२० फेब्रुवारी २०२०

विदेश सेवा संस्थेला ‘स्वराज’ यांचे नाव

🔰 माजी विदेशमंत्री आणि भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त दिल्ली येथील अनिवासी भारतीय केंद्राला सुषमा स्वराज भवन हे नाव देण्यात येणार आहे. याचबरोबर राजधानीतील विदेश सेवा संस्थेचे सुषमा स्वराज इन्स्टीटय़ूट ऑफ फॉरेन सर्व्हिस असे नामकरण करण्यात येणार आहे. विदेशमंत्री म्हणून स्वराज यांनी दिलेले योगदान पाहता केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.

🔰 माजी विदेशमंत्री स्वराज यांच्या अतुलनीय योगदानासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विदेश मंत्रालयाने गुरुवारी दिली आहे. माजी विदेश मंत्र्यांच्या दशकांची सार्वजनिक सेवा आणि त्यांच्या वारशाला सन्मान देत 14 फेब्रुवारी रोजी त्यांच्या पहिल्या जयंतीपूर्वी ही घोषणा केली जात असल्याचेही विदेश मंत्रालयाने सांगितले आहे.

🔰 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या कार्यकाळात स्वराज यांना विदेशमंत्रिपद देण्यात आले होते. विदेशात राहत असलेल्या भारतीयांच्या मदतीकरता त्यांनी उचललेल्या पावलांचे प्रचंड कौतुक झाले होते. स्वराज लोकांशी ट्विटच्या माध्यमातून संपर्कात असायच्या आणि त्यांनी याच माध्यमातून लोकांच्या अडीअडचणी सोडविल्या होत्या. 6 ऑगस्ट 2019 रोजी स्वराज यांचे निधन झाले होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१९ फेब्रुवारी २०२०

इंदूर बनणार ‘सायलेंट सिटी ऑफ इंडिया

◾️'इंदूरमधील वाढत्या ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत.

◾️शहराला 'सायलेंट सिटी ऑफ इंडिया' बनवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली असून, मुंबईच्या धर्तीवर शहरात ठिकठिकाणी 'स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल' यंत्रणा बसविण्यात येणार आहे,' अशी माहिती रविवारी जिल्हाधिकारी लोकेशकुमार जाटव यांनी दिली.

◾️'इंदूरला ध्वनी प्रदूषणमुक्त करायचे असून, मार्च २०२१ पर्यंत भारतातील सायलेंट सिटी म्हणून नावारूपाला आणायचे आहे.

◾️मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठासह परिसरातील वृद्धाश्रम, रुग्णालये, शैक्षणिक संस्था यांसह महत्त्वाच्या ३९ ठिकाणी 'शांती क्षेत्र' घोषित करण्यात येणार आहे. या ठिकाणी मोठे हॉर्न, बँड, डिजे वाजविण्यास बंदी असेल.

◾️नागरिकांनी सरकारी वाहनांनी प्रवास करावा, यासाठी वाहनांची संख्या वाढविण्यात येणार आहे; तसेच जे वाहनचालक सिग्नलपाशी विनाकारण हॉर्न वाजवतील, अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर 'स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल' उभारण्यात येणार आहेत.'

◾️या यंत्रणेंतर्गत सिग्नल डेसिबल मीटरने जोडण्यात येतील. सिग्नलला सतत हॉर्न वाजवल्

2020-21 या वर्षापासून RBIचे लेखा वर्ष आणि सरकारचे वित्त वर्ष एकच असणार.

🔸भारतीय रिझर्व्ह बँकेचे लेखा वर्ष (अकाउंटिंग ईयर) आणि भारत सरकारचे वित्त वर्ष (फायनॅनष्यल ईयर) 2020-21 या वर्षापासून एकच करण्याची शिफारस समितीने केली आहे.

