३० ऑगस्ट २०२०

सकन्या समृद्धी योजना २०१६



* १ हजार रुपयाच्या किमान रकमेसह सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडता येते.

* हे खाते मुलीच्या जन्मापासून केवळ १० वर्षापर्यंतच उघडता येते. एका वर्षामध्ये या खात्यात किमान हजार रुपये किंवा अधिकाधिक १.५० लाख जमा करता येतात.

* एक पालक आपल्या केवळ दोन मुलीकरता हे खाते उघडू शकतो, आणि दोघींच्या खात्यात एक वर्षात १.५० लाख यापेक्षा अधिक रक्कम भरता येणार नाही.

* मात्र दुसऱ्यांदा जुळ्या मुली झाल्यास तिसऱ्या मुलीकरता हे खाते उघडले जाऊ शकते. मुलगी २१ वर्षे झाल्यावर हे खाते परिपक्व होते.

* तथापी १८ वर्षानंतर आवशक्यता असल्यास ५०% रक्कम काढता येईल, ही योजना मुलीच्या शिक्षणाचा खर्च आणि लग्नाचा खर्च घेऊन तयार करण्यात आली.

* या योजनेसाठी मुलीचे खाते काढताना मुलीचा जन्माचा दाखला, ओळखपत्र, निवासी पत्र, इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

* खात्याच्या परिपक्वतेनंतर जमा झालेली रक्कम संबंधित मुलीच्या मालकीची होते. भारतात हे खाते कुठेही काढता येते.

* वयाच्या १० वर्षानंतर मुलगी स्वतः आपले खाते हाताळू शकते. किमान एक हजार रुपये दरवर्षी न भरू शकल्यास त्या वर्षासाठी ५० रुपये दंड आकाराला जाईल, मात्र दंडाच्या रकमेसह १४ वर्षापर्यंत कधीही हे खाते पुन्हा सुरु करण्याची तरतूद आहे.

पराथमिक कृषि सहकारी पतसंस्था



(Primary Agricultural Credit Co-Operatives)

प्राथमिक कृषि सहकारी पतसंस्था सहकारी त्रि-स्तरीय रचनेच्या सगळ्यात खालच्या स्तरावर ग्रामीण भागात कार्य करतात.

🎯सथापना -

गावातील 10 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन या सहकारी पतसंस्थेची स्थापना करू शकतात.
  गरीब शेतकर्‍यांनाही संस्थेला सभासद होता यावे यासाठी सदस्यत्व शुल्क/प्रवेश शुक्ल नाममात्र ठेवले जाते.तसेच या संस्था अमर्यादित जबाबदारीच्या तत्वावर (Unlimited liability) स्थापना केल्या जातात. म्हणजेच, ती संस्था अपयशी ठरल्यास तिची देणी (Liabilities) देण्याची पूर्ण जबाबदारी सदस्यांवर असते.

🎯कार्ये -

ही संस्था प्रत्यक्ष ग्रामीण जनतेच्या संपर्कात येते. त्यांच्या ठेवी स्वीकारते व त्यांना कर्जे देते. कर्जे मुख्यत: अल्प मुदतीचे व मुख्यत: कृषीसाठी दिले जाते. मात्र सावकाराच्या तावडीत सापडू नये म्हणून खावटी कर्जे सुद्धा दिली जातात.ही संस्था ग्रामीण जनता व दुसर्‍या बाजुला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यात दुव्याचे काम करते.

🎯भांडवल उभारणी -

स्व-स्वामित्व निधी - सदस्यत्व फी, भागभांडवल व राखीव निधी.ठेवी - सदस्य तसेच, बिगर सदस्यां कडून मिळविलेल्या.कर्जे - जिल्हा मध्येवर्ती सहकारी बँकेकडून मिळालेली.

🎯विस्तार -

भारतात मार्च 2010 मध्ये विविध राज्यांमध्ये मिळून सुमारे 95,633 प्राथमिक कृषि सह. संस्था कार्य करीत होत्या. त्यांची एकूण सदस्य संख्या त्यावेळी सुमारे 1.32 कोटीपेक्षा जास्त असून त्यांनी 26,245 कोटी रुपयांच्या ठेवी गोळा केल्या होत्या.

🎯महाराष्ट्रातील विस्तार -

31 मार्च 2010 रोजी महाराष्ट्रात 21,392 प्राथमिक कृषि सह.पतसंस्था होत्या आणि त्यांची सभासद संख्या 149 लाख होती. 

परधानमंत्री मातृ वंदना योजना



ही योजना केद्र सरकारचे महिला व बाल विकास मंत्रालय विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे.

वाटा - या योजनेसाठी राज्य शासन 40% आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. उर्वरित 60%  निधीची तरतूद केंद्र सरकारद्वारे होणार आहे.

योजनेची सुरुवात - 1 जानेवारी 2017 पासून

उद्देश - देशातील माता व बालकांचे आरोग्य सुदृढ राखून माता व बालमृत्यु रोखणे.

अंमलबजावणी अधिकारी - राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक तथा आरोग्य सेवांचे आयुक्त हे राज्य पातळीवरील समन्वय अधिकारी असतील.

▪️योजनेचा लाभ -

ही योजना केवळ पहिल्याच अपत्यासाठी व शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत नोंदणी झालेल्या महिला व स्तनदा माता ज्यांची गर्भधारणा दिनांक 01.01.2017 रोजी अथवा तद्नंतर झाली असेल अशाच पात्र महिलांना पहिल्या जिवीत अपत्यासाठी लागू असून लाभाची 5,000/- (पाच हजार रुपये) रक्कम तीन टप्यात संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) च्यामाध्यमातून थेट जमा करण्यात येणार आहे.

ही योजना पुर्वी युपीए कार्यकाळात 2010 मध्ये कार्यन्वीत करण्यात आली होती. हया योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अमरावती व भंडारा जिल्हाचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळी ही योजना इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना या नावाने चालू होती. परंतु, योजनेस पुर्णपणे प्रसिध्दी न दिल्यामुळे ही योजना अपयशी ठरली होती.

‘व्हॅट’अधिनियमात सुधारणा



व्यवसाय सुलभतेच्या धोरणांतर्गत ‘महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम-२००२’ नुसार ऐच्छिक नोंदणी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून अनामत रक्कम घेण्याची तरतूद रद्द करण्यासाठी अधिनियमामध्ये तांत्रिक सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली.

राज्यात वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी १ जुलै २०१७ पासून सुरू झाली आहे. मात्र, सहा वस्तूंवर मूल्यवर्धित कराची (व्हॅट) आकारणी होत आहे. यामध्ये खनिज तेल, पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू, विमानाचे इंधन, मद्य यांचा समावेश आहे. मूल्यवर्धित कराची आकारणी फक्त या सहा वस्तूंवरच होत असल्याने महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम २००२ या अधिनियमाची व्याप्ती आता खूपच मर्यादित झाली आहे. या अधिनियमातील तरतुदीनुसार, व्यापाऱ्याची एका वर्षांतील उलाढाल १० लाखांपेक्षा अधिक असल्यास नोंदणी दाखला घेणे अनिवार्य आहे. मात्र, ही मर्यादा पार करण्याआधीच एखाद्या व्यापाऱ्यास ऐच्छिक नोंदणी करण्याची सवलतदेखील त्यात दिली आहे. अशी नोंदणी करताना, संबंधित व्यापाऱ्यास २५,००० रुपये अनामत रक्कम जमा करणे अनिवार्य आहे. ही रक्कम संबंधित व्यापाऱ्याला तीन वर्षांनंतर परत करण्यात येते. मात्र, वस्तू व सेवा कर (जीएसटी) अधिनियमातील तरतुदीनुसार, ऐच्छिक नोंदणीसाठी अनामत रक्कम घेतली जात नाही. त्यामुळे, ‘जीएसटी’ व ‘व्हॅट’बाबतच्या या दोन्ही अधिनियमातील तरतूद सुसंगत करण्यासाठी या अधिनियमात असलेली ऐच्छिक नोंदणीसाठी अनामत रक्कम जमा करण्याची अट रद्द करण्यात आली आहे. व्यापार सुलभतेसाठी ही सुधारणा पोषक ठरेल, असे राज्य सरकारचे मत असल्याचे सांगण्यात आले.

मूल्यवर्धित कर अधिनियमातील तरतुदीनुसार, नोंदणी अर्ज दाखल करतानाच व्यापाऱ्याने बँकेच्या चालू खात्याचा तपशील सादर करणे अनिवार्य होते. व्यापाऱ्याकडील प्रलंबित थकबाकी वसूल करण्यासाठी हा तपशील आवश्यक असतो. व्यापार सुलभतेसाठी ही तरतूद महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियमांतर्गत २५ एप्रिल २०१८ रोजीच्या अधिसूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या निर्णयानुसार व्यापाऱ्याने नोंदणी दाखला प्राप्त झाल्यानंतर विहित मुदतीत स्वत:च्या चालू बँक खात्याचा तपशील राज्याच्या वस्तू व सेवा कर विभागाच्या संकेतस्थळावर सादर करणे गरजेचे आहे. तसेच विहित मुदतीत तपशील सादर न करणाऱ्या व्यापाऱ्यांचा नोंदणी दाखला रद्द करण्याची सुधारणाही या अधिनियमात करण्यास मान्यता देण्यात आली.

राष्ट्रीयकृत बैंक आणि त्यांची कार्यालय



अलाहाबाद बैंक - कोलकाता

• बैंक ऑफ इंडिया - मुंबई

• बैंक ऑफ महाराष्ट्र - पुणे

• केनरा बैंक - बैंगलोर

• सेंट्रल बैंक ऑफ इंडिया - मुंबई

• कॉरपोरेशन बैंक - मंगलौर

• देना बैंक - मुंबई

• इंडियन बैंक - चेन्नई

• इंडियन ओवरसीज बैंक - चेन्नई

• ओरिएंटल बैंक ऑफ कॉमर्स - नवी दिल्ली

• पंजाब नेशनल बैंक - नवी दिल्ली

• पंजाब एंड सिंध बैंक -- नवी दिल्ली

• सिंडिकेट बैंक - मणिपाल

• यूको बैंक - कोलकाता

• यूनियन बैंक ऑफ इंडिया - मुंबई

• यूनाइटेड बैंक ऑफ इंडिया - कोलकाता

• विजया बैंक - बैंगलोर

• आंध्रा बैंक - हैदराबाद

• बैंक ऑफ बड़ौदा - मुंबई

सटेट बँक ऑफ़ इंडिया मधे सहकारी बँकांचे विलीनीकरण

कद्रीय मंत्रिमंडळाने भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये त्याच्या सहकारी बँकांचे विलीनीकरण करण्यासाठी मंजूरी दिलेली आहे. याशिवाय, नव्याने स्थापन झालेल्या भारतीय महिला बँक ला सुद्धा SBI मध्ये विलीन केले जाईल.

SBI च्या सहा सहकारी बँका आहेत, त्यामध्ये

🔰सटेट बँक ऑफ हैदराबाद,

🔰सटेट बॅंक ऑफ बिकानेर अँड जयपूर,

🔰सटेट बँक ऑफ पटियाला,

🔰सटेट बँक ऑफ म्हैसूर,

🔰सटेट बँक ऑफ त्रावणकोर,

🔰सटेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर

⬆️⬆️या आहेत⬆️⬆️

🏧SBI विलिनीकरणाचे फायदे🏧

💰विलीनीकरण झाल्यानंतर,

🔝🔝🔸बकिंग क्षेत्रात अग्रेसर SBI हे जगातील टॉप-50 बँकांच्या यादीमध्ये प्रविष्ट होणार.🔸🔝🔝

💰ससाधने जमवण्यासाठी एकल कोषागार असणार आणि मोठ्या प्रमाणात कुशल संसाधनांच्या पायाचे योग्य वितरण केले जाणार.

