२५ जुलै २०२४

महाराष्ट्राचा इतिहास.

🧩 मौर्य ते यादव...


🅾️(इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०)


🧩 मौर्य साम्राज्याचा काळ...


🅾️महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.


🧩 सातवाहन साम्राज्याचा काळ...


🅾️सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. 


🅾️महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.


🧩 वाकाटकांचा काळ...


🅾️वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.



🧩कलाचुरींचा काळ...


🅾️वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.


🧩 बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ...


🅾️वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. 


🅾️त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.


🧩 वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटांचा काळ..


🅾️वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.


🧩 यादवांचा काळ..


🅾️महाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. 


🅾️यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.

ब्राम्हो समाज व त्याची स्थापना.


🅾️धार्मिक व सामाजिक सुधारणांच्या युगाला राजा राममोहन रॉय यांच्या कार्यापासूनच खर्‍या अर्थाने सुरवात झाली राजा राममोहन रॉय यांचा जन्म 22 मे 1772 रोजी राधानगर (बंगाल) येथे झाला.

 

🅾️विद्यार्थीदशेत असताना इंग्रजी संस्कृत, अरबी, आणि फार्सी, या भाषा चा त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यांनी बंगालमध्ये इंग्रजी राजवट कशी स्थिर झाली हे प्रत्यक्ष पाहिले.

 

🅾️ब्रिटिशांचे अनेक गुण भारतीय विचारवंतांना अंतर्मुख करु लागले होते.

 आपल्या समाजातील रुढी, परंपरा व अंधश्रध्दा यामुळे भारतीय समाजाची अधोगती झाली आहे, याची जाणीव रॉय यांना होती.

 

🅾️त्यांनी काही काळ ईस्ट इंडिया कंपनीत नोकरीपण केली होती त्या काळात ख्रिश्चन मिशनर्‍यांचे कार्य त्यांनी अगदी जवळून पाहिले होते. हिंदू धर्मातील एकेश्र्वरवाद, मुर्तिपूजा, आणि जातिभेद, समाजाच्या प्रगतीतील प्रमुख अडथळे आहेत. असे त्यांचे मत होते.

 

🅾️त्यामुळे भारतीय समाजाला जागृत करावयाचे असेल तर या अनिष्ट रुढी आणि परंपरांचा त्याग केला पाहिजे असा प्रसार रॉय यांनी सुरु होता. सतीची चाल बंद करण्याचा प्रयत्न रॉय यांनी केला.अर्थात हे काम सोपे नव्हते शतकानुशतकांचा धर्माचा पगडा समाजातील उच्चवर्णियांवर होता.

 स्वार्थी भटभिक्षुकांची समाजावर फार जबरदस्त पकड होती. पती निधनानंतर विधवा स्त्रीने स्वत:च्या मृत पतिसमवेत 

जाळून घेणे म्हणजे सती जाणे आणि हाच धर्म मानला जात होता.


🅾️ संवाद कौमुदी नावाच्या पाक्षिकातून त्यांनी सतीच्या अमानुष पध्दतीवर कडाडुन टिका केली. रॉयसारख्या लोकांचा पाठिंबा असल्यामुळे बेंटिंकने 1829 साली सतीबंदीचा कायदा केला सतीच्या रुढीप्रमाणे बालविवाह, कन्याविक्रय आणि बहुपत्नित्वाची पध्दती समाजासाठी लांच्छानास्पद असल्याचे मत रॉय यांनी मांडले होते.


🧩ब्राम्हो समाजाची स्थापना :


🅾️त्या सुमारास ख्रिस्ती मिशनर्‍यांनी हिंदू धर्मावर प्रखर हल्ले होते.हे हल्ले परतवून हिंदू धर्म व संस्कृती यांचे संरक्षण करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या बुरसटलेल्या धर्मकल्पना हिंदूंनी फेकून दिल्या पाहिजेत असे रॉय यांना वाटत होते.

 

🅾️हिंदू धर्माची मूळ बैठक वेदांताच्या तत्वज्ञानावर आहे हे ओळखून रॉय यांनी वैदिक विचारसरणीचा पुरस्कार केला. वेदांत सूत्रावरील शांकर भाष्याचे बंगाली भाषेत त्यांनी रुपांतर केले.अनेक उपनिषदांचे बंगाली भाषेत त्यांनी रुपांतर केले.वेदांत सार नावाचा ग्रंथ लिहून वेदांचे तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

 

🅾️केवळ ग्रंथ लिहून व वृत्तपेतातून लेखन करुन धार्मिक व सामाजिक सुधारणा होणार नाहीत याची त्यांना जाणीव होती.

 म्हणून त्यांनी 1828 मध्ये ब्राम्होसमाज स्थापन केला. तेव्हा ब्राम्हो समाजाला असंख्य अनुयायी मिळाले. या समाजाचा प्रसार बंगाल बाहेर इतर प्रांतातही झाला होता.


भारत स्वातंत्र्याचा इतिहास.


🧩स्वातंत्र्याची घोषणा :


🅾️नवी दिल्ली येथील संसद भवनाच्या भव्य सभागृहात 14 ऑगस्टच्या रात्री भारताच्या संविधान समितीची बैठक सुरू होती.मध्यरात्री बाराचे ठोके पडले आणि भारताचे पारतंत्र्य संपले. भारत स्वतंत्र झाला. ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरवण्यात आला.


🅾️ त्याच्या जागी भारताचा तिरंगी ध्वज फडकवण्यात आला. वर्षानुवर्षांच्या गुलामगिरीच्या शृंखला गळून पडल्या.

 ब्रिटिश सत्तेने भारतात पाय रोवल्यापासून ज्या लक्षावधी भारतीयांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी असीम त्याग केला होता, अनेकांनी आपले प्राण वेचले होते त्यांच्या महान त्यागाची ही फलश्रुती होती.

 

🅾️या ऐतिहासिक क्षणाचे महत्व स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या प्रभावी भाषणात उलगडून दाखवले.ते म्हणाले, 'अनेक वर्षांपूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता. आज त्याची पूर्तता, पूर्णपणे नसली तरी बर्‍याच मोठया प्रमाणात आपण करत आहोत.


🅾️ मध्यरात्रीचा ठोका पडेल तेव्हा सारे जग झोपलेले असताना स्वतंत्र व चैतन्यमय भारत जन्माला येईल.या मंगल क्षणी केवळ भारतीयांच्याच नव्हे तर सर्व मानवजातीच्या सेवेला वाहून घेण्याची शपथ घ्यावी, असे त्यांनी आवाहन केले लक्षावधी भारतीयांनी स्वातंत्र्याचा सोहळा अभूतपूर्व उत्साहाने साजरा केला.

 स्वातंत्र्यप्रातीचा हा उत्कट आनंद निर्भळ मात्र नव्हता.

 

🅾️देशाची फाळणी आणि त्या वेळी उफाळलेला भयानक हिंसाचार यामुळे भारतीय जनता दु:खी होती. स्वातंत्र्य सोहळयात सहभागी व्हायला गांधीजी दिल्लीत थांबले नव्हते.शांतता व जातीय सलोखा टिकवण्यासाठी ते बंगालमध्ये जिवाचे रान करत होते.

 

🅾️भारत स्वतंत्र करण्यासाठी अहर्निश झटलेल्या या महात्म्याची स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच निर्घृण हत्या करण्यात आली.

ही हत्या नथुराम गोडसे याने 30 जानेवारी, 1948 रोजी केली.हिंदु-मुस्लिम ऐक्य टिकवण्यासाठी गांधीजींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती व त्यासाठीच त्यांनी आपल्या प्राणाचेही मोल दिले.

सिंधु नदीच्या खोर्‍यातील संस्कृती :

सिंधु संस्कृतीचा शोध –


सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी रेल्वे मार्ग टाकण्याचे काम चालू असतांना खोदकाम करतेवेळी तेथील लोकांना पुरातन विटा व चित्रलिपीत मुद्रा सापडल्या.
सर जॉन मार्शल व राखलदास बॅनर्जी यांच्या गटाने सन 1922 ते 1930 पर्यंत या भागात उत्खनन कार्य करून एक महत्वपूर्ण आणि विकसित संस्कृती जगापुढे आणली तीच सिंधु संस्कृती होय.
ही संस्कृती इसवी सन पूर्व 5000 या काळात अस्तित्वात असावी असे या उत्खननात मिळालेल्या पुराव्यावरून स्पष्ट होते.
आज ही ठिकाणे पाकिस्तानमध्ये आहेत. त्यानंतर केलेल्या उत्खनामध्ये भारतातील आलमगीरपूर, कालीबंगन, सुरूकोटडा, धोलावीरा, रंगपूर, रुपड इत्यादी ठिकाणी या संस्कृतीचे अवशेष मिळाले आहे.
आज ही संस्कृती जगातील सर्वात प्राचीन नागर हडप्पा व मोहेंजदडो या नावानी प्रसिद्ध आहे. ही संस्कृती सिंधु आणि रावी नदीच्या परिसरात उदयास आली होती.



❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣


सिंधु संस्कृतीचे वैशिष्टे

जगातील सर्वात प्राचीन नागरी संस्कृती आहे.
रस्ते, घरे, सांडपाण्याची व्यवस्था याची सुनियोजित रचना.
पुरापसून संरक्षण करण्याकरिता उंच जोत्यावर घरे बांधण्यात आली होती.
आरोग्य व स्वच्छता यांच्या दृष्टीने बंद गटारे निर्माण करण्यात आली होती.
मोहेंजदडो येथे 12 मीटर लांब, 7 मीटर रुंद आणि 2.5 मीटर उंचीचे स्नानगृह मिळाले आहे.
मोहेंजदडो हे शहर नदीच्या पुरामुळे सात वेळा नष्ट होवून पुन्हा वसविल्या गेल्याचे येथील पुराव्यावरून सिद्ध होते.



❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣


स्थानिक प्रसाशन –

मोहेंजदडो येथे करण्यात आलेल्या उत्खननात मिळालेल्या पुराव्यावरून येथील लोक आरोग्य आणि स्वच्छता विषयक सोईच्या बाबतीत जागरूक असल्याचे दिसून येते.
नगररचना योजनाबद्ध होती.
यावरून या ठिकाणी आजच्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात असाव्यात आणि त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपीवण्यात आल्याचे दिसून येते.
हडप्पाकालीन लोकजीवन –

सिंधु आणि रावी नद्यांच्या परीसरात करण्यात आलेल्या उत्खननात मिळालेल्या पुराव्याच्या आधारे येथील लोकजीवनाबाबत खालील माहिती मिळते.



❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣


दैनंदिन जीवनप्रणाली –

अन्न : येथील लोक आपल्या आहारामध्ये तांदूळ, गहू, सातू, खजूर, मांस, मासे भाज्या व फळे यांचा वापर करीत असल्याचे दिसून येते.
वस्त्र व प्रावरणे : येथील उत्खनात मिळालेल्या पुराव्यावरून या लोकांना कापड विणण्याची कला अवगत असल्याचे दिसून येते. स्त्री-पुरुषांच्या पोशाखात कंबरेपर्यंतचे वस्त्र व उपरण्याचा वापर करीत असे.
अलंकार : हे लोक सोने, चांदी, तांबे, रत्ने, शिंपले कवडया, बिया इत्यादींचा वापर दागिने तयार करण्याकरिता करीत असे. यामध्ये बाजूबंद, अंगठ्या, दंडापर्यंत बांगड्या कमरपट्टा इत्यादी अंलकाराचा समावेश होता.
करमणुकीची साधने : हे लोक करमणुकीकरिता, नृत्य, संगीत व सोंगट्या व फासे यांचा खेळ खेळत.


❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

धार्मिक संकल्पना –

पुजा अर्चना : हडप्पाकालीन उत्खननात मिळालेल्या मातृदेवतेची मूर्ति आणि अग्नीचे अवशेष यावरून लोक निसर्गपूजक व मातृपूजक होते स्पष्ट होते.
अंत्यविधी : हडप्पा कालीनलोक मृतदेहांना जाळित असे किंवा शवपेटीत घालून पुरले जात आसवेत असे या स्पष्ट होते. त्याचबरोबर मृतदेह पुरतांना सोबत अन्न, अंलकार व आयुधे सुद्धा पुरवण्यात येत असे.
उद्योग व व्यवसाय : हडप्पाकालीन लोकांचा शेती आणि व्यापार हे प्रमुख व्यवसाय होते.
शेती : शेती हा येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय होता. ते शेतीमध्ये गहू, तांदूळ, कापूस, सातू, कडधान्ये इत्यादी पिकांचे उत्पादन घेत असे.
भांडी : भांडी तयार करणे आणि त्यावरच चित्रकला काढणे हा येथील लोकांचा दूसरा व्यवसाय असल्याचे दिसून येते.
कापड : कापूस व लोकरीपासून धागा तयार करणे आणि कापड तयार करणे हा येथील लोकांचा एक व्यवसाय होता.


व्यापर : हडप्पा येथे तयार होणार्‍या मालाचे अवशेष सुमेरियन संस्कृतीमध्ये मिळाल्यामुळे आणि गुजरात मधील लोथल येथे मिळालेल्या बंदरच्या अवशेषावरून हे लोक व्यापारामध्ये प्रविण असल्याचे दिसून येते.हडप्पा येथील लोकांचा व्यापार जलमार्गाने इतर देशांशी चालत असल्याचे स्पष्ट होते.



❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

ब. जीनांचे चौदा मुद्दे


१. भारतीय राज्यघटना संघराज्यात्मक असावी. शेषाधिकार प्रांतांकडे असावेत.

२. सर्व प्रांतांना सारखीच स्वायत्तता मिळावी.

