१९ ऑक्टोबर २०१९

मराठमोळे शरद बोबडे देशाचे नवे सरन्यायाधीश ...?

◾️ विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई पुढील महिन्यात म्हणजेच 17 नोव्हेंबरला निवृत्त होत आहे.

◾️त्यामुळे आता मराठमोळे शरद बोबडे देशाचे नवे सरन्यायाधीश होण्याची शक्यता आहे. खुद्द रंजन गोगोई यांनी केंद्र सरकारला नवे सरन्यायाधीश म्हणून एस ए बोबडे यांचं नाव सुचवलं आहे.

◾️न्यायमूर्ती बोबडे सध्या रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या विशेष पीठाचे सदस्य आहेत. याशिवाय अनेक मोठ्या निकालांमध्ये त्यांचा समावेश होता.

◾️याआधी यशवंत विष्णू चंद्रचूड हे सरन्यायाधीश होणारे पहिले मराठमोळे व्यक्ती होते. ते सर्वाधिक काळ म्हणजेच 7 वर्ष 4 महिने सरन्यायाधीश पदावर कार्यरत होते.

📌  न्यायमूर्ती शरद बोबडे यांचा
   अल्पपरिचय  💢

◾️ न्यायमूर्ती अरविंद शरद बोबडे (एस. ए. बोबडे) यांचा जन्म 24 एप्रिल, 1956 रोजी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये झाला.

◾️नागपूर विद्यापीठातून त्यांनी बीए आणि एलएलबीची पदवी घेतली.

◾️1978 मध्ये न्यायमूर्ती बोबडे यांनी बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्रमध्ये सामील झाले.

◾️ यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात कायद्याची प्रॅक्टिस केली, तर 1998 मध्ये वरिष्ठ वकील बनले.

◾️ 2000 मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर ते मध्य प्रदेश हायकोर्टाचे न्यायमूर्ती बनले.

◾️2013 मध्ये सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलं.

◾️ न्यायमूर्ती एस. ए. बोबडे 23 एप्रिल, 2021 रोजी निवृत्त होणार आहेत.

◾️ 18 नोव्हेंबर रोजी न्यायमूर्ती बोबडे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेऊ शकतात. विद्यमान सरन्यायाधीशांच्या शिफारशींना केंद्राची मंजुरी मिळाल्यानंतर प्रक्रिया सुरु होईल.

📌कोणत्या मोठ्या निकालांमध्ये न्यायमूर्ती एस ए बोबडे यांचा समावेश?

◾️ सुप्रीम कोर्टाने आधार कार्डसंदर्भात दिलेल्या आदेशात न्यायमूर्ती एस. एस. बोबडे यांचाही समावेश होता. आधार कार्डशिवाय कोणताही भारतीय नागरिक सुविधांपासून वंचित राहू शकत नाही, असं मत सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात नोंदवलं होतं. या खंडपीठात न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती चेलमेश्वर आणि न्यायमूर्ती नागप्पन यांचा समावेश होता.

◾️सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात जे लैंगिक अत्याचाराचं प्रकरण समोर आलं होतं, त्याचा तपास सुप्रीम कोर्टाचेच तीन न्यायमूर्ती करत होते. या खंडपीठात न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, एन व्ही रमण आणि इंदिरा बॅनर्जी यांचा समावेश होता.

◾️ नोव्हेंबर, 2016 मध्ये तीन मुलांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने दिल्ली-एनसीआरमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली होती. या निकालात न्यायमूर्ती एस. ए. बोबडेही सामील होते. त्याच्यासोबत या खंडपीठात तत्कालीन सरन्यायाधीश टीएस ठाकूर, न्यायमूर्ती एके सीकरी हे देखील होते.

◾️ मागील चाळीस दिवसांपासून रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणाती दररोज सुनवाणी करणाऱ्या पाच न्यायमूर्तींच्या विशेष पीठात एस ए बोबडेही सहभागी होते.

राज्य अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धा : जान्हवीला सुवर्ण

🔷वरळी येथील महाराष्ट्र रायफल संघटनेच्या नेमबाजी केंद्रावर सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात महिला गटामध्ये रायगडच्या जान्हवी खानविलकरने सुवर्णविजेती कामगिरी केली.

