१३ मार्च २०२०

काश्मीरमध्ये नवा राजकीय पक्ष

● मेहबुबा मुफ्ती सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून काम केलेल्या अल्ताफ बुखारी यांनी काश्मीरमध्ये 'अपनी पार्टी' नावाचा नवीन राजकीय पक्ष स्थापन केला आहे.

🗣 अल्ताफ बुखारी म्हणाले..

▪ या भागताील सामान्य लोकांचा हा पक्ष असेल, त्यामुळेच याचं नामकरण 'अपनी पार्टी' असं करण्यात आलं आहे.

▪ आमच्यासमोर खूप साऱ्या अपेक्षा आणि आव्हानं आहेत, मी जम्मू-काश्मीरच्या लोकांना विश्वास देऊ इच्छितो की माझी इच्छाशक्ती मजबूत आहे.

★ यांनी दिला पाठिंबा :
माजी मंत्री आणि डेमोक्रेटिक पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष गुलाम हसन मीर, पीडीपीचे माजी आमदार दिलावर मीर, नूर मोहम्मद शेख, अशरफ मीर आणि माजी काँग्रेस आमदार फारुख अंद्राबी, इरफान नकीब आणि इतर स्थानिक नेते

★ दरम्यान, कलम 370 हटवल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण असून येथील अनेक नेते नजरकैदेत आहेत.

★ या पार्श्वभूमीवर नवीन राजकीय पक्षाचा उदय झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

भारत: ‘हिंद महासागर आयोग’ याचा पाचवा निरीक्षक

🔸 6 मार्च 2020 रोजी भारत हिंद महासागर आयोगाचा पाचवा निरीक्षक झाला. माल्टा, चीन, युरोपीय संघ आणि फ्रेंच लोकांचा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ ला फ्रान्कोफोनी हे आयोगाचे इतर चार निरीक्षक आहेत.

🔰 मुख्य बाबी

🔸 या आयोगाचा निरीक्षक बनल्यामुळे भारताला पश्चिम हिंद महासागरातल्या आफ्रिका खंडाच्या आग्नेय किनाऱ्यास जोडणार्‍या आपल्या योजनांचा विस्तार करण्यात मदत होणार.

🔹 हिंद-प्रशांत क्षेत्रातल्या पश्चिम भागासोबत भारताच्या हितसंबंधांचे समर्थन करणे हा या निवडी मागचा हेतू आहे. तसेच हिंद क्षेत्रातल्या प्रत्येकासाठी सुरक्षा आणि वृद्धी धोरणाचा देखील भारताला फायदा होणार.

🔰 हिंद महासागर आयोग

🔸 1982 साली मॉरीशस देशाच्या पोर्ट लुईस या शहरात हिंद महासागर आयोग (Indian Ocean Commission -IOC) याची स्थापना झाली. या समूहात मॉरीशस, मेडागास्कर, कोमोरोस, फ्रान्स आणि सेशल्स अश्या पाच आफ्रिकी हिंद महासागर राष्ट्रांचा समावेश आहे.

राज्यातील शाळांमध्ये ‘मुलींचा आदर’ संकल्पना राबवण्याचे निर्देश

🔰 जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘मुलींचा आदर’ ही संकल्पना मध्यवर्ती ठेवून राज्यभरातील शाळांमध्ये विविध उपक्रम आयोजित करण्याचे निर्देश शालेय शिक्षण खात्याने शुक्रवारी दिले.

🔰८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणे, मुलींप्रती आदर व्यक्त करणे, हक्काची जाणीव निर्माण करणे व अन्य हेतू ठेवून विविध कार्यक्रमांचे आयोजन शालेय पातळीवर करण्याची सूचना आहे. ८ मार्चला रविवार असल्याने ९ मार्चपासून सुरू होणाऱ्या आठवडय़ात हे उपक्रम राबवायचे आहेत.

🔰इयत्ता चौथी ते आठवीचे वर्ग असणाऱ्या शाळांमध्ये मुलां-मुलींसाठी चांगल्या-वाईट स्पर्शाबाबत जागृती करणे. शारीरिक, मानसिक  त्रास किंवा लैंगिक शोषण यासारखे प्रसंग घडल्यास त्याची माहिती शिक्षक, पालक किंवा मित्रांना देण्याबाबत अवगत करण्याचे मार्गदर्शन अपेक्षित आहे.

