१४ जानेवारी २०२०

पोलिस भरती प्रश्नसंच

1) ब्राझिलिया येथे कितवी BRICS शिखर परिषद पार पडत आहे?
उत्तर : 11 वी

2) 'जागतिक न्यूमोनिया दिन' कधी साजरा केला जातो?
उत्तर : 12 नोव्हेंबर

3) ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ कधी साजरा केला जातो?
उत्तर : 11 नोव्हेंबर

4) जगातले पहिले 'कॉम्प्रेस्ड नॅच्युरल गॅस पोर्ट टर्मिनल' कुठे उभारले जाणार आहे?
उत्तर : गुजरात

5) देशात चार वैद्यकीय उपकरणे निर्मिती उद्याने उभारण्यास कोणत्या प्रकल्पांतर्गत मान्यता मिळाली आहे?
उत्तर : मेक इन इंडिया

6) “औद्योगिक उत्पादन निर्देशांक” कोणती संस्था प्रसिद्ध करते?
उत्तर : केंद्रीय सांख्यिकी संस्था

7) “ब्राऊन टू ग्रीन रिपोर्ट” कोणती संस्था प्रसिद्ध करते?
उत्तर : क्लायमेट ट्रान्सपेरन्सी

8) ‘सार्वजनिक सेवा प्रसारण दिन’ कधी पाळला जातो?
उत्तर : 12 नोव्हेंबर

9) पाचवी ‘ग्लोबल एक्झिबिशन ऑन सर्व्हिसेस’ प्रदर्शनी कुठे भरणार आहे?
उत्तर : बेंगळुरू

10) चॅलेन्जर टेनिस स्पर्धेच्या दुहेरी प्रकाराचे विजेतेपद कोणी पटकावले?
उत्तर : पुरव राजा आणि रामकुमार रामनाथन

1) पाचवे भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
उत्तर : कोलकाता

2) ऑस्ट्रेलियात झालेल्या फेड चषक 2019 या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले?
उत्तर : फ्रान्स

3)  ‘फूझौ चाइना ओपन 2019’ या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष गटाचे विजेतेपद कोणी पटकावले?
उत्तर : केंटो मोमोटा

4) NASAचे पहिले संपूर्ण विद्युत चलित विमान कोणत्या प्रयोगासाठी बनवले आहे?
उत्तर : मॅक्सवेल X-55

5) BRICS व्यापार मंत्र्यांची 9 वी बैठक कोठे होणार आहे?
उत्तर : ब्राझिलिया

6) ‘MILAN’ सरावाच्या संदर्भातली मध्य नियोजन परिषद (MPC) कुठे पार पडली?
उत्तर : विशाखापट्टणम

7) मॉरिशस या देशात झालेल्या निवडणूकीत कोणत्या व्यक्तीच्या पक्षाचा विजय झाला?
उत्तर : प्रविंद जुगनाथ

8) 11 वा बाल संगम महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे?
उत्तर : नवी दिल्ली

9) राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) प्रक्रियेचे राज्य समन्वयक कोण आहेत?
उत्तर : हितेश देव शर्मा

10) नवोदय विद्यालय समितीसाठी बनवण्यात आलेल्या डिजिटल व्यासपिठाचे नाव काय?
उत्तर : शाला दर्पण

*1)* “सुशासन पद्धतींच्या प्रतिकृती” विषयक दोन दिवसांची प्रादेशिक परिषद कोठे भरली?
उत्तर : जम्मू

*2)* 8 वी आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे?
उत्तर : भारत

*3)* कोणत्या अंतराळ संस्थेनी ‘अल्टिमा थुले’ या खगोलीय खडकाला ‘अ‍ॅरोकोथ’ असे नाव दिले?
उत्तर : NASA

*4)* कोणत्या ठिकाणी ‘आंतरराष्ट्रीय योग परिषद’ आयोजित करण्यात आली?

