०५ सप्टेंबर २०१९

रशियन शस्त्रास्त्रांना भारतीय साथ; दोन्ही देशांत १५ करार


◾️भारत आणि रशिया यांच्यातील संरक्षणविषयक सहकार्य आणखी वृद्धिंगत करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकीत रशियाच्या संरक्षण सामग्रीसाठी भारतीय बनावटीचे सुटे भाग वापरण्याचा निर्णय बुधवारी दोन्ही देशांनी घेतला; तसेच रशिया या उत्पादनांसाठीचे तंत्रज्ञानही भारताला हस्तांतरित

  👉व्लाडिव्होस्टॉकः भारत आणि रशिया यांच्यातील संरक्षणविषयक सहकार्य आणखी वृद्धिंगत करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकीत रशियाच्या संरक्षण सामग्रीसाठी भारतीय बनावटीचे सुटे भाग वापरण्याचा निर्णय बुधवारी दोन्ही देशांनी घेतला; तसेच रशिया या उत्पादनांसाठीचे तंत्रज्ञानही भारताला हस्तांतरित करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यातील चर्चेवेळी हा निर्णय घेण्यात आला. पौर्वात्य आर्थिक मंचाच्या (ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम) अधिवेशनासाठी पंतप्रधान येथे आले आहेत.

'संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढविण्याविषयी दोन्ही देशांनी कटिबद्धता व्यक्त केली. त्याचाच भाग म्हणून संयुक्तपणे लष्करी साधनसामग्रीचे उत्पादन करणे, सुटे भाग आणि घटकांचे उत्पादन करणे आणि विक्री पश्चात यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निश्चित करण्यात आले. सध्याही या प्रकारची भागीदारी सुरू आहे. मात्र तिची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. मेक इन इंडिया मोहिमेंतर्गत रशियन बनावटीची शस्त्रास्त्रे आणि संरक्षणविषयक इतर सामग्रीचे तंत्रज्ञान हस्तांतरही भारताला केले जाणार आहे,' असे दोन्ही देशांनी काढलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

संरक्षण क्षेत्रात रशिया गेली पन्नास वर्षे भारताचा विश्वासू भागीदार राहिला आहे, असे गौरवोद्गार पुतीन यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत काढले. पुढील वर्षीच्या व्हिक्टरी डे सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मॉस्कोला भेट देण्याचे निमंत्रणही पुतीन यांनी मोदींना दिले. भारताने रशियाकडे १४.५ अब्ज डॉलरच्या शस्त्रास्त्रे आणि संरक्षणविषयक इतर सामग्रीची मागणी नोंदवली आहे, अशी माहिती रशियाच्या संरक्षण खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

गेल्या वर्षी रशियाची एस-४०० क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा खरेदी करू नये, यासाठी अमेरिकेने भारतावर मोठा दबाव आणला होता. तरीही तो व्यवहार पार पडला. तसेच, काही छोट्या युद्धनौका (फ्रिगेट), दारूगोळा, तसेच इग्ला-एस ही चल हवाई यंत्रणा भारत रशियाकडून खरेदी करणार आहे, अशी माहिती रशियाच्या फेडरल सर्व्हिस फॉर मिलिटरी टेक्निकल को ऑपरेशनचे प्रमुख दिमित्री शुग्यायेव्ह यांनी दिली.

🔴काश्मीरप्रश्नी भारताची भूमिका समजावली

'काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याबाबत भारताची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष पुतीन यांना समजावून सांगितली. उभय नेत्यांतील चर्चेदरम्यान मोदी यांनी स्वत: पुढाकार घेत काश्मीरचा विषय उपस्थित केला. तसेच, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत रशियाने भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल पुतीन यांचे आभारही मानले. पाकिस्तान भारताविरोधात सातत्याने खोटा आणि दिशाभूल करणारा प्रचार करीत असल्याचेही मोदी यांनी पुतीन यांना सांगितले,' अशी माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली.

