०४ ऑगस्ट २०१९

जम्मू-काश्मीर, कलम ‘३५ अ’ आणि ३७०

जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र सरकारने ३८ हजार अतिरिक्त सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात केल्याने काश्मीरमधील कलम ३५ अ आणि ३७० हटविण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच केंद्र सरकारने पर्यटकांना काश्मीर सोडण्याचं आवाहन केल्याने या चर्चेला अधिकच बळ मिळालं आहे. केंद्र सरकारने काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होणार असल्याचं कारण दिलं असलं तरी केंद्र सरकारच्या या कृतीमुळे काश्मीरमधील राजकारण ढवळून निघालं आहे.

लोकसभा निवडणुकी दरम्यान सत्तेत आल्यास ३७० कलम रद्द करण्यात येईल असं भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितलं होतं. आता शहाच केंद्रीय गृहमंत्री झाले असून त्यातच काश्मीरमध्येही ३८ हजार अतिरिक्त जवानांना तैनात करण्यात आल्याने जम्मू- काश्मीरमधील ३५ अ आणि ३७० ही दोन्ही कलमे हटविण्याची चर्चा सुरू झाली आहे. काय आहेत ही कलमं त्याविषयीची ही माहिती...

▪️कलम ३५ अ

तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांच्यात दिल्लीत १९५२मध्ये झालेल्या करारानुसार राज्यघटनेतील काही तरतुदी राष्ट्रपतींच्या आदेशाने १९५४मध्ये करण्यात आल्या. त्या वेळी कलम ३५अ राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले. जम्मू-काश्मीर या राज्याला स्वतःची राज्यघटना असून ती १९५६मध्ये तयार करण्यात आली. त्यामध्ये महाराजा हरिसिंग यांच्या काळातील; कायमस्वरूपी नागरिकांची व्याख्या परत आणण्यात आली. त्यानुसार १९११पूर्वी राज्यात जन्मलेले किंवा स्थायिक झालेले सर्व नागरिक किंवा संबंधित तारखेपूर्वी दहा वर्षांहून अधिक काळ कायदेशीर मार्गाने स्थावर मालमत्ता धारण केलेले नागरिक यांचा समावेश आहे. त्याशिवाय जम्मू-काश्मीरमधून स्थलांतर केलेले सर्व नागरिक, त्यामध्ये पाकिस्तानात स्थलांतरित झालेले नागरिकही येतील, हा राज्याचा विषय असेल. स्थलांतरितांच्या पुढील दोन पिढ्यांतील वंशजांचाही यात समावेश आहे.

▪️कलम ३७०

शेख अब्दुल्ला यांच्या संदिग्ध भूमिकेमुळे तसेच पंतप्रधान नेहरू संयुक्त राष्ट्रांमध्ये गेलेल असल्यामुळे या कलमाची आणि काश्मीर भारतात यावे यासाठी काय पावले उचलावीत असा पेच निर्माण झाला होता. अशावेळी सरदार पटेल यांनी ‘इन्स्ट्रमेंट ऑफ अ‍ॅक्सेशन’ अर्थात ‘सामीलनामा’ ही संकल्पना मांडली. (अन्य संस्थानांबाबत ‘विलीननामा’ ही संकल्पना आहे.) आणि या पेचातून यशस्वी तोडगा काढला. काश्मीरी जनतेचे काही अधिकार अबाधित ठेवत तसेच त्यांच्या सार्वमताची हमी देत काश्मीर भारतात सामील झाले. सदर कलमाच्या ‘अधिकारक्षेत्रात’ वेळोवेळी बदल झाले. मात्र भारतीय संविधानातील नागरिकत्व, मूलभूत हक्क, राज्यातील उच्च न्यायालयाची कार्यकक्षा, निवडणूक प्रक्रिया आदी बाबी काही अपवादात्मक तरतुदींद्वारे या राज्यास लागू होतात. राष्ट्रपती- संसद यांचे अधिकार, निवडणूक आयोगाची कार्यपद्धती, महालेखापालांचे कार्यक्षेत्र (कॅग), सर्वोच्च न्यायालयाची अधिकार व्याप्ती या बाबी भारताच्या मूळ राज्यघटनेत ‘जशा आहेत तशा’ स्थितीत काश्मीरलाही लागू होतात. मात्र, राज्य लोकसेवा, राज्यांतर्गत आणिबाणी लागू करणे, राज्याच्या सीमांमध्ये बदल करणे, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे असे राज्यघटनेतील मुद्दे काश्मीरला ‘जसेच्या तसे’ लागू होत नाहीत. म्हणजे नेमके काय तर, अशा मुद्यांचा अवलंब करण्यापूर्वी काश्मीरच्या राज्य विधानसभेची सहमती घेणे अनिवार्य होते.

