२९ फेब्रुवारी २०२०

2020 लीप वर्ष

◾️दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात २८ ऐवजी २९ दिवस येतात.

◾️ लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात एक अतिरिक्त दिवस जोडला जाता. यामुळं फेब्रुवारीचा महिना २९ दिवसांचा होतो.

🔰 लीप वर्ष म्हणजे काय?

◾️पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे तर सर्वांनाच ठावूक आहे. पृथ्वीची सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला ३६५ दिवस लागतात. पण खरंतर, पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी ३६५.२४२ दिवसांचा काळ लागतो.

◾️०.२४२ या वेळ आपण धरत नाही. दर ४ वर्षांनी या वेळेचे मिळून २४ तास होतात. म्हणजे एक पूर्ण दिवस.

◾️ हा एक दिवस वाढल्याने फेब्रुवारीचा महिना २९ दिवसांचा होतो. लीप वर्ष सोडले तर इतर वर्षी फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा होतो.

🔰लीप वर्ष कसं सुरू झालं

◾️ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे वर्षातील फेब्रुवारी महिन्यात २८ च्या ऐवजी २९ दिवस असतात ते लीप वर्ष आहे असं मानण्यात येतं

🔰लीप वर्षाची सुरुवात कधी झाली

◾️येशू ख्रिस्त यांच्या जन्मानंतर चार वर्षांनी पहिलं लीप वर्ष होतं. त्यानंतर दर चार महिन्यांनी लीप वर्ष येतं.

◾️लीप वर्ष कसं ओळखावं

ज्या वर्षाला ४ने भाग जातो त्याला लीप वर्ष असं म्हणतात. उदा, २०२० या आकड्यातील २० ला ४नं

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्तांची घोषणा, परमबीर सिंह स्वीकारणार पदभार

      
*मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे आज सेवानिवृत्त होत आहेत*

- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे आज सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्याजागी कोणत्या अधिकाऱ्याची वर्णी लागते तसंच मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्त होणारा अधिकारी महासंचालक दर्जाचा असेल की अतिरिक्त महासंचालक दर्जाचा असेल, याबाबत उत्सुकता होती. अखेर महासंचालक दर्जाचे परमबीर सिंह यांची आयुक्तपदी नियुक्ती झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.

- परमबीर सिंह यांच्या नियुक्तीसंबंधी प्रेस नोट जारी करण्यात आली आहे. यामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, संजय बर्वे सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्त पदावर सरकारने १९८८ च्या तुकडीतील परमबीर सिंह, महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंध विभाग, महाराष्ट्र, मुंबई या पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची बदलीने नियुक्ती केली आहे.

- दरम्यान परमबीर सिंह यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार अपर पोलीस महासंचालक बिपिन सिंग यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

- संजय बर्वे यांना मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे राज्य सरकारने शुक्रवारी स्पष्ट केलं होतं. तसंच नायगाव पोलीस मुख्यालयात बर्वे यांच्या निरोप समारंभाची तयारीही सुरू करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तपदाची धुरा नव्या अधिकाऱ्याकडे सोपवली जाणार, हे निश्चित झालं होतं. मात्र रात्री उशिरापर्यंत नव्या आयुक्ताच्या निवडीची घोषणा न झाल्याने उत्सुकता वाढली होती.

- गेल्या काही दिवसांपासून आयुक्तपदाच्या निवडीवरून तर्कवितर्काना उधाण आलं होतं. अधिकाऱ्याच्या सेवाज्येष्ठतेसोबत त्याचे कार्य, राजकीय जवळीक आदी बाबींवरून अंदाज लावले जात होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक परमबीर सिंह यांच्यासह अतिरिक्त महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) रजनीश सेठ, केंद्रातील प्रतिनियुक्तीवरून अलीकडेच महाराष्ट्रात परतलेले सदानंद दाते, पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम आदी अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती.

म्यानमारचे राष्ट्रपती यू विन मिंट भारताच्या दौर्‍यावर

◾️म्यानमारचे राष्ट्रपती यू विन मिंट 26 फेब्रुवारी 2020 रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौर्‍यावर आलेत. म्यानमारचे राष्ट्रपती यू विन मिंट यांच्याशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी द्वीपक्षीय चर्चा केल्यानंतर विविध क्षेत्रात सहकार्यासाठी करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.

