२४ डिसेंबर २०१९

अफगाणिस्तानने ‘इंडियन फार्माकोपीया’  (IP)पुस्तकाला मान्यता दिली

🎆 अफगाणिस्तान इस्लामिक प्रजासत्ताक या देशाने ‘इंडियन फार्माकोपीया’ या पुस्तकाला मान्यता दिली असून या पुस्तकाला मान्यता देणारा पहिला देश ठरला आहे.

🎆 देशाच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या राष्ट्रीय औषधी व आरोग्य उत्पादने नियमन विभागाने ‘इंडियन फार्माकोपीया’ या पुस्तकाला औपचारिक मान्यता दिली.

📚 ‘इंडियन फार्माकोपीया’ पुस्तक 📚

🍀 इंडियन फार्माकोपीया भारताच्या ‘औषधी व सौंदर्यप्रसाधने कायदा-1940’ अन्वये असलेल्या मानकांचे अधिकृत असे मान्यताप्राप्त पुस्तक आहे.

🍀 हे पुस्तक औषधांची ओळख, शुद्धता आणि क्षमता यांच्या बाबतीत भारतामध्ये उत्पादित आणि विक्री केली जाणार्‍या औषधांची मानके निर्दिष्ट करते.

🍀 दरवर्षाच्या अखेरीस ‘इंडियन फार्माकोपीया’ पुस्तक प्रकाशित केले जाते.

🔴 भारतीय फार्माकोपीया 
आयोग (IPC) विषयी 🔴

🎆 भारतीय फार्माकोपीया आयोग (IPC) भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाची एक स्वायत्त संस्था आहे.

🎆 भारत देशात तयार होणार्‍या औषधांची मानके ठरवण्यासाठी IPCची स्थापना करण्यात आली आहे.

🎆 प्रदेशात असलेल्या रोगांवरच्या उपचारासाठी सामान्यत: आवश्यक असलेल्या औषधांचे मानके नियमितपणे अद्ययावत करणे, हे या संस्थेचे मूलभूत कार्य आहे.

🎆 संस्थेची स्थापना 1956 साली झाली.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महाराष्ट्रातील पहिले वृक्षसंमेलन बीडला

◾️‘मी अन् माझे’ इतकाच संकोचित विचार न करता प्रत्येकाने पर्यावरणाच्या समर्थनासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

◾️झाडांमुळे मिळणाऱ्या शुध्द हवेचे महत्त्व लक्षात घेऊन वृक्षलागवड करून ती जगवावीत, असे सांगत आणि ‘येऊन येऊन येणार कोण? झाडाशिवाय आहेच कोण!’ अशी घोषणा देत चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते सयाजी शिंदे यांनी सह्यद्री देवराई प्रकल्पात वृक्ष संगोपनाची चळवळ गतिमान करण्याचा निर्धार व्यक्त केला.

◾️तसेच जानेवारीत शेवटच्या आठवडय़ात महाराष्ट्रातील पहिले वृक्ष संमेलन बीड येथे घेण्याची घोषणाही त्यांनी केली.

◾️बीड  शहराजवळ पालवण येथील वनविभागाच्या दोनशे हेक्टर परिसरात मागील काही दिवसांपासून सह्यद्री देवराई हा वृक्ष लागवडीचा प्रकल्प आकाराला आला आहे.

◾️ अभिनेते सयाजी िशदे यांनी वृक्ष मित्र आणि नागरिकांच्या पुढाकारातून या ठिकाणी काम सुरू केले आहे.

◾️विविध जातीच्या पावणे दोन लाख वृक्षांची या ठिकाणी लागवड करण्यात आली असून काही दिवसात हा ऑक्सिजन झोन तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

◾️ २१ डिसेंबर रोजी सह्यद्री देवराई प्रकल्पात जाऊन सयाजी शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी शासन आणि लोकसहभागातून प्रयत्न करण्याचा मनोदय व्यक्त केला.

◾️या संमेलनाला राज्यभरातील पर्यावरण तज्ज्ञ उपस्थित राहणार असून वृक्ष पालखी काढण्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अरिवद जगताप आदी उपस्थित होते.

