०२ जून २०२२

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन.

◆ आयोजन : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

◆ महामंडाळाचे अध्यक्ष: कौतूकराव ठाले पाटील

◆ अनुदान : 50 लाख रूपये (शासनाकडून) - दरवर्षी

: 2017 पर्यंत 25 लाख रुपये

❇️ आतापर्यंत 5 महिलांनी अध्यक्षपद भुषविलेले आहे :-

◆ डॉ. अरुणा देरे - 2019✅
◆ विजया ध्यसा- 2001
◆ शांता शेलड़े- 1996
◆ दुर्गा भागवत - 1973
◆ कुसूमावती देशपांडे - 1961

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन :-

◆ कालावधी :  3, 4 व 5 डिसेंबर 2021

◆ स्थळ : नाशिक

◆ अध्यक्ष : डॉ. जयंत नारळीकर ✅

◆ स्वागताध्यक्ष : छगन भुजबळ

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन :-

◆ स्थळ : उदगीर ✅

◆ अध्यक्ष : भारत सासणे ✅

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन :

◆ स्थळ : वर्धा ✅

◆ अध्यक्ष : पु. शि.रेगे ✅

सात बेटांचे शहर: मुंबई


🎯 महाराष्ट्रातील मुंबई हे शहर सात बेटांनी बनलेले आहे.

🎯 पूर्वी मुंबई येथे सात लहान-मोठ्या आकाराची बेटे अस्तित्वात होती.

🎯 या बेटांच्या मधील खाडी व खाजणात भराव घालून त्यांचे एकत्रीकरण करण्यात आले व आत्ताचे मुंबई नगर अस्तित्वात आले.

☑️ मुंबईची सात बेटे खालीलप्रमाणे

1) माहीम (Mahim)
2) वरळी (Worli)
3) परळ (Parel)
4) माझगाव (Mazgaon)
5) मुंबई (Bombay)
6) कुलाबा (Calaba)
7) छोटा कुलाबा (म्हातारीचे बेट - Old Woman's Island)

🎯 एकसंघ मुंबईची निर्मिती

☑️ या बेटांदरम्यानचा समुद्र फारच उथळ होता व ठिकठिकाणी खाजणे होती.

☑️ ओहोटीच्या वेळी बराचसा भाग उघडा पडत असे. 

☑️ जेराल्ड इंजिनिअर (१६७०-७७) या मुंबईच्या दुसऱ्या ब्रिटिश गव्हर्नरने या सात बेटांमधील खाड्या बुजविण्याचा व समुद्र हटविण्याचा कार्यक्रम हाती घेतला.

☑️ त्याच्यानंतर तो टप्पा-टप्प्याने राबविला जाऊन या सात बेटांचे एकत्रीकरण होऊन मुंबई बेटाची निर्मिती झाली.

☑️ मुंबई बेटावर पूर्व व पश्चिम भागांत नैर्ऋत्य-ईशान्य दिशेत पसरलेले व एकमेकांस समांतर असलेले दोन कमी उंचीचे खडक आहेत.

☑️ त्यांपैकी बेटाच्या पश्चिम भागातील खडक मलबार पॉईंट पासून वरळी पर्यंत पसरला आहे.

☑️ या खडकाची मलबार हिल येथील समुद्र सपाटीपासून उंची ५५ मीटर असून तेच मुंबईतील सर्वोच्च ठिकाणी आहे.

☑️ दुसरा खडक बेटाच्या पूर्व भागात साधारण डोंगरीपासून शीवपर्यंत तुटकतुटक पसरलेला आहे.

☑️ या खडकामुळे व नरीमन पॉईंटच्या भूशिरामुळे त्याच्या पूर्व बाजूवर असलेल्या मुंबई बंदराचे खुल्या सागरापासून संरक्षण झालेले आहे.

☑️ या दोन्ही खडकांतर्गत मलबार, खंबाला, वरळी, पाली, गिल्बर्ट, शिवडी, ॲंटॉप इत्यादी लहानलहान टेकड्या आहेत.

☑️ या दोन्ही खडकांदरम्यानचा प्रदेश सपाट असून मलबार हिल व नरीमन पॉईंटच्या दरम्यान बॅक बे हा उथळ समुद्रभाग आहे.

०१ जून २०२२

राज्यसेवा पूर्व परीक्षा : 2022 .


◆ CSAT Qualified झाल्यामुळे आता GS ला जास्त महत्व प्राप्त झाले आहे. परंतु ज्यांचे CSAT अगोदरच व्यवस्थित नव्हते त्यांनी याकडे दुर्लक्ष करू नका.

◆  काही विद्यार्थ्यांच्या मते मागील काही परीक्षेत चालू घडामोडी ची काठिण्य पातळी वाढली आहे. तर माझ्या मते विद्यार्थी जे चालू घडामोडी साठी पुस्तक/मासिक वाचत असतात आणि त्यातून जर परीक्षेत प्रश्न नाही आले तर ते थेट प्रश्नांची काठिण्य पातळी वाढली असं म्हणतात. कारण त्या Q चा Source त्यांच्या जवळ नसतो. आणि मुख्यतः आपण विद्यार्थी मासिक/ News Paper खूप वाचतो परंतु आपल्याला जे गरजेचे आहे ते आपण करत नाहीत म्हणजे आपण कधी MCQ ची प्रॅक्टिसचं करत नाहीत. त्यामुळे तो विषय आपल्याला अवघड किंवा त्या विषयाची काठिण्य पातळी वाढली असे वाटते.