🔸सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे लेखा वर्ष 1 जुलै ते 30 जून असून, वित्त वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असे आहे. या निर्णयानुसार, दोनही वर्षे जुळविल्यास रिझर्व्ह बँकेला अंतरिम लाभांश देण्याची गरज पडणार नाही.

🔸भारतीय रिझर्व्ह बँक

🔸भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारत सरकारने स्थापना केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे.

🔸RBIची स्थापना दिनांक 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आली. त्याचे मुख्य कार्यालय मुंबई (महाराष्ट्र) येथे आहे. RBIचे 1949 साली भारत सरकारद्वारे राष्ट्रीयीकरण गेले आहे.

🔸RBI वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण जाहीर करते.

🔸भारतीय रिझर्व बँकेचे
प्रमुख उद्देश - भारतीय चलनी नोटांची छपाई गरजेनुसार करणे, भारताचा FDI प्रवाह (गंगाजळी) राखणे, भारताची आर्थिक स्थिती राखणे, भारतीय चलन आणि पत यांचे रक्षण करणे.

🔸RBIने शैली आणि दृष्टीकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या ‘दि प्राॅब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्यूशन’ या पुस्तकातून घेतले.

🔸सर ओस्बॉर्न स्मिथ हे RBIचे पहिले गव्हर्नर (1 एप्रिल 1935 ते 30 जून 1937) होते. सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले भारतीय मूल निवासी गव्हर्नर (तिसरे गव्हर्नर) दि. 11 ऑगस्ट 1943 रोजी या पदावर विराजमान झाले.

🔸वर्तमानात, शक्तीकांत दास गव्हर्नर आहेत. बी. पी. कानुंगो, एन. एस. विश्वनाथन, महेश कुमार जैन आणि मायकल पात्रा असे चार डेप्युटी गव्हर्नर आहेत.

General Knowledge

▪ ‘काशी महाकाल एक्सप्रेस’ नावाची तिसरी कॉर्पोरेट पॅसेंजर रेलगाडी कोणत्या मार्गावर धावणार?
उत्तर : वाराणसी-इंदौर

▪ ‘फिरते मधमाशा पालनगृह’ हा उपक्रम कोणत्या मंत्रालयाचा आहे?
उत्तर : सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय

▪ ‘भारतीय नौदल अकादमी’ कुठे आहे?
उत्तर : केरळ

▪ कोणत्या शहरात ‘राष्ट्रीय सेंद्रिय खाद्य’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले?
उत्तर : नवी दिल्ली

▪ कोणती व्यक्ती पंधराव्या वित्त आयोगाने नेमलेल्या ‘संरक्षण व अंतर्गत सुरक्षा गट’चे अध्यक्ष आहे?
उत्तर : एन. के. सिंग

▪ खादी व ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यालय कुठे आहे?
उत्तर : मुंबई

▪ ‘भारतीय नौदल जलविज्ञान विभाग’ याचे कार्यालय कुठे आहे?
उत्तर : देहरादून

▪ कोणते मंत्रालय ‘स्कूल हेल्थ अँड वेलनेस अम्बॅसडर’ उपक्रम राबवत आहे?
उत्तर : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय

▪ 'जागतिक युनानी दिन' कधी साजरा केला जातो?
उत्तर : हकीम अजमल खान

▪ ‘खेलो इंडिया’ अभियानाच्या अंतर्गत राष्ट्रीय हिवाळी खेळांचे आयोजन कुठे केले जाणार आहे?
उत्तर : गुलमर्ग

महत्त्वाचे प्रश्नसंच


केंद्रीय प्रशासकीय न्यायपीठ (CAT) याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. केंद्रीय प्रशासकीय न्यायापीठाचे मुख्य पीठ दिल्लीत आहे.

2. वर्तमानात, CATचे 10 नियमित पिठे आणि 4 चक्रिय पिठे आहेत.

दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा:

(A) केवळ (1)✅✅
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)

♻️♻️
जागतिक बँकेच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. जागतिक बँकेकडून कर्ज घेणारा पहिला देश फ्रान्स हा होता.