▪️कलम ३५ अ कशामुळे चर्चेत?
वी द सिटिझन या स्वयंसेवी संस्थेने २०१४मध्ये कलम या कलमाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. कलम ३६८अंतर्गत सुधारणांद्वारे हे कलम राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले नसल्याचे सांगून याचिकाकर्त्यांनी त्याला विरोध केला आहे. संसदेसमोर हे कलम मांडण्यात आले नाही, तसेच ते तातडीने लागू करण्यात आल्याचा दावा संस्थेने केला आहे. गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टात दुसऱ्या एका प्रकरणात दोन काश्मिरी महिलांनी म्हणणे मांडले होते. कलम ३५अ आधारित राज्याच्या कायद्यामुळे आमच्या मुलांचे नागरिकत्व हिरावले गेले असल्याचे त्यांनी कोर्टात सांगितले होते.

▪️विरोध का?
३५ अ रद्द झाल्यास जम्मू आणि काश्मीरची स्वायत्तता लोप पावेल, अशी भीती राजकीय पक्ष आणि फुटीरतावादी संघटनांना वाटते आहे. कलम रद्द झाल्यास मुस्लिम बहुसंख्य असलेल्या या राज्यात सामाजिक बदल होतील. काश्मीरचा करार सर्वोच्च स्वायत्ततेवर आधारित असल्याचे राज्यातील राजकीय पक्षांचे म्हणणे आहे. ३५ अ रद्द झाल्यास राज्यात हिंदू धर्मियांचे लोंढे येतील, अशी शक्यता फुटीरतावादी व्यक्त करतात. जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या ७० वर्षांत सामाजिक स्थितीत फरक पडलेला नाही. राज्यातील जम्मू भागात हिंदू बहुसंख्य आहेत, तर लडाखमध्ये बौद्ध धर्मिक मोठ्या संख्येने आहेत. त्यांना खोऱ्यात संपत्ती खरेदी करण्याचा, तसेच स्थायिक होण्याचा अधिकार आहे.

​🔹नासाने लावला तीन बाह्य ग्रहांचा शोध

नासाच्या ग्रहशोधक उपग्रहाने तीन नवीन बाह्यग्रहांचा शोध लावला असून, हे ग्रह पृथ्वीपासून 73 प्रकाशवर्षे दूर आहेत. याबाबतचा शोधनिबंध नेचर ॲस्ट्रॉनॉमी या नियतकालिकात प्रसिद्ध झाला असून, यात तीन नवीन बाह्यग्रहांपैकी एक ग्रह खडकाळ व पृथ्वीपेक्षा थोडा मोठा आहे. इतर दोन ग्रहांवर वायूचे प्रमाण जास्त असून, ते पृथ्वीपेक्षा दुप्पट आकाराचे आहेत.
टेस ऑब्जेक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणजे टीओआय-270 या तारका प्रणालीभोवती हे ग्रह फिरत असून, ट्रान्झिटिंग एक्सोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाइट या उपग्रहाने ज्या प्रकारचे ग्रह शोधणे अपेक्षित होते, त्याच प्रकारचे ते ग्रह आहेत, असे कॅॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे.

यातील लहान ग्रह हा मातृ तार्‍यापासून अशा अंतरावर आहे की, जिथे पाणी द्रवरूपात असू शकेल. टीओआय-270 हा मातृतारा शांत आहे. त्यावर कुठल्या ज्वाळा नाहीत, त्यामुळे तो आणि त्याभोवती फिरणार्‍या ग्रहांचे निरीक्षण करणे सोपे आहे. यात काही ग्रह तार्‍यापासून वसाहतयोग्य अंतरावर आहेत. म्हणजे, ते इतक्या अंतरावर आहेत, ज्यामुळे तिथे पाणी असू शकते, असेही संशोधकांचे मत आहे.

