२१ फेब्रुवारी २०२०

मेसी, हॅमिल्टनला लॉरेयो पुरस्कार

- सहा वेळा ‘फिफा’चा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावणारा मेसी हा या पुरस्कारासाठी उपस्थित राहू शकला नाही.

- महिलांमध्ये सिमोन बाइल्स तिसऱ्यांदा सर्वोत्तम खेळाडूची मानकरी

- ब्रिटनचा फॉम्र्युला-वन ड्रायव्हर लुइस हॅमिल्टन आणि महान फुटबॉलपटू लिओनेल मेसी यांनी यंदाच्या वर्षांतील सर्वोत्तम क्रीडापटूसाठी दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या लॉरेयो पुरस्कारावर संयुक्तपणे नाव कोरले आहे. २० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच समान मते मिळाल्यामुळे दोघांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

- सहा वेळा ‘फिफा’चा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावणारा मेसी हा या पुरस्कारासाठी उपस्थित राहू शकला नाही. या दोघांनी गोल्फपटू टायगर वुड्स, केनियाचा धावपटू इलिड किपचोग, टेनिसपटू राफेल नदाल आणि मोटोजीपी विजेता मार्क मार्केझ यांच्यावर मात करत हा पुरस्कार पटकावला.

- २०१९च्या जागतिक स्पर्धेत पाच सुवर्णपदके मिळवणारी अमेरिकेची जिम्नॅस्ट सिमोन बाइल्स हिने सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार पटकावला. गेल्या चार वर्षांतील तिचा हा तिसरा पुरस्कार ठरला. याआधी तिने २०१७ आणि २०१९मध्ये सर्वोत्तम महिला खेळाडूच्या पुरस्कारावर नाव कोरले होते. तिने जमैकाची धावपटू शेली अ‍ॅन-फ्रेसर-प्राइस, टेनिसपटू नाओमी ओसाका, अमेरिकेची अ‍ॅथलीट अ‍ॅलिसन फेलिक्स यांचे आव्हान मोडीत काढले.

- दक्षिण आफ्रिकेच्या रग्बी संघाने जर्गेन क्लॉप यांच्या लिव्हरपूल आणि अमेरिकेच्या महिला फुटबॉल संघावर मात करत लॉरेओ जागतिक सांघिक पुरस्कारावर मोहोर उमटवली. दक्षिण आफ्रिका रग्बी संघाने २०१९मध्ये विश्वविजेतेपदावर नाव कोरले होते.

🔹 सचिनला सर्वोत्तम क्षणासाठीचा पुरस्कार

- भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने घरच्या मैदानावर आपल्या संघाला २०११चा विश्वचषक जिंकून देण्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. गेल्या २० वर्षांतील हाच लॉरेयो सर्वोत्तम क्रीडाक्षण ठरला आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळालेल्या सचिनला या पुरस्कारासाठी सर्वाधिक मते मिळाली आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याच्याकडून सचिनने हा पुरस्कार स्वीकारला. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली वानखेडे स्टेडियमवर भारताला विश्वचषक जिंकून दिल्यानंतर सहकाऱ्यांनी सचिनला खांद्यावर उचलून मैदानात फेरी मारली होती. हा क्षण चाहत्यांच्या मनावर कोरला गेला आहे.

- हा पुरस्कार माझ्यासाठी संस्मरणीय आहे. या पुरस्काराचा आनंद मी शब्दांत सांगू शकत नाही. संपूर्ण देशासाठी खचितच आनंद साजरा करण्याचा क्षण मिळाला आहे. त्यामुळेच क्रिकेट या खेळात किती ताकद आहे, याचा अंदाज आला असेल. २२ वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीनंतर मी पहिल्यांदाच विश्वचषक उंचावला होता. तो माझ्या कारकीर्दीतील सर्वोत्तम क्षण होता.
  – सचिन तेंडुलकर
————————————————--

जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग

🚦ट्रान्स सैबेरियन रेल्वे
: मॉस्कोपासून प्याँगयाँगपर्यंचा हा मार्ग जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग म्हणून ओळखला जातो. याची लांबी सुमारे १० हजार २१४ किमी आहे.

🚦द कॅनेडियन, कॅनडा
: कॅनडामधील टोरँटो ते व्हँकुव्हर या शहरांना जोडणारा हा रेल्वेमार्ग ४४६५ किमी लांब आहे. या मार्गावरील प्रवास पूर्ण करण्यासाठी तीन दिवस लागतात.

