२० मार्च २०२२

करोना महामारीचा शेवट कधी होणार? WHO च्या प्रवक्त्यांनी दिलं उत्तर, म्हणाले

🔶जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्याने शुक्रवारी सांगितले की, कोविड-19 साथीच्या रोगाचा शेवट खूप दूर आहे. त्यांच्या ताज्या साप्ताहिक आकडेवारीमध्ये कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलं आहे.

🔷यू.एन.च्या आरोग्य संस्थेने यापूर्वी म्हटले आहे की या वर्षी साथीच्या रोगाचा तीव्र टप्पा संपू शकतो परंतु इतर घटकांसह प्रत्येक देशातील ७० टक्के लोकसंख्येचे लसीकरण करण्याचे लक्ष्य आपण किती लवकर पूर्ण करतो यावर ते अवलंबून असेल.

🔶जिनेव्हा येथ पत्रकारपरिषदेत जेव्हा एका पत्रकाराने महमारी संपण्याच्या वेळेबद्दल विचारले असता, मार्गारेट हॅरिस म्हणाल्या की त्या “संपण्यासून खूप दूर आहे”. “आपण नक्कीच साथीच्या आजाराच्या मध्यात आहोत,” असेही त्यांनी सांगितले.

🔷एक महिन्याहून अधिक काळ कोविड प्रकरणांमध्ये घट झाल्यानंतर, मागील आठवड्यापासून जगभरात कोविडची प्रकरणे वाढू लागल्याचे समोर येत आहे. डब्ल्यूएचओने सांगितले की, आशिया आणि चीनच्या जिलिन प्रांतात लॉकडाउनसह कोविड संख्येचा उद्रेक रोखण्यासाठी संघर्ष सुरू आहे.

चीनमध्ये एका वर्षानं करोना मृत्यू ; अमेरिकेतही निर्बंध परतणार.

🔮जागतिक कोविड-19 प्रकरणांमध्ये घट झाल्याच्या काही आठवड्यांनंतर आता पुन्हा एकदा करोना महामारीने जागतिकस्तरावर डोकं वर काढल्याचं दिसून येत आहे. चीन आणि दक्षिण कोरिया सारखे देश दररोज कोविड -19 प्रकरणांच्या बाबतीत नवीन उच्चांक गाठत आहेत, जे मुख्यतः ओमायक्रॉन व्हेरिएंटद्वारे वाढत आहेत. शिवाय अमेरिकेतही निर्बंध पुन्हा लागू केले जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

🔮२०२० मध्ये वुहानमध्ये सुरुवातीच्या उद्रेकानंतर चीन सध्या स्थानिक पातळीवर पसरलेल्या कोविड-19 प्रकरणांच्या सर्वात मोठ्या लाटेशी लढत आहे. तसेच, आज (शनिवार) चीनमध्ये दोन करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे. जानेवारी २०२१ नंतर करोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत झालेली ही पहिली वाढ आहे.

🔮चीनमध्ये शनिवारी सामुदायिक संक्रमणातून २ हजार १५७ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली, ज्यामध्ये बहुसंख्य जिलिन प्रांतात आढळले आहेत. तर जिलिन प्रांतात करोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी प्रवासावर निर्बंध लादण्यात आले आहेत आणि लोकांना प्रवास करण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे देखील आवश्यक केले आहे.

प्रो लीग हॉकी (पुरुष) - अर्जेटिनाविरुद्धच्या लढतीत भारताचे प्रयोगाचे धोरण.

🌅‘एफआयएच’ प्रो लीग हॉकी स्पर्धेत दुसरा पराभव पत्करल्यानंतरही भारतीय पुरुष संघाने व्यग्र हंगामाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या फळीतील खेळाडूंना अजमावत प्रयोगाचे धोरण कायम ठेवले आहे. टोक्यो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता भारतीय संघ अर्जेटिनाविरुद्धच्या दोन लढतींपैकी पहिला सामना शनिवारी खेळणार आहे.

🌅किलगा स्टेडियमवर स्पेनविरुद्ध झालेल्या लढतीतील पहिल्या सामन्यात भारताने ५-४ असा विजय मिळवला, परंतु दुसऱ्या सामन्यात ३-५ अशी हार पत्करली. याआधी गेल्या महिन्यात भारताने फ्रान्सकडून २-५ असा पराभव पत्करला होता. मात्र तरीही भारतीय संघ १२ गुणांसह नेदरलँड्स (१६ गुण) पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने आतापर्यंतच्या सहा सामन्यांत चार विजय मिळवले आहेत.

