०६ जानेवारी २०२१

भारताने स्विकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार-



१) रामसर करार - 

वर्ष - १९७१


* दलदली प्रदेशाचे पान पक्ष्यांचा प्रमुख अधिवास म्हणून संवर्धन व धोरणी वापर


* अमलात येण्याचे वर्ष - १९७५


* भारताने मान्य केला - १९८२


२) CITES - 

वर्ष - १९७३


* संकटग्रस्त प्राणी व वनस्पतींमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण


*अमलात येण्याचे वर्ष - १९७६


* भारताने मान्य केला - १९८०


३) बोन करार - 

वर्ष -१९७९


* स्थलांतर करणाऱ्या वन्य प्राण्यांचे व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व व्यवस्थापन


* अमलात येण्याचे वर्ष - १९८३


* भारताने मान्य केला -१९८३


४) व्हिएन्ना करार -

 वर्ष - १९८५


* ओझोन थर संरक्षण* अमलात येण्याचे वर्ष - १९८८


* भारताने मान्य केला - १९९१


५) बँसेल करार - 

वर्ष - १९८९


* हानिकारक त्याज पदार्थांची सीमापार होणारी हालचाल व विल्हेवाट


* अमलात येण्याचे वर्ष - १९९२


* भारताने मान्य केला - १९९


६) UNFCCC - 

वर्ष - १९९२


* हवामान बदल रोखणे


* अमलात येण्याचे वर्ष - १९९४


* भारताने मान्य केला - १९९३


७) UNFCCC अंतर्गत क्योटो करार - वर्ष - १९९७


* हरितवायू उत्सर्जनात घट


* अमलात येण्याचे वर्ष - २००५


* भारताने मान्य केला - २००२


८) CBD जैवविविधता करार - वर्ष -१९९२


* जैवविविधता व जैविक संसाधनांचे संवर्धन व व्यवस्थापन


* अमलात येण्याचे वर्ष - १९९३


* भारताने मान्य वर्ष - १९९४


९) CBD अंतर्गत कार्टाजेना प्रोटोकॉल - 

वर्ष - २०००


* जनुकीय संशोधित जीवांच्या सीमापार होणाऱ्या जैवसुरक्षाहालचालींवर , हाताळणीवर व वापरावर नियंत्रण


* अमलात येण्याचे वर्ष - २००३


* भारताने मान्य केला - २००३


१०) वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्षासाठी संयुक्त राष्ट्राचाकरार -

वर्ष - १९९४


* वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्ष व दुष्काळ ( विशेषतः आफ्रिकेत ) निवारण


* अमलात येण्याचे वर्ष - १९९६


* भारताने मान्य केला - १९९६


११) रोटरडँम करार - 

वर्ष - १९९८


* हानिकारक रसायनांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात पूर्वसुचित मान्यतेची पद्धत अमलात आणणे व त्यातून पर्यावरणाचे व मानवी आरोग्याचे संरक्षण करणे .


* अमलात येण्याचे वर्ष - २००४


* भारताने मान्य केला - २००५


१२) स्टॉकहोम करार -

 वर्ष - २००१


*अ) मानवी आरोग्य व पर्यावरणांचे टिकून राहणाऱ्या सेंद्रिय प्रदुषकांपासून संरक्षण .


ब) एंडोसल्फान बंदी संबंधित करार


* अमलात येण्याचे वर्ष - २००४


* भारताने मान्य केला - २००६

मराठी व्याकरण सराव प्रश्न


१) 'भाववाचक नाम' ओळखा 

१)  उंची   ✔️

२)  शरद 

३)  पुस्तक 

४)  झाडे 


२) खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा 

१) ती हळू चालते 

२) रघु खूप झोपला 

३) रमेश दुध पितो  ✔️

४) तो मूर्ख आहे 


३) कंसातील शब्दांचे सामान्यरूप निवडा .

  माझ्या ( अंगण ) एक वडाचे झाड आहे 

१)  अंगणाला 

२)  अंगणाशी 

३)  अंगणाचे

४)  अंगणा    ✔️


४) 'परंतु' हा शब्द कोणत्या अव्ययाचा सूचक आहे ?

१)  उभयान्वयी अव्यय  ✔️

२)  शब्दयोगी अव्यय

३)  क्रियाविशेषण अव्यय 

४)  केवलप्रायोगी अव्यय 


५) कर्ता - कर्म - क्रियापद यांच्या परस्पर संबंधाना ..........म्हणतात 

१)  वाक्य 

२)  शब्दसमूह 

३)  कर्तरी प्रयोग 

४)  प्रयोग   ✔️


६)  ' पुस्तक ' हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंगप्रकारात येतो ?

१)  नपुसंकलिंग    ✔️

२)  पुल्लिंग 

३)  स्त्रीलिंग 

४)   यापैकी नाही 


७)  ' मी निबंध लिहिते असे ' या वाक्यातील काळ ओळखा 

१)   रीती भूतकाळ   ✔️

२)   रीती वर्तमानकाळ

३)   रीती भविष्यकाळ

४)   अपूर्ण भूतकाळ 


८)  ' आणि ' हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे ?

१)  विकल्पबोधक 

२)  परिणामबोधक 

३)  संकेतबोधक 

४)  समुच्चयबोधक  ✔️

९) अरेरे ! गंगारामचं अजून लग्न झालेलं नाही या वाक्यामध्ये 'अरेरे 'हा कोणता अव्यय आहे ?

१) उभयान्वयी

२)क्रियाविशेषण

३)केवलप्रयोगी  ✔️

४)शब्द योगी


१०) खालीलपैकी समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाचे उदाहरण कोणते ?

१) तुला पुस्तक हवे की पेन्सिल हवी ?

२)पाऊस आला आणि हवेत गारवा झाला. ✔️

३) मला थोडे बरे नाही बाकी सर्व ठीक.

४)खुप अभ्यास केला म्हणून पास झालो.


११)'बाभळी मुद्रा व देवळी  निद्रा 'या म्हणीचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे.

१) दिसण्यास बावळट व व्यवहार चतुर माणुस ✔️

२)अत्यंत बावळट माणुस

३)बाभळीखाली असणा-या देवळात झोपणारा

४)खूपच आळशी माणुस


१२) गडद निळे गडद निळे जलद भरून आले,

शितलतनु चपलचरण अनिलगण निघाले |

हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ?

१) यमक

२)पुष्यमक

३)अनुप्रास ✔️

४) श्लेष



1) सर्वनामाचा प्रकार ओळखा ?

"जो"

A. पुरुषवाचक सर्वनाम

B . दर्शक सर्वनाम

C . संबंधी सर्वनाम✔️✔️✔️

D . अनिश्चित सर्वनाम


2) विशेषण ज्या नामाबद्दल विशेष अशी माहिती सांगते त्या नामाला ---------- असे म्हणतात .

A . विशेष्य✔️✔️✔️

B . अव्य सदृश्य सर्वनाम

C . धातुसाधित विशेषणे

D . अव्ययसाधित विशेषणे


4) अव्ययालाच ------- म्हणतात .

A . विकारी शब्द 

B . पद✔️✔️✔️

C. अविकारी शब्द 

D . विकृति


3) "चांगला मुलगा परिक्षेत पास होतो " यावाक्यातील विशेषण प्रकार ओळखा .