उत्तर : म्हैसूर

*5)* कोणत्या राज्याने 15 नोव्हेंबर रोजी आपला स्थापना दिन साजरा केला?

उत्तर : झारखंड

*6)* भारतातल्या कोणत्या राज्याने “शिशू सुरक्षा” अॅप सादर केले?

उत्तर : आसाम

*7)* कोणत्या राज्यात ‘रोसोगोल्ला दिबस’ साजरा करण्यात आला?

उत्तर : पश्चिम बंगाल

*8)* कोणत्या राज्यात “बाली जत्रा” उत्सव साजरा केला जातो?
उत्तर :  ओडिशा

*9)*  2019 सालाचा ‘BRICS-यंग इनोव्हेटर पुरस्कार’ कोणी जिंकला?

उत्तर : रवी प्रकाश

*10)* “ढाका ग्लोबल डायलॉग” हा कार्यक्रम कोणत्या देशाने आयोजित केला?

उत्तर :  बांग्लादेश

1) कोणत्या विषाणूमुळे विषमज्वर होतो?
उत्तर : साल्मोनेला टायफी

2) पिण्याचे पाणी तपासण्यासाठी BISद्वारे कोणते मानक ठरवण्यात आले आहे?
उत्तर : इंडियन स्टँडर्ड 10500:2012

3) आदी महोत्सव 2019 या कार्यक्रमाचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : नवी दिल्ली

4) कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशात “NISHTHA” ही राष्ट्रीय मोहीम राबवण्यात येत आहे?
उत्तर : जम्मू व काश्मीर

5) कोणत्या शहरात CPR प्रशिक्षणाच्या बाबतीत गिनीज विक्रम करण्यात आला?
उत्तर : कोची

6) कोणते राज्य 14 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत ‘वाळू आठवडा’ पाळत आहे?
उत्तर : आंध्रप्रदेश

7) ‘ब्रह्मपुत्र पुष्करम’ हा कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारने आयोजित केला?
उत्तर : आसाम

8) राष्ट्रीय नदी गंगा विधेयक-2019 नुसार, गंगा नदी प्रदूषित केल्यास दंड काय असू शकतो?
उत्तर : 50 कोटी रुपये आणि 5 वर्षांचा तुरुंगवास

9) राष्ट्रीय पत्र दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 16 नोव्हेंबर

10) UNESCOच्या शिक्षण आयोगाच्या प्रमुखपदी कोणत्या देशाची निवड झाली?
उत्तर : पाकिस्तान

*1)* वातावरणातील सर्वाधिक प्रमाण असलेला वायू कोणता?
उत्तर : नायट्रोजन

*2)* कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयरोगाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली?
उत्तर : ख्रिश्चन बर्नार्ड

*3)* कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास कोणते जीवनसत्व मिळते?
उत्तर : ड

*4)* कोणता अवयव मादी बेडकात आढळून येत नाही?
उत्तर : स्वरकोष

*5)* वातावरणात कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे?
उत्तर : 0.03 टक्के

*6)* चुंबकीय पदार्थ कोणता आहे? 
उत्तर : निकेल

*7)* मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात?
उत्तर : नफोलॉजी

*8)* वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?
उत्तर : कार्बन डायऑक्साईड

*9)* तांबे व जस्त यांच्या मिश्रीणातून कोणता धातू तयार होतो?
उत्तर : पितळ

*10)* बटाटा हे काय आहे?
उत्तर : खोड

प्रश्नसंच विषय = इतिहास प्रश्नसंच

1) शिवाजी क्लब (कोल्हापूर) बाबत चुकीचे विधान कोणते?
१) या क्लबची सभासद संख्या ३०० पर्यंत होती.
२) लोकमान्य टिळक व त्यांचा 'केसरी'चा शिवाजी क्लबच्या राष्ट्रवादी चळवळीला पाठिंबा होता.
३) बाबची निर्मिती कशी करावी याची माहिती देणारी भित्तिपत्रके कोल्हापूर शहरात ६ ठिकाणी २५ जुलै १९०८ रोजी शिवाजी क्लबने लावली होती.
४) राजर्षी शाहूंचा शिवाजी क्लबला पाठींबा होता.