➖➖➖➖➖➖

लोकसंख्या स्थिरीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नीति आयोग आराखडा तयार करणार

🥀भारतीय लोकसंख्या संस्थेसोबत उद्या यासंदर्भात बैठक.

🥀‘कोणालाही वंचित न ठेवता, लोकसंख्या स्थिरीकरणासंदर्भातला दृष्टिकोन समजून घेणे’ या विषयावर नीति आयोगाने उद्या एका राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे.

🥀भारतीय लोकसंख्या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ही बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत भारताचे लोकसंख्या धोरण आणि कुटुंबनियोजन कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्याविषयी चर्चा होणार आहे.

🥀या विषयातले तज्ज्ञ आणि वरिष्ठ अधिकारी बैठकीत सहभागी होतील. या बैठकीतल्या चर्चेनंतर ज्या शिफारसी केल्या जातील, त्यांच्या आधारावर नीति आयोग लोकसंख्या स्थिरीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा आराखडा तयार करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात याची घोषणा केली होती.

🥀या  आराखड्यात कुटुंबनियोजनकार्यक्रमात राहिलेल्या महत्वाच्या त्रुटींवर काम केले जाणार आहे. त्याशिवाय कुमारवयीन आणि तरुणांवर भर देऊन प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी विशेष शिफारसी केल्या जातील. कुटुंबनियोजन कार्यक्रमाचा प्रसार आणि जागृती करण्याबाबत नव्या योजना तयार केल्या जातील.

🥀भारताची लोकसंख्या सध्या 137 कोटी इतकी आहे. लोकसंख्येच्या तुलनेत आपण जगात दुसऱ्या क्रमांकावर आहोत. देशातला सरासरी जन्मदर कमी झाला असला, तरीही आज 30 टक्के लोकसंख्या युवकांची असल्यामुळे भारताची लोकसंख्या आजही वाढतेच आहे. या पार्श्वभूमीवर लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.

चालू घडामोडी प्रश्न

१. कृत्रिम लिंग निर्धारित रेतन लॅब (प्रयोगशाळा) महाराष्ट्रात ----------- या शहरात सुरु करण्यात येणार आहे :-औरंगाबाद

२.  कामगारांसाठी सुरक्षा धोरण आणणारे ---- हे देशातील पहिले राज्य ठरले :- महाराष्ट्र

३. चौथी आपत्ती व्यवस्थापन परिषदेत ----------- येथे आयोजित करण्यात आली होती:- मुंबई

४. महाराष्ट्र राज्यात लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त अधिनियम-1971 नुसार लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त यांची निर्मिती करण्यात आली. अशी पदे निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील --------राज्य ठरले होते:- पहिले

५. ‘इंडिया रबर एक्स्पो’२०१९ हे आशियातील सर्वात मोठे रबर प्रदर्श कोणत्या शहरात भरले होते:- मुंबई

६. पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारी २०१९ रोजी -------या शहरात भारतीय सिनेमाच्या राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्‌घाटन केले :- मुंबई (शाम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखालील संग्रहालय सल्लागार समितीने या संग्रहालयाच्या निर्मितीसाठी मार्गदर्शन केले. या संग्रहालयाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रसून जोशी यांच्या अध्यक्षतेखाली नाविन्यपूर्ण संशोधन समिती स्थापन करण्यात आली होती.)

७. संयुक्त राष्ट्रांच्या दिव्यांगजन अधिकार ठरावाच्या धर्तीवर केंद्र सरकारने व्यंगांची संख्या सात वरुन -----पर्यंत वाढवण्यात आली :- २१

८. पहिल्या आंतरराष्ट्रीय भोजपुरी महोत्सवाचे आयोजन ------- हा देश करणार आहे :-मॉरिशस

९. जगातील सर्वात मोठी थेट लाभ हस्तांतरण योजना म्हणून -------- या योजनेची ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.:-पहल

