०७ जानेवारी २०२०

डॉ.आंबेडकरांबद्दल हे माहिती असुद्या


१. भारत देशाची *३९५ कलम, ८ परिशिष्ट व २२ भागाची राज्यघटना* लिहून जगातील संसदिय लोकशाहीचे पुनरुज्जीवन केले.

२. राज्यघटनेने सर्वांना *मुलभूत हक्क, अधिकार दिले.*
तसेच *कर्तव्य* सुद्धा नमूद केले.

याबरोबरच *"डायरेक्टीव्ह प्रिन्सिपल"* देवून सरकारच्या जबाबदाऱ्यांची तरतूद केली.

३. राज्यघटने मुळे *सामाजिक व भौगोलिकदृष्ट्या* भिन्न असलेल्या देशाला एक केले .

४. भारताच्या प्रत्येक नागरीकाला *मतदानाचा अधिकार* दिला.

५. प्रौढ *मतदानाचा (२१ वर्षांवरील)* प्रत्येक नागरिकाला अधिकार देवून *जगातील प्रथमच प्रयोग* केला.

६. भारतात प्रथम अर्थशास्त्राचा पाया रचला. *"रिजर्व बँक ऑफ इंडिया"* च्या स्थापनेचा पाया रचला. 

७. संविधान लिहून *स्त्रीयांना शिक्षणाचा अधिकार दिला.*
स्त्रीयांना नोकरी करण्याचा अधिकार दिला.
अन्यथा देशातील महिला आजही *"चूल आणि मुल"* सांभाळत बसल्या असत्या.

८. स्त्रीयांना *पुरुषांच्या बरोबरीने हक्क* मिळवून दिले.
त्यांच्या हक्क व अधिकारासाठी *हिंदू कोड बिल* संसदेत मांडले.

हिंदू कोड बिल मंजूर नाही झाले म्हणून *मंत्रिमंडळातून मंत्रीपदाचा राजीनामा* दिला.

९. नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी *गर्भावस्था काळात ६ महिन्याच्या भरपगारी रजेची तरतूद* केली.

👉🏻(*जगात अशी तरतूद करणारे *भारत हे पहिले राष्ट्र* आहे.*)

१०. स्त्रीयांना (मुलींना) वडीलांच्या *चल-अचल संपत्तीवर मुलांच्या इतकाच (पुरुषांसारखाच) समान अधिकार* मिळवून दिला.

११. पुरुषांना *एकपत्नित्व अधिकार...*
दुसरी पत्नी असेल तर पत्नीला *पतीच्या संपत्तीमध्ये हिस्सा* मागण्याचा अधिकार मिळवून दिला.

१२. *नियोजन आयोगाची स्थापना केली.*

१३. *पंचवार्षिक योजनांची सुरुवात केली.*

१४. भारतात प्रथम *जलनिती तयार केली* व *"नद्या जोडणी प्रकल्प" आखला* पण राजकिय इच्छाशक्तीच्या अभावामुळे त्याची अंमलबजावणी झालेली नाही
आणि
त्यामुळे या देशात काही भागात पूरसदृश परिस्थिती व काही भागात पाण्याअभावी शेतकरी आत्महत्या करत आहेत.

१५. *भाकरा नांगल, दामोदर धरण, सोनाकुड, हिराकूंड धरण प्रकल्पाचे उदगाते...*

१६. ' *कोसी नदीवर धरण बांधा त्यामुळे बिहारमध्ये कधीच पूर येणार नाही’*
हे सुद्धा त्यांनीच सांगितले.

१७. भारतात प्रथम *परिवार नियोजनाचा* नारा दिला.

१८. भारतात *बालमजुरीवर रोख* लावली.

१९. कोलंबीया विद्यापीठात असताना
  *३ वर्षात २९ अभ्यासक्रम (११ इतिहास,*
६ समाजशास्त्र,
५ तत्त्वज्ञान
४ मानववंशशास्त्र,
३ राजकारणाचे)
करणारा *पहिला आणि शेवटचा व्यक्ती...*

२०. मजुरांना *१२ तास* काम करावे लागायचे, त्यासाठी *८ तास ड्युटी* व आठवड्यातून *एक* *सुट्टी* कायदा केला.

२१.  *८* *तासापेक्षा* *जास्त* काम केल्यास, कामाचा मोबदला *(ओवरटाईम)* प्रावधान लागू केले.

२२. *‘खोत बिल’* आणून सावकारी आणि वेठबिगारीचा अंत केला.

२३. भारताला *उच्च-नीच जातीवादातून मुक्त* केले...

नाहीतर चांभाराच्या मुलांनी चांभारकी,
लोहाराने लोहारकी,
सोनाराने सोनारकी, मराठ्याने शेती,
ब्राह्मणाने शिक्षण घ्यावे व पुजारी बनावे...

असे करावे लागे
पण, बाबासाहेबांच्या योगदानाने आज कोणत्याही जातितील मुले डॉक्टर, इंजीनियर, वकील, IAS, IPS, मोठमोठे अधिकारी होवू शकतात...

२४. देशातील ८०% जनतेला जिला आजपर्यंत क्षुद्र, अस्पृश्य म्हणून सर्व अधिकारांपासून हिणवण्यात आले, अत्याचार सहन करावे लागत होते,
त्यांना *समान अधिकार* मिळवून दिले

मानवमुक्तीचा आदर्श रचला...

२५. *रिजर्व बँक ऑफ* इंडियाच्या स्थापनेत *महत्त्वपूर्ण योगदान.*

२६. *संयुक्त महाराष्ट्राच्या* लढ्यात महत्वपूर्ण योगदान...

२७. *“मुंबई हि फक्त महाराष्ट्राचीच आहे आणि ती मिळवून देण्यासाठी मी माझ्या अंतापर्यंत लढेन”* अशी घोषणा केली...

