२७ जुलै २०२०

केरळ, कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात आयसीसचे दहशतवादी : संयुक्त राष्ट्र अहवाल

💠केरळ आणि कर्नाटकमध्ये आयसीसच्या दहशतवाद्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असू शकते, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात देण्यात आला आहे. तसंच भारतीय उपखंडात अल कायदा ही दहशतवादी संघटना हल्ल्याचा कट रचत आहे. तसंच या क्षेत्रात भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमारचे १५० ते २०० दहशतवादी असल्याचंही त्यात नमूद करण्यात आलं आहे. पीटीआयनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

💠'अॅनालिटिकल सपोर्ट अँड सँक्शन्स मॉनिटरिंग टीम'चा २६ वा अहवाल प्रकाशित करण्यात आला. भारतीय उपखंडात अल-कायदा (क्यूआयएस) तालिबानच्या मदतीनं निमरूज, हेलमंद आणि कंधारमधून आपल्या कारवाया करत असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. "या संघटनेत भारत, बांगलादेश, पाकिस्तान आणि म्यानमारमधील १०० ते १५० दहशतवादी आहेत. क्यूआयएसचा म्होरक्या हा ओसामा महमूद आहे. त्यानं आसिम उमर याची जागा घेतली आहे. तसंच तो आसिम उमारच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठीही कट रचत आहे," असंही अहवालात नमूद केलं आहे.

💠"१० मे २०१९ रोजी जाहीर करण्यात आलेल्या आयएसआयएलचे (हिंद विलय) १८० ते २०० सदस्य आहेत, असं एका सभासद देशाकडून सांगण्यात आलं. केरळ आणि कर्नाटकमध्ये आयएसआयएलच्या दहशतवाद्यांची मोठी संख्या आहे," असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात आयसीसनं भारतात नवा प्रांत स्थापित करण्याचा दावा केला होता. तसंच काश्मीरमधील दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीनंतर ही संघटनेनं ही घोषणा केली होती.

💠यापूर्वी या दशतवादी संघटनेनं आपल्या नव्या शाखेचं नाव अरबी नाव 'विलायह ऑफ हिंद' असल्याचं अमाक या वृत्तसंस्थेद्वारे सांगितलं होतं. परंतु जम्मू काश्मीरच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं हा दावा फेटाळला होता. यापूर्वी, काश्मीरमध्ये आयसीसचे हल्ले त्याच्या तथाकथित खोरासन प्रांत शाखेशी जोडले गेले होते. ज्याची स्थापना २०१५ मध्ये करण्यात आली होती आणि अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि आसपासच्या प्रदेश हे त्यांचं लक्ष्य होतं.

तंबाखुजन्य उत्पादनाच्या पाकिटांवर आरोग्यविषयक नवीन वैधानिक चेतावणी इशारा


✨भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने तंबाखुजन्यउत्पादनाच्या पाकिटांवर आरोग्यविषयक नवीन वैधानिक चेतावणी इशारा 23 जुलै 2020 रोजी अधिसूचित करण्यात आला. 

✨यासाठी सिगरेट आणि इतर तंबाखुजन्य उत्पादनाच्या (पॅकिंग आणि लेबलिंग) नियमामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. 

✨यानुसार 2008 च्या नियमांमध्ये जीएसआर 248 (ई) मध्ये  21 जुलै, 2020 अनुसार बदल करण्यात येणार आहेत. 

✨या बदलानुसार 1 डिसेंबर, 2020 पासून नवीन नियम लागू करण्यात येणारआहेत. 

✨19 भाषांमध्ये पाकिटावर छापण्यासाठी इशारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

✨नवीन केलेल्या नियमाविषयी माहिती खालील प्रमाणे  -

✨सिगरेट आणि कोणत्याही तंबाखूजन्य उत्पादनाची निर्मिती करणारे, पुरवठादार, आयात करणारे किंवा या मालाच्या वितरकांनी नवीन निर्दिष्ट केलेल्या नियमांनुसारपॅकिंग केले जात आहे की नाही, आणि निश्चित केलेल्या नियमानुसार वैधानिकआरोग्य चेतावणी दिली जात आहे की नाही, हे तपासावे.