◆ आता आपण सर्व विद्यार्थीच आहोत , चालू घडामोडी चे प्रश्न वयक्तिक मला तरी कधी अवघड गेले नाहीत . 15 ते 16 प्रश्नांपैकी हमखास मला मागील परीक्षेत 12 ते 13 मार्क मिळत आले आहेत .माझा  इथे सांगण्याचा उद्देश एकच आहे तो म्हणजे आपण चालू घडामोडी कडे खूप दुर्लक्ष करत असतो. परीक्षा जवळ आली की 1 वर्षाचे 12 मासिक एकदाच गोळा करतोत आणि वाचत बसतोत. ही चुकीची पद्धत आहे.

◆ मागील काही आयोगाचे पेपर बघून आपल्याला असे दिसते की किमान आपण परीक्षेच्या अगोदरचे 2 वर्षाचे तरी चालू घडामोडी चांगले करावे म्हणजे आपल्याला  अपेक्षित मार्क मिळतील....

◆ 21 ऑगस्ट ला होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी किमान आपण जानेवारी 2021 पासून चे चालू घडामोडी चांगले केलेच पाहिजे . [ त्या अगोदरचेही काही केले तर उत्तमच ] .

◆ या वर्षी 🔥GS ला किमान 120 चे टार्गेट 🔥ठवा आणि त्यानुसारच अभ्यास करा. अभ्यास हा व्यवस्थित प्लॅन/Schedule नेच करा , काहीही वाचून मार्क मिळत नाहीत.

💐 सर्वांना शुभेच्छा 💐

मुस्लिम धर्मीयांतील सुधारणा चळवळी

♦️अलीगढ चळवळ :- सर सय्यद अहमद खान .

♦️मोहमेडन लिटररी सोसायटी :- अब्दुल लतिफ.

♦️अहमदिया चळवळ :- मिर्झा गुलाम मुहम्मद.

♦️जामिया मिलिया इस्लामिया :- मुहम्मद अली.

♦️फरियादी चळवळ (1804) :- फरीदपूर (बंगाल) .

♦️वहाबी आंदोलन :- (1820-1820)

♦️तायुणी चळवळ (1839):- ढाका

♦️देवबंद चळवळ (1867) .

♦️टिटू मिर ची चळवळ .

31 मे 2022 चालू घडामोडी..!!


1). द्विपक्षीय नौदल सराव "बोंगोसागर" हा भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित केला जातो?
उत्तर - बांगलादेश

२). अमर जवान ज्योतीची स्थापना कोणत्या युद्धानंतर झाली?
उत्तर - 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर

३). अलीकडे चर्चेत असलेले "मुंद्रा बंदर" कुठे आहे?
उत्तर - गुजरात

4). यूएन पिस्किपिंग मिशनमध्ये अलीकडे कोणत्या देशात भारतीय सैनिकांवर हल्ले झाले आहेत?
उत्तर - काँगो

५). जगातील पहिल्या नॅनो युरिया प्लांटचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले?
उत्तर - गुजरात

६). अलीकडेच चर्चेत असलेले कांगेर व्हॅली नॅशनल पार्क कुठे आहे?
उत्तर - छत्तीसगड

७) नुकतेच अमगढ बिबट्या राखीव कोठे उद्घाटन करण्यात आले?
उत्तर - राजस्थान

8). नुकताच महिला आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – २८ मे

प्र. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक कोण बनले आहे?
उत्तर – टॅड्रोस एडहेनॉम

प्र. जोस रामोस होर्टा हे कोणत्या देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत?
उत्तर – पूर्वी तिमोर / पुर्वी तिमोर

प्र. जागतिक थायरॉईड दिवस २०२२ कधी साजरा केला जातो?
उत्तर – २५ मे / २५ मे

प्र. शिरूई लिली फेस्टिव्हल 2022 ची चौथी आवृत्ती कोणत्या राज्यात सुरू झाली आहे?
उत्तर – मणिपुर / मणिपूर

प्र. प्रतिष्ठित 'ऑनररी चाइल्ड राइट्स हिरो अवॉर्ड 2022' ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर – अशोक दयाल चंद (भारत) आणि जेम्स कोफी अन्नान (घाना)

Q. मे 2022 मध्ये, भारतातील 1 दशलक्ष सर्व महिला आशा कार्यकर्त्यांना …… द्वारे सन्मानित करण्यात आले आणि सन्मानित करण्यात आले.
उत्तर - WHO

प्र. दिल्ली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर – ज्ञानेश भारती / गायनेश भारती

Q. क्वाड लीडर्स समिटमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशात पोहोचले?
उत्तर – पाक / जपान

प्र. जेट एअरवेजचे मुख्य डिजिटल अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - प्रभा शरण सिंह / प्रभा शरण सिंह

प्र. 'टॉम्ब ऑफ सॅन्ड' या अनुवादित हिंदी कादंबरीसाठी कोणत्या लेखकाला आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळाले आहे?
उत्तर – गीतांजलि श्री / गीतांजली श्री

३१ मे २०२२

भूगोल महाराष्ट्रातील डोंगर रांगा



📚 सपर्धा परीक्षेचा अभ्यास करताना महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासणे अगत्याचे ठरते. आज महाराष्ट्रातील प्रमुख डोंगर आणि त्यांचा जिल्हा यांविषयी माहिती घेऊयात.