💰SBI मध्ये अवलंबले जाणारे नवीन तंत्रज्ञान हे सहकारी बँकेच्या सर्व ग्राहकांना समानरूपाने उपलब्ध होणार.

💰तयाच्या उपकंपन्या सोबत SBI भागभांडवल बाजारात प्रचंड कमाई करू शकणार. अशा प्रकारे तो फायदा सर्व भागभांडवल धारकांना देखील होणार.

💰विलीनि‍करणानंतर SBI ची एकूण मालमत्ता रु. 37 लाख कोटी (37 ट्रिलियन रुपयांवर) पोहोचणार.यामुळे SBI चे 50 कोटी पेक्षा अधिक ग्राहक होणार,

🏧आणि  22,500 शाखा आणि 58,000 ATM उपलब्ध होणार.🏧

 🏧💸SBI विलिनीकरणाचे तोटे💸🏧

💰या विलीनि‍करणानंतर , बँकेच्या प्रशासनाला कर्मचारी एकत्रीकरण आणि शाखा सुसूत्रीकरण संबंधित काही गंभीर आव्हानांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

⛔️अनेक कर्मचारी सहकारी संघ या विलीनि‍करणाच्या विरोधात आहेत.⛔️

🏧💸SBI च्या विलीनीकरणाआधी💸🏧

💰SBI मध्ये पूर्वीचे विलीनीकरण निरोगी असल्याचे सिद्ध झाले आहे.

🔰2008 मध्ये, स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र आणि 2010 मध्ये, स्टेट बँक ऑफ इंदोर चे विलीनीकरण करण्यात आले होते.

🔰विलीनीकरण होण्याच्या आधी SBI च्या 7 सहकारी बँका होत्या.

तीन वार्षिक योजना



कालावधी: इ.स. १९६६ - इ.स. १९६९तिसऱ्या योजनेच्या अपयशामुळे ि निर्माण झालेल्या आर्थिक अस्थैर्यामुळे सरकारला चौथी योजना सुरू करता आली नाही. हि सुटी १ एप्रिल,१९६६ ते ३१ मार्च, १९६९ दरम्यान राहिली. या सुट्टीच्या कालावधीत सरकारने तीन वार्षिक योजना राबवल्या ज्यांचे उद्दिष्ट स्वावलंबन हे होते.

१) पहिली वार्षिक योजना (१९६६-६७) १९६६ च्या खरीप हंगामात सरकारने हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा वापर केला. ६ जून १९६६ मध्ये रुपयाचे ३६.५ टक्क्यांनी अवमूल्यन घडवण्यात आले.

२) दुसरी वार्षिक योजना (१९६७-६८) हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानामुळे व पुरेशा मान्सूनमुळे अर्थव्यवस्थेची परिस्थिती सुधारण्यास सुरवात झाली. १९६७-६८ मध्ये अन्नधान्यांचे उच्चांकी उत्पादन झाले.

३) तिसरी वार्षिक योजना (१९६८-६९) अन्नधान्य उत्पादन व किमती स्थिरावल्या. व्यवहारतोल सुधारला व चौथी योजना सुरु करण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली.

४ थी पंचवार्षिक योजना



कालावधी: इ.स. १९६९ - इ.स. १९७४

प्रतिमान ःॲलन एस. मान आणि अशोक रुद्र प्राधान्य : स्वावलंबन घोषवाक्य : स्थैर्यसह आर्थिक वाढ मॉडेल : Open Consistency Model खर्च : प्रस्तावित खर्च- १५,९०० कोटी रु., वास्तविक खर्च- १५,७९९ कोटी रु. योजनेचे उपनाव: गाडगीळ योजना प्रकल्प : १. DROUGHT PRONE AREAS PROGRAMME (DPAP) (1973) २. Small Farmer Development Agency (SFDA) ३. बोकारो पोलाद प्रकल्प (रशियाच्या मदतीने) (१९७२) ४. SAIL (Steel Authority of India Ltd) (१९७३)

महत्वपूर्ण घटना १. आर्थिक केंद्रीकरण रोखण्यासाठी MRTP Act-1969 हा कायदा संमत करण्यात आला. २. जुलै १९६९ मध्ये १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. ३. अग्रणी बँक योजना सुरु करण्यात आली. -1969 ४. विमा महामंडळाची स्थापना (१९७३) ५. १९७२-७३ मध्ये पहिल्यांदा भारताचा व्यापार तोल अनुकूल होता. ६. Foreign Exchange Regulation Act-1973

मूल्यमापन : काही प्रमाणात अपयश आले. करणे- १) बांगलादेश मुक्ती युद्ध - १९७१ २) १९७३ चे पहिला तेलाचा झटका (Oil Shocks)

पाचवी पंचवार्षिक योजना (1974–1978)



रोजगार, दारिद्र्य निर्मूलन आणि न्याय यावर ताण देण्यात आला. या योजनेत कृषी उत्पादन आणि स्वयंपूर्णतेवर भर देण्यात आला. १ 197 88 मध्ये नवनिर्वाचित मोरारजी देसाई सरकारने ही योजना नाकारली.  १९५५ मध्ये विद्युत पुरवठा कायदा लागू करण्यात आला ज्यायोगे केंद्र सरकार वीज निर्मिती व प्रसारात प्रवेश करू शकली. प्रथमच इंडियन नॅशनल हायवे सिस्टम सुरू करण्यात आले आणि वाढती रहदारी सामावून घेण्यासाठी अनेक रस्ते रुंदीकरण करण्यात आले. पर्यटनाचा विस्तारही झाला.

🌿🌿🌺लक्ष्य वाढ 5.6%
   आणि वास्तविक वाढ 4.8%
यशस्वी Rhikvicas दर 4.4 आणि यश दर 4.9% या योजनेसाठी.

सहाव्या पंचवार्षिक योजना (1980-1985)



सहाव्या योजनेत आर्थिक उदारीकरणाची सुरूवात देखील झाली. नेहरूवादी योजनेचा हा शेवट होता आणि इंदिरा गांधी या काळात पंतप्रधान होत्या. सहावी योजना दोनदा तयार केली गेली.
जनता पार्टीने (१९७३ ते १९८३ या कालावधीत) 'अखंड योजना' तयार केली. परंतु १ 1980 in० मध्ये स्थापन झालेल्या इंदिराच्या नवीन सरकारने ही योजना रद्द केली आणि नवीन सहावी पंचवार्षिक योजना (1985) सुरू केली.
  आता जनता पक्षाच्या दाखल्याची जागा पुणे नेहरू मॉडेलने घेतली. या टप्प्यावर यावर जोर देण्यात आला की केवळ अर्थव्यवस्थेचा विस्तार करून ही समस्या सोडविली जाऊ शकते.त्यामुळे सहाव्या पंचवार्षिक योजनेस सहाव्या योजना देखील म्हणतात. लोकसंख्या रोखण्यासाठी कुटुंब नियोजन देखील वाढविण्यात आले. चीनच्या कठोर आणि बंधनकारक एक मुलाच्या धोरणासारखे नाही, भारतीय धोरण सक्तीच्या धोक्यावर अवलंबून नव्हते.
  भारतातील श्रीमंत भागात कौटुंबिक नियोजनाने कमी संपन्न क्षेत्रापेक्षा वेगाने दत्तक घेतले, ज्यांनी जास्त जन्म दर जारी केला. यात प्रथमच आधुनिकीकरण हा शब्द वापरला गेला. रोलिंग प्लॅनची   संकल्पना आली. हे सर्वप्रथम गुन्नर मर्दलने त्यांच्या ‘एशियन ड्रामा’ या पुस्तकात दिले होते. भारतात अंमलबजावणी करण्याचे श्रेय "प्रोफेसर डी.डी. लकडावाला" यांना दिले जाते.

लक्ष्य वाढ : 5.2% 
      आणि वास्तविक वाढ : 5.4%

अलाहाबादचं नाव यापुर्वीही 'प्रयागराज'चं होतं, 444 वर्षांपूर्वी अकबर बादशहानं बदललं



उत्तर प्रदेशची संगम नगरी असलेल्या अलाहाबाद शहराचे नाव बदलण्याच्या निर्णयाला योगींच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून अलाहाबाद शहर प्रयागराज नावाने ओळखले जाईल. मात्र, 444 वर्षांपूर्वीही या स्थानकाचे नाव प्रयागराज असेच होते. त्यावेळी, अकबर बादशहाने या स्थानकाचे नाव बदलून अलाहाबाद असे ठेवले. त्यानंतर पुन्हा या अलाहाबादचे नाव प्रयागराज बनले आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाने अलाहाबाद शहराचे नाव प्रयागराज करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या शहराला पहिलेच नाव मिळाले आहे. योगी आदित्यनाथ यांच्या या निर्णयामुळे संत समाज आनंदी झाला आहे. पण, विरोधकांनी या नाव बदलाला आपला विरोध दर्शवला होता.
इतिहास तज्ञ्ज्ञांच्यामते अकबरनामा, आईने अकबरी आणि अन्य मुगलकालीन इतिहासाच्या पुस्तकांमध्ये अकबरने सन 1574च्या जवळपास प्रयागराज येथे किल्ल्याची पायाभरणी केल्याचे म्हटले आहे. अकबरने येथे नवीन नगर बसवले होते. त्याचे नाव अलाहाबाद ठेवण्यात आले. त्यापूर्वी या शहराला प्रयागराज नावानेच ओळखले जात. तसेच मानचरितमानस या ग्रंथातही अलाहाबादचा उल्लेख प्रयागराज असाच आहे. प्राचीन काळात संगम नदीच्या पाण्याने राजे-महाराजांचा येथे अभिषेक करण्यात येत होता. तर, वाल्मिकी 'रामायण'मध्येही याचा उल्लेख आहे. वनवासाला जातेवेळी श्रीराम यांनी प्रयाग येथील ऋषी भारद्वाज यांच्या आश्रमाल भेट दिली होती.

प्रभू श्रीराम जेव्हा श्रृंग्वेरपूर येथे पोहोचले होते, तेव्हा तेथेही प्रयागराज हाच उल्लेख आला होता. सर्वाच प्राचीन आणि सत्यवचन असलेल्या मत्यपुराणच्या 102 ते 107 या अध्यायातही या तिर्थाच्या महात्म्याचा उल्लेख आहे. प्रयाग हे प्रजापतीचे क्षेत्र असून येथे गंगा आणि जमुना या नद्या वाहत असल्याचे या अध्यात सांगतिले आहे.

कोहिनूर' हिऱ्याचा किस्सा... जाणून घ्या, भारताकडून इंग्रजांकडे गेला कसा?



जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा इंग्रजांनी जबरदस्तीने नेला होता की त्यांना तो भेट म्हणून देण्यात आला होता. हा प्रश्न सामान्य ज्ञानासाठी नेहमीच विचारला जातो. मात्र आता या प्रश्नाचं कोडं लवकरच उलघडणार आहे. भारताचा कोहिनूर हिरा हा इंग्रजांनी जबरदस्तीने नेला होता, असा खुलासा भारतीय पुरातत्त्व विभागाने केला आहे. नऊ वर्षांच्या महाराजा दुलिप सिंह यांच्यासोबत करण्यात आलेल्या तहानुसार त्यांनी कोहिनूर हिरा हिसकावून नेला असल्याची माहिती आरटीआय अंतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पुरातत्त्व विभागाने दिली आहे.

महाराज रणजित सिंह यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला कोहिनूर हिरा भेट म्हणून दिला होता, हा सरकारचा दावा पुरातत्व विभागाच्या खुलाशामुळे आता खोटा ठरला आहे. एप्रिल 2016 मध्ये सरकारने सर्वोच्च न्यायालयात कोहिनूर हिऱ्यासंबंधी माहिती दिली होती. लाहोरच्या महाराजांनी कोहिनूर हिरा इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाच्या ताब्यात दिला होता, असे पुरातत्त्व विभागाने म्हटले आहे. तसेच अँग्लो-शीख युद्धाच्या खर्चाची भरपाई म्हणून रणजित सिंह यांच्या नातलगांनी स्वेच्छेन कोहिनूर हिरा इंग्रजांना दिला होता, असे सरकारने एका जनहित याचिकेला उत्तर देताना सांगितले होते.