✨या नियमांचे उल्लंघन करणा-या  संबंधितांवर दंडात्मक गुन्हा नोंदवून तुरूंगवास आणिदंडाची शिक्षा देण्याची तरतूद कलम 20- सिगरेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादन(व्यापार आणि वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण यांच्यावरील निर्बंध) कायदा, 2003 मध्ये आहे.

✨या उत्पादनांच्याबाबतीत ‘‘पॅकेज’’च्या व्याख्येमध्ये अधिनियम आणि त्यातल्यानियमांच्या अनुसार सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार सध्या देण्‍यात येणा-याआरोग्यविषयक वैधानिक ईशारा 30 नोव्हेंबर 2020 पर्यंतच छापता येणार आहे. 

कोचीन शिपयार्ड लिमिटेड नॉर्वेच्या ॲस्को मेरीटाईम कंपनीसाठी वीजेवर चालणारे स्वयंचलित जहाज तयार करणार.

🌸नॉर्वेतील किरकोळ विक्री क्षेत्रातील सर्वात मोठ्या नोर्जेस ग्रूपेन ए.एस.ए. या कंपनीची उपकंपनी असलेल्या ॲस्को मेरीटाईम ए.एस. या कंपनीचे कंत्राट कोचीन शिपयार्डने मिळवले आहे.

🌸कोचीच्या कोचीन शिपयार्ड लिमिटेड या भारतीय जहाजबांधकाने नॉर्वेच्या ॲस्को मेरीटाईम ए.एस. संस्थेसोबत दोन विजेवर चालणाऱ्या स्वयंचलित जहाज / बोटी बनविण्यासाठी आणि त्यांचा पुरवठा करण्यासाठी आणि तशाच प्रकारच्या नौका बनविण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहे.

🔶ठळक बाबी...

🌸हे जगातील पहिले विजेवर चालणारे स्वयंचलित जहाज असणार, ज्याची लांबी 67 मीटर असून त्याची 1846 kWh एवढी बॅटरी क्षमता असणार आहे.
कार्यरत झाल्यावर जगातील व्यापारी जहाज क्षेत्रात ही स्वयंचलित जहाजे शून्य कार्बन उत्सर्जनासहीत एक नवा मापदंड तयार करतील.

🌸विजेवर चालणारे जहाज बांधणीचा प्रकल्प हा नॉर्वेच्या सरकारचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प असून ओस्लोजवळील समुद्रधुनीतून जाणारा सरकार पुरस्कृत कार्बन-उत्सर्जन रहित परिवहन प्रकल्प आहे.

🌸काँगसबर्ग (स्वयंचलित जहाजांसाठी तंत्रज्ञान पुरविणारी कंपनी) आणि विल्यमसेन (नौवहन क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी) यांच्या संयुक्त विद्यमाने तयार झालेल्या मास्टरली एएस या पहिल्या तंत्रज्ञान व्यवस्थापन आणि स्वयंचलित वाहने बनविणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापनाखाली ही जहाजे चालवली जातील.