१) २,       २) ४,     ३) १,      ४) ४

2) नेता कोण ते ओळखा.
१) अंजुमन-इ-इस्लाम' या संस्थेचे सचिव व पुढे अध्यक्षही होते.
२) उच्च न्यायालयात ते वकील होते.
३) मुस्लीम जमातीतील पडदा पद्धतीस त्यांनी विरोध केला होता. स्वत:च्या मुलीस उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवले होते.
४) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते समर्थक होते. एवढेच नव्हे तर एका अधिवेशनाचे अध्यक्ष होते.

१) बदरुद्दीन तय्यबजी,         २) रहिमतुल्ला सयानी,
३) हबीब अजमल खाँ,         ४) दिनशा वाच्छा

3) सर जॉन माल्कमच्या संदर्भात कोणते विधान बरोबर आहे?

१) १८२७-३० या काळात मुंबई प्रांताचा गव्हर्नर होता.
२) जुने जर चांगले असेल तर तो मोडू नये व नवे करण्याची घिसडघाई करू नये हे त्याच्या धोरणाचे सूत्र होते.
3) Political History of India Memoirs of Central India हे दोन ग्रंथ त्याने लिहिले.
४) उद्यानविद्येकडे त्याने लक्ष पुरवले.
५) स्थितिवाद व साम्राज्यवाद या दोन तत्त्वावर त्याचा विश्वास होता.

१)१,३,५,       २) १,२,३,       ३) १,२,३,४,५,      ४)१,२

4) केशवराव जेधे यांच्यासंदर्भात कोणते विधान बरोबर आहे?

१) पुणे नगरपालिकेचे सभासद या नात्याने म. फुले यांचा पुतळा पुणे नगरपालिकेने बसवावा असा ठराव त्यांनी मांडला होता.
२) शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता.
३) केशवराव जेधे महाराष्ट्र प्रातिक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाल्यावर (१९३७) काँग्रेसच्या सदस्य संख्येत ४ पर वाढ झाली होती.
४) पुणे व बारामती मतदारसंघातून लोकसभेवर ते निवडून गेले होते.
१) १ व ३,     २) १,२,३,४,        ३) १,३,४,      ४) १

5) बेळगाव येथे साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली तिचे सदस्य कोण नव्हते?
१) केशवराव जेधे          २) द. वा. पोतदार      ३) श्री. शं. नवरे,
४) ग. त्र्यं. माडखोलकर    ५) शंकरराव देव     ६) शंकरराव मोरे

उत्तर - 1- ४, 2- १, 3-३, 4 -२, 5-६
==========================

ऑस्करची नामांकने जाहीर

✍ टॉड फिलिप्सच्या ‘जोकर’ला सर्वाधिक ११

◾️जगभरात प्रतिष्ठा असलेल्या ९२व्या ऑस्कर चित्रपट पुरस्कराची नामांकने जाहीर झाली असून टॉड फिलिप्सचा ‘जोकर’ सर्वाधिक ११ नामांकनांचा मानकरी ठरला आहे. 

✍  क्वेण्टिन टॅरॅण्टिनोचा ‘वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड’,
✍मार्टिन स्कॉर्सेसीचा ‘द आयरिश मॅन’ आणि
✍सॅम मेंडीसचा ‘१९१७’ या चित्रपटांना प्रत्येकी १० नामांकने जाहीर झाली आहेत. 

◾️ दक्षिण कोरियातील चित्रपट निर्माते बोंग जून हो यांच्या ‘पॅरासाइट’ला उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक आणि उत्कृष्ट पटकथा यासह सहा नामांकने मिळाली आहेत.

