१२ फेब्रुवारी २०२०

23 व्या ई -गव्हर्नन्स परिषदेचा मुंबईत समारोप

📌ई-गव्हर्नन्स ही देशाच्या भविष्यातील प्रगतीची गुरुकिल्ली - केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह.

📌मुंबई घोषणेतील दहा तरतुदीद्वारे डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून विशेषत: आरोग्य, शेती, शिक्षण आणि भूमी सार्वजनिक सेवा सुधारण्याचे ध्येय्य

📌मुंबईला भारताची फिनटेक राजधानी म्हणून विकसित करु; मार्च 2020 मध्ये मुंबईत इंडिया फिन्टेक महोत्सवाचे आयोजनही करु: महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान मंत्री सतेज पाटील.

📌देशाच्या सुप्रशासनासाठी ई-गव्हर्नन्स हा महत्त्वाचा भाग असून तळागाळातील व्यक्तींपर्यंत शासनाच्या सेवा सुविधा तसेच योजनांचा लाभ पोहोचवणे ही खरी या प्रकल्पाची लिटमस टेस्ट आहे.

📌त्यामुळे भारताच्या विकास प्रवासात ई-गव्हर्नन्स ही भविष्यातील गुरुकिल्ली ठरेल असे प्रतिपादन केंद्रीय ईशान्य क्षेत्र
विकास, वैयक्तिक, जन तक्रार आणि निवृत्तीवेतन, अणुऊर्जा व अवकाश विभाग तसेच पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी केले. 

📌23 व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेचा समारोप आणि आणि ई गव्हर्नन्स तसेच हॅकेथोन  पारितोषिक प्रदान समारंभ आज मुंबईत एन.एस. सी. आय. डोम वरळी येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

📌केंद्रीय राज्यमंत्री डॉ.सिंह पुढे म्हणाले, ई-गव्हर्नन्स ही देशाच्या भविष्यातील प्रगतीची गुरुकिल्ली आहे. ई राष्ट्रीय कृषी बाजार किंवा आयुष्मान भारत अशा योजनांसाठी व उत्तम प्रशासनासाठी ई-गव्हर्नन्स आवश्यक आहे.

📌हाती घेतलेल्या प्रकल्पाचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो आहे की नाही, यावरून प्रकल्पाचे यशापयश ठरते. 

📌युवकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन करून त्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले.

📌केंद्रीय राज्यमंत्री पुढे म्हणाले, शासनाच्या विविध योजना गरीबांपर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून गरिबांसाठी समर्पित असलेले सरकार ही आपली ओळख सरकारने प्रस्थापित केली आहे.

📌किमान शासन, कमाल प्रशासन ह्या शासनाच्या ध्येयाशी अशा परिषदा सुसंगतच असल्याचे त्यांनी सांगितले.

📌 भारतीय फिन टेक महोत्सव मार्च 2020 मध्ये मुंबईत भरविण्यासाठी केंद्र सरकार राज्य शासनाला संपूर्ण पाठबळ पुरवेल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

अभिमानास्पद ! 'ही' व्यक्ती होणार देशातील पहिली मूकबधिर सरपंच

✍मध्य प्रदेशातील घटना अनुसूचित जमातीतील एकमेव उमेदवार  अपंगत्वावर मात करून धाडस दाखविणाऱ्या लोकांचे नेहमीच कौतुक होत असते. मध्य प्रदेशातील दानसरी गावातील २७ वर्षीय मूकबधिर युवकाने सरंपच होण्याची तयारी केली असून, यानुसार तो भारतातील पहिला मूकबधिर सरपंच ठरण्याची शक्यता आहे.

✍इंदोरपासून चाळीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दानसरी गावाची लोकसंख्या हजाराच्या आसपास आहे. या गावात अलीकडेच ग्रामपंचायतीची स्थापना झाली आहे. रोटेशनप्रमाणे सरपंचपदी गावातील लोक लोकशाहीच्या मार्गाने निवडून येत आहेत. आता सरपंचपद अनुसूचित जमाती (एसटी)साठी सुटले असून गावातील एकमेव अनुसूचित जमातीतील मतदार असणारा मूकबधिर लालू हाच एकमेव सरपंचपदासाठी उमेदवार ठरू शकतो. दानसरी गावाची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही, मात्र आगामी सरपंचपद एसटीसाठी सुटणार असल्याने गावकरी कामाला लागले आहेत.