🔰माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये जीवन कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्याची सूचना आहे. या माध्यमातून मुलगा-मुलगी समानता, कौटुंबिक नातेसंबंध, हार्मोन्समुळे होणारे शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळीचे व्यवस्थापन याबाबत जागृती करायची आहे. आठवी ते दहावी इयत्तेतील मुला-मुलींसाठी ‘मुलींचा आदर’ या विषयावर चर्चासत्र होतील. मुलगा-मुलगी समान असल्याची भावना पालकांमध्ये निर्माण होण्यासाठी मुली जी कामे करतात ती कामे मुलांनीही करावी, असे समानतेचे विचार रुजवण्याच्या हेतूने पालकसभा, माता-पालक संघाच्या बैठकी घेण्याचे निर्देश आहेत.

काही ऐतिहासिक ग्रंथ

◾️अर्थशास्त्र - कौटिल्य

◾️नितिसार - कमंडक

◾️शुक्र नितीसार - शुक्र

◾️ब्रहस्पत्य अर्थशास्त्र - ब्रहस्पती

◾️रजत रंगिनी - कल्हण

◾️अष्टाध्यायी - पाणिनी

◾️गार्गी संहिता - गार्गी

◾️महाभास्य - पतंजली

◾️मलविकाग्निमित्र - कालिदास

◾️मुद्राराक्षस - विशाखादत्त

बिमल जुल्का यांची मुख्य माहिती आयुक्तपदी शपथ

▪️शपथ -
      राष्ट्रपती रामनाथ कोविंद

▪️ निवड पद्धत -
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय निवड समिती

▪️कार्यभार  सध्या -
या पदावरून सुधीर भार्गव ११ जानेवारी २०२० रोजी निवृत्त झाले. त्यानंतर हे पद रिक्त होते. जुल्का यांची या पदावर नियुक्ती करण्यात  आली

🔹बिमल जुल्का यांच्याविषयी
नाव -  बिमल जुल्का
जन्म- २७-०८- १९५५

▪️ अनुभव :

- निदेशक, औद्योगिक विकास विभाग, वाणिज्य एवं उद्योग मंत्रालय

- आयुक्त, जनसंपर्क, मध्य प्रदेश सरकार

- निदेशक, नागरिक उड्डयन मंत्रालय, भारत सरकार

- आयुक्त, ग्वालियर डिवीज़न, मध्य प्रदेश

- संयुक्त सचिव (जी/एयर), रक्षा मंत्रालय, भारत सरकार

- रेजिडेंट आयुक्त, मध्य प्रदेश सरकार, नई दिल्ली

अपर सचिव और महा निदेशक (मुद्रा), आर्थिक कार्य विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार, नई दिल्ली

- अपर सचिव / विशेष सचिव और वित्तीय सलाहकार, विदेश कार्य मंत्रालय, भारत सरकार

-  भारत सरकार के सचिव, सूचना एवं प्रसारण मंत्रालय

▪️ केंद्रीय माहिती आयोग (Central Information Commission - CIC) बाबत थोडक्यात

- स्थापना
१२ ऑक्टोबर २००५

▪️ स्थापना कायदा
- माहिती अधिकार (Right to Information - RTI) कायद्यांतर्गत

▪️अधिकारिता
सर्व केंद्रीय सार्वजनिक प्राधिकरणे केंद्रीय माहिती आयोगाच्या अखत्यारीत असतात
—————————————————

नागरी उड्डयण क्षेत्रातल्या 100 टक्के थेट परकीय गुंतवणूकीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता


नागरी उड्डयण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सरकारी एअर इंडिया लिमिटेड या कंपनीच्या बाबतीत गुंतवणुकीचे धोरण बदलण्याच्या उद्देशाने केंद्रीय मंत्रिमंडळाने सध्याच्या थेट परकीय गुंतवणूक (FDI) धोरणात दुरुस्ती करण्यास मान्यता दिली आहे.

या निर्णयामुळे एअर इंडियामध्ये अनिवासी भारतीयांना स्वयंचलित मार्गाने 100 टक्के परकीय गुंतवणूकीला परवानगी देण्यात येणार.

