२४ नोव्हेंबर २०२१

विज्ञान :- आजार आणि त्याचे विषाणू


● *गोवर (मिझल)* : गोवर विषाणू


● *इन्फ्लुएंझा (फ्ल्यू)* : Influenza virus (A,B,C)


● *कावीळ* : Antaro virus (A,B,C,D,E,G)


● *पोलिओ* : पोलिओ विषाणू


● *जापनीज मेंदूज्वर* : Arbo-virus


● *रेबिज* : लासा व्हायरस


● *डेंग्यू* : Arbo-virus


● *चिकुनगुन्या* : Arbo-virus


● *अतिसार* : Rata virus


● *एड्स* : H.I.V(Human, Immuno-defi-ciency Virus)


● *देवी* : Variola Virus


● *कांजण्या* : Varicella zoaster


● *सर्दी* : सर्दीचे विषाणू


● *गालफुगी* : Paramixo virus


● *जर्मन गोवर* : Toza virus


आग्नेय आशियात वर्चस्वाचा चीनचा हेतू नाही- जिनपिंग.

🔰आग्नेय आशिय़ात वर्चस्व प्रस्थापित करण्याचा चीनचा कोणताही हेतू नाही, असे प्रतिपादन चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी सोमवारी आसियान राष्ट्रे आणि चीन यांच्या विशेष बैठकीत केले. आसियान राष्ट्रे आणि चीन यांच्यातील संबंधांना ३० वर्षे झाल्याच्या निमित्ताने ही बैठक आयोजित केली आहे. ती आभासी पद्धतीने सुरू आहे.


🔰दक्षिण चिनी समुद्रात सध्या सुरू असलेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर जिनपिंग म्हणाले की, आमच्या छोटय़ा शेजारी देशांना त्रास देण्याचाही आमचा हेतू नाही. असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स अर्थात आसियान राष्ट्रांच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना त्यांनी हा निर्वाळा दिला.


🔰राजनैतिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीला म्यानमारचा प्रतिनिधी उपस्थित नाही. त्या देशातील पदच्युत नेत्या आंग सान सू ची यांना भेटण्याची परवानगी आसियानच्या दूताला नाकारण्यात आली होती. त्यामुळे तेथील लष्करशहा जनरल मिंग आंग लेंग यांना या परिषदेत सहभागी करून घेण्यास नकार देण्यात आला आहे.


🔰आग्नेय आशियात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चीनचे प्रयत्न सुरू असल्याबद्दल जगभरात चिंतेचा सूर व्यक्त होतो.  या आरोपाचे चीनने नेहमी खंडन करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषत: संपूर्ण दक्षिण चिनी समुद्रावर चीनने दावा सांगितला असून तो मलेशिया, व्हिएतनाम, ब्रूनेई आणि फिलिपाईन्स यांसारख्या आसियान देशांना मान्य नाही.

“प्रत्येक महिलेला महिन्याला १,००० रुपये देणार”, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा.

🔰दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये मोठी घोषणा केलीय.


🔰पजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार स्थापन झाल्यास पंजाबमधील १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक महिलेला महिन्याला १,००० रुपये देऊ, असं अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलंय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून आश्वासनांचं पाऊस पडताना दिसत आहे.


🔰अरविंद केजरीवाल म्हणाले, “जर २०२२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पंजाबमध्ये आपचं सरकार स्थापन झालं तर आम्ही १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक महिलेला दर महिन्याला १,००० रुपये देऊ. हे पैसे थेट महिलांच्या खात्यावर जमा होतील.


🔰एखाद्या कुटुंबात ३ महिला असतील तरीही प्रत्येक महिलेला १,००० रुपये मिळतील. कोणत्याही सरकारने महिला सबलीकरणासाठी राबवलेला हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम असेल.”

अभिनंदन वर्धमान यांना ‘वीरचक्र’ प्रदान; पाकिस्तानचं फायटर जेट पाडणाऱ्या अधिकाऱ्याचा सन्मान.

🔰भारतीय हवाई दलातील अधिकारी अभिनंदन वर्धमान यांना संरक्षण दलामध्ये दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च ‘वीरचक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. भारतीय वायुसेनेचे दिग्गज पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना नुकतीच ग्रुप कॅप्टन या पदावर बढतीही देण्यात आलीय.


🔰२०१९ साली भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी लाडऊ विमानांना पळवून लावताना २७ फेब्रुवारीच्या सकाळी आकाशात जो संघर्ष (डॉगफाइट) झाला त्यामध्ये वर्धमान यांनी पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ १६ फायटर विमान पाडले होते. त्यांनी दाखवलेल्या या शौर्यासाठी त्यांचा ‘वीरचक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अभिनंदन यांना सन्मानित करण्यात आलं.


🔰दशाचे रक्षण करताना उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सैन्य दलातील जवानांना परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीरचक्र ही पदके देऊन सन्मानित करण्यात येते.


🔰अभिनंदन यांनी पाकिस्तानवरुद्धच्या हवाई संघर्षादरम्यान दाखवलेल्या अतुलनीय शौर्याची दखल घेत त्यांच्या नावाची ‘वीरचक्र’साठी शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार आज म्हणजेच सोमवारी (२२ नोव्हेंबर २०२१ रोजी) राष्ट्रपती भवनामध्ये पार पडलेल्या समारंभामध्ये झाला सन्मान पुलवामात दहशतवाद्यांनी लष्काराच्या ताफ्यावर भयंकर हल्ला केला होता.

विनोद तावडे यांची भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती

🔰महाराष्ट्रातील भाजपाचे नेते विनोद तावडे यांना आता पक्षाकडून राष्ट्रीय स्तरावरील महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. विनोद तावडे यांची भाजपाकडून राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्यानंतर या पदावर नियुक्त होणारे विनोद तावडे हे महाराष्ट्रातील दुसरे नेते ठरले आहेत. तर, या अगोदर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी भाजपा अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे.


🔰दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या सक्रीय राजकारणातून काहीसे बाहेर पडल्यानतंर, आता विनोद तावडे यांना राष्ट्रीय स्तरावर कार्यकारिणीत महत्वपूर्ण स्थान मिळालेलं आहे. विनोद तावडे हे महाराष्ट्रातील जुने व संघाच्या मुशीत तयार झालेले भाजपाचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात.


🔰२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ज्या दिग्गज नेत्यांचे तिकीट भाजपाने कापलं होतं. त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे व विनोद तावडे यांचा समावेश होता. मात्र आता भाजपाकडून या दोन्ही नेत्यांचे पुर्नवसन केलं जात असल्याचं दिसत आहे. कारण, कालच बावनकुळे यांना विधानपरिषदचे तिकीट देण्यात आलं. त्यानंतर आज विनोद तावडे यांची राष्ट्रीय सस्तरावरील कार्यकारिणीत महत्वाच्या पदावर नियुक्ती केली गेली आहे.

प्रदूषणामुळे दिल्लीतील शाळा बंद

🔰दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता येथील शाळा प्रत्यक्ष उपस्थितीसाठी पुढील आदेशापर्यंत बंद राहतील; तर ऑनलाइन वर्ग आणि बोर्डाच्या परीक्षा सुरू राहतील, असे शिक्षण संचालनालयाने रविवारी जाहीर केले.


🔰हवेचा दर्जा रविवारी सकाळी ‘अतिशय वाईट’ होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सकाळी ९ वाजता हवेच्या दर्जाचा निर्देशांक (एअर क्वालिटी इंडेक्स- एक्यूआय) ३८२ इतका होता. शनिवारी २४ तासांतील सरासरी एक्यूआय ३७३ इतका होता.


🔰‘राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) आणि आसपासच्या भागांच्या हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाच्या पुढील आदेशांपर्यंत सर्व शाळा तत्काळ प्रभावाने बंद करण्याचे निर्देश पर्यावरण खात्याने दिले आहेत. त्यामुळे सर्व सरकारी व खासगी शाळा पुढील आदेशांपर्यंत बंद राहतील’, असे शिक्षण विभागाच्या अतिरिक्त संचालक रिता शर्मा यांनी सांगितले.


🔰तथापि, ऑनलाइन अध्यापन वर्ग आणि बोर्डाच्या परीक्षा यापूर्वी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार घेतल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीतील हवेच्या ढासळत्या गुणवत्तेच्या पार्श्वभूमीवर शाळा व इतर शैक्षणिक संस्था बंद करण्याची घोषणा दिल्ली सरकारने १३ नोव्हेंबरला केली होती. करोना महासाथीमुळे सुमारे १९ महिने बंद राहिल्यानंतर येथील शाळा १ नोव्हेंबरपासून उघडल्या होत्या.

युगांडा पॅरा-बॅडिमटन स्पर्धा - सुकांतला सुवर्ण

 🔰पीटीआय, कॅम्पाला भारताच्या सुकांत कदमने युगांडा आंतरराष्ट्रीय पॅरा-बॅडिमटन स्पर्धेत रविवारी सुवर्णपदक पटकावले, तर प्रमोद भगतने तीन रौप्य पदकांची कमाई केली.


🔰परुष एकेरीत जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या कदमने भारताच्या नीलेश गायकवाडचा ३८ मिनिटांत २१-१६, १७-२१, २१-१० असा पराभव केला. क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या भगतला मात्र अंतिम सामन्यांत झगडावे लागले.


🔰परुष एकेरीत भगतला सहकारी मनोज सरकारकडून १९-२१, १६-२१ असा पराभव पत्करावा लागला. मग पुरुष दुहेरीत भगत आणि सरकार जोडीने मोहम्मद अन्सारी आणि दीप बिसोयी जोडीकडून २१-१०, २०-२२, १५-२१ अशी हार पत्करली. त्यानंतर मिश्र दुहेरीत भगत आणि पलक जोशी जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ऋतिक रघुपती आणि मानसी जोशी जोडीने त्यांना २१-१९, २१-१६ असे नामोहरम केले.

तालिबानचे आता नविन फर्मान; महिला अभिनेत्रींसोबतच्या टीव्ही मालिका बंद करण्याच्या सूचना



🔰अफगाणिस्तानच्या तालिबान प्रशासनाने रविवारी नवीन ‘इस्लामिक मार्गदर्शक तत्त्वे’ जारी केली आहेत. त्यानुसार महिला अभिनेत्रींना देशातील टेलिव्हिजन वाहिन्यांवरील मालिकांमध्ये किंवा डेली सोपमध्ये अभिनय करता येणार नाही. तसेच अफगाणिस्तानच्या प्रसारमाध्यमांना दिलेल्या निर्देशात महिला टीव्ही पत्रकार त्यांचे वृत्तांकन करताना हिजाब परिधान करतील, असे म्हटले आहे. त्यामुळे आता तालिबानने नवे महिलांसाठी पुन्हा नविन नियम लागू केले आहेत.


🔰हा आदेश अफगाणिस्तान मंत्रालयाने सद्गुणांच्या प्रचारासाठी आणि दुर्गुणांच्या प्रतिबंधासाठी जारी केला आहे, असे तालिबानचे म्हणणे आहे. मंत्रालयाने टीव्ही चॅनेल्सना प्रेषित मुहम्मद किंवा इतर आदरणीय व्यक्ती दाखवणारे चित्रपट किंवा कार्यक्रम दाखवण्यासही मनाई केली आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते हकीफ मोहाजिर यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, “हे नियम नसून धार्मिक मार्गदर्शक तत्त्वे आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वे रविवारी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली.