🌅येत्या वर्षांत राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धाची महत्त्वाची आव्हाने भारतापुढे आहेत. या स्पर्धाना २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रतेचा दर्जा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राखीव खेळाडूंनाही संधी देण्याचे भारताचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी ठरवले आहे.

🌅स्पेनविरुद्धच्या लढतीमधील भारतीय संघात काही बदल करण्यात आले आहेत. जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावरील अर्जेटिनाविरुद्धच्या सामन्यात भारताचा कनिष्ठ विश्वचषक खेळलेला मध्यरक्षक मोयरंगथेम रबिचंद्रन पदार्पण करणार आहे.

🌅दुखापतीतून सावरलेला गरुजत सिंगसुद्धा या सामन्यात पुनरागमन करणार आहे. गोलरक्षक क्रिशन बहादूर पाठक हा सूरज करकेराची जागा घेईल. बचावफळीत मनदीप मोर आणि दीपसन तिर्की यांच्या जागी अमित रोहिदास आणि जुगराज सिंग खेळतील. मध्यफळीत जसकरण सिंग आणि अक्षदीप सिंग यांच्या जागी सुमित आणि रबिचंद्र खेळतील.

जगातील सर्वात आनंदी देशांची यादी जाहीर; फिनलँडनं पटकावला पहिला क्रमांक, तर भारत.

🔴संयुक्त राष्ट्रांकडून दरवर्षी जगातील सर्वात आनंदी देशांची यादी (World Happiness Report) जाहीर केली जाते. वैयक्तिक पातळीवर असणारं समाधान, चांगलं राहणीमान, जीडीपी, आयुर्मान अशा निरनिराळ्या घटकांच्या आधारे ही यादी तयार केली जाते. जगभरातल्या एकूण १५० देशांचं या घटकांच्या आधारे मूल्यमापन करण्यात येतं. यंदाच्या वर्षी अर्थात २०२२ ची यादी तयार करताना एकूण १४६ देशांचं मूल्यमापन करण्यात आलं आहे. या यादीमध्ये सध्या युद्ध सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेनचा देखील समावेश असून ते अनुक्रमे ८० आणि ९८व्या स्थानावर आहेत.

🟠सलग पाचव्या वर्षी फिनलँड अव्वल - या यादीमध्ये सलग पाचव्या वर्षी फिनलँडला जगातला सर्वात आनंदी देश होण्याचा मान मिळाला आहे. फिनलँडच्या पाठोपाठ डेन्मार्क, आईसलँड, स्वित्झर्लंड, नेदरलँड, लग्झेंबर्ग, स्विडन, नॉर्वे, इस्त्रायल आणि न्यूझीलंड या ९ देशांचा क्रम लागतो. पहिल्या १० मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त एक बदल झाला असून ऑस्ट्रिया या यादीतून बाहेर गेला आहे. इतर देशांचा फक्त क्रम बदलला असून ते पहिल्या दहामध्ये कायम आहेत.

🔴अफगाणिस्तान सर्वात शेवटच्या स्थानी - दरम्यान, या यादीमध्ये अफगाणिस्तान सर्वात शेवटच्या म्हणजेच १४६व्या स्थानी आहे. अफगाणिस्तानपाठोपाठ लेबेनॉन आणि झिम्बाब्वे हे देश सर्वात कमी आनंदी ठरले आहेत.

🟠यादीमध्ये भारत कुठे - जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीमध्ये भारताचं स्थान मात्र बरचसं मागे आहे. १४६ देशांच्या यादीमध्ये भारत थेट १३६व्या क्रमांकावर म्हणजे शेवटून ११व्या क्रमांकावर आहे.

१९ मार्च २०२२

महाराष्ट्रातील प्रमुख लघुउद्योग

🌺 हिमरुशाली - औरंगाबाद

🌺पितांबरी व पैठण्या - येवले (नाशिक)

🌺चादरी - सोलापूर

🌺लाकडाची खेळणी - सावंतवाडी

🌺सुती व रेशमी कापड़- नागपूर, अहमदनगर

🌺 हातमाग साडय़ा व लुगडी- उचलकरंजी

🌺 विडीकाम - सिन्नर (नाशिक), अहमदनगर, सोलापूर

🌺काचेच्या वस्तू - तळेगाव, ओगलेवाडी

🌺रेशमी कापड - सावळी व नागभीड (चंद्रपूर), एकोडी (भंडारा)

🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸

मोफत सामान्य ज्ञान व पोलीस भरती टेस्ट

प्र. १.   नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण?