✍लालू याचे आई-वडील त्याच्या लहानपणीच दगावले असून, तो शेतीकाम करत आहे. गावातील समस्या त्याला चांगल्या ठाऊक असून, तो सरपंच होण्यासाठी उत्सुक आहे. सामाजिक कार्यकर्ते ग्यानेंद्र पुरोहित हे लालूशी हातवारे, खुणा करत संवाद साधतात. याबाबत पुरोहित म्हणतात, की सरपंच होण्यासाठी लालूने तयारी दाखविली आहे. तो अर्ज भरण्यासाठी तयार आहे. सरपंच झाल्यानंतर तो गावात विकासकामे करू इच्छित आहे. रस्ते चांगले करण्याची तयारी आहे. मूकबधिर लोकांसाठीही त्याला काम करायचे आहे. लालूला सरपंच करण्यासाठी गावकऱ्यांनी प्रचार सुरू केला आहे.

✍लालू सरपंच झाल्यास मूकबधिर श्रेणीतील लोकांना प्रतिनिधित्व मिळेल, असे पुरोहित यांनी सांगितले. गावातील तरुण राहुल सोनाग्रा म्हणतो, की लालू हा फार शिकलेला नसला तरी गावातील समस्येची त्याला चांगली माहिती आहे. तो सरपंच म्हणून गावच्या विकासासाठी काम करेल, असा आम्हाला विश्‍वास आहे.

देशाला मिळाला सर्वात तरुण न्यायाधीश.

​​
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

▪️21 वर्षीय मंयक प्रताप सिंह हा तरुण विधी सेवा परीक्षा 2018 उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे तो आता देशातील सर्वात तरुण न्यायाधीश म्हणून कोर्टाचे कामकाज पाहणार आहे.

▪️तर 21 व्या वर्षीच तो आता कोर्टात निकाल सुनावणार आहे. या अभुतपूर्व यशासाठी त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

▪️मयंकने सन 2014 मध्ये राजस्थान विद्यापीठातून पाच वर्षांच्या एलएलबी कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. त्याचा हा कोर्स याच वर्षी पूर्ण झाला आहे.

▪️सन 2018 पर्यंत विधी सेवा परीक्षांसाठी अर्ज करण्याची वयाची किमान वयोमर्यादा 23 वर्षे होती. मात्र, 2019 मध्ये राजस्थान हायकोर्टाने ही मर्यादा 21 वर्षे केली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आरक्षण बंधनकारक नाही.

✍सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करण्यास राज्ये बांधील नाहीत. तसेच पदोन्नत्यांमध्ये आरक्षण हा मूलभूत हक्क नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

✍तर न्या. एल. नागेश्वर राव आणि न्या. हेमंत गुप्ता  यांच्या खंडपीठाने उत्तराखंडमधील आरक्षणाबाबतच्या एका याचिकेवर नुकताच हा निकाल दिला.
तसेच ‘आरक्षण लागू करण्याचा कुठलाही आदेश न्यायालय राज्य सरकारांना देऊ शकत नाही,’ असेही सर्वोच्च न्यायालयाने निकालात स्पष्टपणे नमूद केले.

✍उत्तराखंडमधील सरकारी सेवांमधील सर्व पदे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना आरक्षण न देता भरण्याचा निर्णय राज्य सरकारने 5 सप्टेंबर 2012 रोजी घेतला होता.

✍त्याला उत्तराखंड उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने सरकारचा निर्णय रद्दबातल ठरवला होता. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

✍‘निर्धारित कायद्यानुसार सार्वजनिक पदांवरील नियुक्त्यांमध्ये आरक्षण लागू करण्याबाबत राज्य सरकारला निर्देश दिले जाऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे, पदोन्नत्यांच्या बाबतीतही राखीव जागा ठेवण्यास राज्य सरकार बांधील नाही.

✍तथापि, राज्य सरकारांना त्यांचा विशेषाधिकार वापरून आरक्षणाची तरतूद करण्याची इच्छा असेल; तर त्या संवर्गाचे सार्वजनिक सेवांमध्ये अपुरे प्रतिनिधित्व असल्याचे परिमाण ठरवता येण्याइतपत आकडेवारी सरकारला जमा करावी लागेल,’ असे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे.

