०८ फेब्रुवारी २०२०

पोलीस भरती प्रश्नसंच


▶️महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा म्हणून ओळख असलेला जिल्हा कोणता ?

👉🏿उत्तर —--------- - कोल्हापूर

▶️महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेला जिल्हा कोणता ?

👉🏿 उत्तर —---------— औरंगाबाद

▶️विदर्भातील ............. जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.?

👉🏿 उत्तर —---------— गोंदिया

▶️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी ............. या जिल्ह्यात चालते.

👉🏿उत्तर —---------— रत्नागिरी

▶️ महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ?

👉🏿उत्तर —---------— गोंदिया

▶️महाराष्ट्राचे पठार ............. या खडकाने बनलेले आहे.

👉🏿. उत्तर —---------— बेसॉल्ट

▶️महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला .....................म्हणून ओळखतात.

👉🏿 उत्तर —---------— सह्याद्री

▶️महाराष्ट्रातील ............... जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे.

👉🏿उत्तर —---------— मुंबई

▶️ महाराष्ट्रातील ............... या जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

👉🏿. उत्तर —---------— रत्नागिरी

▶️ महाराष्ट्रात ................... या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

👉🏿उत्तर —---------— गडचिरोली

▶️ महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा कोणता ?

👉🏿 उत्तर —--------- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.

▶️महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा कोणता ?

👉🏿उत्तर —--------- वर्धा.

▶️महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता आणि कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाला ?

👉🏿 उत्तर —------— प्रवरानगर, जिल्हा अहमदनगर.

▶️ भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या कोणत्या राज्यात आहेत ?

👉🏿उत्तर —---------— महाराष्ट्रात

▶️ महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना कोणत्या जिल्यात आहे ?

👉🏿 उत्तर —---------- नाशिक

▶️ महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता ?

👉🏿उत्तर —--------- अहमदनगर.

▶️ भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?

👉🏿 उत्तर —---------— रायगड

▶️महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस ................ येथे पडतो.

👉🏿उत्तर —--------- आंबोली (सिंधुदुर्ग)

▶️ पढरपूर हे शहर .............. या नदीकाठी आहे. आणि त्या नदीलाच महाराष्ट्राची काशी म्हणतात.

👉🏿उत्तर —------------ भीमा

▶️कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात ?

👉🏿 उत्तर —---------— गोदावरी

▶️ कोणत्या नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते ?

👉🏿 उत्तर —--------- प्रवरा

▶️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात ................येथे आहेत ?

👉🏿उत्तर —--------- वज्रेश्वरी

▶️जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?
👉🏿
उत्तर —---------—
बुलढाणा

▶️बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते ?

