०२ जानेवारी २०२०

क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे

     जन्म : 2 जानेवारी 1888
(तळेगाव(ढमढेरे) महाराष्ट्र, भारत)

   फाशी : 16 नोव्हेंबर 1915
    (लाहोर कारागृह, पाकीस्तान)

स्वा. सावरकरांच्या ‘अभिनव भारत’ या संघटनेद्वारा पसरलेली क्रांतीची ज्वाळा ते काळ्या पाण्यावर गेले तरी विझली नाही. त्यांच्या पासून स्फूर्ती घेतलेले हिंदुस्थानचे युवक चारी खंडात पसरले आणि पहिलं महायुद्ध सुरु होताच त्यांनी सशस्त्र क्रांतीनं हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी निकराचा प्रयत्न केला तो गदर उत्थान म्हणून इतिहासात प्रसिद्ध झाला. गदर चळवळीतील एक महत्वाचं नाव म्हणजे क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे !

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे या गावच्या गरीब घरात २ जानेवारी १८८८ मध्ये विष्णू गणेश पिंगळे यांचा जन्म झाला. तीन भाऊ आणि चार बहिणींनंतरचं हे शेंडेफळ. चाकोरीपेक्षा काहीतरी वेगळं करण्याच्या स्वभावामुळे ते कोल्हापूरच्या ‘समर्थ विद्यालयात’ दाखल झाले. नंतर ते विद्यालय तळेगाव दाभाडे इथं सुरु झालं, तिथं ते आले. राष्ट्रीय वृत्तीची जोपासना करणारं हे विद्यालय ब्रिटीशांच्या रोषाला बळी पडून १९१० मध्ये बंद झालं. मग त्यांनी काही काळ मुंबईत नोकरी केली, नंतर स्वदेशी चळवळीला हातभार लावण्यासाठी त्यांनी लातूर जवळ हातमाग टाकले. मग मेकॅनीकल इंजिनियर किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून, घरी काहीही न सांगता ते १९११ मध्ये थेट अमेरिकेत पोहोचले.  शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी तिथे त्यांनी अपार कष्ट केले. ते अमेरिकेत असल्याची वार्ता कित्येक महिन्यांनी त्यांच्या घरच्यांपर्यंत पोहोचली. सावरकरांचे अभिनव भारत मधील निकटचे सहकारी लाला हरदयाळ यांनी अमेरिकेत गदर चळवळ सुरु केली होती. १९१४ ला महायुद्ध सुरु होताच, हिंदुस्तानात जाऊन क्रांती करण्याची हीच योग्य संधी आहे असा प्रचार त्यांनी गदर पत्रातून सुरु केला आणि विष्णु गणेश पिंगळे आपल्या कष्टसाध्य सुंदर भविष्यावर अक्षरश: लाथ मारून गदर मध्ये सामिल झाले आणि हिंदी सैन्य स्वातंत्र्यासाठी क्रांतिकार्याकडे वळवण्याच्या विभागाचे प्रमुख झाले.