🔷तिने २५०.४ गुणांची कमाई केली. याच गटात रौप्य जिंकणाऱ्या पुण्याच्या नंदिता सुळने कनिष्ठ तसेच युवा गटात मात्र पहिला क्रमांक मिळवला.

🔷निकाल :१० मीटर एअर रायफल (महिला) : १. जान्हवी खानविलकर, २. नंदिता सुळ, ३. नेहा चाफेकर; १० मीटर एअर रायफल ज्युनियर (महिला) : १. नंदिता सुळ, २. भार्गवी कासार, ३. रिशिमा कानडे (पुणे); युवा गट : १. नंदिता सुळ, २. रितुल कुंडले, ३. भार्गवी कासार.

मधुकर कामथ यांची ऑडिट ब्युरो ऑफ सर्किल्सच्या अध्यक्षपदी निवड


🔰डीडीबी मुद्रा गटाचे अध्यक्ष आणि इंटरब्रँड इंडियाचे मार्गदर्शक मधुकर कामथ यांची 2019-20 साठी ऑडिट ब्युरो ऑफ सर्किल्स (एबीसी) चे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

🔰कामथ हे अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सी असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्षही राहिले आहेत.

🔰एबीसी स्थापना 1948 मध्ये झाली आहे. एबीसी चे मुख्यालय मुंबई मध्ये आहे.

🔰मधुकर कामथ हे एक्सएलआरआय, जमशेदपूर आणि चेन्नईच्या लोयोला महाविद्यालयाचे प्रतिष्ठित विद्यार्थी आहेत.

🔰त्याला जाहिरात उद्योगातील चार दशकांहून अधिक काळचा अनुभव आहे आणि त्यांनी आताच्या मुद्राने डीडीबी मुद्रा ग्रुपमध्ये पंचवीस वर्षे पूर्ण केली आहेत.

🔰एएएआय लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड श्री मधुकर कामथ यांना 6 सप्टेंबर 2019 रोजी मुंबई येथे दिला.

NITI आयोगाच्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2019’मध्ये कर्नाटक अव्वल

राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्था (NITI) आयोगाने या वर्षीचा ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2019’ प्रसिद्ध केले आहे. ही यादी तयार करण्यात इंस्टीट्यूट फॉर कॉम्पटेटिवनेस या संस्थेनी नॉलेज पार्टनर म्हणून काम केले.

- या अभ्यासात नवकल्पनात्मक शोधांसाठी वातावरण तयार करण्यासाठी भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला आहे. त्यामुळे या प्रयत्नांमध्ये येणारी आव्हाने आणि अडथळे दूर करून आर्थिक वाढीसाठी धोरणे आखण्यास मदत मिळते.

- मनुष्यबळ, गुंतवणूक, ज्ञानी कामगार, व्यवसायासाठी वातावरण, सुरक्षितता व कायदेशीर वातावरण, नॉलेज आउटपुट आणि नॉलेज डिफ्यूजन अश्या सात स्तंभावर हा अभ्यास केला गेला आहे.

▪️ठळक बाबी

- कर्नाटक हे नवकल्पनात्मक शोधाच्या क्षेत्रात भारतातले अव्वल राज्य ठरले. पायाभूत सुविधा, ज्ञानी कामगार, नॉलेज आऊटपुट आणि व्यवसायासाठी वातावरण या क्षेत्रात राज्याने सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

- शीर्ष 10 मध्ये समाविष्ट होणारी इतर राज्ये (अनुक्रमे) - तामिळनाडू, महाराष्ट्र, तेलंगणा, हरियाणा, केरळ, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात आणि आंध्रप्रदेश.

- ईशान्य व डोंगराळ राज्यांमध्ये अव्वल ठरलेले – सिक्किम राज्य. (त्यापाठोपाठ हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मणीपूर, जम्मू व काश्मीर ही अव्वल पाच राज्ये)
केंद्रशासित प्रदेश / शहर राज्ये / छोट्या राज्यांमध्ये अव्वल ठरलेले - दिल्ली. (त्यापाठोपाठ चंदिगड, गोवा, पुडूचेरी, अंडमान व निकोबार बेटे)
दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा आणि उत्तरप्रदेश ही उपलब्धतेला उपयोगी बाबींमध्ये रूपांतरित करण्यासाठी सर्वात कार्यक्षम राज्ये ठरली.

- मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्य जरी तिसर्‍या क्रमांकावर असले तरीही राज्याने नवकल्पक शोधकार्यांसाठी मनुष्यबळ, गुंतवणूक, ज्ञानी कामगार, व्यवसायासाठी वातावरण, सुरक्षितता व कायदेशीर वातावरण या क्षेत्रांमध्ये सर्वोत्कृष्ट सक्षम वातावरण बनविल्याचे आढळून आले आहे.
—————————————-——

पाकिस्तान ‘ग्रे’ लिस्टमध्ये.

◾️ दहशतवाद्यांना होणारा अर्थपुरवठा आणि हवाला व्यवहारांवर लक्ष ठेवणाऱ्या पॅरिसस्थित आर्थिक कृती पथकाने (एफटीएफ) पाकिस्तानला पुन्हा एकदा ग्रे लिस्टमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

◾️पाकिस्तानने दहशतवाद्यांना होणारा अर्थपुरवठा वेळेत रोखला नाही तर त्याला काळ्या यादीमध्ये टाकण्यात येईल, असा इशारा या संघटनेकडून देण्यात आला आहे. 

◾️‘एफटीएफ’च्या पाचदिवसीय खुल्या अधिवेशनामध्ये हा निर्णय घेण्यात आला. या संघटनेकडूनच अन्य वैश्‍विक वित्तीय संघटनांना देखील नोटीस पाठविण्यात आली असून, या संघटनांनी २०२० पर्यंत पाकिस्तानला केली जाणारी मदत थांबवावी, असा इशारा देण्यात आला.

अयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण, १५ नोव्हेंबरपूर्वी होणार अंतिम निर्णय

🅾_नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टामध्ये अयोध्या-बाबरी मशीद प्रकरणाची आज सुनावणी पूर्ण झाली. तब्बल 40 दिवस याप्रकरणी रोज सुनावणी सुरु होती, आज अंतिम सुनावणी होऊन दोन्ही पक्षांचा युक्तीवाद आज पूर्ण झाला.

🅾सुनावणी सुरु होताच एका वकिलाने अधिकची मुदत मागितली असता सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आजच सुनावणी पूर्ण होईल असं सांगता वकिलाचा हस्तक्षेप फेटाळला. कोर्टात सुनावणी सुरु असता अखिल भारतीय हिंदू महासभेचे वकील विकास सिंह यांनी सादर केलेला नकाशा ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी फाडला. राजीव धवन हे मुस्लिम पक्षाचे वकील आहेत.

🅾किशोर कुणाल यांच्या अयोध्या रिविजिटेड या पुस्तकातील हा राम मंदिराचा नकाशा होता. या नकाशाच्या मदतीने विकास सिंह त्यांचा मुद्दा मांडत असता नकाशा फाडण्यात आल्याने कोर्टात वादविवाद झाला. मध्यस्थ समितीकडून सुप्रीम कोर्टात अहवाल सादर करण्यात आला.

🅾हा खटला संवेदनशील असल्याने अयोध्येत कलम 144 लागू करण्यात आला आहे, तर 200 शाळा दोन महिने बंद राहणार आहेत. वृत्तवाहिन्यांवरील चर्चांवरही बंदी घालण्यात आली आहे. अयोध्या  17 नोव्हेंबरपूर्वी येण्याची शक्यता आहे. 23 दिवसांनी या प्रकरणाचा अंतिम निर्णय होणार आहे. सुनावणी ज्या सरन्यायाधीसांसमोर सुरु आहे त्या खंडपीठाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई हे 17 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत._

१८ ऑक्टोबर २०१९

चालू घडामोडी वन लाइनर्स, 18 ऑक्टोबर 2019.

✳ एनआयटीआय आयुोगानं 1 लेव्हल इंडिया इनोव्हेशन इंडेक्स जारी केला

✳ कर्नाटक नीती आयोगाचे इंडिया इनोव्हेशन इंडेक्स अव्वल स्थानी

✳ नितीयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये तामिळनाडू दुसर्‍या क्रमांकावर आहे

✳ नितीयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये महाराष्ट्र तिसरा क्रमांकावर आहे

✳ नितीयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये तेलंगणा चौथा क्रमांक लागतो

✳ नितीयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये हरियाणाचा पाचवा क्रमांक लागतो

✳ नितीयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये केरळ सहाव्या क्रमांकावर आहे

✳ नितीयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये उत्तर प्रदेश 7 व्या क्रमांकावर आहे