👉🏿औरंगाबाद

▶️ पणे जिल्ह्यातील हे शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

👉🏿उत्तर - जुन्नर

०७ फेब्रुवारी २०२०

नील / निळी अर्थव्यवस्था (Blue economy) आणि अर्थसंकल्प २०२०


▪️जागतिक बँकेच्या व्याख्येनुसार नील अर्थव्यवस्था म्हणजे समुद्री संसाधनांचा शाश्वत पद्धतीने तसेच समुद्राच्या पर्यावरणातील आरोग्यास जपत केलेला   आर्थिक विकास होय.
▪️याअंतर्गत सागरी संसाधनांचा शाश्वत विकास, पर्यटन यांवर महत्त्वपूर्ण भर देण्यात येतो.
▪️The Blue Economy: 10 Years, 100 Innovations, 100 Million Jobs या गुंटर पाउली लिखित पुस्तकात या संकल्पनेचा प्रथम उल्लेख करण्यात आला.
▪️हरित अर्थव्यवस्थे(Green economy)च्या (1.0)  दुसऱ्या  हरित अर्थव्यवस्था (2.0)” टप्प्याला नील अर्थव्यवस्था म्हणून ओळखले जाते.
▪️अर्थसंकल्पीय भाषणात शेतकऱ्यांचे उत्पन्न, बागायती क्षेत्र, अन्नधान्य साठा, पशुसंवर्धन आणि नील अर्थव्यवस्था दुप्पट करण्यावर लक्ष केंद्रित करून 16 कलमी कृती आराखड्याची घोषणा करण्यात आली.
▪️सीतारामन यांनी सागरी मत्स्यपालन संसाधनांचा विकास, व्यवस्थापन आणि संवर्धन आणि  समुद्री तण आणि  केज कल्चरच्या संवर्धनासाठी एक  आराखडा निर्माण करण्याचा प्रस्ताव दिला, जो 2022-23  पर्यंत मासळीचे उत्पादन 200  लाख टन करण्यात  सहाय्यभूत ठरणार.
▪️याकरिता ग्रामीण भागातील तरुणांना मत्स्यव्यवसाय क्षेत्रात सामील करण्यासाठी सागर मित्र आणि  मत्स्य उत्पादक संस्था यांच्यामार्फत 3477 तरुणांना मत्स्य व्यवसायात सामील करून घेण्यात येणार
▪️2024-25 पर्यंत मत्स्यव्यवसाय निर्यात 1 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट्य.
▪️सहकारी संघराज्याच्या पद्धतीचे  अनुसरण  करत  मॉडेल अ‍ॅग्रीकल्चरल लँड लीजिंग कायदा -2016, मॉडेल कृषी उत्पन्न आणि पशुधन विपणन ( प्रोत्साहन आणि सुलभता) कायदा- 2017 आणि मॉडेल कृषी उत्पन्न आणि पशुधन करार शेती आणि सेवा (प्रोत्साहन आणि सुविधा) कायदा, 2018 ची अंमलबजावणी करणाऱ्या राज्य सरकारांना प्रोत्साहित करण्याचा प्रस्तावही सीतारामन यांनी मांडला.
नील अर्थव्यवस्था आणि हिंदी महासागर
▪️आशियामधील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांना सर्व प्रकारचा पुरवठा करणारे महत्त्वाचे समुद्री जलमार्ग हिंदी महासागरातून जातात. यामुळे  हिंदी महासागराचे महत्त्व अधिक
▪️शीतयुद्धानंतर झालेल्या संघर्षांपैकी बहुतेक संघर्ष हिंदी महासागराच्या परिसरात झालेले आहेत
▪️यामुळेच जगातील प्रमुख सत्तांनी आपली लष्करी उपस्थिती हिंदी महासागराच्या परिसरात ठेवली आहे.
▪️भारत तेल, इंधनआयातीवर इतर देशांवर अवलंबून आहे. यातील ७० टक्क्यांपेक्षा जास्त तेल अरब देशांतून आयात होते
▪️'जर्नल ऑफ द इंडियन ओशन’च्या संदर्भानुसार ८० टक्क्यांपेक्षा जास्त तेल वाहतूक ही हिंदी महासागराच्या अत्यंत अरुंद, चिंचोळ्या मार्गातून होते
▪️हिंदी महासागर भागातील आर्थिक वृद्धी आणि संतुलित विकासासाठी १९९७ मध्ये The Indian Ocean Rim Association (IORA) या संस्थेची  स्थापना
▪️या संस्थेची २० राष्ट्रे  सभासद असून ६  राष्ट्रांना निरीक्षक राष्ट्रांचा दर्जा
▪️भारताकडून किनारपट्टीवरील व समुद्रातील साधनसंपत्तीचा उपयोग करून ‘निळी’ अर्थव्यवस्था विकसित करण्यावर भर
सेशल्स बेटे, भारत आणि नील अर्थव्यवस्था
▪️सेशल्स बेटे ‘ब्लू इकॉनॉमी’बाबत अग्रेसर आहेत. भारताने सेशल्स बेटांसोबत संयुक्त कृतिगट (जॉइंट वर्किंग ग्रूप) स्थापन केला आहे.
▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाकडून  भारत आणि सेशेल्स दरम्यान नील अर्थव्यवस्था अर्थात सागरी अर्थव्यवस्थेसंबंधीच्या क्षेत्रातील सहकार्यासंबंधी कराराच्या आराखड्याच्या प्रोटोकॉलला कार्योत्तर मंजूरी देण्यात आलेली आहे.
▪️हा प्रोटोकॉल दोन देशांमध्ये शाश्वत विकास आणि आर्थिक उद्दिष्टांसाठी सागरी अभ्यास तसेच वैज्ञानिक संशोधन आणि समुद्रावर आधारित साधनांचे शोषण यासंदर्भातील नियमावली आणि सहकार्याचे तंत्र याबाबत आहे.
▪️या सहकार्यामुळे नील अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात भारताचे धोरणात्मक सहकार्य, कौशल्य, तंत्रज्ञान व मानवी संसाधने यांच्या निर्यातीपासून व्यावसायिक लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
▪️याशिवाय, महासागरांमधील स्रोतांपर्यंत पोहचण्यास सेशल्सचे सहकार्य मिळणार असून  सेशेल्ससोबत नील अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रातील सहकार्याने महासागर आधारित स्रोतांच्या नव्या माहितीचे संकलन करता येणार
मालदीव,भारत आणि नील अर्थव्यवस्था
▪️भारतात निर्मिती केलेली जलद इंटरसेप्टर नौका (गस्ती नौका) अधिकृतपणे मालदीव तटरक्षक दलाकडे सुपूर्द करण्यात आलेल्या आहेत
▪️यामुळे मालदीवच्या सागरी सुरक्षेत वाढ होईल तसेच भारत आणि मालदीवमधील  नील अर्थव्यवस्था आणि पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल.
▪️या गस्ती नौकेला ‘कामयाब’ हे नाव देण्यात आले आहे