१०.  ---------- या देशाकडून २०१९ हे सहिष्णुतेचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आला आहे?:- संयुक्त अरब अमिरात

११. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखपदी नियुक्त होणाऱ्या .......या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत? :-गीता गोपीनाथ

१२.  भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने ‘अटल भाषांतर योजना’ सुरू केली आहे?:- परराष्ट्र कल्याण मंत्रालय

१३. कोणते भारतीय राज्य सार्वभौमिक आरोग्य सेवा पुरविणारे पहिले राज्य बनले आहे?:- उत्तराखंड

१४. कोणत्या नदीच्या भागावर भारतामधील सर्वांत दीर्घ ‘बोगिबील पूल’ उभारण्यात आला आहे? :- ब्रह्मपुत्रा

१५.  राष्ट्रीय ग्राहक दिन २०१८’ या दिवसाची संकल्पना काय आहे?;- टाइमली डिस्पोझल ऑफ कंझ्युमर कम्पलेंट्‌स

१६. जागतिक प्रवास आणि पर्यटन परिषदेच्या 2018 च्या अहवालातील मानांकनात भारत सध्या --------- स्थानावर आहे:- तिसऱ्या

१७. ------ देशांच्या नागरिकांसाठी भारताने सध्या ई-व्हिसा सुविधा उपलब्ध करून दिली आहे :- १६६

१८. शेतकऱ्यांचे उत्पन्न ---------- पर्यंत दुपटीने वाढवण्याचे केंद्र सरकारने उद्दिष्ट ठेवले आहे :- २०२२

१९. पहिली जागतिक विमान वाहतूक शिखर परिषद ---------- येथे भरविण्यात आली होती:- मुंबई

२०. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने दूरदर्शन, प्रसारभारतीच्या सहकार्याने -------- आणि ----- हे दोन विज्ञान उपक्रम सुरू केले.:-डीडी सायन्स,इंडिया सायन्स

२१.  --------या ठिकाणी देशातले पहिले ‘राष्ट्रीय युद्ध स्मारक’ उभारण्यात आले - नवी दिल्ली (‘इंडिया गेट’ च्या परिसरात)

२२. भारत हा जगातला -------व्या क्रमांकाचा सर्वात मोठा CO2चा उत्सर्जक देश आहे – चौथा.

२३.  देशाची २२ वी अखिल भारतीय वैद्यकीय शास्त्र संस्था (AIIMS) येथे उभारली जात आहे – मनेठी (रेवाडी, हरियाणा).

२४. ‘राष्ट्रीय गंगा नदी (पुनरुज्जीवन, संरक्षण व व्यवस्थापन) विधेयक-२०१८ ’ अंतर्गत केंद्र सरकारचे सशस्त्र दल म्हणून-------- या नावाने नवे दल तयार केले जाणार - गंगा प्रोटेक्शन कॉर्प्स (गंगा सुरक्षा दल).

२५. ५-६ फेब्रुवारी २०१९ रोजी -------- ठिकाणी ‘आशिया LPG शिखर परिषद २०१९ ’ आयोजित करण्यात आली - नवी दिल्ली (भारत).

२६.  उत्तर अटलांटिक करार संघटना (NATO) याचा 30 वा सदस्य - मॅकेडोनिया.

२७. जागतिक कर्करोग दिन २०१९ ची थीम ----- ही होती:- आय एम अॅण्ड आय वील.

२८.  ICC तर्फे 'वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू'चा मान म्हणून ‘रिचेल हेहोइ फ्लिंट’ पुरस्कार------ या भारतीय क्रिकेटपटू ला मिळाला :- स्मृती मंधाना (भारत).

२९.  ICCची 'सर्वोत्तम महिला टी-20 खेळाडू' या पुरस्काराची विजेती - अलायसा हीली (ऑस्ट्रेलिया).

३०. ३० वा राष्ट्रीय रस्ते सुरक्षा आठवडा २०१९ ----------- या कालावधी मध्ये साजरा करण्यात आला:-४ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी

३१.  १ फेब्रुवारीला ------या राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘स्मार्ट खेडे मोहीम’ राबविण्यास मंजुरी देण्यात आली - पंजाब.

