२८ डिसेंबर २०१९

ग्रामपंचायत

आपल्या देशाच्या घटनेत १९९२ साली ७३ वी दुरुस्ती केली या दुरुस्तीमुळे आपल्या देशात पंचायत राज्यपद्धती सुरु झाली. या पंचायत राज्य पद्धतीत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा नावाची एक यंत्रणा निर्माण केली आहे.
महाराष्ट्रात १९५८ साली ग्रामपंचायतीचा कायदा केला गेला. या कायद्यानेही प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामसभा निर्माण केल्या होत्या. त्यांना आता ७३ वी घटना दुरुस्तीमुळे घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने ग्रामसभा संदर्भामध्ये ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये काही सुधारणा मारून १६ ऑक्टोबर २००२ रोजी ग्रामपंचायत ‘सुधारणा अध्यादेश’ काढलेला आहे. त्यामुळे ग्रामसभांना अनन्य साधारण महत्त्व दिलेले असून पूर्वीच्या चार ग्रामसभा ऐवजी एकूण सहा ग्रामसभा अनिवार्य करण्यात आलेल्या आहेत. तसेच महिलांच्या ग्रामसभा घेणेही बंधनकारक आहे. ग्रामसभांना या दुरुस्तीमुळे इतरही विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत.

🔹ग्रामसभेचे सदस्य 🔹

पूर्वी राजे राज्य करीत. आता लोक राज्यकारभार पाहतात. ज्या कारभारात सर्व लोक सहभागी होतात आणि राज्यकारभाराचे निर्णय घेतात त्या पद्धतीला प्रत्यक्ष सरकार अथवा प्रत्यक्ष [ स्थानिक पातळीवरची ] लोकशाही असे म्हणतात. ज्या कारभारात लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सहभागी होतात आणि राज्यकारभाराचे निर्णय घेतात त्या कारभार पद्धतीला अप्रत्यक्ष सरकार किंवा प्रतिनिधीचे सरकार असे म्हणतात.

🔹आपली ग्रामपंचायत ही अप्रत्यक्ष🔹

कारभाराचे उदाहरण आहे तर ग्रामसभा ही प्रत्यक्ष कारभाराचे उदाहरण आहे आणि ग्रामपंचायतीच्या मतदारांची संस्था आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या गावातील व वाड्यावस्त्यामधील ग्रामपंचायतीचे मतदार हे ग्रामसभेचे सदस्य आहेत.

🔹ग्रामसभेचा कारभार 🔹

ग्रामसभेच्या सदस्यांनी एकत्र यावे. लोकांच्या गरजा काय आहेत त्या ग्रामपंचायतीला सांगाव्यात आणि गावांच्या भल्यासाठी कोणत्या योजना अगोदर घ्याव्यात हे सुचवावे. ग्रामपंचायतीला सल्ला दयावा आणि मार्गदर्शन करावे. थोडक्यात सांगावयाचे तर ग्रामसभेच्या सदस्यांनी गावांच्या विकासात सहभागी व्हावे. याशिवाय ग्रामसभेने, ग्रामपंचायतीने वर्षभरात गावांच्या विकासाची जी कामे केली असतील त्यांची माहिती व आढावा घ्यावा. ग्रामपंचायतीने पुढील वर्षी विकासाची जी कामे करावयची ठरविले असेल त्यांची माहिती घ्यावी. ग्रामपंचायतीने वर्षभर केलेल्या खर्चाचा हिशोब घ्यावा आणि पुढील वर्षी किती खर्च केला जाणार आहे त्याची माहिती घ्यावी. ग्रामपंचायतीने हिशोब तपासताना हिशोब तपासणाऱ्या अधिकाऱ्याला ज्या शंका आल्या असतील त्या शंका जाणून घ्याव्यात आणि त्या शंकांना ग्रामपंचायतीने जी उत्तरे दिली असतील ती उत्तरे समजून घ्यावीत. ग्रामपंचायत करीत असलेल्या कारभाराची प्रश्न विचारून माहिती घ्यावी आणि ग्रामपंचायतीला सूचना कराव्यात. म्हणजेच ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामसभेने नियंत्रण ठेवावे आणि ग्रामपंचायतीवर निवडून दिलेल्या सदस्यांनी चांगली कामे केली तर प्रोत्साहन दयावे व त्यांच्याकडून कामे नीट होत नसतील तर त्यांना जाब विचारावा अशी अपेक्षा आहे.

