०५ सप्टेंबर २०१९

दिल्ली, मुंबई राहण्यासाठी अयोग्य

🏢 जागतिक अहवालातील नोंद; गुन्हे व प्रदूषण वाढीचे कारण 🏭

🏠राहण्यालायक असलेल्या जगातील शहरांच्या यादीत भारतीय शहरांची कामगिरी फारशी चांगली नसल्याचे दिसून आले आहे.

🏠 यात देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई यांचा क्रमांक घसरला आहे. गेल्या वर्षी ही दोन्ही महानगरे वरच्या स्थानावर होती. 

🏠आर्थिक गुप्तचर विभागाची (इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट- ईआययू) "जागतिक राहण्यायोग्य सूची-2019' अहवाल बुधवारी प्रसिद्ध झाला.

🏠त्यात दिल्ली व मुंबई यांच्या श्रेणीत गेल्या वर्षीपेक्षा घसरण झाली आहे. त्यामुळे ही शहरे राहण्यायोग्य नसल्याचे दिसून येते. या सूचीत पाच प्रमुख मुद्यांच्या आधारे शहराची श्रेणी ठरविण्यात आली आहे. यामध्ये स्थिरता आणि संस्कृती आणि पर्यावरण हे दोन मोठे सर्वांत महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत.

🏠 याला प्रत्येकी 25 टक्के गुण देण्यात दिले आहेत.

🏠त्याचबरोबर आरोग्यसेवा आणि पायाभूत सेवा यांना 20 टक्के गुण आहेत.

🏠 शिक्षणाचा मुद्दा यात सर्वांत शेवटचा असून त्यासाठी 10 टक्के गुण आहेत. 

📌नवी दिल्लीचा क्रमांक 112 वरून 118 पर्यंत खाली आहे.
📌मुंबई गेल्या वर्षी 117 व्या स्थानावर होती. यंदा घसरला असून 119 व्या स्थानी

🏠 गेल्या वर्षभरात राजधानीत किरकोळ गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली. तसेच जगातील हवेची सर्वांत खराब गुणवत्ता दिल्लीत असल्याचे "ईआययू'च्या अहवालात म्हटले आहे. .

🏠सांस्कृतिक गटात मुंबईचे अवमूल्यन झाले असल्याने ही घसरण दिसली. दिल्लीतील हवेची गुणवत्ता अत्यंत खालावलेली आहे. "ग्लोबल ऍम्बियंट एअर क्‍वालिटी डाटाबेस'ने 2018 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेला (एचडब्ल्यूओ) याबाबत माहिती दिली आहे. 

🏠गेल्या वर्षात आशियातील काही शहरांच्या स्थानांत मोठे बदल झाल्याचे या सूचीत दिसले आहे.

🏠यात कोलंबोचा अपवाद आहे. तेथील चर्चवर बॉंबहल्ला होऊनही कोलंबो एकाच क्रमांकावर स्थिर आहे.

🏠ढाका या आणखी एका आशियाई शहराचा क्रमांक या सूचित खालून तिसरा आहे. ढाकाची कामगिरी ही आशियातील सर्वांत खराब झाली आहे.

🏠पापुआ न्यू गिनियातील पोर्ट मोरेस्बीचा क्रमांक 135 तर कराचीचा क्रमांक 136 वा आहे. सूचीत तळातील दहा शहरांमध्ये या दोन्ही शहरांचा समावेश आहे. 

🏬राहण्यासाठी जगातील सर्वांत उत्कृष्ट शहरे व कंसात संबंधित देश 🏬

🏘व्हिएन्ना (ऑस्ट्रिया),
🏘 मेलबर्न (ऑस्ट्रेलिया),
🏘सिडनी (ऑस्ट्रेलिया),
🏘 ओसाका (जपान),
🏘कॅलगिरी (कॅनडा),
🏘व्हॅन्क्‍युअर (कॅनडा),
🏘 टोकिया (जपान),
🏘 कोपनहेन (डेन्मार्क),
🏘ऍटलेज (ऑस्ट्रेलिया). 

