३० डिसेंबर २०२२

भारतातील नागरी सेवांचा विकास



 

✏️कॉर्नवॉलिस (1786-93):- यांनी प्रथम आयोजन केले

 

✏️वेलेस्ली (1798-1805)

1. नवीन भरतीसाठी फोर्ट विल्यम कॉलेज

2. 1806- नामंजूर (संचालक न्यायालयाद्वारे)

3. इंग्लंडमधील हेलीबरी येथील ईस्ट इंडिया कॉलेज

 

✏️1853- खुली स्पर्धा

 

✏️भारतीय नागरी सेवा कायदा,1861

 1.वय:-{23-1859},{22-1860},{21-1866}

 {19-1878}

 2.1863- सत्येंद्रनाथ टागोर पात्र ठरणारे पहिले भारतीय 

 

✏️वैधानिक नागरी सेवा (1878-79:लिटन)

 1.नामांकनांद्वारे भारतीयांना 1/6 वे करारबद्ध पद(प्रणाली अयशस्वी आणि रद्द)

  

✏️ऍचिसन कमिटी ऑन पब्लिक सर्व्हिसेस (1886)-डफरिन

1.करारबद्ध आणि uncovenanted Drop

2.इंपीरियल ICS (परीक्षा-इंग्लंड),

-   प्रांतीय नागरी सेवा (परीक्षा-भारत),

-   अधीनस्थ नागरी सेवा (परीक्षा-भारत)

3. वयोमर्यादा 23 पर्यंत वाढवले

 

✏️माँटफोर्ड सुधारणा,1919

 1.भारतातच 1/3 भरती-दरवर्षी 1.5% ने वाढवली जाईल

 

✏️ली कमिशन,1924

1.थेट भरती, 50:50 च्या आधारावर ICS ला 15 वर्षात समता गाठणे.

2.लोकसेवा आयोग स्थापन करणे

(GoI Act,1919 मध्ये नमूद केल्याप्रमाणे)

 

✏️GoI Act,1935

1.फेडरल लोकसेवा आयोग आणि प्रांतीय लोकसेवा आयोगाची स्थापना

महत्त्वाचे सराव प्रश्न व उत्तरे


1)कोणती भारतीय शैक्षणिक संस्था वा विद्यापीठ ‘QS जागतिक विद्यापीठांची मानांकन यादी 2020’ या क्रमवारीत भारतातले पहिल्या क्रमांकाचे ठरले?


(A) IIT मुंबई✅✅✅

(B) IIT मद्रास

(C) IIT दिल्ली

(D) IIT मंडी


1)कोणी स्लोव्हाकिया या देशाच्या प्रथम महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली?


(A) मारिया रोको

(B) एड्रियाना कारेमब्यू

(C) डेनिएला हांतुचोवा

(D) जुझाना कापुतोवा✅✅✅


3)कोणती शैक्षणिक संस्था वा विद्यापीठ ‘QS जागतिक विद्यापीठांची मानांकन यादी 2020’ या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे?


(A) मॅसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी✅✅✅

(B) ऑक्सफर्ड विद्यापीठ

(C) मॅक्स प्लांक विद्यापीठ

(D) भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू


4)कोणत्या सालापर्यंत ‘भारतमाला’ प्रकल्पाच्या अंतर्गत एकूण 35000 किलोमीटर लांबीच्या महामार्गांचे केले जाणार आहे?


(A) सन 2025

(B) सन 2022✅✅✅

(C) सन 2030

(D) सन 2035



5)राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने भारताला 5 भूकंपीय विभागांमध्ये विभागले आहे. कोणता क्षेत्र सर्वात उच्च जोखमीचा क्षेत्र मानला जातो जो अतीव तीव्रतेच्या भूकंपांना बळी पडतो?


(A) क्षेत्र 5✅✅✅

(B) क्षेत्र 1

(C) क्षेत्र 3

(D) क्षेत्र 2




6)भारतीय नौदलाच्या कोणत्या प्रकल्पाच्या अंतर्गत 6 पाणबुडी तयार करण्यासाठी भारत सरकारने जून महिन्यात 45 हजार कोटी रुपयांच्या खर्चाने प्रकल्पाची सुरुवात केली?


