upsc लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
upsc लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१३ फेब्रुवारी २०२५

महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांचे आत्मचरित्र

  ✔️ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे :


◆ अ शॉर्ट अँट हिस्ट्री : अभिनव बिंद्रा 

◆ स्ट्रेट फ्रॉम द हर्ट : कपिल देव

◆ अनब्रेकेबल : मेरी कॉम 

◆ द रेस ऑफ माय लाईफ : मिल्खा सिंह

◆ गोल्डन गर्ल : पी टी उषा 

◆ प्लेयिंग ईट माय वे : सचिन तेंडुलकर

◆ प्लेयिंग टु वीन : सायना नेहवाल

◆ द टेस्ट ऑफ माय लाईफ : युवराज सिंह 

◆ सनी डेज् : सुनील गावसकर 

◆ द ग्रेटेस्ट : मोहम्मद अली 

◆ अँट द क्लोस ऑफ प्ले : रीकी पॉटींग 

◆ नो स्पिन : शेन वॉर्न

◆ 281 अँन्ड बियॉन्ड : वी वी एस लक्ष्मण

◆ गेम चेंजर : शाहिद आफ्रिदी

◆ माईंड मास्टर : विश्वनाथन आनंद

◆ शटलिंग टु द टॉप : पी वी सिंधू 

◆ अ सेंच्युरी इज नॉट इनफ : सौरव‌ गांगुली

◆ एस अगेन्सट ऑड्स : सानिया मिर्झा

◆ बिलीव्ह - सुरेश रैना

०६ फेब्रुवारी २०२५

गोलमेज परिषद बद्दल माहिती

गोलमेज परिषद बद्दल माहिती:

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

सायमन कमिशनवर चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये तीन गोलमेज परिषदा भरवल्या गेल्या.
वसाहतीच्या स्वराज्याची मागणी, 26 जाने. 1930 रोजी पहिल्या स्वातंत्र्य दिन पाळला गेला.

नेहरू आहवालातील तत्वे जर सरकारने स्वीकारली नाहीत तर सविनय कायदेभंग सुरू करण्याची सूचना गांधीजींनी व्हाइसरॉय आयर्वीन या दिली. (23 डिसेंबर 1929), आयर्वीन यांचा प्रतिसाद नाही.

1929 च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष – पं. जवाहरलाल नेहरू.
सविनय कायदेभंग (12 मार्ग 1930 ते 5 मार्च 1931)
12 मार्च 1930 रोजी आपल्या 78 सहकार्‍यांनीशी गांधीजींनी साबरमती आश्रमातून दांडी यात्रेस प्रारंभ केला.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

साबरमती ते दांडी अंतर – 385 कि.मी.
6 एप्रिल 1930 रोजी मिठाचा कायदा मोडला.
धारासना येथे सरोजनी नायडू यांनी मिठाचा सत्याग्रह केला. (21 मे 1930)
याच काळात महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात सिरोडा येथे मिठाचा सत्याग्रह झाला.

या काळात सोलापूरला मार्शल लॉ लागू केला (1930)
पहिली गोलमेज परिषद नोव्हेंबर 1930 मध्ये भरली.
काँग्रेसने पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला.
गांधी आयर्वीन करार – 5 मार्च 1931, या करारान्वे गांधीजींनी काही अटींवर दुसर्‍या गोलमेज परिषदेस हजर राहण्यासाठी मान्यता दिली.

दुसरी गोलमेज परिषद सप्टेंबर 1931 मध्ये भरली, गांधीजी काँग्रेसचे एकमेव प्रतीनिधी म्हणून उपस्थित. गांधीजीचा भ्रमनिरास
सविनय कायदेभंगाच्या दुसर्‍या टप्प्यात प्रारंभ -3 जाने. 1932.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

सविनय कायदेभंगाच्या दुसर्‍या टप्प्यात प्रारंभ -3 जाने. 1932
सविनय कायदेभंगाची समाप्ती – 1934
17 ऑगस्ट 1932 रोजी रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा घोषित केला. या व्दारे अश्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देऊ केले.

विधीमंडळातील विभक्त मतदार संघाविषयी गांधीजीचे प्राणांतीक उपोषण.
24 सप्टेंबर 1932 या दिवशी म. गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार (येरवडा करार) झाला. त्यान्वये अश्पृश्यांना विभक्त मतदार संघाऐवजी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आल्याचे मान्य केले गेले.

तिसरी गोलमेज परिषद नोव्हेंबर 1932 मध्ये भरली.
सविनय कायदेभंगावेळी खान अब्दुल गफार खान यांनी खुदाई खितमतगार नावाची लाल शर्ट वाल्यांची संघटना सुरू केली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

२६ डिसेंबर २०२४

Top 50 Mix Gk



1. सांची के स्तूप का निर्माण किसने कराया

-- अशोक ने


2. मेगस्थनीज ने किसके दूत के रूप चन्द्रगुप्त मौर्य के दरबार में 

आया था

-- सेल्यूकस


3. मुद्रा राक्षस किसने लिखी थी

-- विशाखदत्त


4. अशोक ने अपने पुत्र महेन्द्र व पुत्री संघमित्रा को कहां भेजा

-- श्रीलंका


5. कौनसा मौर्य सम्राट जैन धर्म ग्रहण करके श्रवण बेलगोला 

चला गया

-- चन्द्रगुप्त मौर्य


6. अन्तिम मौर्य समा्रट कौन था

-- बृहद्रथ


7. महाभाष्य के लेखक

-- पंतजलि


8. पंतजालि किसके दरबार में था

-- पुष्यमित्र शुंग के


9. कनिष्क किस वंश का शासक था

-- कुषागवंश का


10. कनिष्क की राजधानी कहां थी

-- पुरूषपुर


11. भारत में सबसे पहले सूर्य किस राज्य में निकलता है?

-- अरुणाचल प्रदेश 


12. भारत का सर्वोच सम्मान कौन सा है?

-- भारत रत्न 


13. भारत रत्न से सम्मानित प्रथम भारतीय महिला कौन थी?

-- इंदिरा गाँधी (1971 में)


14. भारत में मानसून सबसे पहले कहा आता है?

-- केरल राज्य में (जून के प्रथम सप्ताह में)


15. भगवान बुद्ध को ज्ञान की प्राप्ति किस स्थान पर हुआ था?

-- बोधगया 


16. भारत का प्रथम गवर्नर जनरल कौन था?

-- लार्ड विलियम बैंटिक 


17. चन्द्रमा पर मानव भेजने वाला प्रथम देश कौन है? 

-- संयुक्त राज्य अमेरिका (U.S.A)


18. रतौंधी किस विटामिन की कमी के कारण होता है?

-- विटामिन A के कारण 


19. कागज का अविष्कार किस देश ने किया?

-- चीन (China) ने 


20. सौर प्रणाली के खोजकर्ता कौन है?