📌 चित्रपट :
वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड, जोकर,
दी आयरिशमॅन, पॅरासाइट, १९१७,
मॅरेज स्टोरी, जोजो रॅबिट

📌अभिनेत्री :
रिनी झेलवेगर, चार्ीझ थेरॉन, स्कार्लेट जोहान्सन, साओइर्स रोनन, सिन्थिया इरिव्हो.

📌अभिनेता :
जोकीन फिनिक्स, अ‍ॅडम ड्रायव्हर, लिओनार्दो डिकॅप्रिओ, अ‍ॅण्टोनिओ बॅण्डेरस, जोनाथन प्रीस.

📌दिग्दर्शन :
मार्टिन स्कॉर्सेसी, क्वेण्टिन टॅरॅण्टिनो, बोंग जून-हो, सॅम मेंडिस, टॉड फिलिप्स.

जगातील सर्वात उंचीवरील पुलाचे बांधकाम वेगाने सुरू

- डिसेंबर २०२१ पर्यंत काश्मीर उर्वरित भारताशी रेल्वेच्या जाळ्याने जोडणार

- पुढील वर्षीच्या डिसेंबर महिन्यापर्यंत काश्मीर उर्वरित भारताशी रेल्वेच्या जाळ्याने जोडले जाणार आहे. जगातील सर्वात उंचीवरील या रेल्वे पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी सरकारने नवी मुदत निश्चित केली आहे.

- हा रेल्वेमार्ग पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच राहील अशी अपेक्षा आहे. भारतीय रेल्वेच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील हा सर्वात आव्हानात्मक प्रकल्प असल्याचे या पुलाचे बांधकाम करणाऱ्या कोकण रेल्वेने म्हटले आहे.

- ‘रेल्वेच्या दीडशे वर्षांच्या इतिहासातील हे सर्वाधिक आव्हानात्मक काम आहे. काश्मीरला रेल्वेमार्गाने उर्वरित देशाशी जोडणारा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होईल’, असे कोकण रेल्वेचे अध्यक्ष संजय गुप्ता यांनी येथे पत्रकारांना सांगितले.

- या पुलाचे बांधकाम म्हणजे स्वातंत्र्यानंतर हाती घेण्यात आलेल्या काश्मीर रेल लिंक प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक भाग आहे. बांधून पूर्ण झाल्यानतंर तो अभियांत्रिकीतील चमत्कार ठरेल, असे गुप्ता म्हणाले.

- अतिशय खडतर अशा भूप्रदेशात उभारल्या जाणाऱ्या कमानीच्या आकारातील या प्रचंड पुलाच्या बांधकामासाठी ५,४६२ टन लोखंड वापरण्यात आले असून, तो नदीच्या पात्रापेक्षा ३५९ मीटर उंचीवर राहणार आहे. ताशी २६० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना तोंड देता येईल अशी त्याची रचना आहे. ‘अभियांत्रिकी चमत्कार’ ठरणारा १.३१५ किलोमीटर लांबीचा हा पूल बक्कल (कटरा) व कौरी (श्रीनगर) यांना जोडणार आहे.

- उधमपूर- श्रीनगर- बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग असलेल्या कटरा व बनिहाल दरम्यानच्या १११ किलोमीटरच्या पट्टय़ातील हा पूल म्हणजे महत्त्वाचा दुवा आहे.

- सध्या चीनमधील बेपान नदीवरील २७५ मीटर उंचीवरील शुईबई रेल्वे पूल हा जगातील सर्वात उंच पूल असून, काश्मीरमधील पूल त्याला मागे टाकणार आहे.