३२.  १८६९ वर्षी प्रथमच प्रकाशित करण्यात आलेल्या रासायनिक घटकांच्या ‘पिरियोडिक टेबलचे आंतरराष्ट्रीय वर्ष’ म्हणून संयुक्त राष्ट्रसंघ --------- हे वर्ष घोषित केले :-२०१९

३४. २०२१ मध्येICC चॅम्पियन्स करंडक आणि २०२३ वर्षाचा ICC विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात खेळली जाणार आहे :- भारत.

३५. एकदिवसीय (ODI) सामन्यात २०० एकदिवसीय सामने खेळणारी पहिली महिला क्रिकेटपटू - मिताली राज (भारत).

३६. ------या ठिकाणी ‘राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारक’ उभारण्यात आले - दांडी (जिल्हा नवसारी, गुजरात).

३७.  जागतिक बुद्धिबळातील सर्वात दिग्गज खेळाडूंपैकी एक मानल्या जाणार्या रशियाच्या -----या ग्रँडमास्टरने व्यवसायिक बुद्धिबळातून आपली निवृत्ती जाहीर केली - ब्लादिमिर क्रॅमनिक.

३८. १४ फेब्रुवारीला ‘भारत-अमेरिका CEO मंच’ याची पहिली बैठक या ठिकाणी झाली – नवी दिल्ली.

३९.  जागतिक बँकचे पुढील अध्यक्ष म्हणून अमेरिकेने -----या व्यक्तीची शिफारस केली :- डेव्हिड माल्पास.

४०. उत्तर अटलांटिक करार संघटना (NATO) याचा ३० वा सदस्य - मॅकेडोनिया.

४१. ७ फेब्रुवारीला घोषित करण्यात आलेल्या FIFAच्या ताज्या मानांकन यादीत भारतीय फुटबॉल संघाचे स्थान – १०३ वे

४२.  ईशान्य भारतातल्या राज्यांसाठी अरुणाचल प्रदेश राज्यामधील इटानगर येथे --------- या वाहिनीचा शुभारंभ केला जाणार आहे - DD अरुणप्रभा.

४३.  ईशान्य भारताच्या कोणत्या राज्यात पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन योजनेच्या अंतर्गत राज्याच्या पहिल्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले – सिक्किम.

४४. ---- देशात ‘आशिया चषक 2019’ फूटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली – संयुक्त अरब अमिरात.

४५. -------या देशाने ‘ऊसाचा रस’ याला राष्ट्रीय पेय म्हणून घोषित केले – पाकिस्तान.

४६.  २०२० या वर्षी ---- या देशात ICC ट्वेंटी-20 विश्व चषक स्पर्धा खेळली जाणार – ऑस्ट्रेलिया.

४७.  गोव्यात ---------या नदीवर बांधण्यात आलेल्या ५.१ किलोमीटर लांबीच्या ‘अटल सेतू’चे उद्घाटन करण्यात आले - मांडवी नदी (किंवा महादयी नदी).

४८. भारताच्या इंजिन नसलेल्या ‘ट्रेन 18’ याचे नवे नाव - वंदे भारत एक्सप्रेस.

अमेरिकेत जगातले सर्वात जुन्या झाडांचे अवशेष सापडले

अमेरिका या देशाच्या न्यूयॉर्क राज्यात असलेल्या कैरो गावाच्या परिसरात जगातले सर्वात जुन्या झाडांचे अवशेष सापडले आहे. हे अंदाजे 3860 लाख वर्षे जुने असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. बिंघमटन विद्यापीठ, न्यूयॉर्क स्टेट म्यूजियम आणि ब्रिटनच्या कार्डिफ विद्यापीठामधील शोधकर्त्यांनी या अवशेषांचा शोध घेतला आहे.

