०२ जानेवारी २०२१

देशात १०५ वाघांचा मृत्यू; महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर



व्याघ्रसंवर्धसाठी आटोकाट प्रयत्न होत असतानाच मागील वर्षी देशात १०५ वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात वाघांची राजधानी मानल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. ६१ टक्के वाघांचे मृत्यू हे प्रकल्प व अतिसंरक्षित भागात झाल्याने हा चिंतेचा विषय मानला जात आहे.


भारतात २०१८मध्ये करण्यात आलेल्या व्याघ्रगणना सर्वेक्षणात भारतातील वाघांची संख्या वाढल्याची नोंद करण्यात आली होती. यामध्ये देशात सुमारे २ हजार ९६७ वाघ असल्याची नोंद झाली. ही संख्या जगभरातील एकूण व्याघ्रसंख्येच्या सुमारे ७५ टक्के आहे. त्यामुळे व्याघ्रसंवर्धनात केलेल्या कामांना यश आले होते. पण, २०२०मध्ये देशात १०५ वाघांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाने दिली आहे. यात मध्य प्रदेशात सर्वाधिक २९, तर महाराष्ट्रात १६ मृत्यू झाले आहेत. ६४ वाघांचे मृत्यू देशातील विविध भागातील व्याघ्रप्रकल्प व अतिसंरक्षित भागात झाले आहेत. त्यात शिकारीच्या घटनांचादेखील समावेश आहे. महाराष्ट्रात १६पैकी नऊ मृत्यू हे प्रकल्प व अतिसंरक्षित भागात झाले आहेत. त्यामुळे आता प्रकल्प व अतिसंरक्षित भागात करडी नजर ठेवण्याची गरज प्रतिपादित केली जात आहे.


२०२०मधील व्याघ्रमृत्यू


मध्य प्रदेश २९


महाराष्ट्र १६


कर्नाटक १२


तामिळनाडू ८


उत्तर प्रदेश ८



देशातील वाघांचे पाच वर्षांतील मृत्यू -


वर्ष मृत्यू


२०१६ -१२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

Mpsc pre exam samples questions

1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?  A. ...