✳ नितीयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये पश्चिम बंगालचा आठवा क्रमांक लागतो

✳ नितीयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये गुजरातचा 9 वा क्रमांक आहे

✳ नीति आयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये आंध्र प्रदेश दहाव्या क्रमांकावर आहे

✳ नीति आयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये पंजाबचा ११ वा क्रमांक आहे

✳ नितीयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये ओडिशाचा 12 वा क्रमांक आहे

✳ नितीयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये राजस्थानचा 13 वा क्रमांक आहे

✳ नितीयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये मध्य प्रदेश 14 व्या क्रमांकावर आहे

✳ नीति आयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये छत्तीसगडचा 15 वा क्रमांक आहे

✳ नीति आयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये बिहारचा 16 वा क्रमांक आहे

✳ नीति आयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये झारखंडचा 17 वा क्रमांक आहे

✳ जीतन पटेल यांनी इंग्लंडचा फिरकी गोलंदाजी सल्लागार म्हणून नेमणूक केली

✳ गुस लोगीने विंडीज महिला क्रिकेट संघाचा अंतरिम मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली

✳ हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूटने हुरुन ग्लोबल युनिकॉर्न लिस्ट 2019 जाहीर केली

✳ चीनने हरुन ग्लोबल युनिकॉर्न लिस्ट 2019 मध्ये अव्वल स्थान प्राप्त केले

✳ हुरन ग्लोबल युनिकॉर्न लिस्ट 2019 मध्ये अमेरिकेचा दुसरा क्रमांक आहे

✳ हुरन ग्लोबल युनिकॉर्न लिस्ट 2019 मध्ये भारताचा तिसरा क्रमांक आहे

✳ आरसीबी क्रीडा मसाज थेरपिस्ट म्हणून नवनीता गौतम यांची नेमणूक केली

✳ आरसीबी सहाय्यक स्टाफमध्ये महिला नियुक्त करण्यासाठी पहिला आयपीएल टीम बनला

✳ व्हेनेझुएलाची निवड संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेवर झाली

✳ लिबियाची निवड संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेवर झाली

✳ ब्लू स्टार रोप्स विराट कोहलीच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त

✳ पीव्ही सिंधू, समीर, प्रणीथ क्रॅश आऊट ऑफ डेन्मार्क ओपन

✳ 2023 मध्ये पुरुषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने इंडियाने बोली लावली

✳ भारत - ओमानमधील संयुक्त विमानाचा अभ्यास "ईस्टर्न ब्रिज-व्ही"

✳ एशिया हेल्थ -2019  परिषद नवी दिल्ली येथे आयोजित

✳ मध्य प्रदेशात 10 वा राष्ट्रीय संस्कृती महोत्सव 2019 आयोजित.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 सराव प्रश्न

1) विरुध्दार्थी अर्थ लिहा. – ‘अग्रज’

   1) वंशज    2) पूर्वज      3) मनोज      4) अनुज

उत्तर :- 4

2) रिकाम्या जागी योग्य म्हण लिहा.
     काय नाही आजच्या वर्तमानपत्रात ? लेख, अग्रलेख, वृत्तांत आणि सारे काही. तरी कशाचा प्रभाव मात्र नाही. यालाच म्हणतात,
     ‘......................’

   1) बडा घर अन् पोकळ वासा        2) एक ना धड भाराभार चिंध्या
   3) गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता    4) मियाँ मूठभर दाढी हातभर

उत्तर :- 2

3) ‘अल्लाची गाय’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.

   1) अतिशय धूर्त      2) अतिशय श्रीमंत   
   3) अतिशय गरीब    4) अतिशय भाग्यवान

उत्तर :- 3

4) ‘हालअपेष्टा सहन करण्याचा गुण’ या शब्दसमूहाबद्दल समूहदर्शक शब्द कोणता ?

   1) स्थितप्रज्ञता    2) हिंमत     
   3) तितिक्षा    4) शौर्य

उत्तर :- 3

5) खालीलपैकी शुध्द  शब्द कोणते ?

   1) चिंचा, खिंड, टिंब    2) चींच, खींड, टिंब   
   3) चिंच, खिंड, टिंब    4) चींच, खींड, टींब

उत्तर :- 3

5) ‘काल मी मावळणारा सूर्य पाहिला’ या वाक्यातील ‘मावळणारा’ या विशेषणाचा प्रकार कोणता?

