०८ ऑगस्ट २०१९

🔹हिरोशिमा-नागासाकीवर अणुबॉम्ब का टाकला?

अमेरिकेने हिरोशिमा व नागासाकीवर ६ व ९ ऑगस्ट १९४५ रोजी अणुबॉम्ब टाकून प्रचंड विध्वंस केला त्या घटनेला ७१ वर्षे होत आहेत. जर्मनीच्या शरणागतीनंतर जपानी शहरांवर अणुबॉम्ब हल्ला करण्याला अनेक शास्त्रज्ञ,
सेनानी यांनी विरोध केला होता. तरीही हा हल्ला का करण्यात आला याचा ऊहापोह करणारा लेख
अमेरिकन सरकारने हिरोशिमा व नागासाकीवर ६ व ९ ऑगस्ट १९४५ रोजी अणुबॉम्ब टाकून दोन लाख जपानी नागरिकांना ठार मारले. मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहून या नरसंहाराची आठवण दरवर्षी देशोदेशींचे लाखो लोक जागवितात. ‘हिरोशिमा पुन्हा नाही’ असे म्हणत पुन्हा कधीही कोणीही अणुबॉम्बचा वापर करू नये अशी इच्छा व्यक्त करतात. परंतु काही जण मात्र अजूनही या अणुबॉम्ब हल्ल्याचे समर्थन करतात : ‘झाले हे वाईट झाले, पण अणुबॉम्ब वापरला नसता, तर दुसरे महायुद्ध खूप लांबले असते व त्यात जास्त माणसे मारली गेली असती.’ अणुबॉम्ब हल्ल्यानंतरच्या ७० वर्षांत कोणत्याही अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी हिरोशिमाला भेट दिली नव्हती. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या नुकत्याच झालेल्या पहिल्यावहिल्या हिरोशिमा भेटीत बराक ओबामांनी अपार दु:ख व्यक्त करून अण्वस्त्रमुक्त जगाची अपेक्षा केली. परंतु जपानी नागरिकांची जाहीर माफी मात्र मागितली नाही. म्हणूनच अणुबॉम्ब हल्ल्यामागील या सरकारी कारणाची तपासणी केली पाहिजे.
जर्मन फौजांनी पोलंडवर १९३९ मध्ये हल्ला केल्यामुळे सुरू झालेले दुसरे जागतिक युद्ध हिटलरच्या आत्महत्येबरोबर ३० एप्रिल १९४५ रोजी संपल्यात जमा होते. त्यानंतर आठवडाभरात ७ मे रोजी जर्मनीने शरणागती पत्करली आणि युरोपमधील दुसरे महायुद्ध संपले. कमकुवत झालेल्या जपानची शरणागती तेवढी बाकी होती. जपानच्या शरणागतीची कलमे जाहीर करण्यासाठी अमेरिकेचे हॅरी ट्रमन, इंग्लंडचे चर्चिल आणि तैवानस्थित चँग कै शेक यांची बैठक अमेरिकी राष्ट्राध्यक्षांमुळे लांबत होती. जगातील पहिली अण्वस्त्र चाचणी अमेरिकेने जुलै १६ रोजी केल्यानंतर ट्रमन यांनी ती बातमी २४ जुलै रोजी स्टालिन यांना दिली. हेरगिरीतून ही बातमी स्टालिन यांना आधीच कळाली होती. सोविएत रशियाने जपानवर हल्ला करण्याची जोरदार तयारी चालविल्याची बातमी ट्रमन यांनादेखील हेरगिरीतूनच कळाली होती. महायुद्धाने स्पर्श न केलेल्या हिरोशिमा, कोकुरा, निईगाटा आणि नागासाकी या जपानी शहरांपैकी कोणत्याही एका लक्ष्यावर ३ ऑगस्टनंतर योग्य हवामान पाहून अणुबॉम्ब टाकण्याची आज्ञा जनरल कार्ल स्पाट्झ यांना २५ जुलै रोजी मिळाली. दुसऱ्याच दिवशी जपानला शरणागतीचा निर्वाणीचा इशारा देणारी ती लांबलेली बैठक जर्मनीतील पोस्टडॅम येथे झाली. त्याच दिवशी तो इशारा आणि इशारा न पाळल्यास ‘न भूतो..’ हानी करण्याची धमकी नभोवाणीवरून प्रथम इंग्रजीत आणि नंतर दोन तासांनी जपानी भाषेत जपानकडे पोहोचविली. राजनैतिक पातळीवरून हा इशारा मात्र जपानी शासनाला पोहोचविला नाही. रशियाने जपानविरुद्ध युद्ध जाहीर करण्याआधी दोन दिवस म्हणजे ६ ऑगस्ट रोजी अमेरिकेने हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब हल्ला केला. त्यानंतर दुसरा अणुबॉम्ब हल्ला ९ ऑगस्ट रोजी नागासाकीवर केला. हल्ल्यामागील कारणांच्या तपासात कायम उपयोगी असणारा हा तारीखवार घटनाक्रम अमेरिकेतील होलोकास्ट मेमोरियल म्युझियमच्या ‘वर्ल्ड वॉर सेकंड- टाइमलाइन ऑफ इव्हेंट्स’ शीर्षकाखाली उपलब्ध आहे. (संदर्भ: https://www.ushmm.org/wlc/en/article.php?ModuleId=10007306) अण्वस्त्र हल्ल्यामुळे झालेल्या मृतांच्या संख्येच्या विविध अंदाजांपैकी मृतांचा कमीतकमी अंदाज असा आहे : हिरोशिमाच्या २ लाख ५५ हजार लोकसंख्येपैकी १ लाख ३५ हजार आणि नागासाकीतील सुमारे १ लाख ९५ हजार लोकसंख्येपैकी ६४ हजार माणसे ठार. दुसऱ्या महायुद्धात सैनिकांपेक्षा नागरिक जास्त मारले गेले आहेत. परंतु हिरोशिमा-नागासाकीमध्ये बहुसंख्य मृत्यू (९९%) निरपराध नागरिकांचे आहेत. जगातल्या कुठल्या दहशतवादी गटाने अथवा अमेरिकी शासनाच्या नजरेतील शांततेला धोकादायक कोणत्या राष्ट्राने (Rogue State) अमेरिकेच्या तोलामोलाचे दहशतवादी कृत्य केले आहे? युद्धकाळात नागरिकांवर होणारे हल्ले अनैतिक, दहशतवादी आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणारे असतात. त्याविरुद्ध १९२३ सालीच आंतरराष्ट्रीय कायदा अस्तित्वात आला होता. त्यामध्ये नुकसानभरपाईची तरतूददेखील आहे. महाभारताच्या युद्धाचेही त्या काळी धर्मनियम होते. ते मोडूनच श्रीकृष्णाने कुरुसैन्यातील द्रोणाचार्य, कर्ण, जयद्रथ अशा सेनापतींच्या हत्या करविल्या होत्या आणि भीष्माचार्यासमोर हतबल झालेल्या अर्जुनाला पाहून ‘न धरी शस्त्र करी’ हा स्वत:चा शब्द मोडून हाती सुदर्शनचR घेतल्याचे त्रिकालाबाधित सत्य व्यासांनी कथेतून सांगितले आहे. दुसऱ्या महायुद्धात आणि त्यानंतरही अनेक वेळा आंतरराष्ट्रीय नियमांची अनेक राष्ट्रांनी पायमल्ली केली आहे. असेच भयावह वक्तव्य इंग्लंडच्या नूतन पंतप्रधान तेरेसा मे यांनी नुकतेच संसदेत केले. ‘स्वत:च्या राष्ट्राचे संरक्षण’ या नावाखाली ‘दहशतवादी’ हल्ले करून लाखो नागरिकांना झटक्यात ठार मारण्याची मानसिक तयारी अनेक राष्ट्रप्रमुखांची कशी काय होते, याची उत्तरे अण्वस्त्र हल्ल्यांमागील जाहीर कलेली कारणे आणि प्रत्यक्ष कारणे, घटनाक्रम आणि निगडित संदर्भ लक्षात घेतले तर मिळू शकतील.