२८. *"मजुरमंत्री"* असतांना *विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती* योजना आणली.

२९. उर्जानिर्मिती व्यवस्थापनासाठी *‘सेन्ट्रल टेक्निकल पावर बोर्ड (CTPB) ची स्थापना* केली.

३०. देशात *प्रथमच पाटबंधारे आणि सिंचन आयोगाची* स्थापना केली.

३१.पाण्याच्या व्यवस्थापना साठी *नैसर्गिक संसाधन* व *कोळसा आयोगाची* स्थापना केली...

३२. शेती, उद्योग~कारखाने यांच्या विकासासाठी *RCC* *(रिकन्स्ट्रक्शन कमिटी कौन्सिलची स्थापना केली)*

३३. बिहार, मध्यप्रदेशाचे विकास व्हावे यासाठी *विभाजन* करावे अशी सूचना मांडली.

आज ४५ वर्षांनंतर छत्तीसगढ आणि झारखंड राज्य निर्माण झाले... 

३४. शिक्षक भारताच्या मणक्याचा कणा आहे त्याला योग्य वेतन द्यावे यासाठी योगदान..

३५. *स्त्रीभ्रूण हत्त्या* *विरोध* , व *गर्भपात* करू नये यासाठी जनजागृती...

३६. देशाला *उपराजधानी* ची गरज आहे हे सांगणारे *प्रथम व्यक्ती...*

३७. देशात कोळसा ऊर्जेपेक्षा सौर *ऊर्जेपासून चालणारे* *जल* *विद्युत प्रकल्प उभे करावेत* हे सांगणारे *प्रथम व्यक्ती* जे अजूनही झालेले नाही...

३८. ‘मी *कायदेमंत्री बनण्यापेक्षा* मी *कृषिमंत्री* होउन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईन व देशात शेतीचा विकास करून शेतकऱ्यांचे राज्य प्रस्थापित करेन’ असे विधान करणारे सुद्धा *बाबासाहेबच* ...

३९. बाळ गंगाधर टिळक यांच्या मुलाने आत्महत्या केली,
त्या वेळेस भविष्यात कोणी आत्महत्या करू नये म्हणून भावपूर्ण लेख लिहून त्याला आदरांजली दिली व कायदा मजबूत केला.

४०. तीन *लष्कर* *प्रमुख* कधीच एकत्र येवून देशविरोधी कृत्य करून नये हे सांगून तशी मांडणी केली.

४१. *एकमात्र भारतीय* ज्यांना ब्रीटीशांकडून *गोलमेज परिषदेला* येण्याचे *विशेष निमंत्रण* दिले जायचे.

४२. *एकमात्र असे व पहिले भारतीय नेता ज्यांनी स्त्रिया, ओबीसी व एसटी प्रवर्गासाठी असलेले बिल पास न झाल्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा दिला...*

४३. बाबासाहेब *देशातील पहिले उच्चशिक्षित अर्थशास्त्री* आहेत.

४४. ते एक चांगले वायोलिन वादक, शिल्पकार व *चित्रकार* सुद्धा होते...

४५. त्यांचे एकूण *९ भाषांवर प्रभुत्व* होते. *इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती, पारसी, संस्कृत, जर्मन, फ्रेंच, व पाली.*

४६. त्यांनी *पाली* भाषेवर इतके प्रभुत्व मिळविले कि *पाली व्याकरण व शब्दकोशाची* सुद्धा *निर्मिती* केली...

४७. *त्यांनी संसदेत मांडलेली महत्वाची विधेयके* : ~

👉🏻 *माहार वतन बिल,*

👉🏻 *हिंदु कोड बिल,*
,
*खोत बिल,*

👉🏻 *मंत्र्यांचे वेतन बिल,*

👉🏻 *रोजगार विनिमय सेवा,*

👉🏻 *पेंशन बिल,*

👉🏻 *भविष्य निर्वाह निधी (पी एफ) बिल* इ.

४८. *मराठी* हि *राजभाषा* व्हावी यासाठी *संसदेत मत* मांडले...

४९. *पाण्यासाठी आंदोलन करणारे (* *महाड सत्याग्रह) जगात पहिले व्यक्ती...*

५०. *लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स* मध्ये सर्वात जास्त *पुस्तके वाचणारे पहिले व शेवटचे व्यक्ती.* ...

५१. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून *डी. एस. सी.* पदवी मिळवणारे प्रथम व शेवटचे भारतीय...

५२. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये *आठ वर्षांचा अभ्यासक्रम ३ वर्षात करणारे जगातीन प्रथम व शेवटचे व्यक्ती,* ते सुद्धा भारतीय...

५३. देशात *भविष्य निर्वाह निधी (पी. एफ.) कायदा* आणून कामगारांच्या हक्काचे संरक्षण केले.

५४. देशातील जनतेला *वैयक्तिक आयुर्विमा* घेण्यासाठी *आयुर्विमा* महामंडळाची स्थापना करण्यासाठी कार्य केले..

५५. देशात *इम्प्लॉयमेंट एक्स्चेंजची निर्मिती* केली व सर्व समाजातील बेरोजगारांना नोकरीचे दरवाजे खुले केले...

५६. अन्याय, अत्याचारा विरोधात आवाज उठविण्यासाठी एक कुशल *पत्रकार* म्हणून
*मूकनायक* ,
* *बहिष्कृत भारत,*
*प्रबुद्ध भारत* *

*जनता*
पाक्षिक-साप्ताहिक सुरु केले...

५७. ' *बहिष्कृत हितकारणी सभे'ची स्थापना* करून जातींअंताची चळवळ सुरु केली.

५८. *दुसऱ्या गोलमेज परिषदेत अस्पृष्यांचे प्रतिनिधी* म्हणून उपस्थित राहिले...

