२८ मार्च २०२०

उज्ज्वला योजनेंतर्गत 8 कोटी महिलांना मोफत सिलिंडर.

उज्ज्वला योजनेंतर्गत 8 कोटी महिलांना मोफत सिलिंडर देण्यात येणार आहेत. पुढील तीन महिन्यांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
उज्ज्वला योजनेअंतर्गत 8 कोटी महिला लाभार्थ्यांना पुढील तीन महिन्यांसाठी मोफत सिलिंडर देण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.तसंच महिला जनधन खातेधारकांच्या खात्यात पुढील तीन महिन्यांसाठी दर महिन्याला 500 रूपये सरकारकडून भरण्यात येणार आहेत.

तर महिला स्वयंसहायता समुहांना दीनदयाल योजने अंतर्गत 20 लाख रूपयांचं कर्ज देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. यापूर्वी त्यांना या योजनेअंतर्गत 10 लाख रूपयांचे कर्ज देण्यात येत होते.

याव्यतिरिक्त वृद्ध, दिव्यांग आणि विधवा महिलांना पुढील तीन महिन्यांसाठी 1 हजार रूपये देण्यात येणार आहेत. दोन टप्प्यांमध्ये ही रक्कम वितरीत करण्यात येणार असून 3 कोटी लोकांना याचा लाभ मिळणार असल्याचं अर्थमंत्री
म्हणाल्या.

एका ओळीत सारांश, 28 मार्च 2020


*अर्थव्यवस्था*

👉*क्रिसिल संस्थेनी 2021 या आर्थिक वर्षासाठी अंदाजित केलेला भारताचा सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) वृद्धीदर - 3.5 टक्के (5.2 टक्क्यांवरून

👉RBIने बँकांना इतक्या महिन्यांकरिता सर्व मुदत कर्जावरील मासिक हप्ता स्थगित करण्यास परवानगी दिली - तीन.

👉नवा रेपो दर (75 बेसिस पॉईंटने कमी) - 4.40 टक्के.

👉नवा कॅश रिझर्व्ह रेशीयो (CRR) (100 बेसिस पॉईंटने कमी) – 3 टक्के.

👉COVID-19 महामारीचा सामना करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक इतक्या रकमेची अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करणार आहे - सुमारे 3.74 लक्ष कोटी रूपये.

👉COVID-19 महामारीचा सामना करण्यासाठी भारतीय लघोद्योग विकास बँकेनी (SIDBI) सादर केलेली योजना - SAFE (SIDBI Assistance to Facilitate Emergency response against Corona Virus).

*आंतरराष्ट्रीय*

👉या वित्तीय संस्थेनी COVID-19 विषाणूशी लढा देण्यासाठी विविध सरकारांनी केलेल्या उपायांवर नजर ठेवण्यासाठी ‘____ पॉलिसी ट्रॅकर’ सादर केले - आंतरराष्ट्रीय नाणेनिधी.

*राष्ट्रीय*

👉या उद्योग संघटनेनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या पुनर्वसनास मदत करण्यासाठी एक निधी स्थापन केला - भारतीय उद्योग संघ (CII).

*राज्य विशेष*

👉“SMC COVID-19 ट्रॅकर" अनुप्रयोग या राज्य सरकारने सुरू केले - गुजरात.या राज्य सरकारने “मो जीबन” कार्यक्रम सुरू केला - ओडिशा.

*ज्ञान-विज्ञान*

👉या भारतीय कंपनीने केवळ 7500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 'अंबू बॅग' व्हेंटिलेटर विकसित केले - महिंद्रा अँड महिंद्रा.

👉रुग्णालयात संक्रमण रोखण्यासाठी या भारतीय संस्थेनी "संक्रमण-रोधी कापड" विकसित केले - भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) दिल्ली.

*सामान्य ज्ञान*

👉भारतीय लघोद्योग विकास बँक (SIDBI) - स्थापना: 02 एप्रिल 1990; मुख्यालय: लखनऊ, उत्तरप्रदेश.