   1) सिध्द विशेषण    2) क्रमवाचक विशेषण    3) गुण विशेषण    4) साधित विशेषण

उत्तर :- 4

6) ‘आई त्या मुलाला हसविते’ हे उदाहरण क्रियापदाच्या कोणत्या प्रकारात मोडते ?

   1) प्रयोजक      2) शक्य      3) अनियमित    4) सहायक

उत्तर :- 1

8) क्रियाविशेषण अव्यय व त्यांचे प्रकार यांच्या जोडया लावा.

   अ) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय    1) पलीकडे
   ब) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय    2) मोजके
   क) रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय    3) क्षणोक्षणी
   ड) परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय    4) सावकाश

  अ  ब  क  ड

         1)  2  4  1  3
         2)  3  1  4  2
         3)  4  2  3  1
         4)  1  3  2  4

उत्तर :- 2

9) योग्य पर्याय निवडा.

   अ) च, देखील, ना, मात्र, पण, ही, ही शुध्द शब्दयोगी अव्यये आहेत.
   ब) शुध्द शब्दयोगी अव्यये शब्दाला जोडून येताना मागील शब्दांची सामान्यरूपे होत नाही.

   1) अ      2) ब      3) दोन्ही      4) दोन्ही नाही

उत्तर :- 3

10) दोन नामे, वाक्ये किंवा एकवर्गीय शब्द जोडणा-या शब्दाला कोणते अव्यय म्हणतात ?

   1) उभयान्वयी अव्यय    2) शब्दयोगी अव्यय   
   3) केवलप्रयोगी अव्यय    4) क्रियाविशेषण अव्यय

उत्तर :- 1

महाराष्ट्राची विधानपरिदषद

- भारत सरकार कायदा 1935 नुसार 1937 मध्ये विधानपरिषद अस्तित्वात आली.
- परीषदेची पहिली बैठक 20 जुलै 1937 रोजी पुण्याच्या कौन्सिल हाॅलमध्ये पार पडली.
- 1960 पासून हिवाळी अधिवेशन (ऑक्टो नोव्हें) नागपूर येथे होते.
- 1987 मध्ये परीषदेला 50 वर्षे पूर्ण झाली, सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला.
- 2000 पासून 22 जुलै हा दिवस महाराष्ट्र विधानपरिषदेचा वर्धापनदिन म्हणून साजरा केला जातो.
---------------------------------------
● सदस्य संख्या

- 1937 मध्ये 29, 1957 मध्ये 108 करण्यात आली तर वेगळ्या महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ही सदस्य संख्या 78 करण्यात आली. यापैकी -
30 सदस्य विधानसभा सदस्यांद्वारे
22 सदस्य स्थानिक प्राधिकारी संस्थांद्वारे
07 सदस्य पदवीधर आणि शिक्षकांद्वारे
12 सदस्य राज्यपालांद्वारे निवडले जातात.
- गणपूर्तीसाठी कमीत कमी 10 सदस्य उपस्थित असणे आवश्यक आहे.
--------------------------------------
● सभापती

- पहिले सभापती: मंगलदास मच्छाराम पक्वासा (22 जुलै 1937 ते 16 ऑगस्ट 1947)
- सध्या: रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर
- आजपर्यंत एकही महिला सभापती झाली नाही.
----------------------------------------
● उपसभापती

- पहिले उपसभापती: आर. जी. सोमण (22 जुलै 1937 ते 16 ऑक्टोबर 1947)
- पहिल्या महिला उपसभापती: जे. टी. सिपाहिमलानी (19 ऑगस्ट 1955 ते 24 एप्रिल 1962)
- सध्या: नीलम गोर्हे

"प्रेरणा घ्या नावलौकिक केलेल्या व्यक्तींच्या, ज्यांच्या हाती फक्त शुन्य होते..."

🌸 *शेक्सपिअर* 🌸
खाटीकखान्यात नोकरी करत होते. रात्री नाट्यगृहाच्या आवारात घोडागाडी सांभळता सांभळता एका नाटककाराचा जन्म झाला..

🌸 *ग. दि. माडगूळकर* 🌸
मँट्रिक नापास झाल्यावर उदबत्त्या विकल्या. अनवाणी आयुष्य जगले. त्यांनी गीतरामायण रचले

🌸 *सुधिर फडके*🌸
चहा भाजीचा व्यापार करत होते .प्रारंभीच्या काळात त्यांना पोटासाठी वाद्य विकावी लागली .
भटकंतीतून त्यांना सुर शोधला. ते गायक झाले, संगीतकार झाले ....

