०४ फेब्रुवारी २०२०

टोळधाडीमुळे पाकिस्तानात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

🌻पिकांवर आलेल्या टोळधाडीमुळे पाकिस्तान देशाने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. या काळात शेत आणि शेतकर्‍यांचे संरक्षण ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असणार आहे.

🌻टोळधाडीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान इम्रान खान यांनी 31 जानेवारी 2020 रोजी  मंत्रिमंडळाचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत चार राज्यांसाठी 7.3 अब्ज रुपयांच्या ‘राष्ट्रीय कृती कार्यक्रम’ला मंजुरी देण्यात आली.

🎄ठळक बाबी...

🌻पाकिस्तानातल्या सिंध प्रांतानंतर पंजाब प्रांतात सुद्धा टोळ पिके नष्ट करीत आहेत.सिंध आणि पंजाबवर हल्ला केल्यानंतर प्रथमच टोळ भारतीय सीमेजवळील खैबर पख्तूनख्वामध्ये दाखल झाले आहेत. टोळ सिंध आणि बलुचिस्तानमधून चोलिस्तान आणि नारा येथे दाखल झाले होते.

🌻हवामानातले बदल हे एक कारण आहे ज्यामुळे अधिक काळापर्यंत टोळ जीवंत आहेत. 1993 साली पाकिस्तानला ज्या परिस्थितीचा सामना करावा लागला होता त्यापेक्षा आजची परिस्थिती बिकट आहे.

🎄पाकिस्तान देश...

🌻दक्षिण आशियातला हा एक सार्वभौम इस्लामी प्रजासत्ताक देश आहे. भारताची फाळणी होऊन 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तान हे राष्ट्र अस्तित्वात आले. पूर्व पाकिस्तान हा प्रांत पुढे 1971 साली बांगलादेश या नावाने स्वतंत्र देश झाला. इस्लामाबाद ही देशाची राजधानी आहे आणि पाकिस्तानी रुपया राष्ट्रीय चलन आहे.

🌻पाकिस्तानची (ब्रिटिश भारताची वायव्य सीमा) अफगाणिस्तानबरोबरची सीमा “ड्युरँड रेषा” म्हणून ओळखली जाते व ती 1893 साली सर मॉर्टिमर ड्युरँड यांनी निश्चित केली आहे तर पाकिस्तानची भारताबरोबरची वर्तमानची सीमा 1947 साली ‘रॅडक्लिफ अवॉर्ड’ या सर सिरिल रॅडक्लिफ यांच्या निवाड्याप्रमाणे निश्चित केली आहे.

🌻सॉल्ट रेंज किंवा सैंधव-मीठदगड-डोंगररांग हे एक भूवैज्ञानिक वैशिष्ट्य आहे. ही डोंगररांग झेलमच्या उत्तरेस जोगीतिला व बाक्राला येथून सुरू होऊन नैर्ऋत्य दिशेने जाते आणि कालाबागजवळ सिंधू नदी ओलांडते आणि सिंधूच्या पश्चिमेस बन्नू व डेरा इस्माइलखान या जिल्ह्यांत पसरते.

राज्यांचा महसुली वाटा ४१ टक्क्य़ांवर

🔰केंद्राकडून राज्यांना मिळणाऱ्या हिस्स्यात एक टक्के घट करून तो ४१ टक्के करण्याची १५व्या वित्त आयोगाची शिफारस केंद्राने मान्य केली. परिणामी राज्यांना केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीत घट होणार आहे.

🔰वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार राज्यांना केंद्राकडून मदत मिळेल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले. १४व्या वित्त आयोगाने केंद्राकडून राज्यांना ३२ टक्क्य़ांवरून ४२ टक्के वाटा देण्याची केलेली शिफारस मोदी सरकारने २०१५ मध्ये मान्य केली होती. त्यानुसार राज्यांना केंद्राकडे कर रुपाने जमा होणाऱ्या एकूण रक्कमेपैकी ४२ टक्के रक्कम मिळत होती.

🔰१५व्या वित्त आयोगाने मात्र जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख या दोन केंद्रशासीत राज्यांना जास्त मदत देणे आवश्यक असल्याने अन्य राज्यांच्या हिश्श्यांत कपात सुचविली होती. सद्य स्थितीत जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख या केंद्रशासीत राज्यांचा हिस्सा वाढविणे आवश्यक होते. केंद्राकडे जमा होणाऱ्या रक्कमेतूनच राज्यांना मदत दिली जाते. केंद्राच्या तिजोरीवर जादा बोजा शक्य नसल्यानेच अन्य राज्यांच्या हिस्स्याच एक टक्का कपात करण्याची शिफारस वित्त आयोगाने केली होती व केंद्रीय मंत्रिमंडळाने ती मान्य केली.

