२७ सप्टेंबर २०२०

जलयुक्त शिवार' अभियानाचे काही प्रमुख उद्देश..


🅾️पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडविणे


🅾️भगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे


🅾️राज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करुन शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध करण्याची शाश्वता निर्माण करणे


🅾️भजल अधिनियमाची अंमलबजावणी


🅾️विकेंद्रीत पाणीसाठा निर्माण करणे


🅾️पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे


🅾️अस्तित्वात असलेले व निकामी झालेले बंधारे, गावतलाव, पाझरतलाव, सिमेंट बंधारे आदि जलस्तोत्रांची साठवण क्षमता वाढविणे


🅾️जलस्त्रोतातील गाळ लोकसहभागातून काढून पाणीसाठा वाढविणे


🅾️पाण्याच्या ताळेबंदाबाबत आणि कार्यक्षम वापराबाबत प्रभावी जनजागृती तसेच वृक्षलागवडीस प्राधान्य देणे.

ईश्वर चंद्र विद्यासागर


📌 26 सप्टेंबर 1820 ते 29 जुलै 1891


📌 मळ नाव :- नाव ईश्वरचंद्र बन्दोपाध्याय.



◾️1839 साली हिंदुधर्मशास्त्रविषयक परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने मिळालेल्या प्रमाणपत्रात त्यांच्या नावापुढे ‘विद्यासागर’ ही उपाधी लावली होती


◾️तयांचे पुस्तक 'बोर्नो पोरीचॉय' (अक्षर परिचय),अद्याप बंगाली वर्णमाला शिकण्यासाठी प्रारंभिक मजकूर म्हणून वापरला जातो


◾️महिलांच्या शिक्षणसाठी समर्थक असे


◾️शिक्षणखात्यातर्फे मुली शिकल्या पाहिजेत, या हेतूने त्यांनी 35 नवीन बालिका विद्यालये, एक मध्यवर्ती अध्यापक विद्यालय आणि बंगालमधील प्रमुख शहरांत आदर्श (Model) विद्यालये स्थापन केली


◾️1856 साली विधवाविवाहाचा अधिनियम संमत करून घेण्यात त्यांचा मोठा वाटा होता.


◾️ईश्वरचंद्र हे स्वतः कर्ते सुधारक होते. स्वतःच्या मुलींची लग्‍ने त्यांनी त्या चौदा-पंधरा वर्षांच्या होईपर्यंत केली नाहीत. आपल्या मुलाचे लग्‍न त्यांनी एका बालविधवेशी लावून दिले होते


◾️बगाली वृत्तपत्र -शोम प्रकाश 1858 मध्ये प्रकाशन करण्यास सुरुवात केली


◾️1877 साली कलकत्त्यास भरलेल्या दरबारात ईश्वरचंद्र यांना इंग्‍लंडच्या राणीकडून बहुमानाची सनद मिळाली व पुढे ‘सी. आय. इ.’ ही पदवीही मिळाली.


◾️‘मी वास्तव जगाचा व त्यात राहणाऱ्या जीवांचाच विचार करीत असतो. माणुसकीने वागणे हाच मी माझा धर्म मानतो’, असे ते म्हणत.


◾️सारे जग त्यांना ‘विद्यासागर’ म्हणून ओळखीत असले, तरी बंगालमधील सर्वसामान्य जनता त्यांना ‘दयासागर’ म्हणूनच अधिक ओळखते.

भारतीय घटनेतील प्रमुख कलमे

भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.


कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती


कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे


कलम १४. - कायद्यापुढे समानता


कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा


कलम १८. - पदव्या संबंधी


कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार


कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी


कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार.


कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना


कलम ४४. - समान नागरी कायदा


कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण


कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन


कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग


कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे


कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती


कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक


कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता


कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही


कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ


कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग


कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती


कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता


कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग


कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक


कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार


कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ


कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार


कलम ७६. - भारताचा महान्यायवादी


कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल


कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य


कलम ७९ - संसद


कलम ८० - राज्यसभा


कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील


कलम ८१. - लोकसभा


कलम ८५. - संसदेचे अधिवेशन


कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते


कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो


कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही


कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो


कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या


कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक


कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार


कलम १२४. - सर्वोच न्यायालय


कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.


कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात


कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक


कलम १५३. - राज्यपालाची निवड


कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ


कलम १५७. - राज्यपालाची पात्रता


कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)


कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती


कलम १७०. - विधानसभा


कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग


कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक


कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार


कलम २१४. - उच्च न्यायालय


कलम २३३. - जिल्हा न्यायालय


कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये


कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार


कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी


कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार


कलम २८०. - वित्तआयोग


कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा


कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग


कलम ३२४. - निवडणूक आयोग


कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा


कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा


कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती


कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी


कलम ३५६. - राज्य आणीबाणी


कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी


कलम ३६८. - घटनादुरुस्ती


कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती


कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे


कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता

पॅसेज एक्सरसाईज” (PASSEX): भारतीय नौदल आणि ऑस्ट्रेलियाचे नौदल यांच्यामधला संयुक्त सागरी सराव


💬 पूर्व हिंद महासागर प्रदेशात 23 सप्टेंबर आणि 24 सप्टेंबर 2020 रोजी भारतीय नौदल आणि ऑस्ट्रेलियाचे रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही यांच्यामधला संयुक्त “पॅसेज एक्सरसाईज” (PASSEX) नामक सागरी सराव आयोजित करण्यात आला.


♦️ठळक बाबी....


💬 दोन्ही नौदलांच्या दरम्यान होणाऱ्या कार्यात सुसूत्रबद्धता राखणे, एकमेकांना समजून घेणे तसेच सुयोग्य पद्धतीना आत्मसात करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते.


💬 सरावात भारतीय नौदलाच्या INS सह्याद्री आणि INS कर्मुक या जहाजांनी भाग घेतला होता.हा भारतीय नौदलाच्या पुढाकाराने मित्र राष्ट्रांच्या नौदलासोबत नियमितपणे आयोजित केला जाणार सराव आहे.


♦️ऑस्ट्रेलिया देश....


💬 ऑस्ट्रेलिया हा ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रकुल दक्षिण गोलार्धाच्या खंडाच्या अंतर्गत असलेला एक देश आहे, जो जगातला सर्वात छोटा खंड आहे आणि जगातला सर्वात मोठा बेट देखील आहे, जो हिंद व प्रशांत महासागरात पसरलेला आहे. ऑस्ट्रेलिया हा एकमेव असा प्रदेश आहे, जो एक खंड, एक राष्ट्र आणि एक बेट आहे. कॅनबेरा हे देशाचे राजधानी शहर आहे आणि ऑस्ट्रेलियाई डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे

इटालियन खुली टेनिस स्पर्धा - जोकोव्हिचला पाचवे विजेतेपद.


🏆 सर्बियाचा अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचने कारकीर्दीत पाचव्यांदा इटालियन खुली टेनिस स्पर्धा जिंकली. जोकोव्हिचने अंतिम फेरीत अर्जेटिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनला ७-५, ६-३ असे पराभूत केले. हे विजेतेपद पटकावत पुढील आठवडय़ात सुरू होणाऱ्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे जोकोव्हिचने सिद्ध केले.


🏆 नकत्याच झालेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत जोकोव्हिचला रागाच्या भरात अनवधानाने पंचाच्या घशावर चेंडू आदळवल्यामुळे स्पर्धेबाहेर पडावे लागले होते. त्यात भर म्हणजे उपांत्यपूर्व सामन्यात रागाच्या भरात रॅकेट जमिनीवर आदळवल्यामुळे जोकोव्हिचला पंचांकडून ताकीद देण्यात आली.


🏆  मात्र या सर्व प्रकारानंतरही जोकोव्हिचला लाल मातीवरील इटालियन स्पर्धा जिंकता आली. मात्र अंतिम फेरीतही पहिल्या सेटमध्ये जोकोव्हिच ०-३ पिछाडीवर होता. या पिछाडीनंतरही जोकोव्हिचने पहिला सेट जिंकला.


🏆 दसरा सेटही सहज जिंकत जोकोव्हिचने पाऊस सुरू होण्याच्या आतमध्ये विजेतेपदावर नाव कोरले. त्यातच श्वार्ट्झमन ही ‘एटीपी’ १००० प्रकारातील पहिलीच अंतिम लढत खेळत होता. त्याने उपांत्यपूर्व फेरीत स्पेनचा अव्वल राफेल नदालला पराभवाचा धक्का दिला होता.

2025 सालापर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याला भारताचे सर्वोच्च प्राधान्य: डॉ हर्ष वर्धन


👁‍🗨 कद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी 23 सप्टेंबर 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य देशांचे सभासद, संयुक्त राष्ट्रसंघ संस्थांचे प्रमुख आणि प्रतिनिधी आणि भागीदारी संस्था यांच्याशी आभासी पद्धतीने संवाद साधला. बैठकीत त्यांनी क्षयरोगाच्या उच्चाटनाबाबत भारताच्या भूमिकेविषयी स्पष्टता दिली.


🔵 भारत सरकारचे प्रयत्न....


👁‍🗨 कषयरोग एक प्रमुख जागतिक आरोग्य समस्या आहे.भारताने 2025 सालापर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. म्हणजेच जागतिक शाश्वत ध्येयाच्या 2030 सालाच्या मुदतीपूर्वी साध्य करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.अनेक नवोन्मेष योजनांच्या माध्यमातून क्षयरोग निर्मुलनासाठी अनेक महत्त्वाचे उपाय योजिले आहेत.


👁‍🗨  नोंद नसलेल्या क्षयरोगांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. 2016 साली रुग्णांच्या एक दशलक्ष संख्येवरुन ही संख्या 2019 साली अर्ध्या दशलक्षावर आली.वर्ष 2020 मध्ये 2.4 दशलक्ष रुग्णांची नोंद झाली, त्यापैकी एक तृतीयांश नोंदी खासगी क्षेत्राच्या मदतीने केल्या गेल्या आहेत.प्रत्येक जिल्ह्यात रॅपीड मोलेक्युलर निदान चाचणी सुविधा प्रदान केल्यामुळे 2019 साली 66,000 रुग्ण ओळखण्यास मदत झाली.


👁‍🗨 कोविड-19 महामारीमुळे लागू केलेल्या टाळेबंदीच्या काळात क्षयरोग रुग्णांना घरपोच औषधी पुरविण्यात आली. तसेच सुदूर-संवाद, सक्रीय छाननी अनेक रुग्णांसाठी फलदायी ठरली.टाळेबंदीनंतर क्षयरोग रोग्यांना ओळखण्याविषयी राज्य सरकारांसाठी नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. 


👁‍🗨 सरकारने क्षयरोग आणि कोविड रूग्णांमध्ये बाय-डिरेक्शनल तपासणी आणि ILI आणि SARI प्रकरणांमध्ये क्षयरोगाची तपासणी आरंभ करण्यात आल्या.सरकारने थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून क्षयरोग्यांना आर्थिक मदत देत आहे. एप्रिल 2018 पासून 3 दशलक्ष लाभार्थ्यांना 7.9 अब्ज रुपये एवढी रक्कम दिली गेली.


🔵क्षयरोगाविषयी....


👁‍🗨 हा रोग प्राचीन काळापासून जगातल्या अनेक देशांमध्ये अस्तित्वात आहे. 24 मार्च 1882 रोजी डॉ. रॉबर्ट कॉच यांना क्षयरोगाचे कारक असलेल्या ‘TB बॅसीलस’ नामक जिवाणूचा शोध लागला.


👁‍🗨 कषयरोग मुख्यत: हवेच्या माध्यमातून पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. क्षयरोगाच्या निर्मितीस मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलॉसिस हे सूक्ष्मजंतू कारणीभूत असतात. त्यांचा प्रसार रुग्णाच्या खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या द्रवाच्या सूक्ष्म थेंबांमुळे होतो. क्षयरूग्णाचे निदान झालेल्या रूग्णाला डॉट्स (DOTS) प्रोव्हायडरमार्फत औषधोपचार दिला जातो.

अभ्यास’ ड्रोनची उड्डाण चाचणी यशस्वी.


✅ 22 सप्‍टेंबर 2020 रोजी ‘अभ्यास’ नामक हाय-स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट (HEAT) म्हणजेच एका ड्रोनची उड्डाण चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्यावतीने (DRDO) ओडिशा राज्यात ही चाचणी घेण्यात आली. यावेळी दोन निदर्शक वाहनांची यशस्वी चाचणी घेण्यात आली.


✅ विविध क्षेपणास्त्र यंत्रणेचे मूल्यांकन करण्यासाठी लक्ष्य म्हणून ‘अभ्यास’चा उपयोग केला जाऊ शकतो.


🔆‘अभ्यास’ची वैशिष्ट्ये...


✅ उड्डाणासाठी यात जुळे अंडरलंग बूस्टरचा वापर करण्यात आला आहे. लहान गॅस टर्बाइन इंजिनाच्या मदतीने ते उडते.


✅ वाहनात मार्गदर्शन आणि नियंत्रणासाठी फ्लाइट कंट्रोल कंम्प्यूटर (FCC) सोबतच MEMS आधारित इनर्शल नेव्हिगेशन सिस्टिम (INS) बसविण्यात आले आहे.


✅ वाहनाच्या उड्डाणाचे ‘प्रोग्रॅमिंग’ स्वतंत्रपणे केले जाऊ शकते. तसेच वाहनाची सर्व कार्यप्रणाली लॅपटॉपच्या मदतीने GSAवरून संचालित केली जाऊ शकते.‘अभ्यास’ची रचना आणि विकास DRDOच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट ईस्टॅब्लिशमेंट (ADE) या केंद्राने केले.

DRDO एक महत्त्वपूर्ण यश मिळवलं.


💠 लडाख सीमेवर चीन बरोबर तणावाची स्थिती असताना संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) एक महत्त्वपूर्ण यश मिळवलं आहे.


💠 डीआरडीओने लेझर गाइडेड रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची (ATGM) यशस्वी चाचणी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशाबद्दल डीआरडीओचे अभिनंदन केले आहे.अहमदनगरच्या केके रेंज येथे एमबीटी अर्जुनवरुन या मिसाइलची चाचणी करण्यात आली.


💠 “नजीक भविष्यात आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मेहनत करणाऱ्या डीआरडीओच्या टीमचा भारताला अभिमान आहे” असे राजनाथ सिंह यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.


💠 आर्मड कॉर्प्स सेंटर अँड स्कूल अहमदनगर येथे यशस्वी चाचणी केल्याचे डीआरडीने मंगळवारी जाहीर केले होते.एमबीटी अर्जुन रणगाडयावरुन डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्राने तीन किलोमीटरवरील लक्ष्याचा अचूकतेने वेध घेतला.

शिवांगी सिंह ‘राफेल’च्या पहिल्या महिला फायटर पायलट.


🛫 अलीकडेच ‘राफेल’ या अत्याधुनिक फायटर विमानांचा इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यात समावेश  झाला.


🛫 ‘गोल्डन अ‍ॅरो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राफेलच्या पहिल्या स्क्वार्डनमध्ये एका महिला फायटर पायलटचा समावेश करण्यात आला आहे.


🛫 फलाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह असे या महिला फायटर पायलटचे नाव आहे.

शिवांगी सिंह 2017 साली इंडियन एअर फोर्सच्या सेवेत रुजू झाल्या. 


🛫 तया दुसऱ्या बॅचमधील फायटर पायलट आहेत.त्या लवकरच अंबाला स्थित ‘गोल्डन अ‍ॅरो’ च्या 17 व्या स्क्वार्डनच्या भाग होतील.

अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. शेखर बसू यांचे निधन.


💐ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. शेखर बसू यांचे करोना संसर्गाने गुरुवारी कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले.


💐वयाची 68 वर्षे पूर्ण केल्यानंतर तीनच दिवसांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

डॉ. बसू यांना 2014 साली पद्मश्री उपाधीने गौरवण्यात आले होते. 