सप्टेंबर १९१४ मध्ये ‘कोमा गाटा मारू’ हे जहाज शेकडो शिख क्रांतिकारकांना घेऊन हिंदुस्थानात पोहोचलं. त्यानंतर अनेक शीख वेगवेगळ्या जहाजातून परतत राहिले. नोव्हेंबर मध्ये पिंगळे गुप्तपणे हिंदुस्तानात परतले ते ही शांघाय सारख्या काही ठिकाणी जहाल भाषणं करतच. मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, बंगाली, पंजाबी भाषेवर प्रभुत्व असलेले पिंगळे पंजाब, बंगाल मध्ये वेश, नावं बदलून क्रांतिकारकांच्या  भेटी घेत, गदरचा प्रचार करीत राहिले. हिंदू, शीख, मुसलमान एकत्र आले. रासबिहारी बोस, सचिंद्रनाथ यांच्या सहाय्यानं पिंगळे यांनी उठावाची योजना आखली होती. सबंध पंजाब, बंगालपासून ते सिंगापूरपर्यंत क्रांतीची बीजं पेरली गेली होती. शस्त्र, बॉंबगोळे जमवले गेले होते. गनिमी काव्यानं ब्रिटीश सरकारला नामोहरम करण्याची ती  योजना प्रत्यक्षात आली असती तर लाहोरपासून सिंगापूरपर्यंत १८५७ सारखी पण एक यशस्वी उठावणी झाली असती. पण याही वेळी फितुरी झाली आणि बाजी पलटली. मीरत इथल्या लष्करी छावणीत फितुरीनं विष्णु गणेश पिंगळे पकडले गेले, कट उधळला गेला. त्यावेळी त्यांच्याकडे बॉम्ब आणि काही ज्वालाग्राही पदार्थ सापडले. या चळवळीतील ८१ आरोपींपैकी ७ जणांची फाशीची शिक्षा कायम झाली. ते होते विष्णु गणेश पिंगळे, कर्तारसिंग सराबा, सरदार बक्षिससिंग, सरदार जगनसिंग, सरदार सुरायणसिंग, सरदार ईश्वरसिंग आणि सरदार हरनामसिंग. त्यांना १६ नोव्हेंबर १९१५ ला फाशी देण्यात आलं. ( Who’s who of Indian Martyrs या शासकीय ग्रंथानुसार हा दिनांक दिला आहे) हे सर्वजण खरोखरच हसत हसत, वंदे मातरम् च्या जयघोषात फासावर गेले. फाशीची शिक्षा ऐकल्यावरचे विष्णु गणेश पिंगळे यांचे शब्द होते ‘so that’s’ all’. त्यांना शेवटची इच्छा विचारली असता त्यांनी, हातकड्या काढून, दोन्ही हात जोडून प्रार्थना करू देण्यास सांगितले. प्रत्यक्ष मृत्यू समोर उभा ठाकला असता पिंगळे यांचे शब्द होते, “हे परमेश्वरा, ज्या पवित्र कार्यासाठी आम्ही प्राणांचे बलिदान देत आहोत ते कार्य तू पूर्ण कर”. विष्णू गणेश पिंगळे यांचं धैर्य, मोडेन पण वाकणार नाही ही त्यांची वृत्ती याचं क्लिव्हलंड या अधिकाऱ्यालाही कौतुक वाटलं होतं. या सर्वच  क्रांतिकारकांच्या कुटुंबियाचं आयुष्यही त्यांच्याबरोबरच पणाला लागत असे. विष्णू गणेश पिंगळे यांच्या नातेवाईकांचे भोगही चुकले नाहीत. वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी या भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या विष्णू गणेश पिंगळे, त्यांचे सहकारी आणि त्यांचे कुटुंबिय या साऱ्यांचं हे स्मरण !!

        

खालसा पंथाचे संस्थापक: गुरु गोविंद सिंह

▪ श्री गुरु गोविंद सिंह हे शीख धर्माचे दहावे गुरू होय. त्यांचा जन्म 1666 मध्ये पाटना येथे गुजरीजी व श्री गुरु तेगबहादुरजी यांच्या गरीब कुटुंबात झाला. त्यावेळी गुरु तेगबहादुरजी बंगालमध्ये होते.

▪ त्यांच्या म्हणण्यानुसार गुरुजी यांचे नाम गोविंद राय असे ठेवण्यात आले होते. नंतर 1699मध्ये बैसाखीच्या दिनी गुरु गोविंद राय हे गुरु गोविंद सिंह बनले होते. त्यांचे बालपणाचे पाच वर्ष पाटना येथेच गेले.