👉 डोंगराचे नाव : जिल्हा


▪️ सातमाळा : नाशिक

▪️ वणी : नाशिक

▪️ निर्मल : नांदेड

▪️ चिकोडी : कोल्हापूर

▪️ पन्हाळा : कोल्हापूर

▪️ चांदूरगड : चंद्रपूर

▪️ मांधरादेव : सातारा

▪️ महादेव : सातारा

▪️ मालिकार्जुन : सांगली

▪️ अजिंठा: औरंगाबाद

▪️ कळसूबाई : अहमदनगर

▪️ भामरागड : गडचिरोली

▪️ गाविलगड : बुलढाणा, अकोला

▪️ बालाघाट : बीड

▪️ तोरणमाळ : नंदुरबार

जागतिक व्यापार संघटना (WTO)

✔️ नाव : World  Trade Organization


◆ स्थापना: गॅट कराराच्या (General Agreement on  Tariffs and Trade: GATT) उरुग्वे राऊंडच्या मर्राकेश करारानुसार 1 जानेवारी 1995 रोजी WTO ची स्थापना करण्यात आली.


◆ मुख्यालय : जिनिव्हा (स्वित्झर्लंड)✅


◆ सदस्य : 164 (अफगाणिस्तान जुलै 2016 मध्ये 164 वा सदस्य देश बनला)


◆ निरीक्षक : 25 देश


◆ महासंचालक : एन्गोझी ओकोन्जो (आफ्रिकन-अमेरिकन)


 ध्येय : शक्य तितक्या सहजतेने, अंदाजाने आणि मुक्तपणे व्यापार वाहत राहण्याची खात्री करणे.


 ही एकमेव जागतिक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी देशांमधील व्यापाराच्या नियमांशी संबंधित आहे.

नीती आयोग



◆ NITI National Institution for Transforming India.


◆ स्थापना 1 जानेवारी 2015 (नियोजन आयोगाची जागा घेतली)


◆ मुख्यालय :- नवी दिल्ली

◆ अध्यक्ष :- पंतप्रधान (सध्या नरेंद्र मोदी) 

◆ उपाध्यक्ष सध्या :- राजीव कुमार


◆ पदसिद्ध सदस्य (4) :- अमित शहा (गृहमंत्री), राजनाथ सिंह (संरक्षण मंत्री), निर्मला सीतारमण (अर्थमंत्री), नरेंद्रसिंह तोमर (कृषिमंत्री) 


◆ पूर्ण कालीन सदस्य :- व्ही. के. सारस्वत, रमेश चंद, डॉ. विनोद पॉल 


◆ विशेष आमंत्रित सदस्य :-  नितीन गडकरी, पियुष गोएल, थावरचंद गेहलोत, राज इंद्रजीत सिंह.


◆ मुख्य कार्यकारी अधिकारी :- अमिताभ कांत

३० मे २०२२

नवीन शैक्षणिक धोरण २०२०ला मंजूरी :

२०२२-२०२३ पासून लागू होणार
NEW EDUCATION POLICY 2020 :

*केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं*
नामकरण आता
*"शिक्षण मंत्रालय"* असं होणार...

जाणून घेऊया :
*नवीन शिक्षण धोरण २०२०* यांना मंत्रिमंडळाने हिरवा झेंडा दाखवला आहे.
३४ वर्षांनंतर शिक्षण धोरण बदलले आहे. नवीन शिक्षण धोरणाची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत :

— तीन ते १४ वर्ष वयोगटाचे विद्यार्थी शिक्षण हक्क कायद्याच्या कक्षेत आले आहेत. यापूर्वी हा वयोगट ६ ते १४ वर्षे होता...

— *५ वर्षे मूलभूत Fundamental :*
१. नर्सरी            @ ४ वर्षे
२. जूनियर केजी @ ५ वर्षे
३. एसआर केजी @ ६ वर्षे
४. इयत्ता पहिली @ ७ वर्षे
५. इयत्ता दुसरी   @ ८ वर्षे

— *३ वर्षांची प्रारंभिक शाळा Preparatory :*
६. इयत्ता तिसरी  @ ९ वर्षे
७. इयत्ता चौथी   @ १० वर्ष
८. इयत्ता पाचवी @ ११ वर्षे

— *३ वर्षांची माध्यमिक शाळा Middle :*
९.   इयत्ता सहावी @ १२ वर्षे
१०. इयत्ता सातवी @ १३ वर्ष
११. इयत्ता आठवी @ १४ वर्षे

*४ वर्ष माध्यमिक शाळा Secondary :*
१२. इयत्ता नववी     @१५ वर्षे
१३. इयत्ता दहावीची @ १६ वर्षे
१४. एफ.वाय.जे.सी‌. @ 17 वर्षे
१५. एस.वाय.जे.सी. @ १८ वर्षे

*ठळक वैशिष्ट्ये :*

— बोर्ड फक्त १२ वीच्या वर्गाला असेल.
महाविद्यालयीन पदवी ४ वर्षांची.
*दहावी मंडळ रद्द. SSC*
*एमफिल MPhil देखील बंद असेल.*

— *आता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना केवळ मातृभाषा, स्थानिक भाषा आणि राष्ट्रीय भाषा शिकविली जाईल. उर्वरित विषय जरी तो इंग्रजी असला तरी एक विषय म्हणून शिकविला जाईल...*

— *बोर्ड परीक्षांचे महत्त्व कमी...*
आता *बोर्ड परीक्षा फक्त १२वी मध्ये द्यावी लागेल.* तर यापूर्वी दहावीची बोर्ड परीक्षा देणे बंधनकारक होते, ते आता होणार नाही.