-- कॉपरनिक्स


21. हिंदी भाषा की लिपि कौन सी है?

-- देवनागरी लिपि 


22. इंसुलिन का प्रयोग किस बीमारी के इलाज के लिए प्रयोग किया जाता है?

-- मधुमेह के इलाज में 


23. भारत में सर्वाधिक वर्षा कहा होती है? 

-- मासिनराम (मेघालय) में 


24. भारत की पहली महिला शाशिका कौन थी?

-- रजिया सुल्तान बेगम 


25. टेलीविजन का आविष्कार किसने किया था?

-- जॉन लोगी बेयर्ड ने 


26. जलियावाला बाग हत्याकांड कहा और कब हुआ था?

-- अमृतसर (1919 ई०) में 


27. सर्वाधिक चमकीला एवं गर्म ग्रह कौन सा है?

-- शुक्र ग्रह


28. भारत-पाकिस्तान के बीच की सीमा रेखा कौन सी है?

-- रेडक्लिफ रेखा 


29. मछलिया अपना साँस किसकी सहायता से लेती है?

-- गलफड़ो की सहायता से 


30. भारत की प्रथम महिला राज्यपाल कौन थी?

-- सरोजनी नायडु


31. 'ब्रह्म समाज' के संस्थापक कौन थे?

-- राजाराम मोहन राय


32. भारतीय अंतरिक्ष कार्यक्रम के जनक कौन है?

-- डॉ. विक्रम साराभाई 


33. 'तुम मुझे खून दो, मै तुम्हे आज़ादी दूंगा' का नारा किसने दिया?

-- सुभाष चन्द्र बोस ने


34. बक्सर का युद्ध कब हुआ था?

-- 1764 ई० में 


35. माउंट एवेरेस्ट पर दो बार चढ़ने वाली प्रथम महिला कौन थी?

-- संतोष यादव 


36. वास्कोडिगामा का भारत आगमन कब हुआ था?

-- 1498 ई० में 


37. सिख धर्म के संस्थापक कौन माने जाते है?

-- गुरु नानक


38. भारत का स्विट्ज़रलैंड किस राज्य को कहा जाता है? 

-- कश्मीर


39. स्वर्ण मंदिर कहा स्थित है?

-- अमृतसर 


40. वास्कोडिगामा कहा का रहने वाला था?

-- पुर्तगाल 


41. 'लौह पुरुष' किस महापुरुष को कहा जाता है?

-- सरदार बल्लभ भाई पटेल को 


42. सर्वाधिक सीमाओं वाला देश कौन सा है?

-- चीन (China)


43. 'महाभारत' के रचियता कौन है?

-- महर्षि वेदव्यास जी 


44. क्षेत्रफल की दृष्टि से भारत का सबसे बड़ा राज्य कौन सा है?

-- राजस्थान 


45. भारत में सैनिको को दिया जाने वाला सबसे बड़ा सैनिक सम्मान कौन सा है?

-- परमवीर चक्र 


46. ओणम भारत के किस राज्य का प्रसिद्ध त्यौहार है?

-- केरल का 


47. जनसंख्या एवं क्षेत्रफल की दृष्टि से विश्व का सबसे छोटा देश कौन सा है?

-- वेटिकन सिटी 


48. पंजाबी भाषा किस लिपि में लिखी जाती है?

-- गुरुमुखी लिपि में 


49. 'कलाम का सिपाही' किसे कहा जाता है?

-- मुंशी प्रेमचंद को 


50. भारत का सबसे प्रथम विश्वविद्यालय कौन सा है औरu उसकी स्थापना कब हुई?

-- नालंदा विश्वविद्यालय (450 ई० पू.)

०३ ऑक्टोबर २०२४

भारतीय राज्यघटनेची प्रमुख व महत्त्वाची वैशिष्ट्ये – भारतीय राज्यघटनेतील तरतुदींचे महत्त्वाचे स्त्रोत पुढीलप्रमाणे…

भारतीय राज्यघटनेची प्रमुख व महत्त्वाची वैशिष्ट्ये –
महत्वाचे मुद्दे
भारतीय राज्यघटनेची प्रमुख व महत्त्वाची वैशिष्ट्ये –
भारतीय राज्यघटनेतील तरतुदींचे महत्त्वाचे स्त्रोत ....

१) लिखित घटना

भारतीय राज्यघटनेचे स्वरूप लिखित आहे. लिखित घटना एका निश्चित वेळी तयार केली जाते व एका निश्चित तारखेपासून अधिनियमात व अमलात येते.

भारतीय राज्यघटनेचे स्वरूप लिखित आहे मात्र ब्रिटनची राज्यघटना अलिखित स्वरुपाची आहे.

सध्या भारताच्या घटनेत २५ भाग ४६१ कलमे आणि १२ अनुसूची आहेत. अमेरिकेच्या राज्यघटनेची तुलना करावयाचे झाल्यास अमेरिकेच्या घटनेत केवळ ७ कलमे आहेत.

भारतीय घटना विस्तृत का?

भारतीय घटनेमध्ये जगातील विविध देशांच्या घटनांचा अभ्यास करून चांगल्या वैशिष्ट्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये केला असल्यामुळे घटना विस्तृत झाली आहे.

देशाच्या प्रशासनाचे तपशीलवार विवेचन भारतीय राज्यघटनेमध्ये आहे.

केंद्र व राज्याची सामायिक एकच घटना असल्यामुळे घटनेचा विस्तार वाढला आहे.

कलम ३७० कलम ३७१ ते कलम ३७१ (J) मध्ये राज्यांची संबंधित विशेष तरतुदी देण्यात आल्या आहेत.
भारतीय संघराज्य व्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्र-राज्य संबंध तपशीलवार देण्यात आले आहेत.
मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्त्वे मूलभूत कर्तव्य यांचे विस्तृत स्पष्टीकरण घटनेमध्ये भर घालते.
इतर देशांच्या घटनांचा अभ्यास व त्या या देशातील महत्त्वाच्या कलमांचा अंतर्भाव यामुळे भारतीय राज्यघटनेचा आकार वाढला आहे.

२) राज्यघटनेचे विविध स्त्रोत rajyaghatanechi vaishishte

सुमारे ६० देशांच्या घटनांचा विचार करून त्यातील महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश भारतीय घटनेमध्ये करण्यात आलेला आहे.

भारत सरकार कायदा १९३५ नुसार भारतीय राज्यघटनेचा संरचनात्मक आराखडा मांडण्यात आलेला आहे या कायद्यातील सुमारे २५० तरतुदी स्वीकारण्यात आल्या आहेत.

घटनेचा तात्विक भाग म्हणजे मूलभूत हक्क हे अमेरिकेच्या घटनेवरून स्वीकारण्यात आले आहेत तर मार्गदर्शक तत्वे आयरिश घटनेवरून घेण्यात आले आहेत.