नव्या निर्णयामुळे एअर इंडियामध्ये सरकारचा कोणताही हिस्सा नसणार आणि ती संपूर्ण खासगी मालकीची बनणार. म्हणूनच, एअर इंडियाला परदेशी गुंतवणूकीच्या मार्गाने इतर अनुसूचित विमान कंपनींच्या श्रेणीत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतातील शिक्षणासंबंधी आयोग/समित्या

1. सनदी कायदा 1813
2. एलफिन्स्टनची सरकारी पुस्तिका
3. Committee of Public Instruction by गव्हर्नर जनरल अॅडम
4. लाॅर्ड मेकाॅलेचा प्रस्ताव 1835
5. चार्ल्स वुडचा खलिता (1854) भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा
6. हंटर शिक्षण आयोग (1882) प्राथमिक व माध्यमिक शिक्षणावर भर
7. थाॅमस रॅले आयोग (1902) भारतातील विद्यापीठय शिक्षणाचा आढावा
8. भारतीय विद्यापीठ कायदा (1904)
9. सॅडलर आयोग (1917) विद्यापीठय शिक्षण समस्येच्या अभ्यासासाठी
10. हार्टोग समिती (1929) प्राथमिक शिक्षणाला राष्ट्रीय महत्त्व द्यावे
11. सार्जंट योजना (1944)
12. राधाकृष्णन आयोग (1948)
13. कोठारी आयोग (1964)

अर्मेनियाचा भारतासोबत 40 दशलक्ष डॉलरचा संरक्षण करार झाला

युरोपमधल्या अर्मेनिया या देशाने शस्त्रास्त्रे शोधणारे रडार याचे चार संच पुरवण्यासाठी भारताची निवड केली आहे. हा 40 दशलक्ष डॉलर एवढ्या रकमेचा संरक्षण करार आहे.

या करारानुसार भारत देशातच तयार करण्यात आलेले 4 ‘SWATHI’ रडार अर्मेनियाला पुरवेल.

‘SWATHI’ रडार संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) यांनी विकसित केले असून भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) निर्मित आहे. हे रडार त्याच्या 50 किलोमीटरच्या क्षेत्रात शत्रुची शस्त्रास्त्रे शोधण्यास सक्षम आहे.

⌛️अर्मेनिया हा पश्चिम आशिया आणि युरोपच्या काकेशस क्षेत्रात वसलेला एक पर्वतीय देश आहे. देशाची राजधानी येरेवन हे शहर आहे आणि द्राम हे राष्ट्रीय चलन आहे.

RaIDer-X”: DRDO आणि IISc बंगळुरू यांनी तयार केलेले नवे स्फोटक शोधन यंत्र

◾️पुणे (महाराष्ट्र) या शहरात झालेल्या राष्ट्रीय स्फोटक शोधन कार्यशाळेत “RaIDer-X” नावाचे एक नवीन स्फोटक शोधन यंत्र सादर करण्यात आले. हे यंत्र दूर अंतरावरून देखील स्फोटके शोधू शकते.

◾️शुद्ध स्वरुपातली तसेच मिश्रण असलेली रसायने वापरून बनवलेल्या स्फोटकांबद्दल या यंत्राच्या माहितीकोषात माहिती भरल्यास तशी अनेक प्रकारची स्फोटके हे यंत्र शोधू शकते. आवरणाखाली असलेली स्फोटके शोधण्यातही हे यंत्र सक्षम आहे.

◾️पुण्याची संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) यांची उच्च ऊर्जा सामुग्री संशोधन प्रयोगशाळा आणि बंगळुरूची भारतीय विज्ञान संस्था यांनी संयुक्तपणे हे यंत्र विकसित केले आहे.

🔰संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO)..

◾️या संस्थेची स्थापना 1958 साली झाली. पंतप्रधानांच्या शास्त्रीय सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था राष्ट्रीय सुरक्षेसाठी लागणार्‍या अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि उपकरणांचा विकास करणे, संशोधन करणे, संशोधन कार्यक्रम राबवणे इ. कार्य करते. उड्डयण शास्त्र, अग्निबाण व क्षेपणास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, वाहन, अभियांत्रीकी यंत्रणा इत्यादी क्षेत्रात काम करते. संस्थेमध्ये 52 प्रगत प्रयोगशाळा आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आयुष मंत्रालयाचा ‘आयुष ग्रिड’ प्रकल्प

🔸भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने "आयुष ग्रिड" नावाचा देशव्यापी डिजिटल व्यासपीठ उभारण्यासाठी पावले उचलली आहेत, ज्याचा उद्देश रुग्णालये आणि प्रयोगशाळांसह आयुष (आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, सोवा रिग्पा आणि होमिओपॅथी - AYUSH) सुविधा उपलब्ध करून देणे आणि आरोग्य सेवांच्या पारंपारिक यंत्रणेला चालना देणे हा आहे.

