२७ सप्टेंबर २०१९

आशियाई वयोगट जलतरण स्पर्धा : भारताच्या संघाला रीलेमध्ये सुवर्ण

👉आशियाई वयोगट जलतरण स्पर्धेत श्रीहरी नटराज, आनंद अनिलकुमार, साजन प्रकाश आणि वीरधवल खाडे यांनी ४ बाय १०० मीटर पुरुषांच्या फ्रीस्टाइल रीले प्रकारात सुवर्णपदक जिंकून भारताचे खाते उघडले.भारतीय संघाने ३:२३.७२ सेकंद अशी वेळ नोंदवत जेतेपद पटकावले. पाच सेकंदांच्या फरकामुळे रौप्यपदक जिंकणाऱ्या इराणच्या संघाने ३:२८.४६ सेकंद अशी वेळ नोंदवली, तर तिसऱ्या स्थानावरील उझबेकिस्तानच्या संघाने ३:३०.५९ सेकंद वेळेत शर्यत पूर्ण केली.

👉महिलांच्या ४ बाय १०० मीटर रीले प्रकारात भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. रुजूता खाडे (५९.८३ सेकंद), दिव्या सतिजा (१:०१.६१ सेकंद), शिवानी कटारिया (५९.५७ सेकंद) आणि माना पटेल (५९.७५ सेकंद) यांचा भारतीय संघात समावेश होता.

👉गट-दोन मुलांच्यांमध्येसुद्धा भारतीय संघाला ४ बाय १०० मीटर रीले प्रकारात रौप्यपदक मिळले. वेदांत माधवन, उत्कर्ष पाटील, साहिल लष्कर आणि शोआन गांगुली यांचा समावेश असलेल्या संघाने ३:४१.४९ सेकंद अशी वेळ नोंदवली.

🌹🌳🌴कुशाग्रला दुहेरी सुवर्ण🌴🌳🌹

👉भारताच्या कुशाग्र रावतने दोन सुवर्णपदकांची कमाई केली.

👉पुरुषांच्या २०० मीटर प्रकारात रावतने १:५२.३० सेकंदांनिशी सुवर्णपदक जिंकले, तर आनंद अनिलकुमारने १:५२.१९ सेकंदांसह कांस्यपदक पटकावले. सिरियाच्या अब्बास ओमरला कांस्यपदक मिळाले.

👉आणि नंतर  ८०० मीटर स्पर्धेत कुशाग्रने ८:१०.०५ सेकंदांसह सुवर्णपदकावर नाव कोरले.

लष्करप्रमुख आज CCSचा पदभार स्वीकारणार

👉भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत हे आज 'चीफ ऑफ स्टाफ कमेटी'च्या (CCS) अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.

👉या पदाची जबाबदारी स्वीकारण्याची ही अखेरची वेळ असणार आहे.

👉कारण, मोदी सरकारने नुकतीच चीफ ऑफ संरक्षण स्टाफ (सीडीएस) पदाची स्थापणा करणार असल्याची घोषणा केली होती.

👉बीपीन रावत हे आज हवाई दलप्रमुख बी. एस. धनोआ यांच्याकडून पदाचा कार्यभार स्वीकारतील.

👉हवाईदल प्रमुख बी. एस. धनोआ यांची मे २०१९ रोजी चीफ ऑफ स्टाफ कमेटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

👉नौदलप्रमुख सुनील लांबा हे निवृत्त झाल्यानंतर धनोआ यांनी त्यांच्याकडून पदाचा कार्यभार स्वीकारला होता.

👉चीफ ऑफ स्टाफ कमेटीच्या सदस्यांत लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या प्रमुखांचा समावेश असतो. वरिष्ठ अध्यक्षांची या पदावर नियुक्ती करण्यात येते.

👉तिन्ही सैन्य दलात समन्वय करण्याचे काम तसेच देशावर बाहेरील संकटाचा सामना करण्यासाठी रणनिती तयार करण्याची जबाबदारी चीफ ऑफ स्टाफ कमेटीच्या अध्यक्षांवर असते.