सामाजिक कार्यकर्ते रोहित सबरवाल यांनी आरटीआय दाखल करून कोणत्या आधारावर कोहिनूर हिरा इंग्रजांना दिला होता?, असा प्रश्न विचारला होता. त्यांच्या या प्रश्नाला आता भारतीय पुरातत्त्व विभागाने उत्तर दिले आहे. कोहिनूर हिऱ्याची माहिती मागवण्यासाठी कोणाकडे अर्ज करायचा यासंदर्भात मला काहीही माहिती नव्हते. म्हणून मी तो अर्ज पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला. पंतप्रधान कार्यालयाने तो अर्ज एएसआयकडे पाठवला, असे रोहित सबरवाल यांनी सांगितले. रोहित यांच्या प्रश्नाला उत्तर देताना नोंदीनुसार लाहोरमध्ये लॉर्ड डलहौसी आणि महाराजा दुलिप सिंह यांच्यात 1849 साली कथित करार झाला असल्याचं सांगितलं. लाहोरच्या महाराजांनी इंग्लंडच्या महाराणीकडे कोहिनूर हिरा सोपवला होता. परंतु दुलिप सिंह यांच्या इच्छेनुसार तो इंग्रजांकडे सोपवला नव्हता, हेच स्पष्ट होत आहे. कारण करार झाला त्यावेळी दुलिप सिंह केवळ 9 वर्षांचे होते, असे एएसआयने रोहित सबरवाल  यांना पाठवलेल्या उत्तरात सांगण्यात आले आहे.

चंद्रशेखर आझाद


(जन्म: २३ जुलै १९०६-मृत्यु: २७ फेब्रुवारी १९३१)
.
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
.
चंद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतीकारक होते. रामप्रसाद बिस्मिल यांच्या मृत्युनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोशिएशन या क्रांतीकारी संघटनेची हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोशिएशन या नवीन नावाखाली पुनर्बाधणी केली. त्याचप्रमाणे त्यांना भगतसिंग यांचे गुरु मानले जाते.
.
 जन्म आणि बालपण:
चंद्रशेखर यांचा जन्म २३ जुलै १९०६ ला सध्याच्या अलीराजपुर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सीताराम तिवारी आणि आईचे नाव जगरानी देवी होते. त्यांचे पूर्वज कानपूर जवळच्या बदरखा गावात राहत होते. जगरानी देवी ह्या सीताराम यांच्या तिसर्या पत्नी होत्या. त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतरीत झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा गावातच झाले. मात्र नंतर आईच्या इच्छेनुसार ते वाराणसीमधील संस्कृत शाळेत गेले. डिसेंबर १९२१ मध्ये महात्मा गांधीनी सुरु केलेल्या असहकार आंदोलनात तेव्हाच्या १५ वर्षे वयाच्या चन्द्रशेखरने सहभाग घेतला. त्यासाठी त्याला अटक सुद्धा झाली होती. तेव्हा न्यायालयात चंद्रशेखरने आपले आडनाव आझाद असल्याचे नोंदवले. तेव्हापासून ते आझाद आडनावाने ओळखले जाऊ लागले.
.
मृत्यु:
२७ फेब्रुवारी १९३१ ला अलाहाबादमधील अल्फ्रेड पार्क येथे सुखदेव राज या क्रांतीकारकाला भेटायला गेले असताना एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांना वार्ता दिली. पोलिसांनी मैदानाला वेढा घातला आणि चंद्रशेखर व पोलिसांमध्ये गोळीबार झाला. त्यांनी एकहाती तीन पोलिसांना मारले मात्र त्यांच्याजवळील बंदुकीच्या गोळ्या संपत आल्यामुळे शेवटच्या गोळीने त्यांनी स्वत:ला मारून घेतले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नाव चंद्रशेखर आझाद मैदान असे ठेवण्यात आले.

ताराबाई शिंदे (१८५०-१९१०)



 ह्या महाराष्ट्रातील एक स्त्रीवादी लेखिका व सत्यशोधक समाजाच्याकार्यकर्त्या होत. १८८२ साली प्रसिद्ध झालेल्या स्त्री-पुरुष तुलना या पुस्तकाच्या त्या लेखिका होत.

ताराबाई ह्या बुलढाणा येथील रहिवासी होत्या. त्यांचे वडील बापुजी हरी शिंदे हे एक जमीनदार होते. ते सत्यशोधक समाजाचे सभासद होते.ताराबाई शिंदे यांचे भाऊ, रामचंद्र हरी शिंदे जोतिबांच्या कॉन्ट्रक्टिंग कंपनीत भागीदार होते. त्यामुळे ताराबाईंच्या घरात सुरुवातीपासूनच स्त्री-पुरुष समानतेचे वातावरण होते.


ताराबाईंनी आपल्या पुस्तकात विधवा-विवाहास उच्च वर्णीयांनी केलेली मनाई, केशवपनासारख्यादुष्ट रूढी, तसेच पुरुषांना अनेक लग्न करण्याची असलेली मुभा या सर्व प्रश्नांवर टीका केलेली दिसते. तत्कालीन महाराष्ट्रातील स्त्री समाजसुधारक म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थिती देखील सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात योगदान दिले.त्यानी स्त्री यांच्या शोषणा विरोधात दिलेला लढा हा सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेस चालना देणारा होता.

राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना


.
०१. ब्रिटिश अधिकाऱ्यांतही व्हाइसरॉय लॉर्ड डफरिन, ए. ओ. ह्यूमसारखे लोक यांनी भारतात सुराज्य निर्माण व्हावे, दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका उडू नये, त्यांच्या अभिव्यक्तीला एक सनदशीर साधन मिळावे, हिंदी लोकांना स्वायत्ततेचे हक्क प्राप्त व्हावेत असे वाटत होते.
०२. सर्व देशाचे प्रतिनिधित्व करणारी एखादी अखिल भारतीय राजकीय संस्था निर्माण झालेली नव्हती. ती स्थापन करण्यात ए.ओ. हयूम या सेवा निवृत्त सनदी अधिकाऱ्याने सर विल्यम वेडरबर्न व सर हेन्री कॉटन या दोन सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्याचेही सहकार्य घेतले.
०३. राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन पुण्यास भरविण्याचे ठरले होते. पण पुण्यास फार मोठया प्रमाणावर प्लेगची साथ झाली. त्यामुळे ते २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईच्या गोवालिया टॅंकजवळील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये ते भरविण्यात आले. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे या पहिल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. सर्व भारतातून एकूण ७२ प्रतिनिधी राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनास हजर होते.
०४. त्यामध्ये दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, न्या के. टी. तेलंग, दिनशा वाच्छा, वीर राघवाचार्य, पी. आनंद चार्लू, गंगाप्रसाद वर्मा, न्या. रानडे, बद्रुद्दीन तय्यबजी, रा. गो. भांडारकर, एस्. सुब्रमण्यम् अय्यर, दिवाणबहादूर रघुनाथराव, केशव पिल्ले, एन्. जी. चंदावरकर, गो. ग. आगरकर  इ. हिंदी नेत्याचा समावेश होता.
०५. कॉग्रेसचे पुढील अधिवेशन २८ डिसेंबर १८८६ राजी कलकत्ता येथे भरवण्यात यावेत असे ठरले. यानंतर ए.ओ. हयूम आणि राणी व्हिक्टोरिया यांना धन्यवाद देऊन सभा बरखास्त करण्यात आली. राष्ट्रसभेचे सुरुवातीचे स्वरुप कार्यपध्दती मवाळच होती.

भारतातील सर्वात पहिल्या महिला :


.
@राजदूत -विजयालक्ष्मी पंडित
@मेयर -अरूणा अासफअली
@काँग्रेस अध्यक्षा -अॅनी बेझंट
@चित्रपट अभिनेत्या -देविकाराणी
@न्यायाधिश -फातिमा बीबी
@युनोच्या आमसभेच्या अध्यक्षा -विजयालक्ष्मी पंडित
@महापौर -सुलोचना
@स्पीकर -सुशीला नायर
@एव्हरेस्ट काबीज करणारी -बचेंद्री पाल
@मुस्लीम राज्यकर्ता -रझिया सुलतान
@क्रांतीकारक-भिकाई कामा
@राज्यपाल -सरोजनी नायडू
@पंतप्रधान -इंदिरा गांधी
@मुख्यमंत्रीसुचेता कृपलानी (यु.पी)
@आय.ए.एस -आण्णा राजम जार्ज

मारिएक लुकास रिसनेवेल्ड यांनी ‘आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2020’ जिंकला.



🔰2020 वर्षासाठीचा ‘आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक’ नेदरलॅंडच्या लेखिका आलेल्या 29 वर्षीय मारिएक लुकास रिसनेवेल्ड यांना दिला जाण्याचे जाहीर झाले आहे. बुकर पारितोषिक मिळवणाऱ्या त्या सर्वात कमी वयाच्या लेखक ठरल्या आहेत.

🔰नदरलॅंडमधल्या ग्रामीण भागातल्या एका धार्मिक शेतकरी कुंटुबाच्या कहाणीवर आधारित “द डिसकंफर्ट ऑफ ईवनिंग’ या पुस्तकासाठी त्यांना हा पारितोषिक दिला गेला आहे. पारितोषिकाची 50 हजार पौंड रक्कम लेखिका आणि अनुवादक मिशेल हचिंसन यांच्यात विभागून दिली जाणार आहे.

‼️आतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक....

🔰हा ब्रिटनमध्ये (UK) दिला जाणारा आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार आहे. ‘मॅन ग्रुप’ या संस्थेतर्फे दिला जाणारा हा पुरस्कार इंग्रजी भाषेत प्रकाशित होणार्‍या कल्पित साहित्यासाठी तसेच किंवा सामान्यत: इंग्रजी भाषेत भाषांतरित केल्या गेलेल्या साहित्यासाठी कोणतेही राष्ट्रीयत्व असलेल्या जिवंत लेखकाला दिला जातो.

🔰मन बुकर पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर जून 2004 मध्ये या आंतरराष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली. 2005 साली पहिला पुरस्कार दिला गेला. पन्नास हजार पौंडांचा हा पुरस्कार असून तो लेखक व अनुवादक यांच्यात समानरूपाने वाटला जातो.

जगातील सगळ्यात मोठं ‘अटल टनल’ तयार



🔰 १० हजार फुट लांब असलेला जगातिल सगळ्यात लांब रोड टनल अखेर भारतात तयार झाला आहे.

🔰 हा टनेल तयार करण्यासाठी १० वर्षांचा कालावधी लागला आहे. रोहतांग येथे तयार करण्यात आलेल्या बोगद्याचं नाव ‘अटल टनल’ आहे.

🔰 माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरून या बोगद्याचे नाव ठेवलं आहे.

🔰 जयाची लांबी ८.८ किलोमीटर इतकी आहे. १०, १७१ फुटांवर अटल रोहतांग टनेल तयार करण्यात आलं आहे उंच टनेल आहे. या टनेलमुळे मनाली ते लेह हे अंतर ४६ किलोमीटरनं कमी झाले आहे.

🔰 समुद्रसपाटीपासून जवळपास १२ हजार फुटांच्या उंचीवर साकारण्यात येणारा हा बोगदा जगातील सर्वात मोठा ट्रॅफिक टनल मानला जात आहे.