जर्मनीमध्ये अणुविखंडनाची साखळी प्रक्रिया १९३९ या वर्षी प्रथम हाती आली. आता अणुबॉम्बचे आव्हान तंत्रज्ञांपुढेच काय ते होते. जुलमी नाझी सत्ताकाळात अनेक ज्यू शास्त्रज्ञ जर्मनी सोडून अमेरिकेची वाट धरत होते. त्यांना जर्मनीच्या हाती येऊ शकणारा अणुबॉम्ब ही वंशविद्वेषी सत्तेच्या विजयाची खात्री वाटत होती. शांतताप्रिय अल्बर्ट आइन्स्टाइन हेदेखील त्या भावनेला अपवाद नव्हते. लिओ त्झिलार्ड या पदार्थ वैज्ञानिकाने आइन्स्टाइन यांचे मन मोठय़ा कष्टाने वळवून राष्ट्राध्यक्षांच्या पत्रावर त्यांची सही घेतल्यानेच तर मॅनहटन प्रकल्प १९४२ साली गुप्तपणे सुरू झाला. बघता बघता १ लाख ३० हजार व्यक्ती त्यासाठी झटू लागल्या. प्रकल्पाचा चार वर्षांच्या आयुष्यकाळातील एकूण खर्च (२०१६ या वर्षीच्या किमतीनुसार) २६ हजार कोटी डॉलर झाला. दरम्यान जर्मनी अण्वस्त्रे बनविण्याच्या जवळपासदेखील नाही हे कळल्यावर अनेक शास्त्रज्ञांनी मॅनहटन प्रकल्प बंद करण्याची विनंती केली होती. विनंती अमान्य केल्यामुळे अनेक शास्त्रज्ञांनी प्रकल्पाच्या कामातून अंग काढले. व्यथित झालेल्या आइन्स्टाइन यांना अणुबॉम्ब बनविण्याची विनंती करणाऱ्या पत्रावर सही करणे ही भलीमोठी चूक वाटली. अण्वस्त्र हल्ल्यामागचे बदललेल्या परिस्थितीमधील ‘मानवी हत्येची किमान किंमत मोजून महायुद्ध लवकर संपविणे’ हे कारण लेखाच्या सुरुवातीला पाहिले आहे. स्टीमसन आणि ट्रमन यांनी ते जनतेच्या गळी यशस्वीपणे उतरविले. अमेरिकेत ते कारण अजूनही शाबूत आहे. कदाचित त्याचाच आधार घेऊन महायुद्धानंतर राष्ट्राध्यक्षांच्या पहिल्यावहिल्या हिरोशिमा भेटीत बराक ओबामांनी बॉम्बहल्ल्यातून बचावलेल्यांपैकी काही मंडळींची प्रतीकात्मक गळाभेट घेतली, अपार दु:ख व्यक्त केले आणि अण्वस्त्रमुक्त जगाची अपेक्षा केली. परंतु जपानी नागरिकांची जाहीर माफी नाही मागितली. ही दांभिकता नसेल तर काय आहे?
जर्मनीच्या शरणागतीनंतर जपानी शहरांवर अणुबॉम्ब हल्ला करण्याला अनेक शास्त्रज्ञ, सेनानी यांनी विरोध केला होता. त्यात आइन्स्टाइन यांच्या पहिल्या नावानंतर इतरही अनेक मान्यवर आणि अनुभवी व्यक्ती आहेत. त्यांची अवतरणे आणि अवतरणांचे स्रोत ‘हू डिसअॅग्रीड विथ द अॅटमिक बॉम्बिंग’ या शीर्षकाखाली सापडतात. (संदर्भ; http://www.doug-long.com/quotes.htm ) त्यातील पहिले नाव आहे अमेरिकन आर्मीचे पंचतारांकित जनरल आणि दुसऱ्या महायुद्धात दोस्त सेनांचे सर्वोच्च अधिकारी आयसेनहॉवर यांचे. त्यांनी लिहून ठेवले आहे की, ‘सेक्रेटरी ऑफ वॉर स्टीमसन यांनी जुलै १९४५ मध्ये माझी जर्मनीतील कार्यालयात भेट घेतली. भेटीत अमेरिकेने अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केल्याचे सांगितले आणि जपानी शहरांवर त्यांचा प्रत्यक्ष वापर करण्याच्या प्लॅनिंगचे सूतोवाच केले. त्यावर माझे मत विचारले. माझे मत स्पष्ट होते: ‘जपान आता जवळजवळ पराभूत झाला आहे. अशा वेळी अणुबॉम्बचा वापर अमेरिकन सैन्याची हानी रोखण्यासाठीदेखील अनावश्यक आहे. शिवाय, असे महाभयंकर अस्त्र वापरून अमेरिकेने जगाला विनाकारण धक्का देऊ नये. माझ्या स्पष्टोक्तीमुळे स्टीमसन अस्वस्थ झाले होते.’ आयसेनहॉवर यांची राष्ट्राध्यक्षीय कारकीर्द १९६१ मध्ये पूर्ण झाली. त्यानंतर याच मताचा पुनरुच्चार त्यांनी ११ नोव्हेंबर १९६३च्या न्यूजवीकमधील मुलाखतीत केला आहे.
अॅडमिरल विल्यम लेव्ही हे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलीन रुझवेल्ट आणि ट्रमन या दोघांचेही मुख्य सल्लागार होते. ते स्वत:चे मत सांगताना म्हणतात, ‘या पाशवी अस्त्राचा हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर वापर करण्याचा जपानविरोधी युद्धात मुळीच उपयोग झाला नाही. जपानचा आधीच पराभव झाला होता. अमेरिकेने अशा अस्त्राचा जगात प्रथम वापर करून पाशवीपणाचे नवे मानांकन घडविले आहे.’ वरील इंटरनेट साइट आणखी काही मान्यवर अमेरिकन अधिकाऱ्यांचा विरोध नोंदविते. जपानवर बॉम्ब टाकण्यापूर्वी एखाद्या निर्जन बेटावर अणुबॉम्ब टाकून त्याची संहारक शक्ती जपानसह जगाला दाखवून द्यावी, असेही काही शास्त्रज्ञांनी सुचवले होते. पण ट्रमन यांनी कोणताही सल्ला मानला नाही. यावरून अणुबॉम्ब वापराचे कारण आता बदलल्याचे स्पष्ट होते.
ट्रमन यांनी रशियन फौजा जपानमध्ये उतरण्याआधी अणुबॉम्ब हल्ल्याचा निर्णय कृतीत उतरविला. त्यामुळे जपानवरील विजयाची माळ सोविएत रशियाच्या गळ्यात पडू नये आणि रशियाला भविष्यातही अमेरिकेची धास्ती वाटावी हे अणुबॉम्ब हल्ल्याचे खरे राजकीय कारण होते, असे मत डॉ. गेर अल्पेरोवित्झ या अमेरिकी इतिहासतज्ज्ञासह काही अभ्यासकांचे झालेले आहे. अणुबॉम्ब हल्ल्यानंतर मोजक्या दिवसांत अमेरिकेने गोळा केलेल्या डेटाचा आवाका पाहता रशियाकेन्द्री कारणालामानवी आणि इतर हानीची प्रत्यक्ष मोजदाद करण्यासाठी जिवंत प्रयोग, अशी पुस्ती जोडली पाहिजे.