🔰तालिबान सातत्याने दावा करत आहे की आपल्या नवीन राजवटीत महिलांनाही स्थान मिळेल, पण असे असूनही, महिलांवर अनेक निर्बंध जाहीर केले गेले आहेत. याशिवाय वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी आंदोलन करणाऱ्या अनेक अफगाण महिला पत्रकारांवर हल्ले आणि शोषण झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

UAE च्या राजकन्येनं ‘दहशतवादी’ म्हणत टीका केल्यानंतर पत्रकार सुधीर चौधरींना वक्त्यांच्या यादीतून वगळलं

🔰संयुक्त अरब अमिरातीमधील एका कार्यक्रमामधून भारतीय पत्रकार सुधीर चौधीर यांना वगळण्यात आलं आहे. देशाच्या राजकुमारी असणाऱ्या हेंड बिंत फैसल अल कासिम यांनी रविवारी सोशल नेटवर्किंगवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.


🔰राजकुमारी यांनी स्वत: शनिवारी सुधीर चौधरी यांना संयुक्त अरब अमिरातीमधील कार्यक्रमासाठी वक्ता म्हणून बोलवण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतलेला. सुधीर चौधरी हे वादग्रस्त व्यक्तीमत्व असून ते असहिष्णु दहशतवादी आहेत, अशा शब्दांमध्ये राजकुमारीने टीका केलेली.


🔰राजकुमारी यांनी ट्विटरवरुन सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, “सुधीर चौधरी यांना आबू-धाबी चार्टर्ड अकाऊंट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातील वक्ता म्हणून वगळण्यात आलं आहे.”


🔰राजकुमारींनी आपल्या ट्विटमध्ये एक पत्रही लिहिलं असून ते आयसीएआयच्या आबू-धाबीमधील शाखेच्या सदस्यांनी लिहिलं आहे. या पत्रामध्ये चौधरी यांना वक्ता म्हणून बोलवण्यावर आक्षेप घेण्यात आलाय. चौधरी हे प्रसिद्धी टीव्ही अँकर असले तरी त्यांच्याविरोधात खंडणी मागण्यापासून ते अनेक प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचा उल्लेख पत्रात आहे.

पहिला भारत-किर्गिझस्तान धोरणात्मक संवाद.

🔰26 ऑक्टोबर 2021 रोजी नवी दिल्ली येथे भारत आणि किर्गिझस्तान या देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयांमधील त्यांचा पहिला धोरणात्मक संवाद आयोजित करण्यात आला होता.


🔰या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केले तर किर्गिझस्तानचे नेतृत्व देशाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव लेफ्टनंट जनरल मारात इमानकुलोव्ह यांनी केले.


🔰दोनही पक्षांनी देशांसमोरील धोके आणि आव्हाने आणि प्रादेशिक सुरक्षा वातावरण, विशेषतः अफगाणिस्तान देशांमधील परिस्थिती याविषयी चर्चा केली.


🔴किर्गिझस्तान देश..


🔰किर्गिझस्तान (किर्गिझ प्रजासत्ताक) हा मध्य आशियातील एक भूपरिवेष्टित देश आहे. किर्गिझस्तानच्या उत्तरेला कझाकिस्तान, दक्षिणेला ताजिकिस्तान, पश्चिमेला उझबेकिस्तान आणि पूर्वेला चीन आहे. इ.स. 1191 सालापर्यंत किर्गिझस्तान हे सोव्हियत संघाचे एक प्रजासत्ताक होते. बिश्केक हे देशाचे राजधानी शहर आहे. ‘सोम’ हे देशाचे राष्ट्रीय चलन आहे.

भारताची ‘मिसाईल पॉवर’

एकात्मिक मार्गदर्शीत क्षेपणास्त्र विकास (इंटिग्रेटेड गाईडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम -आयजीएमडीपी) हा भारतीय लष्काराचा प्रकल्प आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करते. बॅलेस्टिक मिसाईलमधील संशोधनास भारताने 1960 च्या दशकात प्रारंभ केला. 


▪️पथ्वी-1


सरकारच्या आयजीएमडीपी कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेले पृथ्वी-1 हे भारताचे पहिले क्षेपणास्त्र होय. फेब्रुवारी 1988 साली सादर करण्यात आलेल्या या क्षेत्रपणास्त्राची क्षमता 150 कि.मी. इतकी होती. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र 1994 साली लष्करात दाखल झाले.


▪️अग्नि-1


अणवस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेले हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र. अग्नि मालिकेतील पहिले क्षेपणास्त्र 1983 मध्ये डीआरडीओने सादर केले. याची मारक क्षमता 700 कि.मी. इतकी होती.


▪️आकाश


जमिनीवर आकाशात मारा करणार्‍या आकाशची क्षमता 30 कि.मी. इतकी असून एकाच वेळी अनेक लक्ष्यही भेदता येते. भारतीय लष्कर आणि हवाई दलासाठी याचा वापर केला जातो. 1997 साली याची पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र पूर्णपणे रडारद्धारा संचालित केले जाते.


▪️नाग


रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची तिसरी पिढी म्हणजे ‘नाग’ होय. याची क्षमता 3 ते 7 कि.मी. इतकी आहे. रात्रीदेखील अचूक लक्ष्य भेदण्याची क्षमता या ‘नाग’मध्ये आहे. ‘नाग’चा उपयोग हेलिकॉप्टरमध्येही केला जातो. 


▪️तरिशूल


जमिनीवरून आकाशात मारा करणारे ‘त्रिशूल’ एअरक्राप्ट जामरला उद्ध्वस्त करण्याचे काम करते. याची क्षमता 9 कि.मी. असून लढाऊ जहाजावर होणारे हल्ले रोखण्यासाठीही याचा उपयोग होतो.


▪️अग्नि 2


एप्रिल 1999 साली अग्नि-2 ची पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या ‘अग्नि’ ची क्षमता 2000 ते 2500 कि.मी. इतकी आहे. पारंपरिक आणि आधुनिक शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता यात आहे.


▪️पथ्वी 3


नौसेनेसाठी तयार करण्यात आलेले हे क्षेपणास्त्र 350 कि.मी.पर्यंत मारा करू शकते. याची चाचणी 2000 साली घेण्यात आली होती.


▪️बराह्मोस


भारत आणि रशियाद्धारे विकसित करण्यात आलेले हे आतापर्यंतचे सर्वात आधुनिक क्षेपणास्त्र आहे. ब्राह्मोसने भारताला क्षेपणास्त्र तंत्राज्ञाता अग्रेसर देश म्हणून ओळख मिळवून दिली. या सुपरसोनिक क्षेपणास्त्रात गती आणि अचूकतेचा जबरदस्त संगम आहे. भारताची ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाची मस्कवा यांच्या नावावरून ‘ब्राह्मोस’ हे नाव त्याला देण्यात आले आहे. 300 कि.मी.पर्यंतचे लक्ष्य भेदण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे.


▪️सागरिका


समुद्रातून लाँच करता येणारे पहिले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असून 750 कि.मी. पर्यंत लक्ष्य भेदता येते. 2008 साली याची पहिली चाचणी घेण्यात आली. अरिहंत या पाणबुडीसाठी हे खास तयार करण्यात आले.


▪️धनुष


पृथ्वी-2 या क्षेपणास्त्राचे हे छोटे रूप. समुद्रातील मार्‍यासाठी हे खास तयार करण्यात आले. मार्च 2011 साली लढाऊ जहाजांवरून याची यशस्वी चाचणी घेण्यात आली.


▪️अग्नि-3


अग्नि-2 ची ही सुधारित आवृत्ती असून मारक क्षमता 3500 ते 5000 कि.मी. इतकी मोठी आहे. शेजारील देशांमध्ये आतपर्यंत मारा अग्नि-3 करू शकते. 2011 साली लष्करात हे दाखल झाले.


▪️अग्नि-4


पहिल्या दोन अग्निची आणखी सुधारित आवृत्ती. पहिल्या दोन्ही क्षेपणास्त्रांपेक्षा वजनाने हलके, पण वाहक आणि मारक क्षमता जास्त.


▪️अग्नि-5


भारताचे पहिले आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र. 5000 कि. मी. पर्यंत क्षमता.


▪️निर्भया


जमीन, समुद्र आणि आकाश अशा तिन्ही ठिकाणहून हे क्षेपणास्त्र सोडता येते. ब्राह्मोसला सहाय्य म्हणूनही या क्षेपणास्त्राची ओळख आहे.


▪️परहार


जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे 150 कि.मी. क्षमता असलेल्या ‘प्रहार’ची 2011 साली पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. रोड मोबाईल लाँचरच्या मदतीने याचा मारा करता येतो. लष्कराला युद्धाच्या वेळी ‘प्रहार’चा चांगला उपयोग होतो.

रेझांग ला येथील युद्ध स्मारकाचे नूतनीकरण

🔰संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी पूर्व लडाखच्या रेझांग ला येथे नूतनीकरण केलेल्या युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले. याच ठिकाणी १९६२ मध्ये भारतीय जवानांनी चिनी सैन्याशी शौर्याने मुकाबला केला होता.  


🔰ह युद्ध स्मारक १३ कुमाऊँ  रेजिमेंटच्या शूर भारतीय सैनिकांना समर्पित आहे, ज्यांनी रेझांग लाच्या युद्धात चीनचा पराभव करताना आपल्या प्राणांची आहुती दिली.


🔰  ह स्मारक म्हणजे भारतीय सैन्याने दाखविलेल्या दृढनिश्चयाचे आणि अतीव धैर्याचे उदाहरण आहे, अशा शब्दांत सिंह यांनी स्मारकाचे वर्णन केले. ‘केवळ इतिहासाच्या पानांमध्ये अमर नाही, तर आपल्या हृदयातही कयम अमर राहील,’ असेही संरक्षणमंत्री म्हणाले.


🔰‘१८ हजार फूट उंचीवर लढलेल्या रेझांग लाच्या ऐतिहासिक युद्धाची आजही कल्पना करणे कठीण आहे. जगातील दहा सर्वात मोठय़ा आणि अतिशय आव्हानात्मक लष्करी संघर्षांपैकी एक रेझांग लाची लढाई मानली जाते. मेजर शैतान सिंग


🔰आणि त्यांचे सहकारी सैनिक ‘शेवटची गोळी आणि शेवटच्या श्वासापर्यंत’ लढले आणि शौर्य आणि बलिदानाचा नवा अध्याय लिहिला’, असे गौरवोद्गार सिंह यांनी काढले.

आता भारतातही करोना लसीचा तिसरा डोस दिला जाणार?; पुढील आठवड्यात तज्ज्ञांच्या समितीची बैठक

🔰करोना लसीचे बूस्टर शॉट्स देण्याची प्रक्रिया अनेक देशांमध्ये सुरू झाली आहे तर अजूनही अनेक देशांमध्ये यावर विचार केला जात आहे. आता भारतातही दोन डोसनंतर तिसरा डोस देण्यात येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक होणार असून त्यात हा निर्णय घेतला जाणार आहे. भारतातील करोना लसीच्या तिसऱ्या डोसबाबत प्रशासन धोरण ठरवू शकते. भारतात, ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे अशा लोकांना अतिरिक्त शॉट म्हणून करोनाचा तिसरा डोस देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.


🔰यासंदर्भात एका अधिकाऱ्याने सीएनएन-न्यूज१८ ला दिलेल्या माहितीमध्ये देशातील लसीच्या तिसऱ्या डोसवर धोरणात्मक दस्तऐवज तयार करण्यासाठी तज्ञ गट काम करत आहे. तिसऱ्या लसीच्या डोसची सुरुवातीला बूस्टर डोसऐवजी अतिरिक्त डोस म्हणून शिफारस केली जाईल.