2. भारत जागतिक बँकेकडून कर्ज घेणारा सर्वात मोठा प्राप्तकर्ता आहे.

दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही✅✅
(D) ना (1), ना (2)

👍♻️
‘संप्रिती-9’ हा भारत आणि ______ या देशांच्या दरम्यानचा संयुक्त सैन्य सराव आहे.
(A) बांगलादेश✅✅
(B) म्यानमार
(C) युगांडा
(D) ताजिकिस्तान

♻️♻️
____ येथे ‘वन्य प्राण्यांच्या स्थलांतरण करणाऱ्या प्रजातींचे संवर्धन (CMS)’ विषयक करारनाम्याची 13 वी पक्षीय परिषद (COP) याचे उद्घाटन करण्यात आले.
(A) नवी दिल्ली
(B) गांधीनगर✅✅✅
(C) हैदराबाद
(D) चेन्नई

♻️♻️
पंधराव्या वित्त आयोगाने ‘कृषी निर्यात संदर्भात उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती’ नेमली. या गटाचे अध्यक्ष कोण आहेत?
(A) राधा सिंग
(B) सुरेश नारायणन
(C) जय श्रॉफ
(D) संजीव पुरी👍✅✅

♻️♻️♻️
_________ येथे ‘प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा’ विषयक चौथी राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली.
(A) नागपूर
(B) उदयपूर👍✅✅
(C) भोपाळ
(D) नवी दिल्ली

♻️♻️
मृदा आरोग्य कार्ड योजनेच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. ही योजना फेब्रुवारी 2014 मध्ये लागू केली गेली.

2. 2015 हे वर्ष आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष म्हणून साजरे करण्यात आले.

3. योजनेच्या अंतर्गत दरवर्षी शेतकर्‍यांना मृदा आरोग्य कार्डाचे वाटप केले जाते.

दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा:

(A) (1) आणि (2)
(B) (2) आणि (3)
(C) केवळ (2)👍✅✅
(D) (1), (2) आणि (3)

♻️♻️✅
कोणत्या देशाने पुढील तीन वर्षांसाठी ‘वन्य प्राण्यांच्या स्थलांतरण करणाऱ्या प्रजातींचे संवर्धन (CMS)’ विषयक संयुक्त राष्ट्रसंघाच्या मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले?
(A) ब्राझील
(B) दक्षिण आफ्रिका
(C) भारत✅✅✅
(D) जर्मनी

♻️♻️
"वैश्विक ध्येये 2030 साध्य करण्यासाठी रस्ता सुरक्षा’ विषयक तिसरी उच्च स्तरीय वैश्विक परिषद’ _______ येथे झाली.
(A) जापान
(B) ब्राझील
(C) दक्षिण आफ्रिका
(D) स्टॉकहोम✅✅✅

♻️♻️
आशियातला सर्वात दीर्घ दुहेरी बोगदा असलेला झोजिला बोगदा ______ या राज्यात आहे.
(A) जम्मू व काश्मीर✅✅✅✅✅
(B) हिमाचल प्रदेश
(C) सिक्किम
(D) अरुणाचल प्रदेश

भारतातील नद्यांच्या काठावरील शहरे

गंगा - हरिद्वार, कानपूर,पटना,वाराणसी.
सिंधू - लेह.
सतलज - फिरोजपुर,लुधियाना.
तापी - भुसावळ,सुरत .
महानदी - कटक,संबलपुर.
कृष्णा - मिरज,वाई,कराड,गंगाखेड,राजमुंद्री,सांगली,विजयवाडा.
मुसी - हैदराबाद.
यमुना - दिल्ली,आग्रा.
शरयू - अयोध्या.
ब्रह्मपुत्र - गुवाहाटी,दिब्रुगड.
झेलम - श्रीनगर.
नर्मदा - जबलपूर, भरुचा.
साबरमती - अहमदाबाद.
गोदावरी - नाशिक,पैठण,नांदेड,कोपरगाव.
भीमा - पंढरपूर.
कावेरी - श्रीरन्गपत्तनम, तिरुचिरापल्ली
हुगळी- कोलकाता