👉भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) - स्थापना: 01 एप्रिल 1935; मुख्यालय: मुंबई.

👉भारतीय उद्योग संघ (CII) - स्थापना: वर्ष 1895; मुख्यालय: नवी दिल्ली.

👉गुजरात - स्थापना: 01 मे 1960; राजधानी: गांधीनगर.

👉ओडिशा - स्थापना: 01 एप्रिल 1936; राजधानी: भुवनेश्वर.

रेपो दरात पाऊण टक्के कपात.

🔳 भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात पाऊण टक्के कपात करायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा दर सध्याच्या ५ पूर्णांक १५ शतांश टक्क्यावरून ४ पूर्णांक ४ दशांश टक्के होईल.

🔳 रिझर्व्ह बँकेच्या नाणेविषयक धोरण समितीनं आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. रिव्हर्स रेपो दरात ९ दशांश टक्के कपात करून तो ४ टक्क्यावर आणला आहे. एम.एस.एफ. आणि बँक दरही ५ पूर्णांक ४ दशांश टक्क्यावरून ४ पूर्णांक ६५ शतांश टक्के केला आहे.

🔳 सी.आर.आर. अर्थात राखीव रकमेचं प्रमाण १ टक्क्यांनी कमी करून एक वर्षाकरता ३ टक्क्यावर आणला आहे. त्यामुळे १ लाख ३७ हजार कोटी रुपये उपलब्ध होतील. कोविड १९ च्या प्रादुर्भावानंतर भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसत असल्यानं, त्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेनं हे निर्णय घेतले आहेत. 

🔳 कोविड १९ च्या प्रादुर्भावानं उद्योगजगतासह सामान्य नागरिकांनाही आर्थिक चणचण जाणवत असल्याचं लक्षात घेऊन, बँकांनी पुढच्या तीन महिन्यांसाठी कर्जाची वसुली थांबवावी, असा सल्लाही रिझर्व्ह बँकेनं दिला आहे.

🔳 चालु आर्थिक वर्षात तसंच आगामी वर्षात स्थुल राष्ट्रीय उत्पादनाच्या वाढीवर सद्यस्थितीचा परिणाम होईल, एकंदर मागणी घटेल, त्यामुळे नजिकच्या भविष्यकाळात अनिश्चितता आणि नकारात्मक परिणाम दिसतील, असं बँकेनं म्हटलं आहे.

टोकियो ऑलिंपिक आता पुढच्या वर्षी होणार

🔳 २०२० च्या टोकियो ऑलिंपिकसाठी या आधीच पात्र ठरलेल्या खेळाडूंची पात्रता, २०२१ ऑलिंपिकसाठी सुद्धा कायम राहणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं जगभरातल्या ३२ क्रीडा महासंघांसोबत घेतलेल्या टेली कॉन्फरन्समध्ये, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाश यांनी ही घोषणा केली. 

🔳 कोरोना विषाणु संसर्गाच्या जागतिक संकटामुळे यावर्षी २४ जुलै ते ०९ ऑगस्ट दरम्यान पूर्वनियोजित असलेलं टोकियो आलिंपिक स्थगित करून ते पुढच्या वर्षी घेण्याचा निर्णय,आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं जपानचे अध्यक्ष शिंजो अबे यांच्याशी विचारविनिमय करून अलीकडेच जाहीर केला होता.

🔳 ही स्पर्धा जरी एक वर्षानं पुढे ढकलली असली तरी या स्पर्धेतल्या ११ हजार नियोजित स्पर्धकांपैकी ५७ टक्के स्पर्धकांनी आपली पात्रता याआधीच निश्चित केलेली आहे; त्यामुळे त्यांची पात्रता पुन्हा ठरवणं हे अन्यायकारक ठरेल असं बाश यांनी स्पष्ट केलं. 