🏢राहण्यासाठी जगातील सर्वांत खराब शहरे व कंसात संबंधित देश 🏢

🏚दमास्कस (सीरिया),
🏚 लागोस (नायजेरिया),
🏚ढाका (बांगलादेश),
🏚 त्रिपोली (लिबिया),
🏚 कराची (पाकिस्तान),
🏚 पोर्ट मोरेस्बी (पापुआ न्यू गिनिया),
🏚हरारे (झिम्बाव्बे),
🏚डौला (कॅमेरून),
🏚अल्जायर्स (अल्जेरिया),
🏚कराकास (व्हेनेझुएला). 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शास्त्रज्ञ आणि शोध किंवा सिद्धांत

● झकॅरीस जॅन्सन: 1590 मध्ये सूक्ष्मदरर्शकाचा सर्वप्रथम शोध लावला

● राॅबर्ट हूक: 1665 मध्ये बुचाच्या पातळ कापातील मृत पेशींचा शोध लावला

● ल्युवेन्हाॅक: 1674 मध्ये जीवाणू, आदीजीव, शुक्राणू इ. जीवंत पेशींचे सर्वप्रथम निरीक्षण केले.

● राॅबर्ट ब्राऊन: 1831 मध्ये पेशीतील केंद्रकाचे अस्तित्व दर्शविले

● जोहॅनिस पुरकिंजे: पेशीतील तरंगत्या द्रव्याला प्रद्रव्य असे नाव दिले.

● एम. जे. शिल्डेन: पेशी हा सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे असा सिद्धांत 1838 मध्ये मांडला

● थिओडाॅर शाॅन: वनस्पती वा प्राणी सर्व सजीव हे अनेक पेशींनी बनलेले असतात, असा सिद्धांत 1839 मध्ये मांडला

● राॅफल्ड विरशाॅ: सर्व पेशींचा जन्म हा त्यांच्या आधीच्या अस्तित्वात असलेल्या पेशींपासून होतो, असा सिद्धांत 1855 मध्ये मांडला.

एनडीआरएफ म्हणजे काय? त्यांचं कार्य कसं चालतं?


✅ 1. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005

देशातील आपत्तींना तोंड देण्यासाठी भारत सरकारने 2005 साली आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला. भारतात सर्वच ठिकाणी हा कायदा लागू आहे. एखाद्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी होणारी हानी टाळण्यासाठी पथक स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले.

त्याअंतर्गत 2006 मध्ये NDRFची स्थापना करण्यात आली. याचं कामकाज गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर तातडीने बचावकार्य करण्याची जबाबदारी NDRFकडे असते.

✅ 2. NDRFची संरचना

हे पथक राष्ट्रीय, राज्य, जिल्हा तसेच स्थानिक पातळीवर तयार करण्यात यावेत, असे सरकारचे निर्देश आहेत.

स्थापनेच्या वेळी NDRFचे देशभरात आठ बटालियन होते. सध्या बटालियनची संख्या वाढवून ती 12 करण्यात आली आहे. प्रत्येक बटालियनमध्ये सुमारे 1,149 अधिकारी आणि जवान कार्यरत असतात.

आणि प्रत्येक बटालियनमध्ये काही ठराविक तुकड्या असतात. प्रत्येक तुकडीत 45 जवान असतात, ज्यात अभियंता, इलेक्ट्रिशियन, तंत्रज्ञ, डॉग स्क्वाड आणि आरोग्यसेवेसाठी विशेषरीत्या प्रशिक्षित जवान असतात.

✅ 3. महाराष्ट्रात 18 तुकड्या

महाराष्ट्र आणि गोवा ही राज्यं पाचव्या बटालियनच्या कार्यक्षेत्रात येतात. पाचव्या बटालियनमध्ये एकूण 18 तुकड्या आहेत - तीन तुकड्या मुंबईत कार्यरत आहेत, पुण्यातील मुख्यालयात 14 तुकड्या तैनात असतात तर नागपूरमध्ये एक तुकडी नेहमी सज्ज असते.

सध्या सत्यनारायण प्रधान हे NDRFचे महासंचालक आहेत तर महाराष्ट्र NDRFचे प्रमुख हे अनुपम श्रीवास्तव आहेत.

