१८ ऑक्टोबर २०२१

क्षयरोग म्हणजे काय

◾️क्षयरोग - किंवा टीबी, याला सामान्यतः म्हणतात - हा एक संसर्गजन्य संसर्ग आहे जो सामान्यत: फुफ्फुसांवर हल्ला करतो . हे मेंदू आणि मणक्यांप्रमाणेच शरीराच्या इतर भागातही पसरू शकते . मायकोबॅक्टीरियम क्षयरोग नावाच्या जीवाणूंचा एक प्रकार होतो.

◾️२० व्या शतकात अमेरिकेत टीबी हा मृत्यूचे मुख्य कारण होते. आज बहुतेक प्रकरणे अँटीबायोटिक्सने बरे होतात . पण त्यासाठी बराच वेळ लागतो. आपल्याला कमीतकमी 6 ते 9 महिने मेडस घ्यावे लागतील.

✅ क्षयरोगाचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो?

◾️क्षयरोगाच्या संसर्गाचा अर्थ असा नाही की आपण आजारी व्हाल. रोगाचे दोन प्रकार आहेत:

🔷अव्यक्त टीबी: आपल्या शरीरात जंतू असतात, परंतु आपली रोगप्रतिकारक शक्ती त्यांना पसरण्यापासून रोखते. याचा अर्थ असा की आपल्याकडे कोणतीही लक्षणे नाहीत आणि आपण संक्रामक नाही. परंतु संक्रमण अद्यापही आपल्या शरीरात जिवंत आहे आणि एक दिवस सक्रिय होऊ शकतो. आपल्याला पुन्हा सक्रिय होण्याचा धोका असल्यास - उदाहरणार्थ, आपल्यास एचआयव्ही आहे, आपला प्राथमिक संसर्ग मागील 2 वर्षात होता, आपल्या छातीचा एक्स-रे असामान्य आहे, किंवा आपण इम्युनोकोमप्रॉम्मेड आहात --- डॉक्टर आपल्याला प्रतिजैविकांनी उपचार करेल सक्रिय टीबी होण्याचा धोका कमी करण्यासाठी.  

🔷अ‍ॅक्टिव्ह टीबी रोगः याचा अर्थ जंतूंचा गुणाकार होतो आणि तो आपल्याला आजारी बनवू शकतो. आपण हा रोग इतरांपर्यंत पसरवू शकता. Tक्टिव्ह टीबीची percent ० टक्के प्रौढ प्रकरणे ही सुप्त टीबी संसर्गाच्या पुनःसक्रियतेपासून होते.

🔴क्षयरोगाची लक्षणे कोणती?

◾️सुप्त टीबीसाठी कोणतेही  नाही. आपण संक्रमित आहात की नाही हे शोधण्यासाठी आपल्याला त्वचेची किंवा रक्त तपासणीची आवश्यकता असेल.

◾️परंतु आपल्याला सक्रिय टीबी रोग असल्यास सामान्यतः अशी चिन्हे आहेत. त्यात समाविष्ट आहे:

◾️एक खोकला काळापासून 3 आठवड्यांपेक्षा जास्त

◾️छाती दुखणे

◾️रक्त खोकला

◾️सर्व वेळ थकल्यासारखे वाटत आहे

◾️रात्री घाम येणे

◾️थंडी वाजून येणे

◾️ताप

◾️भूक न लागणे

◾️वजन कमी होणे

🔷 टीबी कसा पसरतो?

◾️हवा माध्यमातून, फक्त एक आवडत थंड किंवा फ्लू . आजारी असलेल्या एखाद्याला खोकला , शिंकणे, बोलणे, हसणे किंवा गाणे, जंतूंचा लहान थेंब सोडला जातो. आपण या ओंगळ जंतूंमध्ये श्वास घेतल्यास , आपल्याला संसर्ग होतो.

◾️टीबी संक्रामक आहे, परंतु पकडणे सोपे नाही. ज्या व्यक्तीच्या फुफ्फुसात जास्त प्रमाणात बॅक्टीली असते अशा व्यक्तीस आपण सहसा बराच वेळ घालवला पाहिजे. म्हणूनच हे सहसा कामगार, मित्र आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये पसरते.

◾️क्षय रोग जंतू पृष्ठभागांवर भरभराट होत नाहीत. ज्यांना हा आजार आहे अशा व्यक्तीशी हात हलवून किंवा त्यांचे भोजन किंवा पेय सामायिक करून आजार आपण घेऊ शकत नाही. 

🔷क्षयरोगाचा धोका कोण आहे?

◾️जर आपण इतर लोकांच्या संपर्कात आला तरच आपण टीबी घेऊ शकता. आपल्या जोखीम वाढवू शकतील अशा काही परिस्थिती येथे आहेतः

◾️मित्र, सहकारी किंवा कुटुंबातील सदस्याला सक्रीय टीबी रोग होतो.