५९. अल्पसंख्यांका विरोधात *कॉंग्रेस च्या धोरणाला गोलमेज परिषदेत विरोध.* ..

६०. *बहुजनांसाठी* मो.क. गांधी यांच्याशी वैचारिक संघर्ष करून *पुणे* *करार* केला...

६१. बहुजनांच्या राजकीय, सामाजिक हक्कांसाठी *कॉंग्रेस पक्षाशी संघर्ष* केला...

६२. राज्यघटना बनविण्यापूर्वी,
*१९३४ साली घटनात्मक दुरुस्ती* करता निर्माण करण्यात आलेल्या *पार्लमेंटरी कमिटीचे सन्माननीय सदस्य* ...

६३. हिंदू धर्मातील *चातुर्वर्ण्य* पद्धती, विषमता व अन्याय-अत्याचाराला कंटाळून *१९३५* साली येवला येथे भरलेल्या परिषदेमध्ये
‘ *मी हिंदू म्हणून जरी जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही’* अशी घोषणा केली...

६४. हिंदूंसाठी *काळाराम मंदिर* प्रवेशाचा *सत्याग्रह* केला...

६५. *“UNTOUCHABILIT”*  हा शब्द बाबासाहेबांच्या लिखाणातून *इंग्रजी भाषेत* घेण्यात आला....

६६. भारताचे पहिले *कायदेमंत्री* होण्याचा बहुमान...

६७. *त्यांनी स्थापन केलेल्या संघटना* :

👉🏻 *बहिस्कृत हितकारणी सभा,*

👉🏻 *ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन,*

👉🏻 *दि बॉम्बे म्यूनिसिपल लेबर युनियन* इ.

६८.👉🏻 *पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना* ...

६९. 👉🏻 *सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स आणि इकोनॉमिक्स ची स्थापना.*

७०. *सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ* ची स्थापना...

७१. बुद्ध धम्माच्या प्रचार- प्रसारासाठी *बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया* ची स्थापना केली....

७२. औरंगाबाद येथे *मिलिंद* महाविद्यालयाची स्थापना...

७३. भारताच्या *राष्ट्रीय ध्वजाच्या मध्यभागी ‘अशोक चक्र’ असण्याला संसदेत मान्यता* मिळवून दिली...

७४. भारताला *राष्ट्रीय चिन्ह “अशोक चिन्ह”* मिळवून दिले जे *बुद्ध धम्मचक्र* आहे....

७५. बुद्ध धम्माचे प्रतिक *निळ्या* रंगाला *राष्ट्रीय रंग,* धम्माचे प्रतिक कमळ फुलाला राष्ट्रीय फुल, बोधिवृक्ष (पिंपळ)
राष्ट्रीयवृक्ष राष्ट्रीय प्रतीके मिळवून दिली....

७६. *‘सत्यमेव जयते’* सम्राट अशोक कालीन ब्रीदवाक्य भारताचे ब्रीदवाक्य म्हणून पुनरुज्जीवित केले...

७७. राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष म्हणून त्याच्या सन्मानाच्या निरन्तरतेसाठी कायदा बनविला...

७८. भारत देशाला🇮🇳 *तिरंगा* व त्याच्या *मधोमध अशोकचक्र*☸ अशी अनोखी भेट दिली...

७९. त्यांना मिळालेल्या उपाध्या (सन्मान) : ~

⚜ *भारतरत्न* (भारत सरकार),

⚜ *द ग्रेटेस्ट मँन इन द वर्ल्ड* (कोलंबिया विद्यापीठ),

⚜ *द युनिवर्स मेकर* (ऑक्सफर्ड विद्यापीठ),

⚜ *द ग्रेटेस्ट इंडियन* (CNN IBN व History वृत्त   वाहिनी) इ.
असे बरेच सन्मान मिळाले...

८०. एकमात्र भारतीय ज्यांनी *पुस्तकांसाठी एक घर* बनवले....

८१. विश्वातील एकमात्र व्यक्ती ज्यांच्याकडे *५०,००० पेक्षा जास्त पुस्तके/ ग्रंथ संच* आहेत...

८२. महापुरुष इतिहास घडवतात पण हे असे आहेत कि ज्यांनी ५००० वर्षांचा विषमतावादी, रूढी परम्परांनी वेढलेला इतिहास बदलला...

८३. *पाकिस्तान* मध्ये *एका भारतीयाची जयंती साजरी* होते ती व्यक्ती म्हणजे
👉🏻* *बाबासाहेब* *  ....

८४. बाबासाहेब एक महान *अर्थशास्त्री* ,
*समाजशास्त्री* ,
*विधिज्ञ* ,
*राज्यघटनाकार* ,
*आधुनिक* *भारताचे जनक*
इतिहासाचे गाढे अभ्यासक व स्वतः घडविणारे सुद्धा,
*मानववंशशास्त्र* अभ्यासक,
*पाली* साहित्याचे महान अभ्यासक,
बौद्ध साहित्याचे महान अभ्यासक “ *बोधिसत्व* ”,
महान तत्त्ववेत्ते,
निष्णात राजकारणी, *दीन-दलित-महिला-मजूर यांचे उद्धारक* ,
विज्ञानवादी शोधाचे समर्थक,
संस्कृत व हिंदू तसेच इतर सर्व *प्रचलित धर्मांचे गाढे अभ्यासक*
होते..

वरील सर्व मुद्यांव्यतीरीक्त बरीच मोठी यादी आहे
पण,
वेळेचे व जागेचे भान ठेवून इतकेच लिहित आहे.