आपल्या सौरमालेत पृथ्वी, मंगळ, शुक्र  व बुध असे लहान ग्रह आहेत, ते खडकाळ आहेत; तर शनी, गुरू, युरेनस, नेपच्यून हे ग्र ह वायूने भरलेले आहेत. नेपच्यूनच्या निम्म्या आकाराचे ग्रह आपल्या ग्रहमालेत फार जास्त प्रमाणात नाहीत, पण ते इतर तार्‍यांभोवती आहेत. टीओआय-270 या ग्रहमालेच्या अभ्यासातून पृथ्वीसारखे खडकाळ व नेपच्यूनसारखे वायूचे ग्रह यांच्यातील दुवा साधता येणे शक्य आहे, असे एमआयटीचे संशोधक मॅक्सिमिलीयन गुंथर यांनी म्हटले आहे.

​🔹जम्मू-काश्मीर, कलम ‘३५ अ’ आणि ३७०

जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र सरकारने ३८ हजार अतिरिक्त सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात केल्याने काश्मीरमधील कलम ३५ अ आणि ३७० हटविण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच केंद्र सरकारने पर्यटकांना काश्मीर सोडण्याचं आवाहन केल्याने या चर्चेला अधिकच बळ मिळालं आहे. केंद्र सरकारने काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होणार असल्याचं कारण दिलं असलं तरी केंद्र सरकारच्या या कृतीमुळे काश्मीरमधील राजकारण ढवळून निघालं आहे.

लोकसभा निवडणुकी दरम्यान सत्तेत आल्यास ३७० कलम रद्द करण्यात येईल असं भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितलं होतं. आता शहाच केंद्रीय गृहमंत्री झाले असून त्यातच काश्मीरमध्येही ३८ हजार अतिरिक्त जवानांना तैनात करण्यात आल्याने जम्मू- काश्मीरमधील ३५ अ आणि ३७० ही दोन्ही कलमे हटविण्याची चर्चा सुरू झाली आहे. काय आहेत ही कलमं त्याविषयीची ही माहिती...

▪️कलम ३५ अ

तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांच्यात दिल्लीत १९५२मध्ये झालेल्या करारानुसार राज्यघटनेतील काही तरतुदी राष्ट्रपतींच्या आदेशाने १९५४मध्ये करण्यात आल्या. त्या वेळी कलम ३५अ राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले. जम्मू-काश्मीर या राज्याला स्वतःची राज्यघटना असून ती १९५६मध्ये तयार करण्यात आली. त्यामध्ये महाराजा हरिसिंग यांच्या काळातील; कायमस्वरूपी नागरिकांची व्याख्या परत आणण्यात आली. त्यानुसार १९११पूर्वी राज्यात जन्मलेले किंवा स्थायिक झालेले सर्व नागरिक किंवा संबंधित तारखेपूर्वी दहा वर्षांहून अधिक काळ कायदेशीर मार्गाने स्थावर मालमत्ता धारण केलेले नागरिक यांचा समावेश आहे. त्याशिवाय जम्मू-काश्मीरमधून स्थलांतर केलेले सर्व नागरिक, त्यामध्ये पाकिस्तानात स्थलांतरित झालेले नागरिकही येतील, हा राज्याचा विषय असेल. स्थलांतरितांच्या पुढील दोन पिढ्यांतील वंशजांचाही यात समावेश आहे.

