Wednesday 26 June 2024

महाराष्ट्रातील पहिले गाव


1] पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)
2] पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर - सातारा)
3] पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा)
4] पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे)
5] पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा)

6] पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)
7] पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती)
8] पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार)
9] पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर)
10] पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी)

11] पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा)
12) पहिले तंटामुक्त गाव: मळेगाव (बारामती - पुणे)
13) पहिले सौरऊर्जा गाव: धरणगाव (सोलापूर)
14) पहिले महिला बचत गटाचे गाव: पाणीव (जळगाव)
15) पहिले पाणलोट क्षेत्र विकासाचे गाव: राळेगण सिद्धी (अहमदनगर)

16) पहिले बायोगॅस प्रकल्पाचे गाव: कोल्हार (राहता - अहमदनगर)
17) पहिले हरित गाव: कोरडगाव (कराड - सातारा)
18) पहिले स्मार्ट गाव: कनेसर (बारामती - पुणे)
19) पहिले बायोफ्युएल गाव: बारड (चंद्रपूर)
20) पहिले साक्षर गाव: देवगाव (सातारा)

21) पहिले कीटकनाशकमुक्त गाव: हरदा (यवतमाळ)
22) पहिले कार्बन नकारात्मक गाव: इन्नेरवाडी (पुणे)
23) पहिले शून्य कचरा गाव: मौजे कळंब (कोल्हापूर)
24) पहिले ई-लर्निंग गाव: साखरवाडी (सातारा)
25) पहिले रेन वॉटर हार्वेस्टिंग गाव: हिवरे बाजार (अहमदनगर)

26) पहिले हायटेक कृषी गाव: सलेहवाडी (जुन्नर - पुणे)
27) पहिले खादी ग्रामोद्योग गाव: बरसिंगे (लातूर)
28) पहिले जलसंधारणाचे गाव: राजापूर (नाशिक)
29) पहिले स्वच्छता मोहीम राबवलेले गाव: पन्हाळगड (कोल्हापूर)
30) पहिले जैवविविधता संवर्धन गाव: चंद्रपूर (चंद्रपूर)

31) पहिले सीएनजी चालवलेले गाव: वलण (सांगली)
32) पहिले ग्रीन हाऊस गाव: पिंपळनेर (धुळे)
33) पहिले जीआयएस तंत्रज्ञान वापरलेले गाव: हिवरे बाजार (अहमदनगर)
34) पहिले 100% लसीकरणाचे गाव: खेड (रत्नागिरी)
35) पहिले जलशुद्धीकरण प्रकल्पाचे गाव: वरवंटी (सोलापूर)

36) पहिले हर्बल औषधी वनस्पती संवर्धन गाव: अडूर (गडचिरोली)
37) पहिले अंगणवाडी नर्सरीचे गाव: निरगुडसर (पुणे)
38) पहिले क्रीडा प्रशिक्षण केंद्र असलेले गाव: मळेगाव (नाशिक)
39) पहिले वनौषधी प्रयोगशाळा असलेले गाव: शिरपूर (धुळे)
40) पहिले सेंद्रिय शेती करणारे गाव: कासारवाडी (सांगली)

41) पहिले स्वयंपूर्ण ग्राम पंचायत: परळी (बीड)
42) पहिले ड्रिप सिंचन प्रणाली वापरणारे गाव: येरळवाडी (सातारा)
43) पहिले समाजवादी गाव: सरसोली (नाशिक)
44) पहिले आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गाव: हिवरे बाजार (अहमदनगर)
45) पहिले आदिवासी ग्रामविकास प्रकल्प गाव: मेंढा (गडचिरोली)

46) पहिले वनधन योजना लागलेले गाव: नवल (नाशिक)
47) पहिले पॅकेजिंग सुविधा असलेले गाव: वाडी (नागपूर)
48) पहिले अन्न प्रक्रिया केंद्र असलेले गाव: खराड (रायगड)
49) पहिले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असलेले गाव:- कुडाळ (सिंधुदुर्ग)
50) पहिले सार्वजनिक वाचनालय असलेले गाव: पाटोदा (अहमदनगर)

51) पहिले अक्षय ऊर्जा वापरणारे गाव: बनकरवाडी (पुणे)
52) पहिले हरित क्रांती राबवणारे गाव: मालेगाव (पुणे)
53) पहिले ग्रामस्वराज्य योजना गाव: राळेगण सिद्धी (अहमदनगर)
54) पहिले पॉलिहाऊस शेतीचे गाव: अरण (पुणे)
55) पहिले पूर्ण साक्षर गाव: गढेगाव (सातारा)

56) पहिले अन्न सुरक्षा योजना राबवलेले गाव: भोर (पुणे)
57) पहिले कृषी पर्यटन गाव: बारामती (पुणे)
58) पहिले इको-फ्रेंडली गाव: लवासा (पुणे)
59) पहिले अन्नप्रक्रिया उद्योग संकुल: लातूर (लातूर)
60) पहिले झीरो बजेट नैसर्गिक शेतीचे गाव: बेलवंडी (अहमदनगर)

61) पहिले प्रायोगिक जैवविविधता पार्क: सिरोंचा (गडचिरोली)
62) पहिले पवन ऊर्जा प्रकल्पाचे गाव: चाळीसगाव (जळगाव)
63) पहिले ग्रीन बिल्डिंग प्रकल्पाचे गाव: कोथुर्वे (सातारा)
64) पहिले जलसंधारणाचे गाव: कडूस (पुणे)
65) पहिले शाश्वत ऊर्जा वापरणारे गाव: करमाळा

66) पहिले पूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध गाव: राजुरी (सातारा)
67) पहिले जलशुद्धीकरण प्रणाली असलेले गाव: वळवंडी (अहमदनगर)
68) पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे कृषी संशोधन केंद्र असलेले गाव: नारायणगाव (पुणे)
69) पहिले जैविक खत वापरणारे गाव: येवलेवाडी (पुणे)
70) पहिले जलशेतीचे गाव: निरगुडसर (पुणे)

71) पहिले कृषी उद्योग संकुल असलेले गाव: शिरूर (पुणे)
72) पहिले उर्जा बचत प्रकल्प राबवलेले गाव: दरेकरवाडी (पुणे)
73) पहिले आदर्श ग्राम हायवे: हिवरे बाजार ते राळेगण सिद्धी (अहमदनगर)
74) पहिले जैविक शेती आणि सेंद्रिय उत्पादनांचे गाव: पिंपळगाव (सांगली)
75) पहिले शाश्वत जल व्यवस्थापन प्रकल्प असलेले गाव: वडगाव मवाळ (पुणे)

76) पहिले शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी केलेले गाव: भोर (पुणे)
77) पहिले आदिवासी कल्याण प्रकल्प गाव: धानोरा (गडचिरोली)
78) पहिले सौरऊर्जा चालित शाळा: चांदोरी (नाशिक)
79) पहिले पर्यावरणपूरक पर्यटन केंद्र: ठोसेघर (सातारा)
80) पहिले कौशल्य विकास केंद्र असलेले गाव: पिंपळनेर (धुळे)

81) पहिले वन्यजीव संवर्धन प्रकल्प: टाडोबा (चंद्रपूर)
82) पहिले नदीजोड प्रकल्पाचे गाव: खेड (रत्नागिरी)
83) पहिले ग्रामीण उद्योजकता विकास केंद्र: वरवंटी (सोलापूर)
84) पहिले शैक्षणिक असलेले गाव: कुडाची (कोल्हापूर)
85) पहिले कॅशलेस व्यवहार स्वीकारणारे गाव: म्हसवे (सातारा)

86) पहिले स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण केंद्र: विटा (सांगली)
87) पहिले बायोगॅस आधारित उर्जा उत्पादन: मळेगाव (नाशिक)
88) पहिले पवन ऊर्जा प्रकल्प: शिराळा (सांगली)
89) पहिले हरित तंत्रज्ञान वापरणारे गाव: वडगाव मवाळ (पुणे)
90) पहिले पर्यावरणपूरक वस्ती योजना: रांजणी (सोलापूर)

91) पहिले वन्यजीव पुनर्वसन प्रकल्प: मेलघाट (अमरावती)
92) पहिले पशुधन विकास प्रकल्प: पंढरपूर (सोलापूर)
93) पहिले जलवायू परिवर्तन अनुकूलन प्रकल्प: आंबेगाव (पुणे)
94) पहिले पूर्णतः सौरऊर्जा चालवलेले गाव: मोहितेवाडी (सातारा)
95) पहिले डिजिटल शिक्षण प्रकल्प: साखरवाडी (सातारा)

96) पहिले कुटीर उद्योग प्रकल्प: शिरगाव (रायगड)
97) पहिले कृषी औद्योगिक संकुल: कराड (सातारा)
98) पहिले हरित ऊर्जा प्रकल्प: वरवंटी (सोलापूर)
99) पहिले ग्रीन कॉरिडॉर प्रकल्प: पुणे-नाशिक मार्ग
100) पहिले जैवविविधता पार्क: रांजणी (सांगली)

101) पहिले ई-कचरा व्यवस्थापन प्रकल्प: सांगली
102) पहिले आदर्श ग्रीन व्हिलेज: कोळेवाडी (पुणे)
103) पहिले पूर्णपणे सौरऊर्जा वापरणारे ग्राम पंचायत: येरळवाडी (सातारा)
104) पहिले हायटेक वसाहत प्रकल्प: पिंपळगाव (नाशिक)
105) पहिले स्वच्छ व पर्यावरणपूरक पर्यटन केंद्र: सागरेश्वर (सांगली)

106) पहिले सेंद्रिय मांस उत्पादन: शिरूर (पुणे)
107) पहिले जलसंवर्धन योजना: महाबळेश्वर (सातारा)
108) पहिले सौर ऊर्जा शाळा प्रकल्प: रांजणगाव (पुणे)
109) पहिले सर्वसमावेशक शैक्षणिक केंद्र: वाडा (ठाणे)
110) पहिले बहुउद्देशीय कृषी केंद्र: करमाळा (सोलापूर)

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 1947



- ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान कलेमंट अटली यांनी ३० जून, 1948 पर्यंत भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात येईल आणि त्यानंतर सत्ता जबाबदार भारतीयांकडे सोपविली जाईल असे २० फेब्रुवारी, १९४७ रोजी घोषित केले.

- माउंटबॅटन योजना: 3 जून 1947 भारताचा व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन याने फाळणीची योजना सादर केली. योजना काँग्रेस व मुस्लिम लीम लीगने मान्य केली. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा (१९४७ संमत करून योजना लगेच अमलात आणली गेली.


- भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आली आणि १५ ऑगस्ट, १९४७ पासून भारत एक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र असल्याचे घोषित करण्यात आले.

- भारताची फाळणी करण्यात आली आणि भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यात आली. त्यांना ब्रिटिश राष्ट्रकुलापासून वेगळे होण्याचा अधिकार देण्यात आला.

- व्हाइसरॉय हे पद रद्द करण्यात आले 

- आपल्या देशासाठी राज्यघटना तयार करून स्वीकारण्याचे अधिकार दोन्ही देशांच्या संविधान सभाना देण्यात आले. 

- नवीन राज्यघटना तयार करून अमलात येईपर्यंत आपापल्या क्षेत्रासाठी कायदे करण्याचे अधिकार दोनी देशांच्या सविधान सभांना देण्यात आले. 

- भारतमंत्री हे पद रद्द करण्यात आले.

- भारतातील संस्थानांना भारतात किंवा पाकिस्तानात सामील होण्याची किंवा स्वतंत्र राहण्याची मुभा देण्यात आली.

- नवीन राज्यघटना तयार होईपर्यंत दोन्ही देशातील व त्याच्या प्रांतातील राज्यव्यवस्था भारत सरकार कायदा १९३५ नुसार पाहिली जाईल अशी तरतूद करण्यात आली.