◾️रशिया, आफ्रिका, पूर्व युरोप, आशिया, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन सारख्या टीबीसारख्या सामान्य ठिकाणी आपण राहता किंवा प्रवास केला आहे.

◾️आपण अशा गटाचा एक भाग आहात जिथे टीबीचा प्रसार होण्याची शक्यता जास्त आहे किंवा आपण काम करत असलेल्या किंवा एखाद्याच्याबरोबर जगता. यात बेघर लोक, एचआयव्ही ग्रस्त लोक आणि आयव्ही औषध वापरकर्त्यांचा समावेश आहे.

◾️आपण रूग्णालयात किंवा नर्सिंग होममध्ये काम करता किंवा राहता.

◾️एक निरोगी रोगप्रतिकार प्रणाली टीबी जीवाणू fights. परंतु आपल्याकडे पुढीलपैकी काही असल्यास, आपण कदाचित सक्रिय टीबी रोगाचा प्रतिबंध करण्यास सक्षम नसाल:

◾️एचआयव्ही किंवा एड्स

◾️मधुमेह

◾️गंभीर मूत्रपिंडाचा आजार

◾️डोके आणि मान कर्करोग

◾️केमोथेरपीसारख्या कर्करोगाचा उपचार

◾️कमी वजन आणि कुपोषण

◾️औषधे साठी अवयव प्रत्यारोपणासाठी

◾️संधिवात , क्रोहन रोग आणि सोरायसिसचा उपचार करण्यासाठी काही विशिष्ट औषधे

◾️बाळ आणि लहान मुलांनाही जास्त धोका असतो, कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती पूर्णत: तयार केलेली नाही.

आरोग्य विभाग तांत्रिक प्रश्नउत्तरे

1) महाराष्ट्रात चिकनगुनिया ची साथ कोणत्या वर्षी पसरली
  -1965

2) चंडीपूरा रोग कोणत्या प्रकारचा आहे
- विषाणुजन्य रोग

3) झिका रोग कोणत्या प्रकारचा आहे
-विषाणुजन्य

4) डांग्या खोकला या अजाराला इंग्रजीत काय म्हणतात
-हुपिंग कफ

5) सुधारित राष्ट्रीय उपचार पद्धति कधी अमलात अली
-2013

6)डेंगू रोगाचा अधिशयन काल कीती कालावधी चा असतो
-5 ते 7 वर्ष

7)चिकनगुनिया विषाणु चा शोध कधी लागला
-1953

8)लहान बालकांना लसिकरनाद्वारे कीती एकक घटसर्प प्रतिविष दिल्या जाते
-5000 ते 1000 एकक

9) उष्णता सूर्यप्रकाश व अतिथंड तापमानाला कोणती लस सवेंदनशील असते
-पेंटा ,डीटीपी, टीटी

10)लस वाहकामध्ये लसी कीती तास सुश्थितित राहु शकतात
-24 तास

महाराष्ट्राविषयी माहिती

▪️  महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (1646 मी.) ता. अकोले, जि - अहमदनगर.

▪️महाराष्ट्राला 720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

▪️महाराष्ट्राची राजधानी - मुंबई

▪️उपराजधानी - नागपूर.

▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - 36

▪️महाराष्ट्राने भारताचा 9.7 टक्के भाग व्यापलेला आहे.

▪️महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

▪️महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे.

▪️ विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.

▪️विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.

▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.

▪️महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.

▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे

▪️महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

▪️महाराष्ट्रातील 100 टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.

▪️महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.

▪️महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.

▪️भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.

▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.

▪️महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.

▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.

▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.

▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.

▪️पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.

▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.

▪️प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.

▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.

▪️जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

▪️औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

▪️पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

▪️महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.

▪️कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.

▪️कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.

▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.

▪️विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.

▪️महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.

▪️विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.

▪️संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि - बुलढाणा येथे आहे.

▪️ संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.

▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि - अमरावती येथे आहे.

▪️ संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.

▪️ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.

▪️  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.

▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.

▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि - नाशिक.

▪️पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.

▪️कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.

▪️आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.

▪️ मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात

▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.

▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.

▪️नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.

▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.

▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.

▪️महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.

▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.

▪️ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.

▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.

▪️भारतातील पहिला पेट्रोरसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.

▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.

▪️रायगड जिल्ह्यात - कातकरी, ठाणे जिल्ह्यात - वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

💥

भारतातली जागतिक वारसा स्थळे


🔰 संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे या यादीची 1972 साली स्थापना झाली.

🔰ती वारसा स्थळे UNESCO जागतिक वारसा परिषदेत वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारसा असलेली महत्त्वाची ठिकाणे असतात.