A  . अधिविशेषण✔️✔️✔️

B . विधिविशेषण

C . सार्वनामिक विशेषण

D . उत्तर विशेषण


 4) दिलेल्या शब्दाचा ध्वन्यर्थ ओळखा ?

"थड"


A . गार

B . किनारा✔️✔️✔️

C . आधात

D . गर्दी 


5) पुढील शब्दसिध्दिचा प्रकार ओळखा ?

"धडपड "


A . पूर्णाभ्यस्त

B .अंशाभ्यस्त

C . अनुकरण वाचक✔️✔️✔️

D .  यापैकी नाही 


6) मराठी भाषेत मुळ सर्वनामे किती आहेत?

A  . १२

B . ०९✔️✔️✔️

C . १५

D . ०७


7) " चला पानावर बसा " या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा?

A . व्यंगार्थ

B . लक्षार्थ✔️✔️✔️

 C . वाच्यार्थ

D . संकेतार्थ


Q: 8) " राम वनात जातो " या वाक्यात एकूण किती मुलध्वनी आहेत ?

A . सात

B. अकरा 

C . तीन 

D . चौदा✔️✔️✔️


10) "मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला"

 या वाक्यातील कर्ता ओळखा

A  .मी

B  . संकष्टी चतुर्थी

C  . चंद्र ✔️✔️

D  . दिसणे


 11) "ळ" वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ?

A . उष्मे

B . स्पर्श 

C . महाप्राण

D . स्वतंत्र✔️✔️✔️


 12) "आजी दृष्ट काढते" 

वाक्यातील प्रयोग ओळखा

A . कर्मणी प्रयोग 

 B. कर्तरी प्रयोग✔️✔️

C . भावे प्रयोग

D . शक्य कर्मणी प्रयोग


13) प्राधान्य नुसार समासाचे प्रकार  सांगा

A) अव्ययीभाव समास

B) तत्पुरुष समास

C) द्व्ंद्व समास

D) बहुव्रीही समास

आर्सेनिकचे प्रदूषण


✍️आर्सेनिक हा जवळजवळ सर्व प्रकाराच्या जीवनासाठी विषारी ठरतो, परंतु अलीकडेच वॉशिंग्टन विद्यापीठाच्या संशोधकांना एका अभ्यासातून असा शोध लागला आहे की प्रशांत महासागरातले काही सूक्ष्मजीव पाण्यातल्या या विषारी घटकाला सहन करण्यासोबतच सक्रियपणे श्वसनासाठी आत्मसात केले आहे.


✍️बदलत्या वातावरणाशी कश्याप्रकारे जुळवून घेतले जाते त्याबाबत हा शोध घेतला गेला.


◾️आर्सेनिक पदार्थ:-


✍️आर्सेनिक (As) एक गंधहीन आणि चव नसलेला उपधातू आहे, जो भूमीच्या पृष्ठभागाखाली प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे. हा पदार्थ सामान्यपणे शीळा, माती, पाणी आणि हवेत आढळतो. हा पृथ्वीवर प्रचंड प्रमाणात आढळून येणार्‍या पदार्थांमधील 26वा पदार्थ आहे. प्रमाणानुसार, आर्सेनाइट As-3 याला आर्सेनिकचे सर्वात विषारी स्वरूप मानले जाते. शिवाय आर्सेनिकचे मिथाइलेटेड स्वरूप {MMA(V), DMA(V), MMA(III), DMA(III)} देखील विषारी असतात. जैव-इंधन जाळणे, रासायनिक खते, उद्योग हे या पदार्थाचे मुख्य स्त्रोत आहेत.


✍️मानवी जीवनास विषारी ठरणार्‍या आर्सेनिकमुळे ‘आर्सेनिकोसिस’ ही वैद्यकीय समस्या उद्भवते. त्यामुळे शरीरातल्या उपलब्ध आवश्यक एनजाइमवर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे बरेच अवयव काम करणे बंद करतात तसेच त्वचेचे रोग, कर्करोग सारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवतात.


✍️पयजलात आर्सेनिकसाठी WHO कडून ठरविण्यात आलेल्या मानकानुसार, पेयजलातली या पदार्थाची कमाल पातळी (MLC) 10 PPB एवढी आहे. भारतामध्ये हे प्रमाण 50 PPB एवढे स्वीकृत करण्यात आले आहे.


✍️भारतात पश्चिम बंगाल, बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड, छत्तीसगड, आसाम, नागालँड, मणीपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश इत्यादी राज्यांमध्ये आर्सेनिकचा प्रभाव आढळून येतो.

महत्त्वाचे आहे नक्की वाचा भारतीय क्षेपणास्त्रे


1. बराक 8 - भारत-इस्त्रायलच्या संयुक्त विध्यमाने, 70 किमी क्षमता, जमिनीवरून हवेत मारा.


2. निर्भय - 1000 किमी पल्ला, डिआरडिओ तर्फे विकसित.


3. पिनाका अग्निबाण प्रणाली 6 - अग्निबाण प्रक्षेपकांव्दारे 12 रॉकेटस 44 सेकंदांत प्रक्षेपित, 40 किमी पल्ला.


4. आकाश - एकामागोमाग एक तीन क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता, हवाई दलात तैनात. (जमिनीवरून हवेत मारा करणारे)


5. अस्त्र-सुखोई 30 - विमानांवर तैनात, स्वदेशी बनावटीचे, पल्ला 60 किलोमीटर (हवेतून हवेत मारा करणारे.)


6. पृथ्वी संरक्षण प्रणाली - हवामानाच्या थरांबाहेर 120 किलोमीटरवर शत्रूच्या क्षेपस्त्रांना उद्ध्वस्त करण्याची क्षमता. (जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे)


7. ब्राम्होस - पल्ला 300 किमी, गती 2.8 माक, आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, अण्वस्त्रवहन क्षमता.


8. त्रिशूल - जमिनीवरून हवेत मारा करणार्या क्षेपणास्त्राविरोधी क्षेपणास्त्र.


9. नाग - रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र.


10. सूर्या - आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र.


11. सागरिका - पाण्याखालून मारा करणारे क्षेपणास्त्र. पाणबुडीवरून जमिनीवर मारा करणारे.


12. शौर्य - जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे.


13. धनुष - जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे.