३. सर्व कायदेमंडळात व लोकनियुक्त संस्थांत अल्पसंख्याकांना योग्य व परिणामकारक प्रतिनिधीत्व मिळावे. तथापि, त्यामुळे बहूसंख्याकवाला पक्ष अल्पसंख्याक होऊ नये.

४. केंद्रीय कायदेमंडळात मुस्लीममांना एक-तृतीयांश प्रतिनिधीत्व मिळावे.

५. स्वतंत्र्य मतदारसंघ हे अस्तित्वात असतीलच. तथापि, कोणाही समाजाला स्वतंत्र मतदारसंघाचा स्वत: हून त्याग करून संयुक्त मतदारसंघ स्वीकारता येईल.

६. पंजाब, बंगाल आणि वायव्य सरहद्द प्रांत यांची पुनर्रचना करीत असता मुस्लीम मताधिक्य नष्ट होता कामा नये.

७. सर्व समाजांना आपल्या धर्माचे आचरण करण्यास, प्रचार करण्यास किंवा धार्मिक शिक्षण घेण्यास पूर्ण स्वातंत्र्य असावे.

८. कोणत्याही कायदेमंडळात अगर लोकनियुक्त संस्थेत एखाद्या समजाविषयी ठराव पास होत असता त्या समाजातील तीन-चतुर्थाश प्रतिनिधींनी जर त्या ठरावाला विरोध केला तर तो ठराव पास होऊ नये.  

९. मुंबई प्रांतापसून सिंध प्रदेश वेगळा करावा.

१०. वायव्य सरहद्द प्रांत व बलूचिस्तान या प्रांतांत इतर प्रांतांप्रमाणे राजकीय सुधारणा राबवाव्यात.

११. राज्याच्या व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कारभारात मुस्लिमांना योग्य त्या प्रमाणात नोकर्‍या मिळाल्या पाहिजेत.

१२. मुस्लीम संस्कृती, भाषा, शिक्षण, संस्था इत्यादींचे संरक्षण करण्यासाठी घटनेत आवश्यक त्या तरतुदी असाव्यात.

१३. केंद्रीय अथवा प्रांतीय मंत्रीमंडळात एक-तृतीयांश मुस्लीम सदस्य असले पाहिजेत.

१४. केंद्रीय कायदेमंडळाची रचना बदल्यासाठी प्रांतीय कायदेमंडळाच्या संमतीची आवश्यकता असेल.

सिंधू/हडप्पा संस्कृती



💁‍♂ महत्त्वाची स्थळे व नद्या 


⦿ हडप्पा ➾ रावी


⦿ मोहेंजोदाडो ➾ सिंधू


⦿ चन्हंदडो ➾ सिंधू


⦿ कोटदिजी ➾ सिंधू


⦿ कालीबंगन ➾ घग्गर


⦿ बनवाली ➾ घग्गर


⦿ रंगपुर ➾ मादर


⦿ रोपड ➾ सतलज


⦿ लोथल ➾ भोगवा


⦿ धोलावीरा ➾ रंगाई


⦿ राखीगढ ➾ चौटांग


⦿ आलमगीर ➾ हिंडन


(इंग्रजी: Harappan civilization) ही जगातील प्राचीन ताम्र युगीन संस्कृतींपैकी एक आहे. हिचा कालखंड लिबी यांच्या कार्बन १४ या शास्त्रीय पद्धतीनुसार इ.स.पू. २७०० ते इ.स.पूर्व १५०० असा मानला जातो. 


इ.स. १९२० च्या सुमारास लाहोर-मुलतान रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना काही प्राचीन विटांचे अवशेष सापडले. यामुळे पुरातत्त्व खात्याने याचा शोध घेण्यासाठी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू केले आणि एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली. 


या संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले म्हणून नव्यानेच शोधलेल्या या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात. ही संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदीच्या प्रदेशात केंद्रित असल्याने तिला सिंधू संस्कृती असेही म्हणतात.


 नागरी हडप्पा संस्कृतीची बीजे बलुचिस्तानातील मेहेरगढ येथील हडप्पापूर्व् काळातील नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये सापडतात. 

जॉ फ्रन्क्ववा जारीज आणि रिचर्ड् मेडो या पुरातत्वज्ञानी येथे उत्खनन केले.


 हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या खुणा दर्शविणा-या ज्या संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत त्या संस्कृतीला 'टोगाओ संस्कृती' या नावाने ओळखले जाते.


 हडप्पापूर्व् काळातील 'रावी अथवा हाक्रा' संस्कृतीचे अवशेष हडप्पा (पन्जाब् पाकिस्तान), कुणाल, भिराणा, फर्माना (हरयाणा) इत्यादी स्थळाच्या उत्खननात मिळाले आहेत.


💠💠प्राचीन भारताचा इतिहास 💠💠

.
* सिंधू संस्कृती
०१. समांतर चतुर्भुज आकाराचा हडप्पाचा गढ ४६० गज (४१८ मीटर) लांब, २१५ गज (१९५ मीटर) रुंद व १७ गज (१५ मीटर) उंच होता.

०२. सिंधू संस्कृतीची लिपी ही चित्रलिपी होती. ज्याच्यात ६०० पेक्षा जास्त चित्राक्षर व ६० मुळाक्षरे होती.

०३. १९२५ साली अर्नेस्ट मैक च्या नेतृत्वाखाली चन्हुदडो नावाच्या शहराचे उत्खनन केले गेले. या शहरात गढ नाही.

०४. नाळ, डाबरकोट, राखीगढी, बनवली, रंगपूर, लोथल, आम्री, कुल्ली, राणा घुन्डाई, अंजिरा, गुमला, देस मोरासी घुन्डाई, मुन्डीगाक, दिप्लबंगा, सहर-ए-सोख्ता, बामपूर व क्वेट्टा या ऐतिहासिक स्थळी सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.

०५. १९६१ साली राजस्थानातील कालीबंगा येथे बी.बी. लाल आणि बी.के. थापड यांच्या निर्देशनाखाली उत्खनन करण्यात आले. उत्खननात खालील भागात पूर्व-सिंधू संस्कृतीचे अवशेष तर वरील पृष्ठभागात सिंधू संस्कृतीचे अवशेष मिळाले. येथील शहर आणि गडाच्या चारही बाजूंनी तटबंदी होती.

०६. रंगनाथ राव यांच्या निदर्शनाखाली १९५३-५४ मध्ये गुजरात मधील रंगपूर येथे सिंधुकालीन स्थळाचे उत्खनन करण्यात आले. येथे कच्च्या विटांचे गड, नाल्या, मातीची भांडी, दगडांचे फलक इत्यादी गोष्टी मिळाल्या. परंतु देवींच्या मूर्ती व मुद्रा सापडल्या नाही.

०७. प्राचीन काळी लोथल हे शहर समुद्रकिनाऱ्यावर स्थित होते. त्याच्या उत्खननात जहाज बांधणी कारखान्याचे अवशेष सापडले. यावरून असे समजले कि लोथलचे नागरिक पश्चिम आशियाशी व्यापार करत होते.

०८. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील सूरकोटडा या ठिकाणचे उत्खनन कार्य १९६४ मध्ये जगतपति जोशी यांच्या निर्देशनाखाली केले गेले.

०९. सिंधू संस्कृतीचे उत्खनन करत असताना २४२ फुट लांब आणि ११२ फुट रुंदीची एक विशाल इमारत सापडली. त्या इमारतीच्या भिंतीची रुंदी सुमारे ५ फुट होती.

१०. सिंधू संस्कृतीत काही मूर्ती सापडल्या. ज्याच्या मध्य भागात सूर्याची प्रतिमा होती. यावरून समजण्यात आले कि त्या काळात सूर्य पूजा प्रचलित होती.

११. भारतात मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे साधारणतः १.५ करोड वर्षापूर्वीचे आहेत. भारतीय लोकांचे निग्रीटो, प्राचीन ऑस्ट्रेलियन, काकेशसी, व मेंगोलाईड्स असे चार मूळ वांशिक उपप्रकार पडतात.

१२. अलाहाबाद जवळील सराय नाहर राय, बालाईखोर व लेखनिया येथे मानवी शरीराचे सांगाडे सापडले आहेत. मोठी उंची, चपटे नाक व रुंद चेहरा ही यांची विशेषता होती. हे सांगाडे मध्य पाषाणकालीन असावेत.

१३. सिंधू नदीची उपनदी असलेल्या सोहन नदीच्या किनाऱ्यावर पूर्व पाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष सापडले. म्हणून याला सोहन संस्कृती असेसुद्धा म्हटले जाते.

१४. हडप्पा संस्कृतीत देवीची पूजा केली जात असे. हडप्पा संस्कृतीत कुत्रा, मांजर आणि घोड्याच्या शरीराचे अवशेष मिळाले आहेत.

१५. सिंध प्रदेश हा कापूस उत्पादन करणारा प्रदेश होता. म्हणून ग्रीकांनी याला सिडोन असे नाव दिले होते.

१६. हडप्पामध्ये चांदीची आयात अफगाणिस्तान, दक्षिण भारत, इराण व अरबस्थानातून केली जात असे. निर्माण कार्यासाठी लागणारा लाज्बर्द बदक्शां येथून, फिरोजा इराण मधून, जबूमणि महाराष्ट्रातून, मुंगा आणि लाल सौराष्ट्र व पश्चिम भारतातून तसेच 'हरा पत्थर' मध्य आशियातून आयात केला जात असे.

१७. राजस्थानातील अहाड संस्कृती ताम्रयुगीन होती. मातीची घरे, ताम्र भांडी, भातशेती ही या २००० वर्षापूर्वीच्या संस्कृतींची विशेषता होती.

१८. माळवा या ताम्र पाषाण कालीन संस्कृतीची चिन्हे नव्दातौली येथून प्राप्त झाली आहेत.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

🟢 सिंधु संस्कृतीचा शोध 🟢

◾️  सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी रेल्वे मार्ग टाकण्याचे काम चालू असतांना खोदकाम करतेवेळी तेथील लोकांना पुरातन विटा व चित्रलिपीत मुद्रा सापडल्या. 

◾️  सर जॉन मार्शल व राखलदास बॅनर्जी यांच्या गटाने सन 1922 ते 1930 पर्यंत या भागात उत्खनन कार्य करून एक महत्वपूर्ण आणि विकसित संस्कृती जगापुढे आणली तीच सिंधु संस्कृती होय. 

◾️  ही संस्कृती इसवी सन पूर्व 5000 या काळात अस्तित्वात असावी असे या उत्खननात मिळालेल्या पुराव्यावरून स्पष्ट होते. 

◾️ आज ही ठिकाणे पाकिस्तानमध्ये आहेत. त्यानंतर केलेल्या उत्खनामध्ये भारतातील आलमगीरपूर, कालीबंगन, सुरूकोटडा, धोलावीरा, रंगपूर, रुपड इत्यादी ठिकाणी या संस्कृतीचे अवशेष मिळाले आहे. 

◾️ आज ही संस्कृती जगातील सर्वात प्राचीन नागर हडप्पा व मोहेंजदडो या नावानी प्रसिद्ध आहे. ही संस्कृती सिंधु आणि रावी नदीच्या परिसरात उदयास आली होती.

वाचा :- राज्यघटना बाबत मते

🍀एन श्रीनिवासन:-

✍️भाषा आणि आशय या बाबतीत घटना जवळजवळ 1935 च्या कायद्यासारखीच आहे


🍀आयव्हर जेंनीग्स:-

✍️1935 च्या कायद्यातून काही तरतुदी जशास तश्या घेतल्या आहेत


🍀के हनुमंतय्या:-

✍️आम्हला विना किंवा सतार याचे संगीत हवे होते पण येथे इंग्लिश घोष विभागाचे संगीत आहे

✍️ज्या प्रकारची घटना गांधीजींना नको होती व त्यांना अपेक्षित न्हवती नेमक्या त्याच प्रकारची ही घटना आहे


🍀लोकनाथ मिश्र:-

✍️पश्चिमचे गुलामी अनुकरण,त्याहून पश्चिमेला गुलामी शरणागती


🍀लक्ष्मीनारायण साहू:-

✍️मसुदा ज्या विचारधारावर आधारलेला आहे त्याचे मूळ भारतीय विचारधाराशी कोणतेही नाते दिसत नाही


🍀एच बी कामत:-

✍️आपल्या समितीसाठी हत्ती हे चिन्ह स्वीकारले आहे ते राज्यघटनाशी सुसंगत आहे


वाचा :- महाराष्ट्र इतिहास


● महाराष्ट्रात नेवासे, चांदोली, सोमगाव, टेकवाडे, सावरदे व दायमाबाद आदी ठिकाणी ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.


● महाराष्ट्रात महापाषाण युगाचा काळ इ.स.पूर्व 1000 वर्षापूर्वीचा आहे.


● मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर महाराष्ट्रात सातवाहन राजघराण्याचा उदय झाला.


● जागतिक नकाशावर महाराष्ट्रास सर्वप्रथम दर्शवणारे व महत्व प्राप्त करून देणारे ‘सातवाहन’ हेच पहिले महाराष्ट्रातील राजघराणे होय. ‘सिमुक’ राजा या घराण्याचा संस्थापक मानला जातो.


● सातवाहन ‘राजा सातकर्णी’ प्रथम व त्याची राणी ‘नागणिका’ यांची प्रतिमा जुन्नरच्या नाणेघाटात आढळून येते.


● राष्ट्रकूट घराण्यातील ‘कृष्ण प्रथम’ याने जगप्रसिद्ध असलेले ‘वेरूळ येथील कैलास मंदिर’ बांधले.


