mpsc लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
mpsc लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२३ मार्च २०२५

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 साठी कोणता optional विषय घ्यावा?


1) एखाद्या विषयाची आवड असेल तर तो विषय घेऊ शकता (उदा. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र) 


2) कोणत्या माध्यमातून परीक्षा देणार : मराठी / English : उपलब्ध संदर्भ साहित्य


3) syllabus : इतर विषयांच्या तुलनेने कमी असलेला विषय / खूपच किचकट संकल्पना नसलेला विषय 



मराठी माध्यमातून मुख्य परीक्षा देणार असाल तर खालील विषयांसाठी चांगले संदर्भ / पुस्तके मिळू शकतात. 


1) इतिहास :  syllabus खूप जास्त

upsc तील trend - इतर विषयांच्या तुलनेत कमी मार्क्स मिळतात.  पण मराठीतून भरपूर संदर्भ पुस्तके उपलब्ध.


2) भूगोल : objective साठी वाचलेल्या बऱ्याच गोष्टी Descriptive मध्ये फायदेशीर ठरू शकतात. बरेच सिद्धांत, भौगोलिक संकल्पना खूप detail मध्ये कराव्या लागतील. 

Mapping वर प्रश्न असतात. 


3) राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध (PSIR) : core polity सगळ्यांचं वाचून झालेलं असतं, बऱ्याच गोष्टी / facts तोंडपाठ असतात. याचा फायदा राज्यशास्त्रात होऊ शकतो. इथे extra फक्त आंतरराष्ट्रीय संबंध हा घटक करायचा आहे. पण सर्व गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाहीत. Thinkers हा घटक बऱ्याच विषयात थोडयाफार प्रमाणात आहे. संकल्पना, कारणे, परिणाम या मुद्द्यांवर लक्ष द्यावे लागेल (इतर विषयांमध्ये सुद्धा) 


4) लोकप्रशासन (Pub Ad) : या विषयाचा अभ्यासक्रम आत्ताच्या objective mains मधील Polity Part 2 शी मिळताजुळता आहे. पण इथे facts पेक्षा Concepts वर जास्त focus पाहिजे. Syllabus इतर विषयांपेक्षा बऱ्यापैकी कमी आहे. 

प्रशासनाशी संबंधित विषय आहे. बऱ्याच गोष्टी आपण polity, पंचायतराज मध्ये वाचलेल्या असतात. 


5) समाजशास्त्र (Sociology) : 

  मराठीतून बरेच संदर्भ उपलब्ध आहेत. Syllabus देखील खूप जास्त नाही. काही thinkers / किचकट सिद्धांत, संकल्पना सोडल्या तर दैनंदिन /सामाजिक जीवनावरील घडामोडिंवर आधारित विषय आहे. 



वरील सर्वच विषयांसाठी मराठी मध्ये पुस्तकं उपलब्ध आहेत. मराठी माध्यमातून अभ्यास करणाऱ्यांसाठी वरील optional विषय चांगले आहेत. तुमच्या आवडीनुसार आणि इतर घटकांचा विचार करून optional विषय निवडू शकता. 


Descriptive मुख्य परीक्षेसाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे Writing practice.

तुम्ही कितीही वाचन केलात, पाठांतर केलात पण writing जमत नसेल तर मार्क्स मिळणार नाहीत. 

इतर काही विषय : मराठी साहित्य, अर्थशास्त्र, विधी, व्यवस्थापन 


पूर्व परीक्षेचा अर्ज भरतेवेळेस Optional विषय कोणता घेणार हे अर्जात नमूद करावे लागेल.


१३ फेब्रुवारी २०२५

थोडक्यात महत्वाचे भारतीय जनक.....

भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक ➖ डॉ. विक्रम साराभाई

भारतीय क्षेपणास्त्राचे जनक  ➖ डॉ. APJ अब्दुल कलाम

भारतीय महासंगणकाचे जनक ➖ विजय भटकर

भारतीय अनुविज्ञानाचे जनक ➖ डॉ.लो होमी भाभा

भारतीय हरितक्रांतीचे जनक ➖ डॉ. M.S. स्वामीनाथन

भारतीय उद्योगाचे जनक ➖ जमशेदजी टाटा

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक ➖ दादासाहेब फाळके

आधुनिक भारताचे जनक ➖ राजा राममोहन रॉय

भारतीय असंतोषाचे जनक ➖ लोकमान्य टिळक

भारतीय राष्ट्रवादाचे जनक ➖ सुरेंद्रनाथ बॅनर्जी

भारतीय अर्थशास्त्राचे जनक ➖ दादाभाई नौरोजी

भारतीय ग्रंथालयाचे जनक ➖ S.R. रंगनाथन

आधुनिक भारताचे शिल्पकार ➖ पंडीत नेहरू

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ➖डॉ. B. R. आंबेडकर

पाणी पंचायतीचे जनक ➖ विलासराव साळुंखे

भूदान चळवळीचे जनक ➖ विनोबा भावे

पंचायतराज पद्धतीचा जनक ➖ बलवंतराय मेहता

भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक ➖ सॅम पित्रोदा

आर्थिक राष्ट्रवादाचे जनक ➖ दादाभाई नौरोजी

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ➖ बाळशास्त्री जांभेकर

भारतीय आरमाराचे जनक ➖ छ. शिवाज महाराज

आधुनिक महाराष्ट्राचे जनक ➖ बाळशास्त्री जांभेकर

महाराष्ट्र हरितक्रांतीचे  जनक ➖ वसंतराव नाईक

भारताच्या एकीकरणाचे जनक ➖ सरदार पटेल

आधुनिक मराठी कवितेचे जनक ➖ केशवसुत

०६ फेब्रुवारी २०२५

गोलमेज परिषद बद्दल माहिती

गोलमेज परिषद बद्दल माहिती:

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

सायमन कमिशनवर चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये तीन गोलमेज परिषदा भरवल्या गेल्या.
वसाहतीच्या स्वराज्याची मागणी, 26 जाने. 1930 रोजी पहिल्या स्वातंत्र्य दिन पाळला गेला.

