३० डिसेंबर २०१९

UPSC मार्फत रेल्वेमध्ये सर्व नवीन भरती करण्यात येणार

🌷भारतीय रेल्वेमध्ये होणारी सर्व नवीन भरती आता पुढे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत केली जाणार आहे. याबाबत सुधारणा करण्याच्या उद्देशाने, केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यांच्या आठ संवर्गांचे एकाच मंडळात विलीनीकरण करून नवे ‘भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा’ (IRMS) हा संवर्ग तयार करण्याला मान्यता दिली आहे.

🌿मंडळाविषयी:-

🌷IRMS मंडळ ही एकमेव संस्था असेल जी उमेदवाराद्वारे अर्ज भरताना सूचित केलेली पसंती लक्षात घेणार.नवीन व्यवस्थेनुसार, नव्या विस्तारीत मंडळात रेल्वे मंडळाचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) असणार. त्याव्यतिरिक्त रेल्वेकडेचे 4 सदस्य आणि उर्वरित स्वतंत्र सदस्य असणार. हे सदस्य वित्त, अर्थशास्त्र, व्यवस्थापन आणि उद्योग क्षेत्रातली 30 वर्षांचा अनुभव असलेले अत्यंत प्रतिष्ठित व्यवसायिक असणार आहेत.

🌷स्वतंत्र सदस्य मंडळाच्या बैठकीत उपलब्ध असणार परंतू ते रेल्वेच्या दैनंदिन कारभारात नसणार.पुढे होणारी सेवा भरती सुलभ करण्यासाठी ‘कार्मिक व प्रशिक्षण विभाग’ आणि केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) यांच्याशी सल्लामसलत करून नवीन सेवा तयार केली जाणार आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) विषयी

🌷भारत सरकारचे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) या संस्थेची स्थापना दिनांक 1 ऑक्टोबर 1926 रोजी झाली. आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि दहा सदस्य असतात. त्यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती यांच्याकडून केली जाते. UPSC च्या अध्यक्ष पदाची नियुक्ती भारताच्या संविधानातली कलम 316 च्या उपखंड (1) अन्वये केली जाते.

🌿भारतीय रेल्वे विषयी:-

🌷भारतीय रेल्वे ही भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. भारतीय रेल्वे जगातली सर्वात मोठ्या रेल्वेसेवांपैकी एक आहे. ही जगातली सर्वात मोठी व्यवसायिक संस्था आहे. भारत सरकारच्या कें‍द्रीय रेल्वे खात्यातला विभाग असा रेल्वे विभाग हा भारतातल्या संपूर्ण रेल्वे जाळ्याचे व्यवस्थापन राखतो. रेल्वे खात्याचा कारभार कॅबिनेट दर्जाचे रेल्वेमंत्री पाहतात व रेल्वे विभागाचे नियोजन रेल्वे मंडळ करते.

🌷भारतातल्या रेल्वेसेवेचा आरंभ सन 1853 मध्ये झाला. सन 1947 पर्यंत भारतात 42 रेल्वे कंपन्या होत्या. सन 1951 मध्ये या सर्व संस्थांचे राष्ट्रीयीकरण करून एक संस्था बनवण्यात आली. भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते.

🌷भारतात पहिली रेल्वेगाडी 22 डिसेंबर 1951 रोजी रूडकीमध्ये बांधकाम साहित्याच्या वहनासाठी चालवण्यात आली. त्यानंतर 22 एप्रिल 1853 रोजी भारतात पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर (मुंबई) ते ठाणे अशी 34 किलोमीटर अंतर धावली. साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले होते.

