०२ जून २०२२

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन.

◆ आयोजन : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

◆ महामंडाळाचे अध्यक्ष: कौतूकराव ठाले पाटील

◆ अनुदान : 50 लाख रूपये (शासनाकडून) - दरवर्षी

: 2017 पर्यंत 25 लाख रुपये

❇️ आतापर्यंत 5 महिलांनी अध्यक्षपद भुषविलेले आहे :-

◆ डॉ. अरुणा देरे - 2019✅
◆ विजया ध्यसा- 2001
◆ शांता शेलड़े- 1996
◆ दुर्गा भागवत - 1973
◆ कुसूमावती देशपांडे - 1961

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन :-

◆ कालावधी :  3, 4 व 5 डिसेंबर 2021

◆ स्थळ : नाशिक

◆ अध्यक्ष : डॉ. जयंत नारळीकर ✅

◆ स्वागताध्यक्ष : छगन भुजबळ

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन :-

◆ स्थळ : उदगीर ✅

◆ अध्यक्ष : भारत सासणे ✅

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन :

◆ स्थळ : वर्धा ✅

◆ अध्यक्ष : पु. शि.रेगे ✅

सात बेटांचे शहर: मुंबई


🎯 महाराष्ट्रातील मुंबई हे शहर सात बेटांनी बनलेले आहे.

🎯 पूर्वी मुंबई येथे सात लहान-मोठ्या आकाराची बेटे अस्तित्वात होती.

🎯 या बेटांच्या मधील खाडी व खाजणात भराव घालून त्यांचे एकत्रीकरण करण्यात आले व आत्ताचे मुंबई नगर अस्तित्वात आले.

☑️ मुंबईची सात बेटे खालीलप्रमाणे

1) माहीम (Mahim)
2) वरळी (Worli)
3) परळ (Parel)
4) माझगाव (Mazgaon)
5) मुंबई (Bombay)
6) कुलाबा (Calaba)
7) छोटा कुलाबा (म्हातारीचे बेट - Old Woman's Island)

🎯 एकसंघ मुंबईची निर्मिती

☑️ या बेटांदरम्यानचा समुद्र फारच उथळ होता व ठिकठिकाणी खाजणे होती.

☑️ ओहोटीच्या वेळी बराचसा भाग उघडा पडत असे. 

☑️ जेराल्ड इंजिनिअर (१६७०-७७) या मुंबईच्या दुसऱ्या ब्रिटिश गव्हर्नरने या सात बेटांमधील खाड्या बुजविण्याचा व समुद्र हटविण्याचा कार्यक्रम हाती घेतला.

☑️ त्याच्यानंतर तो टप्पा-टप्प्याने राबविला जाऊन या सात बेटांचे एकत्रीकरण होऊन मुंबई बेटाची निर्मिती झाली.

☑️ मुंबई बेटावर पूर्व व पश्चिम भागांत नैर्ऋत्य-ईशान्य दिशेत पसरलेले व एकमेकांस समांतर असलेले दोन कमी उंचीचे खडक आहेत.

☑️ त्यांपैकी बेटाच्या पश्चिम भागातील खडक मलबार पॉईंट पासून वरळी पर्यंत पसरला आहे.

☑️ या खडकाची मलबार हिल येथील समुद्र सपाटीपासून उंची ५५ मीटर असून तेच मुंबईतील सर्वोच्च ठिकाणी आहे.

☑️ दुसरा खडक बेटाच्या पूर्व भागात साधारण डोंगरीपासून शीवपर्यंत तुटकतुटक पसरलेला आहे.

☑️ या खडकामुळे व नरीमन पॉईंटच्या भूशिरामुळे त्याच्या पूर्व बाजूवर असलेल्या मुंबई बंदराचे खुल्या सागरापासून संरक्षण झालेले आहे.

☑️ या दोन्ही खडकांतर्गत मलबार, खंबाला, वरळी, पाली, गिल्बर्ट, शिवडी, ॲंटॉप इत्यादी लहानलहान टेकड्या आहेत.

☑️ या दोन्ही खडकांदरम्यानचा प्रदेश सपाट असून मलबार हिल व नरीमन पॉईंटच्या दरम्यान बॅक बे हा उथळ समुद्रभाग आहे.

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...