१० पैकी एका भारतीयाला होणार कर्करोग

👉 भारतात २०१८ मध्ये कर्करोगाचे ११ लाख ६० हजार नवे रुग्ण असणार असून, १० पैकी एका भारतीयाला आयुष्यात कर्करोग होऊन १५ पैकी एकाचा मृत्यू होईल,अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ)व्यक्त केली आहे.

👉जागतिक कर्करोग दिनी डब्लूएचओ आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (आयएआरसी)ने दोन पाहणी अहवाल प्रसिद्ध केले. भारतात २०१८ मध्ये ११ लाख ६० हजार नवे रुग्ण आढळले असून, सात लाख ८४ हजार ८०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २२ लाख सहा हजार रुग्ण पाच वर्षे उपचार घेत आहेत, असे या अहवालात म्हटले आहे.

👉भारतात स्तनाच्या कर्करोगााचे सर्वाधिक रुग्ण असून, ही संख्या एक लाख ६२ हजार आहे.त्यापाठोपाठ तोंडाचा (१.२०लाख), सर्व्हिकल (९७ हजार), फुफ्पुस (६८ हजार), पोट (५७ हजार) आणि आतड्यांचा कर्करोग होणाऱ्यांची संख्या ५७ हजार आहे.

👉स्तनांचा आणि आतड्यांचा कर्करोग होण्याचा संबंध अतिवजन आणि स्थूलपणा, शारिरीक हालचालींचा अभाव आणि चुकीची जीवनशैली असून, यामुळे आर्थिक आघाडीवरही संकट असून,त्यातून सामाजिकआर्थिक बदल मोठ्या प्रमाणावर होणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.

👉जर कर्करोगावर गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांत उपाय योजले गेले नाहीत तर जगात पुढील २० वर्षांत कर्करोगात ६० टक्क्यांनी वाढ होईल असेही डब्लूएचओने म्हटले आहे. या देशांपैकी फक्त १५ टक्के देशांनी कर्करोगावर सरकारी रुग्णालयात व्यापक स्वरूपात उपचार दिले आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.

