२६ नोव्हेंबर २०२०

Online Test Series

२६ नोव्हेंबर : संविधान दिन

🟢 घटना समितीत १५ महिला सदस्यांचा समावेश होता

🙎‍♀ १) अम्मू स्वामीनाथन
🙎‍♀ २) एनी मस्करीन
🙎‍♀ ३) बेगम एजाज रसूल
🙎‍♀ ४) दक्षयानी वेलायुधन
🙎‍♀ ५) दुर्गाबाई देशमुख
🙎‍♀ ६) हंसा मेहता
🙎‍♀ ७) पुर्णिमा बँनर्जी
🙎‍♀ ८) रेणुका रे
🙎‍♀ ९) सरोजिनी नायडू
🙎‍♀ १०) विजयालक्ष्मी पंडित
🙎‍♀ ११) सुचिता कृपलानी
🙎‍♀ १२) कमला चौधरी
🙎‍♀ १३) लीला रे
🙎‍♀ १४) मालती चौधरी
🙎‍♀ १५) राजकुमारी कौर

चालू घडामोडी प्रश्नसंच

 📍विम्बलडन टेनिस स्पर्धा – २०१६ चा पुरुष एकेरीचा विजेता खेळाडू खालीलपैकी कोणता?

 A) अँडी मरे ✅✅

 B) नोव्हाक जोकोविच 

 C) राफेल नदाल 

 D) रॉजर फेडरर


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📍‘द टर्बुलेट इयर्स’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?

 A) प्रणव मुखर्जी ✅✅

 B) शरद पवार 

 C) लालकृष्ण आडवाणी 

 D) बरखा दत्त


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📍भारतीय राज्याघटनेच्या कलम ७६ मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आली?

 A) अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया ✅✅ 

 B) कंट्रोलर ऍड ऑडीटर जनरल ऑफ इंडिया 

 C) ऑडीटर जनरल ऑफ इंडिया 

 D) सर्वोच्य न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📍महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे?

 A) विश्वास नांगरे पाटील 

 B) सतीश माथुर ✅✅

 C) संजीव द्याल 

 D) प्रवीण दीक्षित


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📍धळे-नागपूर -कोलकाता महामार्ग हा कोणता आशियाई महामार्ग आहे?

 A) AH-48 

 B) AH-45 

 C) AH-47 

 D) AH-46 ✅✅


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📌भारताचा कॉर्पोरेट कर दरात कपात करत ____ एवढा केला, ज्यामुळे खासगी क्षेत्रासाठी अप्रत्यक्षपणे 1.45 लक्ष कोटी रुपयांचे भांडवल मिळणार.

(A) 24 टक्के

(B) 22 टक्के✅✅✅

(C) 26 टक्के

(D) 28 टक्के




📌कोणते राज्य सरकार सरकारी रुग्णालयात काम करणार्‍या डॉक्टरांच्या खासगी सरावावर बंदी घालणार आहे?

(A) आंध्रप्रदेश✅✅✅

(B) पंजाब

(C) महाराष्ट्र

(D) कर्नाटक




📌कोणत्या राज्यात NTPC भारतातले सर्वात मोठे सौर पार्क तयार करणार?

(A) तामिळनाडू

(B) कोलकाता

(C) राजस्थान

(D) गुजरात✅✅✅




📌खालीलपैकी कोणते विधान ‘INS खंदेरी’ बाबत अचूक नाही?

(A) INS ‘खंदेरी’ स्कॉर्पियन पाणबुडी मझगाव डॉक लिमिटेड (MDL) द्वारे तयार करण्यात आली आहे.

(B) INS ‘खंदेरी’ ही कलवरी श्रेणीतली डिझेल-इलेक्ट्रिक वर चालणारी लढाऊ पाणबुडी आहे

(C) पाणबुडी खंदेरीची संरचना अमेरिकेच्या नेवल ग्रुप या संस्थेने तयार केली आहे.

(D) पाणबुडी खंदेरीचे नाव हिंद महासागरात सापडणार्‍या घातक सॉफिश खंदेरी याच्या नावावरून ठेवले गेले आहे.


