१२ ऑक्टोबर २०२२

चेतासंस्था


मध्यवर्ती चेतासंस्था (Central Nervous System):

मध्यवर्ती चेता संस्था मेंदू आणि चेतारज्जू / मेरुरज्जू यांची बनलेली असते.

मेंदू भोवती कर्पर (Cranium) कवटीच्या हाडांचे संरक्षणात्मक आवरण असते.

चेतारज्जूला कशेरुस्तंभाचे म्हणजेच पाठीच्या कण्याचे संरक्षणात्मक आवरण असते.

मध्यवर्ती चेतासंस्था आणि हाडे यांच्या पोकळीत संरक्षणात्मक आवरण असते त्यांना मस्तिष्कावरण (Meaninges) असे म्हणतात.

मध्यवर्ती चेतासंस्थेचे कार्य ऐच्छिक स्वरूपाचे असते, म्हणजेच शरीरातील सर्व क्रियांचे नियंत्रण आणि समन्वय घडवून आणणे.

2. परिघीय चेतासंस्था (Peripheral Nervous System):

परिघीय चेतासंस्थेमध्ये मध्यवर्ती चेतासंस्थेपासून निघणाऱ्या सर्व चेतांचा समावेश होतो.

या चेता शरीरातील सर्व अवयवांना मध्यवर्ती चेतासंस्थेशी जोडण्याचे कार्य करतात.

परिघीय चेतासंस्थेचे कार्य ऐच्छिक प्रकारचे असते.

मेंदूपासून निघणाऱ्या चेतांना कर्पार चेता (Cranial Nerves) म्हणतात, तर मज्जारज्जूपासून निघणाऱ्या चेतांना मेरुचेता (Spinal Nerves) म्हणतात.

मानवी शरीरात कर्पार  चेतांच्या (Cranial Nerves) 12 जोड्या तर मेरुचेतांच्या (Spinal Nerves) 31 जोड्या असतात.

3. स्वायत्त चेतासंस्था (Autonomous Nervous System):

स्वायत्त चेतासंस्था हि हृदय, फुप्फुस, जठर इत्यादीं अनैच्छिक अवयवांतील चेतांची बनलेली असते.

मानवी शरीरातील अनैच्छिक क्रियांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य स्वायत्त चेतासंस्था करतात.

उदा. रक्तदाबाचे नियंत्रण, पाचकरस स्त्रावण्याची क्रिया, शरीराचे तापमान.

महराष्ट्रातील महत्त्वाच्या संताची समाधीस्थाने

1) गाडगे महाराज - अमरावती

2) समर्थ रामदास- सज्जनगड

3) संत एकनाथ - पैठण

4) गजानन महाराज - शेगाव

5) संत ज्ञानेश्वर - आळंदी

6) संत गोरोबा कुंभार - ढोकी

7) संत चोखा मेळा - पंढरपूर

8) मचिन्द्रनाथ - सप्तशृंगी

9) संत तुकडोजी  - मोझरी

10) संत तुकाराम - देहू

11) साईबाबा - शिर्डी

12) जनार्दन स्वामी - कोपरगाव

13) निवृत्तीनाथ - त्र्यंबककेश्वर

14) दामाजी पंत - मंगळवेढा

15) श्रीधरस्वामी - पंढरपूर

16) गुरुगोविंदसिंह - नांदेड

17) रामदासस्वामी - जांब

18) सोपानदेव - आपेगाव

19) गोविंदप्रभू - रिधपुर

20) जनाबाई - गंगाखेड

21) निवृत्तीनाथ - आपेगाव

जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत

    सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला.

1. सत्व – अ  

शास्त्रीय नांव – रेटीनॉल  
उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता
अभावी होणारे आजार – त्वचा, रोग व रात आंधळेपणा
स्त्रोत – टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस

2. सत्व – ब1

शास्त्रीय नांव – थायमिन  
उपयोग – चेतासंस्थेचे आरोग्य
अभावी होणारे आजार – बेरीबेरी
स्त्रोत – धन्य, यीस्ट, यकृत,

3. सत्व – ब2

शास्त्रीय नांव – रायबोफ्लेविन  
उपयोग – चयापचय क्रियेकरिता
अभावी होणारे आजार – पेलाग्रा
स्त्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे

4. सत्व – ब3

शास्त्रीय नांव – नायसीन
उपयोग – त्वचा व केस
अभावी होणारे आजार – त्वचारोग व केस पांढरे
स्त्रोत – दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी

5. सत्व – ब6  

शास्त्रीय नांव – पिरीडॉक्सीन  
उपयोग – रक्त संवर्धनाकरिता
अभावी होणारे आजार – अॅनामिया
स्त्रोत – यकृत व पालेभाज्या