जिवंत रोबोट “झेनोबॉट्स” (Xenobots)

🚦वैज्ञानिकांनी जैविक ‘स्टेम सेल’ पासून एक रोबोट तैय्यार केला आहे, ज्याला त्यांनी "झेनोबॉट्स" हे नाव दिले आहे.

🚦 "झेनो" हा शब्द बेडकाची पेशी (झेनोपस लेव्हिज) पासून घेतला गेला आहे कारण त्याच पेशीपासून हा रोबोट तयार झाला आहे.

🚦या शोधात ईशान्य अमेरिकेतल्या टुफ्ट्स यूनिवर्सिटीचे अ‍ॅलन डिस्कव्हरी सेंटर आणि युनिव्हर्सिटी ऑफ व्हरमाँट इथल्या संशोधकांचा सहभाग आहे.

🚦हे निसर्गासाठी “संपूर्णपणे नवीन जीवन-रूप” आहे. झेनोबॉटची लांबी-रुंदी 1 मिलीमीटरपेक्षा कमी आहे.

🚦ते 500-1000 जिवंत पेशींना एकत्र करून बनलेले आहे.

🚦ते विविध आकारात तयार करण्यात आले आहेत, असे की ज्यात चार पाय सुद्धा आहेत. 

🚦मानवी शरीरात प्रवास करण्यासाठी ते सक्षम आहेत. ते चालतात आणि पोहू शकतात, काही आठवडे जेवण न करता जगू शकतात आणि एकत्र गटातही काम करतात

कोकण माहिती

🔹खाड्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलप्रमाणे

1)डहाणूची खाडी
2) दातिवऱ्याची खाडी
3) वसईची खाडी
4) धरमतरची खाडी
5) रोह्याची खाडी
6) राजपुरीची खाडी
7) बाणकोटची खाडी
8) दाभोळची खाडी
9) जयगडची खाडी
10) विजयदुर्गची खाडी
11) तेरेखोलची खाडी

🔹उत्तरेकडून दक्षिणेकडे कोकणातील नद्यांचा क्रम

1) सूर्या नदी
2) वैतरणा नदी
३) उल्हास नदी
4) अंबा नदी
5) सावित्री
6) वाशिष्ठी
7) काजळी
8)वाघोठाण
9)कर्ली
10) तेरेखोल

लोकसभेबद्दल संपूर्ण माहिती:

लोकसभेची निर्मिती ब्रिटन आणि कॅनडाच्या कॉमन सभागृहाच्या धर्तीवर करण्यात आली आहे.

सभासदांची संख्या :
घटनेच्या 81 व्या कलमामध्ये लोकसभेच्या सभासदांची संख्या निर्धारित करण्यात आली आहे. 1974 च्या 31 व्या घटनादुरुस्तीनुसार घटकराज्यांच्या सभासदांची संख्या 525 तर केंद्रशासीत प्रदेशांची सभासद संख्या 20 इतकी करण्यात आली आहे. परंतु लोकसभेत जास्तीत जास्त 552 इतके सभासद सांगितले आहेत. त्यामध्ये 530 घटकराज्य. 20 केंद्रशासीत प्रदेश आणि जर अँग्लो इंडियन समाजाला लोकसभेत प्रतिनिधीत्व मिळाले नाही तर दोन सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे. भारतीयलोकप्रतींनिधी कायदा 1951 नुसार पाच ते साडेसात लाख मतदारांमागे एक लोकसभेचा उमेदवार निवडला जातो.

मतदारसंघ निर्धारण आयोग :
या आयोगाची निर्मिती 1972 साली करण्यात आली. त्या आयोगाचा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचा एक न्यायाधीश असतो.

उमेदवारांची पात्रता :
घटनेच्या 84 व्या कलमात सभासदांची पात्रता सांगितली आहे ती पुढीलप्रमाणे
1. तो भारताचा नागरिक असावा.
2. त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावीत.
3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.