🚦चीन
: शांघाई ते ल्हासा हा चीनमधील रेल्वेमार्ग 4372 किलोमीटर लांब आहे.

🚦कॅलिफोर्निया, सायफर
: एमेरविले ते शिकागोदरम्यान 3923 किलोमीटरचा रेल्वेप्रवास पूर्ण करण्यासाठी ५१ तास लागतात.

🚦इंडियन पॅसिफिक, ऑस्ट्रेलिया : सिडनी ते पर्थ मार्गावरील 4351
किलोमीटरचा हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ६५ तास लागतात.

🚦विवेक एक्स्प्रेस
: आसाममधील दिब्रुगड ते कन्याकुमारी या मार्गावरील 4237 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी या एक्सप्रेसला ८२ तास लागतात.

पोलीस भरती प्रश्नसंच

🔰…..हे पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे.

अ) सत्यमेव जयते
ब) वंदे मातरम्
क) सदरक्षणाय खलनिग्रहणाय✅✅
ड) जय हिंद

🔰🔰....... हा दिवस देशात पोलिस दिन म्हणून साजरा केला जातो.

अ) २ ऑक्टोबर  
ब) २१ ऑक्टोबर✅✅✅
क) १ नोव्हेंबर
ड) ३१ ऑक्टोबर

✅✅१८३५ मध्ये लॉर्ड मेकॉले यांच्या अध्यक्षतेखाली लॉ कमिशनने …...च्या निर्मितीस प्रारंभ केला.

अ) इंडियन पीनल कोड🔰🔰🔰
ब) मुंबई पोलिस अधिनियम
क) इंडियन एव्हीडंस अॅक्ट
ड) यांपैकी नाही.

♻️♻️१८६१ मध्ये ........ यांनी भारतीय दंडविधान (Indian Penal Code) लागू केला.

अ) लॉर्ड मॅकॉले

ब) लॉर्ड रॉयल

क) लॉर्ड कॅनिंग✅✅✅

ड) रॉबर्ट क्लाईव्ह

🔰🔰कायद्यानुसार IPC मध्ये ........कलमे आहेत.

अ) ३३३

ब) ४४५

क) ३११

ड) ५११✅✅✅✅

🔰🔰भारतीय पुराव्याचा कायदा (Indian Evidance Act) ....... सा लागू झाला.

अ) १८३५

क) १८७२✅♻️♻️✅

ब) १८६१

ड) १८८०

♻️♻️....... हे पहिले पोलिस महासंचालक होत.

अ) ग. वा. मावळंकर

ब) बाळासाहेब खेर

क) शिवाजी देशमुख

ड) कृष्णराव मेढेकर✅✅✅

🔰🔰महाराष्ट्रात साधारणतः ........ लोकसंख्येमागे एक पोलिस स्टेशन

आहे.

अ) ५०,०००

ब) १ लाख✅♻️✅✅

क) ७५ हजार

ड) १.५ लाख

♻️♻️...... हे महाराष्ट्र पोलिसांकडून प्रकाशित होणारे मासिक होय.

अ) केसरी

ब) दक्षता✅♻️✅✅

क) किरण

ड) सावधान

♻️♻️महाराष्ट्रात Dy SP व PSI या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलिस अॅकॅडमी ........ येथे आहे.

अ) मुंबई

ब) लातूर  

क) पुणे

ड) नाशिक✅♻️✅✅✅

२० फेब्रुवारी २०२०

20/02/2020 प्रश्नसंच


◆ माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते ‘रिलेंटलेस’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. हे पुस्तक ____ ह्यांचे आत्मचरित्र आहे.
(A) प्रणब मुखर्जी
(B) यशवंत सिन्हा✅✅
(C) जानकी बल्लभ पटनायक
(D) इंदर कुमार गुजराल

◆ टेक महिंद्रा या कंपनीने कोणत्या शहरात ‘गूगल क्लाउड सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारले?
(A) बेंगळुरू
(B) चेन्नई
(C) नवी दिल्ली
(D) हैदराबाद✅

◆ कोणत्या शहरात ‘द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट’ (TERI) या संस्थेच्या वतीने ‘जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद’ आयोजित केली गेली?
(A) मुंबई
(B) हैदराबाद
(C) नवी दिल्ली✅✅
(D) चंदीगड

