२९ ऑगस्ट २०१९

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची आज 114 वी जयंती

आज ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’. भारताची क्रीडा संस्कृती वाढावी, प्रोत्साहन मिळावे तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात खेळाची जागरुकता निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्याचे ठरविण्यात आले.

हॉकीमधील सर्वकालीन महान खेळाडू, जादूगार मेजर ध्यानचंद यांची आज 114 वी जयंती. देशातील सर्व खेळाडूंचे प्रेरणास्थान असलेल्या या महान हॉकीपटूचा जन्मदिवस दरवर्षी देशात क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.

हॉकी विश्वातील सर्वात महान खेळाडू म्हणून आजही मेजर ध्यानचंद यांचे नाव आदराने घेतले जाते. म्हणून आज जाणून घेऊया त्यांच्याबद्दल विशेष काही... 

1) *असे पडले नाव* : मेजर ध्यानचंद यांचे मुळ नाव ध्यान सिंग होते. परंतु ते रात्री उशिरापर्यंत हॉकीचा सराव करत. नंतर त्यांच्या जवळच्या मित्रांनी ध्यान सिंग यांच्या नावापुढे ‘चंद’ हा शब्द जोडला. तेव्हापासून ध्यानचंद या नावाने ते ओळखले गेले.

2) *खेळाची सुरुवात* : ध्यानचंद यांचे शिक्षण फक्त 6 वी पर्यंतच झाले. खरंतर सैन्यात भरती झाल्यानंतर ध्यानचंद यांनी हॉकी खेळायला सुरूवात केली होती. त्याआधी त्यांना हॉकीचा विशेष अनुभव नव्हता.

3) *भारतीय संघाचे नेतृत्त्व* : हॉकी फेडरेशन आर्थिक संकटांचा सामना करत होते. अशा परिस्थितीतही कोणताही दबाव निर्माण न होऊ देता ध्यानचंद यांनी भारतीय संघाचे नेतृत्त्व करून देशाला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले होते. त्यानंतर सलग दोन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा दबदबा कायम होता.

4) *न्यूझीलंड दौऱ्यात छाप* : ध्यानचंद यांच्या खेळाने सर्वांची मने जिंकली होती. 1926 च्या न्यूझीलंड दौऱ्यात एकूण 21 सामने खेळणाऱ्या भारतीय संघातर्फे 192 गोल झाले त्यातील १०० गोल एकट्या ध्यानचंद यांचे होते.

5) *ऑलिम्पिक हिरो* : मेजर ध्यानचंद यांनी 1928, 1932 आणि 1936 या सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आणि त्यात विजय मिळवून दिला.

6) *हिटलरची ऑफर नाकारली* : 1936 मधील भारत-जर्मनी यांच्यातील ऑलिम्पिकच्या लढतीत ध्यानचंद यांचा खेळ पाहून जर्मनीचा हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर त्यांचे चाहते झाले. यामुळे हिटलरने त्यांना जर्मन नागरिकत्व देण्याची तसेच इंग्लिश इंडियन आर्मीत मेजरपद व कर्नल पदापर्यंत बढती देण्याचीही ‘ऑफर’ दिली होती, पण देशप्रेमी व स्वाभिमानी ध्यानचंद यांनी ती नम्रपणे नाकारली होती.

7) *पद्मभूषण देऊन गौरव* : ध्यानचंद यांनी आपला शेवटचा आंतराष्ट्रीय सामना 1948 साली खेळले. भारत सरकारने ध्यानचंद यांना 1956 साली पद्मभूषण देऊन गौरवले होते. मेजर ध्यानचंद यांचे 3 डिसेंबर 1979 रोजी निधन झाले.

हॉकी विश्वात आपल्या असामान्य कामगिरीने सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या तसेच आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या या हॉकीच्या जादूगाराला क्रीडा दिनानिमित्त सलाम.