— ९वी ते १२वीच्या सत्र परीक्षा असतील Semester Exam.
*शालेय शिक्षण ५ + ३ + ३ + ४ सूत्रांच्या (वरील सारणी पहा) अंतर्गत शिकवले जाईल...*

— महाविद्यालयीन पदवी ३ व ४ वर्षांची असेल. म्हणजेच,
*पदवीच्या पहिल्या वर्षात तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल,*
*दुसर्‍या वर्षी पदविका असेल*, तर
*तृतीय वर्षात डिग्री मिळेल.*

— जे संशोधनासाठी उच्च शिक्षण घेऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम तर जे विद्यार्थी पदवीनंतर नोकरी करू इच्छितात त्यांच्यासाठी तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असेल...

— विद्यार्थ्यांना यापुढे एमफिल MPhil करावे लागणार नाही. म्हणजेच, *रिसर्च करणाऱ्यांसाठी पदवी अधिक एक वर्षांचा मास्टर्स अभ्यासक्रम अशी चार वर्षांची पदवी* असेल. यानंतर ते थेट *पीएचडी PHD* करू शकतील.

— दरम्यान विद्यार्थी इतर कोर्स करू शकतील. *उच्च शिक्षणामध्ये Higher Education* २०३५ पर्यंत एकूण सकल पट नोंदणी Gross Enrolment Ratio २०३५ पर्यंत ५०% पोहोचवण्याचं उद्दिष्ट...
दुसरीकडे नवीन शिक्षण धोरणांतर्गत जर एखाद्या विद्यार्थ्याला कोर्सच्या मध्यभागी दुसरा कोर्स करायचा असेल तर तो मर्यादित काळासाठी पहिल्या कोर्समधून ब्रेक घेऊन दुसरा कोर्स करू शकतो...

— उच्च शिक्षणातही Higher Education अनेक सुधारणा केल्या आहेत. सुधारणांमध्ये
*श्रेणीबद्ध शैक्षणिक Graded Academic,* *प्रशासकीय  Administrative* आणि
*आर्थिक स्वायत्तता Financial Autonomy*
समाविष्ट आहे...
त्याशिवाय ई-कोर्सेस प्रादेशिक भाषांमध्येही सुरू केले जातील.
आभासी Vertual लॅब विकसित केल्या जातील.
राष्ट्रीय शैक्षणिक वैज्ञानिक मंच (NETF) सुरू होईल. देशात ४५ हजार महाविद्यालये असल्याचे स्पष्ट आहे...

*सर्व सरकारी Government,*
*खासगी Private* आणि
*मान्यताप्राप्त संस्थांसाठी*
*Deemed University*
समान नियम असतील...

— मल्टीडिसिप्लिनरी अभ्यासक्रम: एकाच वेळी वेगवेगळे विषय एकत्रितपणे शिकता येणार आहेत. यात मेजर आणि मायनर असे विषयांचे विभाजन असेल. आर्थिक किंवा अन्य कारणांमुळे होणारे ड्रॉपआऊट यामुळे कमी होतील. शिवाय ज्यांना एखादा विषय आवडीचा असेल तो विषय त्यांना शिकता येईल...

— बहुभाषिक शिक्षण - मुलांना शिकवताना एकाच भाषेच्या माध्यमातून अध्यापन न करता विविध प्रादेशिक भाषांचा वापर करता येणार...

— लॉ आणि मेडिकल शिक्षण वगळता उच्च शिक्षण एका छताखाली येणार...

— शिक्षणातील गुंतवणूक जीडीपीच्या ६% करणार, सध्या हे प्रमाण ४.४३% आहे...

— विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तक बदलणार. शिक्षकांसोबतच विद्यार्थीदेखील स्वत:चे मूल्यांकन करणार...

— सर्व महाविद्यालयांसाठी एकच सामायिक प्रवेश परीक्षा. एनटीए ही परीक्षा घेणार. मात्र ही परीक्षा ऐच्छिक असेल.‌..

या नियमानुसार नवीन शैक्षणिक सत्रे सुरू करता येतील. सर्व विद्यार्थी आणि पालकांनी हा संदेश काळजीपूर्वक वाचावा.

