लॉर्ड लिटन (१८७६-१८८०)




👉  लॉर्ड लिटन हा कट्टर साम्राज्यवादी होता. म्हणून डिझरायलीने त्याची भारताच्या व्हाइसरॉयपदी १८७६ मध्ये नेमणूक केली. त्याच्या काळात १८७६-७७ मध्ये मद्रास, मुंबई, पंजाब या भागात दुष्काळ पडला. या काळात दुष्काळाने ५० लाख व्यक्ती मृत्यू पावल्या व २० लाख हेक्टर जमीन नापीक झाली.

👉  वहाइसरॉयने दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजनेच्या हेतूने  स्ट्रची दुष्काळ निवारण समिती  नेमली. (अहवाल १८८०). तिचा अहवाल स्वीकारून सरकारने १८८३ साली दुष्काळ संहिता जाहीर केली. लिटनच्या उद्दाम धोरणामुळे दुसरे अफगाण युद्ध उद्भवले.

👉   १८७७ साली पहिला दिल्ली दरबार भरवण्यात येऊन राणी व्हिक्टोरियाने भारत सम्राज्ञी हा किताब धारण केल्याचे जाहीर केले. त्याच्यावर देशी वृत्तपत्रांनी टीकेची झोड उठवल्याने देशी वृत्तपत्रांवर र्निबध टाकणारा देशी कायदा मार्च, १८७८ मध्ये पास करून वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी केली. अमृतबझार पत्रिका  हे देशी वृत्त तेव्हापासून इंग्रजी भाषेत सुरू आहे.

👉 १८७८ मध्ये शस्त्रबंदी कायदा  करून विनापरवाना शस्त्र बाळगण्यास बंदी. लिटनच्या काळात भारतीय मुलकी सेवा कायदा १८७९ पास केला.

👉  आयसीएस परीक्षेचे वय २१ वरून १९ वर्षांवर आणले. त्याविरुद्ध सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची (आयसीएस पास प्रथम भारतीय व्यक्ती) इंडियन असोसिएशनच्या वतीने जनजागरण मोहीम.

आधुनिक भारताचा इतिहास

💎

भारतीय राष्ट्रीय चळवळ एका उत्क्रांतीची अभिव्यक्ती दर्शवते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१८८५) च्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने या चळवळीला सुरुवात होते. या चळवळीची तीन टप्प्यांमध्ये विभागणी केली जाते- मवाळ राजकारणाचा काळ (१८८५-१९०५); जहाल राजकारण्यांचा काळ (१९०५-१९२०); गांधी युग (१९२०-१९४७).

१८५७ चा उठाव दडपला गेल्यानंतर भारतीय समाज निपचित पडला होता. या निद्रिस्त समाजाला जागे करण्याचे काम दादाभाई नौरोजी, गोपाळ कृष्ण गोखले, व्योमेशचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दिनशॉ वाच्छा, न्यायमूर्ती रानडे यांच्यासारख्या भारतीयांनी केले. त्यांनी राष्ट्रीय संघटनेच्या राजकारणाला निश्चित दिशा दिली. या संपूर्ण नेतृत्वाचा विश्वास उदारमतवाद, सांविधानिक मार्ग व क्रांतीपेक्षा उत्क्रांतीतून बदल या तत्त्वांवर होता. म्हणूनच मवाळांनी राजकीय सुधारणांसाठी अर्ज, विनंत्यांचा मार्ग अवलंबला. आíथक निस्सारणाचा सिद्धांत मवाळांचे सर्वात मोठे योगदान ठरते. मवाळांनी भारताच्या वसाहतवादी आíथक शोषणावर प्रकाश टाकून जी जनजागृती घडवून आणली ती राष्ट्रीय चळवळीच्या पुढील टप्प्याची आवश्यक पाश्र्वभूमी ठरते. तद्वतच, या सिद्धांताच्या माध्यमातून मवाळांनी भारताच्या आíथक राष्ट्रवादाचा भक्कम पाया घातला यात शंका नाही.

२०१४ च्या मुख्य परीक्षेमधील ब्रिटिश आíथक धोरणाच्या विविध अंगांच्या विश्लेषणाची अपेक्षा ठेवणारा प्रश्न याच आíथक शोषणाच्या व आíथक राष्ट्रवादाच्या आकलनाची अपेक्षा ठेवतो. या प्रश्नामध्ये ब्रिटिश कालखंडामधील समग्र आíथक धोरण, त्या धोरणाची उत्क्रांती यांचे विश्लेषण केंद्रस्थानी आहे.

लॉर्ड कर्झनने १९०५ साली केलेल्या बंगालच्या फाळणीतून मवाळ राजकारणाच्या मर्यादा तर स्पष्ट केल्याच, पण त्याही पुढे जाऊन ब्रिटिश सत्ता भारताच्या हितासाठी असल्याच्या मवाळांच्या मूलभूत विश्वासाला तडा गेला. म्हणूनच बंगालच्या फाळणीनंतर राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व जहालांच्या हाती येते. अर्थात, १९१५ पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या संघटनेवर मवाळांचेच वर्चस्व होते. जहालांनी काँग्रेसबाहेर राहून राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व केले. राष्ट्रीय चळवळीच्या या दुसऱ्या टप्प्याचा उद्देश ‘स्वराज’ हा होता व चळवळीच्या पद्धती स्वयंभू होत्या. मवाळांच्या पद्धती ब्रिटिश शासनाच्या प्रतिसादावर अवलंबून होत्या. जहालांनी परकीय मालावर बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व असहकार या चतु:सूत्रीवर आधारित चळवळींचा मार्ग अवलंबून शासनावर दबाव निर्माण केला. लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपीन चंद्र पाल, अरिबदो घोष यांनी या टप्प्यातील चळवळीचे नेतृत्व केले.

लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर एका युगाचा अस्त होतो. तद्वतच, एका दुसऱ्या युगाची सुरुवात महात्मा गांधींच्या राष्ट्रीय चळवळीतील सहभागाने होते. गांधीयुगामध्ये ‘अिहसक पद्धतीने केलेल्या असहकारातून स्वराज्य’ हा राष्ट्रीय चळवळीचा उद्देश होता. सत्याग्रह, अन्यायाचा उघड व सक्रिय प्रतिकार, अिहसक असहकार, भारतीय समाजाचा सर्वागीण विकास यांतून गांधींनी राष्ट्रीय चळवळीला वेगळी दिशा दिली व तिला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त करून दिले.

भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या तीन टप्प्यांमधील घटनांचा सखोल अभ्यास आवश्यक ठरतो. मवाळांनी घडवून आणलेल्या राजकीय सुधारणा, वंगभंग चळवळ, होमरूल चळवळ, असहकार चळवळ, स्वराज पार्टी, नेहरू रिपोर्ट, सविनय कायदेभंगाची चळवळ, ‘चलेजाव’ चळवळ, गोलमेज परिषद यांसारख्या घटकांचा यात अंतर्भाव होतो. याव्यतिरिक्त भारतीय राष्ट्रीय चळवळीतील क्रांतिकारकांचे योगदान महत्त्वाचे ठरते.

44वी घटनादुरुस्ती 1978


1)  लोकसभा आणि विधानसभांचा मूळ कार्यकाल (५ वर्षे) पुनर्स्थापित केला.

2) लोकसभा आणि राज्यविधिमंडळाच्या गंपूर्तीची तरतूद पुनर्स्थापित केली.

3) संसदीय विशेषाधिकाराबाबद ब्रिटिशांच्या सामान्य ग्रहाचा संदर्भ वगळण्यात आला.

4) संसद आणि राज्यविधिमंडळामध्ये चालणाऱ्या कार्यपध्द्तीचे खरे वार्तांकन वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यास घटनात्मक संरक्षण दिले.

5) मंत्रिमंडळाचा सल्ला पुनर्विचारार्थ केवळ एकदा परत पाठविण्याचा अधिकार राष्ट्रपतीला दिला. परंतु पुनर्विचार करून दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला.

6) अध्यादेश काढण्यासाठी राष्ट्रपती, राज्यपाल आणि प्रशासक यांच्या समाधानाची तरतूद रद्द केली.

7) सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे काही अधिकार पुनर्स्थापित केले.

8) राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात ‘अंतर्गत अशांतता’ या शब्दा ऐवजी ‘सशस्त्र बंडाळी’ हा शब्द योजण्यात आला.

9) कॅबिनेटने केवळ लेखी स्वरूपात शिफारस केल्यानंतरच राष्ट्रपती ‘राष्ट्रीय आणीबाणी’ घोषित करू शकतात. अशी तरतूद केली.

10) राष्ट्रीय आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवटीबाबत काही ठराविक प्रक्रियात्मक संरक्षण तरतुदी केल्या.

11) मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कांच्या यादीतून रद्द केला आणि तो केवळ कायदेशीर हक्क केला.

12) कलम २० आणि कलम २१ अन्वये हमी दिलेले मूलभूत हक्क राष्ट्रीय आणीबाणीमध्ये तहकूब करता येणार नाहीत.

13) राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि लोकसभेचा सभापती यांच्या निवडणूकवादाबाबत न्यायालये निर्णय देऊ शकत नाहीत ही तरतूद वगळण्यात आली.


गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी (१८४८-५६)

१८४८ मध्ये लॉर्ड हार्डिगच्या जागी डलहौसी गव्हर्नर जनरल बनला. डलहौसीने आपल्या आठ वर्षांच्या कारकीर्दीत भारतात इंग्रज प्रशासनाचा पाया मजबूत केला. त्याच्या कार्यकाळात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी..


डलहौसी हा त्याच्या व्यपगत सिद्धान्तासाठी (Doctrine of Lapse) ओळखला जातो.

डलहौसीने संस्थानांना दत्तकपुत्र घेण्यास अनुमती दिली, पण दत्तकपुत्र हा गादीचा वारस मानण्यास त्याने नकार दिला. त्याचप्रमाणे द्वितीय आणि तृतीय प्रकारच्या संस्थानाला दत्तकपुत्र वारसा नेमण्यास मान्यता नाकारली.


डलहौसीने या सिद्धान्तानुसार सातारा (१८४८), संबलपूर व जैतपूर (१८४९), बगाढ (१८५०), उदयपूर (१८५२), झाशी (१८५३) व नागपूर (१८५४) खालसा केले.

लॉर्ड डलहौसीकृत सुधारणांचा एकमेव उद्देश सत्ता केंद्रीकरण हा होता.

लॉर्ड डलहौसीच्या काळात ईस्ट इंडिया कंपनीच्या साम्राज्याचा पश्चिम भागात विस्तार झाला.

लॉर्ड डलहौसीने सैन्यात तीन रेजिमेंटची भर घातली.

१८५३ मध्ये ठाणे ते मुंबई दरम्यान रेल्वे सुरू झाली.

भारतात टपाल तिकिटांचा वापर लॉर्ड डलहौसीच्या काळात सुरू झाला. त्याच्या काळात भारतात रेल्वेचे जाळे ठेके पद्धतीने बांधण्यात आले.

