१३ मार्च २०२२

संविघानाच्या उद्देशिकेची (Preamble) सुरुवात “आम्ही भारताचे लोक” अशीच का?

🔸 संविधान सभा सदस्य “एच व्ही कामत” यांनी प्रस्ताव ठेवला की “आम्ही भारताचे लोक” ऐवजी आपण “देवाचे नाव” घेवुन सुरुवात करुयात.

🔸”रोहिणी कुमार चाैधरी”यांनी कामत यांच्या सुचनेत बदल करत “देवीचे नाव” सुचवले.

🔸 संविधान सभेचे दुसरे सदस्य “शिब्बन लाल सक्सेना” यांनी आम्ही भारताचे लोक याऐवजी “देव आणि महात्मा गांधी” यांच्या नावाने सुरुवात करण्याचा प्रस्ताव ठेवला.

🔸मात्र वरील दोन्ही प्रस्ताव मान्य झाले नाहीत. आणि उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक अशी करण्यात आली.

“आम्ही भारताचे लोक” (We the people) याचा अर्थ -

“आम्ही भारताचे लोक” ही रचना भारताने “अमेरीका” देशांकडुन घेतली.

१) या संविधानाचे निर्माते भारतीय आहेत.

२) संविधानाच्या शक्तीचा स्त्रोत भारतीय जनता आहे.

३) आम्ही भारताचे लोक ही रचना सार्वभाैमत्वाचे (Sovereign) दर्शन देते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

Mpsc pre exam samples questions

1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?  A. ...