💐🇮🇳शिक्षण मंत्रालय भारत सरकार..जनहितार्थ जारी🇮🇳

२८ मे २०२२

Online Test Series

महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते


🔹1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 


🔸2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 


🔹3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर 


🔸4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ 


🔹5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग 


🔸6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण 


🔹7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी 


🔸8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी 


🔹9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी 


🔸10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी 


🔹11) पार घाट - सातारा - रत्नागिरी 


🔸12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी 


🔹13) पसरणीचा घाट - सातारा - वाई 


🔸14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग 


🔹15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई 


🔸16) बोरघाट - पुणे - कुलाबा


🔹17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल 


🔸18) कुसुर घाट - पुणे - पनवेल 


🔹19) वरंधा घाट - पुणे - महाड 


🔸20) रूपत्या घाट - पुणे - महाड 


🔹21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड 


🔸22) कसारा घाट - नाशिक - ठाणे 


🔹23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई


 🔸24) थळ घाट - नाशिक - ठाणे 


🔹25) माळशेज घाट - ठाणे- पुणे  


🔸26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर

लोकशाही निर्देशांक 2021


👉 या निर्देशांकात भारत 46 व्या क्रमांकावर आहे


✔️ विशेष निरीक्षण :- 


या वर्षीच्या अहवालात असे दिसून आले आहे की लोकशाहीने 2010 नंतरची सर्वात मोठी वार्षिक घसरण अनुभवली आहे



💥 निर्देशांक जाहीर करणारी संस्था :-  


इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट  ( Economic Intelligence Unit )



🟢 2006  पासून हा निर्देशांक जाहीर केला जातो.


🟢 भारताचा क्रमांक :-  46 🟢


( 5 अंकांनी सुधारणा )


मागील वर्षी 51 वा क्रमांक होता



✔️ इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट  लोकशाही निर्देशांक  मोजमाप पद्धत  :-



-  लोकशाही निर्देशांक 60 निर्देशकांवर आधारित आहे


✔️  पाच श्रेणींमध्ये विभाजन केले आहेत :-


1) निवडणूक प्रक्रिया आणि बहुलवाद 


2) नागरी स्वातंत्र्य 


3)सरकारचे कार्य 


4)राजकीय सहभाग 


5) राजकीय संस्कृती .



 🟢 सहभागी  देशांना शून्य ते दहा अंकामध्ये  रेटिंग दिले जाते 


🟢 एकूण अनुक्रमणिका पाच एकूण श्रेणी गुणांची सरासरी असते.



प्रत्येक देशाला त्यांच्या सरासरी गुणांच्या आधारे चार प्रकारच्या शासनांमध्ये वर्गीकृत केले जाते :-


1) पूर्ण लोकशाही


2) सदोष लोकशाही


3) संकरित शासन 


4) हुकूमशाही शासन

मानवी शरीर:


1: हाडांची संख्या: 206

2: स्नायूंची संख्या: 639

3: मूत्रपिंडांची संख्या: 2

4: दुधाच्या दातांची संख्या: 20

5: फासांची संख्या: 24 (12 जोड्या)

6: हार्ट चेंबर क्रमांक: 4

7: मोठी धमनी: महाधमनी

8: सामान्य रक्तदाब: 120/80 मिमीएचजी

9: रक्त पीएच: 7.4

10: पाठीच्या स्तंभात कशेरुकाची संख्या: 33


11: मान मध्ये कशेरुकांची संख्या: 7

12: मध्यम कानात हाडांची संख्या: 6

13: चेहर्यावरील हाडांची संख्या: 14

14: कवटीतील हाडांची संख्या: 22

15: छातीत हाडांची संख्या: 25

16: हात मध्ये हाडांची संख्या: 6

17: मानवी हातातील स्नायूंची संख्या: 72

18: हृदयातील पंपांची संख्या: 2

19: सर्वात मोठा अवयव: त्वचा

20: सर्वात मोठी ग्रंथी: यकृत


21: सर्वात मोठा सेल: मादा अंडाशय

22: सर्वात लहान सेल: शुक्राणू

23: सर्वात लहान हाड: मध्यवर्ती कान

24: प्रथम प्रत्यारोपण केलेले अवयव: मूत्रपिंड

25: लहान आतड्याची सरासरी लांबी: 7 मी

26: मोठ्या आतड्याची सरासरी लांबी: 1.5 मी

27: नवजात बाळाचे सरासरी वजन: 3 किलो

28: एका मिनिटात नाडी दर: 72 वेळा

29: शरीराचे सामान्य तापमान: 37 से ° (98.4 फ °)

30: रक्ताची सरासरी मात्रा: 4 ते 5 लिटर


31: लाइफटाइम लाल रक्तपेशी: १२० दिवस

32: लाइफटाइम पांढ White्या रक्त पेशी: 10 ते 15 दिवस

33: गरोदरपण: 280 दिवस (40 आठवडे)

34: मानवी पायात हाडांची संख्या: 33

35: प्रत्येक मनगटात हाडांची संख्या: 8

36: हातात हाडांची संख्या: 27

37: सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी: थायरॉईड

38: सर्वात मोठे लिम्फॅटिक अवयव: प्लीहा

40: सर्वात मोठे आणि भक्कम हाडे: फेमूर

:१: सर्वात लहान स्नायू: स्टेपेडियस (मध्यम कान)


41: गुणसूत्र संख्या: 46 (23 जोड्या)

42: नवजात बाळाच्या हाडांची संख्या: 306

43: रक्ताची चिकटपणा: 4.5 ते 5.5

44: युनिव्हर्सल डोनर रक्तगट: ओ

45: सार्वत्रिक प्राप्तकर्ता रक्त गट: एबी

46: सर्वात मोठा पांढरा रक्त पेशी: मोनोसाइट

47: सर्वात लहान पांढर्‍या रक्त पेशी: लिम्फोसाइट

48: लाल रक्तपेशींची संख्या वाढते असे म्हणतात: पॉलीसिथेमिया

49: शरीरात रक्तपेढी आहे: प्लीहा

50: जीवनाच्या नदीला म्हणतात: रक्त


51: सामान्य रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी: 100 मिलीग्राम / डीएल

52: रक्ताचा द्रव भाग: प्लाझ्मा

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना.....