२३ वर्षांच्या मेहनतीनंतर वैज्ञानिकांनी शोधलं ‘लाल भेंडी’चं नवं वाण


👉भारतामधील कृषी संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांना एक मोठे यश मिळाले आहे. जवळजवळ २३ वर्षांच्या मेहनतीनंतर भारतीय वैज्ञानिकांनी भेंडीचा नवा वाण तयार करण्यात यश मिळाले आहे.

👉भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेच्या (आयआयव्हीआर) वैज्ञानिकांना हे यश मिळाले आहे. विशेष म्हणजे या भेंडीचा रंग लाल आहे. याच लाल रंगामुळे भेंडीचे नाव 'काशी लालिमा' असं ठेवण्यात आलं आहे.

👉उत्तर प्रदेशमधील वाराणसीतील भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेला भेंडीचे नवे वाण शोधण्यात आलेले यश हे अनेक अर्थांने महत्वाचे आहे.

👉या नव्या प्रजातीच्या भेंडीमध्ये अँटीऑक्सिडंट, लोह आणि कॅल्शियमचे प्रमाण अधिक आहे. सामान्य भेंडीपेक्षा या भेंडीची किंमत अधिक असणार आहे. ही भेंडी सुरुवातील सामान्यांना शंभर ते पाचशे रुपये किलो दराने उपलब्ध होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

👉भारतामध्ये पारंपारिक हिरव्या भेंडीचे उत्पादन घेतले जाते. लाल रंगाची भेंडी सध्या पश्चिमात्य देशांमध्ये पिकवली जाते.

👉भारतामध्ये काही प्रमाणात या भेंडीची आयात केली जाते. मात्र आता भारतीय वैज्ञानिकांनी या भेंडीचा नवा वाण शोधून काढल्याने आता या भेंडीचे देशातच उत्पादन घेणे शक्य होणार आहे.

👉'आयआयव्हीआर'मध्ये १९९५-९६ पासून या भेंडीसंदर्भात संशोधन सुरु होते. मात्र २३ वर्षांनंतर या प्रयत्नांना यश मिळाले आहे. या भेंडीचे बियाने डिसेंबर महिन्यांपासून शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन नियमांत बदल

👉१ ऑक्टोबर २०१९ पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमधील बदलांचा हा नवा नियम लागू होणार आहे.

👉केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन नियमांमध्ये काही महत्वपूर्ण बदल केले असून याचा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना कुटुंबियांना होणार आहे. सरकारने केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम, १९७२ मधील ५४ व्या नियमांत बदल केला आहे. त्यामुळे सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या फॅमिली पेन्शनमध्ये वाढ होणार आहे. १ ऑक्टोबर २०१९ पासून हा नवा नियम लागू होणार आहे.

👉यापूर्वी, सरकारी सेवेत असताना सात वर्षापेक्षा कमी कालावधीत जर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला ३० टक्के फॅमिली पेन्शन मिळत होती. म्हणजेच कर्मचाऱ्याला कमीत कमी ७ वर्षांची सेवा पूर्ण करणे अनिवार्य होते, त्यानंतरच त्याच्या कुटुंबाला ५० टक्के पेन्शनचा फायदा मिळत होता. मात्र, आता नव्या बदलानुसार, ती ५० टक्के करण्यात आली आहे. ही पेन्शन संबंधीत कर्मचाऱ्याच्या शेवटच्या वेतनाच्या ५० टक्के असेल. सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नींच्या हिताच्या दृष्टीने सरकारने हा निर्णय घेतला आहे, फायनान्शिअल एक्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

👉केंद्र सरकारने केलेल्या बदलानुसार, जर कोणत्याही केंद्रीय कर्मचाऱ्याचा १ ऑक्टोबर २०१९ पूर्वी १० वर्षांत मृत्यू झाला असेल तर त्याच्या कुटुंबाला वाढीव पेन्शनचा फायदा मिळेल. यासाठी ७ वर्षांच्या सेवेची अट रद्द करण्यात आली आहे. तसेच ही फॅमिली पेन्शन मिळवण्यासाठी कुटुंबियांना इतरही काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे. तसेच कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या विभाग प्रमुखांच्या सहीनंतरच ग्रॅच्युटीची रक्कम निश्चित केली जाणार आहे.