नेहरू आहवालातील तत्वे जर सरकारने स्वीकारली नाहीत तर सविनय कायदेभंग सुरू करण्याची सूचना गांधीजींनी व्हाइसरॉय आयर्वीन या दिली. (23 डिसेंबर 1929), आयर्वीन यांचा प्रतिसाद नाही.

1929 च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष – पं. जवाहरलाल नेहरू.
सविनय कायदेभंग (12 मार्ग 1930 ते 5 मार्च 1931)
12 मार्च 1930 रोजी आपल्या 78 सहकार्‍यांनीशी गांधीजींनी साबरमती आश्रमातून दांडी यात्रेस प्रारंभ केला.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

साबरमती ते दांडी अंतर – 385 कि.मी.
6 एप्रिल 1930 रोजी मिठाचा कायदा मोडला.
धारासना येथे सरोजनी नायडू यांनी मिठाचा सत्याग्रह केला. (21 मे 1930)
याच काळात महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात सिरोडा येथे मिठाचा सत्याग्रह झाला.

या काळात सोलापूरला मार्शल लॉ लागू केला (1930)
पहिली गोलमेज परिषद नोव्हेंबर 1930 मध्ये भरली.
काँग्रेसने पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला.
गांधी आयर्वीन करार – 5 मार्च 1931, या करारान्वे गांधीजींनी काही अटींवर दुसर्‍या गोलमेज परिषदेस हजर राहण्यासाठी मान्यता दिली.

दुसरी गोलमेज परिषद सप्टेंबर 1931 मध्ये भरली, गांधीजी काँग्रेसचे एकमेव प्रतीनिधी म्हणून उपस्थित. गांधीजीचा भ्रमनिरास
सविनय कायदेभंगाच्या दुसर्‍या टप्प्यात प्रारंभ -3 जाने. 1932.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

सविनय कायदेभंगाच्या दुसर्‍या टप्प्यात प्रारंभ -3 जाने. 1932
सविनय कायदेभंगाची समाप्ती – 1934
17 ऑगस्ट 1932 रोजी रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा घोषित केला. या व्दारे अश्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देऊ केले.

विधीमंडळातील विभक्त मतदार संघाविषयी गांधीजीचे प्राणांतीक उपोषण.
24 सप्टेंबर 1932 या दिवशी म. गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार (येरवडा करार) झाला. त्यान्वये अश्पृश्यांना विभक्त मतदार संघाऐवजी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आल्याचे मान्य केले गेले.

तिसरी गोलमेज परिषद नोव्हेंबर 1932 मध्ये भरली.
सविनय कायदेभंगावेळी खान अब्दुल गफार खान यांनी खुदाई खितमतगार नावाची लाल शर्ट वाल्यांची संघटना सुरू केली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

२५ डिसेंबर २०२४

Eklavya

विद्या प्रबोधिनी कोल्हापूर : CLICK HERE

राष्ट्रनिर्माण प्रबोधनी : CLICK HERE

स्पर्धाशाही acadeny : CLICK HERE

रयत प्रबोधनी : CLICK HERE

सारथी  टेस्ट 2024 : CLICK HERE

विदर्भ IAS अकॅडमी : CLICK HERE

स्वराज अकॅडमी : CLICK HERE

युनिक अकॅडमी पुणे : CLICK HERE

स्पॉटलाईटअकॅडमी,पुणे : CLICK HERE

विद्यानिकेतन अकॅडमी : CLICK HERE

ध्येय स्वप्नपूर्ती करिअर ग्रुप : CLICK HERE

चाणक्य मंडळ : CLICK HERE

अबुज पाटील सर : CLICK HERE

ज्ञानदीप अकॅडमी पुणे : CLICK HERE

Swarajya academy : CLICK HERE

प्रतिष्ठान अकॅडमी टेस्ट : CLICK HERE

महाराष्ट्रप्रबोधिनी ॲकॅडमी : CLICK HERE

The Grow Academy  2024 : CLICK HERE

भगीरथ अकॅडमी पुणे : CLICK HERE

कर्मवीर आयएएस : CLICK HERE

OFFICER'S TEST SERIES : CLICK HERE

Sai : CLICK HERE

Margee, Pune : CLICK HERE

MPSC Corner : CLICK HERE

Pera institute : CLICK HERE

Step up : CLICK HERE

lakshya : CLICK HERE

succes acadamy : CLICK HERE

lokseva : CLICK HERE

Eeon IAS अकॅडमी : CLICK HERE

Advance MPSC : CLICK HERE

H V Desai अकॅडमी : CLICK HERE

Future Officer : CLICK HERE

IP SIR'S : CLICK HERE

JD IAS : CLICK HERE

direction academy : CLICK HERE

ASHA ACADEMY : CLICK HERE

combine mentor : CLICK HERE

deccanIAS : CLICK HERE

१४ डिसेंबर २०२४

महत्त्वाची माहिती वाचून काढा.

1. भगवान बुद्धांना ज्ञान कोठे मिळाले? 

उत्तर : बोधगया


2. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? 

उत्तर : स्वामी दयानंद


3. पंजाबी भाषेची लिपी काय आहे? 

उत्तर : गुरुमुखी


4. भारतीय मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक कोणते आहे? 

उत्तर : कन्याकुमारी


5. भारतातील कोणत्या राज्यात सूर्य प्रथम उगवतो? 

उत्तर : अरुणाचल प्रदेश


6. इन्सुलिनचा वापर कोणत्या रोगाच्या उपचारात केला जातो? 

उत्तर : मधुमेह


7. बिहू हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध सण आहे? 

उत्तर : आसाम


8. आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते?

उत्तर : व्हिटॅमिन सी


9. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? 

उत्तर : विल्यम बेंटिक


10. कागदाचा शोध कोणत्या देशात लागला?

उत्तर : चीन


11. गौतम बुद्धांचे बालपणीचे नाव काय होते? 