4. निवड आणि प्रशिक्षण

आता प्रत्येक आपत्तीत लोकांचे जीव वाचवण्याचं काम किती प्रेरणादायी वाटतं ना? मग NDRFमध्ये कसं जाता येईल, हेही पाहा...

भारतातील केंद्रीय पोलीस सेवेतील विविध उपसंस्थांमध्ये निवड झालेल्या जवानांना प्रतिनियुक्तीच्या माध्यमातून NDRFमध्ये निवडण्यात येतं. प्रतिनियुक्तीचा कालावधी सात ते नऊ वर्षं इतका असू शकतो. BSF, CRPF, CISF, ITBP आणि SSB यांसारख्या पॅरामिलिटरी पथकांतील जवानांची यामध्ये निवड करण्यात येते.
नियुक्ती केलेल्या जवानांना 19 आठवड्यांच्या प्रशिक्षणातून जावं लागतं. या प्रशिक्षणादरम्यान त्यांना आंतरराष्ट्रीय स्तराचं प्रशिक्षण दिलं जातं.

✅ 5. कोणकोणत्या आपत्तींशी सामना करावा लागतो?

जगभरातील विविध देशांमध्ये प्रशिक्षण आणि उपकरणं वापरण्याची पद्धत ही एकाच प्रकारची ठेवण्यात आलेली आहे, जेणेकरून जगात कुठेही काही अपघात घडला तर त्याठिकाणी जाऊन या पथकांना काम करता यावं.

प्रशिक्षणादरम्यान जवानांना आरोग्यविषयक, पूरपरिस्थिती किंवा पाण्याशी संबंधित कुठलीही आपत्ती, पर्वतांमधील लोकांच्या बचावार्थ, उंच इमारतींतील बचावकार्य, मानवी तसंच प्राण्याच्या मृतदेहांचं व्यवस्थान आणि गरज भासल्यास विल्हेवाट लावणे, रासायनिक, जैविक आण्विक आणि किरणोत्सारी आपत्तींसाठी विशेष प्रशिक्षण देण्याचं काम केलं जातं.

चर्चित शहर/ राज्य/देश/स्थळ:-(जाने. २०१९ ते जुलै २०१९)

● आसाम:-
आसाम राज्य सरकाने दारंग जिल्ह्यात कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. हे देशातील पहिले कौशल्य विद्यापीठ असणार आहे.

● एव्हरेस्ट :-
एव्हरेस्ट या जगातल्या सर्वोच्य शिखरावर जगातले सर्वात उंचीवरचे हवामान केंद्र उभारण्यात आले आहे. नॅशनल जीयोग्राफिक सोसायटी आणि त्रिभुवन विद्यापीठ येथील शास्रज्ञांनी तेथे एका अंतराने दोन हवामान केंद्राची स्थापना केली आहे. एक केंद्र ८४३० मीटर आणि दुसरे ७९४५ मीटर उंचीवर उभारण्यात आले आहे

● त्रिपुरा:-
त्रिपुरा राज्य सरकाने सुप्रसिद्ध संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक आर. डी. बर्मन यांच्या स्मरणीय कार्याचे दर्शन घडविण्यासाठी राज्यात एक संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला.

● रशिया:-
५ मे २०१९ रोजी रशियाने पहिली आर्कटिक रेल्वे सेवा सुरु केली. ही रेल्वे रशियातील आर्कटिक क्षेत्रातून नार्वे पर्यंत जाणार आहे.

● प्वेर्टो विलियम्स ( चिली) :-
प्वेर्टो विलियम्स आता जगातील सर्वात दक्षिणेकडील शहर ठरले आहे. या पूर्वी जगातील सर्वात दक्षिणेकडील शहर अर्जेंटिनाचे उशुआया हे होते .

● गुजरात :-
गुजरात मधील महिसागर जिल्हातील बैलानीसोर तालुक्यात रैयोली या गावी देशातील पहिला डायनासोर जीवाश्म पार्क-संग्रहालय सुरु करण्यात आले.

● सुदान:-
सुदान या देशाच्या लष्कराने निर्देशन करणाऱ्या लोकांना ठार मारणार्याच्या क्रूर कारवाईनंतर आफ्रिकी संघाने सुदानचे सदस्यत्व निलंबीत केले. आफ्रिकी संघ हा आफ्रिकी खंडातल्या ५५ देशांचा समावेश असलेला एक संघ आहे.

