१६ जानेवारी २०२०

जागतिक बँकेचा “ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स” अहवाल

जागतिक बँकेचा ताजा ‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स’ अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये वर्तवविलेल्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनाचा (GDP) वृद्धिदर हा 5 टक्क्यांवर सीमित राहणार.

अहवालातल्या ठळक बाबी

भारताविषयी

जागतिक बँकेचा अंदाज खरा ठरल्यास भारतीय विकासदराचा तो 11 वर्षांतला नीचांक ठरणार.

GDP दरातल्या घसरणीस कारणीभूत असणारे घटकही जागतिक बँकेने नमूद केले आहेत. भारतात खासगी क्षेत्रातून होणाऱ्या पतपुरवठ्यामध्ये सध्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. याशिवाय देशांतर्गत क्रयशक्तीही घटल्याचे दिसत असून त्याचाही विकासदरास फटका बसणार.

पुढील आर्थिक वर्षात वृद्धिदर वेग धरणार व आर्थिक वर्ष 2020-21 अखेर हा दर 5.8 टक्क्यांवर पोहोचणार.

जागतिक

वर्ष 2020 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेची अंदाजित वाढ 2.5 टक्के राहणार असा अंदाज आहे.

दक्षिण आशियाचा GDP वृद्धीदर 2019-20 या वर्षी 5.5 टक्क्यांपर्यंत राहण्याचे अपेक्षित आहे.

2020 या वर्षी प्रगत अर्थव्यवस्थांचा एकत्रित वृद्धीदर 1.4 टक्क्यांपर्यंत खालावणार असा अंदाज आहे.

उदयोन्मुख बाजारपेठ आणि विकसनशील अर्थव्यवस्थांचा वृद्धीदर यंदा 4.1 टक्क्यांपर्यंत वाढण्याचे अपेक्षित आहे.

देशाच्या प्रथम संक्रमण-उन्मुख विकास प्रकल्पाचे बांधकाम नवी दिल्लीत सुरू


- काम किंवा करमणुकीसाठी कराव्या लागणार्‍या प्रवासाचा वेळ कमी करण्याच्या आणि शहरी विकासाला अधिक शाश्वत बनविण्याच्या उद्दीष्टांना दृष्टीपथात ठेवत, राजधानी दिल्लीमध्ये देशातल्या पहिल्या संक्रमण-उन्मुख विकास (Transit-oriented development -TOD) प्रकल्पाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.

- केंद्रीय गृह व शहरी कल्याण मंत्रालय आणि दिल्ली विकास प्राधिकरण यांच्या TOD धोरणाच्या अंतर्गत चालणारा हा पहिलाच प्रकल्प आहे.

▪️ठळक बाबी

- स्मार्ट शहर उभे करण्याच्या पार्श्वभूमीवर, दिल्लीत भारतातली पहिली रीजनल रॅपिड ट्रांझिट सिस्टम (RRTS) उभारली जात आहे. हा प्रकल्प त्याचा एक भाग आहे.

- मेट्रो स्थानके, निवासस्थाने आणि कामाचे ठिकाण तसेच संग्रहालये, ग्रंथालये यासारख्या मनोरंजक जागा यांना एकत्र जोडून प्रवास सुकर करण्याच्या उद्देशाने एकात्मिक विकास केला जात आहे. हा प्रकल्प 2023 सालापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

- एका नियोजनबद्ध पद्धतीने मेट्रो स्थानके, रेल्वे स्थानक, आंतरराज्यीय बस सेवा स्थानके, सौर ऊर्जा केंद्रे आणि पुनर्वापरासाठी जलप्रक्रिया यासारख्या पायाभूत सुविधांचा विकास केला जात आहे.

अटल भूजल योजनेचा प्रारंभ

25 डिसेंबर 2019 रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अटल भूजल योजना (अटल जल) याचा प्रारंभ केला गेला.

या मोहिमेशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे ही 2024 सालापर्यंत देशातल्या प्रत्येक घरात पाणी पोहचवण्याचा प्रयत्न साध्य करण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल आहे.

जल शक्ती मंत्रालयाच्या नेतृत्वात ही योजना राबवली जाणार आहे. लोकसहभागाने जल संवर्धनासाठी व्यापक प्रयत्न केले जाणारा आहेत. घराघरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या दिशेने कार्य केले जात आहे.

▪️अटल भूजल योजना (अटल जल):-

भूजल व्यवस्थापनासाठी संस्थात्मक चौकट मजबूत करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

गुजरात, हरयाणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तरप्रदेश या सात राज्यांमध्ये ओळखलेल्या भागांमध्ये शाश्वत भूजल संसाधन व्यवस्थापनासाठी समुदाय पातळीवर वर्तनात्मक बदल घडविणे या मुख्य उद्देशाने अटल जलची रचना करण्यात आली आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीमुळे या राज्यांमधील 78 जिल्ह्यांमधील जवळपास 8350 ग्रामपंचायतींना लाभ मिळण्याची शक्यता आहे.

सन 2020-21 ते सन 2024-25 या पाच वर्षांच्या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या या योजनेसाठी 6000 कोटी रुपये खर्च येणार असून त्यापैकी 50 टक्के जागतिक बँक कर्ज रूपात असतील.

सुधारित भूजल व्यवस्थापन पद्धतीत यश मिळवण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन देणे जेणेकरुन सध्या अस्तित्वात असलेल्या योजना एकत्र करुन राज्य सरकार जल व्यवस्थापनाच्या संदर्भात मागणीनुसार प्राधान्यक्रम ठरवत सुस्पष्ट आखणी आणि अंमलबजावणी करु शकतील.

आता सीएनजीची जागा घेणार बायोगॅस

- कंप्रेस्ड बायोगॅसमार्फत(सीबीजी) संपूर्ण देशामध्ये सीएनजीची मागणी लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. अशी माहिती पेट्रोलियम आणि गॅस मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली आहे.

- यांच्या माहितीनुसार बायोगॅसची योजना सर्वत्र लागू करण्याचे संकेत आहेत. यामध्ये देशभरात प्रत्येक वर्षाला 6.2 कोटी टन सीएनजीच्या तुलने इतके कंप्रेस्ड बायोगॅसचे उत्पादन होण्याचे अनुमान आहे. 

▪️2023 पर्यंतचे ध्येय

- पेट्रोलियम मंत्रालयाने 2018 मध्ये सतत(सस्टेनेबल अल्टरनेटीव्ह टुवार्ड्स अफोर्डेबल ट्रान्सपोर्टेशन) पहिल्यापेक्षा सक्षम योजना लाँच केली होती.

- याच्या आधारेचे सरकारी तेल ऍण्ड गॅस कंपन्यांना सीबीजी प्रकल्प उभारण्यासाठी प्रोहोत्सान देण्यात आले आहे. यासाठी सरकारने 2023 पर्यंत 1.5 कोटी टन वार्षिक सीबीजीचे उत्पादन करण्याचे ध्येय निश्चित केले आहे.

▪️सीएनजीची 40 टक्के मागणी पूर्ण

- 1.5 कोटी टन सीबीजी उत्पादनाचे ध्येय नि]िश्चत केले जाणार आहे. सीएनजीची सध्याची वार्षिक विक्री 40 टक्क्यापर्यंत पूर्ण होऊ शकते. व्यापारी वर्ष  2018-19 मध्ये 4.4 कोटी टन सीएनजीची विक्री करण्यात आली होती. 

▪️कच्च्या तेलाची आयात घट गरजेची

- सरकार 2022 पर्यंत कच्च्या तेलाची आयात 10 टक्क्यांनी कमी करण्याचा विचार करत आहे. त्यात सीबीजी प्रकल्प उभारण्यासाठी जवळपास 1.75 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याचे संकेत असल्याचे पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी सांगितले आहे.