मोजकेच पण महत्वाचे‌


            सा. विज्ञान विशेष

        शास्त्रीय शोध व संशोधक 


1) प्रोटॉन - गोल्ड स्मिथ 

2) इलेक्ट्रॉन - जे. जे. थॉमसन

3) न्यूट्रॉन - C.C. चाडविक

4) किरणोत्सार - हेन्री बेक्वेरेल

5) लेझर किरण - शॉल व चार्लस टोन्स 

6) क्ष- किरणे - रॉन्टजेन

7) पोलोनियम, रेडियम  - मादाम क्युरी,            पेरी क्युरी

8) अमोनियम, ऑक्सिजन - जोसेफ  प्रिस्टले

9) हायड्रोजन - हेन्री कॅव्हेंडिश

10) अणूबॉम्ब - जे. रॉबर्ट ओपन हायमर

11) महारोगावरील लस - थोर्मन हन्सन

12) डायनामाईट - अल्फ्रेड नोबेल

13) देविची लस - एडवर्ड जेन्नर

14) जडत्वाचे नियम - आयझॅक न्यूटन

15) सापेक्षतावाद - अल्बर्ट आईन्स्टाईन

16) मधुमेहावरील उपचार - M. बेंटिग

17) शिवनयंत्र - एलियस हावे

18) अॅटमबॉम्ब - आटो हॉन

19) रिवॉल्वर - कोल्ट

20) सुरक्षित वस्तरा - जिलेट

21) दुरध्वनी - ग्रॅहम बेल

22) टेलिव्हिजन - जॉन लॉगी बेअर्ड

23) केस्कोग्राफ - जगदिश चंद्र बोस

24) मायक्रोस्कोप - जेन्सन

25) टायर - डेनलफ

26) बॅरोमीटर - टॉरीचीली

27) विमान - राईट बंधू

28) बंदुकीची दारू - रॉजर बेकन

29) बॉलपेन - जॉन लुई

30) बॉल पॉईंट पेन - ब्युरो बंधू

31) विद्यूत घट - व्होल्टा

32) होमियोपॅथी - सॅम्युअल हायेनमन

33) टाईपरायटर - ख्रिस्तोफर शोल्स

34) स्ट्रेप्टोमायसिस - बॅकसन

35) पोलिओ लस दंडावाटे - साल्क

36) पोलिओ लस तोंडावाटे - अल्बर्ट साबीज

37) बिनतारी संदेश - मार्कोनी

38) कॉलरा - रॉबर्ट कॉक

39) वाफेचे इंजिन - जेम्स वॅट

40) पेट्रोल इंजिन - निकोलस ऑटो 

41) डिझेल इंजिन - रुडॉल्फ डिझेल

42) इलेक्ट्रीक डायनामा - लायकेल फॅरडे

43) अनुवंशशास्त्राचा जनक- मेंडेल

44) उत्क्रांतीवाद - चार्ल्स डार्विन

45) मोटर गाडी - हेन्री फोर्ड

46) घड्याळ - पीटर

47) सायकल - मॅकमिलन

48) हातमाग - आर्ट राईट

49) यंत्रमाग - कार्ट राईट

50) मोटर सायकल - एडवर्ड  बटलर

भारतीय निवडणूक आयोग



भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. भारतातील निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे. निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त यांच्यासह एक निवडणूक आयोग बनतो. ऑक्टोबर इ.स. १९९३ पासून दोन निवडणूक आयुक्त नेमण्याची प्रथा पडली(1989 मध्ये-दोन अन्य निवडणूक आयुक्त नेमले होते). तसेच एका अद्यादेशाद्वारे त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त सारखाच दर्जा व स्थान देण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्तांना पार पाडण्याचे कर्तव्य लक्षात घेऊन सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती या पदावर करतात.Sunil Arora हे 23 वे व सध्याचे प्रमुख निवडणूक आयुक्त आहेत.


♦️ आतापर्यंतचे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त


🔹 सुकुमार सेन : २१ मार्च १९५० ते १९ डिसेंबर १९५८

🔹 कल्याण वैद्यनाथन सुंदरम : २० डिसेंबर १९५८ ते ३० सप्टेंबर १९६७

🔹 एस.पी. सेन वर्मा : १ ऑक्टोबर १९६७ ते ३० सप्टेंबर १९७२

🔹 महाराज डॉ. नागेन्द्र सिंह : १ ऑक्टोबर १९७२ ते ६ फेब्रुवारी १९७३

🔹 टी. स्वामीनाथन : ७ फेब्रुवारी १९७३ ते १७ जुन १९७७

🔹 एस.एल. शकधर : १८ जुन १९७७ ते १७ जुन १९८२

🔹 राम कृष्ण त्रिवेदी : १८ जुन १९८२ ते ३१ डिसेंबर १९८५

🔹 आर.व्ही.एस. पेरी शास्त्री : १ जानेवारी १९८६ ते २५ नोव्हेंबर १९९०

🔹 श्रीमती व्ही. एस. रमादेवी : २६ नोव्हेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९०

🔹 टी.एन. सेशन : १२ डिसेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९६

🔹 एम. एस. गिल : १२ डिसेंबर १९९६ ते १३ जुन २००१

🔹 जेम्स मायकल लिंगडोह : १४ जुन २००१ ते ७ फेब्रुवारी २००४

🔹 टी. एस. कृष्णमूर्ती : ८ फेब्रुवारी २००४ ते १५ मे २००५

🔹 ब्रिज बिहारी टंडन : १६ मे २००५ ते २८ जुन २००६

🔹 एन. गोपालस्वामी : २९ जुन २००६ ते १९ एप्रिल २००९

🔹 नवीन चावला : २० एप्रिल २००९ ते २९ जुलै २०१०

🔹 शाबुद्दिन याकुब कुरेशी : ३० जुलै २०१० ते १० जून २०१२

🔹 वीरावल्ली सुंदरम संपथ : ११ जून २०१२ ते १५ जानेवारी २०१५

🔹 हरिशंकर ब्रम्हा :१६ जानेवारी २०१५ ते १९ एप्रिल २०१५

🔹 नसीम जैदी :१९ एप्रिल २०१५ ते ६ जुलै २०१७

🔹 अचल कुमार जोति :६ जुलै २०१७ ते 22 जानेवारी 2018

🔹 ओमप्रकाश रावत : 23 जानेवारी 2018 ते 1 डिसेंबर 2018

🔹 सुनील अरोरा : 2डिसेंबर 2018 पासुन पुढे

मराठी व्याकरण शब्दाच्या जाती


1] नाम -


जे शब्द प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूची, वस्तूच्या गुणांची नावे असतात अशा शब्दांना नाम असे म्हणतात.


उदाहरण - घर, आकाश, गोड, गणेश... 

__________________________


2] सर्वनाम-


 जे शब्द नामाच्या ऐवजी वापरले जातात त्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात.


उदाहरण - मी, तू, आम्ही, हा, जो, तो, कोण...... 

__________________________


3] विशेषण-


 जे शब्द नामाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना विशेषण असे म्हणतात.


उदाहरण - गोड, उंच, सुंदर, चपळ, चातुर.... 

__________________________


4] क्रियापद- 


जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवतात व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात.


उदाहरण - बसणे, पळणे, जातो..... 

__________________________


5] क्रियाविशेषण- 


जे शब्द क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात.


उदाहरण - इथे, तिथे, आज, उद्या.... 

__________________________


6] शब्दयोगी अव्यय- 


जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.


उदाहरण - झाडाखाली, त्यासाठी, 

__________________________


7] उभयान्वयी अव्यय-


 जे शब्द दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडतात त्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.


उदाहरण - व, आणि, किंवा, परंतु..... 

__________________________


8] केवलप्रयोगी अव्यय-


 जे शब्द आपल्या मनातील वृत्तीकिंवा भवन व्यक्त करतात त्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.


उदाहरण - अरेरे, अबब..... 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

चर्चित शहर/देश /राज्य :-


• अरुणाचल प्रदेश:-

हे राज्य संपूर्णत: हागणदारीमुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आले. हागणदारीमुक्त ठरलेले हे भारतातील सहावे राज्य ठरले. या अगोदर   सिक्किम, हिमाचल प्रदेश, केरळ, हरियाणा आणि उत्तराखंड हे पाच राज्य हागणदारीमुक्त ठरले आहे 


• तामिळनाडू:-

राज्य पोलीस दलातील सेवा तृतीयपंथी व्यक्तीसाठी खुले करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकाने घेतला .असा निर्णय घेणारे तामिळनाडू हे देशातील पहिले राज्य ठरले 


• केरळ :-

केरळ देशातील ४  विमानतळे असलेले भारतातील  पहिले राज्य  आहे. कोचीन, त्रिवेंद्रम, कालिकत आणि कन्नूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत.