संशोधकांच्या मते, हे अवशेष मत्स्य युग म्हणजेच 4190 ते 3590 लाख वर्षे जुने असू शकतात. त्यावेळेसची झाडे 65 ते 70 फुट उंच होती. त्या परिसरातल्या 32000 वर्ग फूट क्षेत्रात अवशेष मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. या वनाचे जाळे शेजारचे राज्य पेंसिल्वेनिया आणि त्यापुढेही पसरल्याचे सांगितले जात आहे.

सापडलेले अवशेष डेवोनियन काळतली आहेत; तेव्हा बहुतेक जीवन पाण्याखाली होते. यापूर्वी सर्वात जुने वनक्षेत्र न्यूयॉर्क राज्यापासून 40 किलोमीटर दूर गिलबाओमध्ये आढळले होते. तेथे सापडलेल्या झाडांची मुळे 6 इंच जाड तर फांद्याची लांबी 35 फूट होती.

झारखंड भाजप पराभूत ,धनुष्यबाण चे सरकारने

◾️झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत.

◾️ विधानसभेच्या सर्व ८१ जागांचे निकाल प्रदीर्घ मतमोजणीनंतर रात्री उशिरा हाती आले असून
◾️
📌 झारखंड मुक्ती मोर्चा-
📌 काँग्रेस-
📌 राष्ट्रीय जनता दल या तीन पक्षांच्या आघाडीने ४७ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले आहे. भाजपला या निकालांत मोठा धक्का बसला असून

◾️भाजपचे संख्याबळ २५ पर्यंत घसरलेच शिवाय राज्यातील सत्ताही भाजपच्या हातून निसटली आहे.

◾️हेमंत सोरेन हे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील हे निश्चित झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल सोरेन यांचे अभिनंदन केले आहे.

◾️ तीन पक्षांच्या आघाडीने ८१ पैकी ४७ जागा जिंकल्या आहेत.

◾️ २०१४ मध्ये भाजपने ऑल झारखंड स्टुडेंट्स युनियनसोबत (आजसू) आघाडी केली होती. या आघाडीला ४२ जागांसह काठावरचे बहुमत मिळाले होते.

◾️मुख्यमंत्री रघुवर दास यांनाही विजय मिळवता आला नाही.

◾️जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार सरयू राय यांनी रघुवर दास यांचा पराभव केला.

◾️दुसरीकडे झारखंड मुक्ती मोर्चाची धुरा सांभाळणारे हेमंत सोरेन  यांनी
🔘 दुमका आणि
🔘 बरहेट या दोन्ही जागांवर दणदणीत विजय मिळवला.

◾️दोन्ही मतदारसंघांत त्यांनी भाजपच्या उमेदवारांना पराभवाची धूळ चारली.

✍ पक्षीय बलाबल:

📌 झारखंड मुक्ती मोर्चा- ३०
📌 भाजप- २५
📌 काँग्रेस- १६
📌 झारखंड विकास मोर्चा- ३
📌 आजसू- २
📌 राजद- १
📌 भाकप- १
💐 राष्ट्रवादी काँग्रेस- १
📌 अपक्ष- २

◾️ एकूण जागा- ८१

◾️ झारखंडच्या निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राप्रमाणे येथेही पुन्हा एकदा धनुष्यबाणानेच भाजपचा वेध घेतला आहे.

◾️महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपला धक्का दिला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाविकास आघाडी स्थापन करून सेनेने भाजपला सत्तेपासून दूर ठेवले तर झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाने काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलासोबत निवडणूकपूर्व आघाडी करून भाजपला सत्तेतून खाली खेचले.

◾️भाजपला लागोपाठ दोन धक्के देणाऱ्या
📌 शिवसेना 🏹 आणि
📌 झारखंड मुक्ती 🏹 मोर्चा या दोन्ही पक्षांची निशाणी धनुष्यबाण हीच आहे, हे विशेष.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

‘सतत’ योजनेला आशियाई विकास बँकेचे 2 दशलक्ष डॉलर्सचे मदत

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अखत्यारितील भारत पेट्रोलियमने ‘परवडणाऱ्या वाहतुकीसाठी शाश्वत पर्याय’ म्हणजेच ‘सतत’ या योजनेच्या प्रसारासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला होता

‘सतत’ म्हणजेच ‘Sustainable Alternative Towards Affordable Transportation’ ही योजना 15 ऑक्टोबर 2018 रोजी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सुरु केली होती. या योजनेचा प्रसार करण्यासाठी संबंधित उद्योग आणि इतर घटकांनी एकत्र येऊन आज नवी मुंबईत रोड शो आयोजित केला होता.