🔰वस्तू आणि सेवा कर प्रणाली लागू झाल्यापासून केंद्राच्या महसुलात घट झाली होती. गेल्या काही महिन्यांमध्ये ही घट वाढली होती. वस्तू आणि सेवा कराचा परतावाही महाराष्ट्रासह अन्य राज्यांना मिळालेला नाही. काही वेळा वस्तू आणि सेवा कराचा परतावा मिळण्यास विलंब लागतो. या पाश्र्वभूमीवर केंद्राकडून राज्यांना मिळणाऱ्या मदतीत घट होणार हे निश्चितच मानले जात होते. वित्त आयोगाने एक टक्का कपात सुचविली असली तरी त्याचा राज्यांच्या मदतीवर परिणाम होईल. छोटय़ा राज्यांना या कपातीचा जास्त फटका बसेल.

Hobart International स्पर्धेमध्ये सानिया मिर्झाचं दणक्यात पुनरागमन, पहिल्याच प्रयत्नात पटकावलं विजेतेपद.

🔰 बाळतंपण आणि त्यानंतर आपल्या मुलाकडे लक्ष देण्यासाठी टेनिसपासून दुरावलेल्या सानिया मिर्झाने दणक्यात पुनरागमन केलं आहे. 

🔰 WTA Hobart International Tennis स्पर्धेत सानियाने आपली युक्रेनची साथीदार नादीया किचनॉकच्या साथीने दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे.

🔰 अंतिम फेरीत सानिया-नादीया जोडीने चीनच्या शुई पेंग आणि शुई झँग जोडीचा ६-४, ६-४ ने पराभव केला. अवघ्या १ तास २१ मिनीटांत सानिया मिर्झा आणि तिच्या साथीदाराने हा सामना खिशात घातला.

🔰 तब्बल दोन वर्षांनी सानिया मिर्झाने आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुनरागमन केलं आहे.

🔰 सानियाचं हे दुहेरीमधलं ४२ वं विजेतेपद ठरलं. याव्यतिरीक्त सानियाच्या नावावर २०१६ सालचं ऑस्ट्रेलियन ओपनचं महिला दुहेरी आणि २००९ साली मिश्र-दुहेरी स्पर्धेचं जेतेपदही जमा आहे. त्यामुळे आगामी काळात सानिया टेनिसमध्ये कशी प्रगती करतेय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

०३ फेब्रुवारी २०२०

जोकोविचचा विक्रम; आठव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद!

◾️ सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने रविवारी ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले.

◾️ जोकोविचने ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिमचा अंतिम सामन्यात पराभव केला.

◾️जोकोविचचे ऑस्ट्रेलियन ओपनचे हे आठवे विजेतेपद ठरले.

◾️याआधी त्याने
📌 २००८,
📌२०११,
📌 २०१२,
📌२०१३,
📌 २०१५,
📌२०१६ आणि
📌२०१९ मध्ये या ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.

◾️जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू असलेल्या जोकोविचने अंतिम सामन्यात सामन्यात थिमचा
✍ ६-४, ४-६, २-६, ६-३,६-४ असा पराभव केला.

◾️याआधी जोकोविच आणि थिम यांच्यात १० लढती झाल्या होत्या. त्यापैक
📌 सहा वेळा जोकोविचने तर
📌 ४ वेळा थिमने विजय मिळवला होता.

◾️पहिला गेम जिंकल्यानंतर जोकोविचचा पुढच्या दोन गेममध्ये पराभव झाला. त्यानंतर जोकोविचने दोन गेम जिंकत ग्रँडस्लॅम विजेतेपदावर नाव कोरले.

◾️जोकोविचने आठव्यांदा पहिल्यांदा वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदावर नाव कोरले.

◾️जोकोविचच्या नावावर ऑस्ट्रेलियन ओपनचे सर्वाधिक वेळा विजेतेपद पटकावण्याचा विक्रम आहे.

