०२ सप्टेंबर २०१९

चंद्रिमा शहा : भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या पहिल्या महिला अध्यक्षा


● प्रख्यात जीवशास्त्रज्ञ चंद्रिमा शहा यांची भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली आहे.
● 2020 ते 2022 पर्यंत त्या भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या अध्यक्ष म्हणून काम पाहतील.
● याआधी त्या  दिल्लीच्या राष्ट्रीय रोगप्रतिकार संस्थाच्या संचालिका होत्या.

भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी :
● या संस्थेची स्थापना 1935 मध्ये झाली होती, त्यावेळी ही संस्था "नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस ऑफ इंडिया" या नावाने ओळखली जात होती. 1970 पासून ही संस्था भारतीय 'राष्ट्रीय विज्ञान अकादमी' नावाने ओळखली जाते.
● ही विज्ञानातील सर्व शाखांमधील वैज्ञानिकांचे प्रतिनिधित्व करणारी सर्वोच्च संस्था आहे.
● उद्देश : देशात विज्ञानाचा प्रसार करणे
● मुख्यालय : नवी दिल्ली
● यापूर्वीचे अध्यक्ष : अजय सूद
● वर्तमान अध्यक्षा : चंद्रिमा शहा

डीआरडीओ ची QRSAM चाचणी यशस्वी.


● नुकतीच संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने DRDO सर्व हवामानांत व प्रदेशांत अनुकूल अशा अत्याधुनिक क्यूआरएसएएम (क्विक रिएक्शन सर्फेस-टू-एअर मिसाईल) ची यशस्वी चाचणी घेतली.

●ओदिशातील चंडीपूर येथे एकात्मिक चाचणी क्षेत्रात सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी ही चाचणी घेण्यात आली. या चाचणीत हवाई लक्ष्य ठेवले होते.

QRSAM (Quick Reaction Surface-to-Air Missile)

● हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) भारतीय सैन्यासाठी विकसित केले आहे.

● डीआरडीओ ने या मिसाइल ची निर्मिती भारत इलेक्ट्रनिक्स लिमिटेड च्या मदतीने केली आहे.

● हे क्षेपणास्त्र फारच कमी वेळात शत्रूंच्या लक्ष्यांवर नजर ठेवू शकते.

◆ इंधन प्रकार : घन इंधन
◆ रेंज : 25-30 किमी

● हे क्षेपणास्त्र एका ट्रकवर तैनात केले जाऊ शकते.

●  हे क्षेपणास्त्र वेगवेगळ्या अंतरावर आणि उंचीवर असलेले आपले लक्ष्य नष्ट करू शकते.

● क्यूआरएसएएमची प्रथम चाचणी 4 जुलै 2017 रोजी घेण्यात आली, नंतर 26 फेब्रुवारी 2019 रोजी या क्षेपणास्त्राच्या दोन चाचण्या घेण्यात आल्या.

टाइम्सच्या ‘वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेसेस 2019’ यादीत ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चा समावेश


● गुजरातमधल्या 597 फूट उंची असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पुतळ्याला टाइम्स मॅगझीनने प्रसिद्ध केलेल्या ‘वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेसेस 2019’ या यादीत स्थान दिले गेले आहे. त्याव्यतिरिक्त मुंबईचे ‘सोहो हाऊस’ या इमारतीनेही या यादीत स्थान मिळवले.

✅ सन 2019 मध्ये सर्वाधिक भेट दिलेल्या जगातली प्रथम पाच ठिकाणे -

1. जियोसी जियोथर्मल सी बाथ्स (हुसविक, आइसलँड )
2. कॅम्प अ‍ॅडव्हेंचर (रॉनेडे, डेन्मार्क)
3. मोरी बिल्डिंग डिजिटल आर्ट म्युझियम (टोकियो, जपान)
4. स्टार वॉर्स: गॅलेक्सीज एज अॅट डिस्नेलँड (अॅनाहिम, कॅलिफोर्निया)
5. SFER IK (तुलूम, मेक्सिको )

● गुजरात राज्यात केवडिया येथे “स्टॅच्यू ऑफ युनिटी” या नावाने सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा 182 मीटर उंच आहे. हा नर्मदा नदीच्या किनारी जगातला सर्वाधिक उंचीचा पुतळा आहे. त्याचे अनावरण गेल्या वर्षी 31 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. ही शिल्पाकृती विख्यात शिल्पकार राम सुतार यांनी साकारले. विक्रमी 33 महिन्यांमध्ये याचे बांधकाम केले गेले.