🔻'एके-२०३मुळे नवी उंची'

एके-२०३ रायफलींचे उत्पादन भारतात संयुक्तपणे करण्यामुळे दोन्ही देशांतील संबंध नवी उंची गाठतील, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे व्यक्त केली. भारत हा रशियाचा महत्त्वाचा सहकारी देश आहे, अशा शब्दांत रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी द्विपक्षीय भागीदारीचा गौरव केला. उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील कोरवा येथे इंडो-रशियन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने एके-२०३ रायफलींचे उत्पादन सुरू करण्यात येणार आहे. भारतीय दारूगोळा कारखाना मंडळ (ओएफबी) आणि रोसनबर्न एक्स्पोर्ट्स आणि कन्सर्न कलाश्निकोव्ह यांचा हा संयुक्त भागीदारीतील प्रकल्प आहे. याबाबतचा करार फेब्रुवारी महिन्यात करण्यात आला होता.

🔻दोन्ही देशांत १५ करार

- दोन्ही देशांत १५ करार करण्यात आले. त्यात लष्करी साह्य, दळणवळण, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, सागरी वाहतूक आदी क्षेत्रांचा समावेश

- सन २०२५ पर्यंत द्विपक्षीय व्यापार ११ अब्ज डॉलरपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट

- कुडनकुलम येथील उर्वरित चार अणुभट्ट्या उभारणीला गती देणार

- गगनयान मोहिमेतील भारतीय अंतराळवीरांना रशिया प्रशिक्षण देणार

- दहशतवादाबाबत दुटप्पी भूमिका अमान्य करणे

- अफगाणिस्तानात शांतता आणि स्थैर्य राहावे, यासाठी पाठिंबा देणे

समुद्रयान’ प्रकल्पातून भारत खोल महासागरात खनिजांचा शोध घेणार

👉सन 2021-22 मध्ये पाणबुडीसारख्या वाहनामधून खोल समुद्रात मानव पाठविण्याची भारताची महत्वाकांक्षा असून त्यासंदर्भात ‘समुद्रयान’ प्रकल्प राबविण्यात येत आहे.

👉चेन्नईची राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (NIOT) 'समुद्रयान' प्रकल्प राबववित आहे.

👉सुमारे 200 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामधून तीन व्यक्तींसह सुमारे 6000 मीटर खोलीपर्यंत पाण्याखाली जाण्यास सक्षम असलेले जलयान तयार केले जात आहे.

👉 देशातच विकसित केल्या जात असलेल्या प्रस्तावानुसार समुद्राच्या तळाशी सहा किलोमीटरच्या खोलीवर 72 तास कार्य करू शकणारे जलयान तयार केले जात आहे.

👉सध्या पाणबुडी केवळ 200 मीटरच्या खोलीपर्यंतच समुद्राखाली जाऊ शकते.

👉‘समुद्रयान’ प्रकल्प हा खोल समुद्रात खनिजांचा शोध घेण्यासाठी भु-शास्त्र मंत्रालयाच्या पथदर्शी प्रकल्पाचा एक भाग आहे.

👉या प्रकल्पाच्या माध्यमातून समुद्रतळाशी असलेल्या दुर्मिळ खनिजांचा शोध घेतला जाणार आहे आणि असा शोध घेणार्‍या विकसित देशांच्या पंक्तीत भारताला ठेवणार आहे.   

✅पार्श्वभूमी

👉केंद्रीय हिंद महासागर खोरे (Central Indian Ocean Basin -CIOB) या प्रदेशामध्ये समुद्राच्या तळाशी पॉलीमेटॅलिक नोडूलचा शोध घेण्यासंबंधी भारताला काही विशेषाधिकार दिले गेले आहेत. पॉलीमेटॅलिक नोडूल हे समुद्राच्या तळाशी आढळून येतात.

👉इंटरनॅशनल सीबेड अथॉरिटी (ISA) कडून दिल्या गेलेल्या अधिकारांमधून पॉलीमेटॅलिक नोडूलच्या संदर्भात शोध घेण्यासाठी भारताला आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात 75000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ दिले गेले आहे.

👉त्या क्षेत्रात अंदाजे 380 दशलक्ष टन इतके पॉलीमेटॅलिक नोडूलचे स्त्रोत आहे, ज्यात 4.7 दशलक्ष टन निकेल, 4.29 दशलक्ष टन तांबा आणि 0.55 दशलक्ष टन कोबाल्ट आणि 92.59 दशलक्ष टन मॅगनीझ असू शकते.

