आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना



◾️भारतात रेलवे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली?

- लॉर्ड हार्डींग्ज पहिला


◾️इग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतिल प्रथम वृत्तपत्र कोणते?

- बॉम्बे हेराॅल्ड.


◾️भारतातील पहिली जातीय संघटना कोणती?

- मुस्लिम लीग


◾️ टिपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?

- 1780 ची पाल्लुतुरची लढाई 


◾️भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी?

- लॉर्ड कॅनिंग 


◾️ निळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला?

- बंगाल प्रांतात


◾️1858च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री?

- लॉर्ड स्टैनले


◾️1857च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये पेटली?

- 34वी एन. आय. रजिमेंट 


◾️इग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते?

- कलकत्ता विद्यालय

भारत आणि शाश्वत विकास उद्दिष्टे



🌻सर्वेक्षणात नमूद केले आहे की एसडीजींना सरकारच्या धोरण, योजना आणि कार्यक्रमांमध्ये मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारताने अनेक सक्रिय पावले उचलली आहेत.


🌻कोविड -19 महामारीच्या अभूतपूर्व संकटामुळे उद्भवलेल्या आव्हानांचा उल्लेख या सर्वेक्षणात आहे. तसेच  शाश्वत विकास हा भारतीय विकास रणनीतीमधील गाभा असल्याचे यात म्हटले आहे.


🌷हवामान बदल🌷


🌻आर्थिक सर्वेक्षणानुसार भारत हा अनेक सक्रिय हवामानविषयक उपक्रम राबवित आहे.


🌻 तयात हवामान बदलावरील राष्ट्रीय कृती योजना (एनएपीसीसी), जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर अभियान (जेएनएनएसएम), हवामान बदल कृती योजना (सीसीएपी), हवामान बदलावरील राष्ट्रीय अनुकूलन निधी तसेच भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आणि उत्पादनासाठी त्वरित अंमलबजावणी यासारख्या सरकारच्या महत्वाकांक्षी उपक्रमांचा उल्लेख करण्यात आला आहे. 


🌹शाश्वत हवामान वित्तपुरवठा


🌻समाज कल्याणकारी उद्दीष्ट साकार करण्यासाठी कार्यरत असलेल्या सामाजिक उपक्रमांद्वारे भांडवल उभारण्यासाठी सेबीच्या नियामक तत्वाखाली भारत एक सामाजिक शेअर बाजार (एसएसई) उभारण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.


🌻या सर्वेक्षणात चीननंतर उभरत्या बाजारात भारत दुसर्‍या क्रमांकाचा हरित बॉन्ड मार्केट असल्याचे नमूद केले आहे. 2017 मध्ये, भारतातील ग्रीन बॉन्ड्सच्या चलनास पाठबळ देण्यासाठी सेबीने भारतीय शेअर बाजारात हरित बॉन्डच्या यादीसह हरित बाँडसंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी केली. 24 डिसेंबर 2020 पर्यंत भारतात आठ ईएसजी म्युच्युअल फंड सुरू झाले आहेत.


🌷आतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा पुढाकार


🌻विकासाचे शाश्वत मॉडेल विकसित करण्यासाठी आणि आपत्ती निवारक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जागतिक स्तरावर भारताने घेतलेल्या पुढाकारांचा सर्वेक्षणात उल्लेख आहे.


🌻1. आंतरराष्ट्रीय सौर युती (आयएसए) ने नुकतीच जागतिक स्तरावर सौर ऊर्जा क्रांती घडवून आणण्यासाठी ‘वर्ल्ड सोलर बँक’ आणि ‘वन सन वन वर्ल्ड वन ग्रिड इनिशिएटिव्ह’ या दोन नवीन उपक्रमांची सुरूवात केली आहे. 


🌻आयएसए सचिवालयानं नुकतीच जागतिक सार्वजनिक आणि खासगी कंपन्यांचा समावेश असलेल्या ‘शाश्वत हवामान उपक्रमांसाठी युती’ सुरू केली आहे.


🌻 सदर देशांना कला आणि अद्ययावत सौर तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने सप्टेंबर 2020 मध्ये त्यांनी प्रथम जागतिक सौर तंत्रज्ञान परिषदेचे (डब्ल्यूएसटीएस) आयोजन केले होते.