- इंग्लंडच्या सम्राटाच्या किताबातून भारताचा सम्राट हे शब्द काढण्यात आले

कोण होते फिरोज गांधी: जाणून घेऊया....



● फिरोज गांधी यांचा जन्म 12 सप्टेंबर 1912 रोजी मुंबईतील पारशी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जहांगीर आणि आईचे नाव रतिमाई होते .


● ते मुंबईतील खेतवाडी परिसरातील नौरोजी नाटकवाला भवनात राहत असत. फिरोजचे वडील जहांगीर किलिक निक्सन येथे अभियंता होते, नंतर त्यांची वॉरंट अभियंता म्हणून पदोन्नती झाली.


● फिरोज त्यांच्या भावंडांमध्ये सर्वात लहान होता; त्यांना दोराब आणि फरीदुन जहांगीर, अशी दोन भाऊ आणि , तहमिना कार्शश अशा दोन बहिणी होत्या. 


● फिरोज यांचे कुटुंबीय मूळचे दक्षिण गुजरातमधील भरुचचे असून त्यांचे वडिलोपार्जित घर अजूनही कोटपारीवाडमध्ये आहे.


● 1920 च्या दशकाच्या सुरूवातीच्या वडिलांच्या निधनानंतर, फिरोज आपल्या आईसह अलाहाबादमधील आपल्या अविवाहित काकू, शिरीन कमिश्शरी यांच्या कडे राहिला गेले.


● फिरोज यांचे प्रारंभिक शिक्षण अलाहाबादमधील विद्या मंदिर हायस्कूलमध्ये झाले आणि त्यानंतर त्यांनी इव्हिंग ख्रिश्चन कॉलेजमधून शिक्षण घेतले.


● फिरोज हे तेथील लेडी डफरीन रुग्णालयात कामाला होते. तेथे त्यांची ओळख इंदिरा नेहरू यांच्याशी झाली. त्यांनी इंदिरा गांधी यांच्याशी लग्न केले. इंदिरा गांधी या पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या कन्या होत्या. त्यांना राजीव गांधी आणि संजय गांधी असे दोन मुले झाली.


● फिरोज गांधी हे एक भारतीय राजकारणी आणि पत्रकार होते . ते लोकसभेचे सदस्यही देखील होते. 


तलाठी विशेष


 *भारतातील  पहिली रेल्वे लाइन? Answer- ठाणे ते मुंबई (१८५३)*


 *भारतातील  पहिले तारायंत्र? Answer- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)*


*भारतातील  पहिली सूत गिरणी? Answer- मुंबई (१८५४)*


*भारतातील  पहिले स्वातंत्र्य युद्ध? Answer- इ.स. १८५७*


 *भारतातील  पहिले जलविद्युत यंत्र? Answer- दार्जिलिंग (१८९७-९८)*


*भारतातील  पहिले आकाशवाणी केंद्र? Answer- मुंबई (१९२७)*


*भारतातील  पहिला बोलपट? Answer- आलमआरा (१९३१)*


 *भारतातील  पहिली पंचवार्षिक योजना? Answer- १९५१*


 *भारतातील  पहिल्या सार्वत्रिक निवडणुका? Answer- १९५२*


*भारतातील  पहिली परमाणु चाचणी? Answer- पोखरण, राजस्थान*


 *भारतातील  पहिले क्षेपणास्त्र? Answer- (पृथ्वी १९८८)*


*भारतातील  पहिला उपग्रह? Answer- आर्यभट्ट (१९७५)*


 *भारतातील पहिली अणुभट्टी? Answer- अप्सरा तुर्भे मुंबई* *(१९५६)*


 *भारतातील  पहिला तेल शुद्धिकरण कारखाना? Answer- दिग्बोई (१९०१)*


*भारतातील  पहिला आधुनिक पोलाद कारखाना? Answer- दुल्टी (१८८७)*


*🌷भारतातील सर्वप्रथम घटना :*🌷


 *पहिली रेल्वे लाइन- ठाणे ते मुंबई (१८५३)*


*पहिले तारायंत्र- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)*

 

 *पहिले पोस्टाचे तिकीट* *१*

 *ऑक्टोबर १८५४* 


*पहिली सूत गिरणी- मुंबई (१८५४)* 


 *पहिले स्वातंत्र्य युद्ध- इ.स. १८५७*


 *पहिले जलविद्युत यंत्र- दार्जिलिंग (१८९७-९८)*

 

 *पहिला आकाशवाणी केंद्र- मुंबई (१९२७)*

 

*पहिला बोलपट- आलमआरा (१९३१)*

 

 *पहिली पंचवार्षिक योजना- १९५१*


*पहिल्या सार्वत्रिक निवडणुका- १९५२*

 

 *पहिली परमाणु चाचणी- पोखरण, राजस्थान*

 

 *पहिले क्षेपणास्त्र- (पृथ्वी १९८८)*

 

*पहिला उपग्रह- आर्यभट्ट (१९७५)*

 

*भारतातील पहिली अणुभट्टी- अप्सरा तुर्भे मुंबई (१९५६)*

 

 *पहिला तेल शुद्धिकरण कारखाना- दिग्बोई (१९०१)*

 

*पहिला आधुनिक पोलाद कारखाना- दुल्टी (१८८७)*


🌷*भारतातील पहिले :* 🌷

 

 *भारताचा पहिला गव्हर्नर जनरल- वॉरन हेस्टिंग्ज*

 

*पहिला व्हाइसरॉय- लॉर्ड कॅनिंग स्वतंत्र भारताचे*

 

*पहिले गव्हर्नर जनरल- लॉर्ड माऊंट बॅटन*

 

 *राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष- व्योमेशचंद्र बॅनर्जी*

 

 *पहिले राष्ट्रपती- डॉ. राजेंद्र प्रसाद*

 

 *पहिले पंतप्रधान- पं. जवाहरलाल नेहरू*

 

 *पहिले कायदामंत्री- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

 

 *पहिले वर्तमानपत्र- दि बेंगॉल गॅजेट (२१ जानेवारी १७८१)*

 

*स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख- फिल्ड मार्शल करिअप्पा*

 

 *पहिला भारतीय आयसीएस अधिकारी- सत्येंद्रनाथ टागोर*

 

*भारताचे पहिले फिल्ड मार्शल- जनरल माणेकशा (१९७२)*

 

*इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय- राजा राममोहन राय*


*सर्वात लहान राज्य- गोवा (क्षेत्रफळ)*


 *सर्वात लहान लोकसंख्येचे राज्य- सिक्कीम*


*सर्वात कमी लोकसंख्येची घनता - अरुणाचल प्रदेश.*


*भारतातील सर्वात उंचमिनारकोणते ? Answer- कुतूबमिनार (दिल्ली) २९० फूट*


   *सर्वात उंचवृक्षकोणते ? Answer- देवदार*


 *भारतातील सर्वात मोठेसरोवर? Answer वुलर सरोवर (काश्मीर)*


 *भारतातील सर्वात मोठा जिल्हा? Answer- लडाख (जम्मू- काश्मीर)*


  *भारतातील सर्वात मोठा मानवनिर्मित कालवा? Answer- इंदिरा गांधी कालवा (राजस्थान)*


 *भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ)? Answer- राजस्थान*


*भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य? Answer- उत्तर प्रदेश*


*भारतातील सर्वात मोठे धरण? Answer- भाक्रा (७४० फूट)*


*भारतातील सर्वात मोठा धबधबा? Answer- गिरसप्पा (कर्नाटक)*


 *भारतातील सर्वात मोठे वाळवंट? Answer- थर (राजस्थान)*


*भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म? Answer- खरगपूर (प. बंगाल)*


 *भारतातील सर्वात मोठे क्रीडांगण? Answer- प्रगती मैदान (दिल्ली)*


 *भारतातील सर्वात मोठी मस्जिद? Answer- जामा मशीद*


*भारतातील  सर्वाधिक वनक्षेत्रे असलेले राज्य? Answer- मध्य प्रदेश*


*भारतातील सर्वात उंच दरवाजा? Answer- बुलंद दरवाजा*


*भारतातील सर्वात मोठे गुरुद्वारा? Answer- सुवर्ण मंदिर (अमृतसर)*


*भारतात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो? Answer- मावसिनराम (मेघालयं)


थोर भारतीय विचारवंत



(१) राजा राममोहन राॅय :--
           जन्म २२मे १७७२ रोजी पश्चिम बंगालमधील हुबळी जिल्ह्य़ातील राधानगर या गावी झाला. भारतीय सामाजिक, धार्मिक सुधारणांचे प्रवर्तक.सतीची चाल बंद करण्यासाठी लोकजागृती केली.
मृत्यू २७ सप्टेंबर १८३३

(२) स्वामी विवेकानंद :--
            जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता येथे. ११सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेत शिकागो येथे
भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले.  ४ जुलै १९०२ रोजी महानिर्वाण.

(३) रवींद्रनाथ टागोर :--
            ७ मे १८६१ रोजी कोलकाता येथे जन्म .'जन-गण -मन ' या राष्ट्रगीताचे जनक. गीतांजली
हे त्यांचे प्रसिद्ध काव्य. मृत्यू ७ आॅगस्ट १९४१.

(४) न्यायमूर्ती रानडे :--
           जन्म १८जानेवारी १८४२ रोजी नाशिक जिल्ह्य़ातील निफाड गावी. भारतात सनदशीर राजकारणाचा पाया घातला. विधवाविवाहाचे समर्थन. मृत्यू १६ जानेवारी १९०१.

(५)लोकमान्य टिळक :--
             जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे. भारतीय राजकीय प्रवाहातील जहालांचे नेतृत्व .'सार्वजनिक गणेशोत्सव 'व ' शिवजयंती 'हे उत्सव सुरू केले. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि तो मी मिळविणारच." हे त्यांचे उद्गगार प्रसिद्ध आहेत. मृत्यू १ आॅगस्ट १९२०.

(६) महात्मा गांधी :--
            जन्म गुजरातमधील पोरबंदर या गावी २ आॅक्टोबर, १८६९. दक्षिण आफ्रिकेत 'एशियाटिक रजिस्ट्रेशन अॅक्ट' या काळ्या कायद्यास  सत्याग्रहाच्या मार्गाने यशस्वी विरोध. १९२० ते १९४७ पर्यंतचा भारताचा स्वातंत्र्यलढा त्यांच्याच नेतृत्वाखाली
लढविला गेला. मृत्यू ३० जानेवारी,१९४८.

(७) पंडित जवाहरलाल नेहरू :--
              जन्म १४ नोव्हेंबर, १८८९ रोजी अलाहाबाद येथे. गांधीचे लाडके शिष्य. गांधीजींच्या तीनही लढ्यात महत्त्वपूर्ण सहभाग. स्वतंत्र भारताचे
पहिले पंतप्रधान. पंचशील तत्त्वांचा पुरस्कार.

(८) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर :--
         जन्म १४ एप्रिल,१८९१रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी.प्रख्यात कायदेपंडित.भारतीय घटनेचे शिल्पकार. मृत्यू ६ डिसेंबर १९५६.

(९) सुभाषचंद्र बोस :--
               जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी कटक येथे. भारताच्या महान क्रांतिकारक नेत्यांपैकी एक. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर ब्रिटिशांच्या नजरकैदेत."तुम मुझे खून दो ;मै तुम्हे आजादी दुंगा " हे त्यांचे प्रसिद्ध घोष वाक्य आहे. १८ आॅगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात दुर्दैव अंत झाला,असे म्हटले जाते.

(१०) इंदिरा गांधी :--
               जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे. १९४२ च्या चळवळीत सहभाग. शास्त्रीजींच्या निधनानंतर १९६६ मध्ये भारताच्या
पहिल्या महिला पंतप्रधान. ' बांगलादेशाची निर्मिती 'ही त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील सर्वोच्च घटना. मृत्यू  ३१ आॅक्टोबर १९८४.