🔸वर्तमानात, मंत्रालयाने आयुष हॉस्पिटल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टम (A-HMIS), टेली-मेडिसिन, योगालोकेटर अॅप्लिकेशन, भुवन अ‍ॅप्लिकेशन, योग पोर्टल, केस रेजिस्ट्री पोर्टल इत्यादी प्रायोगिक प्रकल्प सुरू केले आहेत आणि पुढे आयुष ग्रिड प्रकल्पात या प्रकल्पांचा समावेश केला जाणार आहे.

🔸वर्ष 2023-24 पर्यंत आयुष मंत्रालयाने देशभरात 12,500 आयुष आरोग्य व निरोगी केंद्रे (AYUSH HWC) उभारण्याचा प्रस्ताव देखील ठेवला आहे. या योजनेसाठी पाच वर्षांच्या कालावधीत प्रस्तावित एकूण आर्थिक खर्च 3399.35 कोटी रुपये इतका येण्याचे अपेक्षित आहे.

गर्भवतींसाठी ‘यशोदा माता अंगत-पंगत योजना’


-----------------------------------------------------
● आदिवासी, दुर्गम भागांतील गर्भवतींचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी महिला व बालविकास विभागाने ‘यशोदा माता अंगत-पंगत’ ही अभिनव योजना हाती घेतली आहे.

■ काय आहे योजना ■ : -

●  एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ‘यशोदा अंगत-पंगत’ ही नाविन्यपूर्ण संकल्पना राज्यभरात राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत गरोदर मातांनी अंगणवाडी केंद्रात एकत्र येऊन सहभोजन करावयाचे आहे.

● सहभोजनादरम्यान अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्या (एएनएम) गरोदर मातांना पोषण आहाराबाबतचे महत्त्व सांगणार आहेत.

●  त्याचबरोबर आरोग्य विभागामार्फत भोजनानंतर लोह आणि फॉलिक ॲसिडच्या (आयएफए) गोळ्या अंगणवाडी केंद्रातच देण्यात येणार आहे.

● राज्यातील 97 हजार अंगणवाडय़ा व 13 हजार मिनी अंगणवाडय़ांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

● प्रायोगिक तत्त्वावर नांदेड जिल्हा परिषदेत राबविण्यात आलेली ही योजना आता संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे.
--------------------------------------------------------
  

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) करोना व्हायरसने जगात महारोगराई पसरल्याचं घोषित केलं आहे.


◾️ करोना व्हायरस जगातील १०० देशांमध्ये फोफावला आहे.

◾️ या व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात ४ हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

◾️या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) करोना व्हायरसने जगात महारोगराई पसरल्याचं घोषित केलं आहे.

◾️तसंच करोनाविरोधात संपूर्ण जगाने आता एकजुट होऊन लढावं, असं आवाहनही जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे. भारतातील करोना रुग्णांची संख्या वाढून ६७ वर पोहोचली आहे.

◾️महाराष्ट्रात करोनाचे ११ रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यानंतर, मुंबई आणि नागपूरमध्ये करोनाचे रुग्ण आढळले आहेत. याशिवास केरळमध्ये करोनाचे नवीन ८ रुग्ण आढळलेत. उत्तर प्रदेशात ९ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. तर दिल्ली आणि राजस्थानमध्ये १-१ असे आणखी दोन नवीन करोनाचे रुग्ण आढळलेत.

◾️१५ एप्रिलपर्यंत पर्यटकांचे व्हिसा रोखले

◾️देशातील करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालल्याने केंद्र सरकारने आणखी खबरदारीची पावलं उचलली आहेत.

◾️चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशांमधून १५ फेब्रुवारीनंतर येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस स्वतंत्र कशात ठेवण्यात येणार आहे.

◾️तसंच १५ एप्रिलपर्यंत पर्यटन व्हिसाही सरकारने बंद केला आहे. हा निर्णय १३ मार्चपासून लागू होणार आहे.

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

लिंगाधारित अर्थसंकल्प [Gender Budget]

- या संकल्पनेचा उद्य 90 च्या दशकात झाला.
- जागतिक महिला परिषद 1995 नंतर "युनिफेम"तर्फे 1996 मध्ये द. आफ्रिका, पूर्व आफ्रिका, दक्षिण पूर्व आशिया, मध्य अमेरिका या भागात या संकल्पनेवर काम सुरू झाले.
- ही संकल्पना सर्वप्रथम ऑस्ट्रेलियात स्विकारण्यात आली.
-----------------------------------------
● नक्की संकल्पना काय ?