▪ 1675 मध्ये कश्मीरच्या ब्राम्हणांच्या विनंतीला मान देऊन श्री गुरु तेगबहादुरजींनी दिल्ली येथील चांदणी चौकात देहत्याग केला होता. श्री गुरु गोविंद सिंहजी 11 नोव्हेंबर 1675 रोजी गुरु गादीवर विराजमान झाले.

▪ धर्म व समाजाच्या संरक्षणासाठी गुरु गोविंद सिंहजी यांनी 1699 मध्ये खालसा पंथाची स्थापना केली. खालसा पंथाच्या माध्यमातून त्यांनी जातीय भेद नष्ट करून समानता प्रस्तापित केली. शीख बांधवामध्ये आत्म-सन्मानाची भावना वाढीस लावली.

▪ गुरु गोविंद सिंह यांना तीन पत्नी होत्या. माता जीतोजी, माता सुंदरीजी व माता साहिबकौरजी अशी त्यांची नावे होती. बाबा अजित सिंह, बाबा जुझार सिंह ही त्यांची मुले होती. ती चमकौरच्या युद्धात शौर्यमरण प्राप्त झाले होते. तर बाबा जोरावर सिंह व फतेह सिंह या लहान मुलांना सरहंदच्या नवाबने जिवंत भिंतींत पुरले होते.

▪ केसगड, फतेहगड, होलगड, आनंदगड व लोहगड हे किल्ले त्यांनी युद्धात जिंकले होते. गुरुजी दररोज गुरूवाणीचे पठण करून आपल्या भक्तांना त्याचा सविस्तर अर्थही सांगत असत. तेव्हा त्यांचे लहान भाऊ मनी सिंहजी ते लिहीत असत. सलग पाच महिने लिहून गुरुवाणी पूर्ण झाली होती.

▪ गुरु गोविंद सिंहजी यांनी 42 वर्षापर्यंत शत्रूविरुद्ध सामना केला होता. 1708 मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील नांदेड येथील सचखंडमध्ये आपला देह त्यागला होता.

दृष्टीहिनांना नोटा ओळखण्यासाठी RBIचे अॅप

🏦रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी एक नवे मोबाइल अप्लिकेशन लाँच केले आहे. दृष्टीहिनांसाठी हे अॅप विकसित करण्यात आले आहे. याद्वारे दृष्टीहिनांना चलनी नोटा ओळखण्यास मदत होणार आहे.

💁‍♂मोबाइल एडेड नोट आयडेंटिफायर (MANI) असं या अॅपचं नाव आहे. हे आरबीआय अॅप अँड्रॉइड प्लेस्टोअर किंवा iOS अॅप स्टोअर वरून मोफत डाऊनलोड करता येईल. एका अधिकाऱ्याने माहिती दिली की हे नवे अॅप्लिकेशन दृष्टीहिनांसाठी आहे.

▪याद्वारे त्यांना महात्मा गांधी सिरीज आणि नवी महात्मा गांधी सिरीजच्या भारतीय बँक नोटा ओळखता येणार आहेत. नोटेचं छायाचित्र घेतलं आणि मोबाइलच्या रिअर कॅमेऱ्यासमोर धरलं तर अॅप ती नोट वाचून दाखवतो.

📍अॅपमध्ये भाषा बदलण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. व्हॉइस कमांड्स, इम्पेअरमेंट बदल, कॅमेऱ्याद्वारे चलन ओळखणे असे अनेक पर्याय आहेत. ओळखलेल्या चलनाची हिस्ट्री ३० दिवसपर्यंत कॅमेऱ्यात राहते.

चालू घडामोडी वन लाइनर्स, 01 जानेवारी 2020.