🌷1951 साली झालेल्या राष्ट्रीयीकरणानंतर, सहा रेल्वे विभागांमध्ये (झोन) त्यांची विभागणी करण्यात आली. यानुसार हैदराबादची निझाम रेल्वे, ग्वाल्हेरची सिंदिया रेल्वे आणि घोलपूर रेल्वे यांची मिळून 'मध्य रेल' असा विभाग बनवला. 'बॉम्बे बरोडा अ‍ॅण्ड सेंट्रल इंडिया रेल्वे', सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे आणि जयपूर रेल्वे यांना एकत्र करून 'पश्चिम रेल्वे' विभाग बनवण्यात आला. उत्तर रेल्वे ही 'ईस्टर्न पंजाब रेल्वे' व जोधपूर रेल्वे, बिकानेर रेल्वे यांना मिळून बनवण्यात आली. अवध, आसाम, तिरहुत या रेल्वे कंपन्यांच्या एकत्रीकरणातून ईशान्य रेल्वे (उत्तर-पूर्व रेल) स्थापन झाली. 'पूर्व रेल'मध्ये बंगाल-नागपूर रेल्वे आणि 'ईस्ट इंडिया रेल्वे कंपनी' यांचा समावेश होता.

🌷आज व्यवस्थापनासाठी भारतीय रेल्वेचे 16 विभाग करण्यात आले आहेत. कोलकाता मेट्रोचे मालकी हक्क व संचालन भारतीय रेल्वेकडे असले तरी देखील ही मेट्रो सेवा कोणत्याही प्रभागामध्ये येत नाही. संचालनाच्या दृष्टीने या रेल्वेस विभागीय रेल्वेचा दर्जा दिला गेला आहे.

हेमंत सोरेन बनले  झारखंडचे ११वे मुख्यमंत्री

🍀 झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी झारखंडचे ११ वे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली.

🍀 राजधानी रांचीतील मोरहाबादी मैदानावर हा शपथविधीसोहळा पार पडला.

🍀 राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी हेमंत सोरेन यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

🍀 हेमंत सोरेन (वय ४४) हे दुसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री बनले आहेत.

🍀 हेमंत सोरेन यांचा पहिला कार्यकाळ हा १३ जुलै २०१३ – २३ डिसेंबर २०१४ इतका होता ह्या पदावर असणारा हेमंत सोरेन आपल्या कार्यकाळामध्ये भारतामधील सर्वात तरुण मुख्यमंत्री होते.

🎇 झारखंड राज्य माहिती 🎇

🍀 झारखंड हे भारत देशाच्या पूर्व भागातले एक राज्य आहे.

🍀 बिहार राज्याचा दक्षिणेकडील भाग वेगळा काढून, या राज्याचा निर्मितीचा ठराव भारतीय संसदेने सन २००० मध्ये संमत केला.

🍀 भारतीय गणराज्यातील २८ वे राज्य म्हणून १५ नोव्हेंबर २००० रोजी झारखंड अस्तित्वात आले.

13 वे दक्षिण आशिया क्रीडा स्पर्धा - 2019

स्थळ - काठमांडू-पोखरा, नेपाळ

कालावधी - 1 ते 10 डिसेंबर 2019

सर्वाधिक पदक विजेता - भारत (312 पदके)

1984 साली दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांची सुरुवात

भारत 1984 पासून सलग आजपर्यंत पदकतालिकेत अव्वल स्थानी राहिलेला आहे.

सर्वाधिक पदक विजेते 5 देश
1. भारत (312 - 174 सुवर्ण, 93 रौप्य, 45 कांस्य)

2. नेपाळ (206 - 51 सुवर्ण, 60 रौप्य, 95 कांस्य)

3.श्रीलंका (251 - 40 सुवर्ण, 83 रौप्य, 128 कांस्य)

4. पाकिस्तान (131 - 31 सुवर्ण, 41 रौप्य, 59 कांस्य)

श्रीकांत, अंजुम चोप्रा यांना 'सी. के. नायडू जीवनगौरव

भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि १९८३चा वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य कृष्णमाचारी श्रीकांत आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार अंजुम चोप्रा यांना बीसीसीआयकडून देण्यात येणारा यंदाचा सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा येत्या १२ जानेवारी रोजी मुंबईत आयोजित करण्यात येणार असून या सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

श्रीकांत आणि अंजुम यांनी भारतीय क्रिकेटमध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले.