◾️ २०११ ते २०१३ या काळात सलग तीन विजेतेपद पटकावण्य

नेपाळने जगाच्या उंचस्थानी फॅशन शो आयोजित करण्याचा विश्वविक्रम केला

🔰26 जानेवारी 2020 रोजी नेपाळ या देशाने समुद्रसपाटीपासून सर्वोच्च उंचीवर फॅशन शोचा कार्यक्रम आयोजित केला आणि नवा विश्वविक्रम केला आहे.

🔰हा कार्यक्रम एव्हरेस्ट बेस कॅम्पजवळ काला पत्थर येथे 5340 मीटर (17515 फूट) उंचीवर आयोजित करण्यात आला होता. या घटनेची नोंद गिनीज ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड या पुस्तकात झाली.

🔰“माउंट एव्हरेस्ट फॅशन रनवे” नावाचा हा कार्यक्रम नेपाळ पर्यटन विभागाच्या समर्थनाने RB डायमंड्स आणि KASA स्टाईल या कंपन्यांनी आयोजित केला होता. इटली, फिनलँड, श्रीलंका आणि सिंगापूरसह जगातल्या विविध भागातून आलेल्या मॉडेल लोकांनी या कार्यक्रमात भाग घेतला.

🔴नेपाळ देश.

🔰नेपाळ हा एक दक्षिण आशियाई देश आहे. हा हिमालय पर्वतराजीमध्ये वसलेला भूपरिवेष्टित देश आहे. उत्तरेला चीन देशाची सीमा असून, इतर सर्व बाजूंना भारत देश आहे. नेपाळ हा आयताक्रुती राष्ट्रध्वज नसलेला जगातला एकमेव देश आहे. काठमांडू हे नेपाळचे राजधानी शहर आहे आणि नेपाळी रुपया हे राष्ट्रीय चलन आहे.

🔰उत्तरेला हिमालय पर्वतरांगा असून जगातल्या सर्वोच्च दहा पर्वतशिखरांमधील आठ नेपाळमध्ये आहेत. जगातले सर्वोच्च शिखर म्हणजेच ‘एव्हरेस्ट’ नेपाळमध्ये आहे.

जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता निर्देशांकामध्ये भारत 77व्या स्थानी


जागतिक बँकेनी आपला वार्षिक 'डूइंग बिझनेस 2019' अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘व्यवसाय सुलभता’ (ease of doing business) निर्देशांकामध्ये भारताला जगभरातल्या 190 देशांमध्ये 77 हा क्रमांक मिळाला आहे.

अन्य बाबी

व्यवसाय सुलभता’ निर्देशांकामध्ये न्यूझीलँड शीर्ष स्थानी आहे.

सोमालिया हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात अयोग्य जागा ठरीत आहे. 

गेल्या वर्षी या निर्देशांकामध्ये भारताचा 100 वा क्रमांक होता. भारताने 10 पैकी आठ घटकांमध्ये सुधारणा दिसून आली.

व्यवसाय सुरू करण्यात सुलभता, बांधकाम परवाना, वीज मिळविणे, आर्थिक पत मिळवणे, कर भरणे, सीमेवरील व्यापार करणे, कंत्राट अंमलात आणणे आणि तंटा सोडवणे अश्या घटकांचा अभ्यास केला गेला आहे.

मध्यप्रदेशात बेरोजगारांना महिना पाच हजार मिळणार

◾️मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकारने बेरोजगारीच्या प्रश्नावर लक्ष केंद्रीत केलं आहे.

◾️मध्यप्रदेशातील बेरोजगारांना दर ✍महिन्याला
📌 चार हजार रुपयांऐवजी आता
📌 पाच हजार रुपये देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री कमलनाथ यांनी घेतला आह

◾️ मुख्यमंत्री युवा स्वाभिमान योजनेअंतर्गत बेरोजगारांना आता दरमहा चार हजाराऐवजी पाच हजार रुपये देण्यात येणार आहेत.

◾️राज्यातील गरीब शहरी तरुणांना रोजगार देण्यासाठी मुख्यमंत्री युवा स्वाभिमान योजना सुरू करण्यात आली आहे.

◾️ या योजनेअंतर्गत तरुणांना १०० दिवसांचा रोजगार देण्यात येणार आहे.

◾️या योजनेत रोजगार प्रशिक्षणाबरोबरच दरमहा चार हजार रुपये देण्यात येतात. त्याऐवजी आता तरुणांना ५ हजार रुपये देण्यात येणार आहे, असं मध्यप्रदेशचे जनसंपर्क मंत्री पी. आर. शर्मा यांनी सांगितलं.