✳ 2019 मध्ये भारत एकदिवसीय विजयांसह संघ आहे (19 विजय)

✳ 11 दिवस लाँग 'धनू जत्रा पश्चिम ओडिशामधील बारगड येथे प्रारंभ झाला

✳ पॅन-आधार लिंक जोडण्याची अंतिम मुदत मार्च 2020 पर्यंत वाढविण्यात आली

✳ अहमदाबाद-मुंबई तेजस ट्रेन 17 जानेवारी रोजी ध्वजांकित केली जाईल

✳ एकूण वृक्ष, 2 वर्षात वनक्षेत्र 5,188 चौरस किलोमीटरने वाढले: अहवाल

✳ जनरल बिपिन रावत यांना भारताचे पहिले संरक्षण संरक्षण कर्मचारी म्हणून नाव देण्यात आले

✳ जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी नवीन लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला

✳ ट्रॅव्हर पेन्नेने वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली

✳ सोमेश कुमार तेलंगानाचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त होऊ शकतात

✳ अनंत मिश्रा यांनी भाजप अरुणाचल सचिवांची नेमणूक केली

✳ अनान्य साहित्य पुरस्कार 1426 नदिरा मजुमदार यांच्या हस्ते प्रदान

✳ अतुल करवाल यांनी राष्ट्रीय पोलिस अकादमीचे संचालक म्हणून पदभार स्वीकारला

✳ छत्तीसगडमध्ये 53व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे आयोजन

✳ रेल्वेने पुरुषांच्या विजेतेपद 53 व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो चँपियनशिपमध्ये जिंकले

✳ एअरपोर्ट आथॉरिटी ऑफ इंडियाने 53 व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो चँपियनशिपमध्ये महिला विजेतेपद पटकाविला

✳ दुबई ग्लोब सॉकर अवॉर्ड्समध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोने पुरुषांच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूचा वर्षाव केला

✳ शासनाने ऑनलाईन सुरू केली अलिलाव प्लॅटफॉर्मला "ईब्रे" नामित

✳ 2020 पासून नेदरलँड्स त्याचे नाव टोपणनाव ‘हॉलंड’

✳ एमईएमध्ये हिंद महासागर प्रदेश विभागात माडागास्कर आणि कोमोरोस समाविष्ट आहेत

✳ संजय गुप्ता यांना लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित

✳ जगातील प्रथम क्रमांकाची केंटो मोमोटा बीडब्ल्यूएफ प्लेअर ऑफ दी इयर म्हणून निवडली गेली

✳ हेमंत सोरेन यांनी झारखंडचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली

✳ अबेलाझिज दजेराड यांनी अल्जेरियाचे नवीन पंतप्रधान म्हणून नेमणूक केली

✳ संगीत दिग्दर्शक इलायराजा यांची निवड 2019 च्या हरिवरासनम पुरस्कारासाठी

✳ व्हीएसएससीने रोहिणी (आरएच) 200 साउंडिंग रॉकेट यशस्वीरित्या लॉन्च केले

✳ 100 टी -20 विकेट्स घेण्यास मुजीब उर रहमान सर्वात युवा गोलंदाज बनला

✳ हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी करनाल येथे अटल किसान मजदूर कॅन्टीनचे उद्घाटन केले

✳ केरळमधील कन्नूर येथे भारतीय इतिहास कॉंग्रेसचे 80 वे सत्र आयोजित

✳ तिरुअनंतपुरममध्ये 27 व्या राष्ट्रीय मुलांची विज्ञान कॉंग्रेस आयोजित

✳ नागालँड असेंब्लीचे अध्यक्ष विखो-यो योशु निधन झाले

✳ शासनाने "इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट" (आयएसएफआर) जारी केला.

०१ जानेवारी २०२०

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) उपसर्ग साधित शब्द निवडा.

   1) मोफत    2)‍ बंदिस्त    3) पैठणी      4) भरजरी

उत्तर :- 4

2) मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही. या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

   1) अभिधामूल व्यंजना    2) लक्षणामूल व्यंजना
   3) लक्षण लक्षणा      4) सारोपा लक्षणा
उत्तर :- 1

3) खालीलपैकी कोणता शब्द ‘घर’ या अर्थाचा नाही ?