• दिल्ली:-

भारतातील पहिले राष्ट्रीय पोलीस संग्रहालय दिल्लीच्या लुटियन भागात बनवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.केंद्रीय पोलीस दल आणि राज्यांच्या पोलीस दलांच्य इतिहासाचा अभ्यास करण्याची संधी या संग्रहालयामुंळे मिळणार आहे. पोलीसांचे गणवेश आणि पोलीसांशी संबंधित अन्य सामग्रीचा संग्रह यात करण्यात येणार आहे.


• फगवाडा (पंजाब):-

पंजाब (फगवाडा ) येथे सुरु असलेल्या १०६ व्या इंडियन सायन्स कॉंग्रेसमध्ये देशातील पहिली चालकविना बस धावली .


• राजस्थान

राष्ट्रीय जैव इंधन धोरण  (National Biofuel Policy) लागू करणारे भारतातील पहिले राज्य राजस्थान ठरले 


• मुंबई :-

केंद्र शासन ,राज्य शासन यांच्या सयुक्त विद्यमाने २५ वी जागतिक भागीदारी परिषद मुंबई येथे आयोजित केली आहे .२५ वर्षात मुंबईला आयोजक होण्याचा प्रथमच मान मिळाला 


• पाटणा देवी (चाळीसगाव):-

गणितीय खेळांची सांगड घालत गणित सोप करून सांगणारा गणितीतज्ञ भास्कराचार्य गणितनगरी प्रकल्प चाळीसगाव तालुक्यातील पाटणा देवी येथे उभारला जात आहे 


• सातारा

महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क सातारा येथे  स्थापन करण्यात येत आहे 


• चंदिगढ़

सैन्य साहित्य महोत्सव-2018’ चे आयोजन चंदिगड या शहरात करण्यात आले होते


• बुडापेस्ट

2023 या वर्षामध्ये आईएएएफ (IAAF) विश्व अथॅलेटिक्स चॅपियनशिप ची स्पर्धा पार पडणार आहे


• भोपाळ

भारतातील पहिला वैश्विक कौशल (Mutti-Skill) पार्क स्थापन होत आहे :- 


• सिंगापुर

6 सप्टेंबर , 2018 रोजी सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक ने सिंगापुर येथे आशियातील पहिले  डेटा सेंटर सुरु करण्याची घोषणा केली 


• बुंदेलखंड एक्सप्रेस-वे

21 ऑगस्ट  2018 रोजी उत्तरप्रदेश सरकाने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ बुंदेलखंड एक्सप्रेस-वे चे नाव ‘अटल पथ’ असे केले 


• तेलंगाना

या राज्य सरकार ने बायोटेक आणि बायोफार्मा क्षेत्रासाठी ‘बी. हब’ स्थापित करण्याचा निर्णय घेतला


• गुरुग्राम

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड ने भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून घोषित केले


• दंतेवाड़ा

अटल बिहारी वाजपेयी एजुकेशन सिटी छत्तीगढ़ मध्ये दंतेवाड़ा या ठिकाणी स्थापन केले  जाणार आहे 


• झारखंड

या राज्यात भारतातील पहिला खादी मॉल स्थापन केला जात आहे 


• उत्तर प्रदेश

या राज्यात विद्युत चोरी बंद करण्यासाठी प्रत्येक जिल्हात एंटी पॉवर थेफ्ट पुलिस स्टेशन स्थापन करण्याचा निर्णय घेतला 


• गुवाहाटी

 हे रेल्वे स्टेशन भारतातील पहिले सौर ऊर्जा संचालित स्टेशन ठरले 


• महाराष्ट्र

डीजीटल स्वाक्षरी असलेले ७/१२ देणारे भारतातील पहिले राज्य कोणते:- 


• पूर्वी गोदावरी (आंध्र प्रदेश )

भारतातील १००% एलईडी स्ट्रीट लाइटिंग असणारा पहिला जिल्हा  


• सूरत (गुजरात)

भारतातील १०० % सौरऊर्जा ने संचालित प्राथमिक स्वास्थ्य केंद्र (पीएचसी) असणारा पहिला जिल्हा :-


• तमिळनाडु( तमिळनाडु कृषि विश्वविद्यालय, कोईमतूर)

भारतातील पहिले  कीटक  संग्रहालय या राज्यात स्थापन करण्यात येत आहे :-


• फरीदाबाद

भारतातील पहिले पॅरालंपिक भवन येथे स्थापित केले जात आहे 


•  कर्नाटक

या राज्यात जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा पार्क ‘शक्तिस्थल’ स्थापन करण्यात आले


मिशन नोकरी

• गांधीनगर रेल्वे  स्टेशन (जयपुर)

भारतातील संपूर्ण महिला कर्मचारी असलेले पहिले स्थानक ठरले या अगोदर मुंबईतील माटुंगा हे ‘ संपूर्ण महिला कर्मचारी असलेले पहिले स्थानक ठरले होते परंतु ते सब-अर्बन (उप-नगरीय) ररेल्वे स्टेशन आहे


• कलकत्ता :- 

भारतातील पहिल्यांदा तरंगता बाजार म्हणजेच 'फ्लोटिंग मार्केट' पश्चिम बंगाल येथील कलकत्ता येथे सुरु करण्यात आला आहे 

Online Test Series

हरदास लक्ष्मणराव नगराळे उपाख्य बाबू हरदास

🟢


◾️जन्म नागपूरमधील कामठी येथे 6 जानेवारी 1904 रोजी झाला.


◾️डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर अनुयायी असलेल्या बाबू हरदास यांना "जय भीम" या अभिवादनाचे जनक मानले जाते


◾️डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1937 साली स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचे मध्य प्रांताचे सरचिटणीस होते


◾️वयाच्या 35 व्या वर्षी त्यांना क्षयरोगाने बाधले व त्यातच 12 जानेवारी  1949 रोजी त्यांचा मृत्यू झाला.


चालू घडामोडी चे २० प्रश्न व उत्तरे

१) कोणत्या व्यक्तीची चौथे निवडणूक उपायुक्त म्हणून नेमणूक झाली?

(A) सुनील अरोरा

(B) ओम प्रकाश रावत

(C) अचल कुमार ज्योती

(D) उमेश सिन्हा✅


२) कोणत्या राज्याला AFSPA कायद्याच्या अंतर्गत ‘अशांत क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले?

(A) त्रिपुरा

(B) सिक्किम

(C) मेघालय

(D) नागालँड✅


३) “नॅशनल पोलीस K-9 जर्नल” हे ‘______’ या विषयावरील देशातले पहिले प्रकाशन आहे.

(A) पोलीस श्वान✅

(B) पोलीस घोडे

(C) पोलीस उंट

(D) यापैकी नाही


४) कोणत्या व्यक्तीला "बूल" कुमार म्हणून ओळखले जात होते?

(A) लेफ्टनंट कर्नल सुमित बक्षी

(B) कॅप्टन मोडकुर्ती नारायण मूर्ती

(C) कर्नल नरेंद्र✅

(D) मेजर हेमंत राज


५) कोणत्या राज्यात ‘शूल्पनेश्वर वन्यजीवन अभयारण्य’ आहे?

