नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
०९ ऑक्टोबर २०२०
तुम्हाला पाठ आहेत का :- महत्वाचे युद्ध सराव
🔶गरुड़ : भारत-फ्रांस.
🔶गरुड़ शक्ति : भारत-इंडोनेशिया.
🔶वरुण : भारत- फ्रांस.
🔶हन्ड-इन-हॅन्ड : भारत-चीन.
🔶जिमेक्स : भारत-जपान.
🔶धर्मा गार्डियन : भारत-जपान.
🔶कजिन संधि अभ्यास : भारत-
जापान तटरक्षकदल.
🔶सर्य किरण : भारत-नेपाळ.
🔶सिम्बेक्स : सिंगापुर-भारतीय नौदल.
🔶लाब्समर : भारत, ब्राझील, दक्षिण
अफ्रीका यांचं नौदल.
🔶कोंकण : भारतीय नौदल-ब्रिटन नेवी.
🔶इद्रधनुष : भारत-ब्रिटन.
🔶मालाबार : भारत-अमेरिका-जपान.
🔶रड फ्लैग : भारत-अमेरिका.
🔶कोप : भारत-अमेरिका.
🔶मित्र शक्ति : भारत-श्रीलंका.
🔶सलिनेक्स : भारत नौदल-श्रीलंका इंद्र :
भारत-रशिया.
🔶नसीम अल बह्न : भारत-ओमान.
🔶सम्प्रीती : भारत- बांग्लादेश.
🔶औसीइंडेक्स भारत-ऑस्ट्रेलिया नौदल.
🔶नोमेडिक एलीफैंट : मंगोलिया-भारतीय
सेना.
🔶एकुवेरिन : मालदीव-भारत.
वाचा :- चालू घडामोडी
● भारतातील सर्वात लांब चेनानी-नशरी बोगद्याचे नाव -------------- हे ठेवण्यात आले? :- डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी
जम्मू-काश्मीरमधील NH-44 वरील भारतातील सर्वात लांब चेनानी-नशरी बोगद्याचे नाव भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी असे ठेवण्यात आले. या बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ एप्रिल २०१७ मध्ये केले होते. हे पाटनिटॉप बोगदा म्हणून देखील ओळखले जाते. ९.२ किमी लांबीचा हा बोगदा आशियातील सर्वात उच्च तंत्रज्ञानाचा बोगदा मानला जातो. (जगात महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा ऑरलॅड व आयरडेल मार्गावर नार्वत आहे. त्याची लांबी २४.५१ कि. मी. आहे) हा बोगदा जम्मू-श्रीनगर महामार्गाचा एक भाग आहे आणि शिवालिक डोंगराच्या मध्यभागी आहे. यामुळे श्रीनगर आणि जम्मू हा रस्ता दोन तासात पूर्ण झाला आहे. या बोगद्याच्या निर्मितीमुळे जम्मू आणि श्रीनगरमधील अंतर ३० किलोमीटरने कमी झाले आहे. या बोगद्याचे प्रत्यक्ष काम युपीए सरकारच्या कालखंडात २३ मे २०११ रोजी सुरु झाले होते.
● राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावरून जाण्या- येण्यासाठी वाहनांवर फास्ट टॅग नावाचा स्टीकर लावणे बंधनकारक केले :- १ डिसेंबर २०१९
एक देश एक फास्ट टॅग या धोरणांतर्गत राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातर्फे १ डिसेंबर २०१९ पासून राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावरून जाण्या- येण्यासाठी वाहनांवर फास्ट टॅग नावाचा स्टीकर लावणे बंधनकारक केले आहे. सध्या ५२७ राष्ट्रीय महामार्गावर एकूण टोलनाके आहेत तर ३८० नाक्यावर फास्ट टॅग यंत्रणा कार्यरत आहे. या फास्ट टॅगची (राष्ट्रीय महामार्ग शुल्क ) मूळ कल्पना २००८ मधील म्हणजे युपीए सरकारच्या काळातील आहे.
● 2021 ची जनगणना ............ भाषांमध्ये होणार आहे :- १६
2021ची जनगणना 16 भाषांमधून केली जाणार आहे. ही जनगणना मोबाईल ॲपच्या माध्यमातून केली जाणर आहे. जनगणना दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. घर-यादी आणि घर गणना एप्रिल ते सप्टेंबर 2020 मध्ये तर लोकसंख्या गणना 9 ते 28 फेब्रुवारी 2021 दरम्यान होणार आहे.
● 2 डिसेंबर 2019 रोजी आशियाई विकास बँकेचे दहावे अध्यक्ष म्हणून * कोणाची निवड करण्यात आली:- मसात्सुगु असकावा
2 डिसेंबर 2019 रोजी, मसात्सुगु असकावा यांची आशिया विकास बँकेचे दहावे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्याचा कार्यकाळ 17 जानेवारी 2020 पासून सुरू होईल. या पदावर ते टेकिको नाकाओची जागा घेणार आहेत. ते 23 नोव्हेंबर 2021 रोजी संपणार्याक टेकिको नाकाओच्या अध्यक्षपदाचा उर्वरित कार्यकाळ पूर्ण करतील. मसात्सुगु आसाकावा सध्या जपानचे पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांचे विशेष सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
आशियाई विकास बँक:-
स्थापना:- १९ डिसेंबर १९६६
मुख्यालय:- मनीला, (फिलिपाईन्स)
एकूण सदस्य:-६८
● पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धाचे आयोजन २०२३ मध्ये १३ ते २९ जानेवारी दरम्यान कोणत्या देशात होणार आहे:- भारत
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) २०२३ मध्ये होणाऱ्या विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद भारताला बहाल केले. भारतात सलग दुसऱ्यांदा विश्वचषक हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धा
भुवनेश्वर आणि राउरकेला (ओडीशा) येथे होणार आहे. विश्वचषक हॉकी स्पर्धेचे चौथ्यांदा आयोजन करणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे. याआधी भारताने १९८२ (मुंबई), २०१० (नवी दिल्ली) आणि २०१८ (भुवनेश्वर) साली विश्वचषक हॉकी स्पर्धा आयोजित केली होती. नेदरलँड्सने तीन वेळा विश्वचषक स्पर्धा भरवली आहे.
● लोकपालने -------------- हे ब्रीद वाक्य स्वीकारले आहे :- मा गृधः कस्यस्विद्धनम्
• 26 नोव्हेंबर 2019 रोजी लोकपालचे अध्यक्ष न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांच्या हस्ते नवी दिल्लीत लोकपालच्या बोधचिन्हाचे (लोगो) प्रकाशन व लोकपालचे ब्रीदवाक्य (घोषवाक्य / motto) म्हणून “मा गृधः कस्यस्विद्धनम्” स्वीकारण्यात आले. लोकपालपीठाने सर्वसंमतीने ‘ईशावास्योपनिषध’ याच्या पहिल्या श्लोकात असलेल्या “मा गृधः कस्यस्विद्धनम्” या वाक्याची निवड केली. ‘मा गृधः= लोभ करु नका’; ‘कस्यस्वित्=कोणाच्याही’, ‘धनम्=धनाचा’ म्हणजेच “कोणाच्याही संपत्तीचा लोभ करु नका” असा या वाक्याचा अर्थ होतो लोकपालच्या बोधचिन्ह आणि ब्रीदवाक्यासाठी एक मुक्त स्पर्धा घेण्यात आली होती. या निवड प्रक्रियेततून उत्तरप्रदेशच्या प्रयागराजचा रहिवासी प्रशांत मिश्रा यांच्या चिन्हाची निवड करण्यात आली.
वाचा :- महत्त्वाच्या चालू घडामोडी
5 जानेवारी रोजी बिहारमध्ये ................. यांचे भारताच्या पहिल्या लोकसभेचे सदस्य (1952 साली स्थापन झालेले) आणि डुमराओं राजचे शेवटचे महाराज यांचे निधन झाले - कमल बहादुर सिंग
* जागतिक आर्थिक मंच (WEF) यांच्या वर्ष 2019 साठीच्या ‘ट्रॅव्हल अॅोण्ड टुरिझम कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स’ (TTCI) मध्ये भारताचा ..........वा क्रमांक लागतो - 34 वा
* ------------ या राज्य पोलीस विभागाने विद्यार्थिनींना स्व-संरक्षण प्रशिक्षण देण्यासाठी तृतीय 'सुकन्या' प्रकल्पाला सुरूवात केली आहे. - कोलकाता पोलीस.
* ----------- या राज्य सरकारने शासकीय कर्मचार्यांाना 10 लक्ष रुपयांपर्यंत वैद्यकीय विमा देणारी ‘मुख्यमंत्री कर्मचारी आरोग्य विमा योजना’ सुरु केली - मध्यप्रदेश.
* ..............या शहरात नवे 'भारत दर्शन पार्क' उभारले जाणार आहे. - दिल्ली.
* परराष्ट्र कल्याण मंत्रालयातला ............. हा नवीन विभाग सुरु करण्यात आला आहे. - नवीन, उदयोन्मुख आणि धोरणात्मक तंत्रज्ञान (New, Emerging and Strategic Technologies -NEST) विभाग.
* ------------- या शिक्षणतज्ज्ञने असे सॉफ्टवेअर तयार केले आहे जे कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून भारतीय शास्त्रीय संगीतामधल्या रागांची स्वरजुळणी करू शकते - विनोद विद्वन्स.
* 4-12 जानेवारी या कालावधीत नॅशनल बुक ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या "नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळावा" याचा ............ हा विषय होता. - "गांधीः द राइटर्स राइटर".
* टी-20 क्रिकेटच्या इतिहासात 100 बळी घेणारा सर्वात तरुण गोलंदाज (वय: 18 वर्ष आणि 271 दिवस)........... हा होय. - मुजीब उर रहमान (अफगाणिस्तान).
* --------- भारतातील पहिल्या शहरी सहकारी बँकेला भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून लघू वित्तीय बँकेत रूपांतर करण्यास तत्वत: मान्यता मिळाली - शिवालिक मर्कंटाइल सहकारी बँक मर्यादित (उत्तरप्रदेश).
* 31 वा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव ------------------ या ठिकाणी भरविण्यात आला - अहमदाबाद, गुजरात.
* ---------------- या शहरात ‘शेतकरी विज्ञान परिषद’ आयोजित केली गेली होती- बेंगळुरु.
* अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी देशातली जागतिक दर्जाची सुविधा .....येथे उभारली जात आहे - छल्लाकेरे (चित्रदुर्ग जिल्हा, कर्नाटक).
* नवीन ‘जागतिक बोध संग्रहालय व शैक्षणिक संस्था’ येथे उभारली जाणार - - सांची, मध्यप्रदेश.
* भारत हवामान खात्याने ................सालानंतरचे 2019 हे सातवे सर्वात गरम वर्ष म्हणून जाहिर केले – 1901.
• महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 7 जानेवारी रोजी ..............या शहरात कला प्रदर्शनी भरविण्यात आले - ढाका, बांगलादेश.
• सेल्फी किंगडम (TSK)” नावाने उघडण्यात आलेले जगातले पहिले "सेल्फी संग्रहालय" ............ येथे आहे. – दुबई, संयुक्त अरब अमिराती.
• 2019 या वर्षी ....................या भारतातल्या UNESCO जागतिक वारसा स्थळाने 1020 वर्षे पूर्ण केलीत - खजुराहोची मंदिरे.
प्रथमच,................ या विधानसभा निवडणुकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाने सुसज्जित 11 मतदान केंद्रे असणार आहे. - दिल्ली.
• .............या व्यक्तीच्या जीवनावर ‘कर्मयोद्धा ग्रंथ’ हे पुस्तक लिहिले गेले आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
• .............या राज्याच्या विधानसभेनी देशभरातल्या इतर मागासवर्गीय (OBC) लोकसंख्या शोधण्यासाठी केंद्र सरकारकडे जाती-आधारित जनगणनेसाठी एकमताने एक ठराव मंजूर केला - महाराष्ट्र.
• 12 जानेवारी 2020 पासून सुरुवात झालेल्या ‘भविष्यातल्या ऊर्जेसंबंधी जागतिक शिखर परिषद ------------- येथे आयोजित केली होती – अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती.
• ‘ऑल इंडिया सीनियर रँकिंग बॅडमिंटन ही स्पर्धा .............. यांनी जिंकली( महिला आणि पुरुष एकेरी गट)- आकर्शी कश्यप आणि मिथुन मंजुनाथ
• 2018-19 हंगामासाठी BCCIच्या दिलीप सरदेसाई पुरस्कार------------- याला जाहिर झाला - जसप्रीत बुमराह
• महिला विभागात BCCIच्या पॉली उम्रीगर पुरस्काराची विजेती - पूनम यादव
• ................या देशाने ताशी 350 किलोमीटरने धावणारी विनाचालक बुलेट ट्रेन सादर केली – चीन (फूक्सिंग श्रेणीची ट्रेन)
• 10 जानेवारी 2020 रोजी .............या देशाच्या संसदेनी खाण- संबंधित विधेयकावर सर्वप्रथम विधानसभेची सार्वजनिक सुनावणी घेतली - भूतान
• ..............या ठिकाणी 14-16 जानेवारी काळात ‘रायसीना संवाद 2020’ आयोजित करण्यात आला आहे - नवी दिल्ली.
• कोलकाता पोर्टचे ...................... हे नवे नाव ठेवण्यात आले आहे - श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट.
• भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) घोषणा केली आहे की कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी भारतातल्या................. या चार विमानतळांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे - नेताजी सुभाष चंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ
वाचा :- UAE चे Moon Mission
अलीकडेच संयुक्त अरब अमिरातीने (UAE) 2024 मध्ये मानवरहित अवकाशयान चंद्रावर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
ठळक बाबी
रोव्हरचे नाव : रशीद , युएईचा मूळ संस्थापक असलेल्या यांच्या नावावरून शेख रशीद बिन सईद अल मकतूम ठेवले जाईल.
उद्दीष्ट: हा रोव्हर अशा चंद्राच्या पृष्ठभागाचा शोध घेईल ज्या भागाचा शोध मानवी मोहिमांनी यापूर्वी घेतला नाही.
चंद्रावर रोव्हर उतरवण्यास संयुक्त अरब अमिरातीला यश आल्यास अशी कामगिरी करणारा चौथा देश ठरणार आहे. अमेरिका, सोव्हिएत युनियन रशिया आणि चीन या देशांनाच अशी कामगिरी करता आली आहे
विशेष म्हणजे ,चंद्रावर अंतराळयान उतरवण्याचा प्रयत्न भारताने केला पण तो यशस्वी झाला नाही. भारताप्रमाणेच इस्त्राईल आणि जपाननेही प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही.
चंद्रयान -3 नावाच्या मिशनची योजना भारताने आखली आहे. ती 2021 च्या सुरूवातीस सुरू होण्याची शक्यता आहे.
नासाचा आर्टेमिस प्रोग्राम
आर्टेमिस प्रोग्रामद्वारे, नासाला 2024 पर्यंत माणसाला (एक स्त्री आणि एक पुरुष) चंद्रावर पाठवायचे आहे. या मिशनचे लक्ष्य चंद्रच्या दक्षिण ध्रुवासह चंद्राच्या पृष्ठभागावर अंतराळवीरांना उतरवायचे आहे(लँडिंग करण्याचे आहे).
UAE चे अंतराळ अभियान
जुलै २०२० मध्ये युएईने जपानमधून ‘अमल (होप)’ नावाचे यान मंगळावर पाठवले
यामुळे मंगळावर यान सोडणारा युएई हा पहिला मुस्लीम देश ठरला आहे.
समार्ट मुंबईचे शिल्पकार!
नामदार जगन्नाथ तथा नाना शंकरशेठ यांचा, ३१ जुलै हा स्मृतिदिन. संस्कृत विषयातील शिष्यवृत्ती देणारे समाजसेवक म्हणून नाना महाराष्ट्रास माहीत आहेत पण, ते भारतीय रेल्वेचे जनक व आधुनिक मुंबईचे आद्य शिल्पकारही होते. नानांनी स्त्रीशिक्षण, पुनर्विवाह, सती बंदी व सोनापूर स्मशानभूमीस दिलेली जमीन तसेच आर्थिक सहकार्यातूनही समाजकार्य साधले. नानांच्या जीवनाचा बहुतांश हिस्सा या घडामोडींचा एक अविभाज्य घटक होता, हे अनेकांना माहीत नाही! नानांच्या सर्व कार्याचा विस्तृत वृत्तांत येथे मांडणे अशक्य आहे म्हणून, त्यांच्या १५१व्या स्मृतिदिनानिमित्त, त्यांच्या प्रेरणेतून घडलेल्या स्थापत्यविषयक कार्याचा हा आढावा.
मुंबईच्या आरंभापासून ते आजतागायत, 'व्यापार' हाच या शहराचा स्थायी स्वभाव बनून राहिला आहे. म्हणूनच मुंबईला 'सिटी ऑफ गोल्ड' किंवा देशाची 'आर्थिक राजधानी' असे म्हटले जाते. अठरा व एकोणिसाव्या शतकात मुंबईत झालेल्या घडामोडींना खूप महत्त्व आहे. त्या घडामोडीतूनच नानांच्या स्मृतीतील वैभवशाली चेहरा असलेली 'स्मार्ट मुंबई' निर्माण झाली.
१८व्या शतकाच्या पूर्वाधात, मुंबईसाठी सार्वजनिक सभागृहाची गरज ओळखून 'टाऊन हॉल' इमारतीचा प्रस्ताव राज्यपाल जोनाथन डंकनच्या राजवटीत मांडला गेला. या टाऊन हॉलचे बांधकाम सन १८२०मध्ये सुरू झाले व १८३३मध्ये पूर्ण झाले. ही भव्य इमारत इंग्रजांच्या सामर्थ्याचे पहिले प्रतीक म्हणून ओळखली जात असे. या इमारतीचा उपयोग त्या काळात अनेक कार्यासाठी केला गेला. यात कायदे मंडळाची बैठक, मुंबई विद्यापीठाचा पदवीदान समारंभ एवढेच नव्हे तर १८६५ पासून १८७१ पर्यंत म्युनिसिपल कमिशनरला जागेच्या अडचणीमुळे जे. पी. मंडळाच्या सभादेखील याच हॉलमध्ये घ्याव्या लागत. या जागेतच एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबई विद्यापीठ, विधिमंडळ व नगरपालिकेचा कारभार केला गेला. या सर्व घडामोडीत नानांचा प्रत्यक्ष सहभाग होता. सन १८३४ पासून एशियाटिक लायब्ररी येथे सुरू करण्यात आली. या लायब्ररीचा प्रथम सभासद होण्याचा मानही नानांनाच दिला गेला.
परदेशातील दळणवळण जहाजे व बोटीतून होत असे. पण देशांतर्गत दळणवळण सुलभ होऊन व्यापाराला गती यावी म्हणून मुंबईत १८४३ साली 'ग्रेट वेस्टर्न रेल्वे कंपनी' स्थापन केली. या समितीतील आद्य प्रवर्तकात नाना शंकरशेठ, जमशेठजी जीजीभाई व सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश अर्स्किन पेरी व इतर प्रवर्तक होते. या कंपनीच्या कार्यालयासाठी जागाही नानांनी त्यांच्या वाड्यात देऊ केली.
मुंबई-ठाणे रेल्वे लाइनचे काम सुरू असतानाच ब्रिटिश सत्तेचा उच्चांक दर्शवणारी दुसरी घटना म्हणजे आजची छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस ही इमारत होय. शे-सव्वाशे वर्षांपूर्वी, ज्या उद्देशाकरिता ही इमारत बनवली गेली तेच कार्य आजही चालते व जगातील सर्वोत्तम रेल्वे इमारत म्हणूनही तिची ओळख आहे. या इमारतीचे आराखडे फ्रेडिक विल्यम स्टीव्हन्स या ब्रिटिश आर्किटेक्टने, गॉथिक शैलीत बनवले होते. या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील कमानीत नानांचे स्मृतिशिल्प बसवण्यात आले आहे.
सन १८६४ मध्ये म्युनिसिपल अॅक्ट पास झाला. सुरुवातीस नगर शासनाचे काम गव्हर्नरच्यामार्फत चालत असे. मुंबई फोर्ट परिसरातील धनिकांनी मुंबई सेंट्रल, परळ व आजच्या सीएसटी स्टेशनच्या पुढे थेट भायखळ्यापर्यंत जागा घेऊन बंगले बांधण्यास सुरुवात केली. या दरम्यान फोर्ट परिसरात अनेक निवासी, नागरी व सरकारी इमारतींचे काम सुरू झाले.