१. मदर टेरेसा
२. हरगोबिंद टागोर
३. सी. रमण
४ . रवींद्रनाथ टागोर

प्र. २. ब्रिटिश भारतातील पहिली लोकसंख्या जनगणना कधी  झाली?
१. इ.स १८८२
२. इ.स १८७२
३. इ.स १८८८
४. इ.स १९७२

प्र. ३.   जगातील एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकसंख्या भारतात आहे?
१. १८.५%
२. १७.५%
३. २१.५%
४. १६.५%

प्र.४.  कलम १ (३)  नुसार, भारताचे राज्यक्षेत्र पुढील बाबीचे मिळून बनलेले असेल;

१) घटकराज्यांची राज्यक्षेत्रे
२) केंद्रशासित प्रदेश
३) संपादित केली जातील अशी अन्य राज्यक्षेत्रे.
४) वरील पैकी सर्व

प्र.५.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे वर्णन संघराज्य असे न करता ' राज्याचा संघ' या शब्दात केले आले आहे कारण -

I) भारताचे संघराज्य अमेरिकन संघराज्याप्रमाणे घटकराज्यांतील कराराद्वारे निर्माण झालेले नाही.
II) घटक राज्यांना संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही.

१) फक्त अ बरोबर
२) फक्त ब बरोबर
३) अ आणि ब दोन्ही बरोबर
४) अ आणि ब दोन्ही चूक

प्र. ६.  सध्या भारतीय राज्यघटनेत  (डिसेंबर २०१८) पर्यंत किती कलमे आहेत ?

१) कलम ४४४
२) कलम ३२४
३) कलम ३४४
४) कलम ४७४

प्र.७.  १९५० साली अंमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे भारत सरकारच्या कायद्यावर आधारित आहे?

१) भारत सरकार कायदा, १९३५
२) भारत सरकारचा कायदा, १८३३
३) भारत सरकारचा कायदा, १८५८
४) वरीलपैकी सर्व

प्र.८.  भारतीय संविधान सभेची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी झाली, त्याबद्दल खालील पैकी योग्य वाक्य  ओळखा.

अ ) सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील संविधान सभागृहात झाली.
ब ) हे सभागृह आज सेंट्रल हॉल या नावाने परिचित आहे.
क) पहिल्या बैठकीला ९ महिलांसह एकूण २०७ सदस्य उपस्थित होते.
ड) १९४६च्या उन्हाळ्यात या समितीची स्थापना झाली.

पर्याय
१) अ,ब,
२) अ,ब आणि क
३) अ,ब,क आणि ड
४) अ, ड

प्र. ९.  कोरोना इन्फेक्शनच्या उपचारांसाठी कोणत्या देशाने अलीकडे प्लाझ्माची ऑनलाइन उपलब्धता सुरू केली आहे?

१ ) भारत
२) अमेरिका
३) बांगलादेश
४) ब्राझील

प्र. १०  कोणत्या राज्य सरकारने नुकतीच पाचवीपर्यंतच्या मुलांसाठी ऑनलाईन वर्ग बंदी घातली आहे?

१) मध्य प्रदेश
२) कर्नाटक
३) ओडिशा
४) प. बंगाल

उत्तरे :
प्र. - १ - ४ . रवींद्रनाथ टागोर
प्र. - २ - २. इ.स १८७२
प्र. - ३ - २. १७.५%
प्र. - ४ - ४) वरील पैकी सर्व
प्र. - ५ - ३) अ आणि ब दोन्ही बरोबर
प्र. - ६ - १) कलम ४४४
प्र. - ७ - १) भारत सरकार कायदा, १९३५
प्र. - ८ - ३) अ,ब,क आणि ड
प्र. - ९ - ३) बांगलादेश
प्र. - १० - २) कर्नाटक

वॉरन हेस्टिंग्स (जन्म: 1732- मृत्यू : 1818)

हैस्टिंग्ज बंगालचा प्रथम गव्हर्नर जनरल(1774-1785)

भारतात गव्हर्नर-जनरल पदाची निर्मिती रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट 1773 कायद्यानुसार झाली. त्यावेळी बंगाल प्रांत असल्याने न्यायालयाने नियुक्त संचालक मंडळाने अर्थात, ईस्ट इंडिया कंपनीच्या न्यायालयाने गव्हर्नर जनरल या पदाची निर्मिती केली.