(A) राजस्थान

(B) कर्नाटक

(C) गुजरात✅

(D) आंध्रप्रदेश


६) कोणत्या व्यक्तीने "विप्लवा तपस्वी: पीव्ही" या शीर्षकाचे पुस्तक लिहिले आहे?

(A) एम. व्यंकय्या नायडू

(B) ए. कृष्ण राव✅

(C) A आणि B

(D) यापैकी नाही


७) ‘राष्ट्रीय मापन शास्त्र परिषद 2021’ याचा विषय काय होता?

(A) अॅडव्हांसेस इन मेट्रोलॉजी

(B) मेट्रोलॉजी फॉर द ग्रोथ ऑफ द नेशन

(C) मेट्रोलॉजी फॉर द इन्क्लूसिव ग्रोथ ऑफ द नेशन✅

(D) यापैकी नाही


८) कोणत्या संस्थेनी “कोची-मंगळुरू वायू पाईपलाईन प्रकल्प” तयार केला?

(A) NTPC लिमिटेड

(B) भारतीय पोलाद प्राधिकरण

(C) GAIL (इंडिया) लिमिटेड✅

(D) ऑइल अँड नॅच्युरल गॅस कॉर्पोरेशन


९) कोणत्या व्यक्तीची दिल्ली सरकारने स्थापना केलेल्या ‘तामिळ अकादमी’च्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली? 

(A) एन. राजा✅

(B) सेनगोट्टीयन के. ए.

(C) पी. थांगमणी

(D) एस. पी. वेलुमानी


१०) कोणता देश 2023 सालापर्यंत लाकडी उपग्रह प्रक्षेपित करणार?

(A) भारत

(B) जपान✅

(C) चीन

(D) रशिया


११) कोणत्या चक्रीवादळामुळे डिसेंबर 2020 या महिन्याच्या शेवटी फिजी देशाचे मोठे नुकसान झाले?

(A) लुसी चक्रीवादळ

(B) उला चक्रीवादळ

(C) दमण चक्रीवादळ

(D) यासा चक्रीवादळ✅


१२) _ आणि _ या राज्यांच्या सीमेवर ‘दजूको खोरे’ आहे.

(A) नागालँड आणि मणीपूर✅

(B) नागालँड आणि मिझोरम

(C) मणीपूर आणि त्रिपुरा

(D) यापैकी नाही


१३) कोणत्या दिवशी ‘जागतिक ब्रेल दिन’ साजरा करतात?

(A) 1 जानेवारी

(B) 3 जानेवारी

(C) 5 जानेवारी

(D) 4 जानेवारी✅


१४) कोणत्या देशाने फाशीची शिक्षा रद्द केली? 

(A) बेलारूस

(B) कझाकस्तान✅

(C) ताजिकिस्तान

(D) चीन


१५) नव्या विधेयकानुसार, केंद्रीय सरकारने सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला परवानगी देण्याचे वय किती निश्चित केले आहे?

(A) 18 वर्ष

(B) 25 वर्ष

(C) 24 वर्ष

(D) 21 वर्ष✅


१६) कोणत्या व्यक्तीची भारतीय भूदलाच्या ‘मानवी हक्क कक्ष’चे प्रथम प्रमुख म्हणून नेमणूक झाली?

(A) जनरल बिपिन रावत

(B) लेफ्टनंट जनरल सतिंदर कुमार सैनी

(C) मेजर जनरल गौतम चौहान✅

(D) लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग


१७) कोणत्या देशात हिमयुगात अस्तित्वात असलेल्या ‘लोकरीने आच्छादित असलेला गेंडा’ याचे अवशेष सापडले?

(A) भारत

(B) अमेरिका

(C) रशिया✅

(D) चीन


१८) कोणत्या व्यक्तीने आशियाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांची जागा घेतली?

(A) पोनी मा हुआटेंग

(B) जॅक मा

(C) अनिल अंबानी

(D) झोंग शांशां✅


१९) चीनच्या पहिल्या मंगळ मोहीमेचे नाव काय आहे?

(A) झेंगहे

(B) तियानवेन-1✅

(C) शेनझोऊ

(D) चांग’ए प्रोजेक्ट


2०) कोणत्या मंत्रालयाने 'उद्योग मंथन' कार्यक्रमाचे आयोजन केले?

(A) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय

(B) अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय

(C) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय

(D) वाणिज्य व उद्योग मंत्रालय✅

जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम लवकरच - मोदी.


🗑औषध नियंत्रक संस्थेने कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लशींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिल्यानंतर आता जगातील सर्वात मोठी कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहीम भारतात सुरू होणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.


🗑या लशी भारत निर्मित असून त्यात आपले वैज्ञानिक व तंत्रज्ञ यांनी मोठी भूमिका पार पाडली, अशा शब्दात पंतप्रधानांनी प्रशंसा केली. ते म्हणाले, की जगातील सर्वात मोठा कोविड १९ लसीकरण कार्यक्रम भारतात सुरू होत असून त्यात वैज्ञानिक व तंत्रज्ञ यांच्या परिश्रमांचे मोठे योगदान आहे. भारताच्या औषध महानियंत्रकांनी सोमवारी ऑक्सफर्डची कोविड १९ लस म्हणजे सीरमची कोव्हिशिल्ड व भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लशींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे.


🗑राष्ट्रीय हवामानशास्त्र बैठकीत मोदी यांनी सांगितले, की भारतात तयार होणाऱ्या उत्पादनांना जगात केवळ मागणीच आहे असे नाही तर ती उत्पादने जगाने स्वीकारली आहेत. गुणवत्ता व संख्या यात गुणवत्ता जास्त महत्त्वाची असून आत्मनिर्भर भारत संकल्पनेचा पाठपुरवा करताना भारतीय उत्पादनांची गुणवत्ता वाढत आहे.

भारतीय हवामान विभागाचा “वर्ष 2020 मधले भारतातले हवामान’ अहवाल.


🔰भारतीय हवामान विभागाने (IMD) “वर्ष 2020 मधले भारतातले हवामान’ या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.


🔴ठळक नोंदी ...


🔰वर्ष 2020 हे वर्ष 1901 पासूनचे आठवे सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदवले गेले.सर्वात उष्ण हवामानाची वर्षे म्हणून नोंदवल्या गेलेल्या वर्षांपैकी बारा वर्षे ही गेल्या पंधरा वर्षातली म्हणजे 2006-2020 मधली वर्षे आहेत.


🔰मागील दशक (2001 - 2010/2011 - 2020) हे देखिल नोंदवले गेलेल्या सर्वाधिक उष्ण दशकांपैकी एक आहे.

देशभरात झालेला नैऋत्य मौसमी हंगामातला (जून ते सप्टेंबर) पाऊस सरासरीपेक्षा जास्त (LPAच्या 109 टक्के) होता.


🔰दशभरातले 2020 या वर्षातले ईशान्य मोसमी हंगामामधले पावसाचे प्रमाण सर्वसाधारण होते.


🔰2020 या वर्षामध्ये उत्तर हिंद महासागरात पाच वादळे तयार झाली. ही वादळ म्हणजे अतीशक्तिशाली वादळ ‘अम्फान’, अतितीव्र चक्रीवादळ ‘निवारा’ आणि ‘गती’,  तीव्र चक्रीवादळ ‘निसर्ग’ आणि चक्रीवादळ ‘बुरेवी’.