6. सत्व – ब10  

शास्त्रीय नांव – फॉलीक  
उपयोग – अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे
अभावी होणारे आजार – अॅनामिया
स्त्रोत – यकृत

7. सत्व – क  

शास्त्रीय नांव – अॅस्कार्बिक, अॅसीड  
उपयोग –  दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता    
अभावी होणारे आजार – स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे   
स्त्रोत – लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि

8. सत्व – ड  

शास्त्रीय नांव – कॅल्सिफेरॉल  
उपयोग – दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य
अभावी होणारे आजार – अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग
स्त्रोत – मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे

9. सत्व – इ  

शास्त्रीय नांव – टोकोफेरॉल
उपयोग – योग्य प्रजननासाठी  
अभावी होणारे आजार – वांझपणा
स्त्रोत – अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या

10. सत्व – के
 
शास्त्रीय नांव – नॅप्थोक्विनान  
उपयोग – रक्त गोठण्यास मदत
अभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही
स्त्रोत – पालेभाज्या व कोबी

अर्थशास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिक,

अमेरिकेच्या ३ अर्थशास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिक, बँका-आर्थिक संकटावरील संशोधनासाठी सन्मान

नोबेल समितीने  अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्काराची घोषणाही केली. त्याअंतर्गत बेन एस बर्नान्के, डग्लस डब्ल्यू डायमंड आणि फिलिप एच डायबविग यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. या तिन्ही अर्थतज्ज्ञांची या पुरस्कारासाठी संयुक्तपणे निवड करण्यात आली आहे.

या तिघांना अर्थशास्त्र क्षेत्रातील 'बँकांवर संशोधन, आर्थिक संकट' यासाठी जगातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

समितीने नमूद केले की, तीन पुरस्कार विजेत्यांनी अर्थव्यवस्थेतील बँकांच्या भूमिकेबद्दल, विशेषतः आर्थिक संकटाच्या काळात आमची समज लक्षणीयरीत्या सुधारली आहे. त्यांनी केलेल्या संशोधनातील एक महत्त्वाची माहिती म्हणजे बँकांची पडझड टाळणे का महत्त्वाचे आहे.

स्टॉकहोममधील रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या नोबेल समितीने सोमवारी बेन एस. बर्नांक, डग्लस डब्ल्यू. डायमंड आणि फिलिप एच. डायबविग यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर केला.

या पुरस्कारांतर्गत १० दशलक्ष स्वीडिश क्रोनर (सुमारे नऊ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) रोख पारितोषिक दिले जाते. हे पुरस्कार १० डिसेंबर रोजी प्रदान करण्यात येणार आहे.

अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकाचा पहिला विजेता १९६९ साली निवडला गेला.

२०२१ मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल डेव्हिड कार्ड आणि जोशुआ अँग्रिस्ट आणि गुइडो इम्बेन्स यांना देण्यात आले. डेव्हिड कार्ड यांना त्यांच्या 'हाऊ मिनिमम वेज, इमिग्रेशन आणि एज्युकेशन इफेक्ट द लेबर मार्केट' या संशोधनासाठी हा पुरस्कार मिळाला आहे.

इतर नोबेल पारितोषिकांप्रमाणे अर्थशास्त्रातील पारितोषिकाचा उल्लेख अल्फ्रेड नोबेल यांच्या १८९५ च्या मृत्युपत्रात करण्यात आला नव्हता, परंतु स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेने त्यांच्या स्मरणार्थ त्याची स्थापना केली होती.

'बँकांना कसे संवेदनशील करावे' यावर संशोधन

पुरस्कारांची घोषणा करताना समितीने म्हटले की, आधुनिक बँकिंग संशोधन आमच्याकडे बँका का आहेत हे स्पष्ट करते. त्यांना संकटांना कमी कसे बनवायचे आणि बँक कोसळल्याने आर्थिक संकटे कशी वाढतात? या संशोधनाचा पाया १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला बेन बर्नांक, डग्लस डायमंड आणि फिलिप डायबविग यांनी घातला. वित्तीय बाजारांचे नियमन आणि आर्थिक संकटांना सामोरे जाण्यासाठी त्यांचे विश्लेषण खूप व्यावहारिक महत्त्व आहे.