● शिलाहारांची महाराष्ट्रात दक्षिण कोकण, उत्तर कोकण (ठाणे) आणि कोल्हापूर या तीन ठिकाणी सत्ता केंद्रे होती.


● शिलाहार घराण्याचा संस्थापक म्हणून ‘विद्याधर जीमुतवाहन’ हा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तगर (तेर) हे त्याचे मूल स्थान होय.


● चंद्रपुर येथे गोंड घराण्याने आपली सत्ता निर्माण केली. तसेच या घराण्याचा संस्थापक ‘कोल भिल’ हा होता.


● यादवांचा प्रधान हेमाद्री याने ‘चातुरवर्ग चिंतामणी’ हा ग्रंथ लिहिला.


● महाराष्ट्रात बहामनी राज्याची स्थापना ‘हसन गंगू बहामणी’ याने केली. तो या राज्याचा संस्थापक मानला जातो. 


बहामणी राज्याचे खालील 5 तुकडे झाले. 

1. वर्हाडी : इमादशाही

2. अहमदनगर : निजामशाही

3. बिदर : बरीदशाही

4. गोवलकोंडा : कुतुबशाही

5. विजापूर : आदिलशाही

प्रागैतिहासिक कालखंड‼️


👉👉प्रागैतिहासिक मानवाला लेखन शैली अवगत नव्हती


अश्म युग👇👇👇


✔️पुराणाश्म युग (Palaeolithic age) :इ.स.पूर्व 9000


 मानवाचा मुख्य व्यवसाय शिकार करणे.


शिकार व इतर कामांसाठी दगडी हत्यारांचा वापर केला जात असल्याने पाषाण युग म्हटले गेले. 

हत्यारे तीक्ष्ण नव्हती.

शेतीचे ज्ञान नव्हते.

डोंगरपायथ्यालगत किंवा नदी काठावर वस्ती करत असे.


नैसर्गिक गुफांमध्ये राहत असे. उदा. भीमबेटका (मध्यप्रदेश).

भीमबेटका येथील गुहांमध्ये भिंतीवर चित्रे कोरली आहेत. त्यात मानवी जीवन तसेच शिकारीचे दृष्य दाखवली आहेत. पक्षी आणि प्राणी चित्रे यांचा समावेश,


✔️मध्याश्मयुग (Mesolithic age): इ.स.पूर्व 9000 इ.स.पूर्व 4000


 पाषाण युग आणि नवाश्म युग यांच्यामधील कालखंड, मुख्य व्यवसाय – शिकार, कंदमुळे गोळा करणे आणि मासेमारी, नंतर प्राणी पाळण्यास सुरुवात.


दगडी हत्यारांचाच वापर मात्र हत्यारे अधिक तीक्ष्ण बनली. दगडी हत्यारे चकत्यांसारखी झाली.


✔️नवाश्म युग (Neolithic age): इ. स. पूर्व 4000 इ. स. पूर्व 1500


 मेहरगड,बलुचिस्तान (एकमेव ) 


 या काळातील दगडी हत्यारे मध्याश्म युगापेक्षा अधिक तीक्ष्ण बनली.


हत्यारे बनवण्यासाठी चकाकी असलेल्या दगडांचा वापर करण्यात येत.

चकत्यासारखी दगडी हत्यारे वापरत नसे.



शेतीची सुरवात – रागी, कुलीथ, काही ठिकाणी गहू व तांदुळ यांचे शेतीत उत्पादन.

राहण्यासाठी दगड व मातीची चौकोनी आकाराचे घरे बनवत असे.

स्थायिक जीवन पद्धतीची सुरुवात.

मातीच्या भांड्यांच्या वापरास सुरुवात.

पाळीव प्राण्यांच्या संख्येत वाढ.


✔️ताम्र पाषाण युग (Chalcolithic age)


Maharashtra, Madhya Pradesh, Rajasthan, Southern-eastern India.

जोर्वे दायमाबाद नेवासा(अहमदनगर) चांदोली सोनगाव इनामगाव (पुणे) प्रकाशे,नाशिक 👈 जोर्वे संस्कृती



नवाश्मयुगाच्या शेवटी धातुच्या वापरास सुरुवात.


सुरुवातीचे धातु तांबे हे होते.

या काळात तांबे व दगड या दोन्हींचा वापर होत असल्याने यास ताम्रपाषाण युग म्हटले गेले.

काही ठिकाणी ब्राँझचाही वापर.


ताम्रपाषाण संस्कृतीच्या महत्त्वाची ठिकाणी- अहर, कायथा, सावळदा, प्रभास, नागपूर शिकार ही करत आणि गाय, म्हैस, शेळी सारख्या प्राण्यांनाही पाळत असे. मात्र घोडा हा प्राणी त्यांना माहित नसावा.


गहु, तांदुळ, बाजरा, मसुर, कापुस इ. ची शेती करत.

कापड बनवण्याची कला अवगत होती.

मृत व्यक्तींना पुरण्याची पद्धत होती.

स्त्री देवतांची पुजा करत.

चालू घडामोडी :- 24 JULY 2024

1) राष्ट्रीय औष्णिक अभियंता दिन दरवर्षी 24 जुलै रोजी साजरा केला जातो.

2) अॅडव्हान्स्ड थर्मल सोल्यूशन्स, इंक (एटीएस) ने जुलै 2014 मध्ये राष्ट्रीय औष्णिक अभियंता दिनाची स्थापना केली.

3) अरुणाचल प्रदेश विधानसभेने 'अरुणाचल प्रदेश सार्वजनिक परीक्षा विधेयक, 2024' एकमताने मंजूर केले आहे.

4) 'ग्रामोदय संकल्प' मासिकाच्या आगामी अंकासाठी पंचायती राज मंत्रालयाकडून लेख आणि यशोगाथा मागवण्यात आल्या आहेत.

5) भारतात दरवर्षी 24 जुलै रोजी 'इन्कम टॅक्स डे' साजरा केला जातो.

6) केव्ही सुब्रमण्यन यांची फेडरल बँकेने सीईओ आणि एमडी म्हणून नियुक्ती केली आहे.

7) 'Institute of Cost Accountants of India' (ICMAI) च्या अध्यक्षपदी 'विभूती भूषण' यांची निवड झाली आहे.

8) हरियाणामध्ये NTPC विद्युत व्यापार निगम लिमिटेडद्वारे ग्रीन चारकोल प्लांट उभारला जाईल.

9) 23 जुलै 2024 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला आहे.

10) केंद्रीय अर्थसंकल्पात आदिवासींच्या विकासासाठी पंतप्रधान जनजाती उन्नत ग्राम अभियान सुरू करण्याची घोषणा  करण्यात आली असून ते 63,000 आदिवासीबहुल गावात राबविण्यात येणार आहे.

11) केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये नैसर्गिक शेतीसाठी 10 हजार जैव-निविष्ट संसाधन केंद्राची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

12) केंद्रीय अर्थसंकल्पात एंजल टॅक्स रद्द करण्याची घोषणा करण्यात आली असून तो 2012 लागू करण्यात आला होता.

13) सुभाष प्रसाद गुप्ता यांची भारताचे सुरीनाम या देशाचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे.

14 ) भावी मेहता यांना Oxford Bookstor बुक कवर पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे.

15) पंजाब राज्यात भारतीय सेना आणि वायू सेना यांच्या व्दारे गगन स्ट्राईक-2 या सरावाचे आयोजन करण्यात आले होते.

16) नागालँड या राज्यात कोहीमा शांती स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

17) केंद्रीय अर्थसंकल्पात ईशान्य प्रदेशात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या 100 शाखा स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

18) मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची निवड झाली आहे.

19) ब्रिटन या देशाचा टेनिसपटू आणि अँडी मरे याने निवृत्तीची घोषणा केली आहे.

20) हंगेरी येथे झालेल्या हंगेरियन ग्रांप्री (GP) 2024 स्पर्धेचे विजेतेपद पटकावून मॅकलारेनच्या ऑस्कर पियास्त्री या ऑस्ट्रेलियन रेसिंग ड्रायव्हरने आपले पहिले F1 विजेतेपद पटकावले.

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫



⚙️ भारतीय खगोल भौतिकशास्त्रज्ञ प्रल्हाद चंद्र अग्रवाल यांना COSPAR हॅरी मॅसी पुरस्कार 2024 ने सन्मानित
◾️हा पुरस्कार मिळवणारे पाहिले भारतीय
◾️हा पुरस्कार अवकाश संशोधनाच्या विकासात उल्लेखनीय योगदानाला दिला जातो
◾️पुरस्कारप्राप्त व्यक्तीला मायनर प्लॅनेट (20064 प्रल्हादग्रवाल) या नावाने सन्मानित केले जाते.
◾️15 जुलै रोजी दक्षिण कोरियाच्या बुसान येथे 45 व्या COSPAR सायंटिफिक असेंब्लीच्या उद्घाटन समारंभात सन्मानित करण्यात आले
◾️AstroSat प्रकल्पाचे मार्गदर्शक आणि प्रमुख अन्वेषक होते
◾️भारताच्या पहिल्या चंद्र मोहिमेचा (चांद्रयान 1) प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी इस्रोने स्थापन केलेल्या चंद्र टास्क फोर्सचे ते सदस्य होते

⚙️ गेवरा आणि कुसमुंडा खाणींचा समावेश जगातील पहिल्या 10 सर्वात मोठ्या खाणींच्या मध्ये झाला
1】🌆 साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (SECL) च्या गेवरा ( जगात दुसरी मोठी)
2】🌆 कुसमुंडा कोळसा ( जगात चौथी मोठी )
◾️दोन्ही खाणी छत्तीसगड कोरबा जिल्ह्यात आहेत
◾️या दोन खाणीतून भारताच्या एकूण उत्पादनाच्या 10% उत्पादन होते
◾️WorldAtlas.com यांनी हा रिपोर्ट प्रकाशित केला

⚙️ BCCI ने इंडियन ऑलिंपिक असोसिएशनला 8.5 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे
◾️BCCI अध्यक्ष :  रॉजर बिन्नी
◾️BCCI सचिन : जय शहा ( यांची घोषणा)
◾️BCCI मुख्यालय :मुंबई
◾️BCCI स्थापना : डिसेंबर 1928

⚙️एलोन मस्क यांनी की एक्स 📱 आणि स्पेसएक्स मुख्यालय कॅलिफोर्निया मधून ते टेक्सासमध्ये हलवणार असल्याची घोषणा केली

⚙️ स्मृती मानधना महिला 🏏 टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय मध्ये सर्वाधिक धावा बनवणारी भारतीय खेळाडू बनली आहे
◾️ हरमनप्रीत कौर हिला मागे टाकले
◾️एकूण 3365 धावा बनवले आहेत

⚙️ भारताला एशियन डेव्हलपमेंट बँकेने (ADB) $240.5 दशलक्ष कर्ज मंजूर केले आहे
◾️भारतातील छतावरील सौर यंत्रणांना🌫 वित्तपुरवठा करण्यासाठी
◾️स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि नॅशनल बँक फॉर ग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) मार्फत हे कर्ज वितरित केले जाईल.

⚙️आशियाई विकास बँक /Asian Development Bank
⭐️मुख्यालयः मांडलुयोंग, फिलीपिन्स
⭐️स्थापनाः 19 डिसेंबर 1966
⭐️68 सदस्य देश
⭐️अध्यक्षः मासात्सुगु असाकावा
------------------------------------------

२४ जुलै २०२४

महाराष्ट्राचे पर्यटन जगाला भुरळ पाडणारे



औरंगाबाद, नागपूर, नंदुरबार ते कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी अशा ठिकाणांच्या पर्यटनस्थळांची निवड करून तेथे अम्युझिंग पार्क, थीम पार्क, वॉटर स्पोर्टस, जंगल सफारी, आलिशान हॉटेल्स उभारण्यासाठी गुंतवणूकदारांना आवाहन करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने सादरीकरण केले होते. मात्र या 20 पर्यटनस्थळांच्या विकासासाठी राज्यातच गुंतवणूकदारांचे स्वतंत्र अधिवेशन भरविण्याचा मानस महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा आहे.


राज्यातील पर्यटन स्थळ प्रकल्पांची संख्या जास्त आहे. औरंगाबाद येथील फरादपूर परिसरासह तेथीव पर्यटन स्थळांचा विकास, चिखलदरा, नागपूर येथील नवेगाव खैरी, नंदुरबारमधील दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे प्रकाशा, नंदुरबारचाच तोरणमाळ परिसर, लोणार येथील आजिसपूर, सिंधुदुर्ग येथील मिठबाव, निवतीचा किनारा, रत्नागिरी हरनई किल्ला, रायगड किल्ला आणि परिसराचा विकास, रायगडमध्येच काशीद समुद्रकिनारा आणि परिसर, सुरेखा परिसर, ठाण्यात वसईचा किल्ला, पालघर येथील शिरगाव, मुंबईत एरंगल येथील कलाग्राम नावाने प्रदर्शन, सभा-चर्चासत्रांसाठी मोठे सभागृह उभारणी आदी प्रकल्पांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पांच्या विकासासाठी लागणारी जागा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून उपलब्ध करण्यात येणार असून, राज्याच्या पर्यटन धोरणांनुसार त्यांचा विकास करण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटन विभागाच्या मुख्य सचिव वल्सा नायर यांनी दिली.