📌चीन आणि तैवान यांच्यातल्या तणावावरून तैवान आणि ___ या देशाने त्यांच्यातले राजनैतिक संबंध तोडले.

(A) किरीबाती✅✅✅

(B) फिलीपिन्

(C) जापान

(D) अफगाणिस्तान


📌कोणत्या मंत्रालयाने “नॅशनल एज्युकेशनल अलायन्स फॉर टेक्नॉलॉजी (NEAT) आर्टिफिश्यल इंटेलिजेंस (AI)” या नावाने योजना सादर केली?

(A) इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

(B) मनुष्यबळ विकास मंत्रालय✅✅✅

(C) सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय

(D) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय


📌 शतकऱ्यांना 24 तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते ?

1) गोवा

2) तेलंगणा✅✅

3) गुजरात

4) पंजाब 


📌 भारतातील पहिली करेन्सी प्रिंटिंग प्रेस ( टाकसाळ ) कोठे स्थापन करण्यात आली ?


1) मुंबई

2) कोलकाता

3) नाशिक✅✅

4) हैदराबाद


📌 महाराष्ट्रात सर्वात जास्त खेडी असणारा जिल्हा कोणता ?

1) पुणे ✅✅

2) सिंधुदुर्ग

3) अमरावती

4) सोलापूर


📌कोणत्या ठिकानांदरम्यान दक्षिण आशिया प्रदेशातली पहिली क्रॉस-बॉर्डर पेट्रोलियम प्रॉडक्ट पाइपलाइन आहे?

(A) मोतिहारी आणि अमलेखगंज✅✅✅

(B) सबा आणि सारवाक

(C) हजीरा आणि विजयपूर

(D) ताशकंद आणि बिश्केक


📌कोणत्या सालापर्यंत पाय व मुखरोगांचे निर्मूलन करणे हे पाय व मुखरोग (FMD) यासाठीच्या ‘राष्ट्रीय पशूरोग नियंत्रण कार्यक्रम’चे उद्दीष्ट आहे?

(A) 2025

(B) 2035

(C) 2030✅✅✅

(D) 2027


📌भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ____ यांनी संयुक्तपणे दक्षिण आशिया प्रदेशातल्या पहिल्या क्रॉस-बॉर्डर पेट्रोलियम प्रॉडक्ट पाइपलाइनचे उद्घाटन केले.

(A) बांग्लादेशी पंतप्रधान शेख हसीना

(B) नेपाळी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली✅✅✅

(C) चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग

(D) म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष विन मिंट


📌कोणते राज्य सरकार भारतातले पहिले आंतरराष्ट्रीय महिला व्यापार केंद्र (iWTC) याची स्थापना करणार आहे?

(A) दिल्ली

(B) राजस्थान

(C) महाराष्ट्र

(D) केरळ✅✅✅


📌“सावरकर: इकोज फ्रॉम ए फरगॉटन पास्ट, 1883-1924” पुस्तकाचे लेखक कोण आहेत? #books

(A) विक्रम संपथ✅✅✅

(B) श्री प्रह्लादसिंग पटेल

(C) रीना बॅरॉन

(D) व्यंकय्या नायडू


📌कोणत्या देशाच्या मंजुरीनंतर ‘1995 बेसल प्रतिबंध दुरुस्ती’ ठराव आंतरराष्ट्रीय कायदा झाला आहे?

(A) बोलिव्हिया

(B) ब्रुनेई

(C) क्रोएशिया

(D) कंबोडिया


📌कोणत्या समूहाने भारतासह वस्तूंसंदर्भातल्या मुक्त व्यापार कराराचा (FTA) आढावा घेण्यास सहमती दर्शविली?