🔰नयूज१८ नुसार, ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत झाली आहे अशा लोकांना अतिरिक्त डोस दिले जातात, तर निरोगी लोकांना दुसरा डोस घेतल्यानंतर काही महिन्यांनंतर बूस्टर शॉट दिला जातो. कोणत्याही रोगामुळे कमी प्रतिकारशक्ती असलेले लोक सामान्य दोन-डोस कार्यक्रमाद्वारे पूर्णपणे संरक्षित नाहीत. त्यामुळे अशा लोकांना अतिरिक्त डोस देण्याची तयारी सुरू आहे. ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कर्करोगासारख्या रोगामुळे खराब झाली आहे ते दोन डोसच्या लसीकरणातून संरक्षित नाहीत. अशावेळी तिसरा डोस देणे महत्त्वाचे असते.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा ‘लाल सलाम’; पहिल्या पुस्तकाची केली घोषणा

🔰केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दंतेवाडामध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यावर पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. स्मृती इराणी यांनी या पुस्तकाला ‘लाल सलाम’ असे नाव दिले आहे. स्मृती इराणी यांनी ट्विटरवर या पुस्तकाची घोषणा केली आहे. तसचे हे पुस्तक अॅमेझॉनवरून प्री-ऑर्डर केले जाऊ शकते, असं त्यांनी ट्विटमध्ये सांगितलंय. स्मृती इराणी यांचे हे पुस्तक वेस्टलँड या प्रकाशन संस्थेने आणले आहे.


🔰समृती इराणी यांचे हे पुस्तक एप्रिल २०१० मध्ये दंतेवाडा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यापासून प्रेरित आहे. या हल्ल्यात ७६ जवान शहीद झाले होते. स्मृती इराणी म्हणाल्या की, “ही गोष्ट त्यांच्या मनात अनेक वर्षांपासून सुरू होती. मग मी ही कथा कागदावर उतरवण्याच्या इच्छेकडे दुर्लक्ष न करता लिहायला घेतली. मला आशा आहे की हे पुस्तक वाचणारे लोक पुस्तकाचा आनंद घेतील.”


🔰लाल सलाम हे पुस्तक विक्रम प्रताप सिंग नावाच्या तरुण अधिकाऱ्याच्या जीवनावर आहे. त्यात विक्रम प्रताप सिंग यांना राजकारण आणि भ्रष्टाचाराने ग्रासलेल्या व्यवस्थेचा कसा सामना करावा लागतो हे सांगितले आहे. प्रकाशनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात या पुस्तकाची माहिती देताना, नक्षलवादी आणि माओवादी बंडखोर भागात आव्हानांचा सामना करणाऱ्या अधिकाऱ्यांना या पुस्तकाच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली आहे. हे पुस्तक २९ नोव्हेंबरपासून वाचकांना उपलब्ध होणार आहे.

एसटीचे खासगीकरण - चाचपणीसाठी महामंडळाकडून खासगी संस्थेची नियुक्ती



🔰संपाचा तिढा कायम आता असताना एसटीचा खासगीकरणाकडे प्रवास सुरू असल्याचे संकेत आहेत. गेल्या काही वर्षांपासून तोटय़ात गेलेली एसटी नफ्यात आणण्यासाठी एसटीच्या खासगीकरणाचा पर्याय पुढे आला असून, याबाबत अभ्यास करण्यासाठी ‘केपीएमजी’ या खासगी संस्थेची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे. परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब आणि एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गुरुवारच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


🔰करोनाची साथ आणि निर्बंधांमुळे गेल्या वर्षांपासून प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर देणेही मंडळासाठी अवघड बनले. सणासुदीच्या काळात तरी उत्पन्न मिळेल, या आशेवर महामंडळ असतानाच ऐन दिवाळीत विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. त्यामुळे महामंडळाला प्रवासी उत्पन्नावर पाणी सोडावे लागले.


🔰गल्या चार वर्षांत घटलेली प्रवासी संख्या, करोनाच्या साथीचा फटका, संप आदींमुळे एसटीचे आर्थिक चाक आणखी खोलात रुतले. एसटीचे वार्षिक प्रवासी उत्पन्न सात ते आठ हजार कोटी रुपयांपर्यंत आहे. मात्र, त्या तुलनेने खर्च अधिक असल्यामुळे एसटीची आर्थिक स्थिती खालावत गेलीे. या पार्श्वभूमीवर एसटीला तोटय़ातून नफ्यात आणण्यासाठी महामंडळ पर्याय शोधू लागले असून, आता खासगीकरणाचा विचार करण्यात येत आहे.

गांधी-बोस स्वातंत्र्य लढय़ातील महान नायक ; नेताजींच्या कन्या अनिता बोस यांच्याकडून कंगनाला कानपिचक्या



🔰अभिनेत्री कंगना राणावत हिने महात्मा गांधी आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यावर टिप्पणी करून नवा वाद निर्माण केला आहे. स्वातंत्र्य लढय़ातील नेत्यांबद्दल अनादर दाखवणाऱ्या बेताल विधानांवर नेताजी बोस यांच्या कन्या अनिता बोस यांनी कंगनाला कानपिचक्या दिल्या.


🔰‘महात्मा गांधी आणि माझे वडील नेताजी बोस हे दोघेही देशाच्या स्वातंत्र्य लढय़ातील महान नायक होते’, असे मत अनिता बोस यांनी व्यक्त केले.कंगना राणावत हिने वृत्तपत्राच्या कात्रणाचा आधार घेत दावा केला की, नेताजी देशात परतले असते तर त्यांना ब्रिटिशांच्या ताब्यात देण्याची तयारी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि महमद अली जिन्ना यांनी एका ब्रिटिश न्यायाधीशाकडे दाखवली होती.. भगत सिंह यांना फाशी दिली पाहिजे असेही गांधीजींचे मत होते व त्यासंबंधी पुरावेही उपलब्ध असल्याचा दावा कंगनाने केला आहे. गांधीजी व नेताजी यांच्यावरील या दाव्यांना अनिता बोस यांनी कोणताही दुजोरा दिला नाही.


🔰महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांचे नाते गुंतागुंतीचे होते. नेताजींचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी असल्यामुळे नेताजींना आपल्या नियंत्रणात ठेवता येणार नाही, असे गांधीजींना वाटत होते. पण, हे लक्षात घेतले पाहिजे की, माझे वडील नेहमीच गांधीजींचे प्रशंसक राहिले.


🔰तयांनी गांधीजींचा आदर केला. स्वातंत्र्य लढय़ासाठी आपण करत असलेल्या कामाबद्दल गांधींजी काय म्हणत आहेत, हे नेताजी नेहमी जाणून घेण्यास उत्सुक असत. गांधीजी आणि नेताजी यांचे उद्दिष्ट एकच होते पण, त्यांचे मार्ग वेगवेगळे होते. त्यांच्यातील या मतभेदात पंडित नेहरूंना कोणाची बाजू घ्यायची नव्हती. पण, नंतर नेहरू गांधीवादी समर्थकांमध्ये सामील झाले, असे अनित बोस यांनी ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

चंद्राभोवती फिरणाऱ्या चांद्रयान २ ची टक्कर टळली


🔰इस्त्रोचे चांद्रयान २ हा उपग्रह ऑगस्ट २०१९ पासून सुमारे १०० किलोमीटर उंचीवरुन चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे. चांद्रयान २ वर असलेल्या विविध उपकरणांच्या माध्यमातून चंद्राबद्दलची विविध माहिती ही गोळा केली जात आहे. तर नासाचा Lunar Reconnaissance Orbiter (LRO) हा उपग्रह जून २००९ पासून चंद्राभोवती २० किलोमीटर ते १८०० किलोमीटर अशा लंब वर्तुळाकार कक्षेत फिरत चंद्राचा अभ्यास करत आहे. हे दोन्ही उपग्रह चंद्राच्या उत्तर ध्रुवावरुन जात असतात. मात्र या दोन्ही उपग्रहांची टक्कर होणार होती.


🔰चद्राभोवती फिरणाऱ्या नासाच्या आणि इस्त्रोच्या या उपग्रहांची टक्कर ही २० ऑक्टोबरला भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ११ वाजुन १५ मिनीटांनी होणार होती. यावेळी या दोन्ही उपग्रहांच्या कक्षेमध्ये १०० मीटरपेक्षा कमी अंतर असणार होते. या उपग्रहांचा आकार आणि सोलर पॅनेलचा विस्तार बघता ही टक्कर अटळ होती.


🔰अर्थात नासा आणि इस्त्रो या अवकाश संस्थांना हा संभाव्य धोका काही दिवस आधीच लक्षात आला. दोन्ही संस्थांनी चर्चा केल्यावर इस्त्रोने चांद्रयान २ ची कक्षा बदलण्याचा निर्णय घेतला. तेव्हा १८ ऑक्टोबरला म्हणजे संभाव्य टक्कर होण्याच्या दोन दिवस आधीच इस्त्रोने चांद्रयान २ च्या कक्षेत बदल केला आणि चंद्राच्या भोवती उपग्रहांची होणारी टक्कर ही टाळण्यात आली.


🔰पथ्वीभोवती काही हजार उपग्रह हे फिरत आहेत. तेव्हा उपग्रहांवर सातत्याने नजर ठेवावीच लागते. अनेकदा दोन उपग्रहांमध्ये टक्कर होऊ नयेत म्हणून उपग्रहांच्या कक्षेत बदल केला जातो. मात्र पहिल्यांदाच अशा प्रकारे उपग्रहाच्या कक्षेत तेही चंद्राभोवती फिरणाऱ्या उपग्रहाबाबत बदल करण्याची वेळ इस्त्रोवर आली.

२३ नोव्हेंबर २०२१

GENERAL KNOWLEDGE

महाराष्ट्रातील कांही वैशिष्टय़े असलेल्या जिल्ह्यांची नावे

🔶भारताचे प्रवेशद्वार
मुंबई

🔶भारताची आर्थिक राजधानी
मुंबई

🔶महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा
मुंबई शहर

🔶महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार
रायगड

🔶महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा
रायगड

🔶मुंबईची परसबाग
नाशिक

🔶महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा
रत्नागिरी

🔶मुंबईचा गवळीवाडा
नाशिक

🔶द्राक्षांचा जिल्हा
नाशिक

🔶आदिवासींचा जिल्हा
नंदूरबार

🔶महाराष्ट्रातील कापसाचे शेत
जळगाव

🔶महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा
यवतमाळ

🔶संत्र्याचा जिल्हा
नागपूर

🔶महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ
अमरावती

🔶जंगलांचा जिल्हा
गडचिरोली

🔶महाराष्ट्रातील केळीच्या बागा
जळगाव

🔶साखर कारखान्यांचा जिल्हा
अहमदनगर

🔶महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार
सोलापूर

🔶महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा
कोल्हापूर

🔶कुस्तीगिरांचा जिल्हा
कोल्हापूर

🔶लेण्यांचा जिल्हा
औरंगाबाद

🔶महाराष्ट्रातील बावन्न दरवाजांचे शहर
औरंगाबाद

🔶महाराष्ट्रातील जुन्या मराठी कवींचा जिल्हा
बीड

🔶महाराष्ट्रातील भवानी मातेचा जिल्हा
उस्मानाबाद

🔶महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा
नांदेड

🔶देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा
अमरावती.

--------------------------------------

२२ नोव्हेंबर २०२१

भारत-चीन संबंधांत सध्या सर्वाधिक कटूता - परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची कबुली



भारत आणि चीन यांच्या संबंधांचा सध्या सर्वात कटुकाळ आहे. चीनने करारांचे उल्लंघन करणाऱ्या काही कृती केल्या आहेत, ज्यासाठी त्याच्याकडे कुठलेही विश्वासार्ह स्पष्टीकरण नाही. आपल्याला द्विपक्षीय संबंध कुठे न्यायचे आहेत याचे उत्तर आता चिनी नेतृत्वालाच द्यायचे आहे, असे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी सांगितले.