उत्तर : सिद्धार्थ


12. भारतातील सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर कोण आहेत? 

उत्तर : अध्यक्ष


13. रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होतो? 

उत्तर : व्हिटॅमिन ए


14. पोंगल हा कोणत्या राज्यातील सण आहे? 

उत्तर : तामिळनाडू


15. गिधा आणि भांगडा हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहेत? 

उत्तर : पंजाब


16. दूरदर्शनचा शोध कोणी लावला? 

उत्तर : जॉन लॉगी बेयर्ड


17. भारताची पहिली महिला शासक कोण होती? 

उत्तर : रझिया सुलतान 


18. मासे कशाच्या मदतीने श्वास घेतात? 

उत्तर : कल्ले


19. ‘इन्कलाब झिंदाबाद’ ही घोषणा कोणी दिली? 

उत्तर : भगतसिंग


20. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कुठे झाले? 

उत्तर : १९१९ इ.स. अमृतसर




● भारतातील सर्वात मोठा सार्वजनिक उपक्रम कोणता आहे? 

उत्तर- भारतीय रेल्वे 


● भारतीय रेल्वे किती झोनमध्ये विभागली गेली आहे? 

उत्तर- 18 


● भारतात पहिली ट्रेन कधी धावली? 

उत्तर- १६ एप्रिल १८५३ इ.स 


● भारतातील पहिली ट्रेन कोठे धावली? 

उत्तर- मुंबई आणि ठाणे दरम्यान


● भारतात सर्वप्रथम रेल्वे कोणी सुरू केली? उत्तर- लॉर्ड डलहौसी 


● रेल्वे सेवा आयोगाचे मुख्यालय कोठे आहे?

 उत्तर- अलाहाबाद, मुंबई, कोलकाता, भोपाळ आणि चेन्नई


● भारतीय रेल्वे नेटवर्कचे आशिया खंडात कोणते स्थान आहे? 

उत्तर- दुसरा


● भारतात सर्वप्रथम रेल्वे कोणी सुरू केली?

 उत्तर- लॉर्ड डलहौसी 


● रेल्वे सेवा आयोगाचे मुख्यालय कोठे आहे?

 उत्तर- अलाहाबाद, मुंबई, कोलकाता, भोपाळ आणि चेन्नई 


● भारतीय रेल्वे नेटवर्कचे आशिया खंडात कोणते स्थान आहे? 

उत्तर- दुसरा 


● भारतीय रेल्वे बोर्डाची स्थापना केव्हा झाली? 

उत्तर- 1905 मध्ये 


● जगातील पहिली ट्रेन कधी धावली? 

उत्तर- इ.स. १८२५, इंग्लंड 


● भारत आणि पाकिस्तान दरम्यान धावणारी ट्रेन कोणती ?

उत्तर - समझौता एक्सप्रेस


● जगातील पहिली ट्रेन कधी धावली? 

उत्तर- इ.स. १८२५, इंग्लंड 


१० डिसेंबर २०२४

राज्यसेवा पूर्व झाली.. आता combine गट ब ची तयारी !!



दि. 5 जानेवारी 2024 ला आपण आतुरतेने वाट पाहणाऱ्या combine गट ब ची पूर्व परीक्षा होत आहे.. या निमित्ताने विद्यार्थी म्हणून आपली भूमिका कशा पद्धतीने असायला हवी ?


Combine 2024 च्या पूर्व परीक्षेचा अभ्यास करण्याऱ्या विद्यार्थ्यांचे दोन गटात वर्गीकरण करता येईल.


१. Core फक्त गट ब पूर्व चा अभ्यास करणारे विद्यार्थी

२. राज्यसेवा व combine दोन्ही करणारे विद्यार्थी


१. पहिल्या गटातील विद्यार्थ्यांबाबतीत बोलायचं झालं तर हे विद्यार्थी तब्बल 3 महिने झाले, combine पूर्व चा अभ्यास करत आहेत. ( combine ची date जाहीर झाल्यापासून) त्यामुळे या विद्यार्थ्यांचा basic book reading, नोट्स

तयारी व PYQ विश्लेषण झाले असेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे ज्यांनी हे टप्पे पूर्ण केले आहेत त्या विद्यार्थ्यांनी रोज किमान 1 पेपर वेळ लावून सोडवणे अत्यावश्यक आहे.

Combine गट ब पूर्व परीक्षा ही फक्त वेळेच्या व्यवस्थापनाची परीक्षा आहे, त्यामुळे जो त्या 1 तासात पेपर काळजीपूर्वक सोडवणार तोच यशस्वी होणार. त्यामुळे येत्या महिन्यात किमान 25 पेपर पूर्ण करण्याचे टार्गेट तुम्ही ठेवायला हवे. सरावासाठी मार्केट ला नामवंत clasees चे सराव पेपर उपलब्ध आहेत ते तुम्ही काळजीपूर्वक सोडवू शकता..


२. दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांनी आता त्यांचा combine mode चालू केला पाहिजे. राज्यसेवा पूर्व 2024 चा पेपर कसा गेला ? किती मार्क्स आले ? Cut off किती असेल ? या चर्चे पेक्षा तुम्ही combine च्या तयारी कडे आवर्जून लक्ष द्या.

आता तुम्ही ( राज्यसेवा ग्रुप ) combine साठी नवीन काय करणार ?

1. Csat ची खूप चांगली तयारी करा. गणिते 20 पैकी किमान 15 बरोबर आले तरच तुम्ही मुख्य साठी सहज पात्र व्हाल हे लक्षात घ्या.

2. चालू घडामोडी व्यवस्थित करा. राज्यसेवा पूर्व साठी तुम्ही एप्रिल- मे 24 पर्यंत चे current केला असेल , अशी अपेक्षा केली तरी तुम्ही नोव्हेंबर पर्यंत चे current affairs करणे आवश्यक आहेच. त्यामुळे daily current साठी वेळ राखून ठेवा. राज्यसेवा पूर्व परीक्षेत आलेल्या current च्या प्रश्नाचे विश्लेषण करता लक्षात येते की current वाचताना बारकावे पाहायला हवेच!!