लॉर्ड डलहौसीला भारतात ‘विद्युत तारेचा प्रारंभकर्ता’ असे म्हणतात.

लॉर्ड डलहौसीने व्यापारासाठी सर्व बंदरे खुली करून कर रद्द केला.

१८५४मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना केली.

१८५४चा वुडचा खलिता : त्यानुसार प्राथमिक शिक्षणापासून विश्वविद्यालयीन शिक्षणापर्यंत एक शिक्षण योजना बनविण्यात आली. यानुसार प्रत्येक प्रांतात स्वतंत्र शिक्षण असावे अशी शिफारस करण्यात आली.

त्याच्या कार्यकालात १८५६ साली विधवा विवाहासंदर्भात ‘विधवा पुनर्विवाह कायदा संमत झाला. त्यासाठी त्याला ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी मदत केली.


१८५७ चा उठाव आणि डलहौसी : 


स्मिथच्या मतानुसार, १८५७ च्या उठावाला डलहौसीच जबाबदार होता. त्याने कोणत्याही कारणावरून, भारतीय राज्यांना ब्रिटिश प्रशासनात विलीन केले. यामुळे राजांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि त्याची परिणती १८५७ च्या उठावात झाली.


लॉर्ड कॅनिंग (१८५६ ते १८६२) : 


कॅनिंग हा ईस्ट इंडिया कंपनीचा शेवटचा गव्हर्नर जनरल व ब्रिटिश संसदेद्वारा नियुक्त पहिला व्हॉईसरॉय होता. १८५८चा उठाव कॅनिंगच्या काळात झाला. उठाव मोडून काढण्याचे महत्त्वाचे काम त्याने केले. कॅनिंगने १८६१ साली पोलीस खात्यात सुधारणा केल्या. पोलीस विभागपदी इन्स्पेक्टर जनरल (कॅ), जिल्हा पोलीस प्रमुखपदी पोलीस अधीक्षक (रढ), तालुका प्रमुखपदी डेप्युटी इन्स्पेक्टर इत्यादी नेमणुका केल्या. कॅनिंगने मेकॉलेद्वारा तयार केलेली (१८३७ भारतीय दंडविधान) संहिता १८६० मध्ये लागू केली. १८६२ पासून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाली. कॅनिंगने मुंबई, मद्रास, कलकत्ता येथे उच्च न्यायालयाच्या शाखा स्थापन केल्या. याच काळात १८६१ चा भारतीय विधिमंडळ कायदा (इंडियन कौन्सिल अ‍ॅक्ट) संमत झाला तसेच ‘इंडियन सिव्हिल सव्‍‌र्हिसेस’ परीक्षा सुरू झाल्या. इ.स. १८५७ मध्ये मुंबई, मद्रास, कलकत्ता (कलकत्ता- २४ जानेवारी) विश्वविद्यालयांची स्थापना करण्यात आली. राणीचा जाहीरनामा लॉर्ड कॅनिंगने १ नोव्हेंबर १८५८ रोजी अलाहाबादच्या दरबारात वाचून दाखवला. १८५९ मध्ये भारतमंत्री म्हणून चार्ल्स वुड आला. वुडच्या सहाय्याने कॅनिंगने प्रत्येक प्रांतात शिक्षण खात्याची स्थापना केली. १८६१ च्या दुष्काळ परिस्थितीच्या चौकशीसाठी कर्नल स्मिथच्या अध्यक्षतेखाली हिंदुस्थानच्या इतिहासातील पहिला चौकशी आयोग कॅनिंगने नेमला.

विद्यापीठ आयोग, 1904


🖍 27 जानेवारी 1904 :- ‘विद्यापीठ आयोग’ स्थापन करण्यात आला.  


 🖍 अध्यक्ष :- सर थॉमस रॅले (कार्यकारी मंडळाचा विधीसदस्य) 


 🖍 या आयोगात निजामाच्या संस्थानातील शिक्षणखात्याचा संचालक सईद हुसेन बिलग्रामी या एकमेव भारतीयाचा अंतर्भाव करण्यात आला होता. 


🖍  भारतात हिंदु बहुसंख्य असून देखील त्यांचा एकही प्रतिनीधी या समितीवर नसल्याने सुशिक्षित भारतीयांकडून तीव्र निषेध व्यक्त केला गेला म्हणून नंतर कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश गुरुदास बॅनर्जी यांची नियुक्ती करण्यात आली. 

म्हणजेच न्या. गुरूदास बॅनर्जी हे या अायोगातील एकमेव हिंदु होते. 


🖍 भारतीय विद्यापीठ स्तरावरील उच्च शिक्षण व्यवस्थेत सुधारणा सुचविणे हा या आयोगाचा उद्देश होता असे वाटत असले तरी शिक्षणाचा प्रसार करणे किंवा शिक्षणाचा दर्जा उंचावणे हा या शिफारशींमागील हेतू मूळीच नव्हता तर उच्च शिक्षण हे सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याचा तो एक प्रयत्न हाेता. 


🖍  बनर्जी, मेहता, गोखले यांनी या विधेयकाचा उघड निषेध करण्यासाठी कलकत्ता टाऊन हॉलमध्ये जाहीर सभा घेतली व या विधेयकामागे कर्झनचे उद्दिष्ट शिक्षण सुधारणेचे नसून राजकीय स्वरुपाचे आहे हे जनतेला पटवून सांगितले. 


🖍 भारतातील वाढत्या राष्ट्रवादी भावनेला आवर घालण्यासाठी या कायद्याने विद्यापीठांवर सरकारी  

नियंत्रणे आणली व यान्वये सरकारी संमतीशिवाय काहीही करण्याची मोकळीक आता विद्यापिठांना  

उरनार नव्हती. 