शांतता राखण्यासाठी पूर्व लडाखमधील सैन्यमाघारीच्या प्रक्रियेची प्रगती आवश्यक असून, सर्वंकष द्विपक्षीय संबंधांच्या विकासाचा तो आधार आहे, असे भारताने चीनला सांगितले आहे.


पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवरील उर्वरित मुद्द्यांवर लवकर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय करारांचे पूर्णपणे पालन करून काम करायला हवे, यावर जयशंकर यांनी १६ सप्टेंबरला ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बेमध्ये आपले चिनी समपदस्थ वांग यी यांच्यासोबत झालेल्या यापूर्वीच्या बैठकीत भर दिला होता.


‘आपले संबंध नक्की कसे आहेत आणि त्यात काय योग्य घडलेले नाही याबद्दल चीनला काही शंका असेल असे मला वाटत नाही. माझे समपदस्थ वांग यी यांना मी अनेकदा भेटलो आहे. तुम्ही अनुभव घेतलाच असेल, की मी पुरेसा स्पष्ट बोलतो आणि त्यात काही संदिग्धता नसते.


त्यामुळे त्यांना ऐकायची इच्छा असेल तर त्यांनी ते ऐकले असेल याची मला खात्री आहे,’ असे ‘ग्रेटर पॉवर कॉम्पिटिशन : दि इमर्जिंग वर्ल्ड ऑर्डर’ या विषयावर सिंगापूरमधील ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमिक फोरम येथे आयोजित करण्यात आलेल्या गटचर्चेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात जयशंकर यांनी सांगितले.

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे



21) भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?

उत्तर : जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड


22) जिम कार्बेटचे जुने नाव काय होते?

उत्तर : हेली नॅशनल पार्क


23) भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कोठे आहेत?

उत्तर : मध्यप्रदेश


24) भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

उत्तर : हिमिस (3568 किलोमीटर, जम्मू आणि काश्मीर)


25) मेळघाट अभयारण्य ची स्थापना केव्हा झाली होती?

उत्तर : 1973


26) नागार्जुन सागर या वाघ अभयारण्याची स्थापना केव्हा झाली होती?

उत्तर : 1982


27) राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे पहिले विजेते कोण आहेत?

उत्तर : विश्वनाथन आनंद


28) राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार याची पहिली महिला विजेती कोण आहे?

उत्तर : कर्णम मल्लेश्वरी


29) राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे स्वरूप काय आहे?

उत्तर : 25 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र


30) हरितक्रांती कशासाठी करण्यात आली होती?

उत्तर : अन्नधान्य उत्पादनात वाढ करण्यासाठी.


31) टीझर गनचा (Tasar Gun) वापर करणारे पहिले पोलीस राज्य कोणते?

उत्तर : गुजरात


32) वाचन यादीमध्ये (Reading List) व्हिडिओ गेम जोडणारा पहिला देश कोणता?

उत्तर : पोलंड


33) अरब देशातील पहिली अणुभट्टी कोणती?

उत्तर : संयुक्त अरब अमिरात


34) भारतातील पहिले ड्रॅगन हे रक्ताळणारे झाड (blood-oozing tree) कोणते?

उत्तर : आसाम


35) तीन राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते?

उत्तर : आंध्रप्रदेश


36) रेल्वेने थेट ओव्हरहेड लाइन उर्जा देण्यासाठी जगातील पहिला सौर उर्जा प्रकल्प तयार करणारा प्रकल्प कोणता?

उत्तर : भारत


37) वनविभागाचा पहिले लायकेन पार्क कोणते?

उत्तर : उत्तराखंड


38) मंगळ मोहीम आखणारा पहिला अरब देश कोणता?

उत्तर : संयुक्त अरब अमिराती


39) जगातील पहिले गोल्ड प्लेटेड (सोन्याचा मुलामा) हॉटेल कोणते?

उत्तर :- हनोई, व्हिएतनाम


40) आशियातील पहिले अखंड गॅल्वनाइज्ड रेबर उत्पादन सुविधा कोठे आहे?

उत्तर : गोविंदगड, भुतान

Daily Question


कोणत्या दिवशी “जागतिक विकास माहिती दिवस” साजरा करतात?


(A) 22 ऑक्टोबर

(B) 23 ऑक्टोबर

(C) 24 ऑक्टोबर ✅✅

(D) 25 ऑक्टोबर


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या संस्थेने “गरुड” अॅप तयार केले?


(A) राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग

(B) राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग

(C) संघ लोकसेवा आयोग

(D) भारतीय निवडणूक आयोग ✅✅


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणती व्यक्ती "द ऑरिजिन स्टोरी ऑफ इंडियाज स्टेट्स" हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहे?


(A) झुम्पा लाहिरी

(B) वेंकटराघवन सुभा श्रीनिवासन ✅✅

(C) चेतन भगत

(D) यापैकी नाही


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या दिवशी “आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी दिवस” साजरा करतात?


(A) 24 ऑक्टोबर ✅✅

(B) 23 ऑक्टोबर

(C) 22 ऑक्टोबर

(D) 21 ऑक्टोबर


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


गुजरातच्या कोणत्या जिल्ह्यात 'बन्नी' नावाच्या म्हैस-जातीच्या भारतातील पहिल्या IVF रेडकूचा जन्म झाला?


(A) जुनागड

(B) जामनगर

(C) गीर सोमनाथ ✅✅

(D) राजकोट


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या संस्थेने बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांसाठी (NBFCs) सुधारित स्तरनिहाय नियमन (SBR) कार्यचौकट निश्चित केली?


(A) IBPS

(B) SEBI

(C) NABARD

(D) RBI ✅✅


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या देशाने दहाव्या ‘जागतिक माध्यम आणि माहिती साक्षरता सप्ताह’ निमित्त जागतिक कार्यक्रमाचे आयोजन केले?


(A) दक्षिण आफ्रिका ✅✅

(B) दक्षिण कोरिया

(C) जपान

(D) भारत

चालू घडामोडी

 1. खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

अ.  केंद्र सरकारने लदाखसाठी नवीन राज्य सैनिक बोर्डाला मान्यता दिली आहे.

ब.  माजी सैनिक, युद्ध विधवा, विधवा, सेवारत कर्मचारी, केंद्रशासित प्रदेशातील त्यांचे आश्रित लोक यांच्या कल्याण आणि पुनर्वसनासाठी राज्य सैनिक मंडळ असेल.


1. फक्त अ

2. फक्त ब

3. अ आणि ब

4. यापैकी नाही


उत्तर-3


------------------------------------------------------------


2. कोणत्या राज्यसरकारने कैसर-ए-हिंद फुलपाखरू राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले आहे?


1. आसाम

2. नागालँड

3. मिझोराम

4. अरुणाचल  प्रदेश


उत्तर- 4


------------------------------------------------------------


3. राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ, पोलाद (NMDC) ने आपला 64 वा स्थापना दिवस कोणत्या ठिकाणी साजरा केला?


1. दिल्ली

2. कोलकत्ता

3. हैदराबाद

4. रांची


उत्तर-3


------------------------------------------------------------


4.

अ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक्सप्रेस वे चे उद्घाटन करण्यात आले.

ब. पूर्वांचल एक्सप्रेस वे हा सुमारे 341 किमी लांबीचा आहे,6 लेन रुंद,प्रवेश नियंत्रित एक्सप्रेस वे आहे.

वारीलपैकी अचूक विधान निवडा.


1. फक्त अ

2. फक्त ब

3. अ आणि ब

4. यापैकी नाही


उत्तर-3

------------------------------------------------------------


5. 16 नोव्हेंबर रोजी युनायटेड  नेशन्स एज्युकेशनल,सायंटिफिक आणि कल्चरल ऑर्गनायझेशन (युनेस्को) ने ........वा  वर्धापन दिन साजरा केला.


1. 70

2. 75

3. 77

4. 80


उत्तर-2


------------------------------------------------------------


6. खालीलपैकी कोणाची संयुक्त राष्ट्र संघाने भारतातील निवासी समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे.


1. टी. एस. तिरुमुर्ती

2. अंटॉनियो गुटेरस

3. शोंबी शार्प

4. एकही नाही


उत्तर-3


------------------------------------------------------------


7. आरबीआय ने ठेवी घेणाऱ्या NBFCs ला .......किंवा अधिक शाखांसह सहा महिन्यात अंतर्गत लोकपाल नियुक्त करणे अनिवार्य केले आहे.


1. 5

2. 8

3. 10

4. 15


उत्तर-10


------------------------------------------------------------


8. नोव्हेंबर 2021 दरम्यान SITMEX-21  च्या तिसऱ्या आवृत्तीत कोणत्या देशाच्या सैन्याने भाग घेतला आहे.?


1. सिंगापूर, भारत

2. थायलंड, सिंगापूर

3. थायलंड,सिंगापूर, भारत

4. भारत,सिंगापूर


उत्तर-3


------------------------------------------------------------


9. पृथ्वीच्या कक्षेतील उपग्रहांशी  जोडण्यासाठी कोणत्या  कंपनीने एक नवीन लहान डिश लॉन्च केली आहे?


1. अमेझॉन

2. इस्रो

3. नासा

4. स्पेसएक्स


उत्तर-4


------------------------------------------------------------


10. नोव्हेंबर 2021 मधील 44 वा बांग्ला उत्सव कोणत्या राज्यात सुरू झाला?


1. मेघालय

2. आसाम

3. नागालँड

4. बांग्लादेश


उत्तर-1


जगातील देश व खंड यांचे टोपण नाव..



🔹आफ्रिका -- काळे खंड..


🔹ऑस्ट्रेलिया -- कांगारूंचा देश व खंडद्वीप..


🔹बहरीन -- मोत्यांची बेटे..


🔹बल्जीयम -- युरोपची रणभूमी..


🔹कनडा -- मॅपल वृक्षांचा देश, लिलीचा देश..


🔹कयुबा -- अँटिलिसचा मोती, साखरेचे कोठार..


🔹इजिप्त -- नाईलची देणगी..


🔹नॉर्वे -- मध्यरात्रीच्या सूर्याचा देश..


🔹फिनलँड -- सरोवराचा देश..


🔹मयानमार -- पॅगोडाचा देश..


🔹जपान -- उगवत्या सूर्याचा देश..


🔹झांझिबार -- लवंगाचे बेट..


🔹नयूझीलंड -- दक्षिण गोलार्धातील इंगलंड..


🔹पलेस्टाईन -- पवित्र भूमी..


🔹आयरलँड व श्रीलंका -- पांचूची बेटे..


🔹रवांडा -- आफ्रिकेचे स्वित्झर्लंड..


🔹सवित्झर्लंड -- युरोपचे क्रीडांगण..


🔹थायलंड -- पांढऱ्या हत्तीचा देश..


🔹बाल्कन देश -- युरोपचा सुरुंग..


🔹तरिस्तन डा कन्हा -- जगातील एकाकी बेट..


🔹अमेरिका -- सूर्यास्ताचा देश..


🔹जपान -- पॅसिफिक महासागरातील इंग्लंड..


🔹परेअरी प्रदेश -- जगाचे धान्याचे कोठार..


🔹यक्रेन -- युरोपचे गव्हाचे कोठार..