- सदरच्या योजनेमधून 75 हजार लोकांना थेट रोजगार उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यासोबतच पाच कोटी टन जैविक खताची निर्मिती होणार असल्याचे नमूद केले आहे.

नवी दिल्लीत 14 जानेवारीपासून  ‘रायसीना संवाद’ याचा प्रारंभ

- 14 जानेवारी ते 16 जानेवारी 2020 या काळात दरवर्षी प्रमाणे नवी दिल्लीत ‘रायसीना संवाद 2020’ ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

▪️कार्यक्रमाचा विषय: “21@20: नेव्हिगेटींग द अल्फा सेंचुरी”

- ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन हे या संमेलनाचे मुख्य वक्ते आहेत. या बैठकीला संबोधित करणार्‍या इतर मंत्र्यांमध्ये यजमान भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लाव्हरोव्ह यांचा समावेश आहे.

- तसेच इराण, डेन्मार्क, मालदीव, मोरोक्को, ऑस्ट्रेलिया, भूतान, दक्षिण आफ्रिका, झेक प्रजासत्ताक, एस्टोनिया आणि उझबेकिस्तानमधले प्रतिनिधी यात भाग घेणार आहेत.

- यावर्षी मोठ्या संख्येनी जगभरातल्या परराष्ट्र मंत्र्यांची उपस्थिती भू-राजनैतिक परिषदेत असणार आहे. परिषदेत 90 देशांमधून 150 हून अधिक वक्ता आणि 550  प्रतिनिधी भाग घेणार आहेत.

▪️कार्यक्रमाविषयी

- 'रायसीना संवाद’ ही नवी दिल्लीत दरवर्षी आयोजित होणारी बहुपक्षीय परिषद आहे. 2016 सालापासून तीन दिवस चालणारी ही परिषद भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय आणि ऑब्जर्वर रिसर्च फाउंडेशन (दिल्लीतली स्वायत्त वैचारिक संस्था) यांच्यावतीने संयुक्त रूपात आयोजित केली जाते.

- "रायसीना" हे नाव नवी दिल्लीमधल्या ‘रायसीना टेकडी’ या ठिकाणावरून ठेवले गेले आहे, जे भारत सरकार तसेच राष्ट्रपती भवन, राष्ट्रपतीसाठीचे घर आहे.

- हा कार्यक्रम जागतिक समुदायाला भेडसावणार्‍या सर्वात आव्हानात्मक मुद्द्यांना सोडविण्यासाठी वचनबद्ध आहे. इथे धोरण, व्यवसाय, माध्यमे आणि नागरी समाजातले सर्व जागतिक नेते नवी दिल्लीत एकत्र येतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील आंतरराष्ट्रीय धोरणांच्या विस्तृत विषयावर चर्चा करतात.
---------------------------------------------------

१५ जानेवारी २०२०

एका ओळीत सारांश, 15 जानेवारी 2020

🌹🌳🌴दिनविशेष🌴🌳🌹

👉भारतात चौथा सशस्त्र सैन्य दिग्गज दिन - 13 जानेवारी 2020.

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉14 जानेवारी रोजी भारतीय रेल्वेचा दक्षिण मध्य विभाग आणि या बँकेत सामंजस्य करार झाला, ज्याद्वारे 585 रेल्वे स्थानकांची थेट कमाई संकलित करण्यासाठी डोअरस्टेप बँकिंग सेवा प्रदान केली जाणार – भारतीय स्टेट बँक.

👉डिसेंबर 2019 मध्ये घाऊक किमतींवर आधारित महागाई - 2.59 टक्के.

👉डिसेंबर 2019 मध्ये मासिक घाऊक किंमत निर्देशांक (WPI) वर आधारित वार्षिक महागाई - 3.46 टक्के.