वाचल्यानंतर एक मात्र सांगाल कि,
*“आधुनिक भारत देशाचा निर्माता”* (NATION BUILDER) हे एकच...
ते म्हणजे
👉🏻  *बोधिसत्व* *प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर...*
🇮🇳🌷🇮🇳🌷🇮🇳🌷

राज्यातील पहिले जडत्व तपासणी केंद्र "या' शहरात

◾️ शहराला होणारा पाणीपुरवठ्यातील जडत्व तपासणी (हेवी मेटल) केंद्र सोलापुरात उभारले जाण्याची शक्‍यता आहे.

◾️या संदर्भात सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत चर्चा झाली. हे केंद्र सोलापुरात प्रत्यक्षात उभारल्यास तो महाराष्ट्र राज्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प असणार आहे.

◾️राज्यातील पहिला असेल प्रकल्प 
दूषित पाण्याची समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा झाल्यास तो महाराष्ट्रातील पहिला पथदर्शी प्रकल्प असणार आहे.

◾️ यावेळी पाण्याची गुणवत्ता तपासणी आणि सुधारणा याबाबतही चर्चा झाली.

◾️महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्यातील जडत्व तपासणीचा प्रकल्प नाही.

◾️नागपूर येथे नीरी केंद्र आहे, पण तपासणी दिल्ली येथील कार्यालयात होते.

◾️सोलापुरातील पिण्याच्या पाण्यामुळे अनेक प्रकारचे आजार होतात हे सर्वमान्य झाले आहे.

◾️सातत्याने अनेक वेगवेगळ्या प्रभागात गढूळ पाणी येत असतं. दूषित पाण्यामुळे 21 जणांचा बळी गेल्याच्या घटनाही सोलापुरातच झाल्या आहेत.

◾️नागरिकांना स्वच्छ आणि पुरेसे पाणी देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 

नीति आयोगाने एसडीजी इंडिया ईडेक्स अर्थात शाश्वत विकास लक्ष्य आणि डॅशबोर्डचं केले प्रकाशन

📌नीति आयोगाने आज शाश्वत विकास लक्ष्य अर्थात एसडीजी इंडिया इंडेक्स प्रकाशित केले. यामध्ये 2030 चे शाश्वत विकासाचे लक्ष्य गाठण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी केलेली प्रगती दर्शवण्यात आली आहे.

📌केंद्रीय संख्याशास्त्र आणि प्रकल्प अंमलबजावणी मंत्रालय, भारतातील संयुक्त राष्ट्र कार्यालये आणि जागतिक हरित विकास संस्था यांनी एसडीजी इंडिया इंडेक्स संयुक्तरित्या विकसित केला आहे.

📌 नीति आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संयुक्त राष्ट्र आणि संख्याशास्त्र विभागातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

📌2030 चे लक्ष्य गाठण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही, असे नीति आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी सांगितले.

📌शाश्वत विकासाचे लक्ष्य गाठण्यासाठी 2020 मध्ये संपूर्ण जग कृतीशील दशकात प्रवेश करणार आहे. त्यामुळेच आत्ताच कृती करण्याची वेळ आहे, असंही ते म्हणाले.

📌शाश्वत विकास लक्ष्याबाबतच्या विकासाचे मोजमाप करणारा भारत हा जगातील सरकारच्या नेतृत्वाखालील पहिलाच देश आहे

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव घटना

🖌गांधीजींनी भारतातील पहिला सविनय कायदेभंगाचा प्रयोग कोठे केला?
- चंपारण्य

🖌गांधीजींनी भारतातील पहिले उपोषण कोठे केले?
- अहमदाबाद गिरणी लढा

🖌गांधीजींनी भारतातील पहिला असहकाराचा प्रयोग कोठे केला?
- खेडा सत्याग्रह

🖌गांधीजींनी आपल्या कोणत्या पहिल्या जनव्यापक चळवळीत पहिल्यांदाच सत्याग्रह या तत्वाचा वापर केला?
- असहकार चळवळ

🖌गांधीजींनी अन्यायाचा विरुद्ध त्यांचा जीवनातील पहिला सत्याग्रह हा कोठे केला?
- 1906 रोजी नाताळ येथे

🖌गांधीजींनी सर्वप्रथम राष्टध्वजाबाबत त्यांची कल्पना ही कोणत्या पेपरमध्ये लेख लिहुन मांडली?
- यंग इंडिया

🖌गांधीजींनी भारतात सत्याग्रह आश्रम हा कोठे स्थापन केला?
- साबरमती

🖌गांधीजी राष्ट्रीय कांग्रेस चे अध्यक्ष असलेले प्रथम व एकमेव अधिवेशन कोणते?
- 1924 चे बेळगाव अधिवेशन

🖌गांधीजींनी स्त्रियांना सर्वप्रथम संपुर्ण भारतीय स्वातंत्र्य संग्रामात कोणत्या चळवळीने आणले?
- सविनय कायदेभंग चळवळ

🖌गांधीजींचे भारतातील पहिले चरित्र हे कोणी लिहिले?
- अवंतिकाबाई

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

1.    नवी दिल्लीत तिसर्‍या ‘राष्ट्रीय सार्वजनिक खरेदी परिषद’चे उद्घाटन कुणाच्या हस्ते झाले?
✅    वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल

2.    भारत आणि रशिया या देशांदरम्यानचा संयुक्त त्रैसेवा लष्करी सरावाचे नाव काय आहे?
✅.  इंद्र

3.   ‘हीट वेव्ह 2020’ या दोन दिवसांच्या कार्यशाळेचे उद्घाटन कोठे झाले?
✅    बेंगळुरू

4.    UNICEFच्या ‘डॅनी काय ह्यूमॅनिटेरियन अवॉर्ड’ या पुरस्काराने कुणाला सन्मानित करण्यात आले?
✅.    प्रियंका चोप्रा

5.   नागालँड राज्याने कोणत्या दिवशीद्वितीय ‘मधमाशी दिन’ साजरा केला?
✅    5 डिसेंबर