Online Test Series

संपूर्ण मराठी व्याकरण महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द:

उदय × अस्त
आदी × अनादी
किंकर,चाकर × मालक,धनी
मर्त्य × अमर
सकाम × निकाम
धुरीण × अनुयायी
रंक × राव,धनाढ्य
दीप्ती × अंधःकार
दुभती × भाकड
दैववाद × प्रयत्नवाद
तम,तिमिर × प्रकाश,उजेड
विनंती × ताकीद
जागृत × निद्रिस्त
तृप्त × अतृप्त
तजेलदार × कोमेजलेले
झकास × निकृष्ट
औत्सुक्य × औदासीन्य
आसक्ती × विरक्ती
औधत्य × नम्रता
कुकर्म × सत्कर्म
साव × चोर
अशांत × प्रशांत
दुष्ट × सुष्ट
सधवा × विधवा
सुलभ × दुर्लभ
सुवर्णयुग × तमोयुग
गद्य × पद्य
सक्षम × अक्षम
राजमार्ग × आडमार्ग
खोल × उथळ
आपुलकी × परकेपणा
आहेरे × नाहिरे
कुलटा × घरंदाज
कृपा × अवकृपा
प्रशंसा × कुचाळी
खम्बीर × डळमळीत
औरस × अनौरस
श्राव्य × अश्राव्य
नीटनेटका × गबाळयंत्री
टंचाई × रेलचेल
इष्टाग्रह × दुराग्रह
साकल्य × वैफल्य
साकार × निराकार
तारतम्य × अविवेक
आठवण × विसर, विस्मरण
उघड × गुप्त
सुविचार × अविचार
उद्योगी × आळशी
एकमत × दुमत
आक्षेप × निरसन
गुंता × उकल
संक्षिप्त,त्रोटक × इत्यंभूत
विन्मुख × उन्मुखी
खंडन × मंडन
सामूहिक × वैयक्तिक
वस्तुस्थिती × आभास
क्षणभंगुर × चिरकलीन
माजी × आजी,विद्यमान
श्रमजीवी × बुद्धिजीवी
स्वस्ताई × महागाई
गर्विष्ठ × निगर्वी
विधायक × विध्वंसक
भरती × ओहोटी
हर्ष × खेद
साकार × निराकार
सकाम × निष्काम
चढाई × माघार
खंडित × अव्याहत
परिक्ष × अपरिक्ष
आडकाठी × मोकळी
सत्य × मिथ्या, मिथ्य
छाया × पडछाया
ग्राह्य × त्याज्य
हीन × दर्जेदार
राग × अनुराग
आमंत्रित × अनाहूत,आंगतूक
सह्य × असह्य
बंडखोर × शांत
कीर्ती × अपकीर्ती
इच्छा × अनिच्छा
सदाचरण × दुराचरण
उपलब्ध × अनुपलब्ध
इप्सित × अवांच्छित
उत्तेजन × खच्चीकरण
प्रसन्न × उद्विग्न
उल्लड × पोक्त
कृष्ण × धवल
अर्थ × अर्थहीन
अंतरंग × बहिरंग
इहलोक × परलोक
उदार × अनुदार
तन्मय × द्विधा
समदर्शी × पक्षपाती
कळस × पाया, पायरी
ओवळा × सोहळा
गच्च × सैल,विरळ
उपाय × निरुपाय
गतकाल × भविष्यकाळ
शंका × कुशंका
विवाद × निर्विवाद
वेध × निर्वेध
सुबोध ×  दुर्बोध
वियोग × संयोग,मिलन
सन्मार्ग × कुमार्ग
लौकिक × दुलौकीक
रुकार × नकार
ऐलतीर × पैलतीर
भोग × त्याग
आवक × जावक
हलकी × अवजड
कुचकामी × फलदाई
उदंड × कमी
स्वार्थ × परमार्थ
क्षम्य × अक्षम्य
संकुचित × व्यापक
श्रुत × अश्रुत
स्मृती × विस्मृती
सनातनी × सुधारक
सक्ती × खुषी
क्षेम × धोका
क्षर × अक्षर
स्वतंत्र × परतंत्र्य
स्वातंत्र्य × पारतंत्र्य
सुरस × नीरस
स्थूल × सूक्ष्म,कृश
पौर्वात्य × पाश्चात्य, पाश्चिमात्य
तारक × मारक
अवधान × अनावधान
अजस्त्र × चिमुकले
स्वीकार × अव्हेर
याचित × आयाचित
उत्कर्ष × अपकर्ष
कला × पांढरा, गोरा
नक्कल × अस्सल
गंभीर × अवखळ
प्रगती × अधोगती
उताणा × पालथा
उंच × ठेंगणा, बुटका,सखल
कोवळे × जून,राठ, निबर
अब्रू × बेअब्रू
उतार × चढाव
एकमत × दुमत
उन्नत × अवनत
उदार × कंजूस, अनुदार
उच्च × नीच
अंध × डोळस
अर्वाचीन × प्राचीन
उष्ण × थंड,गार, शीतल
एक × अनेक
ओली × कोरडी,सुकी
उन्नती × अवनती,अधोगती
आधुनिक × सनातनी
अकलवन्त × अकलशून्य,अकलमंद
अमृत,सुधा × विष,जहर,गरळ
आय × व्यय
इमानी × बेइमानी
आरोहण × अवरोहण
अभिमान × दुराभिमान
घट्ट × सैल,भोंगळ
कोवळा × जून,कडक,निबर
गती × अधोगती,परागती
जनता × नेणता
जेता × जित
जाड्या × रोड्या
चवदार × सपक
चेतन × जड
जणता × अजाण,अडाणी
आमंत्रित × आंगतुक
कालिक × कालातीत
कृतज्ञ × कृतघ्न
मोद × खन्त
रनशूर × रनभीरु
रुचकर × बेचव,सपक,रुचीहीन
राव × रंक
लठ्ठ × कृश
वंद्य × निंद्य
शाश्वत × अशाश्वत,क्षणभंगूर
शंका × खात्री

मराठी व्याकरण : अर्थावरून पडणारे वाक्याचे प्रकार

1. विधानार्थी वाक्य : ज्या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले असते. त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात.

2. प्रश्नार्थी वाक्य : ज्या वाक्यात कर्त्यांने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात.

3. उद्गारार्थी वाक्य : ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो. त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.

4. होकारार्थी वाक्य : ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य किवा करणरूपी वाक्य म्हणतात .

5. नकारार्थी वाक्य : ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात.

6. स्वार्थी वाक्य : जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो त्या वाक्यास स्वार्थी वाक्य असे म्हणतात.

7. आज्ञार्थी वाक्य : ज्या वाक्यामधून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थन ई. गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.

8. विध्यर्थी वाक्य : जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरुन तर्क, कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा इत्यादी गोष्टीचा बोध होत असेल तर त्यास विध्यर्थी वाक्य असे म्हणतात.

9. संकेतार्थी वाक्य : जेव्हा वाक्यात एक गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट घडली असती असा संकेत दिला जातो तेव्हा त्या वाक्यास संकेतार्थी वाक्य असे म्हणतात.

२० नोव्हेंबर २०२१

महाराष्ट्रातील प्रमुख घाट


1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 

2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 

3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर 

4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ 

5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग 

6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण 

7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी 

8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी 

9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी 

10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी 

11) पार घाट - सातारा - रत्नागिरी 

12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी 

13) पसरणीचा घाट - सातारा - वाई 

14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग 

15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई 

16) बोरघाट - पुणे - कुलाबा

17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल 

18) कुसुर घाट - पुणे - पनवेल 

19) वरंधा घाट - पुणे - महाड 

20) रूपत्या घाट - पुणे - महाड 

21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड 

22) कसारा घाट - नाशिक - ठाणे 

23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई

 24) थळ घाट - नाशिक - ठाणे 

25) माळशेज घाट - ठाणे- पुणे  

26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर 


पिंपरी चिंचवड विशेष.


🔸 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याच्या शासन निर्णय.....?

👉 10 एप्रिल 2018


🔹 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय ची स्थापना कधी झाली .....?

👉 15 ऑगस्ट 2018


🔸 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय चे पहिले आयुक्त......?

👉 R.K. पद्मनाभन


🔹 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय चे सध्याचे पोलीस आयुक्त.......?

👉 शरी. कृष्णप्रकाश 


🎯वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये पहिले सरकारी अधिकारी तसेच आयर्नमॅन किताब मिळालेला आहे....


🔸 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय चे सध्याचे अप्पर पोलीस आयुक्त.....?

👉 डॉ. संजय शिढे


🔹 पिंपरी चिंचवड महानगरपालिका ची स्थापना......?

👉 11 ऑक्टोंबर 1982


🎯 मख्यालय - पिंपरी येथे आहे


🎯 आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका ओळखली जाते......


🔸 पणे महानगरपालिका चे पहिले महापौर......?

👉 बाबाराव सणस


🔹 पिंपरी चिंचवड महानगरपालिका चे सध्याचे महापौर......?

👉 उषा उर्फ माई मनोहर ढोरे


🎯 उपमहापौर - राहुल जाधव


🔸 पिंपरी चिंचवड महानगरपालिका चे सध्याचे आयुक्त.....?

👉 शरी. राजेश पाटील


🔹 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कोणत्या ठिकाणी आहे.......?

👉 निगडी

                                  

🔸 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय चे किती परिमंडळ आहेत.....?

👉 तीन


🔹 पिंपरी चिंचवड चे पालकमंत्री....?

👉 अजितदादा पवार


🔸 पिंपरी चिंचवड लोकसंख्या 2011 नुसार........?

👉 17.29 लाख


🔹 पिपंरी चिंचवड साक्षरता दर 2011 नुसार.......?

👉 87.19%


🔸 पिंपरी चिंचवड शहराचे  एकूण क्षेत्रफळ किती आहे.....?

👉 181 चौ.की.मी.


🔹 पिंपरी चिंचवड शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे......?

👉 पवना


🔸 पिंपरी चिंचवड शहराचा पिनकोड काय आहे.....?

👉 411017


🔹 पिंपरी चिंचवड शहराचा आरटीओ कोड काय आहे.....?

👉 MH-14


🎯 MH-12 पुणे तसेच MH-42 बारामती...


🔸 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सदस्य संख्या किती आहे....?

👉 128


🔹 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे एकूण किती झोन आहेत.....?

👉 आठ .....A to F


🔸 पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी येथे कोणती संस्था आहे......?

👉 राष्ट्रीय एड्स संशोधन 


🔹भोसरी चे जुने नाव काय होते.....?

👉 भोजापुरी ( राजा भोज ची राजधानी)


🔸 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पहिल्या महिला महापौर.....?

👉 फरांदे


🎯 पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक प्रभाग संख्या 32 असून प्रत्येक प्रभागातून 4 नगरसेवक निवडले जातात....


🔹 पिंपरी चिंचवड हे शहर कोणत्या जिल्ह्यात आहे.....?

👉 पणे


🔸 पिंपरी चिंचवड येथे कोणता कारखाना आहे....?

👉 पनिसिलीन


🔹 पिंपरी चिंचवड येथील पर्यटन स्थळे.....?

👉 1) निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय

👉 2) दुर्गा देवी हिल पार्क

👉 3) पिंपरी चिंचवड सायन्स सेंटर

👉 4) मोरया गोसावी मंदिर


🔸चिंचवड येथे कोणत्या महा साधूची समाधी आहे ...?

👉 मोरया गोसावी


🔹 चिंचवड हे कोणत्या क्रांतिकारकांचे जन्मस्थान आहे......?

👉 चाफेकर बंधू


🔸 पिंपरी-चिंचवड शहराची समुद्रसपाटीपासूनची उंची किती आहे .....?

👉 530 मीटर


🔹 सटॅलाइट ऑफ पुणे म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते.....?