घटनेच्या राजकीय भागाचा विचार करता ब्रिटनच्या घटनेवर आधारलेली संसदीय शासन व्यवस्था भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेली आहे.

कॅनडा जर्मनी फ्रान्स जपान दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया रशिया इत्यादी देशांच्या घटनेचा प्रभाव भारतीय राज्यघटने वरती दिसून येतो. याच कारणामुळे भारतीय राज्यघटनेला उसनी घटना(Borrowed Constitution), ठीगळांचे कार्य(patchwork), पश्चिमेचे अनुकरण(slavish imitation of the west), अशा टीका केल्या जातात. मात्र यामध्ये भारतीय परिस्थितीला अनुसरून त्यामध्ये बदल करण्यात आलेले आहे म्हणून हे सुंदर ठिकाणांचे कार्य आहे असे संबोधले जाते.

भारतीय राज्यघटनेतील तरतुदींचे महत्त्वाचे स्त्रोत पुढीलप्रमाणे…

भारत सरकार कायदा १९३५ – भारत सरकारच्या १९३५ च्या कायद्यानुसार संघराज्य व्यवस्था, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपालाचे पद, प्रशासकीय तपशील इत्यादी भाग स्वीकारण्यात आलेला आहे. भारतीय राज्यघटना ही मूलतः भारत सरकार कायदा १९३५ वर आधारित आहे. rajyaghatanechi vaishishte
ब्रिटिश घटना – संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट, द्विगृही संसद, फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम, कायदा करण्याची पद्धत, कायद्याचे राज्य, एकच नागरिकत्व आणि विशेषाधिकार हे ब्रिटिश घटनेवरून स्वीकारण्यात आले आहेत.

अमेरिकेची घटना – मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपती वरील महाभियोग, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पदावरून दूर करण्याची पद्धत याबाबी अमेरिकेच्या घटनेवरून स्वीकारण्यात आलेल्या आहेत.

कॅनडा ची घटना – प्रभावी केंद्र असलेले संघराज्य शेषाधिकार, राज्यपालाची नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकारक्षेत्र या बाबी कॅनडाच्या घटनेवरून स्वीकारण्यात आलेल्या आहेत.
आयरिश घटना – मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपतींची निवडणूक, राज्यसभेतील सदस्यांचे नामनिर्देशन या बाबी आयरिश घटनेवरून स्वीकारण्यात आलेल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाची घटना – समवर्ती सूची, संयुक्त बैठक, व्यापार व वाणिज्य चे स्वातंत्र्य या बाबी ऑस्ट्रेलियाच्या घटनेचा अभ्यास करून स्वीकारण्यात आलेल्या आहेत.
जपानची घटना – कायद्याने प्रस्थापित पद्धत
सोवियत रशिया ची घटना – मूलभूत कर्तव्य, प्रस्ताविकातील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श

वेईमर घटना (जर्मनी) – आणीबाणीच्या कालावधीतील तरतुदी व मूलभूत हक्कांमध्ये होणारा बदल
दक्षिण आफ्रिका – घटना दुरुस्ती ची पद्धत, राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक
फ्रान्सची घटना – गणराज्य, प्रास्ताविकेल स्वातंत्र्य, समता, बंधुता या गोष्टी फ्रान्सच्या घटनेवरून घेण्यात आलेल्या आहेत.

३) संघराज्य व्यवस्था (rajyaghatanechi vaishishte) – भारतीय घटनेने संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे संघराज्य व्यवस्थेची वैशिष्ट्ये आपल्या घटनेमध्ये आढळतात. केंद्र व घटक राज्य सरकारांचे अस्तित्व, अधिकारांची विभागणी, घटनेची स्वच्छता घटनेची ताठरता स्वतंत्र न्याय व्यवस्था द्विगृही कायदे मंडळ इत्यादी.

घटनेमध्ये गैर संघात्मक किंवा एकात्मक वैशिष्ट्ये ही आढळतात. त्यामध्ये प्रभावी केंद्रशासन एकच घटना एकेरी नागरिकत्व घटनेची लवचिकता एकात्मिक न्यायव्यवस्था अखिल भारतीय सेवा.

म्हणूनच भारतीय राज्यघटनेचे वर्णन अर्ध-संघराज्यीय (k.c. व्हेअर), वाटाघाटीचे संघराज्य (मॉरीस जोन्स) सहकारी संघराज्य (ऑस्टिन), केंद्रीकरण्याची प्रवृत्ती असलेले संघराज्य (इवोर जिनिंग)

४) संसदीय शासन पध्दती (rajyaghatanechi vaishishte)

भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार ब्रिटनच्या घटनेवरून केलेला आहे. अध्यक्षीय शासन व्यवस्थेत कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ पूर्णपणे विभक्त असतात मात्र संसदीय शासन व्यवस्थेमध्ये यांच्यामध्ये समन्वय व सहकार्य असते.

संसदीय शासन व्यवस्थेमध्ये मंत्रिमंडळाचे निवड कायदे मंडळाच्या सदस्याकडून केली जाते व मंत्रिमंडळ म्हणजेच कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार असते. राष्ट्रप्रमुख हे नामधारी कार्यकारी प्रमुख असतात तर शासन प्रमुख हे वास्तव कार्यकारी प्रमुख असतात.

भारतीय संसदीय शासन व्यवस्थेची वैशिष्ट्ये
राष्ट्रपती नामधारी प्रमुख पंतप्रधान वास्तव प्रमुख
मंत्री कायदेमंडळाच्या सदस्य असणे.

मंत्रिमंडळाची कायदेमंडळा प्रति जबाबदारी
कनिष्ठ सभागृह चे विसर्जन
बहुमताचे सरकार
या वैशिष्ट्यामुळे संसदीय शासन व्यवस्थेला जबाबदार शासन व्यवस्था किंवा कॅबिनेट शासन व्यवस्था असेही म्हणतात. या व्यवस्थेमध्ये पंतप्रधानांची भूमिका महत्त्वाचे असल्याने पंतप्रधान शासनव्यवस्था असेही म्हटले जाते.

भारतीय संसदीय शासन व्यवस्था व ब्रिटिश संसदीय शासन व्यवस्थेमध्ये मूलभूत फरक आहे ब्रिटिश पार्लमेंट प्रमाणे भारतीय संसद सार्वभौम संस्थां नाही.

भारतीय राज्यसंस्था ही एक गणराज्य आहे व ब्रिटिश राज्यसंस्था ही राजेशाही आहे.

५) ताठर व लवचिक (rajyaghatanechi vaishishte)

भारताची राज्यघटना अति ताठर ही नाही व अति लवचिकही नाही यामुळे ताठरता व लवचिकता याचे एकत्रीकरण भारतीय राज्यघटनेमध्ये दिसून येते. ताठर घटनेची घटना दुरुस्ती पद्धत कठीण असते उलट लवचिक घटनेची घटना दुरुस्ती सोपी असते.