बँकांची वसुली ; 'गुगल पे' वापरासाठी लागणार शुल्क



🔰आतापर्यंत 'गुगल पे'च्या वापरासाठी एकही रुपया आकारला जात नव्हता. आता मात्र अॅक्सिस बँकेसह काही खासगी बँकांनी गुगल पेसाठी दरमहा २० व्यवहार झाल्यानंतर पुढील सर्व व्यवहारांसाठी पैसे आकारायला सुरुवात केली आहे.


🔰आतापर्यंत 'गुगल पे'च्या वापरासाठी एकही रुपया आकारला जात नव्हता. आता मात्र अॅक्सिस बँकेसह काही खासगी बँकांनी गुगल पेसाठी दरमहा २० व्यवहार झाल्यानंतर पुढील सर्व व्यवहारांसाठी पैसे आकारायला सुरुवात केली आहे. तीन रुपयांपासून ते मोठ्या व्यवहारांना १० रुपयांपर्यंत दर आकारण्यात येत आहे. यामुळे असंख्य ग्राहकांना आता 'गुगल पे' वापरण्यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. बँकांनी महिन्याला २० व्यवहारांची मर्यादा ठेवली असून हे व्यवहार चार-पाच दिवसांतच पूर्ण होतात. उरलेले दिवस जे व्यवहार होतील त्यावर अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. गुगल पे आणि बँकांकडून यासंबंधी ग्राहकांना कोणत्याही सूचना दिल्या जात नसल्याने नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे. यामुळे आता गुगल पेसारख्याच पण मोफत सेवा देणाऱ्या इतर पर्यायांकडे वळण्याशिवाय पर्याय नाही.

राज्यसेवा Test Series

२९ ऑगस्ट २०२०

सामान्य ज्ञान



राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना – 14 ऑगस्ट 1993.

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची स्थापना - 19 फेब्रुवारी 2004.

राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना - 19 फेब्रुवारी 2004.

राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना - 31 जानेवारी 1992.

राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापना - 11 मे 2000.

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना - 12 ऑक्टोबर 1993.

केंद्रीय विद्युत नियमन आयोगाची स्थापना - 24 जुलै 1998.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) - स्थापनाः 20 फेब्रुवारी 1997; मुख्यालय: नवी दिल्ली.

भारतीय निवडणूक आयोग (ECI) - स्थापनाः 25 जानेवारी 1950; मुख्यालय: नवी दिल्ली.

भारतीय लेखानियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) याची स्थापना - भारतीय संविधानाच्या कलम 148 अन्वये.

केंद्रीय माहिती आयोग (CIC) याची स्थापना - 12 ऑक्टोबर 2005.

केंद्रीय दक्षता आयोग (CVC) याची स्थापना - 11 फेब्रुवारी 1964.

भारतात जाऊ नका; ट्रम्प सरकारचा नागरिकांना सल्ला



⚡️ भारत आणि अमेरिकेमधील परराष्ट्र संबंध मागील काही काळापासून सुधारल्याचे दिसत आहे. मात्र अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने भारतासंदर्भात कठोर पावले उचलत अमेरिकन नागरिकांना भारतामध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे.

💁‍♂️ अमेरिकेने आपल्या नागरिकांसाठी अशाप्रकारच्या सूचना का दिल्या आहेत याबद्दलचे कारण स्पष्ट केले नाही. मात्र अशाप्रकारच्या सूचना या दहशतवाद, एखाद्या प्रदेशात होणारे युद्ध, वाढती गुन्हेगारी आणि साथीच्या रोगांच्या काळात दिल्या जातात.

👀 *रँकिंग* : अमेरिकेने प्रवासासंदर्भात भारताचे रँकिंग चार निश्चित केले आहे. हा सर्वात वाईट रँकिंग असल्याचे सांगितले जाते.

👎🏼 *यादी* : हे रँकिंग देत अमेरिकेने भारताचा समावेश युद्ध सुरु असणाऱ्या सीरिया, दहशतवादाचे केंद्र म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तान, इराण, इराक आणि येमेनसारख्या देशांच्या यादीमध्ये केला आहे.

🙏 *सल्ला* : कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेत ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन नागरिकांना भारतात न जाण्याचा सल्ला दिला आहे.

📍 *वाढ* : अमेरिकन सुरक्षा यंत्रणांच्या सांगण्यानुसार कोरोनाबरोबरच भारतामध्ये गुन्हेगारी आणि दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे.

📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : 

सविस्तर पणे वाचा :- महासंगणक



✍️आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या विश्वातील शक्तिशाली महासंगणक DGX-2 भारतात आला आहे. जोधपूर स्थित आयआयटी मध्ये तो उपयोगात आणण्यात येणार आहे. यामुळे भारतात आर्टिफिशल इंटेलिजन्स प्रशिक्षणासाठी बळ मिळणार आहे.

✍️आयआयटी जोधपूर मधील कॉम्प्युटर विभागाचे अध्यक्ष डॉ.गौरव यांनी सांगितले की, "आपल्या प्रकारातील हा जगातील सर्वात गतिमान आणि आर्टिफिशल इंटेलिजन्स (AI) ऍप्लिकेशन्ससाठी सर्वात शक्तिशाली महासंगणक आहे, जो पहिल्यांदाच भारतात आला आहे.

✍️हा महासंगणक जोधपूर आयआयटी मधील एका विशेष प्रयोगशाळेत लावण्यात आला आहे.

✍️डॉ.हरित यांनी सांगितले की, जवळपास २.५ कोटी रुपयांची गुंतवणूक असणाऱ्या या सुपर कॉम्प्युटरच्या ताकतीचा अंदाज यावरूनच लावता येईल की यामध्ये १६ विशेष GPU कार्ड लावण्यात आले आहेत. त्या प्रत्येक कार्डची क्षमता ३२ GB आहे.

✍️याची रॅम ५१२ GB आहे. त्यांनी असे सांगितले की, साधारण कॉम्प्युटरची क्षमता केवळ १५० ते २०० वॅट असते, मात्र या सुपर कॉम्प्युटरची क्षमता १०००० वॅट आहे.

✍️DGX-2 सुपर कॉम्प्युटर पहिल्यांदा देशात आला आहे. याची क्षमता पहिल्या व्हर्जनच्या जवळपास दुप्पट आहे.

✍️मोठ्या स्तरावर समजून घ्यायचे झाले तर DGX-1 ने जे काम करण्यास १५ दिवस लागत होते ते काम DGX-2 ने करण्यास केवळ दीड दिवस लागणार आहे. जवळपास १५० किलो वजन असणाऱ्या या सुपर कॉम्प्युटरची इंटर्नल स्टोरेज क्षमता ३० TB आहे.

✍️आयआयटी जोधपूर आणि अमेरिकेतील सुपर कॉम्पुटर कंपनी नवीडिया यांच्यामध्ये आर्टिफिशल इंटेलिजन्स क्षेत्रात संशोधनासाठी दोन वर्षांचा करार करण्यात आला आहे, त्या करारांतर्गत हा सुपर कॉम्प्युटर इथे आणण्यात आला आहे.

वाचा :- थोर समाजसुधारक व त्यांच्या पदव्या



🔶 जस्टीज ऑफ दि पीस : जगन्नाथ शंकरशेठ

🔶 मबईचा अनभिषिक्त सम्राट : जगन्नाथ शंकरशेठ

🔶 मबईचा शिल्पकार : जगन्नाथ शंकरशेठ

🔶 आचार्य : बाळशास्त्री जांभेकर, विनोबा भावे

🔶 घटनेचे शिल्पकार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

🔶मराठीतील पहिले पत्रकार : विनोबा भावे

🔶 लोकहितवादी : गोपाळ हरी देशमुख

🔶 विदर्भाचे भाग्यविधाता : डॉ. पंजाबराव देशमुख

🔶 समाजक्रांतीचे जनक : महात्मा ज्योतीबा फुले

🔶 भारतीय प्रबोधनाचे जनक : राजा राममोहन रॉय

🔶 नव्या युगाचे दूत : राजा राममोहन रॉय

🔶आधुनिक भारताचे अग्रदूत : राजा राममोहन रॉय

🔶 भारतीय पुनरुजीवन वादाचे जनक : राजा राममोहन रॉय

🔶 हिंदू नेपोलियन स्वामी विवेकानंद

🔶आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते : दादाभाई नौरोजी

🔶 भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक : न्यायमूर्ती रानडे

🔶भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते : दादाभाई नौरोजी

🔶 पदवीधराजे मुकुटमणी : न्या.म.गो.रानडे

🔶नामदार : गोपाळ कृष्णा गोखले

🔶 हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन : महात्मा ज्योतीबा फुले

भारतीय कंपनी बनवतेय प्लाझ्मा थेरीपीची लस; लवकरच होणार मानवी चाचणी.



🔰जगभरात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशातही करोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ पाहायला मिळत आहे. दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर लस तयार करण्याचा अनेक देशांकडून प्रयत्न सुरू आहे. यात भारतही आघाडीवर आहे. दरम्यान, पुढील महिन्याभरात इंटास फार्मा देशातील पहिली प्लाझ्मा थेरेपी लसीच्या माानवी चाचणीला सुरूवात करणार आहे. आजतकनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

🔰सध्या करोना विषाणूचा कोणताही उपाय सापडलेला नाही. अनेक देशांमध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीवरही संशोधन सुरू आहे. तक काही देशांनी लस तयार केल्याचाही दावा केला आहे. तर दुसरीकडे करोनाच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरेपीदेखील उपयोगी असल्याचं समोर आलं होतं. याचदरम्यान देशातील फार्मा कंपनी इंटास फार्मानं प्लाझ्मा थेरेपीप्रमाणेच असलेली लस विकसित करण्यावर काम सुरू केलं आहे. रुग्णाला ही लस दिल्यानंतर त्यांना प्लाझ्मा थेरेपी देण्याची आवश्यकता नसल्याचा दावाही कंपनीकडून करण्यात आला आहे.

🔴पहिली लस...

🔰“करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात अशाप्रकारची पहिली लस विकसित करण्याचं काम सुरू आहे. ही लस पूर्णत: स्वदेशी आहे. हायपरिम्युन ग्लोब्युलिन (Hyperimmune Globullin) ला ड्रग्झ कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून कोविड १९ वरील उपचाराच्या मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. गुजरात आणि देशातील अन्य रुग्णालयांसोबत याची वैद्यकीय चाचणी केली जाईल,” अशी माहिती इंटास मेडिकल अँड रेग्युलेटरी अफेअर्सचे प्रमुख डॉ. अलोक चतुर्वेदी यांनी दिली.

परथमच, ‘एकलव्य मॉडेल निवासी शाळा’ शिक्षकाची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.



🔰आदिवासी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापना झालेल्या ‘एकलव्य मॉडेल निवासी शाळा’ (EMRS) याच्या शिक्षकाची प्रथमच ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांचे नाव आहे, कु. सुधा पाईनुली.

🔰क. सुधा पाईनुली या EMRS शाळा, कलसी (देहरादून, उत्तराखंड) येथे उप-प्राचार्य पदावर रुजू आहेत.

🔰यदा म्हणजेच 2020 या वर्षी एकूण 47 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जम्मू व काश्मीरमध्ये रुजू असलेल्या महाराष्ट्राचे सुनिल कुमार यांना हा सन्मान मिळाला आहे.

🔴पार्श्वभूमी....

🔰दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी देशात ‘राष्ट्रीय शिक्षक दिन’ साजरा केला जातो. हा दिवस देशाच्या प्रगतीसाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करणार्‍या शिक्षकांच्या सन्मानार्थ पाळला जातो.

🔰भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त देशात राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात येते. या पुरस्काराची स्थापना वर्ष 1958 मध्ये झाली. पुरस्कार म्हणून पदक, प्रमाणपत्र, 50 हजार रूपये रोख रक्कम दिली जाते.

🔰दरवर्षी या दिवशी देशाच्या विविध भागात उत्कृष्ट आणि अभिनव कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्याकरिता भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ दिला जातो. हा सत्कार समारंभ विज्ञान भवनात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने आयोजित केला जातो.