(A) प्रोजेक्ट 17A

(B) प्रोजेक्ट 75-I✅✅✅

(C) प्रोजेक्ट 71A

(D) प्रोजेक्ट 79-I


7)भारताने सॉलिड फ्युएल डक्टेड प्रणोदन समर्थित क्षेपणास्त्राचे चाचणी उड्डाण यशस्वीपणे पार पाडले. या क्षेपणास्त्राचे नाव काय आहे?


(A) कर्णजेट

(B) जेटएक्स

(C) जेट-ओ

(D) रामजेट✅✅✅


8) भारतीय प्राणीशास्त्रीय सर्वेक्षण (ZSI) आणि भारतीय वनस्पतीशास्त्रीय सर्वेक्षण (BSI) च्या प्रकाशनानुसार, 2017 साली वनस्पती आणि प्राण्यांच्या किती प्रजाती शोधल्या गेल्या?


(A) 539✅✅✅

(B) 739

(C) 639

(D) 439


9) कोणते कण हृदयरोग आणि श्वसनाच्या आजाराला कारणीभूत ठरणार्‍या PM2.5 या प्रदूषकाच्या वर्गामधील सर्वात मोठे घटक आहे?


(A) कार्बन डाय ऑक्साइड

(B) नायट्रोजन✅✅✅

(C) मिथेन

(D) सल्फर डाय ऑक्साईड


10) स्पेनमधील सेव्हिले विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शहरी सांडपाण्यामधून बहुतेक प्रदूषके शोषून घेणारा पदार्थ शोधून काढला. त्या पदार्थाचे नाव काय आहे?


(A) Na-माईका-4

(B) CL-माईका-4

(C) N4-माईका-4

(D) C18-माईका-4✅✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागमध्ये येणाऱ्या महानगरपालिका


🎯 कोकण प्रशासकीय विभाग 

1. बृहन्मुंबई महानगरपालिका

2. ठाणे महानगरपालिका

3. कल्याण - डोंबिवली महानगरपालिका

4. मीरा - भाईंदर महानगरपालिका

5. भिवंडी - निजामपूर महानगर पालिका

6. नवी मुंबई महानगर पालिका

7. उल्हास नगर महानगरपालिका

8.  पनवेल महानगरपालिका

9.वसई - विरार महानगरपालिका


🎯 पुणे प्रशासकीय विभाग

1. पुणे महानगरपालिका

2. पिंपरी - चिंचवड महानगरपालिका

3. सोलापूर महानगरपालिका

4. कोल्हापूर महानगरपालिका 

5. सांगली - मिरज - कुपवाडा महानगरपालिका


🎯 नाशिक प्रशासकीय विभाग

1. नाशिक महानगरपालिका

2. मालेगाव महानगरपालिका

3. अहमदनगर महानगरपालिका

4. धुळे महानगरपालिका

5. जळगाव महानगरपालिका


🎯 औरंगाबाद प्रशासकीय विभाग

1. औरंगाबाद महानगरपालिका

2. परभणी महानगरपालिका

3. लातूर महानगरपालिका

4. नांदेड - वाघाळा महानगरपालिका 


🎯 अमरावती प्रशासकीय विभाग

1. अमरावती

2. अकोला


  🎯 नागपूर प्रशासकीय विभागात

1. नागपूर

2. चंद्रपूर

राज्यात ३६२८ तलाठी पदांसाठी होणार भरती; जाणून घ्या जिल्ह्यानुसार किती पदांसाठी भरती होणार..

 राज्यात लवकरच तलाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये ३६२८ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार असून यामध्ये एकुण ३११० तलाठी व ५१८ मंडळ अधिकारी याप्रमाणे एकुण ३६२८ पदांसाठी भरती होणार आहे. यामध्ये जिल्ह्यानुसार किती पदांसाठी भरती होणार याची यादी खालीलप्रमाणे..👇🏻


● पुणे विभागात ६०२ तलाठी साझे आणि १०० महसूली मंडळे,

● अमरावती विभागात १०६ तलाठी साझे आणि १८ महसूली मंडळे, 

● नागपूर विभागात ४७८ तलाठी साझे आणि ८० महसूली मंडळे,

● औरंगाबाद विभागात ६८५ तलाठी साझे आणि ११४ महसूली मंडळे, 

● नाशिक विभागात ६८९ तलाठी साझे आणि ११५ महसूली मंडळे, 

● कोकण विभागात ५५० तलाठी साझे आणि ९१ महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे..