Source: loksatta

चित्रभूषण’  पुरस्कार :-


••••••••••••••••••••••••••••••

● अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणारा ‘चित्रभूषण’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, भालचंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, सुषमा शिरोमणी तसेच ज्येष्ठ कलादिग्दर्शक श्रीकांत धोंगडे  व निर्माते किशोर मिस्कीन यांना जाहीर झाला आहे.
● शाल, श्रीफळ आणि ५१,०००/- रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
● रमेश साळगांवकर, संजीव नाईक, विलास उजवणे, आप्पा वढावकर, नरेंद्र पंडीत, प्रशांत पाताडे, दिपक विरकूड, विलास रानडे, विनय मांडके, जयवंत राऊत, सतीश पुळेकर, प्रेमाकिरण, सविता मालपेकर, चेतन दळवी, अच्युत ठाकूर, वसंत इंगळे या कलाकर्मीना ‘चित्रकर्मी’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ आणि ११,००० /- रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
● चित्रभूषण  पुरस्कार  (पुरुष विभाग )
● सन २०१५-२०१७
१) भालचंद्र कुलकर्णी - अभिनेता
२) श्रीकांत धोंगडे - कला- प्रसिद्धी
३) किशोर मिस्कीन  -  निर्माता
४)विक्रम गोखले   - अभिनेता / दिग्दर्शक  
● चित्रभूषण  पुरस्कार  (स्त्री विभाग )
● सन २०१५-२०१७
१) श्रीमती लीला गांधी -  अभिनेत्री / नृत्यांगना
२) श्रीमती सुषमा शिरोमणी  - अभिनेत्री / निर्माती / दिग्दर्शिका / वितरक