यावेळी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागाचे संचालक विजय शर्मा उपस्थित होते. इंधन वाचवणे ही काळाची गरज आहे. आज आपण हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढीचा सामना करत असतांना अपारंपरिक अक्षय ऊर्जा स्रोतांकडे वळायला हवे, असे शर्मा म्हणाले.

या दृष्टीने सीएनजी आणि एलपीजी हे दोन नैसर्गिक वायू इंधनाचे स्रोत आहेत, ‘सतत’ या योजनेच्या माध्यमातून आपल्याला घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करण्यासाठीच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात, असे शर्मा यांनी सांगितले. बायो गॅसच्या निर्मितीची प्रक्रियाही त्यांनी समजावून सांगितली.

स्वच्छ आणि हरित ऊर्जेचे महत्व जाणून घेत, आशियाई विकास बँकेने ‘सतत’ योजनेला 2 दशलक्ष डॉलर्सची मदत दिली आहे, असे शर्मा यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरात 67 पर्यायी ऊर्जा निर्मिती केंद्र उभारण्यात आली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली

मडगाव येथे ‘आदि महोत्सवा’ला सुरुवात

☑️रवींद्र भवन, मडगाव येथे आदिवासी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार तर्फे आयोजित ‘आदि महोत्सवा’चे काल उद्घाटन करण्यात आले. आदिवासी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत काम करणाऱ्या ‘भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ मर्यादित’ (TRIFED) या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा महासंघ आदिवासी शिल्पे, कलाकारी व इतर उत्पादने यांच्या विपणनाचे काम बघतो. या महासंघाचे अध्यक्ष रमेश चंद मीना यावेळी उपस्थित होते.

☑️रवींद्र भवन, मडगाव येथे 20 ते 30 डिसेंबर या दरम्यान हा महोत्सव सर्व गोवेकारांसाठी खुला असून, अधिकाधिक संख्येने गोवेकरांनी या महोत्सवाला भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.या महोत्सवाच्या पार्शवभूमीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये रमेश चंद मीना यांनी आपले मनोगत व्यक्त केले. देशातील आदिवासी जमातींना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर परिचित करून देणे, हा आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

☑️2011च्या जनगणनेनुसार देशातील 12 कोटी आदिवासी कुटुंबांना रोजगार मिळवून देणे, हा पंतप्रधानांचा मानस असल्याचे देखील त्यांनी यावेळी नमूद केले. पारंपरिक ज्ञान, वनौषधी यांना आधुनिक वैद्यक शास्त्रात विश्व मानव कल्याणासाठी स्थान मिळवून देणे, यासाठी महासंघ प्रयत्नशील आहे. तीन वर्षात महासंघाचा विक्री व्यवसाय 10 कोटी वरून 60 कोटी वर गेला असून, येणाऱ्या पाच वर्षात विक्री दोनशे ते पाचशे कोटी करण्याचा महासंघाचा प्रयत्न आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच महासंघ सध्या देशातील एक लाख आदिवासी बांधवांसोबत काम करत आहे, पुढील तीन वर्षांत ही संख्या 10 लाख व्हावी, अशी इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

☑️‘भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ मर्यादित’च्या दक्षिण विभागचे क्षेत्रीय व्यवस्थापक रामनाथन यांनी महासंघाच्या कामाची माहिती यावेळी दिली. महासंघ आदिवासी कलाकारांना वेळोवेळी विपणन मंच उपलब्ध करून देतो त्यासह प्रशिक्षण देखील देत असतो, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. देशभरात 120 शोरुममध्ये आदिवासी उत्पादने प्रदर्शित व विक्री केली जात आहेत. पैकी दाबोळी विमानतळावरील शोरुम त्याचाच एक भाग आहे; गोवा राज्याकडे पणजी तसेच मडगाव येथे शोरुमकरिता जागा मागितली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