🔰झालेले सामंजस्य करार

◾️मानवी तस्करी रोखण्यासाठी सहकार्य करण्याच्या संदर्भातला सामंजस्य करार

◾️भारत सरकार आणि युनियन ऑफ म्यानमार सरकारमधील त्वरित प्रभाव करणाऱ्या योजनांना निधीचे सहकार्य करण्याबाबत सामंजस्य करार

◾️राखीव राज्य सरकार आणि भारतीय दूतावास यांगॉन यांच्यात माऊक यू येथे भट्टी आणि रुग्णालय वसाहत आणि ग्वा इथं बीज साठवण गृहे आणि पाणी पुरवठा करण्याबाबत सामंजस्य करार

◾️राखीव राज्य सरकार आणि भारतीय दूतावास यांगॉन येथे यांच्यात राखीव राज्यातल्या पाच शहरांमधल्या वसाहतीत राखीव राज्य विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत सौर ऊर्जेद्वारा विद्युत पुरवठा करण्याबाबत योजना करार

◾️राखीव राज्य सरकार आणि भारत दूतावास (यांगॉन) यांच्यात राखीव राज्य सरकार विकास योजनेच्या अंतर्गत क्वावलाँग-ओहलफायू मार्ग, क्वाँग क्याव पाँग मार्ग निर्मिती संदर्भात योजना करार

◾️सामाजिक आरोग्य कल्याण सुरक्षा आणि पुनर्वसन मंत्रालय, भारतीय दूतावास (यांगॉन) आणि राखीव राज्य विकास योजनेच्या अंतर्गत बालवाडी शाळा उघडण्याच्या संदर्भात सामंजस्य करार

◾️लाकूड तस्करी विरोधी तसेच व्याघ्र संवर्धन आणि वनसंपत्ती देखरेख विषयक सामंजस्य करार

◾️भारत सरकार आणि ऊर्जा व वीज पुरवठा मंत्रालय, म्यानमार यांच्यात पेट्रोलियम उत्पादनांच्या विषयक सामंजस्य करार

◾️दळणवळण क्षेत्रात मंत्रालय भारत सरकार आणि परिवहन आणि संपर्क मंत्रालय म्यानमार यांच्यात संपर्काबाबत सामंजस्य करार

◾️भारत आणि म्यानमार यांच्यात सांस्कृतिक, भाषिक आणि वांशिक संबंध आहेत. म्यानमार भारताचा पाचव्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार असून 2018-19 या वर्षात दोन्ही देशांदरम्यानच्या व्यापारात आठ टक्के वाढ झाली.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मराठी भाषा गौरव दिन

- 27 फेब्रुवारी
- कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस
--------------------------------------------------
● विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज)

- जन्म: 27 फेब्रुवारी 1992, मृत्यू 10 मार्च 1999
- जन्म पुणे येथे तर नाशिक येथे शिक्षण. बी. ए. झाल्यावर १९३४ ते १९३६ या काळात ते चित्रपट व्यवसायात होते.
- आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार
--------------------------------------------------
■ ग्रंथसंपदा:

🎭 नाटके:
दुसरा पेशवा (१९४७), कौंतेय (१९५३), आमचं नाव बाबुराव (१९६६), ययाति आणि देवयानी (१९६६), वीज म्हणाली धरतीला (१९७०), नटसम्राट (१९७१), दूरचे दिवे (१९४६), वैजयंती (१९५०), राजमुकुट (१९५४), ऑथेल्लो (१९६१) व बेकेट (१९७१)

🏵 काव्यसंग्रह:
जीवनलहरी (१९३३), विशाखा (१९४२), किनारा (१९५२), मराठी माती (१९६०), स्वगत (१९६२), हिमरेषा (१९६४) व वादळवेल (१९७०)

📚 कादंबर्‍या:
वैष्णव (१९४६), जान्हवी (१९५२) व कल्पनेच्या तीरावर (१९५६).

📖 कथासंग्रह:
फुलवाली (१९५०), सतारीचे बोल आणि इतर कथा (१९६८), काही वृद्ध, काही तरुण (१९६१), प्रेम आणि मांजर (१९६४) व निवडक बारा कथा (१९६८)
--------------------------------------------------
🏆 पुरस्कार:

- 1974 मध्ये त्यांच्या नटसम्राट ह्या नाटकला साहित्य अकादेमीचे पारितोषिक मिळाले.
- 1987 साली ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. माहिती संकलन वैभव शिवडे.
- त्यांचा विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे.
- 1964 मधील गोव्याच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

कॅथरीन जॉन्सन

◾️ अमेरिकेच्या अपोलो मोहिमा यशस्वी करण्यात ज्या महिलांचा वाटा होता त्यापैकी एक.