👉1987 साली पॉलीमेटॅलिक नोडूलचा शोध घेणे आणि त्याच्या वापरासाठी संयुक्त राष्ट्रसंघाकडून केंद्रीय हिंद महासागर खोरे (CIOB) यामध्ये एक विशेष क्षेत्र वाटप करण्यात आले. त्यामुळे एक अग्रगण्य गुंतवणूकदाराचा दर्जा मिळवणारा भारत हा पहिला देश ठरला.

👉भारतासह इतर सात देशांना/कंत्राटदारांनादेखील भु-शास्त्र मंत्रालयाच्या माध्यमातून समुद्राच्या तळाशी शोधकार्य चालविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

👉इंटरनॅशनल सीबेड अथॉरिटी (ISA) ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक शाखा आहे, जी आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात महासागरांच्या समुद्रातल्या मृत स्त्रोतांचा शोध घेण्यास आणि त्यांचा वापर करण्यावर नियंत्रण ठेवते.

दिल्ली, मुंबई राहण्यासाठी अयोग्य

🏢 जागतिक अहवालातील नोंद; गुन्हे व प्रदूषण वाढीचे कारण 🏭

🏠राहण्यालायक असलेल्या जगातील शहरांच्या यादीत भारतीय शहरांची कामगिरी फारशी चांगली नसल्याचे दिसून आले आहे.

🏠 यात देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई यांचा क्रमांक घसरला आहे. गेल्या वर्षी ही दोन्ही महानगरे वरच्या स्थानावर होती. 

🏠आर्थिक गुप्तचर विभागाची (इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट- ईआययू) "जागतिक राहण्यायोग्य सूची-2019' अहवाल बुधवारी प्रसिद्ध झाला.

🏠त्यात दिल्ली व मुंबई यांच्या श्रेणीत गेल्या वर्षीपेक्षा घसरण झाली आहे. त्यामुळे ही शहरे राहण्यायोग्य नसल्याचे दिसून येते. या सूचीत पाच प्रमुख मुद्यांच्या आधारे शहराची श्रेणी ठरविण्यात आली आहे. यामध्ये स्थिरता आणि संस्कृती आणि पर्यावरण हे दोन मोठे सर्वांत महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत.

🏠 याला प्रत्येकी 25 टक्के गुण देण्यात दिले आहेत.

🏠त्याचबरोबर आरोग्यसेवा आणि पायाभूत सेवा यांना 20 टक्के गुण आहेत.

🏠 शिक्षणाचा मुद्दा यात सर्वांत शेवटचा असून त्यासाठी 10 टक्के गुण आहेत. 

📌नवी दिल्लीचा क्रमांक 112 वरून 118 पर्यंत खाली आहे.
📌मुंबई गेल्या वर्षी 117 व्या स्थानावर होती. यंदा घसरला असून 119 व्या स्थानी

🏠 गेल्या वर्षभरात राजधानीत किरकोळ गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली. तसेच जगातील हवेची सर्वांत खराब गुणवत्ता दिल्लीत असल्याचे "ईआययू'च्या अहवालात म्हटले आहे. .

🏠सांस्कृतिक गटात मुंबईचे अवमूल्यन झाले असल्याने ही घसरण दिसली. दिल्लीतील हवेची गुणवत्ता अत्यंत खालावलेली आहे. "ग्लोबल ऍम्बियंट एअर क्‍वालिटी डाटाबेस'ने 2018 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेला (एचडब्ल्यूओ) याबाबत माहिती दिली आहे. 

🏠गेल्या वर्षात आशियातील काही शहरांच्या स्थानांत मोठे बदल झाल्याचे या सूचीत दिसले आहे.

🏠यात कोलंबोचा अपवाद आहे. तेथील चर्चवर बॉंबहल्ला होऊनही कोलंबो एकाच क्रमांकावर स्थिर आहे.

🏠ढाका या आणखी एका आशियाई शहराचा क्रमांक या सूचित खालून तिसरा आहे. ढाकाची कामगिरी ही आशियातील सर्वांत खराब झाली आहे.

🏠पापुआ न्यू गिनियातील पोर्ट मोरेस्बीचा क्रमांक 135 तर कराचीचा क्रमांक 136 वा आहे. सूचीत तळातील दहा शहरांमध्ये या दोन्ही शहरांचा समावेश आहे. 