   1) सदन    2) गृह      3) गोठा      4) गेह

उत्तर :- 3

4) पर्यायी उत्तरातील ‘अ’ व ‘ब’ या शब्दगटातून विरुध्द अर्थी शब्द जोडी कोणती ती शोधा.

  अ    ब

         1) अश्व    वाजी
         2) हय    घोडा
        3) अनुज    अग्रज
         4) वारू    तुरंग

उत्तर :- 3

5) गाळलेल्या जागी योग्य म्हणीचा वापर करा. – अवेळी पडलेल्या पावसाने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले. पण तरीही त्यांना
     स्वत:ला सावरले. कारण म्हणतात ना ..............

   1) वळणाचे पाणी वळणावरच जाणार    2) शीर सलामत तर पगडी पचास
   3) शेंडी तुटो वा पारंबी तुटो      4) पदरी पडले पवित्र झाले

उत्तर :- 2

6) ‘ज्येष्ठ नागरिकांचा आदर करा.’ नकारार्थी वाक्य बनवा.

   1) ज्येष्ठ नागरिकांचा मान राखा      2) ज्येष्ठ नागरिकांचा अपमान करू नका
   3) ज्येष्ठ नागरिकांना आदराने वागवा    4) ज्येष्ठ नागरिकांचा अनादर करू नका

उत्तर :- 4

7) ‘शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो’ या वाक्यातील ‘विधानपूरक’ ओळखा.

   1) शरद    2) चांदणे     
   3) गुलमोहर    4) मोहक 

उत्तर :- 4

8) ‘रामाकडून रावण मारला गेला.’ या प्रयोगाचे नाव सांगा ?

   1) कर्तरी प्रयोग    2) कर्मणी प्रयोग   
   3) भावे प्रयोग    4) संकीर्ण प्रयोग

उत्तर :- 2

9) ‘मीठभाकर’ या समाहार व्दंव्द समासाचा विग्रह कसा आहे ?

   1) मीठ किंवा भाकरी      2) मीठ घालून केलेली भाकरी
   3) मीठ, भाकरी व तत्सम पदार्थ    4) भाकरी आणि मीठ

उत्तर :- 3

10) खालील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा. – केवढी शुभवार्ता आणलीस तू

   1) ,      2) .     
   3) ?      4) !

उत्तर :- 4

अर्थशास्त्राचं नोबेल मिळवणारे अभिजित बॅनर्जी आहेत तरी कोण, जाणून घ्या

अमर्त्य सेन यांच्यानंतर अर्थशास्त्रातला नोबेल मिळवणारे दुसरे भारतीय अर्थशास्त्रज्ञ

🔸भारतीय वंशाचे अभिजित बॅनर्जी यांना २०१९ चा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. जगातलं दारिद्र्य दूर व्हावं यासाठी ‘अब्दुल लतिफ जमील पॉव्हर्टी अॅक्शन लॅब’च्या माध्यमातून प्रयत्न केल्याबद्दल बॅनर्जी यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. 

 हा पुरस्कार तिघांना विभागून देण्यात आला आहे. अभिजित यांच्याबरोबरच त्यांची पत्नी इस्थर डफलो आणि सहकारी मायकल क्रेमर या या तिघांनाही अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जागतिक दारिद्र्य दूर करण्यासाठी प्रायोगिक दृष्टिकोनातून काम करणाऱ्यांचा हा गौरव असल्याचे नोबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे. जाणून घेऊयात कोण आहेत अभिजित बॅनर्जी…

🔸अभिजित बॅनर्जी यांचा जन्म २१ फेब्रवारी १९६१ रोजी कोलकात्यामध्ये झाला.

🔸कोलकत्ता येथील सेंटर फऑर स्टडीज इन सोशल सायन्समध्ये अभिजित यांची आई निर्माला या प्राध्यापक होत्या. तर वडील दिपक हे कोलकात्यामधील प्रेसिडेन्सी महाविद्यालयामधील अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख होते.