- काश्मीर खोऱ्याला भारतीय रेल्वेच्या जाळ्याशी जोडण्याकरिता, जम्मू व काश्मीरसाठी वाहतुकीची पर्यायी आणि विश्वासार्ह यंत्रणा उपलब्ध करून देण्याकरता उधमपूर- बारामुल्ला- श्रीनगर रेल्वे लिंक प्रकल्प आत्यंतिक महत्त्वाचा आहे. त्याचे महत्त्व लक्षात घेऊन, २००२ साली हा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प घोषित करण्यात आला होता, अशी माहिती गुप्ता यांनी दिली
---------------------------------------------------

१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध

हे १० मे १८५७ रोजी मीरत येथील लष्करछावणीतील बंडापासून सुरू झाले व लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले. हा लढा १८५७चे स्वातंत्र्यसमर, पहिला भारतीय स्वातंत्र्यलढा, शिपाई बंडाळी (इंग्लिश: Sepoy mutiny) अशा इतर नावांनीही ओळखला जातो.जवळपास वर्षभर चाललेल्या या युद्धात इंग्रजांचा विजय झाला पण या बंडामुळे भारतीय स्वातंत्र्यचळवळीला प्रारंभ झाला व ९० वर्षानंतर १९४७ साली भारत स्वतंत्र झाला.

१० मे १८५७ रोजी दिल्लीपासून ४० मैलांच्या अंतरावर मेरठ छावणीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय सैनिकांनी बंड पुकारले व बघता बघता उत्तर पुर्व व मध्य भारतात पसरले. १० मेला सुरु झालेले बंड २० जुन १८५८ रोजी ग्वाल्हेर कंपनीच्या ताब्यात पडल्यानंतरच थांबले. बंडखोर शिपायांनी मेरठ काबीज केले व लागोलाग दिल्लीवर जबरदस्त हल्ला चढवून दिल्लीत बसलेले कंपनीच्या अधिकाऱ्यांना व ब्रिटिश सैन्याला चिरडले व ८१ वर्षांच्या बहादूरशहा दुसरा यास हिंदुस्थानचा बादशहा घोषित केले. अवधचा मोठा भुभाग देखील शिपायांच्या ताब्याखाली आला व ब्रिटिश सैन्य घाबरले. तरी कंपनीने कुमक मागवून जुलै १८५७ मध्ये कानपूर व दिल्लीवर पुन्हा कंपनी शासन लागू केले. पण झाशी, अवध आणि लखनऊतील विद्रोह दडपण्यासाठी कंपनीला खुप वेळ लागला.

१ नोव्हेंबर १८५८ ला विद्रोह दडपल्यानंतर ब्रिटिश संसदेने संपुर्ण हिंदुस्थानचा कारभार राणी व्हिक्टोरियाकडे दिला व देशातील कंपनी राज संपुष्टात आले

☘☘☘☘☘🌺☘☘☘☘☘☘☘

राकेश शर्मा : चंद्रावर जाणारे पाहिले भारतीय

👨‍🚀  चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय व्यक्ती म्हटली कि आपसूकच 'राकेश शर्मा' यांचे नाव डोळ्यांसमोर येते. आज त्यांचा 71 वा जन्मदिवस. जाणून घेऊयात त्यांच्याविषयी खास गोष्टी...

🧐 जन्म व शिक्षण : राकेश यांचा जन्म 13 जानेवारी 1949 रोजी पंजाबमधील लुधियाना येथे झाला. त्यांनी आपले शिक्षण हैद्राबाद येथून पूर्ण केले. राष्ट्रीय सुरक्षा अॅकॅडमी मधून पास झाल्यानंतर भारतीय वायू दलामध्ये टेस्ट पायलट पदावर ते रुजू झाले. राकेश यांनी पाकिस्तान विरोधातील युद्धामध्ये महत्वाची भूमिका बजावली.

🚀 अंतराळ मोहिमेविषयी :

▪ सन 1982 मध्ये इस्रो आणि सोव्हिएत इंटरकॉसमॉसस्पेस प्रोग्राम यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित अवकाश मोहिमेमध्ये राकेश यांची निवड करण्यात आली.