🏬राहण्यासाठी जगातील सर्वांत उत्कृष्ट शहरे व कंसात संबंधित देश 🏬

🏘व्हिएन्ना (ऑस्ट्रिया),
🏘 मेलबर्न (ऑस्ट्रेलिया),
🏘सिडनी (ऑस्ट्रेलिया),
🏘 ओसाका (जपान),
🏘कॅलगिरी (कॅनडा),
🏘व्हॅन्क्‍युअर (कॅनडा),
🏘 टोकिया (जपान),
🏘 कोपनहेन (डेन्मार्क),
🏘ऍटलेज (ऑस्ट्रेलिया). 

🏢राहण्यासाठी जगातील सर्वांत खराब शहरे व कंसात संबंधित देश 🏢

🏚दमास्कस (सीरिया),
🏚 लागोस (नायजेरिया),
🏚ढाका (बांगलादेश),
🏚 त्रिपोली (लिबिया),
🏚 कराची (पाकिस्तान),
🏚 पोर्ट मोरेस्बी (पापुआ न्यू गिनिया),
🏚हरारे (झिम्बाव्बे),
🏚डौला (कॅमेरून),
🏚अल्जायर्स (अल्जेरिया),
🏚कराकास (व्हेनेझुएला). 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शास्त्रज्ञ आणि शोध किंवा सिद्धांत

● झकॅरीस जॅन्सन: 1590 मध्ये सूक्ष्मदरर्शकाचा सर्वप्रथम शोध लावला

● राॅबर्ट हूक: 1665 मध्ये बुचाच्या पातळ कापातील मृत पेशींचा शोध लावला

● ल्युवेन्हाॅक: 1674 मध्ये जीवाणू, आदीजीव, शुक्राणू इ. जीवंत पेशींचे सर्वप्रथम निरीक्षण केले.

● राॅबर्ट ब्राऊन: 1831 मध्ये पेशीतील केंद्रकाचे अस्तित्व दर्शविले

● जोहॅनिस पुरकिंजे: पेशीतील तरंगत्या द्रव्याला प्रद्रव्य असे नाव दिले.

● एम. जे. शिल्डेन: पेशी हा सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे असा सिद्धांत 1838 मध्ये मांडला

● थिओडाॅर शाॅन: वनस्पती वा प्राणी सर्व सजीव हे अनेक पेशींनी बनलेले असतात, असा सिद्धांत 1839 मध्ये मांडला

● राॅफल्ड विरशाॅ: सर्व पेशींचा जन्म हा त्यांच्या आधीच्या अस्तित्वात असलेल्या पेशींपासून होतो, असा सिद्धांत 1855 मध्ये मांडला.

एनडीआरएफ म्हणजे काय? त्यांचं कार्य कसं चालतं?


✅ 1. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005

देशातील आपत्तींना तोंड देण्यासाठी भारत सरकारने 2005 साली आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला. भारतात सर्वच ठिकाणी हा कायदा लागू आहे. एखाद्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी होणारी हानी टाळण्यासाठी पथक स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले.

त्याअंतर्गत 2006 मध्ये NDRFची स्थापना करण्यात आली. याचं कामकाज गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर तातडीने बचावकार्य करण्याची जबाबदारी NDRFकडे असते.

✅ 2. NDRFची संरचना

हे पथक राष्ट्रीय, राज्य, जिल्हा तसेच स्थानिक पातळीवर तयार करण्यात यावेत, असे सरकारचे निर्देश आहेत.

स्थापनेच्या वेळी NDRFचे देशभरात आठ बटालियन होते. सध्या बटालियनची संख्या वाढवून ती 12 करण्यात आली आहे. प्रत्येक बटालियनमध्ये सुमारे 1,149 अधिकारी आणि जवान कार्यरत असतात.

आणि प्रत्येक बटालियनमध्ये काही ठराविक तुकड्या असतात. प्रत्येक तुकडीत 45 जवान असतात, ज्यात अभियंता, इलेक्ट्रिशियन, तंत्रज्ञ, डॉग स्क्वाड आणि आरोग्यसेवेसाठी विशेषरीत्या प्रशिक्षित जवान असतात.