💐‘आयएनएस अरिहंत’ या अणुऊर्जेवर चालणाऱ्या भारताच्या पहिल्या पाणबुडीसाठी अतिशय गुंतागुंतीची अणुभट्टी (रिअ‍ॅक्टर) तयार करण्याचेही ते प्रणेते होते.


💐2012 साली डॉ. बसू यांनी भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्राचे (बीएआरसी) संचालक म्हणून सूत्रे स्वीकारली.


💐तारापूर व कलपक्कम येथील ‘न्यूक्लियर रिसायकल प्लांट’ यांचा आराखडा, बांधकाम व संचालन यामागे प्रामुख्याने त्यांचीच प्रतिभा  होती.

RAISE 2020: कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रोत्साहन देणारी आभासी शिखर परिषद


🌺सामाजिक हितार्थ कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने 5 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर 2020 या कालावधीत एक आभासी महाशिखर परिषद आयोजित केली जाणार आहे, जिचे नाव आहे – “RAISE 2020” (सामाजिक सशक्तीकरणासाठी जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता 2020). पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.


🔰कार्यक्रमाविषयी...


🌺भारत सरकारचे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि नीती आयोग यांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.


🌺AI तंत्रज्ञानाद्वारे सामाजिक परिवर्तन, समावेश आणि सशक्तीकरणासाठी भारताची कल्पना आणि रूपरेषा तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर जगभरातल्या विचारवंतांची ही अशा प्रकारची पहिलीच बैठक आहे.


🌺इतर क्षेत्रांबरोबर आरोग्यसेवा, कृषी, शिक्षण आणि स्मार्ट वाहतूक यासारख्या क्षेत्रात सामाजिक परिवर्तन, समावेशकता आणि सशक्तीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी अभ्यासक्रम आखणे आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी हा जागतिक मंच असणार आहे.


🌺परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधन, धोरण आणि नवसंशोधन विषयातले प्रतिनिधी आणि तज्ञ जगभरातून सहभागी होणार आहेत.


🌺‘महामारी सज्जतेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर’, ‘डिजिटलीकरणाला नवसंशोधनाची चालना’, ‘सर्वसमावेशक AI’, ‘यशस्वी नवसंशोधनासाठी  भागीदारी’ इत्यादी विविध विषयांवर या परिषदेत चर्चा होणार आहे.


🌺कार्यक्रमांचाच एक भाग म्हणून, ‘AI सोल्यूशन चॅलेंज’द्वारे निवडलेले  स्टार्टअप 6 ऑक्टोबर 2020 रोजी ‘AI स्टार्टअप पिच फेस्ट’ या प्रदर्शनीत सादरीकरण करणार.


🌺भारत या क्षेत्रासाठी जगातली तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी परिसंस्था आहे. उद्योग विश्लेषकांचा असा अंदाज आहे की, 2035 सालापर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता भारताच्या अर्थव्यवस्थेत 957 अब्ज डॉलर एवढ्या उत्पन्नाची भर घालू शकते.

अक्किथम अच्युतन नंबुथिरी (मल्याळी कवि): 55 व्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी.


🧩परसिद्ध मल्याळी कवि अक्किथम अच्युतन नंबुथिरी यांचा 55 वा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.


🅾️अक्किथम नंबुथिरी विषयी....


🧩मल्याळी साहित्यातले नामांकित व्यक्तित्व असलेले अक्किथम नंबुथिरी यांच्या नावावर 55 पुस्तके आहेत, त्यात 45 काव्यसंग्रह आहेत.


🧩93 वर्षांचे अक्किथम नंबुथिरी यांना साहित्य अकादमी, पद्मश्री, कबीर यासहित देशातले बहुतेक सारे वाङ्मयीन पुरस्कार लाभले. ‘उन्नी नंबुद्री’ या मासिकाचे ते संस्थापक आहेत. याशिवाय, त्यांनी ‘आकाशवाणी’मध्ये दीर्घकाळ काम केले.


🧩‘योगक्षेम सभा’ आणि ‘पलियम सत्याग्रह’ या दोन संस्थांमार्फत त्यांनी अनेक दशके सामाजिक कार्ये केलीत.


🅾️जञानपीठ पुरस्काराविषयी...


🧩जञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य जगतातला सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो. पुरस्कारस्वरूप प्रमाणपत्र, वाग्देवीची प्रतिमा आणि अकरा लक्ष रुपयांचा धनादेश दिला जातो.


🧩22 मे 1961 रोजी रमा जैन आणि त्यांचे पती साहू शांतिप्रसाद जैन यांनी स्वतःच्या कौटुंबिक न्यासच्यावतीने भारतीय साहित्यिकांच्या गौरवार्थ ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ देण्याची घोषणा केली.


🧩भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद केलेल्या बावीस भाषांपैकी कोणत्याही भाषेत लेखन करणाऱ्या एका नागरिकाला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. प्रकाशित होऊन कमीतकमी पाच वर्षे झालेल्या पुस्तकांचाच पुरस्कारासाठी विचार होतो.

‘पृथ्वी’ बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी.


🔰संरक्षण क्षेत्रात स्वत:ला अधिक बळकट करत भारतानं मोठं यश संपादन केलं आहे.


🔰सट्रॅटेजिक फोर्स कमांडने (एसएफसी) आणि भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) डिझाइन केलेले कमी पल्ल्याच्या ‘पृथ्वी’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची (पृथ्वी शॉर्ट-रेंज बॅलेस्टिक क्षेपणास्त्र) यशस्वी चाचणी केली.ओडिशाच्या बालासोर किनाऱ्यावरून या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.


🔰या क्षेपणास्त्राने एसएफसीने ठरवलेल्या आपल्या मोहिमेचा प्रत्येक उद्देश पूर्ण केला.पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यासही सक्षम आहे.


🔰“350 किलोमीटरपर्यंत मारा करणारे हे क्षेपणास्त्र आयटीआरच्या परिसर-3 मध्ये मोबाईल लाँचरद्वारे सोडण्यात आलं,” अशी माहिती डीआरडीओच्या एका अधिकाऱ्यां दिली.

परशासकीय विभागाचे नाव : कोकण



🔺भौगोलिक विभागाचे नाव : कोकण 


🔺मख्यालय : मुंबई


🔺 विभागाअंतर्गत जिल्हे : पालघर, ठाणे, मुंबई नगर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

_________________________


🔴 परशासकीय विभागाचे नाव : पुणे


🔺 भौगोलिक विभागाचे नाव : पश्चिम महाराष्ट्र

🔺 मख्यालय : पुणे 

 विभागाअंतर्गत जिल्हे : पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर


_________________________



🔴 परशासकीय विभागाचे नाव : नाशिक


🔺 भौगोलिक विभागाचे नाव : उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश


🔺 मख्यालय : नाशिक


🔺 विभागाअंतर्गत जिल्हे : नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव


_________________________


🔴 परशासकीय विभागाचे नाव : औरंगाबाद


🔺 भौगोलिक विभागाचे नाव : मराठवाडा


🔺 मख्यालय : औरंगाबाद


🔺विभागाअंतर्गत जिल्हे : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद


_________________________


🔴 परशासकीय विभागाचे नाव : अमरावती


🔺भौगोलिक विभागाचे नाव : विदर्भ

 

🔺 मख्यालय : अमरावती


🔺विभागाअंतर्गत जिल्हे : अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम


________________________


🔴 परशासकीय विभागाचे नाव : नागपूर


🔺भौगोलिक विभागाचे नाव : विदर्भ 


🔺 मख्यालय : नागपूर 


🔺 विभागाअंतर्गत जिल्हे : नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली

२६ सप्टेंबर २०२०

IPL शी संबंधित हे १५ विक्रम



१) आतापर्यंत एकदाही विजेतेपद मिळवण्यात अपयशी ठरलेला RCB संघ, स्पर्धेत सर्वोच्च धावसंख्या करणारा मानकरी आहे…आणि ते देखील एकदा नव्हे दोनवेळा RCB ने अशी कामगिरी करुन दाखवली आहे. २०१३ साली पुणे वॉरियर्स संघाविरुद्ध २६३ तर २०१६ साली गुजरात संघाविरुद्ध २४८ धावा RCB ने केल्या होत्या. सर्वोच्च धावसंख्या उभारण्याच्या निकषांत चेन्नईचा संघ तिसऱ्या स्थानी येतो. २०१० साली चेन्नईने राजस्थानविरोधात २४६ धावा केल्या होत्या.


२) आश्चर्याची गोष्ट म्हणजे आयपीएलच्या इतिहासात सर्वात निच्चांकी धावसंख्येवर बाद होण्याचा नकोसा विक्रमही RCB च्याच नावावर जमा आहे. २०१७ साली कोलकाता नाईट रायडर्स संघाने RCB चा संघ ४९ धावांवर गुंडाळला होता.


३) २०१७ च्या हंगामात मुंबईने दिल्लीवर केलेली १४६ धावांनी मात ही आयपीएलच्या इतिहासात धावांच्या निकषात सर्वात मोठी मात आहे. दुसऱ्या स्थानी RCB चा संघ असून तिसरं स्थान कोलकाता संघाने पटकावलं आहे.


४) आतापर्यंत ८ सामन्यांचा निकाल हा सुपरओव्हवर लागलेला असून कोलकाता नाईट रायडर्सचा संघ ३ वेळा यात सहभागी होता. राजस्थान रॉयल्सने दोनवेळा सुपर ओव्हरवर सामना जिंकलेला आहे.


५) एका सामन्यात सर्वाधिक अवांतर धावा देण्याचा नकोसा विक्रम कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या नावावर आहे. २००८ साली डेक्कन चार्जर्सविरोधात कोलकाताच्या गोलंदाजांनी २८ अवांतर धावा दिल्या होत्या.


६) RCB चा कर्णधार विराट कोहली हा आयपीएलच्या इतिहासातला सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज आहे. त्याच्या नावावर ५ हजार ४१२ धावा जमा आहेत. दुसऱ्या स्थानी सुरेश रैना असून त्याच्या नावावर ५ हजार ३६८ धावा जमा आहेत. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर असून त्याच्या नावावर ४ हजार ८९८ धावा जमा आहेत.


७) स्पर्धेत सर्वाधिक षटकार ठोकण्याचा पराक्रम हा वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत ३२६ षटकार ठोकले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे एकही फलंदाज सध्या गेलच्या शर्यतीत नाहीयेत.


८) आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रमही गेलच्याच नावावर जमा आहेत. २०१३ पुणे संघाविरोधात केलेल्या १७५ धावा ही आयपीएलमधली सर्वोच्च धावसंख्या आहे. यंदाच्या हंगामात गेल किंग्ज इलेव्हन पंजाबचं नेतृत्व करतोय.


९) आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रमही गेलच्याच नावावर जमा आहे. त्याने आतापर्यंत ६ शतकं झळकावली असून विराट कोहली ५ शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.


१०) लोकेश राहुलने १४ चेंडूत झळकावलेल्या ५१ धावा हे आयपीएलमधलं सर्वात जलद अर्धशतक मानलं जातं.


११) १७० बळींसह लसिथ मलिंगा हा आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. यंदा खासगी कारणामुळे त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे.


१२) ३.४ षटकांत १२ धावा देऊन ६ बळी ही आतापर्यंत आयपीएलमधली गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. मुंबई इंडियन्सच्या अल्झारी जोसेफने गेल्या हंगामात सनराईजर्स हैदराबादविरुद्ध ही कामगिरी केली होती.


१३) आयपीएलमध्ये सर्वाधिक हॅटट्रीक घेण्याचा विक्रम हा दिल्लीच्या अमित मिश्राच्या नावावर आहे. अनुभवी अमित मिश्राने आतापर्यंत ३ वेळा हॅटट्रिक घेतली आहे.


१४) सर्वाधिकवेळा ४ बळी घेण्याचा विक्रम हा कोलकाता नाईट रायडर्सच्या सुनील नरीनच्या नावावर आहे.


१५) आयपीएलमध्ये सर्वाधिक निर्धाव षटकं टाकण्याचा विक्रम हा प्रवीण कुमारच्या नावावर जमा आहे. त्याने आतापर्यंत ११९ सामन्यांत १४ निर्धाव षटकं टाकली आहेत.

जगातील महत्वाच्या संघटना, त्यांचे सदस्य व मुख्यालय

 


● जागतिक व्यापार संघटना (WTO)

सदस्य - 164

मुख्यालय - जिनिव्हा (स्वित्झर्लंड)


● युरोपियन युनियन (EU)

सदस्य - 28

मुख्यालय - ब्रुसेल्स (बेल्जियम)


● ओपेक (Organization Of Petroleum Exporting Countries)

सदस्य - 13

मुख्यालय - व्हिएन्ना (ऑस्ट्रिया)


● सार्क (South Asian Association for Regional Co-operation)

सदस्य - 8

मुख्यालय - काठमांडू (नेपाळ)


● आसियन (ASEAN)

(Association Of South East Asian Nations)

सदस्य - 10

मुख्यालय - जकार्ता (इंडोनेशिया)


● ब्रिक्स (BRICS)

सदस्य - 5

मुख्यालय - शांघाय (चीन)

संविधान सभेची सत्रेः संविधान सभेची एकूण 11 सत्रे झाली.

 


ती पुढीलप्रमाणे


📌१.पहिले सत्र  : ९ ते २३ डिसेंबर, १९४६


📌२.दुसरे सत्र : २० ते २५ जानेवारी, १९४७


📌३.तिसरे सत्र  : २८ एप्रिल ते २ मे, १९४७


📌४.चौथे सत्र : १४ ते ३१ जुलै, १९४७


📌५.पाचवे सत्र :  १४ ते ३० ऑगस्ट, १९४७


📌६.सहावे सत्र : २७ जानेवारी, १९४८ 


📌७.सातवे सत्र :  ४ नोव्हेंबर, १९४८ ते ८ जानेवारी, १९४९


📌८.आठवे सत्र  : १६ मे ते १६ जून, १९४९


📌९.नववे सत्र : ३० जुलै ते १८ सप्टेंबर, १९४९


📌 १०.दहावे सत्र :  ६ ते १७ ऑक्टोबर, १९४९.


📌११.अकरावे सत्र : १४ ते २६ नोव्हेंबर, १९४९.


(संविधान सभेची संविधान सभा म्हणून शेवटची सभा २४ जानेवारी, १९५० रोजी झाली, ज्या दिवशी २८४ सदस्यांनी घटनेच्या तीन प्रतींवर सह्या केल्या.)

क्षयरोग त्याची लक्षणे व उपचार



· हा संसर्गजन्य आजार असून तो 'मायक्रोबॅक्टेरियम' ट्युबरक्युलोसिंस' या जिवाणूमुळे होतो.

· या जिवाणूचा शोध 'सर रॉबर्ड कॉक' यांनी 24 मार्च 1882 रोजी लावला म्हणून 'कॉक्स इन्फेक्शन' असेही म्हणतात.

· जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च रोजी साजरा करण्यात येतो.

· क्षयरोगचा प्रसार हवेमार्फत (रुग्णाच्या खोकण्याने, शिकण्याने) होतो.

· क्षयरोगाचे जंतू मुख्यतः फुप्फुसावर परिणाम करतात म्हणून फुप्फुसाच्या क्षयरोगाचे प्रमाण सर्वात जास्त आहे.


क्षयरोगाचे प्रकार : 


1. फुप्फुसाचा 2. इतर अवयवांचा (ग्रंथी, हाडे/सांधे, मूत्रपिंड, मेंदूआवरण, आतड्यांचा, कातडीचा इ.)


क्षयरोगाची लक्षणे :


1.    तीन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला,

2.    हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप

3.    वजन कमी होणे

4.    थुंकीतून रक्त पडणे

5.    भूक मंदावणे इ.


क्षयरोगाचे निदान : 


लहान मुलांमधील क्षयरोग निदानासाठी 'मोन्टोक्स टेस्ट' वापरली जाते.