👉 आता भारतात एकूण 40 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यात 32 (तेलंगणा आणि गुजरात सहित) सांस्कृतिक स्थळे, 7 नैसर्गिक ठिकाणे आणि 1 मिश्रित ठिकाण आहे.

👉 सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असण्यामध्ये भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा देश आहे.

🏰💒🛕⛪️सांस्कृतिक🕌⛩🛤🏞
1) आग्र्‍याचा किल्ला, आग्रा, उत्तरप्रदेश

2) अजिंठा लेणी, महाराष्ट्र

3) नालंदा विद्यापीठ (महाविहार), बिहार

4) बौद्ध स्मारक, सांची, मध्यप्रदेश (1989)

5) चपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान,
    गुजरात

6) छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई, महाराष्ट्र

7) गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंट

8) एलिफंटा लेणी/घारापुरीची लेणी, मुंबई,
    महाराष्ट्र

9) एलोरा / वेरूळ लेणी, महाराष्ट्र

10) फत्तेपूर सिक्री, उत्तरप्रदेश

11) चोला राजांची मंदिरे, तमिळनाडू

12) हपीमधील मंदिरे, कर्नाटक

13) महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडू

14) पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक

15) राजस्थानामधील पर्वतीय किल्ले

16) अहमदाबाद हे ऐतिहासिक शहर

17) हमायूनची कबर, दिल्ली

18) खजुराहो, मध्यप्रदेश

19) महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार

20) भारतातली पर्वतीय रेल्वे (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी पर्वतीय रेल्वे)

21) कतुब मिनार, दिल्ली

22) राणी की वाव, पटना, गुजरात

24) लाल किल्ला, दिल्ली

25) दगडी निवारे, भिमबेतका, मध्यप्रदेश

26) कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क, ओडिशा

27) ताज महाल, आग्रा, उत्तरप्रदेश

28) ल कोर्बुझियरचे वास्तू कलाकृती, चंदीगड

29) जतर मंतर, जयपूर

30) मुंबईची व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट
      डेको एन्सेम्बल ही इमारत
31) काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिर,
       तेलंगणा
32) धोलावीरा हडप्पाकालीन शहर, गुजरात

  🏞🌅🎑 नैसर्गिक ⛰🗻🏔
1) ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान, कुल्लू, हिमाचल प्रदेश

2) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम

3) मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम

4) कवलदेव राष्ट्रीय उद्यान, राजस्थान

5) सदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल

6) नदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड

7) पश्चिम घाट (सह्यांद्री पर्वतरांगा)

    🟥🟧 मिश्र 🟨🟩

1) खांगचेंडझोंगा राष्ट्रीय उद्यान, सिक्किम

✅ UNESCO :-

👉 संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही फ्रांसची राजधानी पॅरिस शहरात असलेली संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे.

👉 स्थळांना ‘जागतिक वारसा’ हा दर्जा UNESCOकडून दिला जातो.

👉 या संघटनेची स्थापना दि. 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडन (ब्रिटन) येथे करण्यात आली.

👉 भारतासह 195 देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि 10 सहकारी सदस्य आहेत.

