१२ ऑगस्ट २०१९

🌺🌺गेल्या १७ वर्षांत यंदा राज्यसभेची कामगिरी ठरली सर्वोत्कृष्ट; तब्बल ३१ विधेयके मंजूर🌺🌺

🔰गेल्या १७ वर्षात यंदा पहिल्यांदाच राज्यसभेची कामगिरी ही सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे. कारण, बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी राज्यसभेकडे मंजुरीसाठी आलेल्या ३३ विधेयकांपैकी तब्बल ३१ विधेयके मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे सुमारे १०५ टक्क्यांनी विधेयकांच्या मंजुरी प्रमाणात वाढ नोंदवली गेली आहे.

🔰या मंजूर विधेयकांमध्ये जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक २०१९, मुस्लिम महिलांचे वैवाहिक हक्क संरक्षण विधेयक २०१९ (तिहेरी तलाक) या महत्वाच्या विधेयकांचा समावेश आहे. या अधिवेशनाचा कार्यकाळ संपताना राज्यसभेचे सभापती एम. वैंकय्या नायडू यांनी सांगितले की, गेल्या पाच अधिवेशनांमध्ये सभागृहाची मंजुरी क्षमता ही ७.४४ टक्क्यांहून ६५.६० टक्क्यांवर पोहोचली. गेल्या पाच वर्षातील ही आकडेवारी १०० टक्क्यांहून अधिक आहे.

🔰या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेत ३६ तर राज्यसभेत ३१ विधेयके मंजूर झाली आहेत. ही ३१ विधेयके ३५ बैठकांमध्ये मंजूर करून घेण्यात आली. राज्यसभेची ही गेल्या १७ वर्षातली सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे. एकूण ५२ सत्रांमध्ये ही कामगिरी केली गेली. २४९ सत्रांपैकी कामकाजाचे अडीज दिवस हे गोंधळामुळे वाया गेले, यामध्ये सभागृहाच्या कामकाजाची १९ तास १२ मिनिटे वायाला गेली.

🔰नायडू म्हणाले, या अधिवेशनात मंजूर झालेली विधेयके ही देशात सामाजीक, आर्थिक आणि भौगोलिकदृष्ट्या परिणाम करणारी महत्वाची विधेयके होती. यांपैकी तिहेरी तलाक विधेयक जे गेल्या ६० वर्षांत हिंदू कोड बिलानंतर मंजूर झालेले सर्वाधिक महत्वाचे सामाजीक सुधारणा विधेयक होते. त्याचबरोबर जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक हे देखील एक ऐतिहासिक विधेयक होते.

११ ऑगस्ट २०१९

📚 *चालू घडामोडी (11/08/2019)*📚


▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा*

● 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची नवी दिल्ली येथे घोषणा करण्यात आली.

● ‘हेलारो’  या गुजराती चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला.

● ‘भोंगा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला.

● मराठी चित्रपट ‘पाणी’ ला पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार

● ‘बधाई हो’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार पटकावला.

● हिंदी चित्रपट ‘पॅड मॅन’ ला सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषित करण्यात आले.

● ‘अंधाधुन’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला.

●  ‘ओंदला एर्दला’ या कन्नड चित्रपटाला राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा नर्गीस दत्त पुरस्कार जाहीर झाला.

● ‘पाणी’ या मराठी चित्रपटाला पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरवण्यात आले.

● ‘नाळ’ या मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यांना सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा इंदिरा गांधी पुरस्कार जाहीर झाला. या चित्रपटातल्या भूमिकेसाठी श्रीनिवास पोकळेला सर्वोत्कृष्ट बालकलाकार ठरवण्यात आले.

● ‘चुंबक’ या मराठी चित्रपटासाठी स्वानंद किरकिरे यांना सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला.

● ‘आई शप्पथ’ साठी दिग्दर्शक गौतम वझे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

● ‘आयुष्मान खुराणा आणि विकी कौशल यांना ‘अंधाधुन’ आणि ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटातल्या भूमिकांबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा संयुक्त पुरस्कार जाहीर झाला.

● तेलगू चित्रपट ‘महानती’ मधील भूमिकेसाठी किर्ती सुरेश या अभिनेत्रीला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला.