3. महाराष्ट्र इतिहास व भूगोल आवर्जुन करा..

4. सराव प्रश्न सोडवा, PYQ विश्लेषण कराच..


आता राज्यसेवा पूर्व 2024  च्या अनुषंगाने थोडं combine च prediction पाहू..


१. राज्यशास्त्र :

- घटनेची कलमे खूप चांगली पाठ करा. आयोगाचा trend थेट कलमे विचारण्यावर दिसतोय.

- संविधानिक- वैधानिक संस्था नीट करा

- पंचायत राज बघून घ्या..


२. भूगोल :

-  24 च्या पूर्वचे विश्लेषण पाहता पुन्हा ध्यानात येईल की आयोग conceptual - factual खेळत आहे.  त्यामुळे concept सोबत fact माहिती असू द्या.

-( प्राकृतिक , राजकिय , नदीप्रणाली , खनिजे ,अभयारण्य , पर्यटन - तोंडपाठ असू द्या)

- लोकसंख्या data खूपच भारी करा. राज्यसेवेला तीन प्रश्न आलेत.

- भारत भूगोल पण करा..


३. इतिहास 

- base source + notes + 11 वी जुने पुस्तक+ समाजसुधारक  + PYQ = best combination

- कुदळे सरांना follow करत असाल तर उत्तमच!


४. विज्ञान -

- , Base source Basic concept  नीट करा. Numerical येऊ शकतात

- plant kingdom , animal kingdom  चांगलं करा

- बाकी जे विज्ञान येईल ते पेपर मध्येच takle करू.


५. अर्थशास्त्र 

- आयोग गेले 2-3 exam पासून अर्थशास्त्रास danger flag दाखवत आहे. Thinker , economist , ycmou बरेच source दिसत आहेत पण तुम्ही basic वर stick राहा. Base book खूप मस्त करा. झालेल्या पेपरचे इकॉनॉमिक्स चे प्रश्न खूप काळजीपूर्वक बघा. Conceptual प्रश्नाचा approach बघा.


६. चालू घडामोडी

- परिक्रमा/ इयर बुक नीटपणे वाचा. सगळं पुस्तकातच आहे, वाचायची गरज आहे.

- थीम predict करायला शिका, त्यावर focus करा.

( उदा. राज्यसेवा पूर्व मध्ये संसद , नारी शक्ती वंदन अधिनियम, स्वामिनाथन , aditya L1 , नर्गिस मोहम्मद हे मुद्दे prediction ला होते)


७. CSAT 

रोज 2 तास प्रॅक्टिस कराच.


विशेष टीप:

State board चे boxes नीट करा. कोकण रेल्वे , SAFAR इंडेक्स हे प्रश्न तिथूनच येत आहेत.



बाकी combine हा knowledge व time management चाच game आहे. त्यामुळे खूप चांगली practice करा. 70+ चं target ठेवा.. desk ला लिहून ठेवा.. एक महिना जोमाने अभ्यास करा.. यश तुमचंच आहे..


०३ ऑक्टोबर २०२४

भारतीय राज्यघटनेची प्रमुख व महत्त्वाची वैशिष्ट्ये – भारतीय राज्यघटनेतील तरतुदींचे महत्त्वाचे स्त्रोत पुढीलप्रमाणे…

भारतीय राज्यघटनेची प्रमुख व महत्त्वाची वैशिष्ट्ये –
महत्वाचे मुद्दे
भारतीय राज्यघटनेची प्रमुख व महत्त्वाची वैशिष्ट्ये –
भारतीय राज्यघटनेतील तरतुदींचे महत्त्वाचे स्त्रोत ....

१) लिखित घटना

भारतीय राज्यघटनेचे स्वरूप लिखित आहे. लिखित घटना एका निश्चित वेळी तयार केली जाते व एका निश्चित तारखेपासून अधिनियमात व अमलात येते.

भारतीय राज्यघटनेचे स्वरूप लिखित आहे मात्र ब्रिटनची राज्यघटना अलिखित स्वरुपाची आहे.

सध्या भारताच्या घटनेत २५ भाग ४६१ कलमे आणि १२ अनुसूची आहेत. अमेरिकेच्या राज्यघटनेची तुलना करावयाचे झाल्यास अमेरिकेच्या घटनेत केवळ ७ कलमे आहेत.

भारतीय घटना विस्तृत का?

भारतीय घटनेमध्ये जगातील विविध देशांच्या घटनांचा अभ्यास करून चांगल्या वैशिष्ट्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये केला असल्यामुळे घटना विस्तृत झाली आहे.

देशाच्या प्रशासनाचे तपशीलवार विवेचन भारतीय राज्यघटनेमध्ये आहे.

केंद्र व राज्याची सामायिक एकच घटना असल्यामुळे घटनेचा विस्तार वाढला आहे.

कलम ३७० कलम ३७१ ते कलम ३७१ (J) मध्ये राज्यांची संबंधित विशेष तरतुदी देण्यात आल्या आहेत.
भारतीय संघराज्य व्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्र-राज्य संबंध तपशीलवार देण्यात आले आहेत.
मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्त्वे मूलभूत कर्तव्य यांचे विस्तृत स्पष्टीकरण घटनेमध्ये भर घालते.
इतर देशांच्या घटनांचा अभ्यास व त्या या देशातील महत्त्वाच्या कलमांचा अंतर्भाव यामुळे भारतीय राज्यघटनेचा आकार वाढला आहे.

२) राज्यघटनेचे विविध स्त्रोत rajyaghatanechi vaishishte

सुमारे ६० देशांच्या घटनांचा विचार करून त्यातील महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश भारतीय घटनेमध्ये करण्यात आलेला आहे.

भारत सरकार कायदा १९३५ नुसार भारतीय राज्यघटनेचा संरचनात्मक आराखडा मांडण्यात आलेला आहे या कायद्यातील सुमारे २५० तरतुदी स्वीकारण्यात आल्या आहेत.