👉याबाबत स्पष्टीकरण देताना केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाने म्हटले की, केंद्रीय सेवेत रुजू झाल्यानंतर करिअरच्या कमी कालावधीत जर एखादा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना वाढीव दराने फॅमिली पेन्शनचा लाभ मिळू शकत नव्हता. मात्र, आता नव्या बदलामुळे अशा परिस्थितीत संबंधित कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे.

मतदानाबाबत जनजागृतीसाठी माधुरी दीक्षित सदिच्छादूत

👉विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी ‘चला मतदान करू या’ असे आवाहन करीत अभिनेत्री माधुरी दीक्षित, महाराष्ट्र भूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवत जनजागृतीच्या प्रचारात उतरले आहेत.

👉लोकसभा निवडणुकीत अन्य राज्यांच्या तुलनेत राज्यातील मतदानाची टक्केवारी कमी होती. त्याचप्रमाणे सन २०१४च्या विधानसभा निवडणुकीतही राज्यात ६०.३२ टक्के मतदान झाले होते, तर लोकसभा निवडणुकीत ६०.७९ मतदान झाले होते.

👉या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने राज्यभर मतदारजागृती उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

👉राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित, पद्मभूषण आणि महाराष्ट्रभूषण सन्मानित अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, डॉ. निशिगंधा वाड,  उषा जाधव, क्रिकेटपटू स्मृती मानधना, अर्जुन पुरस्कारविजेती धावपटू ललिता बाबर, जलतरणपटू वीरधवल खाडे, नेमबाज राही सरनोबत, तृतीयपंथी कार्यकर्त्यां गौरी सावंत, दिव्यांग कार्यकर्ता नीलेश सिंगीत यांचा यामध्ये समावेश आहे. चित्रफितीच्या माध्यमातून लोकशाही प्रक्रिया आणि देशाच्या विकासात जागरूक मतदारांच्या भूमिकेचे महत्त्व हे सदिच्छादूत समजावून सांगणार आहेत.

माजी फ्रान्सचे अध्यक्ष जॅक चिरॅक याचे निधन.

◾️ जॅक चिरॅक याचे 26 सप्टेंबर 2019 रोजी निधन झाले.

◾️ जॅक चिरॅक यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1932 रोजी झाला.

◾️ चिरॅक दोन वेळा अध्यक्ष म्हणून काम करत होते.

◾️ चिराक हे 17 मे 1995 ते 16 मे 2007 पर्यंत राज्याचे प्रमुख होते.

◾️ यापूर्वी ते 1974 ते 1976 आणि 1986 ते 1988 पर्यंत फ्रान्सचे पंतप्रधान होते.

◾️ तसेच 1977 ते 1995 पर्यंत ते पॅरिसचे महापौर होते.

                  🎇  फ्रान्स  🎇

◾️ अध्यक्ष: इमॅन्युएल मॅक्रॉन

◾️ पंतप्रधान: इडोवर्ड फिलिप

◾️ राजधानी: पॅरिस

◾️ चलन: युरो (€)

◾️ राष्ट्रीय भाषा: फ्रेंच

२६ सप्टेंबर २०१९

मराठी महत्त्वाचे प्रश्न उत्तरे 26/9/2019


१) केलेले असेल या क्रियापदाचा काळ सांगा?

➡️पूर्ण भविष्यकाळ

२)त्याने आंबा खाल्ला होता.- या वाक्याचा काळ सांगा ?

➡️पूर्ण भूतकाळ

३)मी आंबा खाईन या वाक्याचे साध्या वर्तमान काळाचे रूप सांगा ?

➡️ मी आंबा खातो

४) भूतकाळाचे एकूण किती प्रकार आहेत ?