◆ भारतात रेल्वे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली❓

   - लॉर्ड हार्डींग्ज पहिला


◆ इंग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतील प्रथम वृत्तपत्र कोणते❓

   - बॉम्बे हेराॅल्ड.


◆ भारतातील पहिली जातीय संघटना कोणती❓

   - मुस्लिम लीग


◆ टिपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?

   - 1780 ची पाल्लुतुरची लढाई 


◆ भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी❓

   - लॉर्ड कॅनिंग 


◆ निळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला.

   - बंगाल प्रांतात


◆ 1858 च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री❓

   - लॉर्ड स्टैनले


◆ 1857 च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये❓

   - 34 वी एन. आय. रजिमेंट 


◆ इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते❓

   - कलकत्ता विद्यालय

गोवा



- 19 डिसेंबर 1961 पोर्तुगीज वसाहतीकडून स्वतंत्र

- 30 मे 1987 पर्यंत दमण व दीव या केंद्र शासित प्रदेशाचा भाग होते.

- भारतीय संघराज्याचे 25 वे राज्य.

- राजधानी: पणजी

- सर्वात मोठे शहर: वास्को दी गामा

- अधिकृत भाषा: कोंकणी

- क्षेत्रफळ: 3702 चौकिमी (भारत 29 व्या क्रमांकावर)

- दोन महसुली जिल्हे: उत्तर गोवा & दक्षिण गोवा

--------------------------------------

● लोकसंख्या (2011 नुसार)


- एकूण लोकसंख्या: 1458545 (भारतात 26 व्या क्रमांकावर)

[64.68% हिंदू, 29.86% ख्रिश्चन, 5.25% मुस्लिम]

- लिंग गुणोत्तर: 973

- लोकसंख्या घनता: 364

- साक्षरता: 88.70% (भारतात तिसर्‍या क्रमांकावर)

------------------------------------

● राजकीय

- एक सभागृहीय राज्य विधिमंडळ: विधानसभा 40 जागा

- राज्यसभा: 1 जागा

- लोकसभा: 2 जागा

- राजकीय पक्ष: भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, गोवा फाॅर्वड

-----------------------------------

● मुख्य व्यवसाय

- शेती: भात, नारळ

- खाणकाम

- पर्यटन

अभिमानास्पद! महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या निखत झरीनने जिंकलं सुवर्णपदक.


💥भारतासाठी अभिमानाची बातमी आहे. भारतीय बॉक्सिंगपटू निखत झरीनने महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा जिंकत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे. यासह जागतिक बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पाचवी भारतीय महिला आहे. तिने इस्तांबुलमध्ये झालेल्या सामन्यात थायलंडची जुतामास जितपाँगला ५-० ने पराभूत केलं.


💥निखत झरीनने ५२ किलो गटात महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेचा अंतिम सामना जिंकत सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचवली आहे. आतापर्यंत सहा वेळा विजेती एमसी मेरी कोम, सरिता देवी, जेनी आरएल आणि लेखा सी या महिला बॉिक्सगपटूंनी जागतिक विजेतेपदे पटकावली आहेत. यात आता निखत झरीनचा समावेश झाला आहे.


💥दरम्यान, उपांत्य सामन्यात निखतने आत्मविश्वासाने खेळ करीत ब्राझिलच्या कॅरोलिन डी अल्मेडाला ५-० असे सहज नामोहरम केले होते. कनिष्ठ विश्वविजेत्या निखतने संयमी खेळाचे प्रदर्शन करीत कॅरोलिनवर निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. पण, मनीषाने टोक्यो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या इटलीच्या इरमा टेस्टाकडून ०-५ अशी हार पत्करली, तर परवीनने युरोपियन कांस्यपदक विजेत्या आर्यलडच्या एमी ब्रॉडहस्र्टकडून १-४ असा पराभव पत्करला होता.

२७ मे २०२२

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.


 गौतम बुद्धांना कोणत्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली ?
गया.( बोधगया )

गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती कोणत्या पौर्णिमेला झाली ?
वैशाख पौर्णिमा.

 गौतम बुद्धांचे पहिले प्रवचन कोठे झाले ?
सारनाथ.

 गौतम बुद्धांनी प्रथम किती लोकांना दीक्षा दिली ?
पाच.

 बौद्ध धम्मातील त्रिरत्ने कोणती ?
बुद्ध,धम्म,संघ.

 त्रिपिटक या बौद्ध धम्मग्रंथाचे किती भाग पाडण्यात आले आहे ?
तीन.