सूचकांक 2020

🔶 विश्व प्रेस स्वतंत्रता सूचकांक 2020
➡️ भारत :- 142
➡️ नॉर्वे :- 1

🔶 विश्व खुशहाली सूचकांक 2020
➡️ भारत :- 144
➡️ फिनलैंड :- 1

🔶 प्रत्यक्ष बिक्री उद्योग सूचकांक 2020
➡️ भारत :- 15
➡️ अमेरीका :- 1

🔶 वैश्विक विनिर्माण जोखिम सूचकांक 2020
➡️ भारत :- 3
➡️ चीन :- 1

🔶 वैश्विक रियल एस्टेट पारदर्शिता सूचकांक 2020
➡️ भारत :- 34
➡️ UK :- 1

🔶 पर्यावरण प्रदर्शन सूचकांक 2020
➡️ भारत :- 168
➡️ डेनमार्क :- 1

🔶 जलवायु जोखिम सूचकांक 2020
➡️ भारत :- 5
➡️ जापान :- 1

🔶 वैश्विक जलवायु परिवर्तन प्रदर्शन सूचकांक 2020
➡️ भारत :- 9
➡️ स्वीडन :- 1

🔶 FIFA रेंकिंग 2020
➡️ भारत :- 108
➡️ बेल्जियम

🔶 सतत विकास लक्ष्य सूचकांक 2020
➡️ भारत :- 117
➡️ स्वीडन :- 1

🔶 विश्व सैन्य खर्च रिपोर्ट 2020
➡️ भारत :- 3
➡️ अमेरीका :- 1

🔶 व्यापार सुगमता सूचकांक 2020
➡️ भारत :- 63
➡️ न्यूजीलैंड :- 1

🔶 वैश्विक प्रतिभा प्रतिस्पर्धात्मक सूचकांक 2020
➡️ भारत :- 72
➡️ स्विट्जरलैंड :- 1

🔶 विश्व प्रतिस्पर्धा सूचकांक 2020
➡️ भारत :- 43
➡️ सिंगापुर :- 1

🔶 अंतर्राष्ट्रीय बौद्धिक संपदा सूचकांक 2020
➡️ भारत :- 40
➡️ अमेरीका :- 1

🔶 स्थिरता सूचकांक 2020
➡️ भारत :- 77
➡️ ब्रूरडी :- 1

🔶 सोशल मोबिलिटी सूचकांक 2020
➡️ भारत :- 76
➡️ डेनमार्क :- 1

🔶 शिशु विकास सूचकांक 2020
➡️ भारत :- 131
➡️ नॉर्वे :- 1

🔶 ग्लोबल जेंडर गैप सूचकांक 2020
➡️ भारत :- 112
➡️ आइसलैंड :- 1

🔶 हेनले पासपोर्ट सूचकांक 2020
➡️ भारत :- 84
➡️ जापान :- 1

डॉ एे पी जे अब्दुल कमाल

◾️जन्म : 15 ऑक्टोबर 1931 रामेश्वर येथे.

◾️अवुल पाकिर जेनुलब्दिन अब्दुल कलाम

◾️ए.पी.जे अब्दुल कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती होते.

◾️कार्यकाळ
25 जुलै  2002 – 25 जुलै 2007

◾️

◾️त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले

◾️1963 मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पीएसएलव्ही (सॅटेलाईट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेतला

◾️इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला

◾️अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले.

◾️संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टॅंक) रणगाडा व लाइट कॉंबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

◾️भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला

◾️कलाम हे राष्ट्रपती भवनवर आलेले प्रथम शास्त्रज्ञ होते

🚀 1985 : त्रिशूल,
🚀1988 : पृथ्वी,
🚀1989 : अग्नी,
🚀1990 : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती.

◾️5 अग्नी बाणांमुळे त्यांना मिसाईल मँन म्हणतात

◾️ सप्टेंबर 2015 : बंगालच्या उपसागरात ओरिसाच्या किनाऱ्याजवळ असलेल्या व्हीलर आयलंडचे प्रचलित नाव बदलून ते अब्दुल कलाम बेट असे करण्यात आले.

◾️ए.पी.जे. अब्दुल कलाम 27 जुलै 2015 रोजी कलाम शिलॉंग येथे भारतीय शास्त्र व्यवस्थापन शिलॉंग येथे "पृथ्वी नावाचा एक जिवंत ग्रह तयार करणे" या विषयावर व्याख्यान देण्यासाठी गेले. 

◾️तेथेच त्यांचे निधन झाले

◾️अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.