🌻2. आपत्ती निवारण पायाभूत सुविधांसाठी युती: राष्ट्रीय सरकारद्वारे सर्वसमावेशक बहु-भागधारक व्यासपीठ म्हणून युती कार्य करते, जिथे आपत्ती निवारणाच्या पायाभूत सुविधांचे विविध पैलू जाणून घेऊन त्यांची देवाणघेवाण केली जाते.


🌷 सीडीआरआय ऊर्जा आणि वाहतूक क्षेत्राची लवचीकता वाढविण्यावर काम करीत असून सर्व खंडातील देश आणि विविध स्तरातील विकास आणि जोखीम यात या देशांना समाविष्ट करण्यासाठी आपली सदस्यता वाढविण्याच्या विचारात आहे.


महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट



१) पहिली 

- 17 फेब्रुवारी ते 8 जून 1980 

- राज्यपाल -: सादिक अली 

- राष्ट्रपती -: नीलम संजीव रेड्डी 


२) दुसरी 

- 28 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2014

- राज्यपाल -: सी विद्यासागर राव 

- राष्ट्रपती -: प्रणव मुखर्जी 

- एकूण 32 दिवस राजवट लागू होती


3) तिसरी 

- 12 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2019 

- राज्यपाल -: भगतसिंग कोशारी 

- राष्ट्रपती -: रामनाथ कोविंद 

- एकूण 12 दिवस राजवट लागू होती 


🔰 सर्वाधिक वेळा मणिपूर मध्ये राजवट लागू 

🔰 छत्तीसगड व तेलंगणा मध्ये एकदाही लागू नाही . 


15 वा वित्त आयोग



अध्यक्ष:एन के सिंग, =  सचिव: अरविंद मेहता 

स्थापना:नोव्हेंबर 2017 =अहवाल : नोव्हेंबर 19

 


» मुख्य शिफारस - राज्यांचा वाटा 42% वरून 41 % करावा


» करातील वाट्यानुसार राज्ये 

१. उत्तरप्रदेश - 17.9%

२. बिहार 10%

३. मध्यप्रदेश 7.9

४. पश्चिम बंगाल 7.5

५. महाराष्ट्र - 6.1( 5.5 वरून 6.1) (0.6 ची वाढ झाली )


» सर्वात शेवटचे राज्य - सिक्कीम - 0.388


» करातील वाटा ठरवण्यासाठी खालील आधार ठरवण्यात आले

१. लोकसंख्या : 15%

२. क्षेत्रफळ     : 15%

३. वने आणि पर्यावरण : 10%

४. उत्पन्न तफावत : 45 %

५. लोकसंख्या कामगिरी : 12.5%

६. कर प्रयत्न : 2.5 %

राष्ट्रीय सागरी कासव कृती योजना.



🔰समुद्रात मोठ्या प्रमाणावर असलेल्या विविध प्राण्यांचे आणि सागरी कासवांचे संवर्धन करण्याची गरज लक्षात घेऊन केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्यावतीने ‘सागरी महा प्राणी संपत्ती मार्गदर्शक तत्वे’ आणि ‘राष्ट्रीय सागरी कासव कृती योजना’ जाहीर करण्यात आली आहे.


🔴ठळक बाबी....


🔰भारताला 7500 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. समुद्रामध्ये समृद्ध जैवविविधता आहे. त्यामध्ये रंगबिरंगी मासे पासून शार्क, देवमासे, वेगवेगळ्या प्रकारची कासवे, महाकाय सस्तन प्राणी, डॉल्फिन, चमकदार प्रवाळ अशा असंख्य प्रकाराच्या सागरी प्रजाती भारतामध्ये आहेत. सागरी प्राण्यांमुळे मानवी आरोग्यासाठीही आवश्यक साधनसामुग्री मिळते.


🔰सागरी व्यापार आणि वाहतूक, अन्न, खनिज स्रोत, सांस्कृतिक परंपरा, त्याचबरोबर अध्यात्मिक मूल्ये आणि विश्वभरातल्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सागरी किनाऱ्यांच्या स्रोतांवर लक्षावधी लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.