🔹ग्रामसभेचे पदाधिकारी 🔹

ग्रामसभेला पदाधिकारी नाहीत. ग्रामसभेला एक अध्यक्ष आहे. निवडणूक झाल्यानंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष व आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष हा सरपंचच असतो. त्याच्या अनुपस्थितीमध्ये उपसरपंच अध्यक्ष असतो. इतर ग्रामसभासाठी ग्रामसभेस उपस्थित असलेल्या सभासदापैकी एकाची बहूमताने अध्यक्ष म्हणून निवड करावी लागते. [ सन १९५९ चा अधिनियम क्रमांक ३ ]
अध्यक्षस्थानी असलेल्या व्यक्तीने ग्रामसभेची संपूर्ण बैठक पार पडेपर्यंत बैठकीचे नियमन करावे लागते. सुरुवातीस विषय पत्रिकेतील विषयांची यादी सर्वांना वाचून दाखवावी लागते. विषयास सुसंगत असा प्रश्न विचारण्याचा अधिकार ग्रामसभा सदस्यांना आहे. अशा सर्व प्रश्नांची उत्तरे अध्यक्षाने तोंडी दयावी लागतात. विषयाचे स्वरूप लक्षात घेऊन एखादया सभासदास चर्चा करण्यास किती वेळ द्यावयाचा हे ठरविण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे. विषय पत्रिकेत नमुद केलेल्या विषयाशिवाय इतर विषयावर अध्यक्षांच्या परवानगी शिवाय चर्चा करता येत नाही.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे राज्यशासन’ या शब्दसमूहाला खालील योग्य शब्द सांगा.

   1) सावकारशाही    2) राजेशाही   
   3) सामंतशाही      4) जमीनदारशाही

उत्तर :- 3

2) खालीलपैकी शुध्द शब्द कोणता ?
   1) आध्यात्मिक      2) अध्यात्मिक   
   3) आध्यात्मीक      4) अधात्मिक

उत्तर :- 1

3) मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला आहे ?

   1) क्   2) ण्     3) ळ      4) क्ष्
उत्तर :- 3

4) पुनर् + जन्म हा कोणत्या संधीयुक्त शब्दाचा विग्रह आहे ?

   1) पुर्नजन्म    2) पूर्ण जन्म    3) पुनर्जन्म    4) पुनर्जम्न

उत्तर :- 3

5) अचूक विधाने निवडा.

   अ) शब्द आणि पद हे एकसारखेच आहे.
   ब) शब्दापासून पदे बनतात.
   क) पदापासून शब्द बनतात.
   1) फक्त अ अचूक  2) फक्त अ आणि क अचूक
   3) फक्त ब अचूक    4) फक्त क अचूक

उत्तर :- 3

6) खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. – ज्याने हे भांडण उरकले, तो माघार घेईल.

   1) दर्शक सर्वनाम    2) संबंधी सर्वनाम   
   3) आत्मवाचक सर्वनाम    4) पुरुषवाचक सर्वनाम

उत्तर :- 2

7) ‘झाड पाडले’ या वाक्यात ‘पाडले’ या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

   1) संयुक्त क्रियापद    2) प्रयोजक क्रियापद
   3) अनियमित क्रियापद    4) शक्य क्रियापद

उत्तर :- 2

8) ‘मला बोलवत नाही’ अधोरेखित शब्दाचा क्रियापद प्रकार ओळखा.

   1) प्रयोजक      2) शक्य     
   3) सहाय्यक      4) अकर्तृक

उत्तर :- 2

9) पर्यायी उत्तरांतील ‘अवधिवाचक कालवाचक क्रिया – विशेषण’ कोणते ?

   1) दिवसेंदिवस थंडी वाढतच गेली      2) पक्षीण क्षणोक्षणी पडत होती
   3) नेहमी त्यांचे असेच असते      4) तो कैकवेळा सांगूनही आला नाही

उत्तर :- 3

10) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. – कोंडिबा झाडाखाली शांत झोपला होता.