● ‘उरी’ या चित्रपटासाठी आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

___________________________
      
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *आरबीआयच्या रेपो दरात कपात*

◆ सहा सदस्यीय पत धोरण समितीने (MPC) बुधवारी रेपो दरात ०.३५ टक्क्यांची कपात करून तो ५.४० टक्के केला तर रिव्हर्स रेपो दर ५.१५ टक्के केला.

◆ ही आरबीआयने केलेली सलग चौथी कपात आहे.रेपो दर (तो व्याज दर, ज्यावर आरबीआय व्यावसायिक बँकांना कर्ज देते) ५.७५ टक्के होता, जो सप्टेंबर २०१० नंतरचा सर्वात कमी दर होता.

◆ त्यानंतर आरबीआयने तीन वेळा रेपो दर ०.७५ टक्के केला. यामुळे कर्ज स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *​लेखिका टोनी मॉरिसन यांचे निधन

• आधुनिक साहित्याच्या जनक मानल्या गेलेल्या, नोबेल पुरस्कारप्राप्त लेखिका टोनी मॉरिसन यांचे अल्प आजाराने सोमवारी रात्री येथे निधन झाले.

• त्या ८८ वर्षांच्या होत्या. बिलव्ह्ड, साँग ऑफ सोलोमन यांसारख्या त्यांच्या कादंबऱ्यांना मोठ्या प्रमाणावर वाचकांची पसंती मिळाली.

• वंशांच्या सीमा सांभाळतानाही स्वातंत्र्याचा केलेला व स्वप्नवत वाटणारा पुरस्कार हे त्यांच्या कादंबऱ्यांचे वैशिष्ट्य होते.

• मॉरिसन यांच्या निधनाचे वृत्त त्यांचे प्रकाशक आल्फ्रेड नॉफ यांनी जाहीर केले.

• टोनी मॉरिसन यांनी 'दि ब्लूएस्ट आय' ही पहिली कादंबरी त्यांच्या चाळीसाव्या वर्षी लिहिली.
https://t.me/TargetMpscMh
• वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत त्यांच्या सहा कादंबऱ्या गाजत होत्या. 'व्हिजनरी फोर्स' या त्यांच्या साहित्यकृतीला 1993 मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला.

• साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला ठरल्या.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2019*

● सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - भोंगा
● सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- अंधाधुन
● सर्वोत्कृष्ट अभिनेता – आयुषमान खुराना (अंधाधुन), विकी कौशल (उरी)
● सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - किर्ती सुरेश (महानटी)
● सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - स्वानंद किरकिरे (चुंबक)
●  सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - सुरेखा सिक्री (बधाई हो)
● सर्वोत्कृष्ट बालकलाकार - श्रीनिवास पोकळे (नाळ)
● सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - आदित्य धर (उरी)
● सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक –सुधाकर रेड्डी यंकट्टी(नाळ)
●  सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - संजय लीला भन्साळी (पद्मावत)
● सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - अरिजीत सिंग (पद्मावतमधील बिंते दिल गाण्यासाठी)
● सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - बिंदू मनी
●  सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन- कृती महेश मिद्या आणि ज्योती तोमर (पद्मावत चित्रपटातील घूमर गाण्यासाठी)
● सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपट - केजीएफ
● सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट - बधाई हो
● सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट - पॅडमॅन

राष्ट्रीय पुरस्कार 2019


••••••••••••••••••••••••••••••••••••
● सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - भोंगा
● सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- अंधाधुन
● सर्वोत्कृष्ट अभिनेता – आयुषमान खुराना (अंधाधुन), विकी कौशल (उरी)
● सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - किर्ती सुरेश (महानती)
● सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - स्वानंद किरकिरे (चुंबक)
●  सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - सुरेखा सिक्री (बधाई हो)
● सर्वोत्कृष्ट बालकलाकार - श्रीनिवास पोकळे (नाळ)
● सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - आदित्य धर (उरी)
● सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक –सुधाकर रेड्डी यंकट्टी(नाळ)
●  सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - संजय लीला भन्साळी (पद्मावत)
● सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - अरिजीत सिंग (पद्मावतमधील बिंते दिल गाण्यासाठी)
● सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - बिंदू मनी
●  सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन- कृती महेश मिद्या आणि ज्योती तोमर (पद्मावत चित्रपटातील घूमर गाण्यासाठी)
● सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपट - केजीएफ
● सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट - बधाई हो
● सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट - पॅडमॅन
● पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट - पाणी

✅✅एका ओळीत सारांश, 11 ऑगस्ट 2019✅

🌹🌳🌴दिनविशेष🌴🌳🌹

👉जागतिक सिंह दिन - 10 ऑगस्ट.