🧾 जिल्ह्यानुसार तलाठी साझे आणि महसूली मंडळे यांसाठी रिक्त पदांची संख्या अनुक्रमे खालीलप्रमाणे..↓↓


📍 पुणे 

पुणे- ३३१,         ५५

सातारा- ७७,       १२

सांगली- ५२,       ०९

सोलापूर- १११,    १९

कोल्हापूर- ३१,     ०५


📍 अमरावती

अमरावती- ३४,     ०६

अकोला- ०८,        ०१

यवतमाळ- ५४,      ०९

बुलढाणा- १०,       ०२


📍 नागपूर

नागपूर- ९४,          १६

चंद्रपूर- १३३,         २३

वर्धा- ५०,               ०८

गडचिरोली- ११४,   १९

गोंदिया- ४९,           ०८

भंडारा- ३८,            ०६


📍 औरंगाबाद 

औरंगाबाद- ११७,     १९

जालना- ८०,            १३

परभणी- ७६,           १३

हिंगोली- ६१,           १०

बीड- १३८,              २३

नांदेड- ८४,              १४

लातूर- ३९,              ०७

उस्मानाबाद- ९०,      १५


📍 नाशिक

नाशिक- १७५,          २९

धुळे- १६६,               २८

जळगाव- १४६,         २४

अहमदनगर- २०२,     ३४

अलीकडेच घडलेल्या घडामोडी


प्रश्न: समुद्राच्या लाटांपासून वीज निर्माण करण्यासाठी कोणत्या IIT ने अलीकडेच 'Ocean Web Energy Converter' विकसित केले आहे?

उत्तर: IIT मद्रास.


प्रश्न: कोणत्या संस्थेने अलीकडेच जागतिक जल संसाधन अहवाल 2021 प्रसिद्ध केला आहे?

उत्तर: जागतिक हवामान संघटना.


प्रश्नः नुकतीच 'जे. सी. बोस: एक सत्याग्रही सायंटिस्ट' या विषयावरील परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे?

उत्तर : नवी दिल्ली.


प्रश्न: भारतातील पहिले सोन्याचे एटीएम नुकतेच कोठे उघडले गेले?

उत्तर : हैदराबाद.


प्रश्न: कोणता देश अलीकडेच $100 अब्ज रेमिटन्स प्राप्त करणारा पहिला देश बनला आहे?

उत्तर भारत.


प्रश्न: अलीकडे कोणत्या मेट्रोने यशस्वीरित्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला आहे?

उत्तर : नागपूर मेट्रो.


प्रश्‍न: अलीकडे NDDB आणि अमूल दुग्‍ध उत्‍पादन वाढवण्‍यासाठी कोणत्या देशाला तांत्रिक सहाय्य करतील?

उत्तर: श्रीलंका.


प्रश्न: भारत आणि कोणत्या देशाने अलीकडे स्थलांतर आणि गतिशीलता करारावर स्वाक्षरी केली आहे?

उत्तर: जर्मनी.


प्रश्न: अलीकडेच 'फोर्ब्स एशिया हीरोज ऑफ फिलान्थ्रॉपी' यादीत कोणाचा समावेश करण्यात आला आहे?

उत्तर: गौतम अदानी.


प्रश्न: अलीकडेच गोव्यात भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलातील 'संगम सराव'ची 7 वी आवृत्ती पार पडली?

उत्तर: अमेरिका. 


Q.1) स्वतःचे हवामान बदल मिशन सुरू करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे?

➡️ तामिळनाडू


Q.2) नुकतेच भारतातील पहिल्या कार्बन न्यूट्रल फार्मचे उद्घाटन करण्यात कोठे करण्यात आले?

➡️ करळ


Q.3) आयुष्मान भारत आरोग्य खाते आयडी निर्मितीसाठी श्रेणीत पहिले पारितोषिक आणि दूरसंचार विभागातील दुसरे पारितोषिक कोणत्या केन्द्रशाशित प्रदेशाला देण्यात आले आहे?

➡️ जम्मू आणि काश्मीर


Q.4) सुप्रसिद्ध मराठी लावणी गायिका_ यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे.

➡️ सलोचना चव्हाण


Q.5) चंद्रावरच्या पहिल्या नागरी मोहिमेसाठी ‘ड्रीम क्रू’ची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्याचा समावेश आहे?

➡️ दव जोशी


Q.6) भारत-इंडोनेशिया समन्वित गस्तीची 39 वी आवृत्ती कोणत्या कालावधीत आयोजित केली जात आहे?