भारतीय राज्यघटनेच्या कलम 368 मध्ये घटना दुरुस्ती ची पद्धती देण्यात आली आहे.

घटनेच्या काही तरतुदींमध्ये बदल करण्यासाठी संसदेच्या विशेष बहुमताची आवश्यकता असते.

घटनेतील संघराज्याची वैशिष्ट्ये यामध्ये बदल करण्यासाठी वरीलप्रमाणे विशेष बहुमता बरोबरच निम्म्या राज्यांचे समर्थन आवश्यक असते.

या पद्धतीने घटना दुरुस्ती करणे अवघड असल्याने घटना ताठर मानली जाते. मात्र घटनेच्या काही तरतुदी मध्ये केवळ साध्या बहुमताने बदल करता येतो याबाबतीत घटना लवचिक आहेत.

६) संसदीय सार्वभौमत्व व न्यायिक सर्वोच्चता याचे संतुलन (rajyaghatanechi vaishishte) – भारतीय राज्यघटनेत कायदे मंडळ व न्याय मंडळ यांच्यामध्ये अधिकाराबाबत योग्य संतुलन राखण्यात आले आहे. संसदेला कायदा व घटना दुरुस्ती करण्याचे अधिकार आहेत आणि संसदेने केलेले कायदे घटनादुरुस्त्या घटनात्मक आहेत किंवा नाहीत हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयांना आहे. यात न्यायालयांना सर्वोच्चता आहे. म्हणजेच भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही आणि सर्वोच्च न्यायालय सुद्धा सर्वोच्च नाही तर दोघांच्या अधिकारांमध्ये संतुलन निर्माण करण्यात आलेले आहे. केशवानंद भारती खटला 1973 नुसार असे संतुलन निर्धारित करण्यात आले.

७) स्वतंत्र व एकात्मिक न्यायव्यवस्था – (rajyaghatanechi vaishishte)

भारताच्या घटनेने कायदेमंडळ कार्यकारी मंडळ यांच्याबाबतीत संघराज्य व्यवस्था निर्माण केलेली आहे मात्र न्याय व्यवस्था एकात्मिक ठेवण्यात आली आहे. एकात्मिक न्यायव्यवस्थेत सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय अशी क्रमबद्ध शृंखला आहे. भारताच्या घटनेने सर्वोच्च न्यायालयाला संघराज्य न्यायालय, अपीलाचे न्यायालय, मूलभूत हक्काचा हमीदाता, घटनेचा संरक्षक बनवले आहे.

८) मूलभूत हक्क –

लोकशाहीमध्ये नागरिकांना समान हक्क प्राप्त होतात. नागरी जीवनासाठी हे मूलभूत हक्क असतात.भारताच्या घटनेने असे हक्क उपलब्ध करून दिले आहेत. मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट असल्याने ते प्राप्त करून घेता येतात. हे हक्क नागरिकांना शासन संस्थे विरुद्ध उपलब्ध आहेत. मूलभूत हक्क मुळे देशात राजकीय लोकशाहीच्या संकल्पनेची पूर्तता करण्याचे कार्य करतात. असे मूलभूत हक्क व मर्यादित नसून त्यावर बंधने आहेत.

९) राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्त्वे (rajyaghatanechi vaishishte) –

मार्गदर्शक तत्वे भारतीय घटनेचे एक वैशिष्ट्य आहे.ही तत्वे कल्याणकारी राज्याची निर्मिती करून लोकांना सामाजिक व आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी समाविष्ट करण्यात आलेली आहेत. मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत मात्र देशाच्या प्रशासनात सरकारला मार्गदर्शक आहेत. घटनेच्या प्रारंभा नंतर मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे यापैकी वरचढ कोण असा प्रश्न निर्माण झाला. यावेळी मिनर्वा मिल खटला १९८० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिला की भारतीय घटनेतील मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे संतुलनाच्या आधार शिलेवर आधारलेली आहेत.

१०) मूलभूत कर्तव्य – (rajyaghatanechi vaishishte)

स्वर्ण सिंह समितीच्या शिफारशीनुसार ४२ वी घटनादुरुस्ती १९७६ मध्ये मूलभूत कर्तव्य कलम ५१ अ मध्ये अंतर्भूत करण्यात आली. यात दहा मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली. २००२ मध्ये ८६ व्या घटनादुरुस्तीने अकरावे कर्तव्य अंतर्भूत करण्यात आले.

११) आणीबाणी विषयक तरतुदी (rajyaghatanechi vaishishte)-

घटनाकर्त्यांनी कारभार चालवणे अवघड असण्याच्या स्थितीची कल्पना करून आणीबाणीची तरतूद केली. अशा कारभाराच्या स्थितीमध्ये देशाची राजकीय लोकशाही व्यवस्था व घटना यांचे संरक्षण करता यावे यासाठी आणीबाणीच्या तरतुदी दिलेल्या आहेत.

घटनेमध्ये तीन प्रकारच्या आणीबाणीची तरतूद आहे

३५२ कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव या कारणावरून पुकारले जाते.
३५६ कलमा अंतर्गत घटक राज्यातील आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट स्पष्ट करण्यात आलेली आहे.
३६० कलमानुसार भारताच्या वित्तीय स्थैर्य किंवा पत धोका निर्माण झाल्यास अशी आणीबाणी पुकारता येते.
१२) एकेरी नागरिकत्व –

संघराज्य शासन व्यवस्थेत दुहेरी नागरिकत्व दिले जाते. त्यामुळे नागरिकांना राज्य सरकारचे व केंद्र सरकारचे असे दोन प्रकारचे हक्क प्राप्त होतात.भारतीय जनतेला मात्र भारतीय घटनेने एकच नागरिकत्व बहाल केलेले आहे. देशातील प्रादेशिक भिन्नता कमी करून नागरिकांमध्ये राष्ट्रवादाची एकच भावना वाढीस लावणे हा उद्देश एकेरी नागरिकत्व मागे आहे.

१३) सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धत –

भारतीय लोकशाही एक व्यक्ती एक मत या तत्वावर चालते. कलम ३२६ मध्ये सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या व्यवस्थेची तरतूद आहे. भारतीय घटनेत सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या पद्धती द्वारे राजकीय समानता प्रस्थापित करते.

१४) धर्मनिरपेक्ष राज्य (rajyaghatanechi vaishishte) –

भारतीय राज्यघटनेने धर्मनिरपेक्ष राज्याची निर्मिती केली आहे. प्रस्ताविका व्यतिरिक्त कोठेही धर्मनिरपेक्ष शब्द आढळत नाही. मात्र घटनेतील विविध तरतुदी वरून धर्मनिरपेक्षता दिसून येते.भारतात सकारात्मक धर्मनिरपेक्षता स्वीकारण्यात आलेली आहे. यामध्ये राज्य कोणत्याही धर्माचा पुरस्कार करणार नाही मात्र सर्व धर्मांना समान वागणूक दिली जाते.