इतर राज्यांच्या सीमा


महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा
१) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया
२) कर्नाटक - कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
३) आंध्र प्रदेश- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.
४) गुजरात - ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे.
५) दादरा, नगर-हवेली- ठाणे, नाशिक.
६) छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली.
७) गोवा- सिंधुदुर्ग.

कवी/साहित्यिक टोपण नावे

कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
गोविंद विनायक करंदीकर - विंदा करंदीकर
त्र्यंबक बापुजी डोमरे - बालकवी
प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज
विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
निवृत्ती रामजी पाटील - पी. सावळाराम
माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव जुलिअन
चिंतामण त्र्यंबक खानोलकर - आरती प्रभू
आत्माराम रावजी देशपांडे - अनिल

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिगे

त्र्यंबकेश्वर- जिल्हा नाशिक
घृष्णेश्वर- वेरुळ जिल्हा औरंगाबाद
भीमाशंकर- जिल्हा पुणे
परळी वैजनाथ- जिल्हा बीड
औंढा नागनाथ- जिल्हा हिंगोली

महाराष्ट्रातील अभयारण्ये

अनेर - धुळे
अंधेरी - चंद्रपूर
औट्रमघाट - जळगांव
कर्नाळा - रायगड
कळसूबाई - अहमदनगर
काटेपूर्णा - अकोला 
किनवट - यवतमाळ
कोयना - सातारा
कोळकाज - अमरावती
गौताळा औट्रमघाट - औरंगाबाद, जळगांव
चांदोली - सांगली, कोल्हापूर
चापराला - गडचिरोली
जायकवाडी - औरंगाबाद 
ढाकणा कोळकाज - अमरावती
ताडोबा - चंद्रपूर
तानसा - ठाणे
देऊळगांव रेहेकुरी - अहमदनगर
नवेगांव - भंडारा
नागझिरा - भंडारा
नांदूर मध्यमेश्वर - चंद्रपूर
नानज - सोलापूर
पेंच - नागपूर
पैनगंगा - यवतमाळ, नांदेड
फणसाड - रायगड
बोर - वर्धा
बोरीवली(संजय गांधी) - मुंबई
भिमाशंकर - पुणे, ठाणे
मधमेश्वर - चंद्रपूर
मालवण - सिंधुदुर्ग 
माळढोक - अहमदनगर, सोलापूर
माहीम - मुंबई
मुळा-मुठा - पुणे
मेळघाट - अमरावती
यावल - जळगांव
राधानगरी - कोल्हापूर
रेहेकुरी - अहमदनगर
सागरेश्वर - सांगली

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे


आंबोली (सिंधुदुर्ग)
खंडाळा (पुणे)
चिखलदरा-गाविलगड (अमरावती)
जव्हार (ठाणे)
तोरणमाळ (नंदुरबार)
पन्हाळा (कोल्हापूर)
पाचगणी (सातारा)
भिमाशंकर (पुणे)
महाबळेश्वर (सातारा)
माथेरान (रायगड)
मोखाडा (ठाणे)
म्हैसमाळ (औरंगाबाद)
येडशी (उस्मानाबाद)
रामटेक (नागपूर)
लोणावळा (पुणे)
सूर्यामाळ (ठाणे

राष्ट्रगीताबद्दल माहिती

१) राष्ट्रगीत (National Anthem) : रविंद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत लिहिलेले ‘ जन-गण-मन ’ या गाण्याच्या हिंदी रुपांतरनाचे संविधान सभेने २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीत म्हणून स्विकार केला.
२) २७ डिसेंबर १९११ रोजी भारतीय कोंग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले.