(A) जागतिक व्यापार संघटना

(B) ASEAN✅✅✅

(C) BRICS देश

(D) बांग्लादेश

डेली का डोज 23 नवम्बर 2020



1.केंद्र सरकार ने किस राज्य में सूक्ष्म सिंचाई परियोजनाओं के लिए 3,971 करोड़ रुपये के ऋण को मंजूरी दी?

a.    बिहार

b.    तमिलनाडु✔️

c.    पंजाब

d.    झारखंड


2.निम्न में से किस देश को 2023 में होने वाली G-20 देशों की बैठक की अध्यक्षता प्रदान की गयी है?

a.    भारत✔️

b.    नेपाल

c.    पाकिस्तान

d.    बांग्लादेश


3.अरब सागर में भारत, सिंगापुर एवं किस देश के बीच “सिटमैक्स-20” सैन्य अभ्यास के दूसरे संस्करण को शुरू किया गया है?

a.    नेपाल

b.    चीन

c.    रूस

d.    थाईलैंड✔️


4.अमेरिका के निर्वाचित राष्ट्रपति जो बाइडन ने अपनी पत्नी जिल बाइडन के लिए निम्न में से किस भारतीय मूल की महिला को नीति निदेशक नियुक्त किया है?

a.    प्रमिला जयपाल

b.    कमला हैरिस

c.    माला अडिगा✔️

d.    मेधा नार्वेकर


5.राष्ट्रीय कैडेट कोर (एनसीसी) ने 22 नवंबर को अपना कौन सा स्थापना दिवस मनाया है?

a.    50वां स्थापना दिवस

b.    72वां स्थापना दिवस✔️

c.    65वां स्थापना दिवस

d.    62वां स्थापना दिवस


6.अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आईसीसी) ने अंतरराष्ट्रीय क्रिकेट में डेब्यू करने की उम्र क्या निर्धारित की है?

a.    15 साल✔️

b.    20 साल

c.    25 साल

d.    12 साल


7.विश्व दूरदर्शन दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?

a.    22 अगस्त

b.    10 मार्च

c.    21 नवंबर✔️

d.    15 अप्रैल


8.विश्व मत्स्य दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?

a.    21 नवंबर✔️

b.    15 मार्च

c.    10 अप्रैल

d.    12 जून



टिपू सुलतान : (२० नोव्हेंबर १७५०–४ मे १७९९).