🔳 उर्वरित ४३ टक्के जागांसाठीची पात्रता निश्चित करण्याकरता घ्यावे लागणारे पात्रता फेरीचे सामने भरवण्यासाठी, ऑलिम्पिक स्पर्धेच्या आधी किमान तीन महिने वेळ द्यावा लागेल. त्यामुळेच स्थगित केलेलं टोकियो ऑलिंपिक, पुढच्या वर्षी नेमक्या कोणत्या कालावधीत घ्यायचं हे अद्याप ठरवता येणार नाही.

🔳 मात्र सहभागी खेळाडूंच्या शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीनं पुढील वर्षी उन्हाळा आटोपण्यापूर्वीच म्हणजे मे-जून  या कालावधीतच ते भरवणं इष्ट ठरेल आणि ही निश्चित तारीख साधारणपणे चार आठवड्यानंतर आम्ही जाहीर करू असा खुलासाही बाश त्यांनी केला

तिसरी पंचवार्षिक योजना


☀️कालावधी:1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966

☀️भर:-कृषी व मूलभूत उद्योग

1962 ला संरक्षण व विकास केला

☀️प्रतिमान:-महालनोबिस व सुखमाय चक्रवर्ती

✍राजकीय घडामोडी:-

1962👉भारत चीन युद्ध

1962👉गोवा मुक्त

1963👉नागालँड

🌻योजना

🔘1964-65:-सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम

🔘1965:-कृषी मूल्य आयोग स्थापन

अद्यक्ष:-प्रो.दांतवाला

शिफारस:-एल के झा समिती

1965👉भारतीय अन्न महामंडळ

1964👉IDBI स्थापन

1964👉UTI स्थापन

✍सर्वाधिक अपयशी योजना

राज्यघटनेतील काही महत्वाच्या घटना दुरुस्त्या

👉 पहिली घटनादुरुस्ती - भारतीय राज्यघटनेत 1951 मध्ये पहिली दुरुस्ती करण्यात आली. या दुरुस्तीने राज्यघटनेत 31-अ आणि 31-ब ही दोन नवी कलमे जोडण्यात आली.

👉 7 वी घटनादुरुस्ती - भाषावर प्रांतरचना करण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्य पुनर्रचनेची योजना अंमलात आणण्यासाठी 1956 मध्ये ही घटनादुरुस्ती करण्यात आली.

👉 17 वी घटनादुरुस्ती  - 1964 मध्ये झालेली ही घटनादुरुस्ती राज्यघटनेतील कलम 31 मधील मालमत्तेच्या हक्काशी संबंधित आहे.

👉 42 वी घटनादुरुस्ती - 1976 साली झालेली ही घटनादुरुस्ती प्रामुख्याने सुवर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार झाली. यामध्ये राज्य घटनेच्या उद्देशपत्रिकेत समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द नव्याने समाविष्ट केले गेले.

👉 44 वी घटनादुरुस्ती - 1978 मध्ये झालेल्या या दुरुस्तीमध्ये 42 व्या घटनादुरुस्ती मधील वादग्रस्त भाग दूर करणे हा उद्देश होता.

👉 52 वी घटनादुरुस्ती - पक्षांतराच्या वाढत्या प्रमाणावर बंधने घालण्याच्या दृष्टीने 1985 साली ही घटनादुरुस्ती केली.

👉 61 वी घटनादुरुस्ती - 1989 साली झालेल्या या घटनादुरुस्तीन्वये घटनेच्या 326 व्या कलमात दुरुस्ती करण्यात आली.

👉 73 वी घटनादुरुस्ती - पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा मिळवून देण्याचे काम 1993 साली झालेल्या घटनादुरुस्तीत करण्यात आले.

👉 86 वी घटनादुरुस्ती - 2002 मधील या घटनादुरुस्तीने घटनेच्या 21 व्या कलमात 21-अ हे नवे कलम जोडण्यात आले.

👉 92 वी घटनादुरुस्ती - 2003 मधील या घटनादुरुस्तीने राज्य घटनेच्या आठव्या परिशिष्टात बदल करण्यात आला.

👉 93 वी घटनादुरुस्ती - 2006 मधील या घटनादुरुस्तीअन्वये अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीयांसाठी अनुदानित किंवा विनाअनुदानित खासगी शिक्षण संस्थांसह शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासंबंधी कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध असणार नाही, अशी तरतूद करण्यात आली.