◾️राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच मध्यप्रदेशातील बेरोजगारीच्या प्रश्नावर काम सुरू केले होते.

◾️त्यामुळेच त्यांनी फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री युवा स्वाभिमान योजना सुरू केली होती.

◾️ तरुणांना रोजगाराचं प्रशिक्षण देण्याबरोबरच या योजनेअंतर्गत त्यांना मासिक भत्ताही सुरू करण्यात आला होता.

◾️ ग्रामीण भागातील गरिबांना रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात आली होती.

◾️या योजनेअंतर्गत राज्यातील २१ ते ३० वर्षांच्या तरुणांना लाभ मिळत आहेत. मात्र,
📌ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा कमी आहे, अशाच तरुणांना या योजनेचा लाभ मिळत आहे.

◾️सध्या या तरुणांना या योजनेअंतर्गत १०० दिवसांत ४ हजार रुपयांच्या हिशोबाने १३,५०० रुपये मानधन मिळत आहे.

◾️आता यात एक हजार रुपयाने वाढ करण्यात आल्याने तरुणांना

📌 १०० दिवसांत एकूण १६,५०० रुपये मानधन म्हणून मिळणार आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोलकात्यात हुगळी नदीखाली  ‘पाण्याखालून धावणारी देशातली पहिली मेट्रो’

पाण्याखालून धावणारी देशातल्या पहिल्या मेट्रो सेवेचे बांधकाम आता शेवटच्या टप्प्यावर आले आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये हुगळी नदीखालून ही मेट्रो धावणार आहे.

देशातली पहिली पाण्याखालून धावणारी रेलगाडी ‘सॉल्टलेक सेक्‍टर-5 आणि हावडा मैदान’ यादरम्यान धावणार आहे. तसेच हा रेल्वेमार्ग दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येत आहे. त्यातला पहिला टप्पा 2022 सालापर्यंत प्रवाशांसाठी खुला केला जाण्याची अपेक्षा आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

🔸या रेलगाडीला जलप्रवाहापासून वाचवण्यासाठी एक भक्कम बोगदा तयार करून उच्चस्तरीय सुरक्षा कवच देण्यात आले आहे.

🔸नदीच्या मधून जाणारा हा मार्ग 520 मीटर लांब असून ती नदीच्या तळापासून 30 मीटरच्या खोलीवर आहे. नदीखालून रेलगाडीला हे अंतर पार करण्यासाठी 60 सेकंदाचा वेळ लागणार आहे.

🔸या प्रकल्पासाठी हावडा ते कोलकाता दरम्यानच्या मेट्रो मार्गाला जोडणाऱ्या हुगळी नदीखाली दुहेरी बोगद्याचे बांधकाम केले गेले. देशातला हा पहिलाच नदीखालचा बोगदा ठरला.

🔸कोलकातामधील रेल्वेच्या 16.6 किमी लांबीच्या पूर्व-पश्चिम मेट्रो प्रकल्पाच्या अंतर्गत 520 मीटर लांबीचा हा बोगदा तयार करण्यात आला आहे.

2024 सालापर्यंत सर्व रेलगाड्या वीजेवर धावणार: भारतीय रेल्वे

इंधनावर होणारा प्रचंड खर्च आणि पर्यावरणाचे नुकसान पाहता 2024 या वर्षापर्यंत सर्वच रेलगाड्या वीजेवर चालविण्याचे ध्येय भारतीय रेल्वेनी निश्चित केले आहे. ते साध्य केल्यानंतर 2030 सालापर्यंत संपूर्णपणे (अक्षय ऊर्जेद्वारे) हरित रेल्वे जाळ्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

भारतीय रेल्वेनी कार्बनचे उत्सर्जन शून्य करण्याचा मानस ठेवला आहे. NITI आयोगाच्या आकडेवारीनुसार, 2014 साली भारतीय रेल्वेकडून होणारे कार्बन डाय-ऑक्साईड वायूचे उत्सर्जन सुमारे 6.84 दशलक्ष टन एवढे होते.

आज, अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारतात जगातले चौथे सर्वात मोठे रेल्वे जाळे आहे. या जाळ्यात सुमारे 7300 स्थानकांना जोडणारा 67,368 किलोमीटर एवढ्या एकूण लांबीचा लोहमार्ग पसरलेला आहे. त्यावर 13 हजार प्रवासी रेलगाड्या धावतात आणि दररोज 23 दशलक्षपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात.