म्हैसूरचा एक प्रसिद्ध व पराक्रमी राजा. त्याचे पूर्ण नाव शाह बहाद्दूर फत्ते अल्लीखान असे होते. टिपू याचा अर्थ कन्नडमध्ये वाघ असा होतो. त्याच्या एकूण स्वभावगुणांवरून हे नाव त्यास मिळाले असावे. हैदर अलीचा हा थोरला मुलगा. कर्नाटकातील देवणहळ्ळी (बंगलोर) या गावी जन्मला. त्याच्या बालपणाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. तथापि त्याने मौलवींकडून पारंपरिक शिक्षण आणि गाझीखान या अधिकाऱ्याच्या हाताखाली लष्करी शिक्षण घेतले होते. पहिली काही वर्षे तो हैदरबरोबर लढाईत भाग घेत असे. एवढेच नव्हे, तर स्वतंत्र रीत्याही त्याने लढाया केल्या होत्या. म्हैसूरच्या गादीवर येण्यापूर्वी १७७१ मध्ये त्याने मराठ्यांच्या सैन्याबरोबर मुकाबला दिला होता, तर १७८१ मध्ये सेनापती कर्नल बेली आणि कर्नल ब्रॅथवेट असे दोघेजण टिपूवर चालून आले असता उभयतांचा पराभव करून त्याने दोघांनाही पकडले व काही फौज कैद केली. १७८२ मध्ये हैदरच्या मृत्यूनंतर टिपू म्हैसूरच्या गादीवर आला. टिपूचे फ्रेंचांशी प्रथमपासून सख्य होते. यामुळे इंग्रज सेनापती एअर कूट हा टिपूवर चालून आला असता फ्रेंच सेनापती बुसी याने टिपूला मदत केली. सालबाईच्या तहाप्रमाणे इंग्रजांचा जो मुलूख हैदर अलीने जिंकला होता, तो परत करावा असे ठरले होते. पण टिपूस ही अट मान्य नव्हती. म्हणून इंग्रजांनी टिपूचा बीदनूर प्रांत घेतला. तेव्हा त्याने जनरल मॅथ्यूझला पकडले. त्यामुळे इंग्रजांना मंगलोरचा शांतता तह करावा लागला (१७८४). त्यानुसार एकमेकांचा घेतलेल्या प्रदेश परत करावा, असे ठरले. याच साली टिपूने नरगुंद व कित्तूर या संस्थानांवर सैन्य पाठवून लूट केली व तेथील किल्ले हस्तगत केले. टिपूचे धोरण नेहमी आक्रमक होते परंतु लढाई अंगाशी येत, असे दिसताच तो तह करी. पण पुढे तो तह कधीच पाळीत नसे. टिपूच्या या वाढत्या सत्तेस पायबंद घालण्याकरिता नाना फडणीसाने निजामची यादगीर येथे भेट घेतला आणि दोघांनी टिपूवर स्वारी करण्याचे ठरले. त्याप्रमाणे उभयतांनी टिपूवर स्वारी करून अनेक ठाणी काबीज केली. सावनेर येथे मोठी लढाई झाली. पण ती निर्णायक झाली नाही. तेव्हा नाना फडणीसाने मॅलेट यास भेटून इंग्रजांची मदत घेण्याचे ठरविले. त्या वेळी टिपूने मराठ्यांबरोबर १७८७ मध्ये तह केला. त्यानुसार ४८ लक्ष रु. खंडणी ठरली व गजेंद्रगड, बादामी, नरगुंद व कित्तूर येथील किल्ले मराठ्यांस परत द्यावेत, अदवानी संस्थान निजामास द्यावे आणि सावनेरकरांचा मुलूख त्यांचा त्यांना परत करावा. पुढे मराठ्यांच्या सैन्याने कर्नाटकातून माघार घेताच त्याने कित्तूरचा किल्ला पुन्हा हस्तगत केला आणि मराठ्यांशी कायमचे वैर निर्माण केले. निजामाने टिपूशी मैत्री करण्याचे प्रयत्न केले ते असफल ठरले. तेव्हा कॉर्नवॉलिसने मराठे व निजाम यांना टिपूविरुद्ध एकत्र आणण्यास ही संधी चांगली आहे, हे हेरून त्यांच्याशी स्नेह वाढविला. शिवाय टिपूच्या या धोरणामुळे शेजारच्या राजवटी त्यावर विश्वास ठेवीत नसत.


अशा परिस्थितीत टिपूने त्रावणकोरवर हल्ला केला तो फसला. पण दरम्यान कॉर्नवॉलिसने मराठे व निजाम यांच्याशी मैत्रीचा तह करून टिपूवर स्वारी करण्याचे ठरविले. १७९० मध्ये प्रत्यक्ष मोहिमेस सुरुवात झाली. टिपूने आपल्या कणखर नेतृत्वाखाली प्रतिकार केला. पण या तिघांच्या सैन्यापुढे त्यास अखेर शरणागती पतकरावी लागली. त्याने २३ फ्रेब्रुवारी १७९२ रोजी श्रीरंगपटण येथे तह केला. त्यानुसार निम्मा प्रदेश व तीन कोट रु. नुकसानभरपाई व ती फिटेपर्यंत दोन मुलगे इंग्रजांकडे ओलिस ठेवणे त्यास भाग पडले. या अपमानास्पद तहामुळे तो पुढे अधिकच बेफिकीर व आक्रमक झाला आणि इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी तो इतरांच्या मदतीची शोधाशोध करू लागला. या संदर्भात त्याने इराण, तुर्कस्तान तसेच नेपोलियन यांच्यांशी संधान बांधून आपली बाजू बळकट करण्याचाही प्रयत्न सुरू केला. एवढेच नव्हे, तर त्याने काही फ्रेंच पलटणी नोकरीस ठेवल्या. या सर्व कारवायांसंबंधी लॉर्ड वेलस्ली याने त्यास जाब विचारला आणि तैनाती फौज स्वीकारण्यासंबंधी विचारणा केली तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. म्हणून वेलस्लीने निजामाशी तह केला, मराठ्यांनाही त्याला यात सहभागी करून घ्यावयाचे होते. पण पेशव्यांचे धोरण अनिश्चित होते. १७९९ च्या सुरुवातीस इंग्रजांनी युद्ध पुकारले व टिपूची वेलस्लीने कुर्ग, मळवळ्ळी वगैरे काही ठाणी काबीज केली. पुढे श्रीरंगपटणास वेढा घातला. तिथे टिपून शिकस्तीचा पराक्रम केला. अखेर तो गोळी लागून मरण पावला. नंतर इंग्रजांनी भयंकर लुटमार केली. टिपूचे एक कोटी सहा लक्ष रुपायांच्या उत्पन्नाचे राज्य घेतले व काही भाग निजामाला दिला व काही भाग मुळाच्या चामराज वोडेयर यांच्या वंशजास दिला. टिपूच्या मुलांना व नातेवाईकांना २४,००० होनांचा मुलूख लावून दिला. पुढे वेल्लोरच्या बंडात टिपूच्या मुलाचा हात आहे, या सबबीवर इंग्रजांनी टिपूची जहागीर खालसा केली. अशा रीतीने टिपूचे राज्य इंग्रजांनी पुढे पूर्णतः गिळंकृत केले.