जगामध्ये दु:ख आहे हे कोणी सांगितले ?
गौतम बुद्ध.

 गौतम बुद्धांचे पत्नीचे नाव काय होते ?
यशोधरा.

 गौतम बुद्धांचे मुलाचे नाव काय होते ?
राहूल.

 'लाईट ऑफ एशिया' म्हणून कोणाला ओळखले जाते ?
तथागत गौतम बुद्ध.

 गौतम बुद्धांनी प्रथम किती लोकांना दीक्षा दिली ?
पाच.

 बौद्ध धम्मातील त्रिरत्ने कोणती ?
बुद्ध,धम्म,संघ.

 त्रिपिटक या बौद्ध धम्मग्रंथाचे किती भाग पाडण्यात आले आहे ?
तीन.

जगामध्ये दु:ख आहे हे कोणी सांगितले ?
गौतम बुद्ध.

 गौतम बुद्धांचे पत्नीचे नाव काय होते ?
यशोधरा.

 गौतम बुद्धांचे मुलाचे नाव काय होते ?
राहूल.

 'लाईट ऑफ एशिया' म्हणून कोणाला ओळखले जाते ?
तथागत गौतम बुद्ध..

भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी

भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी

संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

मूलभूत हक्क : अमेरिका

न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

कायदा निर्मिती : इंग्लंड

लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

संघराज्य पद्धत : कॅनडा

शेष अधिकार : कॅनडा.

भारतातील विविध गोष्टींचे / क्षेत्रांचे जनक

भारतातील विविध गोष्टींचे / क्षेत्रांचे जनक

⭐ नौदल : छत्रपती शिवाजी महाराज
👤 संविधान : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
👤 चित्रपट : दादासाहेब फाळके
👤 मिसाईल : डॉ. ए पी जे अब्दुल कलाम
👤 अवकाश कार्यक्रम : विक्रम साराभाई
👤 अणुऊर्जा कार्यक्रम : होमी भाभा
👤 आधुनिक भारत : राजा राममोहन रॉय
👤 विमानचालन : जे आर डी टाटा
👤 हवाई दल : सुब्रतो मुखर्जी
👤 हरीत क्रांती : एम एस स्वामीनाथन
👤 दुग्ध क्रांती : वर्गीस कुरियन
👤 गुलाबी क्रांती : दुर्गेश पटेल
👤 लाल क्रांती : विशाल तिवारी
👤 पिवळी क्रांती : सॅम पित्रोदा
👤 सुपर कॉम्प्युटर : विजय भटकर
👤 फलोत्पादन : एम एच मारीगौडा
👤 कायदा शिक्षण : माधव मेनन
👤 आयटी उद्योग : एफ सी कोहली

━━━━━━━━━━━━━━━━

इंग्रज अधिकारी व कामगिरी

⭕️ इंग्रज अधिकारी व कामगिरी ⭕️
______

▪️रॉबर्ट क्लाइव्ह - दुहेरी राज्यव्यवस्था

◾️वॉरन हेस्टींग - रेग्युलेटिंग अॅक्ट*

◾️लॉर्ड कॉर्नवॉलिस - कायमधारा पद्धत

◾️लॉर्ड वेलस्ली - तैनाती फौज

◾️लॉर्ड हेस्टींग - पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त

◾️ लॉर्ड विल्यमबेंटीक - सती प्रतिबंधक कायदा

◾️ चार्ल्स मेटकॉफ - वृत्तपत्राचा मुक्तिदाता

◾️ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी

◾️ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण

◾️ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय

◾️ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना

◾️ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक

◾️ लॉर्ड लिटल - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट

◾️ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक..

महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेण्या व गुंफा मंदिर


महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेण्या व गुंफा मंदिर

◾️लेण्या  ठिकाण/जिल्हा

◾️अजिंठा, वेरुळ - औरंगाबाद

◾️एलिफंटा, घारापुरी - रायगड

◾️कार्ला, भाजे, मळवली - पुणे

◾️पांडवलेणी - नाशिक

◾️बेडसा, कामशेत - पुणे

◾️पितळखोरा - औरंगाबाद

◾️खारोसा, धाराशीव (जैर) – उस्मानाबाद.

कोकणातील प्रमुख नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे.

.       🟠कोकणातील प्रमुख नद्या🟠
              (उत्तरेकडून दक्षिणेकडे)

◾️ पालघर जिल्हा -
         दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा

◾️ ठाणे जिल्हा -
         भातसई , काळू , उल्हास

◾️ रायगड जिल्हा -
         पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल

◾️ रत्नागिरी जिल्हा -
           सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव

◾️ सिंधुदुर्ग जिल्हा -
          काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल.