 🖍 या कर्झनच्या धोरणामुळे यावर्षीपासून विद्यापीठांच्या सुधारणांसाठी दरवर्षी 5 लक्ष रू. प्रमाणे पाच वर्षांसाठी देण्याचे ठरविण्यात आले. 

         या समितीच्या शिफारसीनुसार ‘भारतीय विद्यापीठ कायदा, 1904’ पारित करण्यात आला.

राज्य मानवी हक्क आयोगाची रचना.


🔶राज्य सरकार, राज्य आयोगाकडे सोपविण्यात आलेल्या अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करील.


🔶राज्य मानवी हक्क आयोगामध्ये-🔶

अध्यक्ष - उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश

 एक सदस्य - उच्च न्यायालयाचा विद्यमान किंवा माजी न्यायाधीश किंवा किमान 7 वर्षे अनुभव असलेला जिल्हा न्यायाधीश

 एक-दोन सदस्य - मानवी हक्कांसंबंधी ज्ञान किंवा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या व्यक्ति

 सचिव हा आयोगाचा मुख्य कार्यकारी अधिकारी असेल.

राज्य आयोगाचे मुख्यालय राज्यशासन विनिर्दिष्ट करेल अशा ठिकाणी असेल.


🔶राज्य आयोगाच्या अध्यक्षांची व सदस्यांच्या नेमणुका:

अध्यक्षांची नेमणूक राज्यपाल पुढील समितीच्या शिफारशिनुसार करतील.


🔶समितीची रचना -

मुख्यमंत्री- सभाध्यक्ष

विधान मंडळाचा अध्यक्ष - सदस्य

त्या राज्याच्या गृहविकासाचा प्रभारी मंत्री - 

विधानसभेतील विरोधी पक्षनेता - सदस्य

ज्या राज्यात विधानपरिषद असेल त्या ठिकाणी त्याचा सभापती व विरोधी पक्षनेता - सदस्य


 🔶राज्य आयोगाच्या सभाध्यक्षांची किंवा सदस्यांची नोंदणी आणि त्यांना पदावरून दूर करणे:🔶


🔶राज्य आयोगाचा अध्यक्ष किंवा सदस्य राज्यपालांना उद्देशून त्याच्या पदाचा राजीनामा देवू शकेल.


🔶तसेच अध्यक्ष किंवा सदस्यास पुढील कारणावरून पदावरून दूर करता येईल .

अभिनिर्णीत नादार असेल; किंवा -

त्याने लाभाचे पद धारण केले आहे ; किंवा

 मानसिक किंवा शारीरिक अस्वास्थ्य  ; किंवा

राष्ट्रपतींच्या मते नैतिक अध : पतनाचा अंतर्भाव आहे अशा अपराधासाठी दोषी ठरविलेली व्यक्ती.


🔶राज्य आयोगाच्या अध्यक्षाचा आणि सदस्याचा पदावधी:

अध्यक्षांचा कार्यकाल - 5 वर्षे किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत.

 पुनर्नियुक्ति होवू शकते.

वित्त आयोग

*◾️सथापना* : 

वित्त आयोगाची स्थापना आजपासून ६७ वर्षांपूर्वी म्हणजे २२ नोव्हेंबर १९५१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पदाधिकारी कायदा मंत्री यांनी मिळून केली. भारत सरकारच्या अधिपत्याखाली या आयोगाचे कार्यक्षेत्र कार्य करते. वित्त आयोगाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

 

*⚫️रचना* :

 वित्त आयोग ५ लोकांचे मिळून बनते. त्यापैकी एक अध्यक्ष असतो व इतर चार सदस्य असतात. चार सदस्यांपैकी दोन सदस्य हे पूर्ण-वेळ सदस्य असतात. उरलेले दोन सदस्य अर्ध-वेळ सदस्य असतात.

  

🔺*नियुक्ती* :

 वित्त आयोग व त्यातील सदस्यांची नियुक्ती ही भारताच्या तत्कालीन राष्ट्रपतींमार्फत कलम २८० नुसार केली जाते. 


*🔻पात्रता* :

 वित्त आयोगाचा अध्यक्ष म्हणून असा व्यक्ती निवडला जातो ज्याला लोकांच्या आर्थिक समस्या व गरज याबद्दल सखोल ज्ञान असते. (उदाहरणार्थ निवृत्त आय.ए.एस.अधिकारी). इतर चार सदस्यांपैकी एक सदस्य उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश असलेला नियुक्त करतात. तर दुसरा जयला सरकारी वित्त व खाती याबद्दल संपूर्ण ज्ञान आहे असा व्यक्ती नेमला जातो. तिसरा व्यक्ती ज्याला प्रशासनाबद्दल पूर्ण माहिती आणि वित्तीय तज्ज्ञ असला पाहिजे व चौथा सदस्य अर्थतज्ज्ञ असला पाहिजे. 


*◾️कालावधी* :

 वित्त आयोगाचा कालावधी हा साधारणपणे पाच वर्षांचा असतो. पाच वर्षे पूर्ण झाल्यावर किंवा त्यापूर्वी(गरज असेल तर) राष्ट्रपती नवीन वित्त आयोग(नवीन सदस्य) नेमू शकतात. 


*♻️कार्य* :

१) करातून वसूल झालेला निधी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामध्ये समप्रमाणात विभागणे. 

२) राज्यांना लागणाऱ्या निधीसाठी कारणीभूत घटक व त्याचे परिणाम शोधून निश्चित करणे. 