◾️त्यांच्या निधनाने प्रखर बुद्धीचा ‘मानवी संगणक’ कायमचा थांबला आहे.

◾️अमेरिकेचे पहिले अवकाशवीर जॉन ग्लेन हे अवकाशात जायला निघाले तेव्हा सगळी पूर्वतयारी झाली होती, पण यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो यानाची कक्षा ठरवण्याचा. त्या काळच्या आयबीएम संगणकावर आकडेमोड सुरू असताना जॉन ग्लेन तेथे आले व म्हणाले : संगणकाचे जाऊ द्या, त्या मुलीला बोलवा, तिलाच विचारा आता नेमके काय करायचे. ती मुलगी म्हणजे कॅथरीन.

◾️ अतिशय प्रतिभावान गणितज्ञ अशीच त्यांची ओळख होती. पश्चिम व्हर्जिनियात जन्मलेल्या कॅथरीन यांचे वडीलही गणितात हुशार होते.

◾️ लहान असतानापासून त्यांना गणिताची व आकडेमोडीची आवड, रस्त्याने जातानाही कशाची तरी मोजदाद करीत जायचे अशी एक वेगळी सवय त्यांना होती.

◾️वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी सगळे शालेय शिक्षण पूर्ण केले. नंतर अठराव्या वर्षी पदवीही घेतली. कॅथरीन यांनी सुरुवातीला शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी केली.

◾️ नंतर नासा म्हणजे तेव्हाच्या एनएसीएमध्ये त्यांनी १९५३ मध्ये अभियंता म्हणून काम सुरू केले.

◾️नासामधील संशोधन निबंधावर प्रथमच त्यांच्या रूपाने एका महिलेच्या नावाची नाममुद्रा उमटली.

◾️ कालांतराने कॅथरीन नासाच्या उड्डाण संशोधन विभागात काम करू लागल्या. तेथे त्यांच्या भूमितीच्या ज्ञानाने सर्वाना चकित केले.

◾️अमेरिकेच्या पहिल्या मानवी अवकाश मोहिमेचा मार्ग तर त्यांनी आखून दिला होताच,

◾️शिवाय अपोलो १३ मोहिमेत नासाच्या कक्षातील सर्व संगणक बंद पडल्यानंतर उपस्थितांच्या डोळ्यांपुढे अंधारी आली असताना, अमेरिकेची अवकाश मोहीम कायमची आटोपल्यात जमा असताना कॅथरीन यांनी आकडेमोड करून सगळा प्रश्न सोडवला.

◾️नंतर संगणक सुरू झाले तेव्हा त्यांनी केलेली आकडेमोड तंतोतंत संगणकावर उमटली आणि सगळेच चक्रावले.

◾️लिंगभेद, वर्णभेद या सगळ्यांवर मात करून स्वत:च्या बुद्धिमत्तेच्या आधारे अवकाश तंत्रज्ञानात नाव कमावणाऱ्या कॅथरीन या नेहमीच सर्वासाठी आदर्श असतील.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भारतातील 10 सर्वात मोठी राष्ट्रीय उद्याने

1. Hemis National Park
- जम्मू आणि काश्मीर
- 4400 KM²

2. Desert National Park
- राजस्थान
- 3162 KM²

3. Gangotri National Park
- उत्तराखंड
- 2390 KM²

4. Mamdapha National Park
- अरूणाचल प्रदेश
- 1985 KM²

5. Khangchendzonga National Park
- सिक्किम
- 1784 KM²

6. Guru Ghasidas (Sanjay) National Park
- छत्तीसगढ
- 1440 KM²

7. Gir Forest National Park
- गुजरात
- 1412 KM²

8. Sundarbans National Park
- पश्चिम बंगाल
- 1330 KM²

9. Jim Corbet National Park
- उत्तराखंड
- 1318 KM²

10. Indravati National Park
- छत्तीसगढ
- 1258 KM²

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मुस्लिमांना शैक्षणिक संस्थांमध्ये, ५ टक्के आरक्षण देणार.

🌅 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुस्लिम समाजाला शैक्षणिक संस्थांमध्ये, पाच टक्के आरक्षण देणारा कायदा करणार असल्याचं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विधान परिषदेत सांगितलं.

🌅 काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याच्या उत्तरादाखल मलिक यांनी ही माहिती दिली.