पालिकेतील वाढलेल्या कामाचे महत्त्व लक्षात घेऊन तीन म्युनिसिपल कमिशनर नेमण्यात आले. त्यानुसार मुंबई नगरपालिकेचे पहिले कार्यालय गिरगावातील एका वाड्यात सुरू केले होते. त्यानंतर ऱ्हिदम हाऊस या इमारतीत हलवले. मंडळाच्या सभेसाठी जागा अपुरी पडत असल्याकारणाने हे कार्यालय १८६६-१८९२ पर्यंत आर्मी-नेव्ही या इमारतीत नेण्यात आले. पालिकेच्या वाढत्या कामाचा व्याप व भविष्यातील हालचालीचा वेध लक्षात घेऊन नाना व जमशेठजी जीजीभाईंनी पालिकेसाठी जागेचा शोध सुरू केला. मुंबईतील नागरिकांना पालिकेत येणे सोयीचे जावे म्हणून सर्वानुमते सीएसटी (VT) समोरील मोकळ्या जागेची निवड केली. ही जागा निवडण्यामागचे कारणही केवढे सयुक्तिक होते हे आजच्या परिस्थितीवरून समजून येते. यानंतर आराखडा बनवण्यासाठी योग्य वास्तुरचनाकाराचा शोध घेण्याचे काम सुरू झाले. नियोजित पालिकेच्या आराखड्याचे काम, रेल्वे स्थानक व परिसरातील इमारतींच्या बाह्य सौंदर्याशी साधर्म्य साधू शकेल, अशा वास्तुरचनाकारासच देण्यात यावे असा ठराव पालिकेतील नगरसेवकांनी पास केला. सरतेशेवटी हे काम स्टीव्हन्सलाच करावे लागले! १८८३-९३ या दरम्यान आर्किटेक्ट स्टीव्हन्स सरकारी नोकरीत नसल्याने इंग्लंडमध्येच आराखडे बनवून पाठवले होते. स्टीव्हन्सने पालिकेची इमारत पूर्णतः इटालियन गॉथिक शैलीत न बनवता त्यात भारतीय इस्लामी शैलीतील घुमट व मनोऱ्यांचाही वापर खुबीने केला आहे. या सर्व घडामोडींतून त्या काळातील नगरसेवकांकडे दूरदृष्टी व वास्तुसौंदर्यशास्त्राबद्दल असलेल्या जाणिवेची प्रचिती येते!
मुंबईच्या जडणघडणीत फक्त ब्रिटिश राज्यकर्तेच नव्हे तर, अनेक भारतीय समाजसुधारकांनी योगदान दिले आहे. अनेक धनिक, समाजकल्याणाच्या हेतूने सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, स्थापत्य व इतर माध्यमातून, सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत असत. या सामाजिक बांधिलकीतून समाजसेवेच्या विविध प्रथा निर्माण झाल्या.
नानांचा प्रत्यक्ष संबंध आलेल्या स्थापत्यविषयक नामावलीत ग्रँट मेडिकल कॉलेज, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, डॉ. भाई दाजी लाड संग्रहालय, जिजामाता उद्यान, मुंबई विद्यापीठ, एल्फिन्स्टन कॉलेज, नाना चौकातील भवानीशंकर देऊळ, जे. जे. हॉस्पिटलसारख्या सार्वजनिक हिताच्या इमारतींचा समावेश आहे. नानांनी एकनिष्ठेने देशबांधवांसाठी केलेल्या सेवेचे प्रतीक म्हणून ते हयात असतानाच पुतळ्याच्या रूपाने त्यांचे स्मारक उभारण्यात यावे अशा अर्थाचा ठराव प्रो. दादाभाई नवरोजी यांनी मांडला व तो सभेत पासही करून घेतला. दुर्दैवाने पुतळ्याचे काम नानांच्या हयातीत पूर्ण होऊ न शकल्यामुळे हा पूर्णाकृती पुतळा, नानांच्या समकालीनांचे पुतळे व तसबिरी ठेवण्यात आल्या आहेत, त्या टाऊन हॉल इमारतीच्या तळमजल्यावर बसवण्यात आला. म्हणूनच, नाना हेच खरे 'मुंबईचे अनभिषिक्त' सम्राट होते असा उल्लेख आचार्य प्र. के. अत्रेंनी केला होता, हे पटण्यासारखे आहे.
नानांनी समाजहिताच्या भावनेतून मुंबईसाठी केलेले कार्य स्मारकरूपातून सदैव स्मरणात रहावे असे मुंबईकरांना वाटणे साहजिक आहे. स्मारकाच्या जागेसाठी अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेने पुढाकार घेऊन व स्मारक समितीच्या सन्माननीय सदस्यांनी सुरेंद्रभाऊ वि. शंकरशेठ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. अॅड. मनमोहन चोणकर हे समितीचे सरचिटणीस आहेत. अॅड. चोणकरांनी नगरसेवक असताना स्मारकासाठी भूखंडाची मागणी महानगरपालिकेत मांडली. शहर प्रशासनाने, दि. २५ ऑगस्ट २०१४ रोजी सभागृहातील सर्व नगरसेवकांनी नाममात्र प्रतिवर्ष १ रु. भाड्याने, नाना शंकरशेठ स्मारक प्रतिष्ठान समितीस, वडाळा येथे १५०० चौ. मी. चा भूखंड देण्याचा ठराव मंजूर केला. सेना पक्षप्रमुख, महापौर, महानगरपालिका आयुक्त व सुधार समिती सदस्यांनी सहकार्य केले. मुंबई महानगरपालिकेने, या स्मारकास नाममात्र दरात भूखंड देऊन सहकार्य केले. महाराष्ट्र सरकारनेही स्मारकाच्या यापुढील कार्यसिद्धीसाठी मोठ्या रकमेची आर्थिक मदत देऊन आपले कर्तव्य पूर्ण करावे, असे आवाहन मुंबईतील नागरिकांच्या वतीने या लेखाच्या माध्यमातून मी करू इच्छितो. आज घडत असलेल्या मुंबईचा चेहरा व वास्तुसौंदर्यशास्त्रीय ओळख पुढील पिढ्यांकरिता कशी राहील, हे सांगणे कठीण आहे. मुंबईचे आद्य शिल्पकार म्हणून गौरवलेल्या नानांच्या नियोजित इमारतीच्या अंतर्बाह्य आराखड्यातून त्यांच्या स्मृतीतील मुंबईचे प्रतिकात्मक साधर्म्य साधणारी वैशिष्ट्ये जर का अंतर्भूत करू शकलो तर ती खऱ्या अर्थाने वाहिलेली श्रद्धांजली ठरेल!
ताराबाई शिंदे (१८५०-१९१०)
ह्या महाराष्ट्रातील एक स्त्रीवादी लेखिका व सत्यशोधक समाजाच्याकार्यकर्त्या होत. १८८२ साली प्रसिद्ध झालेल्या स्त्री-पुरुष तुलना या पुस्तकाच्या त्या लेखिका होत.
ताराबाई ह्या बुलढाणा येथील रहिवासी होत्या. त्यांचे वडील बापुजी हरी शिंदे हे एक जमीनदार होते. ते सत्यशोधक समाजाचे सभासद होते.ताराबाई शिंदे यांचे भाऊ, रामचंद्र हरी शिंदे जोतिबांच्या कॉन्ट्रक्टिंग कंपनीत भागीदार होते. त्यामुळे ताराबाईंच्या घरात सुरुवातीपासूनच स्त्री-पुरुष समानतेचे वातावरण होते.
ताराबाईंनी आपल्या पुस्तकात विधवा-विवाहास उच्च वर्णीयांनी केलेली मनाई, केशवपनासारख्यादुष्ट रूढी, तसेच पुरुषांना अनेक लग्न करण्याची असलेली मुभा या सर्व प्रश्नांवर टीका केलेली दिसते. तत्कालीन महाराष्ट्रातील स्त्री समाजसुधारक म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थिती देखील सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात योगदान दिले.त्यानी स्त्री यांच्या शोषणा विरोधात दिलेला लढा हा सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेस चालना देणारा होता.
आधुनिक भारताचा इतिहास
बंगालचे गव्हर्नर
🌸 रॉबर्ट क्लाईव्ह :- इ . स . 1757 ते 1760
🍀 हॉलवेल : - इ. स . 1760
🌸 वन्सिटार्ट : - इ . स . 1760 ते 1765
🍀 रॉबर्ट क्लाईव्ह : - इ . स . 1765 ते 1767
🌸 वरलेस्ट : - इ . स . 1767 ते 1769
🍀 कार्टीयर : - इ . स. 1769 ते 1772
🌸 वॉरेन हेस्टिंग्ज : - इ . स . 1772 ते 1774
जीवनसत्त्व E इ
🌻रासायनिक नाव:-टोकोफेरोल
🌻परतिदिन गरज:-10 मायक्रो ग्राम
🗯मख्य कार्य:-
🔘रोगप्रतिकारक क्षमतेत भाग घेते
🔘अटीऑक्सिडेंट जीवनसत्व म्हणतात
🛑मख्य स्रोत:-सर्व वनस्पती तेल
🎯अभावाचा परिणाम:-
🔘वांझ पणा येतो
👉वांझपणा विरोधी जीवनसत्व म्हणतात
जीवनसत्त्व A अ
🔅रासायनिक नाव:-रेटिनॉल
☀️परतिदिन गरज:-1000 मायक्रो ग्राम
🎯मख्य कार्य:-
🔘डोळ्यात दंडपेशीत रोडॅपसीन रंगद्रव्य ची निर्मिती करणे
🔘शरीराची वाढ व डोळे निरोगी ठेवणे
🔘परतिकार क्षमतेत मदत
🔥मख्य स्रोत:-
✍️गाजर ,पालक ,मेथी
✍️टमाटे , आंबा ,दूध
✍️दही ,अंडे ,यकृत
🗯अभावाचा परिणाम:-
👉रात आंधळेपणा
👉डोळे कोरडे पडणे
👉शक्राणू निर्मिती मध्ये अडथळा
✍️मतखडा संबंधित रोग
🔰गरोदरपणात याचे जास्त प्रमाण हानिकारक असते
महिलांना मतदानाचा अधिकार कधी मिळाला
🛑अमेरिका : 1920
🛑यनायटेड किंग्डम : 1928
🛑 फरान्स : 1945
🛑 जपान :1945
🛑 इस्त्रायल :1948
🛑 भारत. :1950
🛑 सविझर्लंड. :1971
1909 च्या भारत कौन्सिल ऍक्ट मधील तरतुदी
1)केंद्रीय व प्रांतीय विधीमंडळाचा विस्तार
2)निर्वाचन तत्वाला किंचित मान्यता
3)केंद्रीय व प्रांतीय विधीमंडळाच्या अधिकारात वाढ
4)मुस्लिम लोकांसाठी स्वतंत्र मतदारसंघ
5) इंडिया कौन्सिलमध्ये भारतीय लोकांना प्रवेश
6)गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळमध्ये भारतीय सदस्यांची नियुक्ती
7)केंद्रीय विधिमंडळात सरकारी सदस्यांचे बहुमत
8)प्रांतीय विधिमंडळात बिनसरकारी सदस्यांचे बहुमत
कषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांचा फायदाच.