घटनेचा तात्विक भाग म्हणजे मूलभूत हक्क हे अमेरिकेच्या घटनेवरून स्वीकारण्यात आले आहेत तर मार्गदर्शक तत्वे आयरिश घटनेवरून घेण्यात आले आहेत.

घटनेच्या राजकीय भागाचा विचार करता ब्रिटनच्या घटनेवर आधारलेली संसदीय शासन व्यवस्था भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेली आहे.

कॅनडा जर्मनी फ्रान्स जपान दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया रशिया इत्यादी देशांच्या घटनेचा प्रभाव भारतीय राज्यघटने वरती दिसून येतो. याच कारणामुळे भारतीय राज्यघटनेला उसनी घटना(Borrowed Constitution), ठीगळांचे कार्य(patchwork), पश्चिमेचे अनुकरण(slavish imitation of the west), अशा टीका केल्या जातात. मात्र यामध्ये भारतीय परिस्थितीला अनुसरून त्यामध्ये बदल करण्यात आलेले आहे म्हणून हे सुंदर ठिकाणांचे कार्य आहे असे संबोधले जाते.

भारतीय राज्यघटनेतील तरतुदींचे महत्त्वाचे स्त्रोत पुढीलप्रमाणे…

भारत सरकार कायदा १९३५ – भारत सरकारच्या १९३५ च्या कायद्यानुसार संघराज्य व्यवस्था, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपालाचे पद, प्रशासकीय तपशील इत्यादी भाग स्वीकारण्यात आलेला आहे. भारतीय राज्यघटना ही मूलतः भारत सरकार कायदा १९३५ वर आधारित आहे. rajyaghatanechi vaishishte
ब्रिटिश घटना – संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट, द्विगृही संसद, फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम, कायदा करण्याची पद्धत, कायद्याचे राज्य, एकच नागरिकत्व आणि विशेषाधिकार हे ब्रिटिश घटनेवरून स्वीकारण्यात आले आहेत.

अमेरिकेची घटना – मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपती वरील महाभियोग, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पदावरून दूर करण्याची पद्धत याबाबी अमेरिकेच्या घटनेवरून स्वीकारण्यात आलेल्या आहेत.

कॅनडा ची घटना – प्रभावी केंद्र असलेले संघराज्य शेषाधिकार, राज्यपालाची नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकारक्षेत्र या बाबी कॅनडाच्या घटनेवरून स्वीकारण्यात आलेल्या आहेत.
आयरिश घटना – मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपतींची निवडणूक, राज्यसभेतील सदस्यांचे नामनिर्देशन या बाबी आयरिश घटनेवरून स्वीकारण्यात आलेल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाची घटना – समवर्ती सूची, संयुक्त बैठक, व्यापार व वाणिज्य चे स्वातंत्र्य या बाबी ऑस्ट्रेलियाच्या घटनेचा अभ्यास करून स्वीकारण्यात आलेल्या आहेत.
जपानची घटना – कायद्याने प्रस्थापित पद्धत
सोवियत रशिया ची घटना – मूलभूत कर्तव्य, प्रस्ताविकातील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श

वेईमर घटना (जर्मनी) – आणीबाणीच्या कालावधीतील तरतुदी व मूलभूत हक्कांमध्ये होणारा बदल
दक्षिण आफ्रिका – घटना दुरुस्ती ची पद्धत, राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक
फ्रान्सची घटना – गणराज्य, प्रास्ताविकेल स्वातंत्र्य, समता, बंधुता या गोष्टी फ्रान्सच्या घटनेवरून घेण्यात आलेल्या आहेत.

३) संघराज्य व्यवस्था (rajyaghatanechi vaishishte) – भारतीय घटनेने संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे संघराज्य व्यवस्थेची वैशिष्ट्ये आपल्या घटनेमध्ये आढळतात. केंद्र व घटक राज्य सरकारांचे अस्तित्व, अधिकारांची विभागणी, घटनेची स्वच्छता घटनेची ताठरता स्वतंत्र न्याय व्यवस्था द्विगृही कायदे मंडळ इत्यादी.

घटनेमध्ये गैर संघात्मक किंवा एकात्मक वैशिष्ट्ये ही आढळतात. त्यामध्ये प्रभावी केंद्रशासन एकच घटना एकेरी नागरिकत्व घटनेची लवचिकता एकात्मिक न्यायव्यवस्था अखिल भारतीय सेवा.

म्हणूनच भारतीय राज्यघटनेचे वर्णन अर्ध-संघराज्यीय (k.c. व्हेअर), वाटाघाटीचे संघराज्य (मॉरीस जोन्स) सहकारी संघराज्य (ऑस्टिन), केंद्रीकरण्याची प्रवृत्ती असलेले संघराज्य (इवोर जिनिंग)

४) संसदीय शासन पध्दती (rajyaghatanechi vaishishte)

भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार ब्रिटनच्या घटनेवरून केलेला आहे. अध्यक्षीय शासन व्यवस्थेत कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ पूर्णपणे विभक्त असतात मात्र संसदीय शासन व्यवस्थेमध्ये यांच्यामध्ये समन्वय व सहकार्य असते.

संसदीय शासन व्यवस्थेमध्ये मंत्रिमंडळाचे निवड कायदे मंडळाच्या सदस्याकडून केली जाते व मंत्रिमंडळ म्हणजेच कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार असते. राष्ट्रप्रमुख हे नामधारी कार्यकारी प्रमुख असतात तर शासन प्रमुख हे वास्तव कार्यकारी प्रमुख असतात.

भारतीय संसदीय शासन व्यवस्थेची वैशिष्ट्ये
राष्ट्रपती नामधारी प्रमुख पंतप्रधान वास्तव प्रमुख
मंत्री कायदेमंडळाच्या सदस्य असणे.