३) राष्ट्रगीतामध्ये एकूण पाच कडवे असून हे गीत पूर्णपणे ५२ सेकंदामध्ये म्हणण्याची प्रथा आहे.

४) काही वेळेस हे गीत संक्षिप्त रुपात गायले जाते त्याचा कालावधी २० सेकंद आहे.

५) जन-गण-मन हे गीत पहिल्यांदा जानेवारी १९१२ मध्ये ‘ भारत विधाता ’ या शीर्षकाखाली ‘ तत्व बोधिनी ’ पत्रिकेमध्ये छापले गेले होते.

६) १९१९ मध्ये या गीताचे इंग्रजीमध्ये रुपांतरण करून ‘ Morning song of India ’ या नावाने छापले गेले.

७) राष्ट्रीय गीत (National Song ) : बंकिमचंद्र चटर्जी यांचे ‘ वंदे मातरम ’ हे संस्कृतमधील गीत स्वातंत्र्य लढ्यातील लोकांसाठी प्रेरणेचे स्त्रोत होते.

८) राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यांना समान दर्जा आहे.

९) १८९६ च्या भारतीय कोंग्रेसच्या अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले होते.

१०) बंकिमचंद्र चटर्जी यांच्या १८८२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘ आनंदमठ ’ या कादंबरीतून घेतले असून याचे इंग्रजीमध्ये भाषांतर श्री. अरबिंदो यांनी केले आहे .

चालू घडामोडी प्रश्नसंच


♻️♻️
संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. दुसर्‍या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) याची स्थापना केली गेली.

2. संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत आठ सदस्य आणि पाच कायमस्वरूपी सदस्य असतात.

दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा:

(A) केवळ (1)♻️✅✅✅
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)

♻️♻️
कोणत्या रेलगाडीमध्ये देवासाठी जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे?
(A) काशी महाकाल एक्सप्रेस♻️✅✅
(B) उज्जैन महाकाल एक्सप्रेस
(C) महाकाल एक्सप्रेस
(D) काशी-उज्जैन महाकाल एक्सप्रेस

♻️♻️
_______ या शहरात दक्षिण भारतातले पहिले ‘भारतीय बँकनोट’ संग्रहालय उघडले गेले.
(A) चेन्नई
(B) हैदराबाद
(C) बेंगळुरू👍👍✅✅
(D) कोची

♻️♻️
____ या शहरात 65 वा ‘अॅमेझॉन फिल्मफेअर अवॉर्ड्स 2020’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
(A) मुंबई
(B) गुवाहाटी♻️✅👍
(C) गोवा
(D) शिमला

♻️♻️
लघुग्रहाविषयी खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. लघुग्रह म्हणजे बाह्य सौरमालेचे छोटे ग्रह होय.

2. ‘सेरेस’ हा शोधला गेलेला पहिला लघुग्रह होता.

3. गुरु व मंगळ या ग्रहांच्या कक्षेदरम्यान ‘लघुग्रहांचा पट्टा’ आहे.

दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा.

(A) केवळ (1) आणि (2)
(B) केवळ (2) आणि (3)♻️👍✅✅
(C) केवळ (1) आणि (3)
(D) (1), (2) आणि (3)

♻️♻️
क्षयरोग (TB) याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. क्षयरोग हा एक संसर्गजन्य रोग आहे जो एका विषाणूमुळे होतो.

2. क्षयरोगाचा प्रसार क्षयरोग असलेल्या लोकांमधील खोकला, थुंकीद्वारे हवेतून होतो.

3. भारत सरकारने 2030 सालापर्यंत क्षयरोगाचे निर्मूलन करण्याची योजना जाहीर केली आहे.

दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा.