१७ सप्टेंबर २०२४

जगाच्या भुगोलाबद्दल थोडी माहिती

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो.


➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.

➡️ भारताचे स्थान आशिया खंडात दक्षिणेस आहे, दक्षिण आशिया खंडात भारत हा देश उत्तर गोलार्धात येतो.

➡️ क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या बाबतीत व्हॅटिकन सिटी हा देश जगात सर्वात लहान आहे.

➡️ इंदिरा पॉइंट हा भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे.

➡️ पाल्कची सामुद्रधुनी व मन्नारचे आखात यामुळे श्रीलंका हे बेट भारतीय भूमीपासून वेगळे झाले आहे.

➡️ जगात सर्वात जास्त भूकंप आणि जपान या देशांमध्ये होतात, तर भारतामध्ये सर्वात जास्त भूकंप आसाम राज्यात होतात.

➡️ भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी अंदमान बेटें वरील बॅरन बेट येथे आहे.

➡️ भारताची दक्षिण उत्तर लांबी 3214 किलो मीटर एवढी आहे तर पूर्व पश्चिम लांबी 2933 किलो मीटर एवढी आहे.



➡️ भारतातील 8 राज्यांतून कर्कवृत्त जाते ⬅️

    क्लुप्ती - मित्र माझा राघू छाप

   मि - मिझोराम
   त्र - त्रिपुरा
   म - मध्य प्रदेश
  झा - झारखंड
   रा - राजस्थान
   गु - गुजरात
  छा - छत्तीसगड
  प - पश्चिम बंगाल.

___________________________

०२ सप्टेंबर २०२४

खिलजी_वंश



1. जलालुद्दीन फिरोज खिलजी के शासन का समय रहा है ?

►-(1290-96) जलालुद्दीन फिरोज खिलजी


2. जलालुद्दीन फिरोज खिलजी दिल्ली की गद्दी पर कब बैठा ?

►-1290 ई.


3. सुल्तान बनने से पहले जलालुद्दीन क्या था ?

►-बुलंदशहर का इफ्तादार


4. नवीन मुसलमान किसे कहा गया ?

►-दिल्ली में बसने वाले मंगोलों को ।


5. किसने जलालुद्दीन फिरोज खिलजी की हत्या कर दिल्ली की गद्दी हासिल की 

►-अलाउद्दीन खिलजी (1296 ई. में)


6. अलाउद्दीन खिलजी के शासन का समय रहा है ?

►-(1296-1316 ई.) अलाउद्दीन खिलजी


7. जलालुउद्दीन खिलजी के शासन में अलाउद्दीन क्या था ?

►-कड़ा-मानिकपुर का सुबेदार


8. उसने देवगिरी पर कब आक्रमण किया ?

►-1296 ई.


9. सिकंदर-ए-सानी की उपाधि किसने ग्रहण की ?

►-अलाउद्दीन


10. अलाउद्दीन के समय किसने दिल्ली में विद्रोह किया था ?

►-हाजियों ने ।


11. हाजियों के विद्रोह को किसने खत्म किया ?

►-हमीदुद्दीन


12.अलाउद्दीन ने कौन-सा सिद्धांत चलाया था ?

►-दैवी अधिकार


13. अलाउद्दीन खिलजी ने सेना में कौन-सी प्रथा शुरू की ?

►-हुलिया रखने की प्रथा ।


14. खिलजी वंश में घोड़ों को दागने की पद्धति किसने शुरू की ?

►-अलाउद्दीन खिलजी ।


15. भू-राजस्व व्यवस्था को अधिक प्रभावी बनाने के लिए अलाउद्दीन खिलजी ने किसकी स्थापना की ?

►-दीवान-ए-मुस्तखराज


16. अलाउद्दीन का प्रसिद्ध सेनापति कौन था जिसने दक्षिण भारत अभियान का नेतृत्व किया था ?

►-मलिक काफूर


17. अलाउद्दीन के दरबारी कवि कौन थे ?

►-अमीर खुसरो


18. सितार एवं तबले के अविष्कार का श्रेय किन्हें जाता है ?

►-अमीर खुसरो


19. इब्नबतूता की पुस्तक रेहला में किस शासक की घटनाओं का वर्णन है ?

►-मुहम्मद तुगलक


20. अलाउद्दीन की मृत्यु के बाद दिल्ली का सुल्तान कौन बना ?

►-कुतुबुद्दीन मुबारक । इसने खलीफा की उपाधि ग्रहण की ।

२८ जून २०२४

polity questions for mpsc exam practice

1.भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागण्याचा किंवा विचार-विनिमय करण्याचा अधिकार आहे?

A) कलम 124 B) कलम 130 C) कलम 143 D) कलम 147

उत्तर – कलम 143


2. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्र संबंधी योग्य विधाने ओळखा.

अ) संसद न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात केवळ वाढ करू शकते मात्र घट घडवू शकत नाही.

ब) भारताचे सर्वोच्च न्यायालय अमेरिकन न्यायालयात प्रमाणे फेडरल कोर्ट म्हणून कार्य करते.

क) ब्रिटिश न्यायालयाचा प्रमाणे अपिलाचे अंतिम न्यायालयाचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहेत.

A) अ आणि ब

B) अ आणि क

C) अ ब आणि क

D) ब आणि क

उत्तर – अ, ब आणि क


3. खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयांचे कार्य स्थान त्यांच्या राजधानीच्या शहरात नाही?

अ) उत्तर प्रदेश ब) मध्य प्रदेश

क) छत्तीसगड ड) सिक्किम

A) अ आणि ब

B) क आणि ड

C) अ,ब आणि क

D) अ ब आणि ड

उत्तर – अ ब आणि क


४.भारतीय राज्यघटनेच्या ह्या कलमानुसार दोन किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त उच्च न्यायालय स्थापन करण्याची तरतूद केलेली आहे.

A) कलम 214 B) कलम 226 C) कलम 230 D)कलम 231

उत्तर – कलम 231


५. गावातील अनुभवी ज्येष्ठांकडून तक्रार निवारणाच्या भारतातील पारंपरिक व्यवस्थेची सुधारित व गांधीवादी तत्त्वावर आधारित व्यवस्था म्हणजे काय?

A) लोकायुक्त B) लोक अदालत

C) लोकपाल D) कौटुंबिक न्यायालय

उत्तर – लोकअदालत


६. राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात योग्य पर्याय निवडा.

अ)कॅबिनेट ने केवळ लेखी स्वरुपात शिफारस केल्यानंतरच राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात.

ब) अशी तरतूद घटनेत 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आली.