✅ 3. महाराष्ट्रात 18 तुकड्या

महाराष्ट्र आणि गोवा ही राज्यं पाचव्या बटालियनच्या कार्यक्षेत्रात येतात. पाचव्या बटालियनमध्ये एकूण 18 तुकड्या आहेत - तीन तुकड्या मुंबईत कार्यरत आहेत, पुण्यातील मुख्यालयात 14 तुकड्या तैनात असतात तर नागपूरमध्ये एक तुकडी नेहमी सज्ज असते.

सध्या सत्यनारायण प्रधान हे NDRFचे महासंचालक आहेत तर महाराष्ट्र NDRFचे प्रमुख हे अनुपम श्रीवास्तव आहेत.

4. निवड आणि प्रशिक्षण

आता प्रत्येक आपत्तीत लोकांचे जीव वाचवण्याचं काम किती प्रेरणादायी वाटतं ना? मग NDRFमध्ये कसं जाता येईल, हेही पाहा...

भारतातील केंद्रीय पोलीस सेवेतील विविध उपसंस्थांमध्ये निवड झालेल्या जवानांना प्रतिनियुक्तीच्या माध्यमातून NDRFमध्ये निवडण्यात येतं. प्रतिनियुक्तीचा कालावधी सात ते नऊ वर्षं इतका असू शकतो. BSF, CRPF, CISF, ITBP आणि SSB यांसारख्या पॅरामिलिटरी पथकांतील जवानांची यामध्ये निवड करण्यात येते.
नियुक्ती केलेल्या जवानांना 19 आठवड्यांच्या प्रशिक्षणातून जावं लागतं. या प्रशिक्षणादरम्यान त्यांना आंतरराष्ट्रीय स्तराचं प्रशिक्षण दिलं जातं.

✅ 5. कोणकोणत्या आपत्तींशी सामना करावा लागतो?

जगभरातील विविध देशांमध्ये प्रशिक्षण आणि उपकरणं वापरण्याची पद्धत ही एकाच प्रकारची ठेवण्यात आलेली आहे, जेणेकरून जगात कुठेही काही अपघात घडला तर त्याठिकाणी जाऊन या पथकांना काम करता यावं.

प्रशिक्षणादरम्यान जवानांना आरोग्यविषयक, पूरपरिस्थिती किंवा पाण्याशी संबंधित कुठलीही आपत्ती, पर्वतांमधील लोकांच्या बचावार्थ, उंच इमारतींतील बचावकार्य, मानवी तसंच प्राण्याच्या मृतदेहांचं व्यवस्थान आणि गरज भासल्यास विल्हेवाट लावणे, रासायनिक, जैविक आण्विक आणि किरणोत्सारी आपत्तींसाठी विशेष प्रशिक्षण देण्याचं काम केलं जातं.

चर्चित शहर/ राज्य/देश/स्थळ:-(जाने. २०१९ ते जुलै २०१९)

● आसाम:-
आसाम राज्य सरकाने दारंग जिल्ह्यात कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. हे देशातील पहिले कौशल्य विद्यापीठ असणार आहे.

● एव्हरेस्ट :-
एव्हरेस्ट या जगातल्या सर्वोच्य शिखरावर जगातले सर्वात उंचीवरचे हवामान केंद्र उभारण्यात आले आहे. नॅशनल जीयोग्राफिक सोसायटी आणि त्रिभुवन विद्यापीठ येथील शास्रज्ञांनी तेथे एका अंतराने दोन हवामान केंद्राची स्थापना केली आहे. एक केंद्र ८४३० मीटर आणि दुसरे ७९४५ मीटर उंचीवर उभारण्यात आले आहे

● त्रिपुरा:-
त्रिपुरा राज्य सरकाने सुप्रसिद्ध संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक आर. डी. बर्मन यांच्या स्मरणीय कार्याचे दर्शन घडविण्यासाठी राज्यात एक संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला.

● रशिया:-
५ मे २०१९ रोजी रशियाने पहिली आर्कटिक रेल्वे सेवा सुरु केली. ही रेल्वे रशियातील आर्कटिक क्षेत्रातून नार्वे पर्यंत जाणार आहे.