- जेंडर बजेट म्हणजे महिलांसाठी वेगळा अर्थसंकल्प नव्हे, तर अर्थसंकल्पातील विविध प्रस्तावांचे महिलाकेंद्रित विश्लेषण होय.
- थोडक्यात स्त्रियांच्या स्थितीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या वित्तीय सुधारणांचे अंतिम परिणाम मोजणे म्हणजे जेंडर बजेट.
--------------------------------------
● भारतात सुरूवात

- सर्वप्रथम 2001 मध्ये या संकल्पनेवर विचार होवू लागला.
- तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या 2000-2001 च्या अर्थसंकल्पीय भाषणात पहिल्यांदा जेंडर बजेटचा उल्लेख झाला.
- 2004 मध्ये केंद्र सरकारने ही संकल्पना स्विकारली तर 2005 पासून त्यावरचे परिशिष्ट हा बजेटचा भाग बनले. माहिती संकलन वैभव शिवडे
- ओरिसा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार, केरळ, इ. राज्यांनी या संकल्पनेची अंमलबजावणी केली.
---------------------------------------
● महाराष्ट्रात सुरूवात

- राज्यात 2013 मध्ये जेंडर बजेट ही संकल्पना स्विकारण्यात आली.
- 1994, 2001 आणि 2014 अशी तीन महिला धोरणे महाराष्ट्र सरकारने तयार केली आहेत.
- 1992 पासून राज्यात नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिला व बालकल्याण समिती स्थापने बंधनकारक करण्यात आले आहे.
- महापालिकेच्या एकूण बजेटपैकी 5% रक्कम जेंडर बजेटसाठी राखून ठेवण्याचे बंधनकारक आहे.
-------------------------------------
● जेंडर बजेटची उद्दिष्टे

- महिलांच्या सामाजिक समानतेसाठीच्या प्रमुख गरजा ओळखून त्यांची क्रमवारी लावून, त्यासाठी सुयोग्य आर्थिक तरतूद करणे.
- टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी
- सामाजिक योजना आणि आर्थिक तरतुदी यांची सांगड घालणे.
- विशेष सामाजिक योजनांवरील खर्चावर नियंत्रण ठेवणे.
--------------------------------------
● अर्थसंकल्पाची कार्यपद्धती

- लिंगाधारित अर्थसंकल्पासाठी स्वतंत्र आदेश जारी करणे.
- माहिती संकलन वैभव शिवडे
- जेंडर बजेट सेल स्थापन करणे.
- जेंडर बजेट अहवाल प्रसिद्ध करणे.
-----------------------------------
● जेंडर बजेटसाठी प्रशिक्षण

Vaikunth Mehta National Institute of Cooperative Management [VAMNICOM] Pune या संस्थेच्या Centre for Gender Studies मार्फत जेंडर बजेट संबंधी मार्गदर्शन, जागरूकता आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

पोलीस भरती प्रश्नसंच


*महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी _____ नावाने ओळखली जाते.*

A) सायरस
B) ध्रुव
C) पूर्णिमा
D) अप्सरा ✅✅

*सर्वसाधारण सूत्र अलकाइनसाठी _____ हे असते.*

A) CnH2n 2
B) CnH2n
C) CnH2n-2 ✅✅
D) वरीलपैकी कोणतेही नाही

: *इलेक्ट्रॉनचा शोध _____ याने लावला.*

A) सर जे.जे. थॉमसन ✅✅
B) गोल्ड स्टिन
C) जेम्स चॅडविक
D) रुदरफोर्ड

*'नवलाई, गारवा, मित्रत्वे, शहाणपणा, देवत्व' ही नामाच्या कोणत्या प्रकारात येतात ? *

A) विशेषण
B) विशेषनाम 
C) भाववाचक नाम ✅✅
D) सर्वनाम

*चूक की बरोबर.

a. कर्तरि प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्त्यांच्या लिंग-वचने-पुरुषानुसार बदलते

.b. कर्तरि प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग-वचनानुसार बदलते. *

A) केवल b बरोबर ✅✅
B) केवल a बरोबर
C) a आणि b बरोबर
D) a आणि b चूक

*जर दोन किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्व बोधक अव्ययानी जोडली तर  ___ वाक्य तयार होते.*