● मुंबईचे सोहो हाऊस हे 11 मजली इमारतीत असून ते अरबी समुद्राकाठी आहे. येथे 34 बैठकांचे सिनेमागृह, एक लायब्ररी आणि एक रूफटॉप बार आणि पूल आहे.

राज्यात पोलीस भरती ३ सप्टेंबरपासून सुरू होणार


📢   खूप दिवसांपासुन प्रतीक्षेत असणाऱ्या पोलीस भरतीची  जाहीर झाली आहे. भरतीप्रक्रियेसाठी *३ सप्टेंबरपासून* ऑनलाईन अर्ज स्वीकारणार आहेत. तर २३ सप्टेंबर अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख राहणार

💁‍♂  *पोलीस भरती प्रक्रिया मध्ये झाले मोठे बदल*

▪  राज्यात पहिल्यांदाच पोलीसभरती प्रक्रिया हि महापोर्टलद्वारे होणार आहे.

▪  यावेळेस पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली जाणार आणि नंतर मैदानी चाचणी  होणार

▪  लेखी परीक्षा हि पूर्वीप्रमाणेच  ९० मिनिटांची १०० गुणांची घेतली जाणार आहे.

▪  लेखी परीक्षेतून एका जागेसाठी १० याप्रमाणे मैदानी चाचणीची संधी दिली जाणार

🙋‍♂   *शारीरिक चाचणीतील बदल*

🔰   मुलांची १०० गुणांची मैदानी चाचणी ५० गुणांवर आणली आहे

🔰   मुलांच्या चाचणीतून लांबउडी, पूलअप्स काढले आहेत.

👱‍♂  *पुरुष उमेद्वार शारीरिक चाचणी*  -  ३० गुणांसाठी १६०० मीटर धावणे, १० गुणांसाठी १०० मीटर धावणे, गोळाफेकसाठी १० राहतील

👱‍♀  *महिला उमेद्वार शारीरिक चाचणी*  -   मुलींना ८०० मीटर धावणेसाठी ३० गुण, १०० मीटर धावणे १० गुण, गोळाफेक १० गुण राहतील

✍  *NOTE - पोलीस भरती बाबत हे महत्वाचे अपडेट आहे*

राष्ट्रीय नागरिक नोंदणीची अंतिम यादी जाहीर, यादीत 3.11 कोटी नागरिकांचा समावेश

👉आसाममधल्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) याची अंतिम यादी 31 ऑगस्ट 2019 रोजी जाहीर करण्यात आली.

👉 NRCच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, या अंतिम यादीत 3,11,21,004 नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे तर 19,06,657 नागरिकांना यादीतून वगळण्यात आले आहे.

👉राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC)च्या या यादीमुळे अनेकांच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे.

👉 कारण या यादीतून आसाममधल्या त्या नागरिकांना वेगळे केळे जाईल ज्यांनी 1971 सालानंतर बांग्लादेशातून बेकायदेशीरपणे राज्यात प्रवेश केला होता.

👉गृहमंत्रालयाच्या स्पष्टीकरणानुसार, NRCमध्ये नाव समाविष्ठ नसलेल्या एखाद्या व्यक्तीला परदेशी ठरवळे जाणार नाही.

👉ज्या नागरिकांची नावे प्रस्तावित NRCमधून वगळण्यात आली आहेत त्यांना अपील करण्याची संधी मिळेल.

🌹🌳🌴NRC म्हणजे काय?🌴🌳🌹

👉राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Register of Citizens -NRC) यामध्ये देशातल्या अधिकृत नागरिकांची नोंद असते.

👉ज्या नागरिकांचे नाव NRCमध्ये नसते त्याना अवैध मानले जाते.

👉NRCनुसार 25 मार्च 1971 पूर्वी आसाममध्ये राहणाऱ्या नागरिकांना भारतीय मानले जात आहे.