● प्वेर्टो विलियम्स ( चिली) :-
प्वेर्टो विलियम्स आता जगातील सर्वात दक्षिणेकडील शहर ठरले आहे. या पूर्वी जगातील सर्वात दक्षिणेकडील शहर अर्जेंटिनाचे उशुआया हे होते .

● गुजरात :-
गुजरात मधील महिसागर जिल्हातील बैलानीसोर तालुक्यात रैयोली या गावी देशातील पहिला डायनासोर जीवाश्म पार्क-संग्रहालय सुरु करण्यात आले.

● सुदान:-
सुदान या देशाच्या लष्कराने निर्देशन करणाऱ्या लोकांना ठार मारणार्याच्या क्रूर कारवाईनंतर आफ्रिकी संघाने सुदानचे सदस्यत्व निलंबीत केले. आफ्रिकी संघ हा आफ्रिकी खंडातल्या ५५ देशांचा समावेश असलेला एक संघ आहे.

● ब्यूएनाॅस आयर्स(अर्जेंटिना);-
ब्यूएनाॅस आयर्स येथे दुसरे जागतिक अपंगत्व शिखर सम्मेलन आयोजित करण्यात आले होते. २०१८ मध्ये पहिले शिखर समेलन युनायटेड किंग्डम (युके ) येथे आयोजित करण्यात आले होते.

● गुरुग्राम (हरीयाणा)
IQ एअरव्हिज्युअल्स अँड ग्रीन पीस संस्थेच्या अहवालानुसार जगातल्या प्रदूषित शहरांमध्ये गुरुग्राम (हरयाणा) हे सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले.तर राष्ट्रीय राजधानी परिसर (एनसीआर) हा जगातील सर्वाधिक प्रदुषित विभाग ठरला.
* प्रथम दहा प्रदूषित शहरे - गुरुग्राम (हरयाणा), गाझियाबाद (उत्तरप्रदेश), फैसलाबाद (पाकिस्तान), फरिदाबाद (हरयाणा), भिवाडी (राजस्थान), नोएडा (उत्तरप्रदेश), पटना (बिहार), होतान (चीन), लखनऊ (उत्तरप्रदेश), लाहोर (पाकिस्तान).

● नुरसुल्तान:-
कझाकिस्तानच्या संसदेने २० मार्च २०१९ रोजी राष्ट्रपती राहिलेले नुरसुल्तान नजरबायेब यांच्या सन्मानार्थ राजधानी अस्तानाचे नाव बदलून नुरसुल्तान करण्यात आले.

●गुरूग्राम:-
११ एप्रिल २०१९ रोजी हरियानाचे मुख्य मुख्य निवडणूक आधीकारी राजीव रंजन यांनी भारतातील पहिले मतदाता पार्कचे उद्घाटन केले

● उत्तराखंड:-
उत्तराखंड (झाझरा) येथे देशातील ५ वी सायन्स सिटी स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकाने घेतला. या अगोदर प. बंगाल (कोलकाता), आसाम(गुवाहाटी), गुजरात (अहमदाबाद) आणि पंजाब (कपुरथळा) येथे सायन्स सिटीची स्थापना करण्यात आली आहे.

● नाशिक:-
बाळाच्या नैसर्गिक संगोपनासाठी आणि आईच्या दुधाचे महत्व लक्षात घेऊन नाशिक शहरामध्ये पहिली ह्युमन मिल्क बँक स्थापन करण्यात येणार आहे.

● नोत्र दाम कॅथेड्रल:-
पॅरिसच्या सर्वात प्राचीन आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या नोत्र दाम कॅथेड्रलला आग लागून अख्खी इमारत भस्मसात झाल्याची घटना घडली. 850 वर्षे जुनं असलेलं कॅथेड्रल नोत्र दाम फ्रान्सचा ऐतिहासिक वारसा सांगतं. या चर्चनं 80 राजांचा राज्याभिषेक, दोन साम्राज्यांचा विस्तार, फ्रेंच राज्यक्रांती, जागतिक महायुद्धं असं बरंच काही अनुभवलं आणि सोसलं आहे. हे चर्च 13 व्या शतकात बांधण्यात आलं होतं. अवर लेडी ऑफ पॅरिस' या नावानं प्रसिद्ध असलेल्या या चर्चचं बांधकाम 1163 मध्ये सुरू झालं होतं. हे चर्च बांधायला 180 वर्षं लागली.या चर्चच्या साक्षीनंच 1431 मध्ये दहा वर्षांचा आजारी किंग हेन्री सहावा फ्रान्सच्या गादीवर बसला. जगाला समता, बंधुता, एकता ही मूल्यं देणारी 1789 ची फ्रेंच राज्यक्रांतीही नोत्र-दामनं अनुभवली
नोत्र दामची वैशिष्ट्यं:-
* या चर्चचं बांधकाम गॉथिक शैलीतलं आहे.
* चर्चच्या तीन 'रोझ विंडोज' या तेराव्या शतकात बांधलेल्या आहेत.
* संगीत हे या चर्चचा अविभाज्य भाग आहे.
*या चर्चमध्ये एकूण दहा घंटा आहेत. विशेष म्हणजे या प्रत्येक घंटेला एका संताचं नाव देण्यात आलं आहे.