🔶1] बंगालमध्ये द्विदल राज्यपद्धती थांबवली (ज्याची ओळख रॉबर्ट क्लाइव्ह यांनी केली होती).

🔶2] टांकसाळ मुर्शिदाबाद वरून कोलकाताला हलवली.

🔶3] जेम्स ऑगस्टस हिकीचे बंगाल गॅझेट - 1780 पहिले भारतीय वृतपत्र प्रसिद्ध

🔶4] कलेक्टर पदाची निर्मिती

🔶5] महाभियोगाचा खटला चालविण्यात आलेला पहिला गव्हर्नर जनरल.(पहिल्या रोहिल्ला युद्धामध्ये त्याच्या सहभागाचा परिणाम म्हणून)

🔶6] कलकत्ता मदरसा (अलिया विद्यापीठ) ची स्थापना केली.

🔶7] फोर्ट विल्यम येथे सर्वोच्च न्यायालयची स्थापना झाली

🔶8] भगवद गीतेचे इंग्रजीत भाषांतर चार्ल्स विकिन्सन

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

प्रमुख पुरुस्कार एवं सम्मान

प्रश्‍न 1- ज्ञानपीठ पुरस्‍कार किस क्षेत्र वालों को दिया जाता है-
उत्‍तर - साहित्‍य

प्रश्‍न 2- 'अर्जुन पुरस्‍कार' किससे संबंधित है-
उत्‍तर - खेलकूद

प्रश्‍न 3- किस क्षेत्र में असाधारण योगदान के लिए शांतिस्‍वरूप भटनागर पुरस्‍कार दिया जाता है-
उत्‍तर - विज्ञान

प्रश्‍न 4- ग्रैमी पुरस्‍कार किस क्षेत्र में दिया जाता है-
उत्‍तर - संगीत

प्रश्‍न 5- 'नॉर्मन बोरलोग पुरस्‍कार' किस क्षेत्र में दिया जाता है-
उत्‍तर - कृषि

प्रश्‍न 6- राष्‍ट्रीय एकता पर बनी सर्वोत्‍तम फीचर फिल्‍म को किस पुरस्‍कार से सम्‍मानित किया जाता है-
उत्‍तर - नरगिस दत्‍त पुरस्‍कार

प्रश्‍न 7- 'रैमन मैग्‍सेसे पुरस्‍कार' किस देश द्वारा प्रदान किया जाता है-
उत्‍तर - फिलीपींस

प्रश्‍न 8- पुलित्‍जर पुरस्‍कार किस क्षेत्र में प्रदान किया जाता है-
उत्‍तर - पत्रकारिता

प्रश्‍न 9- कलिंग पुरस्‍कार दिया जाता है-
उत्‍तर - विज्ञान को लोकप्रिय बनाने के लिए

प्रश्‍न 10- किन उपलब्धियों के लिए 'ग्‍लोबल 500' पुरस्‍कार प्रदान किये जाते हैं-
उत्‍तर - पर्यावरण प्रतिरक्षा

प्रश्‍न 11- धन्‍वन्‍तरी पुरस्‍कार किस क्षेत्र में प्रदान किया जाता है-
उत्‍तर - चिकित्‍सा क्षेत्र

प्रश्‍न 12- 'सरस्‍वती सम्‍मान' किस क्षेत्र में दिया जाता है-
उत्‍तर - साहित्‍य

प्रश्‍न 13- नोबेल पुरस्‍कार की स्‍थापना किस देश ने की थी-
उत्‍तर - स्‍वीडन

प्रश्‍न 14- 'नोबेल पुरस्‍कार' किसकी स्‍मृति में दिये जाते हैं-
उत्‍तर - अल्‍फ्रेड नोबेल

प्रश्‍न 15- 'ज्ञानपीठ पुरस्‍कार' कब से प्रदान किया जा रहा है-
उत्‍तर - 1965 से

प्रश्‍न 16- खेल प्रशिक्षकों के लिए 'द्रोणाचार्य पुरस्‍कार' किस वर्ष स्‍थापित किया गया-
उत्‍तर - 1985 ई.