🌹🌳🌴पर्यावरण🌴🌳🌹

👉संशोधकांच्या मते, 2019 साली 1981-2010च्या सरासरीपेक्षा इतके डिग्री सेल्सियस जास्त समुद्राचे तापमान वाढले आहे – जवळपास 0.075 डिग्री सेल्सियस.

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉13 जानेवारीला भारत आणि या देशाने माहिती व प्रसारण क्षेत्रात महत्त्वपूर्ण करार केला - बांग्लादेश.

👉या व्यक्तीचे शताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी बांग्लादेशाने 17 मार्च 2020 ते 17 मार्च 2021 या काळात ‘मुजीब वर्ष’ साजरा करण्याचा निर्णय घेतला - शेख मुजीबुर रहमान (बांग्लादेशचे पहिले राष्ट्रपती).

👉प्रथमच, हा देश 2021 साली शांघाय सहकार संघटना (SCO) याच्या राष्ट्रप्रमुखांच्या समितीच्या वार्षिक बैठकीचे आयोजन करणार - भारत.

🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹

👉21 जानेवारी रोजी भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू या शहरात सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज इन क्लासिकल तेलुगू (CESCT) याचे उद्घाटन करणार - नेल्लोर.

👉प्लास्टिक कचरा व्यवस्थापन पुरस्कार 2020 जिंकलेला जिल्हा - दिब्रूगड, आसाम.

👉हेन्ले पासपोर्ट निर्देशांकात भारताचा क्रमांक - 84 वा (शीर्षस्थान - जापान)

👉शांघाय सहकार संघटनेच्या 8 आश्चर्यांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला भारतीय पुतळा - स्टॅच्यू ऑफ युनिटी (182 मीटर उंच), गुजरात.

👉ही भारतीय संस्था 17-19 जानेवारी 2020 या काळात ‘ई-समिट-2020’चे आयोजन करणार - IIT, मद्रास.

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन डेप्युटी गव्हर्नर - मायकेल पात्रा (विरल आचार्य यांच्या जागी).

👉भरतीत सर्व्हेक्षण विभागाचे सर्वेयर जनरल ऑफ इंडिया ज्यांना एका वर्षासाठी मुदतवाढ मिळाली - लेफ्टनंट जनरल गिरीश कुमार.

🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹

👉जेदाह (सौदी अरब) येथे 2020 स्पॅनश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेचा विजेता - रियल माद्रीद.

👉स्पोर्टस्टार एसेस अवॉर्ड्समध्ये ‘टीम ऑफ द इयर’ - भारतीय कसोटी संघ.

👉स्पोर्टस्टार एसेस अवॉर्ड्समध्ये वैयक्तिक श्रेणीत ‘स्पोर्ट्समन ऑफ द इयर’ - कुस्तीपटू बजरंग पुनिया.

👉स्पोर्ट्सवुमन ऑफ दी इयर (वैयक्तिक खेळ) - बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी आणि नेमबाज अपूर्वी चंदेला.

👉क्रिकेटर ऑफ द ईयर - रोहित शर्मा (पुरुष) आणि स्मृती मंधाना (महिला).

👉स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर (रॅकेट खेळ) पुरस्कार - पी व्ही. सिंधू.

👉स्पोर्टस्टार एसेस अवॉर्ड्समध्ये विशेष सन्मान - टेनिसपटू लिअँडर पेस.

👉स्पोर्ट्समन ऑफ द इयर (संघ खेळ) - मनप्रीत सिंग (पुरुष हॉकी संघाचा कर्णधार).

👉महिला यंग अ‍ॅथलीट ऑफ द इयर - नेमबाज मेहुली घोष.

🌹🌳🌴राज्य विशेष🌴🌳🌹

👉हे राज्य सरकार प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समन्वयाने आपत्कालीन परिस्थितीत मुक्त हालचालींसाठी ‘ग्रीन कॉरिडोर अ‍ॅप’ बाजारात आणण्याची योजना आखत आहे - बंगाल.