👉 पिंपरी चिंचवड


महत्वपूर्ण क्लुप्त्या


💐महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगा व त्या दरम्यानच्या नद्या कशा ओळखाव्या


✅कलुप्ती : विन सातसा गोहभी मकृ

वि- विध्य पर्वत

न – नर्मदा

सा- सातपुडा

ता- तापी

सा – सातमाळ

गो- गोदावरी

ह –हरिचंद्र बालघाट

भी –भीमा

म- महादेव

कृ- कृष्णा


💐भारतातील कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जाते ?


✅कर्कवृत्त हे अक्षवृत्त ८ राज्यातून जाते. कोणत्या राज्यातून जाते

✅कलूप्त्या : “गुझराती काका के 8 परममित्र है”

गु = गुजरात

झ = झारखंड

ती = छातीसगड

प = पं. बंगाल

र = राजस्थान

म = मध्यप्रदेश

मि = मिझोरम

त्र = त्रिपुरा


💐भारतातील हिमालय पर्वताचे पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रादेशिक विभाग कसे लक्षात ठेवणार


✅कलूप्त्या : कप काकू ने पूर्व हिमालयातून आणले

क = काश्मीर हिमालय

प  =  पंजाब हिमालय

कु = कुमाऊ हिमालय

ने   = नेपाळ हिमालय

पूर्व हिमालय = पूर्व हिमालय


💐हिमाचल पर्वतरांगाच्या दक्षिण उत्तरावर असलेले गीरीस्थानके


✅कलूप्त्या : 'शिमा नैनाला घेवून दार्जीलिंग ला गेली'

शि – शिमला

म  – मसुरी

नैना – नैनिताल

दार्जी– दार्जीलिंग


💐 बांगलादेश या देशाला भारताच्या राज्यांच्या लागलेल्या सीमा


✅कलूप्त्या : “मैत्री आमिप”

मै = मेघालय

त्री = त्रिपुरा

आ = आसाम

मि = मिझोरम

प =पश्चिम बंगाल.


💐दवीपकल्पावरील महत्वाची शिखरे उतरत्या क्रमाने असे लक्षात ठेवा.


✅कलुप्ती : "अन्ना दोन वेळा गुरु सोबत काळूबाईला धूप वाहायला गडावर गेला""

अन्ना = अनायमुडी - २६९५

दोन = दोडाबेटा - २६३

गुरु = गुरुशिखर - १७२२

काळूबाई = कळसुबाई - १६४६

धूप = धुपगड = १३५०


💐भारतात ४ अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्ट खाजगी विकासकांना बहाल करण्यत आले आहेत


✅कलुप्ती : "कृत्ति" मुंगूस.

कृ - कृष्णपट्टम (प्रकल्प आं.प्र)

ति - तिलैया प्रकल्प (झारखंड)

मुगू - मुद्रा प्रकल्प (गुजरात)

स - ससन प्रकल्प (मध्य प्रदेश)


💐भारताच्या सागरी सीमेशी सल्लग्न असलेले देश कसे लक्षात ठेवाल?


✅कलुप्ती : "MIM BSP"

M - म्यानमार

I - इंडोनेशिया

M - मालदीव

B - बांगलादेश

S -श्रीलंका

P - पाकिस्तान


💐आदिश राशी कशा लक्षात ठेवाल.


✅कलुप्ती : “आकाशचा अवघा वेळ ऊर्जेत गेला”.

आ – आकारमान

का – कार्य

श – शक्ती

चा – चाल

अ – अंतर

व – वस्तुमान

घा – घनता

ला – लांबी

वेळ - ऊर्जा


💐सदिश राशी कशा लक्षात ठेवाल. 


✅कलुप्ती : "सविता वेग वजन बग "

स - संवेग

वि - विस्थापन

त - त्वरण

वेग

वजन

ब - बल

ग - गती


💐दगडी कोळसा कार्बन प्रमाण उतरत्या क्रमाने


✅कलुप्ती : ऑबिलीपी


ऑ - अन्थ्रासाईड

बी  - बिटूमिंस

लि - लिग्नाईट

पी - पिट


💐महाराष्ट्रातील घाट


✅आबा कोर -

आंबा घाट - कोल्हापूर ते रत्नागिरी

✅माथूना - मुंबई ते नाशिक - थळ घाट

✅बापुचादिवा - पुणे ते बारामती - दिवा घाट.

✅कभा चिपक - कराड ते चिपळूण - कुंभार्ली घाट

✅खांबाला पूस - पुणे ते सातारा - खंबाटकी घाट.

✅फोकोगा - फोंडा घाट- कोल्हापूर ते गोवा.

✅मना कसा आहेस - मुंबई ते नाशिक - कसारा घाट


💐सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे


✅कलूप्त्या : “साथ आहे मी तुझ्या”

सात – सातमाळ

आ   -  अजिंठा

हे    -  हरिश्चंद्र

मी   - महादेव


💐सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे


✅कलूप्त्या : “साथ आहे मी तुझ्या”

सात – सातमाळ

आ   -  अजिंठा

हे    -  हरिश्चंद्र

मी   - महादेव


💐महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नाद्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा लक्षात ठेवावा


✅कलूप्त्या : ‘सूर्य वैतागला उल्हासवर

             आंबा पडला सावित्रीवर

             वैशिष्टी काजळ लावून गेली वाघावर

             काळी गेली तळ्यात खोलवर’


सूर्या नदी

वैतागला – वैतरणा नदी

उल्हास नदी

आंबा – आंबा नदी

सावित्री नदी

वशिष्टी नदी

काजळ -  काजळी नदी

वाघ – वाघोठान नदी

काळी नदी

तेरेखोल नदी


💐महाराष्ट्राच्या प्रमुख नद्यांचा विस्तारानुसार उतरता क्रम


✅कलूप्त्या : 'गोभीकृतान '

गो - गोदावरी

भी - भीमा

कृ - कृष्णा

ता - तापी

न - नर्मदा

पोलीस दल विशेष

 (०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

उत्तर- मुख्यमंत्री.


(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?

उत्तर- अरबी समुद्र.


(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?

उत्तर- भूतान.


(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- रायगड.


(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?

उत्तर- महाराष्ट्र.


(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.


(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर- स्वामी विवेकानंद.


(०८)  जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १० जानेवारी.


(०९)  रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- हाॅकी.


(१०)  भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?

उत्तर- इंदीरा गांधी.

 

(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.


(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?

उत्तर- सिक्किम.


(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर- २० फेब्रुवारी.


(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- तिरंदाजी.


(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?

उत्तर- सरोजनी नायडू.


(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- जयंत नारळीकर.


(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- सातारा.


(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २३ मार्च.


(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- टेनिस.


(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?

उत्तर- मीरा कुमार.


(२१)  उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण गायकवाड.


(२२)  'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?

उत्तर- रविंद्रनाथ टागोर.


(२३)  जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- ७ एप्रिल.


(२४)  ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- कुस्ती.


(२५)  भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?

उत्तर- आरती शहा.


(२६)  उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण माने.


(२७)  भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?

उत्तर- प्रतिभा पाटील.


(२८)  जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १७ मे.


(२९)  दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- क्रिकेट.


(३०)  भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?

उत्तर- विजयालक्ष्मी.


(३१)  मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- अच्च्युत गोडबोले.


(३२)  कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?

उत्तर- मका.


(३३)  जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १४ जून.


(३४)  अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- गोल्फ.


(३५)  भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?

उत्तर- कल्पना चावला.


(३६)  समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- साधना आमटे.


(३७)  भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?

उत्तर- कोलकाता.


(३८)  जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २९ जुलै.


(३९)  मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- नेमबाजी.


(४०)  दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?

उत्तर- रझिया सुलताना.


(४१)  नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- गोदावरी.


(४२)  शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बाॅक्सिंग.


(४३)  भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?

उत्तर- गंगा.


(४४)  राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.


(४५)  जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १ ऑगस्ट 


(४६)  सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- कृष्णा.


(४७)  चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बॅडमिंटन.


(४८)  भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?

उत्तर- अजिंठा.


(४९)  काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर- गुजरात.


(५०)  जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १६ 


▪️महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या कोण आहेत?
✓ दिलीप वळसे पाटिल

▪️पोलीस खाते कोणत्या मंत्रालयांतर्गत येते?
✓ गृहमंत्रालय

▪️पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो?
✓ राज्यसूची

▪️राष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते? 
✓ दक्षता

▪️भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे?
✓ तेलंगणा

▪️सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे? 
✓ हैदराबाद

▪️महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
✓ संजय पांडे

▪️महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे?
✓ सदरक्षणाय खलनिग्रहणाय

▪️महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते?
✓ पोलीस महासंचालक

▪️महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे?
✓ मुंबई

▪️सदरक्षणाय खलनिग्रहणाय या वाक्याचा अर्थ काय होतो?
✓ सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नायनाट
 
▪️महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहे?
✓ पंचकोणी तारा

▪️पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो?
✓ 21 ऑक्टोबर

▪️सीआरपीएफचे पूर्ण नाव काय? 
✓ सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स

▪️महाराष्ट्रात गुप्तचर अकादमी प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?
✓ पुणे

▪️पोलीस दलातील शेवटचे पद कोणते?
✓ शिपाई

▪️महाराष्ट्र राज्यातील पहिल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला  बटालियनची स्थापना कोठे होणार आहे?
✓ काटोल, जि. नागपूर

▪️महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिदर्शक असे कोणते चिन्ह आहे? 
✓ हाताचा पंजा

▪️जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो?
✓ पोलीस अधीक्षक

▪️महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कोणता आहे?
✓ गडद निळा

▪️मबई पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत ?
✓ हेमंत नगराळे

▪️राज्याच्या पोलीस महासंचालकांची नेमणूक कोण करते ?
✓ राज्यशासन

▪️पोलीस विभागात परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात ?
✓ महानिरीक्षक

▪️FIR चा फुल फॉर्म काय ?
✓ first information report

▪️महाराष्ट्र राज्याच्या एटीएस विभागाचे प्रमुख कोण आहेत ?
✓ देवेन भारती

▪️गह विभागाच्या नियंत्रणाखाली कोणते विभाग येतात ?
✓ गृहरक्षक दल , तुरुंग

▪️महाराष्ट्र राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागचे मुख्यालय कुठे आहे ?
 ✓ पुणे

▪️भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव काय ?
✓ केपी-बोट

▪️राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली ?
✓ 1948

▪️भारताच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी कोणाची निवड करण्यात आली ? 
✓ जनरल बिपिन रावत

▪️दशाचे संरक्षण मंत्री कोण आहेत ?
 ✓ राजनाथ सिंह

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे (कंसात जिल्ह्याचे नाव)


आंबोली (सिंधुदुर्ग)


खंडाळा (पुणे)


लोणावळा (पुणे)


भिमाशंकर (पुणे)


चिखलदरा-गाविलगड (अमरावती)


जव्हार (पालघर)


तोरणमाळ (नंदुरबार)


पन्हाळा (कोल्हापूर)


महाबळेश्वर (सातारा)


पाचगणी (सातारा)


कोयनानगर (सातारा)


माथेरान (रायगड)


मोखाडा(ठाणे)


सूर्यामाळ (ठाणे)


म्हैसमाळ (औरंगाबाद)


येडशी (उस्मानाबाद)


रामटेक (नागपूर)

सीबीआय आणि ईडीच्या प्रमुखांसंबंधी मोदी सरकारचा मोठा निर्णय



🔰सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या प्रमुखांचा कार्यकाळ पाच वर्षांपर्यंत वाढवण्याचा अध्यादेश सरकारने आणला आहे. या केंद्रीय तपास यंत्रणाच्या प्रमुखांचा कार्यकाळ सध्या दोन वर्षांचा आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी दोन्ही अध्यादेशांवर स्वाक्षरी केली आहे. या अध्यादेशानुसार सर्वोच्च संस्थांच्या प्रमुखांचा कार्यकाळ दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक वर्षी तीन वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो.