➡️ चार

५)'धु' या धातू चे भूतकाळी रूप कोणते ?

➡️ धुतला

६)जेव्हा एखाद्या क्रियापदावरून कोणतीही प्रिया एखाद्या काळात नेहमी घडण्याची रीत आहे असा अर्थ व्यक्त होतो तेव्हा त्या काळाला..…..... म्हणतात.

➡️ रिति काळ

७)समर्थ रामदास म्हणतात 'जगी सर्व सुखी असा कोण आहे'.- या वाक्याचा काळ सांगा ?

➡️ वर्तमान काळ

८)मी खेळायला जात होतो या वाक्याचा रीती भूतकाळ कसा होईल ?

➡️मी खेळायला जात असे

९)पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ ओळखा ?

➡️वर्तमानकाळ

१०)खाल्ला होता -या संयुक्त क्रियापदावरून काळाचा कोणता प्रकार तयार होईल ?

➡️पूर्ण भूतकाळ

११)बाबांनी सायकल विकत घेतली होती. या वाक्यातील काळ सांगा ?

➡️पूर्ण भूतकाळ

12)सुर पारंब्यांचा खेळ अलीकडे कुठे दिसला नाही -या वाक्याचा काळ सांगा?

➡️ भूतकाळ

१३) सहलीला जाणार म्हणून तो आनंदाने झोपला होता  - या वाक्याचा काळ कोणता ?

➡️ पूर्ण भूतकाळ

१४) परवा एव्हाना आम्ही सातार्‍याला जात असू -या वाक्याचा काळ सांगा ?

➡️ चालू भविष्यकाळ

१५) प्रजेवर अन्याय झाला होता- या वाक्याचा काळ सांगा ?

➡️ भूतकाळ

१६) आई देवपूजा करीत असेल या वाक्याचा काळ सांगा ?

➡️अपूर्ण भविष्यकाळ

१७) राम सिनेमा पाहतो आहे -वाक्याचा काळ सांगा ?

➡️वर्तमान काळ

१८)त्याचे सांगून झाले आहे वाक्याचा काळ सांगा ?

➡️पूर्ण वर्तमान

१९)उद्या ते येतील या वाक्याचा काळ ओळखा ?

➡️साधा भविष्यकाळ

२०)  मी निबंध लिहितो या वाक्याचा भूतकाळ सांगा ?

➡️मी निबंध लिहिला

२१)  लिहीला, बसला ,होता ,पळाली ,ही क्रियापदाची रूपे कोणत्या काळातील आहेत ?

➡️भूतकाळ

२२)तानाजी शौर्याने लढला -या वाक्याचा काळ ओळखा ?

➡️साधा भूतकाळ

२३) वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून क्रिया कोणत्या वेळी घडते आहे याचा बोध होतो त्याला काय म्हणतात ?

➡️ काळ

२४)क्रिया आता घडत आहे हे जेव्हा क्रियापदाचा रूपावरून कळते तेव्हा कोणता काळ होतो ?

➡️ वर्तमान

२५)वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियांचा बोध होतो तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध होतो त्याला काय म्हणतात ?

➡️काळ

बॉक्सिंगमध्ये विश्वविजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय 'अमीत पंघाल'


✍५२ किलोगटाच्या अंतिम लढतीत उझबेकिस्तानच्या आलिम्पिक विजेत्या शाखोबिदीन झोईरोव्ह याने त्याला ५-० अशी मात दिली. रशियातील एकाटेरिनबर्ग येथे स्पर्धा खेळली गेली.

✍या स्पर्धेच्या इतिहासात रौप्यपदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय बॉक्सर ठरला आहे. यापूर्वी भारताने या स्पर्धेत पाच पदके जिंकली आहेत पण ती पाचही कास्यपदके आहेत.

✍यंदाच मनिष कौशिकने जिंकलेल्या कास्यपदकाचाही समावेश आहे आमि मनिष व अमीतच्या यशासह भारताने प्रथमच जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत एकाच वर्षी दोन पदके जिंकण्याची कामगिरी केली आहे.