◆ कोणता देश शस्त्रास्त्रांच्या उत्पादनात जगातला दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक देश ठरला?
(A) रशिया
(B) फ्रान्स
(C) चीन✅✅
(D)  अमेरिका====पहिल्या क्रमांकावर

◆ कोणत्या शहरात भारतीय रेल्वेनी भारताचा पहिला सरकारी ‘कचर्‍यापासून वीजनिर्मिती’ प्रकल्प कार्यरत केला?
(A) नवी दिल्ली
(B) भुवनेश्वर✅✅
(C) गोरखपूर
(D) कानपूर

♻️♻️
केवडिया सफारी पार्क _____ या राज्यात आहे.
(A) मध्यप्रदेश
(B) गुजरात✅✅
(C) राजस्थान
(D) हिमाचल प्रदेश

♻️♻️
_____ या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ साजरा केला जातो.
(A) 18 फेब्रुवारी
(B) 19 फेब्रुवारी
(C) 20 फेब्रुवारी
(D) 21 फेब्रुवारी✅✅✅

♻️✅♻️
कोणत्या संस्थेला दिवंगत मनोहर पर्रीकर ह्यांचे नाव देण्यात आले आहे?
(A) संरक्षण अभ्यास व विश्लेषण संस्था✅✅✅
(B) संरक्षण संशोधन व विकास संस्था
(C) संरक्षण गुप्तचर संस्था
(D) दिलेल्यापैकी एकही नाही

✅♻️✅
2020 टोकियो ऑलम्पिकचे अधिकृत बोधवाक्य काय आहे?
(A) युनायटेड बाय इमोशन👍✅✅
(B) युनायटेड बाय स्पोर्ट्स
(C) युनायटेड ऑफ स्पिरिट
(D) युनायटेड ऑफ पर्पज

✅✅
भारतीय रोखे व विनिमय मंडळ (SEBI) याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. SEBI ही एक घटनात्मक संस्था आहे.

2. ही भारतातल्या रोखे, समभाग व्यापार बाजारपेठांवर नियंत्रण ठेवणारी संस्था आहे.

दिलेल्यापैकी अचूक उत्तर ओळखा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)✅✅✅✅
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)

♻️♻️♻️
_______ राज्य सरकारने नवी ‘समरक्षने’ योजना लागू केली.
(A) केरळ
(B) कर्नाटक✅✅✅✅
(C) तामिळनाडू
(D) तेलंगणा

✅✅
भारतीय रिझर्व्ह बँकेचे लेखा वर्ष आणि भारत सरकारचे वित्त वर्ष एकच करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती?
(A) बिमल जालान समिती🔰🔰🔰
(B) केळकर समिती
(C) श्रीधर समिती
(D) रघुराम राजन समिती

🔰🔰🔰
‘ब्ल्यु ऑरिजिन प्रोग्राम’ __________ याच्या संदर्भात आहे.
(A) मासे आधारित अर्थव्यवस्थेला चालना देणे
(B) अंटार्क्टिक प्रदेशामध्ये शोधकार्यासाठी NASAचे अभियान
(C) समुद्रकिनारपट्टी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जागतिक महासागर आयोग
(D) अंतराळाचा प्रवास🔰✅✅✅

♻️🔰
भारतीय सीमा निर्धारण आयोग याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. 42व्या सुधारणा कायद्याने 2000 सालापर्यंत मतदारसंघांची सीमा निर्धारण प्रक्रिया थांबवली होती.

2. भारतात सीमा निर्धारण आयोग चार वेळा गठित केले गेले आहेत.

दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही✅♻️✅✅
(D) ना (1), ना (2)

जानेवारी 2020 चा घाऊक किंमत निर्देशांक.


 
सर्व वस्तूंसाठीच्या घाऊक किंमत निर्देशांकात जानेवारी 2020 मध्ये आधीच्या महिन्याच्या तुलनेत 0.1 टक्के वाढ होऊन तो 122.8 वरून 122.9 (तात्पुरती आकडेवारी)वर पोहोचला.

चलनफुगवटा....

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा वार्षिक दर जानेवारी 2020 मध्ये 3.1 टक्के राहिला. आधीच्या महिन्यात तो 2.59 टक्के(तात्पुरती आकडेवारी)  आणि जानेवारी 2019 मध्ये तो 2.76 टक्के होता.

प्राथमिक वस्तू...

या गटाच्या निर्देशांकात 1.1 टक्क्याने घसरण होऊन तो 147.2 (तात्पुरती आकडेवारी) झाला. त्या आधीच्या महिन्यात तो 148.8 होता.