🔰भारतामध्ये सागरी अधिवासांला आर्थिक, पर्यावरणीय महत्व आणि सांस्कृतिक मूल्ये असूनही सागरातल्या महा प्राणी संपत्तीला आणि सागरी कासवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

 

🔰अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये त्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांच्या सहभागाबरोबरच समन्वय साधून कृती करण्याची आवश्यकता आहे. यामुळे सागरी प्रजाती आणि त्यांचा अधिवास सुरक्षित ठेवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी मदत मिळू शकणार आहे.


🔰कती योजनेमध्ये सागरी प्राणी संपत्ती संवर्धनासाठी आंतर-क्षेत्रीय कार्यक्रमाला चालना मिळणार आहे, तसेच सागरी सस्तन प्राण्यांच्या संवर्धनातल्या समस्या सोडविण्यासाठी सरकार आणि समाज तसेच संबंधित भागधारक यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण करणे शक्य होणार आहे.

भारतात ‘टिकटॉक’चा व्यवसाय बंद.


🔰चीनची बाईट डान्स ही कंपनी भारतातील टिकटॉक व हेलो उपयोजनांचा व्यवसाय बंद करणार असल्याचे सांगण्यात आले. बाईट डान्स या समाज माध्यम कंपनीच्या मालकीचे टिकटॉक हे उपयोजन असून त्यावर भारताने बंदी घातली होती, तसेच सरकारने टिकटॉक व हेलो सह ५९ उपयोजनांवर जूनमध्ये बंदी घातली होती.


🔰टिकटॉकच्या जागतिक हंगामी प्रमुख व्हॅनेसा पप्पास व जागतिक व्यवसाय प्रमुख ब्लेक चँडली यांनी संयुक्त ईमेलमध्ये ही माहिती दिली असून टिकटॉक भारतात बंद करून कमर्चारीही कमी करण्यात येतील असे म्हटले आहे. भारतात पुनरागमन केव्हा होईल हे सांगता येणार नाही, पण आम्ही नक्कीच पुन्हा भरारी घेऊन भारतात परत येऊ, असे त्यांनी म्हटले आहे.


🔰टिकटॉकच्या प्रवक्त्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की कंपनीने भारतात २९ जून २०२० रोजी लागू करण्यात आलेले नियम पाळण्याचे वचन दिले होते तरी उपयोजनावर बंदी घालण्यात आली. स्थानिक कायदे व नियमांचे आम्ही पालन केले होते, त्यामुळे गेल्या सहा महिन्यात आम्हाला कुठलेही स्पष्ट निर्देश सरकारकडून मिळाले नव्हते.

51 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI)



🎷51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI) सांगता सोहळा  गोव्याच्या ताळीगाव येथे 24 जानेवारी 2021 रोजी पार पडला.


🎷51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 60 देशांचे 126 हून अधिक चित्रपट दाखवण्यात आले, ज्यात 50 भारतीय प्रीमियर,  22 आशियाई प्रीमियर, 7 वर्ल्ड प्रीमिअर आणि 6 आंतरराष्ट्रीय प्रीमियर होते.


🎷माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणारे चित्रपट महोत्सव संचालनालय आणि गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित केला जातो.


🎗परस्कारांचे विजेते...


🎷डन्मार्कच्या ‘इन टू द डार्कनेस’  या चित्रपटाने प्रतिष्ठित सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला आहे.


🎷तवानच्या दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्या चेन-नियन को यांना त्यांच्या मँड्रिन भाषेतील चित्रपट ‘द साइलेंट फॉरेस्ट’ यासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा रौप्य मयूर पुरस्कार प्राप्त झाला आहे.सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी रौप्य मयूर पुरस्काराने तझू-चुआन लियू याला गौरविण्यात आले. प्रमाणपत्र आणि दहा लक्ष रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.


🎷सर्वोत्कृष्ट अभिनेत्री यासाठीचा रौप्य मयूर पुरस्कार पोलिश अभिनेत्री झोफिया स्टॅफिएज हिला ‘आय नेव्हर क्राय’ या चित्रपटातील भूमिकेसाठी प्राप्त झाला आहे.


🎷दिग्दर्शक कामिन कालेव यांना रौप्य मयूर, प्रमाणपत्र आणि 15 लक्ष रुपयांचा रोख पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विशेष उल्लेखनीय पुरस्कार भारतीय दिग्दर्शक कृपाल कलिता यांना त्यांच्या आसामी चित्रपट ‘ब्रिज’ यासाठी प्रदान करण्यात आला आहे.