1.    थुंकी तपासणी (बेडका) : सर्वात खात्रीशीर, कमी खर्चाची पद्धत. संशयित रुग्णाच्या थुंकीचे तीन नमुने तपासण्यात येतात.

2.    'क्ष-किरण' तपासणी (X-Ray) : छातीचा एक्स-रे काढून करतात. वरील तपासणीपेक्षा कमी खात्रीशीर. विशिष्ट तज्ञांची आवश्यकता असते.


प्रतिबंधक लस -


0 ते 1 वर्ष बालकांना क्षयरोग प्रतिबंधक लस टोचण्यात येते. त्या लसीला 'बी.बी.सी' (बॅसिलस कॉलमेटग्युरिन) असे म्हणतात.

राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम 1962 साली सुरू करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये एक्स-रे तपासणीवर जास्त भर

होता तसेच औषधोपचाराचा कालावधी जास्त होता.(दीर्घ मुदतीचा)

सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (RNTCP) सन 1992-93 मध्ये सुरू करण्यात आला.


क्षयरोग औषधोपचार :


सुधारित कार्यक्रमामध्ये क्षय रुग्णांना प्रत्यक्ष देखरेखीखाली चार प्रकारच्या गोळ्या तसेच 'स्ट्रेप्टोमायसीन' हे इन्जेक्शन देण्यात येते.

1. सदर औषधोपचार पद्धतीला डॉट्स (DOTS) असे म्हणतात.

2. DOTS - Directly Observed Treatment With Short Cource Cheniotherapy (प्रत्यक्ष निरीक्षणाखाली दिलेल्या अल्प मुदतीचा क्षयरोग औषधोपचार)

राष्ट्रीय आरोग्य अहवाल 2019 [National Health Profile 2019]



- केंद्रीय आरोग्य मंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनी नुकतेच अहवालाचे प्रकाशन केले.

- 2005 पासून हा अहवाल प्रकाशित केला जातो. या वर्षीची ही 14 वी आवृत्ती आहे.

- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या Central Bureau of Health Intelligence या संस्थेने हा अहवाल तयार केला आहे.

--------------------------------------------

- भारतातील आरोग्य क्षेत्रातील माहितीचे संकलन करून आरोग्य क्षेत्रात काम करत असणारे संघटना किंवा लोकांना ही माहिती उपलब्ध करून देणे हे या अहवालापाठीमागचे मुख्य उद्दिष्ट आहे. 

- लोकसंख्या, राहणीमान, आरोग्य सुविधा इ. वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करून हा अहवाल तयार केला जातो.

--------------------------------------------

● महत्त्वाच्या गोष्टी 


- मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांचे भारतीयांमध्ये प्रमाण जास्त आहे. 

- डेंग्यू आणि चिकनगुनिया हे सार्वजनिक आरोग्यावर परिणाम करणारे दोन मुख्य घटक आहेत. 

- जन्म दर, मृत्यू दर आणि नैसर्गिक वाढीचा दर यातील वाढ कमी झाली आहे. 

- लोकांचे आयुर्मान वाढले आहे, 49.7 वर्षावरून (1970 - 75) वाढून ते आता 68.7 वर्षे (2012 - 16) एवढे झाले आहे. 

- लोकसंख्येची सर्वाधिक घनता NCT दिल्ली (11320 चौकिमी) तर सर्वात कमी घनता अरूणाचल प्रदेशात (17 चौकिमी) आहे. 

- अर्भक मृत्यू दरात घट झाली आहे, 2016 मध्ये हा दर 1000 बालकांमागे 33 एवढा होता. आता ग्रामीण भागात हा दर 37 तर शहरी भागात 23 आहे. 

- 2017 मध्ये जन्म दर 20.2/1000, मृत्यू दर 6.3/1000 तर नैसर्गिक लोकसंख्या वाढीचा दर 13.9/1000 एवढा होता.

- सध्या भारतात 14 वर्षाच्या आतील 27% लोक, 15 ते 59 या वयोगटात 64.7% लोक तर 8.5% लोक हे 60 वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत. 

- भारताचा एकूण उत्पादन दर 2.3% आहे, हाच दर ग्रामीण भागात 2.5% तर शहरी भागात 1.8% आहे. 

---------------------------------------

● महाराष्ट्राची स्थिती 


- राज्यातील संसर्गजन्य रूग्णांची संख्या 58,53,915 एवढी आहे, यामध्ये मधुमेह (155628), उच्च रक्तदाब (250875), उच्च रक्तदाब आणि मधुमेह दोन्ही (97651) तर 16880 लोकांना ह्रद्य आणि रक्तवाहिन्यांचे विकार आहेत. 

- राज्यातील 14103 लोकांना तोंडाचा, गर्भाशय मुखाचा तसेच स्तनांचा कॅन्सर आहे.

- 6 महिने ते 5 वर्षे या वयोगटातील 54% बालकांत रक्ताक्षयाचे प्रमाण आढळते तर महिलांमध्ये हे प्रमाण 48% एवढे आहे. 

- राज्यातील 49.3% गरोदर महिलांना रक्ताक्षय (अॅनेमिया) आहे. 

- 15 ते 49 या वयोगटातील 47.9% महिला अॅनेमिया ग्रस्त आहेत.

हयुमन कॅपिटल इंडेक्स २०२०


जागतिक बँकेच्या मानव भांडवलाच्या निर्देशांकात भारताचा क्रमांक ११6 आहे. 


🎓ह्युमन कॅपिटल इंडेक्स २०२०  च्या अद्ययावतमध्ये मार्च २०२० पर्यंतच्या १७४ देशांमधील आरोग्य आणि शैक्षणिक डेटाचा समावेश होता. 


🎓जगातील जवळपास 98% लोकसंख्या यात समाविष्ट आहे. जागतिक बँकेच्या मानव भांडवलाच्या निर्देशांकात भारताचा क्रमांक ११6 आहे. 


🎓जागतिक बँकेच्या वार्षिक मानवी भांडवल निर्देशांक २०२० च्या ताज्या आवृत्तीत भारताचे ११6 वे स्थान आहे. गेल्या वर्षी 157 देशांपैकी भारत 115 व्या स्थानावर आहे.


🎓 विश्लेषणाने असे सिद्ध केले की पूर्व-साथीचा रोग, बहुतेक देशांनी मुलांची मानवी भांडवल तयार करण्यात स्थिर प्रगती केली. हे देखील नमूद केले आहे की सर्वात कमी प्रगती कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये झाली.


🎓 निर्देशांकात असेही नमूद करण्यात आले आहे की रेमिटन्समध्ये मोठी घसरण झाली असून एकूण उत्पन्न 11 किंवा 12% ने कमी होत आहे.


वाचा :-भूगोल प्रश्न व उत्तरे



Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे? 

उत्तर :- साखर उद्योग 


Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे? 

उत्तर :- चौथा


Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो? 

उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य 


Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे? 

उत्तर :- पणजी (गोवा) 


Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?

उत्तर :- आम्रसरी 


Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? 

उत्तर :- राजेवाडी 


Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो? 

उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ 


 Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते? 

उत्तर :- महाराष्ट्र 


Q-9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे? 

उत्तर :- पुणे 


Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते? 

उत्तर :- झारखंड

नाफ्टा (NAFTA)

🌻पार्श्वभूमी : उत्तर अमेरिकन मुक्त व्यापार करार (North American Free Trade Agreement) असा त्याचा पूर्णरूप होतो. हा करार कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिका या तिघांमध्ये झाला. हा जगातील सर्वांत मोठा करार मानला जातो. 


🌻या करारातील तीन सभासदीय देशांचे एकूण देशांतर्गत उत्पादन २० ट्रिलियन डॉलर्स (२० लक्ष कोटी रुपये) पेक्षाही जास्त होते. नाफ्टाअंतर्गत प्रथमच दोन विकसित देशांनी जागतिक बाजारपेठेतील मेक्सिको या उदयोन्मुख देशाबरोबर करार केला.


🌻 या तिघांनी आपापसातील व्यापारामधील अडथळे दूर करण्याचे निर्णय घेतले. उत्पादनावरील ज्या करांमुळे परदेशी वस्तू महाग होत असत, ते कर हळूहळू रद्द करण्यात आले. या कराराची व्याप्ती ही आठ विभाग आणि २२ अध्यांयासहित २००० पाने एवढी मोठी आहे.



🌻रचना आणि कार्यपद्धती : साधारणपणे तीस वर्षांपेक्षाही आधीच्या काळात अमेरिकेने कॅनडाबरोबर द्विपक्षीय व्यापारसंबंधात वाटाघाटी सुरू केल्या. जिच्या परिणामस्वरूप अमेरिका आणि कॅनडा यांमध्ये मुक्त व्यापार करार केला गेला. 


🌻तो १ जानेवारी १९८९ मध्ये अमलात आणला गेला. १९९१ मध्ये अमेरिकेने मेक्सिकोबरोबर वाटाघाटी सुरू केल्या. त्यात कॅनडानेही सहभाग घेतला. १ जानेवारी १९९४ मध्ये नाफ्टा करार अमलात आणला गेला.


🌻नाफ्टा कराराचे अनेक फायदे आणि तोटे निदर्शनास आले. पहिला तोटा म्हणजे, अमेरिकेमध्ये होणारी बरीचशी उत्पादने कमीखर्चीक मेक्सिकोकडे देण्यात आली. दुसरा म्हणजे, ज्या कामगारांनी या औद्योगिक क्षेत्रात आपली नोकरी कायम ठेवण्याचे ठरविले, त्यांना कमी वेतनावर काम स्वीकारावे लागले. आणि तिसरा म्हणजे, ‘म्याकिलाडोरा प्रोग्रॅम’द्वारे कामगारांचे शोषण घडले. ‘म्याकिलाडोरा’ ही मेक्सिकोमधील एक परदेशी कंपनी आहे.


🌻 ती करमुक्त कराराचा फायदा घेत कच्चा माल आणि उपकरणे उत्पादनप्रकियेसाठी निर्यात करत असे आणि उत्पादित माल परत कच्चा माल पुरविणाऱ्या देशांकडून आयात करत असे. या कंपनीने नफा कमाविण्यासाठी अनेक प्रयत्न केले आणि कामगारांचे शोषणसुद्धा केले. ही पद्धत (प्रोग्रॅम) सामाजिक आणि कायद्याच्या दृष्टीने स्वीकारार्ह नव्हती.


🌻या कराराचे फायदे नमूद करायचे झाले, तर एक म्हणजे, मेक्सिकोमधून करमुक्त किराणा मालाच्या आयातीमुळे अमेरिकेतील किराणा मालाच्या किमती मर्यादित राहिल्या.


🌻 तयाचप्रमाणे मेक्सिको आणि कॅनडा येथून खनिज तेलाच्या आयातीमुळे पेट्रोलियम उत्पादनाच्या किमती मर्यादित राहिल्या आणि त्यामुळे या तिन्ही देशांची व्यापार आणि आर्थिक वृद्धी झाली.


🌻नाफ्टामुळे तिन्ही सभासद देशांना ‘मोस्ट फेव्हर्ड नेशन’ (MFN)चा दर्जा मिळाला. याअंतर्गत या तिन्ही देशांना सर्व बाबतींत समान वागणूक ठेवणे (ज्यात थेट परकीय गुंतवणुकीचाही समावेश होता) अनिवार्य होते. 


🌻तयामुळे या तिन्ही देशांना देशांतर्गत भांडवलदारांना एक व परदेशी भांडवलदारांना वेगळी अशी वागणूक देता येत नव्हती. त्याचप्रमाणे या करारांतर्गत नसलेल्या देशांबरोबर वेगळ्या प्रकारचा किंवा फायदेशीर सौदा करता येत नव्हता.


🌻नाफ्टाच्या तिन्ही देशांतील व्यवसायांना सरकारी कंत्राटे दिली जात असत. नाफ्टाअंतर्गत निर्यातीवरील करात सवलत मिळविण्यासाठी त्या मालाचे उत्पादन या तीन देशांत केले गेले असण्याची खात्री देण्यासाठी निर्यातदाराला ‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ देणे बंधनकारक होते. म्हणजे मेक्सिकोमधून कॅनडा किंवा अमेरिकेत माल निर्यात करण्यात येत असेल;


🌻 पण त्याचे उत्पादन जर पेरूमध्ये झाले असेल, तर मात्र निर्यातकर बंधनकारक असे. नाफ्टा करारानुसार असलेल्या निर्यातकराच्या सवलतीचा लाभ अशा वेळेस दिला जात नसे.


🌻नाफ्टाद्वारे जरी प्रत्येकाच्या एकस्व (Patent), प्रताधिकार (Copyright) किंवा व्यापार चिन्ह (Trade Mark) यांची कदर केली जात असली, तरी बौद्धिक उत्पादनाच्या हक्कांमध्ये मात्र व्यापारी हस्तक्षेप केला जात नसे.


🌻 नाफ्टा करारामध्ये आणखी दोन करारांची भर घातली गेली. एक म्हणजे, पर्यावरण कायद्याच्या समर्थनार्थ पर्यावरण सहकार्याबाबतचा उत्तर अमेरिकी करार आणि दुसरा म्हणजे, कार्यकारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेला मजदूर संघटनेबाबतचा उत्तर अमेरिकी करार.


🌻नाफ्टाच्या ५२ व्या कलमानुसार उद्योगधंद्यांचा अयोग्य प्रथांपासून बचाव आणि व्यापारातील आपापसांतील मतभेद मिटविण्याच्या काही कार्यपद्धती नमूद केल्या आहेत. दोन गटांतील काही अनौपचारिक ठराव सुलभ करण्यासाठी नाफ्टाच्या सचिवस्तरावर प्रयत्न केले जात असत.


🌻 पण जर हे अमलात आले नाही, तर त्यापुढे जाऊन स्थानिक कोर्टकचेऱ्यांचा खर्च वाचविण्याच्या दृष्टीने दोन गटांतील मतभेदांवर विचारविनिमय करण्यासाठी एक ‘गट’ (Pannel) प्रस्थापित केले जात असे. हे गट नाफ्टाच्या जटिल कायदे आणि कार्यपद्धतीचा योग्य तो अर्थ लावण्यास मदत करत असे. व्यापार मतभेदांबाबतचे हे कायदे भांडवलदारांनासुद्धा लागू असत.

जी—२० (G-20)

🌷आर्थिक दृष्ट्या प्रगत असलेल्या २० देशांची आणि त्या देशांच्या केंद्रिय बँकेच्या गव्हर्नरांची एक संघटना. 


🌷जागतिक अर्थव्यवस्थेच्या संदर्भात महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी औद्योगिक दृष्ट्या प्रगत आणि विकसनशील देशांना एकत्र आणण्याच्या हेतूने १९९९ मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली.


🌷 या २० देशांचे राष्ट्रप्रमुख, त्यांचे अर्थमंत्री आणि त्या देशांच्या केंद्रीय बँकांचे गव्हर्नर यांची या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी वर्षातून एकदा बैठक होते.



🌷जी–२० संघटनेत १९ देश आणि युरोपियन युनियनचा समावेश होतो. अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, टर्की, ब्रिटन आणि अमेरिका हे देश या संघटनेचे सदस्य आहेत. 


🌷जगाच्या एकूण उत्पादनाच्या ८५ टक्के उत्पादन जी–२० देशांकडून होते. जगाच्या एकूण व्यापाराच्या ८० टक्के व्यापार या देशांकडून केला जातो आणि जगाच्या एकूण लोकसंख्येच्या दोनतृतीयांश लोकसंख्या या देशांत आढळते.


🌷रचना आणि कार्य : जी–२० संघटनेतील देशांची वर्षातून एकदा बैठक होते. या संघटनेचे कायमस्वरूपी कार्यालय नाही. सदस्यदेशांची पाच क्षेत्रीय गटांत विभागणी करण्यात आली असून एका गटात चार देशांचा समावेश करण्यात आला आहे.