निवडणूक पद्धत :
लोकसभेची निवडणूक प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने होते. ती निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली होते.

लोकसभेचा कार्यकाल :
पाच वर्ष इतका आहे परंतु तो कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे. आणीबाणीच्या कालखंडात संसद कायदा करून लोकसभेचा कार्यकाल फक्त एकदाच एका वर्षासाठी 83/2 कलमानुसार वाढवू शकतो.

सभासदांचा कार्यकाल :
प्रत्येक सभासदाचा कार्यकाल हा 5 वर्ष इतका असतो परंतु कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी आपला राजीनामा लोकसभेच्या सभापतींकडे देऊ शकतो.

बैठक किंवा अधिवेशन :
घटनेच्या 85 कलमामध्ये सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहाची वाटेल त्या वेळी अधिवेशन बोलवितो परंतु दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.

गणसंख्या :
कोणत्याही सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी आवश्यक असलेली सभासद संख्या म्हणजेच गणसंख्या होय. ती 1/10 इतकी निर्धारित करण्यात आली आहे.

पदमुक्तता :
कोणत्याही सभागृहाची परवानगी न घेता एखादा सदस्य सतत 60 दिवस सभागृहात गैरहजर राहिल्यास त्याचे सभासदत्व आपोआप रद्द होते. परंतु (60 दिवसात संबंधित सभागृहाला लागोपाठ चार दिवस सुट्ट्या आल्या असतील तर सभासदत्व रद्द होत नाही.)

लोकसभेचा सभापती कार्य आणि अधिकार :
लोकसभेत निवडून आलेल्या एका सदस्याची सभापती म्हणून व दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून लोकसभेतील सदस्यांकडून निवड केली जाते.

कार्य :
1. धनविधेयक आहे की नाही हे ठरविणे.
2. प्रश्न आणि उपप्रश्न विचारण्यास परवानगी देणे.
3. प्रवर समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती करणे.
4. कमरोको प्रस्ताव आणण्यासाठी सभापतींची परवानगी आवश्यक आहे.
5. सभागृहात शांतता व सुव्यवस्था राखणे.
6. सभागृहाचे कामकाज सुरू होण्यासाठी पुरेशी गणसंख्या नसेल तर कामकाज थांबविणे.
7. राष्ट्रपतीने दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलविल्यास अध्यक्षपद भूषविणे.
8. सामान्य उद्देश समिती, नियम समिती व कार्यवाही समितीचा सभापती पदसिद्ध अध्यक्ष असतो.
__________________________

संयुक्त अरब अमिरातीमध्ये नवीन नैसर्गिक वायूचा साठा सापडला

👉2 फेब्रुवारी, 2020 रोजी, संयुक्त अरब अमिरातीने सुमारे 80 ट्रिलियन घनफूट नवीन नैसर्गिक वायूचा साठा शोधला. 

👉अबूधाबी आणि दुबई दरम्यान हे साठे अस्तित्त्वात आहेत.

✅महत्वाचे

👉नोव्हेंबर 2019 मध्ये संयुक्त अरब अमिरातीने अब्ज बॅरल तेलाच्या शोधांची घोषणा केली, त्यानंतर युएई क्रूड साठा 10 अब्ज बॅरलपर्यंत पोहोचला, युएईमध्ये जगातील सहावा सर्वात मोठा तेल साठा आहे.

👉युएईनेही 58 ट्रिलियन घनफूट वायूची घोषणा केली. यानंतर, संयुक्त अरब अमिरातीचा एकूण नैसर्गिक वायू (पारंपारिक गॅस) साठा वाढून 273 ट्रिलियन घनफूट झाला आहे.

👉 युएईचा अपारंपरिक गॅस साठा 160 ट्रिलियन घनफूट आहे.

