१६ एप्रिल २०२१

चांदोली राष्ट्रीय उद्यान


◾️सांगली, 

◾️सातारा, 

◾️कोल्हापूर व 

◾️रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील ३१७.६७ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले राज्यातले सर्वांत मोठे अभयारण्य आहे.


🪵 वारणा नदीचा उगम येथेच होतो. 


🪵१७ व्या शतकातील प्रचितगड, भैरवगड हे किल्ले ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहेत. 


🪵 चांदोली अभयारण्यास मार्च २००७ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिकृत घोषित करण्यात आले आहे.


🪵 चांदोलीच जंगल निम सदाहरित जंगल आहे.येथे 


🪴वनऔषधी वनस्पती

 ऐन,बेहडा,जांभूळ,हिरडा,पांगारा.फणस.माड,उंबर,आवळा,आंबा,आपटा,असे वृक्ष आणिअडुळसा,कढीलिंब,शिकेकाई,तमालपत्र,अशा वनऔषधी आहेत.


🐅 पराणी-

पट्टेवाले आणि बिबट्या ,वाघ ,गवे ,अस्वल, रानडुक्कर, सांबर, वानर,सायाळ,भेकर,ससे,रानकुत्री,शेकरु, खवले मांजर, तृण, हरिण इत्यादी वन्य प्राणी आढळतात.


🦚 पक्षी-

महाधनेश,राखीधनेश, रानकोंबड्या, कवडे, गरुड, ससाणे, खंड्या,घारी, बंड्या, सातभा‌ई, सुतार, भारद्वाज, घुबड, चंडोल,पिंगळा, रातवा, कोकिळ, सुभग, स्वर्गीय नर्तक, पावश्या, चातक व  बगळे,पाणकावळे, पाणकोंबड्या व इतर पाणपक्षी आढळतात .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...