🔴एकलव्य मॉडेल निवासी शाळा योजना
...

🔰दशात ‘एकलव्य मॉडेल निवासी शाळा’ योजना 1997-98 साली लागू करण्यात आली. दुर्गम भागातल्या आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी ही योजना राबवली जात आहे. भारत सरकारचे केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्रालय ही योजना राबवत आहे. सध्या देशात अश्या 462 शाळा आहेत आणि आणखी 288 शाळा उभारण्यास मंजुरी दिलेली आहे.

🔰50 टक्क्यांपेक्षा जास्त अनुसूचीत जमाती (ST) लोकसंख्या आणि किमान 20,000 आदिवासी व्यक्ती रहिवासी असलेल्या देशातल्या प्रत्येक विभागांमध्ये एक ‘एकलव्य मॉडेल निवासी शाळा’ स्थापन करण्यास अलीकडेच सैद्धांतिक मंजुरी देण्यात आली आहे.

परधान मंत्री जन-धन योजनेची सहा वर्षे पूर्ण..





🔰देशातल्या सामाजिक-आर्थिकदृष्टया उपेक्षित, अल्पसंख्याक वर्गाच्या आर्थिक समावेशनासाठी सर्वतोपरी कार्य करण्यासाठी अर्थ मंत्रालय वचनबद्ध आहे. या वचनबद्धतेच्या दृष्टीने महत्वपूर्ण पावले उचलत “प्रधान मंत्री जन-धन योजना (PMJDY) - वित्तीय समावेशनासाठीचे राष्ट्रीय अभियान” सादर करण्यात आली. योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी दि. 28 ऑगस्ट 2014 पासून केली जात आहे.

🔰वित्तीय उत्पादन आणि सेवा माफक दरात सर्वांना उपलब्ध होण्याची सुनिश्चिती करणे तसेच तंत्रज्ञानाचा उपयोग आणि व्यापकता वाढवणे, ही योजनेची उद्दिष्टे आहेत.

🔴ऑगस्ट 2020 पर्यंत योजनेच्या अंतर्गत झालेली कामगिरी...

🔰एकूण 40.35 कोटी PMJDY खाती उघडण्यात आली. त्यापैकी ग्रामीण भागात 63.6 टक्के खाती उघडली गेली. महिलांच्या PMJDY खात्यांचे प्रमाण 55.1 टक्के आहे. योजनेच्या पहिल्या वर्षात 17.90 कोटी PMJDY खाती उघडण्यात आली.

🔰करियाशील PMJDY खाती यांच्या बाबतीत, भारतीय रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार, PMJDY खात्यात दोन वर्षे व्यवहार झाला नाही. ऑगस्ट 20 मध्ये 40.05 कोटी PMJDY खात्यांपैकी 34.81 कोटी (86.3 टक्के) क्रियाशील आहेत.

🔰PMJDY अंतर्गत एकूण ठेवी 1.31 लक्ष कोटी रुपये इतक्या रकमेच्या आहेत.
PMJDY प्रती खाते सरासरी जमा 3,239 रुपये आहे. ऑगस्ट 15 पर्यंत प्रती खाते सरासरी जमा 2.5 पटीने वाढली आहे.

🔰PMJDY खातेधारकांना एकूण 29.75 कोटी रूपे कार्ड दिली गेली आहेत.जन-धन दर्शक ॲप हा देशात बँक शाखा, ATM, बँक मित्र, टपाल कार्यालये, यासारख्या बँकिंग टच पॉइंट अर्थात बँकेशी संबंधित सुविधा कुठे आहेत हे सांगणारा लोककेंद्री मंच आहे. GIS ॲपवर 8 लक्षाहून अधिक बँकिंग टच पॉइंट मॅप करण्यात आले आहेत.

🔰 5 किलोमीटरच्या परिसरात बँकिंग टच पॉइंट नसणारी गावेही या ॲप द्वारे ओळखून, तिथे बँक शाखा उघडण्यासाठी संबंधित SLBC केंद्रांद्वारे विविध बँकांना देण्यात येतात. या प्रयत्नामुळे बँक सुविधा नसणाऱ्या गावांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे.

🔰वित्त मंत्र्यांनी 26 मार्च 2020 रोजी केलेल्या घोषणेनुसार प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत, प्रधान मंत्री जन धन योजना (PMJDY) महिला खातेधारकांच्या खात्यात तीन महिने (एप्रिल 20 ते जून 20) या काळात दरमहा 500 रुपये जमा करण्यात आले. एप्रिल ते जून 20 या काळात PMJDY महिला खातेधारकांच्या खात्यात एकूण 30,705 कोटी रुपये जमा करण्यात आले.

🔰विविध सरकारी योजनांच्या अंतर्गत 8 कोटी PMJDY महिला खातेधारकांना थेट लाभ हस्तांतरण लाभ मिळायची माहिती बँकांनी दिली आहे. थेट लाभ हस्तांतरण विफल होण्याचे प्रमाण घटून एप्रिल 2019 मधल्या 5.23 लक्ष (0.20 टक्के) वरून जून 2020 मध्ये 1.1 लक्ष (0.04 टक्के) झाले.

🔰पढच्या काळात सूक्ष्म विमा योजनेच्या अंतर्गत PMJDY खातेधारकांना समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टीने 10 टक्के पात्र PMJDY खातेधारक PMJJBY तर 25 टक्के पात्र PMJDY खातेधारक PMSBY अंतर्गत आणण्यात येणार आहे. PMJDY खातेधारकांमध्ये देशभरात स्वीकृत पायाभूत ढाचा निर्माण करून त्याद्वारे रूपे सह डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिले जाणार आहे.

🔰तसेच फ्लेक्सी आवर्ती ठेव, सुकन्या समृद्धी योजना या अंतर्गत गुंतवणूक आणि सूक्ष्म पत PMJDY खातेधारकांच्या आवाक्यात येण्यासाठी अधिक प्रयत्न केले जाणार आहेत.

आता पोलीस विभाग झाले १५९ वर्षाचे



▪️  परत्येक संकटाच्या वेळी सामान्य माणसाला सर्वप्रथम आठवतो तो म्हणजे पोलीस , याच  पोलीस आयोगाचे वय आता १५८ वर्ष पूर्ण झाले

💁‍♂    जाणून घ्या पोलीस आयोगाबद्दल बरच काही

◾️ दिल्लीवर पूर्ण ताबा मिळविल्यानंतर ब्रिटिशांनी प्रशासकीय सुधारणा सुरू केल्या.आणि १८६० मध्ये पोलीस आयोग स्थापन केला होता

◾️ आणि भारतीय पोलीस कायदा १८६१ बनवून पोलीस दलाची स्थापना केली.

🟢 दशातील पहिले पोलीस ठाणे* (ब्रिटिशकालीन ) - कोतवाली, सदर बाजार, सब्जीमंडी, मेहरोली आणि मुंडका ही देशातील पहिली पोलीस  ठाणे आहे

👮‍♂  दशातील पहले पोलीस ठाणे
(स्वतंत्र  भारत) -  पंतप्रधान इंदिरा गांधीनी २७ आॅक्टोबर १९७३ रोजी देशातील पहिले पोलीस ठाणे केरळच्या कोझीकोडे येथे सुरू केले

⚫️ दशातील पहिला एफआयआर - 18 आॅक्टोबर 1861 रोजी दिल्लीत सब्जीमंडी पोलीस ठाण्यात पहिला एफआयआर दाखल झाला होता
खरं तर FIR आपल्या सुविधेसाठी आहे पण आपण त्याचा उपयोग करून घेत नाही. ह्याचा उपयोग कसा करून घ्यावा हे माहित असणे अतिशय आवश्यक आहे कारण FIR ची सुविधा ही प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी आहे....

सशांत सिंह राजपूतला मानाचा दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलमध्ये सन्मान.



🎯 दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिवंगत सुशांतचा सन्मान केला जाणार आहे.

🎯 छोट्या पडद्यापासून  बॉलिवूडपर्यंत  यशस्वी प्रवास करणाऱ्या सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला. या प्रकरणाचा सध्या तपास करण्यात येत असून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. याच दरम्यान आता सुशांतला मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

🎯 दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिवंगत सुशांतचा सन्मान केला जाणार आहे. अद्याप या पुरस्काराची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

🎯 दादासाहेब फाळके पुरस्कारची सुरवात #1969 साली झाली.

🎯 परस्कार भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्या तर्फे दिला जातो. पुरस्कारात सुवर्ण कमळ आणि 10 लाख रुपये यांचा समावेश असतो.

२८ ऑगस्ट २०२०

निर्यात सज्जता निर्देशांक 2020’मध्ये गुजरात राज्य प्रथम क्रमांकावर



🔰 नीती आयोगाने (राष्ट्रीय परिवर्तन भारत संस्था) ‘निर्यात सज्जता निर्देशांक 2020’ (EPI 2020) जाहीर केला आहे. भारतातल्या राज्यांची निर्यात-बाबतची तयारी आणि कामगिरी यांचे परीक्षण करून आव्हाने आणि संधी ओळखणे, सरकारी धोरणाचा प्रभाव अधिक वाढवणे आणि सोयीचे नियमन संरचना तयार करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या पहिल्या अहवालाचा उद्देश आहे.

🟣 राज्यांच्या एकूणच यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) - गुजरात, महाराष्ट्र आणि तमिळनाडू

🟡 भपरिवेष्टित राज्यांच्या यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) - राजस्थान, तेलंगणा आणि हरयाणा

🟠 हिमालयी राज्यांच्या यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) – उत्तराखंड, त्रिपुरा आणि हिमाचल प्रदेश

🔴 कद्रशासित प्रदेशांच्या यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) – दिल्ली, गोवा आणि चंदीगड

🔴 इतर ठळक बाबी...

🔰 हा निर्देशांक चार स्तंभावर आधारित आहे, ते आहेत - धोरण, व्यवसाय परीसंस्था, निर्यात परिसंस्था, निर्यात कामगिरी. यात 11 उप-स्तंभ आहेत.

🔰 निर्यात वृद्धीसाठी प्रादेशिक कामगिरी उंचावण्यासाठी हा निर्देशांक राज्य सरकारांना मार्गदर्शक ठरणार आहे.
निर्यात वैविध्य, वाहतूक संपर्क आणि पायाभूत सुविधा या उप स्तंभाबाबत बऱ्याच भारतीय राज्यांनी चांगली कामगिरी केली आहे.

🔰या तीन स्तंभाबाबत भारतीय राज्यांचे सरासरी गुण 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहेत.साधारणपणे बहुतांश किनारी राज्यांनी उत्तम कामगिरी दर्शवली आहे.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) संस्थेचे 7 नवीन क्षेत्र.



🔰भारत सरकारच्या संस्कृति मंत्रालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) या संस्थेच्या 7 नवीन क्षेत्रांची नावे जाहीर केली. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत -

🔰तरिची (तामिळनाडू)
🔰रायगंज (पश्चिम बंगाल)
🔰राजकोट (गुजरात)
🔰जबलपूर (मध्यप्रदेश)
🔰झांसी (उत्तरप्रदेश)
🔰मरठ (उत्तरप्रदेश)
🔰हम्पी शहर (कर्नाटक).

🔴भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विषयी...

🔰भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ही एक भारतीय सरकारी संस्था आहे जी संस्कृति मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. पुरातत्व संशोधनात्मक कार्य तसेच देशातल्या सांस्कृतिक स्मारकांचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी ही संस्था जबाबदार आहे. त्याची स्थापना 1861 साली अलेक्झांडर कनिंघम या ब्रिटिश अधिकाऱ्याने केली होती. संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली या शहरात आहे.