🔸सध्या ते अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (एमआयटी) फोर्ड फाऊण्डेशन इंटरनॅशनलचे प्राध्यापक म्हणून काम करतात.

🔸अभिजित हे ‘अब्दुल लतिफ जमील पॉव्हर्टी अॅक्शन लॅब’चे संस्थापक आहेत. इस्थर डफलो आणि सेंडील मुल्लीनाथन यांच्या सोबतीने बॅनर्जी यांनी या संस्थेची स्थापना केली आहे. गरिबीवर मात करण्यासाठी काय करता येईल यासंदर्भातील संसोधन ही संस्था करते.

🔸अभिजित यांनी १९८१ साली आपली अर्थशास्त्रमधील बीएस पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनातर त्यांनी १९८३ साली जवाहरलाल नेहरु विद्यापिठामधून एमएची पदवी घेतली. त्यानंतर १९८८ साली ते पीएचडी करण्यासाठी हार्वर्ड विद्यापिठात गेले.

🔸हार्वर्ड विद्यापीठ आणि प्रिन्सटॉन विद्यापिठामध्ये प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर आता ते मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतात.

🔸विकासावादी अर्थव्यवस्था हा अभिजित यांचा कोअर सबजेक्ट आहे. अर्थव्यवस्थेशी आधारित विविध घटकांचा तिच्यावर कसा परिणाम होतो याचा त्यांनी अभ्यास केला आहे.

🔸२००४ साली त्यांना अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अॅण्ड सायन्सची फेलोशीप मिळाली.

🔸आर्थिक क्षेत्रातील संसोधनासाठी २००९ साली त्यांना इन्फोसेस पुरस्काराने गौरवण्यात आले.

🔸२०१२ मध्ये अभिजित यांना ‘पूअर इकनॉमिक्स’ या पुस्तकासाठी सह-लेखक एस्तेर ड्यूफलो यांच्यासमवेत ‘जेरल्ड लोब अवॉर्ड’ सोहळ्यात विशेष पुरस्कार मिळाला.

🔸२०१३ मध्ये संयुक्त राष्ट्राचा सरचिटणीस बान की-मून यांनी २०१५ नंतरची विकास उद्दिष्टांसंदर्भात काम करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तज्ञांच्या समितीमध्ये अभिजित यांनी नियुक्ती केली होती.

🔸२०१९ मध्ये त्यांनी एक्सपोर्ट-इंपोर्ट बँक ऑफ इंडियामार्फत आयोजित एका कार्यक्रमात सामाजिक धोरणांची पुन:बांधणी या विषयावर एक लेक्चर दिले होते.

🔸अभिजित यांनी एमएयटीमध्ये प्राध्यापिका असणाऱ्या डॉ. अरुंधती बॅनर्जी यांच्याबरोबर लग्न केले. हे दोघेही बालपणापासून मित्र होते. या दोघांना २० फेब्रुवारी १९९१ रोजी पुत्ररत्न प्राप्ती झाली. मात्र नंतर अभिजित आणि अरुंधती यांचा घटस्फोट झाला. २०१६ साली त्यांचा एकुलता एक मुलगा कबीर याचा आकस्मिक मृत्यू झाला.

🔸अभिजित यांनी त्यांची सहकारी इस्थर डफलो यांच्यासोबत २०१५ साली लग्न केले. मात्र त्याआधीपासूनच ते एकत्र राहत होते. २०१२ साली त्यांना एक मुलगा झाला. त्यानंतर तीन वर्षांनी ते लग्न बंधनात अडकले.