🎷सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण हा पुरस्कार ब्राझीलचे दिग्दर्शक कोसिओ परेरा डॉस सॅंटोस यांना पोर्तुगिज चित्रपट ‘व्हॅलेंटिना’ यासाठी देण्यात आला आहे.

भारत-चीन तणाव दूर करण्यासाठी परराष्ट्रमंत्र्यांची रूपरेषा



🔰भारत आणि चीन यांच्यातील ताणलेले संबंध सुधारण्यासाठी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी आठ व्यापक तत्त्वांची आणि दोन्ही देशांनी कोणत्या गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे त्याची रूपरेषा मांडली. दोन्ही देश खरोखरच एकमेकांसमोर असून त्याचे परिणाम केवळ दोन देशांवरच नव्हे तर संपूर्ण जगावर होणार आहेत, असेही जयशंकर म्हणाले.


🔰पर्व लडाखमध्ये गेल्या वर्षी घडलेल्या घडामोडींमुळे भारत आणि चीन यांच्यातील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनले. चीनच्या भूमिकेतील बदल आणि सीमेवर सैन्याची जमवाजमव करण्यामागील कारणे याबाबत चीनने भारताकडे अद्याप विश्वासार्ह स्पष्टीकरण दिलेले नाही, असे जयशंकर यांनी एका ऑनलाइन परिषदेत सांगितले. गेल्या ५ मेपासून दोन्ही देशांचे सैन्य पूर्व लडाखमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले आहे.


🔰सीमा व्यवस्थापनाबाबत जे सर्व करार झाले आहेत त्यांचे कटाक्षाने पालन करणे, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा सन्मान राखणे, सीमेवर शांतता राखणे हा सर्व प्रकारच्या संबंधांचा आधार असावा, आदी तत्त्वांचा जयशंकर यांनी मांडलेल्या आठ व्यापक तत्त्वांमध्ये समावेश आहे.


🔰तयाचप्रमाणे एकमेकांबद्दल आदर, संवेदना आणि हित या गोष्टींचे दोन्ही देशांनी पालन केले पाहिजे आणि याच तीन गोष्टी संबंध सुधारण्यास मदत करतील. उदयास येणाऱ्या शक्ती म्हणून प्रत्येकाच्या आकांक्षा आहेत आणि त्याकडे दुर्लक्ष करता येऊ शकत नाही, असे परराष्ट्रमंत्री म्हणाले. चायना स्टडीजच्या १३ व्या अखिल भारतीय परिषदेत जयशंकर बोलत होते.

चित्रपटगृहे, स्विमिंग पूल जास्त क्षमतेनं वापरता येणार; केंद्रानं दिली परवानगी.



⚜️करोनाच्या संकटकाळात गर्दी टाळण्यासाठी विविध बाबींवर घालण्यात आलेले निर्बंध आता कमी केले जात आहेत. दरम्यान, यापूर्वीच चित्रपटगृह आणि जलतरण तलाव मर्यादीत स्वरुपात खुले करण्यास परवानगी देण्यात आली होती. हे आता अधिक क्षमतेने वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी याबाबत माहिती दिली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून याबाबत एसओपी जाहीर करण्यात येणार आहे.


⚜️गह मंत्रालयाने नवी एसओपी जाहीर करत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश दिले की, निरिक्षण, कंटेन्मेंट झोन आणि सुरक्षेबाबत जाहीर करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. हे निर्देश १ फेब्रुवारीपासून २८ फेब्रुवारीपर्यंत लागू असणार आहेत.


⚜️तयाचबरोबर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कन्टेंमेंट झोनबाहेर सर्व व्यवहारांना परवानगी असेल. सामाजिक, धार्मिक, खेळ, मनोरंजन, शैक्षणिक आणि सांस्कृतीक कार्यक्रमांना राज्यांच्या एसओपींप्रमाणे परवानगी दिली जाईल.

महाराष्ट्र पोलिस भरती - Imp महत्त्वाचे प्रश्न



1) प्रश्न :- भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर :- रामनाथ कोविंद (14 वे)


2) प्रश्न :- भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर :- वैकय्या नायडू (13 वे) 


3) प्रश्न :- भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?

उत्तर :- नरेंद्र दामोदरदास मोदी (15 वे)


4) प्रश्न :- भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?