✍पदोन्नत्यांमध्ये आरक्षण देण्यास राज्य सरकार बांधील नसल्यामुळे उत्तराखंड उच्च न्यायालयाने  राज्य सरकारच्या निर्णयाला बेकायदा ठरवणे गैर असल्याची टिप्पणी करून, उत्तराखंड सरकारची सप्टेंबर 2012ची अधिसूचना सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली.

✍राज्य सरकारी सेवेत संबंधित समाजांचे पुरेसे प्रतिनिधित्व नसल्याचे निदर्शनास आल्यास राज्य सरकार नियुक्त्या आणि पदोन्नतीमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींना आरक्षण देऊ शकते. तसा अधिकार संविधानातील अनुच्छेद 16 (4) आणि 16 (4-ए)नुसार राज्य सरकारांना आहे, असेही न्यायालयाने नमूद केले.

अंडर १९ वर्ल्डकप / बांगलादेश २२ वर्षात पहिल्यांदा चॅम्पियन; विश्वचषक जिंकणारा ठरला सातवा संघ

◾️बांगलादेश युवा संघाचा फायनलमध्ये चार वेळच्या चॅम्पियन भारतावर तीन गड्यांनी विजय बांगलादेश संघाचा १२ व्यांदा स्पर्धेत सहभाग

◾️२०१६ मध्ये सर्वाेत्तम तिसऱ्या स्थानावर धडक

◾️बांगलादेशच्या युवा संघाने रविवारी एेतिहासिक कामगिरीची नाेंद केली.

◾️शहादतच्या नेतृत्वात बांगलादेश संघाने आयसीसीच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत विश्वविजेता हाेण्याचा बहुमान पटकावला.

◾️ बांगलादेशचा युवा संघ पहिल्यांदा विश्वविजेतेपदाचा मानकरी ठरला आहे.

◾️ टीमने स्पर्धेत १२ वेळा सहभागी हाेताना २२ वर्षात पहिल्यांदा ही वर्ल्डकपची ट्राॅफी पटकावली आहे.

◾️ याशिवाय वर्ल्डकप ट्राॅफी जिंकणारा बांगलादेश हा सातवा संघ ठरला.

◾️आशियाईतील संघांनी आतापर्यंत १३ पैकी सात वेळा विश्वविजेता हाेण्याचा पराक्रम गाजवला आहे.

◾️📌यामध्ये भारतीय संघ सर्वाधिक चार वेळा या ट्राॅफीचा मानकरी ठरला आहे.

◾️याशिवाय पाकिस्तान आणि श्रीलंका संघाला प्रत्येकी एक वेळा हा वर्ल्डकप जिंकता आला आहे. त्यानंतर आता बांगलादेश यशस्वी संघ ठरला.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

पश्चिम बंगालमध्ये भाताच्या आर्सेनिक-प्रतिरोधक वाणाची लागवड केली गेली.


⭕️भारताच्या संशोधकांनी भाताचे (तांदूळ) आर्सेनिक-प्रतिरोधक वाण विकसित केले आहे. त्याच्या चाचणी यशस्वी ठरल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये त्याचे व्यापारीकरण केले गेले आहे.

⭕️भारतात पश्चिम बंगाल या प्रदेशामध्ये भूगर्भात आर्सेनिकचे प्रमाण अत्याधिक आहे. राज्यातल्या सात जिल्ह्यांमध्ये 83 विभाग आहेत, ज्यात आर्सेनिकची पातळी मानवी आरोग्याच्या दृष्टीने ठरविलेल्या प्रमाणापेक्षा जास्त आहे.

💮नव्या वाणाविषयी...

⭕️“मुक्तोश्री (IET 21845)” असे नाव या भाताला देण्यात आले आहे. हे वाण जेनेटिकली मॉडीफाईड (JM) आहे म्हणजेच भात पिकाच्या मूळ संरचनेत बदल करण्यात आले आहेत.