अन्न घटकाच्या निर्देशांकात आधीच्या महिन्याच्या तुलनेत 1 टक्क्याने घसरण होऊन तो 160.8 झाला.

‘खाद्येतर’ घटकाच्या निर्देशांकात 1.4 टक्के घसरण होऊन तो 132.1 पर्यंत खाली आला.

‘खनिजे’ घटकाच्या निर्देशांक 7.2 टक्के घट होऊन तो 142.6 झाला.

‘कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू’ घटकाच्या निर्देशांकात 2.7 टक्के वाढ हाऊन तो आधीच्या महिन्याच्या 88.3 झाला.

इंधन आणि वीज

या गटाच्या निर्देशांकात 1.4 टक्के वाढ होऊन तो 102.7 राहिला.

उत्पादित वस्तू
या गटाच्या निर्देशांकात 0.4 टक्के वाढ होऊन ते 118.5 झाला.

अन्नधान्य आधारित घाऊक किंमत निर्देशांक..

अन्नधान्य आधारित घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर घसरून जानेवारी 2020 मध्ये तो 10.12 टक्के झाला. डिसेंबर 2019 मध्ये तो 11.05 टक्के होता.

पद्मविभूषण पुरस्कार जिंकणारी मेरी कॉम पहिली महिला खेळाडू

🔹 तरनजितसिंग संधू यांची अमेरिकेत भारताचे नवे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या श्रीलंकेमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून कार्यरत आहेत.

🔸 पश्चिम बंगाल सीएएविरूद्ध ठराव संमत करणारे चौथे राज्य ठरले.हिवाळी अधिवेशनात संसदेने नागरिकत्व दुरुस्ती कायदा संमत केला. परंतु बरीच राज्ये या कायद्याला विरोध करीत आहेत. या कायद्याच्या विरोधात पहिला ठराव संमत करणारे केरळ हे पहिले राज्य ठरले. केरळनंतर पंजाब, राजस्थान पश्चिम बंगाल असा क्रम लागतो.

🔹कोलकत्ता येथे हुगळी नदीवर भारताची पहिली अंडरवॉटर मेट्रो बांधली जात आहे

🔸 ओडिशाच्या कोणार्क येथे राष्ट्रीय पर्यटन परिषद आयोजित करण्यात आली आहे

जगातील पहिले योग विद्यापीठ

- भारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ अमेरिकेत चालू वर्षात संशोधनासह स्वतःचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करणार आहे. या अभ्यासक्रमासाठी एप्रिलपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती विद्यापीठ अधिकाऱयांनी दिली आहे.
- विवेकानंद योग विद्यापीठ 50 लाख डॉलर्सच्या अर्थसंकल्पासह लॉस एंजिलिस शहरात उभारण्यात आले आहे.
- केस वेस्टर्न विद्यापीठातील प्राध्यापक श्रीनाथ यांना योग विद्यापीठाशी संबंधित महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर भारतीय योगगुरु एच.आर. नागेंद्र याचे अध्यक्ष असतील. अभ्यासक्रम ऑगस्ट 2020 पासून सुरू होणार आहे.
- विद्यापीठाने योगवर आधारित उच्चशिक्षण उपलब्ध करण्यासाठी नोव्हेंबर 2019 मध्ये ब्युरो फॉर प्रायव्हेट पोस्टसेकंड्री एज्युकेशन, कॅलिफोर्नियाकडून अधिकृत मान्यता प्राप्त केल्याच्या तीन महिन्यांमध्येच ही घोषणा केली आहे.
-  ‘वायु’ची संकल्पना नासाचे माजी वैज्ञानिक नागेंद्र यांचीच आहे. नागेंद्र हे मागील 4 दशकांपासून योगप्रसार तसेच त्याच्या शिक्षणासाठी कार्यरत आहेत.
- भारतात 2002 मध्ये पहिले योग विद्यापीठ स्थापन करण्यात आले होते. त्यानंतरच नागेंद्र यांनी योगवर आधारित उच्चशिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ सुरू करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता.
- विद्यापीठामुळे अमेरिकेतील हजारो योगशिक्षकांना मदत मिळणार असल्याचे विधान विद्यापीठाच्या संचालक मंडळाचे सदस्य प्रेम भंडारी यांनी केले आहे

विठ्ठल रामजी शिंदे ऊर्फ महर्षी शिंदे

( जमखिंडी, २३ एप्रिल, इ.स. १८७३ - २ जानेवारी, इ.स. १९४४) हे मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक व लेखक होते.