प्रश्‍न 17- 'नोबेल पुरस्‍कार' कब आरंभ किए गए-
उत्‍तर - 1901 ई.

प्रश्‍न 18- भारत रत्‍न और अन्‍य राष्‍ट्रीय सम्‍मान का आरंभ कब हुआ-
उत्‍तर - 1954 में

प्रश्‍न 19- सी.वी. रमन को किस वर्ष नोबेल पुरस्‍कार मिला था-
उत्‍तर - 1930 में

प्रश्‍न 20- मैन बुकर पुरस्‍कार के लिए किन देशों के लेखकों पर विचार किया जाता है-
उत्‍तर - राष्‍ट्रमंडल और आयरलैंस से अंग्रेजी के लेखक

प्रश्‍न 21- अर्थशास्‍त्र में नोबेल पुरस्‍कार किसने स्‍थापित किया था-
उत्‍तर - स्‍वीडन का सेंट्रल बैंक

प्रश्‍न 22- ज्ञानपीठ पुरस्‍कार प्राप्‍त करने वाली पहली महिला कौन थी-
उत्‍तर - आशापूर्णा देवी

प्रश्‍न 23- के.के. बिड़ला फाउण्‍डेशन द्वारा 1992 में साहित्‍य के क्षेत्र में उत्‍कृष्‍ट योगदान के लिए किस सम्‍मान की स्‍थापना की गई-
उत्‍तर - सरस्‍वती सम्‍मान

प्रश्‍न 24- 'व्‍यास सम्‍मान' किस क्षेत्र में दिया जाता है-
उत्‍तर - साहित्‍य

प्रश्‍न 25- तानसेन सम्‍मान किस राज्‍य सरकार ने शुरू किया है-
उत्‍तर - मध्‍य प्रदेश

प्रश्‍न 26- दादा साहब फाल्‍के पुरस्‍कार सर्वप्रथम किसे मिला-
उत्‍तर - श्रीमति देविका रानी

प्रश्‍न 27- 'मैग्‍सेसे पुरस्‍कार' से सम्‍मानित होने वाले प्रथम भारतीय है-
उत्‍तर - आचार्य विनोबा भावे

प्रश्‍न 28- रविन्‍द्र नाथ टैगोर को साहित्‍य के क्षेत्र में किस वर्ष नोबेल पुरस्‍कार दिया गया-
उत्‍तर - 1913 में

प्रश्‍न 29- सी.वी. रमन को किस वर्ष नोबेल पुरस्‍कार दिया गया-
उत्‍तर - 1930 में

प्रश्‍न 30- प्रो. अमर्त्‍य सेन को किस वर्ष अर्थशास्‍त्र का नोबेल पुरस्‍कार दिया गया-
उत्‍तर - 1998 में

प्रश्‍न 31- सुब्रह्मण्‍यम चन्‍द्रशेखर को किस क्षेत्र में नोबेल पुरस्‍कार मिला-
उत्‍तर - भौतिकी

प्रश्‍न 32- अर्थशास्‍त्र के क्षेत्र में नोबेल पुरस्‍कार किस वर्ष से प्रदान किए जा रहे हैं-
उत्‍तर - 1969 से

प्रश्‍न 33- 'एशियाई नोबेल पुरस्‍कार' के नाम से जाना जाता है-
उत्‍तर - रैमन मैग्‍सेसे पुरस्‍कार

प्रश्‍न 34- 'दादा साहेब फाल्‍के पुरस्‍कार' प्रदान किया जाता है-
उत्‍तर - सूचना एवं प्रसारण मंत्रालय, भारत सरकार द्वारा

प्रश्‍न 35- 'ऑस्‍कर पुरस्‍कार' प्रदान किया जाता है-
उत्‍तर - नेशनल अकादमी ऑफ मोशन पिक्‍चर ऑर्ट्स एण्‍ड साइंसेज द्वारा

प्रश्‍न 36- ज्ञानपीठ पुरस्‍कार प्राप्‍त करने वाला प्रथम हिन्‍दी लेखक कौन था-
उत्‍तर - सुमित्रानंदन पंथ

प्रश्‍न 37- सरस्‍वती सम्‍मान के प्रथम प्राप्‍तकर्ता हैं-
उत्‍तर - हरिवंश राय बच्‍चन

प्रश्‍न 38- 'भारत रत्‍न' से विभूषित प्रथम विभूति है-
उत्‍तर - डॉ. एस. राधाकृष्‍णन