👉NRC भारतीय नागरिकांच्या नावांची एक नोंदणी यादी आहे जे सन 1951 मध्ये तयार करण्यात आली होती.

👉आसाममध्ये बांग्लादेशामधून अवैधपणे आलेल्या लोकांच्या प्रश्नावरुन सर्वोच्च न्यायलयाने NRC अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

👉पहिली NRC 1951 साली जाहीर केले गेले होते. 

स्टार्टअप उद्योगांसाठी CBDTने ‘स्टार्ट-अप कक्ष’तयार केले

👉31 ऑगस्ट 2019 रोजी स्टार्ट-अप उद्योगांच्या प्रकरणाबाबत करविषयक तक्रारींचे निवारण आणि संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) एका ‘स्टार्ट-अप कक्ष’ (Start-up Cell) याची स्थापना केली.

👉स्टार्ट-अप उद्योगांच्या मूळ अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने CBDTने हा निर्णय घेतला.

👉हे समर्पित कक्ष ‘आयकर कायदा-1961’ याच्या प्रशासनाच्या संदर्भात स्टार्ट-अप संस्थांच्या बाबतीत कर-संबंधीत तक्रारींचे निवारण आणि अडचणी दूर करण्यासाठी कार्य करणार आहे.

🌹🌳🌴केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) 🌴🌳🌹

👉हे मंडळ भारतात प्रत्यक्ष करविषयक धोरणे आणि नियोजनासाठी आवश्यक असलेली माहिती प्रदान करते.

👉CBDT हे ‘केंद्रीय महसूल मंडळ अधिनियम-1963’च्या अंतर्गत दि. 1 जानेवारी 1964 पासून कार्यरत असलेले एक वैधानिक प्राधिकरण आहे. हे मंडळ अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते.

👉‘केंद्रीय महसूल मंडळ कायदा-1924’ याच्या अंमलबजावणीनंतर कर प्रशासनासह आकारण्यात आलेले ‘केंद्रीय महसूल मंडळ’ अस्तित्वात आले.

👉पुढे ते मंडळ 1 जानेवारी 1964 रोजी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) आणि केंद्रीय अबकारी कर व सीमाशुल्क मंडळ (CBEC) अश्या दोन भागात विभागण्यात आले.

एका ओळीत सारांश, 2 सप्टेंबर 2019

🌹🌳🌴संरक्षण🌴🌳🌹

👉सीमा सुरक्षा दलाचे (BSF) नवे महानिदेशक - विवेक कुमार जोहरी.

👉01 सप्टेंबर 2019 पासून नवे भारतीय लष्कर उप-प्रमुख - लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरावणे.

👉या ठिकाणी 30 जुलै ते 29 ऑगस्ट 2019 या काळात कुन पर्वतशिखरावर (7077 मीटर) भारतीय लष्कराची पर्वतारोहण मोहीम पार पाडली - झांस्कर, लद्दाख.

👉1 सप्टेंबर रोजी फायर अँड फ्युरी कॉर्प्सने या ठिकाणी आपला 20 वा वर्धापन दिवस साजरा केला - लेह, लद्दाख.

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉स्टार्ट-अप उद्योगांच्या प्रकरणाबाबत करविषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी या केंद्रीय मंडळाने एका ‘स्टार्ट-अप कक्ष’ची स्थापना केली - केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT).

👉RBIने मोबाईल वॉलेट्ससाठी नो युवर कस्टमर (KYC) याच्या नियमांचे पालन करण्याची नव्याने ठरविलेली अंतिम मुदत - 29 फेब्रुवारी 2020.

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉या भारतीय वंशाच्या अमेरिकावासीला दक्षिण कॅलिफोर्नियाच्या जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नेमण्यात आले - शिरीन मॅथ्यूज.

👉2 ते 13 सप्टेंबर 2019 या काळात संयुक्त राष्ट्रसंघ वाळवंटीकरण प्रतिबंधक परिषद (UNCCD) याच्या संबंधित देशांच्या ‘COP-14’ सत्राचे आयोजन या ठिकाणी होणार - ग्रेटर नोएडा, दिल्ली, भारत.

👉या आशियाई देशात प्रथम विश्व शीख अधिवेशन आयोजित करण्यात आले - पाकिस्तान.

🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹

👉आसाममधल्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) याच्या अंतिम यादी समावेश असलेल्या नागरिकांचा संख्या - 3,11,21,004.

👉“कोम्प्लिमेंटरी फीडिंग” या विषयासह ‘राष्ट्रीय पोषण माह 2019’ - सप्टेंबर 2019.

👉जम्मू व काश्मीर राज्यातले एकमेव असे पहिले फ्रेट टर्मिनल येथे असेल - जम्मू विभागातले सांबा रेल्वे स्थानक.

👉20-28 नोव्हेंबर 2019 या काळात पणजी, गोवा येथे होणार्‍या 50व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) याचा विषय - एक भारत श्रेष्ठ भारत.

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉रशियाच्या कझान शहरात ‘वर्ल्ड स्किल्स 2019’ या स्पर्धेत भारतीय पथकाने जिंकलेल्या पदकांची एकूण संख्या - 5 (13 व्या स्थानी).

👉‘वर्ल्ड स्किल्स 2019’ या स्पर्धेत जलतंत्रज्ञान प्रकारात भारतासाठी प्रथमच सुवर्णपदक जिंकणारा आणि भारताच्या सर्व स्पर्धकांमध्ये ‘बेस्ट ऑफ नेशन’चा पुरस्कार मिळविणारा व्यक्ती - अश्वथा नारायण सनागवारापू.

👉‘वर्ल्ड स्किल्स 2019’ या स्पर्धेत पदक जिंकणारी प्रथम भारतीय महिला - श्वेता रतनपुरा (ग्राफिक डिझाईन प्रकारात कांस्यपदक).

👉इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने "बिल्ड फॉर डिजिटल इंडिया" उपक्रम राबविण्यासाठी या कंपनीबरोबर भागीदारी केली - गुगल.

🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹

👉ISSF विश्वचषक IV 2019 या स्पर्धेत महिला गटात 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी भारतीय नेमबाज – यशस्वीनी सिंग देसवाल.

🌹🌳🌴राज्य विशेष🌴🌳🌹

👉या केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने 31 ऑगस्ट रोजी आयुष्मान भारत-प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) योजनेचा प्रारंभ केला - पुडुचेरी.

👉राजस्थानचे नवे राज्यपाल - कलराज मिश्रा.

👉महाराष्ट्राचे नवे राजपाल - भगतसिंग कोशियारी.

👉हिमाचल प्रदेशचे नवे राज्यपाल - बंडारू दत्तात्रेय.

👉केरळचे नवे राज्यपाल - आरिफ मोहम्मद खान.

👉तेलंगणाचे नवे राज्यपाल - तमिलीसाई सौंदराराजन.

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉भारतातले केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरण मंडळ (CBFC) – स्थापना वर्ष: सन 1951; मुख्यालय: मुंबई.

👉भारतातल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) याचे स्थापना वर्ष – सन 1964 (1 जानेवारी).

👉भारतात पहिली राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Register of Citizens -NRC) या साली जाहीर केली गेली – सन 1951.

RISAT-2B: शत्रूवर नजर ठेवण्यासाठीभारताचा रडार इमेजिंग उपग्रह


👉भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) दि. 22 मे 2019 रोजी “री सॅट-2B” (RISAT-2B) या रडार इमेजिंग उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.

👉RISAT-2B या उपग्रहाचा उपयोग शत्रूवर नजर ठेवण्याबरोबर कृषी, वन खाते, आपतकालीन व्यवस्थापनासाठी होईल.

👉इस्रोच्या PSLV C46 या प्रक्षेपकाच्या सहाय्याने श्रीहरीकोटा येथील तळावरून RISAT-2B अवकाशात सोडण्यात आला.

👉ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (PSLV) प्रक्षेपकाची ही 46 वी यशस्वी मोहीम आहे.

👉RISAT मालिकेतला पहिला उपग्रह दि. 20 एप्रिल 2009 रोजी अवकाशात सोडण्यात आला होता. आणि त्यानंतर 2012 साली या वर्गातला आणखी एक उपग्रह पाठवला.

👉यानंतर 2019 साली ISROची चार ते पाच पाळत उपग्रह प्रक्षेपित करण्याची योजना आहे.