6.   देशातला पहिला कॉर्पोरेट बाँड ETF कोणता आहे?
✅.    भारत ETF

7.  ISRO ने कुठे नवीन ‘स्पेस टेक्नॉलॉजी इंक्युबेशन सेंटर’ उघडले आहे?
✅    तिरुचिरापल्ली

8.    द्वितीय ‘स्टार्टअप इंडिया ग्लोबल व्हेंचर कॅपिटल समिट’ या परिषदेचे आयोजन कुठे झाले?
✅.   गोवा

9.   PACS 2019 हा कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आला?
✅.  हवाई

10.   ‘UNCTAD B2C ई-कॉमर्स इंडेक्स 2019’ याच्यानुसार, भारताचा क्रमांक काय आहे?
✅.    73

11.   ‘हँड इन हँड’ हा कोणत्या देशादरम्यानचा एक संयुक्त लष्करी सराव आहे?
✅.  चीन आणि भारत

12.    “गुलामीच्या उन्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन” कधी साजरा केला जातो?
✅.   02 डिसेंबर

13.    राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन कधी साजरा केला जातो?
✅.   2 डिसेंबर

14.   नागालँडचा राज्य दिन कधी साजरा केला जातो?
✅.  1 डिसेंबर

15.   'गेस्ट ऑफ ऑनर कंट्री' हा सन्मान मिळविणारा पहिला आशियाई देश कोणता?
✅.    भारत
16.   महाराष्ट्र विधानसभेच्या सभापती पदावर कोणत्या व्यक्तीची निवड झाली?
✅.  नाना पटोले

17.    हज यात्रेविषयीची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने चालविणारा पहिला देश कोणता?
✅.   भारत

18.   संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान बदल परिषदेचे COP 25 सत्र कुठे आयोजित करण्यात आले आहे?
✅.  मॅड्रीड

19.    सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी गटाचा अंतिम सामना कोणी जिंकला?
✅.  वांग त्झू वेई

20.   13 वे ‘दक्षिण आशियाई खेळ’ या क्रिडास्पर्धेला कोणत्या ठिकाणी औपचारिकपणे सुरुवात झाली?
✅.  काठमांडू

21.    अॅम्बेसेडर्स चॉइस: स्क्रीनिंग ऑफ फिल्म्स” हा कार्यक्रम कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला?
✅.   रियाध

22.   चौथी ‘भारत जल प्रभाव शिखर परिषद’ कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली?
✅.  नवी दिल्ली

23.  नागरी संरक्षण दिन कोणत्या दिवशी पाळला जातो?
✅.   6 डिसेंबर

24.   17 व्या ‘हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप’ शिखर परिषदेचे उद्घाटन कधी झाले?
✅.   6 डिसेंबर 2019

25.   कोणत्या संशोधन संस्थेनी मधुमेहावर उपचारासाठी औषध विकसित केले?
✅.   वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन मंडळ

26.   ‘भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन’ कधी साजरा केला जातो?
✅.    7 डिसेंबर

27.   कोणत्या क्रिकेट संघाने 2019 या वर्षाचा ‘CMJ स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड’ जिंकला?
✅.   न्युझीलँड

28.  औरंगाबाद येथे खेळवल्या गेलेल्या राष्ट्रीय शालेय बुद्धीबळ स्पर्धेत कुणी सुवर्णपदक जिंकले?
✅.   शशिनी पुवी

29.  कोणत्या विमा कंपनीने "माय:हेल्थ वुमन सुरक्षा पॉलिसी" सादर केली आहे?
✅.   HDFC एरगो

30.   WHO ने कोणते वर्ष ‘परिचारिका व सुईणी यांचे वर्ष’ म्हणून पाळण्याची घोषणा केली आहे?
✅.  वर्ष 2020

Super - 30 Questions Current Affairs

1.  “सुशासन पद्धतींच्या प्रतिकृती” विषयक दोन दिवसांची प्रादेशिक परिषद कोठे भरली?
✅.  : जम्मू

2.  8 वी आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे?
✅.   भारत

3.   कोणत्या अंतराळ संस्थेनी ‘अल्टिमा थुले’ या खगोलीय खडकाला ‘अ‍ॅरोकोथ’ असे नाव दिले?
✅.   NASA

4.  कोणत्या ठिकाणी ‘आंतरराष्ट्रीय योग परिषद’ आयोजित करण्यात आली?
✅.    म्हैसूर

5.    कोणत्या राज्याने 15 नोव्हेंबर रोजी आपला स्थापना दिन साजरा केला?
✅.   झारखंड

6.    भारतातल्या कोणत्या राज्याने “शिशू सुरक्षा” अॅप सादर केले?
✅.  आसाम

7.  कोणत्या राज्यात ‘रोसोगोल्ला दिबस’ साजरा करण्यात आला?
✅.  पश्चिम बंगाल

8.    कोणत्या राज्यात “बाली जत्रा” उत्सव साजरा केला जातो?
✅.  ओडिशा

9.  2019 सालाचा ‘BRICS-यंग इनोव्हेटर पुरस्कार’ कोणी जिंकला?
✅.  रवी प्रकाश

10.   “ढाका ग्लोबल डायलॉग” हा कार्यक्रम कोणत्या देशाने आयोजित केला?
✅.  बांग्लादेश

11.   ई-सिगारेटचा शोध कोणी लावला?
✅.  हर्बर्ट ए. गिल्बर्ट

12.    BBPS याचे पूर्ण रूप काय आहे?
✅.  भारत बिल पेमेंट सिस्टम

13.    राय क्रिडा विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली?
✅.   कपिल देव