🔰नयायमूर्ती एलएन राव यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अलीकडेच अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक एस के मिश्रा यांच्या कार्यकाळाच्या मुदतवाढीसंदर्भातील एका खटल्यात निकाल दिला. यावेळी, न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की कार्यकाळ वाढवण्याची परवानगी केवळ अपवादात्मक परिस्थितीतच आहे.


🔰या अध्यादेशानुसार, अंमलबजावणी संचलनालयाचे संचालक ज्या कालावधीसाठी आपले पदग्रहण करतो, तो कालावधी सेक्शन (अ) नुसार समितीच्या शिफारशीनुसार आणि लिखित स्वरूपात दिल्या गेलेल्या कारणांनुसार एका वेळी एका वर्षासाठी वाढवण्यात येऊ शकतो. अर्थात, हे केवळ पाच वर्षांपर्यंतच करता येते. पाच वर्षांची सेवा झाल्यानंतर संचालकाचा कालावधी वाढवता येत नाही. मिश्रा यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ होता आणि १७ नोव्हेंबर रोजी संपणार आहे.

पुढील दशकभरात भारतात तीन विश्वचषक



🔰भारताला २०२३च्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपाठोपाठ श्रीलंकेसह संयुक्तरीत्या २०२६चा ट्वेन्टी२० विश्वचषक आणि बांगलादेशसह संयुक्तरीत्या २०३१चा एकदिवसीय विश्वचषक या स्पर्धाचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळणार आहे.


🔰आतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी जागतिक स्पर्धाची कार्यक्रमपत्रिका जाहीर केली. भारतात २०२९ मध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचेही आयोजन करण्यात येईल.


🔰तसेच पाकिस्तानात २० वर्षांहूनही अधिक कालावधीनंतर ‘आयसीसी’ची जागतिक स्पर्धा होणार असून २०२५च्या चॅम्पियन्स करंडकाचे यजमानपद भूषवण्याची त्यांना संधी मिळेल.


🔰पाकिस्तानाने भारत आणि श्रीलंकेसह संयुक्तरीत्या १९९६चा एकदिवसीय विश्वचषक आयोजित केला होता. तसेच अमेरिका, वेस्ट इंडिजला संयुक्तरीत्या २०२४ ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाची संधी लाभणार आहे.

मराठी न शिकवल्यास शाळांना दंड ; राज्यातील सर्व शिक्षणसंस्थांना अनिवार्य; कारवाईची रक्कम एक लाखापर्यंत



🔰राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व परीक्षा मंडळाच्या पहिली ते दहावीच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करूनही मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर कारवाईचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत. दरम्यान शाळांमध्ये शिकवण्याचा आढावा घेण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयाचे मराठी भाषा, साहित्य, शिक्षण क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे.


🔰राज्यात २०२०-२१ पासून राज्यातील शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्यात आला आहे. त्यात २०२०-२१ मध्ये पहिली आणि सहावी, २०२१-२२ मध्ये दुसरी आणि सातवी, २०२२-२३ मध्ये तिसरी आणि आठवी, २०२-२४ मध्ये चौथी आणि नववी, २०२४-२५मध्ये पाचवी आणि दहावी या पद्धतीने हा निर्णय लागू होणार आहे. मराठी भाषेच्या सक्तीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत शासन स्तरावरून वारंवार आढावा घेण्यात येत आहे.


🔰मराठी शिकवत नसलेल्या संबंधित शाळा आणि व्यवस्थापनास एक लाख रुपयांपर्यंत दंड का करू नये, अशी नोटिस देण्यात यावी. त्यानंतर शाळांकडून खुलासा घ्यावा. खुलासा समाधानकारक नसल्यास किंवा विशेष करून मराठी भाषा विषयी संबंधित वर्ग सुरू न केल्यास अधिनियमातील तरतुदीनुसार शिक्षणाधिकारी स्तरावरून संस्था किंवा शाळा यांचे म्हणणे ऐकून घेऊन योग्य तो निर्णय पारित करावा. त्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालकांकडे दंडाच्या वसुलीचा प्रस्ताव सादर करावा, असे टेमकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

१८ नोव्हेंबर २०२१

MPSC मार्फत लवकरच 15,511 पदांची भरती होणार!


👨🏻‍💼 राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग यासह काही विभागांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा या आयोगामार्फत एकूण 15511 जागा भरण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यामधील एकूण 7168 पदांचे मागणीपत्र राज्य शासनामार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला प्राप्त झाले आहे.

👉 राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग,वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच इतर विविध विभागात एकूण 15511 पदांची भरती होणार आहे. त्यामध्ये गट-अ वर्गात 4417, गट-ब वर्गात 8031 तसेच गट-क वर्गात 3063 पदे असणार आहेत.

📄 राज्य शासनाकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगास 7168 पदांचे मागणीपत्र मिळाले आहे. त्यामध्ये गट अ - 2827 पदे, गट ब - 2641 पदे, गट क - 1700 पदे असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

📍 विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी कायम प्रयत्नशील असून अनेक कामांचा पाठपुरावा मी स्वतः करत आहे. 7168 पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास प्राप्त झाले आहे. तसेच लवकर एमपीएससी विद्यार्थ्यांना एक वर्षाची संधी वाढवून दिल्याचे परिपत्रक निघणार आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

भारतीय निवडणूक आयोग



🌸ही एक संवैधानिक संस्था असून कलम 324 नुसार याची स्थापना25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आलेली आहे. भारतीय निवडणुक आयोगातर्फे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, राज्य विधिमंडळ यांच्या निवडणूका पार पाडल्या जातात. पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांनी कामकाज पाहिले होते. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती करतात व ते 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे होईपर्यंत ते पदावर राहतात.


🌸राज्यसभा

- संसदेचे उच्च सभागृह

- भारताचे उपराष्ट्रपती पदसिद्ध अध्यक्ष असतात

- एकूण जागा: 250: 238 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश + 12 राष्ट्रपती नियुक्त

- सध्या जागा: 245: 233 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश + 12 राष्ट्रपती नियुक्त (कलम 80 नुसार ही नियुक्ती)

- महाराष्ट्रात राज्यसभेच्या 19 जागा

- मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, पाॅडेचरी, गोवा या राज्यांना राज्यसभेवर प्रत्येकी 1 जागा


🌸लोकसभा

- एकूण जागा: 552 (कलम 81 & 331 नुसार)

- पहिल्या लोकसभेची स्थापना: 2 एप्रिल 1952

- 16 वी लोकसभा स्थापना: 4 जून 2014


🌸लोकसभा निवडणूक 2014

- 16 वी लोकसभा निवडणूक

- 7 एप्रिल ते 12 मे या कालावधीतील 10 दिवस भारतभरात मतदान

- 16 मे रोजी निकाल आणि 4 जून 2014 रोजी लोकसभेची स्थापना

- एकूण मतदारसंघ: 543

- एकूण मतदान केंद्र: 927553

- सहभागी राजकीय पक्ष: 464 (2009-363)

राष्ट्रीय- 342, राज्य- 182, नोंदणीकृत- 16, अपक्ष- 3

- एकूण उमेदवारांची संख्या: 8251 पैकी 668 महिला उमेदवार (पैकी 62 निवडून आल्या)


🌸 पक्षीय बलाबल

- भारतीय जनता पक्ष: 282

- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: 44

- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष: 06

- कम्युनिस्ट पक्ष: 01

- कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी): 09

- राज्यस्तीय पक्ष: 182

- नोंदणीकृत पक्ष: 16

- अपक्ष: 03


🌸 वशिष्ट्ये

- EVM वर NOTA हा पर्याय भारतभर पहिल्यांदाच वापरण्यात आला. 

- नोटाचा सर्वाधिक वापर पाॅडेचरी (3.01%), सर्वात कमी वापर नागालॅड (0.26%) करण्यात आला

- 28,527 तृतीयपंथी मतदारांपैकी 1968 जणांनी मतदानाचा अधिकार बजावला. 

- 13,039 (पुरूष 12234, स्त्री 804) भारताबाहेरील भारतीयांपैकी 10 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. 

- एकूण निवडणूक खर्च: 3,87,0354,56,024 रूपये


🌸 महाराष्ट्र: लोकसभा निवडणूक 2014


- 48 मतदारसंघासाठी 90386 मतदान केंद्रे. 

- 6 मतदान केंद्रावर फेर मतदान घेण्यात आले. 

- 32 मतदारसंघात 16 पेक्षा जास्त उमेदवार उभा होते.

- एकूण मतदानापैकी 0.89% लोकांनी NOTA हा पर्याय वापरला


विधान परिषद



- राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह

- घटनेचे कलम 169 विधानपरिषदेची स्थापना किंवा रद्द करण्याशी संबंधित आहे: संबंधित राज्याच्या विधानसभेने विशेष बहुमताने (2/3) असा ठराव पारित करावा लागतो आणि हा ठराव संसदेत साध्या बहुमताने मंजूर करावा लागतो. 

-------------------------------------

● पात्रता 

- उमेदवार भारताचा नागरिक असावा

- त्याने वयाची 30 वर्षे पूर्ण केलेली असावीत. 

- संसदेने ठरवून दिलेल्या अटींची पूर्तता करणे आवश्यक

-------------------------------------

● सदस्य संख्या

- कमीत कमी 40 (J&K: 36) तर जास्तीत जास्त संबंधित राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या एक तृतीयांश इतके सदस्य

- एक तृतीयांश सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात (स्थायी सभागृह)

- सदस्याचा कालावधी 6 वर्षांचा असतो

--------------------------------------

● रचना: कलम 171

[सदस्य: मतदार संघ: महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील संख्या]


- 1/12 सदस्य: पदवीधर मतदारसंघातून: 7 सदस्य

- 1/12 सदस्य: शिक्षक मतदारसंघातून: 7 सदस्य

- 1/6 सदस्य: राज्यपाल नियुक्त: 12 सदस्य

- 1/3 सदस्य: स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून: 26 सदस्य

- 1/3 सदस्य: विधानसभा सदस्य निवडून देतात: 26 सदस्य

■ विधानपरिषदेच्या गणपूर्तीसाठी 1/10 सदस्यांची आवश्यकता असता.

--------------------------------------

● विधानपरिषद असलेली राज्ये

[राज्याचे नाव आणि सदस्य संख्या]


- उत्तर प्रदेश (100)

- महाराष्ट्र (78)

- बिहार (75)

- कर्नाटक (75)

- आंध्र प्रदेश (50)

- तेलंगणा (40)

- जम्मू-काश्मिर (36)

■ ओरिसा हे विधानपरिषद स्थापन करणारे देशातील आठवे राज्य ठरले आहे.

ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले विविध उठाव :




👉1.संन्याशाचा उठाव

1765-1800

बंगाल

शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक


👉2.चुआरांचा उठाव

1768

बंगाल-मिजापूर जिल्हा

जगन्नाथ घाला


👉3.हो जमातीचे बंड

1820

छोटा नागपूर व सिंग

भूम


👉4.जमिनदारांचा उठाव

1803

ओडिशा

जगबंधु


👉5.खोंडांचा उठाव

1836

पर्वतीय प्रदेश

दोरा बिसाई


👉6.संथाळांचा उठाव

1855

कान्हू व सिंधू


👉7.खासींचा उठाव

1824आसाम

निरत सिंग


👉8.कुंकिंचा उठाव

1826

मणिपूर


👉9.दक्षिण भारतातील उठाव


👉10.पाळेगारांचा उठाव

1790

मद्रास


👉11.म्हैसूरमधील शेतकर्‍यांचा उठाव

1830

म्हैसूर


👉12.विजयनगरचा उठाव

1765

विजयनगर


👉13.गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव

1870

गोरखपूर


👉14.रोहिलखंडातील उठाव

1801

रोहिलखंड


👉15.रामोश्यांचा उठाव

1826

महाराष्ट्र

उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत


👉16.भिल्ल व कोळ्यांचा उठाव

1824


👉17.केतूरच्या देसाईचा उठाव

1824

केतूर


👉18.फोंडा सावंतचा उठाव

1838


👉19.लखनऊ उठाव


👉21.भिल्लाचा उठाव

1825

खानदेश


👉21.दख्खनचे दंगे

1875

पुणे,सातारा,महाराष्ट्र

शेतकरी

कोकणातील नद्या....