भारतीय क्षेपणास्त्रे आणि त्यांची वैशिष्ट्ये

🧩बराक 8 :

🅾हे भारत आणि इस्रायल यांच्याकडून संयुक्तपणे विकसित केले जाणारे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हे हवेत अधिकतम 16 किमी उंचीवर आणि 100 किमी लांबीवरील लक्ष्यांवर मारा करू शकते

🧩निर्भय :

🅾या निर्भय’ क्षेपणास्त्राची क्षमता ही अमेरिकेच्या टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांएवढी आहे. निर्भय क्षेपणास्त्राची 1000 किलोमीटर पर्यंत अचूक मारा करण्याची क्षमता असून त्यावर 300 किलो वजनाची पारंपरिक अण्वस्त्रे बसवता येतात.

🧩पिनाका अग्निबाण प्रणाली  :

🅾 अग्निबाण प्रक्षेपकांव्दारे 12 रॉकेटस 44 सेकंदांत प्रक्षेपित, 40 किमी पल्ला.

🧩आकाश:

🅾हे जमिनीवरून हवेत अधिकतम 18 किमी उंचीवर आणि 25 ते 30 किमी लांबीवर मारा करू शकणारे स्वदेशी क्षेपणास्त्र आहे

🧩ब्राम्होस :

🅾 हे भारत आणि रशियामार्फत संयुक्तरीत्या विकसित केले जात असलेले सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्र आहे. या सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्राचा वेग 2.8 मॅच क्रमांक आहे. म्हणजेच त्याचा वेग ध्वनीच्या हवेतील वेगापेक्षा 2.8 पटीने जास्त असेल. यानुसार त्याचा वेग ताशी 3,400 कि.मी. इतका असेल. त्याचे उड्डाण पाणबुडी, विमान, जहाज तसेच जमिनीवरून केले जाऊ शकेल.

🧩त्रिशुल:-

🅾या क्षेपणास्त्राचा पल्ला हवेत 9 किमी इतका आहे.

🧩नाग:

🅾हे रणगाडा भेदी मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हे भारतीय बनावटीचे असून याची मारक क्षमता 7 किलोमीटर आहे.

🧩सूर्या :

🅾हे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. याचा पल्ला 5 हजार ते 8 हजार कि.मी एवढा आहे.

🧩सागरिका:

🅾हे भारताचे पाण्याखालून मारा करणारे, अण्वस्त्रधारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र के-15 या कार्यक्रमाने विकसित करण्यात आलेले आहे.

🧩शौर्य:

🅾हे मध्यम पल्ल्याचे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे अर्ध - बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. त्याचा वापर भूदलामार्फत केला जाईल. याचा पल्ला 750 कि.मी. आहे. हे क्षेपणास्त्र एक टन वजनाची पारंपरिक व आण्विक शस्त्रास्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे.

🧩धनुष:

🅾हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या पृथ्वी क्षेपणास्त्राचे नौदलासाठीचे बॅलिस्टिक संस्करण आहे.

🧩अग्नी:

🅾हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राच्या पाच श्रृंखला आहेत. अग्नी 1 - हे अग्नी क्षेपणास्त्राचे कमी पल्ल्याचे (700 कि.मी.) संस्करण आहे.

🧩तेजस:

🅾हे भारत विकसित करीत असलेल्या हलके लढाऊ विमानाचे नाव आहे. तेजस हे सर्वात लहान, खूप हलके, एक व्यक्ती बसू शकेल असे, एक इंजिन सुपरसोनिक, बहुआयामी, चौथ्या पिढीतील लढाऊ विमान आहे.

🧩सारथ:

🅾हे एक पायदळ लढाऊ विमान आहे. ते भारतीय बनावटीचे असून त्रिशूल, आकाश आणि नाग क्षेपणास्त्रे वाहून नेण्यासाठी आणि प्रक्षेपित करण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात आली आहे.

🧩हॉक्स :

🅾हे ब्रिटनचे अ‍ॅडव्हान्स्ड जेट ट्रेनर्स आहेत. वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी त्यांचा वापर करण्यात येईल.