▪️कलम ३७०

शेख अब्दुल्ला यांच्या संदिग्ध भूमिकेमुळे तसेच पंतप्रधान नेहरू संयुक्त राष्ट्रांमध्ये गेलेल असल्यामुळे या कलमाची आणि काश्मीर भारतात यावे यासाठी काय पावले उचलावीत असा पेच निर्माण झाला होता. अशावेळी सरदार पटेल यांनी ‘इन्स्ट्रमेंट ऑफ अ‍ॅक्सेशन’ अर्थात ‘सामीलनामा’ ही संकल्पना मांडली. (अन्य संस्थानांबाबत ‘विलीननामा’ ही संकल्पना आहे.) आणि या पेचातून यशस्वी तोडगा काढला. काश्मीरी जनतेचे काही अधिकार अबाधित ठेवत तसेच त्यांच्या सार्वमताची हमी देत काश्मीर भारतात सामील झाले. सदर कलमाच्या ‘अधिकारक्षेत्रात’ वेळोवेळी बदल झाले. मात्र भारतीय संविधानातील नागरिकत्व, मूलभूत हक्क, राज्यातील उच्च न्यायालयाची कार्यकक्षा, निवडणूक प्रक्रिया आदी बाबी काही अपवादात्मक तरतुदींद्वारे या राज्यास लागू होतात. राष्ट्रपती- संसद यांचे अधिकार, निवडणूक आयोगाची कार्यपद्धती, महालेखापालांचे कार्यक्षेत्र (कॅग), सर्वोच्च न्यायालयाची अधिकार व्याप्ती या बाबी भारताच्या मूळ राज्यघटनेत ‘जशा आहेत तशा’ स्थितीत काश्मीरलाही लागू होतात. मात्र, राज्य लोकसेवा, राज्यांतर्गत आणिबाणी लागू करणे, राज्याच्या सीमांमध्ये बदल करणे, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे असे राज्यघटनेतील मुद्दे काश्मीरला ‘जसेच्या तसे’ लागू होत नाहीत. म्हणजे नेमके काय तर, अशा मुद्यांचा अवलंब करण्यापूर्वी काश्मीरच्या राज्य विधानसभेची सहमती घेणे अनिवार्य होते.

▪️कलम ३५ अ कशामुळे चर्चेत?
वी द सिटिझन या स्वयंसेवी संस्थेने २०१४मध्ये कलम या कलमाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. कलम ३६८अंतर्गत सुधारणांद्वारे हे कलम राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले नसल्याचे सांगून याचिकाकर्त्यांनी त्याला विरोध केला आहे. संसदेसमोर हे कलम मांडण्यात आले नाही, तसेच ते तातडीने लागू करण्यात आल्याचा दावा संस्थेने केला आहे. गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टात दुसऱ्या एका प्रकरणात दोन काश्मिरी महिलांनी म्हणणे मांडले होते. कलम ३५अ आधारित राज्याच्या कायद्यामुळे आमच्या मुलांचे नागरिकत्व हिरावले गेले असल्याचे त्यांनी कोर्टात सांगितले होते.

▪️विरोध का?
३५ अ रद्द झाल्यास जम्मू आणि काश्मीरची स्वायत्तता लोप पावेल, अशी भीती राजकीय पक्ष आणि फुटीरतावादी संघटनांना वाटते आहे. कलम रद्द झाल्यास मुस्लिम बहुसंख्य असलेल्या या राज्यात सामाजिक बदल होतील. काश्मीरचा करार सर्वोच्च स्वायत्ततेवर आधारित असल्याचे राज्यातील राजकीय पक्षांचे म्हणणे आहे. ३५ अ रद्द झाल्यास राज्यात हिंदू धर्मियांचे लोंढे येतील, अशी शक्यता फुटीरतावादी व्यक्त करतात. जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या ७० वर्षांत सामाजिक स्थितीत फरक पडलेला नाही. राज्यातील जम्मू भागात हिंदू बहुसंख्य आहेत, तर लडाखमध्ये बौद्ध धर्मिक मोठ्या संख्येने आहेत. त्यांना खोऱ्यात संपत्ती खरेदी करण्याचा, तसेच स्थायिक होण्याचा अधिकार आहे.

०३ ऑगस्ट २०१९

📚 *चालू घडामोडी (03/08/2019)*📚

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *रविश कुमार यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार* #Award

◆ एनडीटीव्ही या हिंदी वृत्तवाहिनीचे
कार्यकारी संपादक आणि त्या चॅनेलवरील
प्राईम टाईम या शोचे होस्ट रवीश कुमार यांना आशियातील नोबेल समजला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.

◆ वास्तवदर्शी पत्रकारितेचा वसा घेतलेल्या रवीश कुमार यांची देशातील सार्वकालिक महान पत्रकारांमध्ये गणना होते.