३) जमा झालेल्या निधीतून ज्या राज्यांना आवश्यकता आहे अशा राज्यांना निधीसाठी राष्ट्रपतींकडे शिफारस करणे. 

४) वित्त अहवाल राष्ट्रपतींपुढे सादर करून त्यावर चर्चा करून अव्सज्याक सूचना सूचित करणे. 

५) आर्थिकदृष्ट्या मागास व सधन राज्य यांच्यातील वित्तीय दरी कमी करून त्यांना एकसमान बनवण्याचा प्रयत्न करणे. 



*🔺आतापर्यंतचे वित्त आयोग व अध्यक्ष* :


१) पहिला वित्त आयोग(१९५१ साली स्थापना) - के.सी.नियोगी 

२) दुसरा (१९५६) - के.संथानम 

३) तिसरा(१९६०) - ए.के.चंदा 

४) चौथा(१९६४) - पी.व्ही.राजमन्नावर 

५) पाचवा(१९६८) - महावीर त्यागी 

६) सहावा(१९७२) - के.ब्रम्हानंद रेड्डी 

७) सातवा(१९७७) - जे.एम.शेलार 

८) आठवा(१९८३) - यशवंतराव चव्हाण 

९) नववा(१९८७) - एन.पी.के.साळवे 

१०) दहावा(१९९२) - के.सी.पंत 

११) अकरावा(१९९८) - ए.एम.खुश्रो 

१२) बारावा(२००२) - सी.रंगराजन 

१३) तेरावा(२००७) - विजय केळकर 

१४) चौदावा(२०१३) - आयव्ही.व्ही.रेड्डी 

१५) पंधरावा(२०१७) - एन.के.सिंग 



*🔘पधराव्या वित्त आयोगाबद्दल* :

अध्यक्ष - एन.के.सिंग(I.A.S.)

पूर्ण-वेळ सदस्य:- १) शक्तिकांत दास, २)अनुप सिंग, 

अर्ध-वेळ सदस्य:-१)रमेश चांद २)अशोक लहरी


राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग



स्थापना : १३ ऑगस्ट १९९३

मुख्यालय : दिल्ली 

रचना : १ अध्यक्ष व ४ सदस्य

कार्यकाळ : ३ वर्षे


अध्यक्ष व सदस्य पात्रता 

अध्यक्ष : सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असायला पाहिजे

१ सदस्य सचिव असतील

१ सदस्य समाज शास्त्रज्ञ असतील

२ सदस्य इतर मागासवर्गीय घटकातील विशेष तज्ञ असतील


स्थापना

मंडल आयोगाच्या शिफारसी लागू केल्यानंतर देशभरात याविरोधात आंदोलने झाली. या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक प्रकरणे दाखल करण्यात आली.



यातील इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय मागास वर्ग आयोग स्थापन करण्याचा निर्णय दिला. त्यांनतर भारत सरकारने १९९३ साली राष्ट्रीय मागास वर्ग आयोग स्थापन केला.


कार्य

OBC घटकांच्या तक्रारी सोडविणे, एखाद्या जातीला OBC घटकांमध्ये समावेश करण्याची शिफारस करणे. तसेच एखाद्या जातीला OBC घटकांमधून काढून टाकण्याची शिफारस करणे.

राज्य निवडणूक आयोग

♦️सथापना- संविधान अनुच्छेद 243k.

♦️पचायतीच्या निवडणुकीची जबाबदारी :- 243k नुसार.

♦️नगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी :- 243 ZA नुसार.

♦️राज्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती :- राज्यपाल.

♦️पदावरून काढण्याची पध्दत :- उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून काढण्याच्या पध्दतीप्रमाणे.

♦️नियुक्तीनंतर आर्थिक लाभात अहितकारक बदल नाही. आयोगाला स्वत:चा कर्मचारीवर्ग नसतो.

♦️महाराष्ट्रात स्थापना :- 23 एप्रिल 1994.

♦️पहिले आयुक्त :- श्री डी. एन. चौधरी.





मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती


निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

🔸मुख्य निडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची नेमणूक ➖


👉पंतप्रधान,

👉 विरोधी पक्षनेते आणि

👉 सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश 


यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी करावी,


✅ तसेच विरोधी पक्षनेते नसतील तर, तेव्हा संसदेतील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते या समितीचे सदस्य असतील असेही न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

✅ निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तींबाबत सर्वोच्च न्यायालयाने संसदेला नवीन कायदा बनविण्याचे निर्देश दिले आहेत.


तसेच जोपर्यंत हा कायदा बनत नाही तोपर्यंत निवडणूक आयुक्तांची निवड करण्यासाठी पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचा समावेश असलेल्या समितीद्वारे करण्यात यावी, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.


जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती



०१) 'राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी' (NDA) कुठे आहे ?

- खडकवासला.(पुणे)


०२) बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय  आहे ?

- मुरलीधर देविदास आमटे. 


०३) जगातील कोणत्या खंडास बर्फाळ खंड असे म्हणतात ?

- अंटार्क्टिका.


०४) शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती  ?

- यकृत.


०५) गोवा या राज्याची राजधानी कोणती आहे ?

- पणजी.


०१) महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्र्याचे नाव काय होते ?

- यशवंतराव चव्हाण.


०२) महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीचे नाव काय आहे ?

- नागपूर.


०३) अजिंठा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

- औरंगाबाद.


०४) सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत ?

- ३६.


०५) महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब नदीचे नाव काय आहे ?

- गोदावरी.


०१) महाराष्ट्र राज्याची राजभाषेचे नाव काय आहे ?

- मराठी.


०२) महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता?

- हरियाल.