टीम इंडियाचे शतकांचे महाशतक

श्रीकांत यांनी १९८१ ते १९९२ यादरम्यान भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले.

६० वर्षीय श्रीकांत यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला वेगळा असा ठसा उमटवला होता.

वनडेत त्यांनी भल्याभल्या गोलंदाजांची पिसं काढली. वेगवान गोलंदाजांनाही श्रीकांत हेल्मेटविना खेळायचे.

याच दौऱ्यात सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. ही मालिका बरोबरीत राहिली. त्यानंतर श्रीकांत यांना कर्णधारपदावरून दूर करण्यात आले.

१९९२च्या वर्ल्डकपनंतर श्रीकांत यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

२००९ ते २०१२ पर्यंत श्रीकांत यांच्याकडे राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्षपद होते.

अंजुम चोप्रा भारतीय महिला क्रिकेटमधील सर्वात यशस्वी क्रिकेटपटूंपैकी एक आहे.

मलाला यूसुफझाई जगातील ‘सर्वात प्रसिद्ध किशोरी’

🍀 संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानच्या सामाजिक कार्यकर्त्या आणि नोबेल पारितोषिक विजेती मलाला यूसुफझाई यांना ‘डिकेड इन रिव्यू’ अहवालात ‘जगातील सर्वात प्रसिद्ध किशोरवयीन’ घोषित केले आहे.

🍀 २०१४ मध्ये मलालाला नोबेल पारितोषिक (शांती) देण्यात आले.

🍀 हा पराक्रम गाठणारी मलाला ही सर्वात कमी वयाची तरुणी आहे.

🍀 अहवालात असेही म्हटले होते की, या प्राणघातक हल्ल्यानंतर मलालाचे आणखी वलय वाढले.

🍀 सन २०१७ मध्ये मुलींचे शिक्षण डोळ्यासमोर ठेवून मलालाला यूएन’ने शांतिदूत म्हणून बनवले.

🍀 २२ वर्षीय मलाला अलीकडेच टीन वोग मॅगझिनने ‘कव्हर परफॉरमन्स’साठी निवडले होते.

असे असेल महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ

🎆 महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. आज एकूण ३६ जणांचा शपथविधी पार पडला. यामध्ये २६ जणांनी कॅबिनेट तर १० जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

🎆 राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून आदित्य ठाकरे यांनाही कॅबिनेटमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

🎆 पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांसह सात जणांचा समावेश करण्यात आला होता. 

🎆 राज्य मंत्रिमंडळाची यादी खालीलप्रमाणे :

✅ मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे, शिवसेना

✅ उपमुख्यमंत्री - अजित पवार, राष्ट्रवादी

✅✅ कॅबिनेट मंत्री :

१. एकनाथ शिंदे, शिवसेना

२. सुभाष देसाई, शिवसेना

३. बाळासाहेब थोरात, काँग्रेस

४. नितीन राऊत, काँग्रेस

५. जयंत पाटील, राष्ट्रवादी

६. छगन भुजबळ, राष्ट्रवादी

७. अशोक चव्हाण, काँग्रेस

८. दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी

९. धनंजय मुंडे, राष्ट्रवादी

१०. विजय वडेट्टीवार, काँग्रेस

११. अनिल देशमुख, राष्ट्रवादी

१२. हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी

१३. वर्षा गायकवाड, काँग्रेस

१४. डॉ. राजेंद्र शिंगाणे, राष्ट्रवादी

१५. नवाब मलिक, राष्ट्रवादी

१६. राजेश टोपे, राष्ट्रवादी

१७. सुनिल केदार, काँग्रेस

१८. संजय राठोड, शिवसेना

१९. गुलाबराव पाटील, शिवसेना

२०. अमित देशमुख, काँग्रेस

२१. दादा भुसे, शिवसेना

२२. जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी

२३. संदिपान भुमरे, शिवसेना

२४. बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी

२५. यशोमती ठाकूर, काँग्रेस

२६. अनिल परब, शिवसेना

२७. उदय सामंत, शिवसेना

२८. के.सी. पाडवी, काँग्रेस

२९. शंकरराव गडाख, अपक्ष

३०. असलम शेख, काँग्रेस

३१. आदित्य ठाकरे, शिवसेना

✅✅ राज्यमंत्री :