   1) केवलप्रयोगी      2) क्रियाविशेषण   
   3) शब्दयोगी अव्यय    4) नाम

उत्तर :- 3

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी; काय आहे शासन निर्णय

🅾दुष्काळ, महापूर आणि अवकाळी पावसाच्या दुष्टचक्रामुळे बळीराजा संकटात सापडला होता. अशातच शेतकरी कर्जमाफीची मागणी करण्यात येत होती. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ ची घोषणा करत शेतकऱ्यांसाठी २ लाख रूपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली. परंतु आता ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप अनेक नेत्यांकडून केला जात आहे.

🅾काही दिवसांपूर्वीच सरकारनं महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ ची घोषणा केली होती. यासंदर्भातील अध्यादेश शासनानं काढला आहे. केवळ दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाच या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे.तर दोन लाखांपेक्षा एक रूपयाही अतिरिक्त कर्ज असल्यास तो शेतकरी या योजनेस पात्र ठरणार नाही.

🅾या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत कर्ज घेतलं आहे त्यांच्या कर्ज खात्याचं व्याज आणि थकबाकी ही २ लाखांपर्यंत असावी, अशी अट यामध्ये घालण्यात आली आहे. तसंच अशा शेतकऱ्यांचे अल्प / अत्यल्प भूधारक याप्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता, त्यांच्या कर्जखात्यात २ लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार असल्याचं अध्यादेशात म्हटलं आहे.

दरम्यान, ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यातील मुद्दल आणि व्याज मिळून २ लाखांपेक्षा अधिक असेल अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. तसंच एप्रिल २०१५ पूर्वीचे कर्ज असलेला शेतकरीही या योजनेस पात्र राहणार नाही.

व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे निधन

◾️रेषा आणि शब्दांच्या फटकाऱ्यांतून राजकीय-सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे ‘लोकसत्ता’चे माजी व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे शुक्रवारी दादर येथे निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते.

सबनीस यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. सबनीस यांचा जन्म १२ जुलै १९५० रोजी झाला.

◾️ त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले होते.

◾️ शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी करणे नाकारून त्यांनी स्वतंत्र व्यंगचित्रकार म्हणून काम सुरू केले.

◾️दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आर. के. लक्ष्मण हे त्यांचे आदर्श होते.

◾️ बाळासाहेब ठाकरे राजकारणात सक्रीय झाल्यानंतर त्यांनी ‘मार्मिक’ची जबाबदारी सबनीस यांच्याकडे सोपवली.

◾️त्यांनी तेथे १२ वर्षे काम केले. त्यानंतर त्यांनी  ‘लोकसत्ता’सह अनेक दैनिकांमध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम केले.

◾️सबनीस गेली सुमारे ५० वर्षे व्यंगचित्रांद्वारे राजकीय-सामाजिक वास्तवावर टिप्पणी करत होते.

◾️ परदेशातील काही नियतकालिकांमध्ये तसेच इंग्रजीतील साप्ताहिकांतही त्यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली होती.

◾️ व्यंगचित्रकला इतर कलावंतांनीही आत्मसात करावी, यासाठी ते धडपडत असत.

◾️‘वैश्विक नागरिकत्व’ संकल्पनेवर त्यांचा विश्वास होता. त्यांचे  ‘व्यंगनगरी’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

आरोग्यशास्ञ

🚦 हत्तीरोगाचा रक्त नमुना कधी घेतात - राञी

🚦 लाल रक्तपेशी तयार होण्याकरीता कोणता घटक आवश्यक असतो - फॉलिक अँसिड

🚦 जन्मताच ह्रदयात दोष असणार्या मुलांना ब्लू बेबी म्हणतात

🚦 करडई तेलातील - लिनोलिक हे मेदाम्ल रक्तात्ल कोलेस्टेरॉलची माञा कमी राखते

🚦 सोयाबिन मध्ये - ४०% प्रथिन असतात

🚦 पुरुषांमधिल कुटूंबनियोजन शस्ञक्रियेस - व्हँसेक्टॉमि म्हणतात

🚦 स्ञियांमधिल कुटूंबनियाेजन शस्ञक्रियेस - ट्युबोक्टोमी म्हणतात

🚦 आयुर्वेदाची निर्मिती अथर्ववेदा पासुन झाली आहे

🚦 शरीराच्या एकुन वजनाच्या सुमारे २\३ भाग स्नायुंनी बनलेला असतो

🚦 ह्रदयास ऑक्सिजन चे प्रमाण कमि पडल्यास - हायपरटेंशन हा आजार होतो

🚦 ह्रदयाचा एक ठोका पडन्यास - ०.८ सेतंद लागतात

🚦 शरीरातील पाण्याचे प्रमाण आणि आरबीसीचे प्रमाण मोजण्यासाठी - फॉस्फरस ३२ वापरतात.