🔰नवी दिल्ली : यापूर्वी काही राज्यांत बाजार समिती कायद्याच्या नियमनातून फळे आणि भाज्या वगळल्याने शेतक ऱ्यांना फायदा झाला आहे. आता धान्य उत्पादक शेतक ऱ्यांना नवीन कृषी विधेयकांमुळे तसेच स्वातंत्र्य मिळणार आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात कृषी विधेयकांचे समर्थन केले.
🔰सध्या देशात कृषी विधेयकांच्या विरोधात मोठी आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी या विधेयकांचे फायदे या वेळी स्पष्ट केले. गत काँग्रेस सरकारांनी जी आर्थिक धोरणे राबवली त्यावर त्यांनी जोरदार टीका केली.
🔰पतप्रधान मोदी म्हणाले, की देशातील शेतक ऱ्यांनी कृषी क्षेत्र मजबूत केले असून आत्मनिर्भर भारत घडवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. जर महात्मा गांधी यांचे आर्थिक तत्त्वज्ञान अनुसरले असते तर आत्मनिर्भर भारत योजना राबवण्याची गरज पडली नसती, भारत आधीच आत्मनिर्भर झाला असता.
🔰‘मन की बात’ कार्यक्रमात विविध विषयांचा आढावा घेताना त्यांनी सांगितले, की कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याच्या जोखडातून शेतकऱ्यांना मुक्त केल्यानंतर काही राज्यांत शेतक ऱ्यांना आधीच फळ व भाज्या विक्रीतून फायदा झाला आहे. आपल्या कृषी क्षेत्राने कोविड १९ काळातही चांगली कामगिरी केली, त्याचे श्रेय शेतक ऱ्यांनाच आहे. देशाला आत्मनिर्भर करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. कृषी क्षेत्र जितके मजबूत तितका आत्मनिर्भर भारताचा पाया मजबूत होईल.
शाश्वत विकास लक्ष (sustainable development goal)
(1) दारिद्र्य नष्ट करणे
(2) भूक नष्ट करणे
(3) चांगले आरोग्य व सुस्थिती
(4) गुणवत्तेचे शिक्षण
(5) लिंग समानता
(6) स्वच्छ पेयजल व स्वच्छता
(7) परवडण्याजोगी व स्वच्छ ऊर्जा
(8) चांगली कार्यस्थिती आणि आर्थिक वाढ
(9) उद्योग नवाचार आणि पायाभूत संरचना
(10) विषमता कमी करणे
(11) शाश्वत शहरे व समुदाय
(12) जबाबदार उपयोग व उत्पादन
(13) हवामान कृती
(14) पाण्याखालील जीवन
(15) जमिनीवरील जीवन
(16) शांतता न्याय व मजबूत संस्था
(17) लक्ष पूर्तीसाठी भागीदारी
भारताचे उपराष्ट्रपती (1952 ते 2019)
01. डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन (1952 ते 1962)
02. डाॅ. झाकीर हुसेन (1962 ते 1967)
03. वराहगिरी वेंकट गिरी (1967 ते 1969)
04. गोपाळ स्वरूप पाठक (1969 ते 1974)
05. बसप्पा धनप्पा जत्ती (1974 ते 1979)
06. न्या. महम्मद हिदायतुल्ला (1979 ते 1984)
07. रामास्वामी वेंकटरमण (1984 ते 1987)
08. शंकर दयाल शर्मा (1987 ते 1992)
09. कोचीरिल रमण नारायण (1992 ते 1997)
10. कृष्ण कांत (1997 ते 2002)
11. भैरवसिंह शेखावत (2002 ते 2007)
12. महम्मद हमिद अन्सारी (2007 ते 2017)
13. वेंकय्या नायडू (2017 ते आजपर्यंत)
जागतिक आनंद अहवाल World Happiness Report-2020
🔸UN Sustainable Solution Network द्वारे 2012 पासून जाहीर केला जातो
🔸2020 चा हा 8वा अहवाल आहे
एकूण 156 देशांची यादी जाहीर केली
या अहवालात भारताचा 144 या क्रमांक
🔸2019 मध्ये भारत 140 व्या क्रमांकावर होता
🔸2020 च्या अहवालानुसार प्रथम पाच आनंदी देश
1. फिनलंड
2. डेन्मार्क
3. स्विझरलँड
4. आइलैंड
5.नार्वे
🔸शवटचे पाच देश
156. अफगाणिस्तान
155. दक्षिण सुदान
154. झीबॉम्बे
153. रवांडा
152. सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक
घटना आणि देशातील पहिले राज्य
● प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश
● माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू
● सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान
● पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान
● संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड
● मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा
● भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश
● जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश
● संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ
● देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब
● मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक
● विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक
● भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश
● मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू
● महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई)
● रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र
● राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून)
● अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड
● मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश
महारत्न , नवरत्न , मिनीरत्न :
• भारतीय उद्योगांना नवरत्न आणि मिनीरत्न दर्जा देण्यास सुरुवात 1997 साली - अर्जुनसेन गुप्ता समिती शिफारसीवरून
• उद्योगांना महारत्न देण्यास सुरुवात 19 मे 2010 पासून
• भारतात नवरत्न दरबार "गुप्त राजा विक्रमादित्य" आणि "मुघल बादशाह अकबर" ह्यांच्या दरबारी होता.
🔰 भारतातील महारत्न उद्योग
एकूण - 10
1. BHEL
2. कोल इंडिया लिमिटेड
3. गेल (इंडिया) लिमिटेड
4. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड
5. एनटीपीसी लिमिटेड
6. ONGC कॉर्पोरेशन लिमिटेड
7. SAIL
8. BPCL
9. HPCL
10. PGCIL
(Power Grid Corporation of India Limited)
• नवरत्न उद्योग - 14
भूकंप
◾️‘भू’ म्हणजे जमीन व ‘कंप’ म्हणजे थरथर. भूकंप म्हणजे जमिनीचे थरथरणे.
◾️भकवचाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे खडकांच्या थरांत प्रचंड ताण निर्माण होत असतो.
◾️हा ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो ताण भूकवचात एखाद्या ठिकाणी मोकळा होतो.
◾️जया ठिकाणी तो मोकळा होतो, तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जालहरी निर्माण होतात. त्यामुळे भूकवच कंप पावते, म्हणजेच भूकंप होतो.
◾️ भकवचात ज्या ठिकाणी हा साचलेला ताण मोकळा होतो, त्या ठिकाणाला ‘भूकंपाचे केंद्र’ किंवा ‘भूकंपनाभी’ असे म्हणतात.
◾️या केंद्रापासून विविध दिशांनी ऊर्जालहरी पसरत असतात.
◾️भकंपकेंद्रापासून ऊर्जालहरी ज्या ठिकाणी सर्वप्रथम पोहचतात त्या ठिकाणी भूकंपाचा धक्का सर्वप्रथम बसतो.
◾️भपृष्ठावरील अशा ठिकाणाला भूकंपाचे अपिकेंद्र असे म्हणतात. भूकंपाचे अपिकेंद्र हे नेहमी भूकंप केंद्रास (नाभीस) लंबरूप असते.
देशातील सर्वांत लांब नदीवरील रोपवे
» ठिकाण - गुवाहाटी (आसाम)
» नदी - ब्रम्हपुत्रा
» लांबी - १.८२ किमी
» गुवाहाटीला उत्तर गुवाहाटीशी जोडतो
----------------------------------------------------
■ दिल्ली ते लंडन बस सेवा ■
» जगातील सर्वांत लांब बस सेवा
» सुरु करणारी कंपनी - Adventures Overland
» एकूण आंतर - सुमारे २०,००० किमी
» जवळपास १८ देशांतून प्रवास
» प्रवास कालावधी - ७० दिवस
» मे २०२१ मध्ये धावणार
भारताचा महान्यायवादी (Attorney General of India)
संविधानात “भाग 5 मधील प्रकरण 1 अंतर्गत कलम 76 मध्ये” महान्यायवादी पदाची तरतुद करण्यात आली आहे.
महत्वाचे म्हणजे घटनेतील “कलम 88 आणि 105” ही देखील या पदाशी संबंधित कलमे आहेत..
कलम 88 नुसार, महान्यायवादी यांना सभागृहातील हक्क दिले आहेत. यानुसार भारताच्या महान्यायवादीस, संसदेच्या कोणत्याही सभागृहात, सभागृहाच्या कोणत्याही संयुक्त बैठकीत आणि संसदेच्या ज्या समितीत त्याचे नाव सदस्य म्हणून घातलेले असेल अशा कोणत्याही समितीत, भाषण करण्याचा आणि अन्यथा त्यांच्या कामकाजात भाग घेण्याचा हक्क असेल, पण या कलमाच्या आधारे त्याला मतदान करण्याचा हक्क असणार नाही.
कलम 105 नुसार, महान्यायवादी यांना संसदेची सभागृहे आणि त्यांचे सदस्य व समित्या यांचे अधिकार, विशेषाधिकार, इत्यादी दिले आहेत.
कलम 76 च्या व्यतिरिक्त जी दोन कलमे आहेत ती लक्षात असुद्या..
भारतीय संविधानाबद्दल 10 महत्वाच्या गोष्टी....
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली.म्हणून जाणून घेऊयात संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी...
१. २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो?
२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती.
२. संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?
- संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.
३. कसं लिहीलं गेलं संविधान?
-आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं. यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याी जबाबदारी त्यांना देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.
४. संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते?
-२९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजास सुरुवात केली. जवाहरलाल नेहरू,अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा म
देशभरात आज 'संविधान दिवस' साजरा केला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली.
१. २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो?
२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती.
२. संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?
- संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.
३. कसं लिहीलं गेलं संविधान?
-आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं. यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याी जबाबदारी त्यांना देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.
४. संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते?
-२९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजास सुरुवात केली. जवाहरलाल नेहरू,अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आहे.
५. संविधान सभचे अध्यक्ष कोण होते?
-९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती गठीत करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. पुढं ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले.
६. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
-फाळणीनंतर संविधान सिमितीच्या संदस्यांची संख्या २९२ झाली. समितीच्या ११ बैठका झाल्या. त्या १६५ दिवस चालल्या. समितीच्या १९ उपसमित्या जलद कामकाजाच्या दृष्टीनं कार्यरत होत्या. त्यात मसुदा समिती होती. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. या मसुदा समितीच्या ४४ सभा झाल्या.
७. आपल्या संविधानात किती परिशिष्टे आहेत?
- भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.
८. भारतीय संविधान कधी लागू करण्यात आलं?
-२६ जानेवारी, १९५० रोजीच भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला.
९. संविधानात कोणाचं हस्तलेखन आहे?
- भारताचे संविधान बनून तयार होत होते. पण संविधान हे हस्तलिखीत असावं अशी नेहरुंची इच्छा होती. बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले.
१०.संविधानाच्या पानांवर नक्षीकाम कोणी केलं?
-आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती. तसंच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे.
General Knowledge
▪️ कोणत्या राज्यात भारतातले पहिले ई-वेस्ट क्लिनिक उघडण्यात आले?
उत्तर : मध्यप्रदेश
▪️ कोणते राज्य शेतजमीन भाड्याने देण्याचे धोरण आखणारे पहिले राज्य ठरले?
उत्तर : उत्तराखंड
▪️ कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन’ पाळला जातो?
उत्तर : 24 जानेवारी
▪️ कोणत्या खेळाडूने मेटन चषक या स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले?
उत्तर : दिव्यांश सिंग पनवार
▪️ कोणत्या बँकेनी जानेवारी 2020 या महिन्यामध्ये ATM द्वारे ‘कार्डविरहित पैसे काढण्याची सुविधा कार्यरत केली?
उत्तर : ICICI बँक
▪️ बलॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असलेले ‘वज्र’ नावाचे देयक व्यासपीठ कुणी प्रस्तुत केले?
उत्तर : भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळ (NPCI)
▪️ भारतीय स्टेट बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणत्या व्यक्तीची नेमणूक झाली?
उत्तर : चल्ला श्रीनिवासुलु सेट्टी
▪️ ‘ग्रीनपीस इंडिया’च्या अहवालानुसार, भारतातले कोणते शहर सर्वात प्रदूषित आहे?
उत्तर : झारिया
▪️ मनमोहन सूद ह्यांचे निधन झाले. ते कोणत्या खेळाशी संबंधित होते?
उत्तर : क्रिकेट
▪️ कोणाच्या हस्ते 2020 या वर्षाच्या ‘प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले?
उत्तर : राम नाथ कोविंद
Q1) शांघाय सहकार्य संघटना (SCO) 2020 देशांच्या संरक्षण मंत्र्यांची वार्षिक बैठक कोठे नियोजित आहे?
-- मास्को ( रशिया )
Q2) कोणत्या व्यक्तीच्या नावाची शिफारस भारतीय स्टेट बँकेचे (SBI) नवे अध्यक्ष म्हणून बॅंक बोर्ड ब्युरो कडून करण्यात आली?
-- दिनेश कुमार खारा
Q3) भारतात ‘राष्ट्रीय क्रिडा दिन’ कोणाच्या जयंती निमित्त साजरा केला जातो?
-- मेजर ध्यानचंद ( 29 ऑगस्ट )
Q4) कोणत्या राज्य सरकारने ‘प्रतीक्षा’ नामक पहिली सागरी रुग्णवाहिका कार्यरत केली?
-- केरळ
Q5) राजीव गांधी खेळ रत्न क्रिडा पुरस्कारांची रक्कमेत किती वाढ करण्यात आली आहे?
-- 25 लक्ष रुपये ( अगोदर 7.5 लक्ष होती )
Q6) कोणत्या दिवशी तेलुगू भाषा दिन साजरा केला जातो?
-- 29 ऑगस्ट
Q7) कोणत्या कालावधीत ‘एरो इंडिया’ प्रदर्शनी आयोजित केली जाणार आहे?
-- 3 ते 5 फेब्रुवारी 2021
Q8) कोणत्या देशाने ‘झार बॉम्ब’ तयार केला?
-- रशिया
Q9) कोणत्या शहरातल्या बंदरावर प्लास्टिकचा कचरा हाताळण्यासाठी एक सुविधा ऑगस्ट 2020 या महिन्यात कार्यरत करण्यात आली?
-- कोची
Q10) कोणत्या देशात ‘2021 BRICS खेळ’ या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे?
-- भारत
“संविधान सभा आणि महिला”
🔸 ९ डिसेंबर १९४६ च्या पहिल्या बैठकीला १० महिला सदस्यांनी भाग घेतला होता.
🔸एकुण १५ महिला सदस्य संविधान सभेवर निवडल्या गेल्या. फाळणी नंतर ती संख्या १४ झाली मात्र पुन्हा “ऐनी मस्करीन” यांच्या रुपाने १५ झाली.
🔸 “बेगम रसुल” मुस्लिम लीग कडुन संविधान सभेवर गेल्या मात्र पहिल्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याने त्या हजर राहिल्या नाहीत.
🔸 फाळणी नंतर त्या संविधान सभेत हजर राहणाऱ्या एकमेव महिला सदस्य होत्या.
🔸 “ऐनी मस्करीन” या प्रांताचे प्रतिनिधी करणाऱ्या एकमेव महिला सदस्या होत्या. त्या “त्रावणकोर” प्रांताच्या सदस्य होत्या.
जगातील खनिज संपत्ती व उत्पादन करणार्या देशांबद्दल माहिती
🔴 खनिज संपत्ती उत्पादन करणारे देश
✔️कोळसा दगडी(उत्पादन):- चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन
✔️ कोळसा दगडी(वापर करणारे):- चीन, अमेरिका, भारत, रशिया.
✔️अभ्रक:- भारत, द.आफ्रिका, घाना.
✔️ करोमियस:-द.आफ्रिका, रशिया, र्होडेशिया, फिलिपाईन्स.
✔️जस्त:- अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पेरु.
✔️टिन:- मलेशिया, जर्मनी, चीन, बोलीव्हीया, रशिया, बेल्जियम.
✔️टगस्टन:- चीन, द.कोरिया, रशिया.
✔️तांबे:- अमेरिका, झाम्बिया, चिली, झाईरे, भारत.
✔️तल, खनिज:- रशिया, कुवेत, अमेरिका, इरान, सौदी अरेबिया, इराक, कतार.
✔️निकेल:- कॅनडा, अमेरिका, न्यू कॅलिडोंनिया.
✔️बॉक्साईट:- ऑस्ट्रेलिया, जमैका, गिनी, फ्रांस, भारत.
✔️सोने:- द.आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.
✔️यरेनियम:- द.आफ्रिका, झायरे, कॅनडा, भारत.
✔️पारा:- इटली, स्पेन, अमेरिका.
✔️मगल (मॅगनीज):- रशिया, द.आफ्रिका, ब्राझिल.
✔️ लोहखनिज(साठे):- अमेरिका, कॅनडा, ब्राझिल, भारत, रशिया.
✔️लोहखनिज (उत्पादन):- रशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका.
✔️ शिसे:- ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, स्पेन, रशिया.
73 वी घटनादुरूस्ती
🔰 कलम 243-व्याख्या :
कलम 243 A -ग्रामसभे विषयी:--
कलम 243 B -पंचायती च्या स्थापणे विषयी :--
कलम 243 C -पंचायतीची रचना :--
कलम 243 D -आरक्षणाची तरतूद :--
कलम 243 E -पंचायतीचा कालावधी :--
कलम 243 F -सदस्यांची अपात्रता :--
कलम 243 G -पंचायतीच्या आधिकार व जबाबदार्या :--
कलम 243 H -पंचायतीचा निधि व कर लावण्याचा आधिकार :--
कलम 243 I --वित्तआयोग स्थापन :--
कलम 243 J --पंचायतीच्या लेख्यांचे लेक परीक्षण :--
कलम 243 K--पंचायतीच्या निवडणुका :-
कलम 243 L - 73 वी घटनादुरुस्ती संघ राज्यक्षेत्राला लागू असणे.
कलम 243 M - ठराविक क्षेत्राला 73 वी घटनादुरूस्ती लागू नसणे,
कलम 243 N - पंचायती सबंधी विद्यमान कायदा व तरतुदी चालू ठेवण्यासविषयी.
कलम 243 O - पंचायत निवडनुकात कोर्टाच्या हस्तक्षेपास प्रतिबंध.
५२व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. १९८५ साली पक्षांतरबंदी कायदा करण्यात आला.
◾️यामध्ये लोकसभा व राज्य विधीमंडळातील सदस्यांना पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरविण्याची तरतूद करण्यात आली आहे.
◾️तसेच यासंदर्भात विस्तृत असे १०वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले आहे.
◾️पक्षांतरबंदी कायद्याचा प्रमुख हेतू पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सदस्याने पक्षातच राहिले पाहिजे आणि पक्षाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे हा होता.
◾️या कायद्यान्वये एखाद्या सभागृहाच्या स्वतंत्र निवडून आलेल्या सदस्याने जर अशा निवडणुकीनंतर कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो गृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो.
◾️तसेच सभागृहात पदग्रहण केल्यानंतर सहा महिन्यंच्या कालावधीनंतर जर नामनिर्देशित सदस्याने कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो त्या सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो.
◾️ तया सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार सभागृहाचा अध्यक्ष/सभापती यांना आहे.
‼️ पण २/३ पेक्षा जास्त सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही.