🧩 फाल्कन :

🅾 हे इस्त्रायलने निर्माण केलेले मोबाईल रडार आहे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

Online Test Series

तुम्हाला माहिती आहे का :- थोर समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ

० डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्यप्रदेश)

० राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर

० नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे)

० कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज(कोल्हापूर)

० बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी)

० महात्मा फुले- पुणे

० महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी)

० गोपाळ गणेश आगरकर- टेंभू (सातारा)

० गोपाळ हरी देशमुख- पुणे

० न्या. महादेव गोविंद रानडे- निफाड (नाशिक)

० सयाजीराव गायकवाड- कवळाणे (नाशिक)

० बाळ गंगाधर टिळक- (रत्नागिरी)

० आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके-
शिरढोण (रायगड)

० आचार्य विनोबा भावे- गागोदे (रायगड)

०स्वा. विनायक दामोदर सावरकर- भगूर (नाशिक)

० सावित्रीबाई फुले- नायगांव (सातारा)

० विठ्ठल रामजी शिंदे- जमखिंडी (कर्नाटक राज्य)

० गोपाळ कृष्ण गोखले- कातलुक (रत्नागिरी)

० विष्णू भिकाजी गोखले- बावधन (सातारा)

० डॉ. पंजाबराव देशमुख- पापळ (अमरावती)

० साने गुरुजी- पालघर (रायगड)

० संत गाडगेबाबा- शेणगांव (अमरावती)

० सेनापती बापट- पारनेर (अहमदनगर)

० संत ज्ञानेश्वर- आपेगाव

०संत एकनाथ- पैठण

० समर्थ रामदास स्वामी- जांब (जालना)

० संत तुकडोजी महाराज- यावली (अमरावती)

चालू घडामोडी


• सीमा रस्ते संस्था (BRO) ने................हा पूल पूर्णपणे बदलण्यासाठी ‘प्रोजेक्ट अरुणक’ आरंभ केला
- डापोरीजो पूल (अरुणाचल प्रदेशातल्या अप्पर सुबानसिरी जिल्ह्यात).

• केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाने EPF ग्राहकांकडून तीन महिन्यांपर्यंत मूलभूत वेतन आणि महागाई भत्तेच्या रकमेपर्यंत किंवा EPF खात्यात सदस्याच्या जमा असलेल्या रकमेच्या ____पर्यंत, जे कमी असेल, आगाऊ रक्कम काढण्याची परवानगी दिली
- 75 टक्के.

• पहिल्यांदाच, भारतीय स्टेट बँकेने (SBI)................. इतक्या रकमेचे ग्रीन बॉन्ड उभारले आहेत जे SBIच्या लंडन शाखेत सिंगापूर SGX वर सूचीबद्ध केले जातील
- 100 दशलक्ष डॉलर.

• नवी दिल्लीच्या AIIMS संस्थेतर्फे स्थापन करण्यात आलेले टेलीमेडिसिन केंद्र, ज्याद्वारे तज्ञ डॉक्टर देशभरातल्या तज्ञांशी संपर्क साधतील
- CoNTeC (कोविड-10 राष्ट्रीय दूर-सल्लामसलत केंद्र).

• 1971 साली पाकिस्तानशी झालेल्या युद्धाच्या वेळी बांगलादेशाच्या मुक्तिसाठी चालविण्यात आलेल्या हवाई मोहिमांमध्ये नेतृत्व करणारे निवृत्त एअर वाइस-मार्शल........... यांचे 29 मार्च रोजी निधन झाले
– चंदन सिंग राठौड.

• .................या राज्य विधानसभेने 30 मार्च 2020 रोजी 2020-21 या आर्थिक वर्षात राज्य सरकारला त्याच्या एकत्रित निधीतून 1.55 लक्ष कोटी रुपये खर्च करण्याचे विनियोजन विधेयक एकमताने मंजूर केले
- ओडिशा.

• ..............या भारतीय संस्थेने विलगीकरण केलेल्या लोकांचा मागोवा घेण्यासाठी ‘कोरोनटाईन’ (CORONTINE) नावाचे एक व्यासपीठ तयार केले
- भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मुंबई.

• सीमा रस्ते संस्था (BRO) ने................हा पूल पूर्णपणे बदलण्यासाठी ‘प्रोजेक्ट अरुणक’ आरंभ केला
- डापोरीजो पूल (अरुणाचल प्रदेशातल्या अप्पर सुबानसिरी जिल्ह्यात).

• केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाने EPF ग्राहकांकडून तीन महिन्यांपर्यंत मूलभूत वेतन आणि महागाई भत्तेच्या रकमेपर्यंत किंवा EPF खात्यात सदस्याच्या जमा असलेल्या रकमेच्या ____पर्यंत, जे कमी असेल, आगाऊ रक्कम काढण्याची परवानगी दिली
- 75 टक्के.

• पहिल्यांदाच, भारतीय स्टेट बँकेने (SBI)................. इतक्या रकमेचे ग्रीन बॉन्ड उभारले आहेत जे SBIच्या लंडन शाखेत सिंगापूर SGX वर सूचीबद्ध केले जातील
- 100 दशलक्ष डॉलर.

• नवी दिल्लीच्या AIIMS संस्थेतर्फे स्थापन करण्यात आलेले टेलीमेडिसिन केंद्र, ज्याद्वारे तज्ञ डॉक्टर देशभरातल्या तज्ञांशी संपर्क साधतील
- CoNTeC (कोविड-10 राष्ट्रीय दूर-सल्लामसलत केंद्र).

• 1971 साली पाकिस्तानशी झालेल्या युद्धाच्या वेळी बांगलादेशाच्या मुक्तिसाठी चालविण्यात आलेल्या हवाई मोहिमांमध्ये नेतृत्व करणारे निवृत्त एअर वाइस-मार्शल........... यांचे 29 मार्च रोजी निधन झाले
– चंदन सिंग राठौड.

• .................या राज्य विधानसभेने 30 मार्च 2020 रोजी 2020-21 या आर्थिक वर्षात राज्य सरकारला त्याच्या एकत्रित निधीतून 1.55 लक्ष कोटी रुपये खर्च करण्याचे विनियोजन विधेयक एकमताने मंजूर केले
- ओडिशा.

• ..............या भारतीय संस्थेने विलगीकरण केलेल्या लोकांचा मागोवा घेण्यासाठी ‘कोरोनटाईन’ (CORONTINE) नावाचे एक व्यासपीठ तयार केले
- भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मुंबई.

Q1) ____ या समस्येला तोंड देण्यासाठी भारत आणि इस्रायल या देशांनी एक करार केला.
उत्तर :- सायबर गुन्हे

Q2)कोणाच्या हस्ते दिल्लीत पाचव्या ‘उड्डयन आणि संरक्षण निर्मिती तंत्रज्ञान’ परिषदेचे उद्घाटन झाले?
उत्तर:- श्रीपाद येसो नाईक

Q3) कोचीन शिपयार्ड लिमिटेड या कंपनीने _ याची बांधणी करण्यासाठी नॉर्वेच्या ॲस्को मेरीटाईम या कंपनीसोबत करार केला.
उत्तर :- विजेवर चालणारे जहाज

Q4) कोणत्या योजनेला ‘वंदे भारत’ मोहिमेचे नवे रूप म्हणून ओळखले जाते?
उत्तर:- एअर बबल

Q5) 'FIFA विश्व चषक 2022’ ही स्पर्धा _ देशात खेळवली जाणार आहे.
उत्तर:- कतार

Q6) कोणत्या व्यक्तीच्या हस्ते खाद्यान्नावरील प्रक्रियेच्या संदर्भातल्या ‘डिजिटल भारत-इटली व्यवसाय अभियान’चे उद्घाटन झाले?
उत्तर:-  हरसिमरत कौर बादल

Q7) कोणती व्यक्ती सुरिनाम देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवडली गेली?
उत्तर:-चंद्रिकापरसाद 'चान' संतोखी

Q8) _ यांनी "द तंगम्स" या शीर्षकाच्या पुस्तकाचे अनावरण केले.
उत्तर:- पेमा खंडू

Q9) कोणत्या वनाला ‘वन्यजीव अभयारण्य’चा दर्जा प्रदान करण्यात आला आहे?
उत्तर:- पोबा

Q10) _ ही कंपनी “अंजी खाड पूल” हा भारतातील पहिला तारांच्या सहाय्याने उभारलेला रेल्वे पूल बांधणार आहे.
उत्तर:- के. आर. सी. एल.