देशातील पहिले

देशातील पहिले सोलर सिटी - मलकापूर (सातारा)

देशातील पहिले बाल न्यायालय - दिल्ली

देशातील पहिले महिला न्यायालय - आंधप्रदेश

देशातील पहिले आधार गाव - टेंभली (नंदूरबार)

देशातील पहिले हरीत शहर - आगरतळा (त्रिपुरा)(दूसरे - नागपूर)

देशातील पहिली फूड बँक - दिल्ली

देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड

देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क - भुवनेश्‍वर

देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश

देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी

देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)

देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी

देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र

देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर

देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर

देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई

देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात

देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)

देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन - पुणे

देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात - अरुणाचल प्रदेश

देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर

देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र

देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र

देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई

देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)

देशातील पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली

देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे

देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक

देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर)

देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य - हिमाचलप्रदेश

देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर

देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य -महाराष्ट्र

देशातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे -पुणे

देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य - सिक्किम

देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य -महाराष्ट्र

देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे

देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव - सदरहू (नागालँड)

देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर - चंदीगड

देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड

देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य -महाराष्ट्र

देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा

देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत

देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश

देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य -तामिळनाडू

देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक -बंगळूर

देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य -आंध्रप्रदेश

देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र

देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प -कांडला (गुजरात)

देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल

देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अ‍ॅक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश

देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ - राज्यस्थान

देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे)

देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा

देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)

देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र

देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र

देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली

देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)

देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र

देशातील  पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)

देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले - दिल्ली

देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)

महत्वाचे दिनविशेष


0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन

१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन

०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन

०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
14एप्रिल == भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन

०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन

०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२१ जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन

०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन

०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन

०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन

०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस

०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन

०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
06-डिसेंबर == डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन

नद्या

कृष्णा  -

उगम - महाबळेश्वर
कलांबी-282 कि.मी. (महाराष्ट्र), 1400 कि.मी. (भारत)

मुख्य उपनदया : कोयना, पंचगंगा, घटप्रभा, ताम्रपर्णी, येरळा

राजकिय क्षेत्र : सातारा. सांगली, कोल्हापूर

गोदावारी -

उगम-त्र्यंबकेश्वर

लांबी : 668 कि.मी. (महाराष्ट्र), 1465 कि.मी. (भारत)

गोदावरीला `दक्षिण भारताची गंगा' म्हणतात.

राजकीय क्षेत्र : नाशिक, अहमदनगर, संपूर्ण मराठवाडा

विदर्भातील वाशीम, यवतमाळ वर्धा इ.

उपनदया : मांजरा, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता, इंद्रावती

तापी -

उगम : मुलताई (सातपुडा पर्वत) मध्य प्रदेश

लांबी : 208 कि.मी. (महाराष्ट्र), 724 कि.मी. (भारत )

राजकीय क्षेत्र : अमरावती, अरकोला, बुलढाणा, जळगाव,नंदुरबार, धुळे

उपनदया : चंद्रभागा, भुवनेश्वर, नंद, वान, कापरा, सिन,मोरना, नळगंगा

भारतीय न्यायव्यवस्था


भारतीय न्यायव्यवस्था ही एकेरी न्यायव्यवस्था आहे. ब्रिटिश कालखंडात ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या रचनेप्रमाणे भारताने न्यायव्यवस्था स्वीकारली आहे. 1935 च्या भारतीय संघराज्यांच्या कायद्याने 26 जानेवारी 1950 रोजी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली. भारतीय न्यायव्यवस्थेची रचना पुढील प्रमाणे आहे. शिरोभागी सर्वोच्च न्यायालय त्यानंतर विभागीय पातळीवर खंडपीठे त्यानंतर जिल्हा पातळीवर जिल्हा न्यायालय तर तालुका पातळीवर तालुका न्यायालय.

सर्वोच्च न्यायालय : घटना कलम क्र. 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची निर्मिती करण्यात आली आहे.

रचना :

1. न्यायाधीशांची संख्या :

सर्वोच्च न्यायालयामध्ये एक मुख्य न्यायाधिश आणि नव्याने तरतूद केल्याप्रमाणे इतर 30 न्यायाधिश असतात. न्यायाधिशांची संख्या कमी जास्त करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे .

2. न्यायाधिशांची नेमणूक :

सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधिशांची नेमणून राष्ट्रपती स्वतःच्या सहीने करतो. इतर न्यायाधिशांची नेमणूक करताना राष्ट्रपती सरन्यायाधिशांचा सल्ला घेतो.

न्यायाधीशांची पात्रता :

तो भारताचा नागरिक असावा.
त्याने कमीत कमी पाच वर्ष उच्च न्यायालयात न्यायाधिश म्हणून काम केलेले असावे.
कमीत कमीत दहा वर्षापर्यंत एक किंवा जास्त न्यायालयात वकिली केलेली असावी.
राष्ट्रपतीच्या मते तो कायदेपंडित असावा.

कार्यकाल :

वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत तो पदावर राहतो किंवा तत्पूर्वी तो आपल्या स्वाइच्छेने राष्ट्रपतीकडे राजीनामा देतो.