▪ Soyuz T-11 मोहिमे अंतर्गत राकेश शर्मा 2 एप्रिल 1984 या दिवशी अवकाशयानामधून Salyut 7 स्पेस स्टेशनच्या दिशेने झेपावले. राकेश हे 21 तास 40 मिनिटात अंतराळात वावरले.

▪ बायो मेडिसिन आणि रिमोट सेन्सिंगमधील शास्त्रीय आणि तांत्रिक बाबींचा अभ्यास करणे हा राकेश यांचा मोहिमेतील अभ्यासविषय होता.

▪ रशियाचे अधिकारी आणि भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून या अंतराळवीरांनी  टेलिव्हिजन न्यूज कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला होता.

▪ यावेळी इंदिरा गांधी यांनी 'अंतराळातून आपला भारत कसा दिसतो?' असे राकेश यांना विचारले. यावर राकेश यांनी 'सारे जहॉं से अच्छा!', असे उत्तर देत अवघ्या भारतीयांची मान अभिमानाने उंचावली.

📍 दरम्यान, या मोहिमेवरून परतल्यावर राकेश शर्मा यांना सोव्हिएत युनियनचे हिरो म्हणून सन्मानित केले तर भारत सरकारनेदेखील 'अशोकचक्र' देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.

आनंद ५० व्या वर्षीही गुणवान बुद्धिबळपटू

🌷चेन्नई : पाच वेळा जगज्जेतेपद पटकवणारा भारताचा विश्वनाथन आनंदचा खेळ पहिल्यासारखा सर्वोत्कृष्ट होत नसला तरी त्याच्या पन्नाशीच्या मानाने सर्वोत्तम आहे, असे मत माजी विश्वविजेता रशियाच्या व्लादिमिर क्रॅमनिकने व्यक्त केले आहे.

🌷‘‘आनंदने त्याच्या बुद्धिबळ खेळाच्या प्रदीर्घ कारकीर्दीत मोठी उंची गाठलेली आहे. त्यामानाने आता त्याला यश मिळत नसले तरी ५०व्या वर्षी आनंद सवर्ोेत्तम खेळ करत आहे. या वयात आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने खेळणे हे सोपे नाही. पुढची पिढी वयाच्या पन्नाशीपर्यंत आनंदसारखे सातत्य दाखवू शकेल, असे मला वाटत नाही. अजून किती खेळायचे हे आनंदच ठरवू शकतो. जोपर्यंत तो खेळाचा आनंद घेत आहे, तोपर्यंत तो खेळत राहील, हे मात्र नक्की. कारण बुद्धिबळ हा खेळ अन्य खेळांसारखा शारीरिक ताकदीवर अवलंबून नाही. मात्र त्याच वेळेला युवा बुद्धिबळपटूंसोबत खेळणे हेदेखील एक आव्हानच आहे,’’ याकडे क्रॅमनिकने लक्ष वेधले.

🌷‘‘आनंद ज्या वेळेस जगज्जेतेपदाची लढत मॅग्नस कार्लसनकडून २०१३ मध्ये हरला तेव्हाच त्याला निवृत्तीचे सल्ले देण्यात येत होते. मात्र आनंदने आपल्या कामगिरीने सर्वाना उत्तर दिले,’’ असेही क्रॅमनिकने सांगितले. क्रॅमनिकने सध्या चेन्नईत युवा बुद्धिबळपटूंसाठी सराव शिबीर आयोजित केले आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात यापैकीच सहा मुलांनी फ्रान्स येथे डाऊन क्रॅमनिककडून प्रशिक्षणाचे धडे गिरवले होते.