➡️ 08 ते 19 डिसेंबर


Q.7) एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा भारतातील चौथा आणि जगातील सातवा फलंदाज कोण बनला आहे?

➡️ इशान किशन


Q.8) युनिसेफ दिन केंव्हा साजरा केला जातो?

➡️ 11 डिसेंबर


Q.9) आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस केव्हा साजरा केला जातो?

➡️ 11 डिसेंबर

30 डिसेंबर चालू घडामोडी


Q.1) नुकतेच अटल सन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?

✅ प्रभू चंद्र मिश्रा


Q.2) कोणत्या IIT ने Wharton-QS Reimagine Education Awards 2022 जिंकले आहे?

✅ IIT मद्रास


Q.3) अलीकडेच अकरा दिवसीय “धनुजत्रा” महोत्सव कोणत्या राज्यात सुरू झाला आहे?

✅ ओडिसा


Q.4) “हसमुख अधिया” हे कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्त झाले आहेत?

✅ गुजरात


Q.5) फरहान बेहर’ या कोणत्या देशाच्या क्रिकेटपटू ने क्रिकेटमधून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे?

✅ दक्षिण आफ्रिका


Q.6) भारत सरकार कोणत्या देशात “भारतीय मिशन” चालू करणार आहे?

✅ लिथोनिया


Q.7) इंडियन प्रीमियर लीगच्या सर्वात यशस्वी फ्रँचायझी म्हणून कोणत्या संघाला ओळखले जाते?

✅ मुंबई इंडियन्स


Q.8) 2022 चा 30वा एकलव्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?

✅ स्वस्ति सिंग


Q.9) धर्मदाम हा भारतातील पहिला पूर्ण ग्रंथालय मतदार संघ आहे. ते कोणत्या राज्यात आहे?

✅ केरळ


Q.10) अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाद्वारे कोणत्या तरुणाला 'Eat Right Campus' टॅग मिळाला आहे?

✅ बुलंदशहर कारागृह

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Q.1) लष्कराचे इंजीनिअर-इन-चीफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

✅ अरविंद वालिया


Q.2) प्रति कृषी कुटुंब सरासरी मासिक उत्पन्नामध्ये देशभरात कोणते राज्य अव्वल आहे?

✅ मेघालय


Q.3) ऑस्ट्रेलियाचा पुरूष कसोटीपटूचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार आता कोणाच्या स्मरणार्थ दिला जाणार आहे?

✅ दिवंगत शेन वॉर्न


Q.4) __हे विज्ञानावरील G20 वर्किंग ग्रुपचे सचिवालय म्हणून घोषित करण्यात आले.

✅ IISc बेंगळुरू


Q.5) प्रथम केआर गौरी अम्मा राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?

✅ अलेडा ग्वेरा


Q.6) “फोर्क्स इन द रोड: माय डेज अँट आरबीआय अँड बियॉन्ड” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

✅ सी. रंगराजन


Q.7) उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यातील ‘मुंदेरा बाजार’ नगरपरिषदेचे नाव बदलून काय केले जाणार आहे?

✅ चौरी-चौरा


Q.8) इंडियन बँकेने नुकतेच कोणत्या राज्यात ‘MSME प्रेरणा’ कार्यक्रम सुरू केला?

✅ राजस्थान


Q.9) BBC स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2022 कोणाला निवडण्यात आले आहे?

✅ ब्लेथ मिड

Mpsc राज्यसेवा परीक्षा-प्रश्नसराव



1. टी-२० क्रिकेटची सुरुवात कुठे झाली?

1.  ऑस्ट्रेलिया

2.  इंग्लंड

3.  भारत

4.  दक्षिण आफ्रिका

उत्तर:-2


2. महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण?

1.  पी. के. सावंत

2.  वसंतदादा पाटील

3.  शरद पवार

4.  देवेंद्र फडणवीस

उत्तर:-3


3. उस्मानिया विद्यापीठ कुठे आहे?

1.  अहमदाबाद

2.  हैद्राबाद

3.  नांदेड

4.  अलीगड

उत्तर:-2


4. उपराष्ट्रातीच्या निवडणुकीत कोणत्य सभागृहाचे निर्वाचित सदस्य भाग घेतात?

1.  लोकसभा

2.  लोकसभा, राज्यसभा व विधानसभा

3.  लोकसभा व राज्यसभा

4.  राज्यसभा

उत्तर:-3


5. भारतात सर्वात जुने उच्च न्यायालय कुठे आहे?