०३) महाराष्ट्र राज्याच्या राज्यवृक्षाचे नाव काय आहे ?

 - आंबा.


०४) महाराष्ट्र राज्याच्या खेळाचे नाव काय आहे ?

- कबड्डी.


०५) महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे ?

- मुंबई.


०१) भारतातील पहिली महिला आयपीएस अधिकारी कोण ?

- किरण बेदी.


०२) छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोठे झाला ?

- पुरंदर किल्ला.


०३) नेपाळची राजधानी कोणती आहे ?

- काठमांडू.


०४) रेबिजची लस कोणी शोधली ?

- लुईस पाश्चर.


०५) सुशीलकुमार हा खेळाडू कोणता खेळ खेळतो ?

- कुस्ती.


०१) १ ते ९ अंकाची बेरीज किती होते ?

- ४५.


०२) इटली या देशाची राजधानी कोणती ?

- रोम.


०३) 'कऱ्हेचे पाणी' हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

- प्र.के.अत्रे.


०४) ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे ?

- उस्मानाबाद.


०५) इराक या देशाची राजधानी कोणती ?

- बगदाद.


१) राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी कोणती नाणी तयार केली ?

- होन आणि शिवराई.


०२) भारताच्या अणू विज्ञानाचे जनक कोणास म्हणतात ?

- डॉ.होमी भाभा.


०३) अंधासाठीच्या ब्रेल लिपीचा शोध कोणी लावला ?

- लुईस ब्रेल.


०४) संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव काय ?

- डेंबुजी झिंगराजी जानोरकर.


०५) 'स्कर्व्ही' हा रोग कोणत्या जीवनसत्वाभावी होतो ?

- सी जिवनसत्व.


०१) 'इस्रो' (ISRO)चे मुख्यालय भारतात कोठे आहे ?

- बंगळुरू. 


०२) राष्ट्रीय हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो ?

- १४ सप्टेंबर.


०३) रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते ?

- कुलाबा.


०४) 'विश्वनाथन आनंद' हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

- बुद्धिबळ.


०५) मराठवाड्याच्या राजधानीचा जिल्हा कोणता ?

- औरंगाबाद.


०१) ज्वारीच्या उत्पादनात कोणत्या राज्याचा देशात प्रथम क्रमांक लागतो ? 

- महाराष्ट्र.


०२) प्रसिद्ध 'शनिवारवाडा ' कोठे आहे ?

- पुणे.


०३) सातारा जिल्ह्यात कोणी प्रतिसरकारची स्थापना केली ?

- क्रांतिसिंह नाना पाटील.


०४) गरीबाचे 'बदाम'असे कशास म्हटले जाते ?

- शेंगदाणे.


०५) पृथ्वीच्या स्वतःच्या आसाभोवती फिरण्याच्या क्रियेस काय म्हणतात ?

- परिवलन.


०१) 'ऊसतोड कामगारांचा जिल्हा' म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो ?

- बीड.


०२) ऑक्सीजन चा शोध कोणी लावला ?

- जोसेफ प्रिस्टले. 


०३) बांगलादेशची राजधानी कोणती आहे ?

- ढाका.


०४) भारतीय संविधान लिहून पूर्ण करण्यास किती कालावधी लागला ?

- २ वर्ष ११ महिने १७ दिवस.


०५) 'श्रीमान योगी' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

- रणजित देसाई.



०१) जपान या देशाची राजधानी कोणती ?

- टोकियो.


०२) कोणाचा जन्मदिवस 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो ?

- डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम.


०३) महाराष्ट्रातील कोणत्या संतांची पदे 'गुरु ग्रंथसाहेब' या शीख धर्मीयांच्या धर्मग्रंथात आहेत ?

- संत नामदेव महाराज.


०४) 'क्ष'(X-ray) किरणांचा शोध कोणी लावला ?

- रॉंन्टजेन.


०५) फ्रान्स या देशाची राजधानी कोणती ?

- पॅरिस.


०१) 'विवेकसिंधू' हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?

- मुकुंदराज.


०२) चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ?

- कर्नाटक.


०३) राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतीक आहे ?

- त्यागाचे.


०४) मिठाचे रासायनिक नाव काय आहे ?

- सोडियम क्लोराइड.


०५) 'धवलक्रांती' म्हणजे  कशाच्या उत्पादनात वाढ ?

- दूध उत्पादन.


०१) सरदार सरोवर' हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

- नर्मदा.


०२) 'आग्रा' हे शहर कोणत्या नदी काठावर आहे ?

- यमुना.


०३) शिवाजी सागर' जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात ?

- कोयना.


०४) 'संजय गांधी' राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

- बोरिवली.(मुंबई)


०५) महाराष्ट्रातील सर्वांत मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- चंद्रपूर.


०१) महाराष्ट्र राज्याच्या सागरी किना-याची लांबी किती आहे ?

- ७२० कि.मी.


०२) शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- पुणे.


०३) 'भंडारदरा' धरण कोणत्या नदीवर आहे ?

- प्रवरा.


०४) पालघर जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र कोणते आहे ?

- सातपाटी.


०५) 'बिहू' हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे ?

- आसाम.


१) भारतीय चित्रपट सृष्टीचें जनक कोणास म्हणतात ?

- दादासाहेब फाळके.


०२) डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?

- रूडाल्फ डिझेल.


०३) 'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?

- अनंत भवानीबाबा घोलप.


०४) व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?

- २७० ते २८० ग्रॅम.


०५) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?

- ४ सप्टेंबर १९२७.


०१) महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती ?

- पुणे.


०२) वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ?

- जेम्स वॅट.