महाराष्ट्र हे विविधतेने नटलेले राज्य आहे. डोंगरदऱ्या, विस्तीर्ण समुद्रकिनारा, लेणी, किल्ले, अभयारण्य, मोठी वनराई...यादी खूपच मोठी आहे. विदर्भ, मराठवाडा असो, किंवा कोकण किनारपट्टी; राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये सुंदर पर्यटनस्थळे दडलेली आहेत. फिरायचे म्हटले, तर अख्खे आयुष्यही कमी पडेल, इतकी ठिकाणे आपल्याच राज्यात आहेत. मग येताय ना...महाराष्ट्राच्या सफरीवर!


महाराष्ट्रातील लेणी


अजिंठा लेणी

औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठ्याची लेणी इ.स.पूर्व शतकातील असल्याचे सांगितले जाते. औरंगाबाद विमानतळापासून 108 किलोमीटर अंतरावर या लेण्या आहेत. येथील 30 शिल्पे म्हणजे प्रत्येकाची स्वतंत्र खोली असल्यासारखे वाटते. येथे बुद्धाच्या जीवनावर विविध शिल्पे कोरलेली आहेत. जवळचे रेल्वे स्थानक जळगाव असून, तेथून 58 किलोमीटर अंतरावर ही लेणी आहे. औरंगाबाद शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेले वेरूळ जगातील ऐतिहासिक वारसास्थळ बनले आहे. येथील शिल्पांमध्ये बौद्ध, हिंदू आणि जैन यांच्या शिल्पकलेचा संगम झालेला आहे. येथील धुमार लेणी, कैलासचे मंदिर प्रसिद्ध आहे.


घारापुरी लेणी

गेट वे ऑफ इंडियापासून 9 नॉटिकल मैल अंतरावर समुद्रातील बेटावर घारापुरी लेणी आहेत. त्यांचा समावेश रायगड जिल्ह्यात होतो. यालाच एलिफंटा लेणी असेही म्हणतात. येथे दगडामध्ये महादेवाचे मंदिर कोरलेले आहे. येथे महादेव मूर्तींचा निर्माता, संरक्षक आणि संहारक म्हणून दाखवला आहे; जे खरोखर प्रेक्षणीय आहे.


पितळखोरे लेणी

औरंगाबाद जिल्ह्यातील पितळखोरे लेण्यांमध्ये शिलालेख, कोरीव घोडे, हत्ती मोठ्या प्रमाणात आहेत. तेथील दगडामध्ये बुद्धाची राजा असतानाची प्रतिमा कोरलेली आहे. हे बुद्धाचे राजा असतानाचे एकमेव शिल्प आहे. येथील लेण्यांची शिल्पे पाण्याच्या घर्षणाने नष्ट झालेली आहेत. पितळखोरे अजिंठ्याहून 78 किलोमीटर अंतरावर आहे. ही लेणी अजिंठ्यापेक्षा 2200 वर्षे जुनी आहे.


कार्ले-भाजे लेणी

कार्ले-भाजे लेणी या इ.स.पूर्व शतकातील बौद्ध धर्माच्या हिनयान पंथीय लेणी असल्याचे सांगितले जाते. म्हणून या लेण्यांत बुद्धमूर्ती आढळत नाहीत. कार्ले हे पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथून 11 किलोमीटर अंतरावर आहे. कार्ले येथील महाचैत्याचे शिल्प भाजे लेण्याच्या साडेतीनपट मोठे आहे.


माहूरची लेणी

नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या जुन्या बस स्थानकाजवळील टेकडीत या लेण्या कोरलेल्या आहेत. या लेण्या राष्ट्रकुल काळातील असल्याचे मानले जाते. येथे अनेक खांब असलेले 15 मीटर उंचीचे मोठे दालन आहे. त्यालाच जोडून गर्भगृह कोरलेले आहे.


महाराष्ट्रातील किल्ले


रायगड किल्ला

हा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये आहे. उंच आणि वरील बाजूस निमुळत्या होत गेलेल्या डोंगरावर हा किल्ला बांधलेला होता. याच्या तिन्ही बाजूंनी असलेले खोरे याला सह्याद्री पर्वतापासून वेगळे करते. तिन्ही बाजूंनी येथे जाणे अशक्य होते. मुंबईच्या दक्षिणेस 210 किलोमीटर अंतरावर व महाडच्या उत्तरेस 27 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. किल्ल्यापासून 5 किलोमीटर उंचीवर पश्चिमेस हिरकणी, उत्तरेस टकमक, पूर्वेस भवानी अशी तीन टोके आहेत. येथे जाण्यास केवळ एकच मार्ग ठेवलेला आहे. तोही डावपेचाचा मार्ग आहे. त्याशिवाय शिवाजी महाराजांची समाधी, बाजार, जगदीश्वराचे मंदिर या गोष्टीही पाहण्यासारख्या आहेत.


राजगड

राजगड हा किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. या किल्ल्याची उभारणी शिवाजी महाराजांनी केली. या किल्ल्याला त्या वेळी राजधानी समजले जात असे. हा किल्ला अतिशय दुर्गम आहे. येथील सुवेळा माचीवरील हत्ती प्रस्तर पाहण्यासारखे आहे. उत्कृष्ट डोंगरी किल्ला म्हणून जागतिक पातळीवर राजगडचा गौरव केला जातो.


सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणपासून जवळच खडकाळ बेटावर हा किल्ला उभारला आहे. या किल्ल्याच्या बांधकामासाठी गोव्याहून खास 100 पेक्षा अधिक तज्ज्ञ पोर्तुगीजांना बोलावले होते; तसेच या बांधकामासाठी 3000 कामगार तीन वर्षे झटत होते.

48 एकराचा हा किल्ला असून, किल्ल्याला 4 कि.मी. लांबीचा 9 मीटर उंच, 3 मीटर रुंद असा तट आहे, 42 बुरुज आहेत. मोठे दगड व 72576 किलोग्रॅम लोखंड वापरून याच्या भिंती बांधल्या आहेत. किल्ल्याचे वेगळेपण म्हणजे याचा पाया शिसे ओतून उभारला आहे. किल्ल्यामध्ये असलेल्या शिवाजी मंदिरात शिवाजी महाराजांचा देशातील एकमेव दाढीविरहित पुतळा आहे.


पन्हाळा

कोल्हापूर शहराच्या वायव्य दिशेस 19 किलोमीटर अंतरावर पन्हाळगड हा किल्ला आहे. त्रिकोणी आकाराचा पन्हाळा डोंगराळ भागात असून, त्याची उंची 850 मीटर आहे व परीघ 7.25 किलोमीटर आहे. अर्ध्या भागात नैसर्गिक भिंत आहे. उर्वरित भाग मजबूत दगड भिंतींच्या बुरुजाने संरक्षित आहे. किल्ल्याच्या दुहेरी भिंतीला तीन दरवाजे आहेत. त्यांपैकी दोन सुरक्षित आहेत. येथे मोठमोठी धान्याची कोठारे आहेत. आजही पन्हाळा पर्यटनस्थळ म्हणून महत्त्वपूर्ण आहे. तेथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. कवी मोरोपंतांचा जन्म येथेच झाला; तसेच आज्ञापत्राचे लेखक रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी येथेच आहे.


प्रतापगड

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरपासून 24 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. 1656 मध्ये हा किल्ला बांधला असून, अत्यंत कठीण आणि डोंगराळ भागात हा किल्ला आहे. येथे विजापूरचा सरदार अफजलखान याचा शिवाजी महाराजांनी वध केला होता. प्रतापगडाच्या माथ्यावर चिन्नमनस, धोबी, लिंगमळा धबधबा अशी ठिकाणे आहेत. तिथून दूरपर्यंत निसर्गसौंदर्य न्याहाळता येते; तसेच विल्सन पॉइंट, कारनॅक पॉइंट, हेन पॉइंट, एल्फिन्स्टन, बॉबिग्टन, फलचंद केंद्र येथून निसर्गन्याहाळता येतो.


हरिश्चंद्रगड

अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगड म्हणजे ऐतिहासिक पुरावे असणारा किल्ला होय. चांगदेवांच्या अस्तित्वाचा शिलालेख, प्राचीन लेणी व गुहा मंदिरे, श्रीहरिश्चंद्रेश्वराचे शिल्पसमृद्ध मंदिर व अनेक जुनी हत्यारे या किल्ल्यावर पाहायला मिळतात. या किल्ल्यासंदर्भात अनेक शौर्यगाथा, कथा प्रचलित आहेत. किल्ल्यावरून कोकणकड्याचे अप्रतिम दृश्य दिसते.


नळदुर्ग

उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग हा किल्ला बोरी नदीच्या शेजारी आहे. या भुईकोट किल्ल्याच्या संरक्षणासाठी जलमहाल उभारलेला आहे. येथील गंडभेरुंडाचे शिल्प आठवणीत राहण्यासारखे आहे. उपळ्या बुरूज आणि तेथील खंडोबाचे स्थान ही पर्यटकांसाठी आकर्षण स्थळे आहेत.


महाराष्ट्रातील अभयारण्य


पेंच : पेंच हे वाघांसाठी आरक्षित राष्ट्रीय उद्यान आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या दक्षिण भागात व नागपूर जिल्ह्याचा उत्तरेस हे वन आहे.

पेंच उद्यानाचे 4 विभाग पडतात. येथे विविध प्रकारची झाडे-झुडपे, गवत, वेली, रानगवत औषधी वनस्पती आहेत.


चिखलदरा : चिखलदरा पर्यटनस्थळ हे अमरावती जिल्ह्यात आहे. चिखलदरा 118 मीटर उंच टेकडीवर वसले असून, हे विदर्भातील सर्वांत उंच ठिकाण आहे. या भागात बिबट्या, वाघ, अस्वल, सांबर, डुक्कर आदी प्राणी आणि काही प्रमाणात रान कुत्रे पाहावयास मिळतात. चिखलदऱ्यापासून जवळच मेळघाट आहे. मेळघाटात व्याघ्रप्रकल्प राबवला जातो.


बोरडॅम : बोरडॅम हे महाराष्ट्राच्या पर्यटनस्थळातील महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. येथे अनेक प्रकारचे वन्यप्राणी पाहावयास मिळतात. बोर नदीवरील हा प्रकल्प वर्धा जिल्ह्यात आहे. एप्रिल-मे हा काळ पर्यटनाच्या दृष्टीने उपयुक्त आहे. तेथे जाण्यासाठी विमानाने पर्यटनस्थळापासून 80 किलोमीटर अंतरावर नागपूर, 35 किलोमीटर अंतरावर "वर्धा' स्थानक, तर 5 किलोमीटर अंतरावर "हिंगली' हे बस स्थानक आहे.


महाराष्ट्रातील उद्याने


ताडोबा राष्ट्रीय उद्यान : ताडोबा हे जुने आणि 625 किलोमीटर क्षेत्रावर विस्तारलेले उद्यान आहे. विस्ताराच्या दृष्टीने महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे उद्यान आहे. नागपूर शहरापासून 65 किलोमीटर अंतरावर हे उद्यान आहे.


नवेगाव राष्ट्रीय उद्यान : नागपूर जिल्ह्यातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान 1359 चौ.मी. भूभागावर विस्तारलेले आहे. येथे डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्य आणि हरणांचे उद्यान आहे. उद्यानामध्ये उंच मनोरा उभारलेला आहे. नागपूर विमानतळापासून 100 किलोमीटर अंतरावर हे उद्यान आहे.


संजय गांधी राष्ट्रीय उद्यान : या उद्यानास बोरिवली राष्ट्रीय उद्यान असेही म्हटले जाते. मुंबईतील बोरिवलीच्या डोंगराळ भागात हे उद्यान आहे. शहरास लागून 104 चौ.कि.मी. क्षेत्रावर हे उद्यान विस्तारलेले आहे. सांताक्रूझ विमानतळापासून 20 किलोमीटर अंतरावर हे उद्यान आहे.


महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे


महाबळेश्वर : साताराजिल्ह्यात महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. उंच शिखरे, खोल दऱ्या, हिरवागार निसर्ग, थंड उत्साहवर्धक असे हे ठिकाण होय. जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या दिवसांत येथील पर्यटन पूर्णतः बंद असते आणि वाहनांच्या वापरास बंदी असते.


माथेरान : माथेरान रायगड जिल्ह्यात वसलेले आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये 800 मीटर उंचीवर माथेरान वसलेल्या माथेरानचा शोध 1850 मध्ये मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टननी घेतला असे सांगितले जाते. नेरळहून मीटर गेजची छोटीशी ट्रेन येथे जाते.


अंबोली : सह्याद्रीच्या दक्षिण डोंगररांगांमध्ये 690 मीटर उंचीवर अंबोली हे ठिकाण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात असलेले हे अंबोली थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. येथून 10 किलोमीटर अंतरावर बॉक्साइटच्या खाणी आहेत.


भंडारदरा : भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण नगर जिल्ह्यात आहे. येथील ऑर्थर तलावावर विल्सन धरण आहे. येथून प्रवरा नदीचा उगम होतो. अगस्ती ऋषींच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन देवाने त्यांना आशीर्वाद दिला, तेव्हापासून ही नदी वाहत असल्याची आख्यायिका आहे.

विल्सन धरण, अम्ब्रेला धबधबा, ऑर्थर तलाव, कळसूबाई शिखर, अगस्ती ऋषींचा आश्रम ही ठिकाणे पर्यटकांची प्रमुख आकर्षणस्थळे आहेत. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर आहे. विल्सन धरण 1910 मध्ये बांधले गेले. याची उंची 150 मीटर आहे. येथील हवा थंड व आल्हाददायक आहे.