1.  चेन्नई

2.  मुंबई

3.  अलाहाबाद

4.  दिल्ली

उत्तर:-3


6. भारतातील रबर उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते?

1.  केरळ

2.  आसाम

3.  तामिळनाडू

4.  हिमाचल प्रदेश

उत्तर:-1


7. जालियनवाला बाग हत्याकांडास कोण जबाबदार होता?

1.  लॉर्ड रीडिंग

2.  जनरल डायर

3.  लॉर्ड मॉंटेग्यु

4.  सर मायकेल ओडवायर

उत्तर:-2


8. राज्यात महाराष्ट्र मुलकी पोलीस अधिनियम केव्हापासून लागू झाला?

1.  १९६९

2.  १९६५

3.  १९६३

4.  १९५९

उत्तर:-2


9. युरोपचे प्रवेशद्वार म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

1.  लंडन (इंग्लंड)

2.  रोम (इटली)

3.  शिकागो (यूएसए)

4.  अंमस्टरडोम (हॉलंड)

उत्तर:-4

प्राचीन भारताचा इतिहास



 राज्यसेवा परीक्षेसाठी विशेषतः
.
* सिंधू संस्कृती
०१. समांतर चतुर्भुज आकाराचा हडप्पाचा गढ ४६० गज (४१८ मीटर) लांब, २१५ गज (१९५ मीटर) रुंद व १७ गज (१५ मीटर) उंच होता.
०२. सिंधू संस्कृतीची लिपी ही चित्रलिपी होती. ज्याच्यात ६०० पेक्षा जास्त चित्राक्षर व ६० मुळाक्षरे होती.
०३. १९२५ साली अर्नेस्ट मैक च्या नेतृत्वाखाली चन्हुदडो नावाच्या शहराचे उत्खनन केले गेले. या शहरात गढ नाही.
०४. नाळ, डाबरकोट, राखीगढी, बनवली, रंगपूर, लोथल, आम्री, कुल्ली, राणा घुन्डाई, अंजिरा, गुमला, देस मोरासी घुन्डाई, मुन्डीगाक, दिप्लबंगा, सहर-ए-सोख्ता, बामपूर व क्वेट्टा या ऐतिहासिक स्थळी सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.
०५. १९६१ साली राजस्थानातील कालीबंगा येथे बी.बी. लाल आणि बी.के. थापड यांच्या निर्देशनाखाली उत्खनन करण्यात आले. उत्खननात खालील भागात पूर्व-सिंधू संस्कृतीचे अवशेष तर वरील पृष्ठभागात सिंधू संस्कृतीचे अवशेष मिळाले. येथील शहर आणि गडाच्या चारही बाजूंनी तटबंदी होती.
०६. रंगनाथ राव यांच्या निदर्शनाखाली १९५३-५४ मध्ये गुजरात मधील रंगपूर येथे सिंधुकालीन स्थळाचे उत्खनन करण्यात आले. येथे कच्च्या विटांचे गड, नाल्या, मातीची भांडी, दगडांचे फलक इत्यादी गोष्टी मिळाल्या. परंतु देवींच्या मूर्ती व मुद्रा सापडल्या नाही.
०७. प्राचीन काळी लोथल हे शहर समुद्रकिनाऱ्यावर स्थित होते. त्याच्या उत्खननात जहाज बांधणी कारखान्याचे अवशेष सापडले. यावरून असे समजले कि लोथलचे नागरिक पश्चिम आशियाशी व्यापार करत होते.
०८. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील सूरकोटडा या ठिकाणचे उत्खनन कार्य १९६४ मध्ये जगतपति जोशी यांच्या निर्देशनाखाली केले गेले.
०९. सिंधू संस्कृतीचे उत्खनन करत असताना २४२ फुट लांब आणि ११२ फुट रुंदीची एक विशाल इमारत सापडली. त्या इमारतीच्या भिंतीची रुंदी सुमारे ५ फुट होती.
१०. सिंधू संस्कृतीत काही मूर्ती सापडल्या. ज्याच्या मध्य भागात सूर्याची प्रतिमा होती. यावरून समजण्यात आले कि त्या काळात सूर्य पूजा प्रचलित होती.
११. भारतात मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे साधारणतः १.५ करोड वर्षापूर्वीचे आहेत. भारतीय लोकांचे निग्रीटो, प्राचीन ऑस्ट्रेलियन, काकेशसी, व मेंगोलाईड्स असे चार मूळ वांशिक उपप्रकार पडतात.
१२. अलाहाबाद जवळील सराय नाहर राय, बालाईखोर व लेखनिया येथे मानवी शरीराचे सांगाडे सापडले आहेत. मोठी उंची, चपटे नाक व रुंद चेहरा ही यांची विशेषता होती. हे सांगाडे मध्य पाषाणकालीन असावेत.
१३. सिंधू नदीची उपनदी असलेल्या सोहन नदीच्या किनाऱ्यावर पूर्व पाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष सापडले. म्हणून याला सोहन संस्कृती असेसुद्धा म्हटले जाते.
१४. हडप्पा संस्कृतीत देवीची पूजा केली जात असे. हडप्पा संस्कृतीत कुत्रा, मांजर आणि घोड्याच्या शरीराचे अवशेष मिळाले आहेत.
१५. सिंध प्रदेश हा कापूस उत्पादन करणारा प्रदेश होता. म्हणून ग्रीकांनी याला सिडोन असे नाव दिले होते.
१६. हडप्पामध्ये चांदीची आयात अफगाणिस्तान, दक्षिण भारत, इराण व अरबस्थानातून केली जात असे. निर्माण कार्यासाठी लागणारा लाज्बर्द बदक्शां येथून, फिरोजा इराण मधून, जबूमणि महाराष्ट्रातून, मुंगा आणि लाल सौराष्ट्र व पश्चिम भारतातून तसेच 'हरा पत्थर' मध्य आशियातून आयात केला जात असे.
१७. राजस्थानातील अहाड संस्कृती ताम्रयुगीन होती. मातीची घरे, ताम्र भांडी, भातशेती ही या २००० वर्षापूर्वीच्या संस्कृतींची विशेषता होती.
१८. माळवा या ताम्र पाषाण कालीन संस्कृतीची चिन्हे नव्दातौली येथून प्राप्त झाली आहेत.