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉बेंगळुरू येथे मुख्यालय असलेल्या या बँकेला RBI कडून अनुसूचित बँकेचा दर्जा प्राप्त झाला - जन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड.

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉या ब्रिटिश अभिनेत्याला लॉस एंजेलिस (अमेरीका) येथे 25 ऑक्टोबरला ‘2019 ब्रिटानिया पुरस्कार’ सोहळ्यात चार्ली चॅपलिन पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल - स्टीव्ह कूगन.

🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹

👉66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार - गुजराती चित्रपट ‘हेलारो’.

👉66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – भोंगा.

👉या नदीखालून भारतातली पहिली अंडरवॉटर ट्रेन धावणार - कोलकातामधली हुगळी नदी.

👉जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि लद्दाख केंद्रशासित प्रदेश यांच्या स्थापनेचा दिवस - 31ऑक्टोबर 2019.

👉जलसंवर्धनाशी संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने शालेय विद्यार्थ्यांसाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागातर्फे सुरू करण्यात आलेली मोहीम - ‘समग्र शिक्षा-जल सुरक्षा’.

👉या ठिकाणी तिसरी आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रिक वाहन (EV) परिषद आयोजित करण्यात आली - मानेसर, गुरुग्राम.

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉‘SRISTI-गांधीयन यंग टेक्नोलॉजिकल इनोव्हेशन अवॉर्ड (GYTI) 2019’ या पुरस्काराचे विजेता - नलिनी सूर्यवंशी (CSIR-NCL पुणे येथील संशोधक).

🌹🌳🌴राज्य विशेष🌴🌳🌹

👉8 ऑगस्ट 2019 रोजी 2019 या वर्षासाठी "AQ" या मालिकेच्या अंतर्गत चालवली जाणारी 'स्मॉल सेव्हिंग्ज इन्सेंटिव्ह स्कीम' सादर करणारे राज्य – ओडीशा.

🌹🌳🌴विज्ञान व तंत्रज्ञान🌴🌳🌹

👉या परदेशी संस्थेच्या वैज्ञानिकांनी 100 मायक्रोमीटरपेक्षा कमी व्यास असलेली जगातली सर्वात लहान स्टेंट तयार केली - फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी(ETH), झ्यूरिच, स्वित्झर्लंड.

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉भारतात केंद्रशासित प्रदेश (UT) याचे प्रशासन सांभाळणारे प्रमुख – राष्ट्रपती (त्यांनी नेमलेल्या प्रशासकांमार्फत).

👉अंदमान व निकोबार बेटे, दिल्ली आणि पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक - लेफ्टनंट गव्हर्नर.

👉एक विधानसभा आणि मंत्रीमंडळ असलेले केंद्रशासित प्रदेश - राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली आणि पुडुचेरी केंद्रशासित प्रदेश.

👉भारतीय रिझर्व बँक कायदा-1934 याच्या या अनुसूचीत समाविष्ट केल्या जाणार्‍या बँकांना भारतातल्या अनुसूचित बँका हा दर्जा दिला जातो – द्वितीय अनुसूची.

👉इंडिया एनर्जी स्टोरेज अलायन्स (IESA) याचे स्थापना वर्ष – सन 2012.

👉भारतातली इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (ICAT) – स्थापना वर्ष: सन 2006; ठिकाण: मानेसर, हरियाणा.

👉भारत सरकारचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार याचे स्थापना वर्ष – सन 1954.