🌷 दरवर्षी एका गटातील सदस्यदेशाकडे संघटनेचे अध्यक्षपद असते. ते आळीपाळीने बदलते. संघटनेच्या आजी, माजी आणि भावी अध्यक्षांचा एक व्यवस्थापकीय गट तयार करण्यात आला असून त्याला ‘ट्रॉइका’ म्हणतात. 


🌷विद्यमान अध्यक्ष हा या गटाचा सदस्य असतो. विद्यमान अध्यक्ष त्याच्या कार्यकाळापुरते या संघटनेचे सचिवालय स्थापन करतो. या सचिवालयामार्फत संघटनेचे काम चालते. या सचिवालयामार्फतच विविध बैठकांचे आयोजन केले जाते. 


🌷या ट्रॉइकामुळे संघटनेच्या कामात आणि व्यवस्थापनात सातत्य राहते. संघटनेचे कायमस्वरूपी सचिवालय सुरू करण्याविषयी सध्या चर्चा चालू आहे. संघटनेच्या शिखर परिषदेची विषयपत्रिका दरवर्षी वेगळी असते आणि बहुतेक विषय जागतिक आर्थिक घडामोडींशी संबंधित असतात. 


🌷या घडामोडींच्या संदर्भात कुठल्याही निर्णयांची वा नियमांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार या संघटनेला नसला, तरी बलशाली सदस्यदेशांमुळे ही संघटना जागतिक अर्थव्यवस्थेला दिशा मात्र नक्की देऊ शकते. संघटनेच्या वार्षिक शिखर परिषदेला सदस्यदेशांव्यतिरिक्त १२ कायम निमंत्रित देश आणि अन्य ३० देशांना निमंत्रित केले जाते.


🌷मल्यमापन : जी–२० संघटनेच्या कार्याच्या संदर्भात अनेक मतभेद असून बरीच टीकाही झाली आहे. ही संघटना स्वयंघोषित आहे आणि ती जगातल्या प्रबळ अर्थव्यवस्था असलेल्या पहिल्या २० देशांचे प्रतिनिधित्व करत नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या संघटनेच्या वैधतेलाच अनेकांनी आव्हान दिले आहे. 


🌷दरवर्षी संघटनेच्या शिखर परिषदेच्या वेळी विविध संघटनांतर्फे निदर्शने केली जातात आणि परिषदेच्या आयोजनात अडथळे आणले जातात. अशा स्वरूपाच्या संघटनेने संयुक्त राष्ट्रसंघाची एक संलग्न संस्था या नात्याने काम केले पाहिजे, असे मत अनेक विचारवंतांनी व्यक्त केले आहे. निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे अधिकारही या संघटनेला असावेत, असे या विचारवंतांना वाटते. 


🌷आर्थिक दृष्ट्या पहिल्या २० क्रमांकांत असलेल्या पोलंड, स्पेन, सिंगापूर यांसारख्या देशांनी या संघटनेचे सदस्य नसलेल्या जगातल्या इतर १७३ देशांचे प्रतिनिधी म्हणून संघटनेचे निर्णय धुडकावले आहेत. 


🌷सिंगापूरने जागतिक प्रशासकीय गट (ग्लोबल गव्हर्नन्स ग्रुप) या नावाने एक गट स्थापन करण्यात पुढाकार घेतला आहे. जी–२० संघटनेचे सदस्य नसलेले २८ छोटे देश या गटाचे सदस्य आहेत. 


🌷जी–२० संघटनेपुढे आपले म्हणणे प्रभावीपणे मांडणे, हा या गटाचा मुख्य उद्देश आहे.  अर्जेंटिना आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सदस्यत्वालाही या देशांनी आक्षेप घेतला आहे. 


🌷सघटनेचे उद्दिष्ट निश्चित नाही आणि शिखर बैठका बंद दाराआड होतात, त्यामुळे संघटनेची पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे अनेकांना वाटते.

जम्मू काश्मीर अधिकृत भाषा (संशोधन) विधेयक 2020


√ मंगळवारी लोकसभेत जम्मू - काश्मीर अधिकृत भाषा (संशोधन) विधेयक मंजूर करण्यात आल. 


√ काश्मिरी, डोगरी, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी या जम्मू - काश्मीरच्या अधिकृत भाषा असतील.

  

√ लोकसभेत हे विधेयक गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी सादर केलं. 


√ जम्मू काश्मीरमध्ये उर्दू बोलणारे केवळ ०.१६ टक्के लोक आहेत, ७० वर्षांपासून हीच इथली अधिकृत भाषा बनली होती.


√ जम्मू काश्मीरमध्ये ५३.२६ टक्के लोक काश्मिरी भाषा बोलतात.


√ २६.६४ टक्के लोक डोगरी भाषेत संवाद साधतात.


√ २.३६ टक्के लोक हिंदी बोलतात, असंही रेड्डी यांनी संसदेत म्हटलं.

तामिळनाडूमध्ये भारतातली न्यूट्रिनो वेधशाळा उभारली जाणार

 तामिळनाडूमध्ये भारतातली न्यूट्रिनो वेधशाळा उभारली जाणार


तामिळनाडू राज्याच्या थाटी जिल्ह्यात बोडी वेस्ट हिल्सच्या परिसरात भारतातली न्यूट्रिनो वेधशाळा उभारली जाणार आहे.


ठळक बाबी


तिथे पृथ्वीच्या वातावरणात तयार होणाऱ्या न्यूट्रिनो कणांचे निरीक्षण केले जाणार. त्याद्वारे न्यूट्रिनो कणांच्या गुणधर्मांबद्दल अधिक माहिती गोळा केली जाणार.


‘न्यूट्रिनो डिटेक्टर’ हे एक ‘मॅग्नेटाईज्ड आयर्न कॅलोरीमीटर’ उपकरण असते. कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतात सर्वाधिक वजनी उपकरण तयार केले जाणार आहे.


वेधशाळा जमिनीच्या खाली तयार केली जाणार आहे.प्रकल्पाला अणुऊर्जा विभाग आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभाग वित्तपूरवठा करणार आहेत.


न्यूट्रिनो म्हणजे काय?


न्यूट्रिनो हे ब्रह्मांड तयार करणारे आकाराने सर्वात छोटे कण असतात. न्यूट्रिनो नावाप्रमाणेच विद्युतदृष्ट्या तटस्थ असतात आणि त्याचे वस्तुमान इतर कोणत्याही ज्ञात कणांपेक्षा शून्यसमान अगदीच कमी असते.


सूर्य आणि पृथ्वीचे वातावरण ही न्यूट्रिनो कणांचे मुख्य स्रोत आहेत.


न्यूट्रिनो वेधशाळा कॅनडा, जापान आणि इटली या देशांमध्ये जमिनीखाली तर अंटार्क्टिका व फ्रान्स या देशांमध्ये समुद्राखाली आहेत.

‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्रासाठी भारतातल्या आठ सागरी किनाऱ्यांचे नामांकन देण्यात आले



👉परथमच, ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी भारतातल्या आठ सागरी किनाऱ्यांचे नामांकन देण्यात आले आहे. ते पुढीलप्रमाणे आहेत -


👉शिवराजपूर (गुजरात), घोघला (दमण व दीव), कासारकोड आणि पादुबिद्री (कर्नाटक), कप्पड (केरळ), ऋषिकोंडा (आंध्रप्रदेश), गोल्डन बीच (ओडिशा) आणि राधानगर (अंदमान व निकोबार)


ठळक बाबी


👉दरवर्षी सप्टेंबर महिन्याचा तिसरा शनिवार हा ‘आंतरराष्ट्रीय तटिय स्वच्छता दिन’ साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस 19 सप्टेंबर 2020 रोजी साजरा करण्यात आला आहे. 


👉या दिनाचे औचित्य साधून केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून यासंबंधी घोषणा करण्यात आली.


👉‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्या आठ किनाऱ्यांचा जगातल्या सर्वात स्वच्छ किनाऱ्यांच्या यादीत समावेश होणार.


"BEAMS" (सागरी किनारा पर्यावरण व सौंदर्यिकरण व्यवस्थापन सेवा)


👉हा भारत सरकारचा स्वतःचा कार्यक्रम आहे, ज्याच्याअंतर्गत स्वच्छ किनाऱ्यांना राष्ट्रीय प्रमाणपत्र बहाल केले जातात.


👉 किनारी प्रदेशात शाश्वत विकासासाठी असलेल्या धोरणांना प्रोत्साहन देण्यासाठी SICOM आणि पर्यावरण मंत्रालयाने ICZM (एकात्मिक किनारी क्षेत्र व्यवस्थापन) प्रकल्पाच्या अंतर्गत BEAM कार्यक्रम राबवत आहे.


👉 तटीय व्यवस्थापनाद्वारे किनारी आणि सागरी पर्यावरण तसेच पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने मंत्रालयाने संवादात्मक ICZM (एकात्मिक किनारी क्षेत्र व्यवस्थापन) उपक्रम राबवत आहे.


👉 ICZMची संकल्पना 1992 साली रिओ दे जनेरो येथे झालेल्या पृथ्वी शिखर परिषदेत मांडली गेली होती.


‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्र


🌷हा पर्यावरणाशी अनुकूल असलेल्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने सागरी किनारा, सागरी परिसंस्था किंवा शाश्वत बोटिंग टूरिझम कार्यवाहक यांना बहाल केला जाऊ शकणारा सन्मान आहे. हा सन्मान डेन्मार्कच्या फाउंडेशन फॉर एनविरोनमेंटल एज्युकेशन (FEE) या ना-नफा संस्थेच्यावतीने दिला जातो.

Online test series

घाट


1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 

2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 

3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर 

4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ 

5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग 

6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण 

7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी 

8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी 

9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी 

10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी 

11) पार घाट - सातारा - रत्नागिरी 

12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी 

13) पसरणीचा घाट - सातारा - वाई 

14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग 

15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई 

16) बोरघाट - पुणे - कुलाबा 

17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल 

18) कुसुर घाट - पुणे - पनवेल 

19) वरंधा घाट - पुणे - महाड 

20) रूपत्या घाट - पुणे - महाड 

21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड 

22) कसारा घाट - नाशिक - ठाणे 

23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई 

24) थळ घाट - नाशिक - ठाणे 

25) माळशेज घाट - ठाणे- पुणे  

26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपूर

महाराष्ट्र पोलीस दल विशेष



🅾️ महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या कोण आहेत?


👉अनिल देशमुख


🅾️ पोलीस खाते कोणत्या मंत्रालयांतर्गत येते?


👉गहमंत्रालय


🅾️ पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? 


👉राज्यसूची


🅾️ राष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते?


👉  दक्षता


🅾️भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे?


👉तलंगणा


🅾️ सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे?


 👉हदराबाद


🅾️ महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?


👉सबोध जयस्वाल


🅾️महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे?  


👉सदरक्षणाय खलनिग्रहणाय


🅾️ महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते?


👉पोलीस महासंचालक



🅾️महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे?


👉 मबई


🅾️ सदरक्षणाय खलनिग्रहणाय या वाक्याचा अर्थ काय होतो?


👉सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नायनाट

 

🅾️ महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहे?


👉पचकोणी तारा


🅾️ पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो?


👉21 ऑक्टोबर 


🅾️ सीआरपीएफचे पूर्ण नाव काय?


 👉सट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स


🅾️ महाराष्ट्रात गुप्तचर अकादमी प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?


👉पणे 


🅾️ पोलीस दलातील शेवटचे पद कोणते? 


👉शिपाई


🅾️ महाराष्ट्र राज्यातील पहिल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला  बटालियनची स्थापना कोठे होणार आहे?


👉काटोल, जि. नागपूर


🅾️ महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिदर्शक असे कोणते चिन्ह आहे?


 👉हाताचा पंजा_ 


🅾️ जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? 


👉पोलीस अधीक्षक


🅾️ महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कोणता आहे?


👉गडद निळा 


🅾️ शरी. सुबोध जयस्वाल महाराष्ट्र राज्याचे कितवे पोलीस महासंचालक आहेत ?


👉42 वे


🅾️ मबई पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत ?


👉परमबिरसिंह


🅾️ राज्याच्या पोलीस महासंचालकांची नेमणूक कोण करते ?


👉राज्यशासन


🅾️ पोलीस विभागात परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात ?


 👉 महानिरीक्षक


🅾️ FIR चा फुल फॉर्म काय ?


👉first information report


🅾️ महाराष्ट्र राज्याच्या एटीएस विभागाचे प्रमुख कोण आहेत? 


👉दवेन भारती


🅾️ गह विभागाच्या नियंत्रणाखाली कोणते विभाग येतात ?


👉गहरक्षक दल , तुरुंग


🅾️ महाराष्ट्र राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागचे मुख्यालय कुठे आहे ?


👉पणे


🅾️  भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव काय ?


👉कपी-बोट


🅾️ राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली ?


👉1948


🅾️ भारताच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी कोणाची निवड करण्यात आली ?


👉जनरल बिपिन रावत_


🅾️ दशाचे संरक्षण मंत्री कोण आहेत ? 


👉राजनाथ सिंह

संसदेकडून अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) विधेयक 2020 मंजूर:-



📚अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) विधेयक 2020 आज राज्यसभेत मंजूर झाले. कडधान्य , डाळी, तेलबिया खाद्यतेल, कांदे आणि बटाटे यासारख्या वस्तू अत्यावश्यक वस्तू सेवा कायद्यातून वगळण्याची तरतूद या विधेयकात आहे.


📚तयापूर्वी हे विधेयक ग्राहक सेवा अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री दानवे रावसाहेब दादाराव यांनी लोकसभेत 14 सप्टेंबर 2020 ला हे विधेयक मांडले.  या आधीच्या 5 जून 2020 चा अध्यादेशाची जागा या विधेयकाने घेतली. लोकसभेत 15 सप्टेंबर 2020 ला हे विधेयक मंजूर झाले.


📚आपल्या व्यावसायिक कामकाजात नियामक संस्थांचा अवाजवी हस्तक्षेप होईल ही खाजगी गुंतवणूकदारांची धास्ती दूर करणे हे अत्यावश्यक सेवा (सुधारणा)विधेयक 2020  चे उद्दिष्ट आहे. 

धान्य उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि पुरवठा या बाबींमध्ये मोकळीक मिळाल्याने त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल आणि त्यामुळेच खाजगी क्षेत्र किंवा कृषिक्षेत्रात थेट परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल.


📚शीतगृहे किंवा अन्नधान्य पुरवठ्याची सुधारित व्यवस्था या गोष्टींना चालना मिळण्यासाठी याची मदत होईल.

नियामक संस्थाचे नियंत्रण दूर करतानाच  ग्राहकांचेही हित जपले जाईल याची व्यवस्था सरकारने केली आहे. युद्ध, दुष्काळ, अनावश्यक भाववाढ , निसर्गाचा प्रकोप अशा अनियमित परिस्थितीत धान्य पुरवठ्याबाबत नियंत्रण आणले जाईल. मात्र संबंधितांनी मूल्य साखळीत केलेली गुंतवणूक आणि निर्यातीसाठी नोंदवलेली मागणी ह्या गोष्टींना अशा प्रसंगी साठा करण्याच्या मर्यादेतून वगळले जाईल, जेणेकरून या क्षेत्रात येणाऱ्या गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल.


📚विधेयक मंजूर होण्यापूर्वी राज्यसभेत झालेल्या चर्चेत ग्राहक सेवा, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे राज्यमंत्री रावसाहेब दादाराव दानवे म्हणाले की शीतगृहांची सोय नसल्यामुळे होणारे कृषिमालाची नासाडी टाळण्यासाठी या सुधारणांची गरज होती. फक्त शेतकरीच नाही तर ग्राहक आणि उत्पादक यांच्यासाठीही सकारात्मक वातावरण निर्माण करणाऱ्या या कायद्यामुळे आपला देश स्वावलंबी होईल. कृषी क्षेत्रातील पुरवठासाखळी व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी या सुधारणा उपयोगी पडतील असं ते म्हणाले.  ह्या सुधारणा म्हणजे  सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे दिलेले आश्वासन पाळण्याचा प्रयत्न आहे. या क्षेत्रात गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि व्यापारासाठी आवश्यक सुविधा यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट होईल. 