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

1. आंध्रप्रदेश राज्याचे ‘दहशतवाद-रोधी दल’ __________ या नावाने ओळखले जाते.

(A) MJEX
(B) टायगर
(C) ऑक्टोपस ✅✅
(D) CT-TTX

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2. पाकिस्तान या देशाचे नवनियुक्त सरन्यायाधीश कोण आहेत?

(A) जावेद इकबाल
(B) मिआन साकीब निसार
(C) आसिफ सईद खान खोसा
(D) गुलजार अहमद ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

3. QRSAM क्षेपणास्त्राची चाचणी ______ या संस्थेनी घेतली.

(A) संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) ✅ ✅
(B) भारतीय भुदल
(C) भारतीय नौदल
(D) भारतीय हवाई दल

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

4. आसामच्या मंत्रिमंडळाने अशी घोषणा केली आहे की ‘आसामी’ भाषेला राज्य भाषा बनवतील. त्याच्या संदर्भात भारतीय राज्य घटनेतल्या कोणत्या कलमात सुधारणा केली जाणार?

(A) कलम 345 ✅✅
(B) कलम 354
(C) कलम 348
(D) कलम 352

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

5. _____ वर्षांपेक्षा जास्तच्या कालावधीनंतर क्युबा या देशाच्या पंतप्रधानपदी मॅन्युएल मरेरो क्रूझ यांची नेमणूक करण्यात आली.

(A) 15
(B) 20
(C) 50
(D) 40✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

6. कोणत्या पुरातत्वशास्त्रज्ञाला बांग्लादेशात ‘आंतरराष्ट्रीय कला परिषद’च्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात गौरविण्यात आले?

(A) नयनजोत लाहिरी
(B) अचला मौलिक
(C) आर. नागास्वामी ✅✅
(D) डी. आर. भांडारकर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

7. कोणत्या वर्षी ‘भारतनेट’ प्रकल्प राबविण्यास सुरूवात झाली?

(A) वर्ष 2005
(B) वर्ष 2001
(C) वर्ष 2011 ✅✅
(D) वर्ष 2012

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आरोग्यविषयक सरकारच्या महत्त्वाच्या योजना


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

1.जीवनदायी आरोग्य योजना :-

दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबांसाठी 
१९९७-९८ पासून राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत रुग्णांना मेंदूरोग, मूत्रविकार तसेच मज्जारज्जू यांसाठी आíथक साहाय्य दिले जाते.

योजनेअंतर्गत प्रतिरुग्णास ५० हजार इतके अर्थ साहाय्य दिले जात असे.मात्र ही रक्कम आता २००६-०७ पासून एक लाख ५० हजार इतकी करण्यात आली आहे.

राज्य सरकारने सध्या अस्तित्वात असलेल्या जीवनदायी रचनेचे पुनर्रचना करून सर्वसमावेशक राजीव गांधी जीवनदायी योजना तयार केली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2.राजीव गांधी जीवनदायी योजना :-

ही योजना महाराष्ट्र सरकारने २ जुलै २०१२ पासून सुरू केली..

राज्यातील आíथक दुर्बल घटकांना दुर्धर व गंभीर आजारावरील उपचार व शस्त्रक्रिया करणे शक्य व्हावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.

या योजनेअंतर्गत पिवळेकार्डधारक म्हणजे दारिद्रय़्ररेषेखालील व केशरी शिधापत्रधारक जे दारिद्रय़रेषेच्या वर आहेत, मात्र ज्यांचे वार्षकि उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे, त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थीक दीड लाखांपर्यंत वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे.

या योजनेत पात्र लाभार्थीना हेल्थ कार्ड दिले जाईल.ज्यात कुटुंबप्रमुख व सदस्यांची नावे व फोटो असतील.

राज्य सरकार लाभार्थीच्या नावे विमा काढणार असून त्या विम्याचा हप्ता राज्य सरकार भरणार आहे.लाभार्थी कुटुंबाकडून कोणतीही रक्कम स्वीकारली जाणार नाही.

या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीशी करार करण्यात आला आहे.