०३) 'एकच प्याला' या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहे ?

- प्रल्हाद केशव अत्रे.


०४) ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे मूळ नाव कोणते आहे ?

- भावार्थ दीपिका.


०५) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितिवर निवड केव्हा झाली ?

- ८ जुलै १९३०.

लक्षात ठेवा



🔸१) पुण्याजवळ .... येथे 'राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी' (National Defence Academy) आहे.

- खडकवासला


🔹२) राज्यातील .... या नदीचे खोरे दगडी कोळशाच्या साठ्यांबद्दल प्रसिद्ध आहे.

- वर्धा


🔸३) राज्यातील नियोजित औष्णिक विद्युत केंद्रामुळे अधिक (प्रकाशझोतात आलेले .... हे ठिकाण दगडी कोळशाच्या खाणींबद्दलही प्रसिद्ध आहे. 

- उमरेड (नागपूर)


🔹४) राज्यातील मधुमक्षिकापालन केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेले थंड हवेचे ठिकाण .....

- महाबळेश्वर


🔸५) महाराष्ट्र पठारावरील ..... या सर्वांत मोठ्या डोंगररांगेने कृष्णा व भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी केली आहेत.

- महादेव डोंगररांगा


🔸१) आणीबाणी जारी असता संसद लोकसभेचा कार्यकाल जास्तीत जास्त .... वाढवू शकते. 

- एक वर्ष


🔹२) संसदेच्या अधिवेशनासंदर्भातील घटनात्मक तरतुदी पाहता संसदेची वर्षातून किमान .... अधिवेशने होणे आवश्यक ठरते.

- दोन


🔸३) लोकसभेतील प्रत्येक राज्याची सदस्यसंख्या लोक संख्येच्या निकषावर निश्चित केलेली आहे. लोकसभेतील प्रत्येक राज्याची सध्याची संख्या निश्चित करताना .... या वर्षीची जनगणना आधारभूत धरण्यात आली आहे.

- १९७१


🔹४) कलम २८०(१) मधील तरतुदींनुसार .... हा अर्थ आयोगाची रचना करतो.

- राष्ट्रपती


🔸५) .... हे संसदेचे स्थायी सभागृह होय. ते कधीही विसर्जित होत नाही.

- राज्यसभा

जगभरातील सर्वात लांब, सर्वात मोठी, सर्वात उंच, सर्वात लहान



1. सौर मंडळामधील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?

उत्तर: बृहस्पति ग्रह


2. क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे?

 उत्तर: रशिया


3. लोकसंख्येनुसार सर्वात मोठा देश कोणता आहे?

उत्तर: चीन.


4. लोकसंख्येनुसार सर्वात मोठे शहर कोणते आहे?

उत्तर: टोकियो, जपान.


5. जगातील सर्वात मोठे विमान वाहक कोण आहे?

उत्तर: अँटोनोव्ह अन -225 / Antonov An-225


6. जगातील सर्वात मोठी बँक कोणती आहे?

 उत्तर: Industrial & Commercial Bank of China (ICBC) / आयसीबीसी, चीन


7. जगातील सर्वात मोठी सार्वजनिक कंपनी कोणती आहे?

उत्तर: आयसीबीसी, चीन.


8. जगातील सर्वात मोठे डिस्नेलँड कोणते आहे?

उत्तर: ऑरलँडो, फ्लोरिडा मधील वॉल्ट डिस्ने वर्ल्ड रिसॉर्ट.


9. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?

उत्तर: अंटार्क्टिका, अंटार्क्टिका.


10. जगातील सर्वात मोठे इंग्रजी बोलणारे राष्ट्र कोणते आहे?

उत्तर: अमेरिका


11. जगातील सर्वात मोठे फुटबॉल (किंवा सॉकर) स्टेडियम कोणते आहे?

उत्तर: रुंगनाडो मे डे स्टेडियम, उत्तर कोरिया / Rungnado May Day Stadium, North Korea.


12. क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठे तलाव कोणते आहे?

उत्तर: लेक सुपीरियर, उत्तर अमेरिका.


13. जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?

उत्तर: आशिया / Asia


14. जगातील सर्वात मोठी हॉटेलची साखळी कोणती आहे?

उत्तर: इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल्स गट / Inter Continental Hotels Group.


15. क्षेत्रानुसार जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे?

उत्तर: ग्रीनलँड, उत्तर अटलांटिक


16. जगातील सर्वात मोठे शॉपिंग मॉल कोणते आहे?

उत्तर: न्यू साउथ चायना मॉल.


17. जगातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?

उत्तर: ग्रीनलँड नॅशनल पार्क.


18. सर्वात मोठा अणुबॉम्ब कोणता आहे?

उत्तर: झार बोंबा / Tsar bomb


19. जगातील सर्वात मोठे महासागर कोणते आहे?

उत्तर: पॅसिफिक महासागर.


20. लोकांच्या संख्येने सर्वात मोठा धर्म कोणता आहे?

उत्तर: ख्रिश्चन

21. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

उत्तर: नाईल – करेगा.


22. जगातील सर्वात मोठे ज्वालामुखी कोणते आहे?

उत्तर: हवाईच्या बिग बेटावरील मौना लोआ.


23. जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय कोणते आहे?

उत्तर: ओमाहा, नेब्रास्का मधील हेनरी डोरली प्राणीसंग्रहालय.


24. जगातील सर्वात लांब माउंटन साखळी कोणती आहे?

उत्तर: अँडीज.


25. जगातील सर्वात लांब रेल्वे पूल कोणता आहे?

उत्तर: दानियांग-कुन्शन ग्रँड ब्रिज, चीन.