अभिजित यांनी लिहिलेली पुस्तके

१)Volatility And Growth

२)Understanding Poverty

३)Making Aid Work. Cambridge: MIT Press

४)Poor Economics: A Radical Rethinking of the Way to Fight Global Poverty

५)Handbook of Field Experiments, Volume 1

६)Handbook of Field Experiments, Volume 2

७)A Short History of Poverty Measurements

अभिजित यांना अब्दुल लतिफ जमील पॉव्हर्टी अॅक्शन लॅबसाठी मिळालेली संस्था करते काय

अभिजित आणि त्यांच्या सहकाऱ्यांने स्थापन केलेली ही संस्था म्हणजे एक संसोधन केंद्र आहे. येथे जगातील गरिबीवर मात करण्यासाठी काय करता येईल याबद्दल विज्ञानाचा आधार घेऊन संशोधन केले जाते. ही संस्था देशभरातील अनेक सरकार, सेवाभावी संस्था, स्वयंसेवक आणि वेगवेगळ्या संस्थांच्या सोबतीने गरिबी हटवण्यासंदर्भात काय काय करता येईल याबद्दलचे काम करते. २०१८ पर्यंत ४०० दशलक्ष लोकांनी या संस्थेशी संबंधित कामाचा फायदा झाला आहे.

एअर इंडियाचे खासगीकरण

🎆 केंद्र सरकारने एअर इंडियाच्या खासगीकरणाची कोणतीही मुदत निश्चित केलेली नाही, तथापि गुंतवणूकदारांकडून दिसलेले निर्णायक स्वरूपाचे स्वारस्य पाहता, या मुद्दय़ाबाबत काही आठवडय़ांतच अंतिम तोडगा येऊ शकेल, असा विश्वास नागरी उड्डाणमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केला.

🎆 या हवाई सेवेवर दिवसाला २६ कोटी रुपयांचा तोटा सरकारला सोसावा लागत असल्याने, एअर इंडियाचे लवकरात लवकर खासगीकरण न झाल्यास, या कंपनीला बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे हरदीप सिंग पुरी यांनी नोव्हेंबरमध्ये लोकसभेत विधान केले होते. तथापि, मंगळवारी मात्र त्यांचा सूर सकारात्मक दिसून आला.

🎆 एअर इंडियाचे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दमदार सेवा जाळे आहे, कंपनीची नाममुद्राही प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह आहे.

🎆 त्यामुळे या हवाई सेवेचे बस्तान गुंडाळण्यापेक्षा, चांगले गुंतवणूकदार शोधून तिचे खासगीकरण करण्याबाबत सरकारचे गंभीरतेने प्रयत्न सुरू आहेत.
🔹

दुसरी तेजस एक्सप्रेस अहमदाबाद-मुंबई मार्गावर धावणार

- देशातली पहिली खासगी रेलगाडी दिल्ली-लखनऊ या मार्गावर सुरू झाल्यानंतर आता मुंबई-अहमदाबाद मार्गावर दुसरी ‘तेजस’ एक्सप्रेस 17 जानेवारी 2020 पासून प्रवाशांच्या सेवेसाठी तयार असणार आहे.

▪️तेजस एक्सप्रेस

- या रेलगाडीचे व्यवस्थापन खासगी तत्त्वावर राखले जाते.

- या गाडीमध्ये प्रवाशांसाठी जागतिक दर्जाच्या सुखसोयी व आरामदायी व्यवस्था आहे.

- तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना वाचनासाठी वैयक्तिक रीडिंग लाइट, मोफत वायफाय, प्रवाशांच्या सुविधेसाठी कर्मचारी, बायोटॉयलेट, स्वयंचलित दरवाजे, आरामदायी जागा आदी सुविधा उपलब्ध आहेत.

- इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) यांच्यावतीने तेजस एक्सप्रेस चालविण्यात येत आहे. केंद्र सरकारने IRCTC ला ही रेलगाडी भाडेतत्त्वावर दिली आहे.

- पहिली तेजस एक्सप्रेस दिल्ली-लखनऊ मार्गावर ऑक्टोबर 2019 मध्ये धावली.