टोपण नावे - कवी / साहित्यिक
1) यशवंत - यशवंत दिनकर पेंढारकर
2) मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर
3) रामदास - नारायण सुर्याजीपंत ठोसर
4) दत्त - दत्तात्रय कोंडो घाटे
5) आरती प्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर
6) बी - नारायण मुरलीधर गुप्ते
7) लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख
8) दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे
9) माधव ज्युलियन - माधव त्र्यंबक पटवर्धन
10) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर
गलोबल इनोव्हेशन इंडेक्स 2020’मध्ये भारत 48 व्या क्रमांकावर.
🌑भारताने जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या (WIPO) ‘ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2020’मध्ये 48 वा क्रमांक मिळवलेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चार स्थानांची सुधारणा करत भारताने 48 वा क्रमांक मिळवला आहे.
🌷इतर ठळक बाबी....
🌑मध्य आणि दक्षिण आशियायी देशात भारत पहिल्या क्रमांकावर आहे.
🌑गरीब देशांमध्ये भारत जगातला तिसऱ्या क्रमांकाची नाविन्यपूर्ण अर्थव्यवस्था आहे.स्वित्झर्लंड हा देश GII 2020 याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. स्वीडन द्वितीय तर अमेरिका हा देश तृतीय क्रमांकावर आहे.
🌑भारताने सर्व घटकात सुधारणा केली आहे. माहिती तंत्रज्ञान सेवा, सरकारी ऑनलाइन सेवा, विज्ञान, अभियांत्रिकी याबाबत भारताने चांगली कामगिरी केली आहे.
इज ऑफ दोईंग बिझनेस 2020 निर्देशांक
🔶14 ऑक्टोबर 2019 रोजी 190 देशाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करून हा अहवाल जाहीर करण्यात आला.
🔶जगातील 190 देशांची पैकी भारताचा कितवा क्रमांक लागतो भारताचे मूल्य 71.0 टक्के इतकी आहे.
🔰परमुख पाच देश
1)न्यूझीलंड
2)सिंगापूर
3)हॉंगकॉंग
4)डेनमार्क
5)साऊथ कोरिया
🔰शवटचे पाच देश
186)लिबिया
187)येमेन
188)वेनेझुईला
189)इरिट्रिया
190) सोमालिया.
राज्यघटना : समिती व अध्यक्ष
💁♂ भारतीय संविधान हे जगातील सर्वांत मोठे लिखित स्वरूपाचे संविधान मानले जाते. संविधानाच्या निर्मितीसाठी स्थापन झालेल्या घटना समित्या आणि त्यांचे अध्यक्ष कोण यांविषयी जाणून घेऊयात...
🧐 अध्यक्ष व समिती :
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर : अध्यक्ष, मसुदा समिती (घटनेचे शिल्पकार)
▪️ डॉ. राजेंद्र प्रसाद : अध्यक्ष, घटना समिती व सुकाणू समिती
▪️ डॉ. सच्चिदानंद सिन्हा : हंगामी अध्यक्ष, घटना समिती
▪️ हरेंद्रकुमार मुकर्जी : उपाध्यक्ष, घटना समिती व सुकाणू समिती
▪️ बी. एन. राऊ : कायदेशीर सल्लागार, घटना समिती
▪️ पडीत नेहरू : अध्यक्ष, केंद्र अधिकार समिती
▪️ सरदार पटेल : अध्यक्ष, राज्य अधिकार समिती, मूलभूत हक्क समिती
नोबेलचे भारतीय मानकरी
◾️१९१३ रवींद्रनाथ टागोर – साहित्य
◾️१९३० चंद्रशेखर व्यंकट रमण- भौतिकशास्त्र
◾️१९६९- हरगोविंद खुराणा- वैद्यकशास्त्र
◾️१९७९- मदर तेरेसा – शांतता
◾️१९८३- सुब्रमण्यम चंद्रशेखर भौतिकशास्त्र
◾️१९९८ अमर्त्य सेन – अर्थशास्त्र
◾️२००९ व्यंकटरमण रामकृष्णन- रसायनशास्त्र
◾️ २०१४- कैलाश सत्यार्थी – शांतता
◾️ २०१९ – अभिजित बॅनर्जी- अर्थशास्त्र
जेव्हा तुम्ही बरीच पुस्तके वाचता तेव्हा काय होते?
भिकाऱ्यात पण माणुस दिसायला लागतो.
चोरामध्ये चोरी करण्याचे कारण दिसायला लागते.
प्रेम आणि वासणा यातला फरक कळायला लागतो.
एखाद्याची चुक झाल्यावर त्याला माफ करण्याची ताकद येते.
कोणत्या ठिकाणी बोलावे आणि कुठे बोलु नये हे कळते.
चाकु, बंदुक यांच्यापेक्षा शब्द जास्त तीक्ष्ण असतात हे समजते.
आई वडीलांची किंमत कळायला लागते.
ब्रेकअप, घटस्फोट, जवळच्या व्यक्तीचे मरण…. या गोष्टी म्हणजे पुर्ण जीवन संपले हा गैरसमज दुर होतो. या गोष्टी पण इतर गोष्टी सारख्याच सामान्य वाटायला लागतात.
प्राण्यांबद्दल आपुलकी वाटायला लागते.
सोशल मिडिया वर हासऱ्या चेहऱ्याचे फोटोज् टाकुण खुश आहेत असं दाखवणारे लोक खऱ्या आयुष्यात किती दुःखी आहेत हे समजते.
कलाकार चित्रपटात नाटक/काम करतात. खऱ्या आयुष्यात पण खुप नाटकं करणारी कलाकार आपल्या जवळ असतात हे पण समजते.
या जगात १% चागली लोक आहेत आणि १% वाईट लोक आहेत .राहीलेले आपण सर्व फक्त अनुयायी आहोत, काहीजण चांगल्या लोकांचे अनुकरण करून चांगले होतात तर काहीजण वाईट लोकांचे अनुकरण करून वाईट होतात, हे पण समजते.
प्रोत्साहनामुळे हरलेला व्यक्ति जिंकु शकतो, हे पण समजायला लागते.
हारल्यावर किंवा नापास झाल्यावर आत्महत्येचा विचार पण मनात येत नाही.
करोडोची संपत्ती असणाऱ्या मध्ये गरिब तसेच दिवसाचे २००/- कमवणाऱ्यामध्ये श्रीमंत दिसायला लागतो.
जगातील 5 सर्वात श्रीमंत व्यक्ती
1] जेफ बेझॉस
👉(अमझोन)
2] बर्नार्ड अरनॉल्ट
👉( एलवीएमएम)
3] बिल गेट्स
👉( मायक्रोसॉफ्ट )
4] वॉरेन बफे
👉(बर्कशायर हॅथवे)
5)मार्क झकरबर्क
👉(फेसबूक)
परमुख व्यक्तींची प्रचलित नावे
*🔸 हिंदू नेपोलियन -- स्वामी विवेकानंद*
*🔹 मन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री*
*🔸 कद-ए-आजम -- बॅ. जीना
*🔹 शहीद-ए-आलम -- भगतसिंग
*🔸 लोकनायक -- बापूजी अणे
*🔹 भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू
*🔸 गान कोकिळा -- लता मंगेशकर
*🔹 आध्र केसरी -- थंगबालू प्रकाशम्
*🔸 गरिबांचे कैवारी -- के. कामराज
*🔹 परियदर्शनी -- इंदिरा गांधी
*🔸 दशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद
*🔹 भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल
*🔸 पजाबचा सिंह -- राजा रणजितसिंग
*🔹 विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियाणी
*🔸 विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर
*🔹 समर सौदामिनी -- अरुणा आसफअली
*🔸 भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी
*🔹 शांतीदूत -- पंडित नेहरू
भौतिक राशी व त्यांची परिमाणे/एकके :
क्र.भौतिक राशीपरिमाणे/एकक
1.विद्युतरोध-ओहम
2.विद्युतधारा-कुलोम
3.विद्युतभार-होल्ट
4.विद्युत ऊर्जा-ज्युल
5.वेग-m/s
6.त्वरण-m/s2
7.संवेग-kg/ms
8.कार्य-ज्यूल
9.शक्ती -ज्यूल/सेकंद
10.बल-Newton
11.घनता-kg/m3
12.दाब-पास्कल
____________________________
पंचवार्षिक योजना
◾️ 1 एप्रिल 1951 पासून भारतात आर्थिक आर्थिक नियोजनास सुरवात झाली.
◾️ही पध्दती भारताने रशियाकडून स्वीकारली आहे. तेव्हा पासून 11 योजना पूर्ण झाल्या असून 12 वी योजना चालू आहे.
◾️7 वार्षिक योजनाही भारतात राबविल्या गेल्या त्यातील 1966-69 च्या कालावधीत योजनेला सुट्टी (Plan Holiday) असे म्हणतात.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
➡️ पहिली पंचवार्षिक योजना ⬅️
👉 कालावधी: इ.स. १९५१ - इ.स. १९५६
👉 अध्यक्ष: पं.जवाहरलाल नेहरु.
👉 अग्रक्रम:
कृषी पहिल्या योजना काळात सार्वजनिक क्षेत्रात २०६९ कोटी रु. खर्च करण्याचे ठरविले , तरी प्रत्यक्षात मात्र १९६० कोटी रु. दुसऱ्या महायुद्धाचे झालेले परिणाम व नुकत्याच झालेल्या फाळणीमुळे मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली
●प्रकल्प :•
👉 १. दामोदर खोरे विकास योजना (झारखंड-पश्चिम बंगाल)
👉 २. भाक्रा-नानगल प्रकल्प (सतलज नदीवर,हिमाचल प्रदेश-पंजाब)
👉 ३. कोसी प्रकल्प (कोसी नदी बिहार) 👉 ४. हिराकूड योजना (महानदीवर ओरिसा)
👉 ५. सिंद्री (झारखंड) खत कारखाना
👉 ६. चित्तरंजन (पश्चिम बंगाल) येथे रेल्वे इंजिनचा कारखाना.
👉 ७. पेरांबुर (तामिळनाडू) येथे रेल्वे डब्यांचा कारखाना.
👉 ८. HMT- बँगलोर ९. हिंदुस्थान एंटीबायोटिक
_________________________________
आफ्रिका पोलिओमुक्त झाला: जागतिक आरोग्य संघटना
आफ्रिका खंडातून पोलिओ हद्दपार झाला आहे. आफ्रिका खंड पोलिओमु्क्त झाला असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेकडून 25 ऑगस्ट 2020 रोजी करण्यात आली. आफ्रिका खंडात नायजेरिया हा शेवटचा देशही पोलिओमु्क्त जाहीर करण्यात आला.