ही योजना संपूर्णत: कॅशलेश असून रग्णाला या योजनेअंतर्गत कोणताही खर्च करावा लागणार नाही.

या योजनेअंतर्गत रग्णालयातील उपचार, निदान, आवश्यक औषधोपचार, शुश्रूषा, भोजन तसेच एक वेळचा परतीचा खर्च यांचा समावेश आहे.

या योजनेअंतर्गत रुग्णाला रुग्णालयातून मुक्त केल्यानंतर दहा दिवसांपर्यंतचा फेरतपासणीचा समावेश आहे.

या योजनेच्या पहिल्या टप्प्यात गडचिरोली, अमरावती, नांदेड, सोलापूर, धुळे, रायगड, मुंबई व मुंबई उपनगर या आठ जिल्ह्य़ांचा समावेश आहे.

राज्यातील शासकीय व खाजगी अशी जवळ जवळ १२० रग्णालये यात समाविष्ट झाली आहेत.

या योजनेत रुग्णाला रुग्णालयात भरती करताना मदत व्हावी यासाठी आरोग्यमित्र यांची नेमणूक करण्यात आली आहे. 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

3.जननी बाल ( शिशू) सुरक्षा योजना :-

राष्ट्रीय आरोग्य मोहिमेचा एक महत्त्वाचा घटक म्हणून बालसुरक्षा योजना राबविली जाते.

महाराष्ट्राची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यात याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

ही योजना ०१ जून २०११ रोजी सुरू करण्यात आली.

भारतात प्रथमच अशा एखाद्या योजनेद्वारे पुढील वैधानिक अधिकार देण्यात आले आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📗 मातांचे वैधानिक अधिकार :-

सर्व शासकीय रग्णालयांत मोफत बाळंतपण सुविधा, सिझेरिअन ऑपरेशनसहित पुरवली जाईल.

दवाखान्याच्या कालावधीतील साधारणत: बाळंतपणाच्या वेळेस तीन दिवस व सिझेरिअनच्या वेळेस सात दिवसांपर्यंतचा आहार मोफत देण्यात येईल.

सर्व प्रकारची औषधे, फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या, सर्व प्रकारच्या चाचण्या- उदा. रक्त तपासणी, मूत्र तपासणी तसेच सोनोग्राफी मोफत केली जाईल, तसेच अडचणींच्या वेळेस मोफत रक्तपुरवठय़ाची सोय केली जाईल.

आजारी नवजात बालकाचे वैधानिक अधिकार.

आजारी नवजात शिशूला- म्हणजे ३० दिवसांच्या आतील शिशूला आवश्यक ते सर्व उपचार, औषधे, आहार, तपासण्या सर्व मोफत दिल्या जातील. त्याचबरोबर मोफत वाहतूक सुविधादेखील उपलब्ध होतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शॉपिंगसाठी आरबीआयने आणला ‘पीपीआय’चा नवा पर्याय

💎डिजिटल पेमेंटसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आता आणखी एक नवा पर्याय आणला आहे. त्यानुसार, प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (पीपीआय) ही नवी डिजिटल पेमेंट सिस्टिम लॉन्च करण्यात आली. याद्वारे ग्राहकांना खरेदी करणे सोपे होणार आहे.

💎भारतात सध्या पैशांचे व्यवहार करण्यासाठी डिजिटल पेमेंटचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये युपीआय, नेटबँकिंग, डेबिट-क्रेडिट कार्ड, एआयपीएस, मोबाईल वॉलेट, मोबाईल बँकिंग आणि पीओएस मशीन आदींचा समावेश आहे.त्यानंतर आता आरबीआयने प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (पीपीआय) हा नवा पर्याय आणला आहे.

💎तर पीपीआयचे विस्तारीत रुप प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट असे आहे. हे एक प्रिपेड अकाऊंट असणार आहे. हे अकाऊंट दर महिन्याला तुम्ही रिचार्ज करु शकता. यासाठी 10 हजार रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

💎एकदा हे अकाऊंट रिचार्ज झाले की त्याचा वापर तुम्ही रोजच्या गरजेच्या वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी करु
शकता. या अकाऊंटचे सर्वांत महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला फंड ट्रान्सफरची सुविधा मिळणार नाही.