पर्यटनस्थळे


कोका अभयारण्य: नैसर्गिक सौंदर्यासोबत नैसर्गिक साधन संपत्तीने भंडारा हा समृद्ध जिल्हा आहे. भौगोलिक क्षेत्रापैकी 1/3 क्षेत्र जंगलाने व्यापलेले आहे. या जिल्ह्यात न्यू नागझिरा, उमरेड कऱ्हांडला आणि कोका अशी तीन अभयारण्ये नव्याने घोषित झाली आहेत.


अभयारण्याला कसे जाल : नागपूर-भंडारा हे 65 कि.मी. अंतर असून, भंडाऱ्याहून चंद्रपूरच्या प्रवेशद्वारापर्यंत 19 कि.मी. आहे. चंद्रपूर प्रवेशद्वारापासून 3 जिप्सींची व्यवस्था आहे. तसेच स्वत:चे वाहनही जंगल सफारीसाठी वापरता येते.


पेंच अभयारण्य, गोरेवाडा प्राणिसंग्रहालय : विदर्भात ताडोबा, पेंच, उमरेड करांडलासारखी अभायारण्ये आहेत. या अभयारण्यांना भेट देण्यासाठी देश-विदेशांतून हजारो पर्यटक नागपूरला येतात. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय लवकर झाले, तर विदर्भाच्या विकासात मोठी भर पडणार आहे. राजकीय इच्छाशक्ती दाखविली तर हा प्रकल्प 2019 पर्यंत पूर्ण होईल.


दाजीपूर अभयारण्य : कोल्हापूरपासून 80 कि.मी. अंतरावर असलेले दाजीपूर अभयारण्य, की जे जैव विविधतेचे हॉट स्पॉट किंवा रानगव्यांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. हे अभयारण्य रानगव्यांच्या भूमीबरोबरच विविध पक्षी आणि दुर्मिळ प्राण्यांच्या अधिवासाचे मूळ आहे. या अभयारण्यात 400 ते 500 गवे असून चित्ता, सांबर, मुंगूस, विविध सापांच्या जाती या ठिकाणी घर करून आहेत. जंगलामध्ये प्लॅस्टिक पिशव्या, खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी नसल्याने जंगलात जाण्यास मनाई आहे.


विसापूर किल्ला : हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जातो. पुण्याकडे जाताना लोणावळा सोडले, की लोहगड-विसापूर ही जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेत असते. मळवली रेल्वे स्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो म्हणजे लोहगड, मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो. पवनामावळात मोडणारा आणि लोणावळा (बोर) घाटाचे संरक्षण हा विसापूर किल्ला करतो. पूर्वीपासूनच दुर्लक्षित असलेला हा विसापूर किल्ला इतिहासात फार मोठे असे स्थान मिळवू शकला नाही.


मोराची चिंचोली : गर्द झाडीने वेढलेले आणि भरपूर मोर असलेले असे एक गाव आहे. या ठिकाणी एका दिवसाची छान सहल होऊ शकते. हे गाव पुणे-नगर रस्त्यावर शिरूर, शिक्रापूर जवळ आहे. अष्टविनायकांपैकी रांजणगाव गणपतीपासून साधारण हे जवळ आहे.


कास पठार : सौंदर्याची अनोखी खाण असणारे कास पुष्पपठार हे पश्चिम घाटासह वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणजेच जागतिक वारसा स्थळामध्ये युनेस्कोकडून नुकतेच समाविष्ट केले आहे. आज साताऱ्याच्या पर्यटनाची ओळख खऱ्या अर्थाने सातासमुद्रापार झाली आहे. सातारा शहरापासून अवघ्या 23 कि.मी. वर धरतीवरच्या स्वर्गरूपाने साक्षात कास पुष्प पठार वसले आहे. सध्या कास पठार हे विविध जातींच्या फुलांनी बहरत असून, पर्यटकांची रीघ कास पठाराच्या दिशेने सुरू झाली आहे. या पठाराची माहिती देणारे www.kas.ind.in हे संकेतस्थळ आहे.


चौल- अलिबाग : अलिबागमधील रेवदंडा-नागाव याप्रमाणेच चौल-रेवदंडा अशी जोडगोळी पर्यटनासाठी प्रसिद्ध ! चौल हे एक आतिशय प्राचीन बंदर आहे. या बंदराला अनेक नावे आहेत. चेमुल, तिमुल, सिमुल, सेमुल, सेमुल्ल, सिबोर, चिमोली, सैमुर, जयमूर, चेमुली, चिवील, शिऊल, चिवल, खौल, चावोल, चौले आणि चौल अशा अन्य नावांनीही या स्थळाचा उल्लेख आलेला आहे. दोन हजार वर्षांपूर्वीचे हे एक बंदर ! त्या काळी इजिप्त, ग्रीस, आखातातील काही  देश, चीनदेखील आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू होता.

दूरशेत रायगड पावसाळी पर्यटन

आंबा नदीच्या काठावर आणि सह्याद्री पर्वताच्या अंतर्गत असलेले रायगड जिल्ह्यातील दूरशेत (ता. खालापूर) हे गाव. हे गाव मोठमोठ्या डोंगर व दऱ्यांमुळे पर्यटनस्थळ म्हणूनही ओळखले जाते. तसेच महाराष्ट्रातील अनेक ट्रेकिंग ठिकाणांमधील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीपासून दूर जाऊन निसर्गाला जवळून पाहण्याचे हे एक सुंदर ठिकाण आहे. दूरशेत हे गाव पाली आणि महाडच्या दोन गणेश मंदिरांदरम्यान आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्तलाब खान यांच्यामध्ये उंबरखिंडसाठी लढाई झाली होती. त्यामुळे हे एक ऐतिहासिक स्थळ म्हणूनही ओळखले जाते.


नाना फडणवीस वाडा, वाई : नाना फडणवीसांचा 245 वर्षांचा मेणवलीचा वाडा भारावून टाकणारा आहे. वाईपासूनच 10 कि.मी. अंतरावर मेणवली हे ठिकाण आहे. या ठिकाणचा घाट आणि नाना फडणवीस यांचा वाडा पेशवेकालीन स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. आजच्या काळातही स्थापत्य कलेला प्रेरणा देणारा हा वाडा असल्याचे जाणवते.


ताम्हणी घाट : सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये वसलेल्या पश्चिम घाटामध्ये असलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजे ताम्हिणी घाट. मुळशी धरणाचा नयनरम्य देखावाही बघायला मिळतो आणि या छोट्याशा वर्षासहलीला नदीतील साहसी खेळांची (रिव्हर राफ्टिंग) जोडही देता येते. ताम्हिणी घाटात जाण्यासाठी मुंबई- गोवा महामार्गाने कोलाडपर्यंत जावे लागते. कुंडलिका नदीवरील पूल ओलांडला, की डाव्या बाजूला मुळशी धरणावरून पुढे पुण्याला जाणारा रस्ता लागतो. कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागात हा ताम्हिणी घाट आहे.


प्रबळगड : महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या किल्ल्यांवर ट्रेकिंगला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रामध्ये चढण्याच्या दृष्टीने असे अनेक किल्ले धोकादायक आहेत. यातलाच एक किल्ला म्हणजे प्रबळगड. पनवेलजवळ असलेला हा किल्ला तब्बल 2300 फूट उंच आहे. प्रबळगड हा भारतातला सगळ्यात धोकादायक किल्ला मानला जातो. या किल्ल्यावर जायचा रस्ता प्रचंड धोकादायक आहे.


ट्रेकिंग स्थळे

माथेरानच्या कुशीत वसलेले भिवपुरी, दहीसरजवळील चिंचोटी, मुंबईपासून 2 तासांच्या अंतरावर असणारे तुंगारेश्वर, सह्याद्रीच्या पर्वतरांगात विल्सनडॅमपासून तयार झालेला इगतपुरीजवळील रांधा फॉल, खारघर परिसरातील पांडवकडा, खोपोली येथील झेनिथ धबधबा, मुंबई- पुणे महामार्गावरील पळसदरी, पनवेल परिसरातील गाढेश्वर धबधबा, फणसाड धबधबा, मुरुड-जंजिरा येथील सवतकडा, नवी मुंबई घणसोली गावाजवळील गवळीदेव धबधबा, बदलापूर जवळील कोंडेश्वर धबधबा, वांगणीजवळील भगीरथ धबधबा, नेरळजवळील टपालवाडी, भिवपुरीजवळील आषाणे धबधबा, माळशेज घाटाजवळील भिदबीचा धबधबा, निवळी घाटाजवळील निवळी धबधबा, कर्जतजवळील मोहिली धबधबा, मुरबाडजवळील पळुया धबधबा या ठिकाणी तुम्ही ट्रेकसुद्धा करू शकता. ठाणे जिल्ह्यातील जव्हार डोंगरदऱ्यांमधील दाभोसा धबधबा, नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात असणारे कावनई. गडगडा, त्रिंगलवाडी, हरिहर, बसगड, अंजनेरी इत्यादींसारख्या बऱ्याच किल्ल्यांची सैर पावसात करता येते. धुळे, नंदुरबारजवळील तोरणमाळ हे ठिकाण पावसाळ्यात पाहण्यासारखे आहे. पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वाटेवर वरंधाघाट लागतो. वरंधाघाटालगतच कावळ्या या किल्ल्यावर जाता येते. डोंगरातून वाहणारे छोटे-छोटे झरे, धबधबे, बाजूला खोल दरी आणि त्या दरीत दिसणारे छोटेसे गाव आणि त्या गावालगत वाहणारी नदी, असे वेड लावणारे सौंदर्य वरंधघाटात आहे. वरंधघाटात उतरल्यावर शिवथरघळ येथील गुहा आणि गुहेबाहेर पडणारा पाऊस आणि धबधबा पाहण्यासारखा आहे.


माळशेज घाट :

अवघ्या महाराष्ट्राला आठवण होते ती माळशेज घाटाची. आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळाळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळुवार सरकरणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मध्येच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचे असेल, तर अहमदनगर-कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवे.


कणेरी मठ, कोल्हापूर : 

कोल्हापूरपासून दहा-बारा कि.मी.वर असलेल कणेरीमठ या ठिकाणाची सहल ग्रामीण जीवनशैलीची सुंदर ओळख करून देते. कणेरीमठ येथील सिद्धगिरी म्युझियमप्रेक्षणीय आहे. ही सहल मोकळी हवा, हिरवागार परिसर आणि शहरातील दैनंदिन जीवनापेक्षा खूप वेगळा अनुभव देणारी अशीच ठरेल. सिद्धगिरी म्युझियम हे ठिकाण पुणे-बंगळूर महामार्गावर आहे.


टिपेश्वर वाघोबा : 

यवतमाळ जिल्ह्याच्या मुख्यालयापासून अवघे ------ किलोमीटर अंतर असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात वाघांचे मनसोक्त दर्शन गेल्या काही दिवसांपासून होत आहे. दुर्मिळ प्राणी समजल्या जाणाऱ्या आणि सर्वांचे आकर्षण असलेल्या वाघांचे सहज दर्शन होऊ लागल्याने अभयारण्यात पर्यटकांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे.

टिपेश्वर येथे वाघोबाचे दर्शन घेण्यासाठी जावयाचे असल्यास पांढरकवडा येथून राष्ट्रीय महामार्ग 7 अदिलाबादकडे जाताना डाव्या बाजूस सुन्ना गावाजवळून अभयारण्यात प्रवेश करता येतो.


कुडा लेणी : 

मुरुड-जंजिऱ्यापासून जवळच असणाऱ्या कुडा येथील लेणी आसपासच्या निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांना आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यशैलीमुळे प्राचीन इतिहासाच्या अभ्यासकांना आकर्षित करतात. मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईपासून माणगावच्या आग्नेयला कुडा हे रायगड जिल्ह्यातील एक शांत खेडेगाव आहे.


मालवण देवबाग : 

देवबागच्या समुद्र किनाऱ्यावरील "सुनामी आयलंड' बघण्याची उत्सुकता होती..

"सुनामी आयलंड' हा एक निसर्गाचा चमत्कार आहे. या आयलंडला देवबागच्या किनाऱ्यावरून बोटीने जावे लागते. या सोयी उत्तम व किफायतशीरही आहेत. हा आयलंड तसा फार पूर्वीपासून या ठिकाणी आहे.


गोनी किल्ला : 

जांभीवलीहून या किल्ल्याला जावे लागते. हा प्रवास लोणावळ्याहून सुरू होतो. बरोबर मार्गदर्शक हवा. लोणावळा-भीमाशंकर ही वाट उजव्या हाताला जंगलातून ही वाट जाते. उजवीकडे प्रचंड कातळ आणि डावीकडे खोल दरी. अरुंद वाट पार करताना कमालीच एकाग्रतेची आवश्कता आहे. येथे बहिरीदेवाची, श्रीगणेशाची आणि भवानीदेवीची मूर्ती आहे.

समुद्रकिनारा


श्रीवर्धन, हरिहरेश्वर :

 रायगड जिल्ह्यातील ही पर्यटनस्थळे आहेत. येथील सुखद हवेची झुळूक, मऊ वाळू आणि समुद्राचे पाणी पर्यटकांना आकर्षून घेते. समुद्री अन्न, मासे, झिंगे, बोंबील यांची दुर्मिळता जाणवत नाही. श्रीवर्धन येथे पेशव्यांचे स्मारक आहे. पेशवे मूळचे श्रीवर्धन येथील होते. हरिहरेश्वर शहर हे शांत आणि आकर्षक म्हणून प्रसिद्ध आहे. येथील पुळण व हरिहरेश्वरचे मंदिर प्रसिद्ध आहे.