📚 इतर ठळक बाबी :
जगात आता फक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये पोलिओ आढळला जात आहे.
भारताला 2011 साली पोलिओमुक्त देश जाहीर करण्यात आले होते.
जागतिक आरोग्य संघटना (WHO), संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) आणि रोटरी इंटरनॅशनल या संस्था जगभरात पोलिओ निर्मूलन कार्यक्रम राबवितात.
📚 पोलिओ :
पोलिओ (शास्त्रीय नाव: पोलिओमायलिटिस) हा विषाणूंमुळे बालकांना होणारा आणि अपंग करणारा संसर्गजन्य रोग आहे. पोलिओ या आजारास लहान मुलांचा पक्षाघात म्हणून ओळखले जाते. संसर्गजन्य असा हा आजार मध्यवर्ती चेता संस्थेवर परिणाम करतो.
पोलिओच्या विषाणूचे तीन प्रकार हे ’RNA‘ वर्गीय असून, त्यांची नावे ब्रुनहिल्ड, लॅन्सिंग आणि लिऑन अशी आहेत. ब्रुनहिल्डमुळे अर्धांगवायू होतो. लॅन्सिंग आणि लिऑन मज्जारज्जूच्या पेशींवर हल्ला करतात.
पिटसबर्ग युनिव्हर्सिटीचे प्रो. जोनास सॉल्क यांनी 1951 साली पोलिओचे विषाणू शोधले आणि त्यांच्यापासून लस तयार केली.
पोलिओला प्रतिबंध करणाऱ्या दोन लस – 1) सॅबिन लस ही तोंडाने घेण्याची पोलिओप्रतिबंधक लस आहे. 2) साल्क लस ही मृत पोलिओ विषाणूपासून बनविलेली आहे. त्वचेखाली तीन इंजेक्शन्सच्या स्वरूपात ही लस द्यावी लागते.
📚 आफ्रिका खंड :
आफ्रिका हा आकाराने आणि लोकसंख्येने आशियानंतर क्रमांक दोनचा भौगोलिक खंड (एकूण क्षेत्रफळ: 3.02 कोटी चौ. किलोमीटर) आहे. हा खंड पृथ्वीचा 6% पृष्ठभाग व्यापतो. मादागास्कर आणि इतर बेटांचे समुह मिळून खंडात एकूण 56 सार्वभौम देश आणि दोन मान्यता नसलेले देश आहेत.
आफ्रिकेच्या उत्तरेला भूमध्य समुद्र, ईशान्येला सुएझ कालवा, लाल समुद्र आणि सिनाई बेटे आहेत. आग्नेयला हिंदी महासागर आणि पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना पसरलेला हा खंड आहे. उत्तर आणि दक्षिण दोन्ही उष्ण कटिबंध सामावणारा आफ्रिका हा एकमेव खंड आहे.
मध्यप्रदेश नव्या राष्ट्रीय भरती संस्थेच्या परीक्षेमार्फत नोकरी देणारा पहिला राज्य असणार
🔸नव्या राष्ट्रीय भरती संस्था (NRA) मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत मिळणाऱ्या गुणांच्या आधारावर सरकारी नोकरी देण्याची घोषणा मध्यप्रदेश सरकारने केली आहे. असा निर्णय घेणारा हा देशातला पहिला राज्य ठरला.
पार्श्वभूमी
🔸कद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय भरती संस्था (NRA) याची स्थापना करण्याला मान्यता दिली आहे. केंद्र सरकारमधले सचिव दर्जाचे अधिकारी संस्थेचे अध्यक्ष असणार. सरकारी आणि सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातल्या अराजपत्रित पदांसाठी NRA मार्फत एक सामाईक पात्रता परीक्षा घेतली जाणार.
🔸दरवर्षी साधारणपणे, 1.25 लक्ष सरकारी नोकऱ्यांसाठी 2.5 कोटी इच्छुक उमेदवार विविध परीक्षा देतात. मात्र, आता एकाच सामाईक पात्रता परीक्षेमुळे या उमेदवारांना एकदाच ही पात्रता परीक्षा द्यावी लागणार आणि ती उत्तीर्ण झाल्यावर त्यानंतर ते यापैकी कोणत्याही एका भरती समितिकडे किंवा एकाच वेळी विविध समित्यांकडे उच्चस्तरीय परीक्षा देण्यासाठी अर्ज सादर करु शकणार.
परीक्षेची ठळक वैशिष्ट्ये
🔸सामाईक पात्रता परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाणार.
🔸पदवी, 12 वी उत्तीर्ण आणि दहावी उत्तीर्ण अशा पातळ्यांसाठी वेगवेगळ्या सामाईक पात्रता परीक्षा असणार, जेणेकरुन विविध पातळ्यांवर वेगवेगळी भरती प्रक्रिया करता येणार.
🔸सामाईक पात्रता परीक्षा प्रमुख 12 भारतीय भाषांमध्ये घेतली जाणार.
COVID -19 साठी वेगवेगळ्या राज्याच्या योजना ऍप..
🦠 कोरोना कवच -- भारत सरकार
🦠 बरेक द चेन -- केरल
🦠ऑपरेशन शील्ड -- दिल्ली सरकार
🦠 नाड़ी एप्प -- पुंदुचेरी
🦠 रक्षा सर्व -- छत्तीसगढ़ पुलिस
🦠 i GOT -- भारत सरकार
🦠 कोरोना केअर-- फोनपे
🦠 परज्ञम अॅप --- झारखण्ड
🦠 कोविडकेअर अँप -- अरुणाचल प्रदेश
🦠 कोरोना सहायता अँप -- बिहार
🦠 आरोग्य सेतु -- भारत सरकार
🦠 समाधान -- HRD मिनिस्ट्री
🦠 5T --- दिल्ली
🦠 कॉरेन्टाइन अँप -- IIT
🦠 करुणा अँप --- सिविल सर्विस एसोसिएशन
🦠 V-सेफ टनल -- तेलंगाना
🦠 लाइफलाइन UDAN-- सिविल एविएशन मिनिस्ट्री
🦠 Vera's कोविड 19 मॉनिटरिंग सिस्टम -- तेलंगाना
🦠 सल्फ deceleration अॅप--नागालैंड
🦠 ऑपरेशन नमस्ते -- इंडियन आर्मी
🦠 कोरोना वाच अँप -- कर्नाटक
🦠 नमस्ते ओवर हैंडशेक-- कर्नाटक
🦠 मो जीवन -- ओडिशा
🦠 टीम 11-- उत्तर प्रदेश
🦠 फीफा CAMPAIGN-- सुनील क्षेत्री
भारत सरकारच्या केंद्रीय योजना
1) स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया
▪️परारंभ - १६ जानेवारी २०१६
▪️उद्देश - या योजनेअंतर्गत नवउद्योजकांना त्यांचा व्यवसाय [स्टार्ट अप ] सुरु करण्यासाठी साहाय्य केले जाते.
__________
2) दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना [DDUGKY]
▪️परारंभ - २५ सप्टेंबर २०१४
▪️योजनेचा उद्देश - ग्रामीण युवकांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित करणे आहे.
__________
3) प्रसाद [Piligrimage Rejuvenation and Spiritual Augmentation Drive]
▪️परारंभ - ९ मार्च २०१५
▪️योजनेचा उद्देश - या योजनेअंतर्गत अमृतसर, अजमेर, अमरावती, द्वारका, गया, कांचीपुरम, केदारनाथ, कामाख्य, मथुरा, पुरी, वाराणसी, वेल्लकनी, या तीर्थक्षेत्रामध्ये जागतिक दर्जाच्या पर्यटनासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत.
__________
4) उडाण योजना
▪️परारंभ - १४ नोव्हेंबर २०१४
▪️योजनेचा उद्देश - या योजनेअंतर्गत उच्च तांत्रिक शिक्षणासाठी मुलींना प्रोत्साहन दिले जाते.
__________
5) प्रधानमंत्री उज्वला योजना
▪️परारंभ - १४ नोव्हेंबर २०१४
▪️योजनेचा उद्देश - या योजनेअंतर्गत दारिद्ररेषेखालील ५ कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जात आहे.
__________
6) नमामि गंगे प्रकल्प
▪️परारंभ - १० जुलै २०१४
▪️उद्देश - गंगा नदीचे शुद्धीकरण, संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.
__________
7) सेतू भारतम प्रकल्प
▪️परारंभ - ४ मार्च २०१६
▪️उद्देश - रेल्वे क्रॉसिंगपासून सर्व राष्ट्रीय महामार्ग मुक्त करण्यासाठी आणि २०१९ राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या पुलांच्या दुरुस्तीसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. यासाठी ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल.
राजर्षि शाहू महाराज
जन्म – 16 जुलै 1874.
मृत्यू – 6 मे 1922.
एप्रिल 1919 भारतात बहुजन समाजाच्या उद्धराचे कार्य करणार्या कुर्मी क्षत्रिय महासभा या संस्थेच्या कानपूर येथे भरलेल्या 13 व्या अधिवेशनात महाराजांना ‘राजर्षी’ ही पदवी बहाल करण्यात आली.
महाराष्ट्रात त्यांच्या शेतकर्यांचा खरा राजा म्हणून गौरव केला गेला.
भारतातील वसतिगृहांचे आद्य जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो.
🔰 सस्थात्मक योगदान 🔰
ग्रामीण भागातून शहरी भागात शिकण्यास येणार्या विविध जातीधर्माच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जातीची वस्तीगृहे स्थापन केली.
📌 1901 – मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना (कोल्हापूर).
📌 नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वस्तीगृह उभारले.
📌 1902 – राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवेमध्ये 5% राखीव जागा.
📌 15 नोव्हेंबर 1906 – किंग एडवर्ड मोहमेडण एज्यु. सोसा. स्थापना.
📌 1907 – मिस क्लार्क बोर्डिंग हाऊस ची स्थापना.
📌 1911 – जाहीरनामा काढून 15% विद्यार्थ्यांना नादरी देण्याची घोषणा.
📌 1911 – शिक्षक प्रशिक्षण व शिक्षकांसाठी मेरीट प्रमोशन योजना.
📌 1917 – माध्यमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.