● ब्यूएनाॅस आयर्स(अर्जेंटिना);-
ब्यूएनाॅस आयर्स येथे दुसरे जागतिक अपंगत्व शिखर सम्मेलन आयोजित करण्यात आले होते. २०१८ मध्ये पहिले शिखर समेलन युनायटेड किंग्डम (युके ) येथे आयोजित करण्यात आले होते.

● गुरुग्राम (हरीयाणा)
IQ एअरव्हिज्युअल्स अँड ग्रीन पीस संस्थेच्या अहवालानुसार जगातल्या प्रदूषित शहरांमध्ये गुरुग्राम (हरयाणा) हे सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले.तर राष्ट्रीय राजधानी परिसर (एनसीआर) हा जगातील सर्वाधिक प्रदुषित विभाग ठरला.
* प्रथम दहा प्रदूषित शहरे - गुरुग्राम (हरयाणा), गाझियाबाद (उत्तरप्रदेश), फैसलाबाद (पाकिस्तान), फरिदाबाद (हरयाणा), भिवाडी (राजस्थान), नोएडा (उत्तरप्रदेश), पटना (बिहार), होतान (चीन), लखनऊ (उत्तरप्रदेश), लाहोर (पाकिस्तान).

● नुरसुल्तान:-
कझाकिस्तानच्या संसदेने २० मार्च २०१९ रोजी राष्ट्रपती राहिलेले नुरसुल्तान नजरबायेब यांच्या सन्मानार्थ राजधानी अस्तानाचे नाव बदलून नुरसुल्तान करण्यात आले.

●गुरूग्राम:-
११ एप्रिल २०१९ रोजी हरियानाचे मुख्य मुख्य निवडणूक आधीकारी राजीव रंजन यांनी भारतातील पहिले मतदाता पार्कचे उद्घाटन केले

● उत्तराखंड:-
उत्तराखंड (झाझरा) येथे देशातील ५ वी सायन्स सिटी स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकाने घेतला. या अगोदर प. बंगाल (कोलकाता), आसाम(गुवाहाटी), गुजरात (अहमदाबाद) आणि पंजाब (कपुरथळा) येथे सायन्स सिटीची स्थापना करण्यात आली आहे.

● नाशिक:-
बाळाच्या नैसर्गिक संगोपनासाठी आणि आईच्या दुधाचे महत्व लक्षात घेऊन नाशिक शहरामध्ये पहिली ह्युमन मिल्क बँक स्थापन करण्यात येणार आहे.

● नोत्र दाम कॅथेड्रल:-
पॅरिसच्या सर्वात प्राचीन आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या नोत्र दाम कॅथेड्रलला आग लागून अख्खी इमारत भस्मसात झाल्याची घटना घडली. 850 वर्षे जुनं असलेलं कॅथेड्रल नोत्र दाम फ्रान्सचा ऐतिहासिक वारसा सांगतं. या चर्चनं 80 राजांचा राज्याभिषेक, दोन साम्राज्यांचा विस्तार, फ्रेंच राज्यक्रांती, जागतिक महायुद्धं असं बरंच काही अनुभवलं आणि सोसलं आहे. हे चर्च 13 व्या शतकात बांधण्यात आलं होतं. अवर लेडी ऑफ पॅरिस' या नावानं प्रसिद्ध असलेल्या या चर्चचं बांधकाम 1163 मध्ये सुरू झालं होतं. हे चर्च बांधायला 180 वर्षं लागली.या चर्चच्या साक्षीनंच 1431 मध्ये दहा वर्षांचा आजारी किंग हेन्री सहावा फ्रान्सच्या गादीवर बसला. जगाला समता, बंधुता, एकता ही मूल्यं देणारी 1789 ची फ्रेंच राज्यक्रांतीही नोत्र-दामनं अनुभवली
नोत्र दामची वैशिष्ट्यं:-
* या चर्चचं बांधकाम गॉथिक शैलीतलं आहे.
* चर्चच्या तीन 'रोझ विंडोज' या तेराव्या शतकात बांधलेल्या आहेत.
* संगीत हे या चर्चचा अविभाज्य भाग आहे.
*या चर्चमध्ये एकूण दहा घंटा आहेत. विशेष म्हणजे या प्रत्येक घंटेला एका संताचं नाव देण्यात आलं आहे.