टिपूच्या खासगी जीवनासंबंधी फारशी माहिती उपलब्ध नाही. त्याला दोन बायका होत्या. त्यांपैकी पहिली नवायेत मुस्लिम घराण्यातील असून हैदरने निवडली होती व दुसरी रुकय्या बानू स्वतः टिपूने निवडली होती. यांपासून त्यांस अनेक मुले झाली. त्यांत १२ मुलगे होते. यांपैकी दोन मुलगे त्याने इंग्रजांकडे ओलिस ठेवले होते. काही इंग्रज लेखकांच्या मते टिपू हा अत्यंत धर्मवेडा, क्रूर, लोभी, अविश्वासू व चंचल होता परंतु टिपूचा एकूण कारभार, राज्यव्यवस्था व धडाडी पाहिली असता, हे आरोप सबळ पुराव्यांवर आधारित आहेत असे म्हणता येत नाही. तथापि काही दुर्गुण व सेनापतींची फितूरी यांमुळे त्याच्या सुसंघटित सैन्याचा अखेर पराभव झाला, ही वस्तुस्थिती आहे.


राज्यकारभारात त्याने चोख व्यवस्था ठेवून प्रांतांची नावे बदलली. स्वतःची नवीन मापे, वजने व नाणी पाडली. एवढेच नव्हे, तर स्वतःची कालगणना सुरू करून तीमधील वर्षे व महिने यांस नवी नावे दिली. त्याचप्रमाणे मुलकी व लष्करी खात्यांत अनेक सुधारणा केल्या. त्याला कलाकौशल्याचा व वाङ्‌मयाचा छंद होता. फार्सी, मराठी, उर्दू व कन्नड या भाषा अवगत होत्या. त्याची मराठी पत्रे उपलब्ध आहेत. त्याने जमविलेला संग्रह लंडन, मद्रास व कलकत्ता या ठिकाणी आहे. त्यात दहाव्या शतकापासून त्या वेळेपर्यंतच्या अनेक कलाकुसरींच्या वस्तू, हस्तलिखित ग्रंथ, कुराणाची भाषांतरे, मोगल कालीन इतिवृत्ते, तवारिखा इ. साहित्य आहे. टिपूने फर्मान बनाम अलीराजा व फतह-उल्-मुजाहिदैनत या नावांचे ग्रंथ लिहिले, असे म्हणतात. तो खुतबापठणाच्या बाबतीत दक्ष असे. त्याने आपल्या नावे खुतबापठण करण्याची प्रथा सुरू केली होती.


संदर्भ :1. Ahmad, Fazl, Sultan Tippu, Lahore, 1958.


    2. Forrest, Denys, Tiger of Mysore, Bangalore, 1970.


    3. Hasan, Mohibbul, History of Tipu Sultan, Calcutta, 1951.

वाचा :- भारतीय संविधानाबद्दल 10 महत्वाच्या गोष्टी



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली.म्हणून जाणून घेऊयात संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी...