बस्टील



 बॅस्टील पॅरिसच्या पूर्वबाजूस असलेला व ब्रिटिशांच्या हल्ल्यापासून पॅरिसचे रक्षण करण्यासाठी बांधलेला फ्रान्समधील इतिहास प्रसिद्ध किल्ला.
बॅस्टील या शद्बाचे दोन अर्थ आहेत : तटबंदीयुक्त इमारत व शस्त्रागार. याची उभारणी ह्यूजिस ऑब्रिएट याच्या मार्गदर्शनाखाली १३६९-१३७० मध्ये शतवार्षिक युद्धाच्या वेळी झाली.

 पाचव्या चार्ल्सच्या राजवाड्याच्या संरक्षणार्थ ती करण्यात आली. या आयताकृती किल्ल्याला २३ मी. उंचीचे आठ बुरूज असून ते सलग भिंतीने जोडलेले होते. किल्ल्याच्या सभोवती रुंद खंदक होता. फ्रान्सचा शासकीय तुरुंग म्हणून याची प्रसिद्धी होती.

तेथे राजकीय व संकीर्ण स्वरुपाचे गुन्हेगार कैदी म्हणून ठेवीत. सोळाव्या शतकापर्यंत त्याचा लष्करी दृष्ट्या उपयोग केला जाई. त्यानंतर १६२० पासून फ्रान्सचा पंतप्रधान आर्मां झां रीशल्य याने त्याचा कारागृह म्हणून प्रथम वापर करण्यास सुरुवात केली. सुमारे ४० कैदी येथे असत. त्यांचा येथे अनन्वित छळ केला जाई.

राजाच्या विरोधकांची न्यायालयीन चौकशी न करता त्यांच्या कारवासाची मुदत राजाच्या मर्जीवर अवलंबून असे. येथे जप्त केलेली पुस्तकेही आणून ठेवीत. या किल्ल्याच्या व्यवस्थापनास फार खर्च येऊ लागला; म्हणून तो पाडण्यात यावा, अशा प्रकारचे विचारही १७८४ मध्ये प्रसृत झाले.


फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात बॅस्टील हे अनियंत्रित राज्यसत्तेच्या अन्यायाचे व जुलमाचे प्रतीक मानले गेले. जुलै १७८९ च्या सुरुवातीस १६ व्या लूईने राष्ट्रीय सभा (नॅशनल असेंब्ली) नेस्तनाबूत करण्यासाठी पॅरिसच्या आसपास लष्कराची जमवाजमव सुरू केली, तेव्हा राष्ट्रीय सभेने त्याला लष्कर मागे घेण्यास सांगितले; पण लुईने ह्या कृतीस नकार दिला व त्या वेळचा लोकप्रिय झालेला अर्थमंत्री झाक नेकेर यास बडतर्फ केले (१७८१).

राजाच्या बेमुर्वतपणामुळे चिडून जाऊन कॅमिल देमुलच्या नेतृत्वाखाली जनतेने जोराचा उठाव केला व केला व १४ जुलै १७८९ रोजी तेथील कैदी सोडविण्यासाठी व युद्धसामग्री हस्तगत करण्यासाठी बॅस्तीलच्या किल्ल्यावर हल्ला केला. किल्ल्यावरील प्रमुख अधिकारी व राज्यपाल बेरनार रने झॉरदां लोनो याच्या मदतीस यावेळी फक्त १३० फ्रेंच सैनिक होते.

त्यास पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा तेथे नव्हता. थोड्याशा प्रतिकारानंतर दुपारच्या सुमारास लोनोने किल्ला क्रांतिकारकांच्या ताब्यात दिला. क्रांतिकारकांनी किल्ल्यात प्रवेश केल्यावर तुरुंग फोडून तेथील कैद्यांस मुक्त केले आणि किल्ल्याच्या मोडतोडीस प्रारंभ केला. त्या वेळी आत फक्त सात कैदी होते. प्रक्षुब्ध जमावाने लोनोचा बळी घेतला.

बॅस्टीलचा पाडाव हा लष्करी दृष्ट्या फारसा महत्त्वाचा नसला, तरी त्याचे राजकीय महत्त्व मोठे आहे. यामुळे क्रांतीकारकांना लुईविरुद्ध महत्त्वाचा विजय मिळाला. लोकांचा लूईबद्दलचा आदर कमी झाला. बॅस्तीलच्या पाडावामुळे पॅरिसच्या जनतेत स्वसामर्थ्याची प्रखर जाणीव झाली.

बॅस्टीलचा किल्ला पुढे संपूर्णपणे पाडण्यात येऊन त्या जागी १७८९ व १८३० मध्ये झालेल्या क्रांत्यांमधील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ एक ब्राँझचा स्तंभ उभारण्यात आला. पुढे १४ जुलै हा बॅस्तीलदिन म्हणून राष्ट्रीय सुटीचा दिवस जाहीर करण्यात आला (१८८०). तो दिवस मिरवणुका, भाषणे, नृत्य इत्यादींनी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो.

मराठी व्याकरण - काळ ओळखा.


● *क्रिया चालू असते, तेव्हा क्रियापद वर्तमानकाळी असते.*

● *क्रिया पूर्वी झालेली असते, तेव्हा क्रियापद भूतकाळी असते.* 

● *क्रिया पुढे व्हायची असते, तेव्हा क्रियापद भविष्यकाळी असते.*


🔹 *खालील वाक्यांचा काळ ओळखा.*


*(१) सुप्रिया पुस्तक वाचते.*

उत्तर -- वर्तमानकाळ 


*(२) सुमितने पुस्तक वाचले.*

उत्तर -- भूतकाळ


*(३) चंदना पुस्तक वाचील.*

उत्तर -- भविष्यकाळ 


*(४) आर्यन चित्र काढतो.*

उत्तर -- वर्तमानकाळ 


*(५) धिरजने चित्र काढले.*

उत्तर -- भूतकाळ


*(६) आदित्य चित्र काढील.*

उत्तर -- भविष्यकाळ 


*(७) सानिया साखर खाते.* 

उत्तर -- वर्तमानकाळ 


*(८) सृष्टीने साखर खाल्ली.*

उत्तर -- भूतकाळ


*(९) रोहिणी साखर खाईल.* 

उत्तर -- भविष्यकाळ 


*(१०) ताई शाळेत जाते.* 

उत्तर -- वर्तमानकाळ 


*(११) माई शाळेत गेली.* 

उत्तर -- भूतकाळ


*(१२) बाई शाळेत जाईल.*

उत्तर -- भविष्याकाळ


*(१३) आम्ही अभ्यास करतो.* 

उत्तर -- वर्तमानकाळ 


*(१४) आम्ही अभ्यास केला.*

उत्तर -- भूतकाळ


*(१५) आम्ही अभ्यास करू.* 

उत्तर -- भविष्यकाळ 


*(१६) पंडित नेहरू भारताचे पंतप्रधान होते.*

उत्तर -- भूतकाळ


*(१७) उद्या आमची सहल जाईल.*

उत्तर -- भविष्यकाळ 


*(१८) मी अभ्यास करतो.*

उत्तर -- वर्तमानकाळ 


*(१९) गाय चारा खाते.*

उत्तर -- वर्तमानकाळ 


*(२०) म्हैस चारा खाईल.* 

उत्तर -- भविष्यकाळ

पंतप्रधान बाबत मते

❇️ लॉर्ड मोर्ले:-

समानातील प्रथम

मंत्रिमंडळ रुपी कमानीच्या आधारभूत शिळा


❇️ हर्बर्ट मॅरीसन:-

सरकारचा प्रमुख या नात्याने तो समानातील प्रथम आहे पण आजच्या काळात हे वर्णन तोकडे आहे.


❇️ विल्यम हारकोर्ट:-

कमी तेजस्वी ताऱ्यामधील चंद्र


❇️ जेनिग्ज:-

ग्रह ज्याच्या भोवती फिरतात असा हा सूर्य आहे.


❇️ एच जे लास्की:-

ज्या केंद्राभोवती संपूर्ण सरकारी यंत्रणा फिरते असा हा केंद्रबिंदू आहे.


❇️ एच आर जी ग्रीवझ:-

सरकार हे देशाचे स्वामी आहेत आणि पंतप्रधान सरकारचा स्वामी आहे.


❇️ मनरो:-

हा राज्याच्या नौकेचा कप्तान आहे.


❇️ रमसे मुर:-

राज्याच्या नौकेचा सुकाणू चालवणारा खलाशी आहे.

पोलीस भरतीसाठी महत्वाचे 50 प्रश्न उत्तरे :-


1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

➡️ नाईल (4,132 मैल)


2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?

➡️ आशिया


3) जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे?

➡️ रशिया


4) जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?

➡️ थ्री गोर्जस डँम (three gorges dam)


5) जगातील सर्वात मोठ्या आकाराचे फुल कोणते आहे?

➡️ राफलेशिया अर्नोल्डिया (Rafflesia Arnoldia)


6) जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे?

➡️ ग्रीनलँड (Greenland)


7) जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे?

➡️ अंटार्टिक ब्ल्यू व्हेल (Antartic Blue Whale)


8) जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे?

➡️ माउंट एव्हरेस्ट


9) सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे?

➡️ मौसीमराम


10) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे?

➡️ जेफ बेझोस


11) जगातील सर्वात महागडी गाडी कोणती आहे?

➡️ बुगाटी ला व्हॉइचर नॉइर (Bugatti La Voiture Noire)


12) जगातील सर्वात उंच बिल्डिंग कोणती आहे?

➡️ बुर्ज खलिफा


13) जगातील सर्वात लहान देश कोणता आहे?

➡️ व्हॅटिकन सिटी


14) पृथ्वीवर एकूण किती महासागर आहे? 

➡️ 5


15) जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे?

➡️ वॉल-मार्ट


16) जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे?

➡️ कतार


17) जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे?

➡️ कांगो


18) जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे? 

➡️ एंजल फॉल्स


19) जगातील सर्वात जलद धावणारी रेल्वे कोणती आहे?

➡️ जपानमधील बुलेट ट्रेन


20) जगातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश कोणता आहे?

➡️ व्हॅटिकन सिटी (लोकसंख्या 1000)


21 जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे?

➡️ चीन


22) जगातील सर्वात विषारी साप कोणता आहे? 

➡️ इनलंड ताईपान


23) आकाशगंगेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?

➡️ गुरु


24) आकाशगंगेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे?

➡️ बुध


25) वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे?

➡️ 21 जून


26) वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता आहे?

➡️ 22 डिसेंबर


27) जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता आहे?

➡️ पॅसिफिक समुद्र


28) जगातील सर्वात लहान समुद्र कोणता आहे?

➡️ आर्टिक समुद्र


29) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे?

➡️ बी हमिंग बर्ड


30) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे?

➡️ शहामृग


31) चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण?

➡️ नील आर्मस्ट्रॉंग


32) विमानाचा शोध कोणी लावला?

➡️ राईट बंधू


33) अस्तित्वात असलेला जगातील सर्वात प्राचीन धर्म?

➡️ सनातन धर्म


34) जगात सर्वात आधी परमाणु हमला झालेले नगर कोणते?

➡️ हिरोशिमा


35) जगातील प्रथम महिला प्रधानमंत्री कोण?

➡️ एस. भंडारनायके (लंका)


36) जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे?

➡️ टोकियो


37) जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे?

➡️ महाभारत


38) सर्वात जास्त विकला जाणारे इंग्रजी वर्तमानपत्र कोणते आहे?

➡️ द टाइम्स ऑफ इंडिया


39) जगातील सर्वात लांब भुयार कोणते आहे?

➡️ नार्वे सुरंग


40) जगातील सर्वात मोठी भिंत कोणती आहे?

➡️ ग्रेट वॉल ऑफ चीन


41) पुस्तक मुद्रित करणारा पहिला देश कोणता?