◆ यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री आणि
पत्रकार अरुण शौरी तसेच द हिंदू या
वृत्तपत्राचे पी. साईनाथ यांनाही हा पुरस्कार यापूर्वी मिळाला आहे. 

◆ हिंदी पत्रकारितेमधील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. रॅमन मॅगसेसे पुरस्कार व्यक्ती आणि संस्थांना त्यांच्या कार्यातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जातो. फिलीपिन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जातो. 

◆ रवीश कुमार यांनी १९९६ पासून एनडीटीव्हीमध्ये कार्यरत आहेत. रवीश कुमार यांच्यासह अन्य चार विजेत्यांमध्ये म्यानमारचे को स्वे विन, थायलंडमधील अंगखाना नीलापजीत, फिलीपिन्समधून रेमंडो पुजांते कैयाब आणि दक्षिण कोरियामधील किम जोंग यांनाही हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

★ 'रॅमन मॅग्सेसे पुरस्कार':-

◆ या पुरस्काराची सुरुवात : एप्रिल 1957 पासून झाली.

◆ 'रॅमन मॅग्सेसे' हे आशियाचे नोबेल पारितोषिक म्हणूनही ओळखले जाते.

◆ हा पुरस्कार फिलिपिन्सचे माजी अध्यक्ष रॅमन मॅग्सेसे यांच्या स्मरणार्थ देण्यात येतो.

◆ 2009 पासून ह पुरस्कार खालील सहा प्रकारात दिला जातो:-
◆ 1. Government services (GS)
◆ 2. Public services (PS)
◆ 3. Community leadership(CL)
◆ 4. Journalism, literature & creative communication arts (JLCCA)
◆ 5. Peace and International Understanding (PIU)
◆ 6. Emergent leadership (EL)

◆ जर्नलिज्म, लिट्रेचर और क्रिएटिव कम्युनिकेशन आर्ट्स कैटेगरी मध्ये  'रॅमन मॅग्सेसे पुरस्कार' भेटलेले भारतीय व्यक्ती:

1. 2019- रवीश कुमार
2. 2007- पालगुम्मी साईनाथ
3. 1997- महेश्वेता देवी
4. 1992- रवि शंकर
5. 1991- के वी सुबबना
6. 1984- राशीपुरम लक्ष्मण
7. 1982- अरुण शौरी
8. 1981- गौर किशोर घोष
9. 1975- बूबली जॉर्ज वर्गीस
10. 1967 - सत्यजित राय
11. 1961- अमिताभ चौधरी

◆ 'रॅमन मॅग्सेसे पुरस्कार' मिळवणारे पाहिले भारतीय.- विनोबा भावे

◆ 'रॅमन मॅग्सेसे पुरस्कार' मिळवणारी पाहिली भारतीय महिला .- मदर टेरेसा

◆ 'रॅमन मॅग्सेसे पुरस्कार' मिळवणारे पाहिले भारतीय पत्रकार.- अमिताभ चौधरी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *कपिल देव भारत गौरव पुरस्काराने सन्मानित* #Award

◆ १ ऑगस्ट रोजी, ईस्ट बंगाल क्लबने आपल्या 100 व्या वर्धापन दिनी कपिल देवला भारत गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
https://t.me/TargetMpscMh
◆  कपिल देव यांनी  22 जून 1992 ला इस्ट बंगाल क्लब जॉईन केले होते.त्यानंतर त्यांनी या क्लबच्या वतीने 27 मॅच खेळल्या.

★ ईस्ट बंगाल फुटबॉल क्लब :-

◆ ईस्ट बंगाल फुटबॉल क्लब हा कलकत्ता येथील एक फुटबॉल क्लब आहे.

◆ याची स्थापना 1 ऑगस्ट 1920 रोजी झाली.

◆ याने आतापर्यंत तीन राष्ट्रीय फुटबॉल लीग (आय-लीग), आठ फेडरेशन चषक आणि तीन भारतीय सुपर कप जिंकले आहेत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *आसियानची 52 वी परराष्ट्र मंत्री बैठक*

◆ बँकॉकमध्ये 29 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान 52 व्या आसियान परराष्ट्रमंत्र्यांची बैठक आयोजित केली जात आहे.
 