✍झोईराव्हला या लढतीत पंचांनी ३०-२७, ३०-२७, २९-२८, २९-२८ आणि २९-२८ अशा गुणांनी विजयी घोषित केले.

✍अमीत पंघाल ५-० अशा पराभूत असा दिसत असल्याने लढत एकतर्फी वाटत असली तरी प्रत्यक्षात मात्र अमीतने आलिम्पिक विजेत्याला जोरदार प्रतिकार दिला होता आणि तोडीस तोड लढत झाल्याचे दिसते. विशेषत: दंसऱ्या व तिसऱ्या फेरीत पंघाल प्रभावी दिसलापण पहिल्या फेरीने त्याचा घात केला.

मधुकर कामथ यांची ऑडिट ब्युरो ऑफ सर्किल्सच्या अध्यक्षपदी निवड


🌷डीडीबी मुद्रा गटाचे अध्यक्ष आणि इंटरब्रँड इंडियाचे मार्गदर्शक मधुकर कामथ यांची 2019-20 साठी ऑडिट ब्युरो ऑफ सर्किल्स (एबीसी) चे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. 

🌷कामथ हे अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सी असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्षही राहिले आहेत. 

🌷एबीसी स्थापना 1948 मध्ये झाली आहे

🌷 एबीसी चे मुख्यालय मुंबई मध्ये आहे

मोदींनी परदेश दौरे करण्यापेक्षा मायदेशात थांबून अर्थव्यवस्था सावरावी; ‘फोर्ब्स’मधून टीका

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मायदेशात थांबून भारताच्या गोंधळलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचे प्रयत्न करायला हवेत असा टोला ‘फोर्ब्स’मधून लगावण्यात आला आहे. ‘परदेशातील भारतीयांना देशात सगळं ठिक आहे असं सांगत फिरण्याऐवजी मोदींनी देशात थांबून विविध घटकांमधील लोकांमध्ये वाढणारी दरी कमी करण्यासाठी प्रयत्न कराला हवेत,’ असंही ‘फोर्ब्स’च्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेल्या ‘मोदी शूड स्पेण्ड मोअर टाइम अॅट होम’ या लेखात म्हटले आहे.

कोलंबिया विद्यापिठामधील अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक असणाऱ्या पॅनोस मॉर्डोकोउटास यांनी ‘फोर्ब्स’च्या वेबसाईटवर मोदींच्या अमेरिकेच्या दौऱ्याला सुरुवात करण्याआधी मोदी सरकारच्या धोरणांचा लेखाजोखा मांडणारा लेख लिहिला आहे.

‘एकीकडे मोदी रशियापासून अमेरिकेपर्यंत जगातील सर्वात शक्तीशाली नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत तर दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठी पडझड झाल्याचे चित्र दिसत आहे. मागील काही वर्षांमध्ये भारताचा जीडीपी ८ टक्क्यांवरुन ५ टक्क्यांपर्यंत पडला आहे,’ असं या लेखामध्ये पॅनोस यांनी म्हटलं आहे.

मूकनायक 🌺

🌿डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इ.स. १९२० साली समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक होते. ३१ जानेवारी १९२० रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. हे पाक्षिक मुंबईहून निघत असे.

🔶पांडुरंग नंदराम भटकर नावाच्या महार जातीच्या शिक्षित तरुणाने या पाक्षिकाचे संपादक केले. कारण आंबेडकर हे सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करीत होते. त्यामुळे त्यांना उघडपणे संपादकपदावर कार्य करणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी मूकनायकाच्या व्यवस्थापकपदी ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांची नेमणूक केली होती. पहिल्या अंकातील 'मनोगत' नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी स्वतः लिहिला होता. पुढील तेरा अंकातही त्यांनी लेख लिहिले. मूकनायकासाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी २,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली होती.

🌿आंबेडकरांनी मूकनायक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले, कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा किंवा लोकभाषा होती आणि बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र (कर्मभूमी) महाराष्ट्र होते. तसेच तेव्हा महाराष्ट्रातील दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीच समजू शकत होती.