⭕️पश्चिम बंगालच्या कृषी विभागाच्या अंतर्गत असलेले चिनसुरहमधले तांदूळ संशोधन केंद्र आणि लखनऊची राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था इथल्या संशोधकांनी संयुक्तपणे ही वाण विकसित केले आहे.
ही बियाणे राज्याच्या वेगवेगळ्या भागात ओल्या हंगामात आणि कोरड्या हंगामात यशस्वी चाचण्यानंतर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

⭕️चाचण्यांमधून असे आढळले की इतर विविध प्रकारच्या तांदळाच्या तुलनेत नव्या वाणामध्ये आर्सेनिकचे प्रमाण कमी प्रमाणात होते. या वाणाचे हिवाळ्याच्या हंगामात हेक्टरी 5.5 मेट्रिक टन आणि खरीप हंगामात हेक्टरी 4.5 ते 5 मेट्रिक टन उत्पादन घेतले जाऊ शकते.

💮आर्सेनिक पदार्थ...

⭕️आर्सेनिक नैसर्गिकरीत्या पृथ्वीच्या भूगर्भात विपुल प्रमाणात तसेच खडक, माती, पाणी आणि हवेमध्ये कमी प्रमाणात आढळते. हा पदार्थ बर्‍याच वेगवेगळ्या खनिजांमध्ये देखील आढळतो. वातावरणात असलेल्या आर्सेनिकपैकी एक तृतियांश भाग ज्वालामुखीसारख्या नैसर्गिक स्त्रोतांकडून वातावरणात आला आहे आणि उर्वरित भाग मानवनिर्मित स्त्रोतांकडून आला आहे.

⭕️विविध अभ्यासातून असे दिसून आले आहे की आर्सेनिक हा रासायनिक घटक भूजळ आणि मातीपासून धान्याच्या माध्यमातून अन्न साखळीत प्रवेश करू शकतो.

⭕️जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, आर्सेनिकचा दीर्घकाळ होणारा संपर्क विषबाधा होण्यास कारणीभूत ठरते. यामुळे त्वचेचे घाव आणि त्वचेचा कर्करोग होऊ शकतो.

११ फेब्रुवारी २०२०

आफ्रिका खंडातील सोमालिया सरकारने टोळधाडींमुळे देशात आणीबाणीची घोषणा केली आहे.

🎆 सोमालियामध्ये टोळ किड्यांची संख्या इतक्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे की तेथे अन्न धान्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील कृषीमंत्रालयाने आणीबाणीची घोषणा करण्याची मागणी सरकारकडे केल्यानंतर आणीबाणी घोषित केली आहे.

🎆 सोमालियाच्या कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, “टोळांची संख्या प्रमाणाबाहेर वाढली आहे. टोळधाडीचे प्रमाण वाढल्यामुळे देशातील अन्नधान्याच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. लोकांना अन्नधान्य पुरवणारी पिके या टोळधाडींमुळे नष्ट होत आहेत.

🎆 देशभरामध्ये अनेक ठिकाणी एकाचवेळी टोळांची संख्या हजारोंनी वाढली असून हे टोळ सामान्यपेक्षा मोठ्या आकाराचे आहेत. हे टोळ मोठ्याप्रमाणात पिके खात असल्याने देशाचा अन्नसुरक्षा कार्यक्रम धोक्यात आला आहे.”

✅ वाळवंटी टोळ म्हणजे काय?

🎆 सोमालियामध्ये ज्या टोळ किटकांमुळे आणीबाणी घोषित करण्यात आली आहे ते टोळ वाळवंटी टोळ म्हणून ओळखले जातात.

🎆 नाकतोडा प्रकारातील हे किटक टोळीटोळीने झाडांच्या पानांवर राहतात. प्रजननाच्या काळात यांची संख्या हजारोंच्या पटीत वाढते. आफ्रिकन देशांमध्ये अनेकदा पिकांवर किड लागते. टोळधाडही या भागातील देशांसाठी नवीन नाही. मात्र यंदा या टोळधाडींचे प्रमाण वाढले आहे. मागील २५ वर्षांमधील सर्वात वाईट परिस्थिती यंदा असल्याचे स्थानिक सांगतात.

✅ आधीही पडल्या आहेत टोळधाडी :

🎆 याआधीही सोमालियामध्ये १९९० च्या दशकामध्ये सहा वेळा अशाप्रकारे मोठ्याप्रमाणात टोळधाडींने उच्छाद मांडला होता. त्यानंतर २००३-०४ सालीही मोठ्याप्रमाणात अन्नधान्याची नासधूस केली होती.

महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा राजीनामा

🅾महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. आज संध्याकाळीच विजया रहाटकर यांनी त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सादर केला. एका जनहित याचिकेवर झालेल्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांबाबत टिपण्णी केली होती. सरकार बदललं आहे.