A) फक्त अ

B) फक्त ब

C) अ,ब

D) वरीलपैकी एकही नाही

उत्तर – फक्त अ


७. उच्च न्यायालयाच्या त्या खालच्या न्यायालया वरील प्रशासकीय नियंत्रणात कोणत्या बाबीचा समावेश होत नाही?

A) नेमणुका

B) निवृत्ती वेतन

C) बदली

D) सक्तीची निवृत्ती

उत्तर – निवृत्तीवेतन


८.73 व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायती संस्थांच्या रचनेबद्दल च्या कोणत्या तरतुदी राज्यसरकार साठी  ऐच्छिक आहेत?

अ) दोन-तीन स्तरीय रचना ब) निश्चित कार्यकाळ

क) ग्रामसभेची भूमिका व व्याप्ती ड) जिल्हा नियोजन समिती

A) क आणि ड

B) अ आणि ब

C) ब आणि ड

D) अ आणि क

उत्तर – क आणि ड


९.केंद्रीय निवडणूक आयोगा संबंधित अयोग्य विधान ओळखा.

अ) याला अखिल भारतीय स्वरूप आहे

ब)देशात मुक्त व न्याय निवडणुका घेणे हेतू आहे.

क) राष्ट्रपती किंवा राज्यपाल आयोगास त्यांच्या मागणीनुसार स्टाफ उपलब्ध करून देते.

ड)राज्यपाल आयोगास मदत करण्यासाठी प्रादेशिक आयुक्त नेमू शकतात.

पर्यायी उत्तरे

A) अ , ब

B) ड

C) अ

D) अ ब क ड

उत्तर – ड


१०. मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवते?

A) राज्यपाल  B) संसद  C) विधिमंडळ  D) राज्यपालांच्या सल्ल्याने राष्ट्रपती

उत्तर – विधिमंडळ


११. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आली आहे?

A) कलम 165 B) कलम 166 C) कलम 164 D) कलम 76

उत्तर – कलम 165


१२.भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या भागात उच्च न्यायालय व कनिष्ठ न्यायव्यवस्था यांच्या संदर्भात तरतुदी देण्यात आलेल्या आहेत?

A) भाग 4 B) भाग 5 C) भाग 6 D) भाग 7

उत्तर – भाग 6


१३.न्यायालयीन पुनर्विलोकन बाबत पुढील विधाने विचारात घ्या.

अ)केवळ संसदीय व राज्य विधिमंडळाचे कायदे नव्हे तर शासकीय कार्यकारी आदेशाची ही तपासणी करणे न्यायिक पुनर्विलोकन याच्या साह्याने शक्य आहे.

ब)राज्यघटनेच्या तत्वांचे चुकीच्या कायद्यापासून संरक्षण करणे हे न्यायालयीन पुनर्विलोकनाचे उद्दिष्ट आहे.

A) फक्त अ बरोबर

B) फक्त ब बरोबर

C) दोन्ही बरोबर

D) दोन्ही चूक

उत्तर – दोन्ही बरोबर


१४. खालील विधाने विचारात घ्या.

अ) राज्य विधिमंडळाचे कायदे केवळ राज्याच्या परिक्षेत्रा साठीच लागू असतात

ब) संसदेचे कायदे भारतीय नागरिकांच्या परदेशातील संपत्तीला लागू असतात वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?

A) फक्त अ

B) फक्त ब

C) अ आणि ब

D) वरीलपैकी नाही

उत्तर – अ आणि ब


१५.आदिवासी क्षेत्रांना संसदीय कायदा लागू होणार नाही असे निर्देश देण्याचे अधिकार अनुक्रमे कोणाला आहेत?

A) राष्ट्रपती, राज्यपाल

B) राज्यपाल, राष्ट्रपती

C) केवळ राज्यपाल

D) पंतप्रधान, राष्ट्रपती

उत्तर – राज्यपाल राष्ट्रपती


१६. भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या परिशिष्टात केंद्र व राज्यांच्या कायदेविषयक विषयांची विभागणी दिलेली आहे?

A) परिशिष्ट 4 B) परिशिष्ट 2

C) परिशिष्ट 7 D) परिशिष्ट 8

उत्तर – परिशिष्ट 7


17. शेषाधिकार संबंधित खालील विधाने विचारात घ्या.

अ) भारतीय घटनेत शेषाधिकार याची तरतूद ऑस्ट्रेलियन घटनेवरून घेतली आहे.

ब) भारतात असे शेषाधिकार यांचे अधिकार संसदेस आहेत.

क)  स्वित्झर्लंड मध्ये शेषाधिकार केंद्राकडे आहेत.

ड) स्पेनमध्ये शेषाधिकार केंद्र व राज्य दोघांकडेही आहेत.

A) वरील सर्व योग्य

B) केवळ ब योग्य

C) ब आणि ड योग्य

D) ब आणि क योग्य

उत्तर ब आणि ड योग्य


18. भारतीय निवडणूक आयोगामार्फत खालीलपैकी कोणत्या निवडणुका घेतल्या जातात?

अ) भारताचा राष्ट्रपती ब) भारताचे उपराष्ट्रपती

क) संसद ड) राज्यविधी मंडळ

इ) नगरपालिका

A) अ,ब,क, इ

B) ब,क,ड

C) अ,क,ड

D) अ,ब,क,ड

उत्तर – अ, ब,क,ड


१९.भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार निवडणूक विषयक बाबींमध्ये न्यायालयांना हस्तक्षेपास मनाई आहे?

A) कलम 326 B) कलम 328

C) कलम 329 D) कलम 330

उत्तर – कलम 329


२०. संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष तसेच सदस्यांच्या सेवाशर्ती ठरवण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत?

A) संघ लोकसेवा आयोग B) संसद

C) राष्ट्रपती D) वरीलपैकी नाही

उत्तर – राष्ट्रपती


२१. राज्य लोकसेवा आयोग आपला वार्षिक अहवाल कोणास सादर करतो?

A) संबंधित राज्याचे राज्यपाल

B) संबंधित राज्याचे विधिमंडळ

C) संबंधित राज्याचे मुख्यमंत्री

D) संबंधित राज्याचे विधिमंडळ अध्यक्ष

उत्तर – संबंधित राज्याचे राज्यपाल


२२. राज्याच्या कार्यकारी विभागात कोणाचा समावेश होतो?

अ) राज्यपाल ब) मुख्यमंत्री मंत्रिमंडळ

क) महाधिवक्ता ड) विधानसभा अध्यक्ष


A) अ आणि ब

B) ब आणि क

C) अ, ब, आणि क

D) अ,ब,क,ड

उत्तर – D. अबकड


२३. भारतीय संविधानाने राज्यपालाची नियुक्ती विषयी ची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारले आहे?