● चित्रकर्मी  पुरस्कार  विजेते
●सन २०१५-२०१७
१) रमेश साळगांवकर - दिग्दर्शक
२) संजीव नाईक   -  संकलक / निर्माता / दिग्दर्शक
३) विलास उजवणे  -  अभिनेता
४) आप्पा वढावकर  - संगीत संयोजक
५) नरेंद्र पंडीत - नृत्य दिग्दर्शक
६) प्रशांत पाताडे  - ध्वनीरेखन
७) दिपक विरकूड + विलास रानडे - संकलक
८) विनय मांडके  - गायक
९) जयवंत राऊत -  छायाचित्रण
१०) सतीश पुळेकर  -  अभिनेता
११) श्रीमती प्रेमाकिरण  - अभिनेत्री / निर्माती
१२) श्रीमती सविता मालपेकर - अभिनेत्री
१३) चेतन दळवी - अभिनेता
१४)अच्युत ठाकूर -  संगीतकार
१५) वसंत इंगळे - निर्मिती प्रबंधक / अभिनेता

राज्य मंत्रिमंडळाची 07 ऑगस्ट बैठक पार पडली.

कोल्हापूर, सातारा, सांगली आणि रत्नागिरीतील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा स्थगित करुन तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली होती. बैठकील सर्व मंत्र्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. या बैठकीत पूरग्रस्त जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. सोबत अनेक महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले. या दहा निर्णयांवर एक नजर...

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) :07 ऑगस्ट 2019

1. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांसह विधवा लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात वाढ.

2. सर्वांसाठी घरे धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागातील अतिक्रमणांबाबत समिती स्थापन करण्याचा निर्णय.

3. जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती तसेच पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती पदासाठी होणाऱ्या निवडणुका तात्पुरत्या लांबणीवर.

4. राज्य निवडणूक विभाग नव्याने निर्माण करुन त्यासाठी 128 पदे निर्माण करण्याबाबत.

5. केंद्र शासनाच्या निर्भया निधी योजनेत मुंबईसह इतर डीएनए फॉरेन्सिक लॅबच्या सक्षमीकरणाबाबत.

6. गडचिरोली जिल्ह्यातील मौजा नवेगाव येथे केंद्रीय विद्यालयास भाडेपट्ट्याने जमीन देण्याबाबत.

7. चंद्रपूर जिल्ह्यातील मौजे कोर्टी मोक्ता येथे भारत राखीव बटालियन क्र.4 अकोला जिल्ह्यातील मौजा शिसा उदेगाव येथे भारत बटालियन क्र. 4 आणि जळगाव जिल्ह्यातील हातनूर येथे राज्य राखीव पोलीस गट स्थापन करण्यास मान्यता.

8. विद्यापीठ विद्यार्थी परिषदांच्या निवडणुकांबाबत.

9. तिरुपती देवस्थान संस्थेसाठी शासकीय जागा देण्याबाबत.

10. प्रगतीपथावरील पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दीर्घ मुदतीचे कर्ज घेण्यास मान्यता.

✅✅एका ओळीत सारांश, 8 ऑगस्ट 2019✅✅

🌹🌳🌴दिनविशेष🌴🌳🌹

👉भारतातला राष्ट्रीय हातमाग दिन - 7 ऑगस्ट.

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉या कंपनीने अखंडित ऑनलाइन व्यवहारांसाठी “आयडेंटिटी चेक एक्सप्रेस” या नावाचे एक वैशिष्ट्य सादर केले - मास्टरकार्ड.

👉नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनोमिक रिसर्च (NCAER) यांच्या मते, 2019-20 या वित्त वर्षात भारताची GDP वाढ – 6.2%.

👉बँकांना प्राधान्य क्षेत्रातला प्रमुख कर्जप्रदाता म्हणून वागविण्यासाठी, भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) बँकांना बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या (NBFCs) माध्यमातून या क्षेत्रात कर्ज वाटप करण्यास परवानगी दिली - कृषी, MSME उद्योग आणि परवडणारी घरे.

👉7 ऑगस्ट रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) ठरविलेला नवा रेपो दर (त्याचा कर्ज दर) - 5.40%.

👉7 ऑगस्ट रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) अंदाजित केलेला 2019-20 या वर्षीचा भारताचा वास्तविक किंवा महागाई याने समायोजित सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) - 6.9%.

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉7 ऑगस्ट रोजी मध्यस्थीमधून तयार झालेल्या आंतरराष्ट्रीय तंटा निवारण करार विषयक संयुक्त राष्ट्रसंघाची परिषद (UNISA) याच्या 46 सदस्यांनी स्वाक्षरी केला तो करारनामा - सिंगापूर “कन्व्हेंशन ऑन मीडियेशन”.

👉पॅलेस्टिनी शरणार्थींसाठीच्या युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सीला (UNRWA) मदत म्हणून भारताने इतकी रक्कम देऊ केली - 5 दशलक्ष डॉलर.

👉अमेरिकेच्या या नोबेल पुरस्कार विजेत्या साहित्यकाराचे, ज्यांचा 5 ऑगस्ट 2019 रोजी मृत्यू झाला - टोनी मॉरिसन.

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री राहिलेल्या या व्यक्तीचे यांचे निधन - सुषमा स्वराज.

👉पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनचे नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक - कांदिकुप्पा श्रीकांत.

🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹

👉न्यूझीलंडच्या या माजी कर्णधाराने 5 ऑगस्ट रोजी सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली - ब्रेंडॉन मेकॉलम.

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉पॅलेस्टिनी शरणार्थींसाठीच्या युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सीला (UNRWA) याचे स्थापना वर्ष - सन 1949.

👉पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन याचे स्थापना वर्ष - सन 1989.