● रियो डी जनेरो:-
युनेस्कोने २०२० या वर्षासाठी आपली 'वास्तुकलेची जागतिक राजधानी' (World Capital of Architecture) म्हणून ब्राझील देशाच्या ‘रियो डी जनेरो’ या शहराची निवड केली. UNESCO आणि आंतरराष्ट्रीय आर्किटेक्ट संघटना (UIA) या संघटनांनी नोव्हेंबर 2018 मध्ये 'वास्तुकलेची जागतिक राजधानी' या शीर्

राष्ट्रीय शिक्षक दिन

👉भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन याच्या स्मृतीप्रत्यर्थ त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा करतात.

👉कारण डॉ. राधाकृष्णन यांनी 1909 ते 1948 वर्षं पर्यंत म्हणजे 40 वर्षे शै‍क्षणिक क्षेत्रात शिक्षकाचा कार्यभार सांभाळला . 

👉त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 साली आंध्र राज्यातील चितुर जिल्ह्यातील "तिरूताणी" या गावी वैष्णव कुटुंबात झाला.

👉 प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावी झाले व पुढील शिक्षण तिरुपती या गावी झाले. त्यांचे शिक्षण लुथरम मिशन हायस्कूल मध्ये झाले.

👉नंतर उच्च माध्यमिक शिक्षण मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजात. तत्त्वज्ञान विषय घेऊन ते प्रथम क्रमांकाने पास झाले व एम्.ए. साठी नितीशास्त्र विषय घेतला.

👉1908 साली त्यांनी एम.ए.साठी प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांनी वेदांत या विषयावर पुस्तक लिहीले.

👉मद्रास येथे प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तर्कशास्त्राचे प्राध्यापक म्हणून 1917 पर्यंत कार्य केले.

👉१९२० साली त्यांचे पुस्तक ' द प्लेस आँफ रिलीजन इन कंटेम्पररी फिलाँसाँपी ' प्रकाशित झाले. तसेच त्यांनी ' कल्की 'पुस्तक प्रकाशित केले.

👉डॉ. राधाकृष्णन यांनी आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून १९३१ ते १९३६ पर्यंत पदभार सांभाळला.

👉 1939 मध्ये आंध्र विद्यापिठाने त्यांना डी. लिट. ही पदवी दिली.

👉1931 साली इंग्लॅडने डॉ. राधाकृष्णन यांना सर ही मानाची पदवी बहाल केली.

👉त्यांच्या वाढत्या गुणांमुळे, प्रगतीमुळे 1946ते 1949 या काळात भारतीय राज्य घटना समितीचे सभापती म्हणून निवड झाली.

👉1952 साली भारताचे पहिली निवडणूक होऊन उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. त्याच वेळी ते दिल्ली विद्यापीठाचे कुलपती होते.

👉त्याचप्रमाणे 1939 ते 48 बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे कुलपती होते.

👉1957 च्या दुसर्‍या सार्वत्रिक निवडणुकीत ते पुन्हा उपराष्ट्रपती झाले.

👉उत्कृष्ट कार्य कर्तृत्त्वामुळे त्यांना 1954 साली भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला.

👉13 मे 1962 साली डॉ. राधाकृष्णन यांची राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. 1967 साली निवृत्त झाले.

👉 त्यानंतर आंध्रराज्यातील तिरूपती या गावी 24 एप्रिल 1975 रोजी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...