A) अमेरिका B) ब्रिटन

C) कॅनडा D) ऑस्ट्रेलिया

उत्तर – कॅनडा


२४.कोणत्या घटना दुरुस्तीने दोन किंवा अधिक राज्यांना एकच व्यक्ती राज्यपाल म्हणून नियुक्त करण्याची तरतूद संविधानात केली?

A) चौथी घटनादुरुस्ती

B) सहावी घटनादुरुस्ती

C) सातवी घटना दुरुस्ती

D) आठवी घटनादुरुस्ती

उत्तर 7 वी घटना दुरुस्ती


२५. 73 व्या घटनादुरुस्तीने कायद्यातील कोणत्या कलमाला मूर्त स्वरूप दिले?

A) कलम 19

B) कलम 40

C) कलम 45

D) कलम 21

उत्तर – कलम 40


२६. पंचायत समिती सभापती स्वतःचा राजीनामा कोणाकडे सादर करतात?

A) विभागीय आयुक्त

B) जिल्हाधिकारी

C) पंचायत समितीचा उपसभापती

D) जिल्हा परिषदेचा अध्यक्ष

उत्तर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष


२७. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था महिलांना 50 टक्के आरक्षण कधी मिळाले?

A) 2000

B) 2005

C) 2007

D)2011

उत्तर – 2011


28. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला?

A) अशोक राव मेहता समिती

B) एल एम सिंघवी समिती

C) दिनेश गोस्वामी समिती

D) ताखत्मल जैन समिती

उत्तर एम सिंघवी समिती

२६ जून २०२४

1857 च्या उठावानंतरचा काळ:


भारताचा पहिला व्हॉईसरॉय लॉर्ड कॅनिंग झाला.
राणी एलिझाबेथच्या काळात स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीची 1857 साली राणी व्हिक्टोरियाच्या कारकिर्दीत इतिश्री (शेवट) झाला.
इ.स. 1860 मध्ये भारतीय संस्थानिकांना कॅनिंगने सनदा दिल्या.
इ.स. 1861 साली प्रत्येक प्रांतात पोलिस खाते निर्माण करून त्यावर इंस्पेक्टर जनरल यापदाची निर्मिती करण्यात आली.
1837 साली लॉर्ड मेकॉलेने तर केलेल्या ‘इंडियन पिनल कोड’ ला 1860 मध्ये मान्यता देण्यात आली.
इ.स. 1861 मध्ये ‘इंडियन हायकोर्ट अॅक्ट’ पारीत केला गेला व त्यान्वये मुंबई, चेन्नई व कोलकात्ता या शहरात उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

चार्लस वुड’ ने सुचविलेल्या सुचनेनुसार लॉर्ड कॅनिंगने प्रत्येक प्रांतात शिक्षणखाते सुरू केले. तसेच मुंबई, चेन्नई व कोलकात्ता येथे विद्यापीठे स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले.
इ.स. 1859 साली शेतकर्‍याविषयीचा ‘बंगाल रेंट अॅक्ट’ कॅनिंगच्या काळात करण्यात आला.
इ.स. 1860 मध्ये झालेल्या कृषक आंदोलनाच्या मूळ कारणांचे वर्णन ‘निल दर्पण’ या नाटकात केले. त्याचे इंग्रजी भाषांतर बंगालचा लेफ्टनंट ग्रांट याने केले.
लॉर्ड कॅनिंगची कारर्किर्द 1862 ला पूर्ण झाली. राणीने त्यास ‘अर्ल’ हा किताब बहाल केला.
इ.स. 1866-67 मध्ये ओरिसात दुष्काळ पडला होता त्याचे निर्मूलन करण्यासाठी ‘फॅमिना कमीशन’ ची नियुक्ती सर जॉन लॉरेन्स याने केली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

व्हाईसरॉय लॉर्ड मेयोने भारतात पहिल्यांदा आर्थिक विकेंद्रीकरणाची सुरुवात केली.
14 डिसेंबर 1870 रोजी एक ठराव पास करून त्यानुसार वित्तविकेंद्रीकरणाची योजना निश्चित करण्यात आली. या ठरावास ‘प्रांतीय स्वायत्तेची सनद’ असे मानण्यात येते.
लॉर्ड मेयोच्या काळात इ.स. 1872 मध्ये शिरगणतीचे (जणगणना) कार्य सुरू झाले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

 हंटर आयोग (भारतीय शिक्षण आयोग)

 ◾️ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे अध्यक्ष सर चार्ल्स वुड यांच्या सांगण्यावरून कंपनीने
प्राथमिक शिक्षणाची प्रगती  1854 ते 1882 या कालखंडात अपेक्षेप्रमाणे न झाल्याने भारत सरकारने विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली १८८२ मध्ये एक आयोग स्थापन केला.

◾️वुडच्या खलित्यातील तत्त्वांप्रमाणे शिक्षणाचा विकास होत आहे की नाही, याचा व विशेषत: प्राथमिक शिक्षणाच्या विकासाचा अभ्यास करावयास या  आयोगाला सांगण्यात आले होते.

◾️ या आयोगाने प्राथमिक शिक्षणविषयक धोरण, कायदे आणि व्यवस्थापन, स्थानिक शाळांना प्रोत्साहन, शालेय व्यवस्थापन, शिक्षकांचे प्रशिक्षण आणि प्राथमिक शिक्षणाची अर्थव्यवस्था यांविषयी शिफारशी केल्या.

◾️ प्राथमिक शिक्षण हे लोकांचे शिक्षण आहे हे जाणून शक्य तेथे स्थानिक भाषेत शिक्षण द्यावे, प्राथमिक शिक्षणाला अधिक अर्थपुरवठा व्हावा, शासनात नोकरी देताना त्या व्यक्तीस लिहिता, वाचता येते की नाही हे पहावे मागास जिल्ह्यांत, विशेषत: आदिवासींच्या भागात, प्राथमिक शिक्षण पोहोचते की नाही हे पहावे.

◾️तसेच इंग्लंडमधील 1870 आणि 1876 च्या प्राथमिक शिक्षण कायद्यांप्रमाणे भारतातही कायदा करावा, प्राथमिक शिक्षणाचा कारभार जिल्हा किंवा नगरपरिषदांच्या मंडळांकडे सोपवावा, स्थानिक शाळांना प्रोत्साहन द्यावे, प्राथमिक शाळांतील अध्यापन आणि व्यवस्थापन स्थानिक परिस्थितीशी मिळतेजुळते असावे.

◾️ या आयोगासमोर महात्मा फुले, पंडीता रमाबाई यांनी साक्ष दिली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

२० जून २०२४

भारतातील महाजनपदे

Mpsc History

भारतातील महाजनपदे:

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

संघटीत राज्यव्यवस्थेचा उद्य :

आर्य लोकांनी भारतात टोळ्यांच्या रूपांने प्रवेश केला. कालांतराने त्यांच्या संघर्ष सुरू झाला. प्रराक्रमी टोळ्यांच्या नेत्यांनी राज्यव्यवस्था निर्माण केली. ही राज्ये जनपदे आणि महाजनपदे म्हणून ओळखली जात असे.