14.   LRO याचे पूर्ण रूप काय आहे?
✅   लुनार रिकोनैसेन्स ऑर्बिटर

15.  दूरदर्शनची सुरुवात कधी करण्यात आली?
✅.   15 सप्टेंबर 1959

16.   भारतात हिंदी दिन कधी साजरा केला जातो?
✅.   14 सप्टेंबर

17.  10 वी आशियाई प्रशांत युवा खेळ स्पर्धा कोठे झाली?
✅.  व्लादिवोस्तोक, रशिया

18.  इटालियन ग्रँड प्रिक्स 2019 या शर्यतीचे विजेतेपद कोणी पटकावले?
✅.  चार्ल्स लेकलर्क

19.   कोणत्या पुरुष टेनिसपटूने यूएस ओपन 2019 ह्या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले?
✅.   राफेल नदाल

20.   राजस्थानचे नवनियुक्त राज्यपाल कोण?
✅.  कलराज मिश्रा

21.  ‘COP-14’ सत्राचे आयोजन कोठे करण्यात आले?
✅.  ग्रेटर नोएडा

22.   RCEP या समूहात किती देशांचा समावेश आहे?
✅.   16

23.  ‘हिंद महासागर परिषद 2019’ कुठे आयोजित करण्यात आली?
✅.  माले, मालदीव

24.   दुलीप करंडक 2019 ही क्रिकेट स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली?
उत्तर : इंडिया रेड

25.   जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे?
उत्तर : जिनेव्हा, स्वित्झर्लंड

26.   भारताचे नवे गृह सचिव कोण आहेत?
✅.  अजय कुमार भल्ला

27. कॅटालिना खाडी ओलांडणारा पहिला आशियाई जलतरणपटू कोण आहे?
✅.  सतेंद्र सिंग लोहिया

28.  MMR याचे पूर्ण रूप काय आहे?
✅.   मोबाइल मेटलिक रॅम्प

29.   एसो अल्बेन कोणत्या क्रिडाप्रकारासाठी ओळखला जातो?
✅.   सायकलिंग

30.  फिजी देशाची राजधानी कोणती आहे?
✅.   सुवा

*कर्नाटकच्या NIT येथे ISROचे चौथे शैक्षणिक केंद्र

- अंतराळ क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी एक व्यवस्था उभारण्याच्या उद्देशाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) कर्नाटक  राज्यातल्या सुरथकल येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) याच्या परिसरात एक प्रादेशिक शैक्षणिक केंद्र उघडणार आहे.

- त्यासंदर्भात 3 जानेवारीला दोन्ही संस्थांमध्ये एक सामंजस्य करार झाला.

- NIT-सुरथकल इथले केंद्र हे ISROचे चौथे प्रादेशिक शैक्षणिक केंद्र असणार. इतर केंद्रे मालवीय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (जयपूर), गुवाहाटी विद्यापीठ आणि कुरुक्षेत्र विद्यापीठ येथे आहेत.

▪️केंद्राविषयी

- या ठिकाणी अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनुप्रयोगांमधील संशोधन आणि विकास कार्ये NIT सह संयुक्तपणे केले जाणार आहे.

- ISRO या केंद्राच्या कामकाजासाठी व प्रशासकीय खर्चासाठी वर्षाकाठी 2 कोटी रुपयांचे वार्षिक अनुदान देणार आहे.

- कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पुडुचेरी, केरळ आणि लक्षद्वीप या राज्यांचा समावेश असलेल्या दक्षिणेकडील प्रदेशात अंतराळ तंत्रज्ञानाच्या कामांना प्रोत्साहन देण्यासाठी हे केंद्र मदतनीस म्हणून काम करणार.

- भारतीय अंतराळ कार्यक्रमाच्या भविष्यातल्या गरजांसंबंधित क्षेत्रांमध्ये प्रगत संशोधन हे केंद्र करणार आहे.

- क्षमता बांधणी, जनजागृती आणि ISROच्या संशोधन व विकास कामांसाठी हे केंद्र एक दूत म्हणून काम करणार आहे.

- या केंद्रामध्ये NITचे प्राध्यापक आणि संशोधक तसेच भेट देणारे वैज्ञानिक आणि ISROचे तज्ज्ञ असणार. एक संयुक्त धोरण व व्यवस्थापन समिती या केंद्राच्या अंतर्गत चालणार्‍या उपक्रमांचे मार्गदर्शन करणार.

- या केंद्राच्या माध्यमातून पात्र विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्पाच्या कालावधी दरम्यान संशोधन पाठ्यवृत्ती (फेलोशिप) देखील दिली जाणार.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) पर्यायी उत्तरांतील ‘उद्गारवाचक वाक्य’ ओळखा.

   1) ही मूर्ती खूप सुंदर आहे.    2) कोण म्हणतो ही मुर्ती सुंदर नाही.
   3) किती सुंदर आहे ही मूर्ती    4) ही मूर्ती सुंदर नाही असे नाही.

उत्तर :- 3

2) खाली दिलेल्या वाक्याचे साध्या वर्तमानकाळातील रूप शोधा. – मी आंबा खाईन.

   1) मी आंबा खातो    2) मी आंबा खाल्ला
   3) मी आंबा खात असेन    4) मी आंबा खात होती

उत्तर :- 1

3) खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर पुल्लिंग व स्त्रीलिंग अशा दोन्ही प्रकारे होतो.

   1) संधी    2) बाधी     
   3) वेळ      4) सर्व

उत्तर :- 4

4) गोविंदा इंग्रजीत कच्चा आहे. – अधोरेखित शब्दाचा कारकार्थ शोधा.

   1) षष्ठी – अपादान    2) सप्तमी – अधिकरण 
   3) तृतीया – अधिकरण    4) पंचमी – अपादान

उत्तर :- 2

5) ‘वारा सुटला आणि पाऊस गेला’ या वाक्याचा प्रकार कोणता ?