- आठवड्यातला गुरुवार वगळता इतर सर्व दिवशी तेजस एक्सप्रेस धावणार.

▪️IRCTC विषयी

- इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ही रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीत भारतीय रेल्वेची उपकंपनी आहे, जी भारतीय रेल्वेचे खानपान, पर्यटन आणि ऑनलाईन तिकिटे या कार्यांची हाताळणी करते. ‘लाइफलाइन ऑफ द नेशन’ हे IRCTCचे घोषवाक्य आहे.

- दिनांक 27 सप्टेंबर 1999 रोजी IRCTCची स्थापना झाली आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.
-------------–-------------------–-------------

चालू घडामोडी (एप्रिल २०१९) आयोग:-

● निवृत्त न्यायमूर्ती इब्राहिम खलीफुल्ला :-
अयोध्येतील रामजन्मभूमी जमीन वादाप्रकरणी मध्यस्थामार्फत सहमतीने सोडवावा असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यासाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात येणार आहे. निवृत्त न्यायमूर्ती इब्राहिम खलीफुल्ला या समितीचे अध्यक्ष असतील. वरिष्ठ वकील श्रीराम पांचू आणि आध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर यांचा या त्रिसदस्यीय समितीत समावेश आहे.

● देवेंद्र फडणवीस:-
टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने धनगर समाजाच्या विविध मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती गठीत करण्यात आली. या उपसमितीमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील, सुभाष देसाई, प्रा. राम शिंदे, महादेव जानकर, पंकजा मुंडे, विष्णू सवरा, एकनाथ शिंदे, राजकुमार बडोले आणि संभाजी पाटील- निलंगेकर यांचा समावेश.

● मोहित शहा शोध समिती:-
राज्य सरकारने राज्य माहिती आयोगातील माहिती आयुक्तांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु केली असून,या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संक्षिप्त यादी तयार करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती स्थापन करण्यात आली

● उषा थोरात समिती:-
देशाबाहेरील रुपयाच्या बाजारासंदर्भात अभ्यास करण्यासाठी RBI ने उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. आठ सदस्य असलेली ही समिती देशाबाहेरील रुपयाच्या बाजारपेठेच्या विकासाच्या कारणांचे मूल्यांकन करणार आणि स्थानिक बाजारपेठेतले रुपयाचे विनिमय दर आणि बाजारातली तरलता यावर देशाबाहेरील बाजारपेठेच्या प्रभावांचा अभ्यास करणार आहे तसेच ही समिती स्थानिक बाजारात प्रवेश करण्यासाठी अनिवासी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजनांची देखील शिफारस करणार आहे.

--------------------------------------------------

सरकारने प्रथमच ‘औषध किंमत नियंत्रण अध्यादेश-2013’ लागू केला.

🔥सरकारने प्रथमच ‘औषध किंमत नियंत्रण अध्यादेश-2013’ लागू केला असून, त्याद्वारे औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी किंमती नियंत्रणाच्या अंतर्गत असलेल्या 21 औषध वा औषधी-घटकांच्या किंमतीत वाढविण्यात येत आहे.

🔥नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) यांच्या नियंत्रणात असलेल्या औषधांच्या सध्याच्या कमाल मर्यादेच्या किंमतींमध्ये 50 टक्के वाढ केली जाणार आहे. ही वाढ एकदाच केली जाणार.

🔥या निर्णयामुळे, BCG लस, पेनिसिलिन, मलेरिया आणि कुष्ठरोगावरील औषधे (डॅप्सोन), फ्युरोसेमाइड सारखी जीवनरक्षक औषधे (हृदय, यकृत किंवा मूत्रपिंडाच्या आजारामध्ये वापरली जाणारी), ‘क’ जीवनसत्त्व, काही प्रतिजैविके आणि अँटी-अलर्जी औषधे यासारख्या औषधांच्या किंमतींमध्ये वाढ होणार आहे.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...