🔰हवामानासंबधीत प्रभावी मोठ्या घटना देशात घडल्या. उदाहरणार्थ - अतिशय मुसळधार पाऊस, पूर, दरडी कोसळणे, वादळ, विजांचे थैमान, थंडीची लहर इत्यादी.


🔰वार्षिक पृष्ठभाग तसेच हवेचे तापमान वर्ष 2020 मध्ये सामान्य तापमानापेक्षा जास्त होते. यावर्षी देशभरात जमीन आणि हवेचे तापमान हे सरासरी +0.29 अंश सेल्सियस राहिले.


🔰दशभरातल्या हवामानाच्या नोंदी वर्ष 1901 पासून केल्या जातात. या नोंदींनुसार 2020 हे आठवे सर्वाधिक उष्ण वर्ष आहे.


🔰‘WMO स्टेट ऑफ ग्लोबल क्लायमेट’ याच्यानुसार, जागतिक पातळीवर पृष्ठभाग तापमानातला फरक वर्ष 2020 मध्ये (जानेवारी तो ऑक्टोबर) हा +1.2 अंश सेल्सियस राहिला.

Shift 1 Mts 5 January 2021 exam questions



१) वैदिक संस्कृतीचा कालखंड


२) महाराष्ट्राचे वनमंत्री


३) महाराष्ट्राचे पाणीपुरवठामंत्री


४) भारताने जगाचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे


५) भारतातील सर्वात साक्षर जिल्हा


६) अकोल्याचे खासदार


७) केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री


८) गोदावरी नदीची लांबी किती


९) कावेरी नदी कोठे आहे


१०) महात्मा गांधीजींनी दांडी यात्रा कधी सुरू केली


११) बुलंद दरवाजा कोठे आहे


१२) परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी कोणती मोहीम राबविली गेली


१३) संत जनाबाई कोणाच्या शिष्या होत्या


१४) संत कबीर कोणत्या समाजाचे होते


१५) भारतात पोस्ट बँक ची सुरुवात केव्हा झाली


१६) गीत गोविंद ग्रंथ कोणी लिहिला आहे


28) जयदेव लिखित गीतागोविंदम कोणत्या भाषेत आहे


29) कलिंगा पुरस्कार कोणती सायन्स अकॅडेमी देते


30) मुदुमलाई अभयारण्य कोठे आहे


31) मानस कोणत्या नदीची उपनदी आहे


32) गंदक कोणत्या नदीची उपनदी आहे


33) बालमजुरी हे कोणत्या मूलभूत हक्कामध्ये येते


34) वेद किती आहेत


35) आत्मीय सभेची स्थापना कोणी केली


36) बॉम्बे प्रेसिडन्सी स्थापना


37) NATO ट्रीटी मध्ये शेवटचा सदस्य देश कोणता


38) जीविताच स्वातंत्र्य कोणत्या कलमात येते


39) गुरुशिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे


40) ग्रँड टॅंक रोड कधी बांधण्यात आला


41) राष्ट्रीय सभेत फूट केव्हा पडली


42) वेदांचे किती प्रकार आहेत


43) कन्याकुमारी ते तामिळनाडू मध्ये कोणती नदी आहे


44) मुंबई येथे कोणती चळवळ झाली होती


45) कावेरी नदी काठी कोणते गाव/शहर आहे


46) जगातील कोणता देश पोलिओ मुक्त झाला आहे


47) (20×20×20) ÷(4×4×4)


48) मूलभूत हक्क कोणत्या देशाकडून घेतला आहे


49) आकारमानाने देशातील सर्वात मोठे राज्य कोनते


50) राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाकडून घेतली


51) (152 × 17 ) (33 ÷ 11 ) = ?


52) (120÷16) × ? - 4=356


53) बिहू सण कोणत्या राज्याचा आहे


54) दादासाहेब फाळके पुरस्कार कशाशी संबंधित आहे


55) CII चा फुल फॉर्म


56) कृष्णा आणि कावेरी कोणत्या किनाऱ्यावरून वाहतात


57) DGP फुल फॉर्म


58) पेंच व्याघ्रप्रकल्प


59) ऑपरेशन समुद्र सेतू


60) अष्टप्रधान मंडळातील प्रधान


61) भारताचे 12 वे राष्ट्रपती


62) सर्वात जास्त ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात असतो


63) महाबलिपुरम मंदिर


64) प्रस्तावनेत नसलेला शब्द


65) बोडो भाषा कोठे बोलली जाते


66) दक्षिणवासी कालीमाता मंदिर

पोलिस भरतीचा निर्णय ! 'एसईबीसी'तील विद्यार्थ्यांना भरावे लागणार खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क; 'ईडब्ल्यूएस'चा उल्लेखच नाही



गृह विभागाच्या निर्णयात 'एसईबीसी' प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा आणि संबंधित पात्र विद्यार्थ्यांकडून वाढीव परीक्षा शुल्क भरून घ्यावे, असे आदेशात म्हटले आहे. मात्र, या आदेशात 'एसईबीसी' प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा 'ईडब्ल्यूएस'मधून विचार करावा, असा उल्लेख करण्यात आलेला नाही. गृह विभागाने संबंधित विभागाला पूर्वीच्या निर्णयाचे शुध्दीपत्रक काढण्याचेही आदेश दिले आहे.


 सोलापूर : पोलिस भरतीसंदर्भात 'एसईबीसी' प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करुन संबंधित विद्यार्थ्यांची पात्रता, वयोमर्यादा पाहून त्यांच्याकडून वाढीव परीक्षा शुल्क 15 दिवसांत भरुन घेतले जाणार आहे. त्यानंतर पोलिस महासंचालक कार्यवाहीचा अहवाल तत्काळ शासनास सादर करणार आहेत. तसे आदेश गृह विभागाने आज काढले. 


दरम्यान, हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम निर्णयाच्या तथा अंतरिम स्थगिती उठविण्याच्या अर्जावर अंतिम निकाल होईपर्यंत लागू राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.


गृह विभागाच्या आदेशानुसार... 


'एसईबीसी'चे आरक्षण न ठेवता भरती प्रक्रिया पार पाडावी 

'एसईबीसी'तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू करावी 

जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून करावा विचार 

'एसईबीसी'तून अर्ज केलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारावे 

वाढीव परीक्षा शुल्क ऑनलाइन भरुन घेण्यात येईल; 15 दिवसांत कार्यवाही पूर्ण करावी 

पोलिस महासंचालकांनी या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करुन शासनाला अहवाल सादर करावा.


गृह विभागाने 2019 मध्ये पोलिस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिध्द करण्यात आली. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने 'एसईबीसी' आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलिस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली. मात्र, आज गृह विभागाचे उपसचिव शिरीष मोहोड यांनी पोलिस भरतीच्या दृष्टीने आदेश काढले. दरम्यान, गृह, सार्वजनिक आरोग्य व मेडिकल विभागाअंतर्गत रिक्‍त पदांची भरती करण्यास वित्त विभागाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. त्यानुसार आता भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. 


मात्र, गृह विभागाच्या निर्णयात 'एसईबीसी' प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा आणि संबंधित पात्र विद्यार्थ्यांकडून वाढीव परीक्षा शुल्क भरून घ्यावे, असे आदेशात म्हटले आहे. मात्र, या आदेशात 'एसईबीसी' प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा 'ईडब्ल्यूएस'मधून विचार करावा, असा उल्लेख करण्यात आलेला नाही. गृह विभागाने संबंधित विभागाला पूर्वीच्या निर्णयाचे शुध्दीपत्रक काढण्याचेही आदेश दिले आहे.