26. जगातील सर्वात लांब गुहा कोणती आहे?

उत्तर: अमेरिकेतील केंटकी, ब्राउनस्विलेजवळील, मॅमथ गुहा.


27. सर्वात लांब इंग्रजी शब्द कोणता आहे?

उत्तर: pneumonoultramicroscopicsilicovolcanoconiosis / न्यूमोनॉल्ट्रॅमिकोस्कोपिक्सिलिकोव्होलकेनोकोनिसिस – हा एक फुफ्फुसाचा रोग आहे – 45 अक्षरे


28. जगातील सर्वात लांब महामार्ग कोणता आहे?

उत्तर: ऑस्ट्रेलियाचा हायवे १.


29. सर्वात लांब प्राणी कोणता आहे?

उत्तर: Ocean Quahog


30. जगातील सर्वात उंच इमारत कोणती आहे?

उत्तर: बुर्ज खलिफा, दुबई


31. जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे?

उत्तर: माउंट एव्हरेस्ट.


32. जगातील सर्वात उंच लाईटहॉउस कोणते आहे?

उत्तर: जेद्दाह लाइट, जेद्दाह, सौदी अरेबिया – 436 फूट (133 मीटर)


33. जगातील सर्वात उंच कार्यालय इमारत कोणती आहे?

उत्तर: बुर्ज खलिफा, दुबई.


34. जगातील सर्वात उंच / सर्वात मोठे पिरॅमिड कोणते आहे?

उत्तर: गीझाचा ग्रेट पिरॅमिड (ज्याला खुफूचा पिरॅमिड किंवा चॉप्सचा पिरॅमिड देखील म्हणतात).


35. जगातील सर्वात उंच झाड कोणते आहे?

उत्तर: जगातील सर्वात उंच वृक्ष म्हणजे कोस्ट रेडवुड, 115.72 मीटर (379.7 फूट) उंच.



हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा 2022 (24व्या) :-


◆ स्थळ :- बीजिंग (चीन), 

◆ उद्घाटन स्थळ :- बीजींग नॅशनल स्टेडियम

◆ कालावधी :- 4 ते 20 फेब्रुवारी 2022 (17 दिवस)


➤ उद्घाटन सोहळ्यातील क्रीडाज्योत प्रज्वलन :-

1) डिनीजीर यीलामुजिआंग (चीन)

2) झाओ जिआवेन (चीन) 


उद्घाटन सोहळ्याची मुख्य संकल्पना :- "एक जग एक कुटुंब"


◆ शुभंकर :- बिंग डेवन (एक प्रकारचा पांडा)


➤ एकूण सहभागी देश :- 91

➤ घोषवाक्य :- "सामायिक भविष्यासाठी एकत्र".


➤ भारतातील सहभागी खेळाडू :- 1 (मोहम्मद आरिफ खान)


◆ या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला एकही पदक मिळाले नाही.


◆ उन्हाळी तसेच हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करणारे बीजिंग हे पहिले शहर बनले. 


◆ हैती आणि सौदी अरेबिया हे देश हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धामध्ये पहिल्यांदाच सहभागी झाले.

कर्नाटकने बयंदूर येथे देशातील पहिल्या मरीनाची योजना आखली आहे.


◆ कर्नाटकातील किनारी पर्यटनाला चालना देण्यासाठी कर्नाटक सरकार देशातील पहिले मरीना किंवा डॉकेज देणारे बोट बेसिन, उडुपी जिल्ह्यातील बाइंदूर येथे बांधणार आहे. 


◆ किनारी भागात समुद्रकिनारा पर्यटन आणि तीर्थक्षेत्र पर्यटनासाठी कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) शिथिल करण्यासाठी सरकार केंद्राकडून परवानगी मागणार आहे. 


◆ सरकार पुरातत्व विभागाकडून गंगा, कदंब, राष्ट्रकूट, चालुक्य आणि होयसाळ या महान राजवंशांचा इतिहास संकलित करेल आणि राज्यातील पर्यटनाचा इतिहास विकसित करेल. यामुळे पर्यटनाचा विकास तर होईलच शिवाय लोकांना राज्याचा समृद्ध इतिहास समजण्यास मदत होईल.


➤ कर्नाटक राज्यासंबंधी :-


◆ राजधानी :- बेंगळुरू (कार्यकारी शाखा),

◆ राज्यपाल :- थावर चंद गहलोत,

◆ मुख्यमंत्री :- बसवराज बोम्मई.

कॅच द रेन 2023' मोहीम द्रौपदी मुर्मूने सुरू केली आहे.




🔹राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी असा दावा केला की अनियंत्रित शहरीकरणामुळे जलसंधारणाच्या पारंपारिक पद्धती देशात सोडल्या गेल्या आहेत.


🔸पाण्याची टंचाई आणि ग्लोबल वॉर्मिंग या समस्यांचे परिणाम आहेत यावर राष्ट्रपतींनी भर दिला.


🔹नवीन तंत्रज्ञानाचा वापर करूनही, जुनी जलसंधारण तंत्रे टिकवून ठेवणे आणि पुनर्संचयित करणे अत्यावश्यक आहे, असे त्या म्हणाल्या.


🔸जलसंधारण आणि स्वच्छता यांमध्ये महिलांनी बजावलेल्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन राष्ट्रपतींनी स्वच्छ भारत मिशनच्या अनेक श्रेणींमध्ये ग्रामीण, जल जीवन मिशन आणि राष्ट्रीय जल मिशनसह "स्वच्छ सुजल शक्ती सन्मान 2023" प्रदान केले.


-------------------------------------------------------