🅾त्यामुळे विजया रहाटकर यांनी राजीनामा द्यायला हवा आणि 5 फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारने नव्या अध्यक्षांची नेमणूक करावी असाही आदेश न्यायालयाने दिला होता. हा आदेश कायद्यातील तरतुदींविरोधात असल्याने रहाटकर यांनी या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हानही दिलं होतं.

🅾मात्र आज विजया रहाटकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपण स्वतःहून राजीनामा देत असल्याचं विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. तसेच मागील साडेतीन वर्षांपासून आयोगाचे अध्यक्षपद सांभाळण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली आहे. बालकल्याण विभाग, आयोगाचे कर्मचारी या सगळ्यांचेच आभार विजया रहाटकर यांनी मानले आहेत.

खवल्या मांजरापासून कोरोना विषाणू मानवात आला: शोध


- चीनमधल्या संशोधकांनी कोरोना विषाणूचे मूळ शोधून काढले. संशोधनात असे आढळून आले आहे की खवल्या मांजर (पांगोलिन) या दुर्मिळ वन्यप्राणीपासून हा विषाणू मानवात आला आहे. खवल्या मांजराची आशियात सर्वाधिक तस्करी होते.

- चीनमध्ये या विषाणूने आतापर्यंत 800 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे आणि हा आकडा वाढतच आहे. याचा उद्रेक वुहान शहरापासून झाला.

- संशोधनानुसार, कोरोना विषाणूचे जैविक स्वरूप हे खवल्या मांजराच्या पेशीपासून मिळविण्यात आलेल्या जैविक स्वरूपाबरोबर 99 टक्के जुळतो. खवल्या मांजराची होणारी तस्करी यासाठी कारणीभूत असल्याचा संशय आहे.

-  चीनमध्ये पारंपरिक औषधांमध्ये या प्राण्याचा वापर केला जातो. तसेच, त्यांच्या मांसाला अधिक मागणी आहे.

- 2002-03 या साली देखील अश्याच SARS विषाणूचा चीनमध्ये उद्रेक झाला होता. तेव्हा विषाणू सिव्हेट या सस्तन प्राण्यापासून मानवांमध्ये आला होता.

▪️खवल्या मांजर

- स्तनिवर्गातल्या फोलिडोटा गणाच्या मॅनिडी कुलातला हा प्राणी आहे. या कुलात मॅनिस हा एकच वंश असून त्यात सात जाती आहेत.

- त्यांपैकी काही आफ्रिकेत व काही आशियात आढळतात. मुग्यांची व वाळवीची वारूळे उकरून त्यांतल्या मुंग्या व वाळव्या ते आपल्या चिकट जिभेने टिपून खाते. जिभेने चाटून पाणी पितात.

- खवल्या मांजराच्या दोन जाती भारतात आढळतात, त्या म्हणजे - भारतीय खवल्या मांजर (मॅनिस क्रॅसिकॉडेटा) आणि चिनी खवल्या मांजर (मॅनिस पेटॅडॅक्टिला).

- भारतीय जाती हिमालयाच्या दक्षिणेस मैदानी प्रदेशात व डोंगरांच्या उतरणीवर आणि श्रीलंकेत आढळतात.

- चिनी जाती हिमालय, आसाम, नेपाळ, म्यानमार, दक्षिण चीन, हैनान आणि फॉर्मोसा या देशांमध्ये आढळतात.

उडान योजनेला मदत म्हणून 2024 पर्यंत आणखी 100 विमानतळ विकसित केले जाणार.


🔶चालू आर्थिक वर्षात ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रासाठी 22000 कोटी रुपयांचा केंद्रीय अर्थसंकल्पात प्रस्ताव.
 
🔶केन्‍द्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री  निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत  2020-21 वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना संगितले की आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधा अत्यंत महत्वपूर्ण आहेत.

🔶म्हणूनच हा अर्थसंकल्प सर्व नागरिकांना सुलभ जीवनमान पुरवण्यासाठी समर्पित आहे.भारतीय सागरी बंदरांची कार्यक्षमता वाढवणे आणि तंत्रज्ञानाचा वापरातून त्यांची कामगिरी सुधारण्यावर भर देताना अर्थमंत्री म्हणाल्या कि सरकार किमान एका प्रमुख बंदराचे कंपनीत रूपांतर करण्याबाबत विचार करेल आणि त्यानंतर शेअर बाजारात ते सूचिबद्ध होईल.