शरद बोबडे

⏩47 वे सरन्यायाधीश म्हणून निवड

⏩शपथ:-18 नोव्हेंबर 2019

⏩निवृत्त:-23 एप्रिल 2021

✍2000:-मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश

✍2012:-मध्य प्रदेश उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश

✍2013:-सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश

👉सरन्यायाधीश होणारे चौथे महाराष्ट्रीयन आहेत

1)प्रल्हाद गजेंद्रगडकर(7 वे)

2)मोहम्मद हिदायतुलला(11 वे)

3)वाय व्ही चंद्रचूड(16 वे)

🎯अलीकडील सरन्यायाधीश

43:-टी यस ठाकूर

44:-जे यस खेहर

45:-दीपक मिश्रा

46:-रंजन गोगोई

👉आतापर्यंत एकही महिला सरन्यायाधीश झालेली नाही

साक्षरतेच्या बाबतीत भारतातील प्रथम दहा जिल्हे


सेराश्चिप (मिझोराम)-------------------------97.91 टक्के 

ऐझवाल (मिझोराम)-------------------------97.89 टक्के 

माहे (पद्दूचेरी )-----------------------------97.87 टक्के 

कोट्टायम (केरळ)----------------------------97.21टक्के

पठाणमतीता(केरळ)------------------------96.55 टक्के 

चांफाइ(मिझोराम)---------------------------95.91 टक्के 

एरणाकुलम(केरळ)-------------------------95.89 टक्के 

अल्लापुझा(केरळ)---------------------------95.72 टक्के 

कानूर (केरळ)-------------------------------95.10 टक्के 

थ्रिसुर (केरळ)-------------------------------95.08 टक्के     

विदर्भ मराठवाड्यातील एपीएल (केसरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्य

अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा...

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील 14 जिल्ह्यांतील एपीएल (केसरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून एप्रिल, मे आणि जून 2020 या तीन महिन्यांकरिता सवलतीच्या दरात विदर्भ व मराठवाड्यातील या शेतकऱ्यांना प्रतिमाणसी 5 किलो अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री ना. छगन भुजबळ यांनी दिली आहे.

संचारबंदी मोडली तर होणार २ वर्षांपर्यंतची कैद

🔰 देशव्यापी २१ दिवसांचा संचारबंदीची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचं केंद्रीय गृह मंत्रालयान ठरवलं आहे. या निर्णयाचं उल्लंघन करणाऱ्याला आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा करण्यात येईल.

🔰 या २१ दिवसांच्या लोकडाऊन दरम्यान राज्यात आणि केंद्रशासित प्रदेश आणि मधली सर्व सरकारी-निमसरकारी कार्यालयबंद राहतील. तसंच खाजगी कार्यालय देखील बंद राहतील. 

🔰 मात्र नव्या सूचनांनुसार किराणामालाच दुकान, दूध आणि दुग्धजन्य पदार्थची विक्री करणारी  दुकान, पेट्रोलपंप गॅस सिलेंडर विक्री दुकान खुली राहतील. या जीवनावश्यक वस्तू घरपोच पुरवण्याला जिल्हा प्रशासनानं प्रोत्साहन द्यावं असं गृहमंत्रालयानं सांगितलं आहे.

🔰 या वस्तूंचा ई-कॉमर्स द्वारे पुरवठा सुरू राहील. शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था बंदच राहतील. तसंच कोणत्याही धार्मिक कार्यक्रमास मज्जाव करण्यात आला आहे. तसंच अंत्ययात्रेत वीस पेक्षा जास्त लोकांनी जमू नये, अश्या सूचना देण्यात आल्या आहेत.  

🔰 रुग्णालय आणि त्याच्याशी संबंधित आस्थापन खुली राहतील.  रुग्णवाहिका, वैद्यकीयसेवांशी संबंधित कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी  तसंच साफ सफाई कामगार यांची ने-आण करणाऱ्या वाहनांना या निर्बंधतून सूट देण्यात आली आहे. 