क्रियाशील फ्लोरीन



◆ ज्ञात मूलद्रव्यात फ्लोरीन मूलद्रव्य सर्वात क्रियाशील असून सेंद्रिय, असेंद्रिय, कार्बन, धातू, काच व सिरॅमिक अशा बहुतेक सर्व प्रकारच्या पदार्थावर प्रक्रिया करतो. 


◆ हायड्रोजन आणि फ्लोरीनचे हायड्रोफ्लोरीक आम्ल हे संयुग काचसुद्धा विरघळवते.


◆ फ्लोरीनच्या विषारी गुणामुळे व त्याच्या हाताळणीत होण्याऱ्या जखमांमुळे फ्लोरीनचे रसायनशास्त्र उलगडण्याची प्रगती अतिशय संथ गतीने झाली. 


◆ दुसऱ्या महायुद्धापर्यंत फ्लोरीनचे उत्पादन व्यावसायिक स्तरावर होत नव्हते. जसे रसायनशास्त्रात संशोधन होत गेले तसे काही वर्षांनी फ्लोरीन, क्लोरीन आणि कार्बन यांच्या क्लोरोफ्लुरो कार्बन या संयुगाचा शोध लागला. 


◆ या संयुगाचा वापर वातानुकूलित यंत्रे व रेफ्रिजरेटरमध्ये शीतक म्हणून केला जायचा. जवळपास साठ वर्षे क्लोरोफ्लुरो कार्बन अजिबात धोकादायक नाही अशी खात्री होती.


◆ पण क्लोरोफ्लुरो कार्बनमुळे पृथ्वीभोवती असणारा ओझोन वायूचा थर नष्ट व्हायला सुरुवात झाली.


◆ १९८७ मध्ये झालेल्या ‘मॉट्रिअल करारानुसार’ ओझोन वायूचा थर नष्ट करणाऱ्या क्लोरोफ्लुरो कार्बनसारख्या रसायनांचे उत्पादन आणि वापर थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


◆ सध्या त्याच्याऐवजी हायड्रोफ्लुरो कार्बन वापरण्यात येतो. पर्यावरण संरक्षणासाठी घेतलेल्या या निर्णयाचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. कारण ओझोनच्या आवरणात सुधारणा होत असल्याचे दिसते. 


◆ फ्लोराईडयुक्त टुथपेस्ट वापराव्यात अशा जाहिराती आपण बघतो. क्षार आणि खनिजांच्या स्वरूपात आढळणारा फ्लोराईड हा फ्लोरीनचा आयन. 