👉मध्यस्थीमधून तयार झालेल्या आंतरराष्ट्रीय तंटा निवारण करार विषयक संयुक्त राष्ट्रसंघाची परिषद (UN Convention on International Settlement Agreements -UNISA) स्वीकारले गेले ते वर्ष – सन2018 (20 डिसेंबर).

👉भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) – स्थापना वर्ष: सन 1935; मुख्यालय: मुंबई (महाराष्ट्र).

👉सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) याची पहिल्यांदा मूलभूत संकल्पना मांडणारे ब्रिटिश अर्थशास्त्री - विलियम पेटी (सन 1654).

०७ ऑगस्ट २०१९

✅✅एका ओळीत सारांश, 7 ऑगस्ट 2019✅✅

✅✅एका ओळीत सारांश, 7 ऑगस्ट 2019✅✅

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉जगातली तृतीय क्रमांकाची श्रीमंत महिला - मॅकेन्झी बेझोस (36.8 अब्ज डॉलर).

🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹

👉क्राइसिस कम्युनिकेशन्स आणि इंटर्नल कम्युनिकेशन्स या दोन श्रेणींमध्ये ‘SCOPE कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड 2019’ याचा विजेता - भारतीय पोलाद प्राधिकरण मर्यादित (SAIL).

👉भारत सरकारने तयार केलेले दोन नवे केंद्रशासित प्रदेश - जम्मू व काश्मीर आणि लडाख.

👉जेथे ‘टेकएक्स 2019’ (टेक्नॉलॉजी एक्झिबिशन) आयोजित करण्यात आले ते ठिकाण - IIT दिल्ली.

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉8 ऑगस्ट रोजी मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सवात 'एक्सिलन्स इन सिनेमा' हा सन्मान प्राप्त होईल तो बॉलिवूडचा अभिनेता - शाहरुख खान.

👉4 ऑगस्ट रोजी निधन झालेले ज्येष्ठ गुजराती पत्रकार - कांती भट्ट.

🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹

👉ATP वॉशिंग्टन ओपन 2019 मध्ये पुरुष एकेरी गटाचा विजेता - निक किर्गीओस (ऑस्ट्रेलिया).

👉दक्षिण आफ्रिकेच्या या वेगवान गोलंदाजाने 5 ऑगस्टला कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली - डेल स्टेन.

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉राज्यघटनेतल्या या कलमामुळे जम्मू व काश्मीरला स्वायत्त राज्याचा दर्जा दिला गेला - कलम 370.

👉केंद्र सरकारच्या थेट नियंत्रणाखाली असलेला भूप्रदेश - केंद्रशासित प्रदेश.

👉दक्षिण आफ्रिका – राजधानी: केप टाउन (संविधानक); राष्ट्रीय चलन: दक्षिण आफ्रिकन रँड.

👉असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स (ATP) – स्थापना वर्ष: 1972; मुख्यालय: लंडन, ब्रिटन.

भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन

​🔹

देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले आहे. त्या ६७ वर्षांच्या होत्या. सुषमा स्वराज यांच्या निधनाने एका मितभाषी आणि तितक्यात कणखर नेतृत्वाला देश मुकला आहे.

▪️निवडणूक न लढवण्याचा निर्णय

सुषमा स्वराज सर्वप्रथम १९९० मध्ये राज्यसभेवर निवडून आल्या. १९९६ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्या विजयी झाल्या. सुषमा यांनी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण व नंतर आरोग्य मंत्रालयाची धुरा वाहिली. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांना परराष्ट्र मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आणि त्यांनी ती यशस्वीपणे सांभाळली. सुषमा यांनी आपल्या ओजस्वी वाणीने जागतिक व्यासपीठांवर दबदबा निर्माण केला. संयुक्त राष्ट्रसंघातील सडेतोड भाषणाने त्यांनी सर्वांची मने जिंकली. सोशल मीडियातून येणाऱ्या विविध तक्रारींचा त्यांनी तिथल्या तिथे निपटारा करून वाहवा मिळवली. सोळाव्या लोकसभेत सुषमा मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीतून त्यांनी स्वत:हून माघार घेतली. प्रकृतीच्या कारणास्तव आपण निवडणूक लढणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. दिल्लीच्या त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या.

सात वेळा लोकसभेच्या खासदार राहिलेल्या स्वराज या वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी हरियाणाच्या मंत्रीमंडळात मंत्रीपदावर विराजमान झालेल्या.

▪️अवघ्या 25व्या वर्षी केंद्रीय मंत्रिपदाची धुरा

1977 मध्ये वयाच्या 25व्या वर्षी सुषमा स्वराज केंद्रीय मंत्री झाल्या होत्या. सर्वात कमी वयाच्या कॅबिनेट मंत्री म्हणून त्या कायम स्मरणात राहतील. 1977 ते 1979 दरम्यान समाजकल्याण, श्रम आणि रोजगार यासारख्या आठ खात्यांची जबाबदारी त्यांनी सक्षमपणे सांभाळली होती. त्यानंतर, वयाच्या 27व्या वर्षी त्या जनता पार्टीच्या हरियाणा प्रदेशाध्यक्ष झाल्या होत्या.

राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्षाच्या पहिल्या महिला प्रवक्त्या म्हणूनही सुषमा स्वराज यांची आठवण येईल. त्याशिवाय, पहिल्या महिला मुख्यमंत्री आणि पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या म्हणूनही स्वराज यांच्या नावाची नोंद देशाच्या राजकीय इतिहासात आहे.

देशाच्या परराष्ट्र मंत्री म्हणून इंदिरा गांधी यांनी सर्वप्रथम जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर हे जबाबदारीचं पद भूषवणाऱ्या सुषमा स्वराज दुसऱ्या महिला नेत्या होत्या. चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत त्या एकूण 11 निवडणुका जिंकल्या. त्या तीन वेळा विधानसभेवर निवडून गेल्या होत्या, तर सात वेळा खासदार म्हणून विजयी झाल्या होत्या.