पत्रकार दिन


महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित केला आहे. 

महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.


बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पञकार आहे. यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते. जुलै १८४० मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला**


भाषेत गोविंद कुंटे आणि भाऊ महाजन यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. 6 जानेवारी  1832 रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रकाशित झाला. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले


त्याचवेळी इंग्रजी  सत्ताधार्‍यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी ‘दर्पण’मध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे.


वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली नसल्याने ‘दर्पण’ला सुरुवातीला मोठ्या संख्येने वर्गणीदार मिळाले नाहीत. मात्र ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. ब्रिटिश काळामध्ये वृत्तपत्र चालवणे आणि त्याला वाचक मिळवणे हे मोठे कठीण काम होते. मात्र याही काळात पदरमोड करून व कुठलेही नफ्याचे तत्व न स्वीकारता या काळामध्ये सुधारकांनी आपले वृत्तपत्र चालवले यामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण हे वृत्तपत्र अग्रणी होते. प्रत्यक्षामध्ये या काळातील वृत्तपत्रे ठराविक काळानंतर प्रसिद्ध केली जात असत. 


1832 मध्ये सुरू झालेले दर्पण हे वृत्तपत्र 1840 पर्यंत चालले


चालूघडामोडी



कोणत्या व्यक्तीची चौथे निवडणूक उपायुक्त म्हणून नेमणूक झाली?

(A) सुनील अरोरा

(B) ओम प्रकाश रावत

(C) अचल कुमार ज्योती

(D) उमेश सिन्हा✅



कोणत्या राज्याला AFSPA कायद्याच्या अंतर्गत ‘अशांत क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले?

(A) त्रिपुरा

(B) सिक्किम

(C) मेघालय

(D) नागालँड✅



 “नॅशनल पोलीस K-9 जर्नल” हे ‘______’ या विषयावरील देशातले पहिले प्रकाशन आहे.

(A) पोलीस श्वान✅

(B) पोलीस घोडे

(C) पोलीस उंट

(D) यापैकी नाही



 कोणत्या व्यक्तीला "बूल" कुमार म्हणून ओळखले जात होते?

(A) लेफ्टनंट कर्नल सुमित बक्षी

(B) कॅप्टन मोडकुर्ती नारायण मूर्ती

(C) कर्नल नरेंद्र✅

(D) मेजर हेमंत राज



 कोणत्या राज्यात ‘शूल्पनेश्वर वन्यजीवन अभयारण्य’ आहे?

(A) राजस्थान

(B) कर्नाटक

(C) गुजरात✅

(D) आंध्रप्रदेश



कोणत्या व्यक्तीने "विप्लवा तपस्वी: पीव्ही" या शीर्षकाचे पुस्तक लिहिले आहे?

(A) एम. व्यंकय्या नायडू

(B) ए. कृष्ण राव✅

(C) A आणि B

(D) यापैकी नाही


1) महापौर पदाची जबाबदारी स्वीकारणारी देशातली सर्वात तरुण व्यक्ती कोण ठरली?

उत्तर : आर्या राजेंद्रन


2) पहिला ‘आंतरराष्ट्रीय महामारी सज्जता दिन’ साजरा कोणत्या तारखेला करण्यात आला?

उत्तर: 27 डिसेंबर 2020


3) “नौशेरा का शेर” म्हणून कोणत्या व्यक्तीला संबोधले जाते?

उत्तर : ब्रिगेडिअर मोहम्मद उस्मान


4) ‘ट्रायब इंडिया’याच्या उत्पादन यादीत समाविष्ट करण्यात आलेला मध कोणत्या प्रकाराचा आहे?

उत्तर: जायंट रॉक बी हनी


5) ‘सीड टू शेल्फ’ या संज्ञेचा अर्थ काय आहे?

उत्तर : शेतकरी आणि उत्पादक यांच्यातला दुवा


6) ‘ब्लू फ्लॅग’ कार्यक्रम कोणती संस्था राबविते?

उत्तर : फाउंडेशन फॉर एनव्हिरोनमेंटल एज्युकेशन


7) ‘पेडलंदरिकी इल्लू’ योजना कशासंबंधी आहे?

उत्तर : सर्व गरीबांसाठी घरे


8) ‘भसन चर’ बेट कोणत्या प्रदेशात आहे?

उत्तर : बांगलादेश


● आशियाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांची जागा कोणत्या व्यक्तीने घेतली?

उत्तर : झोंग शानशान


● नुकतीच कोणत्या देशाने फाशीची शिक्षा रद्द केली?

उत्तर : कझाकस्तान


● नव्या विधेयकानुसार, केंद्रीय सरकारने सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला परवानगी देण्याचे वय किती निश्चित केले आहे?

उत्तर : 21 वर्ष


● भारतीय भूदलाच्या ‘मानवी हक्क कक्ष’चे प्रथम प्रमुख म्हणून कोणत्या व्यक्तीची नेमणूक झाली?

उत्तर : मेजर जनरल गौतम चौहान


● दीपोर बील आर्द्रभूमी प्रदेश कोणत्या राज्यात आहे?

उत्तर : आसाम


● ‘डायमिडोफॉस्फेट’चे रासायनिक सूत्र काय आहे?

उत्तर : H4N2O2P


● हिमयुगात अस्तित्वात असलेल्या ‘लोकरीने आच्छादित असलेला गेंडा’ याचे अवशेष कोणत्या देशात सापडले?

उत्तर : रशिया


● चीनच्या पहिल्या मंगळ मोहीमेचे नाव काय आहे?

उत्तर : तियानवेन-1

ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस देण्यास ब्रिटनमध्ये सुरुवात.


🔶ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड -अ‍ॅस्ट्राझेनेका यांची कोविड प्रतिबंधक लस डायलिसिसवर असलेल्या एका ८२ वर्षीय रुग्णास देण्यात आली. याआधीच मान्यता दिलेल्या फायझर-बायोएनटेक लशीच्या मदतीने लसीकरणाची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे.


🔶ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस पहिल्यांदा या व्यक्तीस देण्यात आली. ब्रायन पिंकर असे या व्यक्तीचे नाव असून ऑक्सफर्ड विद्यापीठ रुग्णालयात ही लस देण्यात आली. राष्ट्रीय आरोग्य सेवेने लसीकरणाचा कार्यक्रम वेगाने सुरू केला असून ऑक्सफर्डची लस हे आता तेथील करोना विरोधी लढाईत दुसरे शस्त्र ठरले आहे. याआधी फायझर व बायोएनटेक यांच्या लशीस मान्यता देण्यात आली होती.


🔶मूत्रपिंड विकाराने डायलिसिसवर असलेल्या निवृत्त व्यवस्थापकास ऑक्सफर्डची लस देण्यात आली असून पिंकर यांनी सांगितले, की करोना विषाणूपासून संरक्षण मिळाले याचे समाधान आहे. पिंकर यांच्याव्यतिरिक्त तीन मुलांचा पिता असलेले शिक्षक ट्रेव्हर कोलेट व प्रा. अँड्रय़ू पोलार्ड यांना सोमवारी लस देण्यात आली. पोलार्ड हे बालरोगतज्ज्ञ असून ऑक्सफर्डची लस तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.