१. अब्दुल सत्तार, शिवसेना

२. सतेज उर्फ बंटी पाटील, काँग्रेस

३. शंभूराजे देसाई, शिवसेना

४. बच्चू कडू, प्रहार जनशक्ती पार्टी

५. विश्वजीत कदम, काँग्रेस

६. दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी

७. आदिती तटकरे, राष्ट्रवादी

८. संजय बनसोडे, राष्ट्रवादी

९. प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादी

१०. राजेंद्र पाटील यड्रावकर, अपक्ष

असे असेल महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ

🎆 महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. आज एकूण ३६ जणांचा शपथविधी पार पडला. यामध्ये २६ जणांनी कॅबिनेट तर १० जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

🎆 राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून आदित्य ठाकरे यांनाही कॅबिनेटमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

🎆 पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांसह सात जणांचा समावेश करण्यात आला होता. 

🎆 राज्य मंत्रिमंडळाची यादी खालीलप्रमाणे :

✅ मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे, शिवसेना

✅ उपमुख्यमंत्री - अजित पवार, राष्ट्रवादी

✅✅ कॅबिनेट मंत्री :

१. एकनाथ शिंदे, शिवसेना

२. सुभाष देसाई, शिवसेना

३. बाळासाहेब थोरात, काँग्रेस

४. नितीन राऊत, काँग्रेस

५. जयंत पाटील, राष्ट्रवादी

६. छगन भुजबळ, राष्ट्रवादी

७. अशोक चव्हाण, काँग्रेस

८. दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी

९. धनंजय मुंडे, राष्ट्रवादी

१०. विजय वडेट्टीवार, काँग्रेस

११. अनिल देशमुख, राष्ट्रवादी

१२. हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी

१३. वर्षा गायकवाड, काँग्रेस

१४. डॉ. राजेंद्र शिंगाणे, राष्ट्रवादी

१५. नवाब मलिक, राष्ट्रवादी

१६. राजेश टोपे, राष्ट्रवादी

१७. सुनिल केदार, काँग्रेस

१८. संजय राठोड, शिवसेना

१९. गुलाबराव पाटील, शिवसेना

२०. अमित देशमुख, काँग्रेस

२१. दादा भुसे, शिवसेना

२२. जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी

२३. संदिपान भुमरे, शिवसेना

२४. बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी

२५. यशोमती ठाकूर, काँग्रेस

२६. अनिल परब, शिवसेना

२७. उदय सामंत, शिवसेना

२८. के.सी. पाडवी, काँग्रेस

२९. शंकरराव गडाख, अपक्ष

३०. असलम शेख, काँग्रेस

३१. आदित्य ठाकरे, शिवसेना

✅✅ राज्यमंत्री :

१. अब्दुल सत्तार, शिवसेना

२. सतेज उर्फ बंटी पाटील, काँग्रेस

३. शंभूराजे देसाई, शिवसेना

४. बच्चू कडू, प्रहार जनशक्ती पार्टी

५. विश्वजीत कदम, काँग्रेस

६. दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी

७. आदिती तटकरे, राष्ट्रवादी

८. संजय बनसोडे, राष्ट्रवादी

९. प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादी

१०. राजेंद्र पाटील यड्रावकर, अपक्ष

चालू घडामोडी प्रश्नसंच

🔳 कोणत्या देशाने ‘गांधी नागरिकत्व शिक्षण पुरस्कार’ देण्याची घोषणा केली?