🔰भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) यांच्याकडून ऐतिहासिक महत्व आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या वास्तु वा स्मारकांना ‘राष्ट्रीय महत्त्व’ म्हणून घोषित केले जाते. ‘प्राचीन स्मारके आणि पुरातत्त्वविषयक ठिकाणे व अवशेष अधिनियम-1958’ यामध्ये ‘प्राचीन स्मारक’ या संज्ञेची व्याख्या दिलेली आहे. या कायद्याच्या अंतर्गत ‘प्राचीन स्मारक’ घोषित केले जाते, जे ऐतिहासिक आहे आणि 100 वर्षांपेक्षा अधिक काळापासून अस्तित्वात आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलली, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय.



🔰करोना संकटाच्या पार्श्वभूनीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मुख्य सचिवांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती दिली.

🔰परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे. करोना संकट टळलं नसल्याने एकीकडे जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असताना केंद्र सरकार मात्र परीक्षा घेण्यावर ठाम आहे. त्यातच राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

🔰याआधी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या पूर्वपरीक्षेचे जिल्हा स्तरावर केंद्र बदलून द्यावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. विद्यार्थी संघटना आणि लोकप्रतिनिधींकडून वारंवार मागणी करूनही आयोगाने दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांनी आता थेट न्यायालयात धाव घेतली होती.

9.3 अब्ज प्रकाशवर्षे दूर दिर्घीकापासून येणाऱ्या अतीव अतिनील किरणांचा अॅस्ट्रोसॅट मार्फत शोध.


🔰भारताच्या ‘अॅस्ट्रोसॅट’ या अंतराळ वेधशाळेपासून मिळविलेल्या माहितीच्या आधारे भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी 9.3 अब्ज प्रकाशवर्षे दूर अंतरावर असणाऱ्या दिर्घीका (galaxy) यापासून येणाऱ्या अतीव अतिनील (ultraviolet) प्रकाशकिरणांचा शोध लावला आहे. विश्वाचे अंधकारमय युग कसे संपले याविषयावर शोधामुळे प्रकाश टाकला जाऊ शकतो, जो एक महत्वाचा संकेत आहे.

🔰डॉ. कनक साहा यांच्या नेतृत्वात खगोलशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय चमूने हा शोध लावला आहे. या चमूत भारत, स्वित्झर्लंड, फ्रान्स, अमेरिका, जापान आणि नेदरलँड या देशांचे शास्त्रज्ञ आहेत.

🔴अस्ट्रोसॅट बाबत...

🔰अस्ट्रोसॅट (ASTROSAT) हा 1513 किलो वजनी भारताचा पहिला समर्पित बहु-तरंगलांबीची सोय असलेला खगोलशास्त्र उपग्रह आहे. हे एकाचवेळी विविध तरंगांमध्ये वैश्विक क्ष-किरण स्रोत आणि दूरवर असलेले तारे शोधू शकण्यास सक्षम आहे.

🔰ही मोहीम दिनांक 28 सप्टेंबर 2015 रोजी अंतराळात पाठवण्यात आली. उपग्रह समुद्रसपाटीपासून 650 कि.मी. उंचीवर पृथ्वीच्या खालच्या विषुववृत्तीय कक्षेत प्रस्थापित करण्यात आला आहे. अमेरिका, रशिया, युरोपीय अंतराळ संस्था आणि जापान यांच्यानंतर भारत हा अंतराळात प्रयोगशाळा असलेला जगातला पाचवा देश ठरला.

आफ्रिका पोलिओमुक्त झाला: जागतिक आरोग्य संघटना.



🔰आफ्रिका खंडातून पोलिओ हद्दपार झाला आहे. आफ्रिका खंड पोलिओमु्क्त झाला असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेकडून 25 ऑगस्ट 2020 रोजी करण्यात आली. आफ्रिका खंडात नायजेरिया हा शेवटचा देशही पोलिओमु्क्त जाहीर करण्यात आला.

🔴इतर ठळक बाबी

🔰जगात आता फक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये पोलिओ आढळला जात आहे.भारताला 2011 साली पोलिओमुक्त देश जाहीर करण्यात आले होते.जागतिक आरोग्य संघटना (WHO), संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) आणि रोटरी इंटरनॅशनल या संस्था जगभरात पोलिओ निर्मूलन कार्यक्रम राबवितात.पोलिओ

🔴पोलिओ (शास्त्रीय नाव:

🔰पोलिओमायलिटिस) हा विषाणूंमुळे बालकांना होणारा आणि अपंग करणारा संसर्गजन्य रोग आहे. पोलिओ या आजारास लहान मुलांचा पक्षाघात म्हणू ओळखले जाते. संसर्गजन्य असा हा आजार मध्यवर्ती चेता संस्थेवर परिणाम करतो.

🔰पोलिओच्या विषाणूचे तीन प्रकार हे ’RNA‘ वर्गीय असून, त्यांची नावे ब्रुनहिल्ड, लॅन्सिंग आणि लिऑन अशी आहेत. ब्रुनहिल्डमुळे अर्धांगवायू होतो. लॅन्सिंग आणि लिऑन मज्जारज्जूच्या पेशींवर हल्ला करतात.
पिटसबर्ग युनिव्हर्सिटीचे प्रो. जोनास सॉल्क यांनी 1951 साली पोलिओचे विषाणू शोधले आणि त्यांच्यापासून लस तयार केली.

🔴पोलिओला प्रतिबंध करणाऱ्या दोन लस –

1) सॅबिन लस ही तोंडाने घेण्याची पोलिओप्रतिबंधक लस आहे. 2) साल्क लस ही मृत पोलिओ विषाणूपासून बनविलेली आहे. त्वचेखाली तीन इंजेक्शन्सच्या स्वरूपात ही लस द्यावी लागते.

🔴आफ्रिका खंड....

🔰आफ्रिका हा आकाराने आणि लोकसंख्येने आशियानंतर क्रमांक दोनचा भौगोलिक खंड (एकूण क्षेत्रफळ: 3.02 कोटी चौ. किलोमीटर) आहे. हा खंड पृथ्वीचा 6% पृष्ठभाग व्यापतो. मादागास्कर आणि इतर बेटांचे समुह मिळून खंडात एकूण 56 सार्वभौम देश आणि दोन मान्यता नसलेले देश आहेत.

🔰आफ्रिकेच्या उत्तरेला भूमध्य समुद्र, ईशान्येला सुएझ कालवा, लाल समुद्र आणि सिनाई बेटे आहेत. आग्नेयला हिंदी महासागर आणि पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना पसरलेला हा खंड आहे. उत्तर आणि दक्षिण दोन्ही उष्ण कटिबंध सामावणारा आफ्रिका हा एकमेव खंड आहे.

चिनी फायटर जेट्सचा वेध घेण्यासाठी भारताने तैनात केली ‘इग्ला’सिस्टिम.



🔰पर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चिनी सैन्याच्या हेलिकॉप्टरच्या हालचाली वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने उंचावरील प्रदेशात खांद्यावरुन मिसाइल डागता येणाऱ्या एअर डिफेन्स सिस्टिमसह जवानांच्या तुकडया तैनात केल्या  आहेत.तर शत्रुच्या विमानांनी हवाई हद्दीचे उल्लंघन केल्यास त्यांना तात्काळ प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने उंचावरील प्रदेशात रशियन बनावटीच्या इग्ला एअर डिफेन्स सिस्टिमसह जवानांना तैनात केले आहे.

🔰तसेच रशियन बनाटीच्या या एअर डिफेन्स सिस्टिमचा भारतीय लष्कर आणि इंडियन एअर फोर्स दोघेही वापर करतात.
युद्धाच्या प्रसंगात किंवा शत्रूची फायटर विमाने, हेलिकॉप्टर तुमच्या तळाजवळ येतात, तेव्हा या सिस्टिमचा वापर केला जातो. भारताने सुद्धा आपली टेहळणी क्षमता वाढवली आहे.चीनच्या हवाई हालचालींवर रडार्सच्या माध्यमातून लक्ष ठेवले जातेय तसेच जमिनीवरुन हवेत मारा करणारी मिसाइल्स सुद्धा सज्ज ठेवली आहेत.

🔰भारतीय हद्दीतील भागांमध्ये चिनी हेलिकॉप्टर्स प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सैन्याला दिसले आहे. पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्याच्या हेलिकॉप्टर्सनी हवाई हद्दीचे उल्लंघन करु नये, यासाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवडयापासून इंडियन एअर फोर्सने सुखोई फायटर विमाने तैनात केली आहेत.

आकाशगंगेपेक्षा बटू दीर्घिकांमध्ये ताऱ्यांची निर्मिती जास्त वेगाने.



🔰आपल्या आकाशगंगेपेक्षा काही बटू दीर्घिकांमध्ये (ड्वार्फ गॅलेक्सी) ताऱ्यांची निर्मिती 10 ते 100 पट अधिक वेगाने होते असे आर्यभट्ट रीसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस या संस्थेच्या वैज्ञानिकांनी अभ्यासाअंती स्पष्ट केले आहे.

🔰तर आपल्या विश्वात अब्जावधी दीर्घिका असून त्यातील अनेक बटू दीर्घिका आहेत, या दीर्घिका आपल्या आकाशगंगेपेक्षा वस्तुमानाने कमी आहेत. या लहान दीर्घिकांना बटू दीर्घिका असे म्हटले जाते.

🔰तसेच त्यांच्यात ताऱ्यांची निर्मिती कमी वेगाने होत असते पण काही बटू दीर्घिकांमध्ये ताऱ्यांची निर्मिती नेहमीच्या दीर्घिकांच्या तुलनेत 10 ते 100 पट वेगाने होत असते. आपल्या आकाशगंगेपेक्षाही या दीर्घिकात जास्त वेगाने तारे तयार होतात. पण तारे निर्मितीची ही प्रक्रिया लाखो वर्षांनंतर बंद होते. या दीर्घिकांचे वय मात्र काही अब्ज वर्षे असते.

🔰वज्ञानिकांनी या दीर्घिकांचा अभ्यास दोन भारतीय दुर्बिणींच्या मदतीने केला असून त्यात त्यांचे गुणधर्म वेगळे दिसून आले. त्यांच्यात हायड्रोजन वेगळ्या पद्धतीने विखुरलेला होता व दोन दीर्घिकांमधील टकरीही वेगळ्या होत्या.

🔰हायड्रोजन हा ताऱ्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक घटक असल्याचे सांगून वैज्ञानिक अमितेश ओमर यांनी म्हटले आहे की, जर ताऱ्यांची निर्मिती वेगाने व्हायची असेल तर त्यासाठी दीर्घिकेत हायड्रोजनचे प्रमाण जास्त असावे लागते.

🔰ओमर व त्यांचे माजी विद्यार्थी सुमित जैसवाल यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विभाग व आर्यभट्ट रीसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस या संस्थेच्या माध्यमातून हे संशोधन केले असून त्यासाठी नैनिताल येथील देवस्थळची 1.3 मीटरची जलद प्रकाशीय दुर्बीण व पुण्याची जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप यांचा वापर करण्यात आला.

🔰तसेच ओमर यांनी आयनीभूत हायड्रोजनशी जुळणाऱ्या प्रकाशीय प्रारणांची तरंगलांबी मोजण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी या दीर्घिकांमधून येणाऱ्या प्रारणांच्या वर्णपंक्ती रेषेच्या मदतीने 45 मीटर व्यासाच्या तीस अँटेनांच्या मदतीने प्रतिमा तयार करण्यात आल्या.

उडान 4.0 अंतर्गत नवीन 78 मार्गांना मंजुरी


📚नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रादेशिक संपर्क योजनेच्या (आरसीएस) - उडे देश का आम नागरीक (उडान) ने  तीन यशस्वी निविदा प्रक्रियांनंतर चौथ्या फेरी अंतर्गत नवीन 78 मार्गांना मंजुरी दिली आहे.