A) संयुक्त ✅✅
B) मिश्र
C) केवल
D) उभयान्वयी अव्यय

*पुढील विधाने वाचा.

a. होकारार्थी वाक्यांना करणरूपी वाक्ये म्हणतात.

b. वाक्यात अट असेल तर त्यास आज्ञार्थी वाक्य म्हणतात.

c. क्रियापदाच्या रूपावरून शक्यता, योग्यता, इच्छा या विषयीचा बोध झाल्यास त्यांना स्वार्थी वाक्ये म्हणतात. *

A) फक्त a बरोबर ✅✅
B) फक्त c बरोबर 
C) फक्त a व c बरोबर
D) a, b, c बरोबर

*पुढीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ बरोबर नाही ?*

A) जीव गलबलणे - गहिवरणे 
B) आभाळाला कवेत घेणे - मिठी मारणे ✅✅
C) देणे घेणे नसणे - संबंध नसणे 
D) सोने होणे - सार्थक होणे

: *चहाडी करणे, भांडण करणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.*

A) कानामागे टाकणे 
B) केसाने गळा कापणे 
C) कान लांब होणे 
D) कलागती लावणे ✅✅

*‘अज' या शब्दाचा एक अर्थ आहे बोकड ; तर दुसरा अर्थ कोणता ?*

A) माणूस
B) राक्षस
C) ईश्वर ✅✅
D) गाढव

*अभ्यास केला असता तर तो नापास झाला नसता' या वाक्याचा प्रकार कोणता ?*

A) विध्यर्थी 
B) आज्ञार्थी
C) संकेतार्थी ✅✅
D) स्वार्थी

*'क्ष' आणि 'ज्ञ' ही __ आहेत.*

A) महाप्राण 
B) अल्पप्राण 
C) जोडाक्षरे ✅✅
D) यापैकी कोणतेही नाही

*'कमळ' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. *

A) नलिनी
B) नीरज 
C) पद्म
D) वायस ✅✅

*स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते ?*

A) लॉर्ड माउंटबॅटन्
B) सी. राजागोपालाचारी✅✅ 
C) राजेंद्र प्रसाद
D) वॉरन हेसेटिंग्ज

*नोव्हेंबर 2016 मध्ये 'हॅन्ड इन हॅन्ड 2016' या नावाची संयुक्त लष्करी कवायत पुणे येथे भारत आणि _____ या देशांमध्ये पार पडली.*

A) रशिया
B) अमेरिका
C) चीन ✅✅
D) जपान

चालू घडामोडी प्रश्नसंच

♻️♻️
हे नवनियुक्त मुख्य दक्षता आयुक्त आहेत.
(A) के. व्ही. चौधरी
(B) शरद कुमार
(C) संजय कोठारी✅✅✅
(D) प्रदीप कुमार

♻️
कोणत्या राज्यात ‘शाश्वत विकास ध्येये (SDG) परिषद 2020’ आयोजित केली जाणार आहे?
(A) त्रिपुरा
(B) मिझोरम
(C) मणीपूर
(D) आसाम✅♻️✅✅

कोणते आसाम राज्याचे पहिले "कचरा विरहित गाव" ठरले?
(A) गुवाहाटी
(B) सिलचर
(C) तेजपूर
(D) तिताबोर✅✅✅

‘जागतिक सामाजिक न्याय दिन 2020’ याची संकल्पना काय होती?
(A) क्लोजिंग द इनइक्वलिटीज गॅप टु अचिव्ह सोशल जस्टिस✅♻️✅✅
(B) क्लोजिंग द जेंडर इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस
(C) क्लोजिंग द इकनॉमिक इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस
(D) क्लोजिंग द इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस

♻️♻️♻️
कोणत्या व्यक्तीने ‘2020 ESPN फिमेल स्पोर्टसपर्सन ऑफ द ईयर’ पुरस्कार पटकवले?
(A) सायना नेहवाल
(B) पी. व्ही. सिंधू✅✅
(C) अश्विनी पोनप्पा
(D) ज्वाला गुट्टा

♻️♻️
‘आस्कदिशा’ चॅटबॉट याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. भारतीय रेल्वेनी ऑक्टोबर 2019 या महिन्यात ‘आस्कदिशा’ चॅटबॉट सेवा सादर केली.