मोदी सरकार-1 दरम्यान परराष्ट्र मंत्री म्हणून सुषमा स्वराज यांनी केलेल्या कामाला तर तोड नव्हती. ट्विटरवरून साद घालणाऱ्या प्रत्येकाला सुषमांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. छोट्या छोट्या गोष्टींपासून ते कुलभूषण जाधव आणि गीताच्या सुटकेसाठी मनापासून प्रयत्न केले होते. त्यासाठी देश त्यांचा कायमच कृतज्ञ राहील.

०६ ऑगस्ट २०१९

✅✅एका ओळीत सारांश, 6 ऑगस्ट 2019✅✅

🌹🌳🌴संरक्षण🌴🌳🌹

👉4 ऑगस्टला भारताने आपल्या क्षेपणास्त्राची एकापाठोपाठ दोनदा यशस्वी चाचणी घेतली - क्विक रिएक्शन सर्फेस-टू-एयर मिसाईल’ (QRSAM) (25-30 कि.मी. मारा क्षमता).

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉1000 रुपयांची नोट चलनात आणण्यासंबंधीचा हा कायदा रद्द करण्यात आला – ‘उच्च परिमाण बँक नोटा (चलन अवैधता) दुरूस्ती कायदा-1998’(1999 साली लागू).

👉भारत सरकारच्या TEC याच्या मेंडेटरी टेस्टिंग अँड सर्टिफिकेशन ऑफ टेलीकॉम ईक्विपमेंट (MTCTE) अंतर्गत TEC प्रमाणपत्र मिळविणारी पहिली कंपनी - मॅट्रिक्स टेलिकॉम सोल्यूशन्स.

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉ब्रिटनच्या ‘द स्ट्रक्चरल अवॉर्ड्स-2019’ या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेला भारतीय प्रकल्प - ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ (केवडिया, गुजरात).

🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹

👉जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव मांडताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 5 ऑगस्टला संसदेत जम्मू-काश्मीरमधून हे कलम हटवण्याची शिफारस मांडली - कलम 370.

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉5 ऑगस्टला निधन झालेल्या मराठी चित्रपट रंगभूमीचा अभिनेता - श्रीराम कोल्हटकर.

👉70च्या दशकात इंग्लिश भाषेत क्रिकेटची कॉमेंट्री करणार्‍या या व्यक्तीचे 4 ऑगस्टला निधन झाले - अनंत सेतलवड.

🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹

👉पोलंडमधील वारसॉ येथे झालेल्या पोलंड ओपन कुस्ती स्पर्धेत महिलांच्या 53 किलो वजन गटात सलग तिसरे सुवर्ण पटकाविणारी भारतीय मल्ल - विनेश फोगट.

👉थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावणारी पहिली भारतीय जोडी - सात्विकसाईराज रेनकीरेड्डी-चिराग शेट्टी.

👉आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 106 एवढे सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज - रोहित शर्मा.

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉जगातला सर्वाधिक उंचीचा पुतळा - ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ (केवडिया, गुजरात) (182 मीटर).

👉आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) – स्थापना वर्ष: सन 1909; मुख्यालय: दुबई, संयुक्त अरब अमिरात (UAE).

👉जागतिक बॅडमिंटन महासंघ (BWF) - स्थापना वर्ष: सन 1934; मुख्यालय: क्वाला लंपुर (मलेशिया).

🌺🌺केंद्र सरकारने केली "काबिल" ची स्थापना🌺🌺

🔰  देशातील व्युव्हात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या खनिजांचा पुरवठा व्हावा या उद्देशाने तीन केंद्रीय सार्वजनिक कंपन्यांच्या भागभांडवलाने नुकतीच "काबिल - खनिज बिदेश इंडिया लिमिटेड" ची स्थापना केली गेली.

🔴मुख्य मुद्दे:

🔰 काबिल मध्ये खलील तीन कंपन्यांचा सहभाग आहे.
1)नॅशनल ऍल्युमिनियम कंपनी लिमिटेड (नाल्को),
National Aluminium Company Ltd.(NALCO),
2)हिंदुस्तान कॉपर लिमिटेड.
Hindustan Copper Ltd.(HCL)
3)खनिज अन्वेषण कंपनी (एमईसीएल).
Mineral Exploration Company Ltd. (MECL).

🔰 या संयुक्त उद्यम कंपनी मध्ये वरील तीन कंपन्यांचा वाटा 40:30:30 असा आहे.

📌उद्दीष्ट : देशांतर्गत बाजारपेठेला क्रिटिकल व स्ट्रॅटेजिकल खनिजांचा सतत पुरवठा करणे.

🔰 “काबिल देशाच्या खनिज सुरक्षेची हमी देईल, तर आयात प्रतिस्थानाचे सर्वांगीण उद्दीष्ट साकार करण्यासही मदत करेल,

🔰 या संयुक्त उद्यमातून लिथियम आणि कोबाल्ट सारख्या खनिजांचा पुरवठा सुनिश्चित केला जाईल.

🔰 हे ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील खनिज समृद्ध देशांशी भागीदारी वाढविण्यात मदत करेल.

🔰 लिथियम, कोबाल्ट, टंगस्टन, व्हॅनियम आणि निकेल इत्यादींसह 12 खनिजांना सामरिक खनिजे म्हणून ओळखले गेले आहे. देशाच्या सुरक्षा आणि विकासात सामरिक खनिजे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात

🔰 “काबिल विदेशातील मोक्याच्या खनिजांची ओळख, संपादन, अन्वेषण, विकास, खाण आणि प्रक्रिया या देशातील खनिजांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी वापरेल.