● रियो डी जनेरो:-
युनेस्कोने २०२० या वर्षासाठी आपली 'वास्तुकलेची जागतिक राजधानी' (World Capital of Architecture) म्हणून ब्राझील देशाच्या ‘रियो डी जनेरो’ या शहराची निवड केली. UNESCO आणि आंतरराष्ट्रीय आर्किटेक्ट संघटना (UIA) या संघटनांनी नोव्हेंबर 2018 मध्ये 'वास्तुकलेची जागतिक राजधानी' या शीर्

राष्ट्रीय शिक्षक दिन

👉भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन याच्या स्मृतीप्रत्यर्थ त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा करतात.

👉कारण डॉ. राधाकृष्णन यांनी 1909 ते 1948 वर्षं पर्यंत म्हणजे 40 वर्षे शै‍क्षणिक क्षेत्रात शिक्षकाचा कार्यभार सांभाळला . 

👉त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 साली आंध्र राज्यातील चितुर जिल्ह्यातील "तिरूताणी" या गावी वैष्णव कुटुंबात झाला.

👉 प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावी झाले व पुढील शिक्षण तिरुपती या गावी झाले. त्यांचे शिक्षण लुथरम मिशन हायस्कूल मध्ये झाले.

👉नंतर उच्च माध्यमिक शिक्षण मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजात. तत्त्वज्ञान विषय घेऊन ते प्रथम क्रमांकाने पास झाले व एम्.ए. साठी नितीशास्त्र विषय घेतला.

👉1908 साली त्यांनी एम.ए.साठी प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांनी वेदांत या विषयावर पुस्तक लिहीले.

👉मद्रास येथे प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तर्कशास्त्राचे प्राध्यापक म्हणून 1917 पर्यंत कार्य केले.

👉१९२० साली त्यांचे पुस्तक ' द प्लेस आँफ रिलीजन इन कंटेम्पररी फिलाँसाँपी ' प्रकाशित झाले. तसेच त्यांनी ' कल्की 'पुस्तक प्रकाशित केले.

👉डॉ. राधाकृष्णन यांनी आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून १९३१ ते १९३६ पर्यंत पदभार सांभाळला.

👉 1939 मध्ये आंध्र विद्यापिठाने त्यांना डी. लिट. ही पदवी दिली.

👉1931 साली इंग्लॅडने डॉ. राधाकृष्णन यांना सर ही मानाची पदवी बहाल केली.

👉त्यांच्या वाढत्या गुणांमुळे, प्रगतीमुळे 1946ते 1949 या काळात भारतीय राज्य घटना समितीचे सभापती म्हणून निवड झाली.

👉1952 साली भारताचे पहिली निवडणूक होऊन उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. त्याच वेळी ते दिल्ली विद्यापीठाचे कुलपती होते.

👉त्याचप्रमाणे 1939 ते 48 बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे कुलपती होते.

👉1957 च्या दुसर्‍या सार्वत्रिक निवडणुकीत ते पुन्हा उपराष्ट्रपती झाले.

👉उत्कृष्ट कार्य कर्तृत्त्वामुळे त्यांना 1954 साली भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला.

👉13 मे 1962 साली डॉ. राधाकृष्णन यांची राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. 1967 साली निवृत्त झाले.

👉 त्यानंतर आंध्रराज्यातील तिरूपती या गावी 24 एप्रिल 1975 रोजी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

०४ सप्टेंबर २०१९

रोजगार निर्मितीत ‘मुद्रा योजना’ अपयशी; पाच लाभार्थ्यांपैकी एकानेच सुरू केला व्यवसाय

🔺 केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण केले.

◾️देशातील बेरोजगारी वाढल्याची माहिती राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या अहवालातून समोर आली होती. यावर उतारा म्हणून मोदी सरकारने मुद्रा योजनेतून निर्माण झालेल्या रोजगार निर्मितीची आकडेवारी समोर आणण्याचे काम हाती घेतले होते. त्यासाठी एक पाहणीही करण्यात आली. या पाहणीत रोजगार निर्मिती करण्यात मुद्रा योजना अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे.