 १. २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो? 


२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती.


 २. संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?


- संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.


३. कसं लिहीलं गेलं संविधान?


-आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं. यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याी जबाबदारी त्यांना देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.


४. संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते?


-२९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजास सुरुवात केली. जवाहरलाल नेहरू,अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आहे.


 ५. संविधान सभचे अध्यक्ष कोण होते?


-९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती गठीत करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. पुढं ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले.


६. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?


-फाळणीनंतर संविधान सिमितीच्या संदस्यांची संख्या २९२ झाली. समितीच्या ११ बैठका झाल्या. त्या १६५ दिवस चालल्या. समितीच्या १९ उपसमित्या जलद कामकाजाच्या दृष्टीनं कार्यरत होत्या. त्यात मसुदा समिती होती. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. या मसुदा समितीच्या ४४ सभा झाल्या.


 ७. आपल्या संविधानात किती परिशिष्टे आहेत?


- भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.


 ८. भारतीय संविधान कधी लागू करण्यात आलं?


-२६ जानेवारी, १९५० रोजीच भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला.


 ९. संविधानात कोणाचं हस्तलेखन आहे?


- भारताचे संविधान बनून तयार होत होते. पण संविधान हे हस्तलिखीत असावं अशी नेहरुंची इच्छा होती. बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले.


१०.संविधानाच्या पानांवर नक्षीकाम कोणी केलं?


-आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती. तसंच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे.


यशवंतराव चव्हाण: आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार



◾️आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 35 वी पुण्यतिथी.


◾️ महाराष्ट्रातील राजकारणाला सुयोग्य दिशा देण्याचे आणि समतोल व जातिभेदरहीत राजकारणाचा वारसा देण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे. 


◾️यशवंतरावांची ग्रंथसंपदा

आपले नवे मुंबई राज्य, ॠणानुबंध, कृष्णाकाठ, भूमिका, विदेश दर्शन, सह्याद्रीचे वारे, युगांतर.


◾️यशवंतरावांचे आयुष्य रेखाटणारी पुस्तके: आधुनिक महाराष्ट्र के शिल्पकार, आमचे नेते यशवंतराव, कृष्णाकाठचा माणूस, घडविले त्यांना माऊलीने, नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, मुलांचे यशवंतराव चव्हाण, यशवंतराव : इतिहासाचे एक पान, यशवंतराव : एक इतिहास.


◾️यशवंतरावांचे आर्थिक विचार

यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्व इत्यादीशी निगडीत आहेत.


🔺यशवंतरावांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी


◾️ यशवंतरावांना भाषण, संगीत आणि भजन-कीर्तनाची आवड होती. त्यांनी अनेक वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिके पटकावली. 

◾️तयांनी सालसेत येथे सत्याग्रहात भाग घेतला होता. 


◾️ यरवडा तुरुंगात असताना आचार्य भागवत, एस.एम.जोशी यांच्याशी त्यांची ओळख झाली. तेथेच त्यांना राजकीय, सामाजिक प्रश्नांची जाणीव झाली.


◾️ 1930 साली महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केल्यानंतर त्यांनी त्यामध्ये भाग घेतला


◾️ 1932 साली त्यांना पहिला तुरुंगवास घडला. या कारावासात मार्क्सवादाशी विचारांशी त्यांचा परिचय होऊन काँग्रेसमधील रॉयपंथीय गटाशी त्यांचे संबंध वाढले.

◾️ दसऱ्या महायुद्धाच्या वेळी यशवंतराव चव्हाणांना रॉय यांनी घेतलेली युद्धविषयक भूमिका अमान्य झाली. 

◾️1942 साली छोडो भारत आंदोलनात ते सहभागी झाले


◾️1946 साली मुंबई प्रांताच्या विधिमंडळाच्या निवडणुकीत ते सातारा मतदार संघातून निवडून संसदीय चिटणीस झाले.