★ आसियान (ASEAN)
The Association of South-East Asian Nations (ASEAN) ही 10 आग्नेय आशियाई देशांची प्रादेशिक आंतर-सरकारी संस्था आहे. या संस्थेची स्थापना 6 ऑगस्ट 1967 रोजी झाली.

◆ याचे मुख्यालय : इंडोनेशिया (जकार्ता) येथे आहे.

◆ Motto : "One Vision, One Identity, One Community"

★ सहभागी देश:-

◆ 5 संस्थापक देश
1) इंडोनेशिया, 2) मलेशिया, 3) फिलीपिन्स, 4) सिंगापूर, 5) थायलंड,

◆ नंतर सहभागी झालेले देश
6) ब्रुनेई, 1984 
7) व्हिएतनाम 1995
8) लाओस, 1997
9) म्यानमार 1997
10) कंबोडिया, 1999

◆ उद्देश : सदस्य देशांचे सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि स्वातंत्र्य आणि विवादांचे शांततेने निवारण.

◆ आसियान महासचिव: लिम जौक होई (ब्रुनेई)
◆ कार्यकाळ : पाच वर्षे
◆ आसियानने मंजूर केलेल्या प्रस्तावांची अंमलबजावणी करण्याचे व कामात सहकार्य देण्याचे काम करतात.

◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या शपथविधी सोहळ्यात ASEAN चे सदस्य सहभागी झाले होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


✍प्रार्थना समाज



🔸३१ मार्च १८६७ पापमोचिनी एकादशीला स्थापना

〰मुर्तिपुजेला विरोध होता आणि कोणतेही धर्मग्रंथ ईश्वर निर्मित नाहीत असे तत्व होते.

〰ज्ञानेश्वर ,एकनाथ ,नामदेव,तुकाराम या संताचा प्रभाव होता.

〰केशवचंद्र सेनांचे मुंबईतील भाषणाची स्थापणेमागे प्रेरणा होती.

〰राममोहन आश्रम,आर्य महिला समाज,पोस्टल मिशन,तरुण ब्राम्ह सभा,या महत्तवाच्या संस्था संबंधित आहेत.

🔸"सत्यमेव जयते" ब्रीद वाक्य

✍महत्त्वाचे सदस्य-

आत्माराम पांडुरंग
मामा परमानंद
बाळ मंगेश वागळे
वामन दाजी मोडक
वासुदेव नवरंगे
न्या.रानडे
लालाशंकर उमियाशंकर
वासुदेव सुखटणकर
मि.सय्यद
वि.रा.शिंदे
मोती बुलासा
रा.गो.भाडांरकर
बाबु प्रतापचंद्र मुझुमदार
गंगुताई भंडारे
रमाबाई रानडे इ.

०२ ऑगस्ट २०१९

📚 *चालू घडामोडी (02/08/2019)*📚

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *रविश कुमार यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार* #Award

◆ एनडीटीव्ही या हिंदी वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक आणि त्या चॅनेलवरील प्राईम टाईम या शोचे होस्ट रवीश कुमार यांना आशियातील नोबेल समजला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.

◆ वास्तवदर्शी पत्रकारितेचा वसा घेतलेल्या रवीश कुमार यांची देशातील सार्वकालिक महान पत्रकारांमध्ये गणना होते.

◆ यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री आणि पत्रकार अरुण शौरी तसेच द हिंदू या वृत्तपत्राचे पी. साईनाथ यांनाही हा पुरस्कार यापूर्वी मिळाला आहे. 

◆ हिंदी पत्रकारितेमधील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. रॅमन मॅगसेसे पुरस्कार व्यक्ती आणि संस्थांना त्यांच्या कार्यातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जातो.

◆ फिलीपिन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. 