(A) केवळ (1) आणि (2)
(B) केवळ (2) आणि (3)
(C) केवळ (2)👍✅✅
(D) (1), (2) आणि (3)

♻️
फेब्रुवारी 2020 मध्ये _____ या शहरात केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्र्यांनी ‘गल्फूड 2020’ या कार्यक्रमामध्ये भारतीय मंडपांचे उद्घाटन केले.
(A) दुबई♻️✅✅
(B) कोलंबो
(C) काठमांडू
(D) थिंपू

♻️
________ या शहरात ‘केंद्रीय प्रशासकीय न्यायपीठ विषयक अखिल भारतीय परिषद 2020’ आयोजित केली गेली.
(A) भोपाळ
(B) चेन्नई
(C) हैदराबाद
(D) नवी दिल्ली♻️✅✅

♻️♻️
_______ या शहरात ‘बायो एशिया समिट 2020’ आयोजित केली गेली.
(A) हैदराबाद♻️✅✅♻️
(B) चेन्नई
(C) नवी दिल्ली
(D) कोलकाता

♻️♻️
राष्ट्रीय हरित न्यायपीठ (NGT) हे एक _____ आहे.
(A) घटनात्मक मंडळ
(B) वैधानिक मंडळ✅✅✅
(C) अर्ध-न्यायिक मंडळ
(D) नियामक मंडळ

19/02/2020 प्रश्नसंच

प्रश्न : पश्चिमेकडून पूर्वेकडे जातांना महाराष्ट्रात क्रमाने येणाऱ्या जिल्ह्यांचा योग्य क्रम ओळखा?
पर्याय :
1.  नाशिक - जालना - औरंगाबाद - परभणी
2.  औरंगाबाद - नाशिक - जालना - परभणी
3.  नाशिक - औरंगाबाद - जालना - परभणी
4.  नाशिक - औरंगाबाद

उत्तर :
3.  नाशिक - औरंगाबाद - जालना - परभणी

प्रश्न : पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली व ……. यांच्यात झाली.
पर्याय :
1.  मुघल
2.  शिख
3.  मराठे
4.  राजपूत

उत्तर :
3.  मराठे

प्रश्न : महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही?
पर्याय :
1.  नागपूर
2.  पुणे
3.  यापैकी नाही
4.  औरंगाबाद

उत्तर :
2.  पुणे

प्रश्न : ‘उंटावरचा शहाणा’ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
पर्याय :
1.  खूप हुशार माणूस
2.  खुशामती माणूस
3.  मूर्खपणाचा सल्ला देणारा
4.  मूर्ख माणुस

उत्तर :
3.  मूर्खपणाचा सल्ला देणारा

प्रश्न : महाराष्ट्रास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून नाही?
पर्याय :
1.  आंध्रप्रदेश
2.  यापैकी नाही
3.  छत्तीसगड
4.  मध्यप्रदेश
उत्तर :
1.  आंध्रप्रदेश

प्रश्न : देवीच्या साडे तीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ कोणते?
पर्याय :
1.  कोल्हापूर
2.  माहूर
3.  तुळजापूर
4.  वणी (नाशिक)
उत्तर :
4.  वणी (नाशिक)

प्रश्न : ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय?
पर्याय :
1.  किसन बाबुराव हजारे
2.  किसन कृष्णा हजारे
3.  कृष्णा बापूराव हजारे
4.  आण्णा कृष्णा हजारे

उत्तर :
1.  किसन बाबुराव हजारे

प्रश्न : धुळे जिल्ह्यातून खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो?
पर्याय :
1.  रा.म. 6
2.  रा.म. 50
3.  रा.म. 9
4.  रा.म.8

उत्तर :
1.  रा.म. 6

(प्रश्न : खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार दिला जात नाही?
पर्याय :
1.  रसायनशास्त्र
2.  कला
3.  साहित्य
4.  शांतता
उत्तर :
2.  कला