जीवनसंपादन

शिंदे यांनी पुण्याच्या फर्गुसन कॉलेजमधून बी.ए.ची पदवी मिळवली. कायद्याच्या शिक्षणाचे प्रथम वर्ष उत्तीर्ण केल्यावर ते एल्एल.बी. परीक्षेकरिता मुंबईला गेले.तेथे ते प्रार्थना समाजातदाखल झाले. १८ ऒक्य़ोबर, इ.स. १९०६ रोजी महर्षी शिंदे यांनी ‘'डिप्रेस्ड क्लास मिशन’' या संस्थेची स्थापना केली. त्यांनी इ.स. १९२८ साली पुणे येथे शेतकरी परिषद भरवली.

🌺 लेखन 🌺

शिंदे यांनी वेगवेगळ्या कालखंडात रोजनिशी लिहिली. पहिल्यांदा १८९८ मध्ये फर्ग्युसन कॉलेजात शिकत असताना, मग १९०१-३ या काळात इंग्लंडमध्ये धर्मशिक्षण घेत असताना, व त्यानंतर कायदेभंग सहभागाबद्दल शिक्षा झाल्यानंतर १९३० साली येरवडा तुरुंगात असताना त्यांनी रोजनिशींचे लेखन केले आहे. याशिवाय १९२८ साली शिंदे यांनी 'ब्राह्मसमाज शतसांवत्सरी सफर' नावाची रोजनिशी लिहिली आहे. या चारही रोजनिशीत महर्षी शिंदे यांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते.

पहिल्या तीन रोजनिशींचे संपादन १९७९ साली गो. मा. पवार यांचे असून 'ब्राह्मसमाज शतसांवत्सरी सफर' या नावाच्या चौथ्या रोजनिशीचे संपादन रणधीर शिंदे यांचे आहे.

वि.रा. शिंदे यांच्या आत्मपर लिखाणाचे अनेक खंड प्रकाशित झाले आहेत. पहिल्या खंडात ’भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न : संशोधन आणि चिंतन’ हे लेखन आहे. दुसर्‍या खंडात महर्षी श‌िंदे यांच्या चार रोजनिशींचा समावेश असून, 'माझ्या आठवणी व अनुभव' हे पावणे ४०० पानी आत्मचरित्र व काही प्रवासवर्णने आहेत.

आत्मचरित्र

'माझ्या आठवणी व अनुभव' नावाचे हे आत्मचरित्र तीन भागांत विभागले असून पहिल्या भागात त्यांनी आपला जीवनवृत्तान्त सांगितला आहे. तर उर्वरित भागात शिंदे यांच्या ब्राह्मसमाज, प्रार्थना समाज, डिप्रेस्ड क्लासेस मिशन या सामाजिक व राजकीय कार्याचे विवेचन आहे. लहानपणी त्यांच्या घरी अनेकजण येत. त्यात साधू, रामदासी, संन्यासी व सिद्ध येत. त्यांचे लहानपणाचे अनुभव मोठे हृदयस्पर्शी आहेत. आपल्या वाड्यात सर्व शाळासोबती कसे जमत असत व त्यातून धांगडधिंग्याचा जिमखाना कसा बनत असे, हे ते सांगतात. शेतकरी चळवळी व परिषदांचे वृत्तान्त या आत्मनिवेदनात आहेत

दुसऱ्या मतदारसंघातूनही करता येणार मतदान

◾️तुम्ही राहताय मुंबई, ठाण्यात किंवा पुण्यात, तुम्ही मतदारही तिथलेच आहात; पण मतदानाच्या दिवशी काही कारणाने चेन्नई, बेंगळुरू, किंवा दिल्लीत आहात. अशा वेळी तुमचे मतदान हुकणार हे निश्चित.

◾️मात्र, मतदारांना अशा स्थितीत त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक आयोगाने पावले टाकण्यास सुरुवात केली असून, या कामी 'आयआयटी मद्रास'चे सहकार्य घेण्यात येत आहे.

◾️आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग मतदानासाठी करणारा हा प्रकल्प सध्या तरी संशोधन-विकासाच्या पातळीवर आहे.

◾️ ब्लॉक चेनप्रणालीचा वापर त्यासाठी करण्यात येत आहे.