१० ऑगस्ट २०१९

💁‍♂ *राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा*


📣 दिल्लीतील शास्त्री भवनात मानाच्या 66व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची झाली घोषणा

📍 *बॉलिवूड पुरस्कार* :

● सर्वोत्कृष्ट चित्रपट : अंधाधून
● सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन :  कृती महेश मिद्या व ज्योती तोमर (पद्मावत : घूमर)
● सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक : संजय लीला भन्साळी (पद्मावत)
● सर्वोत्कृष्ट साऊंड डिझायनर : उरी
● पुरेपूर मनोरंजन करणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट : बधाई हो
● सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- :पॅडमॅन
● सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : सुरेखा सिक्री (बधाई हो)
● सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : अरिजीत सिंग (पद्मावत : बिंते दिल)
● सर्वोत्कृष्ट अभिनेता : आयुषमान खुराना (अंधाधून), विकी कौशल (उरी)
● सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : आदित्य धर (उरी)
● सर्वोत्कृष्ट अ‍ॅडाप्टेट स्क्रीनप्ले : अंधाधून

📍 *मराठी चित्रपट पुरस्कार* :

● सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट : भोंगा
● पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट : पाणी
● सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : स्वानंद किरकिरे (चुंबक)
● सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक : सुधाकर रेड्डी (नाळ)
● सर्वोत्कृष्ट बालकलाकार : श्रीनिवास पोकळे (नाळ)

📍 *इतर पुरस्कार* :

● सर्वोत्कृष्ट वेशभूषा : तेलुगू चित्रपट ‘महानटी’
● सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट : हेलारो
● सर्वोत्कृष्ट संवाद : बंगाली चित्रपट ‘तारीख’
● सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : किर्ती सुरेश (महानटी)
● सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स : तेलुगू चित्रपट ‘ऑ’ आणि कन्नड चित्रपट ‘केजीएफ’
● सर्वोत्कृष्ट अ‍ॅक्शन चित्रपट : कन्नड चित्रपट ‘केजीएफ’
● सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट : हरजीता
● सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट : बुलबुल कॅन सिंग
● सर्वोत्कृष्ट तामिळ चित्रपट : बारम
● सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट : मटानटी
● सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट : सुदानी फ्रॉम नायजेरिया

✅✅एका ओळीत सारांश,10 ऑगस्ट 2019✅✅

🌹🌳🌴दिनविशेष🌴🌳🌹

👉जागतिक आदिवासी दिन (9 ऑगस्ट) याची संकल्पना – इंडिजिनस लॅंगवेजेस.

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉वर्तमानात या देशात सर्वाधिक 840 आदिवासी भाषा बोलल्या जातात - पापुआ न्यू गिनी.

👉संयुक्त राष्ट्रसंघाचे “आंतरराष्ट्रीय आदिवासी भाषा वर्ष” – सन 2019.

👉या देशाने भारतासह 20 हून अधिक देशांना सूचीबद्ध केलेली अमली पदार्थांचे संक्रमण किंवा बेकायदेशीरपणे उत्पादन घेणार्‍या देशांची यादी प्रसिद्ध केली - अमेरीका.

🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹

👉बोलल्या जाणार्‍या आदिवासी भाषांच्या संख्येच्या बाबतीत भारताचा क्रमांक – चौथा (453 भाषांसह).

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉2019 साली ‘भारतरत्न’ हा सन्मान प्राप्त करणारे व्यक्ती - प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख.

🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹

👉8 ऑगस्टला दक्षिण आफ्रिकेच्या या फलंदाजाने सर्व क्रिकेट प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली - हाशिम आमला.

👉या खेळाडूने टी-20 क्रिकेट प्रकारात फक्त 18 धावांत 7 बळी मिळवित नवा विश्वविक्रम नोंदवला - कॉलिन अॅकरमन (दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज).

👉19-25 ऑगस्ट 2019 या काळात होणार्‍या जागतिक तिरंदाजी युवा स्पर्धेचे ठिकाण - माद्रिद, स्पेन.

🌹🌳🌴राज्य विशेष🌴🌳🌹

👉ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी या आंतरराष्ट्रीय बँकेकडून महाराष्ट्र राज्यासाठी 200 दशलक्ष डॉलर (सुमारे 1410.8 कोटी रुपये) एवढ्या रकमेचे कर्ज मंजूर करण्यात आले - आशियाई विकास बँक (ADB).

🌹🌳🌴विज्ञान व तंत्रज्ञान🌴🌳🌹

👉ही भारतीय संस्था आणि चेन्नईची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (NIOT) या संस्थेमधील संशोधक संयुक्तपणे महासागरांच्या लाटांपासून वीजनिर्मिती करण्यासाठी योग्य टर्बाइन विकसित करीत आहेत – भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मद्रास.