🔰 शेअर बाजार, बँका, विमा कार्यालयं आणि एटीएम चालू राहतील. खाजगी सुरक्षा सेवा, पेट्रोल पंप, वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमं, दूरसंवाद यंत्रणा, इंटरनेट इत्यादी चालू राहील मात्र त्यातही शक्यतो घरुन काम करण्यावर भर द्यायचा आहे. 

🔰 बंदीमुळे अडकलेल्या किंवा अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांची राहण्याची सोय असलेली किंवा विलगीकरणासाठी वापरली गेलेली वगळता सर्व हॉटेल्स बंद राहतील.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भारतीय शास्त्रज्ञांनी जैविकदृष्ट्या संवर्धित आणि उच्च प्रथिने असलेले गव्हाचे वाण विकसित केले

🔰कुपोषण निर्मूलनाचा एक प्रयत्न म्हणून त्यादृष्टीने चाललेल्या संशोधनामधून पुण्याच्या आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट (ARI) या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी जैविकदृष्ट्या संवर्धित आणि उच्च प्रथिने असलेले गव्हाचे वाण विकसित केले. या गहूला ‘MACS 4028’ असे नाव देण्यात आले आहे.

🔴गव्हाची वैशिष्ट्ये

🔰या नव्या गहूमध्ये 14.7 टक्के एवढे उच्च प्रमाणात प्रथिने असल्याचे आढळून आले आहे. तसेच जस्तचे प्रमाण 40.3 ppm आणि लोहचे प्रमाण 46.1 ppm एवढे आहे.

🔰नवा गहू ‘डुरम गहू’ या प्रकारातला आहे, जो कोरडा प्रदेशात उगवतो. मुख्यत: पास्ता बनविण्यात वापरला जातो आणि म्हणून पास्ता गहू किंवा मकरोनी गहू म्हणून देखील ओळखला जातो.

🔰नवा गहू हे बुटक्या प्रकारातले वाण आहे आणि त्याची संपूर्ण वाढ होण्यासाठी 102 दिवसांचा कालावधी लागतो आणि त्याची हेक्टरी 19.3 क्विंटल उत्पादन देण्याची क्षमता आहे.

🔰 नवा गहू पर्णनाशक, तणनाशक, तपकिरी किडे, फोलीयर एफिडस् आणि रूट एफिडस् अश्या उत्पादन घटविणाऱ्या रोगांसाठी प्रतिरोधक आहे.

🔰भारताच्या ‘व्हीजन 2022’, ‘कुपोषण मुक्त भारत’ आणि राष्ट्रीय पोषण धोरणाचे ध्येय साध्य करण्यात मदत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) यासाठीच्या कृषी विज्ञान केंद्र (KVK) कार्यक्रमात ‘MACS 4028’ गहू समाविष्ट करण्यात आला आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

ATM मधून पैसे निघाले नाही तरी लागणार दंड, या बँकेने केला नवा नियम : 

जर तुम्ही ‘एटीमएम’मधून पैसे काढायला गेला व तुमच्या खात्यात पुरेसे पैसे नसतील, तर तुम्हाला २५ रुपये दंड आकारला जाणार आहे. खासगी क्षेत्रातील अ‌ॅक्सिस  बँकेने १ एप्रिल २०२० पासून हा दंड वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्यावतीने वेबसाइटवर परिपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत पुरेसे पैसे नसल्याने एटीएमधून पैसे काढता न आल्याबाबत कोणताही दंड आकारला जात नव्हता.

याशिवाय अन्य चार प्रकारच्या दंडाची रक्कम बँकेकडून वाढवण्यात आली आहे. आता NACH व्यवहार अयशस्वी झाल्यावर ६५० रुपये दंड आकारला जाणार आहे, जो आतापर्यंत ५०० रुपये होता. याशिवाय अन्य बँकेचा धनादेश न वठल्यास २५० रुपये, ऑटो डेबिट न झाल्यास ३०० रुपये दंड आकारला जाणार आहे. यासाठी आतापर्यंत २५० रुपये आकारले जात होते. एवढेच नाहीतर बँकेने शाखांबरोबरच्या व्यवहारांसंबंधीचे नियम देखील ठरवले आहेत.