Maha MPSC Bharti Recruitment 2020 Combined Preliminary Exam

Apply now – MPSC PSI STI ASO 2020 – 806 Posts

MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब पूर्व परीक्षा- २०२० – ८०६ जागा



एकूण जागा – ८०६ जागा




पदांचे नाव –


सहायक कक्ष अधिकारी – MPSC ASO – 67 जागा
राज्य कर निरीक्षक – MPSC STI – 89 जागा
पोलीस उप निरीक्षक – MPSC PSI – 650 जागा





संयुक्त पूर्व परीक्षा योजना –

सामान्य क्षमता चाचणी
प्रश्नांची संख्या – १००
एकूण गुण – १००
माध्यम – मराठी व इंग्रजी
परीक्षेचा कालावधी – एक तास
प्रश्नपत्रिकेचे स्वरूप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी


शैक्षणिक पात्रता – Qualification

1. विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता.
2. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

वय – Age Limit –

1.सहायक कक्ष अधिकारी – 18 ते 38 [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
2.राज्य कर निरीक्षक – 18 ते 38 [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
3.पोलीस उप निरीक्षक – 19 ते 31 [मागासवर्गीय: 03 वर्षे सूट]

पोलीस उपनिरीक्षक (MPSC PSI) पदासाठी विकल्प नमूद करणाऱ्या उमेदवारांकडे उपरोक्त अर्हतेसोबत खालीलप्रमाणे –
किमान शारीरिक अर्हता असणे आवश्यक आहे.

पुरुष –
१) उंची – १६५ सें. मी. (अनवाणी) (कमीत कमी)
२) छाती – न फुगविता ७९ से.मी.
फुगविण्याची क्षमता किमान ५ सें. मी.

महिला –
उंची १५७ सें. मी. (अनवाणी) (कमीत कमी)


पगार –

९३००-३४८०० /- ग्रेड पे रुपये
४३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.



अभ्यासक्रम – MPSC PSI STI ASO 2020 Syllabus –


१) चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील

२) नागरिकशाश्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)

३) इतिहास – आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास

४) भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश -रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्ज्यन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी
५) अर्थव्यवस्था –
भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्य व बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय नीती, इत्यादी
शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी

६) सामान्य विज्ञान – भौतिकीशास्त्र (Physics), रसायनशाश्त्र (Chemistry), प्रमिशास्त्र(Zoology), वनस्पतीशास्त्र(Botany), आरोग्यशास्त्र(Hygiene)

७) बुद्धिमापन चाचणी व अंकगणित –
बुद्धिमापण चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे अजमावण्यासाठी प्रश्न
अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी

Details of Exam –

सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक या पदांवरील भरतीकरीता सध्या आयोगाकडून स्वतंत्र जाहिरात, स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र पूर्व परीक्षा घेतल्या जातात. या तीनही पूर्व परीक्षांसाठी परीक्षा योजना, अभ्यासक्रम, प्रश्‍नसंख्या, गुण, वेळ एकसमान आहेत. तरीही स्वतंत्र पूर्व परीक्षांमुळे प्रत्येक परीक्षेसाठी अर्ज करणे, परीक्षा शुल्क भरणे, पूर्व/अभ्यास, प्रवास, निवास, व्यवस्था, रजा घेणे अशा बाबींवर उमेदवारांना स्वतंत्रपणे व पुन्हा पुन्हा वेळ व पैसा खर्च करावा लागतो. निवड प्रक्रियेतही विलंब होतो.
या बाबी टाळण्यसाठी सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक पदांवरील भरतीकरीता एकच संयुक्त पूर्व परीक्षा MPSC PSI STI ASO 2020 Combine Exam घेण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे.
आता या तीनही पदांकरीता संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरुन, अर्ज करणार्‍या उमेदवारांकडून ते या पैकी एक, दोन किंवा तीनही पदांसाठी बसू इच्छितात काय, याबाबत विकल्प घेण्यात येईल. संबंधित पदांकरीता उमेदवाराने दिलेला/ले विकल्प हा/हे संबंधित पदभरतीकरीता अर्ज समजण्यात येईल/येतील व त्याच्या आधारे तसेच, भरावयाच्या पदसंख्येच्या आधारे, संबंधित पदाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्‍चित करुन, सामाईक पूर्व परीक्षेच्या आधारे तीनही पदांकरीता स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येतील.
त्यानंतर त्या-त्या पदाच्या मुख्य परीक्षेस पात्र ठरणार्‍या उमेदवारांची विद्यमान मुख्य परीक्षा योजना व अभ्यासक्रमाच्या आधारे, स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येईल. पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षांचा अभ्यासक्रम, प्रश्‍नसंख्या, गुण, वेळ अशा इतर बाबींमध्ये कोणताही बदल नाही.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...