शपथविधी :

घटना कलम क्र. 124/6 नुसार तिसर्‍या परिशिष्टात दिलेल्या नमुन्यानुसार भारताचा राष्ट्रपती शपथ देतो.

पदमुक्ती :

कोणत्याही न्यायाधीशास गैरवर्तन व अकार्यक्षमता या कारणावरून बडतर्फ करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे परंतु असे करण्यापूर्वी संसदेच्या प्रत्येक सभागृहाणे 2/3 बहुमताने तसा ठराव पास करणे आवश्यक आहे.

निवृत्तींनंतर व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे :

सर्वोच्च न्यायालयातील कोणत्याही न्यायाधीशाला सेवानिवृत्तींनंतर भारतातील कोणत्याही न्यायालयात वकिली करता येणार नाही कारण श्रेष्ठ न्यायाधिश जर वकिली करू लागले तर संबंधित न्यायाधीशांवर दबाव येऊ शकतो.

1. प्रारंभीक अधिकार क्षेत्र :

ज्या खटल्यांची सुरवात फक्त सर्वोच्च न्यायालयातच होते त्याला प्रारंभीक अधिकार क्षेत्र असे म्हणतात. पुढीलपैकी खटले फक्त सर्वोच्च न्यायालयातच चालतात. 1. भारत सरकार आणि घटकराज्य सरकार त्यांच्यातील वाद
2. घटकराज्यातील वाद
3. केंद्रसरकार आणि राज्यसरकारचा कायदेविषयक प्रश्न
4. मूलभूत अधिकारांचे संरक्षण इत्यदी.

2. पुनर्निर्णयाचे अधिकार क्षेत्र :

भारतीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर पुनर्निर्णय देण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला आहे.

3. परमार्षदायी अधिकार :

घटना कलम क्र. 43 नुसार भारताच्या राष्ट्रपतीला कायदेविषयक सल्ला सर्वोच्च न्यायालयाकडून घेण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.

4. अभिलेख न्यायालय :

129 व्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे. त्याला त्या न्यायालयाच्या बेअब्रुकरीत शिक्षा करण्याचे अधिकार मिळाले आहेत.

5. मूलभूत अधिकारांचे संरक्षण :

देशातील नागरिकाला मिळालेल्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेला आहे.

विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती


घटकराज्यांमध्ये व्‍ही गृहदिग्‍य विधि विधान की नसावे याबाबद निर्णयाचा अधिकार भागला आहे. सध्या देशाला सहा राज्यांमध्ये विधानपरिषद आहे त्यात महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, प्रदेश, जम्मू काश्मीर आणि कर्नाटक घटकांचा समावेश आहे.

विधानपरिषदेची रचना :

1956 च्या 7 व्या घटनादुरूस्ती असे ठरवण्यात आले आहे, विधानपरिषदेची सदस्य संख्या कमी असावी आणि 40 पेक्षा जास्त नसावी. सध्या लोकसभा 78 सदस्य संख्या आहे. घटना कलम क्र. 171/2 नुसार विधानपरिषदेच्या राज्यबाद कायद्याचा अधिकार संसदेला आहे. विधानपरिषदेत मूलभूतपणे 5/6 सदस्य निर्वाचित असतात तर 1/6 सदस्य राज्यपालाने नियुक्त केलेले असतात. विधानपरिषदेतील सर्व सदस्य प्रत्यक्ष त्यांची निवड करून सदस्य नसतात.

विधानपरिषदेच्या सदस्यांची विभागणी :

1/3 विधान सभा सदस्य निवडले जातात.
1/3 स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात.
1/12 शिक्षक सदस्य संघातून सदस्य निवडले जातात.
1/12 पदवीधर विद्यार्थी संघाचे सदस्य निवडले जातात.
1/6 राज्यपाल सदस्य निवडले जातात स्थानिक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक अशा विविध तज्ञ सदस्य असतात.

सदस्यांची पात्रता :

तो भारताचा नागरिक.
त्याच्या वयाची 30 वर्ष पूर्ण उंची.
संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.

सदस्यांचा कार्यकाल : सदस्यांचा कार्यकाल सहा वर्षांचा असतो.

विधानपरिषदेचा कार्यकाल :

विधानपरिषद हे स्थायी आहे ते कधीही विसर्जित होत नाही. दर वर्षानी 1/3 सदस्य निवृत्त अहवाल आणि समान दोन घडणे त्यांच्या जागी निवडले जातात.

गणसंख्या : १/१०

विचार : दोन प्रश्नांमध्ये सहापेक्षा जास्त अंतर नसावे.

आमदार व उपसभापती :

विधानपरिषदेतून सदस्य सदस्य एका सदस्याची निवड तर निवडणूक तर एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.