   1) केवल वाक्य    2) संयुक्त वाक्य   
   3) मिश्र वाक्य    4) साधारण वाक्य

उत्तर :- 2

6) ‘अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही’ या वाक्यातील उद्देश कोणते?

   1) अलीकडे    2) तुम्हाला   
   3) मी      4) पत्र

उत्तर :- 3

7) ‘न्यायधिशाकडून दंड करण्यात आला’ या प्रयोगाचे नाव सांगा.

   1) कर्तरी प्रयोग      2) भावे प्रयोग   
   3) समापन कर्मणी प्रयोग    4) नवीन कर्मणी प्रयोग

उत्तर :- 4

8) ‘तोंडी लावणे’ हा सामासिक शब्द समासाचा कोणत्या प्रकारातील आहे ?

   1) उपपदतत्पुरुष  2) अलुक तत्पुरुष   
   3) कर्मधारय    4) व्दिगू

उत्तर :- 2

9) कंसातील विरामचिन्हे ओळखा. -  (:)

   1) स्वल्पविराम    2) अपूर्ण विराम   
   3) अर्धविराम    4) यापैकी नाही

उत्तर :- 2

10) खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नव्हे ?

   1) दगड    2) धोंडा     
   3) पाषाण    4) झाड

उत्तर :- 3

विभिन्न गांधी

1) आधुनिक गांधी  - बाबा आम्टे

2) अमेरिकी गांधी  - मार्टिन लूथर किंग

3) बर्मी गांधी  - आंग सान सू की

4) श्रीलंका गांधी  - ए टी अरियाटाने

5) अफ्रीकी गांधी  - केनेथ कोंडा

6) काला गांधी (द.अफ्रीकी गांधी) - नेल्सन मंडेला

7) कीनिया के गांधी। - जोमो केन्याटा

8) इन्डोनेशियाई गांधी  - अहमद सुकर्णो

9) शेखावटी गांधी  - बद्रीमल सोढानी

10) उत्तराखंड के गांधी - इंद्रमल बडोनी

11) बिहारी गांधी  - डॉ.राजेन्द्र प्रसाद

12) राजस्थान गांधी  - गोकुल भट्ट

13) गांधीजी के 5वे पुत्र  - जमनालाल बजाज

14) मालाणी (बाडमेर) के गांधी - वृद्धिचंद जैन

नागरिकत्व कायदा राबविणारे उत्तर प्रदेश ठरलं पहिलं राज्य!

◾️ केंद्र सरकारनं केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी सुरू करणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरलं आहे.

📌 पाकिस्तान,
📌 अफगाणिस्तान आणि
📌 बांगलादेश या तीन शेजारी देशांतून आलेल्या

1⃣ हिंदू,
2⃣ शीख,
3⃣ जैन,
4⃣  बौद्ध,
5⃣ पारशी व
6⃣ ख्रिश्चन

स्थलांतरितांना या कायद्यानुसार नागरिकत्व देता यावे

◾️ यासाठी त्यांचा शोध घेण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असं गृहखात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अविनाश अवस्थी यांनी सांगितलं.

◾️केंद्र सरकारने ठरवून दिलेलं हे काम करणं प्रत्येक राज्यावर बंधनकारक आहे आणि जे यास नकार देतील त्यांना तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो, असं अवस्थी यांनी सांगितलं.

➖➖➖➖

UNICEFचा “जागतिक लोकसंख्या अहवाल”

संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (UNICEF) यांचा “जागतिक लोकसंख्या अहवाल” प्रसिद्ध करण्यात आला आहे.

- अहवालात असे म्हटले आहे की 2027 सालापर्यंत जगातला सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून भारत चीनला मागे टाकणार.

- UNICEFने यावर ‘वर्ल्ड डेटा लॅब’ बरोबर काम केले. 1 जानेवारी 2020 रोजी जन्मलेल्या बाळांच्या संख्येचा अंदाज UNच्या ‘जागतिक लोकसंख्या अंदाज (2019)’ याच्या अद्ययावत पुनरावृत्तीवर आला आहे.

▪️इतर ठळक बाबी

- नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2020 रोजी अंदाजे 67,385 नवजात बाळ भारतात जन्मले जो की एक विक्रम झाला आहे.

- त्या दिवशी जगात जन्मलेल्या अंदाजे 392,078 बाळांपैकी 17% भारतात जन्माला आली. यांपैकी एक चतुर्थांश नवजात बाळ ही दक्षिण आशियामध्ये जन्माला आली आहेत.

- 1 जानेवारी 2020 या दिवशी चीनमध्ये 46 हजार 229 बाळांनी जन्म घेतला. तर नायजेरियात 26 हजार 039, पाकिस्तानात 13 हजार 020, इंडोनेशियात 13 हजार 020, अमेरिकेत 10 हजार 452 बाळांचा जन्म झाला.

- 2020 साली जगातल्या पहिल्या बाळाचा जन्म फिजी देशात झाला.

- 1 जानेवारी 2020 रोजी जागतिक लोकसंख्या अंदाजे 7,621,018,958 वर पोहचली. याचा अर्थ गेल्या वर्षीच्या काळापासून ही अंदाजे वाढ 77,684,873 ने झाली आहे. वाढीचा दर 1.03% असण्याचा अंदाज आहे.

- जानेवारी 2020 मध्ये जगभरात प्रत्येक सेकंदाला 4.3 जन्म आणि 1.9 मृत्यू अपेक्षित आहेत.

- आतापर्यंतच्या दशकात जागतिक लोकसंख्या 8.6 अब्जपर्यंत वेगाने वाढेल अशी संयुक्त राष्ट्रसंघाचा अंदाज आहे. अंदाज असा आहे की 2050 साली हा आकडा 9.8 अब्ज आणि 2100 साली 11.2 अब्जपर्यंत पोहोचेल.