बालकल्याण निर्देशांकामध्ये  केरळ, तामिळनाडू आणि हिमाचल  प्रदेश  अव्वल

👉भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ‘चाईल्ड वेल-बीइंग इंडेक्स’ म्हणजेच ‘बालकल्याण निर्देशांक’ जाहीर करण्यात आला आहे.

👉वर्ल्ड व्हिजन इंडिया आणि IFMR लीड या स्वयंसेवी संस्थांनी हा निर्देशांक तयार केला आहे.

👉हा निर्देशांक म्हणजे निरोगी वैयक्तिक विकास, सकारात्मक संबंध आणि संरक्षणात्मक वातावरण या तीन आयामी घटकांच्या माध्यमातून बालकांच्या सर्वांगीण विकासाचे मूल्यमापन करण्यासाठी तयार केलेले एक साधन आहे. 

🌹🌳🌴अहवालातल्या ठळक बाबी🌴🌳🌹

👉आरोग्य, पोषण आणि शिक्षण सुविधांमधल्या अपवादात्मक कामगिरीमुळे केरळ राज्याने अव्वल स्थान मिळवले आहे.

👉केरळच्या पाठोपाठ तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेश या राज्यांना स्थान मिळाले आहेत.

👉कुपोषण आणि बालकांचा कमी जन्मदर यामुळे मेघालय, झारखंड आणि मध्यप्रदेश यादीत तळाशी आहेत.

👉केंद्रशासित प्रदेशांमध्ये, पुडुचेरीने सर्वाधिक गुण मिळवले आहेत आणि ते अव्वल ठरले. तर दादरा व नगर हवेली कमकुवत कामगिरी दर्शविणारे प्रदेश ठरले.

👉केरळमध्ये बालकांना दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. तसेच कुपोषण, कमी जन्मदर अश्या मुद्द्यांवर प्रभावी कार्य केलेले आहे. त्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी व स्वच्छता सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

👉झारखंडमध्ये जन्मदर, पोषण आणि पाणी आणि स्वच्छता सुविधांची उपलब्धता अश्या घटकांवर लक्षणीय सुधारणा करण्याची गरज आहे. राज्यात अधिकाधिक बालकांमध्ये खुंटलेली वाढ आणि कमी वजन ह्या समस्या दिसून आल्या आहेत. तसेच राज्यात प्रसूतीगृहांची उपलब्धता कमी आहे. पाच वर्षांची होण्यापूर्वीच मृत्यू होणार्‍या बालकांची संख्या जास्त आहे. राज्यात शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक आहे.

👉मध्यप्रदेशात जन्मदर, पोषण, बालकांच्या विरुद्ध गुन्हेगारी आणि किशोरवयीन गुन्हे अशा बाबींमध्ये निम्न कामगिरी दिसून आली आहे. राज्यात दरिद्री कुटुंबात राहणार्‍या बालकांची संख्या सर्वाधिक आहे.

लष्करी सराव (जानेवारी २०१९ ते जुलै २०१९):-

● सी व्हिजिल- २०१९
* भारतीय नौदलाचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा तटरक्षीय सराव
* भारतीय सागर किनारपट्टीला सरक्षण देण्याच्या उद्देशाने २६/११ हल्यानंतर १० वर्षानी भारतीय नौदलाने पोरबंदरपासून ते पश्चिम बंगाल पर्यंतच्या ७५१५ किमीलांबीच्या किनारपट्टीवर एकाचवेळी दोन दिवशीय सी व्हीजील हा लष्करी सराव आयोजित केला होता.

● इम्बेक्स २०१८-१९:-
भारत आणि म्यानमार
ठिकाण;- चंडीमंदीर (हरियाणा) लष्करी तळावर पार पडला
उद्देश:-
सयुंक्त राष्ट्र संघाच्या शांतता अभियानासाठी म्यानमार सैन्यदलास प्रशिक्षण देणे.

●संप्रिती २०१९ :-
भारत आणि बांगलादेश
ठिकाण :- तंगैल (बांगलादेश)
यावर्षी या सराव मालिकेची आठवी आवृत्ती आयोजित केली आहे.