पार्श्वभूमी:


📚बरीच कृषी उत्पादने ही भारतात जास्त प्रमाणात घेतली जातात.  असे झाले की शेतकऱ्यांना शीतगृहे आणि साठवणुकीच्या जागांचा अभाव यामुळे या मालाला चांगली किंमत मिळणे अशक्य होऊन बसते. या शिवाय आवश्यक सेवा कायद्यांमुळे त्यांना व्यापार करता येत नाही.  यामुळे भरपूर पीक आले. 


📚 विशेषतः  नाशवंत माल असेल तर  शेतकऱ्यांना मोठा तोटाही सहन करावा लागतो. ह्या कायद्यामुळे शीतगृहातील तसेच धान्य पुरवठा साखळीतील आधुनिकीकरणाला चालना मिळेल यामुळे शेतकऱ्यांना तसेच ग्राहकांनाही फायदा होऊन वस्तूच्या किमती स्थिर राहतील याची परिणीती स्पर्धात्मक वातावरण तयार होण्यात येईल आणि साठवण्याच्या जागा नसल्यामुळे होणारी कृषिमालाची  नासाडीसुद्धा टाळता येईल.

२५ सप्टेंबर २०२०

Online Test Series

Global invitation index क्रमवारीत भारताचा 48 वा क्रमांक


🔶 दक्षिण आशियाई विभागात भारताने पहिला क्रमांक मिळवला आहे.


🔷 गल्या वर्षीच्या तुलनेत भारताचे स्थान चार स्थानांनी उंचावले आहे.


🔷 जगभरातील 131 देशांच्या कामगिरीचे  मूल्यमापन करून ही क्रमवारी जाहीर करण्यात आली.


🔴 इतर देश - 

१) स्वित्झर्लंड 

२) स्वीडन 

३) अमेरिका 

४) युनायटेड किंग्डम 

५) नेदरलँड


🔶 २०१९ चा अहवाल 🔶

🔺भारत 52 व्या स्थानी होता.


 🔻कॉर्नेल विद्यापीठ, INSEAD, संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक बौद्धिक संपदा संघटना (WIPO) आणि GII नॉलेज पार्टनर्स यांनी ‘वैश्विक नवकल्पकता निर्देशांक 2019’ (global innovation index) प्रसिद्ध केला.


🛑 भारत कल्पकता निर्देशांक 2019 (Indian Innovation Index) 🛑


📌 निती आयोगातर्फे प्रकाशित केला जातो.


📌 क्रमवारी - 


 🔷 मोठी राज्य १७ - 

१) कर्नाटक 

२) तामिळनाडू 

३) महाराष्ट्र 

४) तेलंगणा 

५) हरियाणा


🔷 ईशान्य भारत व पर्वतीय राज्य 11 -

१) सिक्कीम 

२) हिमाचल प्रदेश 

३) उत्तराखंड


🔷 केंद्रशासित प्रदेश व लहान राज्य 8-

१) दिल्ली 

२) चंदीगड 

३) गोवा 

४) पुद्दुचेरी 

५) अंदमान व निकोबार

राजीव कुमार: नवीन निवडणूक आयुक्त.



🔰भारताचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांनी 1 सप्टेंबर 2020 रोजी पदभार स्वीकारला.


🔰राजीव कुमार भारतीय प्रशासनिक सेवेमधले 1984 च्या तुकडीतले अधिकारी आहेत. त्यांनी 36 वर्षांपेक्षा जास्त काळ भारत सरकारमध्ये सेवा केली आहे.


🔴ठळक बाबी...


🔰राजीव कुमार भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांच्याबरोबर काम करणार.


🔰राजीव कुमार 24 वे निवडणूक आयुक्त आहेत.अशोक लवासा यांची आशियाई विकास बँक (मनिला, फिलीपीन्स) येथे उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी निवडणूक आयुक्त पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ही नियुक्ती झाली.


🔴भारतीय निवडणूक आयोग (ECI) विषयी....


🔰भारतीय निवडणूक आयोग (ECI) ही एक स्वायत्त व अर्ध-न्यायिक संस्था आहे. आयोगाला घटनात्मक दर्जा प्रदान करण्यात आला आहे. आयोगाची स्थापना दिनांक 25 जानेवारी 1950 रोजी झाली.


🔴घटनात्मक तरतुदी....


🔰कलम 324: ही तरतूद आयोगाच्या कार्यप्रणालीविषयी आहे. आयोगावर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती तसेच संसदेची लोकसभा आणि राज्यसभा तसेच राज्याच्या विधानसभा निवडणुका घेण्याची जबाबदारी असते.


🔰कलम 325: संसद आणि राज्य विधानसभेच्या सदस्यांच्या निवडणुकीसाठी प्रत्येक प्रादेशिक मतदारसंघासाठी एक सार्वत्रिक निवडणूक होणार. धर्म, वंश, जात किंवा लैंगिकतेच्या आधारावर निवडणूक चालवली जाणार.

कलम 326: लोकसभा आणि राज्याच्या विधानसभांसाठी निवडणुकीच्या आधारावर प्रौढ मताधिकारांच्या संदर्भात आहे.


🔰कलम 327: निवडणुकीच्या संदर्भात प्राधान्य देण्यासाठी संसदेला अधिकार देते.

कलम 328: निवडणुकीच्या संदर्भात कायदे तयार करण्याचे अधिकार राज्य विधानसभेला देते.


🔰कलम 329: निवडणुकीच्या प्रकरणांमध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप प्रतिबंधित करते.संविधानानुसार, उमेदवाराला मनाई करण्यास आयोगाला शक्ती आहे, जर ती व्यक्ती निवडणुकीचा खर्च नोंदविण्यात अपयशी ठरणार.


🔴आयोगाची संरचना आणि जबाबदारी....


🔰आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त असतात. निवडणूक आयुक्त हे भारतीय निवडणूक आयोगाचे सदस्य आहेत, ज्यांना राष्ट्रीय व राज्य पातळीवर निवडणूक घेण्याचे अधिकार आहेत.


🔰निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली आचारसंहिता पाळणे प्रत्येक राजकीय पक्ष, उमेदवारांसाठी बंधनकारक असते. यालाच ‘आदर्श आचारसंहिता’ (Model Code of Conduct –MCC) म्हणून देखील ओळखले जाते. आदर्श आचारसंहिता हे निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या आचरणासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारा तयार केलेली मार्गदर्शके आहेत.

प्रा. (डॉ.) प्रदीपकुमार जोशी: केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष



🔸कद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य, प्रा. (डॉ) प्रदीपकुमार जोशी यांनी 7 ऑगस्ट 2020 रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अध्यक्षपदाची  शपथ घेतली. आयोगाचे मावळते अध्यक्ष अरविंद सक्सेना यांनी जोशी यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.


🔸परा. जोशी यांनी 12 मे 2015 रोजी सदस्य म्हणून UPSC आयोगामध्ये प्रवेश केला. यापूर्वी जोशी त्यांनी छत्तीसगड लोकसेवा आयोग आणि मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाचे अध्यक्षपद भूषवले. त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (NIEPA) याचे संचालक म्हणूनही काम पाहीले. ते आर्थिक व्यवस्थापन क्षेत्रातले एक नामवंत तज्ज्ञ आहेत.


केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) विषयी


🔸कद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ही भारताची केंद्रीय निवड संस्था आहे. हा एक संवैधानिक आयोग आहे. ही संस्था अखिल भारतीय सेवा तसेच केंद्रीय सेवेच्या गट 'अ' व गट 'ब' कर्मचाऱ्यांची निवड करण्याकरीता जबाबदार आहे. ही संस्था 'कर्मचारी, लोक तक्रारी आणि निर्वाहभत्ता मंत्रालयातल्या कर्मचारी व प्रशिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली येतो.


🔸सस्थेची स्थापना दिनांक 1 ऑक्टोबर 1926 रोजी झाली. आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि दहा सदस्य असतात. त्यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती यांच्याकडून केली जाते. UPSC च्या अध्यक्ष पदाची नियुक्ती भारताच्या संविधानातली कलम 316 च्या उपखंड (1) अन्वये केली जाते.

२४ सप्टेंबर २०२०

“इंद्रा नेव्ही-20”: भारत आणि रशिया यांचा संयुक्त युद्धसराव..


💠भारतीय नौदल आणि रशियाचे नौदल यांचा 11 वा द्वैवार्षिक संयुक्त सागरी सराव 4 आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी बंगालच्या उपसागरात आयोजित करण्यात आला आहे.


🔴ठळक बाबी


💠“इंद्रा नेव्ही-20”चा मुख्य उद्देश दोन्ही नौदलामधले आंतर-संचालन अधिक दृढ करणे आणि बहु आयामी सागरी अभियानासाठी आकलन आणि पद्धती विस्तृत करणे हा आहे.


💠सरावादरम्यान भारतीय नौदलाच्या ताफ्यात क्षेपणास्त्र विनाशिका ‘रणविजय’, स्वदेशी लढाऊ जहाज ‘सह्याद्री’ आणि ‘शक्ती’ या तेलवाहू जहाजाचा आणि हेलिकॉप्टरचाही समावेश आहे. तर रशियाच्या ताफ्यात विनाशिका ‘एडमिरल विनोग्राडोव्ह’, विनाशिका ‘एडमिरल ट्रिब्युट’ आणि फ्लीट टॅंकर ‘बोरिस ब्यूटोमा’ या जहाजांचा समावेश आहे.


💠2003 साली सुरु झालेला “इंद्रा नेव्ही” म्हणजे दोन्ही देशांच्या नौदलामधल्या दीर्घकालीन धोरणात्मक संबंधांचे प्रतिक आहे. सरावामुळे दोन्ही नौदलात परस्पर विश्वास आणि सहकार्य अधिक दृढ होणार असून, उभय देशातले दीर्घ काळापासूनचे मैत्रीचे बंध अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.


🔴रशिया देश


💠रशिया हा आशिया खंडाच्या उत्तर भागातला एक देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया जगातला सर्वात मोठा देश आहे. जगाच्या एकूण भूभागाच्या क्षेत्रफळापैकी सुमारे एक-सप्तमांश क्षेत्र रशियाने व्यापलेले आहे. रशियाचा विस्तार यूरोप व आशिया अशा दोन्ही खंडांत असून यूरोप खंडाचा पूर्वेकडील जवळजवळ निम्मा भाग तर आशिया खंडाचा उत्तरेकडील सुमारे दोन-पंचमांश भाग या देशाने व्यापलेला आहे.


💠मॉस्को हे देशाच्या राजधानीचे शहर आहे. रूबल हे रशियाचे राष्ट्रीय चलन आहे.


राज्यसेवा परीक्षा-प्रश्न सराव

 



🔶SPICe+’ नामक डिजिटल व्यासपीठ  कोणत्या मंत्रालयाने तयार केले?


*उत्तर* : कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय


🔶 यदा 2020 साली ‘आंतरराष्ट्रीय तटिय स्वच्छता दिन’ कोणत्या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला आहे?


*उत्तर* : अचीव्हिंग ट्रॅश फ्री कोस्टलाइन


🔶 2020 साली डेटन साहित्यिक शांती पुरस्कार कोणत्या व्यक्तीने जिंकला?


*उत्तर* : मार्गारेट अ‍ॅटवुड


🔶“क्वीन्स कौंसेल” याचा अर्थ काय होतो?


*उत्तर* : वकील (“क्वीन्स कौंसेल” हे एक पद आहे, जे ब्रिटन तसेच काही राष्ट्रकुल देशांमध्ये  आढळते आणि ते राणीचे वकील म्हणून कार्य करतात.) 


🔶2 ऑक्टोबर 2020 रोजी होणारी “वैभव शिखर परिषद” कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?


*उत्तर* : विज्ञान व तंत्रज्ञान


🔶ISROच्या एका अभ्यासानुसार, हिमालयाच्या कोणत्या क्षेत्रातल्या हिमालय हिमनद्यांचा 75 टक्के अंश अत्याधिक दराने वितळत आहे?


*उत्तर* : हिंदू कुश


🔶 ‘मुख्यमंत्री महिला उत्कर्ष योजना’ कोणत्या राज्य सरकारने लागू केली?


*उत्तर* : गुजरात


🔶दरुस्ती करण्यात आलेला ‘सार्वजनिक खरेदी (मेक इन इंडियाला प्राधान्य) आदेश-2017’ कोणत्या मंत्रालयाच्यावतीने अंमलात आणला जातो?


*उत्तर* : वाणिज्य व उद्योग मंत्रालय

Online Test Series

२३ सप्टेंबर २०२०

आचारसंहिता म्हणजे नेमकं काय? पक्ष, उमेदवारांवर बंधनं काय?



 *आचारसंहिता म्हणजे नेमकं काय?* : निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी काय करावं आणि काय करू नये, असे नियम त्यांना घालून देण्यात आले. हे Do's And Dont's म्हणजेच निवडणूक 'आचारसंहिता' होय.


 *पक्ष, उमेदवारांवर काय असतात बंधनं?* : 


▪️ पक्षाने आपल्या प्रचारामध्ये असं कोणतंही भाषण, प्रचार सामग्री, घोषणा अथवा आश्वासन देऊ नयेत ज्यामुळं समाजातील जाती, धर्म, वंश, बोलीभाषा इत्यादींमध्ये फुट पडेल तसंच त्यांच्यात वाद निर्माण होतील.


▪️ कोणत्याही पक्षाला त्याच्या प्रतिपक्षावर टीका करण्याचा अधिकार आहे, मात्र त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल, त्यांच्या धर्माबद्दल, जातीबद्दल बोलता येणार नाही. असं केल्यास त्यास आचारसंहितेचा भंग समजण्यात येतो.


▪️ निवडणूकीच्या प्रचारात  मतांसाठी लोकांमध्ये पैसे वाटणं, महागड्या वस्तू देणं, मतदारांना अमिष दाखवणं, लालूच दाखवणं अशा बाबींना आचारसंहितेमध्ये गैरप्रकार म्हटलं आहे. 


▪️ कोणताही प्रचार रात्री 10 च्या आतच संपवणं, थांबवणं बंधनकारक आहे. तसंच नागरिकांच्या खासगी इमारतीचा, मालमत्तेचा अथवा जमिनीचा वापर परवानगीशिवाय कोणत्याही पक्षाला करता येत नाही.


▪️ कोणत्याही पक्षाला त्याच्या प्रतिस्पर्धी पक्षाच्या प्रचाराध्ये अडथळा आणण्याचा अधिकार नाही, असे केल्यास त्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे.


▪️ कोणत्याही पक्षाला, उमेदवाराला परवानगीशिवाय प्रचार, भाषण करता येणार नाही. याकरिता उमेदवारानं आपल्या सभांसाठी प्रशासनाचं स्वीकृतीपत्र मिळवणं आवश्यक आहे. तसंच संबंधीत बाबींची पोलीस ठाण्यात माहिती देणं आवश्यक आहे. 


▪️ आचारसंहितेच्या काळात कोणत्याही पक्षाला अथवा सरकारला आर्थिक लाभाच्या, मनोरंजनात्मक योजनांची घोषणा तसेच अमंलबजावणीही करता येत नाही. 


▪️ आचारसंहितेच्या काळात कोणत्याही पक्षाला सरकारी वाहने, विमाने, हेलिकॉप्टर इत्यादी वाहनांचा निवडणूकीच्या प्रचारासाठी वापर करता येत नाही. असं केल्यास याला आचारसंहितेचा भंग मानण्यात येतो.


▪️ आचारसंहिता केवळ निवडणूकीत उभे राहणाऱ्या उमेदवारांपुरतीच मर्यादीत नसून ही आचारसंहिता मंत्र्यांवरही लागू असते. 