🔰 कोळसा, खाणी व संसदीय कार्यमंत्री : प्रल्हाद जोशी

स्रोत : PTI,The Hindu,BUSINESS LINE. नवभारत टाइम्स,

🍀🍀 औषधाला न जुमानणार्‍या जिवाणूंसाठी नवे पेप्टाईड🍀🍀

📌अनेक जिवाणूंनी अँटिबायोटिक्स किंवा अन्य प्रकारच्या औषधांबाबतही प्रतिकारक क्षमता विकसित केलेली आहे.

📌 औषधांनाही न जुमानणार्‍या अशा जिवाणूंवर मात करण्यासाठी आता संशोधकांनी नव्या पेप्टाईडचा शोध लावला आहे. हे पेप्टाईड अ‍ॅसिनेटोबॅक्टर बाऊमानी बॅक्टेरियाचाही मुकाबला करू शकते.

📌अमिनो अ‍ॅसिडच्या छोट्या मालिकेला 'पेप्टाईड' असे म्हटले जाते.

📌अनेक पेप्टाईड मिळून एक प्रोटिन तयार होते. पेप्टाईडबाबत आतापर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीचा वापर करून बंगळुरूमधील भारतीय विज्ञान संस्थेच्या संशोधकांनी 'ओमेगा 76' नावाच्या नव्या पेप्टाईडचे कॉम्प्युटर अ‍ॅल्गोरिदमच्या मदतीने डिझाईन बनवले आहे.

📌हे जीवाणूरोधक पेप्टाईड जिवाणूची पेशी भित्ती भेदून त्याला नष्ट करते.

📌 एका संक्रमित उंदरावर 'ओमेगा 76' चे परीक्षण करण्यात आले व त्यामध्ये ते अतिशय परिणामकारक असल्याचे दिसून आले.शिवाय, त्याचा कोणताही दुष्परिणामही आढळला नाही.

६ ऑगस्ट १९४५ :- हिरोशिमाचा अग्निप्रलय

आजचा दिनविशेष

६ ऑगस्ट १९४५ :- हिरोशिमाचा अग्निप्रलय

६ ऑगस्ट १९४५ रोजी जपानच्या हिरोशिमा या ठाण्यावर जगातील पहिला अणुबॉंब टाकला. हा बॉंब वाहून नेणार्‍या वैमानिकाचे नाव कर्नल पॉल डब्ल्यू. टिबेट्स आणि बॉंब टाकणारा मेजर थॉमस डब्ल्यू. फ़ीअरबी. अणुबॉंब म्हणजे नेमके काय? हे वैमानिक आणि प्रमुख अधिकारी पॉल टिबेट्‌स यालाही माहिती नव्हते. या अणुबॉम्ब हल्ल्यांचे सांकेतिक नाव "लिटल बॉय" असे होते. मात्र हे लिटल बॉय जपान आणि माणुसकीला खोल जखम देऊन गेला.लिटल बॉयला दुस-या महायुध्‍दाच्या वेळी अमेरिकेतील मॅनहॅट्टन प्रकल्पांतर्गत लॉस अलामोसमध्‍ये बनवण्‍यात आला होता.

किती पॉवरफुल होता 'लि‍टल बॉय'? 
जवळजवळ ४ हजार किलोग्रॅम वजनाच्या या बॉमची लांबी ३ मीटर आणि व्यास ७१ सेंटिमीटर होते. या बॉम्बने आपली विस्फोटक क्षमता युरेनियम -२३५ च्या आण्विक विखंडन प्रक्रियेतून प्राप्त केले होते. तिची विध्‍वंसक क्षमता १३-१८ किलोटन टीएनटी (ट्रायनायट्रोटालूईन) च्या बरोबरीचे होते.या महासंहारक अस्त्राचा जपानवर वापर करू नये, त्या राष्ट्राला त्याची माहिती द्यावी आणि शरण आणावे असे हे अस्त्र निर्माण करणाऱ्या शास्त्रज्ञांचे म्हणणे होते. पण, अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष ट्रूमन यांनी ते काही ऐकले नाही. अमेरिकन हवाई दलाला, जपानवर अणुबॉंब फेकायचा आदेश त्यांनी दिला.

"जपान" हे नक्की झाल्यावर कुठल्या शहरावर अणुबॉम्ब टाकायचा हे हि ठरवायचे होते. इथे तेव्हाच्या अमेरिकेचा अतिशय क्रूरपणा दिसतो. अणुबॉम्बचे नक्की काय आणि किती दुष्परिणाम होतात हे अजून जगाला माहित व्हायचे होते. या परिणामांचा "नीट अभ्यास करण्यासाठी" अशी शहरे हवी होती जिथे साधारण ३ माइल्स म्हणजे ४.८ किमीच्या परिघात नागरी वस्ती दाट आहे. अशा ठिकाणी बॉम्ब टाकल्यावर त्याची विनाशकारी क्षमता नीट अभ्यासता येईल असे त्यांचे म्हणणे होते. अणुबॉम्बचे परिणाम व्यवस्थित अभ्यासता यावे म्हणून या महत्वाच्या शहरांवरचे इतर बॉम्ब हल्ले बंद करण्यात आले. एप्रिल, मे मध्ये आधी हिरोशिमा, क्योतो, योकोहामा, कोकुरा अशी शहरे त्यांनी निवडली. नंतर पुन्हा एकदा चर्चा वगैरे होऊन २५ जुलै रोजी हिरोशिमा, कोकुरा, नीइगाता, आणि नागासाकी अशी चार शहरे नक्की करण्यात आली. कदाचित टोकियोचे नाव नसण्याचे कारण म्हणजे टोकियोमध्ये अमेरिकेचे युद्ध कैदी होते हे असावे. २ ऑगस्ट १९४५ रोजी हिरोशिमावर सगळ्यात आधी बॉम्ब टाकण्यात येण्याचे नक्की केले गेले आणि तशी 'ऑफिशिअल ऑर्डर' निघाली.