भारतीय रेल्वे विषयी...

भारतीय रेल्वे ही भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. भारतीय रेल्वे जगातली सर्वात मोठ्या रेल्वेसेवांपैकी एक आहे. ही जगातली सर्वात मोठी व्यवसायिक संस्था आहे.

भारत सरकारच्या कें‍द्रीय रेल्वे खात्यातला विभाग असा रेल्वे विभाग हा भारतातल्या संपूर्ण रेल्वे जाळ्याचे व्यवस्थापन राखतो. रेल्वे खात्याचा कारभार कॅबिनेट दर्जाचे रेल्वेमंत्री पाहतात व रेल्वे विभागाचे नियोजन रेल्वे मंडळ करते.

भारतातल्या रेल्वेसेवेचा आरंभ सन 1853 मध्ये झाला. सन 1947 पर्यंत भारतात 42 रेल्वे कंपन्या होत्या. सन 1951 मध्ये या सर्व संस्थांचे राष्ट्रीयीकरण करून एक संस्था बनवण्यात आली. भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते.

भारतात पहिली रेल्वेगाडी 22 डिसेंबर 1951 रोजी रूडकीमध्ये बांधकाम साहित्याच्या वहनासाठी चालवण्यात आली. त्यानंतर 22 एप्रिल 1853 रोजी भारतात पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर (मुंबई) ते ठाणे अशी 34 किलोमीटर अंतर धावली. साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले होते.

1951 साली झालेल्या राष्ट्रीयीकरणानंतर, सहा रेल्वे विभागांमध्ये (झोन) त्यांची विभागणी करण्यात आली. यानुसार हैदराबादची निझाम रेल्वे, ग्वाल्हेरची सिंदिया रेल्वे आणि घोलपूर रेल्वे यांची मिळून 'मध्य रेल' असा विभाग बनवला. 'बॉम्बे बरोडा अ‍ॅण्ड सेंट्रल इंडिया रेल्वे', सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे आणि जयपूर रेल्वे यांना एकत्र करून 'पश्चिम रेल्वे' विभाग बनवण्यात आला.

उत्तर रेल्वे ही 'ईस्टर्न पंजाब रेल्वे' व जोधपूर रेल्वे, बिकानेर रेल्वे यांना मिळून बनवण्यात आली. अवध, आसाम, तिरहुत या रेल्वे कंपन्यांच्या एकत्रीकरणातून ईशान्य रेल्वे (उत्तर-पूर्व रेल) स्थापन झाली. 'पूर्व रेल'मध्ये बंगाल-नागपूर रेल्वे आणि 'ईस्ट इंडिया रेल्वे कंपनी' यांचा समावेश होता.

आज व्यवस्थापनासाठी भारतीय रेल्वेचे 16 विभाग करण्यात आले आहेत. कोलकाता मेट्रोचे मालकी हक्क व संचालन भारतीय रेल्वेकडे असले तरी देखील ही मेट्रो सेवा कोणत्याही प्रभागामध्ये येत नाही. संचालनाच्या दृष्टीने या रेल्वेस विभागीय रेल्वेचा दर्जा दिला गेला आहे.

इस्रो देणार ‘व्हॅलेंटाईन गिफ्ट.

देशाच्या संरक्षणात, आपत्ती व्यवस्थानात उपयोगी ठरणारं असं अमूल्य गिफ्ट इस्रो व्हॅलेंटाईनच्या कालावधीत देशाला देईल.

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात इस्रोकडून जीआयसॅट-1 (GiSAT-1) उपग्रह अवकाशात सोडणार आहे.
तर जीआयसॅट-1 उपग्रह जिओस्टेशनरी ऑर्बिटमध्ये एकाच ठिकाणी थांबून देशाच्या सीमांची टेहळणी करेल. हा उपग्रह दर अर्ध्या तासाला देशाचा एक फोटो पाठवेल.

तसेच यामुळे पाकिस्तान आणि चीनला लागून असलेल्या सीमांवरील हालचालींची माहिती सतत मिळत राहील.
पाकिस्तानमधून सतत भारतीय हद्दीत घुसखोरींचे प्रयत्न सुरू असतात. त्यावर अंतराळातून  जीआयसॅट-1 रुपी तिसरा डोळा लक्ष ठेवेल.