✅संयुक्त अरब अमिराती

👉दुबई, अबू धाबी, अजमान, शारजाह, रस अल खैमाह, फुजैराह आणि उम्-कुवैन असे सात राजकीय क्षेत्र (इमिरेट्स) एकत्र करून संयुक्त अरब अमिरातीची निर्मिती झाली. 

👉संयुक्त अरब अमिरातीच्या जीडीपीपैकी 30% थेट तेल आणि वायूवर आधारित आहे.

✅भारत-संयुक्त अरब अमिराती

👉सध्या भारत आणि युएई दरम्यान द्विपक्षीय व्यापार 59.9 अब्ज डॉलर्स आहे.

👉 संयुक्त अरब अमिरातीमध्ये तिसर्या क्रमांकाची गुंतवणूक करणारा भारत आहे.

👉 2 दशलक्षाहून अधिक भारतीय संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहतात आणि काम करतात.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना ग्राम न्यायालये स्थापन करण्यास सांगितले

👉3 फेब्रुवारी 2020 रोजी, सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यांत राज्यांना 'ग्राम न्यायालये' स्थापन करण्यास सांगितले. 

👉सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील उच्च न्यायालयांशी सल्लामसलत करण्यास सांगितले आहे.

✅मुख्य मुद्दे

👉ग्राउंड कोर्ट अ‍ॅक्ट 2008 भूजल स्तरावर ग्रामीण न्यायालये स्थापन करण्यासाठी पारित करण्यात आला. या न्यायालयीन संस्थेचे उद्दीष्ट ग्रामीण भागात न्याय मिळविणे हे आहे.

👉राज्यांमधील ग्राम न्यायालयांची सद्यस्थिती सुप्रीम कोर्टाचे वकील प्रशांत भूषण यांनी स्पष्ट केली.

👉प्रशांत भूषण यांनी सादर केलेल्या अहवालानुसार गोवा यांनी व्हिलेज कोर्टाच्या स्थापनेसाठी दोन अधिसूचना जारी केल्या आहेत. परंतु आतापर्यंत राज्यात कोणतेही ग्रामीण न्यायालय कार्यरत नाही. 

👉हरियाणाने व्हिलेज कोर्टासाठी तीन अधिसूचना जारी केल्या असून हरियाणामध्ये केवळ दोनच ग्राम न्यायालये कार्यरत आहेत.

👉झारखंडमध्ये 6 ग्राम न्यायालयांना अधिसूचित करण्यात आले होते, परंतु राज्यात फक्त एकच ग्रामीण न्यायालय कार्यरत आहे. 

👉उत्तर प्रदेशने 113 ग्राम न्यायालयांसाठी अधिसूचना जारी केली होती, परंतु सध्या राज्यात केवळ  14 ग्राम न्यायालये कार्यरत आहेत. 

👉राज्यांत एकूण 822 ग्राम न्यायालये स्थापन होणार आहेत.

👉सध्या केवळ 208 ग्राम न्यायालये कार्यरत आहेत, तर 12 व्या पंचवार्षिक योजनेनुसार देशात 2500 ग्राम न्यायालये आवश्यक आहेत.

तानाजी मालुसरे यांच्याविषयी जाणून घ्या 'या' गोष्टी

छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात खास व्यक्ती तानाजी मालुसरे यांची आज (4 फेब्रुवारी) पुण्यतिथी.

कोंढाणा किल्ला जिंकण्याच्या अतीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली होती. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ...

एकदा कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंना दिली, तेव्हा तानाजी स्वतःच्या मुलाच्या लग्ना़च्या तयारीत असताना तानाजी ही तयारी अर्धवट सोडून महाराजांसमक्ष प्रस्तुत झाले.

कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंना दिल्यानंतर तानाजींनी कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला.

ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले. आधी 'लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे'. हे त्यांचे शब्द इतिहासात प्रसिद्ध पावले.

तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोहचले. ती भयाण काळोखी रात्र होती. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी द्रोणगिरीचा कडा निवडला.

रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्यावरच्या तुकडीला कळू न देता त्यांनी किल्ला पार केला.

अचानक हल्ला करून त्यांनी तेथील सैन्याला कात्रीत पकडले. आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्‍न केले.

शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागून 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलार मामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला.

गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. ही घटना 4 फेब्रुवारी, 1670 रोजी घडली.

तिथे झालेल्या अतीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. हे दुसर्‍या दिवशी छत्रपती शिवाजीराजे सिंहगडावर पोहचले तेव्हा त्यांना समजले.

त्यावेळी महाराज म्हणाले "गड आला पण सिह गेला". अत्यंत दुःखी झालेल्या राजांनी तानाजीचे शव त्यांच्या उमरठे या गावी पाठवले. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा 'वीरगळ' स्थापन करुन एक सुंदर स्मारक उभे केले गेले आहे.

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झाली ?
🎈९ डिसेंबर १९४६.

💐 जागतिक वन दिन केव्हा साजरा केला जातो ?
🎈२१ मार्च.

💐 'संविधानाचे शिल्पकार' कोणाला म्हटले जाते ?
🎈डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.

💐 LPG चे विस्तारित रूप काय आहे ?
🎈 Liquefied Petroleum Gas.

💐 संसदेच्या दोन अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त किती कालावधीचे अंतर असते ?
🎈६ महिने.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 'द फाॅल आॅफ स्पॅरो' हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
🎈डाॅ. सलीम अली.

💐 'कोलार' सोन्याची खाण कोणत्या राज्यात आहे ?
🎈कर्नाटक.

💐 'बालकवी' हे कोणाचे टोपणनाव आहे ?
🎈ञ्यंबक बापूजी ठोंबरे.

💐 भारतातील सर्वांधिक जिल्हे असलेले राज्य कोणते ?
🎈उत्तरप्रदेश.

💐 'जागतिक तंबाखूविरोधी दिन ' केव्हा साजरा करतात ?
🎈३१ मे.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 इटलीचा आक्रमक हुकूमशहा कोण होता ?
🎈मुसोलिनी.

💐 रविंद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार कधी मिळाला ?
🎈१९१३ मध्ये.

💐 रिलायंस इंडस्ट्रीजचे संस्थापक कोण होते ?
🎈धीरूभाई अंबानी.

💐 'गीत गोविंद' ग्रंथाचे लेखक कोण आहेत ?
🎈जयदेव.

💐 आॅस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंंधित आहे ?
🎈चित्रपट.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 सेल्युलर जेल कोठे आहे ?
🎈अंदमान.

💐 शाहू महाराजांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला ?
🎈कागल. ( कोल्हापूर )

💐 'जागतिक रेडक्राॅस दिवस' कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
🎈८ मे.

💐 इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेची स्थापना कधी झाली ?
🎈१ सप्टेंबर २०१८. ( नवी दिल्ली )

💐 मौर्य साम्राज्याच्या राजधानीचे शहर कोणते ?
🎈पाटलीपुत्र.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 भारताच्या राष्ट्ध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण किती ?
🎈२ : ३.

💐 'पितळ' हा धातू कशापासून तयार करतात ?
🎈तांबे + जस्त.

💐 भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे उभा राहिला ?
🎈प्रवरानगर.

💐 'क' जीवनसत्वा अभावी कोणता रोग होतो ?
🎈स्कर्व्ही.

💐 कोणत्या शहराचे नाव बदलवून प्रयागराज करण्यात आले ?
🎈अलाहाबाद.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक केव्हा झाला ?
🎈६ जून १६७४.

💐 रंजन गोगाई भारताचे कितवे सरन्यायाधिश होत ?
🎈४६ वे.

💐 भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव काय ?
🎈राॅ. ( RAW )

💐 ओरंग व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
🎈आसाम.

💐 महाराष्ट्रात माळढोक पक्षी अभयारण्य कोठे आहे ?
🎈सोलापूर.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...