27 राज्यांमधल्या वनीकरणासाठी केंद्र सरकारने 47,436 कोटी रूपयांचा निधी दिला.


👉देशाची हरित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि वनीकरणाला चालना देण्यासाठी पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 29 ऑगस्ट 2019 रोजी 27 राज्यांना 47,436 कोटी रुपयांचा निधी हस्तांतरित केला. महाराष्ट्राला 3844.24 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

👉वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र वाढवण्यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावर निश्चित केलेली योगदान (NDC) उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वनीकरणाकरिता हा निधी वापरला जाणार आहे.

👉क्षतिपूरक वनीकरणनिधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरण (CAMPA) याच्या अंतर्गत हा निधी देण्यात आला आहे. क्षतिपूरक वनीकरणासाठी गोळा केलेल्या निधीचा राज्यांकडून वापर होत नसल्याच्या सुरुवातीच्या अनुभवानंतर सर्वोच्च न्यायालयाने 2001 साली या प्राधिकरणाच्या स्थापनेचे आदेश दिले होते.

👉त्या 27 राज्यांमध्ये ओडिशा, छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, गुजरात, कर्नाटक, हरियाणा, पंजाब, आसाम, बिहार, सिक्कीम, मणीपूर, गोवा, पश्चिम बंगाल, मिझोरम, त्रिपुरा, मेघालय, तामिळनाडू आणि केरळ यांचा समावेश आहे.
                  

नवी दिल्ली येथे 12 व्या 'भारत सुरक्षा परिषदचे' (India Security Summit) आयोजन

👉 नवी दिल्ली येथे 12 वीं भारत सुरक्षा परिषद आयोजित करण्यात आली होती.
👉 ही परिषद असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (असोचॅम) द्वारा आयोजित केली गेली आणि केंद्रीय संप्रेषण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने अधिकृतपणे या परिषदेला मदत केली आहे.

👉 या परिषदेचा विषय (थीम) “नवीन राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरणाकडे” (Towards New National Cyber Security Strategy) असा होता.

👉 या परिषदेदरम्यान, संवेदनशील राष्ट्रीय पायाभूत सुविधांचे संरक्षण, भविष्यातील सायबर धोका: घटना, आव्हाने आणि प्रतिसाद यासारख्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. विविध कायद्याची अंमलबजावणी करणा-या एजन्सीजमधील वरिष्ठ अधिकारी या परिषदेस हजर होते.

👉 आपल्या भाषणात केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी जाहीर केले की सायबर धमक्यांचा सामना करण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने समन्वयाने आणि प्रभावी पद्धतीने देशात सायबर गुन्ह्यांचा मुकाबला करण्यासाठी ‘इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर’ (आय 4 सी) ’योजना सुरू केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत डिजिटल इंडियाच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून शासनाने सायबर स्वच्छता केंद्र देखील सुरू केले आहे.

‘फिट इंडिया’


🔰 29 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फिट इंडिया’ अभियानाचा प्रारंभ केला.

🔰 मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून या लोकचळवळीचा प्रारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेजर ध्यानचंद यांना आदरांजली वाहिली.

🔰 तंत्रज्ञानामुळे आपली शारीरिक क्षमता घटली आहे आणि आपले आरोग्याचे दैनंदिन वेळापत्रक कोलमडून गेले आहेत. आज भारतात जीवनशैलीसंबंधी आजार वाढत आहेत. तरुणांनाही ते जडत आहेत. मधुमेह आणि अतिताण याचे प्रमाण वाढत असून, ते मुलांमध्येही दिसून येत आहे. जीवनशैलीतला थोडासा बदल हे जीवनशैलीचे आजार रोखू शकतो. ‘फिट इंडिया अभियान’ हे जीवनशैलीतले छोटे बदल घडवण्याचा एक प्रयत्न आहे...!!!

प्रधानमंत्री पुरस्कार

🔰 नाशिक येथील योगाचार्य डॉ. विश्वास मंडलिक आणि मुंबई येथील ‘द योग इन्स्टिट्यूट’ ला योगाच्या प्रचार व प्रसारासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी प्रधानमंत्री पुरस्काराने गौरविण्यात आले.

