०१ ऑगस्ट २०२२

सपर्धात्मक चालू घडामोडी प्रश्नावली..


Q.1) सलग दुसऱ्या वर्षी भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण ठरली आहे?

>> रोशनी नादर


Q.2) बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 साठी भारताची कोणती खेळाडू ध्वजवाहक ठरली?

>> पीव्ही सिंधू


Q.3) 2022 च्या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक सुवर्ण पदक जिंकले?

>> अमेरिका (13 सुवर्ण)


Q.4) ICC सदस्यांची यादीत कोणत्या तीन देशांना सदस्यत्वाचा दर्जा मिळाला?

>> कंबोडिया, उझबेकिस्तान आणि कोट डी’आयव्होर


Q.5) कोणत्या राज्य सरकारने पोलिसांसाठी ‘स्मार्ट ई-बीट’ प्रणाली सुरू केली?

>> हरियाणा


Q.6) सरकारी अहवालानुसार, शिकारी, नैसर्गिक आपत्ती आणि इतर कारणांमुळे गेल्या तीन वर्षांत भारतात  एकूण किती वाघांचा मृत्यू झाला?

>> 329


Q.7) केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF), 27 जुलै 2022 रोजी  कितवा स्थापना दिवस साजरा केला?

>> 84 वा


Q.8) अलीकडेच कोणी राष्ट्रपती कोविंद यांच्या पूर्वसुरींची छायाचित्रे दाखविणाऱ्या पुस्तकांचे प्रकाशन केले आहे?

>> अनुराग ठाकूर


Q.9) अलीकडेच अतुलानंद गोस्वामी यांचे निधन झाले आहे, ते प्रसिद्ध......होते?

>> लेखक


 Q.10) बॉब राफेल्सन यांचे निधन झाले आहे, ते प्रसिद्ध......होते?

>> नामांकित दिग्दर्शक


Q.11) जागतिक हिपॅटायटीस दिवस जगभरात कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

>> 28 जुलै


राष्ट्रीय काँग्रेसची ठराव:- मागणी -



राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात अनेक ठराव पास करण्यात आले ते ठरव मागण्यांच्या स्वरूपात काँग्रेसने सरकारकडे सादर केले ते पुढील प्रमाणे आहेत.

1. भारतीय प्रशासनाची चौकशी करण्यासाठी सरकारने एका रॉयल कमिशन ची नियुक्ती करावी.

 2.भारताची पद्वा इंडिया कौन्सिल वर विनाकारण पैसा खर्च होत असल्यामुळे ते रद्द करण्यात यावे.

 3. प्रांतीय आणि केंद्रीय विधिमंडळात लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना अधिक संख्येने अंतर्भाव केला जावा तसेच यात लोकनियुक्त प्रतिनिधींना प्रशासना संबंधित प्रश्न विचारण्याचा तसेच अर्थसंकल्पावर मतदान करण्याचा हक्क देण्यात यावा .

४.पंजाब प्रांतआणि संयुक्त प्रांतांत विधान सभेची स्थापना करण्यात यावी.

5. पाच लष्करावर होणाऱ्या खर्चात कपात करावी तसेच लष्करावर होत असणारा खर्च भारताबरोबर नाही करावा लष्करातील इंग्रजां साठी असणाऱ्या जागेवर भारतीयांची सुद्धा नेमणूक करावी संस्था स्थापन कराव्यात 

6. भारतात व ब्रिटन मध्ये घेतल्या जाणाऱ्या आयसीएस च्या पदासाठी परीक्षा एकाच वेळी घेण्यात यावेत तसेच या स्पर्धा परीक्षेसाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेत वाढ करण्यात यावी.

 7.स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकाधिक अधिकार देण्यात येऊन त्यांना स्वायतत्ता देण्यात यावी .

8.ब्रह्मदेश आणि भारताचे एकत्रीकरण करण्यात येऊ नये.

 9 .न्यायदान विभाग आणि कार्यकारी शाखेचे अधिकारी एकाच व्यक्तीच्या हाती केंद्रित करू नये 

10 .भारतीय वस्तूंसाठी संरक्षण खात्याच्या धोरणाचा अवलंब करावा तसेच मिठावरील लावला कर रद्द करण्यात यावा 11.भारतातील सर्व लहान मोठ्या उद्योगात उद्योगधंद्यांचे पुनरुज्जीवन करावे तसेच नवीन उद्योगधंद्यांना चालना द्यावी व बेकारी निवडण्याचा सरकारने प्रयत्न करावा.

12. काँग्रेसचे अधिवेशन प्रत्येक डिसेंबर महिन्यात देशाच्या विविध प्रांतात घेण्यात यावे .