उत्तर :- अमित शहा (29 वे)


5) प्रश्न :- भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?

उत्तर :- राजनाथ सिंग (27 वे)


6) प्रश्न :- सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- ओम बिर्ला (18 वे)


7) प्रश्न :- भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत?

उत्तर :- निर्मला सीतारमन (23 वे) 


8) प्रश्न :- सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायधिश कोण आहेत?

उत्तर :- शरद बोबडे (47 वे)


9) प्रश्न :- रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?

उत्तर :- शक्तीकांत दास (25 वे)


10) प्रश्न :- भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?

उत्तर :- जनरल बिपीन रावत 


11) प्रश्न :- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर :- अजित डोवाल


12) प्रश्न :- भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर :- दत्ता पडसलगीकर


13) प्रश्न :- सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?

उत्तर :- पियुष गोयल


14) प्रश्न :- भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?

उत्तर :- राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8


15) प्रश्न :- सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर :- राजीव कुमार ( 1 सप्टेंबर 2020 )


16) प्रश्न :- महाराष्ट्रा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर :- यु.पी.एस.मदान


17) प्रश्न :- सध्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

उत्तर :- लेह ( लदाख )


18) प्रश्न :- भारताचे थलसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- मनोज मुकुंद नरवाने


19) प्रश्न :- भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- आर.के.एस.भदौरिया


20) प्रश्न :- भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- एडमिरल कर्मबिर सिंह

थेट द्वितीय अभियांत्रिकी प्रवेशामध्ये सिंहगड इन्स्टिट्यूट अव्वल


कॅप राउंड टू साठी सिंहगडला २००४ विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती

शैक्षणिक वर्ष २०२१-२१ या वर्षाकरीता थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्यातील २००४ विद्यार्थ्यांनी सिंहगड इन्स्टिट्यूटला पसंती दिली असून थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशात सिंहगड इन्स्टिट्यूट अव्वल स्थान प्राप्त केले असून थेट द्वितीय अभियांत्रिकी प्रवेशात कॅप राउंड टू साठी सिंहगडला २००४ विद्यार्थ्यांची पसंती दिली आहे.

सिंहगड इन्स्टिट्यूटला राष्ट्रीय मुल्यांकन परिषद कडून नॅक "ए" ग्रेड  मिळाला आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या सोयी सुविधा, गुणवत्ता पुर्ण आणि दर्जेदार शिक्षण पद्धती, शिक्षणाचा दर्जा, उच्चविद्याभूषित प्राध्यापक वृंद, प्राध्यापकांचा अनुभव व संस्थेचा भविष्यातील दृष्टीकोन, संशोधन प्रक्रिया आणि विविध राष्ट्रीय तसेच बहुराष्ट्रीय नामांकीत कंपन्यात विद्यार्थ्यांची होणारी प्लेसमेंट इत्यादी गोष्टीमध्ये सिंहगड इन्स्टिट्यूट अग्रेसर असण्याची पावती म्हणजे हा "ए" ग्रेड हे सिद्ध झाले. याचा अनुषंगाने चालू शैक्षणिक वर्षात १६५६ हून अधिक विद्यार्थ्यांना जगातील नामांकित कंपनीत नोकरी मिळाली असून यातील काही कंपनीकडून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १० लाख वार्षिक पगाराची नोकरी मिळाली आहे.

समाजाला आणि देशाला उपयुक्त असणारे परफेक्ट इंजिनिअर देण्याचं काम सिंहगड संस्था गेली ३० वर्षे करीत आहे. . विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता सामाजिक बांधिलकी, सामाजिक भान, राष्ट्राच्या, समाजाच्या हितासाठी, उन्नतीसाठी व प्रगती कडे घेऊन जाणारे शिक्षण सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये दिले जाते. म्हणून थेट द्वितीय अभियांत्रिकी प्रवेशामधील कॅप राउंड टू साठी सिंहगडला २००४ विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती दिली आहे. यापूर्वी महाराष्ट्र राज्यातील ४११८ विद्यार्थ्यांनी सिंहगड इन्स्टिट्युट प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशाला प्रथम पंसती दिली होती. आता सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये मोजक्याच जागा शिल्लक असून ज्या विद्यार्थ्यांना इच्छुक ठिकाणी थेट द्वितीय वर्षात प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेता येईल.