◾️विशिष्ट आयपी क्रमांक असलेले कम्प्युटर, विशिष्ट इंटरनेट, बायोमेट्रिक यंत्रणा, वेब कॅमेरा अशा सगळ्या सामग्रीनिशी हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती वरिष्ठ निवडणूक उपायुक्त संदीप सक्सेना यांनी दिली

◾️. या यंत्रणेतून मतदाराची खात्री पटली की त्याला ई-मतपत्रिका दिली जाईल.

◾️त्याद्वारे मतदाराला मतदान करता येईल. मतमोजणीपूर्व टप्प्यावर अशा मतांमध्ये काही फेरफार करण्यात आलेले नाहीत ना, याची खातरजमा करण्यात येईल, अशी माहिती सक्सेना यांनी दिली.

🔰'घरच्या घरी मतदान नव्हे'

◾️'ही सुविधा प्रत्यक्षात आल्यानंतर मतदारांना ठराविक वेळेत, विशिष्ट ठिकाणी जाऊन मतदान करता येईल.

◾️ही सुविधा सर्वत्र आणि सर्वकाळ उपलब्ध नसेल. बाहेरून मतदान याचा अर्थ घरी बसून मतदान असा नव्हे. त्यासाठी ठराविक ठिकाणी जावेच लागेल,' असे सक्सेना यांनी स्पष्ट केले.

🔰कशी असेल प्रणाली?

◾️- 'टू-वे ब्लॉक चेन रिमोट व्होटिंग' ही यंत्रणा कार्यान्वित होणार

◾️- मतदार ओळखपत्रासह 'मल्टि लेअर आयटी सिस्टीम'च्या आधारे मतदाराची ओळख पटवली जाणार

◾️- बायोमॅट्रिक प्रणाली, वेब कॅमेरा यांचा उपयोग करता येणार

◾️- मतदाराची ओळख पटल्यानंतर 'ब्लॉक चेन पर्सनलाइज्ड' सिस्टीमद्वारे ई-मतदारपत्रिका मतदारापुढे येईल.

◾️- मतदान झाल्यानंतर त्याबाबत एक 'हॅशटॅग' कोड तयार होईल. त्यानंतर संबंधित मतदान गुप्त असल्याबाबत मतदाराची खात्री पटू शकेल.

◾️- असे मतदान करण्यासाठी मतदाराला मतदानापूर्वी अर्ज करावा लागणार आहे.

◾️- ही यंत्रणा अद्याप विकसित होत असून, ती प्रत्यक्षात येण्यास कालावधी आहे.

➖➖➖➖➖

2018-19 या वर्षाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा:-

📚शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या 2018-19 या वर्षाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा करण्यात आली (State sports awards) आहे.

📚यात कुस्तीमहर्षी पंढरीनाथ तथा आण्णासाहेब पठारे यांना शिवछत्रपती जीवन गौरव राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला आहे.

📚तर 5 जणांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.यात-

•युवराज खटके, सांगली (अॅथलेटिक्स)
• बाळासाहेब आवारे, बीड (कुस्ती)
• नितीन खत्री, पुणे (तायक्योंदो)
•जगदीश नानजकर, पुणे (खो-खो)
•अनिल बंडू पोवार, कोल्हापूर (पॅरा अॅथलेटिक्स) यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार दिला जाणार आहे.

📚तर शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची (खेळाडू गट) यादी जाहीर करण्यात आली आहे. यात कबड्डी खेळात पुरुष गटातून रिशांक देवाडिगा आणि गिरीष इरनक तर महिला गटातून सोनाली शिंगटे हिला पुरस्कार जाहीर झाला आहे.

📚 कुस्ती खेळासाठी राज्य क्रीडा पुरस्कार अभिजित कटके याला दिला जाणार (State sports awards) आहे.

📚त्याशिवाय साहसी गटात चौघांना राज्य क्रीडा पुरस्कार मिळणार आहे. यात खाडी पोहणे यासाठी प्रभात कोळी आणि शुभम वनमाली यांना पुरस्कार दिला जाणार आहे.