🌹🌳🌴ज्ञान-विज्ञान🌴🌳🌹

👉भारतीय संप्रेषण उपग्रह जो 17 जानेवारी रोजी फ्रेंच गयानाहून एरियन-5 प्रक्षेपकाद्वारे पाठवला जाणार आहे - जीसॅट-30.

👉फाइव-हंड्रेड-मीटर अपर्चर स्फेरीकल रेडिओ टेलीस्कोप (FAST) दुर्बिण - चीनमध्ये (जगातली सर्वात मोठी रेडिओ दुर्बिण).

👉13 जानेवारी रोजी जागतिक आरोग्य संघटनेनी चिननंतर आता या देशात SARS सारख्याच कुटुंबातला एका नवीन विषाणूच्या पहिल्या घटनेची पुष्टी केली - - थायलंड.

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉भारतीय सशस्त्र दलांचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ – फील्ड मार्शल के. एम. करियप्पा.

👉केंद्रीय भारतीय भाषा संस्था (CIIL) - स्थापना: वर्ष 1969 (17 जुलै); ठिकाण: मैसूर.

👉मकर संक्रांती - दरवर्षी 14 जानेवारी.

👉कोअला (प्राणी प्रजाती) या देशात आढळते - ऑस्ट्रेलिया.

👉भितरकनिका वन्यजीव अभयारण्य आणि गहिरमाथा सागरी अभयारण्य - ओडिशामध्ये.

👉कैफी आझमी म्हणून ओळखले जाणारे अथर हुसेन रिझवी - भारतीय उर्दू कवी.

👉भारतीय सर्वेक्षण विभाग - स्थापना: वर्ष 1767; मुख्यालय: देहरादून.

👉शांघाय सहकार संस्था (SCO) - स्थापना: वर्ष 2001; मुख्यालय: बिजींग (चीन).

१४ जानेवारी २०२०

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) असला नवरा नको गं बाई! या वाक्यातील ‘असला’ हा शब्द कोणत्या विशेषण प्रकारातील आहे.

   1) गुण विशेषण      2) दर्शक विशेषण   
   3) सार्वनामिक विशेषण    4) अनिश्चित विशेषण

उत्तर :- 3

2) पुढे दिलेल्या वाक्यातून साधित क्रियापद असलेल्या वाक्याचा अचूक पर्याय निवडा.

   1) विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे    2) शिक्षक मुलांना शिकवतात
   3) सचिनने चौकार मारला        4) जुन्या आठवणीने माझे डोळे पाणावले

उत्तर :- 4

3) “चमचम” – हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ?

   1) गतिदर्शक      2) स्थितिदर्शक   
   3) अनुकरणदर्शक    4) प्रकारदर्शक

उत्तर :- 3

4) खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.

     ‘ऐवजी’

   1) विनिमयवाचक  2) हेतूवाचक   
   3) कैवल्यवाचक    4) यापैकी नाही

उत्तर :- 1

5) भिका-याला मी एक सदरा दिला शिवाय त्याला जेवू घातले. वरील उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारातील आहे.

   1) उद्देश बोधक उभयान्वयी अव्यये      2) परिणाम बोधक उभयान्वयी अव्यये
   3) समूच्च बोधक उभयान्वयी अव्यये    4) स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यये

उत्तर :- 2

6) ‘ओहो’ या शब्दाची जात ओळखा.

   1) क्रियाविशेषण    2) शब्दयोगी    3) केवलप्रयोगी    4) उभयान्वयी

उत्तर :- 3

7) पुढील वाक्यातील ‘काळ’ ओळखा. – विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे.