अ‌ॅक्सिस  बँकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार शाखेतून १५ ट्रांजेक्शन मोफत होतील व त्यानंतर प्रत्येक ट्रांजेक्शनला ७५ रुपये पडतील. एवढेच नाहीतर चेकबुक घेण्यासाठी आता १०० रुपये द्यावे लागणार आहेत. अगोदर यासाठी ६० रुपये घेतले जात होते.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

देशातील सर्वाधिक वर्दळीचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सीएसटीएमटी स्थानकाने 2019 मध्ये 132 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तच जाणून घेऊयात लाखोंच्या संख्येने प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या या स्थानकाबद्दलच्या खास गोष्टी…

- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे.
- सीएसएमटी हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आणि त्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे.

- 1878 मध्ये या स्थानकाच्या बांधकामाची सुरुवात झाली. या स्थानकाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी दहा वर्ष लागले. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. त्या काळात कोणतीही इमारत बांधण्यासाठी लागलेला सर्वाधिक वेळ आहे.
- मुंबईच्या बोरीबंदर भागात असलेले हे स्थानक बोरीबंदर स्थानकाच्या जागेवर इ.स. १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधण्यात आले.

- या स्थानकाची रचना फेड्रीक विल्यम स्टीव्हन्स या ब्रिटीश स्थापत्यकाराने केली आहे. या कामासाठी फेड्रीक यांना त्याकाळी १६ लाख १४ हजार रुपयांचे मानधन देण्यात आले होते.
- या स्थानकाची रचना ही लंडनमधील सेंट पॅकार्स रेल्वे स्थानकाशी मिळतीजुळती आहे.

- सीएसटीएमटी स्थानकाची रचना ही व्हिक्टोरियन इटालियन गॉथिक रिव्हायवल प्रकारची आहे.
- स्थानकाच्या मुख्यभागी असलेल्या घड्याळाखाली क्विन एलिझाबेटचा पुतळा होता. मात्र १९५० साली भारत सरकारच्या आदेशानुसार सर्व इमारतींवरील ब्रिटिशांचे पुतळे हटवण्यास सरुवात करण्यात आली. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. त्यामध्येच हा पुतळाही काढून टाकण्यात आला.

- हा पुतळानंतर १९८० पर्यंत राणीच्या बागेत उघड्यावर पडून होता. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. नंतर त्याचे काय झाले यासंदर्भात माहिती अधिकाराअंतर्गत दिलेल्या अर्जात या पुतळ्यासंदर्भात सरकारकडे कोणतीची माहिती नसल्याचे समोर आले.
- हा पुतळा तस्करीच्या माध्यामातून भारताबाहेर नेऊन विकण्यात आला किंवा नष्ट करण्यात आला असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

- मार्च १९९६ पर्यंत या स्थानकाचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हीटी) असे होते. मात्र या स्थानकाचे नामकरण करुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) असे ठेवण्यात आले.
- मार्च १९९६ ते जून २०१७ दरम्यान हे स्थानक छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) नावाने ओळखले जायचे.

- २०१७ साली जून महिन्यामध्ये स्थानकाच्या नावात महाराज हा शब्द लावण्यात आला आणि तेव्हा पासून हे स्थानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) म्हणून ओळखले जाते.
- सीएसएमटी स्थानकामध्ये १८ फलाट असून फलाट क्र. १ ते ७ हे मुंबई उपनगरी मार्गिकेवरील स्थानकाचे आहेत.

- फलाट क्र. ८ ते १८ हे मुख्य मार्गिकेवरील असून तेथून लांब पल्ल्याच्या पॅसेंजर / जलद गाड्या मार्गस्थ होतात.
- महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी छत्रपती शिवाजी टर्मिनस हे एक आश्चर्य ठरले आहे. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली.