📚 यामुळे देशातील दुर्गम आणि प्रादेशिक भागातील संपर्क वाढू शकेल. नवीन मार्गांची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये ईशान्येकडील प्रदेश, डोंगरप्रदेशातील we राज्ये आणि बेटे यांना प्राधान्य देण्यात आले आहे.

📚गवाहाटी ते तेजू, रुप्सी, तेजपूर, पासीघाट, मीसा आणि शिलाँग या मार्गांसह ईशान्येकडील जोडणीला विशेष चालना देण्यात येत आहे. उडानच्या या चार मार्गांतर्गत नागरिकांना हिसार ते चंदीगड, डेहरादून आणि धर्मशाला या मार्गांवर प्रवास करता येईल. वाराणसी ते चित्रकूट आणि श्रावस्ती मार्गाला देखील मंजुरी मिळाली आहे.

📚 उडान 4.0 योजनेअंतर्गत नव्या मार्गांमध्ये लक्षद्वीपमधील अगत्ती, कवरत्ती आणि मिनिकोय बेटे देखील जोडली गेली आहेत.

📚आजवर, उडान योजनेअंतर्गत 766 मार्ग मंजूर झाले आहेत. पैकी 29 वापरातील, 08 वापरात नसलेले आणि 02 कमी वापरात असलेले विमानतळ यांचाही मंजूर मार्गांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

📚ईशान्येकडील क्षेत्र, डोंगर प्रदेशातील राज्ये आणि बेटांवर विशेष लक्ष केंद्रित करून डिसेंबर 2019 मध्ये उडानची चौथी फेरी सुरू करण्यात आली. एएआय च्या वतीने यापूर्वीच विकसित केलेल्या विमानतळांना या योजनेअंतर्गत व्हीजीएफसाठी (अनुदान सहाय्यतून सक्षमीकरण) प्राधान्य दिले आहे. उडान 4, अंतर्गत हेलिकॉप्टर आणि सी-प्लेन्सचे कामकाज देखील समाविष्ट केले गेले आहे.

📚सथापनेपासून नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने 274 उडान मार्ग चालू केले आहेत, जे 45 विमानतळ आणि 3 हेलिपोर्टला जोडले गेले आहेत.

२६ ऑगस्ट २०२०

नक्की वाचा :- भारतात घडलेल्या पहिल्या गोष्टी



●  चंद्रावर मानव पाठवणारा पहिला देश : अमेरिका

● पहिला मानवनिर्मित उपग्रह अवकाशात प्रेक्षेपित करणारा देश : रशिया

●  पहिली हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वी करणारा देश : द. आफ्रिका

●  पहिली चेहरारोपण शस्त्रक्रिया करणारा देश : फ्रान्स

● भारतातील पहिली विज्ञान नगरी : कोलकाता

●  भारतातील पहिला महासंघ : परम 10,000

●  भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र : नवी दिल्ली (1959)

●  भारतातील पहिले स्वदेशी क्षेपणास्त्र : पृथ्वी (1988)

●  भारतातील पहिले कुटुंबनियोजन केंद्र : मुंबई (1925)

●  भारताचा पाहीला उपग्रह : आर्यभट्ट

●  भारतातील पहिला दूरसंवेदन उपग्रह : आय.आर.एस-1ए

●  भारतातील पहिली अणूभट्टी : अप्सरा (1954)

●  भारतातील पहिली जनगणना : ए.स. 1872

●  भारतातील स्वदेशी निर्मिती पहिली आण्विक पाणबुडी : आय.एन.एस.अरिहंत

●  भारतातील पहिली अणुचाचणी : पोखरण (1974)

खारफुटी जंगले



♻️आतरराष्ट्रीय खारफुटी वने दिन - २६ जुलै♻️

🟩 खारफुटी ही चिखलात, घट्ट माती नसलेल्या जागी आणि भरतीचे पाणी घुसणाऱ्या भागात वाढते.

🔸मराठीत या वनस्पतीला कच्छ वनस्पती,
🔸इग्रजीत मॅंग्रोव्ह असे म्हणतात.
🔸 तिवर हा या समूहातील एक उपप्रकार आहे.

🔷या वनस्पतीमुळे बनलेल्या वनश्रीला कांदळवन म्हणतात.

🔺भारतामध्ये जगातील सर्वांत जास्त खारफुटीचे जंगल हे भारताच्यापूर्व किनारपट्टीवर असणारे सुंदरबनचे जंगल आहे.


🔶जगामध्ये खारफुटी वनस्पतीच्या एकूण ७३ जाती आहेत.
🔹तयापैकी भारतामध्ये ४६ जाती आहेत.
🔹पश्चिम किनार पट्टीवर २७,
🔹पर्व किनार पट्टीवर ४०,
🔹अदमान आणि निकोबार या बेटावर ३८ जाती आहेत.

♻️उपयुक्तता♻️

🔘खारफुटीचे लाकूड चमकदार असले, तरी आर्थिक दृष्ट्या ते फारसे उपयुक्त नसते.

🔘मोठ्या झाडांचे लाकूड बंदरातील गोदी व धक्के बांधण्यासाठी वापरले जाते.

🔸कारण या वनस्पतीचे लाकूड पाण्यात कुजत नाही, तसेच त्याला कीड लागत नाही.

🔘तांबड्या खारफुटीच्या सालीपासून टॅनिन हा पदार्थ मिळतो.
🔸टनिनचा उपयोग कातडी कमाविण्यासाठी, रंगविण्यासाठी व माशांची जाळी मजबूत बनविण्यासाठी केला जातो.

🔘निपा नावाचे पाम जातीचे झाड असते, त्यापासून साखर निर्माण करतात.

🔘चिपी जातीच्या झाडांच्या फळांपासून श्रीलंकेत खाद्यपेये बनवतात.

🔘खारफुटीच्या विविध जातींपासून पारंपरिक औषधे तयार होतात.

🔘मस्वाल या वनस्पतीपासून साबणापासून टूथपेस्टपर्यंत विविध वस्तू तयार होतात.

 🔘Acanthus ilicifolius ही वनस्पींपासून अस्थमा, संधीवात आणि त्वचा विकार हा बरा होतो.

 🔘तिवर या वनस्पतीचा जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयोग केला जातो.

🔴या समूहात एकच विषारी वनस्पती आढळते ती म्हणजे इक्झोकरीआ अगर गेवा.🔴

✅ गीर फाऊंडेशन ही संस्था गुजरात मधील खारफुटी वनस्पतीवर काम करीत आहे. ✅

"सिंधू"च्या चर्चेवर भारत आणि पाकिस्तानची चकमक वाढली



🔷 Indus Water Treaty 🔷

🔶पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांनी 19 सप्टेंबर 1960 रोजी सिंधू नदी पाणी वाटप करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

🔶जागतिक बँकेच्या मध्यस्थीने हा करार झाला होता.

🔶या संदर्भातील वाद तंटे सोडवण्यासाठी सिंधू आयोगाची स्थापना करण्यात आली.

🔶करारानुसार बियास , रावी आणि सतलज या तीन पूर्वेकडील नद्यांचे पाणी भारतात विनाअट वापर करू शकणार.

🔶पश्चिमेकडील नद्यांतून भारताला एकूण पाण्यापैकी 20 टक्के पाणी उपलब्ध आहे.

🔶सिंधू, चिनाब आणि झेलम या तीन पश्चिमेकडील नद्यांचे पाणी पाकिस्तान प्राधान्याने वापरू शकणार.

🔶भारत या पश्चिमेकडील नद्यांवर 3.6 दशलक्ष एकर फूट इतक्या पाणी साठवणीच्या सुविधा बांधू शकतो.

🔴 सिंधू नदी 🔴

🔷ही दक्षिण आशियामधील एक प्रमुख नदी आहे.

🔷तिबेट , भारत व पाकिस्तान मधून वाहणारी नदी.

🔷उगम - मानसरोवर , तिबेट.

🔷मुख - अरबी समुद्र, कराची.

🔷उपनद्या - गिलगिट , काबुल , सतलज , बियास , चिनाब , झेलम , रावी.

ओझोन चे संरक्षण कवच



🔰 वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो.

🔰ओझोन  वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे  सजीवांसाठी फार महत्त्वाचे आहे.

🔰सर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. ही
किरणे ओझोन वायू शोषून घेतो. त्यामुळे पृथ्वीवरील  सजीवांचे रक्षण होते.

🔰वातानुकूलन यंत्रे, रेफ्रिजरेटर्स यांमध्ये हवा थंड  करण्यासाठी वापरला जाणारे
📌 कलोरोफ्लुरोकार्बन्स तसेच 
📌 कार्बन टेट्राक्लोराईड हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यास  ओझोनच्या थराचा नाश होतो. 

🔰ओझोनचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे यासाठी  १६ सप्टेंबर हा दिवस जगभर ‘ओझोन संरक्षण दिन’  म्हणून मानला जातो.

महणी व अर्थ



🌷एका म्यानात दोन तलवारी राहात नाहीत------
दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविंदाने राहू शकत नाहीत


🌷एका हाताने टाळी वाजत नाही------
भांडणाचा दोष एकाच पक्षाकडे असत नाही


🌷एकाच माळेचे मणी------
येथून तेथून सगळे सारखेच


🌷एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवी विडी------
दुसऱ्याच्या अडचणीचा किंवा दुःखाचा विचार न करता, स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे


🌷एकादशीच्या घरी शिवरात्र------
एका दरिद्री माणसाला दुसऱ्या दरिद्री माणसाचा काहीच उपयोग नाही


🌷एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु नये------
एकाने वाईट गोष्ट केली म्हणून दुसऱ्याने लहानशी देखील वाईट गोष्ट करु नये


🌷ऐकावे जनाचे करावे मनाचे------
सर्वांचा विचार घ्यावा व आपणास योग्य वाटेल ते करावे


🌷ऐकून घेत नाही त्याला सांगू नये काही------
जो सांगितलेले ऐकत नाही, त्याला उपदेश करण्यात काय अर्थ?


🌷ऐतखाऊ लांडग्याचा भाऊ------
कष्ट केल्याविना खाण्याची सवय असणारा, जेथे आयते खायला मिळेल तेथे चांगलाच ताव मारुन घेतो

मुंबई विमानतळातील 74 टक्के हिस्सा खरेदी.

🔰पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समुहाला देण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली होती.

🔰सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे चालविल्या जाणाऱ्या देशातील या तिन्ही विमानतळांच्या देखभालीचा हक्क खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावर अदानी समुहाला देण्यात आल्याची माहिती सरकारने यापूर्वीच दिली.

🔰आता देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या विमानतळाच्या देखबालीचे आणि हाताळणीचे कंत्राट गौतम अदानी यांच्या समुहाला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

🔰अदानी समुहाचा जीव्हीके समुहासोबत असलेला वाद शमल्यानंतर मुंबई विमानतळातील 74 टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
सध्या मुंबई विमानतळाच्या देखभालीचं आणि हाताळणीचं कंत्राट जीव्हीके समुहाकडे आहे.