भारतात शिका’ कार्यक्रमाच्या अंतर्गत भारतात पहिल्यांदाच ‘Ind-SAT’ परीक्षेचे आयोजन

🧩‘भारतात शिका’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत भारत सरकारच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिनांक 22 जुलै 2020 रोजी पहिल्यांदाच भारतीय शैक्षणिक मूल्यांकन (Ind-SAT) परीक्षा घेतली.

◾️ठळक बाबी....

🧩राष्ट्रीय चाचणी संस्थेतर्फे (NTA) प्रक्षेपित आंतरजाल पद्धतीने घेतलेल्या या परीक्षेत नेपाळ, इथिओपिया, बांग्लादेश, भुटान, युगांडा, टांझानिया, रवांडा, श्रीलंका, केनिया, झांबिया, इंडोनेशिया आणि मॉरीशस या देशांमधून सुमारे पाच हजार उमेदवार सहभागी झाले होते.

🧩मंत्रालयाच्या अंतर्गत EdCIL (भारत) मर्यादित या सार्वजनिक उपक्रमाने आणि SII या अंमलबजावणी संस्थेनी या परीक्षेसाठी नोंदणी आणि इतर बाबींची पूर्तता केली.

🧩Ind-SAT परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे ‘भारतात शिका’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाणार आहे.   

🧩भारतातल्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी परदेशी उमेदवारांना शिष्यवृत्ती प्रदान करण्याच्या उद्देशाने आशियाई तसेच आफ्रिकी देशांमध्ये Ind-SAT परीक्षेचे आयोजन करण्याच्या प्रस्ताव वित्तमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पिय भाषणात मांडला होता. यावर्षी प्रायोगिक तत्वावर 12 देशांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. भविष्यात इतरही देशांमध्ये ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे.

◾️‘भारतात शिका’ कार्यक्रमाविषयी...

🧩‘भारतात शिका’ हा मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा कार्यक्रम असून त्याच्या अंतर्गत परदेशी विद्यार्थी भारतातल्या निवडक अशा 116 उच्च शिक्षण संस्थांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी येतात.

🧩इयत्ता बारावी वा शालांत परीक्षेतल्या गुणांच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड केली जाते. गुणानुक्रमे पहिल्या 2000 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते तर इतर काही विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कामध्ये सवलत दिली जाते. या कार्यक्रमाच्या पहिल्या वर्षात, 2018-19 साली सुमारे 780 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. तर दुसऱ्या वर्षी ही संख्या 3200 वर पोहोचली.

🧩‘भारतात शिका’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत निवडक भारतीय विद्यापिठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी परदेशातल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी तसेच शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी Ind-SAT ही परीक्षा घेतली जाते. भारतात शिकण्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता मापण्याच्या उद्देशाने या परिक्षेची रचना करण्यात आली आहे.

मुकेश अंबानी जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती

➡️उद्योजक मुकेश अंबानी यांच्यासाठी मात्र 2020 हे वर्ष खूपच चांगलं ठरताना दिसतंय. लॉकडाउनमध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजमध्ये अनेक बड्या कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली.
त्यांच्या रिलायन्स जिओच्या व्यवसायातही वाढ झाली, आणि आता मुकेश अंबानी यांच्या संपत्तीतही वाढ झाली आहे.

➡️अब्जाधीश मुकेश अंबानी आता जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले  आहेत.
प्रसिद्ध बिजनेस मॅगझीन फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार मुकेश अंबानी जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

➡️रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन असलेल्या मुकेश अंबानी यांनी फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीमध्ये अमेरिकी गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांना मागे टाकत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे.फोर्ब्सच्या यादीनुसार मुकेश अंबानी यांची संपत्ती 75 अब्ज डॉलर झाली आहे.

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...