मंत्रिमंडळाची कायदेमंडळा प्रति जबाबदारी
कनिष्ठ सभागृह चे विसर्जन
बहुमताचे सरकार
या वैशिष्ट्यामुळे संसदीय शासन व्यवस्थेला जबाबदार शासन व्यवस्था किंवा कॅबिनेट शासन व्यवस्था असेही म्हणतात. या व्यवस्थेमध्ये पंतप्रधानांची भूमिका महत्त्वाचे असल्याने पंतप्रधान शासनव्यवस्था असेही म्हटले जाते.

भारतीय संसदीय शासन व्यवस्था व ब्रिटिश संसदीय शासन व्यवस्थेमध्ये मूलभूत फरक आहे ब्रिटिश पार्लमेंट प्रमाणे भारतीय संसद सार्वभौम संस्थां नाही.

भारतीय राज्यसंस्था ही एक गणराज्य आहे व ब्रिटिश राज्यसंस्था ही राजेशाही आहे.

५) ताठर व लवचिक (rajyaghatanechi vaishishte)

भारताची राज्यघटना अति ताठर ही नाही व अति लवचिकही नाही यामुळे ताठरता व लवचिकता याचे एकत्रीकरण भारतीय राज्यघटनेमध्ये दिसून येते. ताठर घटनेची घटना दुरुस्ती पद्धत कठीण असते उलट लवचिक घटनेची घटना दुरुस्ती सोपी असते.

भारतीय राज्यघटनेच्या कलम 368 मध्ये घटना दुरुस्ती ची पद्धती देण्यात आली आहे.

घटनेच्या काही तरतुदींमध्ये बदल करण्यासाठी संसदेच्या विशेष बहुमताची आवश्यकता असते.

घटनेतील संघराज्याची वैशिष्ट्ये यामध्ये बदल करण्यासाठी वरीलप्रमाणे विशेष बहुमता बरोबरच निम्म्या राज्यांचे समर्थन आवश्यक असते.

या पद्धतीने घटना दुरुस्ती करणे अवघड असल्याने घटना ताठर मानली जाते. मात्र घटनेच्या काही तरतुदी मध्ये केवळ साध्या बहुमताने बदल करता येतो याबाबतीत घटना लवचिक आहेत.

६) संसदीय सार्वभौमत्व व न्यायिक सर्वोच्चता याचे संतुलन (rajyaghatanechi vaishishte) – भारतीय राज्यघटनेत कायदे मंडळ व न्याय मंडळ यांच्यामध्ये अधिकाराबाबत योग्य संतुलन राखण्यात आले आहे. संसदेला कायदा व घटना दुरुस्ती करण्याचे अधिकार आहेत आणि संसदेने केलेले कायदे घटनादुरुस्त्या घटनात्मक आहेत किंवा नाहीत हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयांना आहे. यात न्यायालयांना सर्वोच्चता आहे. म्हणजेच भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही आणि सर्वोच्च न्यायालय सुद्धा सर्वोच्च नाही तर दोघांच्या अधिकारांमध्ये संतुलन निर्माण करण्यात आलेले आहे. केशवानंद भारती खटला 1973 नुसार असे संतुलन निर्धारित करण्यात आले.

७) स्वतंत्र व एकात्मिक न्यायव्यवस्था – (rajyaghatanechi vaishishte)

भारताच्या घटनेने कायदेमंडळ कार्यकारी मंडळ यांच्याबाबतीत संघराज्य व्यवस्था निर्माण केलेली आहे मात्र न्याय व्यवस्था एकात्मिक ठेवण्यात आली आहे. एकात्मिक न्यायव्यवस्थेत सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय अशी क्रमबद्ध शृंखला आहे. भारताच्या घटनेने सर्वोच्च न्यायालयाला संघराज्य न्यायालय, अपीलाचे न्यायालय, मूलभूत हक्काचा हमीदाता, घटनेचा संरक्षक बनवले आहे.

८) मूलभूत हक्क –

लोकशाहीमध्ये नागरिकांना समान हक्क प्राप्त होतात. नागरी जीवनासाठी हे मूलभूत हक्क असतात.भारताच्या घटनेने असे हक्क उपलब्ध करून दिले आहेत. मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट असल्याने ते प्राप्त करून घेता येतात. हे हक्क नागरिकांना शासन संस्थे विरुद्ध उपलब्ध आहेत. मूलभूत हक्क मुळे देशात राजकीय लोकशाहीच्या संकल्पनेची पूर्तता करण्याचे कार्य करतात. असे मूलभूत हक्क व मर्यादित नसून त्यावर बंधने आहेत.

९) राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्त्वे (rajyaghatanechi vaishishte) –

मार्गदर्शक तत्वे भारतीय घटनेचे एक वैशिष्ट्य आहे.ही तत्वे कल्याणकारी राज्याची निर्मिती करून लोकांना सामाजिक व आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी समाविष्ट करण्यात आलेली आहेत. मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत मात्र देशाच्या प्रशासनात सरकारला मार्गदर्शक आहेत. घटनेच्या प्रारंभा नंतर मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे यापैकी वरचढ कोण असा प्रश्न निर्माण झाला. यावेळी मिनर्वा मिल खटला १९८० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिला की भारतीय घटनेतील मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे संतुलनाच्या आधार शिलेवर आधारलेली आहेत.

१०) मूलभूत कर्तव्य – (rajyaghatanechi vaishishte)

स्वर्ण सिंह समितीच्या शिफारशीनुसार ४२ वी घटनादुरुस्ती १९७६ मध्ये मूलभूत कर्तव्य कलम ५१ अ मध्ये अंतर्भूत करण्यात आली. यात दहा मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली. २००२ मध्ये ८६ व्या घटनादुरुस्तीने अकरावे कर्तव्य अंतर्भूत करण्यात आले.

११) आणीबाणी विषयक तरतुदी (rajyaghatanechi vaishishte)-

घटनाकर्त्यांनी कारभार चालवणे अवघड असण्याच्या स्थितीची कल्पना करून आणीबाणीची तरतूद केली. अशा कारभाराच्या स्थितीमध्ये देशाची राजकीय लोकशाही व्यवस्था व घटना यांचे संरक्षण करता यावे यासाठी आणीबाणीच्या तरतुदी दिलेल्या आहेत.