▪️ निवडणूकीवर प्रभाव टाकणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्यांची बदली आपल्या आवडीच्या ठिकाणी करता येत नाही. यापैकी कोणतंही काम केल्यास ते थांबवण्याचा संपूर्ण हक्क निवडणूक आयोगाला असतो.


*सोशल मीडियावरही आचारसंहिता* : इतिहासात पहिल्यांदाच सोशल मीडियावरही आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्वर आचारसंहिते दरम्यान राजकीय पक्षांना जाहिरात पोस्ट करण्याआधी निवडणूक आयोगाला माहिती द्यावी लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर ते जाहिरात पोस्ट करू शकणार आहेत. 


 *तक्रारींसाठी मोबाईल अ‍ॅप्स* : 'समाधान' या वेब पोर्टलवर सामान्य जनता निवडणूक आणि प्रक्रियेबाबत आपल्या प्रतिक्रिया देऊ शकणार आहेत. 


तसेच एक असेही अ‍ॅप लॉन्च करण्यात आले आहे ज्याद्वारे मतदाता आचारसंहितेचा भंग होत असल्याचे ती घटना रेकॉर्ड करून निवडणूक आयोगाकडे पाठवू शकेल. यात तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. तसेच सुविधा नावाचे अ‍ॅप राजकीय पक्षांसाठी लॉन्च करण्यात आले असून याद्वारे उमेदवार, प्रतिनिधी निवडणुकीसाठी लागणार विविध परवानगी अर्ज करू शकणार आहेत.


 *दिव्यांगांसाठी विशेष अ‍ॅप* : दिव्यांग मतदारासाठी इलेक्शन कमीशनने पर्सन विद डिसेब्लिटी (PWD) नावाचे अ‍ॅप लॉन्च केले आहे. याद्वारे मतदान केंद्रावर अशा लोकांना वाहन सेवा, पाणी, रँप सेवा, व्हिलचेअर सेवा आणि ब्रेल बॅलेट पेपर आणि ब्रेल वोटर स्पिल अशा सुविधा पुरवण्यात येईल.

शब्दयोगी अव्यय



· वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांना वाक्यातील इतर शब्दां शी असणारा संबंध दर्शविणार्‍या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.


· शब्दयोगी अव्यव नेहमी एखाद्या नामाला किंवा नामाचे कार्य करणार्‍या शब्दाला जोडूनच येतात.


· शब्दयोगी अव्ययवाचे पंधरा प्रकार पडतात.



2. स्थलवाचक :


· आत, बाहेर, अलीकडे, पलीकडे, मध्ये, समोर, जवळ, ठायी, पाशी, समक्ष, समीप, नजीक इ.


· उदा. 1. पुस्तक टेबलाजवळ ठेवले आहे.

2. घरामध्ये मोठा साप घुसला आहे.



4. हेतुवाचक :


· करिता, साठी, कारणे, अर्थी, प्रीत्यर्थी, निमित्त, स्तव इ.


· उदा. 1. यश मिळविण्याकरिता मेहनत लागते.

2. जगण्यासाठी अन्न हवेच.



5. व्यतिरेकवाचक :


· विना, शिवाय, खेरीज, परवा, वाचून, व्यतिरिक्त


· उदा. 1. तुझ्याशिवाय माला करमत नाही.

2. त्याच्या खेरीज दूसरा कोणताही चालेल.



6. तुलनात्मक :


· पेक्षा, तर, तम, मध्ये, परिस इ.


· उदा. 1. माणसांपेक्षा मेंढरं बारी.

2. गावामध्ये केशर सर्वात हुशार आहे.



7. योग्यतावाचक :


· समान, सम, जोगा, सारखा, योग्य, प्रमाणे इ.


· उदा. 1. तो ड्रेस माझा सारखा आहे.

2. आम्ही दोघे समान उंचीचे आहोत.


8. संग्रहवाचक :


· सुद्धा, देखील, ही, पण, केवळ, फक्त,इ.


· उदा. 1. मी देखील त्या कार्यक्रमात सहभागी होईल.

2. रामही भक्तासाठी धावून येईल.



9. कैवल्यवाचक :


· च, ना, मात्र, पण, फक्त, केवळ इ.


· उदा. 1. विराटच आपला सामना जिंकवेल.

2. किरण मात्र आपल्या सोबत येणार नाही.


10. संबंधवाचक :


· विशी, विषयी, संबंधी इ.


· उदा. 1. देवाविषयी आपल्या मनात फार भक्ति आहे.

2. त्यासंबंधी मी काहीच बोलणार नाही.



11. संबंधवाचक :


· संगे, सह, बरोबर, सकट, सहित, निशी, सवे, समवेत इ.


· उदा. 1. त्याने सर्वांबरोबर जेवण केले.

2. आमच्या सह तो पण येणार आहे.



12.विनिमयवाचक :


· बद्दल, एवजी, जागी, बदली इ.


· उदा. 1. त्याच्या जागी मी खेळतो.

2. सूरजची बदली पुण्याला झाली.



13. दिकवाचक :


· प्रत, प्रती, कडे, लागी इ.


· उदा. 1. या पेपरच्या दहाप्रत काढून आण.

2. त्याच्याकडे पैसे दिले आहेत मी.



14. विरोधवाचक :


· विरुद्ध, वीण, उलटे, उलट इ.


· उदा. 1. भारताविरुद्ध आज पाकिस्तानची मॅच आहे.

2. त्याने उलट माझीच माफी मागितली.


15. परिणामवाचक :


· भर


· उदा. 1. मी दिवसभर घरीच होतो.

2. राम रात्रभर शेतात पाणी भरत होता.



15. परिणामवाचक :


· भर


· उदा. 1. मी दिवसभर घरीच होतो.

2. राम रात्रभर शेतात पाणी भरत होता.

चालू घडामोडी प्रश्नोत्तरे


०१) स्टीव्ह इरविन (क्रोकोडाइल हंटर) दिवस कधी साजरा केला जातो?

⚪️  १५ नोव्हेंबर

⚫️ २२ फेब्रुवारी

🔴 २० डिसेंबर 

🔵 १५ फेब्रुवारी


०२) आर्टीफीशियल इंटेलिजन्स (एआय बेस्ड) तंत्रज्ञानाच वापर करून तयार केलेली पहिली महिला न्यूज अँकर शिन शाओमेंग कोणत्या देशाने सादर केली आहे?

⚪️  चीन 

⚫️ जपान

🔴 अमेरिका 

🔵 भारत


०३) दक्षिण कोरियाच्या कल्चरल फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा सेऊल शांतता पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला आहे?

⚪️  डोनाल्ड ट्रम्प

⚫️  नरेंद्र मोदी 

🔴 वलादिमीर पुतीन

🔵 किम जोंग उन


०४) जागतिक मातृभाषा दिन कधी साजरा करण्यात येतो?

⚪️  २१ फेब्रुवारी

⚫️  २२ फेब्रुवारी

🔴 २३ फेब्रुवारी

🔵 २४ फेब्रुवारी


०५) देशातील पहिले पोलीस साहित्य संमेलन कोठे भरविण्यात येत आहे? 

⚪️ .मुंबई 

⚫️ सांगली 

🔴 कोल्हापूर

🔵 नाशिक


०६) दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणारा पहिला आशियाई देश कोणता?

⚪️ भारत 

⚫️ पाकिस्तान 

🔴 .श्रीलंका

🔵 बांगलादेश


०७) दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभूत करणारा श्रीलंका हा कितवा संघ ठरला आहे?

⚪️  पहिला 

⚫️ .दूसरा 

🔴 तिसरा 

🔵 चौथा


०८) नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या नेमबाजीच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतातर्फे १० मी एअर रायफलमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकणारी खेळाडू कोण?

⚪️  .अंजूम मुदगील

⚫️ अपुर्वी चंडेला

🔴 .तेजस्विनी सावंत

🔵 राही सरनोबत


०९)  ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ३०० षटकार खेचणारा दुसरा भारतीय फलंदाज कोण ठरला आहे?

⚪️  रोहित शर्मा 

⚫️ महेंद्रसिंह धोणी 

🔴 .सुरेश रैना 

🔵 विराट कोहली


१०)  सर्वाधिक परदेश दौरे करणारे भारतीय पंतप्रधान कोण?

⚪️ .इंदिरा गांधी 

⚫️ अटलबिहारी वाजपेयी

🔴 मनमोहन सिंग

🔵 नरेंद्र मोदी


११)  पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ कोणत्या ठिकाणाहून होत आहे?

⚪️  गोरखपूर 

⚫️ कानपूर

🔴 सोलापूर

🔵 नागपूर


१२) ९१व्या ऑस्कर सोहळ्यात सर्वोत्तम चित्रपटाचा ऑस्कर कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? 

⚪️ .ग्रीन बुक 

⚫️ .ब्लॅक पँथर

🔴 रोमा

🔵 द फव्हरेट


१३) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग ४ चेंडूवर ४ बळी घेणारा पहिला गोलंदाज कोण? 

⚪️ लसिथ मलिंगा 

⚫️ राशिद खान 

🔴 इरफान पठाण 

🔵 बरेट ली


१४) महात्मा गांधीच्या १५०व्या जयंतीनिमित्ताने गांधी विज्ञान संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? 

⚪️ .सेवाग्राम वर्धा 

⚫️ गांधीनगर

🔴 मबई

🔵 रायबरेली


१५) 'माय क्रिकेटिंग लाईफ', 'हाऊ टू प्ले क्रिकेट','फेअरवेल टू क्रिकेट' आणि 'दि आर्ट आॅफ क्रिकेट' या पुस्तकांचे लेखक कोण आहेत? 

⚪️ डॉन ब्रॅडमन

⚫️ सचिन तेंडूलकर

🔴 सनिल गावसकर

🔵 कपिल देव


🔴उत्तरे🔴

०१) १५ नोव्हेंबर ०२) चीन ०३) नरेंद्र मोदी ०४) २१ फेब्रुवारी ०५) मुंबई ०६) श्रीलंका ०७) तिसरा ०८) अपुर्वी चंडेला ०९) सुरेश रैना  १०) इंदिरा गांधी  ११) गोरखपूर १२) ग्रीन बुक १३) लसिथ मलिंगा १४) सेवाग्राम वर्धा १५) डॉन ब्रॅडमन

English उच्चारसाधर्म्य शब्द


1) fair - यात्रा, गोरा, 

fare - भाडे


2) week - आठवडा, 

wick - बत्ती , काकडा , 

weak - अशक्त


3) cell - विजेरीचा सेल , पेशी , कोठडी 

sell - विकणे 

sail - तरंगत जाणे


4) celler - तळघर 

seller -विक्रेता


5) once - एकदा 

one's - एखाद्याचा


6) sit - बसणे 

seat - आसन


7) wet - ओला 

weight - वजन 

wait - वाट पाहणे


8) test - चाचणी 

taste - चव


9) roe - मृगी , हरिणी ( मादी) 

row - रांग , ओळ।, वल्हवणे 

raw - कच्चा


10) feet - पाऊले 

fit - योग्य 

feat - पराक्रम , योग्यता


11) thrown - फेकलेला ( throw चे भूतकाळी रूप) 

throne - सिंहासन


12)held - धरला (hold चे भूतकाळी रूप) 

hailed - जयजयकार केला


13) career - व्यवसाय 

carrier - वाहून नेणे


14) our - आमचा, आमची , आमचे 

hour ( अवर) तास


15) bare - उघडा 

bier - तिरडी, शव वाहून नेण्याची चौकट 

bear - अस्वल , सहन करणे


16) road - रस्ता 

rod - गज, दांडा 

rode- आरुढ झाला ( ride चा भूतकाळ)


17)meat - मटण 

meet - भेटणे


18)leave - सोडणे 

live - राहणे


19)piece - तुकडा 

peace - शांतता


20)hail - गारा, अभिवादन 

hale - तगडा, स्वस्थ 

hell - नरक


21) principle - तत्त्व 

principal - प्राचार्य


22) manager - व्यवस्थापक 

manger - गव्हाण , गोठा


23) letter - पत्र, अक्षर 

later - नंतर


24) dip -बुडविणे, बुडणे 

deep - खोल


25) quite - अगदी, जोरदार 

quiet - शांत 

quiot - लोखंडी कडी


26) deed - कृत्य 

did - केले


27) expect - अपेक्षा करणे 

aspect - पैलू, स्वरूप


28) feel - वाटणे, स्पर्श करणे 

fill - भरणे


29) floor - जमीन 

flour- पीठ 

flower - फूल


30)waste - रद्दी, वाया गेलेले 

waist - कमर , कंबर 

west - पश्चिम 

vest - बनियन


31) fell - पडणे 

fail - नापास


32) story - गोष्ट 

storey- मजला


33) slip - घसरणे 

sleep - झोपणे


34)in - आत, मध्ये 

inn - खानावळ 

yean - शेळी ,मेंढीने पिल्लूला जन्म देणे


35) whole - संपूर्ण 

hole - छिद्र 

vole - उंदराच्या जातीचा प्राणी


36)hit - टोला मारणे 

heat - उष्णता


37) of - चा, ची चे 

off - बंद करणे


38) self - स्वत:चा 

shelf - मांडणी , फडताळ


39) sheep - मेंढी 

ship - जहाज 

sheaf - गवताची पेंढी


40) beat - मारणे , पराभूत होणे 

bit - चावला ( bite चे भूतकाळी रूप) 

beet - चुकंदर 

a bit - थोडेसे


41) wander - भटकणे 

wonder - आश्चर्य


42) rich - श्रीमंत 

reach - पोहचणे


43) deed - कृत्य 

did - केले


44) so - म्हणून, इतका, तर, 

sow - पेरणे 

saw - पाहिला, करवत


45) rain - पाऊस 

reign - शासन , राज्य 

rein - लगाम 

wren - रेन पक्षी ( युरोप)


46) lives - राहतो 

leaves - पाने, सोडून जातो


47) liver - यकृत 

lever - तरफ


48) tent - तंबू 

taint - कलंक , दोष


49) wedge - पाचर, 

wage -पगार, वेतन, खंड


50 ) neat - व्यवस्थित 

nit - लीख 

knit - विणणे 


51) list - यादी 

least - कमीत कमी, किमान 


52) horde - भटकी जमात 

hoard - साठा करणे , 


53) jealous - मत्सरी 

zealous - उत्साही 


54) metal - धातू , रूळ 

mettle - धैर्य, शक्ती , स्फूर्ती 


55) to - च्याकडे , च्यापर्यंत, च्या तुलनेने 

too - सुद्धा 

two- दोन


56) lip - ओठ 

leap - उडी मारणे 


57) sun - सूर्य 

son - पुत्र, मुलगा 


58) pray - प्रार्थना 

prey - भक्ष्य 


59) dear - आदरणीय, प्रिय 

deer - हरिण 


60) root - मूळ 

route - मार्ग


61)full - पूर्ण भरलेला 

fool - मूर्ख 


62) sum - रक्कम , बेरीज 

some - काही , थोडे 


63) lesson - धडा , पाठ 

lessen - कमी करणे 


64) night - रात्र 

knight - सरदार 


65) sin - पाप 

seen - पाहीले 

scene - दृश्य, देखावा


66) gate - फाटक 

get - मिळणे, मिळवणे 

gait - चाल ( चालण्याची पद्धत) 


67) male - पुरूष 

mail - टपाल, कवच


68) higher - अधिक उंच 

hire - हप्ता , भाड्याने घेणे 


69) let - परवानगी देणे 

late - उशीर 


70) tell - सांगणे 

tale - गोष्ट 

tail - शेपूट


71) new - नवा 

knew - माहीत होते (know चे भूतकाळी रूप) 


72) bore - छिद्र करणे 

boar - रानडुक्कर


73) vice - दुर्गुण, पकड, उप, दोष 

voice - आवाज , प्रयोग 


74) thirst - तहान 

thrust - खुपसणे 


75) steel - पोलाद 

steal - चोरणे

still - अद्यापपर्यंत,स्थिर , शांत , स्तब्ध


76) addition - वाढ, बेरीज 

edition - आवृत्ती, प्रकाशित पुस्तकाचे स्वरूप


77) chick - पक्ष्याचे पिल्लू 

cheek - गाल


78) it - तो, ती ते 

eat - खाणे


79) stationery - लेखन साहित्य 

stationary - स्थिर , न हलणारा


80) tick - चूक की बरोबर त्याची खूण ( Mark) करणे, कुत्रा व मेंढी यांच्या रक्तावर पोसणारा गोचिडीसारखा कीटक, 

Gk Question


Question: रणथम्भौर का युद्ध किसके मध्य हुआ ?