स्पर्धा परीक्षा तयारी-चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे


Q1) कोणत्या व्यक्तीने “कोड ग्लेडिएटर्स 2020” हा पुरस्कार जिंकला?
उत्तर :- हिमांशू सिंग

Q2) कोणत्या बँकेनी 'गिग-ए-अपोर्च्युनिटीज' उपक्रमाचा आरंभ केला?
उत्तर :- अ‍ॅक्सिस बँक

Q3) कोणत्या विषयाखाली ‘ASEAN-इंडिया नेटवर्क ऑफ थिंक टँक’ (AINTT) याची सहावी गोलमेज बैठक आयोजित करण्यात आली?
उत्तर :- ASEAN-भारत: कोविड नंतरच्या काळात भागीदारीचे बळकटीकरण

Q4) कोणता देश ‘सप्लाय चेन रेझिलन्स’ उपक्रम राबविण्यासाठी भारत आणि जापान सोबत भागीदारी करणार आहे?
उत्तर :-  ऑस्ट्रेलिया

Q5) कोणत्या मंत्रालयाने जव्हेरींसाठी हॉलमार्किंग केंद्रांच्या अधिकृत मान्यता आणि नूतनीकरणाची ऑनलाइन प्रणाली कार्यरत केली आहे?
उत्तर :-  ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय

Q6) कोणती अंदमान व निकोबार बेटांवर हाय-स्पीड 4G सेवा देणारी पहिली खासगी दूरसंचार कंपनी ठरली?
उत्तर :- एअरटेल

Q7) कोणत्या संस्थेत शिव नादर विद्यापीठाच्या भागीदारीने पर्यावरणपूरक लिथियम-सल्फर (Li-S) बॅटरीच्या उत्पादनासाठी एक तंत्रज्ञान विकसित केले गेले?
उत्तर :- भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई

Q8) कोणत्या व्यक्तीची भारतीय स्टेट बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नेमणूक झाली?
उत्तर :-  अश्वनी भाटिया

Q9) कोणत्या खेळाडूने धनुर्विद्या या क्रिडा शाखेसाठी ‘अर्जुन पुरस्कार 2020’ जिंकला?
उत्तर :-  अतनू दास

Q10) कोणत्या व्यक्तीला ‘यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम’ या संस्थेतर्फे ‘2020 लीडरशिप अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर :-  शंतनू नारायण, आनंद महिंद्रा

महात्मा गांधी खेडा येथे १९१८

गांधीजीना पहिलेयश चंपारण आणि खेडामधील सत्यग्रहात मिळाले. चंपारण, बिहारमधील जमीनदार, जे प्रामुख्याने ब्रिटिश होते, स्थानिक शेतकऱ्यांना सक्तीने नीळ उत्पादन करावयास लावत असत. त्यांना योग्य मोबदला पण मिळत नसे, यांमुळे ते सतत गरिबीत राहत. शेतकऱ्यांची गावे अत्यंत धाणेरडी आणि आरोग्य हानिकारक ठेवली जात. तसेच दारू, अस्पृश्यता, परदा पद्धत अशा अनेक समस्या या गावांमध्ये होत्या. यावर भर म्हणजे तेथील दुष्काळ, पण इंग्रजानी तरीही अनेक जाचक कर लादले होते आणि ते वाढतच होते. गुजरातमधील खेडा मध्ये सुद्धा स्थिती काही वेगळी नव्हती. गांधीजींनी तिथे एक आश्रम उभारला ज्याद्वारे त्यांनी त्यांच्या लहान-मोठ्या सर्व अनुयायांना एकत्र केले. त्यांनी त्या भागातील परिस्थितीची माहिती गोळा केली व सखोल अभ्यास केला. गावकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी गावाच्या स्वच्छतेचे तसेच शाळा, रुग्णालयाच्या बांधकामचे काम हाती घेतले. याचसोबत गावातील प्रमुखांना वर उल्लेखलेल्या प्रथा नष्ट करण्यास प्रवृत्त केले.

पण त्यांचा मुख्य प्रभाव तेव्हा जाणवून आला जेव्हा पोलिसांनी त्यांना प्रदेशात अशांतता निर्माण करण्याच्या गुन्ह्याखाली अटक केली व तो भाग सोडून जाण्यास सांगितले. हजारो लोकांनी या अटकेचा विरोध केला. त्यांनी गांधीजींच्या सुटकेसाठी तुरूंगाबाहेर, पोलिस स्थानकासमोर आणि न्यायालयासमोर मोर्चे काढले. न्यायालयाने शेवटी नाइलाजाने त्यांची मागणी मान्य केली. गांधीजींनी जमीनदारांविरुद्ध सुसंघटित आंदोलने चालू केली. याचा परिणाम म्हणजे तेथील जमीनदारांनी ब्रिटिश सरकारच्या मार्गदर्शनाखाली एक ठराव मंजूर केला ज्याद्वारे शेतकऱ्यांना जास्त मोबदला आणि स्वतःच्या मतानुसार पीक घेण्याची मोकळिक मिळाली. तसेच करवाढ रद्द झाली आणि दुष्काळ असेपर्यंत कर भरण्यापासून सूट मिळाली. या आंदोलनादरम्यानच गांधीजींचा उल्लेख लोक ”’बापू”’ आणि ”’महात्मा”’ म्हणून करू लागले. खेडामध्ये सरदार पटेलांनी शेतकऱ्यांच्या बाजूने इंग्रजांसोबत वाटाघाटी केल्या. याद्वारे कर रद्द करण्यात आला आणि सर्वांची तुरूंगातून सुटका करण्यात आली. या आंदोलनामुळे गांधीजींची प्रसिद्धी सर्व भारतभर पोहोचली.

हे लक्षात ठेवा :- देशातील 10 अस्वच्छ शहरे

नागरी स्वच्छता अभियानातील कामगिरीत सातत्य राखत महाराष्ट्राने या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशात सर्वाधिक चार, तर अन्य विभागांतील 13 असे एकूण 17 पुरस्कार मिळवून ‘हॅट्ट्रिक’ साधली आहे.

तर दुसरीकडे सर्वाधिक अस्वच्छ शहरांच्या यादीत अव्वल दहापैकी सहा शहरे बिहारमधील असल्याची माहिती समोर आली आहे.

🛑 10 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या सर्वात अस्वच्छ शहरांची यादी

🔟 अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये दहाव्या स्थानी आहे बिहारमधील साहारसा हे शहर.

9️⃣ बिहारमधीलच बिहार शरीफ शहर नवव्या स्थानी आहे.

8️⃣ आठव्या स्थानी आहे नागालँण्डमधील दिमापूर एमसी हे शहर.

7️⃣ अरुणाचल प्रदेशमधील इटानगर हे या यादीमध्ये सातव्या स्थानी आहे.

6️⃣ मेघालयमधील शिलाँग शहर अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये सहाव्या स्थानी आहे.

5️⃣ अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये पाचव्या स्थानी आहे परसा बाजार. हे शहर बिहारमध्ये आहे.

4️⃣ चौथ्या स्थानी बिहारमधील भागलपूर शहर आहे.

3️⃣ तिसऱ्या स्थानी पंजाबमधील अबोहार शहर आहे.

2️⃣ दुसऱ्या स्थानी बिहारमधील बक्सर शहर आहे.

1️⃣ सर्वात अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये बिहारमधील गया शहर अव्वल स्थानी आहे.

भारतातील जंगलाविषयी माहिती

▪︎         भारत सरकारच्या वन व पर्यावरण विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार भारतातील 78 लाख 29 हजार चौ. हेक्टर जमिनक्षेत्र वनाखाली असून भारताच्या एकूण जमिनक्षेत्राच्या 23.81 जमिनक्षेत्र जंगलाखालील आहे. 

▪︎         भारतातील 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाचा विचार केल्यास काही राज्यामध्ये जंगलाचे प्रमाण कमी झाले असून काही राज्यामध्ये जंगलाचे प्रमाण वाढलेले आहे.
भारतातील जंगलाचे प्रमाण व राज्ये :

● आकारमानानुसार सर्वाधिक जंगल असलेले राज्य -

▪︎         भारतात सर्वात जास्त जंगलाचे प्रमाण मध्यप्रदेश राज्यात (94,689 चौ.कि.मी.) असून दूसरा क्रमांक आंध्रप्रदेश (63,814 चौ.कि.मी.) राज्याचा आणि तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा (61,939 चौ.कि.मी.) लागतो. 

● क्षेत्रफळानुसार जंगलाचे प्रमाण जास्त असलेले राज्य -

▪︎         क्षेत्रफळानुसार सर्वात जास्त जंगलाचे प्रमाण सिक्कीम (82.31%) राज्यात आहे. त्यानंतर अनुक्रमे दूसरा क्रमांक मिझोरम (79.30%) व तिसरा क्रमांक मणीपुर (78.01%) लागतो. केंद्रशासीत प्रदेशात सर्वाधिक जंगले लक्षव्दिप बेटामध्ये आहे. 

● सर्वात कमी जंगल नसलेले राज्य -

▪︎         हरियाणा राज्यामध्ये सर्वात कमी जंगले असून हरियाणामधील फक्त 3.53% जमीन जंगलाखाली आहे. त्यानंतर अनुक्रमे पंजाब (6.12%) व बिहार (6.87%) जमीन जंगलाखाली आहे.

Important information


📚 कृषी सिंचन धोरण अंमलात आणण्यासाठी सुरुवातीची पाऊले उचलणारा प्रथम गव्हर्नर जनरल ?
- लॉर्ड बेंटींक

📚 भारतात रेलवे स्थापन करण्याचा प्रथम निर्णय कोठे घेण्यात आला?
- मद्रास

📚 मुलकी सेवांमधील नेमणूकीसाठी स्पर्धा परीक्षेच्या तत्वाचा स्विकार करण्याची शिफारस करणारा प्रथम व्यक्ती?
- लॉर्ड मेकॉले

📚 रेलवे सुरु करण्याची सर्वप्रथम योजना कोनी आखली?
- लॉर्ड हार्डींग्ज पहिला

📚 इंग्रजांनी भरतातील पहिली वखार ही कोठे स्थापन केली?
- सुरत

📚भरतातील पहिली राजकिय संघटना कोणती?
- लैंड होल्डर्स सोसायटी.

📚 भारतातील कामगारांची पहिली संघटना स्थापन करणारे?
- नारायण मेघाजी लोखंडे

◾️ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवर कोणते धरण आहे – मोडकसागर

◾️महाराष्ट्राच्या पश्चिमेस समुद्र पसरलेला आहे – अरबी

◾️महाराष्ट्राची अतिपूर्वेकडील जमात कोणती – माडीया गोंड

◾️महाराष्टा्रच्या उत्तर सिमेवर पवर्तरांग आहे – सातपुडा

◾️महाराष्ट्रात विशेषत :स गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्दांचा कोणता गटा आक्रमक आहे
– पिपल्स वॉर ग्रुप

◾️औद्दोगिकदृष्टया सर्वात जास्त मागासलेला जिल्हा कोणता – गडचिरोली

◾️मुंबईच्या सात बेटांची निर्मिती मुंबईचे निर्माते कोणी केली – जेरॉल्ड अंजिअर

◾️रोशा जातीचे गवत जिल्ह्यात आहे
– जळगांव, धुळे, नंदुरबार

◾️कोकण किनारपट्टीवर प्रकारच्या पाऊस पडतो
– प्रतिरोध

◾️पानझडी वृक्षांची वने विभागात आहेत
– विदर्भ

◾️समुद्राचे काठी वाढणारी वनस्पती कोणती – सुंद्री

🔰पानझडी वृक्षांची वने विभागात आहेत – विदर्भ

🔰सह्याद्री पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – अवशिष्ट

🔰हिमालय पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – धडिचा

🔰हरिश्चंद्र – बालघाट डोंगर जिल्ह्यात आहे – अहमदनगर

🔰पुणे जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर – हरिश्चंद्रगड

🔰‘रंकाळा’ तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे – कोल्हापुर

🔰भारतातील सर्वात प्राचिन लेणी – पितळखोर (औरंगाबाद)

🔰चांदीच्या दागीण्याकरिता प्रसिद्ध – हुपरी (कोल्हापुर)

🔰औरंगाबाद शहराची स्थापना कोणी केली – मलिक अबंर

🔰औरंगाबाद शहराचे जुने नावं होते – भिल्लठाणा

🔰वाशिम शहराचे जुने नांव होते – वत्सगुल्म

🔰महाराष्टा्रतील दुसरा साक्षर जिल्हा – वर्धा

🔰घारापूरी “एलेफंटा केव्हज” कोठे आहे – उरण (रायगड)

🔰ब्रम्हदेशाचा थीबा राजाचा राजवाडा – रत्नागीरी

🔰पुणे शेअर बाजाराची स्थापना – १९८२

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...