Sunday 1 September 2024

एलिफंटा लेणी


◾️ एलिफंटा लेण्यांच्या निर्मितीचा काळ हा साधारण इसवी सन ९०० ते १३००च्या दरम्यान असावा असा अंदाज आहे.


◾️ एका अखंड पाषाणात ही लेणी कोरण्यात आली आहेत. ज्या काळी पाश्चात्त्य देशांमध्ये मानवी वसाहतीचा मागमूससुद्धा नव्हता त्याकाळी आपल्या भारतीय पूर्वजांनी इतक्या दुर्गम भागात इतकी अफाट कलाकृती निर्माण केला याला कुठेच तोड नाही.


◾️या गावाचे प्राचीन नाव श्रीपुरी असे होते.


◾️कोकणातल्या मौर्य वंशाची घारापुरी ही राजधानीअसावीत्यानंतर चालुक्य, राष्ट्रकूट , यादव नि मोगल यांनी तिथे क्रमाने आपली सत्ता प्रस्थापित केली.सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले.


◾️शिवाजी महाराजांच्या काळात ते मराठ्यांनी हस्तगत केले नि सन १७७४ मध्ये त्यावर इंग्रजांनी आपले प्रभुत्व स्थापले


◾️  १९८७साली या लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला गेला. 


◾️घारापूरी लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे प्रचंड आकाराचे एक शिल्प होते, त्यावरूनच या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले. 

No comments:

Post a Comment