जीआयसॅट-1 मध्ये पाच प्रकारचे कॅमेरे लावण्यात आले आहेत. इस्रो जीआयसॅट मालिकेतले दोन उपग्रह अवकाशात सोडणार आहे. जीआयसॅट-1 च्या प्रक्षेपणानंतर इस्रो जीआयसॅट-2 अवकाशात पाठवेल.

जीआयसॅट-1चं प्रक्षेपण 15 जानेवारीला करण्यात येणार होतं. इस्रोनं ही तारीख जाहीरदेखील केली होती. मात्र काही तांत्रिक अडचणी आल्यानं हे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आलं.

आंध्रप्रदेशातल्या सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रातून जीआयसॅट-1 चं प्रक्षेपण करण्यात येईल. या मोहिमेत जीएसएलव्ही-एके2 प्रक्षेपक म्हणून काम करेल.

तसेच जीआयसॅट-1 मध्ये कार्टोसेट उपग्रहात अतिशय सामर्थ्यशाली पॅनक्रोमॅटिक कॅमेरा लावण्यात आला आहे. हा कॅमेरा अर्ध्या तासानं देशाचा फोटो काढेल.

याशिवाय उपग्रहातले बाकीचे कॅमेरेदेखील सतत फोटो टिपून ते इस्रोला पाठवतील. जीआयसॅट-1 केवळ दिवसाच फोटो काढू शकतो. रात्रीचे फोटो टिपण्यासाठी इस्रो जीआयसॅट मालिकेतला दुसरा उपग्रह अवकाशात सोडणार आहे.

स्मृतीदिन, महान योद्धा सुभेदार मेजर रामजी सकपाळ


आज सुभेदार मेजर रामजी सकपाळ यांचा १०७ वा स्मृतीदिन. ते एक महान योद्धा होते. त्यांनी अफगाणिस्तानच्या युद्धात प्रत्यक्ष लढाई केलेली होती. त्यांच्यातील कुशल शिक्षकाचे गुण ओळखून ब्रिटीश सरकारने त्यांना पुण्याला पाठवून टिचर्स ट्रेनिंग दिले. त्याकाळात त्यांचा महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई यांच्याशी परिचय झाला. पुढे त्याचे रूपांतर घनिष्ट मैत्रीत झाले. शूद्र अतिशूद्रांमधून कोणी तरी महापुरूष जन्माला येईल आणि तो या घटकांची गुलामी संपवील असे फुले म्हणत असत. तसे त्यांनी आपल्या पुस्तकात भाकीतही वर्तवलेले आहे. आपल्या १४ व्या अपत्याकडे,भीमाकडे, सु.मे.रामजी त्यादृष्टीने पाहात असत. त्यांना प्रथम पत्नी भीमाबाईंपासून झालेल्या १४ मुलांमधली अवघी ६ जगली. बाळाराम, गंगा, तुळसा, मंजुळा, आनंद आणि शेंडेफळ भीमराव.

सु.मे. रामजी इंदूरजवळच्या लष्कराच्या छावणीत शिक्षक होते. पुढे ते मुख्याध्यापक झाले. याच " मिल्ट्री हेडक्वार्टर ऑफ वॉर " म्हणजेच MHOW महू मध्ये भिमरावांचा १४ एप्रिल १८९१ ला जन्म झाला.
भिवा ३ वर्षांचा असताना ते लष्करातून निवृत्त झाले. काही काळ दापोलीला राहिल्यावर नोकरीच्या शोधात ते सातार्‍याला गेले. भिवाचे प्राथमिक शिक्षण सातार्‍यातच झाले.

सु.मे.रामजी हे रामानंदी पंथाचे असल्याने त्यांच्यावर संत कबीर, संत तुकाराम आणि अन्य संतांच्या विचारांचा खोलवरचा प्रभाव होता. " आपले वडील गुणी शिक्षक होते. त्यांनी बालपणी आपल्यावर उत्तम संस्कार केले. धार्मिक बाबतीत ते रोमन हुकुमशहासारखे वागत असत, " असे बाबासाहेबांनी आपल्या शेवटच्या पुस्तकाच्या [बुद्ध आणि त्यांचा धम्म] प्रस्तावनेत नमूद केलेले आहे. १४ ऑक्टोबर १९५६ ला स्वत: बौद्ध धम्माची दिक्षा घेताना व लक्षावधी बांधवांना दिक्षा देताना बाबासाहेबांनी नागपूरच्या दिक्षाभुमीवर सर्वप्रथम सु.मे.रामजींना आदरांजली अर्पण केलेली होती.
त्यांनी आपल्या मुलींना घरीच इतके उत्तम शिक्षण दिलेले होते की, त्या सगळ्याजणी ग्रंथवाचन करीत आणि प्रसंगी धर्मग्रंथावर उत्तम प्रवचनंही देत असत असेही बाबासाहेबांनी नमूद केलेले आहे.