●वरुण 19.1:-
भारत आणि फ्रान्स
ही संयुक्त कवायत दोन टप्प्यात होणार आहे. गोवा आणि जिबोती येथे मे महिन्याच्या शेवटी घेतला जाणार आहे.

●ग्रुप सेल:-
कालावधी :- ३ ते ९ मे
* जपान, फिलीपीन्स आणि अमेरिकेच्या नौदल जहाजांसमवेत भारताच्या कोलकाता आणि शक्ती या जहाजांनी दक्षिण चीनी समुद्रात एकत्रित सहा दिवसांचा नौसेना ग्रुप सेल’ (Group Sail) मध्ये सहभाग घेतला
उद्देश :-
* सहभागी राष्ट्रांची भागीदारी अधिकारी दृढ करणे आणि सहभागी राष्ट्रांच्या नौदलात परस्पर सामंजस्य वृद्धींगत करणे हा यामागचा उद्देश आहे.

●सिम्बेक्स-2019:-
१६ मे ते २२ मे २०१९ या दरम्यान भारत आणि सिंगापुर यांच्या मध्ये सिम्बेक्स-2019 हा २६ वा युद्ध अभ्यास आयोजित केला होता. १९९३ या वर्षापासून दरवर्षी भारत आणि सिंगापुर यांच्या मध्ये सिम्बेक्स हा युद्धसराव आयोजित केला जातो.

●बुल स्ट्राइक:-
* ९ मे २०१९ रोजी भारतीय सैन्य दलाने अंदमान निकोबार येथे बुल स्ट्राइक’ (Bull Strike) या नावाने सैन्य अभ्यास आयोजित केला होता. या सैन्य अभ्यासात भूसेना,वायुसेना व नौदल या सैनिकांनी भाग घेतला.

●“IN-VPN BILAT EX”
* दोन्ही देशांमधील सागरी संबंध वाढविण्याच्या उद्देशाने, भारत आणि व्हिएतनाम यांच्या नौदलांचा संयुक्त सागरी सराव म्हणून यावर्षी “IN-VPN BILAT EX” या मालिकेची द्वितीय आवृत्ती आयोजित करण्यात आली.

●वायु शक्ति २०१९;-
* १६ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतीय हवाई दलाने जैसलमेर येथे सर्वात मोठा युद्धाभ्यास केला. पोखरणमध्ये हवाई दलाने आयोजित केलेल्या 'वायुशक्ती २०१९' या युद्धसरावात सुखोई ३०, मिग २९, मिराज २०००, जगुआर, मिग २७ या लढाऊ विमानांनी शक्तीप्रदर्शन केले. आकाशातून जमिनीवर मारा करणाऱ्या विमानांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

●अल नागह 2019”:-
* 13 मार्च 2019 रोजी भारत आणि ओमान यांच्या “अल नागह 2019” नावाच्या संयुक्त युद्धसरावाचा शुभारंभ झाला. भारतीय पायदळ आणि रॉयल आर्मी ऑफ ओमानी यांचा दोन आठवडे चालणारा हा सराव ओमानमध्ये निझवा येथील तळावर आयोजित करण्यात आला होता

●AUSINDEX  - 2019
* भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या AUSINDEX या सयुक्त नौदल सरावाची तिसरी आवृती २ ते १६ एप्रिल दरम्यान विशाखापट्टणम येथे पार पडली
* AUSINDEX हा भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांचा द्वैपक्षीय सागरी सराव असून या सरावाला २०१५ साली सुरुवात झाली.

●बोल्ड कुरुक्षेत्र-2019
* भारत आणि सिंगापुर या दोन्ही देशामधला १२ वा सयुक्त सैन्य अभ्यास ८ एप्रिल ते ११ एप्रिल २०१९ या दरम्यान झांसीच्या बबीना मिलिट्री येथे छावणीत पार पडला.दहशतवादविरोधी कार्यात सहकार्य वाढविणे, संरक्षण तंत्रज्ञानाचा विकास करणे आणि सागरी सुरक्षा सुधारणे हा या सरावाचा उद्देश आहे.