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉आशियाई विकास बँक (ADB) - स्थापना वर्ष: सन1966; मुख्यालय: मंडालुयोंग (मनिला, फिलीपिन्स).

👉भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार - भारतरत्न (1954सालापासून).

👉भारतरत्न सन्मान प्राप्त करणारे पहिले भारतीय - चंद्रशेखर व्यंकट रमन.

👉वर्ल्ड आर्चरी (जागतिक तिरंदाजी महासंघ) – स्थापना वर्ष: सन 1931; मुख्यालय: ल्युसाने, स्वित्झर्लंड.

👉भारतीय तिरंदाजी संघ (AAI) – स्थापना वर्ष: सन 1973; मुख्यालय: नवी दिल्ली.

०९ ऑगस्ट २०१९

🌹🌳🌴मोदी सरकारकडून ३००० ची ‘किसान’ पेंशन योजना आज पासून सुरू🌴🌳🌹

👉केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर दिल्लीतून याची सुरुवात करणार आहेत.

👉या योजनेचा फायदा देशातील ५ कोटी शेतकऱ्यांना होणार आहे.

👉स्वातंत्र्यानंतरची ही पहिलीच वेळ आहे जेव्हा शेतकऱ्यांना पेन्शन देण्यासाठी योजना सुरू केली जाईल.

👉देशभरातील अल्पभूधारक शेतकरी (एसएमएफ) साठी एक ऐच्छिक आणि योगदान देणारी पेन्शन योजना आहे.

👉या योजनेसाठी १८ ते ४० वर्षांपर्यंतचे शेतकरी अर्ज करू शकतील.

👉योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ५० रुपयांपासून १००, १५० रुपयांपर्यंत रोख रक्कम दरमहिन्याला भरावी लागेल.

👉तसंच स्किममध्ये गुंतवणुक करणाऱ्या शेतकऱ्यांना ६० वर्षाचे झाल्यानंतर दरमहिन्याला ३००० रुपये पेंशन म्हणून मिळणार.

👉पेंशन योजनेत नाव असलेल्या शेतकऱ्यांचा मृत्य़ू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला ५० टक्के रक्कम देण्यात येईल. म्हणजे १५०० रुपये मिळतील. तसंच ही योजना जीवन विमा निगम यांच्यातर्फे चालवली जाणार आहे.

👉या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी:-
१. आधार कार्ड,
२. जमिनीचा सात-बारा,
३. बँक पासबुक,
४. राशन कार्ड,
५. २ फोटो

अशा कागदपत्रांची गरज असणार आहे.

👉या योजने अंतर्गत १२ कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा करून देणे हा उद्देश आहे.

👉तसंच किसान पेंशन योजनेता लाभ घेण्यासाठी आपण किसान कॉल सेंटरच्या १८००-१८०-१५५१ या नंबरवर फोन करून माहिती घेऊ शकता. तसंच सामान्य सेवा केंद्र आणि राज्याचे कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करू शकता.

📚 *चालू घडामोडी (09/08/2019)*📚

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *लिंगाधारित अर्थसंकल्प [Gender Budget]

- या संकल्पनेचा उद्य 90 च्या दशकात झाला.
- जागतिक महिला परिषद 1995 नंतर "युनिफेम"तर्फे 1996 मध्ये द. आफ्रिका, पूर्व आफ्रिका, दक्षिण पूर्व आशिया, मध्य अमेरिका या भागात या संकल्पनेवर काम सुरू झाले.
- ही संकल्पना सर्वप्रथम ऑस्ट्रेलियात स्विकारण्यात आली.
---------------------------------------------------
● नक्की संकल्पना काय ?