- २००८ साली झालेल्या मुंबई हल्ल्यांमध्ये या स्थानकालाही दहशतवाद्यांनी लक्ष्य केले.
- रात्री साडेनऊच्या सुमारास अजमल कसाब आणि त्याचा साथीदार ए के ४७ बंदूका घेऊन अंदाधुंद गोळीबार करत स्थानकामध्ये शिरले. या हल्ल्यात सीएसटी स्थानकावरील ५८ जणांचा मृत्यू झाला तर १०४ जण जखमी झाले.

- स्लमडॉग मिलेनियर या सिनेमातील जय हो हे गाणे या स्थानकात चित्रित करण्यात आले आहे. तसेच २०११ साली आलेल्या रा.वन. सिनेमामध्येही हे स्थानक दाखवण्यात आले आहे.
- मुंबईतील सर्वात गजबजलेले स्थानक असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील प्रवाशांची संख्या घटली आहे.

- मागील  वर्षात म्हणजेच २००७ ते २०१८ दरम्यान सीएसएमटी स्थानकात तब्बल ४७.४ टक्के प्रवाशांची संख्या घटली असल्याचे समोर आले आहे.
- वर्ष २००७-०८ मध्ये प्रवासी संख्या ८.८ कोटी होती. ती, २०१८-१९मध्ये घटून ४.६ कोटी झाली आहे. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. दक्षिण मुंबईतून अनेक कार्यालयांचे मुंबईतील उत्तर आणि पश्चिम भागात स्थलांतर झाले आहे.

- लांब पल्ल्याच्या गाडीतून आरक्षित आणि अनारक्षित प्रवास करणाऱ्या प्रवासी संख्येत २२ लाखाहून ३ लाख म्हणजे जवळपास ४ टक्के घट झाली आहे.
- या स्थानकामध्येच रेल्वेचे एक संग्रहालय असून त्यामध्ये या स्थानकाचा इतिहास चित्ररुपात मांडण्यात आला आहे.
- या स्थानकामधून दर चार ते पाच मिनिटांनी एक लोकल ट्रेन सुटते.

ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

(Oscar The Academy Award Winners)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦सर्वोत्कृष्ट चित्रपट – पॅरासाईट
🚦सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – बाँग जून हो
     (पॅरासाईट)
🚦सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – रेनी झेल्विगर
     (ज्युडी)

🚥सर्वोत्कृष्ट अभिनेता – हॉकिन
     फीनिक्स (जोकर)
🚥सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – लॉरा
     डर्न (मॅरेज स्टोरी)
🚥सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – ब्रॅड
     पिट (वन्स अपॉन अ टाईम इन
     हॉलिवूड)

🚦सर्वोत्कृष्ट मूळ गीत – आय अॅम गॉना
     लव्ह मी अगेन (रॉकेटमॅन)
🚦सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअर
     – जोकर
🚦सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट
     – पॅरासाईट

🚥सर्वोत्कृष्ट आधारित पटकथा
    – जोजो रॅबिट
🚥सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा – पॅरासाईट
🚥सर्वोत्कृष्ट केशभूषा आणि रंगभूषा –
    बॉम्बशेल

🚦सर्वोत्कृष्ट वेशभूषा – लिटील वूमन
🚦सर्वोत्कृष्ट दृश्य परिणाम – 1917
🚦सर्वोत्कृष्ट छायाचित्रण – 1917

🚥सर्वोत्कृष्ट संकलन – फोर्ड व्हर्सेस
     फरारी
🚥सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रण – 1917
🚥सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन – फोर्ड
     व्हर्सेस फरारी

🚦सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट – लर्निंग टू
🚦स्केटबोर्ड इन अ वॉरझोन (इफ यू आर
    अ गर्ल)
🚦सर्वोत्कृष्ट माहितीपट – अमेरिकन
     फॅक्टरी

🚥सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट – हेअर
     लव्ह
🚥सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट – टॉय
      स्टोरी 4                               सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन लघुपट – द
     नेबर्स विंडो
-  सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन – वन्स
     अपॉन अ टाईम इन हॉलिवूड

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...