A: अलाउद्दीन खिलजी और राणा हमीर✔️

B: बाबर और राणा सांगा

C: अलाउद्दीन खिलजी और राणा रतन सिंह

D: मुहम्मद गौरी और पृथ्वीराज चौहान


Question: मोहम्म्द गौरी ने पृथ्वीराज चौहान को कब पराजित किया ?

A: तराइन के प्रथम युद्ध मे

B: तराइन के द्वितीय युद्ध मे✔️

C: पानीपत के प्रथम युद्ध मे

D: पानीपत के द्वितीय युद्ध मे


Question: पृथ्वीराज रासो के अनुसार राजपूतो की उत्पत्ति कहां से हुई है ?

A: अग्निकुंड़ से✔️

B: सूर्य से

C: आकाश से

D: चन्द्रमा से


Question: चौहानो का मूल स्थान माना किसे जाता है ?

A: अजमेर

B: नागौर

C: सपादलक्ष✔️

D: जालौर


Question: सातवी शताब्दी मे अजमेर दुर्ग की स्थापना किसने की?

A: अजयपाल ने✔️

B: कीर्तिपाल ने

C: अर्णोराज ने

D: वासुदेव ने


Question: पृथ्वीराज तृतीय का जन्म कहॉ हुआ ?

A: अन्हिलपाटन✔️

B: जालौर

C: सॉंभर

D: अजमेर


Question: अलाउद्दीन खिलजी ने किस दुर्ग को जीतकर उसका नाम खैराबाद रखा ?

A: सिवाना दुर्ग✔️

B: जोधपुर दुर्ग

C: रणथम्भौर दुर्ग

D: िचतौड़ दुर्ग


Question: सिरोही के किस शासक ने ईस्ट इंडिया कम्पनी से संधि की ?

A: सहासमल

B: लक्ष्मण

C: शिवसिंह✔️

D: इनमें से कोई नहीं


Question: तराइन का मैदान कहां है?

A: पंजाब

B: राजस्थान

C: हरियाणा✔️

D: उत्तर प्रदेश


Question: तराइन के प्रथम युद्ध मे किसकी विजय हुई ?

A: पृथ्वीराज चौहान तृतीय✔️

B: मोहम्म्द गौरी

C: मोहम्म्द गजनवी

D: गोविंदराज


Question: चंपानेर की संधि मालवा और गुजरात के शासको ने सयुक्त रूप से मेवाड़ के किस शासक के विरूद्ध की ?

A: महाराणा कुम्भा✔️

B: महाराणा रायवमल

C: राव चूड़ा

D: महाराणा सांगा


Question: एकलिंग महात्म्य ग्रंथ का लेखन कार्य किस शासक द्वारा पूरा किया गया था?

A: महाराणा रायमल

B: महाराणा सांगा

C: महाराणा कुम्भा✔️

D: राणा लाखा


Question: किस शासक के शासनकाल मे पिछोला झील का निर्माण एक बन्जारे द्वारा किया गया था ?

A: महाराणा रायमल

B: महाराणा सांगा

C: महाराणा कुम्भा

D: राणा लाखा✔️


Question: किस शासक को मानवो का खन्डहर व सैनिको का भग्नावशेष कहा जाता है ?

A: महाराणा कुम्भा

B: महाराणा रायवमल

C: महाराणा सांगा✔️

D: मोकल


Question: अलाउद्दीन खिलजी ने चितौड विजय के उपरान्त चितौडगढ का नाम बदलकर क्या रख दिया था ?

A: मालवा

B: ममूदाबाद

C: खिज्राबाद✔️

D: जलालाबाद


Question: मेवाड का प्रथ्म साका किस शासक शासनकाल मे घटित हुआ था ?

A: रत्नसिंह✔️

B: महाराणा रायवमल

C: राव चूडा

D: महाराणा सांगा


Question: मेवाड का भीष्म पितामह किस शासक को कहा जाता है ?

A: महाराणा कुम्भा

B: महाराणा रायवमल

C: राव चूडा✔️

D: महाराणा सांगा


Question: राणा सांगा का सम्बन्ध कहां से है ?

A: मालवा

B: खजुराहो

C: मांडू

D: मेवाड✔️


Question: गुहिल वंश की प्रारंभिक राजधानी क्या थी ?

A: मालवा

B: चितौडगढ

C: आहड़

D: नागदा✔️


Question: मेवाड का मेराथन युद्ध किसे कहा गया है ?

A: हल्दीघाटी युद्ध

B: दिवेर युद्ध✔️

C: माहोली युद्ध

D: इनमें से कोई नहीं


Question: वह राजपूत रानी कौन थी, जिसने अपने सैकडो अनुयायियो के साथ अलाउद्‌दीन खिलजी के 1303 ई. पू. मे चितौडगढ पर कब्जा करने पर जौहर कर लिया था ?

A: पदमावती

B: पदमिनी✔️

C: कर्मावती

D: रूपमती


Question: कुशाल माता का वह भव्य मंदिर जिसका निर्माण महाराणा कुम्भा ने करवाया था, कहां स्थित है ?

A: ओसियॉ

B: बदनोर✔️

C: कुम्भलगढ

D: उदयपुर

चर्चित शहर/देश /राज्य :-


• अरुणाचल प्रदेश:-

हे राज्य संपूर्णत: हागणदारीमुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आले. हागणदारीमुक्त ठरलेले हे भारतातील सहावे राज्य ठरले. या अगोदर   सिक्किम, हिमाचल प्रदेश, केरळ, हरियाणा आणि उत्तराखंड हे पाच राज्य हागणदारीमुक्त ठरले आहे 


• तामिळनाडू:-

राज्य पोलीस दलातील सेवा तृतीयपंथी व्यक्तीसाठी खुले करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकाने घेतला .असा निर्णय घेणारे तामिळनाडू हे देशातील पहिले राज्य ठरले 


• केरळ :-

केरळ देशातील ४ आंतरराष्ट्रीय विमानतळे असलेले भारतातील  पहिले राज्य  आहे. कोचीन, त्रिवेंद्रम, कालिकत आणि कन्नूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत.


• दिल्ली:-

भारतातील पहिले राष्ट्रीय पोलीस संग्रहालय दिल्लीच्या लुटियन भागात बनवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.केंद्रीय पोलीस दल आणि राज्यांच्या पोलीस दलांच्य इतिहासाचा अभ्यास करण्याची संधी या संग्रहालयामुंळे मिळणार आहे. पोलीसांचे गणवेश आणि पोलीसांशी संबंधित अन्य सामग्रीचा संग्रह यात करण्यात येणार आहे.


• फगवाडा (पंजाब):-

पंजाब (फगवाडा ) येथे सुरु असलेल्या १०६ व्या इंडियन सायन्स कॉंग्रेसमध्ये देशातील पहिली चालकविना बस धावली .


• राजस्थान

राष्ट्रीय जैव इंधन धोरण  (National Biofuel Policy) लागू करणारे भारतातील पहिले राज्य राजस्थान ठरले 


• मुंबई :-

केंद्र शासन ,राज्य शासन यांच्या सयुक्त विद्यमाने २५ वी जागतिक भागीदारी परिषद मुंबई येथे आयोजित केली आहे .२५ वर्षात मुंबईला आयोजक होण्याचा प्रथमच मान मिळाला 


• पाटणा देवी (चाळीसगाव):-

गणितीय खेळांची सांगड घालत गणित सोप करून सांगणारा गणितीतज्ञ भास्कराचार्य गणितनगरी प्रकल्प चाळीसगाव तालुक्यातील पाटणा देवी येथे उभारला जात आहे 


• सातारा

महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क सातारा येथे  स्थापन करण्यात येत आहे 


• चंदिगढ़

सैन्य साहित्य महोत्सव-2018’ चे आयोजन चंदिगड या शहरात करण्यात आले होते


• बुडापेस्ट

2023 या वर्षामध्ये आईएएएफ (IAAF) विश्व अथॅलेटिक्स चॅपियनशिप ची स्पर्धा पार पडणार आहे


• भोपाळ

भारतातील पहिला वैश्विक कौशल (Mutti-Skill) पार्क स्थापन होत आहे :- 


• सिंगापुर

6 सप्टेंबर , 2018 रोजी सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक ने सिंगापुर येथे आशियातील पहिले  डेटा सेंटर सुरु करण्याची घोषणा केली 


• बुंदेलखंड एक्सप्रेस-वे

21 ऑगस्ट  2018 रोजी उत्तरप्रदेश सरकाने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ बुंदेलखंड एक्सप्रेस-वे चे नाव ‘अटल पथ’ असे केले 


• तेलंगाना

या राज्य सरकार ने बायोटेक आणि बायोफार्मा क्षेत्रासाठी ‘बी. हब’ स्थापित करण्याचा निर्णय घेतला


• गुरुग्राम

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड ने भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून घोषित केले


• दंतेवाड़ा

अटल बिहारी वाजपेयी एजुकेशन सिटी छत्तीगढ़ मध्ये दंतेवाड़ा या ठिकाणी स्थापन केले  जाणार आहे 


• झारखंड

या राज्यात भारतातील पहिला खादी मॉल स्थापन केला जात आहे 


• उत्तर प्रदेश

या राज्यात विद्युत चोरी बंद करण्यासाठी प्रत्येक जिल्हात एंटी पॉवर थेफ्ट पुलिस स्टेशन स्थापन करण्याचा निर्णय घेतला 


• गुवाहाटी

 हे रेल्वे स्टेशन भारतातील पहिले सौर ऊर्जा संचालित स्टेशन ठरले 


• महाराष्ट्र

डीजीटल स्वाक्षरी असलेले ७/१२ देणारे भारतातील पहिले राज्य कोणते:- 


• पूर्वी गोदावरी (आंध्र प्रदेश )

भारतातील १००% एलईडी स्ट्रीट लाइटिंग असणारा पहिला जिल्हा  


• सूरत (गुजरात)

भारतातील १०० % सौरऊर्जा ने संचालित प्राथमिक स्वास्थ्य केंद्र (पीएचसी) असणारा पहिला जिल्हा :-


• तमिळनाडु( तमिळनाडु कृषि विश्वविद्यालय, कोईमतूर)

भारतातील पहिले  कीटक  संग्रहालय या राज्यात स्थापन करण्यात येत आहे :-


• फरीदाबाद

भारतातील पहिले पॅरालंपिक भवन येथे स्थापित केले जात आहे 


•  कर्नाटक

या राज्यात जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा पार्क ‘शक्तिस्थल’ स्थापन करण्यात आले


• गांधीनगर रेल्वे  स्टेशन (जयपुर)

भारतातील संपूर्ण महिला कर्मचारी असलेले पहिले स्थानक ठरले या अगोदर मुंबईतील माटुंगा हे ‘ संपूर्ण महिला कर्मचारी असलेले पहिले स्थानक ठरले होते परंतु ते सब-अर्बन (उप-नगरीय) ररेल्वे स्टेशन आहे.


दशातील पहिल्या घटना -



देशातील पहिले सोलर सिटी - मलकापूर (सातारा)

 

देशातील पहिले बाल न्यायालय - दिल्ली

 

देशातील पहिले महिला न्यायालय - आंधप्रदेश

 

देशातील पहिले आधार गाव - टेंभली (नंदूरबार)

 

देशातील पहिले हरीत शहर - आगरतळा (त्रिपुरा) (दूसरे - नागपूर)

 

देशातील पहिली फूड बँक - दिल्ली

 

देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य- उत्तराखंड

 

देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क - भुवनेश्‍वर

 

देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश

 

देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी

 

देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)

 

देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज - काटेवाडी

 

देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र

 

देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर

 

देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर

 

देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई

 

देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात

 

देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)

 

देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन - पुणे

 

देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात - अरुणाचल प्रदेश

 

देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर

 

देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र

 

देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र

 

देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई

 

देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)

 

देशातील पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली

 

देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे

 

देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक

 

देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर)

 

देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य - हिमाचलप्रदेश

 

देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर

 

देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य - महाराष्ट्र

 

देशातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे - पुणे

 

देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य - सिक्किम

 

देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य - महाराष्ट्र

 

देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे

 

देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव - सदरहू (नागालँड)

 

देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर - चंदीगड

 

देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर - झारखंड

 

देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य - महाराष्ट्र

 

देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा

 

देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत

 

देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य - आंध्रप्रदेश

 

देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य - तामिळनाडू

 

देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक - बंगळूर

 

देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य - आंध्रप्रदेश

 

देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र

 

देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प - कांडला (गुजरात)

 

देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल

 

देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अ‍ॅक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश

 

देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ - राज्यस्थान

 

देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र - हडपसर  (पुणे)

 

देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा

 

देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)

 

देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र

 

देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य - महाराष्ट्र

 

देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली

 

देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)

 

देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र

 

देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)

 

देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले -  दिल्ली

 

देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)

विटामिन संबंधी महत्वपूर्ण तथ्य



• विटामिन - 'A'

रासायनिक नाम : रेटिनाॅल

कमी से रोग: रतौंधी

स्त्रोत (Source):  गाजर, दूध, अण्डा, फल


• विटामिन - 'B1'

रासायनिक नाम: थायमिन

कमी से रोग: बेरी-बेरी

स्त्रोत (Source): मुंगफली, आलू, सब्जीयाँ


• विटामिन - 'B2'

रासायनिक नाम: राइबोफ्लेबिन

कमी से रोग: त्वचा फटना, आँख का रोग

स्त्रोत (Source):  अण्डा, दूध, हरी सब्जियाँ

• विटामिन - 'B3'

रासायनिक नाम: पैण्टोथेनिक अम्ल

कमी से रोग: पैरों में जलन, बाल सफेद

स्त्रोत (Source): मांस, दूध, टमाटर, मंूगफली


• विटामिन - 'B5'

रासायनिक नाम: निकोटिनेमाइड (नियासिन)

कमी से रोग: मासिक विकार (पेलाग्रा)

स्त्रोत (Source): मांस, मूंगफली, आलू


• विटामिन - 'B6'

रासायनिक नाम: पाइरीडाॅक्सिन

कमी से रोग: एनीमिया, त्वचा रोग

स्त्रोत (Source): दूध, मांस, सब्जी


• विटामिन - 'H  / B7'

रासायनिक नाम: बायोटिन

कमी से रोग: बालों का गिरना , चर्म रोग

स्त्रोत (Source): यीस्ट, गेहूँ, अण्डा


• विटामिन - 'B12'

रासायनिक नाम: सायनोकोबालमिन

कमी से रोग: एनीमिया, पाण्डू रोग

स्त्रोत (Source): मांस, कजेली, दूध


• विटामिन - 'C'

रासायनिक नाम: एस्कार्बिक एसिड

कमी से रोग: स्कर्वी, मसूड़ों का फुलना

स्त्रोत (Source): आँवला, नींबू, संतरा, नारंगी


• विटामिन - 'D'

रासायनिक नाम: कैल्सिफेराॅल

कमी से रोग: रिकेट्स

स्त्रोत (Source):  सूर्य का प्रकाश, दूध, अण्डा


• विटामिन - 'E'

रासायनिक नाम: टेकोफेराॅल

कमी से रोग: जनन शक्ति का कम  होना

स्त्रोत (Source): हरी सब्जी, मक्खन, दूध


• विटामिन - 'K'