बंगालचे गव्हर्नर


   👇👇

१). रॉबर्ट क्लाइव:- १७५७ - ६०

२). हॉलवेल:- १७६०

३). वेन्सीटार्ट:- १७६० - १७६५

४). रॉबर्ट क्लाइव :- १७६५ - १७६७

५). वेरेलस्ट :-१७६७ - ६९

६). कार्टीयर :- १७६९ - ७२

७). वॉरेन हेस्टिंग्ज:- १७७२-७४

  बंगालचे गव्हर्नर जनरल👇👇

१). वॉरेन हेस्टिंग्ज :- १७७४ - १७७५

२). जॉन मॅकफरसन :- १७८५ - ८६

३). लॉर्ड कॉर्नवॉलीस :- १७८६ - ९३

४). जॉन शोअर् :- १७९३ - ९८

५). सर ए क्लार्क‌ :- १७९८

६). रिचर्ड वेलस्ली :- १७९८ - १८०५

७). लॉर्ड कॉर्नवॉलीस :- १८०५

८). जॉर्ज बार्लो :- १८०५ - १८०७

९). लॉर्ड मिंटो :- १८०७ - १८१३

१०). लॉर्ड हेस्टिंग्ज:- १८१३ - १८२३

११). जॉन एडम्स :- १८२३

१२). लॉर्ड एक्सहर्ट:- १८२३ - २८

१३). विल्यम बेली :- १८२८

१४). विल्यम बेंटिक:- १८२८ - ३३

   भारताचे गव्हर्नर जनरल👇👇

१). विल्यम बेंटिक :- १८८३ - ३५

२). चार्ल्स मेंटकाल्फ :- १८३५ - ३६

३). ऑकलंड :- १८३६ - ४२

४). एलेनबरो :- १८४२ - ४४

५). विलियम वर्ड :- १८४४

६). लॉर्ड हार्डिंग्ज :- १८४४ - ४८

७). लॉर्ड डलहौसी :- १८४८ - ५६

८). लॉर्ड कॅनिंग:- १८५६ - १८५८

        भारताचे व्हाईसरॉय👇👇

१. लॉर्ड कॅनिंग :- १८५८ - ६२

२.  एल्गिन :- १८६२-६३

३. नेपियर :- १८६३, विलियम डेनिसन :- १८६३

४. जॉन लॉरेन्स :- १८६४ - ६९

५. मेयो :- १८६९ - ७२

६. जॉन स्ट्रॅची :- १८७२

७. नॉर्थब्रूक :- १८७२ - ७६

८. लिटन :- १८७६ - ८०

९. रीपन :- १८८० - ८४

१०. डफरीन :- १८८४ - ८८

११. लॅन्सडाऊन :- १८८८ - ९४

१२. एल्गिन दुसरा :- १८९४ - ९८

१३. कर्झन:- १८९९ - १९०५

१४. मिंटो दुसरा :- १९०५ - १०

१५. हार्डिंंग :- १९१० - १६

१६. चेम्सफोर्ड :- १९१६ - २१

१७. रिडिंग :- १९२१ - २६

१८. आयर्विन :- १९२६ - ३१

१९. वेलिंग्टन :- १९३१ - ३६

२०. लिनलियगो:- १९३६ - ४४

२१). वेव्हेल:- १९४४ - ४७

२२). माऊंटबॅटन :- १९४७ - ४८

१७ ऑक्टोबर २०२१

सार्वजनिक काका (1828-1880)



💁  गणेश वासुदेव जोशी म्हणजे सार्वजनिक काका त्यांचा जन्म सातारा येथे 9 एप्रिल 1828 ला झाला.


✅ काका शिक्षणासाठी पुण्याला गेले आणि पुढे पुण्यातच वकिलीचा व्यवसाय व सामाजिक कार्यही सुरू केले.


✅ सार्वजनिक काकांनी वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेतले होते.


💁‍♂ 1870 ला पुणे येथे सार्वजनिक सभा झाली, त्यात मुख्य सहभाग काकांचा होता तर सभेचे अध्यक्ष औंधचे श्रीमंत श्रीनिवास पंत प्रतिनिधी हे होते.


✅ नयायमूर्ती रानडे आणि सार्वजनिक काका यांनी सभेला सामाजिक व राजकीय स्वरूप दिले.


✅ 1876-77ला महाराष्ट्रातील दुष्काळाचे वेळी सार्वजनिक सभेचे मार्फत लोकांना भरीव मदत केली.


✅ "देशी व्यापारोउत्तेजक मंडळाची" स्थापना केली.


💁‍♀ तयांची पत्नी सरस्वतीबाई जोशी यांनी 1871 मध्ये पुण्यात "स्त्री विचारवंती" ही सामाजिक संस्था सुरु केली.

परश्नमंजुषा



➖➖➖➖➖➖➖➖➖➖


💮परश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖


१) ०, ७, २६, ६३, ?

१) ९         २) २७ ३) ६४ ४) १२४


२) २०, १२, ६, २, ?

१) ४ २) २ ३) १ ४) ०


३) १, ३, ७, १५, ३१, ?

१) ३३ २) ५२       ३) ६३ ४) ७१


४) २, ३, ५, ७, ११, १३, १७, ?

१) २१ २) १९ ३) २७ ४) ३१


५) २, ५, ११, १७, २३, ?

१) १९ २) २५ ३) २७ ४) ३१


६) ३, ७, १३, १९, २९, ?

१) ३१ २) ३३ ३) ३७ ४) ४७


७) १६, २७, ३८, ?, ६०

१) ४९ २) ५१ ३) ५३ ४) ५७


८) ११, १३, १६, २१, ?, ३९, ५२

१) २३ २) २८ ३) ३१ ४) ३७


९) १६, २५, ३९, ?, ६४

१) ४०        २) ४३ ३) ४६ ४) ४९


१०) १०, २६, ५०, ?, १२२

१) ७१ २) ८२ ३) ९६ ४) १०४


११) १०, १७, २६, ३७, ?

१) ४२        २) ५० ३) ६१ ४) ८२


१२) १२, ४४, २८, ६०, ४४, ?