सकाळी ८:१५ मिनिटांनी "एनोला गे"ने ९४००मी उंचीवरून अणुबॉम्ब 'आइओई'च्या 'टी' ब्रिज वर टाकला.त्याचा स्फोट हिरोशिमा शहराच्या २००० फूट उंचावर झाला. जास्तीत जास्त परिणामांसाठी बॉम्ब तसा हवेतच फुटणे जरुरी होते, त्यामुळे तो तसाच तयार केला गेला होता. काही मायक्रो सेकंदातच न्युक्लीअर चेन रिअक्शन्स चालू झाल्या. फ़ार मोठा स्फ़ोट होवून ४०००० फ़ुटांवर धुराचे लोट उठत राहिले.१७० मैलांपर्यंत त्याचा धडाका जाणवला. (मुंबई ते पुणे अंतर १०० मैल आहे त्यामुळे १७० मैलाचा अंदाज यावा) बॉंब पडला त्या १ मैलाच्या परिघात एकही माणूस जिवंत राहिला नाही. माणसे उभ्या जागेवर विरून गेली. उरल्या त्या त्यांच्या सावल्या. भिंतीवर, दगडावर, आणि चपलांवर उमटलेल्या. लोखंडाचे दरवाजेच्या दरवाजे वाकले. टाईल्स, घरातली क्रोकरी, काचेच्या वस्तू चक्क वितळून एकमेकाला चिकटून गेल्या. या वस्तुंची अशी अवस्था तर माणसांचे काय झाले असेल याची कल्पनाच करवत नाही.अशा प्रकारचे अस्त्र प्रथमच वापरले गेले असल्याने नक्की काय झालेय हे ही कळत नव्हते. "अनेक बॉंब एकाच वेळेस फ़ोडले गेले आहेत" अशी भाबडी समजूत त्यांनी करून घेतली होती. लोकांनी सूर्यापेक्षा प्रखर तेजाचा गोळा फ़ुटून निघावा असा प्रकाश क्षणभर पाहिला. ३ लाख लोकांचे डोळे दिपून गेले.प्रकाश एवढा प्रखर होता की ३ लाख लोकांना त्या प्रकाशाने कायमचे अंधत्व आले.प्रकाशाची लाट सर्वत्र दिसत होती.१०००० सेंटीग्रेडची भयानक उष्णता पुष्कळांचे प्राण घेण्यास समर्थ ठरली.या भीषण लाटेचा दिड-दोनशे फ़ूट उंचीचा एक तप्त कोनच सर्वांचा पाठलाग करीत होता.एका क्षणामध्ये ६०००० लोक एकदम मरण पावले.यानंतर वार्‍याचे प्रचंड झोत सुरू झाले.या सपाट्यात सुमारे ३ लाख लोक कोलमडून पडले. या महासंहारातून वाचलेले एक लाख लोक तीन दिवसात किरणोत्सर्गाच्या आणि आगीच्या जखमांनी टाचा घासून मेले. जे जगले ते अनंत यातना भोगत मरणाची वाट पहात राहिले.

नंतर झालेल्या पावसाच्या थेंबांनी लोकांना बरे वाटले पण तोही भ्रमच ठरला.कारण किरणोत्सारी द्रव्यांनी ते थेंब विषारी झाले होते.स्फ़ोटात होरपळलेल्या लोकांनी हे काळेशार पाणी पिताच त्यांची शरीरे आतून जळाली. अग्निप्रलयापेक्षा हा ५ मिनिटांचा पाऊस अधिक भयानक होता.

मृत्यू :- ७८,१५०

बेपत्ता:- १३,९८३

जखमी:- ३७,४२४

इतर प्रकारची इजा:- २,३५,६५६

एकूण :- ३,६५,२१३

जपान्यांच मात्र कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.खरंतर जपानी मिलिटरीला हिरोशिमामधल्या स्​फोटाच्या तीव्रतेचा अंदाज यायलाही आणि बाहेरून मदत मिळायलाही काही तास गेले.पण तरी बॉम्बस्फोट झाल्यानंतरच्या काही तासात मदत कार्य वेगाने चालू झाले. हिरोशिमाताल्याच जगल्या वाचलेल्या लोकांनी रस्ते आणि दळणवळण नीट करायचे प्रयत्न सुरु केले. चक्क दुसऱ्या दिवसापासून त्यांनी काही भागातला वीजपुरवठा सुरळीत केला. स्फोटापासूनच्या तीन दिवसात शहराच्या बरयाच भागात ट्राम सर्विस चालू झाली.जिवंत असलेल्या सहकार्यांच्या अथक परिश्रमाने दुसऱ्या दिवशी 'उजीनो' नावाची एक ट्रेन लाईन चालू झाली आणि आठ तारखेला दुसरी ट्रेन लाईनही चालू झाली. या जागी पुढची ७५ वर्षे काहीही उगवणार नाही असे बोलले जात असताना ऑटममध्ये काही ठिकाणी जमिनीतून फुटलेल्या अन्कुरांमुळे लोकांच्या आशा पल्लवित झाल्या. पीस म्युझियमच्या बाहेर असलेले आसागिरीचे एक झाडही असेच आतून जळून गेलेले पण त्यालाही पालवी फुटली. या निसर्गाने केलेल्या चमत्कारामुळे लोकांना जगण्याची उमेद मिळाली. हिरोशिमामध्ये आज इतक्या वर्षांनी या घावाची कुठलीच दृश्य खुण दिसत नाही. इतकी तत्परता भारतातील राजकारणी कधी दाखवतात का?

संकलित

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...