देशात गेल्या ४५ वर्षांतले बेरोजगारीचे प्रमाण २०१७-१८ मध्ये सर्वाधिक होते, असे राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या अहवालात नमूद करण्यात आले होते. २०१७-१८ मध्ये बेरोजगारीचा दर ६.१ टक्के होता. त्याचबरोबर १९७२-७३ नंतर बेरोजगारीचे हे सर्वाधिक प्रमाण असल्याचे आयोगाने अहवालात म्हटले होते. या अहवालावर सारवासारव करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान मुद्रा योजनेतून निर्माण झालेल्या रोजगार निर्मितीची आकडेवारी समोर आणणार होते. यासाठी केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण केले.

कामगार मंत्रालयाने केलेल्या पाहणीतून मुद्रा योजनेतून समाधानकारक रोजगार निर्मिती झाले नसल्याचे दिसून आले आहे. हा अहवाल अद्याप प्रकाशित करण्यात आलेला नसून, द इंडियन एक्स्प्रेसने याचा वृत्तांत प्रसिध्द केला आहे. पंतप्रधान मुद्रा योजना सर्वे असे या पाहणीचे नाव होते. कामगार मंत्रालयाअतंर्गत येणाऱ्या कामगार विभागाने हे सर्वेक्षण केले आहे. मुद्रा योजनेच्या पाच लाभार्थ्यांपैकी एकाच लाभार्थ्याने म्हणजे २०. ६ टक्के लोकांनीच उद्योग सुरू केला असून, उर्वरित चार जणांनी जुन्याच व्यवसायात पैसा गुंतवला आहे. यातून केवळ दहा टक्के रोजगार निर्माण झाला असल्याचे अहवालात म्हटले आहे.

“एप्रिल २०१५ ते डिसेंबर २०१७ या काळात १.१२ कोटी अतिरिक्त नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. यापैकी ५१.०६ लाख नोकऱ्या स्वयंरोजगारातून निर्माण झाल्या आहेत. तर ६०.९४ लाख पगारी कर्मचारी आहेत. मुद्रा योजना लागू केल्यानंतरच्या ३३ महिन्यांत मुद्रा योजनेतून वाटण्यात आलेल्या कर्जातून केवळ दहा टक्के रोजगार निर्माण झाला आहे” असे अहवालात नोंदवण्यात आले आहे.

२७ मार्च २०१९ रोजी सर्वेक्षण
अहवालाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. “एप्रिल-नोव्हेंबर २०१८ या कालावधीत मुद्रा योजनेतंर्गत ९७ हजार लोकांना कर्जाचा लाभ देण्यात आला आहे. बालक, युवा आणि तरुण या तिन्ही गटांमध्ये योजनेच्या माध्यमातून ५.७१ लाख कोटी कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. वर्ष २०१७-१८मध्ये बालक गटाच्या माध्यमातून ४२ टक्के, कुमार गटात ३४ टक्के आणि तरुण गटातून २४ टक्के कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. यात ६६ टक्के रोजगार निर्मिती बालक गटातून झाली आहे. त्यानंतर युवक गटातून १८.८५ टक्के तर १५.५१ रोजगार तरुण गटातून निर्माण झाला आहे. याच कालावधीत कृषि क्षेत्रात २२.७७ टक्के रोजगार निर्माण झाला असून, उत्पादन क्षेत्रात १३.१० लाख नोकऱ्या निर्माण झाला आहे” असे अहवालात म्हटले आहे. इंडियन एक्स्प्रेसने कामगार आणि रोजगार मंत्रालयाला मुद्रा योजनेविषयी काही प्रश्न विचारले होते. त्यावर मंत्रालयाकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.

पंतप्रधान आजपासून रशिया दौर्‍यावर


◾️ ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम तसेच भारत-रशिया वार्षिक बैठकीत सहभाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, बुधवारपासून रशिया दौर्‍यावर रवाना होत आहेत. भारत-रशिया वार्षिक बैठकीत रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन हेही सहभागी होणार असल्याने या बैठकीला महत्व आले आहे. भारत आणि रशिया यांच्यादरम्यानचे संबंध नव्या उंचीवर नेण्यासाठी विविध क्षेत्रातील करार केले जाणार आहेत. 