➡️ चीन


42) स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान कोण होते?

➡️ पंडित जवहरलाल नेहरू


43) जगातील सर्वात जुने लोकतंत्र कोणते आहे?

➡️ युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका


44) भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण?

➡️ सिकंदर


45) हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला?

➡️ दयाराम साहनी


46) शीख धर्माचे शेवटचे गुरु कोण होते?

➡️ गुरुगोविंद सिंग


47) भारताची प्रथम महिला शासक कोण होती?

➡️ रझिया सुलतान


48) भारतातील सर्वात पहिला चित्रपट कोणता?

➡️ राजा हरिश्चंद्र


49) भारतातील सर्वात प्रथम रंगीत चित्रपट कोणता?

➡️ झाशीची राणी


50) भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली होती?

➡️ लॉर्ड मेकॉले

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

ससदीय प्रणाली व अध्यक्ष प्रणालीचा तुलनात्मक अभ्यास.

🔵 ससदीय प्रणालीची वैशिष्ट्ये

▪️या प्रणालीमध्ये धोरणे व कृतींसाठी कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार असते.

1. बहुमताच्या पक्षाची सत्ता

2. सामूहिक जबाबदारीचे तत्त्व

5. राजकीय एकजिनसीपणा : एकच राजकीय विचारसरणी

4. दुहेरी सदस्यत्व : संसद सदस्य मंत्री बनू शकतात. मंत्रिमंडळ व कायदेमंडळ दोहोंचे सदस्यत्व.

5. पंतप्रधानाचे नेतृत्व

6. कनिष्ठ गृहाचे विसर्जन करता येते

7. अधिकारांचे एकत्रीकरण.


🔵 अध्यक्षीय प्रणालीची वैशिष्ट्ये

▪️यथे घटनात्मकदृष्ट्या कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळापासून स्वतंत्र असते.

1. अध्यक्ष आणि सभासद यांची निश्चित

कालावधीसाठी निवड.

2. सामूहिक जबाबदारी नाही.

3. राजकीय एकजिनसीपणा असेलच असे नाही.

4. एकेरी सदस्यत्व

5. अध्यक्षाचे नेतृत्त्व

6. अधिकारांची विभागणी


✅ ससदीय प्रणालीचे फायदे

1. कार्यकारी मंडळ व कायदेमंडळ यांच्यात सामंजस्य.

2. उत्तरदायी सरकार.

3. विस्तृत प्रतिनिधित्व


✅ अध्यक्षीय प्रणालीचे फायदे

1. स्थिर सरकार.

2. धोरणांमध्ये निश्चितता.

3. अधिकार विभागणीवर आधारित.

4. तज्ज्ञांचे सरकार.


🔴 ससदीय प्रणालीमधील उणीवा

1. अस्थिर सरकार.

2. धोरणांमध्ये सातत्याचा अभाव.

3. अधिकार विभागणीच्या तत्त्वाविरोधी.

4. नवशिक्यांचे सरकार.

👉 उदा.बहुतांशी युरोपीय राष्ट्र, जपान, कॅनडा, भारत, मलेशिया, स्वीडन.


🔴 अध्यक्षीय प्रणालीमधील उणीवा

1. कार्यकारी मंडळ व कायदेमंडळ यांच्यात संघर्ष.

2. उत्तरदायी सरकार नाही.

3. एकाधिकारशाही 

4. संकुचित प्रतिनिधित्व.

👉 उदा :- अमेरिकन राष्ट्रे काही अपवादसह (उदा. कॅनडा), अफगाणिस्तान, ब्राझील, घाना, मालदीव, रशिया, फिलिपिन्स, तुर्की, बेलारुस, सायप्रस, श्रीलंका.

नियंत्रक आणि महालेखा परीक्षक

     नियंत्रक आणि महालेखाकार (कॅग) भारत लेख 148 स्थापना करून एक अधिकार आहे, भारतीय संविधानाच्या , जे ऑडिट सर्व पावत्या आणि खर्च या भारत सरकारच्या आणि राज्य सरकार , संस्था आणि अधिकारी सेवनाने यांनी आर्थिक त्या सरकार. कॅग ही सरकारी मालकीच्या कंपन्यांचे बाह्य ऑडिटरही आहेआणि सरकारी कंपन्यांचे पूरक लेखापरीक्षण करते, म्हणजेच कोणतीही नॉन-बँकिंग / बिगर-विमा कंपनी ज्यात केंद्र सरकारची इक्विटी हिस्सा कमीतकमी 51१ टक्के किंवा विद्यमान सरकारी कंपन्यांच्या सहाय्यक कंपन्यांचा हिस्सा आहे. कॅगचे अहवाल संसद / विधिमंडळात मांडले जातात आणि लोकलेखा समित्यांनी (पीएसी) आणि सार्वजनिक उपक्रमांवरील समित्यांनी (सीओपीयू) विचारात घेतल्या आहेत, ज्या भारतीय संसदेत आणि राज्य विधानमंडळातील विशेष समित्या आहेत . कॅग भारतीय ऑडिट अँड अकाउंट्स विभागाचे प्रमुख देखील आहेत, ज्याचे कामकाज भारतीय ऑडिट आणि अकाउंट्स सर्व्हिसेसच्या अधिका by ्यांमार्फत केले जातात आणि देशभरात (०१.०3.२०२० पर्यंत), 43,576 employees कर्मचारी आहेत.


नियुक्ती

नियंत्रक आणि भारत महालेखापरीक्षक नियुक्त केले राष्ट्रपती भारत  एक शिफारसीचे अनुसरण पंतप्रधान . भेटीनंतर, त्याने / तिला राष्ट्रपतींसमोर शपथ किंवा कबुली द्यावी लागेल.



कॅग कर्तव्ये

घटनेतील तरतुदीनुसार कॅगचा (डीपीसी) (कर्तव्ये, अधिकार व सेवा अटी) कायदा १ 1971.. लागू करण्यात आला. विविध तरतुदींनुसार, कॅगच्या कर्तव्यांमध्ये ऑडिट समाविष्ट आहेः

भारतीय समेकित निधी व राज्य व केंद्र शासित प्रदेश विधानसभेचे असणारी पावती व खर्च.

ट्रेडिंग, मॅन्युफॅक्चरिंग, नफा आणि तोटा खाती आणि ताळेबंद आणि इतर सहाय्यक खाती कोणत्याही सरकारी विभागात ठेवली जातात; शासकीय कार्यालये किंवा विभागांत ठेवलेली स्टोअर व साठा यांचे लेखा

कंपनी अ‍ॅक्ट, २०१ of मधील तरतुदीनुसार सरकारी कंपन्या .

संबंधित कायद्याच्या तरतुदीनुसार संसदेने बनविलेल्या कायद्यांनुसार किंवा त्या अंतर्गत स्थापना केलेली महामंडळे.

केंद्र आणि राज्य सरकारांच्या एकत्रित निधीतून प्राधिकरणास आणि संस्थांना मोठ्या प्रमाणात वित्तपुरवठा केला जातो. एकत्रीकृत निधीकडून भरीव अर्थसहाय्य दिले गेलेले नसले तरीही कोणाचे किंवा प्राधिकरण, त्याचे लेखापरीक्षण सीएंडएजीकडे सोपविले जाऊ शकते.

विशिष्ट उद्देशाने संस्था व प्राधिकरणास शासनाने दिलेले अनुदान व कर्ज.

तांत्रिक मार्गदर्शन व समर्थन (टीजीएस) अंतर्गत पंचायती राज संस्था आणि शहरी स्थानिक संस्था यांचेकडे सोपविलेले ऑडिट.


महत्त्वाचे 25 प्रश्न उत्तरे



१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?

उत्तर -- सावित्रीबाई फुले 

---------------------------------------------------

२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?

उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)

---------------------------------------------------

३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?

उत्तर -- आनंदीबाई जोशी 

---------------------------------------------------

४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?

उत्तर -- लता मंगेशकर 

--------------------------------------------------

५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी 

---------------------------------------------------

६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?

उत्तर -- प्रतिभाताई पाटील 

--------------------------------------------------

७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?

उत्तर -- कल्पना चावला

--------------------------------------------------

८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी 

--------------------------------------------------

९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर -- बचेंद्री पाल 

--------------------------------------------------


१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?

उत्तर -- मीरा कुमार 

--------------------------------------------------

११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?

उत्तर -- किरण बेदी 

-------------------------------------------------

१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?

उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी 

--------------------------------------------------

१३) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?

उत्तर -- प्रेमा माथूर

--------------------------------------------------

१४) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?

उत्तर -- पी. टी. उषा 

--------------------------------------------------

१५) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?

उत्तर -- नेमबाजी 

--------------------------------------------------

१६) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?

उत्तर -- सुश्मिता सेन 

--------------------------------------------------

१७)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?

उत्तर -- मदर तेरेसा

--------------------------------------------------

१८) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- बॅडमिंटन

-------------------------------------------------

१९) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?

उत्तर -- लाॅन टेनिस 

-------------------------------------------------

२०) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर -- बाॅक्सिंग 

---------------------------------------------------


२१) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- तिरंदाजी 

---------------------------------------------------

२२) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- जलतरण

---------------------------------------------------

२३) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- बुध्दिबळ 

---------------------------------------------------

२४) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- वेट लिफ्टिंग 

---------------------------------------------------

२५) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?

उत्तर -- अनुताई

राज्यघटना -



1.संविधानाच्या कुठल्या कलमांतर्गत लोकसभा आणि राज्य विधान सभा निवडणुका प्रौढ मताधिकाराने होणे नमूद केले गेले आहे?


१.322

२.324

३.326✅

४.329



2. SC-ST करिता विशेष तरतुदी संदर्भात असणाऱ्या यादीत कोणत्या जातीला समाविष्ट करायचे हा अंतिम अधिकार कोणाचा आहे?

१. संसद✅

२.राज्याचे राज्यपाल

३.राष्ट्रपती

४. सर्वोच्च न्यायालय



3.खालील विधानांचा विचार करा.

अ. लोकशाही समाजवादी प्रणालीमध्ये सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व असते.

ब. भारतीय समाजवाद हा मार्क्सवाद व गांधीवाद यांचा मिलाफ आहे.

क. भारतीय समाजवाद मार्क्सवादी समाजवादाकडे अधिक झुकलेला दिसतो.

ड. 1991 च्या 'उखाजा' धोरणामुळे भारताची समाजवादी ओळख कमी झाली आहे.


वरील विधानांतून योग्य विधाने ओळखा.

१.अ,ब,क,ड

२.अ,ब,ड✅

३.अ,क,ड

४.ब,क,ड


4.भारतीय राज्यघटना सरनाम्यातील सामाजिक , आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श नमूद केले आहेत. 


या तिन्ही प्रकारांचे मूळ स्रोत कोणते?

१.फ्रेंच राज्यक्रांती 1789

२.रशियन राज्यक्रांती 1917✅

३.जर्मनी (वायमर संविधान)

४.जपान संविधान


5. आंतरराष्ट्रीय न्यायालयात नियुक्त झालेले प्रथम भारतीय न्यायाधीश कोण होते?


१.डॉ नागेन्द्र सिंह✅

२.जी. वी. माळवणकर

३.जगदीश चंद्र बसु

४.आर. के. नारायण


6. नागरिकत्व मिळवणे व गमावणे याबाबत आणि नागरिकत्वासंबंधी इतर कोणत्याही विषयाबाबत तरतुदी करण्याचा संसदेचा अधिकार राज्यघटनेच्या कितव्या कलमात नमूद केलेला आहे?

१.कलम 11✅

२.कलम 10

३.कलम 9

४.कलम 8


7. परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारक(OCI) व्यक्तीस भारतीय नागरिकत्व प्राप्तीसाठी अर्ज नोंदणीपूर्वी किती दिवस भारतीय वास्तव्य आवश्यक आहे?