   1) भूतकाळ    2) पूर्ण वर्तमानकाळ 
   3) रीती भविष्यकाळ  4) साधा वर्तमानकाळ

उत्तर :- 2

8) खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर पुल्लिंग, स्त्रीलिंग व नपुंसकलिंग अशा तिन्ही प्रकारे होतो ?

   1) बाग      2) पोर      3) तंबाखू    4) सर्व

उत्तर :- 2

9) “तू” या सर्वनामाची तृतीया विभक्तीचे रूप कोणते. (एकवचनमधील)

   अ) तू      ब) तूते      क) तुशी      ड) तूत

   1) वरील सर्व      2) केवळ अ आणि ड 
   3) केवळ ब आणि क    4) केवळ अ आणि क

उत्तर :- 4

10) खाली दिलेल्या वाक्यातील मिश्रवाक्य कोणते ते ओळखा.

   1) तानाजी शत्रूशी लढता लढता रणांगणातच मेला
   2) आकाशात जेव्हा ढग जमतात, तेव्हा मोर नाचू लागतो
   3) मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी
   4) अबब ! केवढी प्रचंड गर्दी ही !

उत्तर :- 2

पोलिस भरती प्रश्नसंच

1) ब्राझिलिया येथे कितवी BRICS शिखर परिषद पार पडत आहे?
उत्तर : 11 वी

2) 'जागतिक न्यूमोनिया दिन' कधी साजरा केला जातो?
उत्तर : 12 नोव्हेंबर

3) ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ कधी साजरा केला जातो?
उत्तर : 11 नोव्हेंबर

4) जगातले पहिले 'कॉम्प्रेस्ड नॅच्युरल गॅस पोर्ट टर्मिनल' कुठे उभारले जाणार आहे?
उत्तर : गुजरात

5) देशात चार वैद्यकीय उपकरणे निर्मिती उद्याने उभारण्यास कोणत्या प्रकल्पांतर्गत मान्यता मिळाली आहे?
उत्तर : मेक इन इंडिया

6) “औद्योगिक उत्पादन निर्देशांक” कोणती संस्था प्रसिद्ध करते?
उत्तर : केंद्रीय सांख्यिकी संस्था

7) “ब्राऊन टू ग्रीन रिपोर्ट” कोणती संस्था प्रसिद्ध करते?
उत्तर : क्लायमेट ट्रान्सपेरन्सी

8) ‘सार्वजनिक सेवा प्रसारण दिन’ कधी पाळला जातो?
उत्तर : 12 नोव्हेंबर

9) पाचवी ‘ग्लोबल एक्झिबिशन ऑन सर्व्हिसेस’ प्रदर्शनी कुठे भरणार आहे?
उत्तर : बेंगळुरू

10) चॅलेन्जर टेनिस स्पर्धेच्या दुहेरी प्रकाराचे विजेतेपद कोणी पटकावले?
उत्तर : पुरव राजा आणि रामकुमार रामनाथन

1) पाचवे भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
उत्तर : कोलकाता

2) ऑस्ट्रेलियात झालेल्या फेड चषक 2019 या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले?
उत्तर : फ्रान्स

3)  ‘फूझौ चाइना ओपन 2019’ या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष गटाचे विजेतेपद कोणी पटकावले?
उत्तर : केंटो मोमोटा

4) NASAचे पहिले संपूर्ण विद्युत चलित विमान कोणत्या प्रयोगासाठी बनवले आहे?
उत्तर : मॅक्सवेल X-55

5) BRICS व्यापार मंत्र्यांची 9 वी बैठक कोठे होणार आहे?
उत्तर : ब्राझिलिया

6) ‘MILAN’ सरावाच्या संदर्भातली मध्य नियोजन परिषद (MPC) कुठे पार पडली?
उत्तर : विशाखापट्टणम

7) मॉरिशस या देशात झालेल्या निवडणूकीत कोणत्या व्यक्तीच्या पक्षाचा विजय झाला?
उत्तर : प्रविंद जुगनाथ