●लिमा :- २०१९
* लांगकावी आंतरराष्ट्रीय सागरी हवाई प्रदर्शन (लिमा 2019) मलेशियातल्या लांगकावी इथे २६ ते ३० मार्च २०१९ या दरम्यान पार पडले.
* भारतीय हवाई दल प्रथमच या सागरी हवाई प्रदर्शनात सहभागी होणार असून, स्वदेशात विकसित केलेल्या एलसीए लढाऊ विमानानी यात सहभाग घेतला या प्रदर्शनात सहभागी झाल्यामुळे भारतीय हवाई दलाला रॉयल मलेशियन एअर फोर्स समवेत संवाद साधण्याची आणि दोन्ही देशातल्या हवाई दलात अधिक घनिष्ट संबंध निर्माण करण्याची संधी मिळाली

●मित्र शक्ती-६:
* भारत आणि श्रीलंका यांचा ‘मित्र शक्ती-६ ” हा संयुक्त लष्करी सराव . २०१८-१९ या वर्षासाठी २६ मार्च ते ८ एप्रिल या काळात श्रीलंकेत आयोजित करण्यात आला होता.
* दोन्ही देशाच्या लष्करांच्या दरम्यान लष्करी संबंध आणि देवाणघेवाण यांचा एक भाग म्हणून दरवर्षी ‘मित्र शक्ती’ लष्करी सराव दरवर्षी आयोजित केला जातो.

दिग्गज गोलंदाजांना मागे टाकत बुमराह ठरला अव्वल

✍विंडीज विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने आपली पकड मजबूत बसवली आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना भारताने 297  धावांपर्यंत मजल मारली. यानंतर इशांत शर्मा आणि इतर भारतीय गोलंदाजांच्या भेदक
माऱ्याच्या जोरावर भारताने विंडीजला 222  धावांमध्ये गारद केलं. इशांत शर्माने विंडीजचा निम्मा संघ गारद केला.

✍तर त्याला मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी 2-2 तर जसप्रीत बुमराहने 1 बळी घेत चांगली साथ दिली.जसप्रीत बुमराहने मात्र केवळ एक बळी मिळवत दिग्गज गोलंदाजांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे.

✍कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामने खेळून सर्वात जलद 50 बळींचा टप्पा गाठणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बुमराह अव्वल स्थानावर पोहचला आहे. त्याने 11 व्या सामन्यात ही कामगिरी करुन दाखवली.

✍तसेच बुमराहने वेंकटेश प्रसाद आणि मोहम्मद शमी  यांच्या नावावर संयुक्तपणे असलेला 13 सामन्यांचा विक्रम मोडला आहे.

२८ ऑगस्ट २०१९

मंत्रिमंडळ बैठकीत झाले 25 मोठे निर्णय; आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी घोषणांचा धडाका