अमेरिकेच्या संसदेने घटवली ट्रम्प यांची ताकद; घेऊ शकणार नाहीत युद्धाचा निर्णय

🎍इराण आणि अमेरिका यांच्यामधील राजकीय संबंध प्रचंड ताणवपूर्ण बनले आहेत. दोन्ही देशांकडून एकमेकांना हल्ल्यांच्या धमक्या दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एकूणच कृती युद्धाला पोषक ठरत आहे. त्यामुळे केव्हाही या दोन्ही देशांमध्ये युद्धाचा भडका उडू शकतो. याचे परिणाम केवळ इराण आणि अमेरिकेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला भोगावे लागू शकतात. याची जाणीव झाल्याने अमेरिकेच्या संसदेने ट्रम्प यांचे विशेषाधिकार कमी करण्याबाबतचा एक ठराव मंजूर केला आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांना इराणवर पलटवार करण्याची खुली मुभा मिळणार नाही.

🎍डेमोक्रेटिक पक्षाच्या खासदारांनी आपले बहुमत असलेल्या कनिष्ठ सभागृहात अर्थात हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे अधिकार कमी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव १९४ मतांच्या बहुमतानं मंजूर करण्यात आला. यानंतर आता तो संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजेच सिनेटमध्ये मांडण्यात येणार आहे.

🎍डेमोक्रेटिक पक्षाचा आरोप आहे की, ट्रम्प यांनी संसदेला माहिती दिल्याशिवाय इराकमध्ये इराणचे कमांडर जनरल सुलेमानी यांच्या ताफ्यावर ड्रोन हल्ल्याची परवानगी दिली होती. यानंतर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी अमेरिकेच्या खासदारांना पत्र लिहून राष्ट्राध्यक्षांच्या सैन्य कारवायांवर मर्यादा घालण्याचा प्रस्ताव मांडला होता.

१३ जानेवारी २०२०

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 82 days left


संदर्भ चा फॉर्म अद्याप सगळ्यांनी भरला असेल. पूर्व परीक्षेच्या अभ्यासचा उत्साह वाढला असेल, तसा तो वाढणे गरजेचे आहे.

पुढील 80 दिवस अभ्यास करताना काही मुद्दे लक्षात ठेवा.

1) less is more
संदर्भ पुस्तकांची संख्या कमी ठेवा आणि  तेच पुस्तक वाचण्याची, उजळणी करण्याची संख्या जास्त.

2) इतके दिवस ज्या पद्धतीने अभ्यास केला आहे त्याच पद्धतीने अभ्यास करा.
( कोणतीही नवीन पद्धत आत्मसात करण्याची ही वेळ नाही.) आता टारगेट एकच असलं पाहिजे काही करून पूर्व परीक्षा पास होणे.

3) वाचन आणि प्रश्न सोडविणे आणि त्याचे विश्लेषण याची विभागणी 7:3 असावी.

4) CSAT मध्ये जास्तीत जास्त स्कोअर करण्यासाठी प्रयत्न करा.
डोकं शांत ठेवून,  होऊन 70 मिनिटांत 10 उतारे याचा नित्य नियमाने सराव करा.
पेपर 2 चे आयोगाचे पेपर किमान 2 वेळ लावून सोडवा.

5) बहुतेक सगळ्यांची पुस्तक यादी जवळ पास सारखीच असते, त्यामुळे तेच पुस्तक कशा प्रकारे अभ्यासता यावर निकाल बदलतो.
केलेले आठवून पहा. वस्तुनिष्ठ माहितीकडे दुर्लक्ष करू नका.
स्पर्धा परीक्षांचा निकाल हा ज्ञान किती आहे यावर अवलंबून आहे पण त्याही पेक्षा जास्त परीक्षेच्या दिवशी कामगिरी कशी करता यावर अवलंबून आहे.

6) पुढील तीन महिन्याच्या काळात अनेक प्रकारचा दवाब जाणवेल. कधी कौटुंबिक तर कधी इतरांचा अभ्यास जास्त असल्याचे, कधी टेस्ट सीरिज ला 60-70 गुण पडल्याचे तर कधी तुमच्या पेक्षा तुमच्या बरोबर अभ्यास करणाऱ्याला कसेंकाय जास्त गुण मिळाले याचे. या सर्व साहजिक गोष्टी आहेत.