संगीतप्रेमी बाळाराम फारसे शिकले नसले तरी त्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व होते. आनंदरावला कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी शिक्षण अर्धवट सोडून नोकरी धरावी लागली. भिमरावला मात्र खूप शिकवायचे अशी सु.मे.रामजीबाबांची महत्वाकांक्षा होती. भिवा १९०७ साली मॅट्रीक झाल्यानंतर त्याला त्यांनी पुढे २ वर्षे महाविद्यालयीन शिक्षण दिले.

आपल्या तुटपुंज्या पेन्शनमधून भागत नसतानाही त्यांनी त्यासाठी खूप हालअपेष्टा भोगल्या. भीमरावांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून सु.मे.रामजी दापोली आणि सातारा येथे काही वर्षे काढल्यानंतर मुंबईला आले. चाळीच्या एका खोलीत भिवाचा अभ्यास होत नसल्याने स्वत: रामजीबाबा रात्री २ वाजेपर्यंत जागे राहायचे, २ वाजता भिवाला झोपेतून ऊठवून अभ्यासाला बसवायचे आणि मगच झोपायचे. पुन्हा दिवसभर ते नानाविध नोकर्‍या किंवा अन्य काबाडकष्ट करायचे.

केवळ भिवाच्या अभ्यासासाठी परवडत नसतानाही त्यांनी चाळीतली समोरची खोली घेतली. भिवामध्ये त्यांनी अभ्यासाची व वाचण्याची आवड निर्माण केली. भिवाने मागितलेले प्रत्येक पुस्तक ते त्याला आणून देत असत. स्वत:जवळ पैसे नसले तर आपल्या विवाहीत मुलींकडून त्यांचे दागिने उसने आणून ते गहाण ठेऊन त्यावर ते कर्ज काढीत पण पुस्तक आणून देतच.

प्रख्यात सत्यशोधक लेखक कृष्णाजी अर्जुन केळुसकर आणि दा. सा. यंदे यांच्या प्रयत्नातून भीमरावला सयाजीराव गायकवाड यांची स्कॉलरशीप मिळाली आणि ते पदवीधर झाले. शिष्यवृत्तीच्या अटी आणि शर्तींनुसार बडोद्यात काही वर्षे नोकरी करणे आवश्यक होते.

त्यानुसार भीमराव नोकरीवर जायले निघाले तेव्हा सु.मे. रामजींनी त्यांना बडोद्याला जायला विरोध केला. सनातन्यांच्या गुजरातेत भीषण जातियता असल्याने आपल्या मुलाचा छळ होईल अशी साधार भिती त्यांना वाटत होती. ती पुढे खरीही ठरली. बडोद्यात भीमरावांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्यांना राहायला घरही मिळाले नाही. कार्यालयातही त्यांचा पदोपदी अपमान करण्यात आला.

भीमरावांनी बडोद्याला जाण्यासाठी घर सोडले त्याच दिवशी मुलाच्या काळजीने हा योद्धा पुरूष आजारी पडला आणि पंधरवड्याभरात त्यांचे २ फेब्रुवारी १९१३ ला दु:खद निधन झाले. वडील आजारी असल्याची तार मिळताच भीमराव मुंबईला यायला निघाले. वडीलांची आवडती मिठाई घेण्यासाठी ते सुरत रेल्वे स्टेशनवर उतरले आणि त्यांची ट्रेन सुटली. पुन्हा गाडी २४ तासांनीच होती. भीमराव घरी पोचले तेव्हा माझा भिवा आला म्हणून सु.मे.रामजींनी २ आनंदाश्रू ढाळले आणि त्यांचे तात्काळ निधन झाले. जणू फक्त भिवाला पाहायला, भेटायलाच ते थांबले होते.

असे होते रामजी म्हणून घडले ग्रंथप्रेमी भीमजी हे आपण कधीही विसरता कामा नये. 

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...