प्रश्‍न 39- मरणोपरान्‍त भारतरत्‍न पुरस्‍कार से सर्वप्रथम किसे सम्‍मानित किया गया था-
उत्‍तर - लाल बहादुर शास्‍त्री

प्रश्‍न 40- 'भारत रत्‍न' से विभूषित प्रथम विदेशी है-
उत्‍तर - खान अब्‍दुल गफ्फार खान

━━━━━━━━━━━━━━━━━

१८ मार्च २०२२

ग्रामपंचायत

महराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या पंचाची संख्या लोकसंख्येवरून ठरविण्यात येते ती खालीलप्रमाणे

लोकसंख्या  –  पंचाची संख्या
600 ते 1500   –  7
1501 ते 3000   – 9
3001 ते 4500  – 11
4501 ते 6000  – 13
6001 ते 7500  – 15
7501 ते पेक्षा जास्त  -17

ग्रामपंचायतीमध्ये महिलासाठी 50% जागा राखीव असतात.
ग्रामपंचायतीमध्ये इतर मागासवर्गीयासाठी 27% जागा राखीव असतात.
ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमातीच्या लोकांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव असतात ही संख्या निश्चित करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्‍याला असतो.
संबंधीत गावातील सहकारी सोसायटीचा अध्यक्ष ग्रामपंचायतीचा सहयोगी सभासद असतो.
महाराष्ट्रात 1 जून 1959 पासून ‘मुंबई ग्रामपंचायत अधिनियम’ लागू करण्यात आला.
ग्रामपंचायतीचा अध्यक्ष हा सरपंच असतो.
सरपंचाची निवड निवडून आलेल्या सदस्यामधून केली जाते तसेच त्यातूनच एकाची उपसरपंच म्हणून निवड केली जाते.
सरपंच व उपसरपंच निवडीची बैठक तहसीलदार बोलवितो व तोच त्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवितो.
ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराचे वय 21 वर्षे पूर्ण झालेले असावे लागते.
ग्रामपंचायतीची निवडणूक दर 5 वर्षांनी होते म्हणजेच ग्रामपंचायतीच्या कालावधी 5 वर्षाचा असतो.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभे राहण्यास अनामत रक्कम – 500 रु. राखीव जागेसाठी – 100 रु.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या शिफारशीनुसार राज्यशासन ग्रामपंचायतीचा कार्यकाल 6 महीने वाढवू शकते.
ग्रामपंचायतीच्या बैठका महिन्यापासून एक म्हणजेच वर्षातून 12 बोलवाव्या लागतात.
ग्रामपंचायतीच्या पंचास व उपसरपंचास सरपंचाकडे राजीनामा द्यावा लागतो तर सरपंच पंचायत समितीच्या सभापतीकडे राजीनामा देतो.
सरपंचावर अविश्वासाचा ठराव आणण्यासाठी एकूण सदस्याच्या 1/3 सदस्यांनी लेखी मागणी करावी लागते तर तो ठराव पास होण्यासाठी एकूण सदस्यांच्या 2/3 सदस्यांनी तो ठराव पास करावा लागतो.
महिला सरपंचावर अविश्वास ठराव पास होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते.
एकदा अविश्वास ठराव फेटाळला गेल्यास दुसरा अविश्वास ठराव कमीत कमी 1 वर्षे आणता येत नाही.
सरपंच किंवा उपसरपंच यांच्या निवडीबाबत काही विवाद निर्माण झाल्यास 15 दिवसाच्या आत सदरहू विवाद जिल्हाधिकार्‍याकडे सोपविता येतो. तसेच जिल्हाधिकार्‍याने दिलेल्या निर्णयावर निर्णय दिलेल्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत विभागीय आयुक्ताकडे अपिल करता येते.
सरपंच किंवा उपसरपंचावरील अविश्वासाच्या ठरावाची बैठक तहसीलदार बोलावितो व तोच त्या बैठकीचा अध्यक्ष असतो.
सरपंच हा ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो.
ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनास आहे.
जर एखाद्या ग्रामपंचायतीमधील एकूण सदस्य संख्येच्या निम्म्यापेक्षा अधिक पदे रिक्त असतील तर राज्यशास्त्र ग्रामपंचायत बरखास्त करू शकते.
सरपंच, उपसरपंच व पंचास अकार्यक्षता, गैरवर्तन, कर्तव्य पार पाडण्यास असमर्थता इत्यादी कारणाने पदावरून दूर करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीस आहे.
नवीन ग्रामपंचायत निर्माण करण्याचा अधिकार विभागीय आयुक्ताला असतो.
ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न 25,000 रु. पेक्षा कमी आहे. अशा ग्रामपंचायतीची हिशोब तपासणी जिल्हा परिषद करते आणि ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न 25,000 रु. पेक्षा जास्त आहे अशा ग्रामपंचायतीची हिशोब तपासणी लेखापाल, स्थानिक लोकनिधी मार्फत होते.
ज्या खेड्यातील अनुसूचीत जाती-जमातीची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 60% पेक्षा जास्त असते अशा गावातील सरपंच हा अनुसूचित जाती जमातीमधील असतो.
ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा दरमहा मानधन लोकसंख्येनुसार 750, 1125 व 1500 रु. मिळते, या मानधनाच्या 75% रक्कम राज्यशासन देते.
ग्रामपंचायतीच्या सदस्यांना दरमहा 200 रु. बैठक भत्ता मिळतो.
ग्रामपंचयातीमध्ये एकूण 79 विषय आहेत.
सरपंच किंवा उपसरपंचाविरुद्ध अविश्वासाची नोटिस तहसीलदारकडे द्यावी लागते.
जिल्हाधिकार्‍यास ग्रामपंचायतीचा ठराव रोखण्याचा अधिकार असतो.
सरपंच व उपसरपंच ही दोन्ही पदे एकाच वेळी रिकामी झाल्यास गामसेवक हा हंगामी सरपंच असतो.
ग्रामपंचायतीची रचना व कार्ये 1963 च्या कायद्याने नियंत्रित होतात.
न्यायपंचायतीचा कार्यकाल सर्वसाधारणपणे 3 ते 5 वर्षे एवढा असतो.
सरपंच व उपसरपंच यांना न्यायपंचायतीचे सभासद होता येत नाही.
न्यायपंचायत 100 रु. किंमतीचे दिवाणी दावे चालविते.
महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत – अकलूज
महाराष्ट्रीतील सर्वात जास्त उत्पन्न देणारी ग्रामपंचायत – नवघर
महाराष्ट्रातील सर्वात जास्त ग्रामपंचायती असणारा जिल्हा – सातारा
महाराष्ट्रात सर्वात कमी ग्रामपंचायती असणारा जिल्हा – सिंधुदुर्ग
ग्रामपंचायतीचे वॉर्ड निश्चित करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्‍यास असतो.