 
मुख्यमंत्री बैठकीतील निर्णय पुढीलप्रमाणे :
1. राज्यातील मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांच्या मानधनात दीडपटीने वाढ.
2. मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेच्या टप्पा 2 व 3 ला मान्यता.
3. सदनिकांच्या मालकी अधिकाराची नोंद अभिलेखात घेण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल नियम 2019 नव्याने तयार करण्यात येणार.
4. शासकीय आश्रमशाळांचे इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमामध्ये रुपांतर करण्याचा निर्णय.
5. नाशिक महानगर प्रदेश क्षेत्रात सार्वजनिक जलद परिवहन व्यवस्था प्रकल्पांर्गत मेट्रो प्रकल्प राबविण्यास मान्यता.
6. मुंबई शहरातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त व बिगर उपकरप्राप्त इमारतींचा समूह पद्धतीने पुनर्विकास करण्यासाठी म्हाडा अधिनियमात सुधारणा.
7. विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यास मान्यता.
8. शासकीय वैद्यकीय, दंत व आयुर्वेद आणि शासन अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील आंतरवासितांचे विद्यावेतन सहा हजारांवरून अकरा हजार रुपये.
9. कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन व संशोधन केंद्र सुरू करण्यास मान्यता.
10. राज्यातील शहरांमधील विघटनशील (ओल्या) कचऱ्यापासून तयार करण्यात येणाऱ्या कंपोस्ट खत निर्मितीला चालना देण्यासाठी प्रोत्साहन अनुदान.
11. बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाला तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता.
12. पर्यटन प्रकल्पांना देय असलेली वित्तीय प्रोत्साहने वितरित करण्याबाबत.
13. महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक अंतर्गत एकलव्य निवासी शाळांमध्ये पहिले ते पाचवीचे वर्ग सुरू करण्यात येणार.
14. नागपूरच्या मिहान प्रकल्पास सुधारित प्रशासकीय व वित्तीय मान्यता.
15. वर्धा येथे नवीन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सुरू करण्यास मान्यता.
16. कायमस्वरुपी बंद करण्यात आलेल्या आदिवासी विभागाच्या अनुदानित आश्रमशाळा ठाणे जिल्ह्याच्या कल्याण येथील अखिल भारतीय मागासवर्गीय समाज प्रबोधन संस्थेस हस्तांतरित व स्थलांतरित करून आदिम जमातीतील विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा चालविण्यास मान्यता.
17. राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून महाराष्ट्र शासनामार्फत खेळत्या भागभांडवलासाठी मार्जिन मनी लोन सहकारी साखर कारखान्यांना उपलब्ध करण्यात येणार.
18. नाशिकच्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाला राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त विकास महामंडळाकडून कर्ज स्वरुपात निधी मिळण्यासाठी शासन हमी.
19. नागपूरच्या मौजा बिनाकी येथील बिनाकी हाऊसिंग स्कीममधील झोपडपट्टी वसाहतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या लाभात होणाऱ्या दस्तावरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास मंजुरी. 
20. मुंबई येथे हैद्राबाद (सिंध) नॅशनल कॉलिजिएट युनिव्हर्सिटी स्थापन करण्यास मान्यता.
21. महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम-1949 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता. अवैध साठा, विक्री केल्यास शिक्षेत वाढ.
22. मिशन मंगल या हिंदी चित्रपटास राज्य जीएसटी कराच्या परताव्यासाठी शासन निर्णय काढण्यास मान्यता.
23. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 48(8) मध्ये सुधारणा.
24. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 24-अ मध्ये सुधारणा करण्याबाबत. अध्यादेश पुन्हा जारी करण्यास मान्यता.
25. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमामध्ये सुधारणा करणार. सरपंच, पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्षांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास पुरेसा कालावधी मिळणार.

​🔹जागतिक आनंदी देश अहवाल 2019 जाहीर


सयुक्त राष्ट्राच्या UN sustainable Development Solution Network मार्फत २०१२ पासून जागतिक आनंद अहवाल जाहिर केला जातो. २०१९ चा अहवाल २० मार्च २०१९ रोजी (जागतिक आनंदी दिवस ) आपला सातवा अहवाल सादर केला गेला. यावर्षीची थीम "हॅपीएर टुगेदर" आहे. या अहवालात या वर्षी भारत १४० व्या स्थानावर पोहोचला आहे. गतवर्षी  तो १३३ व्या क्रमांकावर होता. फिनलँड सलग दुसऱ्या वर्षी सर्वोच्च स्थानी कायम आहे.