(A) जर्मनी
(B) रशिया
(C) पोर्तुगाल✅✅
(D) अर्जेंटिना

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔳 भारतीय नौदलाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या अपहरण-रोधी सरावाचे नाव काय आहे?

(A) अद्भुत
(B) अपहरण ✅✅
(C) बंधक
(D) देश हमारा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔳 डिसेंबर 2019 मध्ये कोणत्या बँकिंग कंपनीने 100 अब्ज डॉलर एवढ्या बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडला?

(A) HDFC ✅✅
(B) अ‍ॅक्सिस बँक
(C) कॅनरा बँक
(D) बँक ऑफ म्हैसूर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔳 कोणत्या राज्याने ‘जलसाथी’ नावाने एका महत्वाकांक्षी कार्यक्रमाला सुरुवात केली?

(A) आंध्रप्रदेश
(B) तामिळनाडू
(C) उत्तरप्रदेश
(D) ओडिशा ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔳 दरवर्षी ____या दिवशी आंतरराष्ट्रीय मानव एकात्मता दिवस साजरा केला जातो.

(A) 25 नोव्हेंबर
(B) 31 ऑक्टोबर
(C) 15 जानेवारी
(D) 20 डिसेंबर ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔳 भारतीय रेल्वे “एक भारत श्रेष्ठ भारत” कार्यक्रमात भाग घेणार्‍या तरुणांना _ सवलत देणार.

(A) 100 टक्के
(B) 25 टक्के
(C) 50 टक्के ✅✅
(D) 55 टक्के

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 लडाख केंद्रशासित प्रदेशात नवीन वर्षाच्या निमित्ताने ___ हा उत्सव साजरा केला जातो.

(A) लोसार उत्सव✅✅
(B) चेती चंद उत्सव
(C) अंबुबाची उत्सव
(D) संम्मक्का सारक्का उत्सव

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 ____ येथे प्रथम ‘मंडू महोत्सव’ आयोजित करण्यात आले.

(A) मध्यप्रदेश✅✅
(B) राजस्थान
(C) तामिळनाडू
(D) उत्तरप्रदेश

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या देशाने त्यांचे पहिले हायपरसोनिक आण्विक क्षेपणास्त्र तैनात केले?

(A) चीन
(B) संयुक्त राज्ये अमेरिका
(C) रशिया ✅✅
(D) इस्त्राएल

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 फानफोन चक्रीवादळ कोणत्या देशाला धडकले?

(A) इंडोनेशिया
(B) फिलीपिन्स✅✅
(C) जापान
(D) चीन

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 डिसेंबर 2019 मध्ये निधन झालेले विकास सबनीस हे एक प्रसिद्ध _____ होते.

(A) वास्तुकार
(B) राजकीय व्यंगचित्रकार✅✅
(C) गायक
(D) राजकारणी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महाराष्ट्राच्या सालसा आहेरला दुहेरी मुकुट

👉रवाइन हॉटेलतर्फे आयोजित केलेल्या ‘एमएसएलटीए’ अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेत महिला गटात
महाराष्ट्राच्या सालसा आहेरने दुहेरी मुकुट पटकावला.

👉तर एकेरी गटात तिने तेलंगणाच्या संस्कृती ढमेराचा पराभव केला, तर दुहेरी गटात युब्रानी बॅनर्जीच्या साथीने तेजस्वी काटे व सृष्टी दास जोडीला नमवले.

👉तसेच चौथ्या मानांकीत सालसाने तेलंगणाच्या दुसऱ्या मानांकित संस्कृतीचा 6-1, 6-1 एक तास, 10 मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात पराभव केला.

👉त्यानंतर दुहेरीच्या अंतिम सामन्यात सालसाने पश्चिम बंगालच्या युब्रानीसह खेळताना महाराष्ट्राच्या तेजस्वी आणि सृष्टीचे आव्हान 6-2, 6-3 असे मोडीत काढले.