१.12 महिने

२.3 वर्ष

३.5 वर्ष✅

४.7 वर्ष


8. भारतात प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार कोणाला दिला आहे?

१.राष्ट्रपती

२.पंतप्रधान

३.सर्वोच्च न्यायालय

४.संसद✅


9. मूलभूत हक्क अंमलबजावणीसाठी कायदे करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत?

१.केंद्रीय मंत्रिमंडळ

२.संसद✅

३.राज्य विधिमंडळ

४.संसद आणि राज्य विधिमंडळ


10. खालील विधानांचा विचार करा.

अ. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क राज्यांच्या कारवाईपासून संरक्षित आहेत.

ब. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क खासगी व्यक्तीपासून संरक्षित नाहीत.

क. कलम 19 मधील हक्क भारतीय नागरिक व कम्पनी भागधारकांना लागू आहेत.

ड. कलम 19 मधील हक्क परकीय नागरिक किंवा निगम/कम्पनी यांना लागू नाहीत.

पर्याय

१.अ,ब,क,ड✅

२.अ,ब,क

३.ब,क,ड

४.अ,ब,ड

बटुकेश्वर दत्त 

बटुकेश्वर दत्त यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९०६ ला ओवारी नावाच्या गावात जे आत्ता पश्चिम बंगालमध्ये आहे तिथे झाला. बटुकेश्वर दत्त यांना जवळचे मित्र बिके, बट्टू अशा नावांनी हाक मारायचे. तिथल्याच पीपीएम हायस्कूलमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं.

महाविद्यालयीन काळातच ते आझाद आणि भगतसिंगांसारख्या तरुणांच्या संपर्कात आले. ‘हिंदुस्तान सोशल रिपब्लिक असोसिएशन’ या जहाल क्रांतिकारी संघटनेच्या संपर्कात येऊन आपापल्या पद्धतीने का होईना पण भारताला स्वातंत्र्य मिळवायचे यासाठी ते काम करू लागले.

१९२९ या बॉम्ब हल्ल्याच्या प्रकरणानंतर काही काळासाठी त्यांना लाहोर जेलमध्ये भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह ठेवण्यात आले. तेथे त्यांनी आणि भगतसिंगांनी एक गोष्ट सरकारच्या निदर्शनास आणून दिली की आम्ही राजकीय कैदी असताना सुद्धा आम्हाला गुन्हेगारासारखं वागवले जात आहे.



ते बंद व्हावं म्हणून त्यांनी जवळजवळ ४० दिवसांचं उपोषण केलं. त्यांच्या बऱ्याचशा मागण्या मान्य झाल्या पण पुढे भगतसिंग यांना फाशीची शिक्षा दिली गेली आणि बटुकेश्‍वर दत्त यांची रवानगी अंदमानात झाली.

एक वेळ मृत्यू परवडला पण अंदमान नको अशी परिस्थिती असणाऱ्या या अंदमानात १९४२ पर्यंतची वर्ष अत्यंत हलाखीत, अत्यंत हाल अपेष्टा सहन करत त्यांनी काढली. वीर सावरकरांच्या चरित्रात सुद्धा काही वेळा या दत्तांचा उल्लेख येतो.

१९४२ ला अंदमानातून सुटल्यानंतर ताबडतोब मोहनदास गांधींनी सुरू केलेल्या ‘भारत छोडो’ आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. दिल्लीत निदर्शने करत असताना त्यांना पुन्हा अटक झाली ती चार वर्षांसाठी.

१९४७ ला भारत वसाहतवादी सत्तेच्या तडाख्यातून मुक्त झाला आणि दत्त सारख्या अनेकांची सुटका झाली. ज्याच्यासाठी आतापर्यंत आपण आपले आयुष्य वेचले निदान त्या स्वतंत्र भारतात तरी क्रांतिकारकांना, देशभक्तांना योग्य स्थान, योग्य मान मिळेल ही अपेक्षा मात्र फोल ठरली.

याचाच अर्थ या तरुणांनी क्रांतिकारकांनी आपले शरीर आणि आपले आयुष्य या स्वांतत्र्य कार्यात वाहून घेतलं, आपलं समर्पण दिले आहे, आपलं बलिदान दिले त्या सगळ्यांचे बलिदान व्यर्थ होते.

अर्थात या सगळ्या शिक्षा भोगून राहिलेले क्रांतिकारी स्वतंत्र भारतात सुद्धा काही मान किंवा जगण्याला पुरेल अशी व्यवस्था सुद्धा मिळवू शकले नाहीत.

सोडवा :- महत्त्वाचे प्रश्न

1)अति मद्य सेवनामुळे ….. या जीवनसत्वाचा अभाव निर्माण होवून पेलाग्रा हा विकार जडतो. 

  बी-1 👈

  बी-5 

  बी-7 

  बी-2



2)पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात?

  पाणलोट 

  शेततळी 

  मालगुझरी 👈

  जोहड



3)जगातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेचे उद्घाटन कोठे झाले आहे?

  जर्मनी👈 

  जपान 

  फ्रान्स 

  रुस



4)सलाबत खानचा मकबरा हे कोणाचे वास्तविक नाव आहे?

  आलमगीर 

  ताहीराबाद 

  भुईकोट किल्ला 

  चाँदबिबी महल 👈



5)समुद्रातील ……. या प्राण्यामुळे मोती मिळतात. 

 सी-लिली 

 ऑयस्टर 👈

 स्टिंग रे 

 यापैकी नाही



6)डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी …… येथे झाला.

  नागपूर 

  आंबवडे 

  महू 👈

  जबलपूर



7)राऊस सार्कोमा (RVS) या विषाणूमुळे ….. हा रोग उद्भवतो?

  एड्स 

  कृष्ठरोग 

  कर्करोग 👈

  हिवताप



8)जगातील सर्वात कॅशलेस व्यवहार कोणता देश करतो?

  बेलारूस 

  बेल्जियम 👈

  फ्रान्स 

  कॅनडा



9)‘विद्वान’ चे स्त्रीलिंगी रूप कोणते?

  विद्या 

  विद्वानिण 

  विदुषी 👈

  विधवा



10)…. संस्था क्रांतिकारी राष्ट्र्वादाशी संबंधित होती.

  अभिनव भारत  👈

  होमरूल लीग 

  बॉम्बे असोसिएशन 

  यापैकी  नाही



11)खालीलपैकी कोणाला ऑलम्पिक पदक मिळालेले नाही?

  मेरी कोम 

  दिपा कर्मारकर 👈

  कर्नाम मल्लेश्वरी 

  साक्षी मलिक



12)पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान ….. आहे.

  राहुरी 

  पेडगाव 

  चोंडी 👈

  राशिन



13)पहिल्या भारतीय अमेरिकन ज्यांची अमेरिकेच्या सिनेटवर निवड झाली आहे?

  कमला शिरीन 

  कमला हॅरीस 👈

  राधा नारायण 

  मृणालिनी रॉय



14)राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या गृहाचे सदस्य भाग घेत नाहीत?

  विधानपरिषद 👈

  लोकसभा 

  राज्यसभा 

  विधानसभा



15)‘थंडा फराळ करणे’ या वाक्य प्रचाराचा अर्थ काय?

  भरपेट फराळ करणे 

  फराळ करणे 

  थंड जेवण करणे 

  उपाशी रहाणे 👈




16)स्वच्छ भारत अभियानाचे घोष वाक्य.

  एक कदम स्वच्छता की ओर 👈

  हमारा भारत स्वच्छ भारत 

  हम स्वच्छ भारत स्वच्छ 

  स्व्च्छताही उन्नती है



17)आंतरराष्ट्रीय महिला दिन …… हा आहे?

  १० आॅगस्ट 

  १६ सप्टेंबर 

  ८ मार्च 👈

  ११ डिसेंबर



18)नागराज मंजुळे या दिग्दर्शकाचा खालीलपैकी कोणता चित्रपट नाही? 

  दुनियादारी 👈

  सैराट 

  पिस्तुल्या 

  फँड्री



19)आशियाई विकास बँक चे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?

  दिल्ली 

  ढाका 

  मनिला 👈

  कोलंबो



20)सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती?

  इंफाळ 

  कोहिमा 

  गंगटोक 👈

  आगरतळा




भारतीय राष्ट्रध्वजाचा विकास.



●पहिला राष्ट्रध्वज : १९०२ रोजी ʼस्वामी विवेकानंदʼ आणि ʼभगिनी निवेदिताʼ यांनी भारताचा पहिला राष्ट्रध्वज तयार केला. 


●हा राष्ट्रध्वज स्वदेशी चळवळ अंतर्गत दिनांक ७ ऑगस्ट १९०६ रोजी कॉंग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात तत्कालीन अध्यक्ष दादाभाई नवरोजी द्वारा पारसी बाग चौक (ग्रीन पार्क) येथे फडकविला गेला.


● हिरवा, पिवळा, लाल रंगाच्या या राष्ट्रध्वजात वरच्या पट्ट्यात एकूण ८ कमळ व खालच्या पट्ट्यात ʼसूर्यʼ आणि ʼचंद्रʼ यांचे चित्र आहे. तर मधल्या पट्ट्यात 'वंदे मातरम' हे स्वदेशी चळवळीतील घोषवाक्य आहे.


●द्वितीय ध्वज : १९०७  रोजी जर्मनी येथील 'स्टटगार्ट' शहरात झालेल्या ७ व्या 'आंतरराष्ट्रीय समाजवादी संमेलनात' भारताचे क्रांतिकारी 'मॅडम भिकाजी कामा' यांनी सहभाग घेतला होता.


● या संमेलनात दिनांक २२ऑगस्ट १९०७ रोजी 'मॅडम भिकाजी कामा' द्वारा भारताचा राष्ट्र ध्वज फडकावण्यात आला.


● हा राष्ट्रध्वज भगवा,पिवळा आणि हिरवा रंगाचा असून वरच्या पट्ट्यात ८ चांदण्या असून खालच्या पट्ट्यात 'चंद्र' व 'सूर्य'चे चित्र आहे.


● यातील भगवा, पिवळा आणि हिरवा रंग म्हणजे अनुक्रमे बौद्ध, हिंदू, मुस्लिम यांचे प्रतीक आहे.


●वरच्या पट्ट्यातील ८ चांदण्या म्हणजे ब्रिटिशांचे भारतातील आठ विभाग होय.


● खालच्या पट्ट्यात सूर्य व चंद्र यांचे चित्र असून हे हिंदू व मुस्लिम यांचे सन्मानचिन्ह आहे.


●मधल्या पट्ट्यात क्रांतिकारी चळवळीचे घोषवाक्य 'वंदे मातरम' लिहिलेले आहे.


●तृतीय ध्वज : १९१६ रोजी झालेल्या 'लखनऊ करारा'न्वये काँग्रेस व मुस्लिम लीग यांचे ऐक्य झाले.


● या पार्श्वभूमीवर १९१७ रोजी कॉंग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्ष डॉ. ऍनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी 'होमरूल लीग चळवळीत' भारताचा तिसरा राष्ट्रीय ध्वज तयार केला व फडकविला.


● या राष्ट्रध्वजात ५ लाल पट्ट्या व ४ हिरव्या रंगाच्या पट्ट्या आहेत. लाल व हिरवा रंग हिंदू व मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानला गेला.


● झेंड्याच्या एका कोपऱ्यात युनियन जॅक तर दुसऱ्या कोपऱ्यात चंद्र व चांदणी आहे.


● या झेंड्यात एकूण ७ चांदण्या असून या चांदण्या म्हणजे सप्तऋषींचे प्रतीक आहे.


●चौथा ध्वज:  १९२१ रोजी काँग्रेसचे अधिवेशन 'विजयवाडा' येथे भरले असता आंध्र प्रदेशातील युवक 'पिंगली वेंकय्या' यांनी बनवलेला झेंडा महात्मा गांधीजींना दिला.