१) ७६        २) ८० ३) ४४ ४) ६६


१३) १३, १३, २०, १८, २७, ?, ३४, २८

१) १९ २) २१       ३) २३ ४) ३३


१४) ४, १६, ३६, ?, १००

१) ४२ २) ५४       ३) ६० ४) ६४


१५) २४, ३५, ४८, ?, ८०

१) ५२ २) ६३       ३) ७१      ४) ७९


१६) ५, ३, १०, ८, १७, ?, २६, २४

१) १५ २) १७ ३) २१ ४) २९


१७) ६, २, १२, ६, ?, १२, ३०

१) ११ २) १७ ३) २०        ४) ३१


१८) ८, २७, ६४, ?, २१६

१) १२५ २) ७८ ३) ८६ ४) ५८


१९) ९, २८, ६५, ?, २१७

१) ८२ २) ९३ ३) १२६       ४) १५४


२०) ६, २६, ६३, १२४, ?

१) ८०        २) ९६ ३) १७६       ४) २१५


➖➖➖➖➖➖➖➖➖➖


⭕️उत्तर :

१) ४ २) ४    ३) ३ ४) २ ५) ४     ६) ३ ७) १ ८) २ ९) ४ १०) २

११) २ १२) १ १३) ३ १४) ४ १५) २ १६) १ १७) ३     १८) १ १९) ३ २०) ४


➖➖➖➖➖➖➖➖➖➖


१) संख्यामार्लेत (n 3 - 1) या सुत्रानुसार १३ - १ = ०


२) संख्यामालेत (n2 - n) ) या सुत्रानुसार ५ - ५ = २०


३) संख्यांमध्ये अनुक्रमे २, ४, ८, १६, ३२ चा फरक


४) क्रमाने येणाऱ्या मुळसंख्या


५) एकाआड एक येणाऱ्या मूळसंख्या


६) एकाआड एक येणाऱ्या मूळसंख्या


७) लगतच्या दोन संख्यांमध्ये ११ चा फरक


८) संख्यामालेत अनुक्रमे २,३,५,७,११,१३ या क्रमवार मूळसंख्यांचा फरक


९) अनुक्रमे ४, ५, ६, ७, ८ या नैसर्गिक संख्यांचे वर्ग


१०) n2 + 1 सुत्रानुसार ३, ५, ७, ९, ११ संख्यांचे वर्ग + १


११) n 2 + 1 सुत्रानुसार ३, ४, ५, ६, ७ संख्यांचे वर्ग + १


१२) स्म्स्थानावरील संख्या (उदा. ४४) मागील विषमसंख्येपेक्षा (उदा. १२) ३२ ने अधिक व पुढील विषमसंख्येपेक्षा (उदा. २८) १६ ने कमी


१३) विषमस्थानावरील संख्यांमध्ये ७ चा फरक, समस्थानावरील संख्यांमध्ये *५ चा फरक


१४) अनुक्रमे २, ४, ६, ८, १० या समसंख्यांचे वर्ग


१५) n 2 - 1 सूत्रानुसार ५, ६, ७, ८, ९ संख्यांचे वर्ग - १


१६) विषमस्थानावर n 2 + 1 नुसार २, ३, ४, ५ या संख्यांचे वर्ग + १ तर समस्थानावर n 2 - 1 नुसार २, ३, ४, ५ या संख्यांचे वर्ग - १


१७) विषमस्थानावर n 2 + n नुसार २, ३, ४, ५ संख्यांचे वर्ग + १ तर समस्थानावर n2 - n नुसार २, ३, ४, ५ संख्यांचे वर्ग उणे (-) अनुक्रमे त्याच संख्या.


१८) n3 नुसार अनुक्रमे २, ३, ४, ५, ६ या संख्यांचे घन


१९) n3 + 1 नुसार अनुक्रमे २,३,४,५,६ या संख्यांचे घन + १


२०) n3 - 1 नुसार अनुक्रमे २, ३, ४, ५, ६ या संख्यांचे घन उणे १


मराठी व्याकरण - भाषेतील रस



रसाचा शब्दश: अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. व्यवहारात गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट व कडू असे सहा रस आहेत. या सहा रसांमुळेच आपणास पदार्थांची गोडी किंवा चव कळते. यालाच आपण रसास्वाद म्हणतो.


साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंत:करणातील भावना उद्दीपित होतात व रसानिर्मिती होते.


मानवी मनात काही भावना कायमच्या वास करीत असतात उदा. प्रेम करण्याची, रागावण्याची, हसण्याची, दु:खाची, पराक्रमांची इ. या मनातील ‘स्थिर’ व ‘शाश्वत’ भावनांनाच काव्यशास्त्रात ‘स्थायीभाव’ असे म्हणतात.


साहित्य कृतीच्या वाचनाने ‘स्थायी भाव’ जागृत होतात व रसनिर्मिती होते.


१) स्थायीभाव - रती


रसनिर्मिती – शृंगार


हा रस कुठे आढळतो - स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणाच्या वर्ननातुन


उदा – डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहु नका.


२) स्थायीभाव – उत्साह


रसनिर्मिती - वीर


हा रस कुळे आढळतो - पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनात


उदा. ‘शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’


३) स्थायीभाव –शोक


रसनिर्मिती – करुण


हा रस कुठे आढळतो - दुख, वियोग, संकट यांच्या वर्णनात


उदा – आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी!