8) 11 वा बाल संगम महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे?
उत्तर : नवी दिल्ली

9) राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) प्रक्रियेचे राज्य समन्वयक कोण आहेत?
उत्तर : हितेश देव शर्मा

10) नवोदय विद्यालय समितीसाठी बनवण्यात आलेल्या डिजिटल व्यासपिठाचे नाव काय?
उत्तर : शाला दर्पण

*1)* “सुशासन पद्धतींच्या प्रतिकृती” विषयक दोन दिवसांची प्रादेशिक परिषद कोठे भरली?
उत्तर : जम्मू

*2)* 8 वी आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे?
उत्तर : भारत

*3)* कोणत्या अंतराळ संस्थेनी ‘अल्टिमा थुले’ या खगोलीय खडकाला ‘अ‍ॅरोकोथ’ असे नाव दिले?
उत्तर : NASA

*4)* कोणत्या ठिकाणी ‘आंतरराष्ट्रीय योग परिषद’ आयोजित करण्यात आली?

उत्तर : म्हैसूर

*5)* कोणत्या राज्याने 15 नोव्हेंबर रोजी आपला स्थापना दिन साजरा केला?

उत्तर : झारखंड

*6)* भारतातल्या कोणत्या राज्याने “शिशू सुरक्षा” अॅप सादर केले?

उत्तर : आसाम

*7)* कोणत्या राज्यात ‘रोसोगोल्ला दिबस’ साजरा करण्यात आला?

उत्तर : पश्चिम बंगाल

*8)* कोणत्या राज्यात “बाली जत्रा” उत्सव साजरा केला जातो?
उत्तर :  ओडिशा

*9)*  2019 सालाचा ‘BRICS-यंग इनोव्हेटर पुरस्कार’ कोणी जिंकला?

उत्तर : रवी प्रकाश

*10)* “ढाका ग्लोबल डायलॉग” हा कार्यक्रम कोणत्या देशाने आयोजित केला?

उत्तर :  बांग्लादेश

1) कोणत्या विषाणूमुळे विषमज्वर होतो?
उत्तर : साल्मोनेला टायफी

2) पिण्याचे पाणी तपासण्यासाठी BISद्वारे कोणते मानक ठरवण्यात आले आहे?
उत्तर : इंडियन स्टँडर्ड 10500:2012

3) आदी महोत्सव 2019 या कार्यक्रमाचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : नवी दिल्ली

4) कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशात “NISHTHA” ही राष्ट्रीय मोहीम राबवण्यात येत आहे?
उत्तर : जम्मू व काश्मीर

5) कोणत्या शहरात CPR प्रशिक्षणाच्या बाबतीत गिनीज विक्रम करण्यात आला?
उत्तर : कोची

6) कोणते राज्य 14 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत ‘वाळू आठवडा’ पाळत आहे?
उत्तर : आंध्रप्रदेश

7) ‘ब्रह्मपुत्र पुष्करम’ हा कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारने आयोजित केला?
उत्तर : आसाम

8) राष्ट्रीय नदी गंगा विधेयक-2019 नुसार, गंगा नदी प्रदूषित केल्यास दंड काय असू शकतो?
उत्तर : 50 कोटी रुपये आणि 5 वर्षांचा तुरुंगवास

9) राष्ट्रीय पत्र दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 16 नोव्हेंबर

10) UNESCOच्या शिक्षण आयोगाच्या प्रमुखपदी कोणत्या देशाची निवड झाली?
उत्तर : पाकिस्तान

*1)* वातावरणातील सर्वाधिक प्रमाण असलेला वायू कोणता?
उत्तर : नायट्रोजन

*2)* कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयरोगाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली?
उत्तर : ख्रिश्चन बर्नार्ड

*3)* कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास कोणते जीवनसत्व मिळते?
उत्तर : ड