👉पुरुष एकेरीत कर्नाटकच्या अव्वल मानांकित सूरज प्रबोधने महाराष्ट्राच्या सातव्या मानांकित कैवल्य कलमसेचा 6-3, 6-2 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

1) महाराष्ट्रात चिकनगुनिया ची साथ कोणत्या वर्षी पसरली
  -1965

2) चंडीपूरा रोग कोणत्या प्रकारचा आहे
- विषाणुजन्य रोग

3) झिका रोग कोणत्या प्रकारचा आहे
-विषाणुजन्य

4) डांग्या खोकला या अजाराला इंग्रजीत काय म्हणतात
-हुपिंग कफ

5) सुधारित राष्ट्रीय उपचार पद्धति कधी अमलात अली
-2013

6)डेंगू रोगाचा अधिशयन काल कीती कालावधी चा असतो
-5 ते 7 वर्ष

7)चिकनगुनिया विषाणु चा शोध कधी लागला
-1953

8)लहान बालकांना लसिकरनाद्वारे कीती एकक घटसर्प प्रतिविष दिल्या जाते
-5000 ते 1000 एकक

9) उष्णता सूर्यप्रकाश व अतिथंड तापमानाला कोणती लस सवेंदनशील असते
-पेंटा ,डीटीपी, टीटी

10)लस वाहकामध्ये लसी कीती तास सुश्थितित राहु शकतात
-24 तास

२८ डिसेंबर २०१९

नूतन वर्षाच्या प्रारंभीच 8 हजार शिक्षकांच्या नोकऱ्यांवर गदा !

⚡ शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची सेवा बंद करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

💁‍♂ प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दत्तात्रय जगताप यांच्याकडून संबंधित शिक्षकांची सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नवीन वर्षाच्या प्रारंभीच राज्यातील 8 हजार शिक्षकांना नोकरी गमवावी लागेल.

📆 राज्यामध्ये 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षण परिषदेने निश्चित केलेली टीईटी उत्तीर्णतेची पात्रता 31 मार्चपर्यंत मिळवून देणे आवश्यक होते.

🧐 राज्य शासनाकडून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला टीईटी उत्तीर्ण होण्याबाबत अतिरिक्त संधी देण्याची विनंती केली होती. त्यानुसार पात्रता नसलेल्या शिक्षकांना तूर्तास सेवेतून न काढण्याच्या सूचना दिल्या होत्या.

👉 दरम्यान राज्य शासनाची विनंती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने 3 जून 2019 च्या पत्राद्वारे फेटाळली.

📌 टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांवर 24 ऑगस्ट 2018 च्या शासन निर्णयानुसार सेवा बंदच्या कारवाईचे आदेश 25 नोव्हेंबरला दिले होते. त्यानंतर महिनाभराने प्रत्यक्ष कारवाईचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून दिले आहेत.

महत्त्वाचे 10 सराव प्रश्न उत्तरे

1) ‘विस्डेन’संस्थेच्या ‘दशकातले पाच क्रिकेटपटू’ च्या यादीत कोणत्या भारतीय खेळाडूला स्थान मिळाले आहे?
उत्तर : विराट कोहली

2) पाकिस्तान या देशाने कोणत्या देशातून ‘पोलिओ मार्कर’ आयात करण्याचा निर्णय घेतला?
उत्तर : भारत

3) 26 डिसेंबर या दिवशी कोणत्या व्यक्तीची 120 वी जयंती साजरी केली गेली?
उत्तर : शहीद उधम सिंग

4) कोणत्या वर्षी ‘भारतनेट’ प्रकल्प राबविण्यास सुरूवात झाली?
उत्तर : वर्ष 2011

5) मोठ्या राज्यांच्या गटात कोणते राज्य ‘सुशासन निर्देशांक’मध्ये अव्वल ठरले?
उत्तर : तामिळनाडू