◾️1948 साली त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या चिटणीसपदावर नियुक्ती झाली.1952 ला ते स्थानिक स्वराज्य व पुरवठा खात्याचे मंत्री झाले


◾️1 नोव्हेंबर 1956 ला द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले व 1960 साली संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले.


◾️ 1962-66 या काळात ते भारताचे संरक्षणमंत्री, 1966-70 गृहमंत्री, 1970-74 पर्यंत अर्थमंत्री व 1974 साली परराष्ट्रमंत्री बनले.


◾️ यशवंतराव चव्हाण यांनी 25 नोव्हेंबर 1984 रोजी जगाचा निरोप घेतला.


संयुगाचे नाव रेणुसूत्रे Chemical Name



पाणी(हायड्रोजन ऑक्साइड) H2O Hydrogen Oxide


अमोनिआ NH3 Ammonia


हायड्रोक्लोरिक आम्ल HCl Hydrochloric Acid


सल्फ्युरिक आम्ल H2SO4 Sulphuric Acid


कार्बनडाय ऑक्साइड CO2 Carbon Dioxide


सोडिअम ब्रोमाइड NaBr Sodium Bromide


कॅल्शिअम ऑक्साइड CaO Calcium Oxide


मॅग्ननोशीअम वलोराइड MgCl2 Magnesium chloride


पोटॉशीअम नायट्रेट KNO3 Potassium Nitrate


पोटॉशीअम कार्बोनेट K2CO3 Potassium Carbonate


पोटॉशीअम क्लोराइड Kcl Potassium Chloride


अमोनिअम सल्फेट (NH4)2SO4 Ammonium Sulphate


सोडिअम फॉस्फेट Na3PO4 Sodium Phosphate


अॅल्युमिनिअम क्लोराइड AlCl3 Aluminium Chloride


अॅल्युमिनिअम हायड्रॉंक्साइड Al(OH)3 Aluminium Hydroxide


कॅल्शिअम कार्बोनेट CaCO3 Calcium Carbonate


अमोनिअम हायड्रॉंक्साइड NH4OH Ammonium Hydroxide


सोडिअम बायकार्बोनेट NaHCO3 Sodium Bicarbonate


हायड्रॉंब्रोमीक आम्ल HBr Hydrotropic Acid


नायट्रीक आम्ल HNO3 Nitric Acid


हायड्रोजन सल्फाइड H2S Hydrogen Sulphide


कार्बोनिक आम्ल H2CO3 Carbonic Acid


फॉस्पोरिक आम्ल H3PO4 Phosphoric Acid


सोडिअम हायड्रॉंक्साइड NaOH Sodium Hydroxide


पोटॉशीअम क्लोरेट KOH Potassium Chlorate


चुनखडी (शाहाबाद) CaCO3 Calcium Chlorate


पोटॉशीअम क्लोरेट KClO3 Potassium Chlorate


पोटॉशीअम परमँगनेट KMnO4 Potassium Permanganate


मॅगनीजडाय ऑक्साइड MnO2 Manganese dioxide


मॅग्नोशीअम ऑक्साइड MgO Magnesium Oxide


झिंक सल्फेट ZnSO4 Zinc Sulphate


झिंक क्लोराइड ZnCl2 Zinc Chloride

मिथेन CH4 Methane


सिल्व्हर नायट्रेट AgNO3 Silver Nitrate


सोडिअम नायट्रेट NaNO3 Sodium Nitrate


सोडिअम सल्फेट NaSO4 Sodium Sulphate


जिपसम (कॅल्शिअम सल्फेट) CaSO4 Gypsum (Calcium Sulphate)


इपसम(मॅग्नेशिअम सल्फेट) MgSO4

 Epsom (Magnesium Sulphate)


कॉपर सल्फेट (मोरचूद) CuSO4 Copper Sulphate


चुन्याची निवळी (कॅल्शिअम हायड्रॉंक्साइड) Ca(OH)2 Calcium Hydroxide


मीठ/ कॉमन सॉल्ट / सोडिअम क्लोराइड) NaCl Common Salt (Sodium Chloride)


सोडाअश/ सोडिअम कार्बोनेट Na2CO3 Sodium Carbonate

Online Test Series

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...