🔶ऑक्सफर्ड लस गटाचे संचालक व ऑक्सफर्ड लस चाचणीचे मुख्य संशोधक प्रा. पोलार्ड यांनी सांगितले, की ऑक्सफर्ड विद्यापीठाने अ‍ॅस्ट्राझेनेकासाठी तयार केलेली लस मिळाली हा अभिमानाचा क्षण आहे. आमच्या चमूने त्यासाठी बरेच कष्ट केले होते व आता ही लस जगात उपलब्ध होत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना तातडीने लस देणे गरजेचे आहे. कारण या रोगाच्या उच्चाटनात त्यांचा मोठा वाटा आहे. नव्या ऑक्सफर्ड लशीची वाहतूक व साठवणूक सोपी आहे. फायझरची लस उणे ७० अंश सेल्सियस तापमानाला ठेवावी लागते, त्यामुळे तिचा वापर सोपा नाही.

'युपीएससी'ची 8 ते 17 जानेवारीपर्यंत परीक्षा ! 'एमपीएससी'ची परीक्षा फेब्रवारीत?



आरक्षण बदलासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2020 मध्ये सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा, राज्य सेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्‍त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेसाठी जाहीरात काढली. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या 'एसईबीसी' आरक्षणास स्थगिती दिली.


 या पार्श्‍वभूमीवर आयोगाने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासप्रवर्गाचा दावा केलेल्या विद्यार्थ्यांनी आता खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) या प्रवर्गातून आरक्षण बदलावे, असे आदेश काढले आहेत. त्यासाठी 5 ते 15 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. 

सोलापूर : मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती कायम असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 'एसईबीसी' प्रवर्गातील उमेदवारांना आता खुल्या अथवा केंद्र सरकारच्या 'ईडब्ल्यूएस'चा पर्याय निवडण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे.


 दुसरीकडे 8 ते 17 जानेवारीदरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा जानेवारीअखेर अथवा 15 फेब्रुवारीपर्यंत होईल, अशी शक्‍यता सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी वर्तविली आहे.

 

आरक्षण बदलासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2020 मध्ये सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा, राज्य सेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्‍त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेसाठी जाहीरात काढली. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या 'एसईबीसी' आरक्षणास स्थगिती दिली. या पार्श्‍वभूमीवर आयोगाने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासप्रवर्गाचा दावा केलेल्या विद्यार्थ्यांनी आता खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) या प्रवर्गातून आरक्षण बदलावे, असे आदेश काढले आहेत. त्यासाठी 5 ते 15 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. 

 

राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर राज्यभर लॉकडाउन करण्यात आला. विद्यार्थ्यांना वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने आणि परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारने आयोगाच्या माध्यमातून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. कोरोनासंबंधीचे निर्बंध व नियमांचे पालन करुन परीक्षा घेण्याचे आयोगाने निश्‍चित केले आणि विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रही वितरीत केले. मात्र, मराठा समाजाचे आरक्षण स्थगित झाल्याने पुन्हा परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. 


आयोगाच्या प्रश्‍नपत्रिका अद्यापही जिल्ह्याच्या कोषागार कार्यालयातच पडून आहेत. दुसरीकडे हजारो विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपुष्टात आली असून त्यांच्यासमोर बेरोजगारीचा प्रश्‍न उभा ठाकला आहे. या पार्श्‍वभूमीवर आयोगाने 23 डिसेंबर 2020 च्या शासन निर्णयाचा आधार घेऊन परीक्षा घेण्याचे नियोजन सुरु केल्याचेही सांगण्यात आले.


 तत्पूर्वी, आयोगाने स्पर्धा परीक्षा देण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना यापुढे अधिकाधिक सहा संधी तर अनुसूचित जाती- जमातीतील विद्यार्थ्यांसाठी अमर्याद संधी असेल, असा निर्णय घेतला. तर उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांना नऊ संधी देण्यात येतील, असेही स्पष्ट केले आहे. त्यानुसार पुढील काळात कार्यवाही केली जाणार आहे.

अंटार्क्टिकासाठी 40 वी भारतीय वैज्ञानिक मोहीम



भारताने अंटार्क्टिकासाठी 40 वी वैज्ञानिक मोहीम आयोजित केली आहे. भारतीय मोहीम देशाच्या चार दशकांच्या दक्षिणेकडील बर्फाळ प्रदेशातल्या वैज्ञानिक प्रयत्नांचे प्रतिक आहे. 40 व्या भारतीय अंटार्क्टिका मोहिमेचा प्रवास 5 जानेवारी 2021 रोजी गोव्याहून 43 सदस्यांसह सुरु झाला.


‘चार्टर्ड आईस’ श्रेणीचे ‘एमव्ही वॅसिली गोलोव्हिन’ हे जहाज 30 दिवसांचा प्रवास करून अंटार्क्टिकाला पोहोचेल. चमूला तिथे सोडल्यानंतर हे जहाज एप्रिल 2021 मध्ये भारतात परत येणार. परत येताना जहाज मागील फेरीतल्या चमूला परत घेऊन येणार.


अभ्यासले जाणारे विषय - हवामान बदल, भूगर्भशास्त्र, समुद्रातले निरिक्षण, विद्युत व चुंबकीय प्रवाह मोजमाप, पर्यावरणी देखरेखीसाठी चालू असलेल्या वैज्ञानिक प्रकल्पांना पाठबळ देण्यावर भर दिला आहे; अन्न, इंधन, तरतुदी आणि अतिरिक्त वस्तूंचे पुनर्वसन; आणि हिवाळ्यातल्या चमूला परत आणण्यावर भर दिला आहे.


पार्श्वभूमी


भारत सरकारने 1981 सालापासून ‘अंटार्क्टिका संशोधन’ हा एक प्रमुख राष्ट्रीय कार्यक्रम हाती घेतला आहे. पहिल्या फेरीमध्ये डॉ. एस.झेड. कासिम यांच्या नेतृत्वात 21 वैज्ञानिक आणि सहाय्यक कर्मचारी यांच्या पथकाचा समावेश होता.


या मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर, भारतीय अंटार्क्टिका कार्यक्रमाने आता अंटार्क्टिकामध्ये दक्षिण गंगोत्री, मैत्री आणि भारती अशी तीन कायमस्वरूपी संशोधन केंद्रे उभारली आहेत. आजपर्यंत, अंटार्क्टिकामध्ये मैत्री आणि भारती अशी दोन कार्यान्वित संशोधन केंद्रे आहेत.

राष्ट्रीय अंटार्क्टिक व महासागरी संशोधन केंद्र ‘नॅशनल सेंटर फॉर अंटार्क्टिक अँड ओशन रिसर्च’ पणजी (गोवा) येथे आहे.


अंटार्क्टिका खंड


अंटार्क्टिका पृथ्वीवरील दक्षिण ध्रुवाभोवतीचे हिमाच्छादित व पर्यावरण प्रदूषणमुक्त खंड आहे. ते जागतिक हवामानाचे नियंत्रक म्हणून ओळखले जाते. या खंडाचे क्षेत्रफळ 1.42 कोटी चौ. किमी. आहे. पृथ्वीवरील एकूण गोड्या जलसंसाधनांपैकी 70 टक्के जलसंसाधन अंटार्क्टिकावर हिमरूपात आहे.

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...