📌 14 फेब्रुवारी 1919 – पाटील शाळा व त्याला जोडून तलाठी वर्ग सुरू केले.
📌 लष्करी शिक्षणासाठी इन्फंन्ट्री स्कूल.
पुणे येथे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल.
📌 जयसिंगराव घाटके टेक्निकल इन्स्टिट्यूड स्थापना.
📌 1894 – बहुजन समाजातून तलाठयांच्या नेमणुका.
📌 1917 – विधवा विवाहाचा कायदा.
📌 1918 – आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा.
चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे
Q1) आंतरराष्ट्रीय कसोटी क्रमवारीत भारताच्या कोणत्या खेळाडूने प्रथम स्थान मिळवले आहे?
---- विराट कोहली
Q2) पैठण (औरंगाबाद) येथे कोणत्या व्यक्तीच्या नावाने संतपीठ तयार होणार आहे?
----- संत एकनाथ
Q3) प्रधानमंत्री मातृ वंदना योजना योजना संपूर्ण देशात कोणत्या मंत्रालयाने लागू केली आहे?
------ महिला व बालविकास मंत्रालय
Q4) हरिशश्चंद्र बर्नवाल यांच्या पुस्तकाचे नाव काय?
---- "लोर्ड्स ऑफ रेकॉड्स
Q5) शाश्वत विकास निर्देशांक नुसार भारतातील प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे?
------ केरळ
Q6) भारतीय स्टेट बँक ने नुकतीच कोणती नवीन योजना सुरू केली?
------ नवीन वर्षात 'ओटीपी' आधारित एटीएम व्यवहार
Q7) जॉर्ज वॉशिंग्टन काव्र्हर पुरस्कार 2020 कोणत्या भारतीय व्यक्तीला देण्यात आला आहे?
--------- डॉ प्रमोद चौधरी
Q8) भारत आणि म्यानमार हे दोन्ही देश दहशतवाद विरोधी कोणते ऑपरेशन राबवत आहे?
------ ऑपरेशन सनराईज-2
Q9) भारत सरकारने जारी केलेल्या आरोग्य व निरोगीकरण च्या संचालनामध्ये राज्याच्या ताज्या नामांकन मध्ये प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे?
------ पंजाब
Q10) नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसने शिक्षणसंदर्भात रिपोट जारी केला असून या मध्ये साक्षरतेमध्ये महाराष्ट्र चा क्रमांक कितवा आहे?
------ पाचवा
Q1) ‘न्यू स्टार्ट’ हा अमेरिका आणि _ या देशांच्या दरम्यान झालेला एक करार आहे.
---------- रशिया
Q2) “मेडिकानेस” ही संज्ञा कश्यासंदर्भात आहे?
----------- उष्णकटिबंधीय चक्रीवादळ
Q3) 'काकातीया राजवंश’ची जागा कोणत्या कुळाने घेतली?
-------- पाश्चात्य चालुक्य
Q4) कोणत्या राज्यात भारतातले दुसरे रॉकेट लॉंच पोर्ट तयार केले जाणार आहे?
----------- तामिळनाडू
Q5) कोणत्या शहारातल्या संस्थेला ‘भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदे (दुरुस्ती) विधेयक-2020’ मार्फत राष्ट्रीय महत्त्व असलेली संस्था म्हणून घोषित करण्यात आले नाही?
---------- बोधागया
Q6) “न्यूट्रिनो” हे काय आहे?
-------- अणु कण
Q7) कोणत्या दिवशी “जागतिक गेंडा दिन” साजरा केला जातो?
------- 22 सप्टेंबर
Q8) कोणत्या संस्थेनी ‘अभ्यास’ नामक हाय-स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट (HEAT) वाहन तयार केले?
--------- एरोनॉटिकल डेव्हलपमेंट ईस्टॅब्लिशमेंट
Q9) 2024 साली चंद्रावर पहिली महिला उतरविण्यासाठी NASA संस्थेनी आखलेल्या मोहिमेचे नाव काय आहे?
-------- आर्टेमिस
Q10) “क्वीन्स कौंसेल” याचा अर्थ काय होतो?
-------- वकील
तामिळनाडूमध्ये भारतातली न्यूट्रिनो वेधशाळा उभारली जाणार
तामिळनाडू राज्याच्या थाटी जिल्ह्यात बोडी वेस्ट हिल्सच्या परिसरात भारतातली न्यूट्रिनो वेधशाळा उभारली जाणार आहे.
ठळक बाबी
तिथे पृथ्वीच्या वातावरणात तयार होणाऱ्या न्यूट्रिनो कणांचे निरीक्षण केले जाणार. त्याद्वारे न्यूट्रिनो कणांच्या गुणधर्मांबद्दल अधिक माहिती गोळा केली जाणार.
‘न्यूट्रिनो डिटेक्टर’ हे एक ‘मॅग्नेटाईज्ड आयर्न कॅलोरीमीटर’ उपकरण असते. कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतात सर्वाधिक वजनी उपकरण तयार केले जाणार आहे.
प्रकल्पाला अणुऊर्जा विभाग आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभाग वित्तपूरवठा करणार आहेत.
न्यूट्रिनो म्हणजे काय?
न्यूट्रिनो हे ब्रह्मांड तयार करणारे आकाराने सर्वात छोटे कण असतात. न्यूट्रिनो नावाप्रमाणेच विद्युतदृष्ट्या तटस्थ असतात आणि त्याचे वस्तुमान इतर कोणत्याही ज्ञात कणांपेक्षा शून्यसमान अगदीच कमी असते.
सूर्य आणि पृथ्वीचे वातावरण ही न्यूट्रिनो कणांचे मुख्य स्रोत आहेत.
न्यूट्रिनो वेधशाळा कॅनडा, जापान आणि इटली या देशांमध्ये जमिनीखाली तर अंटार्क्टिका व फ्रान्स या देशांमध्ये समुद्राखाली आहेत.
राज्य मानवी हक्क आयोगाची रचना.
🔶राज्य सरकार, राज्य आयोगाकडे सोपविण्यात आलेल्या अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करील.
🔶राज्य मानवी हक्क आयोगामध्ये-🔶
अध्यक्ष - उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश
एक सदस्य - उच्च न्यायालयाचा विद्यमान किंवा माजी न्यायाधीश किंवा किमान 7 वर्षे अनुभव असलेला जिल्हा न्यायाधीश
एक-दोन सदस्य - मानवी हक्कांसंबंधी ज्ञान किंवा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या व्यक्ति
सचिव हा आयोगाचा मुख्य कार्यकारी अधिकारी असेल.
राज्य आयोगाचे मुख्यालय राज्यशासन विनिर्दिष्ट करेल अशा ठिकाणी असेल.
🔶राज्य आयोगाच्या अध्यक्षांची व सदस्यांच्या नेमणुका:
अध्यक्षांची नेमणूक राज्यपाल पुढील समितीच्या शिफारशिनुसार करतील.
🔶समितीची रचना -
मुख्यमंत्री- सभाध्यक्ष
विधान मंडळाचा अध्यक्ष - सदस्य
त्या राज्याच्या गृहविकासाचा प्रभारी मंत्री -
विधानसभेतील विरोधी पक्षनेता - सदस्य
ज्या राज्यात विधानपरिषद असेल त्या ठिकाणी त्याचा सभापती व विरोधी पक्षनेता - सदस्य
🔶राज्य आयोगाच्या सभाध्यक्षांची किंवा सदस्यांची नोंदणी आणि त्यांना पदावरून दूर करणे:🔶
🔶राज्य आयोगाचा अध्यक्ष किंवा सदस्य राज्यपालांना उद्देशून त्याच्या पदाचा राजीनामा देवू शकेल.
🔶तसेच अध्यक्ष किंवा सदस्यास पुढील कारणावरून पदावरून दूर करता येईल .
अभिनिर्णीत नादार असेल; किंवा -
त्याने लाभाचे पद धारण केले आहे ; किंवा
मानसिक किंवा शारीरिक अस्वास्थ्य ; किंवा
राष्ट्रपतींच्या मते नैतिक अध : पतनाचा अंतर्भाव आहे अशा अपराधासाठी दोषी ठरविलेली व्यक्ती.
🔶राज्य आयोगाच्या अध्यक्षाचा आणि सदस्याचा पदावधी:
अध्यक्षांचा कार्यकाल - 5 वर्षे किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत.
पुनर्नियुक्ति होवू शकते.
१ ते १०० संख्यांच्या बेरजा
(१) १ ते १० पर्यंत संख्यांची बेरीज -
१+२+३+४+५+६+७+८+९+१०=५५
(२) ११ ते २०पर्यंत संख्यांची बेरीज -
११+१२+१३+१४+१५+१६+१७+
१८+१९+२० = १५५
(३) २१ ते ३० पर्यंत संख्यांची बेरीज -
२१+२२+२३+२४+२५+२६+२७+
२८+२९+३० = २५५
(४) ३१ ते ४० पर्यंत संख्यांची बेरीज -
३१+३२+३३+३४+३५+३६+३७+
३८+३९+४० = ३५५
(५) ४१ ते ५० पर्यंत संख्यांची बेरीज -
४१+४२+४३+४४+४५+४६+४७+
४८+४९+५० = ४५५
(६) ५१ ते ६० पर्यंत संख्यांची बेरीज -
५१+५२+५३+५४+५५+५६+५७+
५८+५९+६० = ५५५
(७) ६१ ते ७० पर्यंत संख्यांची बेरीज -
६१+६२+६३+६४+६५+६६+६७+
६८+६९+७० = ६५५
(८) ७१ ते ८० पर्यंत संख्यांची बेरीज -
७१+७२+७३+७४+७५+७६+७७+
७८+७९+८० = ७५५
(९) ८१ ते ९० पर्यंत संख्यांची बेरीज -
८१+८२+८३+८४+८५+८६+८७+
८८+८९+९० = ८५५
(१०) ९१ ते १०० पर्यंत संख्यांची बेरीज -
९१+९२+९३+९४+९५+९६+९७+
९८+९९+१०० = ९५५
Latest post
Mpsc pre exam samples questions
1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे? A. ...
-
१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...
-
MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम पेपर- १ (गुण २०० - कालावधी २ तास) 1.राज्य ,राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्त्व...
-
✏️ मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता ? 👉 Gluteus Maximus ( मांडीमध्ये ) ✏️ मानवी हृदयाचे वजन सामान्यता किती असते ? 👉 360 ग्रॅम...