🔶अंतर्गत जलमार्गाबाबत बोलताना अर्थमंत्री म्हणाल्या कि राष्ट्रीय जलमार्ग-1 वर 'जल विकास मार्ग' पूर्ण केला जाईल आणि 2022 पर्यंत धुबरी-साडिया (890 किलोमीटर) जलमार्ग जोडणी पूर्ण केली जाईल.

🔶सीतारमण म्हणाल्या कि नदी किनाऱ्यालगत आर्थिक घडामोडी वाढवण्याच्या 'अर्थ गंगा ' या पंतप्रधानांच्या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी योजना तयार आहे. देशात वाहतूक पायाभूत विकासाला चालना देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 1.70 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
 
➡️नागरी विमान क्षेत्राला चालना

🔶 उडान योजनेला मदत म्हणून 2024 पर्यंत आणखी 100 विमानतळ विकसित केले जातील अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. त्या म्हणाल्या कि जागतिक सरासरीच्या तुलनेत भारताच्या हवाई वाहतुकीत वेगाने वाढ झाली आहे. या कालावधीत विमानांची संख्या सध्याच्या 600 वरून 1200 पर्यंत जाईल अशी शक्यता त्यांनी अर्थसंकल्प मांडताना व्यक्त केली.

🔶2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्याच्या दिशेने अर्थमंत्र्यांनी "कृषी उडान" या नागरी विमान मंत्रालयाच्या कार्यक्रमाची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय मार्गांवर हा कार्यक्रम राबवला जाईल.

🔶यामुळे ईशान्य आणि आदिवासी जिल्ह्यांना कृषिमालाला योग्य मूल्य मिळवण्यात मदत होईल.
 
➡️ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा

🔶अर्थमंत्र्यांनी 2020-21 मध्ये ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रासाठी 22000 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

🔶सर्व राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशाना पुढील तीन वर्षात पारंपरिक मीटर्सच्या जागी स्मार्ट मीटर्स बसवणे आणि वीज वितरण कंपन्यांमध्ये सुधारणा करण्याची विनंती केली आहे.

🔶राष्ट्रीय गॅस ग्रीडचा विस्तार सध्याच्या 16200 कि.मी. वरून 27000 किमी पर्यंत वाढवणे आणि पारदर्शक किंमत निर्धारण आणि व्यवहार सुलभ करण्यासाठी आणखी सुधारणा करण्यात येतील असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

🔶अर्थमंत्र्यांनी वीज निर्मिती क्षेत्रातील नवीन देशांतर्गत कंपन्यांना 15% कॉर्पोरेट कर आकारण्याचा  प्रस्तावही दिला.

फेब्रुवारी महिन्यात डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार

📌अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात ट्रम्प भारत भेटीवर येऊ शकतात. त्या दृष्टीने कार्यक्रमांची आखणी सुरु आहे. ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोग खटल्याची सुनावणी पुढच्या आठवडयात सुरु होऊ शकते. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याच्यावेळीच त्यांच्याविरोधात अमेरिकेत हा खटला सुरु असेल असा अंदाज आहे.

📌ट्रम्प यांच्या दौऱ्याची आखणी करण्यासाठी दोन्ही देश संपर्कात असून, सोयीच्या तारखा ठरवण्यासाठी चर्चा सुरु आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ट्रम्प आणि मोदी बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या द्विपक्षीय व्यापार करारासह अन्य करारांवर स्वाक्षरी करु शकतात.

📌भारताची आर्थिक विकासाची गती सध्या मंदावली असून, सीएए कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरु आहे त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा हा दौरा होत आहे. सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी ह्युस्टनमध्ये हाऊडी मोदी कार्यक्रम झाला होता.

📌डोनाल्ड ट्रम्पही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मोदी यांचा हात हातात घेऊन त्यांनी संपूर्ण स्टेडियमला फेरी मारली होती. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, मागच्यावर्षी ट्रम्प यांनी भारताचे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारले होते. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल.

चालू घडामोडी वन लाइनर्स, 10 फेब्रुवारी 2020.