📚तर गिर्यारोहणासाठी अपर्णा प्रभूदेसाई आणि सागर बडवे यांना राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

📚तर स्वप्निल पाटील (जलतरण), पार्थ हेंद्रे (जलतरण), सायली पोहरे (जलतरण) या तिघांना दिव्यांग खेळाडू गटातील राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहेत. तर जयदीपकुमार सिंह याला ज्युदो आणि वैष्णवी सुतार हिला टेबल टेनिस खेळासाठी पुरस्कार दिला जाणार (State sports awards) आहे

पंतप्रधान मोदींनी केली राम मंदिराबाबत आणखी एक मोठी घोषणा

राम मंदिराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजून एका मोठ्या निर्णयाची रविवारी घोषणा केली.भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टकडे 67 एकर जमीन हस्तांतरीत करण्यात येईल अशी घोषणा मोदींनी केली आहे. वाराणसी येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली.

तसेच अनेक वर्षांपासून वादग्रस्त जमीन म्हणून ओळखळी जाणारी अयोध्येतील राम जन्मभूमीची 67 एकर जमीन केंद्र सरकारच्या ताब्यात होती. जोपर्यंत या जागेचा वाद मिटत नाही तोपर्यंत ही जमीन केंद्राच्या ताब्यात राहिल, असा आदेश याबाबत सुप्रीम कोर्टाने दिला होता.

आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानेच रामजन्मभूमीचा वाद संपुष्टात आल्याने ही सर्व जमीन राम मंदिराच्या उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या  ‘रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ला देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.तर या संपूर्ण जागेवर आता भव्य राम मंदिराची स्थापना करण्यात येईल असे मोदींनी म्हटले आहे.

बेंगळुरूमध्ये दक्षिण भारतातले पहिले ‘भारतीय बँकनोट’ संग्रहालय..

कर्नाटक राज्याच्या बेंगळुरू या शहरात प्रेस्टीज फाल्कन टॉवर्स या ठिकाणी “म्यूजियम ऑफ इंडियन पेपर मनी” या बँकनोटांच्या संग्रहालयाचे उद्घाटन उद्योजक रेझवान रझाक ह्यांच्या हस्ते करण्यात आले. हे देशातले द्वितीय तर दक्षिण भारतातले पहिले ‘भारतीय बँकनोट’ संग्रहालय आहे. पहिल्या संग्रहालयाची भारतीय रिझर्व्ह बँकेनी मुंबईत स्थापना केलेली आहे.

संग्रहालयाची वैशिष्ट्ये...

ब्रिटिशांना ‘भारत छोडो’ असा संदेश मिळाला होता अश्या स्वातंत्र्यपूर्व युगात चलनात असलेल्या नोटा, ‘जय तेलंगणा’ या राजकीय संदेशाला अनुसरून असलेल्या नोटा, 1000 रुपयांची नोट अश्या सर्व बँकनोटांचा समावेश या नव्या संग्रहालयात करण्यात आला आहे.ब्रिटीश राजवटीआधीच देशात विकसित झालेल्या कागदी नोटांनी भरलेल्या या संग्रहालयात गेल्या 20 वर्षांच्या कालावधीतल्या 700 हून अधिक कलाकृती संग्रहित करण्यात आल्या आहेत.

सर्वात जुनी नोट म्हणजे 1812 साली प्रसिद्ध झालेली नोट होय. तसेच पोर्तुगीज सरकारने गोव्यामध्ये 1924 मध्ये प्रसिद्ध केलेल्या रु. 50 आणि रु. 500 इतके मूल्य असलेल्या नोटा देखील ठेवण्यात आल्या आहेत.तिथे 10,000 रुपये इतके उच्च मूल्य असलेली पूर्वीची नोट देखील प्रदर्शनात ठेवली गेली आहे.

लष्करातील महिलांना मिळणार कायमस्वरुपी नियुक्ती


सर्वोच्च न्यायालयाने लष्करातील महिला अधिकाऱ्यांसाठी मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने महिलांना कायमची पोस्टिंग देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

महिलांना कायमस्वरूपीची पोस्टिंग मिळाली पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे. केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

महिलांना कायमची पोस्टिंग दिल्यास त्याचा शत्रू राष्ट्र लाभ घेऊ शकतो. तसेच पुरुषांनाही त्यांना आदेश देण्यात अडचणी येऊ शकतात, असा युक्तिवाद मोदी सरकारने केला होता.

2010 ला दिल्ली उच्च न्यायालयाने महिला अधिकाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला होता. त्याला मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने हा उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. तसेच ही याचिका फेटाळून लावली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर मोदी सरकारने तो अद्याप लागू केलेला नाही. उच्च न्यायालयाने 9 वर्षांनंतर केंद्रासाठी नवीन धोरण उपलब्ध करून दिले आहे.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...