डॉ. विश्वास मंडलिक
         
🔰 हटयोग, उपनिषद आणि भगवतगीतेचा अभ्यास व संशोधन करून योगाचार्य डॉ. विश्वास  मंडलिक हे गेल्या ५५ वर्षांपासून योगाभ्यासाचे धडे देत आहेत.

🔰 डॉ. मंडलिक यांनी नाशिक येथे १९७८ मध्ये ‘भारतीय योग विद्या धाम ’ संस्थेची स्थापना केली.

🔰 या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गुरुकुल पद्धतीने योगाचा देश-विदेशात प्रचार व प्रसार केला.

🔰 देशभरात या संस्थेचे एकूण १६० केंद्र तर परदेशात १६ केंद्र आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून ५ लाख लोकांनी योगाचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले आहे.

🔰 त्यांनी योगाच्या प्रचार व प्रसारासाठी विविध पुस्तकही लिहिली आहेत.

🔰 योगक्षेत्रातील  उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना गौरविण्यात आले. 

द योग इन्स्टिट्यूट

🔰 मुंबईतील सांताक्रुझ भागात १९१८ मध्ये स्वामी योगेंद्र यांनी ‘द योग इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली.

🔰 योग प्रचार व प्रसारासाठी कार्यरत या संस्थेने एक कोटी लोकांना योगाभ्यासासाठी प्रेरित केले.

🔰 या संस्थेने देश-विदेशात ५५ हजारांहून अधिक योग शिक्षक घडविले आहेत.

🔰 संस्थेने योगविषयक माहितीची ५० पेक्षा अधिक प्रकाशने प्रकाशित केली आहेत.

🔰 एनसीईआरटीच्या योगविषयक अभ्यासक्रम निर्मितीत संस्थेचे मोलाचे योगदान राहिले आहे.

🔰 योगाच्या प्रचार-प्रसारातील याच कार्याची दखल घेऊन संस्थेला सन्मानित करण्यात आले..!!

०१ सप्टेंबर २०१९

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगत सिंह कोश्यारी यांची नियुक्ती

⚡ सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी कोश्यारी यांची नियुक्ती

💁‍♂ उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यता आली आहे.

🔻 कोण आहेत भगत सिंह कोश्यारी? :
भगत सिंह कोश्यारी उत्तराखंडचे दिग्गज भाजप नेते आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यांनी 1977 मध्ये आणीबाणीच्या वेळी तुरुंगवासही भोगला आहे. उत्तराखंड राज्याची निर्मिती झाली तेव्हा ते भाजपचे पहिले प्रदेशाध्यक्ष बनले.

👉 2001 ते 2007 या कालावधीत ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. 2002 ते 2007 पर्यंत त्यांनी विरोधी पक्ष नेते म्हणूनही काम पाहिलं. 2008 ते 2014 पर्यंत ते राज्यसभेत खासदार होते.

💫 *महाराष्ट्रासह एकूण पाच राज्यांना मिळाले नवे राज्यपाल*
1⃣ केरळ : आरिफ मोहम्मद खान
2⃣ राजस्थान : कलराज मिश्र
3⃣ हिमाचल प्रदेश : बंडारू दत्तात्रेय
4⃣ तेलंगणा : तमिलीसाई सुंदरराजन

देशातील राष्ट्रीयीकृत बॅंकांची संख्या आता फक्त बारा

◾️अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दहा राष्ट्रीय बॅंकांचे चार प्रमुख राष्ट्रीय बॅंकांमध्ये विलीनीकरण करण्याची घोषणा केली. यामुळे आता देशात फक्त १२ राष्ट्रीयीकृत बॅंका असतील. या विलीनीकरणामुळे कामगार कपात होणार नसून, कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार नाही. तसेच बचत आणि कर्जवाटप या बॅंकांच्या प्रमुख कामकाजावरही याचा परिणाम होणार नसल्याचा निर्वाळा अर्थमंत्री सीतारामन यांनी दिला.