वेंगुर्ले-मालवण :

 लांबवर विस्तारलेली पांढरी शुभ्र वाळू, चिकू, नारळ, आंबा अशा फळझाडांनी सजलेल्या टेकड्या यांनी वेंगुर्ले पर्यटनस्थळ म्हणून पर्यटकांची मान्यता मिळाली आहे. ही दोन्ही पर्यटनस्थळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. वेंगुर्ल्याच्या पूर्व-पश्चिम आणि उत्तरेस खडकाळ प्रदेश आहे, तर माडांच्या झाडांमध्ये लपलेले मालवण शहरही खडकाळ क्षेत्रांनी वेढलेले आहे. मालवणचे खाद्यपदार्थही लोकप्रिय आहेत.


गणपतीपुळे : 

रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेले गणपतीपुळे   या ठिकाणास नेत्रदीपक समुद्रकिनारा लाभला आहे. येथील स्वयंभू गणेशाचे मंदिर कित्येकांचे श्रद्धास्थान आहे. स्वच्छ समुद्र किनारा, स्वच्छ पाणी, महत्त्वपूर्ण वनस्पती, माड आणि पाणथळ झाडे यांनी गणपतीपुळे समृद्ध बनले आहे. येथून 25 किलोमीटर अंतरावर रत्नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण आहे.


डहाणू- बोर्डी : 

ठाणे जिल्ह्यातील डहाणू हे समुद्रकिनाऱ्याला लागूनच विस्तारलेले शहर आहे. डहाणू ते बोर्डी असा 17 किलोमीटरचा किनारा विस्तारला आहे. डहाणू फळझाडांच्या रांगांनी सजलेले आहे. चिकूसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. पर्शियनांचे धर्मस्थळ उद्वाडा हे येथून जवळच आहे.

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना (२ मार्क -Combine exam )

🔴कोकण किनारपट्टी

निर्मिती

विस्तार- लांबी,रुंदी(सर्वाधिक ,सर्वात कमी)

क्षेत्रफळ -३०३९४

समुद्र किनारा लाभलेले जिल्हे(उतरता क्रम)

दंतुर,रिया प्रकार

खलाटी, वलाटी


🟠सह्याद्री पर्वत

प्रकार

विस्तार

लांबी -२७.५% in MH

उंची - सरासरी ९००

घाट - थळ,चंदनपुरी,माळशेज,बोर,वरंधा,कुंभार्ली,हनुमंत, फोंडा,आंबोली

शिखरे - (उतरता क्रम)


🟡महाराष्ट्र पठार

निर्मिती

डेक्कन ट्रॅप

विस्तार

लांबी - पूर्व - पश्चिम 

          दक्षिण - उतर (७००km)(प्रश्न येणे बाकी)

क्षेत्रफळ- 


🟢पठारावरील डोंगर रांग

१.सातपुडा

 .तोरणमाळ डोंगर

गाविलगड डोंगर


२.सातमाळा अजिंठा


३.हरिश्चंद्र बालाघाट


४.शंभू महादेव


🟣महत्वाचे डोंगर

जिल्हा ➡️➡️ पर्वत डोंगर टेकड्या डोंगररांगा


🎇मबई मुंबई उपनगर - ⛰⛰पाली, अंटोप हिल, शिवडी,खंबाला, मलबार हिल.


🎇 रायगड - ⛰⛰रत्नागिरी,सिंधुदुर्ग,सह्यण्द्री,


🎇 धळे - ⛰⛰धानोरा, व गाळण्याचे डोंगर.


🎇नाशिक - ⛰⛰सह्यान्द्री, गाळणा, साल्हेर, मुल्हेर,वणी,चांदवड,सातमाळा,


🎇 पणे -⛰⛰ सह्यान्द्री,हरिश्चंद्र,शिंगी,तसुबाई,पुरंदर,ताम्हिनी,अंबाला,


🎇 सांगली -⛰⛰ आष्टा,होणाई,शुकाचार्य,कामलभैरव, बेलगबाद, आडवा,मुचींडी,दंडोबा.


🎇 सोलापूर -⛰⛰ महादेव,बालाघाट, शुकाचार्य,


🎇 जालना - ⛰⛰अजिंठ्याची रांग,जाबुवंत,


🎇 हिंगोली - ⛰⛰अजिंठ्याची रांग, हिंगोलीचे पठार.


🎇 लातूर - ⛰⛰बालाघाटचे डोंगर,


🎇 बीड -  ⛰⛰बालाघाटचे डोंगर


🎇 अकोला - ⛰⛰गाविलगड,अजिंठाचे


🎇 अमरावती -⛰⛰ सातपुडा, गाविलगडच्या रांगा,पोहऱ्याचे व चिरोडीचे डोंगर.


🎇 वर्धा - ⛰⛰रावनदेव, गरमासुर, मालेगाव, नांदगाव, ब्राह्मणगाव टेकड्या.


🎇 भडारा - ⛰⛰अबागडचे डोंगर, गायखुरी व भिमसेन टेकड्या,


🎇 चद्रपूर -⛰⛰ परजागड व चांदूरगडचे, चिमूर व मुल टेकड्या.


🎇 ठाणे -  ⛰⛰सह्यान्द्री


🎇 जळगाव -⛰⛰ सातपुडा, सातमाळा, अजिंठा, शिरसोली, हस्तीचे डोंगर.


🎇 नदुरबार -⛰⛰ सातपुडा व तोरणमाळचे डोंगर.


🎇 अहमदनगर -⛰⛰ सह्यान्द्री,कळसुबाई,अदुला,बाळेश्वर,हरिश्चंद्र डोंगर,


🎇 सातारा -⛰⛰ सह्यान्द्री,परळी,बनमौली,महादेव, यावतेश्वेर, मेंढोशी, आगाशिव, औध,


🎇 कोल्हापूर - ⛰⛰सह्यान्द्री, पन्हाळा, उत्त्तर व दक्षिण, दुधगंगा, चिकोडी रांग.


🎇 औरंगाबाद - ⛰⛰अजिंठा, सातमाळा, सुरपलायान,


🎇 परभणी - ⛰⛰उत्तरेस अजिंठ्याचे डोंगर, दक्षिणेस बालाघाट रांग.


🎇 नांदेड - ⛰⛰सातमाळा, निर्मल,मुदखेड,बलाघाटचे डोंगर,


🎇 उस्मानाबद -⛰⛰ बालाघाट, तुळजापूर, व नळदुर्ग डोंगर


🎇 यवतमाळ - ⛰⛰अजिंठ्याचे डोंगर व पुसदच्या टेकड्या.


🎇 बलढाणा - ⛰⛰अजिंठ्यचे डोंगर.


🎇वाशीम - ⛰⛰अजिंठ्याचे डोंगर


🎇 नागपूर - ⛰⛰सतपुड्याचे डोंगर, गरमसूर,महादागड, पिल्कापर टेकड्या,


🎇 गोदिया -⛰⛰ नवेगाव, प्रतापगड, चिंचगड, व दरकेसाचे डोंगर.


🎇 गडचिरोली -⛰⛰ चरोळी,टिपागड,सिर्कोडा,सुरजागड,भामरागड,चिकियाला डोंगर.


सातपुडा पर्वतरांगा



पूर्व पश्चिम दिशेने पसरलेल्या सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे अलग झालेले आहे. महाराष्ट्राच्या उत्तर सिमेजवळ सातपुडा रांग पसरलेली आहे. महाराष्ट्रात सातपुड्याला नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ डोंगर म्हणतात. सातपुडा पर्वतरांगांचा काही भाग अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात आढळतो त्यास गाविलगड टेकड्या असे म्हणतात. बैराट शिखराची उंची १,१७७ मीटर तर चिखलदराची उंची १.११५ मीटर आहे.


 • सातपुडा पर्वतात नंदुरबार जिल्ह्याच्या पश्चिम भागात तोरणमाळ हे एक लहान आकाराचे पठार असून त्याची उंची १,०३६ मी आहे तर त्या भागातील सर्वात जास्त उंचीचे शिखर अस्तंभा डोंगर असून त्याची उंची १,३२५ मीटर आहे.

 

• अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात जीनगड डोंगर व दक्षिण भागात गाविलगड डोंगर असून त्यात बैराट (११७७ मी) हे उंच शिखर आहे. जीनगड डोंगरात मेळघाट हा दाट जंगलांचा विभाग आहे. या डोंगराच्या उत्तर सिमेकडून तापी नदी वाहते जळगांव जिल्ह्यांत पाल हे थंड हवेचे ठिकाण आहे तसेच जिल्ह्याच्या पूर्व भागात हास्ती चे डोंगर असून त्यातील किसेरसेंचा (५३५ मी) हा उंच भाग आहे.


 • गाविलगड पर्वतात अमरावती जिल्ह्यात चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणालाच विदर्भाचे महाबळेश्वर असेही म्हणतात. या विभागात तोरणमाळचे डोंगर (१९६० मी) व अस्तंभा डोंगर (१३२५ मी) हे प्रमुख डोंगर आहेत.


प्रश्न मंजुषा

(1)1857 च्या उठावात पहिला हुतात्मा कोण झाला?

तात्या टोपे

मंगल पांडे✅✅✅

नानासाहेब पेशवे

बहादुरशहा जफर



2)चंपारण्य सत्याग्रह 1917 मध्ये करण्यात आला. चंपारण्य हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

उत्तरांखंड 

उत्तर प्रदेश

पंजाब

बिहार✅✅✅ 




3)जगात सर्वात जास्त बोलणाऱ्या एकूण भाषांपैकी हिंदी भाषेचा कितवा क्रमांक लागतो?

पाचवा

सहावा✅✅✅

सातवा

आठवा




4)नव्या शैक्षणिक धोरणानुसार 10+2 ऐवजी कोणती पद्धत राबवली जाणार आहे?

5+3+3+4✅✅✅

5+10+12

5+8+4

5+4+3+2




5)कोणते पोलीस ठाणे देशातील सर्वोत्तत्कृष्ठ ठरले आहे?

नादौन पोलीस ठाणे✅✅✅

नानखारी पोलीस ठाणे

रामपूर पोलीस ठाणे

नेरवा पोलीस ठाणे


१) महाराष्ट्रातील क्षेऋफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा ?

१) पुणे

२)नागपूर

३)मुंबई

४)अहमदनगर ✅




२) २०११ च्या घनातेनुसार महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा हा आहे ?


१)नाशिक

२)पुणे

३)मुंबई उपनगर ✅

४)मुंबई शहर 




३) हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून विभाजन होऊन झाली आहे..?

१)ठाणे जिल्हा

२)पुणे जिल्हा

३) वाशिम जिल्हा

४)परभणी जिल्हा ✅



४) नांदेड जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत ?

१)१६ ✅

२)०९

३)१३

४)१० 




५) अमरावती जिल्हास कोणत्या राज्याची सीमा लागून आहे.?

१) आंध्र प्रदेश

२)तेलंगणा

३)मध्य प्रदेश ✅

४)कर्नाटक 




६) अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला स्थित आहे ?

१) पूर्व - पश्चिम

२) पश्चिम - उत्तर

३)उत्तर - पूर्व ✅

४) दक्षिण - पूर्व 




७ ) बुलढाणा जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय ?

१)भिलेवडा

२) भिल्लेश्र्वर

३) भिवटेकडी

४) भिलठाण ✅




८ ) लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) अमरावती

२) लात्तुर

३) सोलापूर

४)बुलढाणा ✅




९)  सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) चंद्रपूर

२) नागपूर

३) भंडारा 

४) यवतमाळ ✅



१० ) कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) सांगली

२)सातारा ✅

३)धुळे

४) औरंगाबाद



११)  धुळे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

१)४ ✅

२)१०

३)१४

४)१६



१२)  तोरणमाळ डोंगर  कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) जळगाव जिल्हा

२) बुलढाणा जिल्हा

३)नाशिक जिल्हा

४) नंदुरबार जिल्हा ✅




१३)  खान्देशी जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रख्यात आहे ?

१) वाशिम जिल्हा

२) धुळे जिल्हा

३) जळगांव जिल्हा ✅

४)हिंगोली जिल्हा




१४)  गौताळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) जालना जिल्हा

२)परभणी जिल्हा

३) सातारा जिल्हा

४) औरंगाबाद जिल्हा ✅

मराठवाडा मुक्ती संग्राम

📌आधी जाणून घेऊ मराठवाड्याबद्दल थोडंसं 


◾️मराठवाडा हा महाराष्ट्रातील वर्तमान प्रशासकिय विभाग असून तो सर्वात मोठा आहे.


 मराठवाड्याचे क्षेत्रफळ हे ६४५९० चौ. किमी असून यामध्ये पुढील ८ जिल्हे आणि त्यातील – ७८ तालूके व ६३ बाजारपेठेची शहरं आहेत.


1) औरंगाबाद

2) नांदेड

3) परभणी

4) बीड

5) जालना

6) लातूर

7) उस्मानाबाद व

8) हिंगोली


◾️ दक्षिणगंगा गोदावरी ही मराठवाड्याच्या ५ जिल्ह्यातून वाहते. 


◾️जायकवाडी हा सर्वात मोठा महाराष्ट्रातील सिंचनप्रकल्प मराठवाड्यात असून मोठा ऐतिहासिक व धार्मिक वारसा हा मराठवाड्यास लाभलेला आहे.


◾️यामध्ये वेरूळ, अजिंठा जगप्रसिद्ध लेणी, देवगिरी, कंधार किल्ले, हेमाडपंथी मंदिरे, मकबरा, ५२ दरवाजे, पानचक्की, ३ जोतिर्लिंग मंदिरे, संतांची भूमी पैठण, तूळजाभवानी मंदिर इत्यादी अप्रतिम संस्कृतीचे दर्शन घडवतात.