प्रश्न : स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम …… या देशाने बहाल केला.
पर्याय :
1.  न्युझिलंड
2.  अमेरिका
3.  भारत
4.  इंग्लंड
उत्तर :
1.  न्युझिलंड

प्रश्न : महाराष्ट्र : पुरणपोळी :: बंगाल : ?
पर्याय :
1.  बासुंदी
2.  बर्फी
3.  श्रीखंड
4.  रसगुल्ला

उत्तर :
4.  रसगुल्ला

प्रश्न : ‘केसाने गळा कापणे’ या म्हणीचा अर्थ सांगा.
पर्याय :
1.  दमबाजी करणे
2.  शत्रुत्व निर्माण करणे
3.  विश्वासघात करणे
4.  ठार मारणे
उत्तर :
3.  विश्वासघात करणे

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

“ब्रिटीश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्य पद्धती देईल” असे 1917 साली _________  यांनी घोषित केले. 

A) मोलें 
B) मिन्टो 
C) मॉन्टेग्यू     √
D) चेम्सफोर्ड 

संविधानातील ……… कलमानुसार घटनेतील ………. तरतुदींचा अंमल, २६ नोव्हेंबर १९४९ रोजीच सुरु झाला?

१) कलम ३९५, १५
२) कलम ३९४, १५  
३) कलम ३९५, १२  
४) कलम ३९४, १६.  √

ब्रिटीश सरकारने मदनलाल धिंग्रा यास ______ साली फाशी दिले. 

A) 1860
B) 1891
C) 1900
D) 1909.  √

पुढील विधाने वाचा:
अ) घटनेचे कामकाज २ वर्षे, ११ महिने, १८ दिवस चालले.
ब) या कालावधीत संविधान सभेची ११ सत्रे झाली.
क) घटना तयार करण्यासाठी ६४ लाख रुपये खर्च झाला.
चुकीचे विधान/विधाने ओळखा

१) अ आणि ब  
२) फक्त अ  
३) ब आणि क  
४) कोणतेही नाही.  √

1)नवकल्पना, संशोधन व विकास आणि कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी __ या कंपनीने "सायन्स अँड अप्लाइड रिसर्च अलायन्स अँड सपोर्ट (SARAS)" या संस्थेची स्थापना केली आहे.
(A) नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेड.  √
(B) कोल इंडिया लिमिटेड
(C) हिंदाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड
(D) यापैकी नाही

2)कोणत्या संस्थेनी कोरोना विषाणू (nCoV) याच्या प्रसाराला अडथळा करण्यासाठी दोन दशलक्ष डॉलर एवढ्या निधीची घोषणा केली?
(A) आशियाई विकास बँक (ADB).   √
(B) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)
(C) जागतिक बँक
(D) भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)

3)कोणत्या देशात ‘वन्य प्राण्यांच्या स्थलांतरण करणाऱ्या प्रजातींचे संवर्धन’ विषयक करारनाम्याची 13 वी पक्षीय परिषद (COP) आयोजित केली जाणार आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) फिलीपिन्स
(C) संयुक्त राज्ये अमेरिका
(D) भारत.  √

4)पंकज अडवाणीला पराभूत करून आदित्य मेहताने ‘राष्ट्रीय स्नूकर अजिंक्यपद 2020’ ही स्पर्धा जिंकली. ‘राष्ट्रीय स्नूकर अजिंक्यपद 2020’ कोणत्या शहरात खेळवली गेली?
(A) मुंबई
(B) पुणे.  √
(C) भुवनेश्वर
(D) नवी दिल्ली

5)कोणत्या दिवशी राष्ट्रीय निर्जंतुकीकरण (Deworming) दिन पाळला जातो?
(A) 11 फेब्रुवारी
(B) 9 फेब्रुवारी
(C) 10 फेब्रुवारी.  √
(D) 12 फेब्रुवारी