संयुक्त राष्ट्र महासभाने २०१२ मध्ये २० मार्च हा दिवस  जागतिक आनंदी दिवस घोषित केला होता. संयुक्त राष्ट्र ही सूची ६ घटकांच्या आधारावर निश्चित करते. यामध्ये उत्पन्न, निरोगी जीवन, सामाजिक अहवाल, स्वातंत्र्य, विश्वास आणि उदारतेचा समावेश आहे. याचे मोजमाप 1 ते 10 मध्ये होते. या अहवालानुसार, मागील काही वर्शांत समग्र जागतिक आनंदात घसरण झाली आहे.संयुक्त राष्ट्राचा सातवा वार्षिक आंनदी देशांचा हा अहवाल जगातील १५६ देशांवर आधारित आहे. या देशातील नागरिक स्वत:ला किती आनंदी समजतात, यावर तो अवलंबून असतो. यामध्ये चिंता, उदासी आणि आणि क्रोधसहित नकारात्मक भावनांमध्ये वृद्धी झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.

▪️जगातील सर्वाधिक आनंदी पाच देश
१) फिनलँड 
२) डेन्मार्क
३) नॉर्वे
४) आईसलँड
५) नेदरलँड

▪️जगातील सर्वात दुखी ५ देश
१) दक्षिण सुदान (१५६)
२) मध्य अफ्रिकन गणराज्य (१५५)
३) अफगाणिस्तान (१५४)
४) टांझानिया (१५३)
५) रवांडा (१५२)

▪️भारताच्या शेजारील राष्ट्रांचे स्थान
नेपाळ - १००
भूतान - ६५
श्रीलंका - १३०
अफगनिस्तान - १५४
पाकिस्तान - ६७
चीन - ९३
बांगलादेश - १२५

जगातील सर्वांत श्रीमंत देशांपैकी एक असलेला अमेरिका मात्र आनंदात १९ व्या स्थानी आहे. २०१८ च्या अहवालानुसार १५६ देशांच्या यादीत भारत १३३ व्या स्थानावर आहे .२०१७ च्या व २०१६ च्या अहवालानुसार भारत अनुकमे १२२ व्या व ११८ व्या स्थानी होता

थोडक्यात, भारताचे स्थान या अहवालात सालदरसाल घसरत आहे.
--------------------------------------------------------

Article 370: सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला नोटीस, सात दिवसांत उत्तर देण्याचा आदेश

👉🏻_ जम्मू काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारं ३७०वं कलम रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकांवर सुनावणी करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला आहे. पाच न्यायाधीशांचं संविधान पीठ या प्रकरणांची सुनावणी करणार आहे. न्यायालयानं केंद्र सरकार आणि जम्मू काश्मीर सरकारलाही यासंदर्भात नोटीस जारी केली आहे.

👉🏻_ याप्रकरणी नोटीस जारी करण्याची गरज नाही, असा दावा महाधिवक्ता के के वेणुगोपाल यांनी केला होता, तो देखील सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळून लावला आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस जारी करत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कलम ३७० शी संबंधित सर्वच याचिकांवर सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता

⚡ 15-20 ऑक्टोबर दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकाचे बिगुल वाजण्याची शक्यता!

💁‍♂ विधानसभा निवडणूक केव्हा जाहीर होणार, याबद्दल अनेक अंदाज व्यक्‍त होत असले,  तरी 12 सप्टेंबरनंतर निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.

📆 साधारणतः 15 ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान निवडणूका होऊ शकतात तसेच 2 टप्प्यांत मतदान होईल, अशी शक्यता आहे.

📍 या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपत असून त्याआधी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. दिवाळी 25 ऑक्टोबरपासून सुरू होत असून त्याआधी मतदान होईल, असे सांगितले जाते.

📢 राज्यात प्रचार यात्रा सक्रिय : येत्या काही दिवसांमध्ये निवडणुकांच्या अधिकृत तारखा जाहीर केल्या जाणार आहे. दरम्यान; राज्यात मुख्यमंत्री फडणवीसांची महाजनादेश यात्रा, काँग्रेसची पर्दाफाश यात्रा, राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा, शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा सध्या सुरू आहे.