४) स्थायीभाव – क्रोध


रसनिर्मिती – रौद्र


हा रस कुळे आढळतो – क्रोध, चीड किंवा रागाचे वर्णन


उदा – मनिषाच्या त्या वर्तनाकडे आई डोळे वटारून पाहत होती.


५) स्थायीभाव – हास


रसनिर्मिती – हास्य


हा रस कुठे आढळतो - विसंगती, असंबध्द भाषण, विडंबन,चेष्टा यांच्या वर्णनात.


उदा – मानसीच पेपर लिहिताना लक्ष विचलित होऊ नये म्हणून रश्मी बरोबर अडीच तास आठ दिवस भजी तळत बसायची.


६) स्थायीभाव – भय


रसनिर्मिती- भयानक


हा रस कुळे आढळतो - युद्ध, मृत्यु, खून, सूड, राक्षस, स्मशान इ. च्या वर्णनात.


उदा. तो गुरासारखा ओरडला त्याचे सारे रक्त उलथे पालथे झाले व त्याने जोरात किंकाळी फोडली.


७) स्थायीभाव – जुगुप्सा


रसनिर्मिती – बीभत्स


हा रस कुठे आढळतो - किळस, वीट, तिटकारा इ. च्या वर्णनात.


उदा – मुंबईचा कामगार चाळीतल्या दहा बाय बाराच्या घरात, कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी, ओकारी आणणाऱ्या दुर्गधीत आयुष्यभर खितपत पडलेला असतो.


८) स्थायीभाव – विस्मय


रसनिर्मिती- अदभुत


हा रस कुठे आढळतो - आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनात


उदा – असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.


९) स्थायीभाव – शम (शांती)


रसनिर्मिती – शांत


हा रस कुळे आढळतो - परमेश्वर विषयक भक्ती भाव असलेली गांणी किंवा वातावरणात.


उदा – सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनि तेजाकंडे प्रभू आमच्या ने जीवंना !

सख्या व संख्याचे प्रकार



N संख्यांची सरासरी = दिलेल्या संख्यांची बेरीज / n, n = एकूण संख्या 


क्रमश: संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते. 


उदाहरणार्थ – 12, 13, [14], 15, 16  या संख्या मालेतील संख्यांची सरासरी = 14 


संख्यामाला दिल्यावर ठरावीक संख्यांची (n) सरासरी काढण्यासाठी 

n या क्रांश: संख्यांची सरासरी = (पहिली संख्या + शेवटची संख्या) / 2 


उदा. 1) क्रमश: 1 ते 25 अंकांची सरासरी = 1+25/2 = 26/2 = 13 


1 ते 20 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी =1+19/2 =20/2 =10 


N या क्रमश:  संख्यांची बेरीज = (पहिली संख्या + शेवटची संख्या) x n/ 2


उदा.

1) 1 ते 100 अंकांची बेरीज = (1+100)x20/2 = 81x20/2 = 810


(31 ते 50 संख्यांमध्ये एकूण 20 संख्या येतात. यानुसार n = 20)


नमूना पहिला –

उदा.

चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 35 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?

32

30

34

28

उत्तर : 32

क्लृप्ती :-

सरासरी संख्या ही क्रमवार संख्यांच्या मधली संख्या असते.

32, 34, [35], 36, 38

नियम –

क्रमश: असलेल्या अंकांची सरासरी = (पहिली संख्या+शेवटची संख्या) ÷ 2

वरील सूत्रानुसार 1+20/2 = 10.5,  1+10/2 = 5.5  

यावरून (10.5-5.5) = 5

 

नमूना दूसरा –

उदा.

क्रमश: 1 ते 100 अंकांची बेरीज किती?

5050

10050

10100

2525

उत्तर : 5050

क्लृप्ती :

क्रमश: संख्यांची बेरीज = सरासरी × एकूण संख्या = 1+100/2 ×100 किंवा

= 101×100/2 = 101×50 = 5050  

 

नमूना तिसरा-

उदा.

35, 39, 45, 36, आणि 4* या दोन अंकी संख्यांची सरासरी 39 आहे; तर शेवटच्या संख्येतील एकक स्थानचा * च्या जागे वरील अंक कोणता?

3

5

0

7

उत्तर : 0

क्लृप्ती :  

सरासरी = 39 [मधली संख्या  (35 36 39 45 4*)]

एकूण = 39×5 = 195  

एकक स्थानी 5 येण्यास 5+9+5+6+* = 25 = 0 = 25    

0+5 = 5     

:: * = 0

 

नमूना चौथा –

उदा.

क्रमश: पाच विषम संख्यांची सरासरी 37 आहे. त्यापुढील 5 विषम संख्यांची सरासरी 47 आहे; तर त्या दहाही संख्याची सरासरी किती?