◾️देशात २७ राष्ट्रीयीकृत बॅंका होत्या. आता या विलीनीकरण प्रक्रियेनंतर फक्त १२ प्रमुख राष्ट्रीयीकृत बॅंका राहतील. यानंतर कोणतेही विलीनीकरण केले जाणार नाही. याशिवाय इंडियन ओव्हरसीज बॅंक, युको बॅंक, बॅंक ऑफ महाराष्ट्र आणि पंजाब अँड सिंध बॅंक या चार बॅंकांच्या कामकाजाचा केंद्रबिंदू विभागीय स्वरूपाचा असल्यामुळे त्यांचा राष्ट्रीय बॅंकेचा दर्जा कायम राखताना कामकाजाच्या प्रादेशिक स्वरूपात बदल न करण्याचे सरकारने ठरविले आहे.

◾️अरुण जेटली यांच्या अर्थमंत्रिपदाच्या काळात बॅंक ऑफ बडोदामध्ये देना बॅंक आणि विजया बॅंकेचे, तर भारतीय स्टेट बॅंकेमध्ये सर्व स्टेट बॅंक समूहांचे विलीनीकरण करण्यात आले होते.

◾️अर्थात, या विलीनीकरण प्रक्रियेमध्ये बॅंक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बॅंक या दोन प्रमुख बॅंकांचे अस्तित्व जैसे थे राखण्याचेही सरकारने ठरविले आहे. या दोन्ही बॅंकांचे देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात असलेले अस्तित्व पाहता त्यांच्या विलीनीकरणाचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. बॅंक ऑफ इंडियाचा ९३ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय आहे, तर सेंट्रल बॅंकेची उलाढाल ४.६८ लाख कोटी रुपये आहे.

◾️अर्थमंत्र्यांनी बॅंक विलीनीकरणाच्या निर्णयाचे समर्थन करताना पाच ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था साकारण्यासाठीचे हे पाऊल असल्याचा दावा केला. निष्क्रिय बॅंकांमध्ये कामकाज वाढेल आणि मोठ्या बॅंकांना अधिक कर्जवाटप शक्‍य होईल. मात्र २५० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या कर्ज प्रकरणांवर सरकारचे बारकाईने लक्ष राहील, असाही इशारा त्यांनी दिला. बॅंकांचा एनपीए (बुडीत कर्जाचे प्रमाण) ८.६५ लाख कोटी रुपयांवरून ७.९ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आल्याचे सांगितले.

हॅपीनेस इंडेक्समध्ये भारत नवव्या स्थानी: इप्सोस सर्वेक्षण


इप्सोस या मार्केट रिसर्च संस्थेनी त्याचा “ग्लोबल हॅपीनेस सर्व्हे” याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

अहवालाच्या ठळक बाबी

✔️हॅपीनेस इंडेक्सच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 28 जागतिक बाजारपेठांमध्ये भारत नवव्या क्रमांकावर आहे.

✔️यादीत ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा (86%) हे अग्रस्थानी असून जगातले सर्वात आनंदी देश ठरले आहेत.

✔️त्यापाठोपाठ, चीन, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, संयुक्त राज्ये अमेरिका, सौदी अरब आणि  जर्मनी या देशांचा क्रम लागतो आहे. नवव्या क्रमांकावर भारत 77 टक्क्यांसह आहे.

✔️अर्जेटिना 34 टक्क्यांसह यादीत शेवटच्या क्रमांकावर म्हणजेच 27 व्या क्रमांकावर आहे. त्याआधी स्पेन आणि रशिया या देशांची नोंद आहे.

✔️विशेष म्हणजे, 2019 साली आनंदीपणाची पातळी कमी झाली. भारतासाठी या पातळीत सहा टक्क्यांची घसरण झाली आहे. सन 2018 मधील 83 टक्क्यांवरून 2019 साली ही पातळी 77 टक्क्यांवर आली आहे.

अहवालानुसार, जेव्हा आनंद हा घटक लक्षात घेतला जातो तेव्हा भारतीय नागरिक चांगली आर्थिक परिस्थिती आणि शारीरिक सुदृढता हे दोन घटक आनंद मानण्याचे सर्वात मुख्य कारणे मानतात. तर वैयक्तिक सुरक्षा आणि सुरक्षितता, मित्र आणि जीवनावर नियंत्रण असल्याची भावना ही भारतीयांची आनंदी राहण्याविषयीचे इतर प्रमुख कारक आहेत, असे नव्या सर्वेक्षणातून आढळून आले आहे.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...