भारतीय वेद, पुराण, रामायण, महाभारत जैन आणि बौद्ध ग्रंथाच्या अभ्यासावरून इसवी सन पूर्व सहाव्या शतकात भारतात अंग (उत्तर बिहार), मगध (दक्षिण बिहार), कोसी (बनारस), कोसल (आयोध्या), विदेह (उत्तर बिहार), मल्य (गोरखपूर), चेंदी (बुंदेलखंड), वस्त (अलाहाबाद), कुरू (दिल्ली व मीरत), पांचाल (बरेली), मस्त्य (जयपूर), अश्मक (गोदावरीचा भाग), अवंती (माळवा), गांधार (अफगाणिस्थान), सुरसेन (मथुरा), कुंभोज (दक्षिण पश्चिम क्षेत्र) असे एकूण सोळा महाजनपदे होती असा उल्लेख मिळतो.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

महाजपदकालीन राज्यव्यवस्था :

महाजनपदकालीन राज्य व्यवस्था ही राजेशाही पद्धतीची होती. राज्यकारभाराच्या प्रक्रियेत राजा हा सर्वात वरच्या स्थानी असला तरी, बहुतांशी निर्णय खालील संस्थांमार्फत घेतले जात असे.

गणपरिषद – ही राज्यातील ज्येष्ठ लोकांची परिषद असे. राज्यातील सर्वोच्च अधिकार व राज्यकारभाराचे अधिकार गणपरिषदेकडे असे.

कार्यकारी मंडळ – राज्याचा दैनंदिन कारभार चालविण्याकरिता कार्यकारी मंडळ असे.
सभासद कार्यकारी मंडळामध्ये प्रस्ताव मांडीत आणि त्यावर बहुमताने निर्णय घेतला जात असे.


❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

पराक्रमी राज्ये :

कालांतराने गणपरिषदेचे महत्व कमी होवून राजेशाहीला महत्व प्राप्त झाले.
या राजेलोकांच्या विस्तारवादी धोरणामुळे काही महाजनपदे विशेष प्रसिद्धीला आली. त्यामध्ये कोसल, वत्स, अवंती आणि मगध विशेष नावारूपास आली.
कोशल – हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तरप्रदेश यामधील भाग म्हणजे कोसल होय.
साकेत ही या राज्याची राजधानी होती.

कोसलचा राजा प्रसेनजित हा गौतम बुद्धाच्या समकालीन होता. या राजाचा मगध साम्राज्याचे पराभव करून कोसल आपल्या राज्यात समाविष्ट केले.
वत्स – अलाहाबाद जवळील प्रदेश हा वत्स राज्याची राजधानी कौशांबी म्हणून ओळखला जात असे. हे शहर त्या काळात तलम रेशमी कापडाकरिता जगप्रसिद्ध होते.

अवंती – आजचे उज्जैन शहर हे अवंतीची राजधानी होती. हे शहर त्या काळात व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्धीला आले होते.
मगध – गंगा व शोण नदीच्या खोर्‍यातील परीसरात मगध राज्य पसरले होते.

बिहारमधील राजगृह हे या राज्याची राजधानी होती. या ठिकाणी होवून गेलेल्या पराक्रमी राजे लोकांनी मगध साम्राज्य नावारूपास आणले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

बिंबिसार :

बिंबिसार हा मगध राज्याचा पहिला पराक्रमी राजा होवून गेला.
त्याने आपल्या विस्तारवादी धोरणामुळे काशी, अंग, मंद्र, अवंती आणि कोसल राजांचा पराभव करून ती राज्ये मगध साम्राज्यात सामील केली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

अजातशत्रू :

हा राजा गौतम बुद्धाच्या समकालीन, असून त्याने अनेक गणराज्य आपल्या साम्राज्यात सामील करून घेतली.
या राजाने जैन व बौद्ध धर्माला राजाश्रय दिला.
पहिली धर्मपरिषद अजातशत्रूने राजगृह येथे बोलाविली होती.

शिशुनाग :

या राजाने उत्तर भारतातील सर्व गणराज्ये एकत्र करून समर्थशाली मगध साम्राज्य निर्माण केले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

नंद राजे (इसवी सनपर्व 364 ते 324) :

या काळात मगध राज्यात पराक्रमी नंद घराने नावारूपास आले. या घराण्यातील राजे लोकांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार तक्षशिला ते हिमालय आणि कर्नाटक पर्यंत केला होता.

या काळात मगध साम्राज्य प्राचीन भारताच्या इतिहासातील पहिले साम्राज्य म्हणून ओळखले जाते.
या घराण्यातील शेवटचा राजा म्हणजे धनानंद होय.
नंद राजांच्या काळातच भारतात परकीयांनी आक्रमण करण्यास सुरुवात केली होती.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

परकीय आक्रमणे :

भारतातील संपत्तीचे वर्णन ऐकूण बर्‍याच परकीय राजांनी भारतावर आक्रमण केले आणि भारतातील संपत्ती लुटून नेली.

प्राचीन काळापासून संपत्तीच्या परकीय राजांनी भारतावर आक्रमण केले आहे.

भारतात पहीले परकीय आक्रमण मगध साम्राज्याच्या उदयाच्या काळात झाले.

इराणचा राजा डार्युश राजाचे आक्रमण :

मगध साम्राज्याच्या उदयाच्या काळात इराणचा सम्राट दार्युश ने वायव्यकडील गांधार व सिंध प्रांतावर आक्रमण करून ते प्रदेश जिंकले.

भारतावर आक्रमण करणारा तो पहिला परकीय होता.
या घटनेमुळे भारत व इराण यांच्यात राजनेतिक संबंध प्रस्तापित होवून व्यापर व कलेच्या क्षेत्रात देवाण घेवाण सुरू झाली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

अलेक्झांडर उर्फ सिकंदरचे आक्रमण (इसवीसन पूर्व 326) :

ग्रीक राजा सिकंदरने इराणच्या राजाचा पराभव केला. त्यानंतर त्याने भारतावर आक्रमण केले.
सिकंदरने सिंधु नदी ओलांडून गांधार प्रांतात प्रवेश केला. त्यांच्या सेनेने रावी नदीच्या तीरावर असलेल्या पुरू राजाचा पराभव केला.

मगध पर्यत मात्र तो येवू शकला नाही.
भारतातून माघारी जात असतांना इसवी सन पूर्व 323 मध्ये बॉबिलान येथे मरण पावला.
सिकंदरच्या स्वारीमुळे भारत व ग्रीक यांच्या राजनैतिक संबंध प्रस्तापित झाले.

ग्रीकांच्या शिल्पकलेचा भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडून त्यामधून गांधार शिल्पकला शैली उदयास आली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...