● या झेंड्यात सुरुवातीस हिरवा व लाल रंग होता. हा रंग म्हणजे  हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक मानले गेले. या झेंड्यामध्ये गांधीजींनी बदल करून त्यात पांढऱ्या रंगाचा पट्टा अन्य समुदायाचे प्रतीक म्हणून जोडला तसेच स्वदेशी चळवळीचे प्रतीक म्हणून चरख्याचा पहिल्यांदाच समावेश केला गेला.


● पाचवा ध्वज : १९३१ रोजी भारतीय राष्ट्रध्वज साठी काँग्रेसच्या अधिवेशनात ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष सरदार वल्लभाई पटेल होते.


● या ठरावानुसार पहिल्यांदाच तिरंगी झेंडा चा स्वीकार करून केशरी,पांढरा, हिरवा अशा रंगातील झेंड्याचा स्विकार करुन चरख्याचाही त्यात समावेश केला. 


●१९३१ रोजी ठराव झालेल्या ध्वजाचे एक वैशिष्ट्य म्हणजे "ध्वज हा कोणत्याही धर्माचा प्रतीक नाही तर संपूर्ण देशातील समुदायांचं प्रतिनिधित्व करणारा आहे." असा ठराव पहिल्यांदाच येथे मंजुर करण्यात आला.


● सहावा ध्वज : भारतीय संविधान सभेत 'राष्ट्रध्वज तदर्थ समिति' गठन करण्यात आली या समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते.


● दिनांक २२ जुलै १९४७ रोजी भारताच्या संविधान सभेने वर्तमान राष्ट्र ध्वजाचा स्वीकार केला.


● राष्ट्रध्वजाची लांबी रुंदी ३:२ असुन यावर मधोमध पांढऱ्या पट्ट्यावर चरख्या ऐवजी सारनाथ स्थित अशोक चक्राचा समावेश करण्यात आला.


● अशोक चक्रा मध्ये एकूण चोवीस आर्‍या असून दिवसातील २४ तास प्रगतीच्या मार्गावर चालणे हा यामागे मुख्य उद्देश आहे.


● राष्ट्रध्वज हा खादी कापडापासून बनवावा तसेच सुती,रेशीम, वुल कापडाचा ध्वज बनवण्यास हरकत नाही.


● मात्र हा ध्वज चरख्यावर तयार करावा किंवा ध्वजाची शिलाई करताना खादीचा धागा वापरावा.


● राष्ट्रध्वज संहिता 2002 नुसार, भारताच्या नागरिकास वर्षभर (३६५ दिवस) राष्ट्रध्वज फडकवण्याचा अधिकार प्राप्त झाला.

मात्र सूर्यास्त झाल्यानंतर झेंडा उतरविणे अनिवार्य आहे.


● "झेंडा उंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा." हे गीत श्यामलाल गुप्ता यांनी लिहिले.


● हे गीत सर्वप्रथम १३एप्रिल १९२४ रोजी 'जालियनवाला बाग शोक दिवसा' निमित्त फुलबाग चौक कलकत्ता येथे गायले गेले.

या कार्यक्रमात पंडित जवाहरलाल नेहरू उपस्थित होते.


●१९३८ रोजी हरीपुरा अधिवेशनात सरोजिनी नायडू द्वारा हे गाणे पुन्हा गायले.


● १९४८ रोजी 'आजादी की राह पर' या चित्रपटात सरोजनी नायडू यांनी हे गीत गायले.

क्ष-किरणांचा शोध

◼८ नोव्हेंबर १८९५ रोजी जर्मनीतील व्युर्झबर्ग विद्यापीठात विल्हेल्म रोंटजेन याने क्ष-किरणांचा शोध लावला. कॅथोड किरणांवर संशोधन करताना रोंटजेनला लागलेला हा शोध विज्ञानाच्या इतिहासात क्रांतिकारी शोध म्हणून नोंदला गेला आहे.

◼काचेच्या निर्वात नळीमधून उच्च दाबाचा विद्युतप्रवाह जाऊ  दिल्यास, त्यातील कॅथोडपासून (ऋण इलेक्ट्रोड) कॅथोड किरणांची निर्मिती होते.

◼ कॅथोड किरण म्हणजे प्रत्यक्षात इलेक्ट्रॉन असतात. कॅथोड किरण नळीच्या बाहेर विविध परिस्थितींत कुठपर्यंत पोहोचू शकतात, यावर रोंटजेन संशोधन करत होता.

◼हे कॅथोड किरण बेरियम प्लॅटिनोसायनाइडसारख्या प्रतिदीप्त (फ्लुओरेसन्ट) पदार्थावर पडताच, असे पदार्थ अंधारात चमकू लागतात. त्यामुळे या कॅथोड किरणांचा प्रतिदीप्त पदार्थाच्या साहाय्याने वेध घेता येतो.

◼हा प्रयोग चालू असताना, रोंटजेनला अचानक दोन मीटर अंतरावर ठेवलेली बेरियम प्लॅटिनोसायनाइडची पट्टी चमकू लागल्याचे लक्षात आले. कॅथोड किरण हवेतून इतक्या दूरवर पोहोचणे शक्य नव्हते.

◼कॅथोड किरणांची निर्मिती थांबवल्यास पट्टीचे चमकणेही थांबत होते. कॅथोड किरणांबरोबरच निर्माण होणारे हे किरण वेगळ्याच प्रकारचे किरण असल्याचे रोंटजेनने जाणले.

◼कॅथोड किरण नळीच्या काचेवर जिथे आदळत होते, तिथेच हे अज्ञात किरण निर्माण होत होते. कारण चुंबकाच्या मदतीने काचेच्या नळीतील कॅथोड किरणांची दिशा बदलल्यावर या किरणांच्या निर्मितीचे स्थानही त्यानुसार बदलत होते. प्रत्यक्ष या किरणांवर मात्र चुंबकत्वाचा परिणाम होत नव्हता.

◼रोंटजेनने त्यानंतर काचेच्या नळीतील विविध घटकांचा या किरणांवर होणारा परिणाम, तसेच त्यांची भेदनशक्ती अभ्यासली. शिशाचा अपवाद वगळता, हे किरण अनेक धातूंतून पार होत होते. हे किरण फोटोग्राफीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लेटवरही परिणाम घडवत होते.

◼जेव्हा रोंटजेनने शिशाची पट्टी दोन बोटांत धरून त्याची प्रतिमा फोटोग्राफीच्या प्लेटवर नोंदवली, तेव्हा त्याला त्या प्रतिमेत आपल्या दोन बोटांतली हाडेही स्पष्टपणे दिसली.

◼सहा आठवडय़ांच्या सखोल अभ्यासानंतर रोंटजेनने आपले हे संशोधन ‘प्रोसिडिंग्ज् ऑफ दी फिजिकल-मेडिकल सोसायटी’ या शोधपत्रिकेकडे सादर केले.

◼हे किरण ‘क्ष-किरण’ या नावे ओळखले जाऊ  लागले. कोणतीही इजा न करता शरीरातील हाडांच्या स्थितीचे दर्शन घडवणारे हे तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रात अल्पकाळातच प्रचंड लोकप्रिय झाले. या संशोधनासाठी रोंटजेनला १९०१ सालचे- म्हणजे पहिले- नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

इतिहासातील महत्वाचे क्रांतिकारी कट खटले


1) अलीपूर कट:- 1908

🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष


2) नाशिक कट:- 1910

🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर


3) दिल्ली कट:- 1912

🔶 रासबिहारी बोस


4) लाहोर कट:- 1915

🔶विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी बोस


5) काकोरी कट:- 1925

🔶 सच्छिन्द्र सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन


6) मीरत/मेरठ कट:- 1928

🔶 मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे


7) लाहोर कट:- 1928

🔶 भगतसिंग, राजगुरु, जयगोपाल, चंद्रशेखर आझाद


8) चितगाव कट:- 1930

🔶 सर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अजय घोष


🔴 टीप:- इतिहासात कटावर प्रश्न आला तर या बाहेरचा प्रश्नच बनू शकत नाही.

महत्वाचे क्रांतिकारक व त्यांनी ठार केलेली इंग्रज व्यक्ती

🌺उधमसिंह -  :मायकेल ओडवयार ची हत्या केली


🌺मदनलाल धिंग्रा.  -:कर्झन वायली ची हत्या केली  (१९०९)


🌺अनंत कान्हेरे.   -:जॅक्सनची हत्या केली (नाशिक कट कान्हेरे कर्वे देशपांडे या तिघांना फाशी देण्यात आली )


🌺चाफेकर बंधू. -:  रंँडची हत्या केली (दामोदर व बाळकृष्ण या दोघांनी गणेश खिंड येथे याला ठार केले )

🌺भारतातील क्रांतिकारी चळवळीचे संस्थापक  असा गौरव लाला लजपत राय यांनी केला


🌺खदीराम बोस व प्रफुल्ल चाकी १९०८-  किंगजफोर्डला ठार केले (खुदीराम बोस  वयाच्या १८ ब्या वर्षी फाशी )


🌺वसंत कुमार बिस्वास ,रासबिहारी बोस,अवध बिहारी  -    लॉर्ड हर्डींगजला ठार केले ( त्यांच्यावर दिल्ली कट खटला सुरू केला होता १९०२ )


🌺भागतसिंग सुखदेव राजगुरू.  स्कॉट खून केला ( लालाजिंच्या मृत्यूचा बदला परंतु चुकीने सांँडर्स  या अधिकाऱ्याला राजगुरू व भगतसिंह याने गोळ्या घालून ठार केले )


🌺वीणा दास.= गव्हर्नर स्टँनले जँक्सन  ठार( ९ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा दिली ) 

 

🌺शांती घोष ,सूनिती चोधरी.  स्टीव्हन जी बी ठार ( दोघींना जन्मठेप )


भारतात आल्यानंतर गांधीजींनी खालील चळवळी सुरू केल्या

🔰 चपारण्य सत्याग्रह (सन 1917) :-

🔗 चपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्‍या गरीब शेतकर्‍यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणारा अन्याय दूर करण्याकरिता गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली..



🔰 साराबंधी चळवळ (सन 1918) :-

🔗 1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडून मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिके बुडाली असतांना ब्रिटिश अधिकारी शेतकर्‍याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल करीत असत..

🔗 गांधीजींनी शासनाच्या या कृती विरुद्ध खेडा येथे साराबंदी चळवळ सुरू केली..

🔗 शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागात जमीन महसूल वसुलीला स्ग्थगिती देण्याचा निर्णय घेतला..

🔗 हा गांधीजीचा दूसरा विजय होता..



🔰 रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह (सन 1919) :-

🔗 भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला..

🔗 या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता..

🔗 या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला..

🔗 हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय बंद होय..

🔗 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली..

🔗 या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्‍याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.

क्रांतिसिंह नाना पाटील

( ऑगस्ट ३, इ.स. १९०० - डिसेंबर ६, इ.स. १९७६) 


हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते.


 क्रांतिसिंह नाना पाटील हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे क्रांतिकारक मांडले जातात त्यांचे कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने सांगली सातारा या परिसरामध्ये होते नाना पाटील यांच्या वरती प्रारंभीच्या काळात सत्यशोधक विचारांचा प्रभाव होता पुढील काळात ब्रिटिशांच्या अन्याय कारक राजवटीस आव्हान देण्यासाठी त्यांनी क्रांतिकारक मार्गाचा पुरस्कार केला.


 साताऱ्यातील प्रतिसरकारच्या स्थापनेत त्यांचा वाटा महत्त्वाचा होता त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेणे महत्त्वाचे ठरते नाना पाटील यांनी साताऱ्यामध्ये प्रतिसरकारची स्थापना करून महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीला मोठे योगदान दिले भूमिगत चळवळीच्या माध्यमातून त्यांनी प्रतिसरकारची स्थापना केली . 