❇ 10-14 फेब्रुवारी: आर्थिक साक्षरता आठवडा

❇ थीम 2020: "मायक्रो, लघु आणि मध्यम उपक्रम (एमएसएमई)"

❇ एचएएलला हलकी उपयुक्तता हेलिकॉप्टर तयार करण्यास मान्यता मिळाली

❇ भारती एअरटेल सह टाटा समूहाच्या विलीनीकरण मंत्रालयाने मंजूर केले

❇ अंतरावरील 328 दिवस घालवल्यानंतर क्रिस्टीना कोच पृथ्वीवर परतली

❇ सेंट्रल बँकेने रेपो दर 5.15% वर बदलला आहे.

❇ रिव्हर्स रेपो दर 4..90 % वर न बदललेला राहण्याचा निर्णय घेण्यात आला.

❇ राजस्थान सरकार ट्रान्सजेंडर समुदायासाठी स्वतंत्र ओळखपत्र तयार करेल

❇ आंध्र प्रदेशातील प्रथम दिशा पोलिस स्टेशनचे राजमहेंद्रवाराम येथे उद्घाटन झाले

❇ आयआयएम बेंगळुरू बिझिनेस स्कूलमध्ये एमओसीच्या जागतिक कामगिरीच्या कामगिरीमध्ये तिसरा या क्रमांकावर आहे

❇ गाझियाबाद पोलिसांनी सर्व ऑटोरिक्षा चालकांची ओळख पटविण्यासाठी 'ऑपरेशन नकईल' सुरू केले.

❇ नेपाळचा कुशल मल्ला (15) एकदिवसीय अर्धशतक झळकावणारा युवा क्रिकेटर ठरला.

❇ सीरियाच्या एलडीलिब प्रांतात मानवतावादी कारवायांसाठी संयुक्त राष्ट्र संघाने 30 दशलक्ष डॉलर्स जाहीर केले

❇ हैदराबाद मेट्रो रेल भारताचा दुसरा सर्वात मोठा ऑपरेशनल मेट्रो प्रकल्प झाला

❇ MoHUA ने राहण्याची सुलभता आणि नगरपालिका कामगिरी निर्देशांक 2019 ची सुरूवात केली

❇ जानेवारी 1, 2020 पर्यंत एलपीजी कव्हरेज .96.9..% पर्यंत पोहोचली: शासन

❇ एडीबीने कोरोनाव्हायरस विरूद्ध लढा देण्यासाठी 2 दशलक्ष डॉलर्सच्या निधीस मंजुरी दिली

❇ बिबट्यांची लोकसंख्या भारतात घटून 75-90% झाली आहे

❇ अमेरिकन लेखक रॉजर कहान यांचे नुकतेच निधन झाले

❇ हरियाणा सरकारने मुक्तामंत्र परिवार समृध्दी योजना सुरू केली

❇ आयकर (आयटी) विभागाने "ई-कॅल्क्युलेटर" चे अनावरण केले

❇ मनोज दास यांना गूढ कलिंग साहित्य पुरस्कार मिळाला

❇ ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये गूढ कलिंग महोत्सव आयोजित

❇ मुंबई येथे ई-गव्हर्नन्स विषयी 23 वे राष्ट्रीय परिषद आयोजित

❇ जागतिक बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ पिनेलोपी कौजियानो गोल्डबर्ग राजीनामा

❇ 64 व्या बोकस्काई मेमोरियल टूर्नामेंट हँगरी मधील डेब्रेसेन मध्ये आयोजित

❇ आयओसी लाइफटाइम पुरस्कारांमध्ये पुलेला गोपीचंद यांचा सन्माननीय उल्लेख

❇ फेड कप मार्चमध्ये दुबईमध्ये होणार: आयटीएफ

❇ दक्षिण आफ्रिकेत यु -20 वर्ल्ड कप 2020 चे 13 वे संस्करण

❇ बांगलादेशने यू 19 विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्यासाठी विकेट्सद्वारे भारताला हरवले

❇ बांगलादेश प्रथम जिंकलेला यू 19 विश्वचषक विजेतेपद

❇ नसीम शाह कसोटी हॅट-ट्रिक घेण्यासाठी सर्वात तरुण गोलंदाज बनला

❇ सरकार सर्जिकल मुखवटे, निर्यात बंदी यादीतील दस्ताने काढून टाकते.

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...