🌺☘🌺☘☘🌺☘🌺☘🌺☘🌺☘🌺

आजचे सराव प्रश्न


१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले
---------------------------------------------------
२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)
---------------------------------------------------
३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?
उत्तर -- आनंदीबाई जोशी
---------------------------------------------------
४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- लता मंगेशकर
--------------------------------------------------
५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
---------------------------------------------------
६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील
--------------------------------------------------
७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- कल्पना चावला
--------------------------------------------------
८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
--------------------------------------------------
९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- बचेंद्री पाल
--------------------------------------------------

१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?
उत्तर -- मीरा कुमार
--------------------------------------------------
११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?
उत्तर -- किरण बेदी
-------------------------------------------------
१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?
उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी
--------------------------------------------------
१३) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?
उत्तर -- प्रेमा माथूर
--------------------------------------------------
१४) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- पी. टी. उषा
--------------------------------------------------
१५) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नेमबाजी
--------------------------------------------------
१६) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?
उत्तर -- सुश्मिता सेन
--------------------------------------------------
१७)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?
उत्तर -- मदर तेरेसा
--------------------------------------------------
१८) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बॅडमिंटन
-------------------------------------------------
१९) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?
उत्तर -- लाॅन टेनिस
-------------------------------------------------
२०) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर -- बाॅक्सिंग
---------------------------------------------------

२१) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- तिरंदाजी
---------------------------------------------------
२२) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- जलतरण
---------------------------------------------------
२३) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बुध्दिबळ
---------------------------------------------------
२४) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- वेट लिफ्टिंग
---------------------------------------------------
२५) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?
उत्तर -- अनुताई वाघ
---------------------------------------------------
२६) विश्वसुंदरी किताब मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- सुश्मिता सेन
---------------------------------------------------
२७) ' सरिता गायकवाड ' कोणात्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- धावपटू
___

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...