🌸 *नीळू फुले* 🌸
पुण्याला काँलेमध्ये अकरा वर्षे माळी होते. झाडांची निगराणी करता करता ते राष्ट्रसेवादलाच्या पथकात सामील झाले. नटसम्राट निळू फुले महाराष्ट्राला माहीत झाले...

🌸 *विष्णूपंत छञे* 🌸
घोड्याच्या पागांमध्ये चाबूकस्वार म्हणून तीन रुपये पगारावर नोकरी करत असताना स्वताःच स्वताःचा मार्ग शोधला. भारतातील पहिली ग्रेट सर्कस निर्माण केली ...

🌸 *दारा सिंग* 🌸
पंजाबमधल्या एका सामान्य खेड्यात आखाड्यात कुस्ती खेळत होते. रानात गुरं चरायला जात होते. गुरांना सांभाळता सांभाळता कुस्तीची आवड निर्माण झाली. जगभर कुस्त्या जिंकल्या. चित्रपटात कामे केली.  राज्यसभेत खासदार म्हणून जाताना मनात एकच भावना होती , एका खेडेगावात आखाड्यात कुस्ती खेळणारा मुलगा खासदार झाला...

🌸 *कर्मवीर भाऊराव पाटिल* 🌸
कंदिल आणि नांगराचे विक्रेते होते. कंदिल नांगर विकता विकता त्यांनी रयत शिक्षण संस्था निर्माण केली ....

🌸 *ग्रेटा गार्बो*🌸
गरीब शेतकऱ्याच्या घरात जन्म झाला. तेराव्या वर्षी गरीबीमुळे शाळा सोडावी लागली. दुकानात सेल्सगर्ल म्हणून नोकरी करत असताना अचानक हाँलीवुडचे दरवाजे उघडले ....

🌸 *चार्ली चँपलिन* 🌸
प्रचंड गरिबी अनुभवली विद्यार्थीदशेत फुले विकण्यापासुन अनेक कामे केली. आपल्या विनोदाने जगभरच्या लोंकाना हसवले...

🌸 *सुशीलकुमार शिंदे* 🌸
सोलापूरला कोर्टात शिपाई होते.
कोर्टाच्या आवारात त्यांनी आयुष्याचा अर्थ शोधला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले....

🌸 *लक्ष्मणनराव किर्लोस्कर* 🌸
दहा वर्षे ड्राईंग टिचर होते. त्यांनी नांगराचा कारखाना निर्माण केला ..

🌸 *यशवंतराव गडाख*🌸
अहमदनगर जिल्ह्यात घोडेगावला शिक्षक होते. मुलांना फळ्यावर मुळाक्षर शिकवता शिकवता त्यांनी शाळेच्या बाहेरचे जग बघितले वयाच्या पंचविशीत सोनाईला मुळा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली ....

🌸 *धिरुभाई अंबानी* 🌸
वडिल प्राथमिक शिक्षक होते. सासरे पोस्टमन होते. भाऊ रेशनिंग आँफिसात नोकरीला होता. स्वताः ते पेट्रोल पंपावर क्लार्क म्हणून तीनशे रुपये पगारावर नोकरी करत होते.
अशा वातावरणात स्वतःचे औद्योगिक साम्राज्य निर्माण केले ....

🌸 *स्टीव्ह जाँब्स*🌸
कोकच्या रिकाम्या बाटल्या विकून जेवणासाठी पैसे मिळवावे लागले. जगातल्या मोठ्या काँम्प्युटर कंपन्यापैकी एक "अँपल"
ची स्थापना केली....

🌸 *सुनील दत्त* 🌸
रेडिओ सिलोनवर अभिनेत्यांच्या मुलाखती घेत असतानाच चित्रपट सृष्टीत प्रवेश झाला. अभिनेता व राजकारणी म्हणून समृद्ध आयुष्य जगले....

🌸 *जाँनी वाँकर* 🌸
बस कंडक्टर होता. प्रवाशांची तिकीटे फाडता फाडता त्याच्या सिनेमाची तिकिटे लोंकानी घ्यायला सुरुवात केली. एका तिकीटाचा प्रवास दुसऱ्या तिकीटावर स्थीरावला....