हायड्रोकार्बन क्षेत्रातील सहयोगाबाबत होणार्‍या उच्चस्तरीय बैठकीत दोन्ही देशांतले या क्षेत्रातले तज्ज्ञ सहभागी होतील. रशियन हायड्रोकार्बन क्षेत्रात आगामी काळात व्यापक प्रमाणावर काम करण्याची भारताची इच्छा आहे. दुसरीकडे रशियाकडून एलएनजी वायू खरेदी करण्याचा सौदा मोदी यांच्या दौर्‍यावेळी केला जाण्याची शक्यता आहे. काही क्षेत्रांमध्ये रशियाला कुशल कामगारांची वाणवा भासत आहे. त्याची पूर्तता करण्यास भारत उत्सूक आहे.

विशेषतः हिरे निर्मिती क्षेत्रात भारत रशियाला मदत करु शकतो. या संदर्भातही मोदी यांच्या दौर्‍यावेळी चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अफगाणिस्तानमधील एकूण परिस्थितीवर मोदी आणि पुतिन यांच्यादरम्यान चर्चा होणार असल्याचेही समजते.

राष्ट्रीय आंदोलन की महत्वपूर्ण घटनाएं


►1904 ➖ भारतीय विश्वविद्यालय अधिनियम पारित
►1905 ➖ बंगाल का विभाजन
►1906 ➖ मुस्लिम लीग की स्थापना
►1907 ➖ सूरत अधिवेशन, कांग्रेस में फूट
►1909 ➖ मार्ले-मिंटो सुधार
►1911 ➖ ब्रिटिश सम्राट का दिल्ली दरबार
►1916 ➖ होमरूल लीग का निर्माण
►1916 ➖ मुस्लिम लीग-कांग्रेस समझौता (लखनऊ पैक्ट)
►1917 ➖ महात्मा गाँधी द्वारा चंपारण में आंदोलन
►1919 ➖ रौलेट अधिनियम
►1919 ➖ जलियाँवाला बाग हत्याकांड
►1919 ➖ मांटेग्यू-चेम्सफोर्ड सुधार
►1920 ➖ खिलाफत आंदोलन
►1920 ➖ असहयोग आंदोलन
►1922 ➖ चौरी-चौरा कांड
►1927 ➖ साइमन कमीशन की नियुक्ति
►1928 ➖ साइमन कमीशन का भारत आगमन
►1929 ➖ भगतसिंह द्वारा केन्द्रीय असेंबली में बम विस्फोट
►1929 ➖ कांग्रेस द्वारा पूर्ण स्वतंत्रता की माँग

►1930 ➖ सविनय अवज्ञा आंदोलन
►1930 ➖ प्रथम गोलमेज सम्मेलन
►1931 ➖ द्वितीय गोलमेज सम्मेलन
►1932 ➖ तृतीय गोलमेज सम्मेलन
►1932 ➖ सांप्रदायिक निर्वाचक प्रणाली की घोषणा
►1932 ➖ पूना पैक्ट
►1942 ➖ भारत छोड़ो आंदोलन
►1942 ➖ क्रिप्स मिशन का आगमन
►1943 ➖ आजाद हिन्द फौज की स्थापना
►1946 ➖ कैबिनेट मिशन का आगमन
►1946 ➖ भारतीय संविधान सभा का निर्वाचन
►1946 ➖ अंतरिम सरकार की स्थापना
►1947 ➖ भारत के विभाजन की माउंटबेटन योजना
►1947 ➖ भारतीय स्वतंत्रता प्राप्ति