- जेंडर बजेट म्हणजे महिलांसाठी वेगळा अर्थसंकल्प नव्हे, तर अर्थसंकल्पातील विविध प्रस्तावांचे महिलाकेंद्रित विश्लेषण होय.
- थोडक्यात स्त्रियांच्या स्थितीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या वित्तीय सुधारणांचे अंतिम परिणाम मोजणे म्हणजे जेंडर बजेट.
---------------------------------------------------
● भारतात सुरूवात

- सर्वप्रथम 2001 मध्ये या संकल्पनेवर विचार होवू लागला.
- तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या 2000-2001 च्या अर्थसंकल्पीय भाषणात पहिल्यांदा जेंडर बजेटचा उल्लेख झाला.
- 2004 मध्ये केंद्र सरकारने ही संकल्पना स्विकारली तर 2005 पासून त्यावरचे परिशिष्ट हा बजेटचा भाग बनले.
- ओरिसा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार, केरळ, इ. राज्यांनी या संकल्पनेची अंमलबजावणी केली.
---------------------------------------------------
● महाराष्ट्रात सुरूवात

- राज्यात 2013 मध्ये जेंडर बजेट ही संकल्पना स्विकारण्यात आली.
- 1994, 2001 आणि 2014 अशी तीन महिला धोरणे महाराष्ट्र सरकारने तयार केली आहेत.
- 1992 पासून राज्यात नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिला व बालकल्याण समिती स्थापने बंधनकारक करण्यात आले आहे.
- महापालिकेच्या एकूण बजेटपैकी 5% रक्कम जेंडर बजेटसाठी राखून ठेवण्याचे बंधनकारक आहे.
---------------------------------------------------
● जेंडर बजेटची उद्दिष्टे

- महिलांच्या सामाजिक समानतेसाठीच्या प्रमुख गरजा ओळखून त्यांची क्रमवारी लावून, त्यासाठी सुयोग्य आर्थिक तरतूद करणे.
- सामाजिक योजना आणि आर्थिक तरतुदी यांची सांगड घालणे.
- विशेष सामाजिक योजनांवरील खर्चावर नियंत्रण ठेवणे.
-------------------------------------------------
● अर्थसंकल्पाची कार्यपद्धती

- लिंगाधारित अर्थसंकल्पासाठी स्वतंत्र आदेश जारी करणे.
- जेंडर बजेट सेल स्थापन करणे.
- जेंडर बजेट अहवाल प्रसिद्ध करणे.
-------------------------------------------------
● जेंडर बजेटसाठी प्रशिक्षण

Vaikunth Mehta National Institute of Cooperative Management [VAMNICOM] Pune या संस्थेच्या Centre for Gender Studies मार्फत जेंडर बजेट संबंधी मार्गदर्शन, जागरूकता आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *आज प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना भारतरत्न*

●माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आज (8 ऑगस्ट 2019 गुरूवार) देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान पुरस्कार 'भारत रत्न' देण्यात आला.,
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जनसंघाचे नेते नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार बहाल केला.

● राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

● या पुरस्कारासाठी दि. 25 जानेवारी 2019  या तिघांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती.

प्रणव मुखर्जी

● प्रणव मुखर्जी यांचा जन्म 11 डिसेंबर 1935 रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला.

● मुखर्जी हे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसशी संबंधित आहेत.

● ते 1982 मध्ये वयाच्या 47 व्या वर्षी भारताचे सर्वात तरुण अर्थमंत्री झाले होते. त्यानंतर त्यांनी भारताचे अर्थमंत्री,परराष्ट्रमंत्री तसेच संरक्षणमंत्री म्हणून काम केले.

● पंतप्रधानां व्यतिरिक्त ,आठ वर्षे लोकसभेचे सभागृह नेते राहिलेले ते एकमेव व्यक्ती.

● भारतरत्न पुरस्कार मिळविणारे सहावे राष्ट्रपती आहेत. याआधी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, सर्वपल्ली राधाकृष्णन, झाकीर हुसेन,व्हीव्ही गिरी आणि डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांना हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला आहे.

● पद्मविभूषण:2008

● त्यांनी 25 जुलै 2012 ते 25 जुलै 2017 पर्यंत भारताचे 13 वे राष्ट्रपती म्हणून काम केले.

नानाजी देशमुख

● हिंगोली जिल्ह्य़ातील कडोली येथे 11 ऑक्टोबर 1916 रोजी त्यांचा जन्म झाला.

● नानाजी देशमुख हे सामाजिक कार्यकर्ते होते. तसेच शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण स्वावलंबन या क्षेत्रात त्यांनी काम केले.

● नानाजी देशमुख हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते होते.

● राज्यसभेचे सदस्यही होते.

● 1999 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...