6)काम्या कार्तिकेयन ही __ शिखर गाठणारी जगातली सर्वात तरुण मुलगी ठरली आहे.
(A) अॅकोनकागुआ शिखर.  √
(B) कंचनजंगा शिखर
(C) लोटसे शिखर
(D) एव्हरेस्ट शिखर

7)पद्मश्री-प्राप्त गिरिराज किशोर ह्यांचे 9 फेब्रुवारी 2020 रोजी निधन झाले. ते _ होते.
(A) गायक
(B) कादंबरीकार.  √
(C) पत्रकार
(D) कवी

8)कोणत्या शहरात ‘राष्ट्रीय ई-प्रशासन परिषद 2020’ आयोजित करण्यात आली होती?
(A) नवी दिल्ली
(B) हैदराबाद
(C) मुंबई.   √
(D) बेंगळुरू

9)आरमंड ड्युप्लांटिस ह्याने बांबू-उडीच्या खेळात फ्रान्सच्या रेनॉड लॅव्हिलेनी ह्याने केलेला विश्वविक्रम मोडला. आरमंड ड्युप्लांटिस कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करतो?
(A) संयुक्त राज्ये अमेरिका
(B) स्वीडन.   √
(C) ऑस्ट्रेलिया
(D) रशिया

10)बेंगळुरूची भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) याला MOOCLab या संस्थेच्या “बिझिनेस स्कूल रँकिंग 2020”मध्ये __ क्रमांकावर स्थान मिळाले आहे.
(A) 5 वा
(B) 8 वा
(C) 11 वा
(D) 3 रा.   √

पोलिस भरती प्रश्नसंच


प्रश्न : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माचा स्वीकार केव्हा केला?
पर्याय :
जुलै १९५१
मे १९५३
मे १९५५
ऑक्टोबर १९५६ 

उत्तर :
ऑक्टोबर १९५६

 इ.स. १८५७ च्या उठावाचे वैशिष्टय म्हणजे .......... ऐक्य होय.

हिंदू-मुस्लिम    √
मराठी-शिख
इंग्लिश-मुस्लिम
इंग्लिश-मराठी

दरवर्षी ____ या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो.
(A) 15 डिसेंबर
(B) 25 डिसेंबर
(C) 24 डिसेंबर   √
(D) 23 डिसेंबर

32 वे ‘गुप्तचर विभाग (IB) वर्धापन दिन व्याख्यान’ _ येथे आयोजित केले गेले.
(A) मुंबई
(B) नवी दिल्ली    √
(C) चेन्नई
(D) लखनऊ

________ येथे अत्याधुनिक ‘DNA विश्लेषण केंद्र’चे उद्घाटन झाले.
(A) नवी दिल्ली
(B) चंदीगड   √
(C) लखनऊ
(D) वाराणसी

कोणाला ‘2019 ITF विश्वविजेता’ घोषित करण्यात आले आहे?
(A) नोव्हाक जोकोविच
(B) राफेल नडाल   √
(C) रॉजर फेडरर
(D) डेव्हिड थिएम

1) पॉव्हर्टी ऑन्ड अनब्रिटिश रुल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला.

1)  दादाभाई नौरोजी ✅✅
2) लाला लजपत रॉय
3)  वि. दा. सावरकर
4)  लोकमान्य टिळक

 2) खालीलपौकी कोणत्या लोकसभा निवडणुका वर्चस्वाचा ·हास दर्शवितात.

1)  1989,1991 आणि 2004
2) 1977,1980 आणि 1984
3)  1967,1977 आणि 2004
4)  1967,1977 आणि 1989✅✅✅

आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हणतात.

1)  सावित्रीबाई फुले
2) वि. रा. शिंदे
3)  लोकमान्य टिळक
4)  महात्मा फुले✅✅✅

भारतात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना केव्हापासून लागू झाली

1)2 फेब्रुवारी 2006✅✅
2)2 फेब्रुवारी 2005
3)20 फेब्रुवारी 2006
4)2 ऑक्टोबर 2007

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...