◆ दातांच्या व हाडांच्या मजबुतीसाठी फ्लोराईड आवश्यक असल्याने पिण्याच्या पाण्यात सोडियम फ्लोराईड मिसळले जाते.


◆ फ्लोराईड वापरताना त्याचे प्रमाण मात्र योग्य असावे लागते. उच्च तापमानाला टिकणारे प्लास्टिक तयार करण्यासाठी फ्लोराईड मिसळले जाते. 


◆ सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारे आणि गृहिणींचे लाडके उत्पादन म्हणजे टेफ्लॉन. 


◆ पदार्थ न चिकटणाऱ्या, न जळणाऱ्या या टेफ्लॉनच्या निर्मितीसाठी कार्बन आणि फ्लोरीनचे मजबूत बंध असलेल्या फ्लोरोबहुवारीकाचा उपयोग केला जातो. 


◆ ऊष्णता वाहून नेणे, विद्युतरोधक, पाणी न शोषणारा, घर्षण कमी करणारा, न गंजणारा या फ्लोरोबहुवारीकाच्या विविध गुणधर्मामुळे औद्योगिक क्षेत्रात याचा वापर केला जातो. 


◆ विद्युत वाहक तारांच्या बाह्य़ लेपनासाठी, विमानांच्या आणि वाहनांच्या भागांना लेपन करण्यासाठी फ्लोरोबहुवारीकाचा वापर केला जातो. 


◆ आण्विक ऊर्जा केंद्रासाठी लागणाऱ्या इंधनातील युरेनियम २३८ पासून युरेनियम २३५ वेगळा करण्यासाठी युरेनियम हेक्झाफ्लोराईड हे फ्लोरीनचे संयुग वापरतात.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शाश्वत विकासाची संकल्पना



आपल्या बुद्धीच्या जोरावर नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करताना माणूस हा निसर्गचक्राचा एक घटक आहे याची जाणीव शाश्वत विकास या संकल्पनेत आहे. पृथ्वीवरील इतर कोणताही सजीव आपल्या गरजेपेक्षा जास्त संसाधनांचा वापर करत नाही. जीवो जीवस्य जीवनम हे निसर्गचक्र आहे. माणसाच्या सतत अधिक काही मिळवण्याच्या इच्छेमुळे तो सतत अधिकाधिक संसाधनांचा वापर करत असतो.


○शाश्वत विकास १७ ध्येये 


•सर्व प्रकारच्या गरिबीचे निर्मूलन करणे.


 • भूक संपवणे, अन्न सुरक्षा व सुधारित पोषणआहार उपलब्ध करून देणे आणि शाश्वत शेतीला प्राधान्य देणे.


•आरोग्यपूर्ण आयुष्य सुनिश्चित करणे व सर्व वयोगटातील नागरिकांचे कल्याण साधणे.


• सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करणे.


• लिंगभावाधिष्ठित समानता व महिला आणि मुलींचे सक्षमीकरण साधणे.


•पाण्याची व स्वच्छतेच्या संसाधनाची उपलब्धता सुनिश्चित करणे.


•सर्वाना अल्पखर्चीक विश्वासार्ह, शाश्वत आणि आधुनिक ऊर्जा साधने उपलब्ध करून देणे.


•शाश्वत, सर्वसमावेशक आर्थिक वाढ आणि उत्पादक रोजगार उपलब्ध करणे.


•पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करणे, सर्वसमावेशक आणि शाश्वत औद्योगिकीकरण करणे आणि कल्पकतेला वाव देणे.


•विविध देशांमधील असमानता दूर करणे.


•शहरे आणि मानवी वस्त्या, अधिक समावेशक, सुरक्षित, संवेदनशील आणि शाश्वत करणे.


• उत्पादन आणि उपभोगाच्या पद्धती शाश्वत रूपात आणणे.


• हवामान बदल आणि त्याच्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे.


•महासागर व समूहांचे संवर्धन करणे तसेच त्यांच्याशी संबंधित संसाधनांचा शाश्वतपणे वापर करणे.


•परिस्थितिकीय व्यवस्थांचा शाश्वत पद्धतीने वापर करणे. वनाचे शाश्वत व्यवस्थापन, वाळवंटीकरणाशी मुकाबला करणे, जमिनीचा कस कमी होण्याची प्रक्रिया आणि जैवविविधतेची हानी रोखणे.


•शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाजव्यवस्थांना प्रोत्साहन देणे. त्यांची शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल निश्चित करणे, सर्वाची न्यायापर्यंत पोहोच स्थापित करण्यासाठी विविध पातळ्यांवर परिणामकारक, उत्तरदायी आणि सर्वसमावेशक संस्था उभ्या करणे.


•चिरस्थायी विकासासाठी वैश्विक भागीदारी निर्माण व्हावी यासाठी अंमलबजावणीची साधने विकसित करणे.

सराव प्रश्नसंच - भूगोल

 ● माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?

अ. सातारा

ब. नाशिक

क. रायगड

ड. पुणे


उत्तर - क. रायगड 


● मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे

अ. मुळा

ब. तापी

क. गोदावरी

ड. कृष्णा


उत्तर - अ. मुळा 


● महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते?

अ. पुणे विद्यापीठ

ब. मुंबई विद्यापीठ

क. शिवाजी विद्यापीठ

ड. नागपूर विद्यापीठ


उत्तर - ब. मुंबई विद्यापीठ 


● महाराष्ट्राचे क्षेत्रफळ एकूण किती चौ. किमी आहे?

अ. 307713

ब. 407434

क. 503932

ड. 603832


उत्तर - अ. 307713


● महाराष्ट्राचा लोकसंख्या बाबतीत भारतात कितवा क्रमांक लागतो?

अ. पहिला

ब. दुसरा

क. तिसरा

ड. चौथा


उत्तर - ब. दुसरा 


● चिकूचे उत्पादन सर्वाधिक कोठे होते?

अ. रायगड

ब. ठाणे

क. पालघर

ड. नाशिक


उत्तर - क. पालघर 


● महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक जास्त लोकसंख्या आहे?

अ. रायगड

ब. पुणे

क. नागपूर

ड. ठाणे


उत्तर - ड. ठाणे


● कोणत्या जिल्ह्यात तुषार सिंचनाचे प्रमाण सर्वाधिक आहे?

अ. पुणे

ब. नाशिक

क. नागपूर

ड. कोल्हापूर


उत्तर - ब. नाशिक 


● महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीरी कोणत्या जिल्ह्यात आहेत?

अ. अहमदनगर

ब. पुणे

क. सोलापूर

ड. रायगड


उत्तर - अ. अहमदनगर 


● सेवाग्राम आश्रम कोणत्या ठिकाणी आहे?

अ. पुणे

ब. सांगली

क. वर्धा

ड. अहमदनगर


उत्तर - क. वर्धा



चालू घडामोडी


प्रश्न: नुकतेच सुखविंदर सिंग सुखू यांनी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली?

उत्तर: हिमाचल प्रदेश


प्रश्न: कोणत्या राज्याचा 'शिशुपाल टेकडी' पर्यटन म्हणून विकसित केला जाईल?

उत्तर : छत्तीसगड.


प्रश्न: अलीकडेच 2022 ह्युरॉन ग्लोबल 500 मूल्यवान कंपन्यांच्या यादीत कोण अव्वल स्थानावर आहे?

उत्तर: यूएसए.


प्रश्न: कोणत्या राज्यात 13 व्या वर्षाखालील थिएटर फेस्टिव्हलची नुकतीच सुरुवात होणार आहे?

उत्तर : आसाम


प्रश्न: नुकतेच हवामान बदल मिशन सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे?

उत्तर: तामिळनाडू.


प्रश्नः कोणत्या देशाने अलीकडेच महिलांच्या स्वाक्षरी असलेली पहिली नोट बाजारात आणली?

उत्तर: अमेरिका.


प्रश्न: अलीकडेच 21 निर्जन बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे कुठे दिली जातील?

उत्तर: अंदमान निकोबार.


प्रश्न: आयुष्मान भारत आयडी जनरेशनमध्ये नुकतेच प्रथम पारितोषिक कोणाला मिळाले आहे?

उत्तर : जम्मू आणि काश्मीर


प्रश्न: अलीकडेच जानेवारीमध्ये दिव्यांग व्यक्तींचा पहिला महोत्सव कोण आयोजित करणार आहे?

उत्तर : गोवा.


प्रश्न: अलीकडेच कोणत्या राज्याचे बियाणे फार्म देशातील पहिले कार्बन न्यूट्रल फार्म म्हणून घोषित करण्यात आले आहे?

उत्तर : केरळ

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...