२९ जुलै २०२१

NMCG संस्थेचा ‘गंगा नदीच्या खोऱ्यात जलसंवेदनशील शहरे तयार करणे’ उपक्रम..



🔰विज्ञान व पर्यावरण केंद्र (CSE) या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाने (NMCG) ‘गंगा नदीच्या खोऱ्यात जलसंवेदनशील शहरे तयार करणे’ या विषयावर आधारित एक नवीन क्षमता निर्मितीचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.


🔰गगा नदीच्या खोऱ्यातील शहरांमध्ये नदीचे आरोग्य सुधारण्यात मदत होणाऱ्या शस्वत शहरी जल व्यवस्थापनास प्रोत्साहन देण्यासाठी क्षमता निर्मिती आणि कृती संशोधनाला चालना देणे, हा या उपक्रमाचा हेतु आहे.


🔴कार्यक्रम पुढील घटकांवर केंद्रीत असणार,


जल संवेदनशील नागरी संरचना आणि नियोजन

शहरी भूजल व्यवस्थापन

शहरी जल कार्यक्षमता आणि संवर्धन

विकेंद्रित सांडपाण्यावरील प्रक्रिया आणि स्थानिक पुनर्वापर

शहरी पाणी संस्था / तलाव व्यवस्थापन

या कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या भागधारकांमध्ये महानगरपालिका, तांत्रिक आणि संशोधन घटक, राज्य कार्यक्रम व्यवस्थापन गट, नमामि गंगे, आंतरराष्ट्रीय संस्था आणि स्थानिक तळागाळातील समुदाय यांचा समावेश आहे.


🔴राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) विषयी...


🔰राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) ही राष्ट्रीय गंगा परिषदेची अंमलबजावणी करणारी शाखा आहे. ऑक्टोबर 2016 मध्ये लागू झालेल्या “गंगा नदी (पुनरुत्थान, संरक्षण व व्यवस्थापन) प्राधिकरणे आदेश 2016” अंतर्गत NMCG ची स्थापना झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

Mpsc pre exam samples questions

1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?  A. ...