13.भारतातील लोकांना लष्करी प्रशिक्षण देण्यात यावे.

14. भूमिकर निश्चित करण्यात येऊन तो स्थायी स्वरूपाचा असावा .

15.शेतकऱ्यांची आर्थिक शोषण थांबवण्यात यावे शेतकऱ्यांच्या कर्जाचा रुपाने अर्थसाह्य करावे भारतात औद्योगिक व तांत्रिक प्रशिक्षण संस्था स्थापन कराव्यात.


 16.वर्तमानपत्रावर लादलेले निर्बंध दूर करावे बंगाल रेगुलेशन मुंबई रेगुलेशन तसेच मद्रास रेगुलेशन अॅक्ट रद्द करण्यात यावी कारण याच कायद्याच्या आधारे टिळकांना राजद्रोहाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

महत्त्वाचे घाट (खिंड):

पर्वतरांगेतील दोन्ही प्रदेशात जाण्या – येण्याजोगा किवा दळनवळनाचा ‘डोंगररस्ता’ म्हणजे घाट होय.



घाट जिल्हा जोडणारी गावे (मार्ग)


♦️मळशेज घाट ठाणे, पुणेअहमनगर – शहापूर


♦️नाणे घाट ठाणे, पुणेजुन्नर – कल्यान


♦️कसूर घाट रायगड, पुणेराजगुरूनगर – कर्जत


♦️वरंधा घाट रायगड, पुणेपुणे – महाड


♦️करुळ घाट सिंधुदुर्ग, कोल्हापूर कोल्हापूर – वैभववाडी- राजापूर


♦️चदनापुरी नगर संगमणेर – पुणे


♦️सारसा घाट चंद्रपुर सिरोंचा – चंद्रपुर


♦️बिजासण घाट धुळे धुळे – आग्रा


♦️मांजरसुभा घाट बीड बीड – नगर


♦️अबेनळी घाट सातारा महाबळेश्वर – कोल्हापूर


♦️ताम्हणी घाट पुणे पुणे – पौदरोड – चिपळूण


♦️धब (कसारा)घाट नाशिक नाशिक – मुंबई


♦️बोर घाट पुणे पुणे – मुंबई


♦️खबाटकी घाट सातारा पुणे – सातारा


♦️दिवा घाट पुणे पुणे – बारामती


♦️कभार्ली घाट सांगली – सातारा कराड – चिपळूण


♦️आबा घाट कोल्हापूर – रत्नागिरी कोल्हापूर – रत्नागिरी


♦️आबोली घाट कोल्हापूर कोल्हापूर – सावंतवाडी बेळगाव


♦️फोंडा घाट कोल्हापूर कोल्हापूर – पणजी

पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाला "उत्कृष्ट महाविद्यालय" पुरस्कार प्रदान



सोलापूर: प्रमोद बनसोडे


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा "उत्कृष्ट महाविद्यालय" पुरस्कार कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाला सोमवार दिनांक १ ऑगस्ट २०२२ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांचे अध्यक्षतेखालील तसेच कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेचे सचिव संजय नवले, पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी स्विकारला.

     पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या १८ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रगीत व विद्यापीठाच्या गीताने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा विद्यापीठाकडून सन्मान करण्यात आला.

   यावर्षीचा सोलापूर विद्यापीठाचा "उत्कृष्ट महाविद्यालय" पुरस्कार  हा एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाला मिळाला असुन अल्पावधीतच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी यशस्वीरित्या पूर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे. महाविद्यालयातुन इंजिनिअरींग शिक्षणाबरोबरच सुसंस्कृत नागरीक घडविण्याची महत्वकांक्षा आपल्या खांद्यावर घेऊन सिंहगड इंजिनिअरींग महाविद्यालय गगनभरारी घेत आहे. अल्पावधीतच यशाच्या शिखरावर गुणवत्ता सिद्ध करून पोचलेले पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज आहे. शिक्षण क्षेत्रात एक वेगळा ठसा निर्माण करून पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 

   पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग महाविद्यालयाला यंदाचा "उत्कृष्ट महाविद्यालय" पुरस्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांना प्रदान करण्यात आला.

  या पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी व्यासपीठावर कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, 

उद्योजक किशोर चंडक, डाॅ. विकास पाटील, डाॅ. सुरेश पवार आदीउपस्थित होते.

   या कार्यक्रमास संस्थेचे सचिव  संजय नवले, सोलापूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेजचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, सोलापूर सिंहगड इन्स्टिट्युटचे इस्टेट मॅनेजर डाॅ. दत्तात्रय नवले, प्रा. अनिल निकम, प्रा. सुमित इंगोले आदी उपस्थित होते.

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...