रासायनिक नाम: फिलोक्वीनाॅन

कमी से रोग: रक्त का थक्का न बनना

स्त्रोत (Source): टमाटर, हरी सब्जियाँ, दूध


जगातील विविध स्थळांची टोपननावे किंवा ठळक वैशिष्टये


👉🏾 *इंग्लंडचे उद्यान*

– केंट 


👉🏾 *यूरोपाचे काश्मीर*

– स्वित्झर्लंड 


👉🏾 *वादळी शहर*

– शिकागो 


👉🏾 *पीत नदी*

– हो हँग हो 


👉🏾 *भारताचे स्वित्झर्लंड*

– काश्मीर 


👉🏾 *लवगांचे बेट*

– झांजीबार 


👉🏾 *गुलाबी शहर*

– जयपूर 


👉🏾 *खड़काळ शहर*

– अँबरडीन 


👉🏾 *पायाखालील प्रदेश*

– ऑस्ट्रेलिया 


👉🏾 *पाच नदयाचा प्रदेश*

– पंजाब 


👉🏾 *हजार तळ्यांचा देश*

– फिनलँड 


👉🏾 *निर्जनतम बेट*

– ट्रिस्टन डी क्यूबा 


👉🏾 *भारताचे व्हेनीस*

– अलेप्पी


👉🏾 *पाचूंचे बेट*

– श्रीलंका 


👉🏾 *दक्षिणेतील ब्रिटन*

– न्यूझीलंड 


👉🏾 *भारताचे उद्यान*

– बंगलोर 


👉🏾 *भूकंपाचे शहर*

– फिलाडेल्फिया 


👉🏾 *उत्तरेकडील व्हेनीस*

– स्टॉकहोम 


👉🏾 *कमलपुष्पांचा देश*

– फ़्रान्स व कॅनडा 


👉🏾 *अमर शहर*

– रोम 


👉🏾 *मंदिरांचे माहेरघर*

– बनारस 


👉🏾 *मेपल वृक्षांचा देश*

– कॅनडा


👉🏾 *काळा खंड*

– आफ्रिका 


👉🏾 *श्वेत शहर*

– बेलग्रेड 


👉🏾 *जगाचे छप्पर*

– पामीरचे पठार 


👉🏾 *भारताचा मसाला मळा*

– केरळ 


👉🏾 *भूमध्य समुद्राची किल्ली*

– जिब्राल्टर 


👉🏾 *गोऱ्या माणसाची दफन भूमी*

– गिनीचा किनारा 


👉🏾 *मोत्यांचे बेट*

– बहारीन 


👉🏾 *राजवाडयांचे शहर*

– वॉशिंगटन


👉🏾 *अज्ञात खंड*

– आफ्रिका 


👉🏾 *उंच इमारतीचे शहर*

– न्यूयार्क 


👉🏾 *भव्य अंतराचे शहर*

– कोलकाता 


👉🏾 *कांगारूंचा देश*

– ऑस्ट्रेलिया 


👉🏾 *सूर्यास्ताचा देश*

– ब्रिटन 


👉🏾 *उगवत्या सूर्याचा देश*

– जपान 


👉🏾 *मध्यरात्रीच्या सूर्याचा देश*

– नॉर्वे


विशेष दर्जा देणारं कलम 35A काय आहे:-



📌 जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं संविधानातील कलम 35A च्या विरोधात सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल झालेल्या आहेत. या याचिका सध्या प्रलंबित आहेत. यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे. मात्र त्यापूर्वीच राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.


काय आहे प्रकरण?


📌कोर्टात प्रलंबित असलेल्या याचिकांमध्ये राज्यघटनेतील कलम 35A रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. या कलमामुळे जम्मू-काश्मीरमध्ये बाहेरुन येणाऱ्या लोकांना सरकारी नोकरी, शिक्षण आणि सुविधांपासून वंचित ठेवलं जातं. सोबतच, राज्याच्या बाहेरील व्यक्तीसोबत लग्न केल्यास मुलगीही आवश्यक अधिकार गमावते.


राष्ट्रपतींच्या आदेशाने 35A चा समावेश-


📌तत्कालीन राष्ट्रपतींच्या आदेशाने मे 1954 मध्ये कलम 35A चा राज्यघटनेत समावेश करण्यात आला. राज्यातील नागरिकांची परिभाषा ठरवण्याचा अधिकार जम्मू-काश्मीर विधानसभेला यामुळे मिळाला. याच नागरिकांना संपत्ती ठेवणं, सरकारी नोकरी मिळवणं आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळतो.


📌ससदेत प्रस्ताव आणल्याविनाच या कलमाचा राज्यघटनेत समावेश का केला, असा याचिकाकर्त्यांचा प्रश्न आहे. या आधारावर सुप्रीम कोर्टाने कलम 35A रद्द करावं, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे.


एकूण चार याचिका प्रलंबित-


📌35A रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात चार याचिका प्रलंबित आहेत. यामध्ये दोन याचिका वुई द सिटीझन आणि पश्चिम पाकिस्तान निर्वासीत कृती समिती या संस्थांच्या नावाने दाखल आहेत. यामध्ये राज्यात बाहेरुन येणाऱ्या लोकांच्या समस्यांवर बोट ठेवण्यात आलं आहे.


📌इतर दोन याचिका चारु वली खन्ना आणि सीमा राजदान भार्गव नावाच्या महिलांनी केल्या आहेत. जम्मू-काश्मीरमधील बाहेरच्या पुरुषासोबत लग्न केल्यास होणाऱ्या भेदभावाचा मुद्दा या महिलांनी आपल्या याचिकांमधून मांडला आहे. त्यांनी घटनेतील कलम 14 म्हणजेच समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन होत असल्याचंही म्हटलं आहे.


📌काश्मीरी मुलीसोबत लग्न केल्यास बाहेरच्या पुरुषांच्या मुलांना स्थायी नागरिकत्वाचा दर्जा आणि अनेक अधिकार मिळतात. मात्र राज्यातील बाहेरच्या पुरुषासोबत लग्न केल्यास महिलांच्या अधिकारांवर बंदी घालण्यात आली आहे, असं याचिकाकर्त्या महिलांचं म्हणणं आहे.


आतापर्यंत दोन वेळा सुनावणी पुढे ढकलली-


📌कद्र सरकारने आयबीचे माजी संचालक दिनेश्वर शर्मा यांचा काश्मीरप्रश्नी मध्यस्थी नियुक्त केलं आहे. सरकारने आतापर्यंत दोन वेळा याप्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यासाठी विनंती केली आहे. या सुनावणीमुळे शांतता प्रस्थापित करण्यात अडचणी येतील, असं सरकारचं म्हणणं आहे.

भारतातील आंतरराष्ट्रीय दर्जाची विमानतळे


·         छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ : मुंबई 


·         इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ : नवी मुंबई 


·         नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ : कोलकत्ता


·         के. कामराज आंतरराष्ट्रीय विमानतळ : चेन्नई 


·         डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानतळ : नागपूर 


·         राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ : हैदराबाद 


·         गोपीनाथ बारडोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ : गोहाटी 


·         दबोलीन आंतरराष्ट्रीय विमानतळ : गोवा 


·         सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळ : अहमदाबाद 


·         श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ : श्रीनगर 


·         बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ : बंगळूर 


·         मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ : मंगळूर 


·         कलिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ : कलिकत


·         कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ : कोची 


·         त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ : तिरूअनंतपुरम 


·         देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ : इंदौर 


·         श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळ : अमृतसर 


·         जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ : जयपूर 


·         वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ : पोर्टब्लेअर 


·         कोईमतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ : कोईमतूर 


·         तिरूचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ : तिरूचिरापल्ली 


·         चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ : लखनौ 


·         लालबहादुर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ : वाराणशी 

चद्रासंबंधीची माहिती


❇️चद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.


❇️चद्र पृथ्वीपासून 3,82,144 किलोमीटर अंतरावर आहे. 


❇️चद्राचा व्यास 3,478 किलोमीटर आहे.


❇️चद्राची गुरुत्वाकर्षण शक्ति पृथ्वीच्या सहापटीने कमी आहे.


❇️चद्रास सूर्यापासून मिळणार्‍या उष्णतेच्या फक्त 7% भाग परावर्तीत करतो. यामुळे चंद्राचा प्रकाश आपणास शितल वाटतो.


❇️चद्र व पृथ्वीच्या परिवलन व परिभ्रमन गतीमुळे चंद्र दररोज 50 मिनीटे उशिरा उगावतो.


❇️चद्राचा हा कालावधी अमवश्या ते पौर्णिमा असा मनाला जातो. हा कालावधी 29 दिवस आहे. याला चंद्रमास असे म्हणतात.


❇️चद्राचा 59% भाग पृथ्वीवरून दिसतो.


❇️चद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परीभ्रमणामुळे पृथ्वीवर चंद्रग्रहण व सूर्यग्रहण हे दोन अविष्कार पाहावयास मिळतात.


❇️चद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील आकर्षण आणि प्रतीकर्षण बलामुळे पृथ्वीवरील समुद्रात भरती व ओहोटी येते.


❇️पोर्णिमेला आणि अमावश्येला चंद्र, सूर्य व पृथ्वी एकाच रेषेत येते. या दिवशी चंद्र व सूर्य यांच्या एकति गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीवर सर्वात मोठी भरती येते. याला उधानाची भरती म्हणतात.


❇️अष्टमिला चंद्र आणि सूर्य पृथ्वीला काटकोन करतात या दिवशी येणार्‍या भरतीला भांगेची भरती असे म्हणतात.

एनएमसीत आहे तरी काय?



राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक गुरुवारी राज्यसभेतही मंजूर झाले. या विधेयकावरून देशातील डॉक्टरांनी नुकताच संपही केला होता. हे विधेयक गरीब आणि विद्यार्थीविरोधी असल्याचा डॉक्टरांचा दावा आहे, तर ते गरिबांसाठी असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.


▪️काय आहे विधेयकात?


- वैद्यकीय क्षेत्रासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची (एनएमसी) स्थापना

- वैद्यकीय प्रवेशासाठी 'नीट'सुरूच राहणार

- वैद्यकीयच्या शेवटच्या वर्षात नॅशनल एक्झिट टेस्ट. यामुळे प्रॅक्टिस करण्यास परवाना दिला जाणार.

- कायदा अस्तित्वात आल्यानंतर तीन वर्षांनी ही तरतूद लागू.

- अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंडमध्ये एमबीबीएस करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ही परीक्षा द्यावी लागणार. आतापर्यंत ही तरतूद नव्हती.


▪️कॉलेज फी आणि तपासणी


- सध्या वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शुल्क नियंत्रण करण्याचा अधिकार मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाला (एमसीआय) नाही.


- या विधेयकाद्वारे खासगी कॉलेजातील ५० टक्के जागांचे शुल्क निश्चित करण्यासाठी 'एनएमसी' मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार


- एमसीआय सध्या सरकारी कॉलेजातील फॅकल्टीचा वापर करून वैद्यकीय कॉलेजची तपासणी करते.


- या विधेयकामुळे त्रयस्थ व्यक्ती किंवा संस्थेचा वापर करून तपासणी करता येणार.


▪️सल्लागार परिषद स्थापणार


- राज्याच्या एमसीआयमधून ११ अर्धवेळ सदस्यांची वैद्यकीय सल्लागार परिषदेवर नियुक्ती करणार.


- या परिषदेवर एकूण ७२ सदस्य असतील.


- प्रत्येक राज्याला सुमारे १० वर्षे प्रतिनिधीत्व करता येणार.


- ही परिषद एनएमसीला फक्त सल्ला देण्याचे काम करणार.


- या परिषदेच्या अध्यक्षस्थानी एनएमसीचे अध्यक्ष असतील आणि त्यात एनएमसीचे २५ सदस्यही असणार.


- परिषदेचा सल्ला स्वीकारायचा की नाही, याचा निर्णय घेतला जाणार.


▪️सरकारी प्रतिनिधींचा समावेश


- 'एनएमसी'त एकूण सदस्य २५ असणार.


- त्यातील तीन सदस्य डॉक्टर नसणार. शोध समितीतील एक, वैद्यकीय आढावा आणि रेटिंग बोर्ड व वैद्यकीय नोंदणी बोर्डावरील प्रत्येक एक असे तिघे डॉक्टर नसतील.


- वैद्यकीय सल्लागार परिषदेतही चार सदस्य डॉक्टर नसतील. यात नोकरशहांचाही समावेश असेल.


- केंद्राकडून एनएमसीवर नियुक्त होणारा सचिव डॉक्टर नसू शकतो. कारण या विधेयकात तसे बंधनकारक नाही.


▪️कद्राचे नियंत्रण वाढणार?


- एनएमसीत केंद्राने नियुक्त केलेल्या सदस्यांची संख्याही आहे.


- एथिक्स आणि नोंदणी बोर्डाने घेतलेले निर्णय सोडून अन्य सर्व निर्णयांना केंद्र सरकारकडेच दाद मागावी लागणार. कारण केंद्र सरकार हेच दाद प्राधिकरण असणार.


- धोरणात्मक आदेश देण्याचा अधिकारही केंद्र सरकारला.


▪️कारवाईचा अधिकार सरकारकडे


- आतापर्यंत एमसीआयचे निर्णय राज्य एमसीआयवर बंधनकारक नव्हते. एखाद्या डॉक्टरला निलंबित करण्याचा आदेश जरी एमसीआयने दिला, तरी राज्य एमसीआय तो नाकारत असे.


- विधेयकात मात्र एनएमसीला तसा अधिकार देण्यात आला आहे.


- जर एमसीआयने इंडियन मेडिकल कौन्सिल कायद्याचे उल्लंघन केले, तरी त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार आतापर्यंत नव्हता. या विधेयकात आयोगावरील कोणत्याही सदस्याविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार सरकारला मिळाला आहे.


- एमसीआय सदस्याला समितीवर येताना व जाताना आतापर्यंत संपत्ती व कर्जे यांची माहिती देण्याचे बंधन नव्हते. ते बंधन एनएमसीवरील प्रत्येक सदस्याला घालण्यात आले आहे. ही सर्व माहिती एनएमसीच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे.


▪️सीएचपींची नियुक्ती


- 'आयुष' डॉक्टरसाठीचे ब्रिज कोर्सेसचा उल्लेख वगळला; पण एनएमसीने केंद्रीय होमिओपॅथी परिषद आणि केंद्रीय औषध परिषदेबरोबर वार्षिक बैठक घ्यावी असे म्हटले आहे.


- या बैठकीत सर्व प्रकारच्या औषध प्रकारांमध्ये सूसूत्रता वाढविण्याचा विचार व्हावा.


- या औषध प्रकारांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यासाठी आणि वैद्यकीय विविधतेसाठी निर्णय घ्यावा.


- सामाजिक आरोग्य सेवक (सीएचपी) नियुक्त करण्याचेही विधेयकात नमूद.


- या 'सीएचपी'ना औषधे देण्याचा परवाना देणार. या सीएचपींसाठी निश्चित निकष नाहीत.


- ही संख्या सुमारे २.७ लाख असणार


- फक्त प्राथमिक आणि प्रतिबंधात्मक औषधे देण्याचा सीएचपींना अधिकार.


▪️नोंदणीचा वाद


- डॉक्टरांनी कायम विशिष्ट कालावधीनंतर सर्व राज्य वैद्यकीय परिषदांकडे त्यांची नोंदणी आणि अधिस्वीकृती करावी असे विधेयकात स्पष्ट म्हटले आहे.


- अनेक देशांमध्ये ही पद्धती आहे.


- मात्र डॉक्टरांचा नकार असल्याने राज्य वैद्यकीय परिषदांना अशी नोंदणी अद्ययावत करणे अशक्य आहे.


- एनएमसीत डॉक्टरांची कार्यपद्धती नियंत्रित करण्याचा किंवा त्यांचे वेतन, भत्ते ठरविण्याची तरतूद नाही.


-🦋आयएमसी कायद्यातही अशी तरतूद नाही.

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...