◆ रवीश कुमार यांनी १९९६ पासून एनडीटीव्हीमध्ये कार्यरत आहेत. रवीश कुमार यांच्यासह अन्य चार विजेत्यांमध्ये म्यानमारचे को स्वे विन, थायलंडमधील अंगखाना नीलापजीत, फिलीपिन्समधून रेमंडो पुजांते कैयाब आणि दक्षिण कोरियामधील किम जोंग यांनाही हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *अतनू चक्रवर्ती: RBI च्या संचालक मंडळावर नेमण्यात आलेले नवे संचालक* #Appointment

◆ केंद्र सरकारने भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयातल्या आर्थिक व्यवहार विभागात सचिव पदावर असलेले अतनू चक्रवर्ती यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळावर संचालकपदी नेमणूक केली आहे.

◆ चक्रवर्ती यांची ही नियुक्ती सुभाष चंद्र गर्ग यांच्या जागेवर करण्यात आली. चक्रवर्ती यांचे नामांकन 29 जुलै 2019 पासून आणि पुढील आदेशापर्यंत प्रभावी आहे.

◆ गेल्या आठवड्यात करण्यात आलेल्या फेरबदलात माजी आर्थिक व्यवहार सचिव सुभाष चंद्र गर्ग यांना वीज मंत्रालयात नियुक्त केले होते.

★ भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)

◆ भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारतातली केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते. ‘भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम-1934’च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे दि. 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले. दि. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBIचे दि. 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले. RBIचे मुख्य कार्यालय मुंबई (महाराष्ट्र) या शहरात आहे.

◆ भारतीय रिझर्व्ह बँकेनी त्याच्या कार्यपद्धतीच्या संदर्भात शैली आणि दृष्टीकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘दि प्रॉब्लेम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्यूशन’ या पुस्तकातून घेतला.
https://t.me/TargetMpscMh
◆ RBIच्या मुख्यालयात एक पूर्ण वेळ गव्हर्नर आणि जास्तीत-जास्त चार उप गव्हर्नर नियुक्त केले जातात. सर ओसबोर्न स्मिथ (1 एप्रिल 1935 - 30 जून 1937) हे RBI चे पहिले गव्हर्नर होते. सर सी॰ डी॰ देशमुख (11 ऑगस्ट 1943 - 30 जून 1949) हे RBIचे तिसरे आणि प्रथम भारतीय गव्हर्नर होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *RBI चे डेप्युटी गव्हर्नर - सुबीर गोकर्ण यांचे निधन*

◆ ते नोव्हेंबर 2009 ते जानेवारी 2013 काळात RBI चे उप-गव्हर्नर होते

◆ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी(IMF) चे कार्यकारी संचालक म्हणूनही त्यांनी काम केले होते.

◆ 2010 साली त्यांनी भारतात प्रथिनांच्या फुगवट्याचा सिद्धांत मांडला होता.
(लोकांच्या मिळकतीत वाढ होत असल्याने जनता अंडी , डाळ आणि मांस याचा मोठ्या प्रमाणात आहार करत असल्याचे मत मांडले होते) त्यावर मात्र बरीच टीका झाली होती.

★ शिक्षण:-

◆ मुंबई - सेंट झेव्हीयर्स कॉलेज - BA
◆ दिल्ली - MA
◆ अमेरिकेत - PhD
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *ई-गव्हर्नन्स विषयी 22 वी राष्ट्रीय परिषद शिलाँगमध्ये आयोजित केली जाणार*

◆ ई-गव्हर्नन्स विषयी 22 वी राष्ट्रीय परिषद 8 ते 9 ऑगस्ट दरम्यान शिलाँग, (मेघालय) येथे आयोजित केली जाईल.

◆ ईशान्येकडील राज्यात प्रथमच हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

◆ ‘डिजिटल इंडियाः सक्सेस टू एक्सलन्स’ Digital India:  Success to Excellence”   ही या परिषदेची थीम आहे.

◆ ई-गव्हर्नन्स विषयी 22 वी राष्ट्रीय परिषद प्रशासकीय सुधारणा व लोक तक्रार विभाग यांच्या वतीने हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि मेघालय सरकारच्या सहकार्याने आयोजित केले गेले आहे.

◆ या कार्यक्रमात 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश सहभागी होणार आहेत. यात 450 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

◆ उद्दीष्ट: ईशान्येकडील राज्यांमध्ये ई-गव्हर्नन्सशी संबंधित पुढाकारांना गती देणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...