2. ‘आस्कदिशा’ चॅटबॉट हे प्रारंभी हिंदी भाषेत सुरू करण्यात आले.

दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)🔰✅✅

♻️♻️
_ या शहरात ‘इंडियन नेव्हल सिम्फॉनिक ऑर्केस्ट्रा 2020’ हा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
(A) भुवनेश्वर
(B) नवी दिल्ली✅✅
(C) भोपाळ
(D) चेन्नई

♻️♻️
____ या संस्थेच्या वतीने ‘5जी हॅकाथॉन’ या कार्यक्रमाची घोषणा केली.
(A) गूगल इंडिया
(B) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय
(C) दूरसंचार विभाग🔰✅✅✅
(D) भारत सरकारच्या सहकार्याने मायक्रोसॉफ्ट

🔰🔰
कोणत्या व्यक्तीने दक्षिणी नौदल कमांडचे चीफ स्टाफ ऑफिसर (ट्रेनिंग) या पदाची जबाबदारी स्वीकारली?
(A) अँटनी जॉर्ज✅👍✅✅✅
(B) अजित कुमार पी.
(C) अतुल कुमार जैन
(D) अनिल कुमार चावला

🔰🔰♻️
_ या शहरात ‘राष्ट्रीय सेंद्रिय खाद्यपदार्थ महोत्सव’चे उद्घाटन झाले.
(A) भोपाळ
(B) हैदराबाद
(C) नवी दिल्ली🔰✅✅👍
(D) लखनऊ

✅🔰♻️
कोणत्या राज्य सरकारने ‘थाई मांगूर’ माशांचे प्रजनन केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला?
(A) तामिळनाडू
(B) पश्चिम बंगाल
(C) आसाम
(D) महाराष्ट्र🔰✅✅👍

🔰♻️
_ हा क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात 100 सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला.
(A) रोहित शर्मा
(B) विराट कोहली
(C) रॉस टेलर🔰🔰✅✅
(D) महेंद्र सिंग धोनी

♻️♻️👍
विद्यार्थ्यांना पाणी पिण्यास प्रोत्साहित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने शाळेच्या तासात कमीतकमी तीन वेळा घंटा वाजवण्याचा अनोखा उपक्रम राबवित आहे?
(A) उत्तरप्रदेश
(B) दिल्ली
(C) कर्नाटक
(D) महाराष्ट्र👍✅✅✅✅✅

✅🔰♻️
फेब्रुवारी 2020 या महिन्यात _ ही कंपनी ‘निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स’ यामध्ये नोंदवली गेली.
(A) महिंद्रा इन्फोटेक
(B) लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक (L&T)🔰✅✅
(C) ट्रायकन इन्फोटेक
(D) यापैकी नाही

🔰🔰
_ या शहरात प्रथम ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ ही स्पर्धा होत आहे.
(A) भुवनेश्वर✅✅✅✅
(B) नवी दिल्ली
(C) कोलकाता
(D) चेन्नई

१२ मार्च २०२०

जादव पायेंग यांना ‘स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार’ जाहीर

‘माय होम इंडिया’ या संस्थेच्या वतीने यावर्षीच्या ‘स्वामी विवेकानंद कर्मयोगी’ पुरस्कारासाठी जादव पायेंग यांची निवड करण्यात आली आहे. मानवनिर्मित जंगल तयार करण्याच्या त्यांच्या सतत प्रयत्नांसाठी जादव पायेंग यांना सहावा कर्मयोगी पुरस्कार दिला जात आहे.

पायेंग यांना हा पुरस्कार 29 फेब्रुवारी 2020 रोजी नवी दिल्लीत एका सोहळ्यात दिला जाणार आहे.

जादव पायेंग (द फॉरेस्ट मॅन)

जादव पायेंग हे भारतातले फॉरेस्ट मॅन म्हणून लोकप्रिय आहेत. ते एक पर्यावरणवादी आणि वन कामगार आहे. ते आसाम राज्याच्या जोरहाट गावाचे रहिवासी आहेत. गेल्या 30 वर्षांपासून त्यांनी वाळवंटीकरणाला आळा घालण्यासाठी ब्रह्मपुत्र नदीच्या लगत एकट्यानेच मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करीत आहेत. त्यांच्या त्या प्रयत्नातून मिळालेले फलित म्हणजे आज तिथली भूमी वन आच्छादित असून ते अनेक नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वन्य प्राण्यांचे घर आहे.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...