💎यातील पैसे केवळ वस्तू आणि सेवा खरेदीसाठीच वापरता येणार आहेत. हे पेमेंट इन्स्ट्रुमेंट बँकेकडून किंवा सध्या अस्तित्वात असलेल्या नॉन बँकिंग पीपीआय प्लेअर्सकडून तयार करुन मिळू शकते.

💎तसेच या कंपन्या ग्राहकांची माहिती व्हेरिफाय करुन त्यांना पीपीआय अकाऊंट सुरु करुन देऊ शकतात. यासाठी मोबाईल क्रमांक आणि ओटीपी, त्याचबरोबर केवायसीसाठी लागणारे कोणतेही एक ओळखपत्र आवश्यक असणार आहे.

💎या पीपीआयमध्ये केवळ नोंदणीकृत मोबाईल क्रमांक जोडलेल्या बँक अकाऊंटमार्फतच रक्कम जमा करता
येणार आहे. हे अकाऊंट रिचार्ज करण्यासाठी आरबीआयने वर्षाला 1 लाख 20 हजार रुपयांची मर्यादा निश्चित केली आहे.

💎म्हणजेच महिन्याला केवळ १०,००० रुपयांपर्यंतच रक्कम ग्राहकाला या अकाऊंटमध्ये ठेवता येणार आहेत.

देशातील पहिली लांब पल्ल्याची CNG बस सेवा सुरू

पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशातील पहिला सर्वात लांबचा प्रवास करणारी CNG बस सेवेची सुरूवात केली.

बस सेवेसाठी महिंद्रा अँन्ड महिंद्रा आणि अमेरिकेच्या एगिलिटी सोल्युशनमध्ये करार झाला आहे.

महिंद्रा कंपनीची ही सीएनजी बस दिल्ली ते देहरादून या मार्गावर धावेल.

  उत्तराखंडने या सेवेसाठी आयजीएलसोबत करार केला आहे.

बसचे वैशिष्ट्ये

एकदा रिफिल केल्यानंतर ही बस 1000 किमीपेक्षा अधिक अंतर पार करू शकेल.

बसमध्ये कंपोजिट इंजिनचा वापर करण्यात आलेला आहे.

याचे वजन सध्याच्या CNG सिलेंडरच्या तुलनेत जवळपास 70 टक्के कमी आहे.

नवीन सिलेंडरमध्ये 225 ते 275 किलोग्राम CNG भरता येतो.

सध्याच्या CNG बसच्या सिलेंडरमध्ये 80 ते 100 किलोग्राम सीएनजी भरता येतो.

सीएनजी बसमुळे प्रदुषण देखील कमी होईल व इंधनावर होणारा खर्च देखील वाचेल.

पाणी व्यवस्थापनासाठी अटल भूजल योजना

🔷पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त बुधवारी येथे अटल भूजल योजना जाहीर केली. या योजनेद्वारे भूजलाचे व्यवस्थापन केले जाणार असून प्रत्येक घरी पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

🔷मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. सध्या १८ कोटी लोकांपैकी केवळ ३ कोटी लोकांनाच जलवाहिनीद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळते.

🔷या योजनेमुळे पुढील पाच वर्षांत उर्वरित १५ कोटी जनतेला स्वच्छ पाणी मिळेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला आहे.

🔷शेतकऱ्यांनी कमी पाण्यात होणारी पिके घ्यावीत असे सांगतानाच मोदी यांनी लोकांना पाण्याचा अपव्यय टाळण्याची विनंती केली.

कोपरगावच्या दोन तरूणींची न्यायाधीशपदी निवड..

◾️कोपरगाव : येथील सामाजिक माहिती अधिकार कार्यकर्ते संजय भास्करराव काळे यांची कन्या अश्विनी ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश परीक्षेत राज्यात नवव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

◾️संवत्सर गावची ही कन्या आता मुंबई येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर जिल्हा स्तरावर न्यायाधीश होणार आहे. कोपरगावची प्रियंका काजळे ही देखील दिवाणी न्यायाधीश परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे.

◾️राज्यात दिवाणी न्यायाधीश परीक्षेत १९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यात अश्विनी काळे ही ९ व्याय स्थानावर राहिली आहे. तिने यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एलएलएम  परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला होता.

