०२ मार्च २०२३

सयाजीराव खंडेराव गायकवाड


◾️स्मृतिदिन: 6 फेब्रुवारी 1939


◾️जन्म: 11 मार्च 1863 कौळाणे मालेगांव नाशिक


◾️1875 ते 1939 दरम्यान बडोदा संस्थानचे अधिपती होते


◾️1893सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू, 1906 साली संपूर्ण देशामध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण लागू करणारे बडोदा संस्थान देशातील पहिले राज्य ठरले


◾️औद्योगिक कलाशिक्षणासाठी ‘कलाभुवन’ ही संस्था स्थापन केली


◾️सयाजीरावांनी ‘श्रीसयाजी साहित्यमाला’ व ‘श्रीसयाजी बाल ज्ञानमाला’ दोन मालांमधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली


◾️भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते


◾️पडदापद्धती बंदी, बालविवाह बंदी, कन्याविक्रयबंदी, मिश्रविवाहाचा पुरस्कार, स्त्रियांना वारसा हक्क, अस्पृश्यतानिवारण, विधवाविवाह सुधारणा अंमलात आणल्या घटस्फोटासंबंधीचा कायदा हा सर्व भारतात पहिल्यांदाच जारी केला


◾️लडनमधील पहिल्या दोन गोलमेज परिषदांनाही हजर होते. टिळक, अरविंद घोष नेत्यांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता राष्ट्रीय आंदोलनाला अप्रत्यक्ष पाठिंबा


◾️"हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा" या शब्दांत त्यांचे वर्णन पं मदनमोहन मालवीय यांनी केले


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

महत्वाचे प्रश्न

    भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? – कर्नाळा (जिल्हा रायगड) 🔸भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०) 🔹भारतातील ...