📌मक्ती संग्राम आणि पार्श्वभूमी –


◾️पर्वी मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानात होता.


◾️हदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान  निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते.


◾️निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.


◾️हदराबाद संस्थानची त्यावेळी तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा काही भाग येत होता.


◾️मक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर खूप अत्याचार सुरु केले.


◾️दसज्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. याचं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.


◾️ मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले.


◾️मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, दगडाबाई शेळके, विठ्ठलराव काटकर, हरिश्चंद्गजी जाधव, जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच सूर्यभान पवार आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्य संग्राम उत्स्फूर्तपणे लढला गेला.


◾️या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, गोविंदराव पानसरे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा नं बाळगता काम केले.


◾️या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल हे खूप मोठे आहे.


◾️निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून १३ सप्टेंबर १९४८ रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाली – ती सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामूळे. ते भारताचे तत्कालीन गृहमंत्री होते. खूप धाडसी परंतू योग्य अशा निर्णयामूळ॓ जनतेस न्याय मिळाला.


◾️मख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे ४ वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर २ तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद  काबिज केले.


◾️१५ सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते.


◾️हदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी १७ सप्टेंबर १९४८ रोजी शरणांगती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला.


📌हदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला…!


हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला…!🇮🇳


हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला…!


◾️१ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन प्रशासकिय विभाग म्हणून ओळखला जाउ लागला.


◾️१७ सप्टेंबर १९४८ रोजी ‘हैदराबाद पोलीस ऍक्शन’ झाली व हैदराबाद संस्थान देशाचे अविभाज्य अंग झाले. इतकी वर्षे होऊनही मराठवाड्याच्या जनतेच्या मनात अजूनपर्यंत त्याच्या स्मृती जिवंत आहेत.

महाराष्ट्र पोलिस भरती वाचा : महत्त्वाचे 25 प्रश्न उत्तरे


१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?

उत्तर -- सावित्रीबाई फुले 

---------------------------------------------------

२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?

उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)

---------------------------------------------------

३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?

उत्तर -- आनंदीबाई जोशी 

---------------------------------------------------

४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?

उत्तर -- लता मंगेशकर 

--------------------------------------------------

५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी 

---------------------------------------------------

६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?

उत्तर -- प्रतिभाताई पाटील 

--------------------------------------------------

७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?

उत्तर -- कल्पना चावला

--------------------------------------------------

८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी 

--------------------------------------------------

९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर -- बचेंद्री पाल 

--------------------------------------------------

१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?

उत्तर -- मीरा कुमार 

--------------------------------------------------

११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?

उत्तर -- किरण बेदी 

-------------------------------------------------

१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?

उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी 

--------------------------------------------------

१३) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?

उत्तर -- प्रेमा माथूर

--------------------------------------------------

१४) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?

उत्तर -- पी. टी. उषा 

--------------------------------------------------

१५) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?

उत्तर -- नेमबाजी 

--------------------------------------------------

१६) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?

उत्तर -- सुश्मिता सेन 

--------------------------------------------------

१७)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?

उत्तर -- मदर तेरेसा

--------------------------------------------------

१८) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- बॅडमिंटन

-------------------------------------------------

१९) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?

उत्तर -- लाॅन टेनिस 

-------------------------------------------------

२०) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर -- बाॅक्सिंग 

---------------------------------------------------


२१) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- तिरंदाजी 

---------------------------------------------------

२२) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- जलतरण

---------------------------------------------------

२३) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- बुध्दिबळ 

---------------------------------------------------

२४) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- वेट लिफ्टिंग 

---------------------------------------------------

२५) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?

उत्तर -- अनुताई


महाराष्ट्राचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे?

उत्तर--नाशिक💐✅


 महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वताची रांग आहे? 

उत्तर----सातपुडा💐✅


महाराष्ट्रात चुंनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत?

उत्तर--यवतमाळ💐✅


 महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांबीचा महामार्ग कोणता ? 

उत्तर---national highway 6 💐✅


स्वातंत्र्य वीर सावरकरांचे जन्मस्थान कोणते? 

उत्तर- भगुर (जी नाशिक )💐✅

 

महाराष्ट्रातील शिखांची दक्षिण काशी कोणती? 

उत्तर--नांदेड💐✅

 

छत्रपती शाहू महाराजांनी गुळाची बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यात स्थापन केली? 

उत्तर---कोल्हापूर येथे 1895 ला💐✅


महाराष्ट्रातील कापसाची प्रसिद्ध बाजारपेठ कोठे आहे? 

उत्तर--अमरावती💐✅

 

पुणे जिल्ह्यातील कोणते शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे? 

उत्तर--जुन्नर💐✅


पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? 

उत्तर---भीमा💐✅


 महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखरकारखाना कोठे स्थापन करण्यात आला होता?

उत्तर---प्रवरानगर(जी अहमदनगर )💐✅


 महाराष्ट्रातील जिल्हयांची संख्या ---

>>>36💐✅


महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात ?

उत्तर ---- गोदावरी💐✅


महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? 

उत्तर---गोदावरी💐✅


महाराष्ट्रातील सर्वाधिक आवर्षंनग्रस्त जिल्हा कोणता?

उत्तर---अहमदनगर💐✅


संत गाडगेबाबाचे नाव दिलेले विद्यापीठ कोठे आहे ?

उत्तर---अमरावती💐✅

 

भारतातील पहिले पक्षी अभयअरण्य कोठे स्थापन करण्यात आले? उत्तर

--कर्नाळा जिल्हा रायगड💐✅

 

यशवंतरावांच्या समाधी स्थळास कोणते नाव देण्यात आले?

उत्तर---प्रीतिसंगम💐✅

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कोठे आहे? 

उत्तर---मोझरी (जी. अमरावती.)💐✅

 

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या प्रकल्पास म्हणतात? 

उत्तर--कोयना प्रकल्प💐✅


 महाराष्ट्रातील मातीचे धरण ? 

उत्तर--गांगपूर जिल्हा नाशिक💐✅


 महाराष्ट्रातील कोणत्या शहरास बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते?  

उत्तर--औरंगाबाद💐✅


 लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? 

उत्तर---बुलढाणा💐✅

महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प

⬜️ महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प

 

🅾️खोपोली - रायगड              

🅾️भिरा अवजल प्रवाह - रायगड                              

🅾️कोयना - सातारा                

🅾️तिल्लारी - कोल्हापूर          

🅾️पच - नागपूर                      

🅾️जायकवाडी - औरंगाबाद


🟧 महाराष्ट्रातील अणुविधुत प्रकल्प                 

🅾️तारापुर - ठाणे                    

🅾️जतापुर - रत्नागिरी              

🅾️उमरेड - नागपूर(नियोजित)


🟨 महाराष्ट्रातील पवन विधुत प्रकल्प                     

🅾️जमसांडे - सिंधुदुर्ग             

🅾️चाळकेवाडी - सातारा           

🅾️ठोसेघर - सातारा               

🅾️वनकुसवडे - सातारा           

🅾️बरह्मनवेल - धुळे                 

🅾️शाहजापूर - अहमदनगर

बातम्यामधील पहिल्या महिला


➢ अमेरिकन स्पेस एजन्सी, NASA ने आर्टेमिस II मोहिमेसाठी पहिली महिला अंतराळवीर क्रिस्टीना कोच यांची निवड केली आहे.


➢ सुरेखा यादव, आशियातील पहिली महिला लोको पायलट जी आता महाराष्ट्रातील सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (CSMT) पर्यंत वंदे भारत चालवते.


➢ शालिजा धामी भारतीय हवाई दल (IAF) मध्ये फायटर युनिटचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी बनली.


➢ कर्नल गीता राणा या क्षेत्रीय परिषदेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या.


➢ कॅप्टन शिवा चौहान या सियाचीन हिमनदीवरील कुमार पोस्टमधील सर्वोच्च युद्धभूमीवर कार्यरत असलेल्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.


➢ बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) मध्ये परदेशी असाइनमेंटवर नियुक्त होणारी पहिली महिला अधिकारी - कॅप्टन सुरभी जाखमोला.


➢ रायबरेलीच्या हॉकी स्टेडियमचे नाव हॉकी स्टार राणी रामपाल यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे, ही कामगिरी करणारी भारतातील पहिली महिला खेळाडू.


➢ हेकानी जाखलू नागालँड विधानसभेच्या पहिल्या महिला आमदार बनल्या.


➢ भारतीय वंशाच्या मनप्रीत मोनिका सिंग यांनी यूएसएची पहिली महिला शीख न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.


➢ संती कुमारी यांची तेलंगणाच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी नियुक्ती.


➢ सौदी अरेबियाची रायना बर्नावी ही पहिली महिला अंतराळवीर या वर्षी अंतराळात जाणार आहे.


➢ दिना बोलुअर्टे पेरूच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या.


➢ पीटी उषा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा झाल्या.


➢ लान्स नाईक मंजू या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला स्कायडायव्ह ठरल्या.


➢ जॉर्जिया मेलोनी इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनण्याच्या तयारीत आहे.


➢ नल्लाथंबी कलैसेल्वी या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR) पहिल्या महिला महासंचालक बनल्या आहेत.


➢ द्रौपदी मुर्मू भारताच्या पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या.


➢ प्रियांका मोहिते 8,000 मीटरपेक्षा जास्त उंचीची पाच शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली.


➢ गीता गोपीनाथ या IMF च्या 'वॉल ऑफ फॉर्मर चीफ इकॉनॉमिस्ट' वर नामांकित झालेल्या पहिल्या महिला ठरल्या.


➢ लिसा स्थळेकर या फेडरेशन ऑफ इंटरनॅशनलच्या पहिल्या महिला अध्यक्षा झाल्या .

पोलीस भरती प्रश्नसंच

(०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

उत्तर- मुख्यमंत्री.


(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?

उत्तर- अरबी समुद्र.


(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?

उत्तर- भूतान.


(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- रायगड.


(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?

उत्तर- महाराष्ट्र.


(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.


(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर- स्वामी विवेकानंद.


(०८)  जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १० जानेवारी.


(०९)  रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- हाॅकी.


(१०)  भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?

उत्तर- इंदीरा गांधी.

 

(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.


(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?

उत्तर- सिक्किम.


(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर- २० फेब्रुवारी.


(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- तिरंदाजी.


(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?

उत्तर- सरोजनी नायडू.


(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- जयंत नारळीकर.


(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- सातारा.


(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २३ मार्च.


(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- टेनिस.


(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?

उत्तर- मीरा कुमार.


(२१)  उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण गायकवाड.


(२२)  'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?

उत्तर- रविंद्रनाथ टागोर.


(२३)  जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- ७ एप्रिल.


(२४)  ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- कुस्ती.


(२५)  भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?

उत्तर- आरती शहा.


(२६)  उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण माने.


(२७)  भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?

उत्तर- प्रतिभा पाटील.


(२८)  जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १७ मे.


(२९)  दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- क्रिकेट.


(३०)  भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?

उत्तर- विजयालक्ष्मी.


(३१)  मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- अच्च्युत गोडबोले.


(३२)  कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?

उत्तर- मका.


(३३)  जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १४ जून.


(३४)  अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- गोल्फ.


(३५)  भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?

उत्तर- कल्पना चावला.


(३६)  समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- साधना आमटे.


(३७)  भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?

उत्तर- कोलकाता.


(३८)  जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २९ जुलै.


(३९)  मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- नेमबाजी.


(४०)  दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?

उत्तर- रझिया सुलताना.


(४१)  नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- गोदावरी.


(४२)  शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बाॅक्सिंग.


(४३)  भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?

उत्तर- गंगा.


(४४)  राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.


(४५)  जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १ आॅगस्ट.


(४६)  सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- कृष्णा.


(४७)  चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बॅडमिंटन.


(४८)  भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?

उत्तर- अजिंठा.


(४९)  काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर- गुजरात.


(५०)  जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १६ सप्टेंबर



 (०१)  राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो ?

उत्तर- २४ डिसेंबर.


(०२)  सायकलचा शोध कोणी लावला ?

उत्तर- मॅकमिलन.


(०३)  'कुरल' या तामिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर कोणी केले ?

उत्तर- पांडूरंग सदाशिव साने.


(०४)  भारताने आॅलिम्पिक स्पर्धेत प्रथम कधी भाग घेतला ?

उत्तर- १९२० मध्ये.


(०५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतीगृह कोठे सुरू केले ?

उत्तर- सोलापूर.


(०६)  भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?

उत्तर- वड.


(०७)  विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?

उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.


(०८)  कोणती आंतरराष्ट्रीय टेनिस खेळ स्पर्धा हिरव्या गवताच्या मैदानात खेळली जाते ?

उत्तर- विंबलडन.


(०९)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा केला ?

उत्तर- २० मार्च १९२७.


(१०) साखरेचे रासायनिक रेणूसूत्र काय आहे ?

उत्तर- C₁₂H₂₂O₁₁ 


(११)  भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास म्हणतात ?

उत्तर- दादासाहेब फाळके.


(१२)  डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- रूडाल्फ डिझेल.


(१३)  'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?

उत्तर- अनंत भवानीबाबा घोलप/ अनंत फंदी


(१४)  व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?

उत्तर- २७० ते २८० ग्रॅम.


(१५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?

उत्तर- ४ सप्टेंबर १९२७.


(१६)  महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती ?

उत्तर- पुणे.


(१७)  वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- जेम्स वॅट.


(१८)  'एकच प्याला' या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहे ?

उत्तर- राम गणेश गडकरी.