*4)* कोणता अवयव मादी बेडकात आढळून येत नाही?
उत्तर : स्वरकोष

*5)* वातावरणात कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे?
उत्तर : 0.03 टक्के

*6)* चुंबकीय पदार्थ कोणता आहे? 
उत्तर : निकेल

*7)* मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात?
उत्तर : नफोलॉजी

*8)* वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?
उत्तर : कार्बन डायऑक्साईड

*9)* तांबे व जस्त यांच्या मिश्रीणातून कोणता धातू तयार होतो?
उत्तर : पितळ

*10)* बटाटा हे काय आहे?
उत्तर : खोड

प्रश्नसंच विषय = इतिहास प्रश्नसंच

1) शिवाजी क्लब (कोल्हापूर) बाबत चुकीचे विधान कोणते?
१) या क्लबची सभासद संख्या ३०० पर्यंत होती.
२) लोकमान्य टिळक व त्यांचा 'केसरी'चा शिवाजी क्लबच्या राष्ट्रवादी चळवळीला पाठिंबा होता.
३) बाबची निर्मिती कशी करावी याची माहिती देणारी भित्तिपत्रके कोल्हापूर शहरात ६ ठिकाणी २५ जुलै १९०८ रोजी शिवाजी क्लबने लावली होती.
४) राजर्षी शाहूंचा शिवाजी क्लबला पाठींबा होता.

१) २,       २) ४,     ३) १,      ४) ४

2) नेता कोण ते ओळखा.
१) अंजुमन-इ-इस्लाम' या संस्थेचे सचिव व पुढे अध्यक्षही होते.
२) उच्च न्यायालयात ते वकील होते.
३) मुस्लीम जमातीतील पडदा पद्धतीस त्यांनी विरोध केला होता. स्वत:च्या मुलीस उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवले होते.
४) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते समर्थक होते. एवढेच नव्हे तर एका अधिवेशनाचे अध्यक्ष होते.

१) बदरुद्दीन तय्यबजी,         २) रहिमतुल्ला सयानी,
३) हबीब अजमल खाँ,         ४) दिनशा वाच्छा

3) सर जॉन माल्कमच्या संदर्भात कोणते विधान बरोबर आहे?

१) १८२७-३० या काळात मुंबई प्रांताचा गव्हर्नर होता.
२) जुने जर चांगले असेल तर तो मोडू नये व नवे करण्याची घिसडघाई करू नये हे त्याच्या धोरणाचे सूत्र होते.
3) Political History of India Memoirs of Central India हे दोन ग्रंथ त्याने लिहिले.
४) उद्यानविद्येकडे त्याने लक्ष पुरवले.
५) स्थितिवाद व साम्राज्यवाद या दोन तत्त्वावर त्याचा विश्वास होता.

१)१,३,५,       २) १,२,३,       ३) १,२,३,४,५,      ४)१,२

4) केशवराव जेधे यांच्यासंदर्भात कोणते विधान बरोबर आहे?

१) पुणे नगरपालिकेचे सभासद या नात्याने म. फुले यांचा पुतळा पुणे नगरपालिकेने बसवावा असा ठराव त्यांनी मांडला होता.
२) शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता.
३) केशवराव जेधे महाराष्ट्र प्रातिक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाल्यावर (१९३७) काँग्रेसच्या सदस्य संख्येत ४ पर वाढ झाली होती.
४) पुणे व बारामती मतदारसंघातून लोकसभेवर ते निवडून गेले होते.
१) १ व ३,     २) १,२,३,४,        ३) १,३,४,      ४) १

5) बेळगाव येथे साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली तिचे सदस्य कोण नव्हते?
१) केशवराव जेधे          २) द. वा. पोतदार      ३) श्री. शं. नवरे,
४) ग. त्र्यं. माडखोलकर    ५) शंकरराव देव     ६) शंकरराव मोरे

उत्तर - 1- ४, 2- १, 3-३, 4 -२, 5-६
==========================

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...