घटनेमध्ये तीन प्रकारच्या आणीबाणीची तरतूद आहे

३५२ कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव या कारणावरून पुकारले जाते.
३५६ कलमा अंतर्गत घटक राज्यातील आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट स्पष्ट करण्यात आलेली आहे.
३६० कलमानुसार भारताच्या वित्तीय स्थैर्य किंवा पत धोका निर्माण झाल्यास अशी आणीबाणी पुकारता येते.
१२) एकेरी नागरिकत्व –

संघराज्य शासन व्यवस्थेत दुहेरी नागरिकत्व दिले जाते. त्यामुळे नागरिकांना राज्य सरकारचे व केंद्र सरकारचे असे दोन प्रकारचे हक्क प्राप्त होतात.भारतीय जनतेला मात्र भारतीय घटनेने एकच नागरिकत्व बहाल केलेले आहे. देशातील प्रादेशिक भिन्नता कमी करून नागरिकांमध्ये राष्ट्रवादाची एकच भावना वाढीस लावणे हा उद्देश एकेरी नागरिकत्व मागे आहे.

१३) सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धत –

भारतीय लोकशाही एक व्यक्ती एक मत या तत्वावर चालते. कलम ३२६ मध्ये सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या व्यवस्थेची तरतूद आहे. भारतीय घटनेत सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या पद्धती द्वारे राजकीय समानता प्रस्थापित करते.

१४) धर्मनिरपेक्ष राज्य (rajyaghatanechi vaishishte) –

भारतीय राज्यघटनेने धर्मनिरपेक्ष राज्याची निर्मिती केली आहे. प्रस्ताविका व्यतिरिक्त कोठेही धर्मनिरपेक्ष शब्द आढळत नाही. मात्र घटनेतील विविध तरतुदी वरून धर्मनिरपेक्षता दिसून येते.भारतात सकारात्मक धर्मनिरपेक्षता स्वीकारण्यात आलेली आहे. यामध्ये राज्य कोणत्याही धर्माचा पुरस्कार करणार नाही मात्र सर्व धर्मांना समान वागणूक दिली जाते.

२६ सप्टेंबर २०२४

पूर्व परीक्षेच्या गुणांचे गणित


📌 मागील पूर्व परीक्षांचा cut- off पाहिल्यास आपल्याला हे लक्षात येईल की पूर्व परीक्षेत 125+ मार्क्स आल्यास second key आली तरी आपण पूर्व परीक्षा नक्की पास होऊ हा विश्वास राहतो. त्यामुळे  कोणत्याही  शंकेविना  मुख्य परीक्षेकडे मोर्चा वळवता येतो. 

 

📌 त्यासाठी पूर्व परीक्षेत 125+ गुण मिळतील हा उद्देश ठेवून अभ्यास त्या दृष्टीने करावा . 125 गुण मिळविण्यासाठी तुम्ही पूर्ण प्रश्न  सोडवत आहात असे गृहीत धरल्यास तुमचे 70 प्रश्न बरोबर येणे अपेक्षित आहे.


📌  या प्रमाणे विषयाच्या काठिण्य पातळी नुसार प्रत्येक विषयात किती किती गुण मिळणे अपेक्षित आहे ते आपण पाहू

    

विषय.          एकूण प्रश्न.      पैकी ✅ अपेक्षित


राज्यशास्त्र             15.                   13

 

भूगोल.                 15.                    12


अर्थशास्त्र.             15.                    12


पर्यावरण.              5.                      3


विज्ञान.                 20.                    12


चालू घडामोडी.       15.                    9


इतिहास                15.                     9.   

          

             एकूण.    100.                   70

               

📌 प्रत्येक विषयाला किमान वरीलप्रमाणे प्रश्न बरोबर येणे अपेक्षित आहे. तुमच्या विषयावरील प्रभुत्वानुसार हे प्रमाण तुम्ही बदलू शकता.  जसे तुम्हाला विज्ञान जर कठीण जात असेल तर ती कसर चालू घडामोडी मध्ये भरून काढू शकता.


📌 सुरवातीच्या तीन विषयात ( राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल) सर्वांना गुण मिळविणे तुलनेने सोपे असते. तर या विषयाचा व्यवस्थित अभ्यास करणे अपेक्षित आहे.


📌 चालू घडामोडींचा अभ्यास दररोज केल्यास शेवटी त्याचा load येत नाही. Analytical विषय जसे की विज्ञान, अर्थशास्त्र, पर्यावरण , भौतिक भूगोल यांचा अभ्यास सुरवातीच्या टप्प्यात करावा. व ज्या विषयात  फॅक्ट्स जास्त आहेत (राज्यशास्त्र, अर्थशास्त्रातील आकडेवारी,इतिहास) ते विषय परीक्षा जवळ आली की हाताळावे म्हणजे short term memory मध्ये फॅक्टस लक्षात राहतात.

 

📌 अशाप्रकारे स्वतःला आधी analize करून अभ्यासाचे नियोजन केल्यास कमी श्रमात परिणामकारक अभ्यास करता येऊ शकतो.

२१ सप्टेंबर २०२४

समोर परीक्षेची तारीख ही नाही;अभ्यास ही होत नाही..

अजून ही combine 24 चे वेळापत्रक आलेले नाही.त्यामुळे बरेच जण वेळापत्रक येईपर्यंत मुख्यचा अभ्यास करावा का? अभ्यास होत नाहीये इ. बद्दल विचारत आहेत.त्यासाठी माझे वैयक्तिक मत देत आहे.