२४ मे २०२२

नक्की वाचा :- भारतात घडलेल्या पहिल्या गोष्टी



🎯 चद्रावर मानव पाठवणारा पहिला देश : अमेरिका

🎯पहिला मानवनिर्मित उपग्रह अवकाशात प्रेक्षेपित करणारा देश : रशिया

🎯  पहिली हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वी करणारा देश : द. आफ्रिका

🎯पहिली चेहरारोपण शस्त्रक्रिया करणारा देश : फ्रान्स

🎯भारतातील पहिली विज्ञान नगरी : कोलकाता

🎯  भारतातील पहिला महासंघ : परम 10,000

🎯भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र : नवी दिल्ली (1959)

🎯  भारतातील पहिले स्वदेशी क्षेपणास्त्र : पृथ्वी (1988)

🎯 भारतातील पहिले कुटुंबनियोजन केंद्र : मुंबई (1925)

🎯भारताचा पाहीला उपग्रह : आर्यभट्ट

🎯  भारतातील पहिला दूरसंवेदन उपग्रह : आय.आर.एस-1ए

🎯  भारतातील पहिली अणूभट्टी : अप्सरा (1954)

🎯 भारतातील पहिली जनगणना : ए.स. 1872

🎯  भारतातील स्वदेशी निर्मिती पहिली आण्विक पाणबुडी : आय.एन.एस.अरिहंत

🎯भारतातील पहिली अणुचाचणी : पोखरण (1974)

महाराष्ट्रातील समाजसुधारकमहादेव गोविंद रानडे

महादेव गोविंद रानडे :

जन्म – 18 जानेवारी 1842, निफाड (नाशिक).

मृत्यू – 16 जानेवारी 1901.

रानडे यांना हिन्दी अर्थशास्त्राचे जनक म्हणून संबोधले जात .

तसेच त्यांना पदवीधरांचे मुकुटमणी असेही म्हटले जात असे .

रानडे हे अक्कलकोटी राज्याचे कारभारी होते.

1886 – भारत सरकार अर्थसमितीचे सदस्य वित्तीय समितीवर नियुक्त होणारे पहिले भारतीय.

रानडे हे गोपाल कृष्ण गोखले यांचे गुरु होते .

त्यांना महाराष्ट्राच्या प्रबोधनाचे जनक म्हटले जात .

समाजसुधारकांसाठी सर्वांगीण प्रतिमान मांडणारे प्रज्ञावंत.

रानडे हे आर्थिक राष्ट्रवादी होते .

1887 – सामाजिक परिषद.

1890 – औद्योगिक परिषद.

त्यांना मराठी पत्रकारीतेचे जनक असेही म्हटले जात असे.

संस्थात्मिक योगदान :

1865 – विधवा विवाहोत्तेजक मंडळी (विष्णु पंडित) सहाय्य.

1867 – मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापनेत सहभाग.

1870 – सार्वजनिक सभा स्थापनेत सहभाग.

उद्दीष्ट – थंड गोला घेवून पडलेल्या समाजात विचार, संघटना व कृतीची सांगड घालण्यासाठी व्यासपीठ उभे केले.

वकृत्वोत्तेजक सभा – पुणे.

नगर वचन मंदिर – पुणे.

1875 वसंत व्याख्यान – माला (पुणे).

1882 – हुजूरपागा शाळा (पुणे).

31 ऑक्टोबर 1896 डेक्कन सभा.

1896 – हिंदू विडोज होम.

इन्फेक्शन डेसिजेस हॉस्पिटल स्थापन केले .
मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी, नाशिक.
पुना मार्कटाईल बँक, रशीम गिरणी, लवाद कोर्ट, पुणे रंगशाला यांच्या स्थापनेत सहभाग.

1889 – Industrial As Sociation Of Western India स्थापन.

रानडे यांनी केलेले लेखन :

इंदु प्रकाश (मासिक).

एकेश्र्वरनिष्ठांची कैफियत.

1874 – जबाबदार राज्यपद्धतीची मागणी करणारा अर्ज.

1888 – ऐजेस ऑन इंडियन इकॉनॉमिक्स.
मराठी सत्तेचा उदय.

मराठी पत्रकारितेचा पाया घातला.

निबंध – प्रजावृद्धीचे दुष्परिणाम, मराठा सत्याग्रहातील नाणी व चलन.

‘तरुण शिकलेल्या लोकांची कर्तव्य‘ हा निबंध ज्ञानप्रसारक नियतकालिकात गाजला.

वैशिष्ट्ये :-

ग. व. जोशी यांच्या सामाजिक व आर्थिक विचारांचा प्रभाव.
भारतात प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया घातला.

1873 – 11 वर्ष वयाच्या मुलीसोबत पुनर्विवाह.
पंचहौद मिशन प्रकरणी प्रायश्र्चित घेतले.
संमतीवय विधेयकास पाठिंबा.
इंडियन नॅशनल कॉग्रेसला पाठिंबा.
दारिद्र्यनिर्मूलनासाठी औद्योगीकरणाचा उपाय सुचवले.
‘महाष्ट्राला पेशवाईनंतर आलेली प्रेतकळा उडवून सचेतन करण्याची काळजी आमरण वाहिनी.’ टिळकांचे मत.

परीक्षेसाठी महत्वाचे

◆ ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक

◆ ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच

◆ ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक

◆ ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच

◆ सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच

◆ पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी

◆ पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती

◆ पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी

◆ पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO

◆ सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती

◆ सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी

◆ जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO

◆ जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष

◆ जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO

◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष

◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO

◆ जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री

◆ जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी

◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री

◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी

◆ नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी

◆ नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष

◆ नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी

◆ महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त

◆ महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर

◆ महानगरपालिकेचा सचिव - आयुक्त

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...