🔶या पाक्षिकाचा मुख्य उद्देश दलित, गरीब व शोषित लोकांच्या व्यथा त्यांचा आवाज सरकारपर्यंत आणि इतर जनतेपर्यंत पोहचवणे हा होता. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखांमधून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायावर प्रकाश टाकून त्या समाजाच्या उन्नतीसाठी तत्कालिन ब्रिटिश सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. अस्पृश्यांचा उद्धार किंवा विकास होण्यासाठी अस्पृश्यांनी राजकिय सत्ता व शैक्षणिक ज्ञान मिळवणे गरजेचे आहे, असे त्यांना नेहमी वाटत असे.

🌿 ५ जुलै १९२० रोजी आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले. त्यानंतर ३१ जुलै १९२० पासून मूकनायकाचे संपादक पद ज्ञानेश्वर ध्रुवनाथ घोलप यांच्याकडे आले.

🔶सध्या मूकनायकाचे १९ अंक उपलब्ध आहेत. त्यांत आंबेडकरांनी वैचारिक लिखाण केले.

🌿 मूकनायक या पत्राने सामाजिक व धार्मिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रातही अस्पृश्यांनी बलवत्तर स्थान निर्माण केले पाहिजे ही जाणीव निर्माण केली. 'मूकनायक' पत्रात विविध विचार, वर्तमानसार, निवडक पत्रातील उतारे, क्षेम, समाचार, कुशल प्रश्न, शेला पागोटे ही सदरे होती. 'मूकनायक' एप्रिल १९२३ मधे बंद पडले.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) खालीलपैकी किती संमतिदर्शक अव्यये आहे.

     हां, जी, जीहां, ठीक, बराय, हाँ, अच्छा

   1) सर्व      2) सहा      3) पाच      4) चार
उत्तर :- 1

2) ‘मी निबंध लिहीत असे’ या वाक्यातील काळ ओळखा.

   1) अपूर्ण भूतकाळ    2) रीती वर्तमानकाळ 
   3) रीती भूतकाळ    4) रीती भविष्यकाळ

उत्तर :- 3

3) “हंस” या शब्दाचा विरुध्दलिंगी शब्द शोधा.

   1) हंसी    2) हंसा      3) हंसीण      4) हंसीका

उत्तर :- 1

4) रामाहून गोविंदा मोठा आहे.

     अधोरेखित शब्दातील विभक्ती प्रत्ययाचा कारकार्थ खालीलपैकी कोणता आहे ?

   1) कर्ता    2) संप्रदान    3) अपादान    4) करण

उत्तर :- 3

5) वाक्यप्रकार ओळखा.
     आई वडिलांचा मान राखावा.

   1) आज्ञार्थी    2) विध्यर्थी   
   3) संकेतार्थी    4) वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर :- 2

6) ‘पुस्तक’ हा शब्द मराठीत कोणत्या लिंगात वापरतात?

   1) नपुंसकलिंग      2) पुल्लिंग   
   3) स्त्रीलिंगी      4) पुल्लिंग व स्त्रीलिंग

उत्तर :- 1

7) स, ला, ते-स, ला, ना, ते, हे कोणत्या दोन विभक्तींचे प्रकार आहेत ?

   1) प्रथमा व व्दितीया    2) व्दितीया व चतुर्थी 
   3) व्दितीया व तृतीया    4) व्दितीया व सप्तमी

उत्तर :- 2

8) ‘गुलाबाची फुले वेगवेगळया रंगाची असतात’ ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?

   1) केवल वाक्य      2) संयुक्त वाक्य   
   3) मिश्र वाक्य      4) प्रश्नार्थी वाक्य

उत्तर :- 1

9) ‘अशा प्रकारचे अनेक विचार आकाशातील सृष्टीचे सौंदर्य पाहून त्याचे मनन करणा-याच्या मनात येतील’ या वाक्यातील
     ‘विधेयविस्तार’ ओळखा.