मुंबईत विद्यापीठ, नाशिकमध्ये मेट्रो; मंत्रिमंडळाचा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत मुंबईत हैदराबाद विद्यापीठ स्थापन करण्याचा आणि नाशिकमध्ये मेट्रो प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात हे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी नाशिक महानगर प्रदेश क्षेत्रात सार्वजनिक जलद परिवहन व्यवस्था प्रकल्पांर्गत मेट्रो प्रकल्प राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच मुंबई येथे हैद्राबाद (सिंध) नॅशनल कॉलिजिएट युनिव्हर्सिटी स्थापन करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.

शैक्षणिक सुधारणांवर जोर

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शैक्षणिक सुधारणांवर सर्वाधिक जोर देण्यात आला. या बैठकीत शासकीय आश्रमशाळांचे इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमामध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच शासकीय वैद्यकीय, दंत व आयुर्वेद आणि शासन अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील आंतरवासितांचे विद्यावेतन सहा हजारांवरून अकरा हजार रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला आहे. कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये 'कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन व संशोधन केंद्र' सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक अंतर्गत एकलव्य निवासी शाळांमध्ये पहिली ते पाचवीचे वर्ग सुरू करण्यात येणार असून कायमस्वरुपी बंद करण्यात आलेल्या आदिवासी विभागाच्या अनुदानित आश्रमशाळा ठाणे जिल्ह्याच्या कल्याण येथील अखिल भारतीय मागासवर्गीय समाज प्रबोधन संस्थेस हस्तांतरित व स्थलांतरित करून आदिम जमातीतील विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा चालविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळाचे निर्णय

>> ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांच्या मानधनात दीडपटीने वाढ

>> मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेच्या टप्पा २ व ३ ला मान्यता

>> मुंबई शहरातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त व बिगर उपकरप्राप्त इमारतींचा क्लस्टरद्वारे पुनर्विकास करण्यासाठी म्हाडा अधिनियमात सुधारणा

>> शहरांमधील विघटनशील (ओल्या) कचऱ्यापासून तयार करण्यात येणाऱ्या कंपोस्ट खत निर्मितीला चालना देण्यासाठी प्रोत्साहन अनुदान

>> नागपूरच्या मिहान प्रकल्पास सुधारित प्रशासकीय व वित्तीय मान्यता

>> वर्धा येथे नवीन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सुरू करण्यास मान्यता

>> नाशिकच्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाला राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त विकास महामंडळाकडून कर्ज स्वरुपात निधी मिळण्यासाठी शासन हमी

>> महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम-१९४९ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता. अवैध साठा, विक्री केल्यास शिक्षेत वाढ

>> सरपंच, पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्षांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास पुरेसा कालावधी मिळणार

>> सदनिकांच्या मालकी अधिकाराची नोंद अभिलेखात घेण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल नियम २०१९ नव्याने तयार करण्यात येणार.

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा वर्षाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बुधवारी मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत निर्णयांचा वर्षाव करण्यात आला. या बैठकीला अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवर आणि गिरीश महाजन यांचीही उपस्थिती होती. विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याच्या निर्णयाबरोबरच बैठकीमध्ये २५ निर्णय घेण्यात आले आहेत.

‼️मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (28 ऑगस्ट 2019)‼️

1. राज्यातील मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांच्या मानधनात दीडपटीने वाढ.

2. मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेच्या टप्पा 2 व 3 ला मान्यता.

3. सदनिकांच्या मालकी अधिकाराची नोंद अभिलेखात घेण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल नियम 2019 नव्याने तयार करण्यात येणार.

4. शासकीय आश्रमशाळांचे इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमामध्ये रुपांतर करण्याचा निर्णय.

5. नाशिक महानगर प्रदेश क्षेत्रात सार्वजनिक जलद परिवहन व्यवस्था प्रकल्पांर्गत मेट्रो प्रकल्प राबविण्यास मान्यता.

6. मुंबई शहरातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त व बिगर उपकरप्राप्त इमारतींचा समूह पद्धतीने पुनर्विकास करण्यासाठी म्हाडा अधिनियमात सुधारणा.

7. विनाअनुदानित शाळांना अनुदान देण

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...