पुर्व परिक्षेबद्दल जरी आणखी काहीही अधिकृत घोषणा नसली तरी मला अस वाटत की पूर्वचाच
अभ्यास सुरू राहू द्या.लक्षात घ्या,आता मुख्य चा पेपर-2 हा पूर्वच्या पेपर सारखा आहे.त्यामुळे तुम्ही जो अभ्यास करताय तो मुख्य परीक्षेसाठी करताय अस समजून चला.
आता पूर्व चा इतका जबरदस्त अभ्यास करा की पूर्व मध्ये 65+ पडणार आणि प्रथम उत्तरतालिका आली की लगेच मुख्यच्या अभ्यासाला लागायचं.
लक्षात घ्या,जर पूर्व मध्ये परत काठावर गुण मिळाले तर त्या इतकी दोलायमान परिस्थिती नसते.सारखं वाटतं,होईल की नाही,प्रत्येक क्लासेस चे दररोज कट ऑफ बघा,मग अश्यात एक दिवस अभ्यास होतो,तर एक दिवस होणार नाही.. काय होईल...होईल की नाही..सारखं तेच ते मनात घोळत असत.सोडता ही येत नाही आणि करायची इच्छा ही होत नाही. जरी पूर्व उत्तीर्ण झालोच तरी निकाल ऐन परीक्षेच्या तोंडावर लागलेला असतो म्हणून अभ्यास ही नीट झालेला नसतो,त्यामुळे अंतिमतः निराशाच पदरी येते. या उलट ज्यांना 60+ गुण असतील त्यांचा एक ही दिवस वाया जात नाही.त्यांना कोणता कट ऑफ prediction, दुसरी उत्तरतालिकेने माझे गुण कमी झाले मग???? हे असलं काहीच बघायचं टेन्शन नसत.त्यामुळे जास्त अभ्यास होतो.
मला माहित आहे तुमच्या पैकी बरेच जन थोड थंड पडले असतील,ते साहजिक आहे.कारण समोर निश्चित तारीख (Dead End) नसल्यामुळे अभ्यास हा हवा तितका होतच नाही. परीक्षा पुढे जात आहे ती एक संधी समजा.पूर्व चा चांगला अभ्यास करा म्हणजे मुख्य च्या पेपर -2 ची आताच तयारी होईल आणि पूर्व झाली की पूर्ण वेळ मराठी इंग्रजी ला देता येईल आणि यावेळी खात्रीने निकाल येईल.
बरेच जण अमुक अमुक तास अभ्यास झाला नाही तर निराश होऊन जाता.मग अश्यात आपसूकच इतरां सोबत बरोबरी होते,तो किती तास अभ्यास करतो, माझं इतक्या कमी अभ्यासात होईल की नाही... वगैरे वगैरे...!?
लक्षात घ्या..एखाद्या दिवशी एकदम चांगला अभ्यास होतो,एखाद्या दिवस कमी होतो,एखाद्या दिवशी अजिबात होत नाही, अश्या वेळी हिरमसून न जाता अभ्यास करत राहायचा.सर्वांचा असा वेळ जात असतो, शेवटी आपण सर्वच homo sapiens कुळातील आहोत,यंत्र मानव नाहीत की दररोज अमुक अमुक तास काम होईलच.
शेवटी तुम्ही दररोज,जीव लावून,जितकं होतील तितके सर्वोत्तम मनातून प्रयत्न करताय ना...? ते महत्वाचं आहे...एक गोष्ट कायम लक्षात घ्या की बदलत्या परिस्थिती नुसार आपल्याला बदलता आला पाहिजे.म्हणजे काय तर आता परीक्षेची तारीख समोर नसताना आपण पूर्वी सारखा अभ्यास होणार नाही हे पहिले मान्य केला पाहिजे.
Its absolutely OK Not to be OK.
आपण सर्व सारखेच आहोत.आता जो राज्यात पहिला येणार आहे 2024 मध्ये त्याचा पण इतक्या जोश मध्ये अभ्यास होत नसणार,कारण तो सुद्धा एक माणूस आहे. तर सांगायचा उद्देश हाच की मान्य करा की माझा 10-12 तास अभ्यास होणार नाही.हरकत नाही.मी पण कोरोना च्या काळात तयारी करताना हे मान्य केलेलं.मग मी सकाळी लवकर उठून अभ्यास करून घ्यायचो दुपार पर्यंत..4/6/8 तास अभ्यास व्हायचा आणि मग उरलेला वेळ Group Discussion साठी द्यायचो.तुम्ही ही तस करू शकता.ज्यांचा होत नाहीये त्यांच्यासाठी खालील बदल करून बघा,जमतंय का..

1.नवीन काही तरी वाचा.उदा. PYQ prelims explanation च पुस्तक घेऊन ते संपवून टाका.
2. जे राज्यसेवा करताय ते हा वेळ Maths करा थोड्यावेळ आणि जे Combine करत आहेत ते PYQ expln book मधून पर्यावरण,प्राचीन मध्ययुगीन करू शकता.(दोन्ही पूर्व देणार असाल तरच)
3. चालू घडामोडी संपवून टाका.
4.दुसरा जो विषय राहिला आहे तो करायला घ्या.नवीन पुस्तक घ्या,ते चाळा.
5.जास्तीत जास्त Group discussion करा.
यावेळी तुम्ही तुमचं सर्वोत्तम दिल तर गुलाल 100% पक्का आहे. फक्त स्वतः वर विश्वास ठेवा.आता पर्यंत झाला तो झाला time pass.. आता राहिलेल्या दिवसांसाठी Lions Attitude ने fight द्या.🦁🔥
कधी कमी अभ्यास होईल,कधी जास्त,परंतु अभ्यास होणं गरजेचं,त्याहून महत्त्वाचं प्रयत्न करण गरजेचं आहे.एक होता कार्व्हर पुस्तकात मार्टिन लुथर किंग यांची ओळख झाली होती.नंतर कालांतराने त्यांच्या विषयी एका मासिकात आणखी वाचण्यात आले.
त्यांचे बरेच वाक्य गाजलेले आहेत.त्यापैकी माझ्या सर्वात आवडत्या वाक्याने शेवट करतो..

यदि आप उड़ नहीं सकते हो, तो दौडो  
यदि दोड़ नहीं सकते हो, तो चलो।
यदि चल भी नहीं सकते हो, तो रेंगो
लेकिन हमेशा आगे बढ़ते रहो...🔥

विजयी भव✨

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...