▪️ठाणे

- सुर्या 

- वैतरणा 

- उल्हास 


▪️मबंई उपनगर 

- दहिसर  

- माहीम


▪️रायगड

- पाताळगंगा 

- सावित्री


▪️रत्नागिरी

- वशिष्ठी  

- शास्त्री 

- काजळी

- मुचकुंदी


▪️सिंधुदुर्ग

- देवगड 

- माचरा

- कर्ली

-तेरेखोल

अर्थशास्त्र काही प्रश्न व उत्तरे -

1. भारताच्या सन २००० च्या लोकसंख्या विषयक धोरणाचे दीर्घकालीन उद्दिष्ट काय आहे?

१.सन २०२० पर्यंत किमान जन्मदर साध्य करणे

२.सन २०३० पर्यंत सुदृढ लोकसंख्या साध्य करणे

३.सन २०४० पर्यंत स्त्री पुरुष प्रमाणात वाढ करणे 

४.सन २०४५ पर्यंत स्थिर लोकसंख्या साध्य करणे✅✅✅

2. १२ व्या पंचवार्षिक योजनेत पायाभूत क्षेत्रातील अंदाजे गुंतवणूक किती आहे?

१.११ व्या पंचवार्षिक योजनेत केलेल्या गुंतवणुकीच्या दुप्पट✅✅✅

२.११ व्या पंचवार्षिक योजनेत केलेल्या गुंतवणुकीच्या १२०%

३.११ व्या पंचवार्षिक योजनेत केलेल्या गुंतवणुकीच्या १५०%

४.वरीलपैकी एक ही नाही

3. भारतीय नियोजन अयशस्वी होण्याची प्रमुख तीन करणे कोणती?

अ)सार्वजनिक क्षेत्रातील अकार्यक्षम उत्पादन

ब)व्यावसायिक संरचनेत न झालेला बदल

क)दारिद्रय निर्मूलनातील अपयश

ड) महालनोबिस प्रतिमानाचा अयोग्य वापर

१.अ, ब आणि ड✅✅✅

२.ब, क, आणि ड

३.अ, ब आणि क

४.क, ड आणि अ

4. भारताच्या विकासासंदर्भात डॉ कलाम यांनी स्वीकारलेल्या प्रतिमानात खालील घटकांचा समावेश होता?

१.भौतिक, इलेक्ट्रॉनिक, ज्ञान व आर्थिक✅✅✅

२.खाजगी क्षेत्रावर नियंत्रण

३.दारिद्रय चे निवारण

४.शेती क्षेत्राचा विकास

5. ग्रामीण पायाभूत विकासासाठी..... या संस्थेने राज्यातील सिंचन प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी विकास निधीची स्थापना केली?

१.नाबार्ड✅✅✅

२.ए. आय.बी.पी

३.एन.सी.डी.सी

४.आय.ए.डी.पी

6. खालीलपैकी कोणते उद्योग भारताचे आधारभूत उद्दोग नाहीत?

१.कोळसा, कचे तेल आणि विधुत

२.तेल परिशोधन, कचे तेल आणि कोळसा

३.कोळसा, सिमेंट आणि लोह इस्पित

४.कचे तेल, प्राकृतिक गॅस आणि तेल परिशोधन✅✅✅

7. १९९१ च्या लघुउद्योगा साठीच्या योजनेनुसार, राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाने खालीलपैकी कोणत्या गोष्टी वर लक्ष द्यायचे होते?

१.वित्त उभारणी

२.निर्यात प्रोत्साहन

३.विपणनास साहाय्य✅✅✅

४.कुशल कामगारांची तरतूद

8. खाजगीकरण व जागतिकीकरण धोरण कोणत्या प्रधानमंत्र्याने जाहीर केले?

१.चंद्रशेखर

२.पी व्ही नरसिंह राव✅✅✅

३.डॉ मनमोहन सिंग

४.एच डी देवेगौडा

9. २००३-२००७ च्या आयात निर्यात धोरणातील सर्वात महत्त्वाचा उपक्रम कोणता?

१.संशोधन आणि विकासात पुढाकार

२.विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीस प्रोत्साहन

३.तंत्रज्ञान पार्क

४.शेतमालाच्या निर्यातीवरील संख्यात्मक निर्बंधा चे उच्चटन✅✅✅

10. देशातील ग्रामीण व शहरी दोन्ही भागात खालीलपैकी कोणत्या योजनेचा विस्तार करण्यात आला?

१.जवाहर रोजगार योजना

२.नेहरू रोजगार योजना

३.जे पी नारायण गॅरेटी योजना

४.प्रधानमंत्री रोजगार योजना✅✅✅

1.भारतातील ग्रामीण दारिद्रय दूर करण्यासाठी कोणता कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

1. वीस कलमी कार्यक्रम✅✅✅

2. किमान गरजा कार्यक्रम

3. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम

4. वरील सर्व

2. डॉ. सुरेश तेंडुलकर अभ्यास गटाच्या शिफारसी प्रमाणे दारिद्रय रेषेखालील कुटुंब ...... या निकशाने ठरवावी.

1. उपभोगत्या खर्च✅✅✅

2. उत्पन्न मर्यादा

3. उष्मांक ( कॅलरी) ग्रहण

4. आरोग्य स्तिथी

3.उत्पन्न दरिद्र्याची व्याख्या कशी केली जाते.

1. किमान जीवनमान प्राप्त करण्यामध्ये असमर्थ असणे.✅✅✅

2.  चांगले जीवनमान प्राप्त करण्यामध्ये  असमर्थ असणे

3.योग्य जीवनमान प्राप्त करण्यामध्ये असमर्थ असणे

4. वरील सर्व

4.महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत होणाऱ्या खर्चाच्या विभागणीच्या संदर्भात खालील पर्यायांपैकी कोणता पर्याय बरोबर आहे.

1.७५ टक्के केंद्रसरकार आणि25  टक्के राज्यसरकार ✅✅✅

2. ५०-५० टक्के केंद्र आणि राज्यसरकार

3. १०० टक्के केंद्रसरकार

4. राज्यसरकार.

5. रोजगार पुरवणारी खालीलपैकी कोणती योजना विशेषतः दुष्काळग्रस्त भागासाठी सुरु केली होती.

1. जवाहर ग्राम समृध्दी योजना

2. रोजगार हमी योजना ✅✅✅

3. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम

4. ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम

6. दुष्काळ व्यवस्थापनासाठी महाराष्ट्रात कोणत्या कार्यक्रमाची अमलबजावणी करण्यात आली.

1. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम

2. ट्रायसेम 

3.सर्वंकष  पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम 

4.रोजगार हमी योजना✅✅✅

7.फिशरच्या  चलनसंख्यामान सिद्धांतानुसार पैशाचे मूल्य आणि पैशांची संख्या यामधील संबंध कडा आहे.

1. इतर परिस्थिती असता पैशांचे मुल्य त्याच्या संख्येच्या विरुद्ध दिशेने बदलते.✅✅✅

2. इतर परिस्थिती स्थिर असता पैशाचे मूल्य त्याच्या सम दिशेने बदलते

3.पैशांची संख्या आणि पैशांचे मूल्य यांच्यातील सहसंबंध प्रमाणशीर आहे

4. वरीलपैकी नाही

8.मंदीच्या काळात खालीलपैकी कोणते राजकोशीय धोरण आधिक यशस्वी ठरेल?

1. करामध्ये वाढ आणि सार्वजनिक खर्चात कपात

2.करामध्ये वाढ आणि सार्वजनिक खर्चात वाढ

3.करामध्ये कपात आणि सार्वजनिक खर्चात कपात

4. करामध्ये कपात आणि सार्वजनिक खर्चात वाढ✅✅✅

9.मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास काय म्हणतात?

1.व्याज दर

2.बँक दर✅✅✅

3. रेपो दर

4.अधिकर्ष सवलत

10. नैसर्गिक मत्तेच्या मौद्रीक मूल्यांमध्ये त्या वर्षात जो ऱ्हास झाला असेल त्याचे समायोजन एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकड्याशी करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात?

१.हरितगृह परिणाम

२.हरित क्रांती

३.हरित ऊर्जा

४.वरील एक ही नाही✅✅✅



 

1. दहाव्या पंचवार्षिक योजनेत कोणते क्षेत्र 'गाभा क्षेत्र' मानण्यात आले?

अ) औद्योगिक क्षेत्र

ब) शिक्षण क्षेत्र

क) पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा

ड) कृषी क्षेत्र

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा

1.(अ) फक्त

2. (अ)आणि(क) फक्त

3.ब) फक्त

4.ड) फक्त✅

2. तुटीच्या अर्थभरण्यामुळे खालीलपैकी कोणता परिणाम होतो?

1.भावसंकोच

2. भाववाढ✅

3.निर्यातवाढ

4. यापैकी कोणतेही नाही

3.एक बंध अर्थव्यवस्था अशी अर्थव्यवस्था आहे ज्यामध्ये .. .....

1. चलन पुरवठा पूर्णपणे नियंत्रित असतो

2.तुटीच्या अर्थ भरणाचा वापर केला जातो

3.केवळ निर्यातीला परवानगी असते

4.ना निर्यात ना आयात✅

4. एक रुपयाच्या चलनी नोटा चलनात आणण्याचे अधिकार कोणास आहे?

1.नियोजन आयोग

2.रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

3.स्टेट बँक ऑफ इंडिया

4.केंद्रीय अर्थ खाते✅

5.भारतीय हरितक्रांतीचे शिल्पकार कोणास म्हणले जाते?

1.जगदीशचंद्र बोस

2.राजा रामन्ना

3.डॉ. स्वामिनाथन✅

4.जयंत नारळीकर

6.मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दरात कर्ज देते त्या दरास काय म्हणतात?

1.बँक दर✅

2. व्याज दर

3 रेपो दर

4.अधिकर्ष सवलत

7...... यांनी १९४८ मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले औद्योगिक  धोरण संसदेपुढे मांडले

1.डॉ. आंबेडकर

2.श्यामप्रसाद  मुखर्जी✅

3.पंडित नेहरू

4.गुलझारीलाल नंदा

8. खालीलपैकी कोणती समिती लघुउद्योग क्षेत्रातील पतपुरवठयात येणाऱ्या अडचणी या विषयाशी संबधित होती?

1. आर.व्ही.गुप्ता समिती

2.डा. एल.सी. गुप्ता समिती

3.एस.एल.कपूर समिती✅

4.आर.एल.मल्होत्रा समिती

9.सदोष शिक्षण पद्धतीमुळे ......बेकारी निर्माण होते?

1.सुशिक्षित✅

2.तंत्रिकी

3.ग्रामीण

4.संघर्षजन्य

10.रेपो दर वाढीचा खालीलपैकी परिणाम कोणता?

1.चलन पुरवठा कमी होणे✅

2.महागाईत वाढ होणे

3.उत्पादनात वाढ होणे

4.अ व ब  दोन्हीही

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...