   1) विचार    2) अशा प्रकारचे अनेक
   3) येतील    4) आकाशातील सृष्टीचे सौंदर्य पाहून त्याचे मनन करणा-याच्या मनात

उत्तर :- 4

10) माझ्याकडून कॉफी घेतली गेली, प्रयोग ओळखा.

   1) कर्मणी प्रयोग      2) भावे प्रयोग   
   3) कर्तरी प्रयोग      4) संकीर्ण प्रयोग

उत्तर :- 1

परदेशी विद्यार्थ्यांत नेपाळ आघाडीवर

🔰परदेशी विद्यार्थ्यांकडून उच्च शिक्षणासाठी सर्वाधिक पसंती कर्नाटक राज्याला मिळत असून

🔰नेपाळ आणि अफगाणिस्तानमधूनही मोठ्या प्रमाणात परदेशी विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी भारतात येत आहेत, अशी माहिती मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिली आहे.

🔰परदेशातून उच्चशिक्षणासाठी भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांची संख्या मुलींच्यापेक्षा जास्त असून परदेशी विद्यार्थ्यांकडून 'बीटेक' करण्याला अधिक पसंती दिली जात असून त्यानंतर 'बीबीए' कोर्सला पसंती मिळत आहे.

🔰अशा प्रकारे उच्चशिक्षण घेणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या अंदाजे ४७ हजार आहे.

👉राज्यनिहाय आकडेवारी पाहिल्यास

🔰कर्नाटक राज्यात सर्वाधिक १० हजार २३ परदेशी विद्यार्थी
👉 महाराष्ट्र (५००३ विद्यार्थी),
👉पंजाब (४५३३),
👉उत्तर प्रदेश (४५१४),
👉 तमिळनाडू (४१०१),
👉 हरियाणा (२८७२),
👉दिल्ली (२१४१),
👉गुजरात (२०६८) आणि
👉तेलंगणा (२०२०) यांचा क्रमांक लागतो.

🔰जगभरातील तब्बल १६४ देशांतून परदेशी विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी भारतात येतात.

🔰यामध्ये प्रमुख दहा देशांतील विद्यार्थ्यांचे प्रमाण ६३.७ टक्के आहे. यातही शेजारील
🔰नेपाळ देशातून  सर्वाधिक  २६.८८ टक्के आहे.त्याखालोखाल
👉अफगाणिस्तान (९.८ टक्के),
👉बांगलादेश (४.३८),
👉सुदान (४.०२),
👉भूतान (३.८२) आणि
👉नायजेरिया (३.४) असे विद्यार्थ्यांचे प्रमाण आहे.

🔰मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केलेल्या अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण २०१८-१९ मधून ही माहिती समोर आली आहे.

👉अमेरिकेतील विद्यार्थ्यांचे प्रमाण ३.२ टक्के असून
👉येमेन (३.२),
👉श्रीलंका (२.६४) आणि इराण (२.३८) या प्रमाणात विद्यार्थी येथे उच्च शिक्षणासाठी येतात.

👉सर्वाधिक परदेशी विद्यार्थी नेपाळमधील असले तरी

🔰पीएचडी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इथिओपिया (२९५) आणि येमेन (१४९) येथील विद्यार्थी अधिक आहेत.

🔰पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या परदेशी विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक ७३.४ टक्के आहे.

🔰 त्या तुलनेत पदव्युत्तरचे शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण १६.१५ टक्के असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे.

👉बीटेकला पसंती

🔰परदेशी विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती 'बीटेक'ला मिळत असून ८,८६१ विद्यार्थ्यांनी या कोर्ससाठी प्रवेश घेतला आहे. त्याखालोखाल
👉बीबीए (३३५४),
👉बीएससी (३३२०),
👉बीए (२२२६) या कोर्सला पसंती मिळत आहे.

🔰पदवीपूर्व अभ्यासक्रमामध्ये बी. फार्म., बीसीए, नर्सिंग आणि बीडीएस या कोर्सना विशेष पसंती मिळत आहे.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...