44

43

42

40

उत्तर : 42

क्लृप्ती :

एकूण संख्यांची सरासरी = सरसरींची बेरीज / एकूण संख्या (N) 37+47/2 = 42

 

नमूना पाचवा –

उदा.

एका नावेत सरासरी 22 कि.ग्रॅ. वजनाची 25 मुले बसली. नावाड्यासह सर्वाचे सरासरी वजन 24 कि.ग्रॅ. झाले तर नावाड्याचे वजन किती?

74 कि.ग्रॅ.

71 कि.ग्रॅ.

75 कि.ग्रॅ.

100 कि.ग्रॅ.

उत्तर : 74 कि.ग्रॅ.

नावाड्याचे वजन = (सरासरीतील फरक × विधार्थ्यांची संख्या) + नवीन सरासरी

क्लृप्ती :

सरसरीतील फरक = 24 -22   2×25.    

नावाड्याचे वजन = 50+24 = 74

 

नमूना सहावा –

उदा.

एका वर्गातील सर्व मुलांच्या वयांची सरासरी 15 वर्षे आहे. त्यापैकी 15 मुलांच्या वयांची सरासरी 12 वर्षे आहे व उरलेल्या मुलांची सरासरी 16 वर्षे आहे, तर त्या वर्गात एकूण मुले किती?

60

45

40

50

उत्तर : 60

स्पष्टीकरण :-

15 मुलांच्या वयांची सरासरी एकूण मुलांच्या सरासरी पेक्षा 3 ने कमी व उरलेल्या मुलांच्या वयाची सरासरी 1 ने जास्त आहे. एकूण भरून काढावयाची वर्षे = 3×15 विधार्थी = 45 वर्षे

उरलेल्या विधार्थ्यांपैकी 1 विधार्थी 1 वर्ष भरून काढतो.

उरलेले विधार्थी = 1×45 = 45 विधार्थी

:: एकूण विधार्थी = 45+15 = 60 विधार्थी

 

नमूना सातवा –

उदा.

एका दुकानदाराची 30 दिवसांची सरासरी विक्री 155 रु. आहे पहिल्या 15 दिवसांची सरासरी विक्री 190 रु. असल्यास; नंतरच्या 15 दिवसांची एकूण विक्री किती?

285

2375

1800

1950

उत्तर : 1800

क्लृप्ती : -

(155 – सरसरीतील फरक)×15

= (155-35)×15

= 120×15

= 1800

 

नमूना आठवा –

उदा.

ताशी सरासरी 60 कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोहचते. जर ती ताशी सरासरी 50 कि.मी. वेगाने गेल्यास ती निर्धारित वेळेपेक्षा 30 मिनिटे उशीरा पोहचते. तर तिने कापावयाचे एकूण अंतर किती?

300 कि.मी.

150 कि.मी.

450 कि.मी.

यापैकी नाही

उत्तर : 150 कि.मी.

स्पष्टीकरण :-

एकूण अंतर x मानू

∷x/50-x/60=30/60    

∶:(6x-5x)/300=1/2     

x= 300/2

=150 कि.मी.

📚 *स्पर्धापरीक्षा महत्त्वाच्या क्लुप्त्या (Short tricks)*



🔖 *अभ्रक उत्पादक प्रमुख देश*
क्लुप्ती :- "B.B.C."
• B - भारत.
• B - ब्राझील.
• C – चीन.

🔖  *द्वीपकल्पावरील महत्वाची शखरे उतरत्या क्रमाने*
क्लुप्ती :- "अन्ना दोन वेळा गुरु सोबत 
काळूबाईला धूप वाहायला गडावर गेला".
• अन्ना - अनायमुडी - २६९५.
• दोन - दोडाबेटा - २६३.
• गुरु - गुरुशिखर - १७२२.
• काळूबाई - कळसुबाई - १६४६.
• प - धुपगड = १३५०.

🔖 *क्षेञफळानुसार पहिले  क्रमवार सात देश*
क्लूप्ती :- "RusCi ChiU BAI 
(रुसकी चिऊ बाई)".
• Rus - रुस - रशिया (१७.०७५.००० स्के . 
ͩकिमी).
• Ci - की - कानडा (९,९७६,१३९ स्के . 
ͩकिमी).
• Chi - चि - चीन (९,५६१,००० स्के . किमी).
• U - ऊ - अमेरिका (९,३७२,६१४ स्के . 
ͩकिमी).
• B - ब्राझील (८,५११,८६५ 
स्के . किमी).
• A - ऑस्ट्रेलिया (७,६८२,३०० 
स्के . किमी).
• I - इंडिया (३,२८७,२६३ स्के. ͩकिमी).