☑️महोत्सवातून आदिवासींना प्रत्यक्ष ग्राहकांसोबत संवाद साधण्याची संधी मिळत असते, हे नमूद करताना ते म्हणाले की, पुढील आदी महोत्सवात गोव्यातील आदिवासी बांधवांना सामील करून घेण्यासंबंधी प्रक्रिया सुरू आहे

उपराष्ट्रपतींच्या हस्ते 23 डिसेंबरला 66व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण संपन्न

☑️अमिताभ बच्चन यांचा 50 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने होणार सन्मान

☑️प्रतिष्ठेच्या 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण काल 23 डिसेंबर 2019 ला नवी दिल्लीत एका दिमाखदार सोहळ्यात पार पडले  उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते आणि माहिती-प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहेया कार्यक्रमाला चित्रपट सृष्टीतील मान्यवरांचा आणि भारतीय सिनेसृष्टीला योगदान देणाऱ्या सर्वांचा सन्मान करण्यात आला.

☑️भारतीय चित्रपट सृष्टीचे अर्ध्वयू, पितामह अमिताभ बच्चन यांचा या 50 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. याआधी, ऑगस्ट महिन्यात, या चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती.

☑️सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार गुजराती चित्रपट हेलारो या सिनेमाला, ‘बधाई हो’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा, हिंदी चित्रपट पैडमैन ला सर्वोत्कुष्ट सामाजिक चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, उरी-द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटासाठी आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे. अंधाधून आणि उरी-द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटातील अभिनयासाठी आयुष्यमान खुराना आणि विकी कौशल यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून मिळाला आहे. कीर्ती सुरेश यांना महानती या तेलगु चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.तर पर्यावरण संवर्धनाचा विषय प्रभावीपणे मांडल्याबद्दल ‘पाणी’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गौरवले जाणार आहे

आठ महत्वपूर्ण उद्योगांचे निर्देशांक

आठ महत्वपूर्ण उद्योगांचा निर्देशांक ऑक्टोबर महिन्यात 5.8 टक्क्याने कमी होऊन 127 इतका राहिला. एप्रिल ते ऑक्टोबर 2019-20 दरम्यान एकत्रित वाढ 0.2 टक्के इतकी राहिली

✅ कोळसा ✅

ऑक्टोबर 2019 मध्ये कोळशाच्या उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 17.6 टक्क्याने घट झाली. एप्रिल ते ऑक्टोबर 2019 दरम्यान या क्षेत्राचा एकत्रित निर्देशांक गेल्यावर्षीच्या तुलनेत 5.8 टक्क्याने कमी राहिला.

✅ खनिज तेल ✅

ऑक्टोबर 2019 मध्ये खनिज तेलाच्या उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 5.1 टक्क्याने घट झाली.

✅ नैसर्गिक वायू ✅

ऑक्टोबर 2019 मध्ये नैसर्गिक वायूच्या उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 5.7 टक्क्याने घट झाली.

✅ रिफायनरी उत्पादने ✅

ऑक्टोबर 2019 मध्ये पेट्रोलियम रिफायनरी उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 0.4 टक्क्याने वाढ झाली.

✅ खते ✅

ऑक्टोबर 2019 मध्ये खतांच्या उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 11.8 टक्क्याने वाढ झाली.

✅ पोलाद ✅

ऑक्टोबर 2019 मध्ये पोलाद उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 1.6 टक्क्याने घट झाली.

✅ सिमेंट ✅

ऑक्टोबर 2019 मध्ये सिमेंटच्या उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 7.7 टक्क्याने घट झाली.

✅ वीज ✅

ऑक्टोबर 2019 मध्ये वीज निर्मितीत ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 12.4 टक्क्याने घट झाली.

नोव्हेंबर 2019 साठीच्या औद्योगिक निर्देशांक 31 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...