कधी तरी मनात येईल माझ्याकडून हे सगळं होईल का? मी हे सगळं का करत आहे. अशा अनेक गोष्टी तुम्हाला विचलित करतील.

पण हे सगळे विचार अगदी क्षणिक असतात, सगळ्यांच्याच मनात येतात. अशा वेळी स्थिर राहणे जास्त गरजेचे आहे. जितका तुमचा अभ्यास मदत करेल  तेवढाच  तुमचा temperament  तुम्हाला या परीक्षेत यश देणार आहे.

बिनधास्त पण शिस्त बद्ध अभया करा.

7) आयोगाच्या मागील वर्षीच्या पेपर वरून लॉजिक डेव्हलप करा. तेच शेवटी कामाला येत.

एकूणच जोमाने शर्यतीसाठी प्रयत्न करा.
लक्षात ठेवा जो अंतिम शर्यतीत जिंकल्याचा विचार करतो आणि त्यादृष्टीने तगडी तयारी करतो त्याला हरवणे कठीण असते.

तयारी करताना टॉपर माईंड ने करा.

You have it and you can do it

All the best

चालू घडामोडी प्रश्नसंच

📍 कोणत्या शहरात प्रथम ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’चे 22 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत आयोजन होणार आहे?

(A) कटक
(B) भुवनेश्वर✅✅
(C) भोपाळ
(D) गुवाहाटी

📍 पद्मभूषण अकबर पदमसी ह्यांचे कोयंबटूर येथे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. ते एक ____ होते.

(A) पत्रकार
(B) कलाकार✅✅
(C) अभियंता
(D) लेखक

📍 ISRO या संस्थेनी _ येथे ‘ह्यूमन स्पेस फ्लाइट सेंटर (HSFC)’ उभारण्यासाठी 2,700 कोटी रूपये खर्च असलेल्या योजनेचा आराखडा तयार केला आहे?

(A) तिरुवनंतपुरम
(B) बेंगळुरू
(C) छल्लाकेरे✅✅
(D) कोची

📍 __ राज्य सरकार ‘झो कुटपुई उत्सव’ आयोजित करतो.

(A) नागालँड
(B) मिझोरम✅✅
(C) मणीपूर
(D) अरुणाचल प्रदेश

अॅसिड हल्ला पीडितांना १० हजारांचे पेन्शन!

◾️ अॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांना दरमहा पेन्शन देण्याचा निर्णय उत्तराखंडमधील त्रिवेंद्र सिंह रावत सरकारने घेतला आहे.

◾️अॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल यांच्या सत्य घटनेवर आधारित छपाक चित्रपटापासून प्रेरणा घेत उत्तराखंड सरकारने हा निर्णय घेतला आहे.

◾️राज्यातील अॅसिड हल्ल्यातील पीडितांना ७ हजार ते १० हजार रुपयांपर्यंत दरमहा पेन्शन देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

◾️अॅसिड हल्ल्यानंतर त्यातून सावरून आपले जीवन पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या पीडितांना हे पेन्शन दिले जाणार आहे.

◾️महिला व बाल विकास विभागाकडून अशा प्रकारचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

◾️या प्रस्तावावरील मसुद्यावर काम सुरू आहे. हा प्रस्ताव लवकरच राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री रेखा आर्या यांनी दिली.

◾️अॅसिड हल्ल्यातील पीडिता हरिद्वार, नैनीताल आणि उधमसिंह नगर या भागात मोठ्या प्रमाणावर राहतात.

◾️ पेन्शन मिळाल्यामुळे पीडितांना आर्थिक आधार मिळून, त्या सन्मानाचे जीवन जगू शकतील. आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करू शकतील, असेही आर्या यांनी सांगितले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...