🔖 *महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगा व त्या दरम्यानच्या नद्या*
क्लुप्ती :- "विन सातसा गोहभी मकृ."
• वि  - विंध्य पर्वत.
• न - नर्मदा.
• सा - सातपुडा.
• ता - तापी.
• सा - सातमाळ.
• गो - गोदावरी.
• ह - हरिचंद्र बालघाट.
• भी - भीमा.
• म - महादेव.
• कृ – कृष्णा.

🔖 *भारताचे आतापर्यंतचे सर्व राष्ट्रपती क्रमानुसार*
क्लुप्ती :- "राजू कि राधा जाकर ͬगिरी
फकरुद्दीन रेड्डी की जेल में तब राम शंकर 
ͩकि कलम से प्रतिभा निकाली प्रणव कि राम ".
• राजू - राजेंद्र प्रसाद.
• राधा - एस. राधाकृष्णन.
• जाकर - जाकीर हुसेन.
• गिरी - वी.वी. गिरी.
• फकरुद्दीन - फकरुद्दीन अली अहमद.
• रेड्डी - निलम संजीव रेड्डी.
• जेल - ज्ञानी जैल सिंह.
• राम - रामकृष्ण वेंकटरमण.
• शंकर - शंकर दयाल शर्मा.
• नारायण - के. आर. नारायण.
• कलम - ए.पी.जे.अब्दुल कलाम.
• प्रतिभा - प्रतिभा देवी पाटिल.
• प्रणव - प्रणव मुखज्री.
• राम - रामनाथ कोविंद.
>> "जस्टिस एम. हिदायतुल्ला दोन वेळा 
भारतप्रप्त राष्ट्रपती होते आणि बिडी 
जाट्टी एक वेळा."

🔖 *विधान परिषद अस्तित्वात असलेली राज्ये - ०७.*
क्लुप्ती :- "आम का बीज उत्तम"
• आ - आंध्र प्रदेश.
• म - महाराष्ट्र.
• का - कर्नाटक.
• बी - बिहार.
• ज - जम्मू आणि काश्मीर.
• उ - उत्तर प्रदेश.
• ते - तेलंगणा.

🔖 *महाराष्ट्रातील चार  नगरपंचायतीची नावे*
क्लुप्ती :- "Dasi Ne Kamal Fulavile"
• Da - Dapoli.
• Shi - Shirdi.
• K - Kanakwali.
• Ma - Malakapur.

🔖 *प्रमुख पर्वत व त्यांचे प्रकार*
क्लुप्ती :- "यु आर ए हिमालय"
• यु -  युराल (रुस).
• आ - आल्पस.
• र - रॉकी.
• ए - एन्डीज हिमालय.
>> हे सगळे वलिय पर्वत आहेत.

🔖 *महाराष्ट्रच्या प्रमुख नद्यांचा विस्तारानुसार उतरता क्रम*
क्लुप्ती :- "गोभीकृतान"
• गो - गोदावरी.
• भी - भीमा.
• कृ - कृष्णा.
• ता - तापी.
• न - नर्मदा.

🔖 *हिमाचल पर्वतरांगाच्या दक्षिण उत्तरावर असलेले गीरीस्थानके*
क्लुप्ती :- "शिमा नैनाला घेवून दार्जीलिंग ला गेली."
• शि - शिमला.
• म - मसुरी.
• नैना – नैनिताल.
• दिली - दार्जीलिंग.

इंग्रजी व्याकरण :- Voice

⭐️ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना इंग्रजी व्याकरण हा हमखास गुण मिळवून देणारा विषय आहे. आज आपण इंग्रजी व्याकरणातील 'Voice' अर्थात 'प्रयोग' हा विषय अभ्यासणार आहोत.

इंग्रजी व्याकरणात मराठी व्याकरणाप्रमाणे 3 प्रयोग नसून फक्त 2 प्रयोग असतात.

1) Active Voice (कर्तरी प्रयोग)
2) Passive Voice (कर्मनी प्रयोग)

⭐️ प्रयोगाचे गुणधर्म :

👉 Active Voice :

▪ यामध्ये वाक्याची सुरुवात कर्त्याने होते.
▪ वाक्यात कर्ता मुख्य असतो.
▪ वाक्यात कर्ता सक्रिय असतो.
▪ वाक्यातील क्रिया कर्त्यामार्फत केली जाते.

📊 या प्रयोगातील वाक्याची रचना साधारणतः Subject + Verb + Object अशी असते.

उदा. Sue changed the flat tire.

👉 Passive Voice :

▪ यामध्ये वाक्याची सुरुवात कर्माने होते.
▪ वाक्यात कर्म मुख्य असते.
▪ वाक्यात कर्ता निष्क्रिय असतो.
▪ वाक्यातील क्रिया कर्माकडून कर्त्यावर केली जाते.

📊 या प्रयोगातील वाक्याची रचना साधारणतः Object + Verb  अशी असते.

उदा. The flat tire was changed by Sue.

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...