(१९)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितिवर निवड केव्हा झाली ?

उत्तर- ८ जुलै १९३०.


(२०) ग्लुकोजचे रेणुसूत्र काय आहे ?

उत्तर- C₆H₁₂O₆ 


(२१)  राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतिक आहे ?

उत्तर- त्याग आणि शौर्य.


(२२)  टेलिफोनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- अलेक्झांडर ग्रॅहम बेल.


(२३)  ना. धों.महानोर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ?

उत्तर- रानकवी.


(२४)  अर्जून पुरस्कार कधी दिला जातो ?

उत्तर- २९ आॅगस्ट.


(२५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमामाई यांचे महापरिनिर्वाण केव्हा झाले ?

उत्तर- २७ मे १९३५.


(२६)  न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?

उत्तर- किवी.


(२७)  ग्रामोफोनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.


(२८)  मुकुंदराजाचा हा मराठीतील पहिला ग्रंथ,असे एक मत आहे ?

उत्तर- विवेकसिंधू.


(२९)  'सनी डेज' हे पुस्तक कोणाचे आहे ?

उत्तर- सुनील गावस्कर.


(३०) डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांनी आचार्य अत्रे यांच्या कोणत्या चित्रपटाचे उद्घाटन केले ?

उत्तर- महात्मा फुले.


(३१)  अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे शासकीय निवासस्थान कोणते आहे ?

उत्तर- व्हाइट हाऊस.


(३२)  अंधासाठीच्या लिपीचा शोध कोणी लावला ?

उत्तर- ब्रेल लुईस.


(३३)  ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?*

उत्तर- अरूणा ढेरे.


(३४)  'गोल्डन गर्ल' हे पुस्तक कोणाचे आहे ?

उत्तर- पी. टी. उषा.


(३५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे गोखले अर्थशास्त्र संस्थेत कोणत्या विषयावर भाषण केले ?

उत्तर- फेडरेशन व्हर्सेस फ्रिडम.


(३६) मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी कोणती ?

उत्तर- मोचनगड, गुंजीकर यांची 


(३७)  महाराष्ट्रातील विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- सयाजीराव लक्ष्मण सीलप


(३८)  देशातील पहिला स्वच्छ निर्मल जिल्हा कोणता ?

उत्तर- कोल्हापूर.


(३९)  श्यामची आई या चित्रपटाचे निर्माते  ?

उत्तर- प्र.के.अत्रे 


(४०)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला ?

उत्तर- 1990 


(४१)  तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये कोणत्या नदीच्या पाण्यावरून वाद आहे ?

उत्तर- कावेरी नदी.


(४२)  पेनिसिलीनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- अलेक्झांडर फ्लेमिंग.


(४३)  आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?

उत्तर- कृष्णाजी केशव दामले.


(४४)  अमेरिकेचा कार्ल लुईस कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- अॅथेलेटिक्स.


(४५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन केव्हा केली ?

उत्तर- २५ डिसेंबर १९२७.

 

(४६)  सात टेकड्याचे शहर कोणते आहे ?

उत्तर- रोम.


(४७)  डायनामाइटचा शोध कोणी लावला ?

उत्तर- आल्फ्रेड नोबेल.


(४८)  आधुनिक मराठी कांदबरीचे जनक कोणास म्हटले जाते ?

उत्तर- ह. ना. आपटे.


(४९)  'प्लेईंग टू विन' हे पुस्तक कोणाचे आहे ?

उत्तर- सायना नेहवाल.


(५०)  डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या संस्थेचे ब्रीद वाक्य 'शिका,संघटित व्हा,संघर्ष करा.' हे होते ?

उत्तर- बहिष्कृत हितकारिणी सभा.

महत्वाचे समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था

 

✅🔴नाना शंकरशेठ:- 

➡️ बॉम्बे नेटिव्ह एज्यूकेशन सोसायटी - 1823 मुंबई , 

➡️ बॉम्बे असोसिएशन:- 1852 


✅🔴न्या. म. गो. रानडे:-

➡️ विधवा विवाहोत्तेजक मंडळ (१८६५)

➡️ डेक्कन सभा :- 1896 , पुणे



✅🔴 रमाबाई रानडे :- 

➡️ आर्य महिला समाज :-  1882(पंडिता रमाबाई, काशिताई कानिटकर)

➡️ हिंदू लेडिज सोशल क्लब :- 1894, मुंबई 

➡️ सेवा सदन :-1908 ,मुंबई

➡️ भारत महिला परिषद :- 1904 ,मुंबई


✅🔴महर्षी वि. रा. शिंदे :-  

➡️ डिप्रेस्ड क्लासेस मिशन (१९०६),

➡️ राष्ट्रीय मराठा संघ.

➡️ अहिल्याश्रम.

➡️ तरुण मराठा संघ.


✅🔴 जनाक्का शिंदे :-

➡️ निराश्रित सेवासदन



✅🔴कर्मवीर भाऊराव पाटील :-

➡️ रयत शिक्षण संस्था, काले (१९१९), 


✅🔴 वि. दा. सावरकर : -

➡️ मित्रमेळा(1900).

➡️ अभिनव भारत(1904).


✅🔴 महात्मा गांधी:- 

➡️ हरिजन सेवक संघ (१९३२) .


✅🔴 डॉ. बाबासाहेब आंबेडकर:-

➡️ बहिष्कृत हितकारिणी सभा (१९२४).

➡️ मजुर पक्ष (१९३६).

➡️ अ.भा. समता सैनिक दल (१९२७)


✅🔴नाम. गो. कृ. गोखले :-

➡️ भारत सेवक समाज (१९०५)


✅🔴 गणेश वासुदेव जोशी(सार्वजनिक काका) :- 

➡️ सार्वजनिक सभा (पुणे), 

➡️ देशी व्यापारोत्तजक मंडळ (पुणे)



✅🔴 सरस्वतीबाई जोशी:- 

➡️ स्त्री-विचारवंती संस्था, पुणे


✅🔴पंडिता रमाबाई:-

➡️ कृपासदन 

➡️ शारदा सदन (मुंबई), 

➡️ मुक्तीसदन (1896, केडगाव), 

➡️ आर्य महिला समाज, पुणे

महत्त्वाचे पुरस्कार - वाचून घ्या :

◾️भारत रत्न पुरस्कार 2024 :- कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह, एम.एस. स्वामीनाथन,
◾️महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 :-अशोक सराफ
◾️महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 :- डॉ.प्रदीप महाजन
◾️58 वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर :- कवी गुलजार व जगद्गुरु रामभद्राचार्य
◾️विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2023 :- डॉ. रवींद्र शोभणे
◾️ग्रॅमी पुरस्कार 2024 :- शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन
◾️ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार 2023 :- श्री नारायण जाधव
◾️स्वच्छ सर्वेक्षण 2023 :- महाराष्ट्र
◾️टाईम मॅक्झिन 2023 ऍथलिट ऑफ द ईयर :- लियोनेल मेस्सी
◾️टाईम मॅक्झिन चा पर्सन ऑफ द ईयर पुरस्कार 2023 :- टेलर स्विफ्ट
◾️65 वा महाराष्ट्र केसरी :- शिवराज राक्षे
◾️66 वा महाराष्ट्र केसरी :- सिकंदर शेख
◾️मिस युनिव्हर्स स्पर्धा 2023
◾️मिस वर्ल्ड 2024 :- क्रिस्टीना पिजकोव्हा
◾️मिस इंडिया 2024 :- सिनी शेट्टी
◾️मिस अर्थ इंडिया 2023 :- प्रियन सेनन
◾️वर्ल्ड कप 2023 विजेता देश :- ऑस्ट्रेलिया
◾️आशिया कप 2023 :- भारत
◾️यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2023 :- डॉ. यशवंत मनोहर
◾️लता मंगेशकर पुरस्कार 2023 :- सुरेश वाडकर
◾️राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार 2022 :- धर्मेंद्र देओल
◾️अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023 :- क्लॉडिया गोल्डिन
◾️शांततेचा नोबेल पुरस्कार 2023 :- नर्गिस मोहम्मदी
◾️वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023:- डॉ कॅटालिन कारिको व डॉडू वेसमन
◾️दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार-2021 :– वहिदा रेहमान
◾️'नॉर्मन बोरलॉग पुरस्कार' 2023 :- डॉ. स्वाती नायक
◾️ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर" ग्रीस :- नरेंद्र मोदी
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 

General Knowledge Questions & Answers 2024

(०१)  राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो ?
उत्तर- २४ डिसेंबर.

(०२)  सायकलचा शोध कोणी लावला ?
उत्तर- मॅकमिलन.

(०३)  'कुरल' या तामिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर कोणी केले ?
उत्तर- पांडूरंग सदाशिव साने.

(०४)  भारताने आॅलिम्पिक स्पर्धेत प्रथम कधी भाग घेतला ?
उत्तर- १९२० मध्ये.

(०५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतीगृह कोठे सुरू केले ?
उत्तर- सोलापूर.

(०६)  भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?
उत्तर- वड.

(०७)  विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?
उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.

(०८)  कोणती आंतरराष्ट्रीय टेनिस खेळ स्पर्धा हिरव्या गवताच्या मैदानात खेळली जाते ?
उत्तर- विंबलडन.

(०९)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा केला ?
उत्तर- २० मार्च १९२७.

(१०) साखरेचे रासायनिक रेणूसूत्र काय आहे ?
उत्तर- C₁₂H₂₂O₁₁

(११)  भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास म्हणतात ?
उत्तर- दादासाहेब फाळके.

(१२)  डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- रूडाल्फ डिझेल.

(१३)  'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?
उत्तर- अनंत भवानीबाबा घोलप/ अनंत फंदी

(१४)  व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?
उत्तर- २७० ते २८० ग्रॅम.

(१५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?
उत्तर- ४ सप्टेंबर १९२७.

(१६)  महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती ?
उत्तर- पुणे.

(१७)  वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- जेम्स वॅट.

(१८)  'एकच प्याला' या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहे ?
उत्तर- राम गणेश गडकरी.

(१९)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितिवर निवड केव्हा झाली ?
उत्तर- ८ जुलै १९३०.

(२०) ग्लुकोजचे रेणुसूत्र काय आहे ?
उत्तर- C₆H₁₂O₆

(२१)  राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतिक आहे ?
उत्तर- त्याग आणि शौर्य.

(२२)  टेलिफोनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- अलेक्झांडर ग्रॅहम बेल.

(२३)  ना. धों.महानोर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ?
उत्तर- रानकवी.

(२४)  अर्जून पुरस्कार कधी दिला जातो ?
उत्तर- २९ आॅगस्ट.

(२५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमामाई यांचे महापरिनिर्वाण केव्हा झाले ?
उत्तर- २७ मे १९३५.

(२६)  न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?
उत्तर- किवी.

(२७)  ग्रामोफोनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.

(२८)  मुकुंदराजाचा हा मराठीतील पहिला ग्रंथ,असे एक मत आहे ?
उत्तर- विवेकसिंधू.

(२९)  'सनी डेज' हे पुस्तक कोणाचे आहे ?
उत्तर- सुनील गावस्कर.

(३०) डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांनी आचार्य अत्रे यांच्या कोणत्या चित्रपटाचे उद्घाटन केले ?
उत्तर- महात्मा फुले.

(३१)  अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे शासकीय निवासस्थान कोणते आहे ?
उत्तर- व्हाइट हाऊस.

(३२)  अंधासाठीच्या लिपीचा शोध कोणी लावला ?
उत्तर- ब्रेल लुईस.

(३३)  ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?*
उत्तर- अरूणा ढेरे.

(३४)  'गोल्डन गर्ल' हे पुस्तक कोणाचे आहे ?
उत्तर- पी. टी. उषा.

(३५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे गोखले अर्थशास्त्र संस्थेत कोणत्या विषयावर भाषण केले ?
उत्तर- फेडरेशन व्हर्सेस फ्रिडम.

(३६) मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी कोणती ?
उत्तर- मोचनगड, गुंजीकर यांची

(३७)  महाराष्ट्रातील विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
उत्तर- सयाजीराव लक्ष्मण सीलप

(३८)  देशातील पहिला स्वच्छ निर्मल जिल्हा कोणता ?
उत्तर- कोल्हापूर.

(३९)  श्यामची आई या चित्रपटाचे निर्माते  ?
उत्तर- प्र.के.अत्रे

(४०)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला ?
उत्तर- 1990

(४१)  तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये कोणत्या नदीच्या पाण्यावरून वाद आहे ?
उत्तर- कावेरी नदी.

(४२)  पेनिसिलीनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- अलेक्झांडर फ्लेमिंग.

(४३)  आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?
उत्तर- कृष्णाजी केशव दामले.

(४४)  अमेरिकेचा कार्ल लुईस कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- अॅथेलेटिक्स.

(४५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन केव्हा केली ?
उत्तर- २५ डिसेंबर १९२७.

(४६)  सात टेकड्याचे शहर कोणते आहे ?
उत्तर- रोम.

(४७)  डायनामाइटचा शोध कोणी लावला ?
उत्तर- आल्फ्रेड नोबेल.

(४८)  आधुनिक मराठी कांदबरीचे जनक कोणास म्हटले जाते ?
उत्तर- ह. ना. आपटे.

(४९)  'प्लेईंग टू विन' हे पुस्तक कोणाचे आहे ?
उत्तर- सायना नेहवाल.

(५०)  डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या संस्थेचे ब्रीद वाक्य 'शिका,संघटित व्हा,संघर्ष करा.' हे होते ?
उत्तर- बहिष्कृत हितकारिणी सभा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...