6) क्युबा देशाचे पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर : मॅन्युएल मरेरो क्रूझ

7) QRSAM क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या संस्थेनी घेतली आहे?
उत्तर : संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO)

8) पाकिस्तान या देशाचे नवनियुक्त सरन्यायाधीश कोण आहेत?
उत्तर : गुलजार अहमद

9) आंध्रप्रदेश राज्याचे ‘दहशतवाद-रोधी दल’ कोणत्या नावाने ओळखले जाते?
उत्तर : ऑक्टोपस

10) ICCच्या ताज्या 2019 कसोटी मानांकन यादीत कोणता खेळाडू अग्रस्थानी आहे?
उत्तर : विराट कोहली

English grammar :- Already, Yet, Still

Fill in the blanks with still, yet or already.

☘️🍄☘️🍄☘️🍄☘️🍄☘️🍄☘️🍄☘️

1. Are you ……………… living in the same house?

a) still
b) yet
c) already

2. My father has not come ……………….

a) yet
b) still
c) already

3. When I went to bed, my sister was ………………. studying.

a) still
b) yet
c) already

4. Is it ……………… raining?

a) still
b) yet
c) already

5. Do you ……………… want to go to the party or have you changed your mind?

a) yet
b) still
c) already

6. I have ……………….. completed the job.

a) already
b) still
c) yet

7. I have ………………. to hear from them.

a) still
b) yet
c) already

8. He ……………….. lives at the same address.

a) still
b) yet
c) already

9. I ………………. practice the violin but I no longer play the piano.

a) still
b) yet
c) already

Answers
▬▭▬▭▬▭▬▭▬▭▬▭▬

1. Are you still living in the same house?

2. My father has not come yet.

3. When I went to bed, my sister was still studying.

4. Is it still raining?

5. Do you still want to go to the party or have you changed your mind?

6. I have already completed the job.

7. I have yet to hear from them.

8. He still lives at the same address.

9. I still practice the violin but I no longer play the piano.

ग्रामपंचायत

आपल्या देशाच्या घटनेत १९९२ साली ७३ वी दुरुस्ती केली या दुरुस्तीमुळे आपल्या देशात पंचायत राज्यपद्धती सुरु झाली. या पंचायत राज्य पद्धतीत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा नावाची एक यंत्रणा निर्माण केली आहे.
महाराष्ट्रात १९५८ साली ग्रामपंचायतीचा कायदा केला गेला. या कायद्यानेही प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामसभा निर्माण केल्या होत्या. त्यांना आता ७३ वी घटना दुरुस्तीमुळे घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने ग्रामसभा संदर्भामध्ये ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये काही सुधारणा मारून १६ ऑक्टोबर २००२ रोजी ग्रामपंचायत ‘सुधारणा अध्यादेश’ काढलेला आहे. त्यामुळे ग्रामसभांना अनन्य साधारण महत्त्व दिलेले असून पूर्वीच्या चार ग्रामसभा ऐवजी एकूण सहा ग्रामसभा अनिवार्य करण्यात आलेल्या आहेत. तसेच महिलांच्या ग्रामसभा घेणेही बंधनकारक आहे. ग्रामसभांना या दुरुस्तीमुळे इतरही विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत.

🔹ग्रामसभेचे सदस्य 🔹

पूर्वी राजे राज्य करीत. आता लोक राज्यकारभार पाहतात. ज्या कारभारात सर्व लोक सहभागी होतात आणि राज्यकारभाराचे निर्णय घेतात त्या पद्धतीला प्रत्यक्ष सरकार अथवा प्रत्यक्ष [ स्थानिक पातळीवरची ] लोकशाही असे म्हणतात. ज्या कारभारात लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सहभागी होतात आणि राज्यकारभाराचे निर्णय घेतात त्या कारभार पद्धतीला अप्रत्यक्ष सरकार किंवा प्रतिनिधीचे सरकार असे म्हणतात.