- जवळजवळ निश्चित आहे की जागतिक लोकसंख्या काही वर्षातच 8 अब्जांवर जाणार, जी 1975 सालापासून दुप्पट असणार.

- गेल्या तीन दशकांत जगात नवजात बाळाच्या जगण्याच्या प्रमाणात उल्लेखनीय प्रगती झाली आहे आणि जगभरात वयाच्या पाच वर्षापूर्वी मृत्यूमुखी पडणार्‍यांची  संख्या निम्म्याहून कमी झाली आहे.

- बालमृत्यू ही भारतातली सार्वजनिक आरोग्यासाठीची एक मोठी चिंता आहे आणि जन्माच्या वेळी मृत्यूमुखी पडणार्‍या नवजात बाळांची संख्या जवळजवळ 0.76 दशलक्ष होती आणि सुमारे 3.5 दशलक्ष बाळ अकाली जन्मले.

हॉकीपटू सुनीता लाक्राची निवृत्ती

- गुडघ्याच्या दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय हॉकी कारकीर्द संपुष्टात

- भारताच्या महिला हॉकी संघाची बचावपटू सुनीता लाक्राने गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती पत्करली आहे.

- भारताच्या महिला हॉकी संघाने २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये रौप्यपदक जिंकले होते. त्या संघात सुनीताचा समावेश होता. २८ वर्षीय सुनीताच्या गुडघ्यावर आणखी एक शस्त्रक्रिया आवश्यक आहे.

- सुनीताने १३९ सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. विशेष म्हणजे या वर्षी होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे सुनीताचे स्वप्न होते.

-  ‘‘आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्त होत आहे. २०१६मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे त्या वेळेस तीन दशकांनंतर भारताच्या महिला हॉकी संघाला ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचा मान मिळाला होता. या आठवणी नेहमी आपल्यासोबत राहणार आहेत.

- ‘हॉकी इंडिया’चीही मी आभारी आहे. दुखापतींवर चांगले उपचार मिळण्यापासून प्रत्येक वेळी हॉकी इंडियाकडून चांगले सहकार्य लाभले,’’ असे सुनीताने म्हटले.

- आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीचा निर्णय हा माझ्यासाठी भावुक क्षण आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करायला मिळणे हा आपल्यासाठी अभिमानास्पद क्षण होता. टोक्यो ऑलिम्पिकसाठीदेखील आपण तयारी करत होतो.

- मात्र गुडघा दुखापतीवर दुसरी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीचा निर्णय घेत आहोत. आपले संघसहकारी, हॉकी इंडिया आणि आपले प्रशिक्षक शोर्ड मरीन यांचे आपण विशेष आभार मानत आहोत. माझ्या कुटुंबीयांच्या प्रोत्साहनाशिवाय हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रवास आपण करू शकलो नसतो. - सुनीता लाक्रा

▪️शेतकरी वडिलांकडून नेहमीच प्रोत्साहन

- सुनीता लाक्राचा जन्म ओदिशामधील राजगंजपूर येथे शेतकरी कुटुंबात झाला. वडिलांनी सुनीताला सहाव्याच वर्षी रॉरकेला येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणात (साई) हॉकी प्रशिक्षणासाठी पाठवले.

- वास्तविक लाक्रा यांच्या घरात सर्व मुले व मुली फुटबॉल खेळायचे. मात्र तरीदेखील हा खेळ धोकादायक आहे असे मानणाऱ्या सुनीताच्या वडिलांनी आपल्या मुलीला हॉकीसाठी प्रोत्साहन दिले.

- सुनीताचे तिच्या यशस्वी कारकीर्दीसाठी अभिनंदन. मैदानावर आणि ड्रेसिंग रूममधील आपल्या सोबतच्या आठवणी बऱ्याच आहेत. दशकाहून अधिक काळ आपण एकत्र खेळलो आहोत. लवकरच सुनीता तू बरी हो.

- राणी रामपाल, भारतीय हॉकी कर्णधार

▪️एक नजर कामगिरीवर

- * १३९ सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

- * २०१४मध्ये इन्चॉनमधील एशियाडमध्ये कांस्यपदक

- * २०१८ आशिया चॅम्पियन्स चषक स्पर्धेत भारताचे नेतृत्व- स्पर्धेत भारताला दुसरे स्थान

- * २०१८मध्ये जकार्तामधील एशियाडमध्ये रौप्यपदक
-------------------------------------------------

सहा चेंडूत सहा षटकार

🔰 एका षटकात सलग 6 षटकार (सिक्स) मारण्याची विक्रमी कामगिरी, न्यूझीलंडचा फलंदाज लिओ कार्टरने रविवारी टी -20 क्रिकेटमध्ये केली आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील सातवा फलंदाज ठरला आहे.

🔰 असे ठोकले षटकार : कार्टरने नाईट्स संघाचा फिरकी गोलंदाज अँटोन डेवसिचच्या एका षटकात सलग 6 षटकार ठोकले.

🔰 6 चेंडूत, 6 षटकार ठोकणारे फलंदाज :

▪ गॅरी सोबर्स (वेस्ट इंडिज)
▪ रवी शास्त्री, युवराज सिंग (भारत)
▪ हर्शल गिब्स (दक्षिण आफ्रिका)
▪ रॉस विटली (इंग्लंड)
▪ हजरतुल्ला जाजाई (अफगाणिस्तान)
▪ लिओ कार्टर (न्यूझीलंड)

🔰 दरम्यान, कार्टरने डोमॅस्टिक टी -20 स्पर्धेत कँटरबरी संघाकडून खेळत ही कामगिरी केली आहे.

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...