"या सर्व मोठ्या माणसांच्या हाती शुन्य होते . त्यांनी अथक परिश्रमाने शुन्यातून विश्व निर्माण केले. अनवाणी आयुष्याला आकार दिला, परिस्थितीशी झगडत संघर्ष करणाऱ्या माणसापुढे आदर्श ठेवला .. 
तुम्हीसुध्दा शुन्य असताना स्वताःचे स्वतंत्र व्यक्तीमत्व निर्माण करु शकता....."

*"आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामकरा नाहीतर..?*
*दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल"..!*

   *धन्यवाद..!!

चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे दि:- 18/10/2019 शुक्रवार

1. आयुष्यमान भारत योजना संपूर्ण भारतात कधी लागू करण्यात आली आहे?
-- 25 सप्टेंबर 2018 पासून

2. भगतसिंग कोशारी हे महाराष्ट्र चे कितवे राज्यपाल आहे?
-- 19 वे ( 18 वे विद्यासागर राव )

3. 2000 हजार धावा ( फास्ट धावा )  पूर्ण करणारा पहिला भारतीय खेळाडू कोणता ?
-- मिताली राज

4. जल धोरण तयार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
-- महाराष्ट्र

5. " ऑर्डर ऑफ दि सेट अँड्रूअ अ पोस्टल " हा पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार कोणत्या देशाकडून मिळालेला आहे ?
-- रशिया

6. मैत्री 2019 हा युद्ध सराव कोणत्या दोन देशामध्ये पार पडला ?
-- भारत×थायलंड

7. भारताचे रॉकेट मॅन कोणाला म्हणतात?
-- डॉ.के.वि. सिवन

8. ई - सिगारेट वर बंदी घालणारे प्रथम राज्य कोणते?
-- पंजाब

9. किरण बेदी कोणत्या राज्याच्या राज्यपाल आहेत?
-- पद्दुचेरी

10. कोणत्या राज्याची विधान परिषद 31 ऑक्टोबर 2019 ला बरखास्त करण्यात येणार आहे ?
-- जम्मू काश्मीर ( कलम 370 रद्द )

स्टार्टअप इंडिया योजनेंतर्गत गेल्या चार वर्षात देशभरात १९ हजार ३५१ स्टार्टअप

*⃣ उद्योगांची नोंदणी झाली असून सर्वाधिक ३ हजार ६६१ स्टार्टअप उद्योगांची नोंदणी महाराष्ट्रात झाली.

*⃣ देशातील राज्यांमध्ये स्टार्टअप उद्योगात झालेल्या वैकल्पिक गुंतवणुकीतही या योजनेंतर्गत महाराष्ट्राने आघाडी घेत दुसरा क्रमांक मिळवला आहे.

*⃣ केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालयाच्यावतीने १६ जानेवारी २०१६ पासून देशभरात “ स्टार्टअप इंडिया ” योजनेची अंमलबजावणी सुरु झाली.

*⃣ केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग व देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने २४ जून २०१९ रोजी राज्यनिहाय स्टार्टअप उद्योगांची यादी जाहिर करण्यात आली.

*⃣ या यादीत देशातील २९ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांची आकडेवारी जाहिर करण्यात आली असून ३ हजार ६६१ स्टार्टअप उद्योगासह महाराष्ट्र प्रथम स्थानावर आहे.

*⃣ महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक (२,८४७), दिल्ली (२,५५२) उत्तरप्रदेश (१,५६६) तर १ हजार ८० स्टार्टअपसह तेलंगना पाचव्या स्थानावर आहे.

जम्मू-काश्मीर राज्यातील विधानपरिषद बरखास्त

●जम्मू-काश्मीरला केंद्रशासित दर्जा दिल्यानंतर 31 ऑक्टोबरला जम्मू-विधानपरिषद बरखास्त केली जाणार आहे.

●जम्मू-काश्मीर विधानपरिषदेत 36 सदस्य होते.

🔰 सध्या भारतात 6 राज्यात विधानपरिषद अस्तित्वात
1. उत्तरप्रदेश - 100 सदस्य
2. महाराष्ट्र - 78 सदस्य
3. तेलंगणा - 40 सदस्य
4. कर्नाटक - 75 सदस्य
5. बिहार - 75 सदस्य
6. आंध्रप्रदेश - 58 सदस्य

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...