🔹आपली ग्रामपंचायत ही अप्रत्यक्ष🔹

कारभाराचे उदाहरण आहे तर ग्रामसभा ही प्रत्यक्ष कारभाराचे उदाहरण आहे आणि ग्रामपंचायतीच्या मतदारांची संस्था आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या गावातील व वाड्यावस्त्यामधील ग्रामपंचायतीचे मतदार हे ग्रामसभेचे सदस्य आहेत.

🔹ग्रामसभेचा कारभार 🔹

ग्रामसभेच्या सदस्यांनी एकत्र यावे. लोकांच्या गरजा काय आहेत त्या ग्रामपंचायतीला सांगाव्यात आणि गावांच्या भल्यासाठी कोणत्या योजना अगोदर घ्याव्यात हे सुचवावे. ग्रामपंचायतीला सल्ला दयावा आणि मार्गदर्शन करावे. थोडक्यात सांगावयाचे तर ग्रामसभेच्या सदस्यांनी गावांच्या विकासात सहभागी व्हावे. याशिवाय ग्रामसभेने, ग्रामपंचायतीने वर्षभरात गावांच्या विकासाची जी कामे केली असतील त्यांची माहिती व आढावा घ्यावा. ग्रामपंचायतीने पुढील वर्षी विकासाची जी कामे करावयची ठरविले असेल त्यांची माहिती घ्यावी. ग्रामपंचायतीने वर्षभर केलेल्या खर्चाचा हिशोब घ्यावा आणि पुढील वर्षी किती खर्च केला जाणार आहे त्याची माहिती घ्यावी. ग्रामपंचायतीने हिशोब तपासताना हिशोब तपासणाऱ्या अधिकाऱ्याला ज्या शंका आल्या असतील त्या शंका जाणून घ्याव्यात आणि त्या शंकांना ग्रामपंचायतीने जी उत्तरे दिली असतील ती उत्तरे समजून घ्यावीत. ग्रामपंचायत करीत असलेल्या कारभाराची प्रश्न विचारून माहिती घ्यावी आणि ग्रामपंचायतीला सूचना कराव्यात. म्हणजेच ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामसभेने नियंत्रण ठेवावे आणि ग्रामपंचायतीवर निवडून दिलेल्या सदस्यांनी चांगली कामे केली तर प्रोत्साहन दयावे व त्यांच्याकडून कामे नीट होत नसतील तर त्यांना जाब विचारावा अशी अपेक्षा आहे.

🔹ग्रामसभेचे पदाधिकारी 🔹

ग्रामसभेला पदाधिकारी नाहीत. ग्रामसभेला एक अध्यक्ष आहे. निवडणूक झाल्यानंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष व आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष हा सरपंचच असतो. त्याच्या अनुपस्थितीमध्ये उपसरपंच अध्यक्ष असतो. इतर ग्रामसभासाठी ग्रामसभेस उपस्थित असलेल्या सभासदापैकी एकाची बहूमताने अध्यक्ष म्हणून निवड करावी लागते. [ सन १९५९ चा अधिनियम क्रमांक ३ ]
अध्यक्षस्थानी असलेल्या व्यक्तीने ग्रामसभेची संपूर्ण बैठक पार पडेपर्यंत बैठकीचे नियमन करावे लागते. सुरुवातीस विषय पत्रिकेतील विषयांची यादी सर्वांना वाचून दाखवावी लागते. विषयास सुसंगत असा प्रश्न विचारण्याचा अधिकार ग्रामसभा सदस्यांना आहे. अशा सर्व प्रश्नांची उत्तरे अध्यक्षाने तोंडी दयावी लागतात. विषयाचे स्वरूप लक्षात घेऊन एखादया सभासदास चर्चा करण्यास किती वेळ द्यावयाचा हे ठरविण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे. विषय पत्रिकेत नमुद केलेल्या विषयाशिवाय इतर विषयावर अध्यक्षांच्या परवानगी शिवाय चर्चा करता येत नाही.

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...