 प्रतिसरकारची स्थापना झाल्यावर ग्रामीण भागात ब्रिटिशांचे अस्तित्व नाममात्र राहिले नाना पाटील यांनी युवकांची संघटना स्थापन करून इंग्रजांपुढे जबरदस्त आव्हान निर्माण केले प्रती सरकारचे नेते या नात्याने त्यांनी केलेल्या कार्यामुळेच त्यांना क्रांतिसिंह म्हणून ओळखले जाऊ लागले महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीच्या भूमिगत कार्यकर्त्यांमध्ये नाना पाटलांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले या काळामध्ये महाराष्ट्रातील सातारा, सांगली या परिसरात नाना पाटलांची ब्रिटिशांवर एक मोठी दहशद निर्माण झाली होती प्रतिसरकार अथवा 'पत्री सरकार' म्हणून या काळात ते ओळखले गेले. मंत्र प्राप्तीनंतर हे  नाना पाटील यांनी सातारा सांगली परिसरामध्ये आपले सामाजिक कार्य पुढे चालू ठेवले कारमध्ये त्यांना मोठी लोकप्रियता देखील मिळाली

काकोरी कट (Kakori conspiracy)



◾️9 ऑगस्ट 1925

◾️लखनौ ते सहारनपूर दरम्यान काकोरी

◾️सहभाग:- चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, मन्मथनाथ गुप्ता, अशफाक उल्लाखान, राजेंद्रनाथ लाहिडी, रोशनलाल इत्यादी क्रांतिकारक अग्रणी होते. (एकून 10 जणांचा समावेश)

◾️बरिटिशांच्याविरुद्ध सशस्त्र लढा देण्याच्या हेतूने काकोरी (उत्तर प्रदेश) येथे घडवून आणलेला प्रसिद्ध क्रांतिकारी कट.

◾️सरकारी पोस्ट कार्यालयांमध्ये जमा झालेला पैसा रेल्वे मार्गाने जाणार असल्याची माहिती क्रांतिकारकांना मिळाली

◾️लखनौ ते सहारनपूर मार्गावर लखनौपासून आठ मैल अंतरावर असलेल्या काकोरी या गावाजवळ सशस्त्र क्रांतिकारकांनी रेल्वे थांबवून त्यातील खजिना लुटावा अशी योजना आखली.

◾️ 9 ऑगस्ट 1925 रोजी क्रांतिकारक सरकारी खजिना घेऊन जाणाऱ्या रेल्वेच्या डब्यात जाऊन बसले. रेल्वे आडवळणी अशा काकोरी स्थानकाजवळ येताच त्यांनी साखळी ओढून रेल्वे थांबविली

◾️रामप्रसाद बिस्मिल यांनी चैन खेचुन रेल्वे थांबवली

◾️कवळ दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही नियोजित लूट यशस्वी केली. या घटनेलाच ‘काकोरी कट’ असे म्हणतात.

◾️या कटात जवळपास 8000 रुपये लुटले

◾️काकोरी खटल्याचे कामकाज एप्रिल १९२७ पर्यंत चालले.

◾️यामधील रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्लाखान, रोशनलाल व राजेंद्रनाथ लाहिडी यांना फाशी दिली

◾️कारस्थानांमध्ये सहभागी असलेले चंद्रशेखर आझाद ब्रिटिशांना गुंगारा देऊन भूमिगत राहिले.

◾️सशस्त्र क्रांती करण्याच्या उद्देशाने चंद्रशेखर आझाद यांनी ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोशिएशनʼ या जुन्या संस्थेचे ‘हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोशिएशनʼ असे नामकरण करून क्रांतिकार्य चालू ठेवले.

भारतीय क्रांतिकारी संघटना.

🅾व्यायाम मंडळ
– चाफेकर बंधू  ( १८९६ )

🅾अनुशीलन समिती
– ज्ञानेंद्रनाथ बोस ( १९०१ ) मिदनापुर

🅾अभिनव भारत( पुणे )
– वि .दा .सावरकर  ( १९०२ )

🅾इंडिया हाऊस
– श्यामजी कृष्णा वर्मा ( १९०४ )

🅾स्वदेश बांधव समिती
– अश्विनीकुमार दत्त ( १९०५ )

🅾अभिनव भारत( लंडन)
– वि. दा. सावरकर ( १९०६ )

🅾इंडियन इंडिपेंडस लिग
– तारकानाथ दत्त ,अमेरिका, १९०७

🅾अनुशीलन समिती
– विरेंद्रकुमार घोष - भूपेंद्र दत्त
                  १९०७ ( ढाका )

🅾भारत माता सोसायटी
– अजितसिंह आंबाप्रसाद (१९०७ )

🅾गदर पार्टी
– लाला हरदयाळ ( १९१३ )

🅾इंडियन इंडिपेंडस लिग
– लाला हरदयाळ - विरेंद्र चट्टोपाध्याय ( १९१४ ) ( बर्लिन )

🅾इंडियन इंडिपेंडस लिग
– राज महेंद्र प्रताप ( १९१५ ) काबूल

🅾हिन्दुस्थान रिपब्लिकन असोशिएशन
– सचिंद्रनाथ संन्याल ( १९२४ )

🅾नौजवान सभा
– भगतसिंग ( १९२६ ) (लाहोर)

🅾हिन्दुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोशियशन
– चंद्रशेखर आझाद (१९२८)

🅾इंडियन इंडिपेंडन्स लिग( *टोकियो* )
– रासबिहारी बोस (१९४२)

🅾आझाद हिंद सेना
– रासबिहारी बोस (१९४२) टोकियो

बगालमध्ये र्लॉड क्लाईव्ह पुरस्कृत दुहेरी राज्यव्यवस्था -



🔸बगालच्या नबाबने फेब्रुवारी 1765 मध्ये निजामतीचे (लष्करी, फौजदारी, न्यायनिवाडा) अधिकार कंपनीकडे दिले.


🔹16 ऑगस्ट 1765 मध्ये अलाहाबादच्या तहानुसार सम्राट शहाआलमने बंगाल, बिहार, ओरिसाचे दिवाणीचे (कर, वसूल, करणे) अधिकार कंपनीला दिले.


🔸तयामुळे कंपनीच्या हाती निजामती आणि दिवाणीचे आकार केंदि्रत झाले. पंरतू प्रत्यक्षात सुपूर्ण राजकीय सज्ञ्ल्त्;ाा कंपनीने स्वत:कडे घेतली नाही कारण ब्रिटिश संसदेचे कंपनीवरील नियंत्रण व हस्तक्षेपाची आणि अंतर्गत बाहय शत्रु यांची कंपनीला भीती वाटत होती.


🔸भारतीय शासनपध्दतीची माहिती असणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नव्हता, म्हणून र्लॉड क्लाईव्हने दुहेरी राज्यव्यवस्था सुरु केली कंपनीने दिवाणी करवसुली व न्यायदान अधिकार नबाबाकडे ठेवला व्यापार सैन्य, परराष्ट्र, व्यवहार आणि खजिना इ. महत्वाची कार्ये कंपनीने स्वत:कडे ठेवली अशा प्रकारे नबाब आणि कंपनी यांच्यात सज्ञ्ल्त्;ाा विभागली गेली म्हणूनच तिला दुहेरी राज्यव्यस्था असे म्हणतात.


🔹या कार्यासाठी बंगालच्या नबाबला 53 लाख रुपयांची पेन्शन देण्यात आली. 1765-1772 या काळात बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात होती.


🔹या व्यवस्थेमुळे गोंधळ व भाषांतरांवरूनरष्टाचार निर्माण झाल्याने 1772 मध्ये वॉरन हेस्टिंग्जने बंद केली.

तिसरे कर्नाटक युध्द (1756-1763)



1756 मध्ये युरोपात इंग्लंड व फ्रान्समध्ये पुन्हा युध्द सुरु झाले. ते सप्तवर्षीय म्हणून प्रसिध्द आहे.


  फ्रेंच सरकारने ताबडतोब काऊंट लाली यास भारतात पाठविले तो जवळजवळ एक वर्ष प्रवास करीत एप्रिल 1758 मध्ये भारतात येऊन पोहोचला या दरम्यान सिरोजउद्दीला या पराभव करुन इंग्रजानी बंगालवर आपले नियंत्रण प्रस्थापित केले होते.


  त्यास इंग्रजांचा जो प्रचंड आर्थिक फायदा झाला, त्याचा उपभोग त्यांनी फ्रेंचांविरुध्द लढण्यास केला.

  काऊंट लालीने 1758 मध्येच पाॅंडेचरी जवळ असलेला सेंट डेविड किल्ला जिंकून घेतला त्यानंतर त्याने तंजावरवर आक्रमण करण्याचा आदेश दिला.


  कारण तंजावरच्या राजाकडून 56 लक्ष रुपये घ्यावयाचे होते, परंतु या मोहिमेत अपयश आल्यामुळे फ्रेंचांच्या आरमार आल्यामुळे त्याने हा वेढा उठवला.


  दुसर्‍या बाजूला पोकॅाकच्या नेतृत्वाखाली इंग्रज आरमारी तुकडीने डी अ‍ॅशच्या नेतृत्वाखाली असलेल्या फ्रेंच आरमारी तुकडीचा तीन वेळा पराभव करुन त्यांना भारतीय सागरातून परत सेनानी सरआयकूट याने वांदिवाश येथे फ्रेंचांचा जबरदस्त पराभव केला.

  खुद्द बुसीला युध्दकैदी बनविण्यात आले.


  युध्दातील या पराभावामुळे फ्रेंच पॉडेंचरीला परत गेले. पण इंग्रजांनी पाँडेचरीलाच वेढा घातला शेवटी आठ महिन्यानंतर फ्रेंचांनी पॉडेचरी इंग्रजांच्या ताब्यात दिले.


  कर्नाटकाच्या तिसर्‍या युध्दात फ्रेंचांचा अंतिम पराभव झाल्यामुळे हे युध्द निर्णायक सिध्द झाले.


  1763 च्या पॅरिसच्यातहाने सप्तवर्षीय युध्द थांबल्यावर भारतातील संघर्षही संपुष्टात आला.


  या तहानुसार पॉडेचरी व काही प्रदेश फ्रेंचांना परत मिळाला असला तरी यापुढे फ्रेंचांनी इंग्रजाविरूध्द युध्द करण्याची हिंमत केली नाही. येथून फ्रेंच सत्ता भारतात वाढू शकती नाही.

चक्रवर्ती समिती (Chakravarty Committee)



🌻भारतीय मौद्रिक प्रणालीच्या कामकाजासंबंधीचा अभ्यास करण्याकरिता स्थापन करण्यात आलेली समिती.


 ☂️१९७० ते १९८०च्या दशकात सरकारकडून पैशाची सतत होणारी मागणी पूर्ण करण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक सरकारला जास्तीत जास्त कर्ज देत होती. 


☂️तयासाठी लागणाऱ्या चलनाच्या उभारणीसाठी बँकांच्या वैधानिक रोखता गुणोत्तरात (statutary liquidity ratio) सतत वाढ केली जात होती.


 ☂️तयामुळे ‘राखीव चलनात’ किंवा ‘मूळ चलनात’ वाढ होऊन देशातील चलन पुरवठ्यातही वाढ होत होती. त्याचा परिणाम म्हणजे, महागाईचा भार देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडत होता. 


☂️अशा वेळी चलन पुरवठ्यातील वाढ रोखण्यासाठी रिझर्व बँक ही बँकांच्या ‘आवश्यक रोख राखीव गरजेवर’ (Cash Resrve Requirment) सतत वाढ करत होती.


 ☂️या चक्रातून बाहेर पडून येणाऱ्या काळात महागाईमुक्त नियोजित विकास कसा साध्य करता येईल, हे ठरविण्यासाठी प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ सुखमय चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली.