*कुछ महान कार्यों से सम्बंधित व्यक्ति🎓*

1. ब्रह्मा समाज – राजाराममोहन राय

2. आर्य समाज – स्वामी दयानंद सरस्वती

3. प्रार्थना समाज – आत्माराम पांडुरंग

4. दीन-ए-इलाही, मनसबदारी प्रथा – अकबर

5. भक्ति आंदोलन – रामानुज

6. सिख धर्म – गुरु नानक

7. बौद्ध धर्म – गौतमबुद्ध

8. जैन धर्म – महावीर स्वामी

9. इस्लाम धर्म की स्थापना, हिजरी सम्वत – हजरत मोहम्मद साहब

10. पारसी धर्म के प्रवर्तक – जर्थुष्ट

11. शक सम्वत – कनिष्क

12. मौर्य वंश का संस्थापक – चन्द्रगुप्त मौर्य

13. न्याय दर्शन – गौतम

14. वैशेषिक दर्शन – महर्षि कणाद

15. सांख्य दर्शन – महर्षि कपिल

16. योग दर्शन – महर्षि पतंजली

17. मीमांसा दर्शन – महर्षि जैमिनी

18. रामकृष्ण मिशन – स्वामी विवेकानंद

19. गुप्त वंश का संस्थापक – श्रीगुप्त

20. खालसा पन्थ – गुरु गोविन्द सिंह

21. मुगल साम्राज्य की स्थापना – बाबर

22. विजयनगर साम्राज्य की स्थापना – हरिहर व बुक्का

23. दिल्ली सल्तनत की स्थापना – कुतुबुद्दीन ऐबक

24. सतीप्रथा का अंत – लॉर्ड विलियम बेंटिक

25. आंदोलन : असहयोग,सविनय अवज्ञा, खेडा, चम्पारन, नमक, भारत छोडो – महात्मा गाँधी

26. हरिजन संघ की स्थापना – महात्मा गाँधी

27. आजाद हिंद फ़ौज की स्थापना – रास बिहारी बोस

28. भूदान आंदोलन – आचार्य विनोबा भावे

29. रेड क्रॉस – हेनरी ड्यूनेंट

30. स्वराज पार्टी की स्थापना – पंडित मोतीलाल नेहरु

31. गदर पार्टी की स्थापना – लाला हरदयाल

32. ‘वन्देमातरम्’ के रचियता – बंकिमचन्द्र चटर्जी

33. स्वर्ण मंदिर का निर्माण – गुरु अर्जुन देव

34. बारदोली आंदोलन – वल्लभभाई पटेल

35. पाकिस्तान की स्थापना – मो० अली जिन्ना

36. इंडियन एसोशिएशन की स्थापना – सुरेन्द नाथ बनर्जी

37. ओरुविले आश्रम की स्थापना- अरविन्द घोष

38. रुसी क्रांति के जनक – लेनिन

39. जामा मस्जिद का निर्माण – शाहजहाँ

40. विश्व भारती की स्थापना – रवीन्द्रनाथ टैगोर

41. दास प्रथा का उन्मूलन – अब्राहम लिंकन

42. चिपको आंदोलन – सुंदर लाल बहुगुणा

43. बैकों का राष्ट्रीकरण – इंदिरा गाँधी

44. ऑल इण्डिया वीमेन्स कांफ्रेंस की स्थापना – श्रीमती कमला देवी

45. भारत की कम्युनिस्ट पार्टी की स्थापना – एम०एन० राय

46. नेशनल कांफ्रेंस की स्थापना – शेख अब्दूल्ला

47. संस्कृत व्याकरण के जनक – पाणिनी

48. सिख राज्य की स्थापना – महाराजा रणजीत सिंह

49. भारत की खोज – वास्कोडिगामा

महाराष्ट्रातील वनसंपदा


🍀 महाराष्ट्रातील एकुण क्षेत्रफळा पैकी वनांखालील क्षेत्र  21.10 % आहे.

🍀 भारताच्या वनक्षेत्रापैकी महाराष्ट्रात 8.7 % वने आहेत.

🍀 सर्वाधिक क्षेत्र वनांखाली असणारा जिल्हा गडचिरोली आहेत.

🍀 महाराष्ट्रातील सर्वात कमी जंगले लातुर मध्ये आहेत.

🍀 सागाची उत्कृष्ट जंगले चंद्रपूर ( बल्हारशा ) येथे सापडतात.

🍀 संत तुकाराम वन ग्राम योजनेची सुरुवात 2006-07 मध्ये झाली.

🍀 महाराष्ट्र वनविकास मंडळाची स्थापना 1974 नागपूर येथे झाली.

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...