◾️तिचे प्राथमिक शिक्षण जंगली महाराज आश्रम, अकरावी बारावी सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालय कोपरगाव तर कायदेविषयक शिक्षण मराठवाडा मित्र मंडळ शिवाजी शिक्षण महाविद्यालय, पुणे येथे झाले.   तिला प्राध्यापक गणेश शिरसाठ , अक्षय  ईनामके, वडील संजय काळे, आई माधुरी काळे,  भाऊ  अजिंक्य काळे यांचे मार्गदर्शन लाभले.

◾️कान्हेगावची कन्या प्रियंका मच्छिंद्र काजळे दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन कान्हेगाव बरोबर कोपरगाव वकील संघाचे नाव राज्यातउज्ज्वल  केले.

◾️ मच्छिंद्र जयराम काजळे व सुशीला काजळे या शेतकरी दामपत्यांची ही लेक असून कायद्याच्या परीक्षेत वयाच्या २८ व्या वर्षी प्रथम प्रयत्नात यशस्वी ठरली आहे.

ओआयसी’चा भारताला धोक्याचा इशारा


⚡️अयोध्या वादावरील न्यायालयीन
निकालाबाबतही चिंता व्यक्त :–

🌷ऑर्गनायझेशन ऑफ  इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) या संस्थेने रविवारी भारतातील सुधारित नागरिकत्व कायद्यावर चिंता व्यक्त करून या घडामोडींवर बारीक लक्ष असल्याचे म्हटले आहे.

🌷अयोध्येतील रामजन्मभूमी वादाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरही या संघटनेने चिंता व्यक्त केली. 

🌷ओआयसी ही ५७ मुस्लीम बहुल देशांची संघटना असून त्यात पाकिस्तानचाही समावेश आहे. या संघटनेने नेहमीच पाकिस्तानची बाजू घेतली आहे.

🌷ओआयसीच्या सचिवालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, भारतातील अल्पसंख्याक मुस्लीम समुदायावर परिणाम करणाऱ्या नागरिकत्व कायद्यासह सर्व घटनांवर आमचे बारीक लक्ष आहे.

🌷नागरिकत्व अधिकार व न्यायालयाने बाबरी मशीद प्रकरणी दिलेला निकाल या घटना चिंताजनक आहेत.

🌷ओआयसीने निवेदनात पुढे म्हटले आहे की, भारत सरकारने मुस्लीम अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी व त्यांच्या धार्मिक स्थळांना संरक्षण द्यावे.

🌷 संयुक्त राष्ट्रांच्या संहितेनुसार काही महत्त्वाची तत्त्वे व नियमांचे पालन केले पाहिजे. अल्पसंख्याकांशी कुठलेही भेदाभेद न करता अधिकार दिले पाहिजेत.

🌷या तत्त्व व नियमांच्या विरोधात काही वर्तन केले गेले तर त्यामुळे तणाव निर्माण होऊन या भागातील शांतात व सुरक्षा यावर गंभीर परिणाम होतील.

बॉक्सिंगपटू सुमितवर 1 वर्षाची बंदी

🥊 भारताचा स्टार बॉक्सिंगपटू सुमित सांगवानवर उत्तेजक चाचणीत दोषी सापडल्यामुळं एका वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

🧐 प्रकरण काय? : 10 ऑक्टोबर रोजी हिमाचल प्रदेश येथे झालेल्या चाचणीत सुमितच्या सॅम्पलमध्ये अ‍ॅसेटॅझोलामाइड या उत्तेजकांचे अंश सापडले. ऑलिम्पिक आणि नॅशनल चॅम्पियन (91 किलोग्राम) सांगवानवर राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेकडून ही बंदी लादण्यात आली आहे.

🏅 ऑलिम्पिकचे स्वप्न भांगणार :

▪ सांगवानच्या बंदीचा कालावधी 26 डिसेंबर 2019 पासून सुरू झाला आहे. त्यामुळं सांगवान पुरुषांच्या ऑलिम्पिक पात्रता फेरीत भाग घेऊ शकणार नाही.

▪ पुरुषांची ऑलिम्पिक पात्रता फेरी 29-30 डिसेंबर रोजी बरेलीमध्ये होणार आहे. या फेरीत निवडले बॉक्सर 3 ते 14 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक क्वॉलिफायर स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील.

📍 दरम्यान, या 1 वर्ष बंदीच्या काळामुळे सुमितला पुढील वर्षी टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये खेळात येणार नाही.

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...