☂️शिफारसी : चक्रवर्ती समितीने मौद्रिक प्रणालीच्या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करण्यासाठी रिझर्व बँक व भारत सरकार यांनी १९८१ पर्यंत नेमलेल्या सर्व समित्यांचा व अभ्यासगटांच्या अहवालांचा आधी सखोल अभ्यास केला.


 ☂️तयानंतर एप्रिल १९८५ मध्ये समितीने आपला अहवाल रिझर्व बँकेला  सादर केला .

महाराष्‍ट्राचा-खनिज संपत्ती

👉 महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भात खोरे व कोकणात खनिजे सापडतात.


👉 दशातील खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा – ३.३%, महाराष्ट्रात ३८,००० चौ.कि.मी. (१३.३७%) क्षेत्रात खनिजे सापडतात.


👉 महाराष्ट्रात देशाच्या ५०% बॉक्साईट साठे, व २१% उत्पादन होते. महाराष्ट्रात ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली व सातारा इ. ठिकाणी बॉक्साईटच्या खाणी आहेत.


👉 दशातील मँगनिज (मंगल) च्या साठ्यांपैकी ४०% साठे महाराष्ट्रात आढळतात. महाराष्ट्रात तुसर, बुझुरग व चिखलगाव (भंडारा), सावनेर व रामटेक (नागपूर), सावंतवाडी, व वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) येथे खाणी आहेत. 


👉 महाराष्ट्रात देउळगाव (गडचिरोली), चंद्रपूर, भंडारा, नागपूर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी व रेडी (सिंधुदुर्ग) येथे खाणी आहेत. रेडी या बंदरातून लोह खनिज निर्यात केले जाते.


👉 दशाच्या ४% कोळसा महाराष्ट्रात सापडतो. हे साठे वर्धा वैनगंगेच्या खो-यात आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधिक कोळशाचे साठे – बल्लारपूर (चंद्रपूर) येथे आहेत. 


👉 तसेच कामठी व उम्रेड (नागपूर), वणी (यवंतमाळ), गडचिरोली जिल्ह्यातही कोळसा सापडतो.


👉 कायनाईटचे १५% साठे महाराष्ट्रात आह्ते. भंडारा जिल्ह्यात साकोली तालुक्यात देहगाव, पिंपळगांव, मोगरा, मीरगा इ. तसेच गार्काभोंगा तालुक्यात कयनाईट व सिलिमिनाईटचे साठे आहेत.

कायनाईटचे उपयोग हि-यांना पैलू पाडणे, काच, रसायन उद्योगात होते.

भारताच्या ९% चुनखडीचे साठे व २% उत्पादन महाराष्ट्रात होते. 


👉 यवतमाळ जिल्ह्यात मांजरी, वांजरी, शिंदोला, मुकवटन येथे चुनखडीचे सर्वाधिक साठे आहेत. तसेच चंद्रपुर, अहमदनगर व गड्चोरोली येथेही साठे सापडतात.


👉 महाराष्ट्रातील मँगनिज शुध्दीकरण प्रकल्प – तुसर (भंडारा) व कन्हान (नागपूर) येथे आहेत.

हिरव्या अभ्रकात सिलियम भंडारा जिल्ह्यात सापडते.


👉 दशातील क्रोमाईटच्या साठ्यांपैकी १०% साठा महाराष्ट्रात असुन प्रामुख्याने भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यात साठे आहेत. टाका (नागपूर), मौली (भंडारा), कनकवली, जानोली (सिंधुदुर्ग), क्रोमाईटचा उपयोग धातू उद्योगात किंमती खड्यांवर प्रक्रिया करण्याच्या उद्योगात होतो. 

आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक


                                                                                  

         जन्म : 7 सप्टेंबर 1791

         (भिवडी, पुरंदर, पुणे)


        फाशी : 3 फेब्रुवारी 1832

                   (पुणे)

━━━━━━━━━━━━━━━

            ◾️सासवडच्या सत्तू नाईकच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम रामोशी समाज एकत्रित आला. सत्तू नाईक, साता-याचा चित्तूरसिंग नाईक व पुरंदरचा उमाजी नाईक हे रामोशांचे प्रमुख नेते होते. पुण्याच्या आग्नेय भागात रामोशाची जास्त दहशत होती.


           ◾️सत्तू नाईकच्या नेतृत्वाखाली उमाजी नाईक व त्याचा भाऊ अमृता नाईक यांनी पुण्याजवळ भांबुर्ड्याचा लष्करी खजिना 1924 - 25 साली लुटला. पुण्यातून रामोशांच्या  हकालपट्टीसाठी ब्रिटिशांनी जवाहरसिंग रामोशी यास सासवडचा अंमलदार बनविले. पण  उमाजी व सत्तू नाईकाने जवाहरसिंग व त्याच्या मुलाच्या मुसक्या आवळल्याने त्याने इंग्रजांची नोकरी सोडून दिली.

          ◾️सत्तू नाईक नंतर रामोशांचे नेतृत्व उमाजी नाईकवडे आले. भूजाजी, कृष्णाजी, येसाजी व अमृता हे उमाजीचे विश्वासू सरदार होते. उमाजी स्वत: ला राजे समजून घेत असे. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी 1791 साली उमाजीचा जन्म झाला होता.


           ◾️बरिटिश काळात रामोशांची संख्या 18000 होती. दरम्यानच्या काळात उमाजीने एका यात्रेत तलवारीने कोतवालाचे तुकडे करून पोलिसात दहशत पसरवली. उमाजीला पकडण्यासाठी ब्रिटिशांनी 1826 साली पहिला जाहीरनामा काढला. यानुसार उमाजी व त्याचा साथीदार पांडुजी यांना पकडून देणा-यास 100 रुपये ईनाम जाहीर केले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

          

◾️सरकारने पुन्हा जाहीरनामा काढून ईनामाची रक्कम 1200 रूपये कली आणि जाहीरनाम्यात असे म्हटले की, "सरकारला मदत केली नाही तर बंडवाल्यात सामिल झालात, असे समजण्यात येईल." यावेळी उमाजीस पकडून देण्याचा विडा उचलणा-या  शिवनाक यास रामोशांनी ठार केले.


            ◾️तयावेळी उमाजीचा धाक पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, जेजुरी, सासवड व मराठवाड्याच्या काही भागात होता. यावेळी पुण्याचा कलेक्टर एच . डी . रॉबर्टसन  याने वेळोवेळी जाहीरनामा काढून उमाजीला पकडण्याचे ठरविले. कोणीच गददारी न केल्यामुळे त्याच्या हाती काहीच आले नाही.


             ◾️रॉबर्टसनने दरम्यान कोकणावर वचक बसविण्याठी बंडखोरांची माहिती देणा-यासाठी खास बक्षिस जाहीर केले. या काळात उमाजीने ठाणे व रत्नागिरी जिल्हयातील लोकांनी ब्रिटिशांकडे महसूल न भरता उमाजीकडे दयावा असे जाहीर केले. याच्या परिणामस्वरूप भोर  संस्थानातील 13 गावानी उमाजीकडे महसुल भरला.


             ◾️शवटी ब्रिटिशांनी उमाजीची बायको, दोन मुले व एक मुलगी यांना अटक केली. त्यामुळे कुटुंबाखातर उमाजी ब्रिटिशांना शरण आला. ब्रिटिशांनी त्याचे सर्व गुन्हे माफ करून त्याला सरकारी नोकरी दिली. पुणे व सातारा जिल्हयात शांतता व सुव्यवरथा राखण्याचे काम उमाजींकडे देण्यात आले. पण पुढे नंतर 13 गावांच्या महसुलावरुन उमाजी व ब्रिटिश यांच्यात वाद सुरू झाला.


           ◾️1831 साली ब्रिटिशांनी जाहीरनामा प्रसिध्द करून उमाजीला पकडण्याची जबाबदारी कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मैकिन्तोश यांच्याकडे सोपविली. उमाजी, येसाजी, मुंजाजी व कृष्णाजी यांना पकडून देणा-यास 5000 रूपये व 2 बिघा जमीन बक्षीस देण्याचे जाहीर केले. त्यापैकी एकटया उमाजीस पकडून देणा-यास 2500 रूपये व 1 बिघा जमीन जाहीर करण्यात आली. बक्षीसाच्या आमिषाला बळी पडून एकेकाळचे त्याचे जवळचे साथीदार काळू रामोशी, नाना रामोशी यानी गददारी केली. उमाजीचा जुना शत्रु बापूसिंग यानेही त्यांना मदत केली. 15 डिसेंबर 1831 रोजी कॅप्टन मैकिन्तोशने पुण्याच्या मुळशी तालुक्यातील अवळस येथे उमाजीला  अटक केली. पुण्याच्या तहसिलदार कचेरीत 3 फेब्रुवारी 1832 रोजी उमाजीला फाशी देण्यात आली.  त्याठिकाणी आता पुतळा स्वातंत्र्याचा संदेश देत ठामपणे उभा आहे.


          ◾️उमाजीचा पहिला चरित्रकार व उमाजीस पकडण्याच्या मोहीमेचा प्रमुख मैकिन्तोश म्हणतो, “उमाजीच्या नजरेसमोर शिवाजी राजांचे उदाहरण होते. स्वराज्य संस्थापक शिवाजी हे त्याचे श्रध्देय व स्फूर्तीचे स्थान होते. शिवाजीच त्याचा आदर्श होता. मोठमोठया लोकांनी मला स्वतः  सांगितले की, उमाजी हा काही असला तसला भटक्या दरोडेखोर नाही. त्याच्या नजरेसमोर नेहमी शिवाजीचे उदाहरण होते. शिवाजी महाराजांप्रमाणे आपण मोठे राज्य कमवावे  अशी त्याची इच्छा होती."


महाराष्ट्रातील पंचायत राज-

आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.


🌻1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?

==> स्थानिक स्वराज्य संस्था


🌻2.  राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?

==> 2 ऑक्टोबर 1953


🌻3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?

==> 16 जानेवारी 1957


🌻4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?

==> वसंतराव नाईक समिती


🔘5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?

==> 27 जून 1960


🌻6.  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?

==> महसूल मंत्री


🔘7.  वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?

==>226


🌻8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?

==> जिल्हा परिषद


🔘9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?

==> तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)


🌻10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?

==>  1  मे 1962


🌻11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?

==> महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966


🔘12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?

==> 7 ते 17


🌻13.  ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?

==>जिल्हाधिकारी


🔘14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?

==> जिल्हाधिकारी


🌻15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?

==> 5 वर्षे


🌻16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?

==> पहिल्या सभेपासून


🌻17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?

==> तहसीलदार


🌻18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?

==> विभागीय आयुक्त


🌻19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> सरपंच


🌻20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

=पंचायत समिती सभापती


🌻21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?

==> दोन तृतीयांश (2/3)


🔘22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?

==> तीन चतुर्थांश (3/4)


🌻23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> पंचायत समिती सभापती


🔘24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> जिल्हा परिषद अध्यक्ष


🌻25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> संबंधित विषय समिती सभापती


🌻26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> जिल्हा परिषद अध्यक्ष


🌻27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> विभागीय आयुक्त


🌻28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?

==> ग्रामसेवक


🌻29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?

==> जिल्हा परिषदेचा


🌻30.  ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?

==> जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून


🌻31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?

==> ग्रामसेवक


🌻32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?

==> शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)


🌻33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

==> राज्यशासनाला


🔘34.  सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?

==> विस्तार अधिकारी


🌻35.  गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?

==> ग्रामविकास खाते


🌻36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

==> जिल्ह्याचे पालकमंत्री


🔘37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?

==> जिल्हाधिकारी


🌻38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?

==> दहा (स्थायी+9 विषय समित्या)


🌻39. जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?

==> स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा


🌻40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?

==> जिल्हा परिषद अध्यक्ष


🌻41.महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?

==> वसंतराव नाईक

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...